Professional Documents
Culture Documents
बराच घाट घाटाचा रस्ता संपून आता 4 पदरी highway आला. आता जरा गाडी ताणायला मजा येणार होती सरसकट मोकळा रोड जो जिम कॉर्बेट
च्या जंगलातून जातो. त्या रोड वरून हरिद्वार ला जातांना मधे उत्तर प्रदेश ची काही गावं लागतात. नगीना, गाझियाबाद, सुल्तानपूर, मिर्झापुर, सीतापूर,
बाजपूर, नाजीबाबद, मुरादाबाद,रामपूर म्हणजे कोअर UP.. प्रचंड दारिद्र्य, गलिच्छ वस्त्या, लोकांची बेरड नजर आणि नो ट्रॅफिक रूल्स. त्यात आम्ही
चाललो होतो त्यात महाशिवरात्र दोन दिवसावर असल्याने सगळे UP मधले लोक शंकराच्या पालख्या घेऊन हरिद्वार ला चालत चालले होते.. त्या रस्त्यावर
गाडी चालवताना ‘मिर्झापुर’, ‘झिला गाझियाबाद’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’ असे सिनेमे आठवत होते.. अगदी तेच दृश्य, भांडणं, मारामाऱ्या,
highway च्या भर रस्त्यावर डॉल्बी वाला ट्रॅक्टर रस्त्याच्या मध्ये लावून भोजपुरी गाण्यांवर उत मात.. 😄 जवळपास 80 च्या स्पीड ने जात असताना
मधेच कचकन ब्रेक मारणे.... ओव्हरटेक करत समोरून येताना मोठ्या गाड्या अंगावर घालणे आणि cars ना सर्रास कडेला दाबून किं वा वेळप्रसंगी घासून
जाणे. यामध्ये आमचे 2 वेळा मोठे accident होता होता वाचले.. के तन ची झोपच उडाली. 😀
बरं या लोकांना काही बोलताही येईना.. महाराष्ट्रात काच खाली करून दोन शिव्या हासडू न frustration बाहेर काढता येतं.. पण इकडे कोणाला
काही बोलायचं म्हणजे कट्टा, पिस्तुल, चॉपर, तलवार, कोयता,रामपुरी यापैकी कु ठल्या हत्त्याराशी गाठ पडेल काही सांगता येत नाही..
मी गाडी जरा लक्षपूर्वक चालवत होतो. एकतर दुसऱ्याच्या गाडीची जबाबदारी आपल्यावर आणि त्यात या रस्त्यांवर लोकांच्या चुकीमुळे काही राडा झाला तर
उगाच गाडीचं नुकसान नको.. वर बाचाबाची झाली तर हत्यार निघणार हे नक्की.. योगेशजींनी आधीच एक रॉड गाडीत ठेवला होता.. गरज पडली तरच
बाहेर काढा असं ते म्हणाले.. त्यांना त्या रस्त्यांची पूर्ण कल्पना होती.. पूर्वी कधीतरी तिथल्या टोल नाक्यावर एकाने गाडीला टोल मागितला तर त्या टोल
वाल्याला डायरेक्ट गोळी घातली म्हणे, असे इथले किस्से.. तेव्हापासून UP च्या या टोल वर कोणी काम करायलाच तयार नाही . तिथली फास्ट टॅग
मशीन्स पण वर्क होत नव्हती..
रस्ते मात्र इथले खूपच कमाल.. इथे labour cost स्वस्त असल्यामुळे अगदी 2 वेळचं जेवायला मिळेल या बोलीवर ही दिवसातले 18-18
तास काम करू शकतील एवढी यांची क्षमता. मी त्या बकाल, खेडेगावातल्या गजबजलेल्या रस्त्यावर सुमारे 3 तास ड्राईव्ह करत होतो.. इथे एखादा हॉर्न
जरी मारला तरी इथे लोकांना अपमान झाल्याची भावना येते.. अगदी काळजी पूर्वक आम्ही ती गावं सोडू न पुढे हरिद्वार रोड ला लागलो. हरिद्वार चं एकू ण
चित्र बघता इथे राहणं अवघड आहे हे कळून चुकलं. महाशिवरात्र आणि कुं भमेळा एकत्रच आल्याने गर्दी साहजिकच वाढली होती.
मग आम्ही थेट आधी ऋषिके श ला जायचं ठरवलं.. मुक्ते श्वर च्या हॉटेल मालकाने ऋषिके श मधल्या त्याच्या हॉटेल चा नंबर दिला होता.. ऋषिके श मधलं
सर्वात पवित्र स्थान म्हणजे तपोवन इथे त्याचं हॉटेल होतं.. पोहोचलो..
पुढच्या दिवशी आमचं ऋषिके शमधे jumping heights च्या site वर बंजी जम्पिंग booked होतं.. बापरे त्याचा तर अजून विचारही के ला
नव्हता आम्ही.. पण तो दिवस अगदी उद्यावरच येऊन ठेपला होता.. सकाळी 9.30 चं reporting होतं, बेडवर आलो आणि डोळे मिटले. पण
झोप लागेच ना सारखं 274 फू ट (८३ meter) उंचीवरून खाली उडी मारताना कसं वाटेल हा विचार मनात चालू होता.. झोप लागणं शक्य
नव्हतं..
रात्री उशिरा झोप लगली आणि डायरेक्ट 8 ला जाग आली.. आवरून निघालो.. Newzealand च्या एका jumper ने सुरू के लेली ही
site आहे. तिथे बुकिं ग कन्फर्म के लं.. त्यांनी बसायला सांगितलं.. तिथे मोठे 2 TV सेट्स होते.. Jumping चं live टेलिकास्ट होत
होतं. ते बघून संमिश्र भावना होती...
आमचं वजन आणि वैद्यकीय तपासणी झाली. मधुमेह, रक्तदाब, अस्थमा असलेल्यांना जंप करता येत नाही. वजन आमच्या हातावर लिहिलं आणि एक
फॉर्म भरून घेतला.. “जर हे adventure करताना तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर इथला crew जबाबदार राहणार नाही..” त्या फॉर्म
वर सही करताना हात थरथरत होते.. काही वेळाने आम्हाला Jumping Site वर नेलं प्रत्येकाच्या हातावर जंप नंबर घातला.. जगला वाचलात
तर हा नंबर दाखवून Video घेता येतो. पुढे एका वरांड्यात बसवलं आणि नंबर प्रमाणे बोलवू लागले..
धडधड वाढत होती.. आत्ता हे शब्दात मांडताना मजा येतीये.. पण तेव्हा शब्द फु टत नव्हता तोंडातून.. तरी मी आणि के तन उगाच जोक्स मारून
वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करत होतो.. हे कोण वेडे आहेत अश्या नजरेनी आजू बाजूची मंडळी एकदम गंभीर चेहेरे करून आमच्याकडे बघत
होती..😀
आणि ती वेळ आली जंप नंबर 41 तिथल्या मॅन नि हाक मारली.. एक क्षणात आत्तापर्यंत चं आयुष्य खटकन आठवून गेलं..घरच्यांचे वाट बघणारे चेहेरे
डोळ्यासमोर आले.. जंपिंग पॉईंट - जिथून 83 मीटर ( 273 फू ट) तुम्ही खाली उडी मारायला उभे राहणार आहात त्याच्या 3 फू ट अलीकडे एका
खुर्चीवर मला बसवलं harness, belts, bungee, ropes, clips लावून झालं. Crew एकदम भारी गप्पा मारत होता.
वातावरण हलकं करायची जबाबदारी त्यांची होती..दोन्ही पाय bungee बेल्ट ने बांधले त्याला elastic असलेला rope एका पायाला लावला
आणि मला उभं करून त्या edge वर यायला सांगितलं...
आता त्या edge वर तुम्ही आलाय खाली गंगेचा एक लहान प्रवाह वाहतोय ज्याची खोली जेम तेम ३ फू ट आहे.
तुमच्या हार्नेस ला मागून त्याने धरलंय आणि तो तुम्हाला सांगतोय “नीचे नही देखना है”
त्या दोराला आणि ज्या माणसाने तो बांधला त्याला नमस्कार के ला.. खरतर यातून काय साध्य होणार होतं कोण जाणे.. पण जस्ट एजे आपली भावना
म्हणून तसं के लं.. म्हंटल “भाऊ तुझ्यावर आहे बघ सगळं”,😀 तो मॅन हसला.
आता इथून मागे फिरणं नाही.. तुमची नजर समोरच्या पर्वत शिखरावर आहे.. हे घडतंय... त्याच्या count चा आवाज आता तुम्हाला येतोय
3...2...1 ------- आणि एक सूर मारून तुम्ही उडी मारता... सगळ्या स्थायू,घनं आणि सुरक्षित गोष्टींशी तुमचा संपर्क तुटलाय, तुम्ही खाली
पडताय.. भयंकर वारा तुमच्या के सांना कापत डोक्यात शिरतोय...मेंदू चं कार्य अचानक बंद पडलंय वाटतय, आत्महत्या करताना जसा फील येईल तसं
काहीसं... डोळे उघडेच आहेत.. 274 पैकी जवळपास 200 फू ट होईपर्यंत खाली पडताना आपल्याला पायाला दोर बांधला आहे याचं फीलिंग चं
नाहीये ..
काही वेळाने खचकन पायाला हिसका बसून परत उंच उलट्या दिशेने उसळी मारून तुम्ही वर येता.. पोटातलं पाणी हलतंय.. पोटात गोळा येतोय.. 2
ते 3 वेळा बाउंस होऊन रोप स्थिर झाल्यावर हळू हळू शांतपणे खाली यायला लागलाय.. आता मेंदूचा रक्तप्रवाह वाढलाय . तोंडातून नुसता आरडा ओरडा
आणि किं काळ्या..बाहेर येत आहेत.
खाली उभा असलेला माणूस एक मोठा Rod stand तुमच्या हातात देतो.. त्याला खेचून तो आपल्याला खाली ओढतो आणि तिथल्या कु शन वर
झोपवतो.. आहा... वेड नुसतं वेड.. आत्ता हे लिहितानाही अंगावर शहारा येतोय.
सगळी हत्यारबंदी नंतर त्याने काढली आणि मला एक badge दिला त्यावर लिहिलं होतं.. 'Yes I have got guts' प्रचंड भारी फिलिंग
होतं ते, पुढची साडे तेरा मिनिटं मी काहीच बोललो नाही गंगा नदीच्या तिथे असलेल्या प्रवाहाच्या कडेला वाहत्या पाण्याकडे बघत बसलो. येस.. हे जमलंय
आपल्याला.. आता काहीही अशक्य नाही.. त्या उडी मध्ये एक वेगळ्या प्रकारची नशा होती एक थरार होता. जगातला सगळा confidence
आपल्यात सामावला आहे असं फिलिंग होतं.
काही वेळानं आरड्या ओरड्याचा ओळखीचा आवाज आला.. के तन नं उडी मारली होती.. त्याला बघितल्यावर लक्षात आलं एवढ्या जवळून ते दृश्य कसलं
कमाल दिसतं.. त्याला ही खाली उतरवलं.. आणि तो, मी बसलो होतो त्या ठिकाणी आला आणि मग नुसता कल्ला. Complete इयत्ता 3 री
लेव्हल.😄 आरडा ओरडा, शिव्या सगळं असं लीलया बाहेर पडत होतं. सहज वर पाहिलं.. त्या वरच्या टोकावरून आपण उडी मारलीये यावर विश्वासच
बसेना.
पुढे तिथून वर जवळपास अर्ध्या तासाचा जंगल ट्रेक करून वर आलो लॉकर मधनं बॅग घेतली. फु ल्ल विजयी मुद्रा होती.. जंप नंबर दाखवून विडिओ
घेतला आणि निघालो आता आम्हाला शिवपुरी ला कॅ म्पिंग ला जायचं होतं... पुढच्या दिवशी आमचं रिव्हर राफ्टिंग चं बुकिं ग झालं होतं. आम्ही कॅ म्पिंग च्या
इथे पोहोचलो. शिवपुरी हे ऋषिके श मधलं पवित्र स्थान जवळच जंगलातून आत 4 किमी चालत गेल्यावर मूनसियारी गावाच्या वेशीवर जंगलात ऋषिके श मधलं
एक प्राचीन शिव मंदिर आहे. अतिशय खडबडीत काट्याकु ट्याचा रस्ता.. काही ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या.. उतरून तिथले दगड बाजूला करून
गाडी पुढे घातली.. काही वेळाने ती जंगलातली पायवाट लागली.. गाडी तिथेच लावून आम्ही चालत निघालो.. रुद्रधारी चा अनुभव होता पण इथे
आजूबाजूला कोणी गाईड काय चिटपाखरूही दिसत नव्हतं. तसंच जंगलात 4 किमी चालत गेलो आणि ते शिवमंदिर सापडलं.. तिथे कोणीच नव्हतं.. कोणी
पुजारीही नव्हता.. एक प्राचीन शिवलिंग..दर्शन घेऊन लगेच निघालो.
कॅ म्पिंग site कमाल होती view मस्त होता.. संध्याकाळी बुद्धीबळाचे डाव आणि सकाळी कॅ म्पिंग ला आलेल्या आजूबाजूच्या tents मधल्या मुलांना
गोळा करून क्रिके ट.
साधारण 11.30 वाजता राफ्टिंग site वरून फोन आला.. Checkout करून निघालो. सगळी हत्यारबंदी चढवून आमची राफ्ट गंगेमध्ये आली..
तो instructor पण भारी होता सगळी शिकवणी झाल्यावर राफ्टिंग सुरू झालं.. गंगेच्या प्रचंड प्रवाहातून वाट काढताना ती राफ्ट कॉन्स्टंट फु ल पॉवर
नं Carbon Paddle नि वल्लवावी लागते प्रवाह एवढा असतो की कधी कधी आपला जोर पुरत नाही..
डाव्या हाताची जखम आता चांगलीच चिघळली होती.. आधीच एवढ्या दिवसाच्या दुर्लक्षामुळे ती नाजूक झाली होती.. Paddling करत असताना ती
आणखीनच फाटली. परत रक्ताची धार.. पण त्या राफ्टिंग च्या धुंदीत पुन्हा एकदा दुर्लक्ष.. जोराच्या लाटेवर paddling करताना हाताला करंट बसत
होता. गंगेच्या खवळलेला प्रवाहातून राफ्ट जात असताना ती कधी उलटी होईल याचा नेम नाही.. प्रवाह खवळलेला असल्याने तुम्हाला पोहता येत असलं तरी
उपयोग नाही.. त्या भयावह अश्या प्रवाहात एका पॉईंट ला आमची राफ्ट त्या नावाड्याने उलटवली.
गंगेच्या त्या प्रवाहात गेल्यावर काही सुचत नाही तिथून थोडं पुढे वाहत आल्यावर परत हातपाय मारत राफ्ट पकडली.. रक्त गोठेल इतकं थंड पाणी..
नुकतंच glacier melt होऊन खाली आलेलं. तिथून आम्ही cliff jumping पॉईंट ला आलो गंगेत तिथल्या टेकडावरून उड्या मारल्या
आणि काही वेळाने किनाऱ्याला आलो तिथे एक बोर्ड बघितला वेगवेगळ्या इव्हेंट्स ना या प्रवाहातून वाहून गेलेल्या आणि बेपत्ता झालेल्यांची लिस्ट होती ती..
त्यात एक इव्हेंट रिव्हर राफ्टिंग हाही होता...आम्ही परत खच्ची.. पण एक बरं झालं कि राफ्टिंग झाल्यावर हा बोर्ड दिसला.. 😶😄
के तन ला सहज विचारलं.. उद्या करूया परत rafting? तत्क्षणी पठ्ठा हो म्हणाला..😄 आणि आम्ही पुढच्याही दिवशी इथे यायचं ठरवलं.
क्रमशः
पुणे
Ph: 9881999034
Please visit - facebook profile - 'Abhishek Shalu' for watching related photos and
videos
#himalayachyavatevar
#abhishekshalu
#travelblogger
#seriesofarticles
#Travelblog
#facebookblogger
06/05/2021, 06:44 - +91 99203 10508: हिमालयाच्या वाटेवर – लेखांक 10 वा – कुं भपर्व
पुढच्या दिवशी महाशिवरात्र होती. सकाळी पुन्हा एकदा राफ्टींग करून आम्ही हरिद्वार ला कुं भ मेळ्यातले साधू गंगेत शाही स्नान करतानाचा सोहळा बघायला
आलो. प्रचंड गर्दी होती. सगळ्या आखाड्याचे साधू,संन्यासी,अघोरी, नागा, दिगम्बर, ऋषी, संत, महात्मे, साधक आणि यती ‘हर की पोडी’ च्या
घाटावर स्नानासाठी आले होते. आम्ही व्यवस्थित मास्क आणि ग्लोव्ज अशी पूर्ण सावधगिरी बाळगून तिथे गेलो होतो. शिवरात्र, कुं भमेळा आणि त्या
यतींबरोबर महाकुं भ समारोहात गंगेत शाही स्नान.. हा एक विलक्षण योग् होता. इथली गंगा आरती म्हणजे साग्रसंगीत सोहळा असतो, त्यात महाकुं भ चालू
असल्यामुळे अजूनच प्रेक्षणीय होती. आम्हाला जरा भुके ची जाणीव झाली, पण आज उपास असल्याने तिथे बाहेर काही खाणं आम्ही टाळत होतो. तेव्हड्यात
द्रोणागीरीच्या गुहेत मिळालेल्या संत्र्याची आठवण झाली. तेच मग दोघांनी अर्ध अर्ध खाल्लं.. कमालीचं गोड होतं ते.. आश्चर्य म्हणजे त्यानंतर संध्याकाळपर्यंत
आम्हाला भुके ची जाणीव नव्हती. नंतर महाकुं भ चा तो प्रेक्षणीय सोहळा बघायला वर एका कोपऱ्यात जागा पकडली.
कुं भमेळा हा जगातला सर्वात organized mass event म्हणून ओळखला जातो.. इथलं व्यवस्थापन सुद्धा काटेकोर असतं. त्यात covid
मुळे ते आणखीन कडक होतं.. कुं भमेळा दर १२ वर्षांनी प्रयागराज, उज्जैन, नाशिक आणि हरिद्वार या चार तीर्थक्षेत्री भरतो. कलियुगात पहिल्यांदा
आठव्या शतकात आदि शंकराचार्यांनी या कुं भमेळ्यास सुरुवात के ली अशी नोंद आहे. पण कुं भ मेळा हा पुराणांमध्ये आणि उपनिषदांमध्येही नमूद के ला
असल्यामुळे त्याचा सुरु होण्याचा काळ हा खूप आधीचाहि असावा.
सूर्याभोवती भ्रमण करणारे नऊ ग्रह एका रेषेत येतात त्यावेळी सूर्याचे किरण ज्या स्थानावर पडतात तिथे कुं भमेळ्याचे औचित्य असते असे मानले जाते. शाही
स्नान हे कुं भमेळ्यातील विशेष आकर्षणाचा कें द्रबिंदू आहे. शाही स्नान म्हणजे एखाद्या विशिष्ट मुहूर्तावर तीर्थक्षेत्र स्थानी जाऊन तेथील नदीमध्ये स्नान करणे,
सूर्याला अर्घ्य देणे, नदीची पूजा करणे असे याचे स्वरूप असते. कुं भमेळ्यातील शाही स्नानात विविध आखाडे आणि त्यातील साधू यांना अग्रक्रम दिला
जातो.त्यांची विशेष शोभायात्रा निघते. त्यांचे स्नान झाल्यावर नंतर अन्य भाविक नदीत स्नान करतात. या विषयावर अशी आख्यायिका आहे की भगीरथाने
प्रयत्न करूनही गंगा नदी पृथ्वीवर अवतरण व्हायला तयार होत नव्हती. त्यावेळी तिला असे सांगितले गेले की कुं भमेळा प्रसंगी तुझ्या पाण्यात अनेक साधू
स्नान करतील. हे ऐकताच तिने पृथ्वीवर येण्याचे मान्य के ले. त्यामुळे कुं भमेळ्यात विविध आखाडे आणि साधू यांचे विशेष महत्त्व आहे.
या उत्सवात विविध साधू आणि त्यांचे आखाडे यामध्ये होम-हवन, वैदिक मंत्रांचे पठण, प्रवचने, लोकांना उपदेश करणे असे अनेक विविध उपक्रम पहायला
मिळतात. कुं भमेळ्यात सहभागी होणारे साधू त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आखाड्याचे सदस्य असतात. काही साधू स्वतंत्रपणेही सहभागी होताना दिसतात. असं
म्हणतात गेल्या 2000 वर्षाहून अधिक काळापासून प्रत्येक कुं भमेळ्यात महाअवतार बाबाजी देखील त्यांच्या शिष्यांसमवेत स्वतंत्र पणे हजेरी लावतात त्यामुळे कुं भ
मेळा हा 8 व्या शतकाच्याही आधी पासून भरत असावा असा एक अंदाज आहे.
शैव, वैष्णव, शाक्त, उदासीन, नागा, नाथपंथी, अघोरी, परी (के वळ स्त्रियांचा) किन्नर (तृतीय पंथीय सदस्य)
असे वेगवेगळे आखाडे आहेत.
परकीय सत्तांच्या आक्रमणापासून हिंदू धर्माचे, तसेच हिंदू तीर्थक्षेत्र स्थळांचे रक्षण करण्यासाठी हे आखाडे निर्माण झाले असे मानले जाते. औरंगजेबाकडू न काशी
विश्वेश्वराच्या मंदिरावर आक्रमण झाल्यानंतर हे आखाडे जास्त सक्रीय झाले. योग, तंत्र आणि त्यापासून उत्पन्न सिद्धींच्या माध्यमातून हे लोक समाज विघातक
घटकांशी युद्ध करत असतात. सैनिकांच्या समूहाप्रमाणे या आखाड्यांचे नियम, आचरण असते. कुं भमेळ्यात या सर्व आखाड्यांच्या साधूंचे विशेष आदराने स्वागत
के ले जाते. त्यांना सेवा - सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
कुं भपर्व विषयी दोन-तीन पौराणिक कथा प्रचलित आहेत. ज्यात सगळ्यात मानली जाणारी कथा म्हणजे देव-दानव द्वारा समुद्र मंथनात प्राप्त अमृत कुं भातून
अमृताचे थेंब पृथ्वीवर पडल्याचा उल्लेख आहे. या कथेप्रमाणे महर्षि दुर्वास यांच्या शापामुळे जेव्हा इंद्र आणि अन्य देवता शक्तिहीन झाल्या तेव्हा दैत्यांनी या
संधीचा फायदा घेऊन त्यांच्यावर आक्रमण करण्यास सुरवात के ली आणि त्यांना पराभूत के लं. तेव्हा सगळे देव भगवान विष्णूंकडे गेले आणि उपाय विचारला,
तेव्हा भगवान विष्णूंनी दैत्यां बरोबर तह करून क्षीरसागर मंथनाने अमृत प्राप्त करण्याचा सल्ला दिला.
तेव्हा देव आणि दैत्य दोघांमध्ये तह होऊन ते अमृताच्या मोहाने प्रयत्न करू लागले. अमृत कुं भ मिळाल्यावर इंद्रपुत्र जयंत ने तो घेऊन अवकाशात उड्डाण के ले
आणि त्यानंतर शुक्राचाऱ्यांच्या अदेशावरून दैत्यांनी १२ दिवस अविराम युद्ध के लं.
या दरम्यान पृथ्वीवर चार ठिकाणी या कलशातले अमृत थेंब पडले (प्रयाग [इलाहाबाद], हरिद्वार, उज्जैन, नाशिक) नंतर 12 दिवसांनी युद्ध शांत होऊन
विष्णूने मोहिनी रूप घेऊन त्या अमृताचं वाटप के लं. हे देवांचे 12 दिवस म्हणजे पृथ्वीवरची 12 वर्षे त्यामुळे कुं भ दर 12 वर्षांनी होण्याची प्रथा आहे.
शिवाय एकू ण कुं भ 12 ठिकाणी होतात ज्यातली 4 ठिकाणं पृथ्वीवर आहेत तर उरलेली 8 ठिकाणं ही देव लोकात आहेत जिथे मानवाची पोहोच नाही.
ज्या वर्षी सूर्य चंद्र आणि बृहस्पती या ग्रहांचा कुं भ राशीत प्रवेश होऊन संयोग होतो त्या वर्षी जिथे जिथे अमृताचे थेंब पडले तिथे कुं भ पर्व भरते अशी हि
कथा .
इथे एक मात्र लक्षात आलं, कुं भमेळ्यातले साधू सोडू न इथे मंदिरात सेवा करणारे सेवेकरी किं वा स्वयंघोषित पंडित/पुजारी लोक देवाच्या नावाखाली प्रचंड काळा
बाजार करत आहेत.. बघून वाईट वाटलं.. सगळे इथे देवाच्या नावाने पैसे उकळायला बसलेत.. ‘देऊळ’ सिनेमा आठवला..
हर की पोडी च्या रस्त्यावरून जाताना अचानक एक मनुष्य माझ्याजवळ येऊन मला म्हणाला होता “आप अगर स्नान करने जा रहे हो तो ये १२१
रुपये दान पेटी मे डाल देना..” आम्ही ते पैसे घेऊन घाटावर आलो. गंगा पूजा के ली,आरती झाली आणि गंगा मंदिर आणि हरी की पोडी च्या दर्शना
आधी आम्ही गंगेत एक डु बकी मारायचं ठरवलं, तेवढ्यात त्या माणसाने दिलेल्या पैशाची आठवण झाली. तिथे securty गन मॅन ला आम्ही इथे
दानपेटी विचारली.. म्हणाला “दान पेटी मे मत डालो.. किसीं गरीब को दो.. दुआ लगेगी, दानपेटी के पैसे निकाल निकाल कर ये trustee लोग
स्कॉर्पिओ मे घुम रहे है..” त्याच्या बोलण्यात कळकळ होती. तेवढ्यात तिथे एक लहान मुलगी आम्हाला गंध लावायला आली तिच्या हातात मी ते पैसे
ठेवले.. पटकन तिच्या चेहेऱ्यावर अनपेक्षित हास्य उमटलं. तिच्या चेहेर्यावरचा तो आनंद अवर्णनीय होता.. त्या एवढ्याश्या लहान मुलीने गन्ध लावून आमच्या
डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि निघून गेली.. नंतर ती आम्हाला कु ठेच दिसली नाही..
अजूनही तो डोक्यावरचा हात आठवला की शहारा येतो. साक्षात गंगामाई चे त्या कु मारिके च्या रुपातले आशीर्वाद या भावनेने त्या security गार्ड चे
आभार मानून आम्ही निघालो. गंगेत स्नान के लं, गंगा मंदिर आणि विष्णू मंदिरात दर्शन घेतलं आणि परत ऋषिके श साठी निघालो.. रात्री साधारण १०
वाजता पोहोचलो..
पुढच्या दिवशी सकाळी आम्ही निलकं ठेश्वर महादेव मंदिराकडे निघालो. हेच ते ठिकाण जिथे भगवान शंकराने हलाहल विष प्राशन के लं.. अतिशय जागृत
देवस्थान आहे, उंच टेकडीवर हे मंदिर आहे.. अलीकडे गाडी लावून बरच चालत जावं लागतं. उत्तम दर्शन झालं तिथून पुढे मौनी बाबांची कु टी आहे तिथे
दर्शनाला गेलो. वेगळंच वाटलं. हे बाबा अनेक वर्षे इथे तपस्या करतात, कोणाशी कधीच बोलत नाहीत.. तिथून निघालो पुढे ऋषिके श मधल्या तपोवनात
असलेल्या काही आश्रमांना भेट दिली.. ओशो आश्रम, प्रभू राम तपस्थळी, शिवानंद आणि दयानंद आश्रम, हिमालयन योग आश्रम आणि त्रिवेणी घाट
करून परमार्थ निके तन घाटावर परत गंगा आरती साठी आलो.. आरती संपल्यावर आम्ही पायीच ऋषीके श च्या मार्के ट मधून गाडीपाशी आलो आणि आमच्या
हॉटेल मध्ये जाण्यासाठी निघालो. पुढच्या दिवशी आम्हाला रुद्रपूर गाठायचं होतं..
क्रमशः
पुणे
Ph: 9881999034
Please visit - facebook profile - 'Abhishek Shalu' for watching related photos and
videos
#himalayachyavatevar
#abhishekshalu
#travelblogger
#seriesofarticles
#Travelblog
#facebookblogger
06/05/2021, 06:44 - +91 99203 10508: हिमालयाच्या वाटेवर – लेखांक 11 वा आणि शेवटचा
'दिव्यस्मृतींची भैरवी'
आज सकाळी लवकर उठू न आम्ही रुद्रपुर ला जायला निघालो.. परत 9 तासांच ड्राइव्ह होतं. यावेळी आम्ही राजाजी नॅशनल पार्क च्या जंगलातल्या
रस्त्यातून आलो. तिथून येताना एक प्रचंड मोठा पिसारा फु लवलेला मोर...दिसला आहा.. कमाल.. बरं झालं हा रस्ता धरला.. ट्रीप संपता संपता
मिळालेली याहून दुसरी मेजवानी नव्हती. परत ती उत्तर प्रदेशातली गावं पार करत साधारण संध्याकाळी 6 ला रुद्रपूर ला पोहोचलो..
टाकी फु ल्ल करून गाडी आतून बाहेरून वॉशिंग सेन्टर वर क्लीन के ली. सुदैवाने कु ठेही scratches गेले नव्हते. 7 वाजता Bhawana Lamba
म्हणजे माझ्या मावस बहिणीच्या घरी आलो.. आणि लगेच जिम कॉर्बेट साठी निघालो. पुढच्या दिवशी सकाळी 6 वाजता जंगल सफारी आधीच बुक के ली
होती.. आता आमच्याबरोबर योगेशजी पण होते.. गाडी त्यांनीच घेतली 11 वाजता कॉर्बेट किं ग्डम नावाच्या हॉटेल मध्ये check in के लं. पुढच्या
दिवशी सकाळी 6 ला जिप्सी आली. त्यानंतर पुढचे 3 तास मोर,काळवीट,ससे,कोल्हे, हरणं, रान मांजर, हत्ती आणि असंख्य प्रकारचे पक्षी पाहून आम्ही
door 3 जवळ वाघाचं नुकतंच sighting झालेल्या ठिकाणी आलो.. तिथे अनेक गाड्या आधीच उभ्या होत्या... वाघ जवळपास असेल तर
माकड एक वेगळ्या प्रकारची आरोळी देतं.. तो आवाज त्या दिशेने येत होता.. माझा canon 80D तयारच होता ते दृश्य टिपायला. जवळ जवळ
जास्तीचा एक तास आम्ही तिथे थांबलो पण वाघ काही दिसला नाही..😀 सगळेच प्रवास हे एवढेही परिपूर्ण होत नसतात.. त्यात काहीतरी राहून जातंच..
तसं व्याघ्रदर्शन, ज्या साठी आम्ही जिम कॉर्बेट ला आलो होतो ते राहूनच गेलं. आम्ही निघालो.. रूम वर जाऊन फ्रे श होऊन चेक आऊट के लं आणि
पुढे रामनगर आणि काठगोदाम जवळ असलेलं हनुमान धाम, काली मंदिर, काळ भैरव, मानसा देवी करून रुद्रपूर ला आलो. संध्याकाळी बहिणीने मांडवी
पद्धतीची डाल बाटी करून खाऊ घातली.. आणि 10 वाजताच्या रानीखेत एक्सप्रेस ने दिल्ली ला यायला निघालो. पुढच्या दिवशी सकाळी 10 ला पुण्याला
येणारी flight होती. सकाळी 5 ला दिल्लीत पोहोचलो. मेट्रो ने एअरपोर्ट वर आलो आणि 16 तारखेला दुपारी 12.30 वाजता पुण्यात
पोहोचलो..
ही ट्रिप आठवताना, मागे वळून बघताना विचार के ला कि ध्यानीमनी नसताना आपण इथे का आणि कसे आलो? एक पुस्तक वाचून एव्हडं व्हावं? पण खरं
सांगू.. कु ठल्याही गोष्टी या घडणार असतील तर त्या कशाही आणि कु ठेही घडतात. त्यांना काळ स्थळ आणि वेळेचं बंधन नसतं.. एखाद्या ठिकाणी जायला
मिळणं हे देखील प्रारब्धात असावं लागतं.. तिथून बोलावणं यावं लागतं.. नशिबात असावं लागतं.. काही योगायोग असावे लागतात.
हा विषय मी के तन शी बोलत असताना तो म्हणाला “तुला तरी ते पुस्तक वाचून यावसं वाटलं, मी तर या जन्मात कधी विचारही के ला नव्हता या गोष्टी,
ही ठिकाणं हे अनुभव आयुष्यात कधी माझ्या वाट्याला येतील. तू म्हणालास आणि आंधळेपणाने मी तुझ्या मागे आलो.”
काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला कोणीतरी निमित्त व्हावं लागतं. ते निमित्त एखादी व्यक्ती असो किं वा एखादी घटना. आपल्या पूर्व प्रारब्धात जर एखादी
गोष्ट लिहिली असेल तर ते निमित्त चं आपल्याला त्या ठिकाणा पर्यंत पोहोचवतं. आणि आपण विचार करत बसतो की एखादी अशक्यप्राय गोष्ट आपल्या
ध्यानीमनी नसताना आपल्या आयुष्यात घडली तरी कशी.
योगेशजी पण म्हणाले “जो जो तै किया था उससे ज्यादाही देखा आपने.. हर बार यहा पे खराब मौसम की वजह से आए हुए लोग, जीस जगह जाना
है वहा नही पाहोच पाते.. और पिछ्ले महिने जो हिम पहाडो के पिघलनेसे हुए अति बहाव के कारण नुकसान हुआ, वैसे तो अक्सर होता ही रेहता
है |”
ऐकू न त्या द्रोणागिरीच्या यतींचे शब्द आठवले "मन की ताकद क्या होती है? जो आपसे असाध्य भी साध्य करवा ले. मन से अगर वहा पोहोच गये तो
शरीर अपने आप वहा जाने की क्षमता बना लेता है | और ये प्रकृ ती भी वह अनुभव से आपको रूबरू कराने कि पुरी शिद्दत से कोशिश करती है”|
काही जागा / ठिकाणं ही मनाला वेगळीच भुरळ पाडतात. त्या जागा नवीन असतील तरी कित्येक जन्मांची ओळख सांगून जातात.. तिथून पायच निघत
नाही. खरं सांगायचं तर तिथून परत पुण्याला यायची माझी इच्छाच नव्हती.. ती जागा आता इतकी डोक्यात बसलीये की ठरवलं तर पुढचं सगळं आयुष्य
मला इथे राहून जगायला आवडेल..
या अशा ट्रिप्स खूप भारी असतात त्या तुम्हाला तुमची स्वतःची ओळख नव्याने करून देतात. त्या तुमच्यातला ‘स्व’ शोधायला तुम्हाला मदत करतात. वेळ
प्रसंगी तुमची कु वत किं वा लायकीही दाखवून तुम्हाला जमिनीवर आणतात. आणि काही प्रसंगी तुमच्यातल्या क्षमता पडताळायला ही मदत करतात. माझ्यासाठी हा
प्रवास हा माझ्या आयुष्यातला दृष्टीकोन बदलण्याच्या बाबतीतला Turning Point वाटतो.. प्रत्येक माणसाने कधीतरी असा प्रवास करावा. रोजच्या 9
ते 6 च्या रुटीन मधून बाहेर पडू न कधीतरी उघड्या डोळ्याने हे जग बघावं. माणसं अनुभवावीत. कदाचित हे असे प्रवास तुम्हाला तुमच्या आयुष्याचा,
जन्माचा हेतू ही सांगून जातील... कोण जाणे.
आज इथे या प्रवासाची समाप्ती झाली. जी कदाचित पुढच्या कोणत्यातरी नवीन प्रवासाची सुरवात असेल. या लेखमालेचाही आज शेवट होत आहे त्यानिमित्ताने
तुमच्याबरोबर संवाद साधायचा आहे.. मुळात मी काही लेखक वैगेरे नाहीये त्यामुळे हे जे काही माझ्याकडू न लिखाण झालं त्याला मी अनुभव कथन म्हणीन..
पण ते लिहिण्याचं कर्तेपण मला घ्यायचं नाहीये.. कारण ज्या माणसाने आयुष्यात ‘अवांतर लिखाण’ या श्रेणीमधे उत्तरपत्रिके तल्या निबंधाशिवाय काही
लिहिलं नाही अश्या माणसाकडू न हे लिहिलं गेलंय. ते लिहून घेतलं गेलंय.. मी फक्त कृ ती के लीये.. त्यामुळे ते अद्वैताचं आहे..
अजिबातच अध्यात्माचा धार्मिकतेचा गंध नसलेल्या माझ्यासारख्या माणसाला हे अनुभव का यावेत हे अजूनही मला उलगडलं नाहीये..
खरंतर हे सगळं लिहून फे सबुक वर पोस्ट करायचा माझा अजिबात विचार नव्हता.. बरेच जणांनी सल्ले दिले “आपले अनुभव हे आपले असतात. ते असे
चार चौघात सांगू नयेत.. कारण अनुभवलेल्या गोष्टी इतक्या अनाकलनीय आहेत की कोण कसा अर्थ काढेल माहीत नाही..” पण शेवटी मनातल्या वेड्या
पीराने उचल खाल्ली आणि न राहवून हे पोस्ट के लंच.. असा विचार मनात आला की हे सगळं वाचून एक जरी मनुष्य उठू न उत्तराखंड ला गेला किं वा
अगदी तिथे नं जातही एकाला जरी असं वाटलं की चाकोरी मधलं 9 ते 6 चं आयुष्य बाजूला ठेऊन एकदातरी आपल्याला मिळालेल्या मनुष्य जन्माचं कारण
किं वा साध्य शोधावं, तर या लेखनाचं सार्थक होईल..
माझा एक विश्वास आहे, कोणतीही गोष्ट ही आपल्या आयुष्यात कारणाशिवाय घडत नसते.. आम्ही तिथे का गेलो? अतिशय अवघड आणि अशक्य
रस्त्यांवरून जवळपास 1300 किमी ड्राईव्ह करायची क्षमता कशी आली? द्रोणागिरीच्या त्या गुहेत अष्टसात्विक भाव का जागृत झाले? तिथे ते यती का
भेटले..? त्यांच्याकडचं ते गूढ अगाध ज्ञानामृत त्यांनी आम्हाला का दिलं? जी ठिकाणं ठरवली नव्हती ती ठिकाणं आम्ही कशी आणि का बघितली..?
द्रोणागिरीच्या जंगलातले भर पावसातले ते अतर्क्य अनुभव का आले? अनेक मित्र सोडू न फक्त के तन ला बरोबर घेऊन जाण्याची बुद्धी मला का झाली? आणि
त्यालाही हो म्हणायची बुद्धी कशी व्हावी? नैनिताल च्या पार्किं ग चा तो खांब कसा आपोआप उखडू न पडला? जिथे गेली 8 महिने कोणी फिरकलं नव्हतं त्या
महावतार बाबाजीं च्या गुहेत ते संत्र्याचं फळ कसं आलं? रुद्रधारा च्या निर्मनुष्य भयाण जंगलात चुकलेल्या वाटेवर अनपेक्षितपणे तो माणूस भेटू न त्याने आम्हाला
वाट कशी दाखवली? हिमालयाच्या पर्वत रांगा बघताना डोळ्याला पाण्याची धार का लागली?ऋषिके श च्या बंजी जम्पिंग वेळी 273 फू ट खाली उडी मारायचं
धाडस कसं झालं? गंगा काठी त्या छोट्याश्या कु मारिके ने चौड्यावर उभं राहून आमच्या डोक्यावर हात ठेउन आशीर्वाद का दिला? आणि ज्या माणसाला
उत्तरपत्रिके तल्या निबंध लेखना व्यतीरिक्त लेखनाचा अनुभव ही नाही अश्याकडू न हे संपूर्ण प्रवास वर्णन कसं लिहिलं गेलं? या सगळ्या अनाकलनीय प्रश्नांची
उत्तरं आता शोधतोय. या सगळ्या गोष्टी कारणाशिवाय घडल्या नाहीत हे नक्कीच.. ते कारण आता शोधतोय.. सगळ्या गोष्टी पुन्हा revisit करून
डॉट्स कनेक्ट करायचा प्रयत्न करतोय.
या प्रवासातून एक नक्की शिकायला मिळालं - की श्रद्धा,भक्ती या नंतरच्या गोष्टी आहेत.. या सगळ्या ची मूळ मेख वेगळीच आहे.. आणि ती म्हणजे
'विश्वास'
या लेखांचं कर्ते पण मी घेणार नाही. कारण ते अद्वैताचं आहे. आपण फक्त ओझ्याचे बैल आहोत..कर्ता करविता वेगळाच आहे.. अक्षरशः एका बैठकीत हे
सगळं लिहून घेतलं गेलंय.. या लेखांमध्ये जे चांगलं लिखाण झालं असेल ते स्वामीसमर्थ आणि शंकर महाराजांमुळे, जर काही चुकलं असेल किं वा गडबडलं
तर ते माझ्यामुळे.. शंकर महाराज नेहमी म्हणायचे - “माणसातला 'मी' मेला पाहिजे..”
तसाच.... माझ्यातला 'मी' मरायची वाट बघणारा मी
पुणे
Ph: 9881999034
Please visit - facebook profile - 'Abhishek Shalu' - for watching related photos
and videos
#himalayachyavatevar
#abhishekshalu
#travelblogger
#seriesofarticles
#travelblog
#facebookblogger
*समाप्त*
06/05/2021, 13:17 - +91 99203 10508: *मी तुम्हाला पुढील 19000 हिंदी व्हिडियो गाणी पाठवत आहे खरच ज्याने ही साईड
बनवली त्याची आणि तंत्रज्ञानाची कमाल आहे . खालील साईटवर क्लिक करा आणि व्हिडियो गाणी,गझलचा आनंद घ्या.*
*S P Balasubramaniam(119)*
<http://www.hindigeetmala.net/singer/s_p_balasubramaniam.php>
*Pl forward to all those who love or like listening to Hindi songs...🎵🎵🎵
Enjoy...🎵🎵🎵*
07/05/2021, 07:30 - +91 99203 10508: नागझिरा जंगलात चारशे दिवस किरण पुरंदरे अवश्य पहावा असा व्हिडिओ. वेळ काढू न
जरूर पहा.
07/05/2021, 07:30 - +91 99203 10508: <Media omitted>
07/05/2021, 10:18 - +91 99203 10508: कोरोना मूळे आज दारू सोडू न 12 महीने पूर्ण झाले...
रोज सकाळी दहा किलोमीटर वेगात पळणे आणि मग कमीत कमी तीस मिनिटं योगासनं करणं हे रूटीन झालं आहे..
ना चहा, ना कॉफी....
आता फक्त....
👇
सर्वप्रथम ही धनगरी घोंगडी कशी तयार होते यांच्या बद्दल थोडसं जाणून घेऊ…!
गावच्या किं वा रानामाळाच्या ठिकाणी तलाव, नदी, नाले, अशा ठिकाणी मेंढ्यांना स्वच्छ धुतलं जातं. नंतर स्वछ ठिकाणी त्यांच्या अंगावरील लोकर कातरली
जाते. कातरलेली लोकर पिंजुन त्यातील काळी-पांढरी लोकर वेगळी के ली जाते. त्यानंतर चरख्यावर लोकरीपासून सूत कातलं जातं. सुताला चांगला
पीळ,मजबुती यावी आणि घोंगडी विणायला सोपं जावं यासाठी त्याला रात्रभर भिजवलेल्या चिंचोक्यांच्या खळीमदे भिजत ठेवलं जातं. त्यामध्ये हळद आणि
आयुर्वेदिक वनस्पतींचा अर्क मिसळला जातो. साधारणपणे एक घोंगडी विणायला दोन ते तीन दिवस लागतात. पूर्वी १२ फू ट लांबीची घोंगडी विणली जात
असे, पण आता मात्र आपल्या मागणीनुसार हवी अशी बनवून दिली जाते. सर्वसाधारणपणे एक घोंगडी विणायला ३ ते ४ किलो लोकर लागते.. मेंढ्यांच्याच
लोकरीपासून घोंगडी का बनवली जाते असे प्रश्न बर्याचदा आपल्या पडत असतील तर तर त्याचे उत्तर म्हणजे मानवी जीवनात घोंगडी हि एक औषधी आहे!
पाठदुखी, कं बरदुखी, वात, सांधेदुखीमध्ये यांपासून आराम मिळतो. यामध्ये जेण (घोंगडीचाच एक जाड प्रकार) वापरणे जास्त योग्य ठरते.
झोप येत नसणार्यांसाठी तर हे एक उत्तम औषधच आहे घोंगडीवर झोपल्याने शांत झोप लागते.
घोंडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकू ण जवळ येत नाहीत.
▫ *वकीलाची पत्नी* :- आम्ही बायकांंनीच, सकाळ- संध्याकाळ राबून, स्वयंपाक करून तुम्हाला जेवायला घालायचे, असें कु ठल्या कायद्यात आहे
...?
▫ *वकील* :- घटनेत लिहीलेले आहे, प्रत्येक *कै द्याला जेवण* देणे बंधनकारक आहे.
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
09/05/2021, 12:50 - माणिक राज शिंगे: 😄😄
10/05/2021, 17:44 - +91 99203 10508: <Media omitted>
10/05/2021, 18:58 - माणिक राज शिंगे: 😂
11/05/2021, 20:26 - +91 99203 10508: कालच "मदर्स डे" साजरा झाला आणि आज आईची खूप आठवण आली.
मी लहान असताना कु ठल्याही बाईने माझं कौतुक के लं की आई तिला म्हणायची "चार दिवस ठेवून बघा तुमच्याकडे, मग कळेल"
आज बायकोची मैत्रीण घरी आली होती. मला घरकाम करताना पाहून म्हणाली "कित्ती चांगले आहेत गं तुझे मिस्टर"
*🌞12/05/2021*
️*'
️ लोकमत'आजचे ई-वर्तमानपत्र*
https://chawadimitra.in/?p=87
️*'
️ लोकसत्ता'आजचे ई-वर्तमानपत्र*
https://chawadimitra.in/?p=95
️*'
️ दिव्य मराठी'आजचे ई-वर्तमानपत्र*
https://chawadimitra.in/?p=113
️*'
️ महाराष्ट्र टाईम्स'आजचे ई-वर्तमानपत्र*
https://chawadimitra.in/?p=107
️*'
️ देशोन्नती'आजचे ई-वर्तमानपत्र*
https://chawadimitra.in/?p=104
️*'
️ पुण्य नगरी'आजचे ई-वर्तमानपत्र*
https://chawadimitra.in/?p=101
तिसरा डोस जास्त स्ट्राँग होता.!!! 😷
♂️
♂️
😃😃😃😃😃
️13/05/2021, 07:35 - +91 99203 10508: *️चावडीमित्र ई-वाचनालय️
️ ️*
*🌞13/05/2021*
️ ️ लोकमत'आजचे ई-वर्तमानपत्र*
*'
https://chawadimitra.in/?p=87
️*'
️ लोकसत्ता'आजचे ई-वर्तमानपत्र*
https://chawadimitra.in/?p=95
️*'
️ दिव्य मराठी'आजचे ई-वर्तमानपत्र*
https://chawadimitra.in/?p=113
️*'
️ महाराष्ट्र टाईम्स'आजचे ई-वर्तमानपत्र*
https://chawadimitra.in/?p=107
️*'
️ देशोन्नती'आजचे ई-वर्तमानपत्र*
https://chawadimitra.in/?p=104
️*'
️ पुण्य नगरी'आजचे ई-वर्तमानपत्र*
https://chawadimitra.in/?p=101
😃😁😆
14/05/2021, 22:22 - माणिक राज शिंगे: 😛
16/05/2021, 09:37 - +91 99203 10508: "आमचं लेकरू हुशार आहे पण जरा अभ्यासात कमी आहे", अशा वाक्याला बरेच जण
अजुनही हसतात.
शाळेच्या अभ्यासात कमी आहे किं वा परीक्षेत फार मार्क्स मिळत नाहीत, तर ती व्यक्ती 'बुद्धीमान' नाही हा आपल्याकडे एक खूप मोठा गैरसमज आहे.
खरंतर गार्डनर (Howard Gardner) या मानसशास्त्रज्ञाने ही समजूत कशी ठार चूकीची आहे हे सांगितलंय. त्याने बुद्धीमत्तेचे मुख्य आठ प्रकार
पाडले. कु ठल्याही व्यक्तीमध्ये या आठ प्रकारांपैकी एक किं वा अधिक बुद्धिमत्तांचं कमी-अधिक प्रमाण असतं, असं त्याचं त्याचं मत होतं.
5. Musical Intelligence :
चाल, धून, ताल वगैरे लक्षात राहणं, वाद्यांबद्दल आवड असणं, लवकर नवीन गाणी किं वा विविध वाद्यं शिकता येणं या सगळ्या गोष्टी म्हणजे सांगीतिक
बुद्धीमत्ता होय.
गायक, संगीतकार, कं पोझर वगैरे मंडळी यात येतात.
6. Interpersonal Intelligence :
लोकांशी संवाद साधता येणं, लोकांच्या भावना समजून घेता येणं, त्यानुसार स्वतःच्या वागण्यात बदल करून घेणं, मित्रमंडळी बनवता येणं, त्यांना जपणं,
कु ठे कसं वागावं हे समजणं, वाद सोडवणं हे सगळं यात येतं. मानसशास्त्रज्ञ, टीम लिडर, काऊन्सीलर, सेल्सपर्सन, राजकारणी माणसं वगैरे .
7. Intrapersonal Intelligence :
हे वरच्या प्रकारच्या उलट. हे स्वतःमध्ये हरवलेले असतात. यांना स्वतःच्या विश्वात दंग राहायला आवडतं. स्वतःचे strengths आणि
weaknesses यांना माहिती असतात. नवनवीन कल्पना ते मांडतात (पण मोस्टली मनातल्या मनात 😅). विचारवंत, वैज्ञानिक, लेखक अशी माणसंं
या प्रकारची बुद्धीमान असतात.
8. Naturalistic Intelligence :
हा प्रकार त्याने जरा उशीरा मांडला. काही लोकांना निसर्ग आवडत असतो. पक्षी, जंगलं, समुद्र, डोंगर, जैवविविधता अशा सगळ्या गोष्टींचे ते चाहते
असतात. शहरात फार मन लागत नाही, खेड्याकडे जाऊन मोकळ्या आभाळाखाली चांदण्यात झोपणंं फार आवडत असतं. पर्यावरणतज्ज्ञ, जीवशास्त्रज्ञ,
निसर्गप्रेमी, पक्षीप्रेमी वगैरे सगळे लोक यात येतात.
अशा प्रकारे आपली एक बुद्धीमत्ता ओळखली आणि त्यानुसार आपल्या जीवनाची दिशा ठरवली तर आनंदमय होईल सगळं भविष्य. एकापेक्षा जास्त बुद्धीमत्ता
असल्यास उत्तमच, मग अशा वेळी भविष्याचा स्कोप अजुन मोठा होतो.
आपल्या शालेय वयात ज्या बॅक बेंचर्सना आपण अभ्यासामुळे, कमी मार्क्स मुळे हलक्यात घेतो ते लोक कसले भारी खेळाडू , कलाकार असतात हे जरा
आठवा. आपल्या एकू णच बोगस शिक्षणव्यवस्थेमुळे कितीतरी लोक depression, न्यूनगंडामध्ये गेले असतील हे सुद्धा आठवा.
त्यामुळे इंटरनेट वर अलरेडी उपलब्ध असलेली ही माहिती सोप्या शब्दांत इथे मांडण्याचा प्रयत्न करतोय. वाचकांपैकी कोणाचा फायदा झाला तर मला आनंदच
होईल 🖤
*मैत्रिणी ला लागतोय...*
17/05/2021, 22:42 - +91 99203 10508: <Media omitted>
18/05/2021, 22:44 - +91 99203 10508: <Media omitted>
18/05/2021, 22:44 - +91 99203 10508: <Media omitted>
18/05/2021, 23:07 - माणिक राज शिंगे: 😄
19/05/2021, 12:42 - +91 99203 10508: <Media omitted>
19/05/2021, 12:49 - +91 99203 10508: <Media omitted>
19/05/2021, 12:59 - माणिक ♀️
राज शिंगे: 😄
19/05/2021, 14:01 - +91 99203 10508: <Media omitted>
19/05/2021, 14:22 - माणिक राज शिंगे: 👏😄😄😂😂
19/05/2021, 14:28 - +91 99203 10508: *Power of music!*
माझं आणि बायकोचे जोरात भांडण चालू होतं! बायको चिडू न चिडू न माझा उद्धार करत होती!
जादुची कांडी फिरवल्यासारखी बायको शांत झाली..... बाल्कनीचं दारं आपटलं .... आणि किचन मधुन चहा भजी😋 घेऊन आली!
1. खूप भूक लागते. चिकन खाण्याची प्रचंड इच्छा होते. झोमॅटो-स्वीगीवर बिर्याणी/कोरमा ऑर्डर करण्यासाठी हात शिवशिवतात. अळू, मेथी, पालक
इत्यादी भाज्यांचं नाव जरी काढलं, तरी ओकारीसारखं होतं.
2. कधीही चहा-कॉफी घ्यावीशी वाटते. आपण मागितल्यानंतर करून नं देणाऱ्या व्यक्तीचा खूप राग येतो.
3. रोज झोपेतून उठल्यानंतर एक बाई आपलं नाव खूप कर्क श्शपणे उच्चारते आहे, असा भास होतो. थोड्यावेळाने कळतं की तो भास नाही. शिवाय ती
बाई आपली बायको आहे, ह्याचीही जाणीव होते.
4. साधं अन्न खा, आवळा, तुळस, कडु लिंब इत्यादी खाऊन इम्युनिटी वाढवा, वगैरे सल्ले देणाऱ्यांना जमिनीखाली वीस फू ट पुरण्याची इच्छा होते.
5. चादरीची घडी कर, असं कोणी सांगितलं की प्रचंड अशक्तपणा येतो. फोनची बॅटरी संपत आल्यावर चार्जर शोधताना मात्र अशक्तपणा आपोआप पळून
जातो