Professional Documents
Culture Documents
Marathi Yuvakbharati Digest 00001
Marathi Yuvakbharati Digest 00001
Begin Content
अभ्यासक्रमावर आधारित
JUNIOR COLLEGE
नवनीत मराठी युवकभारती निबंध व लेखन
इयत्ता ११ वी-१२ वी
ठळक वैशिष्ट्ये
• निबंधलेखन
• कवितांचे रसग्रहण
• पत्रलेखन
• संवादलेखन
• उताऱ्याचे आकलन व सारांशलेखन
• भाषांतर
• मुलाखतीसाठी प्रश्नावलीलेखन
• जाहिरातलेखन
• वृत्तलेखन
उपयोजित लेखनाचे परिपूर्ण मार्गदर्शन करणारे एकमेव पुस्तक
हे पुस्तक सर्व पुस्तक-विक्रे त्यांकडे उपलब्ध आहे.
NAVNEET
नवनीत एज्युके शन लिमिटेड
EW12nb
मराठी युवकभारती
नवनीत
इयत्ता अकरावी
कृ ती आधारित
• ठळक वैशिष्ट्ये:
१. नवीन अभ्यासक्रम व नवीन पाठ्यपुस्तक यांवर आधारित अद्ययावत परिपूर्ण रचना.
२. गद्य पाठांतील मजकु राचे योग्य प्रमाणात उतारे करून त्यावर कृ तिपत्रिके च्या आराखड्यानुसार अनेक अपेक्षित कृ ती आणि त्यांची अचूक व समर्पक
उत्तरे.
३. विशेष साहित्यप्रकार नाटक ––
यावर आधारित कृ ति-स्वाध्यायांचे सादयंत समर्पक खुलासेवार विश्लेषण.
४. स्वमत, अभिव्यक्ती, भाषासौंदर्य, उपयोजन यांवर विविधांगी कृ ती.
५. सर्व पाठांतील कठीण शब्दांचे सुबोध अर्थ आणि माहितीपर, स्पष्टीकरणात्मक सविस्तर टिपा.
६. गद्य अपठित उताऱ्यांचा स्वतंत्र विभाग आणि त्यावर बोर्डाच्या अपेक्षेप्रमाणे उत्तमोत्तम कृ ती.
७. सर्व कवितांचा सोप्या भाषेत भावार्थ.
८. व्याकरणावर कल्पक, काटेकोर व सुव्यवस्थित कृ ती व उत्तरे.
९. उपयोजित लेखन विभागातील सर्व घटकांबाबत कृ तींसह सविस्तर मार्गदर्शन.
नवनीत मार्गदर्शक म्हणजे
सुनियोजित अभ्यास, उज्ज्वल यश हमखास
लेखक :
श्री. नवनीत
पहिली आवृत्ती : २०१९\mathbf{२०१९}
Balbharati Registration
No. 2018MH0014
NAVNEET
किं मत : Rs १४०.००
E0271
नवनीत एज्युके शन लिमिटेड
नवनीत −\mathbf{-}
शैक्षणिक क्षेत्रातील देदीप्यमान यशाची ६० वर्षे !
सन १९५९ मध्ये रुजवलेल्या नवनीत एज्युके शन लिमिटेड या रोपट्याचे आता ६० व्या वर्षी डेरेदार वृक्षात रूपांतर झाले आहे. तब्बल साठ वर्षांच्या
या यशस्वी वाटचालीत नवनीतने प्रकाशन आणि स्टेशनरी व्यवसायात भारतातच नव्हे, तर परदेशांतही अढळ स्थान मिळवले आहे. शैक्षणिक
पुस्तके , वह्या, स्टेशनरी आणि पुढे जाऊन काळानुरूप ई-लर्निंग क्षेत्रामध्येही नवनीतने चांगलाच जम बसवला आहे. 'शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारी
परिपूर्ण संस्था' हे अभिमानाचे बिरुद मिरवत षष्ट्यब्दिपूर्ती आनंदाने साजरी करताना आम्ही कृ तकृ त्य आहोत.
असं म्हणतात की, गुणवत्ता हा अपघात नसून ती बुद्धिमान व्यक्तींच्या प्रयत्नांची फलश्रुती असते. नवनीतच्या गुणवत्तेचे श्रेयही निर्विवादपणे
नवनीतच्या संस्थापकांचे आहे. त्यांनी दिलेल्या ध्येयधोरणांशी बांधील राहून, त्यांचा वारसा पुढे चालवण्याचे प्रामाणिक प्रयत्न आम्ही करीत आहोत.
सुजाण आणि दक्ष विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, शैक्षणिक संस्था आणि शैक्षणिक साहित्य विक्रे ते ही आमची खरी ताकद आहे. त्यांचा
गुणवत्तेविषयीचा आग्रही दृष्टिकोन आम्हांला अतिशय मोलाचा वाटतो. त्यांचे सहकार्य आणि सदिच्छा घेऊनच आम्ही यशाचे अधिक उच्चांक प्रस्थापित
करू इच्छितो.
'उत्तम गुणवत्तेची खात्री म्हणजे नवनीत,' असा नवनीतचा ठसा उमटवण्यात आमच्या ६० वर्षांच्या या प्रदीर्घ वाटचालीत आमचे सर्व हितचिंतक आणि
कर्मचारीवृंद या सर्वांचे योगदान अमूल्य आहे. म्हणूनच आम्ही या सर्वांविषयी कृ तज्ञता व्यक्त करतो.
- नवनीत एज्युके शन लिमिटेड
NAVNEET
नवनीत एज्युके शन लिमिटेड
मुंबई : नवनीत भवन, भवानीशंकर रोड, दादर (प.), मुंबई-४०० ०२८. (फोन : ६६६२ ६५६५) www.navneet.com
e-mail: publications@navneet.com
पुणे : नवनीत भवन, १३०२, शुक्रवार पेठ, बाजीराव रोड, सणस प्लाझाजवळ, पुणे-४११ ००२. (फोन : २४४३ १००७)
नागपूर : ६३, शिवाजी सायन्स कॉलेजसमोर, काँग्रेसनगर, नागपूर -४४० ०१२. (फोन : २४२ १५२२)
नाशिक : निर्माण इन्स्पायर, दुसरा मजला, कान्हेरे वाडी, जुन्या सीबीएसच्या समोर, नाशिक-४२२ ००१.
(फोन : २५९ ६९५०)
© All rights reserved. No part of this book may be copied, adapted,
abridged or translated, stored in any retrieval system, computer
system, photographic or other system or transmitted in any form or by
any means without a prior written permission of the copyright holders,
M/s. Navneet Education Limited. Any breach will entail legal action and
prosecution without further notice.
Published by : Navneet Education Limited, Dantali, Gujarat.
Printed by : Navneet Education Limited, Dantali, Gujarat.
मनोगत
शैक्षणिक वर्ष २०१९−२०२०१९ - २०
पासून शिक्षण मंडळाने इयत्ता अकरावीच्या भाषाविषयाच्या आराखड्यात आमूलाग्र बदल के ला आहे. त्यानुसार योजलेल्या नवीन पाठ्यपुस्तकाचा
सखोल अभ्यास करून कृ ति-स्वाध्याय व त्यांची अचूक व समर्पक उत्तरे यासंबंधीचे परिपूर्ण मार्गदर्शन करणारे मराठी युवकभारती नवनीत : इयत्ता
अकरावी हे मार्गदर्शक पुस्तक विद्यार्थ्यांसाठी सादर करताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे.
पाठ्यपुस्तक व मार्गदर्शकाची रचना वैशिष्ट्ये
विभाग - १ व २ (गद्य व पद्य)
(१) गद्य : भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी गाभाघटक – नैतिक मूल्ये व जीवनकौशल्ये यांचा जाणीवपूर्वक विचार करून पाठ्यपुस्तकात गद्य
विभाग नेमलेला आहे. यात विद्यार्थ्यांना विविध साहित्यप्रकारांचा परिचय करून दिला आहे.
मार्गदर्शकात प्रत्येक गद्यपाठाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात लेखक/लेखिका यांचा परिचय – लेखनवैशिष्ट्ये - ग्रंथसंपदा यांचा उल्लेख करून पुढे
पाठाचा परिचय – शब्दार्थ – टिपा – वाक्प्रचार व अर्थ - कृ ति - स्वाध्याय व त्यांची समर्पक उत्तरे या क्रमाने पाठाचा सुसंगतवार अभ्यास करून
दिला आहे.
(२) पद्य : 'स्वतंत्रतेचे स्तोत्र' हे राष्ट्रभक्तीपर काव्य काव्यानंदासाठी नेमून इतर पद्यपाठांमध्ये निसर्ग, प्रेम, संतकाव्य, स्त्रीवादी व विद्रोही कविता
अभ्यासाला लावून विद्यार्थ्यांची काव्यगत जाण समृद्ध करण्याचे उद्दिष्ट राखले आहे. पद्य विभागात या वेळी रसग्रहणाचाही समावेश के ला आहे.
मार्गदर्शकात प्रत्येक पद्यपाठाच्या सुरुवातीला कवी/कवयित्री यांचा परिचय - काव्यवैशिष्ट्ये - ग्रंथसंपदा यांची माहिती देऊन पुढे कवितेची मध्यवर्ती
कल्पना - शब्दार्थ – टिपा - कवितेचा सुबोध भावार्थ – कृ ति-स्वाध्याय व त्यांची अचूक उत्तरे - काव्यसौंदर्य – स्वमत व अभिव्यक्ती यांचे परिपूर्ण
मार्गदर्शन या क्रमाने कवितांचा सखोल अभ्यास करून दिला आहे. प्रत्येक कवितेचे काव्यवैशिष्ट्यांसह यथायोग्य रसग्रहण के ले आहे. या विभागानंतर
अपठित गद्य व पद्य उताऱ्यांचे कृ ति-स्वाध्याय व त्यांची समर्पक उत्तरे विश्लेषणासह दिली आहेत.
विभाग - ३ (विशेष साहित्यप्रकार - नाटक)
या नवीन पाठ्यपुस्तकात या वेळी 'नाटक' हा विशेष साहित्यप्रकार स्वतंत्रपणे अंतर्भूत के ला आहे. यामध्ये तीन नाट्यउतारे व त्यांवरील आकलन –
स्वमत – अभिव्यक्ती असे कृ ति-स्वाध्याय दिले आहेत.
मार्गदर्शकात समूहकला असलेल्या नाटकाच्या प्रमुख घटकांचा ऊहापोह करून त्याचे स्वरूप सुबोध भाषेत उलगडू न दाखवले आहे आणि प्रत्येक
नाट्यउताऱ्यावरील कृ ति-स्वाध्याय अचूक व समर्पक पद्धतीने सोडवून दिले आहेत.
विभाग - ४ (उपयोजित लेखन)
व्यावसायिक क्षेत्रातील भाषिक कौशल्ये प्रगत करण्यासाठी प्रात्यक्षिक – सादरीकरण – प्रकल्प यांच्या माध्यमांतून व्यक्त होण्याची संधी विद्यार्थ्यांना
प्राप्त व्हावी म्हणून या वेळी पाठ्यपुस्तकात (१) सूत्रसंचालन (२) मुद्रितशोधन (३) अनुवाद (४) अनुदिनी (ब्लॉग) (५) रेडिओजॉकी या नवीन
भाषिक उपयोजित घटकांचा समावेश के ला आहे.
मार्गदर्शकात उपरोक्त प्रत्येक घटकांची सादयंत विश्लेषणात्मक माहिती दिली आहे; तसेच त्यावरील कृ ति-स्वाध्यायांची अचूक उत्तरे देऊन
विद्यार्थ्यांना सुलभ मार्गदर्शन के ले आहे.
विभाग - ५ (कार्यात्मक व्याकरण)
भाषा व भाषिक कौशल्ये यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास होऊन भाषा - समृद्धीकडे विद्यार्थ्यांचा कल व्हावा, म्हणून या वेळी (१) शब्दशक्ती (२) काव्यगुण
(३) वाक्यसंश्लेषण (४) काळाचे उपप्रकार (५) शब्दभेद या नवीन कार्यात्मक व्याकरणिक घटकांचा समावेश के ला आहे.
मार्गदर्शकात उपरोक्त प्रत्येक कार्यात्मक व्याकरण घटकाचा यथायोग्य परामर्श घेऊन, सुबोध भाषेत समजावून देऊन प्रत्येक घटकासाठी दिलेल्या
कृ ति-स्वाध्यायाची अचूक व समर्पक उत्तरे दिली आहेत.
शिवाय प्रत्येक गद्य व पद्य पाठाच्या शेवटी (अ) व्याकरण घटकांवर आधारित कृ ती (आ) भाषिक घटकांवर आधारित कृ ती यांवरील कृ ति-स्वाध्याय
देऊन, त्यांची योग्य व अचूक उत्तरे देऊन विद्यार्थ्यांचा व्याकरणाचा अभ्यास दृढमूल करण्याचा उपक्रम के ला आहे.
अशा प्रकारे सर्वांगीण व मूलभूत मार्गदर्शन करून विद्यार्थी-शिक्षक व पालक यांना उपयुक्त ठरून, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढू न त्यांचे यश उज्ज्वल होईल,
याची आम्हांला पक्की खात्री आहे.
प्रस्तुत पुस्तकाची उपयुक्तता आणखी वाढवण्याच्या दृष्टीने येणाऱ्या योग्य सूचनांचे आम्ही स्वागत करू.
- प्रकाशक
अनुक्रमणिका
शब्दार्थ
स्तोत्र - प्रार्थना. जयोऽस्तु - जयजयकार असो. महन्मंगले - महापवित्र. शिवास्पदे - शिवाचे (नीतीचे) घर. शुभदे - शुभदायी. भगवती - देवी,
देवता. त्वामहं - तुला मी. यशोयुतां - यश चिंतितो. वंदे - वंदन करतो. चैतन्य - ऊर्जा, शक्ती. मूर्त - प्रत्यक्ष. संपदा - वैभव, संपत्ती. श्रीमती
- प्रज्ञावंत. राज्ञी - राणी. परवशता - पारतंत्र्य. नभ - आकाश. कु सुमी - फु लांमध्ये. विलसतसे - शोभते, चमकते. तेज - प्रकाश. उदधी -
समुद्र. गांभीर्य – गंभीरता, गाढ शांतता. अन्यथा - दुसरे. ग्रहण - अंधाराने ग्रासणे. नष्ट - नाश. मोक्ष - मुक्ती. वेदांती - वेदांमध्ये. योगिजन -
साधू. परब्रह्म - विधाता. वदती - बोलतात, म्हणतात. उत्तम - सर्वोत्कृ ष्ट. उदात्त - भव्य. उन्नत - प्रगतिशील. महन्मधुर – खूप गोड. तव -
तुझे. सहचारी - सहकारी, सोबती. अधम - दुर्जन, दुष्ट. रक्त-रंजिते – रक्ताने माखलेली. सुजन - सज्जन. जनन - जगणे. सकल - सर्व.
चराचर – सृष्टी. दृढालिंगन - घट्ट मिठी. वरदे - आशीर्वाद देणारी.
१. मामू
- शिवाजी सावंत
लेखक परिचय
शिवाजी सावंत
सुप्रसिद्ध कादंबरीकार. 'मृत्युंजय' ही कादंबरी हा त्यांचा मानबिंदू. 'मृत्युंजय' ही कर्णाच्या जीवनावर आधारलेली कादंबरी अमाप गाजली. तिची
अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरे झाली. त्यांच्या अन्य काही कादंबऱ्या : 'छावा', 'युगंधर', 'लढत'. इतिहास-पुराणातील लोकोत्तर व्यक्ती या
त्यांच्या कादंबऱ्यांचे नायक. व्यक्तिचित्रणात्मक लेखसंग्रह : 'अशी मने असे नमुने', 'मोरावळा', 'लाल माती रंगीत मने'. अनेक पुरस्कारांनी
सन्मानित.
पाठ परिचय
हा व्यक्तिचित्रणात्मक पाठ. मामू हा पाठाचा नायक. शाळेतील शिपाई या पदावर नेमणूक. सामान्य स्तरावरील जीवन लाभलेले असताना स्वत:च्या
व्यक्तित्वातील उदात्त गुणांमुळे त्याने संपूर्ण व्यक्तिमत्त्वालाच उच्च, उदात्त पातळीवर नेले. मुख्यतः सेवाभावी वृत्ती. कधीही कोणालाही मदत करण्यास
तत्पर. समोर आलेले कोणतेही काम मनापासून, निष्ठापूर्वक व आनंदाने करण्याची वृत्ती असल्याने काम करता करता अनेक गुण आत्मसात के ले.
त्यामुळे व्यक्तिमत्त्व बहुआयामी बनले. त्याच्याविषयी लहानथोरांच्या मनात आदर, आपुलकी व सन्मानाची भावना.
शब्दार्थ
थोराड - मोठी, बळकट. कोंब - अंकु र. चर्येनं - चेहेऱ्याने, मुद्रेने. अनघड - न घडलेला, अजाण. रेलून - आधाराला टेकू न. चुनेवाणाची -
चुन्यासारखी. पायपीट करणे - थके पर्यंत चालणे. फाटेचं - पहाटेचे. चौवाटा – चहूवाटांनी. डु ईला - डोईला. पंपशू - चपलेचा एक प्रकार.
पारखत - तपासून पाहत. मासला - नमुना. अल्लाला प्यारी झाली - मरण पावली. आब - प्रतिष्ठा, इज्जत. निकोप - निर्दोष. अंग धरीसारकं -
अंग भरल्यासारखे. कवळिकीच्या - कोवळ्या.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) चौवाटा पांगणे : चहूबाजूंना विखुरणे.
(२) कं ठ दाटू न येणे : गहिवरणे.
(३) हरवलेला काळ मुठीत पकडणे : भूतकाळातील आठवणी जागृत होणे.
व्याकरण व भाषाभ्यास
अ व्याकरण घटकांवर आधारित कृ ती
१. शब्दशक्ती :
तक्ता पूर्ण करा :
वाक्ये शब्दशक्ती
(१) मामू, शाळेत शिपाई आहे. - अभिधा
(२) या शाळेचा मामू एक अवयव झालाय. - व्यंजना
२. काव्यगुण :
पुढील ओळींतील काव्यगुण ओळखून लिहा : उत्तरे
(१) जें जें उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर तें तें ' स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते - माधुय
(२) हे अधम-रक्त-रंजिते ओज सुजन-पूजिते ! श्रीस्वतंत्रते - ओज
(३) गालावरच्या कु सुमी किं वा कु सुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती! तूच जी विलसतसे लाली - प्रसाद
३. वाक्यसंश्लेषण (वाक्याचे प्रकार) :
(१) पुढील वाक्यातील उद्देश्य - उद्देश्यविस्तार, विधेय - विधेयविस्तार ओळखून लिहा :
• महाराजांचा मुक्काम पन्हाळ्यावर पडला.
उद्देश्य →\rightarrow
मुक्काम
विधेय →\rightarrow
पडला
उद्देश्यविस्तार →\rightarrow
महाराजांचा
विधेयविस्तार →\rightarrow
पन्हाळ्यावर
(२) पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा : उत्तरे
(१) शाळेत तो शिपाई आहे; पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे. - संयुक्त वाक्य
(२) मामूने आभार मानण्यासाठी माईक हातात घेतला. - के वल वाक्य
(३) शाळेत एखादा कार्यक्रम निघाला, की त्याची आखणी मामच्या हातात असते. - मिश्र वाक्य
४. काळ :
• पुढील वाक्यांचे काळ ओळखा : उत्तरे
(१) संस्थाने विलीन झाली. - भूतकाळ
(२) मामू बदलत्या काळाची पावले ओळखतो. - वर्तमानकाळ
(३) चैतन्याचे अगणित कोंब नाचत राहतील. - भविष्यकाळ
५. शब्दभेद :
(१) पुढील शब्दांतील भेद स्पष्ट करणारी वाक्ये लिहा :
शब्द वाक्ये
(१) राष्ट्रगीत →\rightarrow
'जण-गण-मन' हे आपले राष्ट्रगीत आहे.
(२) राष्ट्रीयगीत →\rightarrow
'वंदे मातरम्' हे आपले राष्ट्रीयगीत आहे.
(२) पुढील शब्दांचे भिन्न अर्थ लिहा :
(i) बाक - ___, ___
(ii) नाव - ___, ___
उत्तरे :
(i) बाक - बसण्याचे साधन, वक्रता
(ii) नाव - होडी, नाम
आ भाषिक घटकांवर आधारित कृ ती
१. शब्दसंपत्ती :
भाषाभ्यास : शब्दसिद्धी
(१) उपसर्गघटित शब्द :
• पुढील शब्द लक्षपूर्वक अभ्यासा :
(१) सु ++
विचार →\rightarrow
सुविचार (चांगला विचार)
(२) दर ++
रोज →\rightarrow
दररोज (प्रत्येक दिवस)
• 'विचार' या शब्दाआधी 'सु' हे अक्षर आले आहे.
• ‘रोज' या शब्दाआधी 'दर' हा शब्द आला आहे.
• शब्दाच्या आधी लागलेल्या शब्दांना उपसर्ग म्हणतात.
• शब्दांच्या आधी अक्षर किं वा शब्द लागून जे नवीन शब्द तयार होतात, त्यांना उपसर्गघटित शब्द म्हणतात.
• म्हणून, 'सुविचार' व 'दररोज' हे उपसर्गघटित शब्द आहेत.
काही उपसर्गघटित शब्द : अपमान, आजन्म, अनुक्रम, प्रतिबिंब, आडनाव, निरोगी, गैरहजर, बिनचूक, बेजबाबदार इत्यादी.
(२) प्रत्ययघटित शब्द :
• पुढील शब्द लक्षपूर्वक अभ्यासा :
(१) रस ++
इक →\rightarrow
रसिक
(२) झोप ++
आळू →\rightarrow
झोपाळू
• 'रस' या शब्दामागे ‘इक' हा शब्द लागला आहे.
• 'झोप' या शब्दामागे ‘आळू' हा शब्द लागला आहे.
• शब्दांच्या मागे लागलेल्या अक्षरांना किं वा शब्दांना प्रत्यय म्हणतात.
• शब्दांच्या मागे अक्षर किं वा शब्द लागून जे नवीन शब्द तयार होतात, त्यांना प्रत्ययघटित शब्द म्हणतात.
• म्हणून, 'रसिक' व 'झोपाळू' हे प्रत्ययघटित शब्द आहेत.
काही प्रत्ययघटित शब्द :
लेखक, पथिक, कर्तव्य, शिलाई, पुजारी, लाजाळू, रेखीव, भांडखोर, शेतकरी, दळणावळ, हसरा इत्यादी.
(३) अभ्यस्त शब्द :
• अभ्यस्त म्हणजे पुनरावृत्ती (पुन्हा पुन्हा येणे) होय. जे शब्द दोनदा येतात किं वा पुनरावृत्त होतात व नवीन जोडशब्द तयार होतो, त्यास
अभ्यस्त शब्द म्हणतात.
• अभ्यस्त शब्दांचे तीन प्रकार आहेत :
(अ) पूर्णाभ्यस्त (आ) अंशाभ्यस्त (इ) अनुकरणवाचक.
(अ) पूर्णाभ्यस्त शब्द : एक शब्द पुन्हा येऊन जोडशब्द तयार होतो. उदा,. लाललाल, मधूनमधून, समोरासमोर इत्यादी.
(आ) अंशाभ्यस्त शब्द : एखादे अक्षर बदलून तोच शब्द पुन्हा येतो. उदा., नोकरीबिकरी, शेजारीपाजारी, गोडधोड इत्यादी.
(इ) अनुकरणवाचक शब्द : काही ध्वनिवाचक शब्द पुन्हा पुन्हा (पुनरावृत्त) होतात. उदा., गडगड, बडबड, किरकिर, कडकडाट इत्यादी.
(१) पुढील शब्दांचे दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा :
(१) अनुमती (२) जुनापुराणा
(३) साथीदार (४) घटकाभर
(५) भरदिवसा (६) ओबडधोबड
(७) नानात हा (८) गुणवान
(९) अगणित (१०) अभिवाचन.
उत्तरे :
अगणित
२. प्राणसई
- इंदिरा संत
• कवयित्रीचे नाव : इंदिरा संत.
• व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये : कवयित्री, कथाकार, ललित लेखिका.
• ग्रंथसंपदा : 'सहवास, शेला, मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम' इत्यादी कवितासंग्रह. 'श्यामली, चैतू' हे कथासंग्रह.
'मृद्गंध, मालनगाथा' हे ललित लेखसंग्रह.
• पुरस्कार : साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित.
• काव्यवैशिष्ट्ये : उत्कट, भावपूर्ण व प्रतिभासंपन्न काव्यशैली.
• प्रस्तुत कवितेचा छंद : अष्टाक्षरी छंद.
शब्दार्थ
प्राणसई - प्राणप्रिय सखी. कांडते - धान्य ठेचणे. कडाडते - कडक, कडाक्याचे. घनावळ - ढगांची माळ, मेघमाला. सांगावा - निरोप. धाडू न -
पाठवून. आळी - चवड, साठा. कोमेली - कोमेजली, हिरमुसली. झळा – (गरम) झोत. भिंग - आरसा. दौडत - धावत. घोळ - (लुगड्याचा)
झोळणा. वाकु डेपणा - विपरीत वागणे. भरारी - झेप.
टिपा
१. पडवळ-भोपळा- फळभाज्यांची नावे
२. हुडा - शेण थापून सुकवलेल्या गोवऱ्यांचा ढीग
३. शेणी - गोवऱ्या
४. ठाणबंदी - बैलांना गोठ्यात बांधून ठेवणे
५. शेला - अंगावरचे भारी वस्त्र
६. भाचे - भावा-बहिणीची मुले
७. आळे - वाफा
८. अष्टाक्षरी छंद - कवितेच्या या प्रकारात प्रत्येक चरणात (ओळीत) आठ अक्षरे असतात.
कवितेचा भावार्थ
कवयित्री पावसाळी ढगांना प्राणसखी म्हणते आणि मैत्रिणीच्या नात्याने तिला निरोप धाडताना म्हणते -
पांढरेधोप पीठ जसे राक्षसिणीने कांडावे तसे कडाक्याचे ऊन तळपते आहे. माझ्या प्राणप्रिय घनावळी सखी, तू कु ठे गुंतून पडली आहेस? (वेगाने
ये.)
पाखरांच्या हाती तुला मी निरोप धाडला आहे. आपली मैत्री आठवून तरी, हे मेघमाले, तू तातडीने ये ना !
घराघरात गोवऱ्यांचा ढीग मोडन पडवळ व भोपळा यांची आळी भाजण्यासाठी शेणी रचून ठेवल्या आहेत.
पाऊस येत नाही; त्यामुळे बैल गोठ्यातच बांधून ठेवले आहेत. त्यामुळे शेतकरी बेचैन झाले आहेत. उन्हाच्या तीव्र झळा लागून लहान बाळांची तोंडे
कोमेजली आहेत. बाळे हिरमुसली आहेत.
विहिरीतले पाणी आटले आहे. विहिरीच्या खोल तळाशी फक्त थोड्याशा पाण्याचा आरसा दिसतो आहे. मन घरामध्ये रमत नाही. तू कधी येशील ते
सांग. आम्ही आतुरतेने तुझी वाट पाहतो आहोत.
हे मेघमाले, तू धावत पळत आधी माझ्या शेतावर येऊन बरस. आणि शेतकऱ्यांनी उरापोटाशी बाळगलेल्या स्वप्नांवर हिरवी शाल पांघर.
(मालकाच्या मनातले हिरवे स्वप्न साकार कर.)
तशीच झुलत झुलत माझ्या घरापाशी ये. माझे भाचे तुझ्या घोळदार जरीच्या लुगड्याला मायेने बिलगतील.
तुझ्या बरसातीने वेलींचे वाफे भिजू देत. विहीर पाण्याने तुडुंब भरून जाऊ दे. माझे सर्व घरदार चिंब चिंब भिजून जाऊ दे.
मग मी दाराजवळ उभी राहून तुझ्याशी गप्पागोष्टी करीन नि माझा सखा शेतामध्ये कष्ट करण्यात कसा रमला आहे, ती गोष्ट तुला कौतुकाने सांगेन.
(त्याच्या कष्टाचे कौतुक मी तुझ्याकडे करीन.)
पण हे मेघमाले, तू का नाराज आहेस? तू विपरीत का वागत आहेस नि आमच्याकडे तू का पाठ फिरवली आहे? हे प्राणसई, वाऱ्यावर झेप घेत तू
लवकर ये.
प्राणसईला कवयित्री विनंती करते त्या ओळी (१) ये ग दौडत धावत आधी माझ्या शेतावर
(२) तशी झुलत झुलत ये ग माझिया घराशी
(३) ये ग ये ग प्राणसई वाऱ्यावरून भरारी
प्राणसई न आल्याने कवयित्रीच्या अस्वस्थ मनाचे वर्णन करणाऱ्या (१) तोंडे कोमेली बाळांची झळा उन्हाच्या लागून
ओळी
(२) मन लागेना घरात कधी येशील तू
प्राणसई हीच कवयित्रीची मैत्रीण आहे हे दर्शवणाऱ्या ओळी (१) ये ग ये ग घनावळी मैत्रपणा आठवून
(२) उभी राहून दारात तुझ्या संगती बोलेन
मालकाच्या स्वप्नपूर्तीसाठी आवाहन करणाऱ्या ओळी (१) शेला हिरवा पांघर मालकांच्या स्वप्नांवर
(२) सखा रमला शेतात त्याचे कौतुक सांगेन
उपसर्गघटित प्रत्ययघटित
प्रतिबिंब मैत्रपणा
उपसर्गघटित प्रत्ययघटित
सुमन घनावळ
आकं ठ ठाणबंद
३. अशी पुस्तक
- डॉ. निर्मलकु मार फडकु ले
लेखक परिचय
डॉ. निर्मलकु मार फडकु ले
डॉ. निर्मलकु मार फडकु ले हे प्रसिद्ध समीक्षक, संतसाहित्याचे अभ्यासक.
प्रसिद्ध पुस्तके : 'कल्लोळ अमृताचे', 'चिंतनाच्या वाटा,' 'प्रिय आणि अप्रिय', 'सुखाचा परिमळ'.
संतसाहित्यविषयक पुस्तके : 'संतकवी तुकाराम : एक चिंतन', 'संत चोखा मेळा आणि समकालीन संतांच्या रचना', 'संतांचिया भेटी',
'संतवीणेचा झंकार', 'संत तुकारामांचा जीवनविचार'.
वाङ्मयविषयक पुस्तके : 'समाजपरिवर्तनाची चळवळ : काल आणि आज', 'साहित्यातील प्रकाशधारा'.
'भैरू रतन दमाणी' या साहित्य पुरस्काराने सन्मानित.
पाठ परिचय
या पाठात लेखक पुस्तकांचे मानवी जीवनातील स्थान समजावून सांगतात. लेखक पुस्तक लिहितो. तो आपले जीवनाचे संचित त्या पुस्तकात
ओततो. वाचक पुस्तक वाचतो. पुस्तकातल्या आशयाने तो समृद्ध होतो. त्याच्या जीवनात बदल घडतो. बदललेल्या जीवनाचे प्रतिबिंब पुस्तकात
उमटते. पुन्हा पुस्तकाचा प्रभाव माणसांवर पडतो. माणूस व पुस्तक यांचे हे असे अतूट नाते. पुस्तक सतत माणसाला सोबत करते. पुस्तक
जीवनाचे दर्शन घडवते. तसेच, बरे-वाईट काय आहे, याचा निवाडा करायला शिकवते. चांगल्या जीवनाचा मार्ग दाखवते. त्यामुळे माणसाचा
जगण्यावरचा विश्वास वाढतो. पुस्तक माणसाला अंधारातून प्रकाशाकडे जायला शिकवते. माणसाला सत्य शिव-सुंदराकडे नेण्याचा पुस्तक प्रयत्न
करते. हेच या पाठात लेखकांनी लालित्यपूर्ण शैलीत मांडले आहे.
शब्दार्थ
मनात दरवळत राहणे - मन प्रसन्न, आनंदी राहणे. उत्तेजक - उत्साह निर्माण करणारे, हुरूप आणणारे. काव्यात्म – काव्य हाच आत्मा असलेले.
अर्थगर्भ - अर्थपूर्ण, खोलवरचा अर्थ असलेले. भावस्पर्शी - भावनेला स्पर्श करणारे. अनुभूती - अनुभव घेण्याची क्रिया (बहुतेक वेळा अनुभव व
अनुभूती एकाच अर्थाने वापरले जातात.) उत्कट - तीव्र, तीक्ष्ण. रंगाढंगांचं - स्वरूपाचे, युक्तीचे. विमनस्क - विषण्ण, उदासवाणा. बलदंड -
शक्तिमान, ताकदवान. मनसुबे - बेत, मनोगत, विचार. शोष - कोरड. घशाला कोरड पडण्याची स्थिती. बाणा – ब्रीद, शील, प्रतिज्ञा. कणखर
- घट्ट, मजबूत, दणकट. बुलंद - भव्य, थोर, टोलेजंग. वैफल्य - नैराश्य. उद्विग्नता - खिन्नता, कं टाळा, उबग. अवीट - अढळ, अतूट,
अक्षय्य, अमर. जिवापाड - जिवापलीकडे, जिवापेक्षाही जास्त. मुडपणे – दुमडणे. सासुरवास – त्रास, जाच, छळ.
टीप
• वज्र हे इंद्राचे आयुध. त्याने शत्रूवर प्रहार करता येतो व ते फे कू नही मारता येते. भारतीय पुराणकथांनुसार जगातील महान शक्तिमान ,
शस्त्रांपैकी वज्र हे एक शस्त्र आहे.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) संपुष्टात येणे : संपणे, नष्ट होणे.
(२) जिवापाड जपणे : पराकोटीची काळजी घेणे.
(३) माहेरी आल्यासारखे वाटणे : मायेचे वातावरण लाभणे, प्रेम लाभणे.
(४) सासुरवास होणे : जाच, छळ होणे.
(५) गिळंकृ त करणे : दुसऱ्याची संपत्ती बळकावणे.
(६) स्मशानासारखे वाटणे : चैतन्यहीन वाटणे.
(७) कानापर्यंत पोहोचणे : माहिती मिळणे.
(८) उजेडाची स्वप्ने दाखवणे : चांगल्या भावी स्थितीची आशा दाखवणे.
(९) (एखादे काम) हाती घेणे : काम सुरू करणे.
(१०) खिळवून ठेवणे : जखडू न टाकणे.
(११) हस्तगत होणे : आत्मसात होणे, प्राप्त होणे.
(१२) जिवाची शर्थ करणे : पराकोटीचे प्रयत्न करणे.
(१३) (एखाद्या भावनेची/विचाराची) ज्वाला पेटणे : (भावना इ.) तीव्रपणे जागृत करणे.
(१४) पायातले साखळदंड तोडणे : कोणत्याही प्रकारची गुलामगिरी नाहीशी करणे.
(१५) दंड थोपटणे : लढण्याचे आव्हान देणे, लढण्यास सिद्ध होणे.
___ ___
___ ___
___ ___
___ ___
पुस्तके नेहमी सुगंधाप्रमाणे मनात दरवळत राहतात. ज्यांच्यावर प्रेम के ले ते वैरी बनतात.
पुस्तके कधीही विश्वासघात करीत नाहीत. माणसे काही वेळा विश्वास घात करतात.
पुस्तके स्वत:जवळचे सर्व भांडार मुक्तपणे बहाल करतात. माणसे उदार नसतात.
(७) (१) दुधाने तोंड पोळल्याने ताक फु कू न पिणे - एखाद्या गोष्टीमुळे आधी नुकसान झाले असेल तर पुढच्या वेळी सावधगिरी बाळगणे.
(२) पुस्तकाला माहेरी आल्यासारखे वाटणे - पुस्तकाला प्रेमाने सांभाळले जाणे.
कृ ती २ : (स्वमत)
• पुस्तकांविषयीचा लेखकाचा दृष्टिकोन तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : लेखकांच्या मते, मानवी जीवनामध्ये पुस्तकाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. वाचकाला पुस्तकातून चांगले काय, वाईट काय याचे दर्शन
घडते. तो चांगले-वाईट ओळखायला शिकतो. वाईटाचा त्याग के ला पाहिजे आणि चांगले आत्मसात के ले पाहिजे ही दृष्टी त्याला मिळते. त्यानुसार
जीवन जगायला तो सुरुवात करतो. यावरून माणसाच्या आयुष्यातील पुस्तकाचे महत्त्व आपल्या सहज लक्षात येईल.
उदाहरणार्थ, महात्मा फु ले यांचे साहित्य आपण वाचले की शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती, होणारा अन्याय आपल्या लक्षात येऊ लागतो. त्यामुळे
आपल्या अंत:करणात भावनांची मोठी खळबळ उडते. आपल्या अवतीभवतीच्या परिस्थितीचे आपण निरीक्षण करतो. त्यात चांगले काय आहे, वाईट
काय आहे, हे आपल्याला कळू लागते. म्हणून असे पुस्तक आपण कधी विसरू शकत नाही. उलट, असे पुस्तक आपण पुन्हा पुन्हा वाचत राहतो.
प्रत्येक वाचनाच्या वेळी आपल्याला नवीन दृष्टी मिळते. परिस्थितीचे अधिकाधिक चांगले ज्ञान मिळते. अशा परिस्थितीत काय के ले पाहिजे आणि
काय करता कामा नये यांचीही दृष्टी मिळते. मग आपण त्यानुसार जीवन जगायचा प्रयत्न करतो. म्हणजेच, पुस्तक आपल्याला चांगले जीवन
जगायला शिकवतात. हे पुस्तकाचे फार मोठे महत्त्व आहे.
पुस्तकाचे हे महत्त्व लेखक समजावून सांगत आहेत.
कृ ती ३ : (अभिव्यक्ती)
(१) 'उत्तम साहित्यकृ ती आपल्याला आयुष्यभर भावनिक सोबत करतात, ' हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर : उत्तम साहित्यकृ ती आपल्याला सदोदित भावनिक सोबत करतात, हे खरेच आहे. अशी पुस्तके आपल्याला उभारी देतात. मी दहावीची
परीक्षा दिली. सर्व पेपर काही चांगले गेले नव्हते. कमी गुण मिळणार याची मला मनोमन खात्री होती. निराश झालो होतो. काय करावे ते सुचत
नव्हते.
तेवढ्यात एक पुस्तक माझ्या हाती लागले - अच्युत गोडबोले या लेखकांचे 'मुसाफिर'. वाचायला सुरुवात के ली. मग पुढे वाचत गेलो, वाचत गेलो
आणि वाचतच गेलो. लेखकांनी स्वतःचे आत्मकथन त्यात मांडले आहे. लेखक स्वतः प्रचंड बुद्धिमान. आयआयटीसारख्या मातब्बर खप प्रतिष्ठित
अशा शिक्षण संस्थेत प्रवेश मिळाला होता. कोणत्या तरी कारणाने सामाजिक चळवळीकडे लक्ष गेले. देशातील अन्याय, अत्याचार यांचे दर्शन घडले.
जीवनाचा मार्ग ढळला. मग कसेबसे स्वतःला सावरले. झोकू न देऊन अभ्यास सुरू के ला. प्रचंड यश मिळत गेले. त्यांनी लिहिलेली पुस्तके जगभर
गाजली. जगभर मोठमोठ्या कं पन्यांना मार्गदर्शन के ले. कित्येक कं पन्या स्वतः स्थापन के ल्या. अनेक कं पन्यांमध्ये भागीदारी मिळाली. हे सगळे
वाचल्यानंतर माझी दृष्टीच बदलली. आपणही प्रयत्न करून असे भव्यदिव्य यश मिळवू शकतो, असे मला वाटू लागले. माझी निराशा झटकली गेली.
आता जेव्हा जेव्हा कं टाळा येतो, तेव्हा तेव्हा ते पुस्तक मी घेतो. कु ठू नही वाचायला सुरुवात करतो. माझा कं टाळा निघून जातो आणि मन चैतन्याने
भरून जाते.
(२) 'निष्ठावंत वाचक आता दुर्मीळ झाले आहेत,' हे विधान स्पष्ट करा.
उत्तर : लेखकांच्या एका ग्रंथप्रेमी मित्रांनी लेखकांना पुस्तक वाचायला देताना खूप अटी घातल्या. त्यांचे सांगणे अपमानास्पद वाटेल असेच होते. पण
लेखकांना ते अपमानास्पद वाटले नाही. याचे कारण लेखक स्वतः ग्रंथप्रेमी होते. म्हणूनच त्यांना ग्रंथप्रेमी माणसाच्या शब्दांमागील भावना समजून
घेता आली. त्यांनी लेखकांना स्वतःची भूमिका समजावून सांगितली. एका कविमित्राने त्यांच्याकडू न घेतलेली दोन पुस्तके परत के लीच नाहीत. हे
त्या ग्रंथप्रेमी मित्रांना जिव्हारी लागले. त्यांनी निर्णय घेऊन टाकला की आता यापुढे कोणालाही पुस्तक द्यायचे नाही. याचे कारण त्यांची पुस्तके त्यांना
स्वतःच्या अपत्यासारखी वाटत होती. म्हणून पुस्तके नसली तर राजवाडाही स्मशानासारखा वाटेल आणि सोबत पुस्तके असतील तर
काळ्यापाण्याची शिक्षाही आनंदाने स्वीकारीन, असे ते ग्रंथप्रेमी लेखकांना सांगतात. यावरून त्यांची ग्रंथांवरची निष्ठा लक्षात येते. असे निष्ठावंत वाचक
लेखकांना हल्ली आढळतच नाहीत.
उतारा क्र. २
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृ ती करा :
कृ ती १ : (आकलन)
(१) कृ ती करा :
(१) हेमिंग्वेच्या कादंबरीतून सूचित होणारे अर्थ
(i) ___
(ii) ___
(iii) ___
(iv) ___
(२) कारणे लिहा :
(१) लेखक विमनस्क अवस्थेत होते; कारण ___
(२) हा कणखर म्हातारा खवळलेल्या समुद्रात पुढे पुढेच चालला होता; कारण ___
(३) पण म्हाताऱ्याला देवमासा मिळाल्याचे समाधान फार वेळ मिळाले नाही; कारण ___
(३) माहिती लिहा :
(१) लेखकांनी नियतीला दिलेली विशेषणे.
(२) लेखकांनी माणसाला दिलेली विशेषणे.
(३) नियती व माणूस यांच्यातील संघर्षाचे स्वरूप.
(४) हेमिंग्वेचा संदेश.
(५) हेमिंग्वेच्या कादंबरीचा लेखकांवर झालेला परिणाम.
उतारा क्र. २ : (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. १२ ते १४)
मी एके दिवशी अत्यंत ___ ___ __ मस्त झंकारत राहते.
उत्तरे
(१) हेमिंग्वेच्या कादंबरीतून सूचित होणारे अर्थ -
(i) अतिबलाढ्य, निष्ठु र नियती आणि दुबळा, महत्त्वाकांक्षी माणूस यांच्यात लाखो वर्षांपासून
द्वंद्वयुद्ध चालू आहे.
(ii) नियती बलाढ्य आहे, पण दुबळ्या माणसातही अदम्य ईर्ष्या आहे.
(iii) विजय मिळवायचाच, या ईर्षेने माणूस आपल्या प्रारब्धाशी झगडत आहे.
(iv) भविष्यात के व्हातरी माणूस नियतीवर विजय मिळवीलच.
(२) (१) लेखक विमनस्क अवस्थेत होते; कारण त्यांचा एक कलावंत मित्र अपघातात मरण पावला होता.
(२) हा कणखर म्हातारा खवळलेल्या समुद्रात पुढे पुढेच चालला होता; कारण त्याला आजवर कधीही न सापडलेला महाप्रचंड देवमासा आज
मिळवायचाच होता.
(३) पण म्हाताऱ्याला देवमासा मिळाल्याचे समाधान फार वेळ मिळाले नाही; कारण देवमाशाचे बहुतेक मांस शार्क माशांनी मटकावले होते आणि
फक्त हाडे शिल्लक ठेवली होती.
(३) (१) लेखकांनी नियतीला दिलेली विशेषणे : अतिबलाढ्य, क्रू र, जबरदस्त, निष्ठु र.
(२) लेखकांनी माणसाला दिलेली विशेषणे : दुबळा, महत्त्वाकांक्षी, जयिष्णू.
(३) नियती व माणूस यांच्यातील संघर्षाचे स्वरूप : नियती महाबलाढ्य आहे. तिचे परिस्थितीवर संपूर्ण नियंत्रण आहे. माणसाच्या जीवनावरही
नियतीचा पूर्ण ताबा आहे. माणूस मात्र स्वतंत्रपणे, स्वतःच्या इच्छेने, हवे तसेच जगू पाहतो. नियती तसे करू देत नाही. ती त्याला खेळवते,
हुलकावण्यां देते. तरीही माणूस निराश न होता लाखो वर्षांपासून नियतीशी झगडत आहे.
(४) हेमिंग्वेचा संदेश : जगण्या-मरण्याचा खेळ अखंडपणे चालू आहे. मरणाच्या जाळ्यात आपण सापडता कामा नये. नियती सतत आपल्याला
तिच्या जाळ्यात फसवू पाहते. नियतीने जाळे टाकले तरी ते तोडू न फे कू न द्यायचे आणि जीवनाच्या अथांग सागरात स्वैर संचार करायचा.
(५) हेमिंग्वेच्या कादंबरीचा लेखकांवर झालेला परिणाम : हेमिंग्वेच्या त्या छोट्या कादंबरीने लेखकांच्या मनातले वैफल्य आणि उद्वेग पार धुऊन
टाकले.
कृ ती २ : (स्वमत)
(१) वैचारिक साहित्यातून मिळणारे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव स्वभाषेत लिहा.
किं वा
एखाद्या वैचारिक किं वा ललित साहित्यातून मिळणारा अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : ललित आणि वैचारिक साहित्यातून विलक्षण अनुभव मिळतात. ते वैशिष्ट्यपूर्ण असतात. ते वाचल्यावर वाचकांच्या मनावर काही ना काही
परिणाम होतोच. त्या पुस्तकातून भोवतालच्या परिस्थितीचे दर्शन घडते. त्यातल्या दुःखद घटनांनी वाचकांचे हृदय पिळवटू न जाते. त्या
परिस्थितीतील दुःखाची जाणीव होते. ही अशी स्थिती वाईट आहे. ती तशी असता कामा नये. ती बदलली पाहिजे. असे विचार मनात येतात. मग
माणसे ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करतात. नवीन चांगली स्थिती आणण्याच्या विचारांना पाठिंबा देतात.
उदाहरणार्थ, द्या पवार यांचे 'बलुतं' हे आत्मकथनात्मक पुस्तक पाहा. यात दलित समाजाचे अत्यंत हीनदीन अवस्थेतील चित्रण के लेले आहे. हे
वाचल्यावर वाचकाला दुःख होते. संतापही येतो. मग जातीयता, धर्मांधता या तत्त्वांविरुद्ध त्याच्या मनात तिडीक निर्माण होते. याचा अर्थ 'बलुतं' हे
पुस्तक माणुसकीची बाजू घेते. गुलामगिरीविरुद्ध, अन्यायाविरुद्ध ते पुस्तक माणसाला लढायला प्रवृत्त करते. म्हणजे अशी पुस्तके माणसाला चांगले
जग निर्माण करण्याची प्रेरणा देतात.
(२) हेमिंग्वेचा जीवनविषयक दृष्टिकोन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर : या पाठात लेखकाने हेमिंग्वेच्या 'द ओल्ड मॅन अँड द सी' या कादंबरीचा परिचय करून दिला आहे. कादंबरीचे कथानक तसे साधे आहे.
एका धाडसी म्हाताऱ्या कोळ्याला एके दिवशी प्रचंड ताकदीच्या देवमाशाची शिकार करायची होती. अखेरीस एक प्रचंड देवमासा या म्हाताऱ्या
कोळ्याच्या जाळ्यात सापडला. कोळ्याने जिवाच्या शर्थीने देवमाशाशी लढत दिली आणि त्याच्यावर विजय मिळवला. विजयाच्या आरोळ्या ठोकत
तो किनाऱ्याकडे निघाला. वाटेत त्या देवमाशावर शार्क माशांनी मोठा हल्ला के ला. देवमाशाला त्यांनी खाऊन टाकले.
जाळ्यामध्ये देवमाशाची फक्त हाडे शिल्लक राहिली. म्हणजे त्या कोळ्याला देवमासा मिळाला आणि मिळाला नाहीसुद्धा! यावर तो कोळी निराश झाला
नाही. हतबल झाला नाही. तो हसला आणि 'उद्या पुन्हा देवमाशाच्या शिकारीला जाऊ,' असा त्याने निश्चय के ला.
तो देवमासा आणि शार्क मासे महाप्रचंड शक्तिशाली नियतीचे प्रतीक होत. हा कोळी संपूर्ण मानवजातीचा प्रतीक होय. या कोळ्याची लढाई म्हणजे
संपूर्ण मानवजातीचीच लढाई होय. हजारो-लाखो वर्षांपूर्वीपासून माणूस नियतीशी झगडत आहे. प्रत्येक वेळी माणूस नियतीकडू न पराभूत होतो.
तरीही तो पुन्हा नियतीशी झगडायला सिद्ध होतो. जिंकण्याची इच्छा, त्याची विजिगीषु वृत्ती या लढाईतून दिसून येते. हेमिंग्वे आपला हाच दृष्टिकोन
या कादंबरीतून मांडत आहे.
कृ ती ३ : (अभिव्यक्ती)
• त्या म्हाताऱ्या कोळ्याच्या देवमाशाला पकडण्याच्या कृ तीचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
उत्तर : आज कोणत्याही परिस्थितीत देवमाशाला पकडायचे, अशा ईर्षेने त्या म्हाताऱ्या कोळ्याने आपली होडी समुद्रात ढकलली. देवमाशाला
पकडण्याचे धाडसी विचार मनात घोळवत घोळवत तो कित्येक मैल आत समुद्रात गेला. पोटात अन्न नव्हते. पोटात कावळे ओरडत होते. तहानेने
घशाला कोरड पडली होती. दमलेले शरीर एका बाजूने त्याला परत फिरण्याची विनंती करत होते. त्याचे मन मात्र मागे फिरायला तयारच नव्हते.
अजूनही खवळलेल्या लाटांशी झुंजण्याची त्याची इच्छा तीव्र होती. तो पुढे पुढेच जात राहिला. अचानक त्याच्या जाळ्यात देवमासा सापडला. तो
बुलंद देवमासा कोळ्याचे जाळे तोडू न सहज निसटू न जाऊ शकला असता. पण म्हाताऱ्याने प्रचंड ताकदीने झुंज देऊन देवमाशाला ठार के ले.
तेवढ्यात शार्क माशांच्या एका टोळीने देवमाशावर हल्ला के लाच. सर्व बाजूंनी त्यांनी देवमाशाचे लचके तोडले. त्यांच्याशी झुंज देऊन कोळ्याने
त्यांनाही पिटाळले. मग ते धूड त्याने होडीला बांधले आणि विजयाच्या आरोळ्या ठोकत किनाऱ्यावर आला. परंतु त्याचा आनंद फार वेळ टिकला
नाही. शार्क माशांनी देवमाशाचे सर्व मांस गिळंकृ त के ले होते; फक्त हाडे शिल्लक राहिली होती. देवमासा मिळाल्याचे समाधान कोळ्याला मिळाले
नाही. तरी तो निराश झाला नाही. उद्या पुन्हा प्रयत्न करू, असे ठरवून तो निघून गेला.
व्याकरण व भाषाभ्यास
अ व्याकरण घटकांवर आधारित कृ ती
१. शब्दशक्ती :
• पुढील वाक्यांतील शब्दशक्ती ओळखा : उत्तरे
(१) पुस्तकं नसतील तर राजवाडासुद्धा मला स्मशानासारखा वाटेल. →\rightarrow
लक्षणा
(२) पुस्तकं हीच माझी अपत्य. →\rightarrow
व्यंजना
(३) दंड थोपटू न उभी राहिलेली काही बंडखोर पुस्तकं मी वाचली. →\rightarrow
व्यंजना
(४) मी ग्रंथप्रेमी आहे. →\rightarrow
अभिधा
२. वाक्यसंश्लेषण :
• पुढील वाक्ये कं सांतील सूचनांप्रमाणे बदला :
(१) दुधाने तोंड पोळल्यामुळे मी ताक कुं कू न पितो.
(मिश्र वाक्य करा.)
(२) माझ्या हाती पुस्तकं दिली आणि त्याने त्यावरून मायेने हात फिरवला.
(के वल वाक्य करा.)
(३) प्रत्यक्ष परमेश्वराला पुस्तक द्यायचे नाही.
(मिश्र वाक्य करा.) (४) मी कादंबरी वाचून संपवली.
(संयुक्त वाक्य करा.)
उत्तरे : (१) दुधाने तोंड पोळले की मी ताक कुं कू न पितो.
(२) माझ्या हाती पुस्तक देताना त्याने त्यावरून मायेने हात फिरवला.
(३) जरी प्रत्यक्ष परमेश्वर आला, तरी पुस्तक द्यायचे नाही.
(४) मी कादंबरी घेतली व वाचून संपवली.
३. काळ :
• पुढील वाक्यांचे रीती वर्तमानकाळात रूपांतर करा :
(१) मी पुस्तक वाचतो.
(२) त्याने मजकू र शाईने अधोरेखित के ला.
(३) श्रेष्ठ साहित्य मला म्हातारा होऊ देत नाही.
(४) त्याने छोटेखानी पुस्तकावरची धूळ झटकली.
उत्तरे : (१) मी पुस्तक वाचत असतो.
(२) तो मजकू र शाईने अधोरेखित करत असतो.
(३) श्रेष्ठ साहित्य मला म्हातारा होऊ देत नसते.
(४) तो छोटेखानी पुस्तकावरची धूळ झटकत असतो.
४. शब्दभेद :
• पुढील शब्दांचे भिन्न अर्थ लिहा :
अभंग →\rightarrow
___, ___
भाव →\rightarrow
___, ___
उत्तरे :
अभंग →\rightarrow
न भंगणारे, एक छंदवृत्त
भाव →\rightarrow
भावना, दर
आ भाषिक घटकांवर आधारित कृ ती
१. शब्दसंपत्ती :
(१) विशेषण-विशेष्ये यांच्या जोड्या लावा :
'अ' गट 'ब' गट
उत्तरे :
(१) महाप्रचंड - देवमासा
(२) क्रू र - नियती
(३) अथांग - सागर
(४) अवीट - सुगंध
(५) आशावादी - म्हातारा
(२) 'चवदार' सारखे शब्द लिहा.
उत्तर : दळदार, डेरेदार, वळणदार, रखवालदार.
(३) जसे विफलताचे →\rightarrow
वैफल्य
तसे - उत्तरे
(१) सफलता →\rightarrow
साफल्य
(२) कु शलता →\rightarrow
कौशल्य
(३) निपुणता →\rightarrow
नैपुण्य.
(४) शब्दाच्या शेवटी 'क' असलेले चार शब्द लिहाः
उदा., 'उत्तेजक' उत्तर : (१) लेखक (२) वाचक (३) रसिक (४) पथिक.
(५) या शब्दगटातील विशेषणे ओळखा :
काव्यात्म, अवस्था, साहित्यकृ ती, विमनस्क, प्रेरणा, संवाद, नव्या, उत्तम
उत्तरे
विशेषणे
काव्यात्म
विमनस्क
नव्या
उत्तम
(६) उपसर्गघटित व प्रत्ययघटित शब्द लिहा :
रसमय, विस्मृती, सुगंध, निर्दय, निष्ठावंत, भावनिक, सुशिक्षित, कलावंत
उत्तर : उपसर्गघटित शब्द -
(१) विस्मृती (२) सुगंध (३) निर्दय (४) सुशिक्षित.
प्रत्ययघटित शब्द -
(१) रसमय (२) निष्ठावंत (३) भावनिक (४) कलावंत.
(७) शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा : उत्तरे
(१) पंधरा दिवसांनी प्रकाशित होणारे - पाक्षिक
(२) ज्याला एकही शत्रू नाही असा - अजातशत्रू
(३) मंदिराचा आतील भाग - गाभारा
(४) गुडघ्यापर्यंत हात लांब असणारा - अजानुबाहू
(५) के लेले उपकार न जाणणारा - कृ तघ्न
२. विरामचिन्हे :
(१) पुढील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा :
ते म्हणाले, "गेले दोन दिवस 'मेघदूत' वाचत होतो."
(१) , →\rightarrow
___
(२) “ ” →\rightarrow
(३) ‘ ’ →\rightarrow
(४) . →\rightarrow
उत्तरे : (१) , →\rightarrow
स्वल्पविराम
(२) “ ” →\rightarrow
दुहेरी अवतरणचिन्ह
(३) ‘ ’ →\rightarrow
एके री अवतरणचिन्ह
(४) . →\rightarrow
पूर्णविराम
(२) पुढील वाक्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा :
मी म्हणालो या वयात मेघदूताची रुची कशी काय वाटते
उत्तर : मी म्हणालो, “या वयात मेघदूताची रुची कशी काय वाटते?"
३. लेखननियम :
(१) पुढील शब्दगटांतील अचूक शब्द ओळखा : उत्तरे
(१) विद्यार्थि/वीद्यार्थी/वीयार्थि/विद्यार्थी - विद्यार्थी
(२) गृहस्थ/गृहस्त/ग्रुहस्थ/गृहस्त - गृहस्थ
(३) संर्घष/संघर्ष/संघर्श/संगघर्ष - संघर्ष
(४) सूशिक्षित/सुशीक्षित/सुशिक्षित/सुशिक्षीत - सुशिक्षित
(२) पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(१) उतम साहीत्यकृ ति आपल्याला भावनिक सोबत करतात.
(२) मी एके दीवशी अत्यंत वीमनस्क अवस्थेत होतो.
उत्तरे : (१) उत्तम साहित्यकृ ती आपल्याला भावनिक सोबत करतात.
(२) मी एके दिवशी अत्यंत विमनस्क अवस्थेत होतो.
४. वाक्प्रचार व म्हणी:
(१) पुढील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ निवडा :
(१) हस्तगत होणे -
(अ) जुळवणे (आ) मिळवणे (इ) हरवणे
(२) कुं कू न टाकणे -
(अ) व्यर्थ दवडणे (आ) सार्थ होणे (इ) हवेवर उधळणे
(३) कानावर हात ठेवणे -
(अ) न ऐकणे (आ) बोल ऐकणे (इ) मान्य न करणे
(४) मनसुबे रचणे -
(अ) इच्छांचे इमले रचणे (आ) मन तयार करणे (इ) प्रभाव पाडणे
उत्तरे : (१) मिळवणे
(२) व्यर्थ दवडणे
(३) मान्य न करणे
(४) इच्छांचे इमले रचणे
(२) पुढील म्हणीचा अर्थ लिहा : .
दुधाने तोंड पोळले की ताक कुं कू न पिणे
अर्थ : एखाद्या कामात फटका बसला की दुसरी कामे सावधगिरीने करणे.
५. पारिभाषिक शब्द :
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा : उत्तरे
(१) Zone - परिमंडळ, विभाग
(२) Up-to-date - अद्ययावत
(३) Technician - तंत्रज्ञ
(४) Runway - धावपट्टी
(५) Procession - मिरवणूक
(६) Motto - ब्रीदवाक्य
प्रकल्प
• जी. ए. कु लकर्णी, भा. द. खेर, दुर्गा भागवत, व्यंकटेश माडगूळकर या साहित्यिकांची माहिती व यासंबंधीचे संदर्भसाहित्य
वाङ्मयकोशातून शोधून लिहा.
शब्दार्थ
स्पंदन - हालचाल. सावळा - श्यामल. पताका - रंगीत कागदी त्रिकोण. तोरण - दारावर लावायची माळ. करणी - कृ ती, क्रिया. उधाण -
भरती, उसळणे. खडक - मोठा दगड. तुषार - थेंब. मज - मला. डु चमळते - हिंदकळते. हंगाम - मोसम. साक्षी - डोळ्यांनी पाहणारे. काऊ –
कावळा. बाहू - हात.
टिपा
१. वसंत - (मराठी) सहा ऋतूंतील सृष्टीला बहर आणणारा ऋतू.
२. कोकीळ - वसंत ऋतूत कु हू कु हू गाणारा एक पक्षी.
३. फाया - अत्तर लावलेला कापसाचा बोळा.
४. रंगपंचमी - माघ शु. पंचमी, वसंत ऋतूचे आगमन, रंगांची उधळण सुरू होते.
५. ओटी भरणे - आशीर्वाद देण्यासाठी सौभाग्यवती स्त्रीच्या पदरात खण-नारळ टाकणे, ही एक प्रथा.
कवितेचा भावार्थ
निसर्गाचा घटक होऊन निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्याची इच्छा सांगताना कवी म्हणतात -
चला, झाडांच्या मनात शिरूया, स्वत:च पानांचे विचार होऊया. नव्या कोवळ्या पालवीच्या पोपटी स्पंदनांसाठी स्वत:च कोकीळ पक्षी होऊन
गाऊया.
वसंत ऋतूच्या बहरात तो कोकिळाचा मधुर सावळा सूर ऐकत फु ले रंगून जातील नि फु लांच्या गाभ्यात अत्तर जन्माला येईल. चला, त्या गोड
सुराबरोबर अत्तराने भिजलेला फाया आपण कानात ठेवूया. (कोकीळचा सूर आणि फु लांचा गंध कानामनात साठवूया)
विविध रंगांची उधळण झाली आहे. या रंगपंचमीत सारी फु लपाखरे चिंब भिजली आहेत. फु लपाखरांचा बागडणारा तो रंगीत थवा जणू . फिरणारी
पताकाच भासते आहे. हे भिरभिरणारे फु लपाखरांचे रंगीत तोरण आपण दाराला लावूया.
ही कु णाची गूढ किमया आहे की झऱ्यातले निर्मळ पाणी माझ्या डोळ्यांतून वाहते आहे. चोहिकडे आलेली ही आनंदाची भरती म्हणजे देवलोकीची मधुर
गाणी आहेत. या गान ऋतूत चिंब भिजून त्यांच्यासवे खळाळत वाहून जाऊया.
ओढ्याच्या खळाळत्या पाण्यात उतरून माझे मन ओल्या खडकावर बसले आहे. आजूबाजूचे थुई थुई नाचणारे पाणी मला हसताना दिसत आहे. जणू
हे तुषाराचे रोप मला मायेने अंघोळ घालते आहे.
अलगदपणे, हलके च मी ओंजळीमध्ये जरासे आकाश झेलले आहे. ओंजळीतल्या आकाशाने मी साऱ्या पाण्याची ओटी भरली आहे. ओंजळीतल्या
पाण्यात आकाशीचे ऊन जेव्हा हिंदकळते तेव्हा त्यात सूर्यबिंब पोहते आहे, असे मला भासते.
फांदीवर ओळीने बसलेले ओले पक्षी हे या वसंत ऋतूच्या मोसमाचे साक्षीदार आहेत. झाडाच्या बुंध्याशी सावली उन्हाची नक्षी कोरते आहे. त्या
सावलीला पंख फु टले नि पाहा, त्या सावलीचेच उडणारे कावळे झाले आहेत.
मानवी स्पर्श न झालेले निर्जन हिरवेगर्द रान असावे, जिथे फक्त फु ले नि पाखरेच असतील. अशा निर्जन रानात, हे देवा, तू मला ने. त्या रानात मी
एखादे झाड होईन आणि सगळ्यांच्या स्वागताला माझे फांदयांचे हात पसरीन. (मला निसर्गाशी एकरूप होऊदे.)
कवितेचा विषय
भाषिक सौंदर्यस्थळे
कवितेचा विषय
(२) गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू___ निसर्गाने दिलेली गाणी पाणी होऊन एकरूपतेने गा.
(३) (१) निसर्गाशी एकरूप होऊन निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्याची कवींची मनोमन इच्छा आहे. म्हणून ते म्हणतात की आपण झाडाच्या मनात
शिरू आणि पाने जी विचार करतात, तसे आपणच पानांचे विचार होऊ. म्हणजे आपण स्वत:च झाड होऊ.
(२) कवी म्हणतात की माझ्या ओंजळीमधल्या पाण्यात आकाश उतरले आहे. त्यात जेव्हा ऊन मिसळून हिंदकळते, तेव्हा असे वाटते की जणू सूर्य
त्या हातातल्या पाण्यात पोहत आहे.
(४)
कवीने वापरलेली आनंदाची दोन प्रतीके (१) भिरभिरणाऱ्या फु लपाखरांचा थवा म्हणजे रंगीत पताकांचे तोरण.
(२) सावलीला पंख फु टू न तिचे कावळे झाले.
कवितेतून मिळणारा संदेश निसर्गातील बहरलेल्या सौंदर्याचा खुल्या मनाने आनंद लुटणे व आपणच
निसर्गाचा घटक होऊन निसर्गाशी एकरूप होणे.
(५)
(१) देवाघरची गाणी →\rightarrow
आनंदाचे उधाण
(२) डोळ्यांत असणारे →\rightarrow
झऱ्याचे पाणी
(३) तुषाराचे →\rightarrow
रोप
(४) सावळा असलेला →\rightarrow
सूर
(५) खडकावर बसलेले →\rightarrow
कवीचे मन
कृ ती २ : (काव्यसौंदर्य)
(१) 'पोपटी स्पंदनासाठी, कोकीळ होऊनी गाऊ दे___' या काव्यपंक्तीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर : 'झाडांच्या मनात जाऊ' या कवितेमध्ये कवी नलेश पाटील यांनी उत्कटपणे वसंतातील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांना
आवाहन के ले आहे.
वसंत ऋतू हा ऋतूंचा राजा आहे. या ऋतूमध्ये सृष्टीला बहर येतो. झाडांना नवी पालवी फु टते. ती कोवळी लुसलुशीत पालवी पोपटी रंगाची असते.
अम्लान ताजेपणाची चमक पानांवर झळकते. सदाबहार वसंत ऋतूची चाहूल आधी कोकीळ पक्ष्याला लागते. तो वसंत ऋतूच्या आगमनाचा हर्ष कु हू
कु हू स्वरात गाऊन जगाला सांगतो.
कवी म्हणतात की, वसंतातील सौंदर्याचा आस्वाद आपल्याला जर मनोभावे घ्यायचा असेल तर आपण झाडांशी एकरूप व्हायला हवे. त्यांच्या मनात
शिरून पानांचा विचार आपणच व्हायला हवे. नवीन पानांमधील या पोपटी पालवीची स्पंदने अनुभवायची असतील, तर आपण स्वतः कोकीळ पक्षी
होऊन गायला हवे.
कोकीळ पक्ष्यांच्या स्वरांतून निसर्गाची एकरूप होण्याची उत्कट व भावपूर्ण अवस्था अतिशय विलोभनीय प्रतीकातून कवीने मांडली आहे.
(२) ऊन आणि सावली यांच्या प्रतीकांतून सूचित होणारा आशय कवितेच्या आधारे लिहा.
उत्तर : कवी नलेश पाटील यांनी 'झाडांच्या मनात जाऊ' या कवितेमधून वसंत ऋतूतील निसर्गसौंदर्याचे चित्रण उत्कट व भावविभोर शब्दकळेतून
साकारले आहे. स्वत: निसर्गाचे घटक होऊन निसर्गसौंदर्याचा कसा आस्वाद घ्यावा, हे सांगताना कवींनी वेगवेगळी व अनोखी प्रतीके वापरली
आहेत.
बहरलेल्या झाडाचे वर्णन करताना कवी म्हणतात की झाडाच्या फांदीवर ओळीने बसलेले पक्षी हे या वसंत ऋतूच्या बहरलेल्या मोसमांचे
साक्षीदार आहेत. झाडाच्या पायथ्याशी जी सावली आहे ती उन्हावर नक्षी काढत बसली आहे. म्हणजे सूर्याची किरणे जेव्हा पानांतून झाडाखाली
झिरपतात त्या वेळी पायथ्याशी पसरलेल्या सावलीत त्याची नक्षीदार पखरण होते. मग नक्षीलाच जेव्हा पंख फु टतात तेव्हा सावल्यांचेच कावळे
आसमंतात उडताना दिसतात.
'ऊन-सावलीच्या नक्षीतून निर्माण झालेले काऊ' या प्रतिमेतील ऊन सावली ही प्रतीके सजग होतात. येथे चेतनगुणोक्ती अलंकाराचा लोभसवाणा
आविष्कार मनाला प्रसन्न करतो.
(३) 'डोळ्यांत झऱ्याचे पाणी' या शब्दसमूहातील भावसौंदर्य उलगडू न दाखवा.
उत्तर : 'झाडाच्या मनात जाऊ' या कवितेमध्ये कवी नलेश पाटील यांनी वसंत ऋतूत फु ललेल्या निसर्गघटकांचे लोभसवाणे दर्शन नितांत सुंदर
प्रतिमांमधून उलगडू न दाखवले आहे. रंग व गंधाच्या या उत्सवात आपणही निसर्गाचा घटक होऊन निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेऊया असे ते सांगतात.
वसंत ऋतूमध्ये चराचराला लाभलेले हे सौंदर्याचे वैभव अनुभवताना कवींना या सौंदर्याची निर्मिती अनोखी व अपूर्व वाटते. या रंगपंचमीमध्ये सारी सृष्टी
न्हाऊन निघालेली आहे. हे सृष्टीचे अम्लान सौंदर्य मानवनिर्मित नसून ती ईश्वराचीच किमया असावी, असे कवी आत्मीयतेने सांगतात. अवतीभवती
आलेले हे आनंदाचे उधाण म्हणजे विधात्याची स्वत:ची गाणी आहेत. ही सर्व देवाजीची करणी आहे. हे अनोखे सौंदर्य पाहून कवींच्या डोळ्यांत
आनंदाश्रू येतात. ते म्हणतात की, या झऱ्यात वाहणारे पाणी आणि डोळ्यांत तरळलेले पाणी वेगळे नाही. ते एकच आहे. या झऱ्यातलेच पाणी माझ्या
डोळ्यांत तरळले आहे, अशी एकतानता नि अद्वैत घडले आहे.
'डोळ्यांत झऱ्याचे पाणी' या भावपूर्ण प्रतिमेतून कवींनी निसर्गाशी घडलेली एकरूपता सजीव साकार के ली आहे. मानव हा निसर्गाचेच अपत्य आहे,
याचे प्रत्यंतर या प्रतिमेतून दिसून येते.
कृ ती ३ : (अभिव्यक्ती)
(१) 'तुम्ही झाडाच्या मनात शिरला आहात', अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा.
उत्तर : माझे झाडांवर नितांत प्रेम आहे. मला नेहमी झाडाच्या मनात शिरावेसे वाटते. एकदा मी खरेच झाडाच्या मनात शिरलो. मी त्याच्या मुळांपाशी
पोहोचलो. त्यांना विचारले की, तुम्ही सतत मातीखाली असता. वरती दिसत नाहीत. तुम्हाला तुमच्या वरच्या पिसाऱ्याविषयी काय वाटते? मुळे
म्हणाली - "मातीतच आमचा निवास! आम्ही खाली खोलवर जातो. जीवनरस घेतो आणि वरच्या अवयवांना पुरवतो. म्हणून तर फांद्या झुलतात,
पाने डु लतात नि फु ले फु लतात. आम्ही जरी मातीत असलो; तरी वरच्या अवयवांचे सर्व लाड आम्हीच पुरवतो.
मातीतला गंध आम्ही फु लात ओततो. पानांची झळाळी मातीमुळेच दिसते. हे आमचेच वंशज असल्यामुळे त्यांच्या सुखात आमचे सुख सामावलेले
आहे. सर्व ऋतूंत आमचे फु लणे, कोमेजणे सुरू राहते. आमची जीवनेच्छा दृढ आहे. त्यामुळे आम्ही कृ तार्थ आहोत.''
झाडांच्या मनात शिरून त्यांचे मनोगत मी जाणून घेतले नि मनोगताला शीर्षक दिले – 'मुळांची मुले!'
(२) निसर्गातील घटक व मानवी जीवन यांचा परस्परसंबंध स्पष्ट करा.
उत्तर : मानवी जीवन निसर्गाच्या गर्भातच पोसले जाते. आपल्या आजूबाजूला अफाट निसर्ग पसरलेला आहे. निसर्गाचा व मानवी जीवनाचा अतूट
संबंध आहे. निसर्गातील प्रत्येक घटक मानवी जीवनाला समृद्ध करीत असतो. रोज उगवणारा सूर्य जीवनाला ऊर्जा देतो नि चंद्र शीतल चांदणे देतो.
डोंगरातून नदी उगम पावते नि काठावरच्या गावांची तहान भागवते. ही धरती मानवांसाठी अन्नाची निर्मिती करते. जमिनीवर उगवलेली वनश्री मानवी
जीवनाची प्रत्येक गरज पूर्ण करते. पशु-पक्षी पर्यावरणाची शुद्धता राखतात, तर गुरेढोरे मानवाच्या कष्टात सामील होतात. वातावरणातील हवा मानवी
श्वास जगवते. सारा आसमंत मानवी जीवनासाठी नि:स्वार्थी वृत्तीने दातृत्व जोपासतो. या चराचरातील निसर्म मानवी जीवनाचे संवर्धन करतो. या
निसर्गाविषयी मानवी जीवन कृ तार्थ होऊन सदैव कृ तज्ञ राहिले आहे.
रसग्रहण
• 'झाडांच्या मनात जाऊ' या कवितेचे रसग्रहण करा.
उत्तर : 'झाडांच्या मनात जाऊ' ही कवी नलेश पाटील यांची कविता 'हिरवं भान' या कवितासंग्रहातून घेतली आहे. या कवितेत निसर्गाच्या
चैतन्याचा अनुपम सोहळा उत्कट प्रतिमांमधून कवींनी रंगवला आहे.
झाडांच्या मनात शिरून त्याचे हृद्गत जाणून घ्यायचे व आपणच अंती एखादे झाड होऊन निर्जन रानात डोलायचे, असा या कवितेचा प्रवास रसिकांना
आनंददायी व समृद्ध करणारा ठरला आहे. वसंत ऋतूचे लोभसवाणे दर्शन या चराचरातील वनश्रीत कसे झाले आहे, याचे वर्णन कवींनी अनेक प्रतीके
व प्रतिमा यांतून दृग्गोचर के ले आहे.
'फु लपाखरांचा थवा म्हणजे भिरभिरणारे पताकांचे तोरण, डोळ्यांत झऱ्याचे पाणी, देवाघरची गाणी, तुषारांचे रोप, सूर्य ओंजळीतल्या पाण्यात
पोहणे, सावलीला पंख फु टू न त्यांचे झालेले काऊ' अशा नितांत सुंदर प्रतिमा व प्रतीकांतून कवितेचा आशय समृद्ध झाला आहे व कवितेत नितळ
सौंदर्याचा आविष्कार झाला आहे. 'ईश्वरा, मला झाड बनवून निर्जन रानात टाक' ही कवींची अंतिम इच्छा खूपच भावपूर्ण व हृदयस्पर्शी आहे.
निसर्गचित्र रेखाटताना अम्लान शब्दकळेतून उमटलेला उत्कट भाव रसिकांना मोहून टाकणारा आहे. जणू आपणच निसर्गाच्या घटकात
तादात्म्य पावून निसर्ग डोळ्यांत व हृदयात साठवतो आहोत, अशी अनुभूती रसिक मनाला प्रत्ययास येते. कवींचे शब्दसामर्थ्य अनोख्या व उल्हसित
पतिमांतून प्रकट झाले आहे.
ध्रुपद व अंतरा असलेली ही गीतरचना यमकप्रधान आहे. प्रत्येक कडव्यात अनोखी भावस्थिती वर्णिली आहे. प्रासाद व माधुर्य याकाव्यगुणांनी मंडित
झालेली ही गीतरचना मला हृदयस्थ भावली.
व्याकरण व भाषाभ्यास
अ व्याकरण घटकांवर आधारित कृ ती
१. शब्दशक्ती :
• पुढील वाक्यांतील शब्दशक्ती ओळखा : उत्तरे
(१) सावलीला पंख फु टू न तिचे कावळे झाले. →\rightarrow
व्यंजना
(२) हे फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी →\rightarrow
लक्षणा
(३) रंगपंचमी खेळून फु लपाखरे भिजली →\rightarrow
अभिधा
२. काव्यगुण :
• पुढील ओळींतील काव्यगुण ओळखा : उत्तरे
(१) झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ पोपटी स्पंदनासाठी, कोकीळ होऊनी गाऊ →\rightarrow
माधुर्य
(२) ही कोणाची रे करणी, डोळ्यांत झऱ्याचे पाणी हे उधाण आनंदाचे की देवाघरची गाणी →\rightarrow
प्रसाद
(३) हे फांदीवरले पक्षी की हंगामांचे साक्षी झाडांच्या पायी काढी, सावली उन्हावर नक्षी →\rightarrow
प्रसाद
३. शब्दभेद :
• पुढील तक्ता पूर्ण करा :
शब्द अर्थ वाक्य
विशेषणे विशेष्ये
नाचरे स्पर्श
सावळा स्पंदन
मानवी पाणी
रंगीत सूर
पोपटी पताका
उत्तरे :
नाचरे - पाणी
सावळा - सूर
मानवी - स्पर्श
रंगीत - पताका
पोपटी - स्पंदन
(६) वचन बदला:
(१) गाणी - ___
(२) सूर - ___
(३) रोप - ___
(४) पाखरे - ___
(५) कोकीळ - ___
(६) सावली - ___
उत्तरे :
(१) गाणी - गाणे
(२) सूर - सूर
(३) रोप - रोपे
(४) पाखरे - पाखरू
(५) कोकीळ - कोकीळ
(६) सावली - सावल्या.
२. लेखननियम :
• पुढील शब्द शुद्ध स्वरूपात लिहा :
वंसत - ___
आनंध - ___
ओजंळ - ___
स्पर्ष - ___
सुरर्य - ___
इष्वर - ___
उत्तरे :
वंसत - वसंत
आनंध - आनंद
ओळ - ओंजळ
स्पर्ष - स्पर्श
सुरर्य – सूर्य
इष्वर – ईश्वर
३. पारिभाषिक शब्द :
• पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द द्या : उत्तरे
(१) Dean - अधिष्ठाता
(२) Elected - निर्वाचित
(३) Layout - आखणी/मांडणी
(४) Iceberg - हिमनग
(५) Guest House - अतिथीगृह
(६) Vacancy - रिक्तपद
(७) Yard - आवार
(८) Rest House - विश्रामगृह.
५. परिमळ
- प्रल्हाद के शव अत्रे
लेखक परिचय
प्रल्हाद के शव अत्रे
महाराष्ट्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले सुप्रसिद्ध लेखक. वाङ्मय, नाटक, चित्रपट, शिक्षण, राजकारण, समाजकारण अशा सर्व क्षेत्रांमध्ये उत्तुंग
कामगिरी. या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी मानदंड निर्माण के ले.
ग्रंथसंपदा : ‘अशा गोष्टी अशा गमती', 'फु ले आणि मुले' इत्यादी कथासंग्रह.
'झेंडू ची फु ले' हा विडंबन कवितांचा संग्रह.
'क-हेचे पाणी' हे आत्मचरित्र.
'मी असा झालो', 'हशा आणि टाळ्या' वगैरे विविध लेखन प्रकारांमधील अनेक पुस्तके .
'साष्टांग नमस्कार', 'तो मी नव्हेच', 'कवडीचुंबक', 'ब्रहमचारी'. 'डॉक्टर लाग', 'मोरूची मावशी' वगैरे रंगभूमीवर इतिहास निर्माण करणारी
अनेक नाटके .
भारत सरकारचे सर्वोत्कृ ष्ट चित्रपटाला असलेले सुवर्णकमळ हे पारितोषिक सर्वप्रथम पटकावणारा 'श्यामची आई' हा त्यांचा चित्रपट. १९४२१९४२
साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हा सन्मान त्यांना मिळाला.
पाठ परिचय
'बहिणाबाईंची गाणी' या काव्यसंग्रहाला अत्रे यांनी लिहिलेली प्रस्तावना म्हणजे हा पाठ होय. कोणत्याही प्रकारचे औपचारिक शिक्षण न घेतलेल्या,
लिहिता-वाचताही न येणाऱ्या, असामान्य प्रतिभाशक्ती असलेल्या बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यप्रतिभेची ओळख या पाठात करून दिलेली आहे.
ग्रामीण जीवन व कृ षिजीवन यांचा बहिणाबाईंच्या व्यक्तिमत्त्वावर खोल परिणाम झालेला होता. त्यामुळे त्यांच्या कवितांमध्ये त्या संस्कृ तीचे शेकडो
तपशील जिवंतपणे उभे राहतात. निसर्गाशी समरसता, परमेश्वरावरील व्यापक श्रद्धा, ग्रामीण समूहजीवनावरील विश्वास, माणुसकी इत्यादी
भावभावना त्यांच्या कवितांतून आविष्कृ त झालेल्या आहेत. अहिराणी बोलीमुळे त्यांच्या कवितांना अवीट असा गोडवा लाभला आहे.
शब्दार्थ
सोज्वळ - निष्पाप. माजघर - घराचा मध्यभाग. चतकोर - भाकरीचा पाव भाग, (येथे अर्थ - खूप लहान). येहेरित - विहिरीत. मोट - बैलांकडू न
किं वा रेड्यांकडू न विहिरीतील पाणी वर काढण्याचे एक साधन. जातीचा कवी - प्रतिभाशक्ती लाभलेला कवी. कपार - डोंगरातील खबदाड, दरड.
अपढिक - अशिक्षित. खेयता - खेळता. पर्गटले - प्रकटले. जोडीसन - जोडू न. करमाची - कर्माची, नशिबाची. पुशीसनी - पुसल्यावर. घरोटा -
जाते. व्होटी - ओठांत. धुक्कयेला – जळणाचा लाकू ड-फाटा, धुराने भरलेला. मियते - मिळते. फयं - फळे. झाडाले - झाडाला. निंबोयी -
निंबोळी. पिकिसनी - पिकल्यावर. अवघ्याले - अवघ्यांना. पात – रांग, ओळ. पुन्याई - पुण्याई. हिरीताचं - हृदयाचं. कारुणिक - करुणेने
भरलेले. येळी - वेडी. शिगोशीग - काठोकाठ,
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) मूग धरून बसणे - मौन पाळणे.
(२) तोंड पाहिलेले नसणे - अजिबात परिचय नसणे.
(३) धावा करणे - आळवणी करणे, विनवणी करणे.
घटना परिणाम
घटना परिणाम
(३) जातीच्या कवीचे हृदय ताल धरून बसलेले असणे. कवीच्या जिभेवर येणारा शब्द नाचतच येणे.
वर्तणूक
इमानीपणा
व्याकरण व भाषाभ्यास
अ व्याकरण घटकांवर आधारित कृ ती
१. शब्दशक्ती :
• पुढील वाक्यांतील शब्दशक्ती ओळखा : उत्तरे
(१) प्रतिभा हे कवीला लाभलेले निसर्गाचे देणे आहे. - अभिधा
(२) कवीचे हृदय ताल धरून बसलेले असते. - लक्षणा
(३) गावातली मंदिरे ह्याच माझ्या शाळा. व्यंजना - प्रसाद
२. काव्यगुण :
• पुढील ओळीतील काव्यगुण लिहा : उत्तरे
(१) हिरवे हिरवे पानं
लाल फयं जशी चोच
आलं वडाच्या झाडाले
जसं पीक पोपटाचं! - माधुर्य
(२) मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात?
प्रसाद आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात - प्रसाद
३. वाक्यसंश्लेषण :
• कं सांतील सूचनांप्रमाणे बदल करा :
(१) त्यांना लिहिता येत नव्हते नि वाचताही येत नव्हते.
(के वल वाक्य करा.)
(२) चूल पेटेनाशी झाली आणि तिच्यातून नुसताच धूर बाहेर पडू लागला.
(मिश्र वाक्य करा.)
(३) बहिणाबाई सोपानला निजवून हारा घेऊन शेतात गेल्या.
(संयक्त वाक्य करा.)
उत्तरे : (१) त्यांना लिहिता-वाचताही येत नव्हते.
(२) जेव्हा चूल पेटेनाशी झाली, तेव्हा तिच्यातून नुसताच धूर बाहेर पडू लागला.
(३) बहिणाबाईंनी सोपानला निजवले आणि हारा घेऊन त्या शेतात गेल्या.
४. काळ :
• कं सांतील सूचनांप्रमाणे बदल करा :
(१) कोकीळ पक्ष्याने तोंड उघडले. (रीती भूतकाळ करा.)
(२) सोपानदेवांनी आईची कविता वाचून दाखवली. (साधा वर्तमानकाळ करा.)
(३) हे काव्य मराठी भाषेत झळके ल. (रीती भविष्यकाळ करा.)
(४) त्यांनी एक चतकोर चोपडी दिली. (साधा भविष्यकाळ करा.)
(५) बहिणाबाईंची गाणी मराठी वाङ्मयात अमर होतील. (रीती वर्तमानकाळ करा.)
उत्तरे :
(१) कोकीळ पक्षी तोंड उघडत असे.
(२) सोपानदेव आईची कविता वाचतात.
(३) हे काव्य मराठी भाषेत झळकत जाईल.
(४) ते एक चतकोर चोपडी देतील.
(५) बहिणाबाईंची गाणी मराठी वाङ्मयात अमर होत असतात.
५. शब्दभेद :
• पुढील तक्ता पूर्ण करा : (अक्षर फरकाने अर्थबदल)
(१) पाठ शरीराचा अवयव काम करून आईची पाठ दुखू लागली.
पाट बसायचे साधन आईने गुरुजींना बसायला पाट दिला.
शब्दार्थ
भल्या पहाटीं - उत्तररात्रीनंतरची अरुणोद्याची वेळ. तोऱ्यात - ऐटीत, रुबाबात. पेरित - पखरण करत. तरल - उत्कट. लक्ष्य - वेध, ध्येय.
पिपासा - उत्कट तहान. बुजली - नाहीशी झाली, मिटली, दिसेनाशी झाली. तांबुस - लालसर. निर्मल - स्वच्छ, पवित्र. अभ्र - ढग, मेघ. गंध
- सुवास.
टिपा
१. दव - पहाटेच्या वेळी हवा गारठू न निर्माण झालेले पाण्याचे थेंब, दवबिंदू.
२. शुक्र - एक तेजस्वी ग्रह (तारा).
३. हिरवे धागे - (इथे अर्थ) प्रेमाचे कोमल संबंध, प्रेमपाश.
४. डोळ्यांमधली डाळिंबे - (इथे अर्थ) डोळ्यांमधली तरल चमक.
५. पारा - एक धातू (चिमटीत पकडता येत नाही.)
६. गतजन्म - पूर्वजन्माची कल्पना.
कवितेचा भावार्थ
शुक्रताऱ्याच्या तेजस्वी प्रकाशात, शुक्राच्या ऐटीत, एकदा तू दवबिंदू पडण्याच्या भल्या पहाटेच्या प्रहरी आलीस; आणि आपल्या तरल पावलांच्या
कोमल शोभेची पखरण करत माझ्याजवळून दूर निघून गेलीस.
पुढे जाऊन थोडीशी थबकलीस, जरासे स्मित तुझ्या ओठांवर उमलले; पण तू मागे वळून मला पाहिले नाहीस. आपल्यामधील प्रेमभाव, प्रेमाचे पाश
तू विसरलीस का? (आपल्यामधील प्रेमसंबंध तू पार विसरलीस.)
तुझे डोळे कशाचा वेध घेत होते? प्रेमाची आकं ठ तहान तुला होती का? तुझ्या सौंदर्याची कोणती नेमकी खूण आहे? तुझ्या डोळ्यांत उमललेल्या
चंचल चमके मधला भाव पाऱ्यासारखा उमटू न निसटू न गेलेला मी पाहिला.
वर्तमानातील ताज्या, कोमल, ओल्या आठवणीच जर विरून गेल्या असतील, तर अनोळखी झालेल्या गतकाळातील प्रेमाची ओळख मी तुला कशी
द्यावी, ते मला सांग.
तळहाताच्या नाजूक रेषा वाचून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कसे करावे? तुझ्या लालसर निर्मळ नखांवर शुभ्र चांदण्यांसारखे शुभशकु न कु णी गोंदावे?
भल्या पहाटेच्या वेळी, विरल सुंदर ढग अरुणोद्याच्या प्रतीक्षेत असताना तू एकदा आलीस आणि जवळून जाताना आपल्या प्रेमाच्या आठवणींचा मंद
ओलसर सुवास मनात पेरीत निघून गेलीस.
कवितेचा विषय
कवितेतील छंद
कवितेतील तुम्हांला आवडलेले शब्दसमूह लक्ष्य कु ठे अन् कु ठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा;
डोळ्यांमधल्या डाळिंबांचा
सांग धरावा कै सा पारा!
(७) (१) तोरा (२) इशारा (३) डाळिंबे (४) नाजूक रेषा (५) शुभ्र चांदण्या (६) मढेकरांची कविता
कृ ती २ : (काव्यसौंदर्य)
(१) 'डोळ्यांमधल्या डाळिंबांचा, सांग धरावा कै सा पारा!' या काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर : ‘दवांत आलीस भल्या पहाटी' या कवितेत कवी बा. सी. मर्डेकर यांनी प्रेयसीच्या भेटीतील आतुरता व व्याकु ळता यांचे भावोत्कट वर्णन के ले
आहे. पहाटेच्या वेळी दवभारल्या प्रहरात घडलेली भेट ही प्रत्यक्ष होती की स्वप्नवत होती, यांतील संभ्रम मनोहारी प्रतिमांतून प्रकट के ला आहे.
शुक्राच्या तोऱ्यात आलेली प्रेयसी तरल पावलांमधली शोभा पेरीत अगदी जवळून गेली. पण तिला गतकाळातील प्रेमाच्या आठवणी स्मरत नाहीत. ती
वळूनही मागे पाहत नाही. तिच्या नजरेमध्ये सुंदरतेच्या खुणा उमटत नाहीत. तिच्या डोळ्यांत प्रेमाची आश्वासक चमक का नाही? हे सांगताना
कवीने 'डोळ्यांमधल्या डाळिंबाचा पारा' ही तरल प्रतिमा वापरली आहे. पारा जसा चिमटीत ठरत नाही, पटकन निसटू न जातो. डाळिंबांच्या
दाण्यातला पांढरा गर चकाकत राहतो. तसे तिच्या डोळ्यांतील प्रेम तरळते व नाहीसे होते.
प्रेयसीच्या नजरेतील चंचलतेसाठी एक वेगळी, अनोखी व तरल प्रतिमा कवीने सार्थपणे या ओळीत योजिली आहे.
(२) 'जवळुनि गेलिस पेरित अपुल्या मंद पावलांमधल्या गंधा' या ओळींमधील भावसौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : कवी बा. सी. मर्डेकर यांनी 'दवांत आलीस भल्या पहाटी' या कवितेमध्ये स्वप्नवत येणारी प्रेयसी व गूढपणे तिचे निघून जाणे यांतील
कातरता व व्याकु ळता सहज पण तरल, संवेदनशील प्रतिमांमधून व्यक्त के ली आहे.
पहाटेच्या वेळी शुक्र ताऱ्याच्या तेजाने आसमंत उजळावा तशी आलेली प्रेयसी तरल पावलांमधील शोभा फु लवीत जवळून गेल्याचा भास होतो.
गतकाळातील प्रेमभाव तिच्या डोळ्यांत दिसत नाही. कोमल, ओल्या आठवणी तिला स्मरत नाहीत. तळहातावरील रेषा वाचता येत नाहीत. तिचा
सारा अनोळखी भाव कवीला व्याकू ळ करतो. पहाटेच्या विरळ व धूसर ढगांच्या शोभेत आलेली प्रेयसी जाताना मात्र तिच्या प्रेमाचा गंध मागे दरवळत
ठेवून निघून जाते.
अभ्रांच्या शोभेत प्रियेचे येणे व निघून जाणाऱ्या मंद पावलांमधला गंध मागे उरणे, यांतील हृदयस्थ कातर करणारा भाव कवीने उत्कटपणे व्यक्त के ला
आहे.
कृ ती ३ : (अभिव्यक्ती)
• प्रस्तुत प्रेमकवितेचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण स्पष्ट करा.
उत्तर : बा. सी. मर्टेकर यांच्या बहुतांश कविता मानवी जीवनातील नगण्यता व वैफल्यग्रस्तता चितारीत करणाऱ्या आहेत. त्या भावोत्कट आहेतच
पण चिंतनशीलता हा त्यांचा स्थायीभाव आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत ‘दवांत आलीस भल्या पहाटी' ही कविता वेगळी ठरते.
प्रेमभावनेने ओथंबलेली ही कविता त्यातील व्याकू ळतेमुळे मनाला भिडते. प्रेयसीचे येणे व जाणे हे प्रत्यक्ष आहे की स्वप्नवत आहे, हा संभ्रम कवितेच्या
प्रत्येक कडव्यात तरळत राहतो. गतकाळातील प्रेमाची तिला विस्मृती झाली आहे की काय? प्रेमीजीवनात विरह प्रबळ ठरतो का? प्राक्तनाच्या रेषा
चुकीच्या असतात का? नजरेतील प्रेमभाव हरवून आठवणी बुजून जातात का? असे अनेक अनुत्तरित प्रश्न या कवितेत निर्माण होतात व
प्रेमीजीवनातील हतबलता प्रकर्षाने काळजाला पोखरत नेते. शेवटी स्मरणगंध उराशी जपावा हेच कवीचे भागधेय (नशीब) ठरते.
समकालीन प्रेमकवितेतील आनंददायी उत्कट आविष्कार, प्रस्तुत कवितेत दिसून येत नाही. प्रेमभावनेचा वेगळा दृष्टिकोन या कवितेत प्रत्ययास येत
असल्यामुळे ही प्रेमकविता वेगळी व अनोखी ठरली आहे.
रसग्रहण
• 'दवांत आलीस भल्या पहाटी' या कवितेचे रसग्रहण करा.
उत्तर : प्रेयसीचे आगमन व निर्गमन हे प्रत्यक्ष आहे की स्वप्नवत , आहे, याचे व तिच्या सौंदर्याच्या विभ्रमांचे भावोत्कट आलेखन करणे ही 'दवांत
आलीस भल्या पहाटी' या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. प्रेयसीच्या भेटीची आतुरता व त्यातील कातर व्याकू ळता हा या प्रेमकवितेचा स्थायिभाव
आहे.
शुक्राच्या तेजस्वी आभेमध्ये तोऱ्यात येणारी प्रेयसी विरळ, धूसर अभ्रांच्या शोभेत स्मरणगंध मागे ठेवून निघून जाते. या दरम्यानची मानसिक घालमेल
कवीने उत्कट व अनोख्या प्रतिमांमधून साकार के ली आहे. अनेक गूढरम्य भावनांचे जाळे या कवितेत कवीने विणले आहे. समकालीन प्रेमकवितेत
आढळून न येणाऱ्या वेगळ्या भावरम्य प्रतिमा कवीने या कवितेत मांडल्या आहेत. 'प्रेमभावनेचे हिरवे धागे', 'डोळ्यांमधील डाळिंबांचा पारा',
'आठवणींची रांग', 'तांबुस नखांवरील शुभ्र चांदण्या', 'पावलांचा गंध' इत्यादी भावगर्भ प्रतिमांतून प्रेमभावनेतील व्याकू ळता प्रत्ययकारी रीतीने प्रकट
झाली आहे. रसिकाला खिळवून ठेवणारी ही प्रतिसृष्टी के वळ अनोखी आहे.
प्रेमात बुडू न गेलेल्या जिवासाठी प्रेयसीचे अनोळखी वर्तन हृदयाला पीळ पाडणारे आहे. तसेच प्रेमातील हेच भागधेय आहे की काय? प्रेमाची परिणती
विरहात होते का? के वळ उराशी स्मृती व प्रेमगंध जपणे हीच प्रेमाची अपरिहार्यता असते का? इत्यादी चिंतनशील आशय या कवितेतून दृग्गोचर होत
राहतो.
अनुष्टु भ' छंदात बांधलेली ही यमकप्रधान रचना तिचा अंतर्गत नाद व लय यांमुळे रसिकाच्या ओठांत गुणगुणत राहते. त्यामुळे प्रेमातील कातरता
अधोरेखित करणारी ही बा. सी. मकर यांची अनोखी प्रेमकविता मला अत्यंत प्रिय आहे.
व्याकरण व भाषाभ्यास
अ व्याकरण घटकांवर आधारित कृ ती
१. शब्दशक्ती :
पुढील ओळींमधली शब्दशक्ती ओळखा :
(१) डोळ्यांमधल्या डाळिंबांचा
सांग धरावा कै सा पारा! →\rightarrow
व्यंजना
(२) दवांत आलीस भल्या पहाटे
अभ्रांच्या शोभेत एकदा →\rightarrow
अभिधा
२. काव्यगुण :
पुढील ओळींतील काव्यगुण ओळखा :
(१) अडलिस आणिक पुढे जराशी
पुढे जराशी हसलिस;
-मागे →\rightarrow
प्रसाद
वळुनि पाहणे विसरलीस का?
विसरलीस का हिरवे धागे?
(२) अनोळख्याने ओळख कै शी
गतजन्मीची द्यावी सांग;
कोमल ओल्या आठवणीची
माधुर्य एथल्याच जर बुजली रांग! →\rightarrow
माधुर्य
३. शब्दभेद :
• पुढील तक्ता पूर्ण करा : (लेखनातील सूक्ष्म बदल व अर्थबदल)
२. लेखननियम :
• पुढील शब्द शुद्ध स्वरूपात लिहा :
डाळींब -___
वीसरलिस -___
ताबूंस -___
नीमल -___
उत्तरे :
डाळींब - डाळिंब
वीसरलिस - विसरलीस
ताबूस – तांबुस
नीमल - निर्मल
३. पारिभाषिक शब्द :
• पुढील इंग्रजी शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा : उत्तरे
(१) Journal - नियतकालिक
(२) Draft - मसुदा
(3) Foundation - प्रतिष्ठान
(४) Pedestrian - पादचारी
(५) Terminology - परिभाषा
(६) Verification - पडताळणी
(७) Symposium - परिसंवाद
(८) Xerox - नक्कल प्रत, छायाप्रत.
भाग - २ : गद्य व पद्य
७. 'माणूस' बांधूया!
- प्रवीण दवणे
लेखक परिचय
प्रवीण दवणे
प्रवीण दवणे हे विद्यार्थिप्रिय प्राध्यापक आणि लोकप्रिय लेखक, कवी, गीतकार, पटकथालेखक, वक्ते म्हणून परिचित.
ग्रंथसंपदा
१. 'थेंबातलं आभाळ', 'अत्तराचे दिवस', 'सावर रे', 'गाणारे क्षण', 'मनातल्या घरात', 'हे जीवना' हे ललित लेखसंग्रह.
२. 'रंगमेघ', 'गंधखुणा', 'आर्ताचे लेणे', 'ध्यानस्थ', 'भूमीचे मार्दव' हे कवितासंग्रह.
३. 'प्रश्नपर्व' हा वैचारिक लेखसंग्रह.
४. 'दिलखुलास', 'थेंबातले आभाळ', 'सावर रे', 'लेखनाची आनंद्यात्रा', 'वय वादळ विजांचं' हे त्यांचे गाजलेले कार्यक्रम.
पाठ परिचय
'प्रश्नपर्व' या वैचारिक लेखसंग्रहातून हा पाठ घेतलेला आहे.
सध्याचे वातावरण हे आत्यंतिक उपयुक्ततावादी बनले आहे. आज भावनांना किं मत राहिलेली नाही. पैसा मिळवणे एवढा एकच हेतू मानवी जीवनाला
लाभला आहे. खरे पाहता माणसांमधील नाती ही आंतरिक जिव्हाळ्याने बांधलेली असली पाहिजेत. इतर प्राणी व माणूस यांच्यात हाच महत्त्वाचा
फरक आहे. सध्या माणसांच्या नात्यातला भावनांचा हळुवारपणा हरवला आहे. माणसांमधला नष्ट झालेला संवाद हेच यामागील कारण होय.
माणसांमध्ये भावपूर्ण, हृदय नाते आपण निर्माण करू शकलो नाही, तर सर्व माणसांना मानसिक आजारांनी ग्रासले जाईल. त्याबद्दलची खंत लेखक
या पाठात मांडत आहेत.
शब्दार्थ
मिथ्या – खोटे, असत्य, अवास्तव, भासमय. आरपार - वस्तूमधून वस्तूच्या पल्याड (पाहणे). आंतरिक दारिद्र्य - मनाचे दारिद्र्य. मार्के टिंग -
एखाद्या वस्तूला बाजारात विक्रीयोग्य बनवण्यासाठी के लेला यशस्वी प्रचार. खिन्न - दुःखी, कष्टी. क्रं दन - रडू , आक्रोश. पोटार्थी – पोटासाठी
जगणारे. आटापिटा - खूप कष्टपूर्वक के लेला प्रयत्न. यंत्रसंवाद - यंत्राच्या साहाय्याने साधलेला संवाद. अंमळ - अल्पसा वेळ. उमाळा - भावनेचा
कढ, तीव्र इच्छा. मनोरुग्णता - मानसिक आजार. झडझडू न - झटकन, लवकर, सर्व काही झिडकारून पटकन.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) भुईसपाट होणे : पूर्णपणे उद्ध्वस्त होणे.
(२) मन कातर होणे : भयभीत होणे.
(३) एकाकी पाडणे : आधार असलेले नातेसंबंध तोडणे.
(४) जागे होणे : वास्तवाची जाणीव होणे.
व्याकरण व भाषाभ्यास
अ व्याकरण घटकांवर आधारित कृ ती
१. शब्दशक्ती :
पुढील वाक्यांतील शब्दशक्ती ओळखा : उत्तरे
(१) घर, शाळा, मंदिरे म्हणजे समाजाची आशास्थाने होती. - लक्षणा
(२) 'विनाश हाच विकास' हा नव्या जगाचा मंत्र होईल. - व्यंजना
(३) आत्म्याची साद असते, तोच संवाद! - अभिधा
(४) संवाद हा माणूसपणाचा पायाभूत धर्म आहे. - लक्षणा
२. वाक्यसंश्लेषण :
• पुढील वाक्ये कं सांतील सूचनांनुसार बदला :
(१) आई कामावरून घरी येते. सिरियल बघण्यात मग्न होते.
(के वल वाक्य करा.)
(२) काही प्रश्न असे आहेत. धनाने सोडवता येणार नाहीत..
(मिश्र वाक्य करा.)
(३) नवनिर्मितीची प्रेरणा भूतकाळाशी धागा जोडते. ती भविष्यकाळाची स्वप्नं रंगवते.
(संयुक्त वाक्य करा.)
(४) सकाळ होते. पाय पाठीला लावून लोक पळत सुटतात.
(के वल वाक्य करा.)
उत्तरे :
(१) आई कामावरून घरी येताच सिरियल बघण्यात मग्न होते.
(२) काही प्रश्न असे आहेत, जे धनाने सोडवता येणार नाहीत.
(३) नवनिर्मितीची प्रेरणा भूतकाळाशी धागा जोडते आणि भविष्यकाळाची स्वप्नं रंगवते.
(४) सकाळ होताच पाय पाठीला लावून लोक पळत सुटतात.
३. काळ :
• पुढील वाक्ये रीती भूतकाळात लिहा :
(१) कृ त्रिम पाऊस पाडण्याचा आटापिटा करतात.
(२) 'मनजागरण' करण्याचे कु णीतरी निमंत्रण देईल.
(३) माणूस भूतकाळाशी धागा जोडतो.
(४) नवनिर्मितीची प्रेरणा माणसाला विचार करायला लावते.
उत्तरे :
(१) कृ त्रिम पाऊस पाडण्याचा आटापिटा करीत असत.
(२) 'मनजागरण' करण्याचे कु णीतरी निमंत्रण देत असे.
(३) माणूस भूतकाळाशी धागा जोडत असे.
(४) नवनिर्मितीची प्रेरणा माणसाला विचार करायला लावत असे.
४. शब्दभेद :
• पुढील शब्दांचे भिन्न अर्थ लिहा :
(१) काठ →\rightarrow
___, ___
(२) हवा →\rightarrow
___, ___
(३) मूल्य →\rightarrow
___, ___
(४) साथ →\rightarrow
___, ___
(५) पद →\rightarrow
___, ___
(६) माया →\rightarrow
___, ___
उत्तरे:
(१) काठ →\rightarrow
किनारा, लुगड्याचा पदर
(२) हवा →\rightarrow
वारा, क्रियापद
(३) मूल्य →\rightarrow
किं मत, तत्त्व
(४) साथ →\rightarrow
सोबत, रोगाची लागण
(५) पद →\rightarrow
पाय, हुद्दा
(६) माया →\rightarrow
प्रेम, पैसा
आ भाषिक घटकांवर आधारित कृ ती
१. शब्दसंपत्ती :
(१) समानार्थी शब्द लिहा : (प्रत्येकी दोन)
उत्तरे
(१) मन ==
चित्त अंत:करण
(२) मिथ्या ==
खोटे लटके
(३) आकाश ==
गगन आभाळ
(४) सूत्र ==
धागा सूत
(५) भुंगा ==
भ्रमर अली
(६) दगड ==
खडक पाषाण
(२) अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थबदल न करता वाक्ये पुन्हा लिहा :
(१) नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही.
(२) माणसा-माणसांत संवाद हवा.
(३) मनुष्य हा प्रेमाच्या आधारावर जगू शकतो.
उत्तरे :
(१) जुन्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत होती.
(२) माणसा-माणसांत विसंवाद नको.
(३) मनुष्य हा द्वेषाच्या आधारावर जगू शकत नाही.
(३) विरुद्धार्थी शब्द लिहा :
(१) खरेदी ×\times
___
(२) अबोल ×\times
___
(३) सुख ×\times
___
(४) कृ त्रिम ×\times
___
(५) प्रगती ×\times
___
(६) लौकिक ×\times
___
(७) चिरंतन ×\times
___
(८) सत्य ×\times
___
(९) नैसर्गिक ×\times
___
उत्तरे : (१) खरेदी ×\times
विक्री
(२) अबोल ×\times
बोलका
(३) सुख ×\times
दुःख
(४) कृ त्रिम ×\times
अकृ त्रिम
(५) प्रगती ×\times
अधोगती
(६) लौकिक ×\times
अलौकिक
(७) चिरंतन ×\times
अशाश्वत
(८) सत्य ×\times
असत्य
(९) नैसर्गिक ×\times
अनैसर्गिक
(४) 'संवेदनशून्य' शब्दासारखे नकारार्थी भावदर्शक चार शब्द लिहा.
उत्तर : (१) भावशून्य (२) मूल्यहीन (३) अगतिक (४) अधिकारशून्य
(५) गटात न बसणारा शब्द शोधा : उत्तरे
(१) तो, मी, पी, हा →\rightarrow
पी
(२) खाणे, पिणे, शहाणे, जाणे →\rightarrow
शहाणे
(३) तापी, कृ ष्णा, नदी, यमुना →\rightarrow
नदी
(४) त्याला, तुला, मला, माणसाला →\rightarrow
माणसाला
(५) आनंदी, दुःखी, सौंदर्य, आळशी →\rightarrow
सौंदर्य
(६) पुढील शब्दांतील अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द लिहा : उत्तरे
(१) भुईसपाट →\rightarrow
भुई, पाट, सपाट, पास
(२) जीवनशैली →\rightarrow
जीवन, वन, नव, शैली
(७) पाठातील प्रत्येकी दोन शब्द लिहा : उत्तरे
(१) उपसर्गघटित शब्द →\rightarrow
सुसंवाद विनाश
(२) प्रत्ययघटित शब्द →\rightarrow
आंतरिक उबदार
(३) अभ्यस्त शब्द →\rightarrow
आरपार पडझड
२. विरामचिन्हे :
• पुढील वाक्यांत योग्य जागी योग्य विरामचिन्हे घालून वाक्ये पुन्हा लिहा :
(१) घर शाळा मंदिरं ही समाजाची आशास्थानं होती पण या काळात घर म्हणजे फक्त निवारा
(२) हे काय घडतंय माणसं असं का वागताहेत
उत्तरे : (१) घर, शाळा, मंदिरं ही समाजाची आशास्थानं होती;
पण या काळात घर म्हणजे फक्त निवारा!
(२) हे काय घडतंय? माणसं असं का वागताहेत?
३. लेखननियम :
(१) अचूक शब्द निवडा :
(१) दारीद्रय/दारीद्र/दारिद्र्य/दरिद्र्य - दारिद्रय
(२) निष्कर्ष/नीष्कर्ष/निष्र्कष/नीश्कर्ष -निष्कर्ष
(३) उदेश/उद्देश/ऊद्देश/उद्देष - उद्देश
(४) नेसर्गीक/नैसर्गीक/नैशर्गिक नैसर्गिक - नैसर्गिक
(२) पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(१) संवेदनांचे नीरोप समारंभ साजरे होऊ लागले.
(२) हीच दूकानाची लागण बाहेरुन आत सरकली.
(३) संवाद हा माणुसपणाचा पायाभुत धर्म आहे.
(४) वीनाश हाच वीकास हा नव्या जगाचा मंत्र होईल.
उत्तरे : (१) संवेदनांचे निरोप समारंभ साजरे होऊ लागले.
(२) हीच दुकानाची लागण बाहेरून आत सरकली.
(३) संवाद हा माणूसपणाचा पायाभूत धर्म आहे.
(४) विनाश हाच विकास हा नव्या जगाचा मंत्र होईल.
४. वाक्प्रचार व म्हणी :
(१) पुढील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा :
(१) मन कातर होणे
(२) काळजात क्रं दन होणे.
उत्तरे : (१) मन कातर होणे - मन बेचैन होणे.
वाक्य : पुरात सदाशिवचे घर वाहून गेले हे कळताच माझे मन कातर झाले.
(२) काळजात क्रं दन होणे - हृदयात आक्रोश दाटणे.
वाक्य : दुष्काळाने गावाची वाताहत होते तेव्हा काळजात क्रं दन होते.
(२) पुढील म्हणी पूर्ण करा :
(१) नाचता येईना ___
(२) गरज सरो नि ___
(३) उथळ पाण्याला ___
(४) बुडत्याला ___
उत्तरे :
(१) नाचता येईना अंगण वाकडे.
(२) गरज सरो नि वैद्य मरो.
(३) उथळ पाण्याला खळखळाट फार.
(४) बुडत्याला काडीचा आधार.
५. पारिभाषिक शब्द :
• पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा : उत्तरे
(१) Academics - विद्याभ्यास
(२) Commissioner - आयुक्त
(३) Incentive -प्रोत्साहनपर
(४) Kindergarten - बालकमंदिर
(५) Waiting list - प्रतीक्षासूची
(६) Upgradation - उन्नयन
(७) Organic Farming - सेंद्रिय शेती
(८) Nervous System - चेतासंस्था
प्रकल्प
• लेखकाने पाठात व्यक्त के लेल्या संवादाचे बदलते स्वरूप समजून घेऊन, तुमच्या परिसरातील भिन्न-भिन्न आर्थिक, शैक्षणिक स्तरांतील
किमान पाच कु टुंबांचे सर्वेक्षण करा. नोंदींसाठी मुद्दे ठरवा. त्यानुसार नोंदी करा. तुमच्या अहवालाबाबत तुमच्या मित्रांशी चर्चा करा.
त्यानुसार तुमच्या प्रकल्प अहवालात सुधारणा करून तो वर्गात वाचून दाखवा.
शब्दार्थ
ऐसी - अशी. रसिकें - रसाळ. बोलु - बोल, शब्द. परि - परंतु, पण. पैजा - शर्यत, होड, स्पर्धा. मेळवीन - निर्माण करीन. कोवळिके -
कोमलता, मार्दव. जिये - जिच्या. पांडे - पुढे. नादींचे - संगीताचे, नादाचे. वेधे - वेधणे. परिमळ - सुगंध. बीक मोडे - बळ मोडते, गर्व नाहीसा
होतो. जयाचेनि - जिच्यामुळे. लोभा - मोहाने. श्रवण - कान. इंद्रियां - अवयवांत. कळंभा - भांडण, कलह. विषो - विषय. रसना - जीभ.
घ्राण - नाक. भावो - भावना. जाय - जातो. देखता - बघता. धणी – तृप्ती. खाण - भांडार, साठा, संग्रह. रूपाची - सौंदर्याची. पद - शब्द.
उभारे - उभारतो, वर येतो. भुजा - हात, बाहू. आविष्करें - तयार होतात, सरसावतात. आलिंगावया - मिठी मारायला. झोंबती - बिलगतात.
सरिसेपणे - उत्तम प्रकारे, सरसपणे. बुझावी - समाधान करतो. चेववी - चेतवतो, उजळतो. सहस्रकरु - सूर्य. व्यापकपण - विस्तार,
अथांगपणा. असाधारण - असामान्य, उत्कृ ष्ट. भावज्ञां - जाणकार, ज्ञानी. फावती - भावतात, पसंत येतात. हे असोतु - हे असो, हे राहू दे.
भली - छान भरलेली. वोगरिलीं - वाढलेली. प्रतिपत्ती – मेजवानी. मियां – मी. आत्मप्रभा - स्वयंप्रकाश. नीच नवी - नित्य नवी. ठाणदिवी -
लाकडी समई. जेवी - आस्वाद घेणे. तयासीचि - त्यालाच. फावे - फावते, मिळते. पांगेंविण - अंगाशिवाय. निजांगे - स्वत:चे अंग. भोगिजे -
भोग घ्या, आत्मसात करा, आस्वादा.
टिपा
१. अमृत - अमर करणारे स्वर्गलोकीचे रसाळ पेय (काल्पनिक).
२. चिंतामणी - मनातील इच्छा पूर्ण करणारा अलौकिक मणी (काल्पनिक).
३. कै वल्यरस - पारमार्थिक सुख, आध्यात्मिक तत्त्व.
४. निष्काम - कार्याचा परिणाम किं वा मोबदला किं वा परिपाक न घेणे. नि:स्वार्थ बुद्धीने के लेले काम.
५. रेखेची वाहणी - शब्दनिर्मितीची प्रक्रिया. रेषा वाहते तसे शब्द तयार होतात.
कवितेचा भावार्थ
मराठी भाषेचा गौरव करताना व शब्दांची महती सांगताना संत ज्ञानेश्वर म्हणतात
कौतुकास्पद असलेला माझा मराठीचा बोल (शब्द) अमृताशीही पैज जिंकणारा आहे. अशी रसाळ अक्षरे मी मराठीत निर्माण करीन. ।।१।।
या शब्दांची कोमलता इतकी आहे की त्यांच्यापुढे संगीताचे रंगही फिके पडतात. माझ्या शब्दांना इतका गंध आहे की त्यापुढे (फु लांच्या) सुगंधाचेही
बळ तोकडे पडते. सुगंधाचेही गर्वहरण होते.।।२।।
मराठी भाषेच्या रसाळपणाचा इतका मोह होतो की, कानांना जिभा फु टतात. श्रवणाला स्वाद येतो. शरीराचे सर्व अवयव (इंद्रिये) एकमेकांशी भांडू
लागतात. प्रत्येक इंद्रियाला मराठी भाषा के वळ आपलीच आहे, असे वाटू लागते.।।३।।
खरे म्हणजे, शब्द हा श्रवणाचा (ऐकण्याचा) विषय आहे. परंतु जीभ म्हणते की, तो रस (शब्द) माझा आहे. मला आस्वादायचा आहे. नाकाला तर
शब्दांचा सुगंध येऊ लागतो. त्यामुळे नाक म्हणते शब्द हा माझा विषय आहे.।।४।।
या रेखेच्या वाहणीचे (शब्दांचे) नवल असे की हे शब्दचित्र पाहून डोळ्यांची तृप्ती होते. डोळ्यांचे पारणे फिटते. डोळे म्हणतात की आमच्यासाठीच हे
सौंदर्याचे भांडार खुले के ले आहे.।।५।।
जेव्हा संपूर्ण सार्थ शब्द उभा ठाकतो, तेव्हा मन त्याला आस्वादण्यासाठी शरीराबाहेर झेप घेते आणि हात त्याला मिठीत घ्यायला पुढे सरसावतात.
हातांना आलिंगन द्यावेसे वाटते.।।६।।
अशा प्रकारे सर्व इंद्रिये आपापल्या परीने शब्दाला बिलगतात आणि शब्दही उत्तम प्रकारे सर्व इंद्रियांचे समाधान करतो. ज्याप्रमाणे एकटा सूर्य
चराचराला उजळतो.।।७।।
त्याप्रमाणे माझ्या मराठी शब्दाचे असामान्य, अलौकिक असे व्यापकपण, विस्तार, अफाटपणा आहे. जाणकार रसिक लोकांना तर मराठी भाषा ही
हरएक इच्छा पूर्ण करणाऱ्या चिंतामणीसारखी भावते. पसंतीस येते.।।८।।
हे असो. तर मी या मराठी शब्दांची शिगोशीग ताटे भरली आहेत. त्यावर कै वल्यरस वाढला आहे. अशी निष्काम कर्मयोगाची मेजवानी मी तयार के ली
आहे.।।९।।
आता या नित्य नूतन आत्मप्रकाशाची समई (दीपज्योती) मी तेवत ठेवली आहे. मराठी भाषेची ही अक्षयसंपदा जो इंद्रियातीत, इंद्रियांच्या पलीकडे
जाऊन नि:संगपणे आस्वादेल, त्यालाच ती प्राप्त होईल.।।१०।।
आता श्रोतेहो एक गोष्ट करा, मी निरूपण करीत असलेली मराठी भाषेची थोरवी ऐकण्याच्याही पलीकडे जाऊन मनाने आत्मरत होऊन आस्वादा. (हा
कै वलरसमोदक तुम्ही मनाने अनुभवा.)
।।११।।
इंद्रिये परिणाम
इंद्रियेतर - ___
(१) मन ___
(३) 'रसाळ बोल' आणि 'सूर्य' यांच्या कार्याच्या माध्यमातून पुढील तक्ता पूर्ण करा :
इंद्रिये परिणाम
इंद्रियेतर -
(३)
(४) (१) माझा मराठीचा बोल (शब्द) मला कौतुकाचा वाटतो. अमृताशी जरी पैज लावली, तरी माझा मराठीचा बोल ती पैज जिंके ल. कारण
अमृतापेक्षाही माझ्या मराठी भाषेत गोडवा व माधुर्य अधिक आहे.
(२) माझ्या मराठी शब्दांची इतकी कोमलता आहे की, त्यातून फु लासारखा सुगंध येतो. हा सुगंध असा आहे की, प्रत्यक्ष फु लातल्या सुगंधाचे बळ
त्याच्यापुढे तोकडे पडते. इतकी माझी मराठी भाषा गंधित आहे.
(५) (१) श्रवणाच्या जिभा होतात
(२) इंद्रियांत भांडण लागते
(३) सहस्त्रकर (सूर्य)
(६)(१) परिमळाचे
(२) रेखेची
(३) सहस्रकर (सूर्य)
(३) रूपाची
(४) सहस्रकर
(५) चिंतामणीचे
(६) कै वल्यरस
आत्मप्रभेची
कृ ती २ : (काव्यसौंदर्य)
• पुढील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा :
(१) ऐका रसाळपणाचिया लोभा। की श्रवणींचि होति जिभा।
बोलें इंद्रियां लागे कळंभा। एकमेकां ।।३।।
उत्तर : 'ऐसी अक्षरे रसिकें ' या ओव्यांमध्ये संत ज्ञानेश्वर यांनी मराठी भाषेची महती सांगितली आहे. मराठी भाषेचे सौंदर्य व गोडवा सांगताना ते
म्हणतात की मराठी भाषा ही अमृतापेक्षा गोड व मधुर आहे.
प्रस्तुत ओवीमध्ये संत ज्ञानेश्वरांना मराठी भाषेच्या रसाळपणाविषयी भाष्य करायचे आहे. ते म्हणतात की, माझी मराठी भाषा इतकी रसाळ आहे की
तिच्या रसाळपणाच्या मोहाने कानालाही जिभा फटतात. म्हणजे कानाला ती जिभेप्रमाणे आस्वादावीशी वाटते. एवढेच नव्हे तर प्रत्येक इंद्रियाला
मराठी भाषा स्वतः आस्वादावीशी वाटते. यासाठी सर्व अवयवांमध्ये व पंचेंद्रियांमध्ये प्रेमळ भांडण जुंपले आहे. प्रत्येक इंद्रियाला मराठी भाषा
आपलीशी वाटते.
प्रस्तुत ओवीमध्ये मराठी भाषेच्या रसाळपणाविषयी पराकोटीची कल्पना करून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला एकमेवाद्वितीय ठरवली आहे.
(२) "तैसें शब्दांचे व्यापकपण । देखिजे असाधारण ।
पाहातयां भावाज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ॥२॥
उत्तर : संत ज्ञानेश्वर यांनी 'ऐसी अक्षरे रसिकें ' या ओव्यांमध्ये मराठी भाषेची थोरवी भावपूर्ण शब्दांत व्यक्त के ली आहे. सर्व इंद्रियांना हवीहवीशी
वाटणारी माझ्या मराठी भाषेची गोडी जाणकार रसज्ञांना कशी भावते, याचे यथोचित वर्णन उपरोक्त ओवीमध्ये त्यांनी के ले आहे.
संत ज्ञानेश्वर मराठी भाषेची महती सांगताना म्हणतात – सूर्य जसा चराचराला उजळून टाकतो तशी मराठी भाषेला बिलगणाऱ्या सर्व अवयवांना ती
उत्तम प्रकारे समाधान देते. असे मराठी शब्दांचे विस्तारलेपण, अथांगपण असामान्य असे आहे. चिंतामणी हे रत्न जसे सर्व माणसांची मनोइच्छा पूर्ण
करण्यास सक्षम आहे, तसे मराठी बोल हे सर्व रसिकज्ञांना व जाणकारांना मनोमन भावतात. भावज्ञांना मराठी भाषेत चिंतामणीचे सगुण सापडतात.
मराठी शब्दांच्या व्यापकपणाची व अर्थ सघनतेची यथोचित महती सांगताना संत ज्ञानेश्वरांचा मराठी भाषेविषयीचा दृढ व प्रगाढ आत्मविश्वास या
ओवीमध्ये प्रत्ययास येतो.
कृ ती ३ : (अभिव्यक्ती)
(१) मराठी भाषेची थोरवी तुमच्या भाषेत लिहा.
उत्तर : 'मराठी असे आमुची मायबोली.' माझी मातृभाषा 'मराठी' मराठी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आरूढ झालेली आहे. तिची थोरवी वर्णावी
तितकी थोडीच आहे ! मराठी भाषेच्या समृद्धीचा मी एक नम्र पाईक आहे.
संत ज्ञानेश्वरमाउली, संत तुकाराम, कवी के शवसुत, बा. सी. मर्डेकर, कु सुमाग्रज, बा. भ. बोरकर ते विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर इत्यादी
कवींनी तिला शब्दलेण्यांनी साकारलेली आहे. मराठी भाषेतील रसपूर्ण, भावपूर्ण, रसमय ललित साहित्य ही महाराष्ट्राची वाङ्मयीन पेठ आहे. संत,
पंत आणि तंत परंपरेने तिला नटवलेली आहे. इतर कलांनी तिला सजवलेली आहे. मराठीचे शब्दभांडार अभिजात आहे. मराठी बोलीभाषेचे
ठिकठिकाणच्या प्रदेशांतील झरे प्रमाण मराठीच्या नदीत मिसळन मराठी गंगा अविरत वाहते आहे व काठांवरील लोकसंस्कृ तीला जगवते आहे. मराठी
भाषेतील लोकगीते व बोधकथा ही मराठी संस्कृ तीची प्राचीन रसमय अमृताची ठेव जतन करण्याचे आमचे कर्तव्य आहे.
'माझा मराठीचा बोल
वाजे काळजात खोल
ओवीमधून पाझरे
निळ्या अमृताची ओल'
या प्रा. अशोक बागवे यांनी लिहिलेल्या ओळींमधून मराठी भाषेचा सार्थ अभिमान अधोरेखित होतो.
(२) 'ऐसी अक्षरे रसिकें ' या रचनेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : (यासाठी 'कवितेचा भावार्थ' वाचा.)
रसग्रहण
• 'ऐसी अक्षरे रसिकें ' या कवितेचे रसग्रहण करा.
उत्तर : 'ऐसी अक्षरे रसिकें ' या ओव्यांमधून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचे गौरवगीत गायिले आहे. मराठी भाषेचे शब्दसामर्थ्य, कोवळिकता,
रसमयता, सौंदर्यपूर्ण व भावपूर्ण अभिव्यक्ती मनोहारी दृष्टान्तातून साकार करणे, ही या रचनेची मध्यवर्ती कल्पना आहे. मराठी शब्दांचे व्यापकपण
सिद्ध करणे, हा या ओवीरचनेचा स्थायिभाव आहे.
अमृताहून गोड असलेली मराठी भाषा सर्व इंद्रियांचा आत्मीय, आस्वादक विषय ठरली आहे. ही सौंदर्याची खाण पाहताना डोळे दिपतात. सूर्याने सर्व
जग उजळावे, तशी मराठी भाषेची आत्मप्रभा अभिजात आहे. मराठी भाषा सामान्य जनांपासून जाणकार रसज्ञांपर्यंत मनाला थेट भावते. निष्काम
कर्मयोग्यांसाठी कै वल्यरसाने भरलेल्या ताटाची मेजवानी मी अर्पण के ली आहे, ती नि:संग मनाने आस्वादा, असा संदेश संत ज्ञानेश्वर रसिकांना
देतात.
संस्कृ तातील भगवद्गीतेचा मराठी भाषेत भाष्यानुवाद करताना 'ज्ञानेश्वरी'च्या सहाव्या अध्यायामध्ये प्राचीन ओवीछंदात मराठी भाषेचा सार्थ अभिमान
व्यक्त के ला आहे. प्रस्तुत ओव्यांमध्ये मराठी भाषेच्या शब्दसामर्थ्यावरचा दृढ विश्वास व्यक्त करताना येथे ज्ञानेश्वरांनी कमालीची भावोत्कटता
साकारली आहे. प्रसाद व माधुर्य हे काव्यगुण यांमध्ये प्रकर्षाने प्रकट झाले आहेत.
मराठी भाषेची ही आल्हाददायक रचना आस्वादताना आपला ऊर मराठीच्या नितांत प्रेमाने भारावून जातो, इतकी सोज्ज्वळ व रसमय अभिव्यक्ती संत
ज्ञानेश्वरमाउलींनी साकारली आहे. मराठी भाषेचे हे एक नितांत जपावे असे 'देशिकार लेणे' आहे.
व्याकरण व भाषाभ्यास
अ व्याकरण घटकांवर आधारित कृ ती उत्तरे
१. शब्दशक्ती:
• पुढील वाक्यांतील शब्दशक्ती ओळखा : उत्तरे
(१) मराठीचे रसाळपण आस्वादताना कानाला जिभा फु टतात. →\rightarrow
व्यंजना
(२) मराठीच्या कोमलतेने सुगंधाचे गर्वहरण होते. →\rightarrow
व्यंजना
(३) मराठी भाषा म्हणजे रेखेची वाहणी! - अभिधा
२. काव्यगुण :
• पुढील ओळींमधील काव्यगुण ओळखा : उत्तरे
(१) माझा मराठाचि बोलु कौतुकें ।
परि अमृतातेही पैजा जिंके ।
ऐसी अक्षरे रसिकें । मेळवीन ।। →\rightarrow
प्रसाद
(२) नवल बोलतीये रेखेची वाहणी ।
देखतां डोळ्यांही पुरों लागे धणी।
ते म्हणती उघडली खाणी । रूपाची हे ।। →\rightarrow
माधुर्य
३. शब्दभेद :
• पुढील शब्दांचे भिन्न अर्थ लिहा :
(१) पद →\rightarrow
___, ___
(२) बोल →\rightarrow
___, ___
(३) वर →\rightarrow
___, ___
(४) प्रभा →\rightarrow
___, ___
(५) कर →\rightarrow
___, ___
(६) परी →\rightarrow
___, ___
(७) रसना →\rightarrow
___, ___
उत्तरे :
(१) पद →\rightarrow
पाय, ओळ
(२) बोल →\rightarrow
शब्द, क्रियापद (बोलणे)
(३) वर →\rightarrow
नवरा, वरची बाजू
(४) प्रभा →\rightarrow
प्रकाश, मुलीचे नाव
(५) कर →\rightarrow
हात, सारा (टॅक्स)
(६) परी →\rightarrow
पण, पंख असलेली मुलगी
(७) रसना →\rightarrow
प्रभा, गोड पेय
आ भाषिक घटकांवर आधारित कृ ती
१. शब्दसंपत्ती :
(१) कवितेतील प्रत्येकी दोन शब्द लिहा : उत्तरे
(१) उपसर्गघटित →\rightarrow
संपूर्ण, निष्काम
(२) प्रत्ययघटित →\rightarrow
रसाळपणा, रसिक
(२) पुढील शब्दांचे एकवचन लिहा :
(१) अक्षरे - ___
(२) पैजा - ___
(३) डोळे - ___
(४) भुजा - ___
(५) इंद्रिये - ___
(६) श्रोते - ___
उत्तरे :
(१) अक्षरे - अक्षर
(२) पैजा - पैज
(३) डोळे – डोळा
(४) भुजा – भूज
(५) इंद्रिये - इंद्रिय
(६) श्रोते – श्रोता
(३) पुढील शब्दांतील अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द लिहा':
(१) परिमळ →\rightarrow
परि, पळ, मळ, रिळ
(२) कै वल्यरस →\rightarrow
कै वल्य, रस, वर, सरस
(४) विरुद्धार्थी शब्द लिहा :
(१) संपूर्ण ×\times
___
(२) श्रोता ×\times
___
(३) रूप ×\times
___
(४) गुण ×\times
___
(५) जिंकणे ×\times
___
(६) बाहेर ×\times
___
उत्तरे :
(१) संपूर्ण ×\times
अपूर्ण
(२) श्रोता ×\times
वक्ता
(३) रूप ×\times
अरूप
(४) गुण ×\times
अवगुण
(५) जिंकणे ×\times
हरणे
(६) बाहेर ×\times
आत
(५) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा : उत्तरे
(१) अक्षरओळख नसलेला →\rightarrow
निरक्षर
(२) लिहिता-वाचता येणारा →\rightarrow
साक्षर
(३) शिक्षण न घेतलेला →\rightarrow
अशिक्षित
(४) शिक्षण घेतलेला →\rightarrow
सुशिक्षित
२. लेखननियम :
• पुढील शब्द शुद्ध स्वरूपात लिहा :
(१) इंद्रीय - ___
(२) रसीक - ___
(३) परीमळ - ___
(४) आंलीगन - ___
(५) चीतामणि - ___
(६) अविश्कार - ___
उत्तरे :
(१) इंद्रीय - इंद्रिय
(२) रसीक - रसिक
(३) परीमळ - परिमळ
(४) आलीगन - आलिंगन
(५) चीतामणि - चिंतामणी
(६) अविश्कार - आविष्कार
३. म्हणी:
• पुढील म्हणी पूर्ण करा : उत्तरे
(१) ___ तसे उगवेल. पेराल तसे उगवेल.
(२) ___ तो वजीर. हाजीर तो वजीर.
(३) ___ कान पिळी. बळी तो कान पिळी.
(४) ___ तळे साचे. थेंबे थेंबे तळे साचे.
४. पारिभाषिक शब्द :
• पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा : उत्तरे
(१) Qualified →\rightarrow
अर्हताप्राप्त
(२) Recommendation →\rightarrow
शिफारस
(३) Superintendent →\rightarrow
अधीक्षक
(४) Zero Hour →\rightarrow
शून्यकाळ
(५) Barcode →\rightarrow
दंडसंके त
(६) Domicile →\rightarrow
अधिवास
(७) Gazette →\rightarrow
राजपत्र
(८) Landholder →\rightarrow
भूधारक
पाठ परिचय
प्रस्तुत पाठ म्हणजे विनोदी अंगाने लिहिलेली एक हलकीफु लकी कथा आहे. काही गमतीदार योगायोग; कथेच्या ओघाला अचानक मिळणाऱ्या
कलाटण्या; व्यक्तींच्या वागण्या-बोलण्यातील विरोधाभास आणि व्यक्तींच्या स्वभावाला पोषक असे प्रवाही, रुचकर, प्रसन्न संवाद यांमुळे कथा
वाचकांच्या मनाची पकड घेते. हलक्याफु लक्या पद्धतीने समाजातील स्त्री-पुरुष असमानतेवर बोट ठेवलेले आहे. समाजात स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीचे
स्थान मिळवायचे असेल, तर स्त्रीने स्वतःच्या कृ तीतून स्वतःचे महत्त्व पटवून दिले पाहिजे, असा संदेश या कथेतून मिळतो.
शब्दार्थ
विशी गाठली - वीस पूर्ण झाली (कार्यक्रम, पुस्तके , उपक्रम वगैरेंची वीस ही संख्या; वयाची वीस वर्षे इत्यादी.) नावलौकिक - प्रसिद्धी. पोकळ
बुडबुडे - वास्तवाला धरून नसलेले. अस्थिव्यंगतज्ज्ञ - मानवी देहातील हाडांबाबतचा तज्ज्ञ. अॅनेस्थेशिया - भूल; शरीराच्या विशिष्ट अवयवांना
किं वा संपूर्ण शरीराला औषध देऊन आणलेली बधिरता. बर्का - बरं का. नेत्रांजन - डोळ्यांत घालण्याचे औषध. कानातले - कानात घालण्याचे
विविध अलंकार. आतिथ्यशील - पाहुणचार करण्यात आनंद मानणारी. यजमान - पाहुणे ज्याच्या घरी जातात तो. भीड - आदर, मान, चाड,
लाज. कायापालट - आमूलाग्र बदल. पार्किं ग स्पेस - गाड्या तात्पुरत्या उभ्या करण्याची जागा. छेडछाड - टिंगलटवाळी.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) डोळ्यांसमोर काजवे चमकणे - अकल्पितपणे संकट उभे राहिल्याचे लक्षात येणे.
(२) प्रयत्नांची पराकाष्ठा करणे - खूप प्रयत्न करणे.
(३) सूत्रे हाती घेणे - (एखादा कार्यक्रम, उपक्रम, एखादे काम) पार . पाडण्याची जबाबदारी स्वीकारणे.
(४) डोळे लकाकणे - एखादी विलक्षण कल्पना वा विचार सुचणे.
(५) कायापालट होणे - आमूलाग्र बदल होणे.
(६) कीड मुळापासून उपटणे - मुख्य कारण (अडचण, समस्या) दूर करणे.
(७) शिखर गाठणे - सर्वोच्च पातळीवर जाणे.
(८) पुतळ्यासारखे खिळणे - स्तब्ध होणे.
टीप
• थेट प्रक्षेपण : दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम सादर करण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीनुसार, स्टुडिओमध्ये किं वा बाहेर आधी
चित्रीकरण के ले जाते. त्यात हव्या त्या दुरुस्त्या के ल्या जातात. कार्यक्रमाचे आखीव-रेखीव रूप तयार के ले जाते. या प्रक्रियेला संपादन
असे म्हणतात. संपादन के ल्यानंतर तो कार्यक्रम प्रक्षेपित के ला जातो.
दुसऱ्या पद्धतीमध्ये, कार्यक्रम किं वा प्रसंग प्रत्यक्ष घडत असतानाच त्याचे चित्रीकरण के ले जाते व तेच चित्रीकरण त्याच क्षणी थेट प्रक्षेपित के ले जाते.
त्यामुळे कार्यक्रम किं वा प्रसंग प्रत्यक्ष घडत असतानाच प्रेक्षकांना पाहायला मिळतो. कार्यक्रम घडत असताना एखादी चूक झाल्यास ती चूक दुरुस्त
करण्याची कोणतीही संधी मिळत नाही झालेल्या चुकांचेही दर्शन प्रेक्षकांना त्या क्षणी घडते. या प्रकारे दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम प्रक्षेपित करण्याच्या
पद्धतीला थेट प्रक्षेपण म्हणतात .
___ ___
___ ___
___ ___
___ ___
२. जोडा आणि जुळवून घ्या. २. स्वतःच स्वतःला महत्त्व द्या, आत्मसन्मान जपा.
३. इतरांच्या नजरेतून बघायला शिका, ही शिकवणूक. ३. समानतेचा आग्रह धरणारे, सडेतोड, म्हणून धक्कादायक, तरीही
मनाला भिडणारे विचार.
(७) (१) माणसांच्या दुःखाचे खरे कारण समजावून सांगणे हे माझे काम आहे, असे निशा समजावून सांगत आहे.
(२) नोकरी न करणारी बाई ही जणू रिकामटेकडी असते. त्यामुळे पाहुण्यांची सरबराई करायला ती जणू मोकळीच असते. घरकामाविषयी आत्यंतिक
चुकीचा दृष्टिकोन मनात बाळगल्यामुळे अशी धारणा निर्माण होते.
(३) घरकाम, पाहुण्यांची सरबराई ही जणू स्त्रियांचीच कामे होत, असा चुकीचा दृष्टिकोन प्रस्थापित झालेला होता. ही मूळ कीड आहे. तीच नष्ट
के ली पाहिजे. तर मग संघर्षाचे किं वा स्त्रियांना कमी लेखण्याचे, त्यांच्या कामाला किं मत न देण्याचे कृ त्य समाजाकडू न होणार नाही.
(४) उषावहिनी या गोड गोड शब्दांमध्ये फसवे विचार मांडत होत्या. निशाने सडेतोडपणे आपले विचार मांडले. ते स्त्री-पुरुष समानतेचे विचार होते.
आधुनिक जगात निशाचे विचारच आवश्यक आहेत, हे उषावहिनींना पटले.
कृ ती २ : (स्वमत)
(१) वहिनींचा सल्ला 'सुसाट' वाटण्याची तुम्हांला समजलेली कारणे लिहा.
उत्तर : ही कारणे लिहिण्यापूर्वी त्या वेळची परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. त्या काळात घरातली सर्व कामे स्त्रियांनीच करायची, असा नियम होता.
पुरुष या कामांना हात लावत नसे. पुरुषाच्या पेन, पाकीट, रुमाल या साध्या वस्तूसुद्धा स्त्रीनेच नीट ठेवायच्या आणि पुरुषांना हव्या त्या वेळी
त्यांच्या हाती द्यायच्या. पाहुणेसुद्धा के व्हाही येत. घरातल्या स्त्रीने आलेल्या पाहुण्यांची सर्व सरबराई करावी, त्या वेळी स्वतःची सोय व गैरसोय पाहू
नये, असा रिवाज होता. घरातील स्त्री कोणत्या तरी कामासाठी बाहेर पडत असतानाच पाहुणे आले तर बाहेर जाणे रद्द के ले पाहिजे, असे सगळेजण
मानत होते. अशा वेळी त्या स्त्रीचे कितीही नुकसान झाले, तिला अडीअडचणी आल्या, ती काही सुखाला मुकली तरी तिने पाहुण्यांची सरबराई के ली
पाहिजे, असा दंडक होता.
या पार्श्वभूमीवर निशावहिनींचा सल्ला पाहिला पाहिजे. निशावहिनी सांगतात की, प्रत्येक माणूस स्वार्थी असतो. मग फक्त स्त्रीनेच का म्हणून इतरांच्या
सुखासाठी झटत राहावे? स्त्रीने स्वतःच स्वतःचे सुख पाहिले पाहिजे. स्वतःच्या गरजा पाहिल्या पाहिजेत. नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी जशी पत्नी
सांभाळते, तशा पत्नीच्या गोष्टी पतीने का सांभाळू नयेत? एखाद्या दिवशी पतीने स्वयंपाक करावा. पत्नीचे जेवणाचे ताट मांडावे. एखाद्या दिवशी
पतीने पत्नीच्या साडीला इस्त्री करावी. अचानक न सांगता पाहुणे घरी आले, तर आपली कामे बाजूला ठेवू नयेत. स्वतःची गैरसोय करून घेऊ नये.
म्हणजे हळूहळू पाहुण्यांनासुद्धा न कळवता अचानक कोणाहीकडे जाऊ नये, याची सवय होईल. निशावहिनींचे विचार त्या काळाच्या मानाने खूपच
बंडखोरीचे होते. अनेकांना ते पटत होते, पण स्वीकारणे जड जात होते. यामुळेच निशावहिनींचे विचार सुसाट वाटतात.
(२) 'पाहुण्यांचा पाऊस' यासंबंधी कथेत आलेला विनोद तुम्हांला आवडला का, ते सकारण स्पष्ट करा.
उत्तर : निलंजनाबाईंनी पाहुण्यांना पावसाची उपमा दिली होती. पाऊस हा कधीही, न सांगता, अगदी नको त्या वेळीसुद्धा येतो. आपली अडचण
करतो. आपली कामे अडतात. पाहुणेसुद्धा असेच न सांगता के व्हाही टपकतात. ज्यांच्या घरी आपण जातो त्यांची गैरसोय होईल का, त्यांचे नुकसान
होईल का, याचा ते काहीही विचार करीत नाहीत. तसेच, पाऊस किती वेळ राहावा, तो किती प्रमाणात यावा, कशा स्वरूपाचा असावा यावर
आपले कोणतेही नियंत्रण नसते. त्याप्रमाणेच पाहुण्यांचेही होते. पाहुण्यांनी कधी यावे, किती जणांनी यावे, कोणत्या कामासाठी यावे यांवर घरातल्या
स्त्रीचे कोणतेही नियंत्रण नसते. ती काहीही सुचवू शकत नाही. तिला सगळा त्रास निमूटपणे सहन करावा लागतो. पाहुणे आणि पाऊस यांच्यातील हे
साम्य पाहून निलंजनाबाईंनी पाहुण्यांना पावसाची उपमा दिली. एवढेच नव्हे, तर तक्रार मांडताना त्यांनी पाहुण्यांचा उल्लेखच के ला नाही. फक्त
पावसाचा उल्लेख के ला.
निशावहिनींचा त्यामुळे गैरसमज झाला आणि सगळा घोटाळा झाला. त्यांनी पाऊस या शब्दाचा अर्थ शब्दश: घेतला. त्यामुळे ही काहीतरी
पावसाळ्यातील पाणी गळतीची समस्या असावी, असे निशावहिनींना वाटले. प्रत्युत्तर म्हणून आपण ताडपत्रीची एजन्सी घेतलेली नाही, किं वा आपला
वॉटर प्रूफिं गशीसुद्धा काही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट के ले. त्यामुळे तेव्हा हास्य निर्माण होते. सडेतोड व तडाखेबाजपणे उत्तरे देणाऱ्या
निशावहिनीसुद्धा क्षणभर गडबडल्या. हा त्या विनोदाचा परिणाम होता.
(३) सल्ला मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयी तुमचे मत लिहा.
उत्तर : शिवाजी मंदिर येथील कार्यक्रमात प्रेक्षकांनी अनेक समस्या मांडल्या. त्यांचे स्वरूप साधारणपणे असे होते : सर्व घरकाम स्त्रीच्या अंगावर
येऊन पडते. स्वत:साठी वेळ मिळत नाही. दिवसभर करीत असलेल्या कामाला कोणी किं मतही देत नाही. घरी के व्हाही, कधीही, कितीही पाहुणे
येतात. आपल्यामुळे यजमान घरातल्या लोकांची किती गैरसोय होत असेल, याचे भान पाहुणे बाळगत नाहीत. सासू-सुना यांच्यातील भांडणे,
कार्यालयात काम करणाऱ्या स्त्रियांना पुरुष संहकाऱ्यांकडू न होणारा त्रास, महाविद्यालयात शिकायला जाणाऱ्या मुलींना होणारा छेडछाडीचा त्रास,
व्यसनी नवऱ्यांमुळे होणारी संसाराची वाताहत या स्वरूपाच्या बऱ्याच समस्या पुढे आल्या.
या समस्यांकडे पाहिल्यावर लक्षात येईल की, या सर्व समस्या स्त्रियांशी निगडित आहेत. या सर्व समस्या स्त्री-पुरुष असमानतेतून निर्माण झालेल्या
आहेत. स्त्रियांना समाजात पुरुषांच्या बरोबरीने सन्मानाचे स्थान मिळत नाही. घरातली कष्टांची व वेळखाऊ कामे स्त्रियांच्याच माथी लादलेली आहेत.
घरातली कामे महत्त्वाची असतातच. घरातल्या सगळ्यांनी ती पार पाडली पाहिजेत. त्या कामांबाबत सगळ्यांची समान जबाबदारी असली पाहिजे.
तसे होत नाही.
सून म्हणून घरात आलेल्या नवीन मुलीला सगळे वातावरणच नवीन असते. तिच्या मनावर दडपण येईल, मोकळेपणाने वावरणे अवघड होईल, असे
आपण वागता कामा नये. अजूनही अनेक सुशिक्षित लोकही स्त्रियांना कमी लेखतात. त्यामुळे उच्चपदस्थ स्त्रियांनाही याचा त्रास सहन करावा लागतो.
छेडछाडीच्या प्रकारांबाबत तर बोलायलाच नको. यामुळे स्त्रिया सार्वजनिक वातावरणामध्ये मोकळेपणाने वावरू शकत नाहीत. याचा त्यांच्या
शिक्षणावर, त्यांच्या नोकरी-व्यवसायावर परिणाम होतो.
आपण सर्वांनी या समस्येकडे गंभीरपणे बघितले पाहिजे.
(४) खऱ्या उषावहिनींनी आपल्या 'बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी ' तुमच्या प्रतिक्रिया लिहा.
उत्तर : खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीचे, निशाचे, मनापासून कौतुक के ले – तेही जाहीरपणे. हे कौतुक करताना त्यांनी स्वत:मधील उणीवही
मान्य के ली. लोकांना बरे वाटावे, त्यांची मने दुखवू नयेत, म्हणून त्या गोड गोड बोलत राहिल्या. सामाजिकदृष्ट्या योग्य सल्ला त्यांनी दिला नाही.
समाजाचे वातावरण निकोप व्हावे, स्त्रियांना सन्मानाचे जीवन मिळावे, हे त्यांना ओळखता आले नाही. ही उणीव त्यांनी मान्य के ली, हा त्यांच्या
मनाचा मोठेपणा होय.
निशाने समाजाला क्विनाईनचा डोस दिला. क्विनाईन हे अत्यंत कडू असे औषध आहे. निशाचा सल्ला क्विनाईनसारखा होता. तिच्या सल्ल्यामध्ये
सामाजिक सुधारणा करण्याची मोठी शक्ती होती. सामाजिक सुधारणा कोणताही समाज सहजासहजी मान्य करीत नाही. किं बहुना खूप विरोध करतो.
अशा वेळी समाजाच्या विरुद्ध भूमिका घ्यायला फार मोठे धाडस लागते. या धाडसामुळे आपण समाजामध्ये अप्रिय होण्याची
शक्यता असते. आपली प्रतिमा अप्रिय करून घ्यायला बहुसंख्य लोक तयार नसतात. उषावहिनीसुद्धा असे धाडस दाखवू शकल्या नाहीत.
सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी बंडखोर स्वभावाची गरज असते. असा स्वभाव निशाकडे आहे. म्हणून तिने के वळ एका दिवसाची संधी
मिळताच त्या संधीचे सोने के ले. आपल्यालासुद्धा समाजात काही बदल करायचे असल्यास निशासारखी भूमिका घेतली पाहिजे आणि तीसुद्धा वेळ न
गमावता घेतली पाहिजे.
कृ ती ३ : (अभिव्यक्ती)
(१) वहिनींचा 'सुसाट' सल्ला ही कथा तुम्हांला का आवडते, ते लिहा.
उत्तर : ही कथा खूपच चांगली आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती जराही कं टाळवाणी होत नाही. सुरुवातीलाच ती वाचकांच्या मनाची पकड घेते
आणि ही पकड शेवटपर्यंत घट्ट राहते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंगच मुळी उत्सुकता निर्माण करणारा आहे. तो अत्यंत चित्रदर्शी आहे. आपल्या
डोळ्यांसमोर तो घडत आहे असे वाटत राहते. स्त्रीची मानसिकता त्या प्रसंगातून चांगल्या रितीने व्यक्त होते. त्यात प्रसंगानंतर एक-एक घटना अशी
घडत जाते की, वाचकाची उत्सुकता वाढत जाते. आता पुढे काय घडेल, आता पुढे काय घडेल, असे कु तूहल त्याच्या मनात निर्माण होते. या
घटकामुळे कथेची वाचनीयता कायम राहते.
पुढे उषावहिनींना अपघात होतो, हा प्रसंग तर कु तूहल खूपच वाढवतो. या अपघाताने मोठा पेच उभा राहतो. या पेचातून सोडवणूक करून घेण्याचे
अनेक मार्ग दिसू लागतात. त्यांपैकी कथेत कोणता मार्ग निवडला आहे, त्या निवडीमुळे काय काय घडेल, कोणकोणत्या व्यक्तींवर कोणकोणते परिणाम
घडतील, मग त्या व्यक्ती कशा वागतील, असे कु तूहल वाढवणारे अनेक प्रश्न त्याच्या मनात उभे राहतात. कथेची रंगत वाढत जाते.
हलकीफु लकी प्रसन्न भाषा हे एक कथेचे सामर्थ्यस्थान आहे. कथेची भाषा अत्यंत प्रवाही आहे. या भाषेत कु ठेही बोजडपणा नाही. निलंजनाबाईंच्या
प्रसंगाच्या वेळी तर खेळकर विनोद अवतरतो आणि 'कथेवर हलके च प्रसन्नता पसरते.
या कथेतील सामाजिक आशय खूप महत्त्वाचा आहे. स्त्री-पुरुष असमानतेतून निर्माण झालेली सामाजिक विषमता हा या कथेचा आत्मा आहे.
निशावहिनींनी या असमानतेवर नेमके बोट ठेवले आहे. या असमानतेतून स्त्रियांची मुक्तता करणे स्त्रियांच्याच हाती आहे, हे वास्तव निशावहिनी बोलून
दाखवतात. स्त्रियांनी आत्मसन्मान जपला पाहिजे. मग त्यांना स्वतःलाच परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागेल. या कथेतून वाचकाला असे
मार्गदर्शन घडते. त्यामुळे कथा वाचताना आनंद मिळतोच, शिवाय आपला दृष्टिकोन अधिक संपन्न झाला, याचे फार मोठे समाधान वाचकाला मिळते.
या कथेचे हे फार मोठे यश आहे. अशी कथा कोणालाही आवडेल.
(२) 'स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,' याविषयीचे तुमचे विचार लिहा.
उत्तर : आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृ ती आहे. त्यामुळे अनेक शतके स्त्रियांवर अन्याय होत आहे. त्यांना समाजजीवनात सन्मानाचे स्थान दिले जात
नाही. या अन्यायाची सुरुवात स्त्रीच्या जन्मापासूनच होते. घरात मुलगा जन्माला आला की आनंदोत्सव साजरा के ला जातो. मुलगी जन्माला आली
की घरात निरुत्साह असतो. यात थोडी सुधारणा झाली आहे. नाही असे नाही. पण ती सुशिक्षितांच्या घरांत. अशिक्षितांच्या घरांत किं वा ग्रामीण
भागात अजूनही मुलगी जन्माला आल्याचा आनंद साजरा होत नाही. इथपासून सुरू झालेला हा अन्याय स्त्रीच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहतो.
कोणत्याही समाजात स्त्रियांची संख्या जवळजवळ निम्मी असते. पुरुषप्रधानतेमुळे आपण अर्ध्या समाजावर अन्याय करीत असतो.
स्त्रियांविषयी चुकीच्या कल्पना रूढ झाल्याने हा अन्याय जोमाने चालू राहतो. स्त्रिया दुबळ्या असतात. त्यांच्यात शारीरिक क्षमता कमी असते. त्या
मनानेही दुबळ्या असतात. कठीण प्रसंगांत त्या कणखरपणे वागू शकत नाहीत. त्यांच्याकडे पुरुषांएवढी बुद्धिमत्ता नसते. त्यामुळे त्या बुद्धीच्या क्षेत्रांवर
प्रभाव टाकू शकत नाहीत. बुद्धीच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करू शकत नाहीत. गुंतागुंतीची, किचकट कामे त्यांना झेपत नाहीत. वगैरे वगैरे
गैरसमज शतकानुशतके बाळगले जात आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सन्मानाचे स्थान मिळत नाही. ग्रामीण भागांत तर चारचौघांची बैठक
चालू असताना त्या बैठकीत स्त्रीने बोलू नये, आपले मत मांडू नये, असा दंडकच असतो. स्त्रीने फक्त घरकाम, धुणी-भांडी व मुलांचे संगोपन
एवढ्याच गोष्टी पाहाव्यात, अशी अपेक्षा असते. कोणत्याही बाबतीत तिचे मत विचारात घेतले जात नाही.
पूर्वी प्राधान्याने मुलग्यांनाच शाळेत पाठवले जाई. अलीकडे या परिस्थितीत थोडीशी सुधारणा झालेली आहे. दहावीपर्यंत तरी मुलींना आडकाठी के ली
जात नाही. पण अजूनही उच्च शिक्षण घेण्याच्या बाबतीत मुलींच्या शिक्षणासाठी हात आखडता घेतला जातो. तिथे जर मुलगा असेल तर कर्ज काढू नही
शिक्षण देण्याची व्यवस्था के ली जाते. अशा प्रकारे स्त्रियांना विकासाच्या संधी नाकारल्या जातात. हा फार मोठा अन्याय आहे. अर्धा समाजच जर
आपण दुबळा ठेवला, तर पूर्ण समाजाचे नुकसान होते, हे आपण कधी लक्षात घेणार?
स्त्रियांवर जिथे जिथे अन्याय होतो, तिथे तिथे त्याला विरोध के ला पाहिजे. सर्व समाज सुधारायचा असेल तर स्त्रियांनी समान हक्क मिळवले पाहिजेत.
त्याला कोणताही पर्याय नाही.
व्याकरण व भाषाभ्यास
अ व्याकरण घटकांवर आधारित कृ ती
१. शब्दशक्ती :
• पुढील वाक्यांतील शब्दशक्ती ओळखा : उत्तरे
(१) या वीस वर्षांत त्यांनी हंडाभर फे विकॉल, दोन-चार मैल लांबीच्या चिकटपट्ट्या, शंभर एक किलो डिंक आणि पाच-सात बरण्या च्युइंग गम
वापरलं असेल →\rightarrow
लक्षणा
(२) संसाररथाची दोन चाकं म्हणजे नवरा आणि बायको! →\rightarrow
व्यंजना
(३) मी माणसांना दुःखप्रूफ किं वा दुःखमुक्त होण्यासाठी मदत करते.→\ \rightarrow
लक्षणा
(४) आज उषावहिनींचा सत्कार होणार होता. →\rightarrow
अभिधा
२. वाक्यसंश्लेषण :
के वल वाक्ये, मिश्र वाक्ये आणि संयुक्त वाक्ये यांची पाठातील प्रत्येकी दोन-दोन उदाहरणे शोधून लिहा.
उत्तर : के वल वाक्ये :
(१) हात उंचावून त्यांनी झटकन दांडीवरचा रुमाल खेचला.
(२) शेवटची नजर टाकू न त्यांनी पर्समध्ये सर्व गोष्टी आहेत ना ते पाहिलं.
मिश्र वाक्ये :
(१) सर संसाररथ नीट चालायला हवा असेल, तर दोन्ही चाकांची सारखीच शक्ती वापरात यायला हवी.
(२) एक चाक थोडंसं कु चकामी असेल, तर दुसऱ्या चाकाने आपल्यावर जास्त भार द्यावा.
संयुक्त वाक्ये :
(१) निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न के ला आणि उषावहिनींच्या भूमिके त स्वत:ला सराईतपणे झोकू न दिलं.
(२) घरी जा आणि एक छान साडी नेस.
३. काळ :
• पुढील वाक्ये रीती भविष्यकाळात रूपांतरित करा :
(१) त्यांच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले.
(२) निशाने सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली.
(३) शोफरने लवून अभिवादन के ले.
(४) हा प्रयोग लोकप्रिय नाट्यगृहात साजरा होत आहे.
उत्तरे : (१) त्यांच्या डोळ्यांसमोर काजवे चमकत जातील.
(२) निशा सर्व सूत्रे आपल्या हातात घेत राहील.
(३) शोफर लवून अभिवादन करत जाईल.
(४) हा प्रयोग लोकप्रिय नाट्यगृहात साजरा होत जाईल.
४. शब्दभेद :
(१) पुढील वाक्यांचा अभ्यास करा. 'कर' या शब्दाची योग्य अर्थच्छटा कं सातील पर्यायांतून निवडा. ती वाक्यांसमोर कं सांत लिहा. उत्तरे
[टॅक्स, कृ त्य, हात, करणे (क्रियापद)]
(१) दाम करी काम वेड्या (करणे)
(२) कर भरणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे (टॅक्स)
(३) कर हा करी धरिला शुभांगी (हात)
(४) कर नाही त्याला डर कशाला? (कृ त्य)
(२) पुढील तक्ता भरा : (शब्दांचा अचूक संदर्भ)
विशेषणे विशेष्ये
(४) जीवघेणी कळ
विशेषणे विशेष्ये
विरामचिन्हे नावे
; अर्धविराम
..... लोपचिन्ह
_ अपसारणचिन्ह
: अपूर्णविराम
- संयोगचिन्ह
(२) पुढील वाक्यांत विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्ये पुन्हा लिहा :
(१) ड्रायव्हर चुकचुकला अर्रर्र अशा कशा पडल्या तुम्ही वहिनी
(२) जाऊ दे ना कशी पडलीस ते महत्त्वाचं नाही आता पुढे काय करायचं ते महत्त्वाचं
(३) तर मैत्रिणींना वहिनींचा सल्ला हा आजचा शेवटचा कार्यक्रम
उत्तरे : (१) ड्रायव्हर चुकचुकला, “अर्र! अशा कशा पडल्या तुम्ही वहिनी?"
(२) "जाऊ दे ना! कशी पडलीस ते महत्त्वाचं नाही, आता पुढे काय करायचं, ते महत्त्वाचं!"
(३) “तर 'मैत्रिणींना वहिनींचा सल्ला!' हा आजचा शेवटचा कार्यक्रम."
३. लेखननियम :
(१) अचूक शब्द निवडा : उत्तरे
(१) प्रतिबिंब/प्रतिबींब/प्रतीबिंब/प्रतीबींब - प्रतिबिंब
(२) कार्यक्रम/र्कायक्रम/कार्यक्रम/कायक्रम - कार्यक्रम
(३) व्यक्तीमत्त्व/व्यक्तिमत्त्व/व्यक्तिमत्व/ - व्यक्तिमत्त्व
(४) आतीथ्य/आतिथ्य/आतिथ/अतिथ्य -आतिथ्य
(२) पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(१) हा महत्वाचा कार्यक्रम दुरर्दशनच्या स्टू डीओमधून काढू न शिवाजीमंदीरमध्य ठेवला होता.
(२) वयोमानानूसार नीवृत व्हावेच लागणार.
(३) वहींनीचा सक्तार होणार होता.
(४) पायांतुन जीवघेणि कळ आलि.
उत्तरे :
(१) हा महत्त्वाचा कार्यक्रम दूरदर्शनच्या स्टुडिओमधून काढू न शिवाजीमंदिरमध्ये ठेवला होता.
(२) वयोमानानुसार निवृत्त व्हावेच लागणार.
(३) वहिनींचा सत्कार होणार होता.
(४) पायांतून जीवघेणी कळ आली.
४. वाक्प्रचार :
• पुढील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा :
(१) काजवे चमकणे
(२) डोळे लकाकणे
(३) कायापालट होणे
(४) कडेलोट होणे
उत्तरे :
(१) काजवे चमकणे -
अर्थ : डोळ्यांसमोर क्षणभर लख्ख प्रकाश चमकू न कळेनासे होणे.
वाक्य : रघूने पोहण्यासाठी जेव्हा पहिल्यांदा विहिरीत उडी मारली, तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले.
(२) डोळे लकाकणे -
अर्थ : पटकन एखादा विचार सुचणे.
वाक्य : सरांनी प्रश्न विचारताच मधूचे डोळे लकाकले.
(३) कायापालट होणे -
अर्थ : आमूलाग्र बदल होणे.
वाक्य : विपश्यनेहून परत आल्यावर माधवचा कायापालट झाला.
(४) कडेलोट होणे -
अर्थ : (भावनेने) उचंबळून टोकाचा विचार मनात येणे.
वाक्य : न के लेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळते, असे समजताच गोपूचा कडेलोट झाला.
(२) जोड्या लावा :
वाक्प्रचार अर्थ
उत्तरे :
(१) जीवघेणी कळ येणे - पराकोटीची वेदना होणे
(२) नावलौकिक होणे - प्रसिद्धी मिळणे
(३) तसदी घेणे - श्रम घेणे
(४) वाताहत होणे - दुर्दशा होणे
५. पारिभाषिक शब्द :
• पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा : उत्तरे
(१) Working Capital →\rightarrow
खेळते भांडवल
(२) Utility →\rightarrow
उपयुक्तता
(३) Quorum →\rightarrow
गणसंख्या
(४) Share Certificate →\rightarrow
समभागपत्र
(५) Administration →\rightarrow
प्रशासन
(६) Enrolment →\rightarrow
नावनोंदणी
(७) Junction →\rightarrow
महास्थानक
(८) Guard of Honour →\rightarrow
मानवंदना
१०. शब्द
- यशवंत मनोहर
• कवींचे नाव : यशवंत मनोहर
• कवींच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये : कवी, समीक्षक, विचारवंत.
• ग्रंथसंपदा : 'उत्थानगुंफा, काव्यभीमायन, मूर्तिभंजन, जीवनायन, प्रतीक्षायन, अग्नीचा आदिबंध, स्वप्नसंहिता, युगमुद्रा, बाबासाहेब'
इत्यादी कवितासंग्रह प्रसिद्ध. 'दलित साहित्य : सिद्धान्त आणि स्वरूप, स्वाद आणि चिकित्सा, समाज आणि साहित्यसमीक्षा, नवे
साहित्यशास्त्र, परिवर्तनवादी जीवनमूल्ये आणि वाङ्मयीन मूल्ये' इत्यादी समीक्षाग्रंथ. 'रमाई, मी यशोधरा' इत्यादी कादंबऱ्या प्रकाशित.
• काव्याची वैशिष्ट्ये : समाजवास्तवावर प्रखर भाष्य, शोषणाचा तीव्र निषेध, मूल्यव्यवस्थेवर प्रहार करणारी उपरोधिक पण ओजस्वी
आक्रमक शब्दकळा हे कवींच्या काव्याचे विशेष आहेत.
• प्रस्तुत कवितेचा छंद : यमकप्रधान, चार ओळींचा सैल मुक्त बंध.
शब्दार्थ
आकान्त - आक्रोश, रुदन. निरुत्तर - अबोल. निखारे - अंगार. माउली - आई, माता. अंधारून - काळोखून. उजेड - प्रकाश. बिजली -
वीज. धारेत - प्रवाहात. निवारा - आश्रय, निवास. जहर - विष.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
१. पोटाशी घेणे - मायेने जवळ घेणे.
२. अंधारून येणे - (दुःखाने) पुढचा मार्ग न दिसणे.
३. हात देणे – मदत करणे, सहकार्य करणे.
४. सावली धरणे - आधार देणे.
५. तोल सावरणे - (मन) स्थिर ठेवणे.
६. धारेत सापडणे - (पुराच्या) प्रवाहात सापडणे.
७. पाठीवर हात ठेवणे - पाठिंबा देणे, आधार देणे.
८. उतराई होणे - उपकार फे डणे.
९. जहर पिणे – दुःख गिळणे.
कवितेचा भावार्थ
एकाकी जीवन जगत असताना, जेव्हा जेव्हा घोर संकटे आली व जीवन असाहाय्य झाले, तेव्हा तेव्हा शब्दांनी (साहित्याने) आपल्याला कसे
सावरले, याची हृदयद्रावक कहाणी वर्णन करताना कवी म्हणतात -
जेव्हा माझ्या दुःखांनी हंबरडा फोडला व आक्रोश करून शब्दांना हाका मारल्या, तेव्हा शब्दच माझ्या मदतीला धावून आले. मला असाहाय्य
करणाऱ्या निखाऱ्यांना म्हणजे बिकट संकटांना आई होऊन शब्दांनी पोटाशी घेतले. बिकट संकटात मला शब्दांनी मायेने जवळ घेतले व माझे सांत्वन
के ले. माझी संकटे शब्दांनी सुसह्य के ली.
दारिद्रय, दैन्य. द:ख यांच्या अंधारात जेव्हा मी चाचपडत होतो: डोळ्यांपुढे के वळ अंधार दाटला; पुढचा जीवनमार्ग दिसेनासा झाला; तेव्हा शब्दांनी
(साहित्याने) मला उजेड दाखवला. जीवनमार्ग प्रकाशित करण्यास शब्दांनी मदत के ली. जेव्हा एखादी जीवघेणी आठवण मला आगीने होरपळत
गेली; एखाद्या नकोशा आठवणीत माझ्या मनाची राख होऊ लागली; तेव्हा शब्दांनीच त्या धगधगत्या आगीवर प्रतिहल्ला के ला नि मला वाचवले.
जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात ऊन चिडू न सांडत होते, म्हणजे जेव्हा माझ्या आयुष्यात तापदायक प्रसंग आले, तेव्हा शब्दांनी माझ्यावर मायेची
सावली धरली. मला छत्र दिले. मला आधार व आश्रय दिला. जेव्हा दिवसाही अंधार दाटू न यायचा म्हणजे जेव्हा दुःखाचा अंधार गडद व्हायचा,
तेव्हा शब्दांनी हातात वीज दिली. दुःखाचा अंधार उजळण्याची उमेद दिली, हिंमत दिली.
पुढे चांगले आयुष्य जगण्यासाठी मागे झालेले अन्याय विसरायचे असतात. काही कटू प्रसंग भूतकाळातच गाडू न टाकायचे असतात. अशी जगणे
असह्य करणारी वेळ जेव्हा माझ्यावर आली, माझे पाय डगमगू
लागले, तोल जातोय असे जेव्हा वाटले, तेव्हा मला शब्दांनी सावरले व माझे मन स्थिर के ले. शब्दांनी माझा तोल सावरला. जीवन नकोसे होऊन मी
जेव्हा मरणाकडे ओढला गेलो, धारेत सापडलो, दुःखाच्या सागरात जेव्हा मी गटांगळ्या खाऊ लागलो. या तुफानातून बाहेर काढण्यासाठी शब्दांनी
मला किनारा दिला. मला सुखरूप पैलथडीला नेले.
मी कफल्लक होतो. माझ्यापाशी मला जगण्यासाठी काहीही नव्हते. फाटका होतो. दारिद्र्यात पिचत होतो. नगण्य झालो होतो. मला माझीच जेव्हा
भीती वाटत होती, तेव्हा शब्दांनीच माझ्या पाठीवर धीराचा हात ठेवला. मला धीर दिला. जगण्याची उमेद दिली. कधी सुखाच्या वाऱ्याने मला
टाळले. कधी मला कायमचा निवारा लाभला नाही. माझी ससेहोलपट झाली. मला आयुष्याने एके ठिकाणी स्थिर राहू दिले नाही, तेव्हा माझ्या
शब्दांनी (लेखनाने) मला निवारा दिला. आश्रय दिला.
मी निष्कांचन आहे. मी भिकारी आहे. मी शब्दांना काही देऊ शकत नाही. शब्दांचेच माझ्यावर ऋण आहे, कर्ज आहे. मी शब्दांचाच कर्जबाजारी
आहे. मी शब्दांचे देणे फे डू शकत नाही. मी शब्दांच्या उपकारांची परतफे ड करू शकत नाही. मीच शब्दांच्या अंतरंगात शिरलो आणि या निर्दय
दुनियेपासून स्वत:चा बचाव के ला. मी आयुष्यात दुःखाचे घोट प्यायलो. विष प्राशन के ले, पण ते माझ्याऐवजी माझ्या शब्दांनी पचवले. माझ्या
दुःखाचे विष पचवून शब्दांनी मला अमृतमय संजीवन दिले.
व्याकरण व भाषाभ्यास
अ व्याकरण घटकांवर आधारित कृ ती
१. शब्दशक्ती :
• पुढील ओळीतील शब्दशक्ती ओळखा : उत्तरे
(१) काहीही नव्हते हाती, वाटे स्वत:चीच भीती तेव्हाही शब्दांनीच पाठीवर हात ठेवला.→\ \rightarrow
आभधा
(२) चिडू न चिडू न सांडत होते ऊन तेव्हाही शब्दांनीच सावली धरली. →\rightarrow
व्यंजना
(३) मी भिकारी : मी शब्दांना काय देऊ?
मी कर्जदार : शब्दांचा कसा उतराई होऊ? →\rightarrow
लक्षणा
२. काव्यगुण :
• पुढील ओळींतील काव्यगुण ओळखा :
(१) माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माउलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले. →\rightarrow
माधुर्य
(२) एखादी आठवण आग घेऊन धावली तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला. →\rightarrow
ओज
(३) कधी वाऱ्याने टाळले, कधी निवाऱ्यांनी टाळले तेव्हाही शब्दांनीच उरात आश्रय दिला.→\ \rightarrow
प्रसाद
३. काळ :
• कं सांतील सूचनांप्रमाणे बदल करा :
(१) मी जहर प्यालो. (अपूर्ण वर्तमानकाळ करा.)
(२) शब्दांनीच तोल सावरला. (अपूर्ण भूतकाळ करा.)
(३) शब्दांनी पाठीवर हात ठेवला. (अपूर्ण भविष्यकाळ करा.)
उत्तरे : (१) मी जहर पीत आहे.
(२) शब्द तोल सावरत होते.
(३) शब्द पाठीवर हात ठेवत असतील.
४. शब्दभेद :
• पुढील शब्दांचे भिन्न अर्थ लिहा :
(१) पाठ →\rightarrow
___, ___
(2) वात →\rightarrow
___, ___
उत्तरे :
(१) पाठ →\rightarrow
शरीराचा अवयव, पाठांतर
(२) वात →\rightarrow
वारा, ज्योत
आ भाषिक घटकांवर आधारित कृ ती
१. शब्दसंपत्ती :
(१) समानार्थी शब्द लिहा :
(१) माउली ==
___
(२) आग ==
___
(३) मरण ==
___
(४) किनारा ==
___
(५) निवारा ==
___
(६) जहर ==
___
उत्तरे :
(१) माउली ==
आई
(२) आग ==
वन्ही
(३) मरण ==
मृत्यू
(४) किनारा ==
काठ
(५) निवारा ==
निवास
(६) जहर ==
विष
(२) विरुद्धार्थी शब्द लिहा :
(१) उजेड ×\times
___
(२) आठवण ×\times
___
(३) ऊन ×\times
___
उत्तरे :
(१) उजेड ×\times
अंधार
(२) आठवण ×\times
विस्मरण
(३) ऊन ×\times
सावली
(३) 'कर्जदार'सारखे चार शब्द लिहा.
उत्तर : (१) चौकीदार (२) रखवालदार
(३) दावेदार (४) हकदार.
(४) 'निरुत्तर'सारखे चार शब्द लिहा.
उत्तर : (१) निर्विकार (२) निर्लज्ज
(३) निर्मळ (४) निर्गुण.
(५) गटात न बसणारा शब्द लिहा : उत्तरे
(१) किनारा, काठ, थड, तीर, - किनार
(२) वारा, पवन, सदन, वात, - सदन
२. लेखननियम :
• पुढील शब्द शुद्ध स्वरूपात लिहा :
बीजली - ___
भीकारी - ___
दीवस - ___
नीवारा - ___
नीरूतर - ___
कीनारा - ___
उत्तरे :
बीजली - बिजली
भीकारी - भिकारी
दीवस - दिवस
नीवारा - निवारा
नीरूतर - निरुत्तर
कीनारा - किनारा
३. वाक्प्रचार :
जोड्या लावा :
वाक्प्रचार अर्थ
उत्तरे :
वाक्प्रचार अर्थ
४. पारिभाषिक शब्द :
• पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा : उत्तरे
(१) Encyclopedia →\rightarrow
विश्वकोश
(२) Hygiene →\rightarrow
आरोग्यशास्त्र
(३) Industrialization →\rightarrow
औद्योगिकीकरण
(४) Labour Welfare →\rightarrow
कामगार कल्याण
(4) Meteorology →\rightarrow
हवामानशास्त्र
(६) Minute Book →\rightarrow
कार्यवृत्त पुस्तक
(७) Notification →\rightarrow
अधिसूचना
(८) Personal Assistant →\rightarrow
स्वीय सहायक
शब्दार्थ
मातृविहीन - आई लहानपणीच मरण पावली आहे अशी व्यक्ती. न्यून - कमतरता, उणीव. तान्हेपण - आईच्या अंगावरचे दूध पीत असण्याचा काळ.
दाई - बाळाला सांभाळणारी मदतनीस स्त्री. काळाभोर - दाट काळा, आत्यंतिक काळा. संकलित - एकत्रित. दृक्प्रत्यय - डोळ्यांनी घेतलेला
अनुभव, दृश्य अनुभव. आत्म शोधन - स्वतःच्या आत्म्याचा/मनाचा शोध घेणे. अंतःस्रोत - स्वतःच्या मनात खोलवर असलेले उगमस्थान. पिंजण
– पिंजण्याची क्रिया. मूलस्रोत - उगमस्थान, मूळ प्रवाह. अगत्य – कळकळ, आत्मीयता, मनःपूर्वकता. मसलत - विचारविनिमय, चर्चा.
झपाझप – पटापट निढळाच्या - कपाळाच्या (निढळ = कपाळ). कालक्रमणा - जीवन जगणे, दिवस घालवणे. विस्मयावह - आश्चर्यकारक
(विस्मय = आश्चर्य). स्मृतिमंजूषा - आठवणींचा कोश, आठवणींचा साठा. परिष्करण - नवीन नवीन कल्पनांप्रमाणे, विचारांप्रमाणे के लेले बदल.
चोखंदळपणा - शुद्ध ते शोधण्याची वृत्ती. शब्दसंहती - शब्दांची रूपे, शब्दांचा संग्रह. चिताडणे - चितारणे, चित्ररूप देणे, चित्रित करणे.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) मनाची पाटी कोरी असणे - मनात कोणत्याही कल्पना, भावना किं वा विचार नसणे.
(२) अगत्याचे वाटणे - मनापासून वाटणे.
(३) रस घेणे - आवड वाटणे.
(४) दमछाक होणे - खूप थकू न जाणे.
(५) कालक्रमणा करणे - जीवन जगत राहणे.
(६) वाकवळणे घेणे - अडथळे, अडीअडचणी येणे.
(७) अवाक् होणे - थक्क होणे.
(८) स्मृतिकण वेचणे - आठवणी गोळा करणे.
(९) स्मृतिमंजूषेत साठवून ठेवणे - स्मरणात ठेवणे.
(१०) कृ तकृ त्य वाटणे - धन्य वाटणे.
टीप
• भूमिती श्रेणी : अंकगणिती श्रेणी व भूमिती श्रेणी या गणितातील दोन संकल्पना आहेत. हे उदाहरणांच्या साहाय्याने समजावून घेऊ.
(१) अंकगणिती श्रेणी :
१, २, ३, ४, ५, ६,___
४, ७, १०, १३, १६, १९,___
वर दोन संख्यामालिका दिल्या आहेत. त्यांपैकी पहिल्या संख्या मालिके तील प्रत्येक संख्या लगतच्या मागील संख्येपेक्षा एकने जास्त आहे.
दुसऱ्या संख्यामालिके तील प्रत्येक संख्या लगतच्या मागील संख्येपेक्षा तीनने जास्त आहे.
एखाद्या मालिके तील लगतच्या कोणत्याही दोन संख्यांमधील अंतर सारखेच असते. कितीही मोठी मालिका घेतली किं वा ती कितीही वाढवीत नेली,
तरी तेवढ्याच फरकाने पुढची संख्या वाढणार. म्हणजे वाढीचा वेग तोच राहतो. वेग कमी होत नाही किं वा जास्त होत नाही. एखाद्या गोष्टीच्या वाढीचा
वेग जेव्हा जास्त नसतो किं वा कमीही नसतो, तेव्हा त्या वाढीला अंकगणिती श्रेणीची उपमा देतात.
(२) भूमिती श्रेणी : (पुढील श्रेणी पाहा :)
२, ४, ८, १६, ३२, ६४, १२८, २५६,___
या श्रेणीमधील कोणतीही संख्या मागील संख्येच्या दुप्पट आहे. यामुळे लगेच या दोन संख्यांमधील फरक हा सारखा राहत नाही.
लगेच या दोन संख्यांमधील फरक पुढे पुढे वाढत जातो. वाढत जातो म्हणजे दुप्पट होत जातो. त्यामुळे पुढे येणारी प्रत्येक संख्या झपाट्याने वाढलेली
दिसते. यामुळे कोणतीही गोष्ट अशी झपाट्याने वाढत असली की तिच्या वाढीला भूमिती श्रेणीची उपमा देतात.