Professional Documents
Culture Documents
सहयाद्रीच्या पाऊलखुणा - - - राजा हरिश्चंद्र आणि राणी तारामती यांचा "किल्ले हरिश्चंद्रगड"... - -
सहयाद्रीच्या पाऊलखुणा - - - राजा हरिश्चंद्र आणि राणी तारामती यांचा "किल्ले हरिश्चंद्रगड"... - -
पाचनई हा अपभ्रंश
आहे पाच नद्यांचा, या पाच नद्यांना कोणतीही नावे नाहीत, त्या अनामिकच आहेत. गावाच्या
उत्तर
बाजूस समोरच्या उभ्या असलेल्या आडव्या कड्यावरून आणि त्याच्या समोर असलेल्या
गायरान कड्यावरून एकू ण ५ नद्यांचा
उगम होतो ज्या धबधब्यांच्या स्वरुपात खाली
कोसळतात, अर्थातच पावसाळ्यात. त्या पाच नद्या सपाटीवर येवून एकत्र येतात
आणि पुढचा
प्रवास करतात. त्या पाच नद्यांचे उगमस्थान म्हणजेच पाचनई होय. याच गावाच्या शिवारातून
किल्ल्यासाठी एक वाट
जाते, तीच ती वाट म्हणजे पाचनईची वाट...
दोन-तीन भिडूंनी
बालेकिल्ल्यावर न जाता खालीच थांबण्याचा निर्णय घेतला. त्यांना तिथं एका सुरक्षित
जागी सोडून
इतरांनी बालेकिल्ल्याची वाट धरली, वाट अशी कसली नाहीच मुळी. आपण जिथून
जाऊ शकू तीच वाट. आमच्यातील दोन
भिडूंच्या पायाचे स्नायू आखडले , त्यांना व्यायाम
दिला आणि पुढे नेले . अर्ध्या तासाच्या रग्गड चालीने आम्ही बालेकिल्ला गाठला,
त्याअगोदर संपूर्ण पडझड झालेली तटबंदी दिसली, तटबंदीचे दगड इतके आखीव-रेखीव की जे
आजच्या अभियांत्रिकीला
लाजवतील असे. किल्ल्याच्या सुरवातीला एक पाण्याचे टाके
बुजलेल्या अवस्थेत आहे परंतु तिथलं पाणी पिण्यायोग्य आहे.
सुरुवातीला कोणीही पाणी
प्यायचे धाडस के ले नाही. अजून थोडसं पुढ गेल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या
भग्नावस्थेतील इमारतीत
प्रवेश करतो. सुरुवातीला एक पाण्याचे टाके आहे, ज्यातील
पाणी आता पिण्यायोग्य राहिलेलं नाहीये. त्याकाळच्या जीवनशैलीच्या
खाणाखुनांमधील एक
दगडी जाते तुटलेल्या अवस्थेत सापडले , ते सगळे एकत्र करून त्यास मूर्त स्वरूप
देण्याचा एक प्रयत्न के ला.
समोरच एका दगडी चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची
सिंहासनाधिस्त मूर्ती बसवलेली आहे, आता एकच महाराजांच्या
समोर नतमस्तक झालो आणि
मनोमन महाराजांचे आशीर्वाद घेतले . एक वेगळं काहीतरी साध्य के ल्याचा अनुभव आला.
बालेकिल्ल्याच्या पश्चिम बाजूस गेले असता विस्तीर्ण पसरलेली
सह्याद्रीची विशाल आणि रौद्र पर्वतरांग नजरेस पडते, हे दृष्य
पाहणे म्हणजे
स्वर्गस्थ अनुभवच हो!! खालच्या बाजूला पिंपळगाव जोगा धरण, त्याच्या उजवीकडील बाजूस
संपूर्ण माळशेज
घाटरस्ता आणि त्याच्याच मागील रांगेत नानाचा अंगठा आणि किल्ले जीवधन
व नाणेघाट सुस्पष्ट दिसत होते तसेच शिवनेरी,
हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, नानाचा अंगठा, गोरखगड, मच्छिंद्रगड, सिद्धगड, माहुली, कलाडगड, भैरवगड-मोरोशी, तसेच
भैरवगड-शिरपुंजे आणि कुं जरगड असे किल्ले
दिसतात. खिरेश्वर गाव आणि पडलिंगी नेढ समोरच दिसते. आता
किल्ला आणि
आजूबाजूचा परिसर पाहून झाला होता, थकवा कु ठच्याकु ठे गायब झाला होता.
बालेकिल्ल्यावरून उजव्या बाजूस अजून एक उंच
शिखर दिसते ते म्हणजे तारामती शिखर,
आता उत्सुकता होती ते सर करण्याची.
बालेकिल्ला पाहून झाला होता, आता पोटात भुके चा आगडोंब उसळायला
लागला होता. गड उतरून परत काहीतरी
खाण्याचा बेत के ला आणि लक्षात आले की सर्वांकडचे
पाणी संपले आहे, तटबंदीच्या बाजूच्या टाक्यातील पाण्याचा कानोसा
घेतला, थोडसं
पिवून बघितलं तर काय पाणी एकदम थंडगार. पटापट बाटल्या भरून घेतल्या, एव्हाना ते
पाणी पाहून नाक
मुरडणारे मला दे , मला दे म्हणू लागले होते. १५-२० मिनिटांच्या सावध
चालीने घसरगुंड्या वाटेने खाली उतरलो. आता नागेश
म्हणाला की आपण हत्तीचं नेढ पाहून
घेवू? काही भिडूंनी इथून थेट मंदिर गाठण्याचा निर्णय घेतला आणि ते तिकडे निघून
गेले
सुद्धा. आम्ही नागेश बाबाची शेपटी धरली आणि १५ मिनिटांच्या चालीनंतर
हत्तीच्या नेढ्यापाशी पोहोचलो, हे नेढ आणि वर
उल्लेखिलेले नेढ याच्यात अर्थाअर्थी
काहीही साम्य नाही. हि जागा म्हणजे तीन वेगवेगळ्या पौराणिक गुहा, त्याही संपूर्ण
कातळात
खोदलेल्या. एका गुहेत तीन माणसे आरामात राहू शकतील अशा या गुहा, वर्षाचे
बाराही महिने गुहांच्या आतमध्ये खोदलेल्या
टाक्यांमध्ये पाण्याची उपलब्धता.
गुहांमधल्या टाक्यांमध्ये पाणी पोहोचण्यासाठी एक विशिष्ठ खोदीव पाट, सार काही अद्भुत.
गुहेतील वातावरण इतकं शांत आणि थंड की खरेच ध्यानाला बसावे आणि वर्षानुवर्षे बसून
राहावे असे. या नीरव शांततेचा अनुभव
घेवून परतीची वाट धरली आणि अर्ध्या तासाच्या
नागमोडी वाटेने किल्ल्याचे मुख्य आकर्षण असलेल्या हरिश्चंद्रेश्वर मंदिरापाशी
आलो,
आता वेळ होती थकलेल्या जीवाला थंड पाण्यात बुडवण्याची, वेळ न दवडता बर्फाचा
नैसर्गिक थंडावा असलेल्या पाण्यात
मनसोक्त डुंबून घेतले .
थोडसं हरिश्चंद्रगडाविषयी...
जेवण झाल्यानंतर थोडा वेळ आराम के ला आणि चहा घेवून किल्ल्यावरचे मुख्य आकर्षण
असणारा आणि सर्वांना
पहावासा वाटणारा कोकणकडा आणि तिथला सूर्यास्त पाहून आजच्या
दिवसाची सांगता करण्याचे ठरले आणि लगोलग पावले
कोकणकडा कडे चालू लागली. १५
मिनिटांच्या सहज चालीने आणि नागमोडी वाटेने, परिसरातील आटलेले ओढे -नाले पार करत
कोकणकडा गाठला, तोवर सूर्य आजच्या दिवसाची रजा घेण्याच्या तयारीला लागला होता.
कोकणकडा ...
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच जाग आली, उठून ब्रश करून थोडसं फ्रे श होवून घेतलं
आणि पहिला एके क कप चहा
घेतला. रात्री उशिरापर्यंत जागे राहिलेले भिडू अजून गाढ
झोपेत होते. ना-नुक्कड करत तारामती शिखर सर करायचे असे ठरवून
टाकले . आता इतर
लोकांचे आवरेस्तोवर न थांबता शिरवळचे दादा आणि मी निघण्याचा निर्णय घेतला, सोबत
राहुलही आम्हाला
मिळाला. तारामती शिखराकडे जाणारी वाट अगदीच खडतर म्हणता न येणारी
परंतु सुरुवातीलाच कारवीच्या दाट झाडीतून नंतर
गवत पठारावरून पुढे जावून ती
कोकणपट्टा आणि घाटमाथा सीमेवर म्हणजेच समुद्र सपाटीपासून १३३५ मीटर उंचीवर येवून
थांबते. वेस्टर्न घाट इको क्लब, अकोले या संस्थेने सदर उंची निश्चित करून एका
दगडावर लिहून ठे वलेली आहे. इथं आल्यानंतर
कोकणातील सोसाट्याचा वारा आपणास
मंत्रमुग्ध करून टाकतो. पुढील चढाई साधारण ९६ मीटर उंचीची आणि तीन ठिकाणी
कातळटप्पे असणारी आहे. सुमारे १५ मिनिटांच्या कसदार चढाईने आपण तारामती शिखर सर
करून सपाटीवर पोहोचतो. इथं
पोहोचल्यावर आपण महाराष्ट्र देशातील सर्वात उंच कळसुबाई
शिखराच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाच्या शिखरावर येवून एका विलक्षण
सिद्धीस पात्र
होता. तारामती शिखरावरून आजूबाजूला पाहिल्यास सह्याद्रीची विस्तीर्ण पसरलेली पर्वतरांग
आणि तिच्यातले
अनेकाविध किल्ले आणि शिखरे नजरेस पडतात, पैकी नवरा-नवरी, आजोबाचा
किल्ला आणि बरेच. दूर उत्तर-पूर्व बाजूस दोन
पर्वतांच्या पलीकडे आपणास कळसुबाईचे
शिखर सुस्पष्ट दिसते. इकडे पश्चिमेकडे पाहिले असता, कोकणकडा, माळशेज घाट
आणि
कल्याण पर्यंतचा संपूर्ण कोकणपट्टा एका नजरेत सामावतो. शिखराच्या माथ्यावर कातळात
तयार के लेलं एक शिवलिंग
आहे जिथे स्थानिक लोकं आपली पूजा वाहतात आणि एक प्रकारे
संवर्धनास मदत करतात. तारामती शिखरावर थोडा वेळ
थांबल्यानंतर आता उताराची हुरहूर
लागली आणि लगोलग उतरावयास सुरुवात के ली. उताराच्या दुसऱ्या टप्प्यावर आमच्या टीमचे
बाकी भिडू भेटले अर्थातच सर्वजण ढेपाळलेले . सगळ्यांना लवकर परतण्याची विनंती करून
आम्ही उताराची वाट धरली आणि
पाहतो तर काय राहुल परत एकदा त्याच्या तारामती सोबत
पुन्हा एकदा शिखर सर करण्यास सज्ज झाला होता. वेळ न दवडता
खाली उतरून मंदिरापाशी
आलो, पुनश्चः एकदा गुहेतील थंडगार पाण्यात अंघोळ उरकली, तोवर आम्हाला टप्पा दिलेला
आमचा
मित्र नंदू, अविश आणि योगेश भेटले . सर्वांना नमस्कार सांगून मंदिरात जावून
दर्शन घेतले . झोळी भरली, नाश्ता उरकू न इतर
भिडूंची वाट न पाहता संतोष भाऊ, दादा
आणि मी किल्ला उतरून पाचनई गावात परतलो. आज उन्हाचा तडाखा कालच्यापेक्षा
जास्त
होता, काल चढाई करताना जितके घामाघूम झालो होतो त्याच्या दुप्पट घामाघूम आज झालो.
वाटेत एके ठिकाणी मस्त
लिंबू सरबताचा आस्वाद घेतला आणि गावात परतून आजच्या रग्गड
भटकं तीची सांगता के ली. परतीच्या वाटेवर एके ठिकाणी
“पाप-पुण्याचा घडा” ही दोन
कुं डे आहेत, त्यापैकी पुण्याचा घडा हा सदैव पाण्याने भरलेला असतो तर पापाच्या घड्यातील
पाणी
उन्हाळ्यात पार तळाला जाते, हाही एक निसर्गाचा अविष्कारचं म्हणावा लागेल.
महाराष्ट्र देशीच्या भूमीत जन्माला यावे आणि किल्ले हरिश्चंद्रगड आणि तारामती
शिखर पाहू नये, हे होवूच शकत नाही.
प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदातरी किमान दोन
दिवसांचा वेळ काढून किल्ल्यावर जावून एका आगळ्यावेगळ्या नंदनवनात
जावून येण्याचा
अविस्मरणीय अनुभव घ्यावाच, नाहीतर आयुष्य व्यर्थच गेले असे समजा!!
शेवटी ...
आपला,
अभिजीत शिंदे
पुणे.
+९१ ९५२७ ३३० ५६७.
https://photos.app.goo.gl/TFu5kiofkPn2F48s6
सह्याद्रीच्या पाऊलखुणा...
at
9:05 AM
Share
14 comments:
Replies
Reply
Replies
Reply
Reply
Replies
Reply
Replies
Reply
Replies
Reply
उनाड भटकं ती October 20, 2018 at 6:07 PM
सविस्तर आणि सुरेख शब्दशैली। मजा आली। ब्लॉगची लांबी कमी करता आली तर बघा. लिहत रहा लिहत रहा.....
Reply
Replies
Reply
Comment as:
dravinashk Sign out
Publish Preview
Notify me
‹ Home ›
View web version
ABOUT ME
सह्याद्रीच्या पाऊलखुणा...
View my complete profile
Powered by Blogger.