श्रीमत् हंसराजस्वामी १९ व्या शतकातील एक थोर वेदांती संत होते. स्वामींचे वेदेश्वरी, लघुवाक्यवृत्ती टीका हे ग्रंथ प्रसिद्धच आहेत. आगमसार हा त्यांचा पहिला स्वतंत्र ग्रंथ. ग्रंथ केवळ ३५०० ओव्यांचाच आहे, पण अद्वैत वेदांताच्या अभ्यासकांसाठी अनन्य महत्त्वाचा आहे. ग्रंथ दोन विभागलेला आहे. प्रत्येक विभागात सात सात पंचिका आणि प्रत्येक पंचिकेत पाच पाच समास आहेत. पूर्वार्धात तात्विक चर्चा असून उत्तरार्धात ब्रह्मात्मैक्य प्राप्तीच्या साधनांची चर्चा आहे. तीव्रप्रज्ञ अधिकार्यासाठी पूर्वार्धातील निरूपण पुरेसे आहे. मंदप्रज्ञ अधिकार्यासाठी उत्तरार्धात साधनांची चर्चा उपयुक्त आहे.
पूर्वार्धाला स्वामींनी ’विचार’ म्हटले आहे कारण त्यात मुख्यत्वे सांख्य म्हणजेच तात्त्विक विचाराचे प्रतिपादन आहे. विचाराच्या साहाय्याने पिंडब्रह्मांडातील नित्यानित्य वस्तूंचा विवेक करून स्वतःच्या अभेदरूप ब्रह्मस्वरूपाची ओळख करून घेणे - हा या भागाचा प्रमुख विषय आहे. त्यासाठी वेदांताच्या दृष्टिकोनातून जीव, जगत्, परमेश्वर, अविद्या, माया, कूटस्थ ब्रह्म यांची स्वरूपे व त्यांचे परस्परसंबंध इत्यादिंचे वर्णन आले आहे. श्रवणमननाच्या साहाय्याने आणि गुरुकृपेच्या योगाने जीवाला प्रथम आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान होते आणि नंतर विचारांच्या साहाय्याने तो अपरोक्ष ज्ञान प्राप्त करतो असे स्वामींच्या प्रतिपादनाचे सूत्र दिसते.
उत्तरार्धाला स्वामी ’अभ्यास’ म्हणतात. अभ्यास म्हणजे योग, अर्थात् चित्त स्थिर करण्याचा अभ्यास. ’योगा’साठी स्वामींनी परंपरागत पतंजलीप्रणीत योगाऐवजी शंकराचार्यांच्या ’अपरोक्षानुभूति’ तील ध्यानाची अंगांचा अनुवाद केला आहे. अभ्यास म्हणजे ध्यानाच्या साहाय्याने ब्रह्मात्मैक्य साध करण्याचा मार्ग. तो करीत असताना अनेम विघ्ने येतात. त्यांचे निरसन कसे करावे, तो साध्य झाला की क्रमाक्रमाने जीवनमुक्ति, विदेहमुक्ति, सहजस्थिती इ. उत्तरोत्तर श्रेष्ठ अशा अवस्थांची प्राप्ति होऊम दृढ अपरोक्षस्थितीला साधक कसा पोहोचतो याचे विवेचन स्वामींनी तपशीलाने केले आहे.
उपनिषदांच्या आधारे सर्व वेदांतप्रक्रिया सुसंगतपणे एकत्र मांडणे हा स्वामींच्या या ग्रंथाच्य अरचनेमागचा हेतू दिसतो. म्हणून या ग्रंथात जागोजागी औपनिषदिक संदर्भ वापरलेले आहेत. तैत्तिरीय उपनिषदातील पंचकोशविवरण, कठोपनिषदातील आत्मा - रथी, देह - रथ, इ. सदर्भ आले आहेत. ग्रंथ दासबोधाप्रमाणे संवादात्मक आहे पण प्रत्यक्ष संवाद नाहीत. मार्मिक प्रश्न उपस्थित करून त्यास मार्मिकतेने उत्तरे देण्यात आली आहेत.
श्रीमत् हंसराजस्वामी १९ व्या शतकातील एक थोर वेदांती संत होते. स्वामींचे वेदेश्वरी, लघुवाक्यवृत्ती टीका हे ग्रंथ प्रसिद्धच आहेत. आगमसार हा त्यांचा पहिला स्वतंत्र ग्रंथ. ग्रंथ केवळ ३५०० ओव्यांचाच आहे, पण अद्वैत वेदांताच्या अभ्यासकांसाठी अनन्य महत्त्वाचा आहे. ग्रंथ दोन विभागलेला आहे. प्रत्येक विभागात सात सात पंचिका आणि प्रत्येक पंचिकेत पाच पाच समास आहेत. पूर्वार्धात तात्विक चर्चा असून उत्तरार्धात ब्रह्मात्मैक्य प्राप्तीच्या साधनांची चर्चा आहे. तीव्रप्रज्ञ अधिकार्यासाठी पूर्वार्धातील निरूपण पुरेसे आहे. मंदप्रज्ञ अधिकार्यासाठी उत्तरार्धात साधनांची चर्चा उपयुक्त आहे.
पूर्वार्धाला स्वामींनी ’विचार’ म्हटले आहे कारण त्यात मुख्यत्वे सांख्य म्हणजेच तात्त्विक विचाराचे प्रतिपादन आहे. विचाराच्या साहाय्याने पिंडब्रह्मांडातील नित्यानित्य वस्तूंचा विवेक करून स्वतःच्या अभेदरूप ब्रह्मस्वरूपाची ओळख करून घेणे - हा या भागाचा प्रमुख विषय आहे. त्यासाठी वेदांताच्या दृष्टिकोनातून जीव, जगत्, परमेश्वर, अविद्या, माया, कूटस्थ ब्रह्म यांची स्वरूपे व त्यांचे परस्परसंबंध इत्यादिंचे वर्णन आले आहे. श्रवणमननाच्या साहाय्याने आणि गुरुकृपेच्या योगाने जीवाला प्रथम आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान होते आणि नंतर विचारांच्या साहाय्याने तो अपरोक्ष ज्ञान प्राप्त करतो असे स्वामींच्या प्रतिपादनाचे सूत्र दिसते.
उत्तरार्धाला स्वामी ’अभ्यास’ म्हणतात. अभ्यास म्हणजे योग, अर्थात् चित्त स्थिर करण्याचा अभ्यास. ’योगा’साठी स्वामींनी परंपरागत पतंजलीप्रणीत योगाऐवजी शंकराचार्यांच्या ’अपरोक्षानुभूति’ तील ध्यानाची अंगांचा अनुवाद केला आहे. अभ्यास म्हणजे ध्यानाच्या साहाय्याने ब्रह्मात्मैक्य साध करण्याचा मार्ग. तो करीत असताना अनेम विघ्ने येतात. त्यांचे निरसन कसे करावे, तो साध्य झाला की क्रमाक्रमाने जीवनमुक्ति, विदेहमुक्ति, सहजस्थिती इ. उत्तरोत्तर श्रेष्ठ अशा अवस्थांची प्राप्ति होऊम दृढ अपरोक्षस्थितीला साधक कसा पोहोचतो याचे विवेचन स्वामींनी तपशीलाने केले आहे.
उपनिषदांच्या आधारे सर्व वेदांतप्रक्रिया सुसंगतपणे एकत्र मांडणे हा स्वामींच्या या ग्रंथाच्य अरचनेमागचा हेतू दिसतो. म्हणून या ग्रंथात जागोजागी औपनिषदिक संदर्भ वापरलेले आहेत. तैत्तिरीय उपनिषदातील पंचकोशविवरण, कठोपनिषदातील आत्मा - रथी, देह - रथ, इ. सदर्भ आले आहेत. ग्रंथ दासबोधाप्रमाणे संवादात्मक आहे पण प्रत्यक्ष संवाद नाहीत. मार्मिक प्रश्न उपस्थित करून त्यास मार्मिकतेने उत्तरे देण्यात आली आहेत.
श्रीमत् हंसराजस्वामी १९ व्या शतकातील एक थोर वेदांती संत होते. स्वामींचे वेदेश्वरी, लघुवाक्यवृत्ती टीका हे ग्रंथ प्रसिद्धच आहेत. आगमसार हा त्यांचा पहिला स्वतंत्र ग्रंथ. ग्रंथ केवळ ३५०० ओव्यांचाच आहे, पण अद्वैत वेदांताच्या अभ्यासकांसाठी अनन्य महत्त्वाचा आहे. ग्रंथ दोन विभागलेला आहे. प्रत्येक विभागात सात सात पंचिका आणि प्रत्येक पंचिकेत पाच पाच समास आहेत. पूर्वार्धात तात्विक चर्चा असून उत्तरार्धात ब्रह्मात्मैक्य प्राप्तीच्या साधनांची चर्चा आहे. तीव्रप्रज्ञ अधिकार्यासाठी पूर्वार्धातील निरूपण पुरेसे आहे. मंदप्रज्ञ अधिकार्यासाठी उत्तरार्धात साधनांची चर्चा उपयुक्त आहे.
पूर्वार्धाला स्वामींनी ’विचार’ म्हटले आहे कारण त्यात मुख्यत्वे सांख्य म्हणजेच तात्त्विक विचाराचे प्रतिपादन आहे. विचाराच्या साहाय्याने पिंडब्रह्मांडातील नित्यानित्य वस्तूंचा विवेक करून स्वतःच्या अभेदरूप ब्रह्मस्वरूपाची ओळख करून घेणे - हा या भागाचा प्रमुख विषय आहे. त्यासाठी वेदांताच्या दृष्टिकोनातून जीव, जगत्, परमेश्वर, अविद्या, माया, कूटस्थ ब्रह्म यांची स्वरूपे व त्यांचे परस्परसंबंध इत्यादिंचे वर्णन आले आहे. श्रवणमननाच्या साहाय्याने आणि गुरुकृपेच्या योगाने जीवाला प्रथम आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान होते आणि नंतर विचारांच्या साहाय्याने तो अपरोक्ष ज्ञान प्राप्त करतो असे स्वामींच्या प्रतिपादनाचे सूत्र दिसते.
उत्तरार्धाला स्वामी ’अभ्यास’ म्हणतात. अभ्यास म्हणजे योग, अर्थात् चित्त स्थिर करण्याचा अभ्यास. ’योगा’साठी स्वामींनी परंपरागत पतंजलीप्रणीत योगाऐवजी शंकराचार्यांच्या ’अपरोक्षानुभूति’ तील ध्यानाची अंगांचा अनुवाद केला आहे. अभ्यास म्हणजे ध्यानाच्या साहाय्याने ब्रह्मात्मैक्य साध करण्याचा मार्ग. तो करीत असताना अनेम विघ्ने येतात. त्यांचे निरसन कसे करावे, तो साध्य झाला की क्रमाक्रमाने जीवनमुक्ति, विदेहमुक्ति, सहजस्थिती इ. उत्तरोत्तर श्रेष्ठ अशा अवस्थांची प्राप्ति होऊम दृढ अपरोक्षस्थितीला साधक कसा पोहोचतो याचे विवेचन स्वामींनी तपशीलाने केले आहे.
उपनिषदांच्या आधारे सर्व वेदांतप्रक्रिया सुसंगतपणे एकत्र मांडणे हा स्वामींच्या या ग्रंथाच्य अरचनेमागचा हेतू दिसतो. म्हणून या ग्रंथात जागोजागी औपनिषदिक संदर्भ वापरलेले आहेत. तैत्तिरीय उपनिषदातील पंचकोशविवरण, कठोपनिषदातील आत्मा - रथी, देह - रथ, इ. सदर्भ आले आहेत. ग्रंथ दासबोधाप्रमाणे संवादात्मक आहे पण प्रत्यक्ष संवाद नाहीत. मार्मिक प्रश्न उपस्थित करून त्यास मार्मिकतेने उत्तरे देण्यात आली आहेत.