Professional Documents
Culture Documents
सदर विशेषांकाचे सर्व हक्क प्रकाशकांकडे राखीव असनू येथे प्रकाशित झालेले लेख, छायाचित्रे वा अन्य
सामुग्री प्रकाशकांच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही, याची नोंद घ्यावी.
तसे के लेले आढळल्यास कायदेशीर कारवाई के ली जाईल.
`mo OmVmo _éX§eO… {j{VVbo g§~moY`Z² gÁOZmZ² &
J«ÝW§ `mo aM`Z² gwnwÊ`OZH$§ lrXmg~moYm{^Y_² &
`… H$rË`©m nR>ZoZ gd©{dXwfm§ ñdm§Vmnhmar gXm &
gmo@`§ _w{º$H$a… {jVm¡ {dO`Vo lram_XmgmoJwé… &&
_bm dmQ>Vo§ A§Var§ Ëdm§ dgmdo§ & VwÂ`m Xmg~moYm{g Ëdm§ ~moYdmdo§ &
AnË`mnar nmddr ào_J«mgm & _hmamO`m gÒwé am_Xmgm &&
AZwH« _m[UH$m
• संपादकीय ०७
• प्रस्तावना - श्रीभषू णस्वामी ०९
जग एकविसाव्या शतकात वाटचाल करत असताना भारत देश विकसनशीलतेपासनू विकसित होण्याकडे
अतिशय झपाट्याने पाऊले टाकत आहे. हे शतक स्पर्धेचं मानले गेले आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने
या स्पर्धेत धावत आहे. भारताचा मळ ू पाया असणाऱ्या आजच्या तरुणाईसाठी स्टार्टअप इडि ं या, स्टॅन्डअप
इडि
ं या, मेक इन इडि ं या सारख्या संकल्पांद्वारे त्यांच्या स्किल्स विकसित करून त्याद्वारे भारत आपला सहभाग
या स्पर्धेत नोंदवत आहे. यात तो अग्रेसर राहत आहे ते देखील या तरुणाईमळ ु े च! कारण तरुण हा नेहमी
भविष्यातील स्वप्नांना समोर ठे ऊन काही तरी नवीन करण्याचा विचार करत असतो आणि याचाच फायदा
आज भारताला होतो आहे.
आधनि ु कतेकडे वाटचाल करणाऱ्या या पिढीला नाविन्याची ओढ असणे स्वाभाविक आहे. भविष्यात ज्या
बदलांना सामोरे जायचे आहे त्याबाबतीत दक्ष असणं म्हणजे माणसाच्या विवेकबद्धी
ु चा कस लागण्यासारखे
आहे. परु ातन काळापासनू भारत देशात कायमच वेदशास्त्र आणि परु ाणांची सांगड घालत सतं विचारांची कास
धरून संस्कृति आणि सभ्यतेच्या चौकटीत राहून वैचारिक जडणघडण व एका पिढीपासनू पढु ील पिढीपर्यंत हा
अमलू ्य विचारांचा ठे वा प्रदान होत आला आहे.
इसवी सनाच्या सतराव्या शतकात स्वराज्यनिर्मितीचे स्वप्न साकार होऊ पाहणाऱ्या महाराष्ट्राला अशाच एका
अद्वितीय तेजपरुु षाचा आणि त्यांच्या अमलू ्य व तितक्याच चिरंजिव अशा विचारांचा सहवास लाभला, ते
म्हणजेच परमपजू ्य राष्ट्रगरू
ु श्रीसमर्थ रामदासस्वामी महाराज !
समर्थांचे विचार त्रिकालाधिष्ठित आणि व्यापक असेच आहेत. शिवरायांचे स्वराज्यनिर्मितीचे कार्य असो,
परकीयांच्या गल ु ामगिरीतनू ‘अखडं सावधान’ होण्याची शिकवण असो, स्वतःचा व्यक्तिगत विकास असो
वा भगवंताचरणी निरपेक्षपणे लीन होण्यातले उत्कट समाधान असो. श्रीसमर्थांचे विचार आणि त्यांचे सयु ोग्य
आचरण हे मानवी जीवनाला कायमस्वरूपी संजीवनीच देत आलेले आहे. समर्थांचा जीवनपट पाहिला तर
एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे जैसी वाणी, तैसी क्रिया! समर्थ म्हणतात,
आपली वाणी आणि आपल्या हातनू घडणारी कृती यात मेळ नसेल तर लोकांस सांगितलेल्या उपदेशास अर्थ
काय? हेच सत्रू समर्थांनी आयषु ्यभर पाळले. टाकळीत तपश्चर्या पर्णू करून तिर्थाटनास निघाले असता
७
सगळीकडे परकीय सत्तेचा गल ु ाम झालेला आणि जल ु मू सोसत राहिलेला हिदं सु ्थान पाहून समर्थांचे मन
आध्यात्मिकते कडून व्यावहारिकते कडे वळले. समाजाचे होत असलेले हाल, अनन्वित अत्याचार पाहून
समर्थांना हा समाज जागतृ करण्याची आवश्यकता वाटली. पढु े महाराष्ट्रात येऊन त्यांनी समाजास स्वावलंबी
बनविण्यासाठी आपल्या श्रीमत् ग्रंथराज दासबोध ग्रंथातनू मार्गदर्शन के ले.
श्रीदासबोधात मांडलेले समर्थांचे विचार पाहून मन थक्क होते. विविध विषयातील व्यवस्थापन, कोणतेही
कार्य करताना लागणारे मनषु ्यबळ, त्यांचे संघटन, सयु ोग्य वर्तणक
ू , जनमान्य नेततृ ्व, राष्ट्रकार्य आणि
त्याचसोबत प्रपंच परमार्थाचा योग्य मिलाप, इत्यादी अनेक मलू ्यांचे दर्शन समर्थांच्या दासबोध ग्रंथातनू घडते.
‘आधी के ले, मग सांगितले’ या सत्राू नसु ार समर्थांचा दासबोध ग्रंथ व त्यांचे चरित्र एकरूपच आहे, याची खणू
पटते.
आजच्या काळाला अनरू ु प असे समर्थांचे हेच मौलिक विचार अनेक मान्यवर लेखकांनी आपल्या
अभ्यासपर्णू विचारधनातनू सोप्या भाषेत या विशेषांकात मांडले आहेत. अर्थापासनू परमार्थापर्यंत सर्वच
विषयांवरील लेखांचा अतं र्भाव या अकं ात करण्याचा प्रयत्न के ला आहे. ‘डिजीटल इडि
ं या’च्या यगु ात
ई-पसु ्तक रूपाने प्रकाशित होत असलेल्या या विशेषांकातील लेखांमधनू आपणांस श्रीमत् ग्रंथराज
दासबोधाची गोडी लागावी व यातनू समर्थांना अभिप्रेत असा आत्मनिर्भर समाज निर्मित होऊन आपले राष्ट्र
पाहत असलेले समर्थभारताचे स्वप्न शीघ्रातिशीघ्र साकार होवो, हीच दासनवमीच्या निमित्ताने श्रीसमर्थचरणी
प्रार्थना करतो व लेखनास पर्णवि
ू राम देतो.
।।जय जय रघवु ीर समर्थ।।
.
विशेष आभार
या विशेषांकात आपले अनभु वी व अभ्यासपर्णू लिखाण पाठवनू हा अक ं सर्वार्थाने वाचनीय, चितं नीय
व संग्राह्य करणाऱ्या सर्व मान्यवर लेखकांचे अतं ःकरणपर्वू क आभार. हा अक ं साकारण्यासाठी आर्थिक
सहभाग नोंदवणाऱ्या श्री.अरुण गोसावी, श्री.राहुल पडंु लीक, श्री.अनिके त कुलकर्णी, श्री.जितेंद्र दिक्षित यांचे
देखील मनःपर्वू क आभार! ‘सामर्थ्याची उपासना’च्या कार्यास ज्यांचा नेहमीच भक्कम पाठिंबा लाभतो व
ज्यांची आशीर्वादरूपी प्रस्तावना या पसु ्तकास लाभली, असे परमश्रध्येय श्रीभषू णस्वामी महाराज व श्रीसमर्थ
संप्रदायाची मातसृ ंस्था-श्रीसज्जनगड संस्थानचे आम्ही ऋणी आहोत. हा अक ं साकारण्यासाठी अथक परिश्रम
घेणारे श्री.जयंतराव कुलकर्णी काका (चिचं वड) यांचे ही शतशः आभारी आहोत!
८
lrg_W©ñdê n
Xmg~moY
प.पु. श्रीभूषणस्वामी महाराज
(श्रीसमर्थांच्या घराण्यातील अकरावे वश
ं ज)
या सगणु ातनू निर्गुणाकडे जाणाऱ्या उपासकाच्या उपासनेसाठी श्रीसमर्थ वापरतात. यातील हरिकथा हा शब्द
सगणु रूपाची भक्ती दर्शवितो. परंत, उपासकाचा प्रवास सगणु रूपाशी थांबू नये म्हणनू लगेचच ‘निरूपण’
या शब्दातनू आत्मचितं नाने अरूपी, विश्वव्यापी परब्रह्मतत्वाचा शोध ही निर्गुणाची आराधना ही त्याची
अतिं म ध्येय निश्चिती दर्शवितो. ’मी देह आहे’ या लौकिक अर्थातनू ‘मी चिदानंदरूप परब्रह्म तत्व आहे’ या
अलौकिकतेची हे दासबोधाचे सार आहे. मायातीत परब्रह्माच्या आकाशव्यापी अस्तित्वाच्या अनभु तू ीतनू
निर्गुण ब्रह्माची निश्चलता अतं री बिंबली जावी व यातनू जीवाला शाश्वत सखु ाची प्राप्ती व्हावी हाच विषय
दासबोधाच्या कें द्रस्थानी आहे. २० व्या दशकाच्या १० व्या समासातनू श्रीसमर्थ हे ससु ्पष्ट करतात.
९
झाले साधनाचे फळ। ससं ार झाला सफ ु ळ।
निर्गुण ब्रह्म ते निश्चल। अतं री बिंबले।।
दासबोधाच्या मनन, चितं नातनू आत्मा आणि परमात्मा यांच्यातील द्वैतभावाची पोकळी नाहीशी होऊन
अद्वैताची अनभु तू ी जीवाला प्राप्त होऊन सिद्धवस्था साधली जाते, हे दासबोधाचे मखु ्य सत्रू आहे. या सत्रा
ू शी
एकरूपता साधण्यासाठी श्रीसमर्थ कर्म, उपासना जान आपि मोक्ष या मार्गाने साधकाचा प्रवास व्हावा, असे
सांगतात.
कर्माधिष्ठित उपासनेची साधना झाली की अतं ःकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश प्रकाशित होतो. या ज्ञानप्रकाशात
अज्ञानरूपी अधं ःकार नाहीसा होऊन दःु ख आणि भ्रांतीचे पडदे आपोआप दरू होतात. दासबोधाची फलश्तरु ी
हेच सांगते-
ज्ञानाने रूप पाहता येते, पण विमलज्ञानाने स्वरूपाची ओळख पटते. आत्मबधु ्दी प्रकाशित होणे हेच खरे ज्ञान
आहे. आत्मबधु ्दीच्या प्रकाशातनू स्वरूप कळले की चिद्रुप उजवनू निघते. हरिहर हृदयीचे गह्य
ु प्रकट करून
दाखविणारा दासबोध म्हणनू च बध्द ते सिध्द या पारमार्थिक प्रवासातील लामणदिवाच आहे. श्रीदासबोधाच्या
आरतीमध्ये याचे यथार्थ वर्णन आहे-
१०
Xmg~moYmVrb
na_mW©
डॉ.श्रीकृष्ण द. देशमुख
शब्दसष्टी
ृ मध्ये ‘परमार्थ’ या विषयाला आणि शब्दाला जेवढे वलय लाभले आहे तेवढे खचितच दसु ऱ्या
कोणत्याही शब्दाला लाभले असेल. हे वलय अत्यंत प्रेम आणि भावना यांचहे ी आहे. तसेच ते गढु ात्मकही
आहे. हा विषय नेमका काय आहे? सतं ांनी आणि विशेषतः समर्थ रामदासस्वामींनी या विषयाची उकल कशी
के ली आहे हे आपण प्रस्तुत लेखामध्ये थोडक्यात पाहूया.
परमार्थ या शब्दाचे अनेक अर्थ के ले गेले आहेत. जसे सर्वोत्तम वस्तू (ची प्राप्ती), मोक्ष, परमतत्त्व, सत्य / ब्रह्म
/ ईश्वर या सर्व अर्थांचा लक्ष्यार्थ परम प्राप्तव्य अर्थातच नरदेहामध्ये येऊन जे ‘आत्यंतिक प्राथमिकतेने (top
priority) प्राप्त करावे’ असा होतो.
मानवी जीवनामध्ये अज्ञाताची प्राप्ती करून घेण्याची प्रवत्ृ ती होत नाही. कोणतीही वस्तू मिळवण्यासाठी, प्राप्त
करून घेण्यासाठी आधी त्या वस्तूचे परोक्षत्वाने ज्ञान व्हावे लागते. त्या ज्ञानामधनू मानवाला, जीवाला त्या
वस्तूचे महत्त्व कळते किंवा त्या वस्तूची त्याला उपयक्त
ु ता कळली तरच त्याला ती वस्तू आपण प्राप्त करून
घ्यावी असे वाटू लागते आणि त्यानंतर तो त्या विषयात, मार्गात प्रवत्तृ होतो. त्यामळ ु े परमार्थ विषयाची
सविस्तर ओळख झाल्याशिवाय सर्वसामान्य व्यक्तीची त्याच्याकडे प्रवत्ृ ती होणार नाही. यासाठी परमार्थाचा
आकृतीबंध काय आहे याची ओळख करून घेऊ.
परमार्थ या विषयाचे चार घटक आहेत. आधनि ु क विचारसरणीने याची मांडणी करायची झाल्यास ती
खालीलप्रमाणे करता येईल. .
१. दृष्य जगत कसे आणि कशापासनू बनले आहे?
२. त्याच जगताचा एक घटक ‘मी’ काय आहे?
३. दृष्य जगताचा आणि ‘मी’ चा संबंध काय?
४. हे ज्ञान मिळाल्याने माझा काय लाभ होईल?
१. सष्टी
ृ कशी निर्माण झाली आहे? ब्रह्म काय आहे?
२. मी किंवा जीव याचे यथार्थ स्वरूप काय आहे?
११
३. माझे (जीवाचे) आणि ब्रह्माचे सत् चे नाते (सबं ंध) काय आहे?
४. या ज्ञानाचे प्रयोजन काय?
वेदान्तशास्त्राचे सर्वच ग्रंथ या चौकटीतनू अभ्यास करता येतात. श्रीमत् दासबोध हा वेदान्त प्रामाण्य मानणारा
व त्याचाच अर्थ विशद करणारा ग्रंथ आहे. याचा स्पष्ट निर्देश समर्थांनी ग्रंथाच्या सरुु वातीला के ला आहे.
त्यामागे ग्रंथकर्त्याचा हेतू हा की साधक ग्रंथवाचनाकडे प्रवत्तृ व्हावा आणि त्याला परमार्थ उत्तमरित्या साधनू
घेता यावा. समर्थ सांगतात:
श्रोते पसु ती कोण ग्रंथ। काय बोलिले जी येथ।
श्रवण केलियाने प्राप्त। काय आहे।।
उत्तर:
ग्रंथा नाम दासबोध। गरुु शिष्यांचा सवं ाद।
येथ बोलिला विशद। भक्तिमार्ग।।
येथे समर्थ त्यांची आत्मप्रचिती आणि श्तरु ीप्रामाण्य याचा समन्वय, एकवाक्यता दर्शवितात.
येथे अमतृ ानभु वमधील माऊलींच्या ओव्यांची हटकून आठवण होते. माऊली सांगतात-
१२
आणि नंतर ते विवर्त असल्याचे सांगतात.
अविनाश जे ब्रह्म निर्गुण। नासे ते माया सगणु ।
सगणु आणि निर्गुण। कालवले।। ६-३-६
आता या नामरूपात्मक जडसष्टी ृ चे अधिक सक्ू ष्म निरीक्षण करण्यास सांगनू ‘जे प्रत्यक्षात दिसते ते खरे असते’
असे मानणे म्हणजे अज्ञानाचे लक्षण सांगतात.
आता दिसणाऱ्या नामरूपात्मक जगताचे मिथ्या (सत् नाही आणि असत् ही नाही) असे वर्णन करून ते स्वप्न
साकार (विवर्त) आहे हे जाणनू घे हे निक्षून सांगतात. (जाण बापा)
१३
२. दृश्य जगताचा सक्षे
ं पाने विचार के ल्यानंतर आता ‘मी’ / जीव या सक ं ल्पनेचा विचार करू. ‘मी’ किंवा जीव
याचा यथार्थ शोध घेतला असता मी सापडतच नाही. परंतु या प्रक्रियेमध्ये ज्या दृष्य जगताचा ‘मी’ हा एक
घटक आहे ते त्रिगणु आणि पंचमहाभतू ांचे (अष्टधाप्रकृतीचे) बनलेले विश्व रहातच नाही, किंबहुना जे निर्गुण
तत्त्व शिल्लक रहाते ते मी आहे याचा अनभु व गरुु कृपेने येतो, असे सांगतात.
१४
४. फळ/ प्रयोजन-
परमार्थशास्त्राचे प्रयोजन मानवाला निरतिशय सख ु ाची प्राप्ती करून देणे हा आहे. माणसाने प्रथम सख ु रूप-सख ु ी
व्हावे, सखु ाने जीवन जगावे आणि सख ु ाने या जगाचा निरोप घ्यावा या साठी परमार्थशास्त्र शिकावे लागते.
मनषु ्याचे मळू स्वरूप आनंदस्वरूप असनू सद्धा ु अज्ञानजन्य भ्रांतीमळ ु े किंवा व्यापक आत्मस्वरूपाचे विस्मरण
झाल्यामळ ु े तो प्रथम देहाला मी म्हणतो आणि सभोवतालच्या जगताला ‘माझे’ म्हणतो. हे भेदज्ञानच त्याच्या
दःु खाचे कारण ठरते. म्हणजेच स्वरूपाचे अज्ञान किंवा विस्मरण हे मानवी जीवना मधील सर्व दःु खांचे मळ ू
आहे आणि अज्ञाननिवत्ृ तीचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे ज्याच्या अज्ञानामळ ु े जे भासते ते त्याच्याच ज्ञानाने
निवत्तृ होते. या प्रक्रियेमध्ये अज्ञानजन्य मिथ्या सष्टी
ृ चा क्रमाक्रमाने बाध के ला की त्यामध्ये सष्टी ृ आणि तिचा
घटक ‘मी’ या दोहोंचा ही निरास होतो आणि शेवटी निश्चळ ब्रह्माची आत्मत्वाने प्राप्ती होऊन जीव सख ु रूप
होतो. म्हणनू ग्रंथाचा उपसहं ार करताना समर्थ म्हणतात-
सकळ देहाचा झाडा के ला। तत्वसमदु ाव उडाला।
तेथे कोण्या पदार्थाला। आपल ु े म्हणावें।। २०-१०-३६
जालें साधनाचे फळ। ससं ार जाला सफळ। निर्गुणब्रह्म ते निश्चळ। अतं री बिंबले।।
१५
Xmg~moYmVrb
{ejUemñÌ
प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे
शिशिक्षणाचे स्वरूप व कार्य या विषयीची एक ‘त्रिशब्दी-त्रिसत्ू री’ आहे. कोणती म्हणाल? तर ‘जाणीव-ज्ञान-
प्रकटीकरण’ ही होय. या त्रिसत्ू रीत अध्यात्मशास्त्रही बसते आणि शिक्षणशास्त्रही बसते. या त्रिसत्ू रीशी तंतोतंत
जळ ु णारी समर्थांची एक मेरूदडं ाची ओवी आहे. कोणती म्हणाल? तर,
जितक
ु े काही आपणांस ठावे । तितक
ु े हळूहळू सिकवावे।
शहाणे करूनि सोडावे। बहुतजन ।। १९-१०-१४
शैक्षणिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही ओवी जाणीव-ज्ञान-प्रकटीकरण या त्रिशब्दी त्रिसत्ू रीला कशी
व्यापनू राहिली आहे, याचा आता विचार करावयाचा आहे.
‘जितक ु े कांही आपणास ठावे’ ही ओळ प्रामखु ्याने गरुु संस्थेला लागू पडते. कारण अध्यात्म असो की शिक्षण
असो, तिथल्या गरूंु कडे येणारे शिष्य आणि विद्यार्थी त्यांचेकडून आपणास काही ज्ञान प्राप्त व्हावे या इच्छेने
आलेले असतात. गरुु वा शिक्षक हे ज्ञानी आहेत, अशा विश्वासाने व श्रद्धेने ते त्यांचेकडे पाहात असतात. मग
तिथे गरुु ससं ्थेने साधक-शिष्य अथवा छात्र-विद्यार्थी यांना आपणाला ठाऊक असलेले सर्व ज्ञान दिले पाहिजे.
काही वेळा विद्या-कला देताना त्या क्षेत्रातील गरुु हातचे राखनू तटु पंजु ी माहिती देऊन पिटाळतात. तर कधी
कधी ‘मी’ विद्वान, मला सर्व काही ज्ञात आहे, अशा अहक ं ाराने अध्यात्म व शिक्षण या दोन्ही क्षेत्रात ज्ञान
देण्याचे टाळतात. किंवा माझ्यापेक्षा तमु ्ही अमकु अमक ु त्यांच्याकडे जा. ते तमु ्हाला सर्व काही सांगतील.
खरे तर अशा प्रवत्ृ तीचे गरुु असोत की शिक्षक असोत, ते त्यांच्या प्राप्तपदवीला उणेपणा आणतात. म्हणनू च
समर्थांनी ‘जितक ु े काही तमु ्हाला ठाऊक आहे, तितकु े प्रेमाने, आनंदाने, विश्वासपर्वू क सांगावे’ असे म्हटले
आहे. तसेच आपणाला एवढेच ठाऊक आहे याची प्रांजळपणे कबल ु ीही द्यावी. म्हणजे ज्ञान असनू ही ते न
दिल्याचा दोषही लागणार नाही आणि गरुु ससं ्थेवरील विश्वासही उडणार नाही.
‘तितकु े हळूहळू सिकवावे’ या दसु ऱ्या ओळीत ज्ञानप्रदान करताना ते कशा पद्धतीने द्यावे, हे समर्थांनी
सांगितले आहे. आई जसे बालकास एके क छोटा घास करून भरविते, तसे हळूहळू म्हणजे त्याला आकलन
कसे आणि कितपत होते आहे, हे पाहूनच पढु च्या काही गोष्टी शिकविल्या पाहिजेत. एक सहज उदाहरण
डोळ्यासमोर येते ते असे की, ठरलेल्या कालावधीत अभ्यासक्रम पर्णू न झाल्याने कधी कधी नसु तेच धडे वा
कवितांचे वाचन के ले जाते. त्यासंबंधी काहीही चर्चा न करता वा अर्थ न सांगता ‘झाला सगळा अभ्यासक्रम
१७
पर्णू . घरी जाऊन तमु ्हीच वाचा’ असे सांगनू हात झटकणारे ही गरुु वा शिक्षक असतात. तोंडातला घास चावनू
खाऊन सपं ल्यावरच दसु रा घास भरविला पाहिजे. एकदम सगळे अन् भरभरा तोंडात कोंबनू खाल्ले तर त्या
अन्नाचे पचन कसे होणार? अगदी तसेच ज्ञानप्रदान कार्यप्रणालीत घाईघाईने शिकविले तर त्याचे आकलन
पर्णू त्वाने कसे होणार? त्यामळ
ु े शिकविलेले कितपत कळले आहे, याची तपासणी वा चाचपणी करीत करीतच
पढु चे ज्ञान दिले पाहिजे.
चतरु बद्धी
ु व बद्धि
ु चातर्यु -
समर्थांचे शिक्षणशास्त्र पाहात असताना मला त्याविषयी निगडीत असलेला एक महत्त्वाचा मद्ु दा अनभु वाला
आला. त्यामळ ु े त्याची दोन उदाहरणे मद्ु दाम इथे देत आहे.
चतरु बद्धी
ु -
विद्यार्थी मोठे चतरु ही असतात. मार्च-एप्रिल महिन्यात शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा असतात. त्यावेळी
क्रिके टचे सामने सरू ु होते. त्यामळ
ु े बारावीच्या मलु ांना शिक्षकांनी आवर्जून सांगितले होते की, इग्रं जीच्या
पेपरमध्ये ‘क्रिके ट’वर निबंध हमखास येणार! मल ु ांनी त्याची तयारीही करून ठे वली होती. पण परीक्षेत
पेपरमध्ये ‘क्रो’ विषय दिला गेला होता. तो कुणाचाच तयार नव्हता. पण एका चतरु बद्धी ु च्या मल ु ाने त्यावरही
निबंध लिहिला. कसा म्हणाल? तर, कावळा झाडावर बसला होता. बाजल ू ाच क्रिके टचे मैदान होते. मल ु े
क्रिके ट खेळत होती. कावळा वरून काव काव म्हणनू ओरडत होता. जणू त्यांची कॉमेंट्रीच सरू ु होती. पाठ
के लेला निबंध त्याने असा उतरवनू काढला. पढु े वत्तृ पत्रात अशी चतरु ाई विद्यार्थ्याने के ल्याचे छापनू ही आले
होते. चतरु बद्धी
ु ची अशी माणसे वेळ मारून नेतात, हेच खरे !
बद्धि
ु चातर्यु :
बी.ए. भाग-२ मराठीच्या अभ्यासक्रमात मर्ढेकरांची एक कविता होती. ती सर्वपरिचित आहे. का ? तर तिच्या
ओळी वाचल्या तर सहजसल ु भपणे तिचा अर्थ कळत नाही. ती कविता म्हणजे ‘पिपात मेले ओल्या उंदीर’.
मबंु ईच्या गदु मरलेल्या जीवनाचे त्यात चित्रण आहे. मी थोडी सचू कता स्पष्ट के ली. म्हणालो, शब्दक्रम बदलनू
पाहा, म्हणजे ओळीचा अर्थ कळे ल. त्यावर एक हुषार मल ु गा म्हणाला, ‘मी सांगतो’ मी त्याला बोलावले.
फळ्यावर लिहून दाखव म्हणनू सांगितले. त्यावर त्याने लिहिले, ‘पिपात ओल्या मेले उंदीर’ ओले पिप म्हणजे
मबंु ईतला माणसू , जो धकाधकीचे जीवन जगत असतो. घरी येताना तो घामेजनू गेलेला असतो. तोच स्वतःच
ओल्या पिपात गदु मरलेला उंदीर झालेला असतो. मग सांगा, बरे की, ‘पिपात ओल्या मेले उंदीर’ ही प्रतिमा
खरोखरीच किती सार्थ आहे !
‘अध्यात्म असो की शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रम असो, तिथे दिलेल्या शिक्षणाची (ते कळले आहे की
नाही) पावती दिली गेली पाहिजे. अन्यथा फार मोठ्या प्रमाणात नळाला वेगाने पाणी आले तर घड्यात ते
भरले जातच नाही. पाण्याच्या मोठ्या धारे ने ते घागरीच्या गळ्याबाहेरच फे कले जाते. मग अशी शिकवण
१८
ते ‘कळले’ काय? याची खातरजमा करता आली पाहिजे. खातरजमा झाली की, मगच पढु चा अभ्यासक्रम
शिकविला गेला पाहिजे. ‘शहाणे करूनि सोडावे’ या ओळीत असा गर्भितार्थ आहे की, जे ज्ञान तमु ्हाला दिले
गेले ते नीट ‘कळले’ का? नाहीतर अर्धवट ज्ञानी काय उपयोगाचा! शिवाय ‘शहाणे’ करण्यात आणखी एका
निकषपट्टीचा समावेश होतो. ती कोणती म्हणाल ? तर जे आपण शिकलो, ते आणखी दसु ऱ्या कुणाला तरी
शिकवता आले पाहिजे, तरच ज्ञानदानाची प्रक्रिया पर्णू होईल. म्हणजेच ‘प्रकटीकरण’ करता आले पाहिजे.
आता ‘जाणीव-ज्ञान-प्रकटीकरण’ यांचश े ी समर्थांची ओवी कसा ‘संवाद’ करते ते पाहता येते. मला
शिकवायचे आहे आणि मला शिकायचे आहे, त्यासाठी गरुु संस्थेचा आधार घेतला पाहिजे, ही मखु ्य जाणीव
अनक्र ु मे गरुु आणि शिष्य यांना व्हायला हवी. दसु री गोष्ट म्हणजे ज्ञानाचे आदान-प्रदान होणे होय. गरू ु ला
पक्के ज्ञान (पर्णू ज्ञान) असेल, तरच तो शिष्याला ते ज्ञान देऊ शकतो. शिष्यानेही गरू ु वर पर्णू विश्वास ठे वनू
मला हे ज्ञान आले पाहिजे याचा ‘ध्यास’ धरून प्रयत्नांची पराकाष्ठा के ली पाहिजे. ज्ञानप्राप्तीसाठी विश्वास
आणि ध्यास ही दोन पाऊले आहेत. कशी म्हणाल? तर, इथे महाभारतातील एक उदाहरण आठवते. ते म्हणजे
धनर्वि
ु द्या शिकविण्यास नकार दिलेल्या द्रोणाचार्यांना एकलव्याने मनोमन गरू ु माननू त्यांचा एक मातीचा
पतु ळा तयार के ला होता. त्यांचेवर विश्वास ठे वनू त्याने स्वतःच्या ध्यासाने धनर्वि ु द्या प्राप्त करून घेतली
होती. तिचे प्रकटीकरणही एका प्रसंगाने घडले होते. कोणते म्हणाला तर द्रोणाचार्य पांडवांना घेऊन जात
असताना बाजल ू ा रस्त्यात एक कुत्रे भक ंु त होते. त्यावर एकलव्याने तोंडात असे बाण मारले की, कुत्र्याला
मरण तर आले नाहीच; पण त्याचे भक ंु णे मात्र थांबले, कारण भक ंु णारा जबडा बाणाने त्याने उघडा ठे वला
होता, त्याला तोंड मिटायलाही सवड ठे वली नाही. मग ते भक ंु े ल तरी कसे? आत्मसात विद्येचे प्रकटीकरण
म्हणजेच ज्ञानप्राप्तीत परिपर्णू ता मिळविणे होय. ‘शहाणे करूनि सोडावे’ या ओवीत हाच अर्थ दडला आहे.
ज्ञानप्रदान आणि ज्ञानाकलन याबद्दल गरुु - शिष्य यांचते जाणीव निर्माण झाली की, संवाद सख ु ावह होतो.
विषय पर्णू पणे कळला तरच तो दसु ऱ्यांना समजावनू सांगता येतो. त्यालाच प्रकटीकरण असे म्हणतात. नसु ते
ऐकणे वा लिहून घेणे म्हणजे शिक्षण नव्हे! तर बोलणे हाही प्रकटीकरणाचा भागच आहे. त्यामळ ु े ऐकते
विद्यार्थी घडविता यायला हवेत. तरच शिकण्याची प्रक्रिया पर्णू झाली असे होईल !! शहाणपण आहे ते अशा
प्रकटीकरणात आहे. पदवी प्राप्त करून घेणे हे शहाणपण नव्हे ! तर ज्ञानाचे प्रकटीकरण हे खरे शहाणपण आहे.
समर्थांना ही शैक्षणिक पदवी अभिप्रेत आहे.
‘बहुतजन’ असे या ओवीच्या अखेरीस म्हटलेले आहे. पषु ्कळवेळी काही जण ‘सकळजन’ असेही म्हणतात.
इथे एक गोष्ट लक्षात ठे वली पाहिजे की, समर्थांचा शब्द जागा, क्रम, अर्थ, भाव या सर्वदृष्टीने परिपर्णू असतो.
त्याला दसु रा कोणताही मिळताजळ ु ता वा पर्यायी शब्द लावनू ओवी म्हणू नये. कारण तिथे समर्थांना अभिप्रेत
असलेला अर्थ कळत नाही. प्रसगं ी अशा पर्यायी शब्दाने आपण त्यांचा अनादरच करतो. असे पाहा की,
कोणतेही संत-साध-ु सत्पुरुष जगदोद्धारासाठी अवतार घेऊन आलेले असले तरी ते सर्वांचा उद्धार करीत
नाहीत. उद्धार कोणाचा करतात? तर जे त्यांचेकडे ज्ञान-कर्म-उपासना-भक्ती या चतर्वि ु ध अगं ाने सेवा करतात,
तसेच ते ज्यांना आत्मोद्धाराची तळमळ लागनू राहिली आहे आणि त्यासाठी ते सद्गुरुं ना शरण आले आहेत,
त्यांच्याच आत्मोद्धाराची चितं ा वाहतात, त्यांनाच सत्मार्गी लावतात. शिक्षणातही तसेच आहे. जरी असखं ्य
मलु ांनी (विद्यार्थी) मल
ु ींनी (विद्यार्थिनींनी ) शाळे त प्रवेश घेतला असला तरी जो छात्र शिकण्यास उत्सुक
आहे, शिकविण्याकडे ज्याचे लक्ष आहे, दिलेला अभ्यास जो पर्णू करून आणतो, त्याच्याकडेच शिक्षक
१९
अधिक लक्ष देतात. असे छात्र त्यांच्या विषयात पारंगत होऊन नावलौकिक मिळवितात. मिळालेल्या
ज्ञानाचा लौकिक जीवनात उपयोग करुन घेऊन आत्मोन्नती करून घेतात. त्यांनाच ते प्रोत्साहन देऊन अधिक
कार्यप्रवण करतात. बाकी सगळे नसु ते उत्तीर्ण होतात एवढेच! फक्त काहींनाच प्रथमश्रेणी वा विशेष श्रेणी प्राप्त
होते. अशा बहुत शिष्यांना तसेच छात्रांना अनक्र ु मे गरुु व शिक्षक ज्ञानयज्ञदान करून त्यांच्या आध्यात्मिक
वा शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीचा मार्ग उपलब्ध करून घेतात. समर्थांना तळमळीने, प्रयत्नाने, सातत्याने जे
अभ्यास करतात अशा बहुतजनास ‘शहाणे’ करावयाचे आहे. ज्याच्याकडे इच्छा नाही, तळमळ नाही, कष्ट
करण्याची तयारी नाही अशा सगळ्यांना ते शहाणे कसे करतील? म्हणनू इथे ‘बहुतजन’ असा शब्द समर्थांनी
वापरला आहे. अशा ज्ञानातनू , संघटकातनू त्यांना महतं तयार करावयाचे आहेत. शिक्षकही अशा हुषार
विद्यार्थी-समहू ातनू ‘आदर्श’ व्यक्तिमत्त्व उभे करून ज्ञानप्रसाराचे कार्य करवनू घेतात. सामाजिक आणि राष्ट्रीय
कार्यातही त्यांना असेच महतं व आदर्शशिक्षक निर्माण करावयाचे असनू त्यांचेद्वारे आध्यात्मिक क्षेत्रात आणि
शैक्षणिक क्षेत्रात प्रगती म्हणजे ‘परिवर्तन घडवनू आहे. शिक्षण क्षेत्रात नामवंत शिक्षणतज्ञांकडून हे कार्य घडावे
आणि असेच कार्य सर्वत्र विखरु लेल्या विविध मठांच्या मठपतींकडून घडून यावे, अशीच त्यांची अपेक्षा आहे.
समर्थ रामदासस्वामींच्या शिक्षण शास्त्राचा साकल्याने विचार करता ज्ञानाची देवाण-घेवाण कशी चालते हे
आपण त्यांच्या एका महत्त्वपर्णू अशा ओवीच्या आधारे पाहिले आहे. ती शिक्षणशास्त्राची ‘पवू ार्ध’ म्हणनू
पाहिली जाणारी ओवी आहे. आता ‘उत्तरार्धाची-ओवी’ कोणती? तर, ती पाहू.
या ओवीचे वैशिष्ट्य असे की, ज्ञान प्राप्त झाले तरी त्याचे प्रकटीकरण करण्यासाठीही अभ्यास करावाच
लागतो. तो अपरु ा असेल, तर प्रकटीकरणाची घाई करता कामा नये. अपऱु ्या तयारीने (अभ्यासाने) आपण
ज्ञानाच्या प्रकटीकरणाची घाई के ली, तर जगात आपलेच हसे होते. कारण अभ्यासा अभावी प्रकटीकरण अपरु े
होते, योग्य वा यथार्थ होत नाही. श्रोते वा वाचक हुषार असतात, हे ओळखनू असावे. घाईघाईने मी ज्ञानी
असा टेंभा मिरविण्याच्या हव्यासापायी आपण जर अर्धवटपणे काही बाही सांग,ू तर ते कुणीही मान्य करणे
तर सोडाच, पण ऐकणारही नाही. ही गोष्ट के वळ साहित्याचाच नव्हे, तर कलेच्या प्रांतातही चालणार नाही.
त्यापेक्षा माझा अजनू अभ्यास पर्णू झालेला नाही, असे सांगनू विनम्र होऊन राहण्यातच खरा शहाणपणा आहे,
असे इथे समर्थांना सचु वावयाचे आहे. अर्धवट ज्ञानावर मी शहाणा म्हणनू कुणी जर मिरवित असेल, तर मर्ख ू च
म्हटला पाहिजे, असा गर्भित इशाराही समर्थांनी या ओवीतनू दिला आहे. काही वेळा घाईघाईने चार मद्ु दे
जमा करून अर्धवटपणे विषय मांडल्याचा आव आणणारे ही लोक असतात. मग लोक त्यांना नावे ठे वतात.
त्यापेक्षा अभ्यास करून त्या विषयाचे परिपर्णू ज्ञान प्राप्त झाल्यावरच ते प्रकट करावे. प्रकट करतानाही त्यात
अहक ं ाराऐवजी नम्रताच ठे वनू बोलावे. अहक ं ाराने कुठल्याही क्षेत्रात अधःपतनच होते. वेळ निघनू जाते. मग
पश्चात्ताप करून काय उपयोग ? नम्रतेनेच विद्वत्ता खरी तर प्रकट होते, हे ध्यानात ठे वनू त्याप्रमाणे वागायला
हवे.
‘अभ्यासाने सकळ विद्या प्राप्त’ असेही प्रतिपादन समर्थांनी के ले आहे. ‘अभ्यासे प्रकट व्हावे’ या सत्रा
ू च्या
२०
पष्टी
ु साठी समर्थांनी दासबोधात आणखी काही विचार मांडला आहे. त्याचाही इथे थोडक्यात मागोवा घेतला
आहे.
इथे जर कुणी अभ्यासवू त्ृ तीने अभ्यास करून ज्ञान प्राप्ती करून घेईल, तर त्याला सर्व विद्या प्राप्त होऊ शकतील,
असे समर्थ सांगतात. या त्यांच्या म्हणण्याला ज्ञानेश्वरी व गाथेतही पष्टी
ु देणारे संदर्भ (ओवी वा अभगं चरण)
पाहावयास मिळतात. कसे म्हणाल ? तर, ‘पै अभ्यासाचिया पाऊटी । ठाकिजे ज्ञान किरीटी । ज्ञान येईजे भेटी ।
ध्यानाचिये ॥ ज्ञाने.१२.१३७’. तसेच ‘म्हणौनि पार्था पाही । अभ्यासासी सर्वथा दषु ्कर नाही । म्हणौनि माझिये
ठायी । अभ्यासे मीळ ।। ज्ञाने.१२.११३ ॥’ तक ु ोबाराय यांनीही अभगं ात म्हटले आहे की, ‘असाध्य ते साध्य
। करिता सायास । कारण अभ्यास । तक ु ा म्हणे ॥ (गाथा)
ज्ञान मिळविणे, ते प्रकट करणे ही प्रक्रिया अभ्यासाशिवाय होऊच शकत नाही. अभ्यास व प्रयत्न हे
परस्परपरू क असतील तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हेच इथे सर्वांनी प्रतिपादले आहे. समर्थ सांगतात
की, ‘अभ्यासाचा संग धरिला’ आणि ‘प्रेत्न सांगाती भला’ असे होईल, तर सर्व काही साध्य आहे. अविद्या
असली तरी अभ्यासपु णाने विद्या प्राप्त होऊ शकते. मग अभ्यासाने तो अग्रणी (सर्वप्रथम) होतो. अभ्यास कसा
करावा? तर, त्याचे उत्तर समर्थांनी दशक ७ समास ८ मध्ये श्रवण व सत्संग हवा, हेच प्रतिपादले आहे. (ओवी
१ ते ३२ पाहा) तसेच पढु े मनन हवे (ओवी ३८) निजध्यास हवा (ओवी ३९). ‘श्रवण मनने शद्ध ु चित्तवत्ृ ती
होते’ (४३)
२१
होणार? हाच मोठा प्रश्न निर्माण होतो. ते ‘बोलके ’ झाले, तरच ज्ञानाचे प्रकटीकरण होऊन त्याचा क्षमता’
(आकलनाची व प्रकटीकरणाची) सिद्ध होऊ शके ल.
तसे घडले नाही, तर मात्र त्याची ‘बौद्धिक-नसबंदी’ हीच भीती वाटते. माझे एक सहज निरीक्षण असे आहे
की, शाळे त वक्तृ त्व स्पर्धेत पाठ करून का होईना, पण घडाघडा बोलणारी मल ु े वा मल
ु ी पढु े महाविद्यालयात
तोंडही उघडत नाहीत. असे का होते ? त्यांना स्वतंत्रपणे विचार करून का बोलता येऊ नये? सगं णक,
मोबाईल, इटं रनेट या सर्व सवि ु धा उपकारक आणि आवश्यक ठरल्या असल्या तरी वाचिक-क्षमता त्यायोगे
सिद्ध होत नाही. उलट वरील उपकरणांचा अधिकाधिक वापर करणारे लोक मख ु ाने सांगू शकत नाहीत.
त्यांचे बोलणे, सभं ाषण, लेखन ठप्प होऊ पाहात आहे. उपकरणांसमोर ते गप्पच बसनू राहिलेले दिसतात.
‘मेसेज’ करण्यात ते हुषार आहेत. पण सवं ादक्षमता गमावनू बसले आहेत, असेच वाटत राहते. सभं ाषण व
प्रकटीकरण मख ु ाने झाले नाही तर, वाक्यरचना तयार करून विचार वा भावना प्रकट करण्याचे कौशल्यही ते
गमावनू बसतील काय, अशी भीती वाटते. घरातले, रस्त्यातले, कार्यक्रमानिमित्त सभागहृ ातले असे ‘संवाद’
मौनरूपच धारण करून स्तब्धावलेले दिसतात. ही बाब काळजी करण्यासारखीच आहे. म्हणनू च थोडा
यथार्थ भाषेत म्हणा, वा वास्तवस्वरूपात म्हणा, एक प्रश्न गांभीर्याने मनात उभा राहतो, तो म्हणजे ‘बौद्धिक -
नसबंदी’ घडून येईल काय? तसे होऊ नये यासाठी श्रीसमर्थ रामदासस्वामी यांनी ‘कथा करावी घडघडाटे’ हा
के लेला उपदेश शिरोधार्ह मानणे, हे अपरिहार्य, आवश्यक, महत्त्वपर्णू असेच आहे. शिक्षणशास्त्राची खरी मेख
प्रकटीकरणातच आहे. लिहिणारे , वाचणारे , ऐकणारे ‘बोलके ’ व्हायला हवेत. पोपटाच्या ‘मिठू-मिठू’ पेक्षा
कोकिळे चे मजं ळू स्वरच ऐकू आले, तर नक्कीच मने उमलतील. शिक्षणाचे स्वरूप हेच असनू तीच परिणती
आहे. पेरलेले बीज उगवले पाहिजे, उगवलेली वेल डोलली पाहिजे, वेलीवरचे फूल उमलले पाहिजे, फुलाचा
सगु ंध दरवळला पाहिजे.
२२
Xmg~moYmVrb
ì`dñWmnZemñÌ
डॉ. श्रीराम ग. बापट.
व्यवस्थापन विद्येचा एक अभ्यासक, अनेक वर्षे विद्यार्थी - विद्यार्थीनींना व्यवस्थापनशास्त्र शिकविण्याचा योग
आला. अनेक उद्योग ससं ्थांमध्ये नेततृ ्व, सवं ाद कौशल्य, कार्यप्रेरणा व सघं -बांधणी या विषयांवर प्रशिक्षण
घेण्याचा योग आला. एक विशेष जाणवले म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोधातील अनेक
प्रसिद्ध ओव्यांमध्ये व्यवस्थापनाची बीजे सांगितलेली आहेत.
आपण ‘समर्थ’ या शब्दापासनू प्रारंभ करू. आपण म्हणतो की, उद्योग-व्यवसायात काम करणाऱ्या
माणसांमध्ये कार्य करण्याची पात्रता ( Capability) आणि उच्च नीतीमत्ता (Character) अत्यावश्यक आहे.
मला वाटते, ‘समर्थ’ या शब्दात या दोन्ही कल्पना चपखल बसल्या आहेत.
इग्रं जीतील गाजलेले पसु ्तक ‘Excellence in Management’ यात पहिला मद्ु दा दिला आहे. Bias for
Action म्हणजेच के ल्याने होत आहे रे , आधी के लेचि पाहिजे! आपल्या मनात सहजपणे घट्ट बसलेल्या
काही ओव्या पाहुया.
२३
शहाणे करूनी सोडावे। सकल जन।।
यामध्ये ‘प्रशिक्षण’ ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असनू सर्व थरांवर प्रशिक्षण आवश्यक असते. सतत
शिकण्याची तयारी म्हणजे “Learning Organization” याविषयी किती नेटके वर्णन आहे ! आपल्या
ओठावर असणाऱ्या अनेक ओव्या आपल्याला व्यवस्थापनाचे धडे देतात -
प्रसंगी अखडि
ं त वाचीत जावे।।
यातील प्रत्येक शब्द महत्वाचा नाही का? ‘यत्न उदडं ची करावा’ किंवा ‘प्रपचं ी असावे सावधान’ हे
शहाणपणाचे शब्द सर्वत्र विखरु लेले दिसतात.
मला नेहमीच असे वाटते की, भारतात ११०० मठांची स्थापना करणारा हा व्यक्ती नेततृ ्व व कर्तृत्व सिद्ध
करतो. खिशात एक दमडीही नसताना ! कल्पना करा एखाद्या जनरल मॅनेजरने भारतात ११०० शाखा
उघडल्या असत्या तर त्याचे वर्णन “Manager of the Decade” असे सहज के ले गेले असते, नाही का?
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातभृ ाषेतनू शिक्षणावर भर दिला जात आहे. त्यामळ
ु े श्रीरामदासांचा सदं श
े
योग्य प्रकारे पोहचेल अशी अपेक्षा करता येईल.
या रचना आदर्श नवसमाज निर्मितीस प्रेरक आहेत. आपले वैयक्तिक आणि औद्योगिक जीवन सार्थकी
लागेल. व्यवस्थापन विषयक विचारांचा आत्मा दासबोधात सापडतो, हे वैशिष्ठ्य मद्ु दाम अधोरेखित करावेसे
वाटते.
।।जय जय रघवु ीर समर्थ।।
२४
Xmg~moYmVrb
AÜ`mË_emñÌ
श्री.अविनाश पवार
दासबोध म्हणजे दासांना झालेला बोध. श्रीरामचद्रां ं नी रामदास स्वामींना जो आत्मबोध के ला त्यालाच
‘समर्थकृपेची वचने तो हा दासबोध’ असे म्हणण्यात येते. अर्थात हे श्रीरामदास स्वामींनीच त्यांच्या ग्रंथात
लिहिले आहे. बारा वर्षे टाकळीला तपश्चर्या के ल्यावर समर्थांना श्रीरामकृपेने ब्रह्मज्ञान झाले. श्रीरामरायाचा
अनग्रु ह तर त्यांना लहान वयातच झाला होता. बखरीप्रमाणे श्रावण श.ु ८ शके १५३८ (प.ृ क्र. ५४
समर्थावतार) वयाच्या अकराव्या वर्षी अनग्रु ह झाल्याचे म्हटले आहे. सद्रुगु कृपेशिवाय आत्मबोध होणे शक्य
नाही. सद्रुगु च भवसागरातनू तारून नेण्यास समर्थ आहेत. रामदास स्वामींचे सद्रुगु श्रीरामच होते. ते श्रीरामाला
‘समर्थ’ म्हणत म्हणनू त्यांचे वाङ्मय हे ‘समर्थकृपेची वचने’ म्हटल्या जाते. श्रीरामदासस्वामींनी अध्यात्माचे
अफाट, अगणित वाङ्मय निर्माण के ले. त्याच्यावर सरस्वतीचा, वाग्देवतेचा वरदहस्तच होता. त्यामळ ु े एवढे
वाङ्मय त्यांना निर्माण करता आले.
सरस्वतीचा अश
ं त्याच्यात होता हे देखील ते स्वतःच सांगतात व तिला ग्रंथारंभी वदं न करतात.
२५
माझ्या उपासनेचा बडिमार। ज्ञान सांगावे साचार।
मिथ्या बोलता उत्तर। प्रभसू लागे॥ १०.८.२७
इतके च नव्हे तर छातीठोकपणे सांगतात.
नाना साधनांचे उधार। हा रोकडा उत्तम साक्षात्कार।
वेदाशास्त्री जे सार। ते अनभु वास ये॥ १.९.३
अध्यात्मशास्त्र किंवा अध्यात्मविद्या ही सर्व विद्येत श्रेष्ठ आहे. ही विद्या म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त के ल्याने
अज्ञानाचा निरास होतो. जीवनातील दःु खे नाहीशी होतात. निरंतर साधना करीत राहिल्याने साधकाला
मोक्ष प्राप्ती होते. गीतेच्या तत्सम दासबोध हा मोक्षदानी ग्रंथ आहे. हे वाचकांनी लक्षात घ्यावे. दासबोध का
वाचावा? हे मी लिहिलेले छोटेखानी पसु ्तक वाचावे.
वेदशास्त्राचे सार दासबोधात समाविष्ट आहे. त्यामळ ु े इतर ग्रंथातील साधन करायची गरज नाही. अध्यात्मशास्त्र
हे एक विशाल अध्यात्मिक वाङ्मय आहे. यात नीतिशास्त्र, निरनिराळे पारमार्थिक योग, तत्त्वज्ञान, मोक्ष प्राप्त
करण्याची साधना; असे अनेक विषय समाविष्ट आहेत. या सर्वांचा इथे आढावा घेणे शक्य नाही. त्यामळ ु े
दासबोधातील काही मखु ्य विषय, साधना यांची चर्चा समर्थांच्या वाङ्मयाधारे करूया. श्रीमत् शक ं राचार्यांनी
‘सर्व वेदांत सिद्धांत सार संग्रह’ या अद्वैत ग्रंथात अध्यात्मशास्त्राचा सिद्धांत श्लोक ९९६ मध्ये सांगितला आहे.
त्याचा अर्थ खाली देत आहे.
‘अध्यात्मशास्त्राचा सिद्दांतच असा आहे की हे सर्व भासमान (विश्व, दृश्य पदार्थ) मिथ्या असल्याने त्यांचा
निरासच के ला पाहिजे. येथे अविद्या नाही किंवा माया नाही तर के वळ शांतस्वरूपाचे परब्रह्मच आहे. (सर्व
खल्विदं ब्रह्म)
याचेच पढु े विवरण करताना विवेकचडु ामणी ग्रंथात ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ हे तत्त्वज्ञान श्लोक २० मध्ये
सांगितले आहे. या सिद्धांताला अध्यात्मवाद म्हटले जाते. हेच तत्त्वज्ञान मराठी साक्षात्कारी संतांनी
त्यांच्या वाङ्मयात सांगितले आहे. या सिद्धांताला धरूनच निरनिराळ्या साधना सांगितल्या गेल्या आहेत.
ज्या कटाक्षाने अगं ीभतू के ल्याने परमात्म्याची अनभु तू ी येते. या तत्त्वाच्याच आधारे श्रीरामदास स्वामींनी
सांगितलेले तत्त्वज्ञान, साधना कशा परमार्थाला सहाय्य करतात, त्यांनी दाखविलेली ही मोक्षाची वाट किती
सल ु भ, सरळ आहे याचे विवरण पढु ील परिच्छेदात पाहूया.
मायेच्या अविद्येने भ्रम निर्माण झाला आहे. अधं ारात देखील सर्व समजणे हा भ्रम आहे. तो तात्पुरता असतो,
तमु ्हाला जेव्हा दोरीचे ज्ञान होते तेव्हा समीची भ्रांती जाऊन रज्जू असल्याचे यथार्थ ज्ञान होते. तसेच विश्व
आणि दृश्यपदार्थ हे भासमान आहेत. ते खरे नव्हते. या दृश्याच्या तळाशी ब्रह्मतत्त्व आहे. संपर्णू विश्व हे
ब्रह्माच्या अधिष्ठानावर उभारलेले आहे. दृश्य हे कालांतराने ना श होणारे असनू ब्रह्म हेच शाश्वत, नित्य आहे.
२६
पण हे तत्त्व सक्ू ष्माहून अतिसक्ू ष्म असल्याने ते डोळ्यांना दिसत नाही. त्याचे अस्तित्व आपण जाणू शकत
नाही.त्यासाठी ब्रह्मज्ञान प्राप्त करून या दृश्याचा उच्छेद, निरसन करायला हवा. दृश्याचा लोप झाला की
परब्रह्माचे अस्तित्व कळते व परमेश्वराची अनभु तू ी येते. आत्माराम ग्रंथात समर्थ शिष्याला लक्षपर्वू क ऐकायला
सांगतात.
तू आशक ं ा नाही घेतली। परी चितं ा मज लागली।
जे तझु ी भ्रांती मिटली। नाही अद्यापि॥ १.१९ आ.
समर्थांनी मी पणाची भ्रांती जाण्याकरिता एकवीस समासी जनु ा दासबोधात समास १३ ‘मीपणा निरसन३
समास १७ ‘दृश्यउच्छेद’, श्रीमत् दासबोदात ६.८ ‘दृश्यनिरसन’, ‘भ्रमनिरूपण’१०.६, इतके समास रचले
आहेत. तरीही मायेच्या जबरदस्त आकर्षणामळ ु े आपल्याला दृश्य पदार्थ, हे शरीर, इत्यादी सत्य वाटतात. ही
भ्रांती पनु ्हा ते आत्माराम या ग्रंथात दरू करतात. आत्मा हा निःसंग, निर्विकार आहे. देहाच्या उपाधी बरोबर,
देहांतसद्धा
ु आपल्याला जडली आहे. यास्तव समर्थ उपदेश करतात की-
संग तितक ु ा नाशिवंत। निःसंग शब्द अशाश्वत।
म्हणोनी संगानिःसंगातीत। होवोनि राहे॥ २.४१. आ
सगं ातीत म्हणजे मोक्ष। तेथे कै चे देखणे लक्ष।
लक्ष आणि अलक्ष। दोहीस ठाव नाही॥ ४.३०.आ
श्रीमत् दासबोधात लिहितात की हे दृश्य मिथ्या आहे. ते अविद्येने म्हणजे भ्रमामळ ु े निर्माण झाले आहे. या
अविद्येतनू च ‘मी देह आहे’ ही भ्रामक कल्पना देहबद्धि ु निर्माण करते.
दृष्टीने दृश्य देखिले। मन भासावरी बैंसले।
तरी ते लिंगदेह जाले। अविद्यात्मक॥ ६.८.३९
ही देहबद्धीु जन्मभर बळकट झाल्याने परब्रह्माची वाट या दृश्याने रोखली आहे.
देहबद्धि
ु के ली बळकट। आणि ब्रह्म पाहो गेला धीट।
तो दृश्याने सधिली वाट। परब्रह्माची॥ ६.८.४३
अविद्येच्या भ्रमामळ ु े सादकाला स्वतःचे खरे स्वरूप काय आहे हे कळत नाही. परब्रह्माच्या निर्गुण, निराकार
स्वरूपावेगळे जे जे दिसते। भासते, ते सारे भ्रमरूप आहे. दृश्य हे विकारी आहे. म्हणनू त्याचा उच्छेद करणे
आवश्यक आहे.
भ्रमरूप विश्व स्वभावे। तेथे काये म्हणोनी सांगावे।
निर्गुण ब्रह्मावेगळे अवघे। भ्रमरूप॥ १०.६.३६
२७
अविद्येचा, भ्रमाचा लय, निरास करण्याकरिता आत्मज्ञान अत्यावश्यक आहे. जसे दोरीचे ज्ञान झाले की
समीची भ्रांती जाते. तसे आत्मज्ञान प्राप्त झाले की दृश्याचे निरसन होऊन साधकाला दृश्याऐवजी परब्रह्माची
(परतत्वाची) अनमु ती येते. अज्ञानाचा भिन्नत्वाचा भ्रम तटु ू न जाण्याकरिता साधनांचे साधन ‘श्रवण’ आहे.
श्रवण मनन निजध्यासाचे साधन हे प्राचीन काळापासनू ,श्तरु ीमध्ये सांगितले आहे. तेच शिष्याला सांगतात
ते हे जाण रे श्रवण। करावे अध्यात्मनिरूपण।
मनन करिता समाधान। निजध्यासे पाविजे॥ ४.२ आ.
विमल ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्याने अविद्येचा नाश होतो. महावाक्याचे विवरण समजते, दृश्याचे निरसन होऊन द्वैत
मावळतो. हे आत्मज्ञानच स्वरूपाची प्रचिती करून देते.
ऐक ज्ञानाचे लक्षण। ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान।
पाहावे आपणासि आपण। या नाव ज्ञान॥ ५.६.१
देह बद्धि
ु ने बांधिला। तो विवेके मोकळा के ला।
देहातीत होता पावला। मोक्षपद॥ ६.२.३६
ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्याने अज्ञानाचा नाश होतो, दृश्य आणि द्रष्टा एक होतात. भिन्नत्वाचा भ्रम, द्वैत मिटून जाते
व स्वरूपाची प्रचिती येते.
दृश्य पदार्थ आटता। आपणहि नरु े तत्वतः।
ऐक्यरूपे ऐक्यता। मळ ु ीच आहे॥ ५.६.४८
आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यावर साधक स्वस्वरूपाच्या चितं नात बडु ू न जातो. त्याच्या बहिर्गामी वत्ृ ती अतं र्गत
होतात. साधकाला आत बाहेर परतत्त्वच भरून असल्याचे कळून येते. हा आत्मतत्त्वाचा बोध म्हणजे रामाचे
सर्वत्र दर्शन होय. पंचसमासीत खालील ओव्यांमधनू समर्थांना आलेली प्रचितीचा स्वानभु व झळकतो.
दाही दिशा अवलोकिता। रामचि भासे तत्वता।
वदन चक ु वू जाता। सन्मुख राम॥ ५.९
२८
साधकाने सदाचाराने सत्कार्याची कर्मे करायला हवी. उपासनेत स्वधर्माचरण व भक्तीचा भाव असणे गरजेचे
आहे. परब्रह्माच्या अस्तित्वावर श्रद्धा, भाव असायला पाहिजे. नाहीतर ‘भावे विण भक्ति’ ही व्यर्थ ठरते.
भगवंत भावाचा भक ु े ला। भावार्थ देखोनि भल
ु ला। ३.१०.१०
३०
देहाने, दृश्याने आपल्याला भरु ळ (भ्रम) पाडली आहे. आत्मज्ञान अद्वैताचा बोध नसल्याने विश्वभास सत्य
वाटतो. हा आतं रीचा भेद नाहीसा झाला की भास/भ्रम दरू होऊन हे विश्व ब्रह्मरूप असल्याचे कळे ल.
तजु नाही झाले ज्ञान शाश्वताचे। ध्यान या भतू ांचे करितोसी॥ १५
करितोसी वाद वगु ा विवाद। सांडवेना भेद अतं रीचा॥ १६
भास भ्रम नव्हे वस्तूचि के वळ। जीव हे सकळ ब्रह्मरूप॥ १८
यासाठी गरुु भक्ति, अभेद भक्ती करायचा समर्थांचा उपदेश आहे.
असो गरुु चे ठाई अनन्यता। तरी तजु कायसे रे चितं ा।
वेगळे पणे अभक्ता। उरोचि नको॥ ५.६.५२
देहबद्धि
ु चे आचरण सोडण्याकरिता, सदाचार, सत्कार्याची कर्मे करण्याकरिता, प्रपचं ाचा नाश करण्याकरिता
समर्थांनी सत्संगात जीवन घालविण्याचा सल्ला दिला आहे. सत्संगात राहिल्याने परमेश्वराच्या अस्ति भावाचा
उदय होतो. परमात्म्याचे सदैव, निरंतर सरू ु असल्याने भक्ती, आत्मज्ञान प्राप्त होते. देहाचा अहक
ं ार, मोह
ममता, याचा क्षय होतो.
या कारणे सतं सगं ती। धरिता प्राणी मक्तु होती।
ज्ञानामतृ सेवती। जेणे चक ु े जन्ममतृ ्यू॥ २४ सत्संगमहिमा
सत्संगाचा महिमा फार मोठा आहे. परिसाच्या सान्निध्यात लोखडं आले तर ते सोने होते. पण परिस सोने
करण्याचा गणु लोखडं ाला देत नाही पण सतं सज्जनांचा सहवास, सान्निध्य तसे नाही. त्यांच्या सहवासात
काळ घालविल्यावर साधक सतं च होतो. तो वेगळे पणाने उरत नाही.
कर्मानसु ार या लोकी। संगती सापडे बरी।
इहलोकपरलोकी। सत्संग पाहिजे बरा॥ १३ स.इ. साधना
श्रीसमर्थ रामदासस्वामींचे अध्यात्मिक वाङ्मय इतके अगणित व अफाट आहे की त्याचा सार ४-५ पानात
लिहिणे अशक्य आहे. वर विवरण के लेले काही मद्ु दे व त्याला आधारित समर्थाची वचने ही अल्पशी आहेत.
‘समर्थांची अमतृ वचने’ व ‘दासबोधातील साधना’ या दोन माझ्या पसु ्तकात बरे चसे स्पष्टीकरण आहे.
वाचकांना विनंती आहे की त्यांनी श्रवण करावी.
३१
Xmg~moYmVrb
^yemñÌ
प्रा. डॉ. सीताराम उमर्जीकर
समर्थ रामदासांनी टाकळी येथे १२ वर्षे तपश्चर्या करून नंतरची १२ वर्ष तीर्थाटनात व्यतीत के ली. किंबहूना
त्यानंतरच्या जीवनातही या ना त्या कारणास्तव त्यांची भ्रमतं ी सरू ु च होती. तीर्थाटनाच्या कालावधीत
त्यांनी संपर्णू भारतभ्रमण के ले आणि विशेष म्हणजे भ्रमतं ी अत्यंत जागरूकपणे, डोळे उघडे ठे वनू आणि
काही महत्वाची उद्दिष्टे समोर ठे ऊन संपर्णू भारताचे एक प्रचार निरीक्षण व परीक्षण करत भक्तीबरोबरच
अभ्यासालाही स्थान देत ही पर्णू तीर्थयात्रा पार पाडली. या यात्रेत त्यांनी प्रजेच्या स्थितीचे व ते अनभु वत
असलेली आपत्कालीन परिस्थिती पहिली. राजकारणाचा अदं ाज घेतला, मारुती स्थापन के ले, विविध
नद्यांमध्ये स्नान व देवदेवतांचे दर्शन घेतले, मठांची स्थापना के ली, लोकांचे दारिद्र्य, दःु ख व त्यांची होणारी
पिळवणक ू व्यथित अतं ःकरणाने पहिली. अध्यात्मिक चर्चा के ल्या, काही चमत्कार सद्धा ु करून दाखवले.
या सर्वांबरोबर आणखीन एक खपू महत्त्वाची गोष्ट त्यांनी के ली आणि ती म्हणजे भपू ष्ठा ृ चे काळजीपर्वू क,
कुतहू लाने व जिज्ञासेने निरीक्षण व चितं न के ले असे दासबोधामधल्या अनेक ओव्यातनू लक्षात येते. एकदृष्टीने
समर्थांनी भपू ष्ठा
ृ चा अभ्यास व चितं नच के ले असे मला वाटते. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर
असे त्यांनी के लेले प्राथमिक निरीक्षणातनू असे प्रतीत होते की भारताची भमू ी पहात असताना सपं र्णु वसधंु रा
त्यांच्या नजरे समोर होती एवढेच नव्हे तर त्यांचे विचार भपू ष्ठृ रचना, जळचर, जमिनीवर राहणारे व आकाशात
उडणारे प्राणी व पक्षी, भपू ष्ठा
ृ चा द्विपे, खडं े असा असलेला विस्तार हे त्यांनी वरील ओव्यातनू नेमके टिपले
३२
आहे व यातनू च त्यांची अधिक चितं नाची आवश्यकता त्यांना भासली असावी. भश ू ास्त्र म्हणजे नेमके काय
याचा विचार के ला तर पर्वीू या शास्त्राला (जिओलॉजि) अर्थात भगू र्भशास्त्र असे सबं ोधले जात असे. त्याचे
कारण पथ्वीृ च्या अतं रंगाचा अभ्यास त्यात प्रामखु ्याने के ला जात असे. तसेच पथ्वी ृ ची उत्पत्ती, खडक,
खनिजे, पथ्वी
ृ वरील खडं ांचे संवहन इत्यादींचा अतं र्भाव त्यात होता. पण शास्त्रात जशी प्रगती होऊ लागली
त्याप्रमाणे जिओलॉजि या शास्त्रात के वळ खडकच नव्हे तर उत्क्रांती कशी होत गेली हे समजण्यासाठी
जीवांचा अभ्यास, कोट्यवधी वर्षातील हवामानातील बदल जाणनू घेण्यासाठी वातावरणाचा अभ्यास व
पथ्वी
ृ वर जमिनीपेक्षा पाण्याचे प्रमाण फार मोठे असल्याने त्याचा अभ्यास करणे हे आवश्यक ठरले म्हणनू
जिओलॉजि हे शास्त्र भगू र्भ शास्त्र ऐवजी ‘भशू ास्त्र झाले’. यामध्ये भगू र्भ, भपू ष्ठृ , अतं राळ, अवकाश यांचा
समावेश होतो.
भशू ास्त्राच्या अभ्यासात धारतीशी संबंधित चार अवरणांचा अभ्यास करावा लागतो त्यात पाहिले वातावरण
जे वायू व पाण्याची वाफ यांनी बनलेले आहे. दसु रे जलावरण जे भपू ष्ठृ व भगू र्भातील नैसर्गिक रीतीने उत्पन्न
झालेल्या जलांनी बनलेले आहे. तिसरे जीववरण हे सक्ू ष्म तसेच लहान मोठ्या आकाराच्या जीवांनी बनलेले
आहे आणि चौथे शिलावरण जे कठीण खडक, खनिजे यांनी बनलेले आहे; त्यात भक ु वच व भगू र्भ हा भाग
येतो. हे सर्व सांगण्याचे कारण असे कीं पथ्वी
ृ चे समर्थांनी दासबोधात या चारही आवरणात आढळणाऱ्या
घटकांचे चितं न करून त्यांचे निरीक्षण नोंदवले आहे. पथ्वी
ृ ची उत्पत्ती एका विविध वायू आणि धलि ू कण याने
बनलेल्या तेजोमायापासनू झाली. ही निर्मिती होत असताना वायचू ्या गोळ्याचे शिलारसात रूपांतर व त्यातनू
पाण्याची वाफ प्रचडं प्रमाणात बाहेर पडून थंड होणाऱ्या पथ्वी
ृ वर पावसाचा धआ ु धार वर्षाव झाला. समद्रु
तयार झाले व पथ्वी ृ पाण्याने भरून गेली हा सिद्धांत अलीकडे झालेल्या संशोधनातनू मांडला जातो. समर्थांनी
एका ओवीत हेच मांडले-
वायोपासनि
ू तेज जालें। तेजापासनि
ू आप निपजलें।
आपापासनिू आकारलें। भमू डं ळ।। ६-३-१३
अशीही पथ्वीृ निर्माण होऊन समु ारे ४५०० वर्षे झाली. इतक्या मोठ्या कालावधीची गणना काशी, याचा
उल्लेख करून, समर्थांनी एका अर्थाने पथ्वी
ृ चे आकल्प प्राचीनत्व सांगितले. भश ू ास्त्रात ४५०० कोटी
वर्षासाठी एक ‘टाइम स्के ल’ आहे. याच धर्तीवर पथ्वी
ृ चे प्राचीनत्व अप्रत्यक्षपणे मांडण्यासाठी समर्थानी
यगु ांच्या आधारावर तयार के लेल्या कालमापन पट्टी निर्देशित के ली आहे.
३३
कलयगु च्यारिलक्ष बत्तीससहस्र। चतर्युु गें त्रेचाळिसलक्ष वीससहस्र।
ऐसी चतर्युु गें सहस्र। तो ब्रह्मयाचा येक दिवस।। ६-४-२
चर अचरांची ही पथ्वी
ृ निर्माण झाली आणि त्याचा विचार के ला तर त्याला अतं नाही! अशीही अमर्याद
कालाची लांबी समर्थांना नक्कीच जाणवली होती. शिलावरणाबद्दल समर्थांचे निरीक्षण अचक
ू आहे ते
म्हणतात-
विविध ठिकाणी माती वेगळी आणि विविध पाषाणाचे प्रकार, मातीचे वाळूचे प्रकार यासर्वांनी मिळून पथ्वी
ृ
बनली आहे असे ते सांगतात. त्यांचे आणखी एक निरीक्षण उदबोधक आहे ते म्हणतात-
रस होऊन वितळ
ु तें। पनु ्हा पथ्वी
ृ ।। १५-४-१३
३४
खपू खोलवर भगू र्भात आधी असलेल्या खडकांच्या वितळण्याचा प्रक्रियेने नव्याने रूपांतरित खडक
तयार होतात याची कल्पना समर्थांना आली हे खरोखर त्यांच्या चितं नशीलतेची प्रगल्भता दर्शवते. आधी
तयार झालेले अग्निजन्य किंवा थरांचे खडक भगू र्भातील उष्णतेने वितळून थंड होतात असताना त्यांचे
स्फटिकीकरण होऊन नवे रूपांतरित खडक तयार होतात हे नेमके वरील ओवीत सांगितले आहे.
किंवा
भगू र्भामधे तयार झालेले धात,ू विविध रत्ने, हिरे , हे वरच्या खडकाची झीज होऊन ते आवरण नष्ट झाल्यावर
मग उघडे पडतात तो पर्यंत ते कवचाखाली गप्तु चं असतात. झीज झाल्यावर हे गप्तु धन प्रकट होते हे त्यांनी
ओळखले होते.
अशा प्रकारचे चितं न करून समर्थांनी अभ्यासू वत्ृ तीने निरीक्षणे नोंदवली आहेत. वैशिष्ठ असे कि पर्वतांच्या
वरचे कडे सद्धा
ु समर्थांच्या नजरे तनू सटु ले नाहीत. त्यांचे वेगळे पण सद्धा
ु त्यांच्या निरीक्षणातनू त्यांनी स्पष्ट
के ले.
नाना समद्रा
ु पैलीकडे। भोंवतें आवर्णोदकाचें कडें।
असभं ाव्य तटु ले कडे। भमू डं ळाचे।।
हे निरीक्षण फार महत्वाचे आहे. भारताचा पश्चिम घाटाचा कोकणाकडचा भाग हा प्रचडं उंचीचा कडा आहे.
त्याच्या पायथ्याशी समद्रु आहे तेथे किंबहुना भारताची सपं र्णू पश्चिम किनारपट्टी भ्रांशीत म्हणजे FAULTED
आहे. असे मानले जाते कीं या ठिकाणी खडकातील मोठ्या भेगांवर खडक तटु ू न ते घसरले व पश्चिमे कडचा
खडकाचा मोठा भाग खाली घसरून पाण्याखाली गेला व वर संह्याद्रीचा पश्चिमदिशेला कडा तयार झाला याच
कड्याचा निर्देश आवर्णोदका भोवतालचे “असंभाव्य कडे” असा उल्लेख वरील ओवीत करतात.
३५
खडक आणि खनिजे या प्रमाणेच भश ू ास्त्राला अगदी जवळचा विषय म्हणजे पाणी. के वळ नद्यांचे पाणी
अथवा सागराचे पाणी एव्हढा उल्लेख करून समर्थ थांबले नाहीत तर
पथ्वी
ृ चें मळू जीवन। जीवनाचें मळू दहन।
दहनाचें मळ
ू पवन। थोराहून थोर।। १६-४-३०
असे समर्थ आपले निरीक्षण नोंदवतात. आज आपल्याला माहित आहे की पथ्वी ृ वर ७९% पाणी व २१%
भभू ाग आहे. यापार्श्वभमू ीवर समर्थांचे चितं न फार महत्वाचे आहे. याहून पढु चे म्हणजे पथ्वी
ृ वरील पाण्याचा
उगम, स्वरूप, स्थाने, इत्यादी विषयी भश ू ास्त्रीय माहितीच ते ओव्यांमधनू समोर ठे वतात. त्यांनी दासबोधात
ओव्यांतनू सचु वल्या प्रमाणे के वळ पष्ठृ भागावरच नद्यांचे डोह आहेत असे नव्हे तर
पथ्वी
ृ तळीं पाणी भरलें। पथ्वी
ृ मधें पाणी खेळे।
पथ्वी
ृ वरी प्रगटलें। उदडं पाणी।।२८।।
हे वाचल्यावर आपले मन आश्चर्यचकित होते. ते समर्थांच्या कल्पनेची भरारी किती तर्क शद्ध ु व पारदर्शक होती
हे पाहून त्यांनी उल्लेखिलेले उदकांचे प्रकार वाचनू ४०० वर्षांपर्वी
ू समर्थांनी हे सर्व तर्क ससु ंगतीतनू सांगितले
याचे खरोखर नवल वाटते.
पथ्वी
ृ स आधार आवर्णोदक। सप्तसिंधचू ें सिंधोदक।
नाना मेघीचें मेघोदक। भमू डं ळीं चालिलें।। १६-४-२
३६
कूप बावी सरोवरें । उदडं तळीं थोरथोरें ।
निर्मळें उचबं ळती नीरें । नाना देसीं।। १६-४-५
गायेमख
ु ें पाट जाती। नाना कालवे वाहती।
नाना झऱ्या झिरपती। झरती नीरें ।। १६-४-६
हे वाचल्या नंतर समर्थांच्या निरीक्षणाने मन थक्क होऊन जाते. याहून पढु े जाऊन समर्थ लिहितात
जितक
ु े गिरी तितकु ्या धारा। कोंसळती भयंकरा।
पाभळ वाहाळा अपारा। उकळ्या सांडिती।।८।।
जमीनीतनू कारंजासारखे पाणी सारखे उडत असते असे निरीक्षण हे भश ू ास्त्रात ज्याला artesian अवस्था
म्हणतात त्याचे आहे. प्रचडं दाबाखाली असलेले भगू र्भातले पाणी भेणेमधनू वर येऊन कारंजासारखे उडू
लागते! पाण्याचे Geysers म्हणजे उष्णोदक याबद्दल ही ते सांगतात-
भजू ल, भपू ष्ठृ जल, आर्टिशिअन जल, नद्या, समद्ु ,रे सरोवरे , झरे , कालवे, तळी हे सर्व प्रकार समर्थांनी वर्णिले
आहेत. भश ू ास्त्रात हा मोठा अभ्यासाचा भाग आहे.
पथ्वी
ृ वरील प्राण्यांच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेशी सबं ंधित ही काही ओव्या आहेत.
विश्वाच्या उभारणी सहं ारणीचा विचार करावा असे समर्थ सचु वितात. लय हा शब्द महत्त्वाचा आहे. जीवांच्या
उत्क्रांतीमध्ये अस्तित्वात असलेले जीव वातावरणातील बदलाने लय पावतात म्हणजेच पनु ्हा तसे जीव
जन्मत नाहीत (extinetion) व नव्या प्रकारचे जीव जे नव्या वातावरणात आपल्या अगं भतू सामर्थ्याने टिकू
३७
शकतात, पनु ्हा अस्तित्वात येतात. म्हणनू समर्थ सांगतात-
त्यात
अवघें सीतळचि असते। प्राणिमात्र मरोन जाते।
अवघ्या उष्णेचि करपते। सकळ काही।। १६-१७-१४
अत्यंत शीतलता पथ्वीृ वर हिमयगु ाच्या रुपाने येते व वातावरणातल्या या बदलांमध्ये उष्ण हवामानाला
सरावलेले प्राणी मरतात व लय पावतात. नंतर हजारो वर्षांनी जेव्हा वातावरण उष्ण होऊ लागते तेव्हा पनु ्हा
जनु े प्राणी लयाला जातात. नवे प्राणी जन्मतात. जलचर व भजू ल या दोघांनाही हा नियम लागू आहे.
थोडक्यात समर्थांना पथ्वीृ वर भतू काळात झालेल्या भश ू ास्त्रीय घडामोडींचा निश्चितपणे अदं ाज होता. खडक व
खनिजे पाणी, भपू ष्ठृ रचना, हिमयगु , वातावरणातले शीतोष्णते मधले बदल, उत्क्रांति अशा भश ू ास्त्रीय घटनांची
तर्क शद्ध
ु रीतीने समर्थांना पक्की जाणीव होती, हे यावरून निश्चितपणे समजते. आणि त्यांच्या निरीक्षणाबद्दल
तर्क ससु गं तीबद्दल व निष्कर्षांच्या अचक ू तेबद्दल सार्थ अभिमान वाटतो. भश ू ास्त्रात एक सिद्धांत फार महत्त्वाचा
आहे. तो म्हणजे Present is key to the past. वर्तमानकाळातल्या चालू असलेल्या घटना भतू काळात
काय घडले असावे हे ओळखण्याची किल्ली आहे. या सिद्धांताप्रमाणे समर्थ रामदासांनी तीर्थयात्रेत व
तदनंतरच्या भ्रमतं ीत शास्त्रीय दृष्टीने के लेले निरीक्षण फारच महत्त्वाचे ठरते. म्हणनू च समर्थ म्हणतात-
ऐसा पथ्वी
ृ चा महिमा। दसु री काय द्यावी उपमा।।
।।जय जय रघवु ीर समर्थ।।
३८
Xmg~moYmVrb
g§JrV{df`H$ {dMma
डॉ. पं. कमलाकर परळीकर
समर्थ रामदास स्वामींचा हा उपदेश बहुतेक सर्वांना माहित आहे. कितीतरी माणसे या उपदेशानसु ार लिखाण
करीत असतात व वाचनही करीत असतात. मी ही त्यापैकी एक सामान्य गायक , वाचक व लेखक. मानवी
जीवनात सतं ांच्या उपदेशाला अनन्यसाधारण महत्व आहे, हे आपण सर्वजण जाणतो. सतं ांचे बोलणे, सतं ांचे
अभगं , सतं ांचे वागणे, सतं ांचे जीवन यांचा जेव्हा आपण अभ्यास करु लागतो, तेव्हा लक्षात येते, की प्रत्येक
संताने समाज जागतृ ीसाठी संगीताचा उपयोग कमी अधिक प्रमाणात के ला आहे. म्हणजेच संगीत कलेचे ज्ञान
त्यांना होते असे दिसते. बऱ्याच संतांच्या अभगं ातनू संगीत कलेचा उल्लेख के लेला आपल्याला दिसनू येते.
हे जरी खरे असले, तरी समर्थ रामदासांचा जेंव्हा आपण अभ्यास करु लागतो, तेव्हा लक्षात येते की समर्थ
रामदास स्वामी इतर सतं ांच्या मानाने खपू वेगळे सतं होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती करताना
ते म्हणतात –
किंवा
समर्थांनी “दासबोध” ग्रंथ लिहिला. तो मानवी जीवनाला कें द्रस्थानी माननु . मानवाला उपयक्त
ु ठरणाऱ्या
अनेक विषयांना त्यांनी स्पर्श के ला आहे. त्यात सगं ीत सधु ्दा आहे. त्याचाच आपण आता विचार करणार
आहोत. संगीताचा इतका सखोल विचार के लाला दसु रा संत आपल्याला आढळणार नाही असे नाईलाजाने
का असेना म्हणावेच लागेल. संगीताचा त्यांचा अभ्यास त्यांवरचे चितं न मनन यातनु हे विचार प्रगट झालेले
आहेत हे समजते.
३९
दासबोध आणि समर्थ सगं ीत -
म्हणजेच जिथे भक्त गायन करतात, तिथे भगवंत तिष्ठत राहतात. संगीत कला देवाला किती आवडते हे यावरुन
लक्षात येते. सगं ीत कलेची महती समर्थ रामदास स्वामींनी “धन्य ते गायनी कळा” या बारा कडव्याच्या
काव्यातनू सांगितली आहे. ही कला प्राप्त होण्यासाठी प्रथम मानव योनीत जन्म मिळावयास हवा. म्हणनू ते
म्हणतात –
या ठिकाणी गायन कळा, संगीत कळा असे वेगवेगळे शब्द जाणीवपर्वू क समर्थांनी वापरले आहेत. गायन
म्हणजे गाणे आणि सगं ीत म्हटल्यावर गायन , वादन आणि नतृ ्य या तीन कलांना मिळून सगं ीत असे नाव
आहे. आणखी एक शब्द या ठिकाणी त्यांनी वापरला आहे. तो म्हणजे “अतं र्क ळा”. प्रत्येक माणसाला
जन्मापासनू च अनेक कला देऊन परमेश्वराने पाठविलेले असते. आपल्याला कोणकोणत्या कला आहेत हे
त्याला माहित नसते. परंतु प्रसंगानसु ार त्या दिसनू येतात. एकाच व्यक्तित अनेक कला गणु आहेत अशा व्यक्ति
समाजात दिसतात. साहित्य, सगं ीत, नाटक, अभिनय, वर्क्तृ त्व, चित्रकला, शिल्पकला, दिग्दर्शन, नकला वगैरे
कला अगं ी असणारी माणसं आपल्याला सापडू शकतात. या सर्व कला देह प्राप्त झाला तरच शक्य आहेत.
समर्थ याविषयी बोलताना दिसतात –
तज्ञ गरुु कडूनच ही गायन ,वादन कला शिकायला पाहिजे तरच तो शिष्य कलावतं होईल. नावलौकिक प्राप्त
होईल. आलापचे प्रकार शिकता येतील. संगीतात “रागालाप” व “रुपकालाप” असे दोन प्रकार आलापचे
सांगितले आहेत. ते गायकास माहित पाहिजेत. त्यासाठी शिकणे गरजेचे आहे. या शिकण्याच्या जोडीला
४०
समर्थांनी श्रवणाचे महत्वही सांगितले आहे. ते म्हणतात –
श्रवणे आशक
ं ा फिटे| श्रवणे संशय तटु े|
श्रवण होता पालटे| पर्वु गणु आपलु ा|| ७-८-५
मनात ज्या शक ं ा असतात त्या श्रवणाने दरू होतात. मग विषय कोणता का असेना. काहि पर्वू ग्रह असतील
ते बदलतात. सगं ीत शिकताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. श्रवण, मनन, चितं , रियाज यातनू च
कलावतं घडत जातो. सगं ीतात या गोष्टीला अतिशय महत्व आहे. त्यामळ ु े गाणे शिकण्यापर्वी
ू शिष्याला गरुु
नसु ते ऐकावयास बसवत. तंबोरा सरु े ल लावनू देऊन तो तासन तास ऐकावयास सांगत. ऐकण्याचा सराव
झाल्यावर जेंव्हा तो स्वर मनात पक्का बसला, असे वाटले की मग प्रत्यक्ष शिक्षण सरुु होत असे. श्रवणासारखे
दसु रे साधनच नाही. त्या शिवाय काम पढु े सरकत नाही. श्रवणातनू आवड निर्माण होते. रसिकता वाढीस
लागते. ज्ञान प्राप्त होते. त्यामळ
ु े श्रवण महत्वाचे आहे.
आपल्याला ज्या विषयातले ज्ञान आहे, ते इतरांना हळूहळू शिकवावे व त्यांनासधु ्दा परिपर्णू करावे. ज्ञान
के वळ स्वत:कडेच ठे वू नये. ते शिष्यांना , समाजातील इतर मडं ळींना देत जावे. म्हणजे समाजात जाणकार
मडं ळी तयार होतील. गरुु ने आपले ज्ञान मक्त ु हस्ते शिष्यांना द्या वयास हवे तर शिष्य सधु ्दा तसेच कलेच्या
क्षेत्रात ज्ञानी होतील. व ते कलेच्या प्रसारासाठी पात्र होतील. आणि त्यांच्या ज्ञानाचा समाजाला व पढु च्या
पिढीला उपयोग होईल.
सगं ीताविषयी “दासबोध” ग्रंथात अनेक महत्वाचे विचार समर्थ रामदास स्वामींनी मांडले आहेत. अभ्यास
झाल्यावरच माणसाने प्रगट व्हावे असे समर्थ म्हणतात. हा विचार सर्वांसाठीच लागू आहे. विषय कुठलाही
असो अभ्यास झालेला असेल तरच बाहेर पडावे. संगीताच्या बाबतीत तर हा विचार महत्वाचाच आहे.
४१
एका तपाचा अभ्यास, रियाज झालेला असेल तरच गरुु शिष्याला गाण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी
परवानगी देत असत. त्याच्या सगं ीत कला सादरीकरणाची गरुु ला खात्री झालेली असेल तरच हे शक्य होत
असे, नव्हे होत असते. अभ्यास झालेला असेल तरच प्रगट व्हावे असे समर्थ म्हणतात ते याचसाठी. अभ्यास
झालेला नसेल तर फजीती होते. ती टाळायची असेल तर झाकोन रहावे असे समर्थ सचि ू त करतात. हा
अतिशय मोलाचा सल्ला आहे.
परमेश्वराच्या नामस्मरणाविषयी जरी या ठिकाणी समर्थांनी सांगितले असले तरी ही गायकानी रियाज कसा
करावा याचादेखील यातनू बोध होतो. गायिलेले बंदिश, गीत, रागाचे आलाप, ताना पनु ्हा पनु ्हा गात जावे,
आवडीने गावे, कंटाळू नये असे गायक कलाकारांना समर्थ रामदास स्वामी या ठिकाणी सांगतात. रियाजामळ ु े
गाण्यात सहजता येते, आत्मविश्वास वाढतो, स्वरांवर व रागावर प्रभतू ्व प्राप्त होते. असे जाणकार गायक
कलाकारांचा अनभु व आहे. त्यामळ ु े या कलेस रियाजाशिवाय पर्याय नाही.
लग्नसोहळयात गाण्यासाठी जाऊ नये विवाह व्यवसाय म्हणनू तरी गाऊ नये असे मत त्यांनी व्यक्त के ले आहे.
पैसे घऊन कीर्तन करु नये असेही ते म्हणतात. त्या काळी सधु ्दा लग्नात गाण्याचे कार्यक्रम होत असावेत असे
४२
दिसते. जे समर्थांना नको वाटतात. हल्ली अनेक लग्न सोहळयात छोटया मोठया गायकांचे गाणे व गायकांचे
मगं लाष्टके चढाओढीने गायिलेले ऐकु येतात. खरे ना ?
वायमु ळ ु े च शब्द श्रोत्यांपर्यंत पोचतात. वायमु ळु े च बोलणे, गाणे श्रोत्यांपर्यंत ऐकु येते. श्वासावरच हे सर्व
अवलंबनु आहे. रागोध्दार वायमु ळ ु े च होतो. स्वरशास्त्र व स्वरशास्त्रानसु ार यधु ्दाची वेळ प्रभु रामचद्रां
ं नी ठरवली
होती असे मानतात. मत्रं उच्चारण्यासाठी स्वरशास्त्राची गरज असते तर रागोध्दारासाठी स्वरोदय शास्त्राची
गरज असते. कंु डलिनी जागतृ ी झाल्यावर हे दोन्ही शास्त्र साध्य होतात. कलाकारांना स्वर सिध्द करुन घ्यावे
लागतात. तरच रागसिध्दी प्राप्त होते. अशी सिध्दी प्राप्त झाल्यावरच दिपक राग गायिल्यावर दिवे लागू
शकतात व मेघ मल्हार राग गायिल्यावर पाऊस पडू शके ल. असे सिध्द गायक पर्वी ु च्या काळी होते म्हणनू
दिवे लागत असत व पाऊस पडत असे. रागाचा उध्दार जेव्हा होतो, तेव्हाच असे चमत्कार घडतात. रागोध्दार
ही सगं ीत कल्पना समर्थ रागदास स्वामींनीच प्रथम वापरली आहे. हा सगं ीत विचार न भरताच्या नाटयशास्त्रात
आहे ना शारंगदेवांच्या संगीत रत्नाकरात आहे, ना अधनि ु क शास्त्रकार पं. विष्णु नारायण भातखडं ेंच्या
हिदं सु ्थानी संगीत पध्दतीत आहे. हा विचार फक्त समर्थ रामदास सारख्या संगीततज्ञ संतालाच सचु ु शकतो.
सगं ीत हा विषयच मळ ु ात अमर्तू व गहन आहे. जितक्या खोलात आपण शिरु तितके त्यांत काहि तरी नवीन
सापडते. 350 वर्षांपर्वी
ू समर्थ रामदासांनी जे सांगितीक विचारधन लिहून ठे वले आहे. ते आजच्या काळीही
तितके च महत्वपर्णू आहे. संतांचे विचार त्रिकालाबाधीत असतात. ते सर्व काळात लागू होतात. समर्थांनी
जसे अभगं लिहिले, त्स्फु ट लेखन काव्य के ले, आरत्या लिहिल्या. मनाचे श्लोक, करुणाष्टके लिहिली. मारुती
स्तोत्र लिहिले. तसेच त्यांनी रागदारी सगं ीताच्या २५०/३०० बंदिशी लिहिल्या. त्यावर रागाची, तालाची नावे
लिहिली. काहि बंदिशी मराठीत तर काहि हिदं ी भाषेत लिहिल्या आहेत. इ.स. १६३२ ते १६४४ या १२ वर्षांत
समर्थानी भारत भ्रमण के ले होते. त्या काळातील लोकांची राजकीय , सामाजिक , सांस्कृ तीक व सांगितीक
परिस्थिती अतिशय जवळून त्यांनी पाहिली. म्हणनू ते म्हणतात -
वर्णि स्त्रीयांचे आवेव| नाना नाटके हावभाव|
देवा विसरो जो मानव| तो एक पढत मर्ख ू || २-१०-१९
नाना प्रकारे हावभाव करुन स्त्रीयांच्या अवयवाचे वर्णन करणाऱ्या गायकांना ते पढत मर्खु म्हणतात. कुठे ना
कुठे तरी या भ्रमण काळात त्यांनी अशा गायकांना ऐकले असणारच. म्हणनू ते त्यांना पढतमर्ख ु म्हणतात.
संगीत सरुु वातीला मदं िरातच गायले जायचे. नंतर ते दरबारात पोचले. पढु े त्याचा उपयोग मनोरंजनासाठी
होऊ लागला. राजेरजवाडे यांचे मनोरंजन करणे , त्यांना आवडतील अशा काव्य रचना बंदिशीत घालणे व
त्यांना खषू करणे हा उद्योग सरुु झाला. भारतीय शास्त्रीय सगं ीतातील बंदिशी मध्ये पिया, सैया, बलमा, सास,
ननंद, जेठनिया यांच्या जोडीला स्त्रियांच्या अवयवाचा उल्लेख झालेला दिसतो. जे समर्थांना खटकले. पढु ील
काळात अशा बंदिशी संगीतात येऊ नये असे समर्थांना वाटले आणि त्यांनी २५०/३०० बंदिशी रचल्या. राग
कल्याण मधील ही बंदिश पहा –
४३
दिसते. जे समर्थांना नको वाटतात. हल्ली अनेक लग्न सोहळयात छोटया मोठया गायकांचे गाणे व गायकांचे
मगं लाष्टके चढाओढीने गायिलेले ऐकु येतात. खरे ना ?
वायमु ळ ु े च शब्द श्रोत्यांपर्यंत पोचतात. वायमु ळु े च बोलणे, गाणे श्रोत्यांपर्यंत ऐकु येते. श्वासावरच हे सर्व
अवलंबनु आहे. रागोध्दार वायमु ळ ु े च होतो. स्वरशास्त्र व स्वरशास्त्रानसु ार यधु ्दाची वेळ प्रभु रामचद्रां
ं नी ठरवली
होती असे मानतात. मत्रं उच्चारण्यासाठी स्वरशास्त्राची गरज असते तर रागोध्दारासाठी स्वरोदय शास्त्राची
गरज असते. कंु डलिनी जागतृ ी झाल्यावर हे दोन्ही शास्त्र साध्य होतात. कलाकारांना स्वर सिध्द करुन घ्यावे
लागतात. तरच रागसिध्दी प्राप्त होते. अशी सिध्दी प्राप्त झाल्यावरच दिपक राग गायिल्यावर दिवे लागू
शकतात व मेघ मल्हार राग गायिल्यावर पाऊस पडू शके ल. असे सिध्द गायक पर्वी ु च्या काळी होते म्हणनू
दिवे लागत असत व पाऊस पडत असे. रागाचा उध्दार जेव्हा होतो, तेव्हाच असे चमत्कार घडतात. रागोध्दार
ही सगं ीत कल्पना समर्थ रागदास स्वामींनीच प्रथम वापरली आहे. हा सगं ीत विचार न भरताच्या नाटयशास्त्रात
आहे ना शारंगदेवांच्या संगीत रत्नाकरात आहे, ना अधनि ु क शास्त्रकार पं. विष्णु नारायण भातखडं ेंच्या
हिदं सु ्थानी संगीत पध्दतीत आहे. हा विचार फक्त समर्थ रामदास सारख्या संगीततज्ञ संतालाच सचु ु शकतो.
सगं ीत हा विषयच मळ ु ात अमर्तू व गहन आहे. जितक्या खोलात आपण शिरु तितके त्यांत काहि तरी नवीन
सापडते. 350 वर्षांपर्वी
ू समर्थ रामदासांनी जे सांगितीक विचारधन लिहून ठे वले आहे. ते आजच्या काळीही
तितके च महत्वपर्णू आहे. संतांचे विचार त्रिकालाबाधीत असतात. ते सर्व काळात लागू होतात. समर्थांनी
जसे अभगं लिहिले, त्स्फु ट लेखन काव्य के ले, आरत्या लिहिल्या. मनाचे श्लोक, करुणाष्टके लिहिली. मारुती
स्तोत्र लिहिले. तसेच त्यांनी रागदारी सगं ीताच्या २५०/३०० बंदिशी लिहिल्या. त्यावर रागाची, तालाची नावे
लिहिली. काहि बंदिशी मराठीत तर काहि हिदं ी भाषेत लिहिल्या आहेत. इ.स. १६३२ ते १६४४ या १२ वर्षांत
समर्थानी भारत भ्रमण के ले होते. त्या काळातील लोकांची राजकीय , सामाजिक , सांस्कृ तीक व सांगितीक
परिस्थिती अतिशय जवळून त्यांनी पाहिली. म्हणनू ते म्हणतात -
वर्णि स्त्रीयांचे आवेव| नाना नाटके हावभाव|
देवा विसरो जो मानव| तो एक पढत मर्ख ू || २-१०-१९
नाना प्रकारे हावभाव करुन स्त्रीयांच्या अवयवाचे वर्णन करणाऱ्या गायकांना ते पढत मर्खु म्हणतात. कुठे ना
कुठे तरी या भ्रमण काळात त्यांनी अशा गायकांना ऐकले असणारच. म्हणनू ते त्यांना पढतमर्ख ु म्हणतात.
संगीत सरुु वातीला मदं िरातच गायले जायचे. नंतर ते दरबारात पोचले. पढु े त्याचा उपयोग मनोरंजनासाठी
होऊ लागला. राजेरजवाडे यांचे मनोरंजन करणे , त्यांना आवडतील अशा काव्य रचना बंदिशीत घालणे व
त्यांना खषू करणे हा उद्योग सरुु झाला. भारतीय शास्त्रीय सगं ीतातील बंदिशी मध्ये पिया, सैया, बलमा, सास,
ननंद, जेठनिया यांच्या जोडीला स्त्रियांच्या अवयवाचा उल्लेख झालेला दिसतो. जे समर्थांना खटकले. पढु ील
काळात अशा बंदिशी संगीतात येऊ नये असे समर्थांना वाटले आणि त्यांनी २५०/३०० बंदिशी रचल्या. राग
कल्याण मधील ही बंदिश पहा –
४४
कल्याण माझे नाम तझु े | नाम तझु े कल्याण माझे |
सकं ट वारी भये निवारी | सारी भव अपहारी |
दास म्हणे पर पार पाववी | उतरवी जीव बघ भवार्णव ||
४५
Xmg~moYmVrb
{ZVremñÌ
डॉ. सौ. समिता टिल्लू
मानवाला उन्नतपदाला उन्नत पोहोचवणारे साहित्य म्हणजे सतं वाङ्मय याला पाचवा वेद म्हणतात. सतं
साहित्य हे ससं ्कृ तीचा अविभाज्य भाग असनू तो आपला श्रीमतं वारसा आहे. सतं साहित्य हे विस्तार, प्रकार
व खोली या दृष्टीने लोकविलक्षण आहे.
श्रीज्ञानेश्वरांपासनू ते समर्थ रामदासस्वामींपर्यंत अनेक सतं ांचे विचार आत्मिक स्फु रणातनू निर्माण झालेले
आहेत. सतं ांचे जीवन व लिखाणातनू प्रेरित होणारी जी दृष्टी आहे ती त्यांच्या आर्त मनाची व्यापक दृष्टीची
साक्ष देणारी व बहुजन समाजाच्या उन्नतीची आहे.
श्रीसमर्थ या परंपरे तील थोर सतं होऊन गेले. त्यांनी प्रपचं व परमार्थ यांचा उभयान्वयी विवेक मांडला. त्यांचे
स्वतःचे चारित्र्यसपं न्न राजकारणी सतं ांचे गतिमान जीवन, त्यांचा लोकसग्रं ही कर्मयोग, त्यांची तेजस्वी धर्मदृष्टी
होतीच. परंत,ु त्यांच्या जीवनाचे सार त्यांच्या उदडं वाङ्मयात २६३५० ओळींचे प्रकाशित लिखित वाङ्मयात
आणि व्यापक कार्यात आहे.
ग्रंथराज दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, करुणाष्टके , यद्ध ु कांड, सदंु रकांड, अस्मानी सल
ु तानी, स्फु ट
वाङ्मय, हिदं ी पदे, कविता, गाथा अशाप्रकारे त्यांचा विस्तार आहे. चारशे वर्षांनंतर हि समर्थांच्या वाङ्मयसंपदेचे
अनेक आयाम दिसतात. विचार, उच्चार, आचार यांमध्ये एकरूपता असणाऱ्या या संतांच्या वाङ्मयात नीतीचे
स्वरूप काय होते, हे सर्वार्थाने जाणनू घेणे उचित ठरे ल.
नितीविचाराचे स्वरूप-
मानवी जीवन जास्तीत जास्त शद्ध ु कसे होईल ते पाहणे हा नितीशास्त्राचा अव्याहत ध्यास आहे. चांगले
वर्तन म्हणजे काय, वाईट वर्तन म्हणजे काय, योग्य अयोग्य म्हणजे काय ठरविणे नीतीचे काम आहे. मानवी
प्रवत्ृ तीच्या गाभ्यापर्यंत जाऊन कोणती जीवनमलू ्ये चांगली हे ठरवनू त्या जीवमलू ्यांची श्रेणी निर्माण करणे हे
नितीशास्त्राचे काम आहे.
समर्थ रामदास ज्यावेळी देशाटनासाठी निघाले तेव्हा कोलमडती अर्थव्यवस्था, जल ु मी राज्यकर्ते, भ्रष्ट शासन,
न्याय अन्यायाच्या परिसीमा ओलांडून लोकांवर होणारे अत्याचार, स्त्रियांवर होणारे बलात्कार असे चित्र सर्वत्र
४६
होते. परकीयांची सत्ता, लोकांमधील सपं त्ती लालसा होती. परंतु याखेरीज जाळपोळ, लटू मार, कत्तल, यामळु े
आपले अस्तित्व टिकविणे हे सद्धा ु अवघड झाले होते. आपला धर्म, ससं ्कृ ती, परंपरा, दैवते, पायदळी
तडु विले जात होती. राजकीय जीवनातील अस्थिरता, सामाजिक जीवनातील असरु क्षितता, नैतिक जीवनात
मलू ्यांचा झपाट्याने झालेला ऱ्हास, याची कित्तीतरी उदाहरणे ‘अस्मानी सल
ु तानी’ व ‘परचक्र निरुपणात’
दिसतात.
यात आणखी भर म्हणजे दषु ्काळ, परू या नैसर्गिक आपत्ती ही लोकांवर कोसळल्या होत्या. लोकांमधील
कर्तव्यभ्रष्टता, अलिप्तता, स्वाभिमानशनू ्यात, दीर्घसचू नेचा अभाव, फितरु ी, पक्षभेद, कलह यांनी संपर्णू समाज
आतनू पोखरला होता. स्वार्थी वत्ृ ती व लाचारी पाहून समर्थ म्हणतात-
समर्थ रामदास सपं र्णू मानवी जीवनच एका विशिष्ट दृष्टिकोनातनू न्याहाळताना आढळतात. त्यातनू
समर्थकालीन जीवनाची बौद्धिक, सामाजिक, आर्थिक, नैतिक अशी झालेली वाताहत त्यांच्या लक्षात येते. हा
देश के वळ राजकीय दृष्टीने पोखरला गेला होता, असे नव्हे तर जीवन जगण्यातील प्रत्येक मानवी व्यवहारात
खेचला गेला. जीवन मलू ्यांचा ऱ्हास कधीही झाला नसेल इतक्या प्रमाणात या कालखडं ात झालेला दिसतो.
निःसत्व, गळितगात्र आणि विकल अशा भारतदेशात समर्थ असेतू हिमाचल फिरले.
त्यांनी सर्व जीवनव्यवहार बारकाईने न्याहाळले आणि त्यातनू समर्थ रामदासांचे धर्मनीती विषयक विचार
अधिक प्रखर व धगधगीत झाले. कारण या काळात धर्मजीवनातील झडंु शाही पाहून समर्थ म्हणतात-
अशा परिस्थितीत समर्थांनी कुटुंब मानस, समाजमानस आणि राष्ट्रमानस या तिन्ही पातळ्यांवर नीतीचा
विचार मांडला. मानवाचे जीवन वैयक्तिक पातळीवर उन्नत होण्यासाठी दर्बु लता, निष्क्रियता, स्वार्थान्धता
निर्माण करणाऱ्या गोष्टींचा समर्थांनी निषेध के ला आणि मानवी जीवनात सामर्थ्य, अचक ू पणा, तेजस्विता,
क्रियाशीलता निर्माण करणाऱ्या गोष्टींचा उद्घोष के ला. म्हणनू च उत्तमपरुु ष लक्षणे, मर्ख
ू लक्षणे, पढतमर्खू
लक्षणे, गहृ स्थाश्रमाचे महत्त्व त्यांनी सांगितले.
समाज मानस भक्कम होण्यासाठी सघं टनेचे महत्त्व विवरून सांगितले. त्यासाठी प्रभू रामचद्रा
ं चा उत्सव, अकरा
मारुतीची स्थापना, तळ
ु जाभवानीचा पराक्रम वर्णिला. श्रीरामराय हे एकवचनी, एकबाणी आणि सर्वार्थाने
४७
नितीमत्तेचा आदर्श आहेत. त्यातनू आदर्श नैतिक वर्तनाचा ठसा लोकांवर उमटवला. भिक्षा, कीर्तनासह
श्रीराम व श्रीमारुतीच्या उत्सवातनू लोक सघं टित के ले.
असा उद्घोष के ला. कारण न्याय, नीती, निष्ठा, कर्म, आचार, विचार यांचा अभाव जर समाज जीवनात
असेल तर ते जीवन प्रेतासमान असते असा सिद्धांत त्यांनी मांडला. ‘जनस्वभाव गोसावी’ या स्फु ट प्रकरणात
अधं श्रद्धा, द्रव्यभिलाषा, पराधीनता यांचा फै लाव करणाऱ्या गरुु संस्थेचे नितीदृष्ट्या विघातक स्वरूप समर्थांनी
स्पष्ट के ले.
व्यक्ती जीवनातनू समाज जीवनाची उन्नती आणि समाज निष्ठेतनू व्यक्ती जीवनाला प्रेरणा, असा त्यांच्यामधील
परस्पर संबंध समर्थ वाङ्मयात आढळतो. कोणत्याही समाजमनाची प्रबोधन, प्रतिकार, संघर्ष व समन्वय असा
चतरु ावस्थेतनू जोडणी होते. स्थिर राज्याची उभारणी करण्याच्या प्रक्रियेत निवत्ृ तीवाद गढु वाद, पलायनवाद
यांना समर्थांच्या विचारप्रणालीत अजिबात थारा नाही. लोकांच्या मरगळलेल्या मनात उत्साह, एकतेचा वन्ही
चेतत असता मानव कें द्रभतू माननू मानवाचे नैतिक, उन्नत व्यक्तिस्वातंत्र्य हे प्रमख
ु ध्येय मानले.
राष्ट्र मानस या सक
ं ल्पनेचा विचार करता समर्थांनी श्रीशिवाजी महाराज व श्रीसभं ाजी महाराजांना लिहिलेली
जी पत्रे आहेत, त्यातनू आदर्श राजा व राज्यकार याबद्दलची नैतिक बैठक स्पष्ट होते. राज्यसपं ादन व
राज्यसंवर्धन कसे करावे, टिकवावे कसे, राज्यांतर्गत बंडाळी मोडून महाराष्ट्रधर्म वाढविणारे धर्मरक्षक राज्य
कसे करावे याचे विचार समर्थ मांडतात. आदर्श राजा धैर्यशील, नीतीबंध असावा, असे सांगताना समर्थ
एकांती चाळना कशी करावी, सर्व माणसांना समान पातळीवर न वागवता
कोणत्या कार्यकर्त्यांना जवळ ठे वावे अगर दरू ठे वावे, याचा विवेक ते सचु वितात. कर्तव्याने बडु ती राज्ये
खबरदारी असेचिना। असे सांगण्यास समर्थ डॉट नाहीत. आजच्या परिस्थितीत जडवादाधारित, भोगवादी
दृष्टिकोन, समाजधारणेसाठी नितांत आवश्यक असलेल्या मल ू भतू नीती विषयी पर्णू अनास्था, स्वार्थांधतेचे
प्रलयंकारी तांडव, खऱ्या राष्ट्रनिष्ठेचा अभाव, अनेकविध भेद व कलह, बद्धि ु वादाच्या जोरावर होत असलेली
अहक ं ाराची घातक जोपासना, ध्येयशनू ्य शिक्षण पद्धती, लोकशाहीचे विडंबन नेततृ ्वाची समस्या, सामान्य
जनतेची असहाय उदासीनता, अगतिकता, सार्वत्रिक सत्यहिनात आणि या सर्व व्याधींनी ग्रस्त होऊन
४८
चैतन्यविहीन कर्तृत्वहीन नीरस जीवन हे आजच्या भारतीय समाज परुु षाचे हृदयाला घरे पाडणारे चित्र आहे.
या उक्तीनसु ार पढु ील पिढीसमोर उच्चध्येय अपेक्षा त्यांनी ते जाळून ठे वले. प्रपचं , परमार्थ, धर्मकारण,
राजकारण, प्रयत्नवाद, सावधानता, विवेक, वैराग्य याचा समन्वयात्मक अर्थ जाणारा समाजप्रधानता ठे वणारा
आणि त्याप्रमाणे लोकांना आचरण करायला शिकवणारे श्रीसमर्थ रामदासस्वामी हे महान द्रष्टे व नीतीवंत होते,
असे खचितच म्हणता येईल.
।।जय जय रघवु ीर समर्थ।।
४९
Xmg~moYmVrb
à`ËZdmX
अॅड.डॉ. नंदकुमार अच्युत मराठे
कोणतेही कार्य यशस्वी होण्यासाठी पाच गोष्टींची आवश्यकता असते. अधिेठान, कर्ता, विविध प्रकारची
साधने, प्रत्यक्षकर्म करण्यासाठी आवश्यक असणारी हालचाल आणि पांचवी अनक ु ू ल दैव. समर्थ रामदास
स्वामी प्रयत्नवादी असल्यामळ ु े त्यांनी त्यांच्या चतःु सत्ू रीमध्ये भगवंतानी सांगितलेल्या पांचव्या गोष्टीचा
दैवाचा विचार मांडला नाही. म्हणनू च पहिल्या चार गोष्टींचा विचार करताना समर्थांनी गढू भाषेत हा संदश े
जनसामान्यांपर्यंत पोहोचविताना
अशी ही कर्म चतःु सत्ू री सांगितली आहे. प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे हे स्पष्ट करताना समर्थ
लिहितात, यत्न तो देव जाणावा। आणि नंतर पनु ्हा लिहितात, अचक ु यत्न तो देवो।
प्रयत्नाला देव मानण्याची कल्पना तशी प्राचीन काळापासनू चालत आलेली आहे. या सदं र्भात कर्म म्हणजेच
तप असे माननू हे तप करणे कसे कष्टप्रद आहे हे स्पष्ट करताना मनसु ्मृती म्हणते,
म्हणजे देवाचे आणि माणसाचे जे जे सखु आहे त्या सगळ्याचे मळ ू तपच आहे. ते तरून जाण्यास कठीण, जे
मिळण्यास कठीण, जे जाणण्यास किंवा जाण्यास कठीण आणि जे करण्यास अत्यंत कठीण ते सगळे तपाने
साध्य होते. आणि अशक्य वाटणारय् ा गोष्टीही तपाने सोप्या होतात. म्हणनू च तपाला ‘दरुू तिक्रम’ असे म्हटले
आहे, दषु ्कर असे म्हटले आहे. याच संदर्भात चाणक्य सत्रां
ू मध्ये आचार्य चाणक्य लिहितात,
५०
परुु षकारमनवु र्तते दैवम॥्
म्हणजे दैव हे परुु षार्थाच्या मागे धावत असते. कर्मयोगी माणसे कर्तव्य पालन करताना दैवाचा, नियतीचा
विचार करीत नाहीत. अशा व्यक्ति वर्तमान जगत असताना भतू काळाचा विचारही करीत नाहीत. प्रयत्न न
करता के वळ बाष्कळ बडबड करणारय् ा दैवाधीन असणारय् ा माणसांच्या सदं र्भात समर्थ म्हणतात,‘फुकाचे
मखु ी बोलतां काय वेच।े ’ किंवा ‘क्रियेवीण वाचाळीता व्यर्थ आहे।’ अन्य एका पदात समर्थ लिहितात,‘वन्ही
तो चेतवावे रे चेतविताची चेततो।’ अर्थात त्यासाठी स्वतः कर्म करणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु आपल्या
बरोबर इतरांनाही त्या कर्माची प्रेरणा देऊन ‘जनांचा प्रवाहो चालला।’ या न्यायाने सर्वांना एकत्र करून आपले
कर्म के ल्यास आपणांस अपेक्षित यश प्राप्त होते.
प्रत्येक माणसाजवळ दोन प्रकारच्या शक्ति असतात. एक ज्ञानशक्ती आणि दसु री क्रियाशक्ति. सर्वसाधारणपणे
प्रत्येकजण यापैकी एकाच शक्तीचा वापर करताना दिसतो, अशीच माणसे समाजात सर्वत्र विखरु लेली
आपणांस पहावयास मिळतात. काही विद्वान विद्वत्ता असनू ही क्रियाशनू ्य असण्याने समाजाला त्यांचा उपयोग
होत नाही. अशा क्रियाशनू ्य विद्वानांची गणना सर्वसामान्य माणसू ‘वाचाळ’ वर्गात करतो. तर काहीजण के वळ
क्रियाशक्तीचाच वापर करताना दिसतात. त्यांच्या कर्माचे त्यांना पर्णू ज्ञान नसते. अथवा त्या कर्माची फारशी
माहितीही कोणाला नसल्याने समाज त्याची फारशी दखलही घेत नाही. या दोनही शक्ति एकत्र असण्याचे
आणि या दोनही शक्तिं चा एकाच वेळी आपला उद्दिष्टपर्ती ू साठी यथोचित वापर करणारय् ा दोन महान विभतू ी
एकाचवेळी महाराष्ट्रात कार्यरत होत्या. त्यापैकी एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचे वर्णन करताना
शाहीर म्हणतात,
तंगु नग शिरी दर्गु कुणाचा हा झलु तो आहे। चद्रं हीन हा ध्वज कोणाचा फडकत वरि राहे।
काय पसु तसा सह्याद्रीच्या बाळा जे काळ। त्या बाळांचा काळ जाहला ज्यांचा करवाल॥
शक्तीयगु ्तीचे नीति भक्तीचे मिलन ज्या माजी। जिंकायाला समर्थ ज्याला नच झाला गाजी॥
शक्ति-यक्ु ति, नीति-भक्तीने महाराज आणि त्यांचे सर्व सवगं डी परिपर्णू होते. म्हणनू च ‘हे राज्य व्हावे ही श्रींची
इच्छा।’ असे म्हणनू त्यांनी स्वराज्याची निर्मिती के ली.
५१
ग्रंथानाम दासबोध। गरुु शिष्याचा सवं ाद।
येथ बोलिला विशद। भक्तिमार्ग॥
समर्थांनी भक्तीचा विचार स्पष्ट करताना नवविधा भक्तीचे भागवतातील स्वरूप प्रयत्नवादाच्या माध्यमातनू
स्पष्ट के ले आहे. म्हणनू श्रवणाचा अर्थ स्पष्ट करताना ‘आता श्रवण केलियाचे फळ। क्रिया पालटे तात्काळ।’
असा त्यांनी के ला. देवाधर्माबद्दल परु ाणांनी के लेले वर्णन असखं ्य लोकांनी अनेकवेळा ऐकले आहे. परंतु
परु ाणातील वांगी परु ाणात म्हणनू परु ाणिक बवु ा आणि त्यांचे श्रोते सर्वजण ते परु ाणाच्याच ठिकाणी सोडून
परत जातात. तसे घडू नये म्हणनू समर्थ आधी श्रोत्यांना बजावतात, ‘श्रोती व्हावे सावधान।’ आणि देवाबद्दल
सांगतात,
देवद्रोही तितक
ु े कुत्ते। मारोनि घालावे परते।
देवदास पावतील फत्ते। यदर्थी संदहे नाही।
परंतु त्याच मदं िरामध्ये, त्या देवतेच्या नावाने के ल्या जाणारय् ा विविध प्रकारच्या अधर्माबद्दल आज आम्ही
फारसे बोलावयास तयार नाही. कारण त्याबद्दल आम्हालाच फारसे काही माहीत नाही. म्हणनू त्याबाबतीत
आधी स्वतः माहिती करून घेणे आवश्यक आहे. यासाठी समर्थ लिहितात, ‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे।
प्रसंगी अखडं ीत वाचीत जावे॥’ याचा फायदाहाषऊन समाजाची ज्ञानशक्ति वाढण्यास मदत होते, ईष्ट काय
अनिष्ट काय हे समजण्यासाठी आवश्यक ती तारतम्य बद्धी ु विकसीत होते. सधं ्या या तारतम्य बद्धीु चाच
अभाव असल्यामळ ु े स्वतंत्र भारतात आजही एतद्देशीय ते सर्वजनु ाट, बरु सटलेले असे समजण्याची आणि
परदेशी वस्तू, ज्ञान, चालीरिती विकत घेण्याची स्पर्धाच आपल्या देशातील इग्रं जाललेल्या, शिकलेल्या
लोकांमध्ये लागलेली आहे. त्यामळ ु े आपल्या देशाच्या अर्थव्यस्थेवर, उद्योगधद्ं यावर, नोकरी, व्यापारउदीम
करणारय् ा लोकांच्या आर्थिक स्थितीवर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेतल्यास कोणीच तयार नाही. ही
मडं ळी के वळ आम्ही एवढे शिकलेले आहोत, एवढा पैसा कमावतो आहोत, आमच्या पर्वू जांनी काय के ले ?
यासंबंधी पोकळ बढाया मारताना दिसतात. अशांचे वर्णन करताना समर्थ लिहितात,
आपल
ु ी आपण करी स्तुती। स्वदेशी भोगी विपत्ती।
सांगे वडिलांची कीर्ति। तो एक मर्ख
ू ॥
आपल्या समाजामध्ये वाचाळवीर भरपरू आहेत. काय व्हायला पाहिजे याबाबत तासन्तास बोलणे आणि
वाट्टेल तेवढे ताव भरूनअसे लिहिणे यामध्ये त्यांचे सपं र्णू आयषु ्य व्यर्थ चालले आहे. अशा लोकांसाठी समर्थ
लिहितात,‘एके सदेवपणाचे लक्षण। रिकाम जाऊ नेदी क्षण।’ तर दसु रीकडे लिहितात,‘आधी कष्ट मग फळ।
कष्टाचि नाही ते निष्फळ।’ परंतु नसु ते कष्ट करण्याचा फायदा काहीच नाही. म्हणनू च कोणते कार्य करावयाचे
या संदर्भात काही निश्चित विचार करून त्याप्रमाणे योजना बनवणे आवश्यक आहे. ज्या स्वराज्य स्थापनेचा
५२
डाव समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी खेळावयाचा ठरवले होते त्यासाठी योग्य
असे मनषु ्यबळ तयार करण्याचे फार मोठे कार्य समर्थांनी करावयाचे ठरविले. आणि अशी निःस्पृह माणसे
बरोबर घेऊन, त्यांचा योग्य तो उपयोग करून धर्म स्थापनेचे कार्य उभयतांना करावयाचे होते. असा निःस्पृह
माणसू घडवायचा असेल तर तो भक्ताच असावा लागतो. म्हणनू च दासबोधाचा हेतू स्पष्ट करताना भक्तिमार्ग
सांगितला आहे असे समर्थ स्पष्टपणे नमदू करतात. भक्ताची व्याख्या करताना समर्थांनी ‘विभक्त नव्हे तो
भक्त।’ अशी के ली आहे. आपल्या कर्तव्य कर्मापासनू जो कधीही च्युत होत नाही, विभक्त होत नाही तो
भक्त. असा भक्त निःस्पृहच असावा लागतो. आणि स्थल कालाच्या भेदापलिकडे जाऊन त्याला काम करावे
लागते. भक्तीची व्याख्या करताना नारद भक्तिसत्रू म्हणते,‘सा तु अस्मिन् परम प्रेम स्वरुपा। अनिर्वचनीय
प्रेमस्वरुपम।् मक
ु ास्वादनवत् इति। या व्याख्येनसु ार समाजावर, देवाधर्मावर आत्यंतिक प्रेम करायंचे असेल तर
समाजातील दःु ख दैन्य दरू करा. याबराबेरच समाजाचे मानसिक आणि नैतिक बळ, धैर्य, सयं म, सहनशीलता
उंचावेल अशा प्रकारचे शिक्षण द्यावे लागेल.यासाठी समर्थ लिहितात,
भगवतं म्हणतात,‘कर्मोन्द्रियाणि सयं म्य च आस्ते मनसा स्मरण।’ म्हणजेच जी माणसे धर्मकार्यात
जोडावयाची, साधचंू े रक्षर करण्यासाठी ज्याला प्रेरणा द्यायची त्यांच्या कर्मेंद्रियांवर, मनावर त्यांचे नियंत्रण हवे.
त्यांची उक्ती आणि कृती एकत्र हवी. यासाठी ‘भेटो कोणी एक नट। धेडमहार चांभार। त्याचे राखावे अतं र। या
नांव भजन॥’ अशी प्रयत्नवादाकडे नेणारी व्याख्या के ली. एकीकडे निष्ठेच्या बाष्पळ गप्पा माररारे , उपासनेचे
सोंग रचणारे आज समाजात अनेकजर आहेत. ही उपासना इतकी बळकट असावी की, ‘उपासनेचा आश्रयो।
उपासनेवीण निराश्रयरे । असे उपासकाला वाटले पाहिजे. प्रसंगी ते तळ ु जाभवानीला बजावतात,‘तझु ा तंू वाढवी
राजा। सिघ्र आम्हांची देखता। त्यासाठी ‘राखावी बहुतांची अतं रे । भाग्य येणे तदनंतरे ।’ हे ध्यानी घेऊन अनेक
कुळ्या व रुढी परंपरांच्या विरोदात त्यांनी कार्य के ले. विदवा स्त्रियांना मठपतीचा, शिष्य करण्याचा, कीर्तन
करण्याचा अधिकार देऊन त्यांनी स्त्रियांवरील अत्याचारांना वाचा फोडली. आदी के ले मग सांगितले। असे
त्यांचा प्रयत्नवाद सांगतो. त्यासाठी २भवाच्या भये काय भितोसि लंडी।’ आणि समर्थाचिया सेवका वक्र पाहे।
असा सर्व भमू डं ळी कोण आहे।’ असे म्हणणारे समर्थ, ‘सामर्थ्य आहे चळवळीचे। हे जाणनू होते. ही चळवळ
चालविण्यासाठी जी माणसे तयार करावयाची ती देवस्वरूप असली पाहिजे. देव या शब्दाचा मळ ु दातू ‘दिव’
असा असनू त्याचा अर्थ प्रकाश असा आहे. म्हणनू देव म्हणजे समाजाला प्रकाश देणारा, ज्ञान देणारा माणसू
निर्माण करणे असा आहे. ‘मरणाचे स्मरण असावे।’ हे ध्यानात ठे वनू , ‘आपण यथेष्ट जेवलो। उरले ते अन्न
वाटणे। परंतु वाया दवडणे। हा धर्म नव्हे।’ यासाठी आपण स्वये करावे। जनाकरवी करवावे। हा प्रयत्नवाद
त्यांनी स्पष्ट के ला आहे. म्हणनू च समर्थांचा प्रयत्नवाद हा कर्तव्यकठोर आणि उद्दिष्टपर्तिू साठी सर्वस्वाचा त्याग
करण्याची मानसिकता निर्माण करणारा आहे हे दासबोधाच्या सजु ाण वाचकांनी ध्यानात घेणे आवश्यक आहे.
॥ जय जय रघवु ीर समर्थ॥
५३
Xmg~moYmVrb
g_wnXoeZemñÌ
डॉ. सौ. माधवी महाजन
समर्थ रामदासस्वामी एक साक्षात्कारी सतं , अध्यात्मिक गरुु , सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपला वेगळा
ठसा उमटविणारे अशा विविध अगं ांनी विदित आहेत. त्यांच्या चरित्राचा आढावा घेतला तर त्यांच्या प्रभावी
व्यक्तिमत्त्वाची ओळख होते. प्रखर बद्धि ु मत्ता, बलोपासनेमळ ु े प्राप्त झालेली बलदडं तसेच बांधसे दू शरीरयष्टी,
प्रासादिक वाणी,. उत्तम आचार विचार उच्चारांनी संपन्न असे त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व निश्चितच मनावर
छाप पडणारे आहे. त्यांनी आपल्या प्रखर वाणीने जे प्रबोधन के ले, तेजस्वी लेखणीने जे विचार व्यक्त के ले
त्यामध्ये प्रत्येक व्यक्ती घडविण्याचे सामर्थ्य होते समर्थांनी के वळ विचार न मांडता त्याप्रमाणे कृती करून
जनजागतृ ी घडवनू आणली. नरदेहाच्या माध्यमातनू आत्मिक उन्नती करून घ्यावी या सर्व संतांच्या मताचा
त्यांनी पाठपरु ावा के ला. परंतु के वळ यावरच भर न देता साधनेच्या मार्गातच नव्हे तर भौतिक जगात जगताना
व्यवहारामध्ये, प्रपचं ामध्ये,सतत सावध रहा अशी सचू ना देऊन व्यवहारी जगामध्ये जगण्याचे धोरण देखील
शिकवले.
समर्थांनी उदडं वाड्मय निर्मिती के ली. यामधनू आपला विचार मांडताना आपल्या समोरील श्रोता कोण
आहे, साधक आहे का प्रापचि ं क आहे, राजकारणी आहे का महतं आहे हे बघनू त्यानसु ार त्यांनी प्रत्येकाला
मार्गदर्शन के ले. समर्थांचा पारमार्थिक दृष्टीने मांडलेला विचार साधकांना ब्रह्मसख
ु ाची अनभु तू ी देतो तर त्यांचे
राजकारण विषयक विचार समर्थ राजकारणी संत होते अशी प्रतिमा निर्माण करतात. त्यांची प्रपंचविषयक
शिकवण ते पर्वू प्रापंचिक वाटतात तर भक्तिमार्गातील साधक भगवंताशी पर्णू तादात्म्य पावतात. समर्थांचे
वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी आपले व्यवहारातील, अध्यात्मशास्त्रातील रोखठोक विचार मांडले. पण आपला
विचार मांडताना तो विचार समोरच्या व्यक्तीवर त्यांनी लादला नाही. त्याविषयाचे महत्त्व समोरच्या व्यक्तीला
समजावनू सांगितले पण त्याप्रमाणे कृती करावी अथवा नाही हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य पर्णू पणे समोरच्या
व्यक्तीला दिले. त्यांची ही भमिू का, त्यांनी के लेले प्रबोधन वाचले असता समर्थ थोर मानसशास्त्रज्ञ तर होतेच
पण एक उत्तम समपु देशक देखील होते याची खात्री पटते.
समर्थांचा समपु देशक हा व्यक्तिमत्वाचा पैलू वाखाणण्याजोगा आहे. समपु देशन म्हणजे सल्ला देणे नव्हे तर
व्यक्तीला मानसिक दृष्ट्या सक्षम बनवणे, त्याला निर्णय घेण्यास प्रवत्तृ करणे हे समपु देशकाचे कार्य असते.
शाररीक आरोग्यासाठी औषधे घेता येतात परंतु मानसिक आजाराला समपु देशन उपयोगी ठरते. चितं ा, भीती,
नैराश्य, अज्ञान, चक
ु ीचे समज यासर्व नकारात्मक गोष्टींमधनू ज्या समस्या निर्माण होतात त्या समपु देशकाच्या
माध्यमातनू सटु ू शकतात. अतिश्रम, ताणतणाव नैराष्य यामळ ु े व्यक्तीमधील मनोबल कमी होते. त्याच्यामधील
५४
नकारात्मकता वाढिला लागते. यासर्व नकारात्मक विचारांमळ ु े सात्विकता क्षीण होत जाते. असे अनेक
तोटे लक्षात घेऊन समर्थ आपल्या विचारामधनू मानसिक स्वास्थ्यासाठी उपयोगी पडेल असा सकारात्मक
दृष्टीकोन आपल्याला देतात. समर्थांनी आपल्या श्रीमद दासबोध, मनाचे श्लोक याग्रंथातनू जो उपदेश के ला
मनाचे सामर्थ्य तर वाढतेच पण त्याचबरोबर आपल्यातील नकारात्मकता जाऊन सकारात्मकता वाढिला
लागते.
श्रीमद दासबोध ग्रंथामधील मर्खू लक्षणांच्या समासामध्ये नकारात्मक उर्जा वाढवणारी लक्षणे सांगितली
आहेत आणि त्यापासनू दरू राहण्यात शहाणपण आहे हे त्यांनी स्पष्ट के ले आहे. ‘निंदा द्वेष करू । असत्संग
धरू नये ।’, ‘तोंडाळासी भांडो नये । वाचाळासी तंडो नये ।’, ‘अति क्रोध करू नये | जीवलगांस खेदू नये ।’
अशी अनेक नकारात्मक लक्षणे समर्थ मर्ख ू लक्षण समासामध्ये सांगतात. या सर्व लक्षणांचा विचार करता
सतत इतरांचा द्वेष, निंदा करणे या प्रवत्ृ तीतनू मनषु ्य स्वत:चे नक
ु सान करून घेत असतो. सतत इतरांशी भांडणे,
वाद करणे यातनू तो स्वत:चेच मन:स्वास्थ्य गमावनू बसतो. मनाची सतत उद्विग्र अवस्था, असमाधानीवत्ृ ती,
सतत इतरांचा अपमान करण्याची वत्ृ ती, अज्ञान हा जीवनतील अधं :कार आहे. या नकारात्मक उर्जेचा विकास
आपल्यामध्ये होऊ नये ही काळजी समर्थ याठिकाणी घेतात. उत्तम व्यक्तिमत्व घडण्यासाठी ही नकारात्मक
उर्जा अडथळा आहे हे निदर्शनास आणनू देतात.
समर्थ आपल्या प्रबोधनामध्ये सकारात्मक विचारांवर अधिक भर देतात. ही उर्जा आपले शारिरीक, मानसिक
आरोग्य उत्तम राखण्यास मदत करते. यासाठी काही सवयी जाणीवपर्वू क स्वत:ला लावनू घेणे गरजेचे असते.
उत्तम सवयी देहाला लागाव्यात यासाठी समर्थ सतत प्रोत्साहित करतात.
५५
सगं त, उत्तम सवयी, यासाठी लागणारे सातत्य, चिकाटी यावर समर्थ सतत भर देतात. या उत्तमाचा ध्यास
घ्यावा असे समर्थ वारंवार सांगतात. समर्थ म्हणतात,
उत्तम संगतीचे फळ सख
ु । अधम संगतीचे फळ दःु ख|
आनंद सांडूनिया शोक| कै सा घ्यावा|| १७-७-१७
उत्तम संगतीने सख
ु मिळते हे ठाऊक असताना देखील आनंदाचा अव्हेर करून दःु ख पत्करणाऱ्या अविवेकी
माणसांना समर्थ सत्संगाचे महत्व समजावनू सांगतात. सकारात्मकतेच्या माध्यमातनू उत्तमोत्तमाचा संग्रह
करून जे जे उत्तम आहे ते प्राप्त करून घेण्यास समर्थ प्रवत्तृ करतात.
आपल्या मनाला आणि मेंदल ू ा सकारात्मक विचारांची, कृतीची सवय लावण्यासाठी घटनेकडे बघण्याचा
दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. हा बदल घडण्यासाठी विचारांची व्यापकता असणे महत्वाचे आहे.
सदाचाराची शिकवण देताना समर्थ इतरांना मदत करा, क्षमाशील राहा, सतत कार्यरत रहा, समतोल आणि
सयं म राखा हे आवर्जून सांगतात. यासर्वामधनू मिळणारे समाधान मानसिक उर्जा उत्तम राखते. इतरांच्या
वागण्याचा सतत विचार करत राहिल्याने सडू ाची भावना निर्माण होते हे टाळण्यासाठी क्षमाशीलवत्ृ ती जी
सकारात्मक उर्जेत वाढ करते तीचा अगि ं कार करणे गरजेचे आहे.
समर्थांनी वेळेचे महत्व पदोपदी समजावनू दिले आहे. आपल्या आयषु ्यातला कोणताच क्षण वाया जाऊ न
देणे हेच खरे भाग्याचे लक्षण असल्याचे ते ठामपणे सांगतात.
आपल्या आयषु ्यात वेळेला अतिशय महत्व आहे. गेलेली वेळ परत कधीही येत नाही हे जाणनू च समर्थांनी
‘सिकवण निरुपण’ या समासामध्ये वेळेचे महत्व स्पष्ट के ले आहे. सामान्य माणसाने आपले जीवन यशस्वी
करण्यासाठी कसे वागावे याची रूपरे षा या समासामधनू ते आखनू देतात. प्रयत्नवादाचा परु स्कार करताना
आळस सोडून अचक ू प्रयत्न कसे करावेत याविषयी या समासामध्ये मार्गदर्शन के ले आहे. प्रात:काली उठून
काही पाठांतर करावे, प्रात:स्नान करून संध्या करावी पिततृ र्पण करावे, देवाची पजू ा करावी आणि यथासांग
वैश्वदेव करावा. व्यवहारात वागताना प्रामाणिकपणा आणि सावधपणा बाळगावा. सर्वाशी गोड बोलावे, स्नेह
जोडावा, जेवण झाल्यावर थोडे वाचन, चर्चा करावी एकांतात बसनू निरनिराळ्या ग्रंथांचा अभ्यास करावा.
एकही क्षण वाया न घालवण्यामागे वेळेचे व्यवस्थापन दिसनू येते. प्रयत्नवादाची शिकवण देताना समर्थांनी
आळशीवत्ृ तीचा निषेध करून अचक ू प्रयत्नावर भर दिला आहे.
समर्थांच्या वाड्मयामधनू आदर्श मानवी जीवन कसे जगावे याचे मौलिक मार्गदर्शन घडते. वाचिक तपाचे
महत्व जाणनू आपली वाणी कशी असावी याचे अचक ू मार्गदर्शन त्यांच्या वाड्डमयामधनू होते.
५६
कठीण शब्दे वाईट वाटते। हे तो प्रत्ययास येते।
तरी मग वाईट बोलावे ते| काय निमित्ये|| १२-१०-२३
उत्तमपरुु षाची लक्षणे या समासामध्ये समर्थांनी स्वत:वरून दसु ऱ्याचे अतं :करण कसे जाणावे याचे सोपे सत्रू
सांगितले आहे. उत्तम गणु ांपैकी वाणीची मधरु ता हा एक गणु आहे. माणसाने नेहमी स्वतःवरून दसु ऱ्याची
परीक्षा करावी. दसु ऱ्याच्या कटू बोलण्याने जसे आपले मन दख ु ावते तसेच आपल्या कठोर शब्दाने दसु ऱ्याचे
मन दख ु ावू शकते. या कृतीमधनू , बोलणार्याला त्याक्षणाला जरी आनंद प्राप्त झाला तरी ज्याला बोलले जाते
त्याचे मन दख ु ावले जाते. त्यातनू शत्रुत्वाची भावना जोपासली जाते आणि मग परस्परांविषयी राग द्वेष वाढत
जातो. यासाठी मनाच्या श्लोकात देखील समर्थ म्हणतात की,
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकासी रे नीववावे || ७||
त्यांच्या या विचारातनू त्यांचा सामाजिक मानसशात्राचा सक्ू ष्म अभ्यास दृष्टीस पडतो. लोकसग्रं हाच्या दृष्टीने
समर्थांनी वाणीचे महत्व वारंवार स्पष्ट के ले. आजच्या यगु ात देखील कामाच्या ठिकाणी “ टीमवर्क ” असते
तेव्हा परस्परांच्या सहकार्याने कोणतेही काम पर्णू त्वाला जात असते. अशावेळी एकमेकांना समजनू घेऊन
कोणाचे मन न दख ु ावता काम करणे गरजेचे असते. आपली वाणी जर गोड असेल, दसु ऱ्याला जाणनू घेण्याची
क्षमता असेल तर अशा व्यक्ती जीवनात यशाच्या शिखराच्या दिशेने वाटचाल करतात. दसु ऱ्याला दख ु ावणारी
वाणी ही अपवित्र असल्याचे समर्थाचे स्पष्ट मत आहे. श्रीमद दासबोधामध्ये तोंडाळ, कठोरवचनी, शीघ्रकोपी
माणसाला राक्षस संबोधले आहे.
शब्द हे अस्त्र आहे ते जपनू च वापरले पाहिजे. शब्दाचा वापर विवेकाने तसेच विचाराने के ला पाहिजे.
दसु ऱ्याला दःु खी करणारे कटू शब्द नेहमीच कटूता वाढवितात. अशा शब्दांना थारा न देता बोलण्या वागण्यात
नम्रता आणावी. सघं टनेला महत्व देणारे समर्थ या सध्या सोप्या सत्रांू च्या आधारे सघं टनेचे सोपे पण अवघड
सत्रू शिकवनू जातात. प्रभू रामचद्रं हे समर्थाचे उपास्य दैवत होते. दशरथनंदन श्रीराम, आयोध्येचा भावी
राजा प्रजाजनामध्ये मिसळत असे. सर्वाची द:ु खं जाणनू घेत असे. त्याच्या लाघवी बोलण्याने, नम्र वाणीमळ ु े
प्रजाजनांना दिलासा मिळत असे. समर्थ हाच आदर्श समोर ठे ऊन आचरण करीत असत.
समर्थांचा प्रत्येक विचार मनातील नैराश्य घालवनू सतत सकारात्मक विचारांना पोषक ठरतो. मन सशक्त
असेल, आत्मविश्वास असेल तर नैराश्याला थारा राहत नाही. आत्मविश्वास ही यशाची गरुु किल्ली आहे. तो
टिकवनू ठे वण्यासाठी कष्ट करण्याची तयारी तसेच सयं म आवश्यक आहे. व्यक्तिमत्व सधु ारायचे असेल तर
स्वत:वर, स्वत:च्या विचारांवर विश्वास असणे गरजेचे आहे.
५७
सभा देखोन गलो नये। समई उत्तर टळो नये|
धि:करता चळो नये| धारिष्ट आपल
ु े|| २-२-३८
या उत्तम लक्षणामधनू समर्थ आपला आत्मविश्वास वाढवतात. सभेमध्ये बोलताना आपले विचार ठामपणे
मांडता येणे आवश्यक आहे. कोणी काही प्रश्न विचारले तर घाबरून न जाता शांतपणे शक ं ा निरसन करावे
पण सभेतनू पळून जाऊ नये. आत्मविश्वास वाढवणारा हा विचार नक्कीच प्रेरणादायी आहे. वास्तविक
आत्मविश्वास हा मानसिकतेवर अवलंबनू असतो. म्हणजेच तो मनाचा गणु धर्म झाला. ज्याचे मन खबं ीर
असेल त्याचा आत्मविश्वास जास्त. या संदर्भात एक दृष्टांत वाचनात आला. एका भित्र्या सश्याने आपल्या
भित्रेपणाला कंटाळून देवाजवळ मला वाघ बनव अशी इच्छा व्यक्त के ली. देवाने ती लगेच पर्णू के ली.
त्यामळ ु े इतर प्राणी सश्याला घाबरु लागले पण सश्याची भीती काही कमी होईना. पनु ्हा त्याने देवाची प्रार्थना
के ली तेव्हा देव म्हणाला, बाळ सशा, जोपर्यंत तझु े मन भित्रे आहे तोपर्यंत तू भित्राच राहणार तू मन खबं ीर
कर, मानसिकता बदल तरच तू शरू होशील “ मन खबं ीर नसेल तर साध्या संकटामध्ये देखील आत्मविश्वास
डळमळीत होतो आणि नैराश्य येते. नैराश्यामध्ये विचार करण्याची क्षमता हरवनू जाते. मनात सतत येणाऱ्या
नकारात्मक विचारांमळ ु े आत्मविश्वास कमी होतो. त्यामळ ु े समाजात वावरणे अवघड होऊन जाते. कामात
सतत येणारे अपयश, दरु ावलेले नातेसंबध यामळ ु े निर्माण झालेले नैराश्य त्या व्यक्तिला आत्महत्येस प्रवत्तृ
करतात. यासाठी मन खबं ीर आणि स्थिर असणे आवश्यक आहे. समर्थांनी आपल्या विचारातनू आत्मविश्वास
जागा के ला. भक्ती, ज्ञान, कर्म हे सर्व सांगत असताना अतं रंगातील सामर्थ्याला अधिक महत्व दिले.
समर्थांनी अनेक ठिकाणी सतत सावधपणे कसे वागावे याचे मार्गदर्शन के ले आहे. दासबोधातील ‘राजकारण
निरुपण’ या १९ व्या दशकातील नवव्या समासात चतरु पणे, धर्तू पणाने कसे वागावे याचे मार्गदर्शन घडते.
या समासामध्ये समर्थ स्पष्टपणे सांगतात की दष्टु आणि दर्जु नांच्या भयाने आपले कार्य विस्कळीत होऊ देऊ
नये. त्याना योग्य पद्धतीने शह द्यावा. लोकसग्रं ह करताना नाना प्रकारच्या व्यक्ती भेटत असतात. त्यातील
दर्जु न व्यक्ती ओळखनू ठे वाव्यात पण त्यांना सर्वामध्ये प्रगट करू नये अशी सचू ना देखील देतात. कारण
अशा व्यक्ती आपल्या कार्यात कटकटी करत राहतात म्हणनू सतत सावधानता आणि सतर्क ता आवश्यक
असते. एखादी दर्जु न व्यक्ती त्याचामधील वाईट गणु ांमळ ु े परिचित असेल तर अशा व्यक्तीना एकदम दरू न
लोटता त्यांना जवळ करून त्यांच्या वत्ृ तीतील दर्जु नाचा समळ ू नष्ट करण्याचा प्रयत्न करावा. त्यांचातील दोष
सतत दाखवनू दिले तर कटूता वाढते म्हणनू मदृ ू बोलण्याने, क्षमाशील वत्ृ तीने त्या व्यक्तीचे मन बदलावे.
त्याच्यातील वाईट वत्ृ तीचा नाश करावा. तरीही यश मिळाले नाही तर मात्र,
समाजातील गंडु गिरी साफ मोडून काढावी, अन्यायाचा प्रतिकार करावा अशी समर्थांची शिकवण आहे.
५८
जो दसु ऱ्यावरी विश्वासला| त्याचा कार्यभाग बडु ाला|
जो आपणचि कष्टत गेला| तोचि भला|| १९-९-१६
कोणतेही काम हाती घेतल्यानंतर ते पर्णू होईपर्यंत त्याचा पाठपरु ावा सोडू नये. आपला कार्यभाग आपणच पर्णू
करावा. जर आपले कार्य दसु ऱ्यावर सोपवले तर वेळेत पर्णू होईलच याची खात्री नसते. काम तर होत नाहीच
पण ताण मात्र वाढत जातो. यातनू निर्माण होणारे दषु ्परिणाम टाळण्यासाठी परावलंबी न रहाता स्वावलंबी
असावे ही शिकवण देतात.
समपु देशन ही काळाची गरज ठरते आहे. जीवनाचा अत्यंत वेगवान प्रवास, ताणतणाव, स्पर्धा, यामध्ये
यशस्वी होण्यासाठी मनषु ्य सतत धावत असतो. सततच्या धावण्याने तो शांतता हरवनू बसला आहे. भरपरू
पैसा, सख ु ासिनता, जे नवे ते हवे हा ध्यास यामळ
ु े असमाधान, अशांती, यामध्ये वाढ होत आहे. अहक ं ार,
असरु क्षितता, अनारोग्य, अस्थिरता यासर्व नकारात्मक विचारांमधनू ताण वाढत जातो. त्यातनू च शाररीक
मानसिक आरोग्य बिघडते. समाधानी, आनंदी जीवन जगण्यासाठी, मन:शांती देणार्या सकारात्मक विचारांची
सगं त आज आवश्यक आहे . समर्थांची शिकवण भविष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दष्टीकोन निर्माण करते
आणि शाररीक तसेच मानसिक आरोग्य उत्तम राखण्यास उपयक्त ु ठरते. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे’ तसेच
‘यत्न तो देव जाणावा’ या समर्थांच्या उक्ती आजही मार्गदर्शक ठरतात. जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे, मना
सत्य सक ं ल्प जीवी धरावा, अहतं ा गणेु सर्वही दःु ख होते, हे समर्थांचे जीवनविषयक तत्वज्ञान कोणत्याही
काळाला उपयक्त ु असेच आहे. जीवनाचा सर्वांगीण विकास करणारे समर्थांचे विचार त्याकाळात जसे उपयोगी
होते तसेच आजही तितके च मोलाचे ठरतात.
(सदर लेख ‘कल्याणी’ मासिकाच्या ‘समर्थबोध’ विशेषांकात २०१८ साली पर्वू प्रकाशित.)
५९
Xmg~moYmVrb
ì`dñWmnZemñÌ
श्री.श्रीनिवास रायरीकर
श्रीसमर्थांचा जन्म सन १६०८ मध्ये आणि निर्याण सन १६८२ मध्ये झाले. या ७४ वर्षांपैकी १२ ते २४ या
वयात (एक तप) त्यांची अध्यात्मिक साधना झाली. १६३२ ते १६४४ असे आणखी एक तप त्यांनी सपं र्णू
भारतभर भ्रमण करून समाजाचे निरीक्षण के ले. अनेक ठिकाणी मठ स्थापन के ले व मारूतीची मदं िरे उभारली.
‘मनाचे श्लोक हा अनमोल ग्रंथ १६७२ मध्ये पर्णू झाला. तसेच श्री दासबोध या आध्यात्मिक व व्यवहारीक
ज्ञान देणाऱ्या ग्रंथाची रचना १६३२ मध्ये म्हणजे साधना साधना सपं ल्यानंतर सरू
ु करून १६८० मध्ये पर्णू
के ली. तब्बल ४८ वर्ष चाललेले हे लिखाण तीन टप्प्यात झाले - २१ समासाचा, ७ दशकाचा आणि सध्या
प्रचलित असलेला २० दशकाचा म्हणजे २०० समासांचा (७७५१ ओव्यांचा) यातील निदान ३५ समास
(समु ारे ११०० ओव्या) या व्यवस्थापन, नेततृ ्व, व्यवहार या विषयांशी थेट निगडीत आहेत.
समर्थांचे ४८ वर्षांचे अनभु व, सक्ू ष्म निरीक्षण आणि त्यावरील चितं न यांचे अचक
ू प्रतिबिंब दासबोधात दिसते.
समर्थांनी महाराष्ट्रात च नव्हे तर इतर प्रातांताही एकूण ११०० मठ स्थापन के ले. आणि प्रत्येक मठावर एक
मठाधिपती किंवा महतं (नेता - लीडर) नेमला. श्रीरामदासस्वामी या सर्व नेत्यांचे नेते होते, आणि म्हणनू
जनतेने त्यांना ‘समर्थ’ ही पदवी दिली.
६०
त्या काळच्या परकीय राजवटीमध्ये समाजासाठी ११०० मठ स्थापणे हे के वढे अवघड आणि असामान्य
(extra ordinary) कार्य! त्यासाठी लागणारे नेततृ ्व समर्थांच्या अगं ी होते व इतर नेते कसे असावे, याची
विलक्षण जाण त्यांना होती. ११०० मठ स्थापन के ल्यावर मठाधिपतींची निवड लाखों कार्यकर्त्यांमधनू
करायची होती. समर्थ रामदास दरू दर्शी (visionary) अणि अतिशय बद्धि ु मान (extremely clever),
अभ्यासू तसेच विद्वान होते. ते सर्वार्थाने खरे नेते होते. या कार्यासाठी लाखो लोकांना प्रेरित, उद्युक्त (moti-
vate) करणे ही साधीसधु ी गोष्ट नव्हती. इतके मठ चालवण्याचे शिक्षण हजारो लोकांना देणे यात समर्थांच्या
विवेकबद्धीु चे सामर्थ्य दिसनू येते. अनयु ायी तयार करणे व त्यांना प्रेरित करणे (development & motiva-
tion) + संगठन बांधणे व टिकवणे (setting up organisation and maintaining it) यातनू नेता दिसतो
जो पढु े ध्येयाप्रत नेतो.
नेत्यांच्या अगं ी खालील गणु असणे आवश्यक आहे. त्याने स्वतःला बदलणे व स्वतःचा विकास करणे
महत्वाचे आहे. त्यासाठी-
२. स्वतःचे दोष ओळखणे - मनषु ्य एका ठराविक पातळीवर पोचल्यावर त्याला असे वाटू लागते, की
आपण कधीच चक ु त नाही. परंतु आत्मपरीक्षणानंतर स्वतःमधले दोष ओळखनू त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल
करणाराच खरा नेता होऊ शकतो.
३. स्वतःमधले दोष ओळखल्यावर ते घालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहणे हा नेत्याचा गणु असतो.
(कळते पण वळत नाही या मराठी म्हणीसारखी अवस्था असू नये).
४. नेत्याने नवीन गोष्टी शिकण्याची, नवनवीन कला शिकण्याची सवय लावनू घेतली पाहिजे. सध्याच्या शीघ्र
बदलांच्या काळात जगाबरोबर राहण्यासाठी याचा नेत्याला उपयोग होऊ शकतो.
५. आपल्या स्वतःच्या वागण्याने अनयु ायांना चांगल्या गोष्टी दाखवनू देणारा नेता यशस्वी होऊ शकतो.
(Role Model) स्वतःच्या अगं ी चांगले गणु असले, तरच तो इतरांना ठामपणे त्याविषयी आग्रह धरू शकतो.
नेततृ ्व अगं ी येण्यासाठी खालील टप्प्यांप्रमाणे जावे असे दासबोधात समर्थांनी सांगितले आहे-
१. अनयु ायी तयार करणे - ज्या लोकांमध्ये गणु वत्ता असेल त्यांना प्रशिक्षण व विकासाचे धडे देणे आवश्यक
आहे.
६१
लोक बहुत शोधावे। त्यांचे अधिकार जाणावे।
जाणजाणोनि धरावे। जवळ दरू ी।।
तसेच अधिकार पाहोन कार्य सांगणे। साक्षेप (जबाबदारीची जाणीव, सावधपणा) पाहोन विश्वास धरणे।
आपला मगज (महत्व) राखणे। काहीतरी।।
२. अनयु ायांना उद्दिष्टाकडे प्रेरित करणे, त्यांना कामात हुरूप येईल, असे वातावरण निर्माण करणे (Motiva-
tion & Inspiration)
३. नवे नेततृ ्व तयार करणे - समर्थांनी म्हटले आहे, ‘महतं े महतं करावे’ नेत्याने आपली जागा घेणारा नेता
तयार करावा.
नेत्याची वर्तणक
ू आदर्श पाहिजे. त्याचे बोलणे विचारपर्वू क असावे. आपण जे बोलतो ते सिद्ध करता आले
पाहिजे.
६२
विचार के ल्याशिवाय नेत्याने बोलणे योग्य नाही (No Loose Talk).
अनयु ायांना उगीच दख ु वणे योग्य नाही. सर्व अनयु ायांबरोबर ससु वं ाद साधणे नेत्याला जमलेच पाहिजे.
(Communication Skill) सगं ठन व सांघिक कार्य (Team Building & Team Work) करण्यासाठी
सर्व अनयु ायांना उद्युक्त करणे ही महत्वाची कला नेत्याकडे असणे आवश्यक आहे. या संबंधी दासबोधात
अनेक ओव्या आहेत. अनयु ायाची योग्यता पारखनू त्यांच्या योग्यतेनसु ार काम नेमनू देणे हेही नेत्याचे अति
महत्वाचे कर्तव्य आहे. कोणालाही काही ही काम देणे हा के वळ मर्ख ू पणा असे समर्थ म्हणतात.
असे के ल्याने नेता स्वतःला अनावश्यक कामाचे ताणापासनू वाचवनू इतरांचा विकासही साधू शकतो. तसेच
त्यामळु े अनयु ायांमध्ये काम करण्याची नवी उमेद निर्माण होऊ शकते. ज्यांच्या अगं ी ही क्षमता आहे, त्यांना
प्रशिक्षण देऊन, त्याविषयी अधिक माहिती देऊन त्यांचे कडून काम करुन घ्यावे. सध्याच्या विश्वव्यापी
विचारसरणीसाठी ही आवश्यक आहे. ग्लोबलायझेशन समर्थांना ३५० वर्षांपर्वी ू च दिसले होते असेच म्हणावे
लागेल. पढु ील ओवीमध्ये हे स्पष्ट दिसते-
नेत्याने प्रयत्नवादी असले पाहिजे. आळस सोडून सतत कष्ट करण्याची तयार ठे वली पाहिजे. जे करतो
ते अचक ू करण्याकडे नेत्याची प्रवत्ृ ती असली पाहिजे. सध्याच्या यगु ात हे गणु वत्तेचे धोरण आहे. पढु ील
ओवीमध्ये हे स्पष्ट दिसते.
अचक
ू यत्न करवेना। म्हणनू के ले ते साजेना।
आपला अवगणु जाणवेना। काही के ल्या।।
ही ओवी quality गरूु फिलिप्स क्रॉसबीच्या ‘Do It right first time’ या तत्त्वानसु ारच आहे. नेत्याने
चातर्यु आत्मसात करावे. इतर लोक काय बोलतात त्यांचे ऐकून घेऊन त्यावर चातर्याु ने विचार करून आपल्या
कामात बदल सचु वणे हा नेत्याचा आणखी एक गणु असतो. पढु ील ओवीमध्ये हे स्पष्ट दिसते.
६३
आदर सन्मान तारतम्य जाणे। प्रयोग समयो प्रसगं जाणे।
कार्याकारण चिन्हे जाणे। विचक्षण बोलिका।।
सर्वोत्कृष्ट असेच ध्येय ठे वावे. सर्वोत्कृष्ट तेच घ्यावे. निकृष्ट (Substandard) ते त्याज्य समजावे. निस्पृहपणे
विचार करून उत्तम गोष्टींचा पाठपरु ावा करावा. (Bench Marking)
नेत्याला दरू दृष्टी असली पाहिजे - म्हणजे त्याला पढु े काही काळानंतर काय होईल किंवा काय करावे याचे
आकलन होईल.
६४
आदरे वीण बोलणे। न पसु ता साक्ष देणे।
निंद्य वस्तु अगं ीकारणे। तो एक मर्ख
ू ।।
६५
Xmg~moYmVrb
ZoV¥Ëd {dMma
डॉ. शिरीष लिमये
समर्थांनी मांडलेल्या व्यवस्थापनविषयक विचारांमध्ये, नेता निर्माण करणे आणि विविध समदु ायांतील नेत्यांना
हाताशी धरून त्यांच्याकडून काम करून घेणे यावर खपू भर दिलेला आहे. सामान्य लोकांमधनू नेता निर्माण
करणे चांगलेच आहे. पण दरवेळेस सामान्य लोकांतनू नेता निर्माण करता येईलच असे नाही. म्हणनू नेतत्ृ त्वाचे
गणू असलेली माणसे ओळखणे, त्यांना एकत्रित आणनू संघटना बांधावी लागते. म्हणनू समर्थ म्हणतात,
स्वतः समर्थांचे त्याकाळातील छत्रपती शिवाजी महाराज, संत तक ु ाराम, मौनीबाबा, मोरया देव, रामचद्रं
अमात्य या सारख्या लोकप्रिय असणाऱ्या लोकांशी सख्य होते. लोकांना प्रेरणा देणे व्यवस्थापनात अत्यंत
महत्वाचे असते. नेत्याला सामदु ायिक ध्येय प्राप्त करण्यासाठी एक सयं ंत्रणा तयार करावी लागते, योग्य
माणसू योग्य ठिकाणी नेमावा लागतो, त्याला काम करण्याचा अधिकार द्यावा लागतो, त्याला कामाबाबात
जबाबदारी द्यावी लागते, त्याच्या कामावर लक्ष ठे वावे लागते, त्याला मार्गदर्शन करावे लागते, वेळोवेळी
त्याला कार्याला प्रेरित करावे लागते.
या ठिकाणी मला आपल्या देशाचे भतू पर्वू राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी सांगितलेली एक
घटना आठवते. ते इस्त्रोत काम करीत होते. एका अतं राळयान प्रकल्पाचे डॉ. सतीष धवन हे याचे प्रमख ु
होते. त्यांच्या हाताखाली कलाम साहेबांना प्रकल्पाचे नियोजन करावयाचे होते. अतं राळयान तयार झाले.
आकाशात सोडण्याची वेळ आली. अगदी शेवटच्या क्षणी सगं णकाने सचू ना दिली की इधं नाच्या एका
साठ्यात काही तरी कमी आहे. पण कलाम यांनी निर्णय घेतला की यान सोडायचे. त्यांनी तशा सचू ना दिल्या.
पण यान अतं राळात न क्षेपावता, बे आफ बेंगालच्या समद्रा ु त ते कोसळले. वार्ताहारांची परिषद होती,
६६
त्यावेळी डॉ. धवन पढु े झाले आणि परिषदेचे नेतत्ृ त्व करुन वत्तृ पत्रकारांना म्हणाले, “होप आज आमचे प्रयत्न
अयशस्वी झाले आहेत. पण पढु च्या वेळी आमचे शास्त्रज्ञ निश्चित यशस्वी होतील.” आणि खरोखरच पढु च्या
वेळी के लेला प्रकल्प यशस्वी झाला. त्यावेळच्या वार्ताहारांच्या परिषदेत त्यांनी डॉ. कलामांना जाण्यास
सांगितले. इथे आपल्याला डॉ. धवन यांचे नेतत्ृ त्व गणु दिसतात. जेव्हा अपयश आले होते तेव्हा स्वतः धवन
पढु े झाले आणि सर्व जबाबदारी त्यांनी स्वीकारली. जेव्हा यश मिळाले तेव्हा त्याचे श्रेय स्वतः न स्वीकारता,
आपल्या बरोबर काम करण्याच्यांना त्याचे श्रेय दिले. असे के ल्याने त्या नेत्याशी अनेक लोक अनन्य राहतात.
आज इस्त्रोच्या त्या विभागाला डाॅ.धवनांचे नाव दिलेले आहे.
म्हणनू समर्थ म्हणतात,
त्याग, कृतीशीलता आणि निस्पृहता या गणु ांमळ ु े त्याच्याकडे नेतत्ृ त्व चालत येते. उदाहरणार्थ, महात्मा गांधी
त्यागी होते, कृतीशील होते आणि निस्पृह होते. निस्पृहस्य तणृ ं जगत।् आणि म्हणनू च पडि ं त जवाहरलाल
नेहरूं सारखे प्रचडं श्रीमतं राजकारणी, तसेच राजगोपालाचारींसारखे प्रकांड पंडित त्यांच्या समोर हात
जोडून ते सांगतील तो शब्द झेलण्यास तयार होते. प्रभू रामचद्रां
ं चे नेतत्ृ त्व पाहून वाल्मिकी ऋषी त्यांना
‘लोकब्रह्मपरायण’ म्हणत असत. प्रभू रामचद्रांं चे राजकारण म्हणजे जनता जनार्दनात
भगवतं पाहून सहृदयतेने के लेले राजकारण होते.
नेता म्हटला की त्याला आपल्या बरोबर काम करणाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या अधिकारांप्रमाणे कामांचे वाटप
करणयाचे कौशल्य अगं ी बाणावे लागते, या सदं र्भात समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
चक
ु ीच्या माणसावर जबाबदारी देऊन कार्याचा नाश होतो. नेत्याला कमीपणा येतो. फुटबॉल खेळात गोली
कोणाला नेमावे, पढु च्या फळीत कोणी खेळावे, बाकी कोणी राहावे, मधल्या फळीत कोणी खेळावे, उजव्या
बाजनू े खेळणारे , डाव्या बाजनू े खेळणारे कोण असावेत याचे नियोजन करावे लागते. जो डावखरु ा आहे त्याला
डाव्याबाजनू े खेळण्यास नेमले पाहिजे, म्हणजे तो चांगला खेळ करू शके ल. अन्यथा खेळात अपयश येईल.
छत्रपती शिवाजी महाराजांना माणसांची पारख उत्तम होते. कोंढाणा जिक ं ण्यासाठी तानाजी मालसु रे यांची
निवड के ली. अफजल खानाला मारण्यासाठी कान्होजी जेधे आणि नेताजी पालकर यांची निवड के ली.
आग्र्याला जाताना मिर्झाराजे जयसिंग यांचा मल
ु गा रामसिंग या रजपतू सरदाराला त्यांनी जवळ के ले,
६७
छत्रपतींचे सगळे वकील विलक्षण बधु ्दीमान होते. म्हणजे आपल्या माणसांची क्षमता ओळखनू जर आपण
त्यांना त्यांच्या त्यांच्या क्षमतांप्रमाणे जबाबदारीचे वाटप के ले नाही तर त्यांनी के लेल्या चकु ांची झळ
सर्वांना सोसावी लागते. कर्ज देण्यापर्वी ू बँकेने जर त्या व्यक्तीची कर्ज परत फे डीची क्षमता किती आहे याचा
अभ्यास न करता कर्ज दिले आणि त्याने ते कर्ज परत के ले नाही तर त्याची झळ सामान्य खातेदाराला सहन
करावी लागते. अतं र राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या राजदतु ांना निवडताना भारत सरकारला खपू काळजी
घ्यावी लागते. ही माणसे जर त्यागी असतील, चारित्र्य सपं न्न असतील, निःस्पृह असतील तर भारताची
शान वाढवतील अन्यथा भारताची मान शरमेनं खाली नेतील. येसाजी कंकांचा पराक्रम पाहून कुतबु शहाने
त्याला एक सोन्याचा कंठा बहाल के ला. पण येसाजीने तो कंठा निःस्पृहपणे परत के ला आणि कुतबु शहाला
सांगितले, “माझ्या पराक्रमाचे कौतक ु करायला माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज समर्थ आहेत. हा तमु चा
कंठा मला नको.” येसाजीच्या या वक्तव्याने छत्रपतींची गोवळकोंड्यातील प्रतिष्ठा वाढली.
कारगील यद्धा
ु त कॅ प्टन विक्रम बात्रा, लेफ्टनंट बलवंत सिंग, ग्रेनेडियन योगेंद्रसिंग यादव, मेजर राजेश
अधिकारी, मेजर विवेक गप्ता
ु , नायक दिगेंद्रकुमार, मेजर मनपाणी आचार्य या सर्वांनी आपल्या क्षमतांची
परीसीमा गाठून के लेला अद्वितीय पराक्रम भारताची शान आणि मान जगात वाढविणारा होता. म्हणनू समर्थ
म्हणत आहेत की,
६८
Xmg~moYmVrb
ì`dñWmnZemñÌ
डॉ. पराग काळकर
के वळ भावनेच्या आहारी जाऊन ग्रंथ न वाचता काय आणि कशासाठी वाचवा, याचा खल
ु ासा समर्थांनी
के ला आहे.
जीवन व्यवस्थापन, स्वयं व्यवस्थापन आणि कुटुंब व्यवस्थापन याच्या सोबत समाजात वावरताना सहजपणे
वापरता येणारे समर्थांचे विचार आजच्या व्यवस्थापन शास्त्रामधील ‘मनषु ्यबळ व्यवस्थापन’, ‘समहू
व्यवस्थापन’ अशा सक ं ल्पनांमधे चपखल बसतात. समर्थ म्हणतात,
तेव्हा प्रश्न व्यक्ती म्हणनू आपण काय करतो त्याचा असतो. कारण व्यवस्थापन हे माणसांचे वा माणसांनी
करावयाचे असते. ज्याला ते करावयाचे आहे, त्यास अनेकांना बरोबर घेऊन चालावे लागते. हे बरोबर
चालणारे आपल्या चालीने चालणारे असतीलच असे नाही. काही मदं असतील, तर काही जलद. त्यावर
रामदासांचा सल्ला असा की, मल ु ाच्या चालीने चालावे मल ु ांच्या बोलीने बोलावे. म्हणजे सगळे बरोबर
येतात की नाही, हे पाहत पाहत पढु े जावे. या बरोबर येणाऱ्यांशी संवाद हवा. तो हवा असेल तर भाषा
तशी हवी. आपल्या भाषेने त्यांना जिक ं ावे. त्यासाठी मदृ ,ू सभ्यपणे सवं ाद साधावा. कारण आपणच मळ ु ात
ओबडधोबड भाषेत बोललो, तर समोरचा तसाच प्रतिसाद देण्याची शक्यता अधिक. कारण बोलणे हे
पेरण्यासारखे असते. जे जमिनीत रुजते, ते वर येते.
असा प्रश्न करीत रामदास बोलावे कसे, हा सल्ला देतात. तेव्हा असे बोलनू अनेकांची मने जिंकावीत.
आधनि ु क व्यवस्थापनशास्त्र सांगते की, आपले यश आपल्याभोवती असा सकारात्मकांचा सघं आपण उभा
करू शकतो की नाही, यावरही अवलंबनू असते. म्हणजे आपण यशस्वी व्हावे हे जसे आपल्याला वाटायला
हवे, तसेच ती आसपासच्यांचीही इच्छा हवी. म्हणनू च -
हा झाला एक भाग. आधनि ु क व्यवस्थापनशास्त्रात महत्त्व आहे ते सातत्याला. म्हणजे धरसोड नसावी. जे
काही करीत आहोत ते पर्णू अदं ाज घेऊन सरू ु करावे आणि तडीस न्यावे. ज्यास या मार्गाच्या आधारे यशप्राप्ती
करून घ्यावयाची असेल त्याने प्रयत्नांचे सातत्य सोडू नये. असे सातत्य राखणाऱ्याकडे नेततृ ्व अपरिहार्यपणे
येते. ते नसेल तर अशा व्यक्तीस गांभीर्याने घेतले जात नाही. रामदास विचारतात -
७०
साहेब कामास नाही गेला। साहेब कोण म्हणेल त्याला।।
व्यवस्थापनातले हे मल ू तत्त्व नव्हे काय? खद्दु साहेबच जेव्हा मैदानात उतरून आघाडीवर लढताना
सैनिक पाहतात तेव्हा त्या सैनिकांचा उत्साह तर द्विगणि ु त होतोच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे
साहेबाबाबतचा त्यांच्या मनातला आदरदेखील कितीतरी पटीने वाढतो.
दसु री महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्यक्ष परिस्थितीचा अदं ाज घ्यायचा असेल तर साहेब हिडं ता हवा. कार्यालयात
वातानक ु ू ल कक्षात बसनू साहेब नसु ते ‘हे करा, ते करा’ असे आदेश देत असेल तर अशा साहेबाचे शारीरिक
वजन तेवढे वाढते. त्याचे व्यावसायिक वजन मात्र हळूहळू कमीच होत जाते. त्यामळ ु े साहेब हिडं ता हवा.
कोणत्या आघाडीवर काय चालले आहे याची खडान् खडा माहिती त्यास हवी.
कोणत्याही आधनि ु क व्यवस्थापन गरूु शी स्पर्धा करे ल असा हा सल्ला नव्हे काय? फरक इतकाच, की
आधनि ु क व्यवस्थापन गरूंु कडे आपण त्या क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणनू पाहतो, तर रामदासांकडे संत म्हणनू . आणि
संत म्हटले की देवधर्म आदी आन्हिके आली. तेव्हा त्यांस कशाला महत्त्व द्या, असे आपणास वाटते.
हे आपले वाटणे किती अयोग्य आहे हे तपासनू घ्यावयाचे असेल तर रामदासांचे वाचन करण्यास पर्याय
नाही. कुटुंबनियोजनापासनू ते घरबांधणीत वीट कशी भाजावी, येथपर्यंत रामदास उत्तमपणे मार्गदर्शन
करतात. ते करून घेण्यासाठी आपणही ज्ञानसाधक असावयास हवे. याचे कारण कोणत्याही काळातील
व्यवस्थापनशास्त्रात प्रगतीसाठी अत्यावश्यक घटक म्हणजे ज्ञान. त्याची कास कधीही सोडून चालत नाही.
त्यासाठी ज्ञानमार्गी असावे लागते. त्याची सवय लावनू घ्यावी लागते. या ज्ञानाचे महत्त्व रामदास सांगतात-
तेव्हा सर्व सिद्धीक्षमता आहे ती ज्ञानात. आणि ते मिळवणे हे प्रयत्नसाध्य आहे. आवश्यक असते ते त्यासाठी
प्रयत्न करीत राहणे. या ज्ञानाची आस लावनू घेणे. ते शोधत राहावे लागते. मिळवत राहावे लागते. त्याच्या
मिळण्याने अज्ञानाचा अतं होतो आणि संदहे दरू होतो.
रामदास व्यवस्थापनाची मल ू तत्त्वे ही अशी सोपी करून सांगतात. ती ज्यांना समजनू घ्यावयाची
असतील त्यांच्याकडून रामदासांनी एकच अपेक्षा के ली आहे. ती म्हणजे उद्दिष्टांविषयी प्रामाणिक असणे.
व्यवस्थापनाची तत्त्वे पाळूनही जे यशस्वी होत नाहीत, त्यांच्यात ही बाब प्रामखु ्याने दिसनू येते. ते
उद्दिष्टांविषयी प्रामाणिक नसतात. तेव्हा आपल्या आत जे काही आहे तेच बाहेरही असावयास हवे आणि
७१
बाहेर जे काही आहे त्याचा सबं ंध आत जे काही सरू
ु आहे त्याच्याशी हवा.
सर्व प्रसगं ामधे तोडीस तोड ज्याला बिझिनेस स्ट्रॅटेजी सबं ोधले जाते त्यासाठी रामदास म्हणतात-
समर्थांचा ‘महतं ’ हा एक आदर्श तावनू सल ु ाखनू निर्माण के लेला ‘व्यवस्थापक’ आहे वैयक्तिक जीवनापासनू
ते सामाजिक आयषु ्यापर्यंत सर्व ठायी उत्तम व्यवस्थापन कसे असावे याचा परिपाठ समर्थ रामदासांनी घालनू
दिला आहे.
७२
Xmg~moYmVrb
g_mOemñÌ
डॉ. सौ. रजनी पतकी
छांदोग्य उपनिषदात अध्याय सहामध्ये अरुणि व श्वेतके तु यांचा सवं ाद आहे. श्वेतके तु आपले पिता अरुणि
यांना काही प्रश्न विचारतो व ते त्याला उत्तरे देतात. या प्रश्नोत्तरात सष्टि
ृ निर्मिती विषयी एक प्रश्न आहे. त्यावर
ऋषी अरुणि उत्तरतात की प्रथम फक्त एकमेव अद्वितीय असे “सत”् होते. त्या सत् ने असा विचार के ला की
“बहु स्यां प्रजायेय” अर्थात मी अनेक व्हावे. या त्याच्या संकल्पानंतर तेज उत्पन्न झाले, इत्यादी भाग पढु े
येतो. (अ. ६ खडं २) यावरून मनषु ्याच्या सक ं ल्पाचे मळू लक्षात येते. मनषु ्याला एकट्याला करमत नाही,
त्याला जोडीदार लागतो. अनेकात तो रमतो. हे अनेक मनषु ्ये मिळून जो समाज निर्माण होतो त्याचे मळ ू आहे.
समाज म्हटले की विभिन्न प्रवत्ृ तीच्या लोकांचे एकमेकांच्या सहवासात वसती असणे क्रमप्राप्त आहे. तो समाज
त्यातील घटकांना सरु क्षा देतो, मदत करतो. सख ु दःु खात ते घटक एकमेकांना सहाय्य करतात. असा समाज
व्यापक होत होत एक राष्ट्र बनते. मग त्यात आचार प्रणाली, विचार प्रणाली इत्यादी निर्माण होते. समाजावर
काही संकटेही येतात. त्यांना प्रतिकार करण्यासाठी एखादा नेता, राजा, संतश्रेष्ठ सर्वांना मार्गदर्शन करतात व
सर्वजण एकमेकांच्या सहकार्याने त्या संकटातनू पार होतात. अशाच एका संकटकाळात समर्थ रामदास या
एका सळाळत्या व्यक्तीमत्वाच्या सतं महात्म्याने महाराष्ट्र प्रदेशाला मार्गदर्शन के ले आहे. तो काळ इसवी
सनाच्या सतराव्या शतकाचा होता. महाराष्ट्राच्या आजबू ाजल ू ा असणारय् ा पातशाह्या, त्यांनी बसविलेली
दहशत, स्त्रियांची होत असलेली विटंबना, लटु ालटू , जाळपोळ, लोकांनी गमावलेला आत्मविश्वास अशा
निराशाजनक परिस्थितीत समाजाला ताठ मानेने उभे करण्याचे अलौकिक कार्य समर्थ रामदासांनी के ले.
हे कार्य करण्यापर्वी
ू त्यांनी स्वतःला मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम बनविले. आसेतु हिमाचल
परिभ्रमण करून देशाचे निरीक्षण के ले व महाराष्ट्र ही आपली कर्मभमू ी निवडून आनंदवनभवु नाचे स्वप्न
पहिले व साकारही के ले. त्यासाठी त्यांना समाजात वावरावे लागले. समाजाचा अभ्यास करावा लागला.
आर्थिक, मानसिक, कौटुंबिक, ग्रामीण, शहरी, आरोग्यविषयक, धर्मविषयक, औद्योगिकीकरण विषयक,
शिक्षणविषयक, राजधर्मविषयक या सर्व विषयांवर समर्थांनी समाजाचे निरीक्षण करून त्यावर चितं न करून
काही विधायक सिद्धांत मांडून त्यावर कार्य के ले. त्यासाठी महतं घडविले, त्यांना कार्याचे व्यवस्थापन
शिकविले व समाजाला यशस्वीरित्या सक्षम के ले. मरगळलेल्या मनाच्या तरुणांच्या हातात शास्त्र दिले.
जेणेकरून ते शस्त्र धरण्यासही तयार झाले. यातनू समर्थ रामदास एक थोर समाजशास्त्रज्ञ या रूपातही प्रभावी
ठरले. त्यांच्या या समाजशास्त्राचा दासबोधात जो निर्देश होतो, त्याचे अल्पचितं न प्रस्तुत लेखात करावयाचे
आहे.
७३
प्रथम आपण भारतीय समाज रचनेचा विचार करू. नंतर आधनि ु क समाज शास्त्रज्ञांचे मत समजावनू घेऊ व
त्यापढु े सध्या फक्त भारतीय समाजावरच नव्हे तर सर्व जगावर आलेल्या कोविड (१९) महामारीचे सक ं टव
त्याचा समाजावर झालेला परिणाम पाहून दासबोधात या समस्येचे निराकरण करण्याचा काही उपाय समर्थांनी
दिला आहे का, समाजाचे स्वास्थ्य टिकविण्यासाठी समाजशास्त्र त्यांनी विचारात घेतले आहे का ते पाहू-
अल्प विचार-
पर्वी
ू भारतीय समाज रचना वर्णाश्रम व्यवस्थेशी सबं ंधित होती. समाजशास्त्रात राजा हा क्षत्रियवर्णाचा असे.
तथापि महत्त्वाच्या विषयांबाबत त्याला सर्व वर्णातील प्रतिष्ठित लोकांशी विचार-विनिमय करावा लागत असे.
रामाला यवु राज म्हणनू घोषित करण्यापर्वी ू राजा दशरथाने असा विचार-विनिमय आपल्या मत्रि ं मडं ळांशी
(ज्यात सर्व वर्णाचे प्रतिष्ठित प्रतिनिधी होते) के ला होता; असा उल्लेख रामायणात आहे. समाजातील सर्व
घटकांना न्याय मिळावा अशी व्यवस्था होती. स्वधर्मपालन करण्यावर लोकांचा कटाक्ष होता. समाज एकत्रित
राहण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम नित्य-नैमित्तक कर्मात अनसु ्यूत के ले होते. मदं िरे , पाठशाला, तलाव-
विहिरी, धर्मशाळा बांधणे, देव-देवतांच्या अवतारांचे जन्मोत्सव, तीर्थयात्रा यांनी समाज व देश जोडण्याचा
प्रयत्न के ला होता. कीर्तन हे लोकशिक्षणाचे महत्त्वाचे साधन होते. गरुु कुलातनू सर्व प्रकारचे यथायोग्य शिक्षण
दिले जात होते. उत्तम करव्यवस्था होती. चार आश्रम ही जीवनाची विभागणी होती. गहृ स्थ हा समाजाचा
कणा होता.
अशी आदर्श समाज रचना सततच्या परकीय आक्रमणांमळ ु े हळूहळू विस्कटत गेली. ती पनु ्हा सरु ळीत
करण्याचा प्रयत्न समर्थांनी यशस्वीरित्या के ला. या प्रयत्नात त्यांनी जे विचार अमलात आणले ते आधनि ु क
समाज शास्त्रज्ञांच्या विचाराशी बरे चसे जळु तात. किंबहुना ‘समाजशास्त्राला आध्यात्मिक बैठक’ हा महत्त्वाचा
मद्ु दा त्यांच्या समाज शिक्षणात दिसनू येतो.
आधनि
ु क समाजशास्त्रज्ञांचे समाज चितं न-
समाज म्हणजे काय त्याची व्याख्या काही विद्वानांनी के ली आहे. Mexweber, Park and Burgess,
Simmel, Emile Durkhiem, Mark Young ही काही परदेशी विद्वानांची नावे होत. Social Ac-
tion, Social Interaction, Social Facts, Social aspects of human life असे मद्ु दे त्यांनी आपल्या
व्याख्येत अनसु ्यूत के ले आहेत. समाजातील प्रश्न सोडवनू त्यांची उकल करण्यासाठी या शास्त्रज्ञांनी
समाजशास्त्राची काही विशेष क्षेत्रे निवडली आहेत. ती अशी -
७४
या आधनि ु क क्षेत्रांच्या सदं र्भात समर्थांनी जे समाज चितं न के ले आहे. ते प्रस्तुत लेखिके ने एका लेखात लिहिले
आहे. (समर्थ रामदास: एक परिपर्णू समाज शास्त्रज्ञ. विशेषांक -“रामदास आणि रामदासी” शताब्दी विशेषांक
२०१५) प्रस्तुत लेखात कोविड-१९ या महामारीमळ ु े समाजामध्ये जे वातावरण निर्माण झाले आहे व त्याचा
अर्थव्यवस्थेवरही जो परिणाम झाला आहे त्याबाबत समर्थांचे काही विचार दासबोधात आले आहेत का
या एकाच मद्ु याचा विचार आपण करणार आहोत. कारण या पर्वी ू ही अशा महामारी येऊन गेल्या आहेत.
त्याचा सामना समाजाने के ला आहे. त्यामळ ु े समर्थांनी नक्कीच याचा विचार समाजशास्त्रीय दृष्टिकोनातनू
के ला असेल; तो कसा ते वरील मद्यां ु पैकी तिसरा मद्ु दा Medical Psychology वैद्यकीचे समाजशास्त्र या
शीर्षकाखाली पाहण्याचा विचार करू.
दासबोधात आलेले वैद्यकीय जागरूकते सबं ंधीचे चितं न-
वैद्यकीय समाजशास्त्र-
शरीर व मनाने कणखर असा समाज घडविणे हे समर्थांचे अगि ं कृत कार्य होते. यासाठी त्यांनी मानवी
जीवनाला अध्यात्माचे अधिष्ठान ठे वले, कारण अध्यात्म हा भारतीयांचा श्वास आहे. समर्थ म्हणतात,
सभु मि
ू आणि उत्तमकण। उगवेना पर्जन्येवीण।
तैसे अध्यात्मनिरूपण। नसता होय।। ५-३-८
म्हणनू समर्थांच्या वाङ्मयात समाज व अध्यात्म या समाज व्यवस्थेच्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. समाज हा
निष्ठेने बांधलेला असावा असे ते म्हणतात.
यात त्यांनी चवथ्या एका गोष्टीची भर घातली आहे, ती म्हणजे साक्षेप. तसेच समाजाने मानवधर्माचे पालन
करावे. ज्याच्यामळ ु े हे जग चालते, त्याची आठवण ठे वावी. आतं रिक चैतन्य म्हणजे अतं रात्मा. हा अतं रात्मा
चार खाणी (जारज, स्वेदज, अडं ज, उद्भिज जीवोत्पत्ती) व चार वाणी (परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी) यांचा
प्रवर्तक आहे. मनषु ्य देहाच्या सगं तीने कार्य करतो पण देहधर्म पाळत नाही. आहार-विहाराचे नियमन करत
नाही. म्हणनू रोगी होतो. योग्य देह धर्मपालन के ले नाही की मनषु ्यावर सकं टे येतात. या सकं टांना “इति” असे
म्हणतात. परु ाणांमध्ये या ईतिचे सात विभागात विभाजन के ले आहे. अतिवष्टी ृ , अनावष्टी
ृ , मषू क, शलम, शक ु ,
स्वचक्र व परचक्र या सात ईति म्हणजे संकटे होत. आपण ही समाजावर येणारी ही संकटे जाणतो. अतिवष्टी ृ व
अनावष्टी ृ ने समाजात अन्नधान्याचे नक ु सान होते. शेतकरी निराश होतात, आत्महत्या देखील करतात. मषू क
म्हणजे उंदीर. यांच्यापासनू प्लेगसारखी महामारी येते हे सर्व जाणतात. शलभ म्हणजे टोळ. टोळधाड शेताचे
कसे नक ु सान करते हे ज्ञात आहे. शक ु म्हणजे पक्षी. आज बर्ड फ्लूचा प्रताप सर्व जाणतात. स्वचक्र म्हणजे
आपल्याच राजावर के लेला हल्ला, जो सर्वांना टेलिव्हीजनद्वारे पहायला मिळतो. परचक्रही सर्वांना माहित
७५
आहे. तेव्हा ही सक ं टे येऊच नयेत याची काळजी घ्यायला हवी. यासाठी समर्थांनी दासबोधात उत्तम मार्गदर्शन
के ले आहे.
आहार-विहाराचे नियम न पाळल्याने आज कोवीड-१९ या महामारीला तोंड देणे जगाला अवघड झाले आहे.
या महामारीने समाजाचे खपू नक ु सान झाले आहे. या रोगामळ ु े समाजामध्ये मानसिक बदल खपू झाला आहे.
मलु े, महाविद्यालयीन विद्यार्थी, आरोग्य सांभाळण्याचे कार्य करीत असलेले वैद्य, नर्सेस यांना एक प्रकारचा
ताण पडल्याने त्यांना काळजी, नैराश्य आले आहे. Social Distance अर्थात् एकमेकांपासनू अतं र ठे वनू
राहणे, मास्क (मख ु बंध) वापरणे याने नातेसंबंधातही तणाव उत्पन्न झाला आहे. ज्येष्ठ नागरिक घरात बंदिस्त
झाल्याने त्यांनाही करमेनासे झाले आहे. सर्वांना रोगाची भीती वाटत असल्याने आतं रिक दबाव निर्माण झाला
आहे.
अशावेळी भारतासारख्या ऋषी-मनु ींच्या व संतांच्या भमू ीत सर्वांना उभारी धरता येईल असे शास्त्र उपलब्ध
आहे. दासबोध हा ग्रंथ त्यापैकीच एक असल्याने या सामाजिक रोगग्रस्त दरु वस्थेला तोंड देण्याचा मार्ग
समर्थांसारख्या थोर समाजशास्त्रज्ञाने नक्कीच दिला आहे. तो काय ते दासबोधातील वैद्यकीय समाजशास्त्र
खालीलप्रमाणे सांगते-
समर्थांनी महाराष्ट्रात व भारतात अनेक मठ स्थापन के ले आहेत व तेथे मारुती उपासना नेमनू दिली आहे.
महाराष्ट्रात अकरा मारुतींची स्थापना के ली आहे. याचे कारण मारुतीचा वज्र देह, जो कधीच रोगग्रस्त झाला
नाही. मारुतीसारखे सर्वांनी वज्रदेही व्हावे म्हणनू समर्थांनी ही मारूती उपासना अर्थात् बलोपासना सरूु के ली.
निरोगी शरीरात निरोगी मन राहते म्हणनू शरीर घडविले पाहिजे. रोजचा व्यायाम आवश्यक आहे. कोविड-१९
साठीही डॉक्टर्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास सांगत आहेत. दासबोध अभ्यासकांनी हे आधीच
माहित आहे.
समाज सविद्य
ु हवा, लोक, गणु वान, कुशल, सामर्थ्यवान हवेत. यासाठी समाजात उत्तम गणु ांची पेरणी व्हावी.
समर्थ म्हणतात, ‘सगणु भाग्यश्री भोगती। अवगणु ास दरिद्रप्राप्ती॥’ येथे दारिद्र म्हणजे फक्त आर्थिक गरीबी
नाही तर आरोग्याचीही आहे. निरोगी रहावयाचे असेल तर आहार-विहाराचे योग्य नियमन आवश्यकच आहे.
समर्थांनी दासबोधात दैनंदिनीच दिली आहे. मनाच्या सामर्थ्याचा विचारही आरोग्यासाठी आवश्यक आहे.
मनःस्वास्थ्य बिघडले की आजार होतात हे आजचे वैद्यक शास्त्रही सांगते. Psycosomatic Illness हा
७६
आज परिचयाचा शब्द आहे. मनावरच्या ताणाशी याचा सबं ंध आहे. मनाला हळूहळू वळण लावावे लागते
त्यासाठी समर्थांनी मी कोण, जग म्हणजे काय, मळू तत्त्व काय याचा विचार दासबोधात के ला आहे. पचं ीकरण
सांगनू स्वतःचे खरे रूप आत्मस्वरूप-ओळखावे व मन ताणरहित/विकल्परहित करावे म्हणजे तणावग्रस्ततेने
येणारे नैराश्य, डायबेटीस इत्यादी आजार होणार नाहीत व कोविड १९ सारख्या महामारीला तोंड देण्यास
शारीरिक व मानसिक तयारी होईल. मनाचे श्लोकही यासाठी उपयक्त ु आहेत. समर्थ म्हणतात,
समर्थांच्या व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यासही आज कार्यालयीन कामकाजासाठी के ला जातो. त्यांनी महतं ांची
जडण घडण कशी करावी त्याचे उत्तम मार्गदर्शन दासबोधात के ले आहे. कार्यकर्त्यांची फळी या मार्गदर्शनाने
उभी करता येते. कोविड-१९ च्या महामारीच्या काळात अशी योजना उपयक्त ु ठरावी.
उपसहं ार-
समाजामध्ये एकोप्याने राहणे आवश्यक आहे, एकमेकांच्या सरु क्षिततेचा विचार करणे जरूरीचे आहे, हे
समर्थांनी दासबोधात सांगितले आहे. ते म्हणतात,
पढु े ते म्हणतात,
मैत्री करता होते कृत्य। वैर करिता होतो मतृ ्य।
बोलिले हे सत्य की असत्य। ओळखावे॥
बहुतांचे मख
ु ी उरावे। बहुतांचे अतं री भरावे।
उत्तम गणी
ु विवरावे। प्राणिमात्रांशी।।
७७
शाहणे करावे जन। पतित करावे पावन।
सष्टि
ृ मध्ये भगवद्वजन। वाढवावे॥ १४-७-२८-२३
७८
Xmg~moYmVrb
Aïm§J`moJ gmYZm
डॉ. सौ.मृणालिनी कुलकर्णी
योगशास्त्राच्या दृष्टीकोनातनू विचार के ला असता सपं र्णू दासबोध हा योगशास्त्र आहे. योग हा शब्द ससं ्कृ त
यजु धातपू ासनू बनला आहे. यजु म्हणजे जोडणे, सयं ोग होणे, शरीर आणि मन, आत्मा आणि परमात्मा यांचा
संयोग.
योगशास्त्र आणि उत्पत्तीनसु ार योग म्हणजे सतं ल ु न होय. शरीर, मन, आत्मा व इद्रि
ं ये यामध्ये समन्वय साधणे
म्हणजे योग होय. योग भारतीय ससं ्कृ ती आणि तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. योगसाधनेमळ ु े शारीरिक व मानसिक
क्षमता वदृ ्धिंगत होतात. श्रीसमर्थांनी विवेक, वैराग्य आणि आत्मसंयमन याद्वारे ग्रंथराज दासबोधात योग
सांगितला आहे. दासबोधाच्या ग्रंथारंभ लक्षणात योगाभ्यासाचे महत्त्व सांगताना श्रीसमर्थ रामदास म्हणतात,
यमनियमसनप्राणायामप्रत्याहरधारणाध्यानसमघयोऽष्टांषङ्गानि।
यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही योगाची आठ अगं े पतंजली मनु ीनी
साधनापादाच्या २९ व्या श्लोकात सांगितली आहेत. “अहिसं ासत्त्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमाः” अहिसं ा,
सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे पाच यम वैयक्तिक स्वास्थ्यासाठी आहेत. कायिक, वाचिक,
मानसिक अहिसं ा पाळणे अपेक्षित आहे. दासबोधात समर्थांनी म्हटलेच आहे की,
दसु रय् ाचे चालीने चालावे। दसु रय् ाचे बोलणी बोलावे।
दसु रय् ाचे मनोगते जावे। मिळोनिया॥ १५-१-८
सत्य बोलणे, सत्कर्म करणे, गोड बोलणे. म्हणजे सत्य. याचे समर्थन करताना श्रीसमर्थ म्हणतात,
समर्थांनी सत्याचा सर्वकाळ आग्रह धरला आहे. सत्य म्हणजे स्वरूप जाण। असत्य माया हे प्रमाण॥ सत्य हे
आत्मस्वरूप आहे असे समर्थ म्हणतात. अस्तेय- अ म्हणजे नाही आणि स्तेय म्हणजे लोभ. गरजेपेक्षा जास्त
घेणे म्हणजे अस्तेय. भिक्षानिरूपणात समर्थ म्हणतात,
समर्थांचा सत्वगणी
ु साधक अतिथी अभ्यागताना कधीही भक
ु ीस्त जावू देत नाही.
ब्रह्मचर्य- आत्मविवेक, प्रखर वैराग्य, अनभु वाचे ब्रह्मज्ञान, आचार-शिलता आणि परोपकार हे ब्रह्मचर्य व्रत
आहे.
अपरिग्रह- म्हणजे संग्रह न करणे. क्रिया करून करवावी- इतरांकरवी। या न्यायाने समर्थांनी प्रत्येक गोष्टीचे
आचरण स्वतः के ले आणि मग इतरांनी तसे वागावे असा आग्रह धरला. तपश्चर्या काळात आणि तीर्थाटन
काळात अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना देखील त्यानी कशाचाही सचं य के ला नाही.
८०
शौचसतं ोषतपःस्वाध्यायेश्वर प्रणिधानानी नियमाः॥३२॥ पतंजली योग.
अष्टांग योगाचे दसु रे अगं नियम. हे पाच आहेत. हे सामाजिक स्वास्थ्यासाठी आहेत. शौच, संतोष, तप,
स्वाध्याय, ईश्वप्रणिधान.
स्वाध्याय- शास्त्रांचा व धर्मग्रंथाचा अभ्यास तसेच उपास्य देवतेच्या मत्रांं चा जप म्हणजे स्वाध्याय. ग्रंथराज
दासबोधाच्या रचनेत शिवगीता, रामगीता, गरुु गीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधतू गीता, भगवद्गीता, ब्रह्मगीता,
हसं गीता, पांडवगीता, गणेशगीता, येमगीता, उपनिषदे, वेद, वेदान्त, भागवत इ. ग्रंथांचे अध्ययन के ल्याचे
दिसनू येते. प्रभू रामचद्रां
ं नी प्रत्यक्ष त्याना अनग्रु ह देवनू “श्रीराम जयराम जय जय राम” हा मत्रं दिला होता.
समर्थांचा हा मत्रं जप अहोरात्र चालू होता.
८१
योगाचे तिसरे अगं आसन. स्थिरसख ु मासनम॥्
शरीर ज्या स्थितीत राहिले असता मन आणि शरीर या दोहोस सख ु वाटेल आणि स्थिरता प्राप्त होईल ते आसन
होय. त्यामळ ु े आत्म्याच्या ठिकाणी तन्मयता साधने सख
ु ावह होते. आसन सिद्ध झाले असता राग-द्वेषादि
द्वंद्वांचा त्रास होत नाही. ज्याला आसनसिद्धी झाली तो योगी म्हणजे,
नैसर्गिक श्वासप्रश्वासाबरोबर चालणारी अजपा ही जाणत्यानाच कळते असे श्रीसमर्थ म्हणतात. प्राणायाम
म्हणजे श्वासावर नियंत्रण. सयं म. मनाच्या शद्ध
ु तेसाठी हे आवश्यक आहे.
८३
येथे जीवलग म्हणजे विषयलोलपु इद्रि
ं ये. त्यांचे दमन व्हावे असे समर्थ म्हणतात.
योगाच्या आठ अगं ापैकी ही पाच बहिरंग साधने आहेत. तर धारणा, ध्यान, समाधी ही तीन अतं रंग साधने
आहेत.
धारणा - देशबंधाश्चितस्य धारणा। चित्ताला कोणत्यातरी देशावर म्हणजे स्थानावर जणू बांधनू ठे वल्यासारखे
स्थिर करणे ही धारणा होय. देश म्हणजे एखादा भाग. हा छोटा किंवा मोठा कसाही असू शकतो. एखादा
लहान बिंद,ू ज्योत, देवाची मर्ती
ू , संतानी- महापरुु षांनी दिलेल्या मत्रा
ं चा जप ही सद्धा
ु धारणाच आहे.
काहीच न करूनी प्राणी। रामनाम जपे वाणी। याने धारणा साधली जाते. नामस्मरणात जात, धर्म, स्त्री-परुु ष
असा भेद नाही. नामाच्या धारणेने सर्वच भवसागर पार करतात.
सगणु ाचेनि आधारे । निर्गुण पाविजे निर्धारे । सगणु ाची धारणा परिपक्व झाली की, निर्गुणापर्यंत पोहचण्याचा
प्रवास सलु भ होतो.
ध्यान- चित्त कोठे तरी स्थिर करणे ही धारणा तर स्थिर झालेल्या चित्ताचा विशिष्ट वत्ृ तीरूप परिणाम टिकविणे हे
ध्यान होय. ध्यान या शब्दात ‘ध्यै’ विचार करणे हा धातु आहे. ध्यान या शब्दाचा अर्थ चितं न करणे, विचार
करणे असाच आहे. पण हे चितं न धारणेसंबंधीच पाहिजे. धारणेच्या विषयाचे एकतान होऊन चितं न करणे
म्हणजे ध्यान. श्रीसमर्थांनी अखडं ध्यान नाम असा एक दशकच ध्यानावर रचला आहे. ध्यान कसे करावे ? का
करावे ? कशाचे करावे? हे समर्थांनी विस्तृतपणे सांगितले आहे. माणसामधील शद्ध ु जाणीव म्हणजे त्याच्या
हृदयात वास करणारे आत्मस्वरूप होय. त्याचे ज्ञान करून घेण्यास त्याचे अखडं ध्यान करावे. त्यासाठी त्याचे
अखडं स्मरण असावे.
समाधी- तदेवार्थमात्रनिभासं स्वरुप शनू ्यमिव समाधिः। ध्यानाचीच पक्वावस्था म्हणजे समाधि होय. समाधीत
सक्ू ष्म पातळीवर मी असतो पण त्याचे जडरूप मात्र उरत नाही. ईश्वरीय तत्वाशी सतत अनसु ंधान ही समाधी
अवस्थाच होय.
८४
ज्ञानदृष्टी अर्थातच आत्मज्ञान सपं ादन करण्यासाठी समाधी हे साधन अत्यंत प्रभावी आहे. ही समाधी अवस्था
प्राप्त झाली की, “जाले साधनाचे फळ। ससं ार झाला सकळः निर्गुण ब्रह्म ते निश्चलळ। अतं री बिंबले। अशी
अवस्था होते. दासबोधात कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग, शक्तीयोग याद्वारे समर्थांनी अष्टांगयोग साधना
साधली आहे. प्रत्यक्षात योगशास्त्र सांगण्यापेक्षा योगाच्या आचरणावर भर दिला आहे. अर्थातच ‘समर्थ
कृपेची वचने तो हा दासबोध”
।।जय जय रघवु ीर समर्थ।।
जया पाहिजे शांती विरक्ती भक्ती । कळावे कसे ज्ञान सायजु ्यमक्ती
ु ।।
मनी वाटते की कवित्व करावे । तये दासबोधासि वाचीत जावे ॥२॥
कुणे निर्मिली पचं भतू े जगासी । असे कोण कर्ता खरा निश्चयेसी ।।
बरे गजु वेदांतिचे ते ठसावें । तये दासबोधासि वाचीत जावे ॥४॥
कसे ब्रह्ममाया अनात्मा आणी आत्मा । कसे पिंड ब्रह्मांड आणि दरु ात्मा ।।
खरा देव तो कोण त्यातें भजावे । तये दासबोधासि वाचीत जावे ॥५॥
परु ाणॆ इतिहास ते चार वेद । असे सर्व गीता नसे काही भेद ।।
जया संशयो होय कै से वदावे । तये दासबोधासि वाचीत जावे ॥६॥
८५
Xmg~moYmVrb
_Zwî`{Z_©mU emñÌ
प्रा. प्रभाकर नानकर
श्रीदासबोध हा श्रीसमर्थांचा प्रमखु ग्रंथ आहे. या ग्रंथाचा आशय मनषु ्याला प्रेरणा देणारा आहे. मनषु ्यावर
अत्युत्तम ससं ्कार करणारा आहे. हा ग्रंथ मानवी जीवनाच्या सर्व अगं ांना स्पर्श करणारा आहे. जीवनाचे
वास्तव जाणनू प्रत्येक मनषु ्याने आपला विकास कसा साधावा? आपले जीवन विवेकपर्णू विचारांनी कसे
विकसीत करावे? कसे समद्ध ृ करावे? कसे यशस्वी करावे? कसे सार्थकी लावावे? याबाबत सोप्या भाषेत
मार्गदर्शन करणारा हा उत्कृष्ट ग्रंथ आहे. या ग्रंथातील विचार शाश्वत स्वरूपाचे, सर्वव्यापी, सत्य, कालातीत,
अनभु वगम्य व मानवी जीवनाला आकार देणारे आहेत. मानवी जीवनाला सर्वांगीण पर्णू ता देणारे आहेत,
म्हणनू म्हणावेसे वाटते, ‘श्रीदासबोध हा ग्रंथ खऱ्या अर्थाने मनषु ्य निर्माण करणारे शास्त्रच आहे.’
नरदेहाचे महत्त्व-
श्रीसमर्थ रामदासस्वामी यांना सत्छिल, सदाचारी, चारित्र्यसंपन्न, कर्तृत्ववान, विवेकी माणसू घडवायचा
होता. त्यांना दासबोधाच्या माध्यमातनू सत्कर्म करणारे नागरिक तयार करायचे होते. माणसास प्राप्त झालेला
नरदेह सार्थकी लावावा, त्याचेकडून समाजाच्या हिताची, समाजाच्या कल्याणाची कामे व्हावीत, यासाठी
श्रीसमर्थांनी या ग्रंथात हितोपदेश के ला आहे. श्रीसमर्थांना जगाला जे सांगायचे होते ते त्यांनी या ग्रंथात
स्पष्टपणे सांगितले आहे. नरदेहाबद्दल श्रीसमर्थ म्हणतात,
या नरदेहाची प्राप्ती झाल्यामळ ु े सारासार विचार करुन अनेक साधनांच्या साहाय्याने काही लोक संत, महतं ,
ऋषी, मनु ी, तत्त्वज्ञानी, ब्रह्मज्ञानी अशा उच्च पदाला पोहोचले. त्यांनी त्यांच्या अगं ी असणाऱ्या गणु ांचा
सदपु योग के ला, म्हणनू नरदेह श्रेष्ठ आहे. सर्व प्रकारच्या प्राणीदेहांमध्ये तो वरिष्ठ आहे. नरदेहाचा आणखी एक
गणु म्हणजे तो स्वतंत्र असतो. सहसा तो परतंत्र होत नाही. परंतु त्याचा वापर परोपकार करण्यासाठी करावा,
त्यामळु े त्याचे नाव कायम स्मरणात राहील. म्हणनू च आपण म्हणतो, “मरावे परी कीर्तिरूपे उरावे.” अर्थात
नरदेह लंगडा, पांगळा, आधं ळा, रोगी, मक ु ा, बहिरा, अशक्त असेल तर त्याला परोपकार करणे अशक्य आहे.
म्हणनू नरदेह हा सर्व अवयवांनी धडधाकट असला पाहिजे. तरच त्याला कोणतेही काम चांगल्याप्रकारे
करता येईल. देह परमार्थासाठी, परोपकारासाठी झिजवावा तरच त्याचे सार्थक झाले असे समजावे. श्रीसमर्थ
म्हणतात,
विवेकशक्तीचा विकास-
ग्रंथराज दासबोधात श्रीसमर्थांनी ‘विवेकशक्ती’ वर विशेष भर दिला आहे. त्यांनी प्रत्यक्ष अनभु वाचे,
स्वप्रचितीचे विलक्षण महत्त्व प्रतिपादन के ले आहे. ‘विवेकाच्या जोरावर माणसू अतं ःकरणाने विशाल बननू
आत्मज्ञानी बनू शकतो’ हा त्यांचा आवडता सिद्धांत आहे. श्रीसमर्थ म्हणतात,
संसार सोडावा लागत नाही. प्रपंच व्यवस्थित चालू ठे वता येतो. विचारांच्या साहाय्याने जन्माचे सार्थक होते.
श्रीसमर्थ म्हणतात, ‘विवेकाच्या मार्गाने जाऊन तमु ्हीही तो अनभु व घ्या. मला जो अनभु व आला आहे तोच
मी तमु ्हाला सांगतो. असा अनभु व जो घेईल तोच खरा शहाणा होय. जो अनभु व घेत नाही तो शहाणा नव्हे.’
वास्तविक मनषु ्य हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. त्याला परमेश्वराने विचार करण्याची शक्ती दिली आहे.
चांगले काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, हितकारक काय, अहितकारक काय हे त्याला समजू
८६
शकते. परंतु तो आपल्या विवेकशक्तीचा वापर करीत नाही. बहुसखं ्य वेळा माणसाचे शत्रू - काम, क्रोध,
मोह, मद, मत्सर आणि लोभ त्याला आकर्षित करतात. अशा वेळी त्याची विवेकशक्ती जागतृ करण्याची
आवश्यकता असते.
श्रीसमर्थांचे काळी आपला भारतीय समाज सपं र्णू निष्क्रिय व दैवाधीन होता.
ह्या विचारामळ ु े मनषु ्य कर्तव्यशनू ्य बनला होता. भारतीय समाज मागे पडण्याची दोन प्रमख
ु कारणे श्रीसमर्थांनी
सांगितली पहिले कारण ‘योग्य प्रकारे विचार न करणे’ तर दसु रे कारण ‘प्रयत्न न करणे.’ अविवेक आणि
आळस हीच दोन अवनतीची व दैन्यावस्थेची लक्षणे होत. ‘विवेक आणि अपरिमीत कष्ट करण्याची तयारी’
ही उन्नतीची व प्रगतीची लक्षणे होत. अशावेळी त्या मनषु ्याची विवेकशक्ती जागतृ करण्याची आवश्यकता
असते. श्रीसमर्थांनी त्यांच्या दासबोधातनू मनषु ्याला त्याच्या कल्याणाच्या, हिताच्या अनेक गोष्टी सांगितल्या
आहेत. मनषु ्याने सन्मार्गाने चालावे, नीतीने वागावे, समाजाच्या व राष्ट्राच्या हिताचे काम करावे, आपल्या
बद्धि
ु मतेचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करावा असा हितोपदेश के ला आहे. श्रीसमर्थ माणसास खऱ्या
अर्थाने माणसू बनविण्याचा प्रयत्न आपल्या दासबोधातनू करतात. माणसाने नेहमी असार टाकून सार
घ्यावे, असत्य सोडून सत्याच्या मागे लागावे, अशाश्वताचा अव्हेर करून शाश्वताचा स्वीकार करावा, अशी
प्रेरणा देण्याचे काम विवेकशक्तीचे आहे. ही विवेकशक्ती जागतृ करण्याचे काम श्रीसमर्थानी दासबोधाच्या
माध्यमातनू के ले आहे. नराचा नारायण बनावा ही श्रीसमर्थांची तळमळ आहे. लोकांचे दर्गुण ु नष्ट व्हावेत, ते
नीतिमान, परोपकारी व चारित्र्यसंपन्न व्हावेत, त्यांचे दैनंदिन जीवन सदृु ढ, कर्मशील आणि मलू ्याधिष्ठित व्हावे
म्हणनू हितोपदेश के ला आहे.
श्रीसमर्थानी दासबोध या ग्रंथात तत्वज्ञानापेक्षा जीवनशिक्षणाला महत्त्व दिले आहे. ‘जीवनशिक्षण हेच
दासबोधाचे ध्येय आहे. कर्म, ज्ञान, भक्ती, त्याग, सेवा, प्रेम, स्वधर्म, प्रपंच, राजकारण, समाजकारण, स्वदेश,
निष्ठा, नेते व नेततृ ्व, गरुु व शिष्य, कवी, लेखक, ग्रंथ अशा अनेक विषयांवर श्रीसमर्थानी मनषु ्याला मार्गदर्शन
के ले आहे, म्हणनू दासबोधाला मानवी जीवनाचा खराखरु ा वाटाड्या म्हटले जाते.
श्रीसमर्थाचा दृढ विश्वास आहे की दासबोध ग्रंथाच्या वाचनाने, अभ्यासाने मनषु ्याचे अनेक भ्रम नाहीसे
होतील. त्याच्या संसारातील व व्यवसायातील अनेक दःु खे, अनेक अडी-अडचणी, अनेक नैराश्याचे प्रसंग
नष्ट होतील. तसेच त्यांच्या मनास शांती, समाधान व योग्य दिशा प्राप्त होईल. त्याची वत्ृ ती विवेकशील व
सकारात्मक बनेल. श्रीसमर्थ म्हणतात,
८७
आतं अवगणी ु अवलक्षण। तेचि होतो सलु क्षण।
धर्तू तार्कि क विचक्षण। समयो जाणती।। १-१-३२
वेदकाळापासनू माणसांच्या मल ू भतू प्रवत्ृ तींचा सखोल अभ्यास भारतात झालेला आहे. मोठमोठ्या
विचारवतं ांनी, तत्त्ववेत्त्यांनी, साहित्यिकांनी, ऋषिमनु ींनी माणसाच्या अगं भतू गणु -अवगणु ांचे वर्णन के लेले
आहे. काही माणसे न्याय, नीतीने वागतात, तर काही माणसे अन्यायाने आणि अनीतीने वागतात. काही
माणसे प्रेमळ, दयाळू व शांत असतात तर काही माणसे रागीट, शीघ्रकोपी, चचं ल असतात. काही माणसे
स्वार्थी असतात, तर काही माणसे निःस्वार्थी व परोपकारी असतात. काही माणसे सतत उद्योगी असतात, तर
काही माणसे आळशी असतात. श्रीसमर्थांना न्यायाने, नीतीने वागणारा, प्रेमळ, दयाळू, परोपकारी, निःस्वार्थी
उद्योगी, सत्य-अहिसं ा-असंग्रह यांचे पालन करणारा, सर्वांना समानतेची वागणक ू देणारा, समाजाचे हित
जोपासणारा माणसू तयार करावयाचा होता. या गणु ांचे जो आचरण करीत नाही त्याला श्रीसमर्थांनी मर्ख ू
म्हटले आहे.
श्रीसमर्थानी मर्ख
ू , अज्ञानी माणसांची जशी लक्षणे सांगितली त्याप्रमाणे उत्तम माणसांची लक्षणेही
८८
सांगितली आहेत. मर्ख ू माणसांच्या लक्षणांचा त्याग करावा व उतम माणसांच्या लक्षणांचा स्वीकार करावा.
उत्तम परुु षाने देहबद्धी
ु च्या प्रगट प्रवत्ृ ती टाळावयाच्या असतात, आवरावयाच्या असतात, म्हणनू श्रीसमर्थानी
उत्तम लक्षणे नकारपणाने सांगितली आहेत. श्रीसमर्थ म्हणतात, उत्तम परुु षाने-
सख
ु ा आगं देऊ नये। प्रेत्न परुु षे सांडू नये।
कष्ट करिता त्रासो नये। निरंतर।। २-२-१४
श्रीसमर्थांचा उत्तम परुु ष हा प्रापंचिक व परमार्थी आहे. सामान्य माणसाला देव हवा असतो, पण प्रपंचाला व
पैशाला धक्का न लावता तो हवा असतो, म्हणनू प्रपंचाची घडी न बिघडवता परमेश्वराची भक्ती कशी करावी
याचा मार्ग श्रीसमर्थांनी दासबोधात दाखविला आहे. प्रपचं आणि परमार्थ या दोन वेगवेगळ्या जीवनपद्धती
नाहीत. एकाच अखडं जीवनाकडे पाहण्याच्या त्या दोन दृष्टी आहेत. ससं ार आणि परमार्थ वेगळे करणे चक ु ीचे
आहे. संसारात परमार्थवत्ृ ती ठे वता येते व पारमार्थिक जीवनात संसारातील अनेक गोष्टी नि:स्वार्थपणे करता
येतात. येथे आपल्या मनाची दृष्टी बदलणे असते. आपले जीवन परमार्थमय होण्यासाठी ‘मी पणा’ नाहीसे
होणे आवश्यक आहे. ‘मी पणा’ नष्ट झाला की त्याचे जीवन पवित्र, परोपकारी आणि नि:स्वार्थी बनते. उतम
परुु षाच्या ठिकाणी प्रपचं आणि परमार्थ, कर्तेपणा आणि अकर्तेपणा, व्यक्तीजीवन आणि समहू जीवन यांचा
सरु े ख संगम पहावयास मिळतो. श्रीसमर्थांनी सर्व लोकांना सतत कष्ट करण्याची, सतत प्रयत्न करण्याची
शिकवण दिली, तरी ईश्वरी सामर्थ्याला कमी लेखले नाही. प्रयत्न करणाऱ्याला ईश्वर साहाय्य करतो हा त्यांचा
दृढ विश्वास होता.
श्रीसमर्थांनी आपले उभे आयषु ्य लोकांना सधु ारण्यासाठी, त्यांना कार्यप्रवण करण्यासाठी, त्यांना
घडविण्यासाठी, त्यांचे अवगणु दरू करण्यासाठी, त्यांच्या अगं ी सद्गुण प्राप्त करण्यासाठी, त्यांना शहाणे
८९
सांगितली आहेत. मर्ख ू माणसांच्या लक्षणांचा त्याग करावा व उतम माणसांच्या लक्षणांचा स्वीकार करावा.
उत्तम परुु षाने देहबद्धी
ु च्या प्रगट प्रवत्ृ ती टाळावयाच्या असतात, आवरावयाच्या असतात, म्हणनू श्रीसमर्थानी
उत्तम लक्षणे नकारपणाने सांगितली आहेत. श्रीसमर्थ म्हणतात, उत्तम परुु षाने-
सख
ु ा आगं देऊ नये। प्रेत्न परुु षे सांडू नये।
कष्ट करिता त्रासो नये। निरंतर।। २-२-१४
श्रीसमर्थांचा उत्तम परुु ष हा प्रापंचिक व परमार्थी आहे. सामान्य माणसाला देव हवा असतो, पण प्रपंचाला व
पैशाला धक्का न लावता तो हवा असतो, म्हणनू प्रपंचाची घडी न बिघडवता परमेश्वराची भक्ती कशी करावी
याचा मार्ग श्रीसमर्थांनी दासबोधात दाखविला आहे. प्रपचं आणि परमार्थ या दोन वेगवेगळ्या जीवनपद्धती
नाहीत. एकाच अखडं जीवनाकडे पाहण्याच्या त्या दोन दृष्टी आहेत. ससं ार आणि परमार्थ वेगळे करणे चक ु ीचे
आहे. संसारात परमार्थवत्ृ ती ठे वता येते व पारमार्थिक जीवनात संसारातील अनेक गोष्टी नि:स्वार्थपणे करता
येतात. येथे आपल्या मनाची दृष्टी बदलणे असते. आपले जीवन परमार्थमय होण्यासाठी ‘मी पणा’ नाहीसे
होणे आवश्यक आहे. ‘मी पणा’ नष्ट झाला की त्याचे जीवन पवित्र, परोपकारी आणि नि:स्वार्थी बनते. उतम
परुु षाच्या ठिकाणी प्रपचं आणि परमार्थ, कर्तेपणा आणि अकर्तेपणा, व्यक्तीजीवन आणि समहू जीवन यांचा
सरु े ख संगम पहावयास मिळतो. श्रीसमर्थांनी सर्व लोकांना सतत कष्ट करण्याची, सतत प्रयत्न करण्याची
शिकवण दिली, तरी ईश्वरी सामर्थ्याला कमी लेखले नाही. प्रयत्न करणाऱ्याला ईश्वर साहाय्य करतो हा त्यांचा
दृढ विश्वास होता.
श्रीसमर्थांनी आपले उभे आयषु ्य लोकांना सधु ारण्यासाठी, त्यांना कार्यप्रवण करण्यासाठी, त्यांना
घडविण्यासाठी, त्यांचे अवगणु दरू करण्यासाठी, त्यांच्या अगं ी सद्गुण प्राप्त करण्यासाठी, त्यांना शहाणे
९०
करण्यासाठी खर्च के ले. गावोगावी मठांची व मदं िरांची स्थापना के ली. त्यांनी ‘दासबोध सारखा २०
दशकांचा, प्रत्येक दशकात १० समास म्हणजे २०० समासांचा व ५१ ओव्यांचा महत्वपर्णू ग्रंथ’ सपं र्णू
महाराष्ट्राला दिला. ‘श्रीसमर्थांनी के लेल्या हितोपदेशामळ
ु े दासबोध हा ग्रंथ मनषु ्य निर्माण शास्त्र’ बनला आहे.
ग्रंथाच्या अखेरीस श्रीसमर्थांनी आश्वासन दिले आहे,
९१
Xmg~moYmVrb
H$_©{dnmH$ {gÕm§V
श्री.दामोदर रामदासी
जे जसे वागतात, कर्म करतात तसेच त्यांना फळ मिळते हा कर्म फळाचा सिद्धांत समजावनू सांगताना समर्थ
पणु ्यसामग्री जेवढी, तेवढी भगवतं ाची भक्ती घडते हे सांगतात. पापकर्म द:ु ख देते आणि कोणत्या योनीत
जन्माला घालील हे सांगता येत नाही.
पणु ्य कर्म के ले म्हणजे ज्ञानवान होण्याचा काहीतरी यत्न के ला तर पाप-पणु ्य समान होऊन मनषु ्य योनीत
जन्माची संधी त्या जीवाला मिळत राहील-
पण मनषु ्य म्हणनू जन्माला आला व त्याचे महत्त्व कळाले नाही, अज्ञान शिल्लक राहिले तर तोही नकोसा
वाटायला लागतो.
जन्म सख
ु ाचा विसर। जन्म चितं ेचा आगर।
जन्म वासनाविस्तार। विस्तारला।। ३-१-५
९२
कर्मामागोमाग येणारय् ा सख ु द:ु खरूपी भवनदीच्या तटावर मनषु ्य यगु ानयगु े उभा आहे. द:ु ख आटत नाही,
सख
ु परु ते मिळत नाही अशा स्थितीत कदाचित त्या भवनदीच्या पलिकडे कायम सख ु ाचा तट असेल की
काय या अभिलाषेने द:ु खाने आर्द्र झालेले डोळे लावनू आशेने उभा आहे. ही भवनदी पार व्हावी यासाठी
एकमात्र संतसद्रुगु च त्या जीवाचे नावाडी होतात व सखु ाचा पणु ्यमार्ग शिकवतात. भोगलेले, भोगत असलेले व
भोगायला मिळे ल अशा तीन द:ु खात पहिले तर एक भोगनू झालेलेच असते, दसु रे प्रारब्धवश भोगत आहोतच
पण अजनु जी आलेली नाहीत अशी द:ु खे आपण नष्ट करु शकतो. त्या द:ु खांच्या कारणांचाच नाश कसा
करायचा ! याचा मार्ग सद्रुगु सांगतात.
कर्मात कार्यकारण सिद्धांत असल्यामळ ु े तो वैज्ञानिक आहे. मनषु ्याचे अस्तित्त्व आहे कारण त्याने के लेले बरे
वाईट कर्म त्याला भोगावेच लागते. यातनू सटु का नाही. चांगल्याचे चांगले फळ मिळते तर वाईटाचे वाईट फळ
मिळते म्हणजे तसे जन्म मिळत राहतात. पाप कर्मविपाकाची उदाहरणे शास्त्रात सांगितलेली आहेत- चोराची
नखे वाईट होतात, ब्रह्महत्यारा कुष्ठरोगी होतो, मद्यपीचे दात कीडतात, गरुु पत्नीशी पापसंबंध ठे वणारय् ाला
चर्मरोग तर परस्त्री हरण वा ब्राह्मण द्रव्य चोरणारा ब्रह्मराक्षस होतो, धान्य चोर उंदीर, सोने चोरणारा कृमी, कीट,
पतंग बनतो. तर काही विपाकासाठी वक्ष ृ वल्लीही बनावे लागते. कर्मविपाक या शब्दाचा अर्थच हा आहे की
अधर्ममल ू क अर्थात अशभु फल उत्पन्न करणारय् ा कर्माचा परिणाम म्हणजे कर्मविपाक होय. या लोकी तो
रोगादि द:ु ख उत्पन्न करतो तर परलोकात नरकभोगादि द:ु खे देतो. मनषु ्य कुरुप वा रोगी जन्मला तर ते त्याच्या
पर्वू जन्मीच्या पापामळु े असेच म्हटले जाते. महाभारत म्हणते की मनषु ्य कितीही वेगाने धावू लागला तरीही
त्याचे पर्वू जन्माचे कर्म त्याचा पाठलाग करत असते. तो झोपला तर तेही त्याच्याबरोबर झोपते, तो उठला की
ते उठते, तो चालू लागला तर तेही चालू लागते. तो कर्म करु लागला तर तेही त्याच्या कर्मात सहभागी होते.
थोडक्यात जीवाचे प्राक्तन कर्म छायेसारखे लागलेले असते. ज्या ज्या परुु षाने पर्वी ू आपल्या इच्छेने जे जे कर्म
के ले ते ते त्याला एकट्यालाच भोगावे लागते.
श्रवणानेच चितं नशील व्यक्तीत्त्व जन्माला येते आणि कळते की अविद्या म्हणजे अज्ञान, अस्मिता, मोह म्हणजे
९३
राग, द्वेष, अभिनिवेश म्हणजे जीवनासक्ति हीच द:ु ख उत्पन्न होण्याची कारणे आहेत. पतंजली सांगतात-
अविद्यास्मितारागद्वेषाभिनिवेशा: क्लेशा: ॥३॥ ही अविद्याच द:ु खाचे खरे कारण आहे. अविद्या म्हणजे
अनित्याला नित्य समजणे, अशद्धा ु ला शद्ध
ु जाणणे, पीडेला सख ु आणि अनात्माला आत्मा जाणणे.
अनित्याशचि
ु द:ु खानात्मसु नित्यशचि
ु सख
ु ात्मख्याति: अविद्या॥५॥
मनषु ्य या अज्ञानातनू उलगडत नाही. भोगाची लालसा, आसक्ति व द:ु खाच्या अनभु वाच्या मागे जी घणेृ ची
वासना चित्तात राहते तो द्वेष यामळ ु े संस्कारीत चित्त व चित्तवत्ृ तींच्या गंतु ावळ्यात अडकलेला जीव सटु ण्याची
धडपड करतो पण अचक ू यक्ु ति न समजल्याामळ ु े अधिक अडकत जातो. यासाठी या द:ु खाचा उगम नेमका
होतो कसा व सटु ावे कसे यासाठी कर्मविपाक समजनू घेण्याचा आपण यत्न करुयात.
कर्म संकल्पना-
सर्वदर्शनसग्रं हामध्ये ‘क्रियते फलार्थिभिरिति कर्म धर्माधर्मात्मकं बीजाङ्कुरवत् प्रवाहरूपेणानादि’ अर्थात
फलाची अपेक्षा असणारय् ा लोकांकडून के ले जाते ते कर्म होय. हे कर्म धर्मधर्मांत्मक व बीजातनू अक ं ूर
निघावा त्याप्रमाणे प्रवाहरूपाने अनादी असते. अशी व्याख्या के लेली आहे. कर्म हा शब्द ‘कृ’ या धातपू ासनू
निघालेला असनू करणे, हालचाल असे त्याचे अर्थ होतात. वेदांतात आध्यात्मिकदृष्ट्या अर्थ के लेला आहे.
नित्य (सधं ्यावदं नादी), काम्य (यागादी) व नित्यकाम्य (एकादशीव्रतादी) अशी कर्मांची विभागणी आपल्या
सनातन धर्मात के लेली आहे. जी न के ली किंवा विधीयक्त ु नसतील तर दोष लागतात.
विधीयक्त
ु ब्रह्मकर्म। अथवा दया आणि दान धर्म।
अथवा करणे सगु म। भजन भगवतं ाचे।। २-४-६
भगवतं ाने मात्र गीतेमध्ये या कर्म शब्दाचा अधिक व्यापक अर्थ सांगितला आहे. मनषु ्य जे करतो ते सर्व
कर्मच होय भलेही ती कायिक, वाचिक वा मानसिक असोत. देहाचे जीवतं राहणे वा मरणेही कर्मच आहे.
कर्माशिवाय कोणीच असू शकत नाही. साधकाच्या दृष्टिने काय योग्य वा काय अयोग्य हे बघता विहितकर्मे
महत्त्वाची ठरतात. कर्मगती गहन असल्यामळ ु े कर्म, विकर्म व अकर्म याचे विज्ञान भगवंत व संत सांगतात.
व्यष्टी कर्माबरोबर समष्टी कर्म अर्थात सष्टीृ व्यापारही कर्मच आहे. हे कर्म ब्रह्मोद्भव आहे. कर्मरूपी यज्ञ आणि
सष्टि
ृ ही बरोबरच निर्माण झाली. सष्टि ृ निर्माण होण्यावेळी मळ ू ब्रह्मात जो व्यापार दिसनू आला तेच कर्म होय.
या मळ ू कर्मापासनू च ब्रह्मांडादि सष्टि
ृ तील सर्व पदार्थांचे व्यापार पढु े परंपरे ने निर्माण झाले. यात कार्यकारण भाव
असतो. ब्रह्मांड निर्माण कर्म के व्हा झाले हे न कळाल्याने वेदांती कर्माला अनादि म्हणतात. म्हणजे आरंभ
कळत नाही असे कर्म. दृश्यसष्टि ृ रूप के व्हा व का होऊ लागले हे जरी नाही समजले तरीही त्या कर्माच्या
९४
पढु ील व्यापाराचे नियम मात्र माणसाने समजनू घेण्याचा प्रयत्न के ला.
मळ ू प्रकृतीपासनू म्हणजे अनादिकर्मापासनू नामरूपात्मक असखं ्य पदार्थ कोणत्या क्रमाने झाले या अष्टधा
प्रकृतीचे वर्णन सांख्यशास्त्रात के ले आहे.
बहृ दारण्यकोपनिषदामध्ये याज्ञवल्क्यऋषी सांगतात की मानवी इच्छेचे निशच् यात रूपांतर झाले की तो
त्याप्रमाणे क्रिया करतो. त्या क्रियेप्रमाणे त्याला फळ मिळते. त्या फळाचा पर्णू उपभोग घेतल्यावर मानव या
कर्मयक्त
ु जगात जन्माला येतो. पणु ्यकर्माने पणु ्यवान तर पापकर्माने पापी ठरतो. (बहृ दा. 3.2.13)
असा योगी व्हायचा ही सल्ला देतात. चितं न, मनन, तपाने हे पणु ्य गोळा होते. तसे संचित तयार होते. अर्थात
हे पणु ्य कर्मही बंधनच आहे हेही सांगतात.
९५
कोण पणु ्याचा सग्रं हो। जे पनु ्हा पाविजे नरदेहो।
दरु ाशा धरिली पाहो। पढिलिु या जन्माची।। ८-७-२९
ऐसे मर्ख
ू अज्ञान जन। के ले संकल्पे बंधन।
शत्रु आपणासि आपण। सांगिजेल।। ८-७-३१
कसलेही कर्म के ले तरी बंधन निर्माण होतेच म्हणनू या पणु ्य-पापाच्या चितं ेत अडकण्यापेक्षा असा काही उपाय
असू शकतो का की कुठलेही कर्मे करूनही बंधन निर्माण होणार नाही ? यावर संतांनी स्वानभु वातनू जीवाला
यक्ु ति सांगितली. ती म्हणजे ‘कर्माच्या ठिकाणची आसक्ति सोडणे’. ही नैष्कर्म्ययक्त
ु स्थिती येण्यास कर्मे न
सोडता ज्ञानाने आसक्तिचा क्षय करून ती करत राहणे हा एकमात्र मार्ग राहतो.
आणि ही यक्ती
ु समजनू घेतली नाही तर जन्म वाया गेला म्हणनू समजावे.
संचित, प्रारब्ध व क्रियमाण- कर्माचा चित्तावर होणारा धर्माधर्मरुप संस्कार हा कर्माशय म्हणजे साठा आहे.
अनेक जन्मात कोण्याही मनषु ्याने सांप्रतच्या क्षणापर्यंत के लेले जे कर्म, ज्याचा विपाक सरू ु झालेला नाही
अशा कर्माचा साठा म्हणजे सचि ं त, सचि ं त म्हणजे साठविलेले. यालाच अदृष्ट, अपर्वू असेही म्हणतात.
कर्म ज्यावेळी करावे त्या वेळेपरु ते ते दृश्य असते व ती वेळ गेल्यावर पढु े ते कर्म किंवा क्रिया स्वरुपत:
शिल्लक न राहता तिचे सक्ू ष्म परिणाम मात्र शिल्लक राहतात. या संचित कर्माची फळे सर्वच्या सर्व एकदम
भोगणे शक्य नसते कारण या संचित कर्मपरिणामांपैकी काही चांगले तर काही वाईट म्हणजेच परस्परविरोधी
फळे देणारी असतात. काही स्वर्ग देणारी तर काही नर्क देणारी त्यामळ ु े एकाच वेळी ती भोगणे शक्य होत
नाही. ती एकामागोमाग एक भोगावी लागतात. म्हणनू सचि ं तापैकी जी फलोन्मुख झाली असतील त्यांनाच
प्रारब्ध म्हणजे फळे देऊ लागलेली असे म्हणतात. हे प्रारब्ध भोगत असताना प्रसंगानसु ार माणसाच्या हातनू
प्रारब्धभोगाव्यतिरिक्त कर्मे होतच असतात अशा कर्मांना क्रियमाण म्हणतात. याचीही फळे भोगावीच
लागतात. काही परिणाम तत्काळ मिळतात. जसे आगीवर पाय पडला की लगेच भाजते म्हणजे ते क्रियमाण
भोगाने सपं नू जाते पण जर दागिना चोरला तर ते कर्म सचि ं तात जमा होऊन पढु े प्रारब्धानसु ार त्याला फळ
भोगावे लागते. अशा प्रकारे संचित, प्रारब्ध व क्रियमाण ही प्रक्रिया सतत चालू राहते.
९६
समाजात काही माणसे सतत सख ु भोगताना दिसतात तर काही द:ु खात खचलेले दिसतात. सामान्य माणसू
देवाला दोष देऊ लागतो. पण माणसाने सष्टी ृ चे नियम शोधले तर त्याला याचे उत्तर मिळे ल. सष्टि
ृ च्या
रहाटगाडग्यात परमेशव् र हात घालत नाही. कर्मफळ नेमनू देणे हा नियम त्याने लावनू दिलेला आहे. तो
उदासीन राहतो. त्यामळ ु े विषमता व निर्दयता त्याला चिकटत नाही. तेव्हा मनषु ्याने या किंवा पर्वू जन्मात
के लेल्या कर्मांमळ
ु े चे त्याला सखु व द:ु ख मिळते. उदा- एखाद्या कणगीच्या छिद्रातनू गहू निघत असतील तर
बघणारय् ाला वाटते ‘बघा काय भाग्य आहे याचे ! मीच दर्भा ु गी की माझ्या वाट्याला बाजरी आली.’ पण हा
विचार करणारय् ाला हे माहीत नसते की त्या कणगीतनू गव्हाच्यावर बाजरीही ओतलेली असेल तर कधीतरी
गहू संपताच बाजरीही त्याच्या वाट्याला येऊ शकते. संचितात काय टाकले आहे यावर सगळा खेळ चालू
आहे. म्हणनू सत्कर्म योगे वय घालवावे ! असा सल्ला समर्थ देतात कारण मतृ ्यूक्षणी जो भाव तसा पढु चा
जन्म ठरतो.
जन्माला येताना सर्व पर्वू संस्कार घेऊन जीव जन्माला येतो. त्यातला जो संस्कार सर्वात प्रबळ असेल त्यानसु ार
त्याला घर मिळते. जन्मस्थानाच्या निवडीमळ ु े मातापित्याचे गणु सत्रू वाटेला येतात. त्यानसु ार देह, आरोग्य,
बद्धि
ु , सांपत्तिक स्थिती, यशापयश, आयर्मर्या
ु दा इ. गोष्टी प्राप्त होतात. या स्थूल मर्यादेत गणु व अवगणु ांचा
सक ं ोच वा विकास होत जातो. या प्रपचं ाच्या द:ु खांमळु े यातनू सटु का व्हावी अशी प्रबळ भावना निर्माण
झाली की त्याच्या आध्यात्मिक आयषु ्याला सरुु वात होते. पढु े सद्रुगु कृपा, विवेक-वैराग्य, सत्कर्माने चित्तशद्धीु
व कर्ताभाव सोडण्याच्या अभ्यासाने कर्मफळाचा साठा होणे बंद व्हायला लागते. जसे सायकल चालवताना
पैंडल मारणे बंद झाले की सायकलला वेग देणे आपण बंद करतो. पण आधीचा वेग मिळालेला असतो.
त्याचा अनभु व येतोच. क्रियमाण जरी थांबले तरी आधीचे सचि ं त ते ज्ञानाग्निने जळून जाते व प्रारब्ध भोगनू च
संपवावे लागते. हे पैंडल मारणे आधी थांबवले पाहिजे म्हणजेच क्रियमाणाबाबत सावध, सजग झाले पाहिजे
यासाठीच संत सावधानतेचा सल्ला देतात.
सष्टीृ अष्टधा (सत्त्व, रज व तम असे तीन गणु व पचं महाभतू े) आहे. त्यामळ ु े प्रत्येक कर्म सत्त्व, रज व तम या
तीन गणु ांनी त्रिविध होते. यात निष्काम सात्त्विक कर्मालाच उत्तम कर्म म्हटले आहे.
नित्य, नैमित्तिक, काम्य वा दसु रे कोणतेही मोक्ष मिळवनू देणारे कर्म पर्णू झाल्यावर विष्णूला समर्पण के ल्याने
सात्त्विक व सफल होते. या समर्पण भावनेमळ ु े त्यातले न्यूनाधिक दोष कर्त्याला बाधक होत नाहीत. या
सात्त्विक कर्मामळ
ु े चित्तशद्धी
ु होते त्यामळु े ध्यान लागते. ध्यान-समाधी अभ्यासामळ ु े प्रज्ञा प्राप्त होते. प्रज्ञेमळ
ु े
९७
पढु ील गहन समाधी उपलब्ध होतात व अतं ीम निर्विकल्प समाधीत त्रिगणु साम्य स्थितीला जातात व निर्गुण
स्थिती येते.
आत्मसामर्थ्य वाढवणे हाच उपाय- निग्रहाने प्रापंचिक अनभु व व अनग्रु हाने मक्ु ति असा दोन्हीही अनभु व
प्रकृती देते. मक्त
ु होण्याचा अधिकार व सामर्थ्य प्रत्येक जीवात आहे. प्रकृतीचा जोर देह, मन, बद्धी ु पर्यंत
चालतो. पण एकदा का तपाने आत्मसामर्थ्य वाढले की प्रकृतीचा खेळ थांबतो. पर्वी ू च्या कर्माचे फल
भोगण्यापरु ताच जीव बांधलेला आहे. एकदा का तो शद्ध ु आत्म्याच्या स्वतंत्र प्रेरणेने वागू लागला की त्याचा
प्रत्येक व्यवहार मोक्षानक ु ू ल होतो. नैष्कर्म्य सिद्धीने या जन्ममतृ ्यूच्या चक्रातनू मक्ु ति मिळते. ही नैष्कर्म्य
सिद्धीसाठी जी यक्ु ति भगवतं ाने व सतं ांनी सांगितलेली आहे ती म्हणजे प्रत्येक क्षणाला विशिष्ट यक्ु तिने कर्म
करणे ज्यामळ ु े योग (चित्तवत्ृ तींचा निरोध) साधला जाईल. योग: कर्मसु कौशलम।् (गीता २-५०) या सत्रा ू त
भगवंत म्हणतात की कर्म करण्याची काही विशेष प्रकारची कुशलता, यक्ु ति, चतरु ाई की ज्यामळ ु े कर्मे होत
असतानाही क्रियमाण अथवा बंधन निर्माण होणार नाही. आसक्ति विरहीत कर्मे करणे हाच एकमात्र उपाय
असताना ही आसक्ति निर्माण होऊ नये म्हणनू प्रामखु ्याने दोन मानसिक यकु ्त्या आहेत.
१. शनू ्यभावातनू कर्म करणे
२. सर्व कर्मे भगवंत वा सद्रुगु ला अर्पण करून आपण नामानिराळे राहणे.
या दोन्हीपैकी एक किंवा प्रसंगोपात दोन्हीही उपाय वापरल्यामळ ु े हळूहळू अलिप्तपण, समत्त्व वा द्रष्टाभाव
येतो. चित्तशद्धु होत जाते. ज्यामळ ु े हळूहळू चित्तवत्ृ तींचा निरोध साधला जाऊन ध्यानधारणासमाधी असा
सयं म साधला जातो. सद्रुगु ही शिष्याचा समर्पणभाव व तयारी बघनू शक्तिपाताद्वारे हा चित्तवत्ृ तीनिरोधाचा
कालावधी कमी करतात. ज्यामळ ु े तो साधक जीवन्मुक्त होतो.
कर्मसिद्धांताला आज नवा अर्थ द्यायला हवा. या सिद्धांताला घाबरून पापभिरु जगण्यापेक्षा अवघाची ससं ार
सख ु ाचा करीन ! अशा व्यापक, आशावादी व आत्मविशव् ासपर्णू दृष्टीने बघायला हवे. स्वर्ग, नर्क , गरीबी व
विचित्र योनीत जन्माची भिती बाळगनू जगण्यापेक्षा किंवा अधं ाराला घाबरत जीवन कंठण्यापेक्षा प्रकाशाचे
पजू क म्हणनू जगण्याचा दृष्टिकोन का ठे ऊ नये ? या सिद्धांताचा नवा अर्थ आहे- ‘या क्षणात जगणे’ गेलेल्या
वा येणारय् ा क्षणांचा नव्हे. आता कराल ते आता पावाल. प्रतिपल जगा ! कसले भविष्य, कसले भतू ?
कुठला मागचा जन्म, कुठला पढु चा ? कशाला यांची चितं ा ? आत्ता या क्षणी - प्रतिपल मी प्रसन्न आहे !
प्रतिपल मी शांत आहे ! प्रतिपल मी मौनात आहे ! प्रतिपल मी आत्मसंयमात आहे ! प्रतिपल माझा भाव शद्ध ु
आहे !
मन:प्रसाद: सौम्यत्वं मौनम् आत्मविनिग्रह: । भावसश ं द्धि
ु : इत्येतत्तपो मानसमचु ्यते ॥ गीता १७-७
या मनाच्या तपाने याच जन्मी प्रारब्ध बदलते. जीवनाच्या छोट्या छोट्या गोष्टीत धन्यतेचा अनभु व करणे,
९८
म्हणनू अनेक वैकल्पिक उपायांपैकी एक असा कर्मयोग हा उपाय असनू त्याचा सबं ंध के वळ ज्ञानपर्वू काळातच
येतो असे त्यांनी म्हटले आहे.
लोकसंग्रह या संकल्पनेला महत्त्व यासाठी आहे कारण गीतेत संकर ही संकल्पना मांडली आहे. संकर
म्हणजे लोकांनी आपापली कर्मे सोडल्यामळ ु े समाजात निर्माण झालेली अराजकता. असा सामाजिक नाश
होऊ नये म्हणनू लोकसग्रं ह करणारय् ा माणसाने लोकांना सन्मार्गाला लावनू त्यांचा नाश न होऊ देता सग्रं ह
म्हणजे चांगल्या रितीने धारण, पोषण, पालन किंवा बचाव के ला पाहिजे. मनसु ्मृतीमध्येही राष्ट्राचा संग्रह
(७-११४) वा महाभारतामध्येही शांतीपर्वात (२५८-२५) हे शब्द याच अर्थाने आलेला आहे. आचार्यांनीही
‘लोकस्य उन्मार्गप्रवत्तिनि
ृ वारणम’् असा लोकसग्रं ह शब्दाचा अर्थ दिलेला आहे. हीच स्वधर्मस्थापना आहे. हा
लोकसग्रं ह व धर्मस्थापनेसाठीच समर्थ अवतरीत झालेले होते.
।।जय जय रघवु ीर समर्थ।।
त्याची विचारदीप्ती प्रखर । अज्ञानतम सर्यू रुचिर । त्रिविधतापासी शरच्चंद्र । आत्मबोधानंदे सांद्र ।
उजळी आत्मनिर्धार । आनंदरूपाचा ।।२।। सकल जीवाचे वारी अभद्र । दासबोध हा ।।९।।
कल्पतरूचा आश्रयो । सर्व उणिवांचा करी क्षयो । मदृ ू तैंसा क्वचित कठोर । हा सर्वज्ञ शिक्षक थोर ।
सर्व जीवांचा भाग्यदयो । तो हा दासबोध ।।४।। अचक ू पणे शिकवी सार । विश्वविद्यार्थीया ।।११।।
९९
Xmg~moYmVrb
amOY_© Am{U jmÌY_©
श्री. कौस्तुभ कस्तुरे
महाराष्ट्राला सतं ांच्या मांदियाळीची एक प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. ज्ञानेश्वर माउलींपासनू तक ु ाराम
महाराजांपर्यंत वाढलेला वैष्णव पथं ाचा वटवक्ष ृ असो की महानभु ाव पथं ाची भलीमोठी वेल असो, सर्व
संतांनी महाराष्ट्राच्या जनजीवनात एक प्रकारची ससु त्रू ता आणण्यासाठी आणि लोकांना “माणसू ” म्हणनू
जगण्यासाठी मार्गदर्शन के लं. या सारंगला संतांच्या मांदियाळीत सतराव्या शतकात आणखी एक संप्रदाय
उदयाला आला तो म्हणजे, अर्थातच, “रामदासी सप्रं दाय”. समर्थांची शिकवण ही इतर सप्रं दायांपेक्षा वेगळी
होती. देव सक ं टकाळी तमु चं रक्षण जरूर करे ल हेच समर्थांनी सांगितलं; पण देव प्रत्यक्ष येवनू रक्षण करे ल
का? नाही ! देवाने तमु ्हाला धडधाकट बनवलं आहे ते त्यासाठीच. तो तमु ्हाला लढण्याची प्रेरणा देईल, ताकद
देईल. लढायचं तमु ्हाला आहे. मग विजय निश्चित आहे !! समर्थ हे मनावर बिंबवतात. “के ल्याने होत आहे
रे , आधी के लेची पाहिजे” सारखी अनेक उदाहरणं आपल्याला समर्थांच्या शिकवणीत सहज मिळून जातात.
आजच्या भाषेत सांगायचं तर ‘प्रॅक्टिकली’ जगणं हा समर्थांच्या शिकवणीचा गाभा होता. आणि हाच धागा
पकडून पढु े समर्थांनी के वळ अध्यात्म हेच विश्व असं न समजता तत्कालीन राजकारण आणि समाजकारण
समजनू वेळोवेळी इतरांना तसे उपदेशही के ले. समर्थांचा “राजधर्म” आणि “क्षात्रधर्म” ही दोन सर्वात मोठी
आणि महत्वाची उदाहरणं आपल्यासमोर आहेत. समर्थांनी हे दोन धर्म शिवाजी महाराजांना सांगितले होते.
काय आहेत हे दोन धर्म?
समर्थांनी समाधी घेण्यापर्वीू छत्रपती संभाजी महाराजांना उपदेश के ला होता, त्यात समर्थ म्हणतात,”पर्वी ू
राजश्रींस राजधर्म व क्षात्रधर्म व अखडं सावधान ऐशी पत्रे पाठविली होती”. ‘अखडं सावधान असावे’ हे
पत्र समर्थांनी सभं ाजी महाराजांना लिहिलं होतं, त्यामळ ु े वरील वाक्यावरून असं वाटेल की ते दोन धर्मही
शभं रू ाजांनाच सांगितले असावेत. परंतु चाफळच्या प्रसिद्ध सनदेत समर्थ शिवाजी महाराजांना पर्वी ू काय
म्हणाले होते ते महाराजांनी उद्धृत के लं आहे. या सनदेत “पर्वीू तमु ्हांस धर्म सांगितले तैसे करावे” असं स्पष्ट
म्हटलं आहे. हे धर्म म्हणजेच राजधर्म आणि क्षात्रधर्म, अर्थात हे दोन्ही एकत्र करून होणारा “समर्थांचा
महाराष्ट्रधर्म” ! समर्थांनी हे धर्म विशेषतः शिवाजी महाराजांसाठी लिहिले का? याचं उत्तर होय असहं ी आहे
आणि नाही असहं ी आहे. होय अशाकरिता की या क्षणी स्वराज्याचे राजे शिवछत्रपती महाराज होते. अन
नाही अशाकरिता की के वळ शिवप्रभू नव्हे, पण त्यांच्यानंतर छत्रपती होणाऱ्या कै क पिढ्यांमधील राजांना
ही शिकवण उपयक्त ु ठरणार होती. शिवाय राजधर्म हा राजासाठी असला तरी क्षात्रधर्म हा स्वराज्यासाठी
लढणाऱ्या असखं ्य वीरांसाठी होता. आणि म्हणनू च, या पोथ्यांमध्ये “श्रोती मानेल तरी घ्यावे” अशी रचना
समर्थांनी के ली आहे, कोणा एकाच नाव यात घेतलं नाही. हे दोन धर्म नेमके काय होते ते पाहू:
१००
राजधर्म:
श्रीरामसमर्थ ।। नमु मगं ळमर्तीू विघ्नहरु ।। सरस्वतीस नमस्कारु ।। सद्रू गु सतं कुळे श्वरु ।। दाशरथी ।।१।। श्रोतीं
मानेल तरी घ्यावें ।। अथवा वाचनु सांडावें ।। प्रपंचा कारणे स्वभावें ।। बोलिलों मी ।।२।। सावधपणे प्रपंच
के ला ।। तेणे सख ु चि पावला ।। दीर्घ प्रेत्नें मोडला ।। कार्यभाग सादे ।।३।। आधी मनषु ्य वोळखावें ।। योग्य
पाहुन काम सांगावें ।। निकामी ते ठे वावें ।। येकेकडे ।।४।। पाहोन समजोन कार्य करणे ।। तेणे कदापि न ये उणे
।। कार्यकर्तयाच्या गणु ें ।। कार्यभाग होतो ।।५।। कार्यकर्ता प्रेत्नी जाड ।। कांही येक आसला हेकाड ।। तरी
समर्थपणे पोटवाड ।। के लें पाहिजे ।।६।। अमर्याद फितवेखोर ।। याचा करावा विचार ।। शोधिला पाहिजे विचार
।। यथातथ्य ।।७।। मनषु ्य राजी राखणे ।। हेचि भाग्याची लक्षणे ।। कठीणपणे दरु ी धरणे ।। कांही येक ।।८।।
समयी मनषु ्य कामा येते ।। याकारणे सोसिजे ते ।। न्यायचि सांडिल मग तें ।। सहजचि खोटें ।।९।। न्याय सिमा
उलंघू नये ।। उलंघितां होतो अपाय ।। न्याय नसता उपाय ।। होईल कै चा ।।१०।। उपाधीस कंटाळला ।। तो
भाग्यापासनू चेवला ।। समयी धीर सांडिला ।। तोही खोटा ।।११।। संकटी कंटाळो नये ।। करावे अतं ्यंत उपाय ।।
तरिं मग पाहतां काय ।। उणे आहे ।।१२।। बंद बां सोडवता येणार नाही. अर्थात, कारभार अन ऋणानबु ंध इतके
पक्के ठे वा की कोणाला त्यात ढवळाढवळ करता येणार नाही. यानंतर समर्थ म्हणतात, “धरु ाने यद्धा ु सी जाणे,
ऐसी नव्हेती राजकारणे”. धरु ा म्हणजे नेततृ ्व. खद्दु राजाने नेततृ ्व कराव,ं हाती तलवार घेऊन आघाडीवर जावं
हे काही योग्य नव्हे. का? राजा घाबरून मागे राहावा असं समर्थांना म्हणायचयं का? अजिबात नाही. उलट
राजाचा जीव के व्हाही महत्वाचा. त्याच्यामळ ु े च राज्याचा डोलारा उभा असतो. यद्धा ु त कोणत्या क्षणी काय
होईल सांगता येत नाही, कधी समोरून अचानक तोफगोळा येईल, कुठून हे सांगता येत नाही. शत्रूची लाट
अगं ावर येते तेव्हा आघाडीचं सैन्य आधी चिरडलं जातं. त्यामळ ु े राजाने आघाडीवर न थांबता एकतर त्याने
पिछाडीला किंवा मध्यावर राहावं नाहीतर आपल्या मोठ्या सेनापतींना पाठवावं. “धरु ा चकसनू सोडणे” याचा
अर्थ त्या नेततृ ्वावर तमु ची नजर असेल अशा ठिकाणी राजाने राहायला हवं. प्रतापराव गजु र खासे सेनापती
पढु े गेल्याने मारले गेले हे शिवकाळातील उदाहरण आपल्यासमोर आहेच. पानिपतात विश्वासराव बंदक ु ीच्या
गोळीचे लक्ष झाल्याने पढु े काय अनर्थ झाला हेही आपल्याला माहित आहेच. म्हणनू समर्थांचा होरा हा की
राजाने स्वतःला यात जपलं पाहिजे, स्वतःसाठी नाही, राज्यासाठी. “मोहरा पेटला अभिमाना, मग तो जीवाचे
पाहेना” म्हणताना पनु ्हा प्रतापराव आणि सदाशिवरावभाऊंचं उदाहरण चपखल बसतं. यद्धा ु वर जातानाच
निवडक पण योग्य माणसं निवडली की थोर थोर शत्रू सेनापतीही पळून जातात. एकंदरीतच अशा प्रकारचा
हा राजधर्म समर्थांनी सांगितला. धावे नेटके ।। जेणे करिता चतरु चक ु े ।। ताबे न होतां फिके ।। कारभार होती
।।१३।। धरु े ने यधु ्धास जाणे ।। ऐसी नव्हेती राजकारणे ।। धरु ा चकसनू सोडणे ।। कितेक लोक ।।१४।। उदडं मडंु े
असावी ।। सर्वही येक न करावी ।। वेगळाली कामे घ्यावी ।। सावधपणे ।।१५।। मोहरा पेटला अभिमाना ।।
मग तो जिवाचें पाहेना ।। मोहरे मेळउन माना ।। वरी चपेटे करी ।।१६।। देखोन व्याघ्राचा चपेट ।। मेंढरें पळती
बारावाटा ।। मस्त जाला रे डा मोटा ।। काय करावा ।।१७।। रायाने करावे राजधर्म ।। क्षेत्री करावे क्षत्रधर्म ।।
ब्राह्मणी करावे स्वधर्म ।। नाना प्रकारे ।।१८।। तरु ं ग शस्त्र आणि स्वार ।। पहिलाच पाहावा विचार ।। निवडुन
जातां थोर थोर ।। शत्रू पळती ।।१९।। ऐसा प्रपंचाचा विवेक ।। स्वल्प बोलिलों काही येक ।। ये कामने स्वामी
शेवक ।। असतां बरे ।।२०।। इतिश्री राजधर्म निरोपणं ।। संपर्णू मस्तु ।। श्रीरामचद्रार्पण ं मस्तु ।।
हा राजधर्म आपण नीट वाचला तर एक गोष्ट लक्षात येते की एका राजाला नेमकं कसं वागायला हव,ं त्याची
कर्तव्य कशी हवीत, त्याने कशा प्रकारे लोकांना सांभाळून घ्यायला हवं वगैरे सगळं वर्णन के लं आहे.
वास्तविक शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या समर्थंच सहभाग कुठे ही नव्हता, आणि शिवाजी
१०१
महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या समर्थंच सहभाग कुठे ही नव्हता, आणि शिवाजी महाराजांनी समर्थांच्या
भेटीपर्यंत जे राज्य वाढवलं तेव्हा समर्थांची ही शिकवण त्यांना झालेली नव्हती हे सर्यू प्रकाशाइतकं स्वच्छ
आहे. पण समर्थांचं एक वडीलधारी व्यक्ती म्हणनू किंवा एक सत्पुरुष म्हणनू हे कर्तव्य होतं की आपल ु कीने
आणि मायेने चार गोष्टी सांगाव्यात, तद्वत ही शिकवण आहे. मी वडीलधारी अशासाठी म्हणतो आहे की
समर्थ हे शिवाजी महाराजांपेक्षा बावीस वर्षांनी मोठे होते. समर्थ म्हणतात, “आधी योग्य माणसाची पारख
करून मग त्यांना त्या त्या निश्चित स्थळी योजावे. त्यांची नेमणक ू योग्य स्थानी करावी. एखादा मनषु ्य कामाचा
नाही असं वाटल्यास त्याला मखु ्य कामात घेऊ नये, त्याला बाजल ू ा ठे वावं. एखादा फितवेखोर असेल
तर त्याचा योग्य बंदोबस्त के ला पाहिजे. शिवाजी महाराजांनी खडं ोजी खोपडे वगैरे कशा पद्धतीने के ला हे
आपल्याला माहित आहेच.मखु ्य गोष्ट पढु े अशी आहे की, “बंध बांधावे नेटके , जेणे करीत चतरु चक ु े !”,
म्हणजे गाठ अशी मारा की भल्याभल्यांनाही सोडवता येणार नाही. अर्थात, कारभार अन ऋणानबु ंध इतके
पक्के ठे वा की कोणाला त्यात ढवळाढवळ करता येणार नाही. यानंतर समर्थ म्हणतात, “धरु ाने यद्धा ु सी जाणे,
ऐसी नव्हेती राजकारणे”. धरु ा म्हणजे नेततृ ्व. खद्दु राजाने नेततृ ्व करावं, हाती तलवार घेऊन आघाडीवर जावं
हे काही योग्य नव्हे. का? राजा घाबरून मागे राहावा असं समर्थांना म्हणायचयं का? अजिबात नाही. उलट
राजाचा जीव के व्हाही महत्वाचा. त्याच्यामळ ु े च राज्याचा डोलारा उभा असतो. यद्धा ु त कोणत्या क्षणी काय
होईल सांगता येत नाही, कधी समोरून अचानक तोफगोळा येईल, कुठून हे सांगता येत नाही. शत्रूची लाट
अगं ावर येते तेव्हा आघाडीचं सैन्य आधी चिरडलं जातं. त्यामळ ु े राजाने आघाडीवर न थांबता एकतर त्याने
पिछाडीला किंवा मध्यावर राहावं नाहीतर आपल्या मोठ्या सेनापतींना पाठवाव.ं “धरु ा चकसनू सोडणे” याचा
अर्थ त्या नेततृ ्वावर तमु ची नजर असेल अशा ठिकाणी राजाने राहायला हव.ं प्रतापराव गजु र खासे सेनापती
पढु े गेल्याने मारले गेले हे शिवकाळातील उदाहरण आपल्यासमोर आहेच. पानिपतात विश्वासराव बंदक ु ीच्या
गोळीचे लक्ष झाल्याने पढु े काय अनर्थ झाला हेही आपल्याला माहित आहेच. म्हणनू समर्थांचा होरा हा की
राजाने स्वतःला यात जपलं पाहिजे, स्वतःसाठी नाही, राज्यासाठी. “मोहरा पेटला अभिमाना, मग तो जीवाचे
पाहेना” म्हणताना पनु ्हा प्रतापराव आणि सदाशिवरावभाऊंचं उदाहरण चपखल बसतं. यद्धा ु वर जातानाच
निवडक पण योग्य माणसं निवडली की थोर थोर शत्रू सेनापतीही पळून जातात. एकंदरीतच अशा प्रकारचा हा
राजधर्म समर्थांनी सांगितला.
क्षात्रधर्म:
श्रीरामसमर्थ ।। क्षेत्रधर्म ।। अल्पस्वल्प ससं ारवर्म ।। मागा बोलिला राजधर्म ।। आता ऐका क्षात्रधर्म ।। परम
दर्ल
ु भ जो ।।१।। जयास जीवाचे वाटे भय ।। तेणे क्षात्रधर्म करू नये ।। काहीतरी करून उपाय ।। पोट भरावे ।।२।।
विमख ु मरणें नर्क होती ।। वाचोन येतां मोठी फजिती ।। इहलोक परलोक जाती ।। पाहेना कोणी ।।३।। मारितां
मारितां मरावे ।। तेणें गतीस पावावे ।। फिरोन आलिया भोगावे ।। महद्भाग्य ।।४।। नजर करार राखणे ।। काबू
पाहोन खतल करणे ।। रणशरू ाची अतं कर्णे ।। चक्कीत होती ।।५।। जैसा भांड्याचा गलोल ।। निर्भय भारामध्ये
पडिला ।। तैसा क्षेत्री रिचवला ।। परसेनेमध्ये ।।६।। निःशक ं पणे भार फुटती ।। परवीराचे तवके तटु ती ।। जैशा
बळ्या घालनू घेती ।। बहिरी उठता ।।७।। ऐसेचि अवघे उठता ।। परदळाची कोण चितं ा ।। हरणे लोळती चिता
।। देखता जैसी ।। मर्दे तकवा सांडू नये ।। म्हणिजे प्राप्त होतो जय ।। काबू प्रसगं समय ।। बरा वोळखावा ।।९।।
काबू समजेना अतं रे ।। तें काय झजु ेल विचारे ।। यधु ्ध करावे खबर्दारे ।। लोक राजी राखतां ।।१०।। दोनी दळे
येकवटे ।। मिसळता चिखल खाटे ।। यधु ्ध करावे खणखणाटे ।। सीमा सांडूनि ।।११।। देव मात्र उछे दीला ।।
आपला स्वधर्म उडवला ।। जिण्यापरीस मतृ ्यू भला ।। ऐसें समजावे ।।१२।। म्हराटा तितक ु ा मिळावा ।। आपल ु ा
१०२
म्हराष्ट धर्म राखावा ।। येविसी न करिता तकवा ।। पर्वू ज हांसती ।।१३।। मरण हक तो चक ु े ना ।। देह वाचविल्या
वाचेना ।। विवेकी होऊन समजाना ।। काय करावे ।।१४।। भले कुळवतं म्हणावे ।। तेही बेग हजिर व्हावे ।।
हाजीर न होता भ्रष्टावे ।। लागेल पढु े ।।१५।। येक जातीने दोन जाती पावला ।। तो कै सा म्हणावा भला ।। तमु ्हां
सकळांस कोप आला ।। तरी क्षमा कीजे ।। देवद्रोही तितक ु े कुत्ते ।। मारुनी घालावे परते ।। देवदास पावती फते
।। यदर्थी सदं हे नाही ।।१७।। देव मस्तकी धरावा ।। अवघा हलहलकोळ करावा ।। मल ु क
ू बडवावा बडु वावा ।।
धर्मस्थापनेसाठी ।।१८।। विवेक विचार सावधपणे ।। दीर्घ प्रयत्न के लाची करणे ।। तळ ु जावराचे निगणेु ।। रामे
रावण बडु विला ।।१९।। ऐसी हे तळ ु जाभवानी ।। प्रसिद्ध रामवरदायिनी ।। रामदास ध्यातो मनीं ।। यतत्निमित्त
।।२०।। इति श्रीक्षेत्रधर्म संपर्णु मस्तु श्रीरामचद्रार्पण
ं मस्तु ।।
क्षात्रधर्म हा प्रत्येकासाठी आहे, जो हाती तलवार घेऊन यद्ध ु प्रसगं करतो. जर एखाद्याला आपल्या जीवाची
भीती वाटत असेल तर मळ ु ात त्याने क्षात्रधर्म करूच नये असं समर्थ म्हणतात. समोर शत्रू मारायला येत
असताना हातपाय गाळून बसल्यास काय उपयोग मग क्षत्रिय असल्याचा? त्याने मग इतर काही उद्योगधदं ा
करून आपलं पोट भरावं. ज्याप्रमाणे एखाद्या तोफे चा लालबंदु गोळा शत्रुसैन्यात जाऊन आढळतो त्याप्रमाणे
क्षत्रियाने लढाई करावी आणि शत्रुसैन्यात भीती माजवावी. जितके काही मराठे आहेत (इथे मराठे म्हणजे
महाराष्ट्रधर्मीय असा अर्थ समर्थांना अभिप्रेत आहे) ते एकत्र होऊन महाराष्ट्रधर्म राखावा असं समर्थ म्हणतात.
“देवद्रोही तितक ु े कुत्ते, मारोनी घालावे परते” हे म्हणताना समर्थांच्या मनातील सलु ्तानांबद्दलचा राग उफाळून
येतो, पण पढु े लगेच “देवदास पावती फत्ते” म्हणताना त्यांना आनंदही होतो हे लपत नाही. या क्षात्रधर्मात
शेवटी “ऐसी हे तळ ु जाभवानी, प्रसिद्ध रामवरदायिनी” असं म्हटलं आहे त्या अर्थी हे स्फु ट समर्थांनी प्रतापगड
पायथ्याच्या रामवरदायिनीच्या समोर रचलं असण्याची शक्यता जास्त आहे.
समर्थांचा महाराष्ट्रधर्म असा होता. इ.स. १६७२च्या शिवछत्रपती महाराजांना लिहिलेल्या पत्रात समर्थ त्यांना
म्हणतात, “महाराष्ट्रधर्म राहिला काही, तमु ्हां कारणे”, म्हणजे हे राजा, हा जो काही महाराष्ट्रधर्म आज राहिला
आहे, वाढला आहे,तो के वळ आणि के वळ तमु च्यामळ ु े ! समर्थांच्या या राजधर्म-क्षात्रधर्मातनू आपल्याला
त्यांचं ‘रामदासा’व्यतिरिक्तच्या राजकारण-यद्ध ु कौशल्यपटुत्वाचं दर्शन घडतं एवढं नक्की. बहुत काय लिहिणे?
१०३
Xmg~moYmVrb
{^jm{Zê nU
श्री.प्रशांत सबनीस
या न्यायाने सर्वकालिय सामान्य जनांकडून भिक्षा या परंपरागत प्रक्रियेचे अनक ु रण के लेले आढळते.
अपवादात्मक परिस्थिती वगळता या अनक ु रणातनू या परंपरागत पद्धतीत अनेक दोष उत्पन्न झाले व त्यातनू च
श्रीसमर्थ म्हणतात तसे ‘एवं पोट भरावयाची विद्या’ या सदोष वत्ृ तीचे लांगल ु चालन यात अतं र्भूत झाले. एक
अर्थी पाहता या सदोष भिक्षापद्धतीला सर्वप्रथम छे द देण्याचे कार्य आचार्य चाणक्य यांचे कडे जाते. हिच
सक ं ल्पना व महत्त्वकांक्षा श्रीसमर्थांनी आपल्या भिक्षापरंपरा पद्धतीत अनसु रली. नसु तेच आमगु ामी झाले
नाहीत, तर तिला विविध प्रकारचे आयाम दिले. तिचे स्वरूप बदलले. उदात्त विचार देण्याचा व समाजाला
सामर्थ्यसंपन्न करण्याचा प्रयत्न सर्वप्रथम श्रीसमर्थांनी या भिक्षेच्या माध्यमातनू के ला. भारत भ्रमण काळात
श्रीसमर्थांनी आसेतहिु माचल निरीक्षण करीत आपल्या दृष्टीत साठवनू ठे वला. या भ्रमणकाळात त्यांच्या मनाचा
निश्चय झाला होता. कार्याची दिशा ठरली होती. किंबहुना ‘शभु स्य शीघ्रम’् या न्यायाने त्यांनी कार्याला प्रारंभ
के ला होता. सर्वात विशेष म्हणजे या कार्याच्या पर्तू तेसाठी साधनही ठरले आणि ते दसु रे तिसरे कोणी नसनू
भिक्षा हे एकमेव साधन होते! भिक्षापद्धती त्यांनी स्वतःसाठी ‘कल्पतरू’ आणि ‘कामधेन’ु मानली व यालाच
सहाय्यक म्हणनू इतरही साधनांचा अवलंब के ला. श्रीसमर्थांनी भिक्षा मागण्याच्या परंपरागत पद्धतीला काही
नियम घालनू घेतले व आचरण पद्धतीला जोडून दोन्हींचा समन्वय साधला.
आणि
या त्रिसत्ू रीला छे द जाणार नाही याची विशेष खबरदारी घेतली. वस्तुतः श्रीसमर्थ तपश्चर्याकाळात टाकळी येथे
माधक ु री मागत असत. परंत,ु नंतर तपश्चर्येची फलश्तरु ी अनायासे श्रीराम कृपाप्रसादाने चमत्कार प्रसंगातनू
भिक्षास्वरूपात उत्पन्न झाली. आणि श्रीसमर्थांच्या मख ु ातनू पहिल्यांदाच भिक्षा म्हणनू पढु े उद्धवस्वामी या
नामाभिधानाने विशेष प्रसिद्ध झालेल्या बालकास मागण्यात आले. भारतभ्रमण काळात पाहिलेली
१०४
समाजाची अवस्था, सामाजिक, वैचारिक अवनती व त्यातनू च उत्पन्न झालेली नैराश्यता कुठे तरी सामर्थ्यवान
विचारशैलीत बदलली पाहिजे. समाजमनाला एक नवा विचार अथवा जागतृ सामर्थ्यवान करायचे झाले तर
‘एक विचारे भरावे’ या मल ू भतू संकल्पनेवर काम के ले पाहिजे. त्यासाठी आवश्यक संघटन मनाला चैतन्य
प्रदान करणारी शक्ती, बद्धी
ु व भक्ती उत्पन्न करणारे विचार समर्थांनी आपल्या ओघवत्या प्रपाताप्रमाणे
शब्दरचना करून श्लोकांची निर्मिती के ली. श्रीराम व श्रीमारुती हि उपास्यदैवते समाजापढु े ठे वली.
उपासनापद्धतीमध्ये ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या त्रयोदशाक्षरी मत्रां द्वारे भक्तीसक
ं ल्पना दृढ के ली व
‘जय जय रघवु ीर समर्थ’ या वीरश्रीयक्त
ु जयघोषाद्वारे जनमानसात सामर्थ्य निर्माण के ले. भिक्षेच्या माध्यमातनू
श्रीसमर्थांनी समाजमनाशी जवळीक साधली.
‘भिक्षामिसे लहानथोर परिक्षून सोडावी’ या न्यायाने श्रीसमर्थांनी भिक्षा मागितली व आपल्या अनयु ायी
शिष्यांना वस्तुपाठ घालनू दिला. रोज पाच घरी भिक्षा मागावी, ‘बहुत आणिता घ्यावी। मष्टी ु येक।।’ या
न्यायाने व ‘काही भिक्षा आहे म्हणावे’ या संवादाने स्वीकारण्याची पद्धत रूढ के ली. ‘ओम् भवती भिक्षान्
देही’ या पारंपारिक घोषवाक्याने भिक्षा मागण्याच्या पद्धतीऐवजी समाजात भक्ती व श्रद्धा दृढ व्हावी, या हेतनू े
उपदेशपर अथवा भक्तीपर श्लोक व जय जय रघवु ीर समर्थ अशा उच्चारवाने उद्घोष करण्याची परंपराही सरू ु
के ली.
एकाच ठिकाणी नित्यनेमाने भिक्षेस जाऊ नये हा दडं क घालनू दिला. जेथे जाल तेथील मनषु ्यांची पारख
करावी. आपल्या कार्यास अनक ु ू ल आवश्यक असेल तर त्यास सघं टनेत जोडावे. त्यांच्यातील सद्गुणांची कदर
करावी. सांप्रदायिक लक्षणांनी यक्त ु असलेल्या व्यक्ती हेरून त्यांना आपल्या कार्यात सामील करून घ्यावे.
उर्वरित जनांना सन्मार्गाचा, सत्संगतीचा, भक्तीमार्गाचा उपदेश करावा.
निस्पृह व्यक्तीने ‘कदा काळी हिडं ो नये। वोळखीमध्ये।।’ या न्यायाने वर्तन करत भिक्षा मागावी. हे सांगताना
श्रीसमर्थांनी एका अभगं ात म्हटले आहे-
भिक्षा मागनू झाल्यावर त्या गावातच वास्तव्य करू नये. मदं िरे , धर्मशाळा, इत्यादी ठिकाणी निवास न करता
एकांतात अन्यत्र काल व्यतीत करावा. श्रीसमर्थ स्वतः एकांतातच निर्जनस्थानी वास्तव्य करीत असत. भिक्षा
मागताना ऐहिकदृष्ट्या काही कालावधीसाठी लाजता कामा नये हे सांगताना ते म्हणतात-
भिक्षेविषयी लाजू नये। बहुत भिक्षा घेऊ नये।
पसु ता ही देऊ नये। ओळखी आपल ु ी।।
१०५
अशा उदात्त हेतनू े जो भिक्षा मागनू आपली क्षुधा शांत करतो तो निराहारी म्हणनू च ओळखला जातो. भिक्षेच्या
माध्यमातनू श्रीसमर्थांनी सघं टन उभे के ले आणि ते योग्य प्रकारे गप्तु रुपाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या
स्वराज्य स्थापनेच्या कार्यात सहाय्यभतू के ले. स्वतः श्रीसमर्थ व प्रभू श्रीरामाच्या कृपाशिर्वादाचा परिणाम,
असे जरी मान्य के ले तरी भिक्षेच्या माध्यमातनू अनेक उत्तम गणी ु जनसमदु ाय जोडला गेला. संप्रदायात
याच भिक्षेच्या माध्यमातनू सामर्थ्यवान, उत्तमगणी ु व्यक्तिमत्वे उदयास आली आणि महाराष्ट्राच्या मराठी
साहित्यक्षेत्रातील इतिहासात अजरामर झाली. पाठांतर, लेखन, कवित्व, इत्यादी गणु ांना सप्रं दायात स्थान व
महत्त्व देऊन त्या स्वरूपाची व्यक्तिमत्वे संप्रदायात विशेषत्वाने आदर्श निर्माण करती झाली. त्यात प्रामखु ्याने
८४ सहस्त्र ओव्या मख ु ोद्गत असणारे श्रीसमर्थ प्रशिष्य शिवराम असोत, अथवा समर्थप्रतापकार व अनेक
ग्रंथांचे रचते गिरिधरस्वामी असो, किंवा एक लक्ष ५० सहस्त्र पेक्षा जास्त ओव्यांचे रचते समर्थ प्रशिष्य तंजावर
प्रांतीचे माधव असोत. ही सर्व समर्थांनी कामधेनु अथवा कल्पतरू मानलेल्या भिक्षेचीच फलनिष्पत्ती होय.
श्रीरामनवमी सारखे उत्सव सरू ु के ले. त्यासाठी लागणारी शिधासामग्ु री भिक्षेच्या माध्यमातनू च उभी के ली.
वेळोवेळी अनेक स्थानांचे जीर्णोद्धार हि भिक्षारूपात मिळालेल्या सेवेतनू च मर्तू रूपात आणले. भिक्षेच्या
माध्यमातनू श्रीसमर्थ व शिष्यांच्या मख ु ातनु उच्चरवाने उद्घोषित श्लोक कर्णोपकरुनी श्रीशांतिब्रह्म एकनाथ
महाराजांचे पौत्र श्रीमक्तेु श्वर यांच्या कानी रुं जी घालू लागले व त्यांच्या ही हस्ते मराठी साहित्यविश्वाला
आणखी मनाच्या श्लोकांची प्राप्ती झाली, हाही एक भिक्षेचाच महिमा म्हणता येईल. श्रीसमर्थांनी घालनू
दिलेल्या या भिक्षेच्या पदपथावरून मार्गक्रमण करीत अनेक आदर्श, सत्वगणी ु , सामर्थ्यसंपन्न व्यक्तिमत्वे
उदयास आणण्याचे कार्य आपणा सर्वांना सद्य स्थितीतही करणे आवश्यक आहे. त्यासाठी निरंतर प्रयत्नशील
असणे आवश्यक आहे. अन्यथा ‘भिक्षापात्र अवलंबणे। जळो जिणे लाजिरवाणे।।’ असे होऊन जाईल. असो!
प्रत्येकाने नित्यनेमाची निस्पृहतेची भिक्षा समर्थ सांप्रदायाच्या भिक्षारुपी झोळीत समर्पित के ली तरी श्रीसमर्थ
सप्रं दाय पर्वी
ू सारखाच वैभवसपं न्न होईल, हे मात्र निःसश ं य!
१०६
Xmg~moYmVrb
gmYH$m§gmR>rMm CnXoe
सौ.शुभदा थिटे
ग्रंथराज दासबोध हा ग्रंथ म्हणजे श्रीसमर्थांचे निजस्वरूप आहे असे म्हटले तर ते योग्यच ठरे ल. यात श्रीस्वामी
जे जीवन जगले आणि ज्याच्या आधाराने साधक हा भवसागर तरून जाऊ शके ल असे सर्व ज्ञान विस्तृतपणे
प्रतिपादन के लेले आहे. या ग्रंथात एकूण ७७५१ओव्या असनू यातिल प्रत्येक ओवी साधकाच्या जीवनाचा
आधारस्तंभ आहे. एक तरी ओवी अनभु वावी हे नाथ महाराजांचे म्हणणे सार्थ आहे. आणि श्रीस्वामी ही
असेच म्हणतात. या ग्रंथाचा समारोप करताना श्रीसमर्थ सांगतात,
म्हणजेच ग्रंथाच्या पहिल्या ओवी पासनू शेवटच्या ओवी पर्यंत साधकांसाठी बोधच आहे. ज्याप्रमाणे पर्वी ू
समाज रचनेत ढोबळ मानाने चार भागात वर्गीकरण होते, जसे गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमतं व गर्भश्रीमतं
किंवा तालेवार घराणी. तसेच परमार्थात ही चार भाग पडतात. बध्द, ममु क्षू
ु , साधक, सिध्द. ज्यांना स्वत:च्या
स्वार्थापढु े काहीच दिसत नाही, अहक ं ाराने यक्त
ु , मी व माझे असे समजणारे बध्द. यातनू जे त्रिविध ताप
भोगल्याने सावध होतात ते ममु क्षू
ु . बध्द ते ममु क्षू
ु याची जाणीव सांगताना श्रीसमर्थ म्हणतात,
संसारद:ु खे दख
ु वला। त्रिविध तापे पोळला।
निरूपणी प्रस्तावला। अतं र्यामी।। ५-८-३
मग या जाणीवेने तो सज्जनाची सगं त शोधू लागतो आणि स्वामी त्याच्या विषयी म्हणतात,
अशा रीतीने सज्जन संगतीत जाऊन पश्चाताप झाल्यानंतर तो तीव्र ममु क्षू ू साधक म्हणनू तयार होऊ लागतो.
इथेच त्याला एक श्रीगरूु , एक संप्रदाय, एक मत्रं , एक ग्रंथ याची कास धरावी लागते. या सगळ्याचा आधार
घेऊन तो इतर सद्ग्रंथांचा अभ्यास करतो तेव्हा परमार्थातील रहस्य समजायला लागतात. महद्भाग्याने जेव्हा
ग्रंथराज दासबोध त्याच्या हाती येतो तेव्हा साधकावर पर्णू कृपा झाली असे म्हटले तर ती अतिशोयक्ती होणार
१०७
नाही. कारण साधकाच्या मनातील प्रत्येक शक ं ा, त्याच्या अडचणी या श्रीसमर्थ स्वामींनी स्वत:च बोलनू
दाखविल्या आणि त्याचे उत्तम रीत्या निराकरण सधु ्दा के लेले दिसते. थोडक्यात या वीस दशकांचा विचार
मांडण्याचा प्रयत्न करते.
यासाठी मी आदरणीय लीलाताई गाडगीळ यांचा भावसमु नांजली हा ग्रंथ आधारासाठी घेतला आहे.
साधकाने साधन चतष्टु य असल्याशिवाय परमार्थात तो प्रगती करू शकत नाही. या चार गोष्टी आद्य
शकं राचार्यांनी विवेक चडु ामणीत सांगितल्या आहेत,
१)नित्यानित्यविवेक २)इहलोकी व परलोकी फलोपभोगाची आसक्ती नाहिशी करणे म्हणजेच इहामत्रु फलभोग
विराग, वैराग्य ३) शमादि षटके ४) ममु क्ष
ु त्व
नित्यानित्य विवेका शिवाय साधकाची वाटचाल सरू ु च होत नाही, यामळ ु े पहिला दशक हा स्तवनाचा
सांगितला आहे, ज्यात गणेश, शारदा, श्रोते, संत ,परमार्थ, नरदेह असे दहा समास नित्य अस्तित्वाचे सांगितले
आहेत. यांचे विषयी पजू ्य भाव ठे वणे म्हणजेच ते स्विकारणे. असे हे नित्य सांगणारा पहिला दशक. तर
त्यागार्थ , अज्ञानाचा निरास होण्यासाठी सांगितलेला दशक मर्खू लक्षणे. साधकांना स्पष्टपणे योग्य अयोग्य
समोर ठे वनू त्यांचा पाया भक्कम करून परमार्थातले पहिले पाऊल स्थिर करणारे हे दोन दशक आहेत. असा
शास्रिय पध्दतीने विचार मांडणारा मराठी सारख्या बोली भाषेत असणारा हा ग्रंथ विलक्षणच आहे.
तिसऱ्या दशकात जन्मापासनू मतृ ्यूपर्यंतचे स्पष्ट वर्णन या स्वगणु परीक्षा या दशकात करून देहबधु ्दी व प्रपचं ा
विषयी वैराग्य उत्पन्न करून साधकाला प्रखर जाणीव करून दिली आहे. चौथा दशक हा नवविधा भक्तीचा
असनू साधकाकडे असणाऱ्या षट्संपत्तीची ठे व श्रीसमर्थ समोर ठे वतात, जणू काही वैराग्यास विवेकाची जोड
देतात. यात षट्सपं त्तीची वाढ करणारी सत्ू रे सापडतात.
भक्ती दृढ होण्यासाठी श्रीसद्गुरूं चे साधकाच्या जीवनात अतिशय महत्वाचे स्थान आहे. आणि येथे जर चक ु ले
तर चक ु लीया वर्म फे रा पडे, असे तक ु ाराम महाराज म्हणतात तसे होईल. म्हणनू हा पाचवा दशक गरू ु मत्रा
ं चा
आहे. ज्यात दांभिक गरू ु , सधं ी साध,ू व्यावहारीक गरूु व त्यांचे शिष्य या विषयी सांगनू साधकाला सधु ्दा
आरसा दाखवतात. आणि मग महावाक्यांचा उपदेश, निश्चय,बहुधा ज्ञान, शधु ्द ज्ञान असे सांगनू साधकाला
सावधान करतात आणि विचारांची स्पष्टता सधु ्दा मांडतात. सहावा दशक हा श्रोता वक्ता संवाद रूपाने
साधकाला बध्दिु निश्चय करण्यास प्रेरीत करतो. या दशका पासनू साधकाचा देव दर्शन ते देव शोधन हा अतं रंग
साधनेचा प्रवास सरूु होतो.
मग सातवा दशक, हे वैदिक काळात जसे खडं न-मडं न असे वाद चालत त्या पध्दतीने चौदा ब्रह्मांची उभारणी
म्हणजेच मांडणी करून त्यांचा संहार सांगनू अद्वैताचा सिध्दांत पक्ष सांगितला आहे. यातनू साधकाला
मिळालेल्या अनेक सिध्दी जसे वाचा सिध्दी, प्रतिभा जागतृ होऊन काव्य निर्मिती, दृष्टांत होणे व तसेच घडणे,
मागे घडलेल्या घटनां विषयी समजणे. असे सगळे या चौदा ब्रह्मांत येते आणि त्याचा निरासच करायचा हे
या दशकातनू सांगनू साधकाला ज्ञानदशकासाठी तयार करतात. नराचा नारायण होण्यासाठीची कवाडं या
दशकात सांगनू साधकाची पर्णू तेकडे जाण्याचा
१०८
मार्ग विशद के ला आहे. ९-१५ दशक हे साधकांसाठीचे महत्वाचे दशक होय. १) सहजस्थिती, २) उन्मनी,३)
अलिप्तपण,४) निवेदन,५) विदेहस्थिती, ६) विज्ञान व ७) सगं त्याग. सोळा ते वीस दशक सिध्दावस्थेत
जाणाऱ्या साधकाला दिलेले मार्गदर्शन आहे.
कसे ओळखू संत पंडित ज्ञानी | कुणा भीक मागू असे मी अडाणी |
ठसेना मनाला कुणाचा प्रबोध | मला दासबोधीच लाभेल बोध ||२||
नसे शास्त्र विद्या कला ज्ञान काही | बडु ालो सदा मी ससं तृ ीच्या प्रवाही |
जरी अज्ञ मी बद्ध होईन सिद्ध | मला दासबोधीच लाभेल बोध ||७||
१०९
Xmg~moYmVrb
gyú_OrdemñÌ
श्री.सध
ु ांशू कविमंडण
सनातन वैदिक संस्कृति ही विश्वाच्या पाठींवरील सार्वकालिक विज्ञानाचीं रहस्यें उदरांत दडवनू बसली आहे.
कमतरता आहे ती ही रहस्ये उलगडावयाचा यत्न करणारांची! खेदजनक बाब ही आहे की आमचें लोकांस
एकतर या ससं ्कृतिच्या विज्ञानाधारित्वाचा प्रचडं अभिमान तरी असतो अथवां तो के वळ मर्ख ू पणा तरीं
भासतो. अवास्तव श्रध्दा व अविश्वास दोहोंचीही मनावर चढलेलीं पटु ें काढून त्रयस्थवत् या वैदिक ज्ञानाचे
परिशिलन करावयास क्वचितच लोक पढु ें येतात! प.प.आचार्य आद्य शक ं रांपासनू तो ज्ञानेश्वर व सद्रू
गु
श्रीसमर्थ रामदासस्वामींपर्यंत सतं परंपरे ने आपल्या ग्रंथांद्वारें बहुतांशी रहस्ये उलगडलेली आहेत; परंतु तेथेही
कधी श्रध्दाळूपणाच्या अतिरे कानें परमार्थाबाहेरचा अर्थ काढावयास भक्तसमदु ाय धजत नाही. आज प्रस्तुत
लेखांत सद्रूगु श्रीसमर्थकृत ग्रंथराज श्रीमद्दासबोध ग्रंथांतील आधनु ीक जीवशास्त्रावर आधारिलेल्या एका
अद्वितीय समसाचें उपबंहृ ण करावयाचा अल्पमतीनें यत्न करित आहे. खद्दु श्रीसमर्थ म्हणतात तद्सनु ार,
याप्रमाणें जो भावार्थ आकळला, तो येथे शधु ्द आधनु ीक विज्ञानाचा प्रस्तुत समासाशी ताळमेळ
करून विवेचन मांडित आहे. सदर समास आहे पधं रावें आत्मदशकांत वर्णिलेला अष्टम समास अर्थात्
सक्ु ष्मजीवनिरूपण!
प्रारंभास एक बाब स्पष्ट के लीं पाहीजें, व ती म्हणजें सक्ु ष्मजीवशास्त्र अर्थात् Microbiology हा विषय
आधनु ीक विश्वांत के व्हा शास्त्रज्ञांस दृग्गोचर झाला; व याचें उत्तर असे की एण्टोनी वॅन लिवेनहुक नामक
शास्त्रज्ञ; ज्यांना आज ‘सक्ु ष्मजीवशास्त्राचें पितामह’ (Father of Microbiology) म्हणतात, यांनी
सामान्यत: सन १६७५ च्या आसपास सक्ु ष्मजीवयंत्राची निर्मिती करून त्यांचे निरीक्षण के ल्याचा उल्लेख
आहे. तोवर पदार्थ सडतात यामागील कारण देखिल पाश्चात्य सोडवू शकलें नव्हते. या लिवेनहुकांचा जन्म सन
१६३२ सालचा आहे. हे श्रीसमर्थांना समकालीन होते. परंत;ु श्रीसमर्थांचा जन्मकाल सन १६०८ चा असल्याने
व सन १६३२ पर्वी ू च समर्थांनी आपलें परु श्चरण टाकळीस सरू ु के ले होते व ते बहुतांशी पारही पडले होते.
अर्थात् लिवेनहुकांच्यादेखिल आधी सक्ु ष्मजीवांचे अध्ययन समर्थांनी के लें असावे यांत शक ं ा नाही. आता प्रश्न
उठतो, कुठलेही सक्ु ष्मजीवनिरिक्षक यंत्र नसतानाहीं समर्थांनी हे अध्ययन के ले कसे?
याचें उत्तर टाकळीनिवासातील वेदाध्ययनात आहे. श्रीसमर्थ टाकळीस असताना ते रोज नाशकास जाऊन
११०
वेदाध्ययन करित, शास्त्रांचा परामर्ष घेत हे सर्वश्तरु आहे; व यांदरम्यानच त्यांनी अथर्ववेदाचाही अभ्यास
के ला असणार! अथर्ववेद हा बहुतांशी विज्ञानाधिष्ठीत आहे. आज वैद्यकीय क्षेत्रांतील भारतीयांचे अतलु ्य
योगदान असणारा आयर्वेु द हा देखिल अथर्ववेदाचाच उपवेद म्हणविला जातो. याच अथर्ववेदांत ‘कृमिजम्भन
सक्त
ु म’् नामक सक्त
ु आहे. संस्कृ ताचा आधार घेतल्यास कृमि अर्थात् सक्ु ष्म किटक व तेही पिशाच्चवत्
अदृश्य असतात (अर्थात् मनषु ्याच्या नेत्रांस अगोचर असतात), यास्तवच सदर सक्तां ु त या कृमींचा उल्लेख
‘पिशाच्च’ असा के ला आहे. आमच्या अत्यल्प कयासानसु ार श्रीसमर्थांचा सक्ु ष्मजीवांशी परिचय झाला
असणार तो या टाकळीवास्तव्यातच!
पढु े ग्रंथराजाच्या लेखनादरम्यान कुशाग्रधि समर्थांनी सक्ु ष्मजीवनिरूपण समासात या अभ्यासाचा सोप्या भाषेत
प्रपचं मांडला. पाश्चात्यांत लिवेनहुकांनंतर स्पॅलेनझॅनी, लईु पाश्चर, राॅबर्ट काॅच इत्यदिक शास्त्रज्ञांनी हा अभ्यास
पढु े चालवनू मायक्रोबायोलाॅजी नावांस आणिली व आम्ही लेखारंभी म्हटल्यानसु ार आपल्या लोकांनी
अध्यात्मप्रवण अर्थ काढून बाकी सर्वत्र दर्ल ु क्ष के लें त्यामळ
ू ें समर्थांच्या या ज्ञानाचा म्हणावा तसा लाभ आपण
घेवू शकलो नाही.
आता समासांतील ओव्यांचा धांडोळा घेत त्यांचा सबं ंध आधनि ु क सक्ु ष्मजीवशास्त्रांशी लावयू ात. सर्वप्रथम
सक्ु ष्मजीवांचा प्राथमिक सिध्दान्त समर्थांनी स्पष्ट के ला आहे.
रेणू अर्थात् माॅलीक्युल्स! या माॅलीक्युल्सहुनदेखिल सक्ु ष्म असे किडे वास्तव्य करून आहेत. त्यामानानें त्यांचे
आयषु ्यही तितके च अल्प आहे. त्यानसु ार त्यांची यक्ती ु बधु ्दी आहे. असे हे नाना जीव आपण पाहावयास
(डोळ्यांनी) गेलो असता दिसत नाहीत! आता बघा! सक्ु ष्मजीवाची व्याख्या-
“Micro Organisms are the smallest animalcules which we cannot seen by our naked
eyes.”
हे पाहण्यासाठी वेगळीं दृष्टी हवी; व ही दृष्टी अर्थात मायक्रोस्कोप होय! खद्दु समर्थांना या मायक्रोस्कोपबद्दल
ठावे असेल की नाही हे अज्ञात आहे परंतु कल्पना असलीच पाहीजें! श्रीसमर्थ पढु ल्या काही ओव्यांमध्ये या
सक्ु ष्मजीवांच्या अभ्यासाचा विस्तार करताना म्हणतात,
१११
ऐसिया किड्यांचा सभं ार । उदडं दाटला विस्तार ।
अत्यंत साक्षपी जो नर । तो विवरोन पाहे ।।६।।
या सक्ु ष्मजीवांकरिता मगंु ीदेखिल फार मोठा प्राणी ठरतो. मगंु ीसमान अन्य छोटे किटक देखिल यांच्याकरिता
हत्तीप्रमाणें असतात. अशा या प्रचडं सखं ्येतील कृमींचा वाढता विस्तार कोणास समजावा? तर समर्थ
म्हणतात की ‘अत्यंत साक्षेपीं नर विवरोनी पाहें।’ जो साक्षेपी नर तोच यांच्या अध्ययनास उद्युक्त होईल!
दर्ु वदै ाने आमच्या राष्ट्रांत तो न उत्पन्न होता दरु हाॅलंड देशांत झाला हा दैवदर्वि
ु लासच म्हटला पाहीजें!
श्रीसमर्थांचा हा समास सक्ु ष्मजीवशास्त्र व त्यांच्या शाखा यांची तोंडओळख करून देण्यास परु े सा आहे.
समर्थांनी समासात विषयाच्या काही मखु ्य शाखांचा परिचय करून दिला आहे. ते क्रमाक्रमानें पाहू.
या सक्ु ष्मजीवांचा आहार, त्यांची रंगसगं ति, त्यांची वैशिष्ट्ये हीदेखिल भिन्नत्वतेनें त्यांच्यात वास करतात.
प्रत्येकाचा आकार, त्यांचा जीवनकाल, त्यांचे प्रजनन इत्यादि प्रकारांत पथृ कता आढळून येते. यांच्यापैकी
काही त्रासदायक असतात, तर काही प्रकृति व मनषु ्यादि प्राण्यांना उपकारक असतात. ‘सिम्बायोसिस’ या
सक ं ल्पनेला येथे श्रीसमर्थ महत्व देतात. उदाहरणार्थ, आज विश्वभरांत कोविड एकोणीस या विषाणचू ें जसे
तांडव सरू ु आहे, तद्वतच साइनोबॅक्टेरिया या प्रजातीचे जिवाणदू ेखिल आहेत, की जे भमि ू मध्ये नायट्रोजन
फिक्सिंगची प्रक्रीया करून जमिनीस सपि ु क बनवतात. ज्याप्रमाणें हेपिटायटीस, क्लाॅस्ट्रीडियम सारखे रोग
पसरवणारें जिवाणू विषाणू आहेत, तसेच काही लॅक्टोबॅसिलाय सारखे जिवाणदू ेखिल आहेत की जे अन्नपदार्थ
पौष्टीक बनवतात. अशाप्रकारे यांच्यापैकी काही लाभकारक तर काही हानीकारकही आहेत.
पथ्वी
ृ गर्भीं नाना नीरें । त्या नीरामधें शरीरें ।
नाना जिनस लाहानथोरें । कोण जाणें ।।१८।।
उपरोक्त ओव्या पाहील्यास, समर्थ येथे सक्ु ष्मजीवशास्त्राची अतीव महत्वाची शाखा असणार्या ‘जल
११२
सक्ु ष्मजीवशास्त्र’ अर्थात् Water Microbiology ची सक ं ल्पना विस्तृत करित आहेत. सपं र्णू रोगांपैकी
अर्ध्याहून अधिक रोग हे पाण्याच्या अशधु ्दतेने होतात याचे ज्ञान समर्थांना आहे, व ते पाणी शधु ्द करणे
किंवा अशधु ्द करणे यांतही या बॅक्टेरियादिचं ा अविच्छिन्न सहभाग आहे हे श्रीसमर्थ जाणतात. म्हणनू च ते
म्हणतात की नीरांमध्ये शरिरे आहेत. ते प्रचडं प्रमाणांत आहेत. त्यांची स्थिती अर्थात् ते कसे आहेत, किती
प्रकारचे आहेत, त्यांच्यात लाभकारक किती, अपायकारक किती याबद्दल कोणास ज्ञात आहे? जेथे पाणी
आहे तेथे सजीवसष्टी ृ आहेच म्हणजेच तेथे सक्ु ष्मजीवदेखिल आहेतच! भरिस भर, पथ्वी ृ गर्भ म्हणजेच भमि ू च्या
आतं देखिल जे पाणी आहे त्यांतही हे जीव आहेत! त्यांचाही धांडोळा घ्यायला हवा!
ही ओवी देखिल महत्वाची आहे. यांत समर्थ निर्देश देताहेत तो अतं राळ सक्ु ष्मजीवांचा, ज्याला आपण
Exomicrobiology किंवा Space Microbiology म्हण!ू नासा, जपान इत्यादि राष्ट्रांनी आपल्या
प्रयोगावरून हे सिध्द के लें आहे की अन्तरिक्षांत अर्थात् पथ्वि
ृ बाहेरही या सक्ु ष्मजीवांचे अस्तित्व आहे, ते
ग्रहांतरदेखिल करतात. असे काही सक्ु ष्मजीव आहेत की जे अन्तराळातच जन्मतात, तेथेच विस्तार पावतात
व तेथेच नष्ट होतात, यांनी कधीं पथ्वी
ृ पाहिलेलीही नसते. समर्थांचा निर्देश या अन्तराळातील सक्ु ष्मजीवांकडे
आहे.
प्रस्तुत समासांत समर्थ वारंवार या बाबीबद्दल औदासिन्य प्रकट करित आहेत की या विषयाचा अभ्यास
करणारें कोणी नाही. याला प्रचडं वाव आहे. या आशयाच्या काही ओव्या समासात पाहावयास मिळतात.
त्या पाहू-
११३
ही सक्ु ष्मसष्टी
ृ उलगडून पाहणारा व त्यांत स्वारस्य असणारा तत्कालीन हिन्दुस्थानांत कोणी समर्थांना
आढळला नाही. मात्र सहस्त्रो योजने दरु असणार्या यरु ोप द्विपामध्ये या सक्ु ष्मजीवशास्त्राच्या अध्ययनाची बैठक
घातल्या जात होती. नवनवें शोध घेतलें जात होते, कौतहु लात्मकतेने नवसजृ न घडत होते. समर्थांसारखे
महात्मे आपल्या देशांत जीव तोडून असे विषय प्रतिपादित होते. अर्थात् तत्कालीन देशाची परिस्थिती पाहता
यवनांच्या आक्रस्ताळे पणानें भांबावलेल्या हिन्दुंना इकडे लक्ष देण्यास वेळही साधत नव्हता, हेही खरें ! के वळ
उदरवनिर्वाहापरु ते शिकून प्रपचं ात गतंु लेलें आपले लोक आज, स्थिती बदललेली असतानाही बरे च उदासिन
आहेत, ही मात्र शोकांतिकाच होय!
या सक्ु ष्मजीवांच्या तल
ु नेत आपले जीवन किती उदडं आहे! हे विशाल जिवन आपण प्रंपंच, स्वार्थ,
अहकं ार, विषयभोगादि वत्ृ तींत घालवत बसतो! असल्या दर्ल
ु भ विषयांचा अभ्यास, काही अनाकलनीय
रहस्यांचा उलगडा, परमार्थाकडे ओढ याचे भान आपणांस राहत नाही. ही दो दिसांची कायेची माया
आपण इश्वरभजनास न लाविली तरी आरंभास व अतं ासदेखिल निर्भत्सनेखरे िज आपल्याकडें काय राहील?
याकरितांच,
११४
या विज्ञानदृष्टीस आकळून घेणारी बधु ्दीमत्ता विकसीत होणे अवघड आहे. मात्र; एक स्पष्टच आहे, की जर
समर्थांच्या वाङ्मयातील हे विज्ञानमोती वेचनू वेचनू काढलें, तर भारताच्या विज्ञानेतिहासांत अमलु ्य भर पडेल,
व हे समास त्या त्या विषयांच्या अभ्यासार्थींना दिपस्तंभवत् मार्गदर्शक ठरतील हे नि:संदहे !
अनेक प्रकारची शास्त्रे आहेत, शिकण्यासारखेही पषु ्कळच आहे. परंतु काल अल्प आहे व विघ्ने बहुत आहेत;
तस्मात् जे सार आहे ते ग्रहण करून त्याची उपासना करावी, जसे हसं पाणी व दधु ाच्या मिश्रणातनू के वळ
दधू च ग्रहण करतो. याआशयाचा भर्तृहरिचा एक श्लोक उद्धृत करून; भगवान् श्रीसज्जनगडाधिश्वरास कृतानेक
दडं वत घालनू येथे लेखाचा समारोप करतो.
११५
Xmg~moYmVrb
g_W©H$wQ>w§~mMr {eH$dU
श्री. माधव किल्लेदार
समर्थ कुटुंब म्हणजे नेमके काय? ते कसे? आणि ते कुठे ? हे प्रश्न सामान्य मनषु ्याला पडतात. कुटुंब म्हणजे
के वळ चार भितं ींमध्ये असलेला मनषु ्याचा घोळका नव्हे. देहबद्धीु पासनू ते आत्मबद्धीु पर्यंतची एक कार्यशाळा
म्हणजे कुटुंब. साधकांना किंवा समर्थभक्तांना माझे म्हणणे काय आहे ते कळे ल.
दासबोधातील समर्थ कुटुंबाची शिकवण का आवश्यक आहे?
मनषु ्याची निर्मिती कधी झाली हे निश्चितपणे सांगता येत नाही. पण मानवप्राणी जेव्हापासनू एकत्र नांदायला
लागला आहे तेव्हापासनू निश्चितच कुटुंबससं ्था उदयास आली आहे हे सांगता येऊ शकते. प्राचीन-अर्वाचीन
काळी किंवा अगदी अश्मयगु ातही कुटुंब ही संकल्पना निर्माण झाली असावी. त्याकाळी नव्यानेच मानव
संस्कृ तीची सरुु वात पथ्वी
ृ तलावर झाल्याने एकाच कुटुंबात अनेक सदस्य असतील किंवा अनेक सदस्यांचे एक
कुटुंब असावे.
जशी जशी मानवाची उत्क्रांती होत गेली तशी तशी कुटुंबसंस्था आणि तिचे नियमही बदलत गेले असावे.
जेव्हा चाकाचा शोध लागला, जेव्हा मनषु ्य शेती करू लागला तेव्हा वन्य प्राण्यांच्या भीतीने किंवा एखाद्या
नैसर्गिक सक ं टाच्या भीतीने मनषु ्य एकत्र राहू लागला. ह्या एकत्रित सहवासामळ
ु े मनषु ्याच्या भाव-भावनांचा,
विचारांचा, स्वभावाचा आणि एकंदरीतच व्यक्तिमत्वाचा विकास होत गेला. मनषु ्याचे जीवनमान, राहणीमान,
वातावरणाचा त्याच्या वत्ृ तीवर होत असलेला परिणाम आणि त्यातनू त्यांचे वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय
आणि वैश्विक जीवन हे उदयास येऊ लागले असावे.जोपर्यंत मी आणि माझे ह्या भावनांचा उद्रेक वाढला
नव्हता तोपर्यंत मात्र माणसू माणसाशी माणसाप्रमाणे वागत असावा. जेव्हा त्याच्या मनात, विचारात, वत्ृ ती-
प्रवत्ृ तीत आणि भाव विश्वात “मी” डोकावायला लागला तेव्हापासनू च माणसापासनू माणसू तटु ला आणि
माणसाला माणसू जोडावासाही वाटला. अर्थातच माणसाला अजनू ही माणसाशी जोडता आले नाही. ह्या
अशा अनेक कारणांमळ ु े मनषु ्य जीवनाचा पाया असलेली कुटुंबसंस्था हळूहळू लोप पावायला लागली.
११६
त्यास अमतृ प्राशनापेक्षाही अधिक सख
ु प्राप्त करून देऊ शकतो. म्हणनू च श्री समर्थ म्हणतात की, “मरावे परी
कीर्ती रूपे उरावे!!”
कारण ज्यास कीर्ती मिळते तो के वळ स्वतःपरु ता विचार करत नाही तर संपर्णू विश्वाचा विचार त्याला करावा.
सकं ु चित मनोवत्ृ ती ही खपू काळ तग धरू शकत नाही. त्यात गती नसते आणि जी विचारसरणी गतिमान नाही
त्या विचारसरणीचा अवलंब करणारे अनयु ायी हे कधीच प्रगती साधू शकत नाही. आपण भाग्यवान आहोत
की आपल्याला मानव जन्म मिळाला, हे आपले सद्भाग्य आहे की आपण हिदं ू सनातन संस्कृ तीत जन्माला
आलो आहोत आणि हे आपले महद्भाग्य आहे की श्री समर्थांनी ग्रंथराज दासबोध आपल्या कल्याणाकरीता
लिहून ठे वला आहे. एकत्रित कुटुंब पद्धती ही आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतरही बऱ्याच काळापर्यंत
अस्तित्वात होती. आजकाल गावा-खेड्यांमध्येही ही एकत्र कुटुंब पद्धत अस्तित्वात आहे. परंत,ु ह्या
जागतिकीकरणामळ ु े एकत्र कुटुंब पद्धतच काय पण कुटुंबसंस्थाही अनेक मोठ्या शहरात लोप पावत चालली
आहे. ह्याचे गंभीर परिणाम पढु ील भविष्य काळात आपल्याल्या सामाजिक स्तरावर भोगायला लागतील की
नाही हा सश ं ोधनाचा मद्ु दा आहे. पढु े होणारे हे सामाजिक स्तरावरील दःु ख किंवा हानी जर टाळायची असेल
तर दासबोधाच्या अभ्यासाशिवाय पर्याय नाही.
ज्याप्रमाणे स्वामी विवेकानंद म्हणतात की माणसू कमावणे हीच खरी संपत्ती आहे तीच गोष्ट समर्थांनी
दासबोधात लोकसग्रं ह करण्यास सांगितली आहे. लोकसग्रं हाची सरुु वात ही कुटुंबापासनू व्हायला हवी. जिथे
एक विचार आणि एकवाक्यता असते त्या कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य हे नेहमीच उत्तम असते. दर्ु वदै ाने आज
समाजात हे घडतांना दिसत नाही. कारण, कुटुंबातील प्रत्येकाचेच अहकं ार हे कुटुंबापेक्षाही मोठे झाले आहेत.
प्रेम, जिव्हाळा, ओलावा ह्या गोष्टींना आपण तिलांजली देत आहोत की काय असे भयानक चित्र निर्माण झाले
आहे. ह्यावर उपाय खपू सोपा आहे आणि तो म्हणजे मनोबोधाचा(मनाचे श्लोक) अभ्यास करणे होय!
पर्वी
ू च्या काळी घरातील चालते-बोलते विद्यापीठ म्हणजे आजी-आजोबा असत. आज मात्र क्वचितच
घरातील लहान मल ु ांच्या वाट्याला त्यांच्या आजी-आजोबांचे प्रेम येते आहे. पर्वी
ू मनाचे श्लोक हे घरात
म्हणवनू घेतले जात असत त्यामळ ु े बालपणापासनू च मनावर योग्य ससं ्कार होत असत. आज परिस्थिती
वेगळी आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर आधी कुटुंबातील सर्व सदस्यांनी स्वतःची मनःस्थिती
बदलायला हवी. जे कुटुंब समर्थांच्या चरणी लीन होऊन स्वतःची मनःस्थिती बदलण्याचा प्रयास करे ल तेच
समर्थ कुटुंब बनू शके ल आणि भविष्यातील आव्हानांना समर्थपणे तोंड देऊ शके ल.समर्थांच्याच शब्दात
सांगायचे झाल्यास असे म्हणता येईल की,
दासबोधातील समर्थ कुटुंबाची शिकवण कशी गरजेची आहे? प्राचीन-अर्वाचीन काळापसनू कुटुंबससं ्था
भतू लावर अस्तित्वात आहे. जसा काळ बदलला तसे ह्या कुटुंब संस्थेचे स्वरूप बदलले पण मळ
ू रूप मात्र
अबाधित राहिले. एका कुटुंबात एक कुटुंबप्रमख
ु असतो आणि इतर सदस्य असतात. यथा राजा तथा
११७
तथा प्रजाह्या नियमानसु ार कुटुंबातही जसा कुटुंबप्रमख
ु असेल त्यानसु ारच इतर कुटुंबीयांचे आचरण असते.
म्हणनू कुटुंबप्रमख
ु अतिशय उत्तम, जवाबदार असणे गरजेचे असते.
समाज नेततृ ्व निर्माण करते की नेततृ ्व समाज निर्माण करते हा प्रश्न नेहमीच विचारले जातो पण ह्याचे उत्तर
जरी अगदी योग्यरीतीने देता आले नाही तरीही परिस्थितीनसु ारच समाज आणि नेततृ ्वाची निर्मिती होत असते.
परिस्थिती अनक ु ू ल असेल तर समाजाची काय भमि ू का असावी? नेततृ ्वाची काय जवाबदारी असावी?
तसेच परिस्थती प्रतिकूल असल्यावर समाजाने कुठली जवाबदारी निभवावी आणि नेततृ ्वाने काय भमि ू का
स्वीकारावी? ह्यावरच संबंधित मानवी समहू ाची दिशा ठरत असते.
श्रीसमर्थ म्हणतात त्यानसु ार घर हे के वळ एका व्यक्तीचे नसनू , त्या घरात राहणाऱ्या सदस्यांचे नसनू ते
घरात असणाऱ्या किडा, मगंु ी, पाळीव प्राणी, फुलं-झाडे, पक्षी ह्यांचे देखील आहे. ज्याप्रमाणे कुटुंबात
मनषु ्यप्राण्याचा समावेश होतो त्याप्रमाणे ह्या कीटक, पश,ु पक्षी ह्यांचादेखील समावेश होतो. असे अनेक
कुटुंब जेव्हा एकत्र होतात तेव्हा एक मानवी समहू तयार होतो आणि असे अनेक मानवी समहू ांचे एकत्रीकरण
म्हणजेच समाज निर्मिती होय! कुटुंबातील प्रमख ु सदस्य जसा वागेल-बोलेल, जसा व्यवहार घरात आणि
समाजात करे ल तसाच परिणाम कुटुंबातील इतर सदस्यांवर होईल. जर कुटुंब प्रमख ु हा सत्वगणी ु असेल तर
इतर कुटुंबीयांमध्ये आपोआपच सात्विकता निर्माण होईल, जर कुटुंब प्रमख ु रजोगणी
ु असेल तर त्या कुटुंबात
रजोगणु ाचा प्रभाव वाढेल आणि जर कुटुंबातील प्रमख ु सदस्य तमोगणी ु असेल तर मात्र निश्चितच इतर कुटुंबीय
हे तमोगणु ाच्या आहारी जातील. त्याकरिता कुटुंबप्रमख ु ाने कसे असावे हे त्याचे त्याने/तिने ठरवावे. त्यांच्या
आचरणावरच कुटुंबाचे भविष्य अवलंबनू असते.
श्रीसमर्थांनी वाल्मिकीस्तवन समासात खपू उत्तमरीतीने कुटुंबप्रमख ु कसा असावा हे सांगितले आहे. श्रीसमर्थ
म्हणतात की,
पर्वी
ू होता वाल्हा कोळी। जीवघातकी भमू डं ळी।
तोची वंदिजे सकळीं। विबधु ी ऋषेश्वरीं।। १०-११/०१-१६
म्हणजे, वाल्मिकींनी जेथे तप के ले ते वन पवित्र झाले. त्यांच्या तपोबळाने शषु ्क किंवा सक ु लेल्या झाडाच्या
खोडालाही पालवी फुटून ते हिरवेगार झाले. पर्वी ू असलेला वाल्या कोळी हा दष्टु आणि घातकी होता पढु े तोच
वाल्मिकी नावाने महर्षी झाला आणि असंख्य विद्वानांना तसेच ऋषीमनु ींना वंदनीय ठरला.
जोपर्यंत वाल्मिकी ऋषी हे वाल्या कोळी होते तोपर्यंत त्यांनी अनेक विघातक कृत्य के लेत. त्यांच्या ह्या
विघातक कृत्याचे समर्थन त्यांच्या कुटुंबीयांनी के ले. परंत,ु जेव्हा ते कुटुंबीय त्यांच्या पापाचे भागीदार होतील
का असे विचारल्यावर मात्र कोणीही त्यास होकार दिला नाही. ह्या प्रसगं ामळ ु े वाल्मिकींचे हृद्य परिवर्तन झाले
आणि नारदमनु ींनी के लेल्या उपदेशाने ते रामनाम जप करू लागले. त्यांच्या जपाचे सामर्थ्य एवढे वाढले की
ज्या वनात त्यांनी जप के ले ते पवित्र झाले आणि तेथील पश-ु पक्षी ह्यांची वत्ृ ती देखील सात्विक झाली. ह्याचा
११८
अर्थ ते सपं र्णू वन हे एक कुटुंब झाले, त्या वनातील वक्ष
ृ , लता-वेली, पश-ु पक्षी हे कुटुंबातील सदस्य झालेत
आणि महर्षी वाल्मिकी हे कुटुंबप्रमख ु झालेत. रामायणासारखा अद्भूत ग्रंथ त्यांनी लिहिला आणि ते जगद्वंद्य
ठरले.
याकरिताच कुटुंबप्रमखु ाने नेहमीच स्वतःचे आचरण शद्ध ु ठे वावे. स्वतःचे सातत्याने आत्मपरीक्षण करावे
पण आत्मवचं ना करून नये. आत्मघातकी विचार मनातनू काढून टाकावे. प्रपचं आणि परमार्थ नीट साधावा.
स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना मानसिक दृष्ट्या कणखर बनावावे, त्यांच्यात कुटुंबाकरिता जिव्हाळा निर्माण
करावा, ईश्वराची भक्ती वाढवावी आणि स्वतःसहित पढु ील पिढ्यांचा उद्धार करण्याचा प्रयत्न करावा. ह्यातनू च
उत्तम समाज निर्मिती आणि त्याद्वारे राष्ट्रनिर्मिती होऊ शकते.
जो व्यक्ती लौकिक जगतात जगतो त्यास जे डोळ्यांना दिसते, जे कानाला ऐकू येते, ज्याचा स्पर्श होतो आणि
ज्याचा व्यवहारिक स्तरावर अनभु व येतो त्यासच तो सत्य मानतो. पण जो संत-सत्पुरुष आहे त्याला मात्र
आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे त्यामळ
ु े प्रापचि
ं क आणि पारमार्थिक गोष्टीतला भेद त्यास जाणवतो आणि
काळाचाही पलीकडे बघण्याचे सामर्थ्य त्यास प्राप्त होते.
आपल्या सनातन हिदं ू संस्कृ तीत प्रत्येक जीवमात्राला महत्व आणि त्याच्या ईश्वरीय अस्तित्वाची पजू ा
करण्यात आली आहे. कारण आपण प्रत्येकात भगवतं ाचे रूप बघत असतो. उदाहरणार्थ नागपचं मीच्या
दिवशी नागाचे/सर्पाचे पजू न करणे, बैलपोळ्याच्या दिवशी बैलांचे पजू न करणे, जगदबं ेचे वाहन सिहं आहे,
गणपतीचे वाहन उंदीर आहे, भगवान विष्णूंचे वाहन गरुड आहे, वटपौर्णीमेच्या दिवशी वटवक्षा ृ ची पजू ा करणे,
प्रत्येक घरात तळ
ु शी वंदृ ावन असणे ह्यात पश-ु पक्षी आणि वक्ष
ृ -लतावेलींमध्ये सद्धा
ु परमात्मा आहे आणि
११९
त्याचे पजू न करणे गरजेचे आहे हे सिद्ध के ले गेले आहे.
त्यामळ
ु े हिदं ू संस्कृ ती ही प्राचीन-अर्वाचीन काळापासनू सर्वसमावेशक असनू परिस्थितीनसु ार बदल
स्वीकारणारी आहे. मागासलेपणा, बरु सटलेपणा हा हिदं ू संस्कृ तीमध्ये नसनू काळाच्याही अनेक पावले पढु े
असलेले तत्वज्ञान हे आपल्या ससं ्कृ तीतील सतं ानी आणि महात्म्यांनी जगाला पटवनू दिले आहे.
संपर्णू जगातील तत्वज्ञान किंवा ईश्वराविषयीच्या संकल्पना आणि समर्थांचा दासबोध हे एक कुटुंबच आहे.
समर्थ वाड्मय हे त्या कुटुंबाचे प्रमख
ु असनू इतर तत्वज्ञान हे सदस्य आहे. अर्थातच ह्या कुटुंबात मात्र
प्रत्येकाला तेवढेच महत्व आहे जेवढे कुटुंब प्रमख
ु ाला आहे. विश्वातील सगळ्यांचा प्रवास हा एकाच दिशेने
सरुु आहे. जे सगणु ाला मानतात तेही भगवतं ापर्यंत पोहोचतात आणि जे निर्गुणाला मानतात ते भगवतं ाला प्राप्त
करतात. जसे सर्व नद्यांचे पाणी हे महासागराला जाऊन मिळते त्याचप्रमाणे सर्व संप्रदाय हे एकाच ठिकाणी
जाऊन मिळतात आणि ह्याचा स्वीकार करणे म्हणजेच खर्या अर्थाने दासबोधातील समर्थ कुटुंबाची शिकवण
होय!
।।जय जय रघवु ीर समर्थ।।
जालें साधनाचें फळ | ससं ार जाला सफळ | निर्गुण ब्रह्म तें निश्चळ | अतं रीं बिंबलें ||
हिसेब जाला मायेचा | जाला निवाडा तत्वांचा | साध्य होतां साधनाचा | ठाव नाहीं ||
स्वप्नीं जें जें देखिलें | तें तें जागतृ ीस उडालें | सहजचि अनर्वा
ु च्य जालें | बोलतां न ये ||
ऐसें हें विवेकें जाणावें | प्रत्ययें खणु सें ी बाणावें | जन्ममतृ ्याच्या नावें | सनु ्याकार ||
भक्तांचेनि साभिमानें | कृपा के ली दाशरथीनें | समर्थकृपेचीं वचनें | तो हा दासबोध ||
वीस दशक दासबोध | श्रवणद्वारें घेतां शोध | मननकर्त्यास विशद | परमार्थ होतो ||
वीस दशक दोनीसें समास | साधकें पाहावें सावकास | विवरतां विशेषाविशेष | कळों लागे ||
ग्रंथाचें करावें स्तवन | स्तवनाचें काये प्रयोजन | येथें प्रत्ययास कारण | प्रत्ययो पाहावा ||
देहे तंव पांचा भतू ांचा | कर्ता आत्मा तेथींचा | आणी कवित्वप्रकार मनश
ु ाचा | काशावरुनी ||
सकळ करणें जगदीशाचें | आणी कवित्वचि काय मानश
ु ाचें | ऐशा अप्रमाण बोलण्याचें | काये घ्यावें ||
सकळ देह्याचा झाडा के ला | तत्वसमदु ाव उडाला | तेथें कोण्या पदार्थाला | आपल
ु ें म्हणावें ||
ऐसीं हें विचाराचीं कामें | उगेंच भ्रमों नये भ्रमें | जगदेश्वरें अनक्र
ु में | सकळ के लें ||
१२०
।।जय जय रघुवीर समर्थ।।