Professional Documents
Culture Documents
आपण बघतो की काही माणसे वरकरणी क्षुल्लक दिसणाऱ्या घटनांमुळे अस्वस्थ होतात तर काही महाभयानक आपत्तींमुळेसुध्दा विचलित होत नाहीत. एखाद्या अनुभवाने आपणास सुख झाले आहे वा
दुःख होत आहे याचे ज्ञान होण्यास दोन गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे मनाच्या पटावर घडलेल्या घटनेची प्रतिमा उमटण्यास मोकळी जागा असणे जरुरी आहे. स्वतःच्या नादात रमलेल्या
माणसाच्या समोरुन लग्नाची सुंदर वरात गेली तरी त्याला त्याची जाणीव होत नाही! परंतु नुसते प्रतिबिंब उमटू न चालत नाही. दुसरी आवश्यक गोष्ट म्हणजे त्या मोकळ्या जागेत जे काही उमटलेले आहे
त्या चित्राची जाणीव व्हायला हवी. एखादे बालक प्रत्येक पक्ष्याला ‘काऊ’ वा ‘चिऊ’ असे संबोधिते आणि अचानक एखाद्या सुंदर पक्ष्याच्या दर्शनाचा आनंद झाला तरी त्या आनंदाचे वर्णन करु शकत
नाही. तेव्हा आपल्या जवळ पूर्वानुभवांचा मुबलक साठा असणेसुध्दा भावनांना नीट ओळखण्यास जरुरी आहे.
आता या पार्श्वभूमीवर बघा की संतांच्या मनात आधीच्या सर्व जन्मांतील अनुभवांचे ज्ञान असते. उदाहरणार्थ, माउलींनी श्रीज्ञानेश्वरीत असे स्पष्टपणे म्हटले आहे की ‘माझिया सत्यवादाचे तप । वाचा के ले
बहुत कल्प । तया फळाचे हे महाद्वीप । पातलो प्रभु ॥ ३२:१६॥’ आणि त्याचबरोबर ते सतत वर्तमानकाळात जगत असल्याने त्यांचे मनःपटल संपूर्ण मोकळे आहे. त्यामुळे त्यांच्या मनात समोरील घटनांचे
जे पडसाद उमटत असतील त्याची कल्पना आपणासारख्यांना होणे कसे शक्य आहे?!! आपल्यासारखे त्यांचे मन भौतिक पातळीवर नसते म्हणूनच ठीक आहे, नाहीतर भोवतालच्या प्रत्येक घटनेने ते
हत्तीच्या चालण्याने जवळील मुंगी जशी हादरते तसे भावनांच्या वादळात सापडले असते. परंतु त्यांचे मन ज्या ठीकाणी असते तेथील सूक्ष्मातल्या सूक्ष्म हालचालीनेसुध्दा त्यांच्या जीवनात प्रचंड हेलकावे
येतातच. आपले चित्त सतत भगवंताच्या चरणकमलांपाशी ठेवल्यामुळे भगवंताचा क्षणिक वियोगसुध्दा त्यांना जिवापाड वेदना देऊन जातो, जिवन उलटे-पालटे करुन जातो.
वरील अभंगामध्ये माउलींनी आपल्या आयुष्यातील अशाच एका नाजूक क्षणाचे वर्णन के ले आहे. ते म्हणत आहेत: ‘तुझ्यापासून दूर गेल्याने तुझी आठवण मनात प्रकर्षाने येत आहे. हा वियोग अतिशय
कष्टदायक असून मनापासून नकोसा वाटत आहे (१). हे करुणासागर माते, मला आता दिवस रात्रीसारखा वाटत आहे (माझे सर्व जिवन उध्वस्त झाले आहे), ही अवस्था झालेली असतानासुध्दा तू अजून
का येत नाहीस? (भक् ताच्या आर्त हाके ला तात्काळ धावून येण्याच्या ब्रीदाची आठवण ठेवून माउली भगवंतांना अशी हाक देत आहे!) (२). अरे सर्वगुणसंपन्न असलेल्या गरुडा, तू भगवंतांचे वाहन आहेस
तर आता तू तरी उदार हो आणि माझ्यापाशी श्रीविठ्ठलांना घेऊन ये (३).’
बघा, माउलींचे मन विरहवेदनेने किती वेडेपिसे झालेले आहे! जो गरुड भगवंतांच्या आज्ञेशिवाय आपले पाय पुढे ठेवित नाही अशा सेवकाला जबरदस्तीने भगवंताला आपणाजवळ आण अशी विनवणी
करण्यास ते तयार झाले आहेत. जेव्हा मनाची अवस्था के विलवाणी झालेली असते तेव्हा ‘बुडत्याला काडीचा आधार’ या न्यायाने आपण कितीही अशक्य असलेल्या गोष्टींचा आधार घेतो तशीच अवस्था
प्रत्यक्ष माउलींची झालेली आहे. श्रीसंत तुकाराम महाराजसुध्दा आपल्या ‘गरुडाचे पायी, ठेवी वेळोवेळां डोई’ या अभंगामध्ये गरुडाला, लक्ष्मीला आणि शेषाला विनवणी करतात की तुम्ही तरी भगवंताला
माझ्याजवळ आणा. संतांच्या या सकृ तदर्शनी विरोधाभासी वर्तनावरुन ते किती व्याकु ळ झाले असतील याची थोडीफार कल्पना करण्याचा प्रयत्न आपण करु शकतो. आपल्या हातात एवढेच आहे कारण
त्यांच्या मनःस्थितीची आपणास जाणीव होणे निव्वळ अशक्य आहे!
शेवटी या अभंगाकडे बघताना एक गोष्ट लक्षात घ्या की माउलींना झालेली विरहवेदना आपल्या दृष्टीने एक क्षणभरही टिकलेली नसणार. परंतु त्यांच्या मनाच्या पराकोटीच्या संवेदनशीलतेमुळे तो
अत्यल्पकाळसुध्दा त्यांना नकोसा वाटतो. दुःखाचे मोजमाप ते कितीकाळ टिकले यावर करायचे नसते, तर त्याने मनात किती खोल जखम झाली आहे यावर करायचे असते हे आपण नजरेआड करु नये.
॥ हरि ॐ ॥
सं त ज्ञाने श्वर विराणी / विरहिणी / विरहरत्ने २ – पुनर्भेटीची उत्कंठा
एकदा अशाच अवस्थेत श्री ज्ञानेश्वर माउली असताना त्यांना पलिकडू न एका कावळ्याचे ओरडणे ऐकू आले. त्याच्या वरकरणी कर्क श्य वाटणाऱ्या कावकावीतून त्यांना काय वाटले याचे वर्णन त्यांनी
वरील अभंगात के ले आहे. ते म्हणत आहेत की: ‘(माझ्या मनाची व्याकु ळता बघून) पलीकडील कावळा मला ओरडू न सांगत आहे की मी तुला शुभ वार्ता सांगायलाच इथे आलो आहे (१). अरे कावळ्या,
आता तुझा शकु न पूर्ण करण्यासाठी जरुरी असलेले उडू न जाणे लवकर कर. तू असे के लेस तर ज्याप्रमाणे एखादा राजा शुभवार्ता आणणाऱ्याला गळ्यातील मोल्यवान हार काढू न देत असे, त्याचप्रमाणे मी
तुला संपूर्ण सोन्याने मढवून टाकीन कारण तू पंढरीराणे विठोबा घरात के व्हा येणार आहेत याची वार्ता सांगितली आहेस! (२) पण उडू न जायच्या आधी जरा थांब, तू ‘त्यांच्याकडू न’ आलेला असल्याने
उडायच्या आधी मला विठोबारायांबद्दल जरा सांग बघू. ते कसे आहेत, के व्हा येणार आहेत वगैरे गोष्टी मला सांगितल्यास तर तुला आवडणारा दहि-भात मी तुला प्रेमाने भरवीन (३) आणि ही घे दूधाने
भरलेली वाटी पण मला खरं सांग रे! माझा विठोबा येणार ना रे?!! (४) आज तू दारच्या आंब्याच्या झाडावर असल्यापैकी सर्वात रसाळ फळांना खाल्लेस तरी मी तुला काहीही बोलणार नाही पण शकु न पूर्ण
करण्यात आता दिरंगाई करु नकोस आणि आत्ताच तो पूर्ण कर. (५) ओ हो! मला आत्ता कळले की कावळ्याचा शकु न पूर्ण झाला आहे आणि त्याने माझा पंढरीराया मला आजच भेटणार आहे याबद्दल
माझी पूर्ण खात्री झालेली आहे!! (६)’
विठोबाशी तादात्म्य साधण्यासाठी माउली इतकी उत्सुक आहे की त्यामुळे कावळ्यासारख्या अतिसामान्य जीवालासुध्दा अत्यंत आदराने संबिधिले जात आहे. कारण सेवक कितीही छोटा असला तरी तो
ज्या मालकाची सेवा करीत आहे त्यानुसार श्रेष्ठ होतो!! आणि आलेला कावळा प्रत्यक्ष विठोबांच्या आज्ञेने आलेला असल्यामुळे ते अत्यंत प्रेमाने त्याला ‘काउ’ असे संबोधून त्याचा मानसन्मान करीत
आहेत! यावरुन आपण असा बोध घ्यायला हवा की जर आपणास माउलींचे प्रेम पूर्णरुपाने हवे असेल तर आपल्या मनात विठोबाबद्दलची भक् ती जागृत असायला हवी. जिथे वैष्णवांच्या मेळा असतो तिथे
माउली येणारच येणार. वारीतील प्रत्येक वारकऱ्याला या सत्याची प्रचीति आलेली आहे!!!
॥ हरि ॐ ॥
सं त ज्ञाने श्वर विराणी / विरहिणी / विरहरत्ने ३ – पूर्वभे टीची आठवण
या सृष्टीतील प्रत्येक वस्तूत सत्व, रज आणि तम या तिन्ही गोष्टी अस्तित्वात असतात. त्यामुळे विरहासारख्या अधिकांश तामसिक गोष्टीतही सद्गुरुं च्या तीव्र आठवणीची सात्विकता आहेच. त्या
सत्स्मरणामध्ये एकाग्रतेने मग्न असताना आपले मन अतिशय ताणलेल्या तंतुवाद्यासारखे तरल होते आणि त्यामुळे अत्यंत क्षुल्लक गोष्टीही आपणास अनिवार आनंद वा दारुण दुःख देऊन जातात. याचे एक
उदाहरण म्हणजे ज्या ग्रामातील मातीपासून भगवंताच्या भजनासाठी वापरणारा घट बनतो त्या गांवाचे नाव काढल्यावरच श्री रामकृ ष्ण परमहंस अतिउच्च भावावस्थेमध्ये विरुन जायचे. कारण त्यांच्या
मनात त्या नामोच्चरणाने तो घट आणि त्याच्या अनुषंगाने भजन-कीर्तन यायचे आणि ते त्या स्मरणात समाधिस्थ व्हायचे. त्यांची मनःस्थिती कायमच अशी अत्यंत नाजूक असल्याने भोजनसमयी
चुकू नसुध्दा कु णी दुरान्वयाने भगवंताची आठवण होईल असे शब्द काढले तरी ते भावावस्थेत विलीन व्हायचे आणि त्यांचे भोजन तसेच रहायचे. के वळ श्री शारदामाताच त्यांना पूर्ण भोजन करण्यास भाग
पाडू शकायच्या. अशी अतिउच्च भावावस्था विरहाचाच एक भाग आहे. वरील अभंगामध्ये माउलींची अवस्था अशीच असल्याचे आपणास स्पष्टपणे दिसून येते.
माउली म्हणत आहे: ‘कु ठू न तरी अचानक चंदनाचा सुगंध आल्याचा मला भास झाला आहे. नक्कीच देवकीनंदन गोपाळ मला भेटायला आला असणार. त्या भेटीच्या कल्पनेनेच माझे देहभान हरपल्यासारखे
झाले पण मी स्वतःला कशीबशी सांभाळत त्याला भेटायला बाहेर आले तर माझे बघणेच खुंटल्यासारखे झाले आहे. आता मी काय करु हे सुचेनासे झाले आहे (१). सख्यांनो, माझा विरहज्वर अधिक
प्रज्वलित होण्याआधी यावरचा एकच उपाय जो आहे तो म्हणजे मुरलीधराची भेट ती मला लवकरात लवकर घडवा (ध्रु.) मला त्याचे पीतांबर नेसलेले लावण्यमयी मनोहर सावळे रुप दिसले आणि मला
दृष्टी आहे याचे सार्थक झाले. परंतु चित्त समाधान झाल्यावर त्याला परत एकदा नीट पहावे म्हणून बघायला गेले तर तो कु ठे अदृष्य झाला हे कळलेच नाही (२). त्या दर्शनाने माझे मन उन्मन झाले आहे
आणि माझ्या संकु चित व्यक्तिमत्वाचा पूर्ण नाश झाला आहे. आता मला निव्वळ विठ्ठलाच्या स्मरणातच सुख लाभायला लागले आहे. त्यातच मी आता कायावाचामनाने पूर्णतः गुंतलो आहे (३).’
बघा, कु ठू न तरी सुगंधाचा भास होण्याचे निमित्त काय झाले आणि माउली भावावस्थेत विलीन झाल्या! परंतु या देहातीत अवस्थेतही अतिशय सुंदर शब्दांत माउलींनी फार गहन तत्व मांडले आहे.
भगवंताशी भेट झाल्यावर जी अवस्था होते तीचे वर्णन करायला गेल्यास ती कु ठे नाहीशी होते हे कळतच नाही असे माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणत आहे. ‘दृष्टी भरल्यावर डोळ्यांनी बघायला
गेले तर तो नाहीसा झाला’ या अतिनाजूक आणि समर्पक शब्दांतून भगवंताला बुध्दीने जाणणे अशक्य आहे हे माउलींशिवाय कोण मांडू शके ल काय?! खरोखर, माउलींच्या रुपाने इतकी अफाट ज्ञानी
आणि त्याबरोबर अकल्पानप्य वाक् कौशल्यता व अमर्याद सौंदर्यदृष्टी असलेली व्यक् ती या भूतलावर कधीतरी वावरली आहे या जाणीवेनेच मन भरुन येते. अशावेळी अभंग ऐकणाऱ्यांच्या नयनांतून
अश्रुधारा न वाहतील तरच नवल. भगवंताबद्दल अभंगातील भावनेच्या एक लक्षांश भावना तरी आपल्या जिवनात येऊदे अशी माउलींच्या चरणी प्रार्थना!
॥ हरि ॐ ॥
सं त ज्ञाने श्वर विराणी / विरहिणी / विरहरत्ने ४ – विरहाग्नीचा दाह
वरील अभंगातही माउली विरहाग्नीच्या दाहाचे वर्णन करीत म्हणत आहे: ‘ढगांचा गडगडाट आणि त्याच्या बरोबर थंडगार वाऱ्याची झुळूक जाणविली, (आणि ज्याप्रमाणे अशा वातावरणात मयूराला मयूरीची
तीव्र ओढ वाटते त्याचप्रमाणे मला वाटू न) आता मला या जगाचे सर्वदुःख हरण करणारा कान्हा लवकर भेटवा (१). या देवकीनंदन गोपाळाविण मला ना रात्रीचे चांदणे शीतल वाटत आहे ना चंदनाचा लेप
(२). चंदनाची चोळी करुन मला घातली तरी माझे सर्व अंग जळल्यासारखे होत आहे. तो दाह आता सहवेनासा होऊन यावर जो एकच उपाय आहे तो म्हणजे भगवान श्रीकृ ष्णांचे दर्शन ते मला घडवा
(३). अगदी गोड सुवासिक फु लांच्या शय्येवर जरी मी झोपले तरी मला विस्तवावर पडल्यासारखे होत आहे. आता हा विरहाग्नी त्वरीत विझवा (४). मैत्रिणींनो, तुम्ही आपल्याच जीवनगाण्यात मग्न आहात
परंतु माझे करुणास्वर ऐकू न माझ्यासाठी काहीतरी करा. सख्यांनो, आता माझ्यासाठी तरी तुम्ही ऐहीक सुखाला त्यागा (म्हणजे भगवान तुम्हांकडे येईल आणि मग त्याला तुम्ही माझ्याकडे आणू शकाल!)
(५). श्री विठ्ठलकृ पेने मी कोण आहे, कु ठे आहे, कशी आहे याचे सर्व भान सुटलेले आहे. स्वतःचे रुप पहायचा प्रयत्न के ला तरी त्यात मला यश मिळत नाही (तेव्हा आता माझ्याकडू न भगवंतप्राप्तीचे प्रयत्
न होतील ही आशाच नाही. म्हणून सख्यांनो आता मला फक् त तुमचाच आधार आहे.) (६).
सांगायची गोष्ट अशी की माउलींनी आपल्या या विरहीणीमध्ये श्री रामकृ ष्ण परमहंसांच्या अवस्थेपेक्षाही दारुण अवस्था वर्णन के ली आहे. भैरवी ब्राह्मणीने ठाकु रांच्या विरहज्वरावर जे यशस्वी उपाय के ले
होते, त्यांचाच उल्लेख करुन आता त्यांचासुध्दा काही उपयोग होत नाही असे माउली म्हणत आहे हे लक्षात घ्या. याचे कारण असे आहे की माउलींची विरहावस्था इतरांच्या भौतिक पातळीवरील
अस्तित्वातच सुख शोधण्याच्या प्रयत्नांनी अधिकच वृध्दींगत झालेली आहे. परमदयाळू माउलींच्या कृ पामय स्वभावामुळे आता आपल्या जीवनातील दुःखही त्यांचे झाले आहे. त्यामुळे निव्वळ त्यांच्या
देहावर उपचार करुन त्यांची मनःशांति होत नाही तर जेव्हा आपण आपल्या जीवनात खरा आनंद निर्माण करु तेव्हाच त्यांचे खरे समाधान होणार आहे. सख्यांच्या रुपकाद्वारे माउली आपणा सर्वांना
स्वतःचे जीवनगाणे बदलायला सांगत आहे. चला, आपण स्वतःच्या भगवंताजवळ जाण्याच्या साधनेला जोमाने सुरु करुन ‘भजिजो आदिपुरुखी अखंडित ॥’ अशा अवस्थेत राहण्याचा प्रयत्न करु.
माउलींच्या विरहाचे निरसन करण्याचा आपल्यापरीने प्रयत्न करु!!
॥ हरि ॐ ॥
सं त ज्ञाने श्वर विराणी / विरहिणी / विरहरत्ने ५ – सगु णरुपाचा ध्यास
माउलींच्या वरील विराणीमध्येही त्यांच्या भगवंतदर्शनाची आस दिसून येत आहे. काहीतरी प्रमाद घडल्यावर शिक्षा म्हणून प्रियकराने प्रेयसीशी अबोला धरल्यावर तिची जी अवस्था होते तो भाव मनात
ठेऊन करुण स्वरात माउली म्हणत आहे: ‘ज्या भगवंताच्या गोडीने मी व्यावहारिक जगाचा त्याग के ला त्याने का म्हणून माझ्याशी अबोला धरला आहे? स्वतःच्या व्यक् तिमत्वाला तिलांजली देऊन
(जीवाला गाठ मारुन!)त्याच्या पायाला मी घट्ट मिठी घातली तरी तो आपल्याच ठिकाणी स्वस्थ उभा राहून माझ्यासमोर येण्याचे का टाळत आहे? (१) कु णीतरी त्याला मला भेटवा हो! त्याच्या चरणांची
धूळ मी माझ्या के सांनी झाडायला तयार आहे, त्याच्या सगुणरुपाच्या ध्यासात मी विरुन गेले आहे (ध्रु.) त्याच्या भेटीसाठी माझा जीव अत्यंत उतावीळ झाला आहे. त्याच्या चारी भुजांनी मला आलिंगन
दिले तरच मला सुख लाभणार आहे. मी काय के ले म्हणून तो माझ्यावर रुसला आहे आणि त्यामुळे माझ्या सुखाला त्याने रोखून ठेवले आहे? (२) मी त्याच्या ध्यासात वेडी होऊन माझे सर्व चित्त त्याने
व्यापून टाकले आहे. (भ्रमर-कीटक न्यायाने) त्याच्या सतत विचाराने मी आणि तो यातील फरकच आता मला कळेनासा झाला आहे आणि त्यातच सगुण दर्शनाची ओढ असल्याने (म्हणजे द्वैतामधील
आनंद उपभोगायची इच्छा अजून असल्याने) मला वेड लागल्यासारीखे झाले आहे (३).’
संतांचा जन्म निव्वळ लोककल्याणासाठी झालेला असल्याने त्यांनी स्वतःसाठी काहीही मागणे करणे कदाचित भगवंताला पसंत नसावे. मग भले ती मागणी त्याच्या दर्शनाची का असेना! श्री रामकृ ष्ण
परमहंसांच्या धर्मपत्नी म्हणजे श्री शारदामाता. त्यांनी त्यांच्या दक्षिणेश्वरामधील रहिवासाबद्दल असे सांगितले की ‘मी ठाकु रांच्या खोलीशेजारी असलेल्या इमारतीतील जिन्याच्या खाली जी छोटीशी जागा
होती त्यात रहायचे आणि तिथेच दिवसभर त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांकरीता भोजन इत्यादी तयार करायचे. परंतु त्यांच्या इतक्या जवळ राहूनसुध्दा मला त्यांचे दर्शन कित्येक महिने व्हायचे नाही!
दर्शनाची अगदीच उत्कट इच्छा झाली तर मी माझ्या खोलीच्या दाराला चटईचा पडदा होता त्याच्या एका बारीक छिद्रातून त्यांच्या पाठीकडे वा जवळ बसलेल्या एखाद्या शिष्याकडे बघून वा त्यांचा भजन
गातानाचा आवाज ऐकू न समाधान मानायचे.’ बघा म्हणजे ज्या रामकृ ष्णांना देवीच्या दर्शनाचा ध्यास लागला होता ते स्वतः भगवंतस्वरुप झाल्यावर त्यांचे दर्शनही दुर्मिळ झाले! ठाकु रांनी व श्री
शारदामातांनी जे जीवन व्यतीत के ले त्याच्या दिव्यपणाला तोड नाही. माउलींच्या विराणीतील सर्व भावांचे प्रत्यक्ष दर्शन या दैवी दंपतीच्या जीवनपटात वेळोवेळी दिसून येते! विराणीतील भाव निव्वळ
कविकल्पना नसून त्यांची उत्कटता संतांनी प्रत्यक्षतेने भोगलेली आहे हे लक्षात घ्या.
॥ हरि ॐ ॥
सं त ज्ञाने श्वर विराणी / विरहिणी / विरहरत्ने ६ – कृष्णाविण जीवनाचे शून्यत्व
वरील अभंगामध्ये माउलींनी भगवान श्रीकृ ष्णांची पूर्ण कृ पा झालेल्या एका गोपीची अवस्था कथन के लेली आहे. भगवान श्रीकृ ष्णांना आपला सखा मानलेल्या गोपीच्या अवस्थेबद्दल माउली म्हणत आहे:
‘कृ ष्णाच्या ध्यानात मग्न झालेली एक विरहिणी बोलत आहे की शीतल चांदणेही आता मला प्रखर सूर्यप्रकाशाप्रमाणे दाह देत आहे. या विरहाग्नीला शमविण्यासाठी तुम्ही मला चंदनाचा लेप लावू नका वा
पंख्याने गार वारा घालू नका. माझ्या हरिविण हे सर्व निरुपयोगी आहेत (१). माझ्या या दुःखाचे मूळ तुम्हाला कसे कळत नाही? सख्यांनो, आता माझे सर्व जीवन कृ ष्णमय झालेले आहे (२). त्यामुळे
नंदकु माराला सतत माझ्यासमोर आणल्याशिवाय आता माझे प्राण वाचणार नाहीत. श्री ज्ञानदेवांनाही विठ्ठल, गोविंद या नावांचा जप अमृत प्राशन के ल्यासमान आहेत (३).’
सदर गोपीच्या मधुरभावात पूर्ण अध्यात्म भरलेले आहे असे म्हणण्याचे कारण म्हणजे भगवंतांशी भेट झाल्यावर ती आपल्या पंचेंद्रियांचे समाधान होईल असे म्हणत नाही तर माझे जाणारे प्राण परत येतील
असे म्हणत आहे. हे प्रेम देहभावनेवर आधारीत नाही तर चैतन्याच्या पातळीवर आहे. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये विश्वरुपाचे दर्शन झाल्यावर परम भक् त अर्जुनसुध्दा असे उद्गारतो की भगवंता तुझे चतुर्भुज रुप
परत माझ्यासमोर पुढे येऊदे, नाहीतर जीव काय आता चैतन्यसुध्दा जायची वेळ आलेली आहे! समजा गोपिके च्या मागणीला मान देऊन अचानक श्रीकृ ष्ण समोर आले तर ती काय करेल? तिची अवस्था
काय करु आणि काय नको असे होऊन ती संपूर्णपणे भांबावून जाईल. श्री रामकृ ष्ण परमहंस एकदा कलकत्याला राहणाऱ्या दोन बहिणींच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या घरी गेले तर त्यातील एक बहीण
आतल्या खोलीतच ‘आज माझ्या घरी प्रत्यक्ष ठाकु र आले आहेत’ असे म्हणून त्या अत्यानंदात नुसती बसून राहीली. त्या अत्युकट आनंदावेगाने पूर्ण बहरुन गेल्याने तिला खोलीबाहेर येऊन त्यांचे
दर्शनसुध्दा घेता आले नाही, मग त्यांची सरबराई करणे दूरच राहीले! दुसरी बहीण श्री रामकृ ष्णांकडे तक्रार करु लागली की ‘बघा, सगळ्यांची सेवा करण्याची सर्व कामे मला एकटीलाच करावी लागत
आहेत. बहीण असूनसुध्दा काही उपयोग नाही!’ अहो, सद्गुरु समोर आल्यावर आपले संसारिक देहभान हरपणे यापेक्षा अधिक उच्च अध्यात्मिक अवस्था असू शके ल काय? आणि अशी अवस्था व्हावी
म्हणूनच सद्गुरुं चे स्मरण सतत के ले पाहिजे. अभंगाच्या शेवटी माउली म्हणूनच असे म्हणत आहे की ‘विठ्ठल, गोविंद’ या नामांचा जप करणे म्हणजे आपले गमाविलेले अध्यात्मिक जीवन परत मिळण्याचे
अमृत प्राशन करण्यासारखे आहे. हा अमृताचा सागर अखंड समोर असताना व्यावहारिक विश्वात मग्न राहण्याने आपणच आपल्या ओठांची वज्रमिठी घालून बसलो आहोत याला कोण काय करणार?
॥ हरि ॐ ॥
सं त ज्ञाने श्वर विराणी / विरहिणी / विरहरत्ने ७ – कृष्णा सारखा कृष्ण आहे!
श्री रामकृ ष्ण परमहंसांना त्यांच्या प्रिय शिष्यांनी अनेकदा त्याच्या अत्युच्च भावावस्थेचे वर्णन करण्याचा आग्रह के ला होता. भक् तांवरील प्रेमाने ‘आज मी त्या अवस्थेत गेलो की जरुर सांगीन’ असे त्यांनी
बरेचवेळा सांगितलेसुध्दा. परंतु त्या अवस्थेत पोहोचल्यावर ते संपूर्णरीत्या स्तब्ध व्हायचे. नंतर ते म्हणायचे की ‘मुलांनो, मी खरोखर मनापासून स्वतःला थोडे वेगळे ठेवून जे दिसत आहे त्याचे वर्णन
करण्याचा प्रयत्न के ला. परंतु जेव्हा समाधी लागते तेव्हा मुखातून शब्द उच्चारायला हवेत याची जाणीव व्हायला जरुरी असणारे देहभानच हरपते. मग कोण कु णाला काय सांगणार?’ नंतर ते म्हणायचे की
‘या जगात ज्या गोष्टींबद्दल बोलले गेले आहे त्या सर्व वस्तू आपल्या वाचेमुळे जणू ‘उष्ट्या’ झालेल्या आहेत. त्यांचा सोवळेपणा नष्ट झालेला आहे. या विश्वात संपूर्णरीत्या पवित्र गोष्ट एकच आहे. ती
म्हणजे भगवंताशी एकरुप झाल्यावरची समाधीवस्था!’ या उच्चारांमधून ब्राह्मणाने ‘सोवळ्यात’ रहावे या नेहमी वापरण्यात येणाऱ्या शब्दांचा एक वेगळाच अर्थ लागतो! असो.
परंतु या वस्तुस्थितीतही आपल्या उपजत परमदयाळू स्वभावामुळे सर्व संतांनी आपापल्या परीने त्यांच्या इष्टदेवतेचे वर्णन करण्याचा प्रयत्न के लेला आहे असे दिसून येते. याचे कारण असे की ज्या
भगवंताशी एकरुप झाल्याने त्यांना जिवापलिकडील आनंद प्राप्त झालेला असतो त्या आनंदाला सर्व जगाला वाटण्याचा त्यांचा प्रयत्न होय. वरील विरहिणीमध्येसुध्दा माउली आपल्या आराध्याचे वर्णन
करीत आहेत असे दिसून येते. अभंगामध्ये श्री ज्ञानदेव महाराज असे म्हणत आहेत की ‘सांवळ्या रंगात बांधलेल्या सावळ्या रुपाच्या सांवळ्या आकृ तीने माझे मन पूर्ण वेधून घेतले आहे (१). मैत्रिणींनो,
आता मी काही के ले तरी या सांवळ्या रुपाचा ध्यास काही सुटत नाही. माझी सर्व इंद्रिये या एकाच रुपाच्या चिंतन करण्याच्या प्रयत्नांत एकरुप झालेली आहेत (२). या सांवळ्या रुपाचे तेज सांवळेपणाने
झळकत आहे! जणू काळ्या रंगाच्या डोहात माझा कृ ष्ण सावळ्या तेजाने चमकत आहे (३) ज्ञानदेवाला श्री निवृत्तींच्या कृ पाप्रसादाने सांवळ्यात सामावून जाण्याचा ध्यास लागला आहे (४).’
ज्या माउलींनी श्री ज्ञानेश्वरीत अनेक नवीन शब्द निर्माण करुन आपल्या भावनांना स्पष्टरीत्या मांडले त्यांनासुध्दा आपल्या भावावस्थेतील सांवळ्याचे वर्णन करीत असताना ‘सांवळा’ याशिवाय दुसरा
कु ठलाही शब्द वापरावासा वाटला नाही यातच भगवंताचा अनिर्वाच्यपणा स्पष्ट होतो. बावन्न भाषांवर पूर्ण प्रभुत्व असलेल्या माउलींनाही ‘सावळा’ या शब्दाशिवाय दुसरा एकही शब्द त्यांच्या
शब्दसंपत्तीमधून वापरावासा वाटला नाही हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. भगवान कृ ष्ण कृ ष्णरुप आहे याशिवाय माउली सांगू इच्छित नाही तर दुसरे कोण काय बोलणार? हीच गोष्ट अनंत काल चालू
आहे. आपले वेदसुध्दा ‘हे नाही, ते नाही’ यापलिकडे भगवंताचे वर्णन करु शकले नाहीत. ख्रिश्चन धर्मातही अशी कथा आहे की साडे-तीन हजार वर्षांपूर्वी जेव्हा आपल्या योग्य अनुयायांना मार्गदर्शन
मिळावे म्हणून मोझेसने सिनाई पर्वतावर जाऊन भगवंताची आराधना के ली आणि देवाने त्याला एका झुडु पातील अग्नीरुपात दर्शन दिले व लोकांना उपदेश म्हणून ‘दहा आज्ञा ’ दिल्या. तेव्हा मोझेसने
देवाला विचारले की ‘तूच मला भेटलास यावर लोकांचा विश्वास बसावा म्हणून मला तुझे वर्णन करावे लागेल. तर तू कसा आहेस म्हणून मी त्यांना सांगू?’ तेव्हा त्याला उत्तर मिळाले ‘मी माझ्यासारखा
आहे हे त्यांना सांग!. अहो अनादीकाळापासून भगवंताचे वर्णन असेच होत आहे. परमार्थामध्ये दुसऱ्याच्या वर्णनाचा आधार घेऊन भगवंताशी भेट होत नाही तर सद्गुरुकृ पेमुळे स्वतःला ध्यास लागल्यावर
होते असे माउली आपणास अभंगाच्या शेवटच्या चरणातून सांगत आहे. माउली अभंगातून आपणास असे सांगत आहे की भगवंताचा ध्यास लागणे म्हणजेच गुरुकृ पा झाली असे समजणे होय. या
ध्यासानंतर स्वतःच्या पायावर उभे राहूनच भगवंतदर्शन घ्यायचे आहे. याकरीता जे पाठबळ लागते ते द्यायला आपले सद्गुरु समर्थ आहेतच!
॥ हरि ॐ ॥
सं त ज्ञाने श्वर विराणी / विरहिणी / विरहरत्ने ८ -सर्व सु खाचे मूळ
आपल्या मनात हे प्रश्न उद्भवतसुध्दा नाहीत याचे कारण दृष्य जगतातील उपरोनिर्दिष्ट वैविधता होय. ज्याप्रमाणे पत्यांची जादू करणारा मनुष्य आपले व्यवधान बोलण्यात गुंतवून हळूच दुसरीकडे
हातचलाखी करतो त्याचप्रमाणे आपल्या नजरेसमोरील विविधता त्यांच्यामध्ये काही साम्य असेल या भावनेला उद्भवूदेखील देत नाही. कल्पना करा की कचेरीमधून दमून आल्यावर हसतमुख पत्नीच्या
हातून मिळालेल्या गरम-गरम चहाच्या प्यालातील आनंद आणि ती माहेरी गेल्यावर शेजारणीशी खेळकरपणे मनसोक् त गप्पा मारण्यातील सुख आणि त्या दोघींना पूर्ण विसरुन भगवंताच्या उपासनेत
संपूर्णपणे मग्न होण्यामधील मिळालेले समाधान यामध्ये काही समानता असू शके ल याची आपण कल्पनातरी करु शकतो का?! परंतु आपल्या जीवनातील सर्व सुखांमध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे
प्रत्येक सुखी क्षण आपल्या मनाची अजून काही शोधण्याची धडपड थांबलेली असते तेव्हाच येतो.
जरा विचार के ल्यावर आपल्या लक्षात येईल की जेव्हा के व्हा आपणास आनंद होतो तेव्हा त्या आधी ‘आता अजून काही हवे आहे’ ही भावना आपल्या मनातून गेलेली असते आणि आपले मन त्या
स्तब्धतेमध्ये विलीन होउन गेलेले असते. काय गंमत आहे बघा. जे मन सुख मिळविण्यासाठी आपणास नाना संकटातून नाचविते ते स्वतः कधीही सुखाचा उपभोग घेऊ शकत नाही (कारण त्या
प्रत्येकवेळी तो ‘मनोरुपी पटु’ फाटलेला असतो). मिठाची बाहुली अथांग सागराचा तळ शोधण्यास गेली असता स्वतःच्या अस्तित्वाच्या लोपामध्येच सत्य प्राप्त करते तशी ही गोष्ट आहे. मग परत स्वतंत्र
अस्तित्व आल्यावर त्या बिचाऱ्या मनाचा सुखाचा शोध सुरु होणारच. कारण त्याने फक् त भूतकाळात मिळालेल्या सुखाची गोष्ट ऐकलेली असते, प्रत्यक्ष काहीच अनुभवलेले नसते! आता असे बघा की
ज्यावेळी आपले मन नष्ट होते त्या प्रत्येकवेळी आपण भगवंतानजीक असतो. ही भगवंतप्राप्तीची व्याख्याच आहे असे समजा. म्हणूनच माउली आपल्या वरील अभंगामध्ये भगवंताच्या निर्गुण रुपाला
‘त्रिभुवनींचे सुख’ या नावाने पुकारत आहे. भगवंत म्हणजे के वळ सात्विक लोकांचे सुख नसून या सर्व जगातील यच्चयावत सुखांचा पाया तोच आहे हे ध्यानात घ्या. म्हणूनच संत असे म्हणतात की सर्व
विश्व एकाच भगवंताच्या ध्यासात आहे.
वरील विरहिणीमध्ये माउली म्हणत आहे: ‘या त्रिभुवनातील सर्व सुखांचा पाया असलेल्या निर्गुण भगवंताला नयनांनी प्रत्यक्ष पाहण्यासाठी दिवसरात्र माझी आस्था फोफावत आहे (१). (पंढरपुरी) विटेवर
उभा असलेल्या सांवळ्याला डोळा भरुन बघितल्याची आठवण मनात वारंवार येत आहे (२) पूर्ण भरलेल्या सागरालाही जलौघांनी पाणी आणावे असे वाटते त्याप्रमाणे तुझ्या आठवणींने पूर्ण झालेल्या
मनाने मी वाट बघत आहे की तुझी मूर्ती कु ठे दिसेल (३) (तुझ्या दर्शनाने) श्री ज्ञानदेवांना सुखाची पूर्ण प्राप्ती झाली आहे, आणि ज्याप्रमाणे रविउदयाबरोबर कमळ संपूर्णरीत्या विकसित होते त्याप्रमाणे
मतीची स्थिती झाली आहे (४).’
आपल्या मनाची दोलायमान स्थिती जेव्हा निर्गुण भगवंताच्या सान्निध्याने नष्ट होउन स्थिरता प्राप्त होते तेव्हा सुख मिळते. आणि त्यात सगुण रुपाची आस्था असणे म्हणजे पूर्ण भरलेल्या सागरामध्ये
वर्षाऋतूतील ओसंडू न वहात असलेल्या गंगेने आणलेले पाणी मिसळल्यासारखे होते. अशावेळी आपली मर्यादा न सोडता तो सागर अधिकच उचंबळून येतो आणि त्याचे रुप अधिकच भव्य होते. अगदी
त्याचप्रमाणे विठ्ठलाच्या दर्शनाने संतांच्या हृदयाला भर येतो असे माउली म्हणत आहे! जसा सागर आधीच पूर्ण होता त्याचप्रमाणे संतही अनुसंधानात संपूर्णच असतात. आणि अशा स्वरुपानुसंधानात मग्न
असलेल्या स्थितीत संतांच्या चित्ताचे अर्धवट उमलेले कमळ सुंदर असते यात शंकाच नाही. पण सगुण रुपाच्या ध्यासात ते जेव्हा संपूर्ण उमलते तेव्हा त्याचे सौंदर्य अधिकच बहरुन येते. श्री रामकृ ष्ण
परमहंस म्हणायचे की ‘स्वतः साखर होण्यात मला आनंद वाटतोच पण ती साखर चाखण्यातसुध्दा कधी कधी रस वाटतो!’. अलंकापुरीत आत्मानंदात डुंबत असणाऱ्या माउलीला पंढरपुरला जाण्याची
आस लागते ती कु ठल्या कारणाने हे इथे स्पष्ट होत आहे असे वाटते.
॥ हरि ॐ ॥
सं त ज्ञाने श्वर विराणी / विरहिणी / विरहरत्ने ९ – करुणापर आळवणी
तेव्हा लक्षात घ्या की आपण किती खडतर साधना के ली यापेक्षा आपला साधनेचा हेतू किती पवित्र आहे यावर आपली प्रगती जास्त अवलंबून आहे. आपण साधनेला सुरुवात का के ली याला फारसे
महत्व नाही. परंतु सद्गुरुं बाबत ‘व्यावहारिक अडचणींवर मात करण्यासाठी एक समर्थ शक् ति’ हाच दृष्टीकोन आयुष्यभर ठेवला तर आपली साधनेतील प्रगती एका ठराविक पातळीच्या पुढे जाणार नाही
यात शंका नाही.
काही साधक गुरुं च्या मदतीने आपल्या सुरुवातीच्या अडचणींवर मात करुन आता परत संसाराकडे बघायचे नाही असा सुनिश्चय करतात. परंतु अशा भाग्यवान साधकांमध्येही बहुतेकजण आपल्या
गुरुं कडे ‘भूतकाळात अडचणींवर मात करण्यास मदत करणारे व भविष्यात भगवंतदर्शनाचा मार्ग दाखविणारे’ या कृ तज्ञतायुक् त भावनेने बघत असतात. सकृ तदर्शनी काहीच वावगे न दिसणाऱ्या या
भावनेतूनसुध्दा वास्तविक आपण अजून संसारातून बाहेर आलेलो नाही हेच सिध्द होते हे लक्षात घ्या. त्यामुळे असे साधकही भगवंतभक् तिप्राप्तीपासून वंचित राहतात.
आता फारच विरळा साधक असे असतात की सद्गुरुं शी आपला संबंध कु ठल्या निमित्ताने आला हे पूर्ण विसरुन त्यांच्याविषयीच्या निव्वळ प्रेमापोटी त्यांच्या सान्निध्यात राहतात. ज्याप्रमाणे न चुकता
आणि विनाहेतू आपण मित्रांशी गप्पा मारायला दर संध्याकाळी नाक्यावर जातो त्याप्रमाणे ते आपली साधना नित्यपणे करतात. साधनेतून काय मिळाले, काय मिळणार आहे आहे वगैरे विचार त्यांच्या
मनातसुध्दा येत नाहीत. हे साधक सद्गुरुं बद्दलच्या प्रेमात सतत न्हाऊन आपल्यातील सर्व मनोमळांना दूर सारतात आणि ध्येयाला सहजपणे गाठतात! श्रीसंत गोंदवलेकर महाराज म्हणायचे की ‘इथे
इतके जण येतात, पण रामनामाची गोडी मनाला लावून घेऊन स्वतःचे सार्थक करुन घेणारे श्री ब्रह्मानंदांसारखे विरळाच आहेत!’ थोडक्यात सांगायचे म्हणजे ज्या साधकांचा साधनेमागील हेतू प्रेमाशिवाय
दुसरा नसतो त्यांना आणि त्यांनाच भगवंतभक् तीची प्राप्ती होते. कारण निर्हेतुक प्रेमामध्येच भगवंत आहे.
आपल्या मनात भगवंताबद्दलचे निर्मळ प्रेम उद्भवणे हीच खरी गुरुकृ पा आहे. एकदा ही कृ पा झाली की भक् त भगवंताची कशी आळवणि करतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माउलींची वरील विरहिणी
आहे. या स्थितीसाठी भगवंताच्या येण्यातच आपले सर्वस्व आहे ही भावना जागृत हवी! वरील अभंगातून माउली म्हणत आहे की: ‘हे पांडु रंगा ये रे, पांडु रंगा ये. माझी विठाई, कृ ष्णाई (ये ये तू आता ये)
(१). ज्यापासून या त्रिभुवनांची निर्मिती झालेली आहे आणि जो वैकुं ठात रहात आहे, त्या तुझ्या रुपाचाच ध्यास या मनात भरलेला आहे (२). भरजरी पीतांबर नेसून, रत्नजडित मुकु ट घालून कं बरेवर हात
ठेवलेल्या रुपात जसा आहेस तसा धावत ये (३) ज्याने आपल्या रुपाने हे विश्व पूर्ण भरलेले आहे आणि म्हणून विश्वरुप झाला आहे त्याच्या कमळधारी रुपाच्या सुंदर नयनांच्या ध्यानात श्री ज्ञानदेवांना
जीवनाचे सर्वस्व वाटू दे (हीच प्रार्थना आहे) (४).’
अहो, भगवंताबद्दल असे निर्मळ प्रेम असलेल्या साधकामध्ये आणि भगवंतात काय फरक असतो? ज्याक्षणी हे पवित्र प्रेम उद्भवते त्याचक्षणी तो आपल्यामध्ये आलेलाच आहे! म्हणूनच स्वामी विवेकानंद
जेव्हा पहिल्यांदा श्री रामकृ ष्ण परमहंसांकडे गेले तेव्हा त्यांना आपला जिवलग भेटल्यासारखा आनंद झाला आणि ‘अरे, इतके दिवस तू कु ठे होतास?’ असे म्हणून स्वामींच्या गळ्यात हात घालून त्यांनी
अश्रू ढाळले! तसे बघायला गेल्यास श्री रामकृ ष्ण परमहंसांकडे अनेक साधक सदा यायचे. परंतु त्यांची सत्संगाची भूक त्यांच्या सहवासात भरुन निघायची नाही. ते म्हणायचे ‘मी इथे रत्न, माणके द्यायला
बसलो आहे आणि माझ्याकडे हिग-जीरे विकत घेण्यात रस असणारेच येत आहेत!’ त्यातच श्रीकालीमातेने दृष्टांत देवून तुझे खरे शिष्य येणार आहेत हे दाखविलेले असल्याने त्यांची वाट बघण्यात ते अगदी
कासावीस व्हायचे. संध्याकाळ झाली की दक्षिणेश्वर मंदिराच्या छतावर जाऊन आक्रोश करायचे की ‘अजून एक दिवस गेला पण अजून तुम्ही आला का नाहीत?’ श्री रामकृ ष्णांची त्यांच्या ‘आतल्या
गोटातील’ भक् तांची अशी वाट म्हणजे बघणे भगवंताची वाट बघण्यासारखेच आहे यात शंका नाही. या पार्श्वभूमीवर जेव्हा स्वामी ठाकु रांना प्रथम भेटले तेव्हा त्यांना असा पराकोटीचा आनंद होणे
साहजिकच आहे. अर्थात, स्वामींना या पार्श्वभूमीची काहीच कल्पना नसल्याने कु ठल्या वेड्या माणसाकडे मी आलो आहे असेच वाटले! परंतु आपण बघितलेले आहेच की स्वामींना आपल्यामधील
पवित्रतेची जाणीव नसली तरी ते सत्य बदलले नव्हते! त्या सत्याच्या प्रभावानेच श्री रामकृ ष्णांना हर्षाचा अत्यावेग झाला. सद्गुरु दिसताक्षणी असा आवेग ज्यांच्या मनात येतो त्यांची साधना फळास आली
असे समजावे.
॥ हरि ॐ ॥
॥ समाप्त ॥