Professional Documents
Culture Documents
वेद
शब्दोत्पत्ती
वेद हा संस्कृ त शब्द असून तो 'विद्' या संस्कृ त
धातूपासून तयार झाला आहे. वेद या शब्दाचा अर्थ 'ज्ञान'
असा सुद्धा घेतला जातो. वेदभक्तांच्या दृष्टीने हे ज्ञान
पवित्र आणि दैवी ज्ञान आहे. परंतु मूळ रूपामध्ये हा
शब्द साहित्य ग्रंथामध्ये एक विशाल राशी-विशेषाचा
बोधक आहे. प्राचीन काळी ऋषींना वेद 'दिसले ' म्हणून
त्यांना वेद असे नाव मिळाले आहे. सत्, चित् आणि
आनंद असे ब्रह्माचे स्वरूप असल्याचे वेदांमध्ये म्हटले
आहे; म्हणून वेदाला "ब्रह्म" असेही म्हणतात. जो ग्रंथ
इप्सित फलाची प्राप्ती आणि अनिष्ट गोष्ट दूर करण्याचा
मानवी बुद्धीला अगम्य असा उपाय दाखवून देतो त्याला
वेद असे म्हणावे.
वेदांचा आविष्कार
वेद असे निर्माण झाले याविषयी अनेक मते आढळून
येतात.परमात्मा किंवा ईश्वर या म्हाभूताचे निःश्वास
म्हणजे वेद होत असे बृहदआरण्यक उपनिषदात
सांगितले आहे.वेद हे शब्दस्वरूप असल्याने ते
आकाशातून उत्पन्न झाले असेही एक मत आहे.वेद
आपला धर्म आहे...
वेदांचे महत्त्व व प्रामाण्य
वेद हे आर्यधर्माच्या मूलस्थानी आहेत. 'वेदोऽखिलो
धर्ममूलम् |' असे मनुवचन प्रसिद्धच आहे. वेदांवरून
तत्कालीन आर्य जनांच्या भौतिक उन्नतीची कल्पना येते.
व्यक्ती, समाज आणि राष्ट्र या तीन गोष्टींच्या माध्यमातून
आर्यांनी भौतिक उत्कर्ष साधला होता. वेद, स्मृती,
सदाचार आणि स्वतःच्या अंतःकरणास जे बरे वाटेल ते,
अशी धर्माची चार प्रकारची लक्षणे आहेत. भारतीय
आस्तिक दर्शनानी आपापले तत्त्वज्ञान मांडताना वेदांचा
आधार घेतला आहे.
वेदांचा कालनिर्णय
ख्रिस्ती शतकापूर्वी १००० वर्षांच्या पलीकडच्या काळात
वेदरूप काव्ये रचली असावी असे दिसते. काही
विद्वानांचे असे मत आहे की छंदांचा काल ख्रिस्ती
शकापूर्वी दोन किंवा तीन हजार वर्षापूर्वीचा असावा.
लोकमान्य टिळकांनी 'ओरायन'हा ग्रंथ लिहून
वेदकाळासंबंधी आपले मत सविस्तरपणे मांडले आहे.
वेदकालाचा निर्णय करण्यासाठी वेद वाक्यांचाच आधार
घेतला पाहिजे असे त्यांनी नोंदविले आहे.
डॉ.भांडारकर
ऋग्वेदाचा काल सनपूर्व २५०० मानतात तर
अविनाशचंद्र दास यांच्या मते तो सनपूर्व २५००० इतका
मागे जातो.[१]
वेदांचे स्वरूप
वेदांमध्ये अग्नी, इंद्र, वरुण, उषा,मरुत अशा विविध
देवतांची स्तुतीपर सूक्ते आहेत. वैदिक ऋषींनी
निसर्गातील वेगवेगळ्या शक्तींना उद्देशून रचलेली ही
स्तोत्रेच आहेत. वैदिक काळातील कु टुंब व्यवस्था,
लोकजीवन, संस्कृ ती, आश्रम व्यवस्था, शिक्षण पद्धती
,राष्ट्र दर्शन ,तत्त्वज्ञान विषयक संकल्पना अशा विविध
मुद्द्यांची माहिती आपल्याला वेदांमध्ये अभ्यासायला
मिळते.[१]
आधुनिक काळातही अभ्यासाची गरज
खऱ्या अर्थाने वेदांचे रक्षण करायचे असेल तर वेदांतील
ऋचांचाचा उच्चार योग्य माणसाने, योग्य वेळी व योग्य
परिस्थितीत के ल्याने त्यातील खरा अर्थ प्रकट होतो, असे
सांगितले जाते. गुरू शिष्य परंपरेने चालत आलेले हे
ज्ञान आजवर सांभाळले गेले आहे.
व्यास
वेदान्त (उपनिषदे , वगैरे)
टीका
हिंदू धर्माचे अनेक विश्लेषक असा दावा करतात की हिंदू
धर्म सर्व समकालीन धर्मांचे घटक स्वीकारतो आणि हिंदू
धर्मातील वैदिक पुराणांसह अनेक धर्मग्रंथांमध्ये बौद्ध,
जैन आणि शीख धर्माचे घटक आहेत आणि ग्रीक आणि
झोरोस्ट्रियन धर्मातील महत्त्वपूर्ण घटकांनी दत्तक
घेतलेले आहे.[२] अवेस्ताः आहूरा ते असुर, देयब ते देवा,
अहुरा ते मजदा ते एके श्वरवाद, वरुण, विष्णू व गरुड,
अग्निपूजा, सोम ते होम असे सोम, स्वर्ग ते सुधा, यासना
ते योजना किंवा भजन, नरियसंघ ते नरसंघ (ज्याचे बरेच
लोक म्हणतात) इस्लामिक प्रेषित मुहम्मद यांचे
भविष्यवाणी), इंद्र ते इंद्र पर्यंत, गंडरेवापासून गंधर्व, वज्र,
वायु, मंत्र, याम, आहुती, हुमाता ते सुमती इ.[३][४]