Professional Documents
Culture Documents
Sy Ba Mil-1
Sy Ba Mil-1
B. A. (Marathi)
Second Year
MIL 1
All rights reserved. No part of this publication which is material protected by this copyright notice may be reproduced
or transmitted or utilized or stored in any form or by any means now known or hereinafter invented, electronic, digital
or mechanical, including photocopying, scanning, recording or by any information storage or retrieval system, without
prior written permission from the Publisher.
Information contained in this book has been published for School of Open Learning, Savitribai Phule
Pune University, Pune by VIKAS Publishing House Pvt. Ltd. and has been obtained by its Authors from
sources believed to be reliable and are correct to the best of their knowledge. However, the Publisher and
its Authors shall in no event be liable for any errors, omissions or damages arising out of this information
and specifically disclaim any implied warranties or merchantability or fitness for any particular use.
Regd. Office: A-27, 2nd Floor, Mohan Co-operative Industrial Estate, New Delhi 1100 44
घटक १
१.१ भाषा आणि व्यक्तिमत्त्व विकास : सहसंबंध
१.२. लोकशाहीतील जीवनव्यवहार आणि प्रसारमाध्यमे
१)
घटक २ प्रसारमाध्यमांसाठी लेखन
२.१ वृतपत्रांसाठी बातमीलेखन आणि मुद्रितशोधन
२.२. नभोवाणीसाठी भाषणाची संहितालेखन
२.३ दूरचित्रवाणी - माहितीपटासाठी संहितालेखन
87
भाग- २ नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांसाठी मराठी
घटक १
१.१. भाषा, जीवनव्यवहार आणि नवमाध्यमे/समाजमाध्यमे
१.२. नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांचे प्रकार : ब्लॉग, फेसबुक,
ट्विटर
२) १.३ नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांविषयी साक्षरता, दक्षता, वापर
आणि परिणाम
घटक २
२.१ वेबसाईट आणि ब्लॉग, ट्विटरसाठी लेखन
२.२. व्यावसायिक पत्रव्यवहार
मराठी भाषिक संज्ञापनकौशल्ये - नवमाध्यमे
आणि समाजमाध्यमांसाठी मराठी
अनुक्रमणिका
घटक १ 9
१.१ भाषा आणि व्यक्तिमत्त्व विकास : सहसंबंध
१.२. लोकशाहीतील जीवनव्यवहार आणि प्रसारमाध्यमे
१.१. प्रस्तावना 9
१.२. उद्दिष्टे 10
१.३. भाषेच्या व्याख्या 11
१.४. भाषा आणि व्यक्तिमत्व विकास : सहसंबंध 21
१.५. सारांश 26
१.६. महत्वाचे शब्द 26
१.७. सरावासाठी प्रश्न 27
१.८. अधिक वाचनासाठी पुस्तके 27
१.२. लोकशाहीतील जीवनव्यवहार आणि प्रसारमाध्यमे 28
१.२.१ प्रस्तावना 28
१.२.२. उद्दिष्टे 30
१.२.३ लोकशाहीतील जीवनव्यवहार 30
१.२.४. प्रसारमाध्यमे 35
१.२.५. भारतीय राज्यघटना आणि प्रसारमाध्यमे 36
१.२.६. लोकशाहीचा चौथा खांब 37
१.२.७. प्रसारमाध्यमांचे ठळक विशेष 38
१.२.८. प्रसारमाध्यमे आणि संसदीय विशेष अधिकार 38
१.२.९. प्रसारमाध्यमे आणि न्यायालये 39
१.२.१०. प्रसारमाध्यमे व इतर कायदे 39
१.२.११. प्रसारमाध्यमाची तत्त्वे 40
१.२.१२. सारांश 40
१.२.१३. महत्वाचे शब्द 41
१.२.१४. सरावासाठी प्रश्न 41
१.२.१५. अधिक वाचनासाठी पुस्तके 41
NOTES
१.१. प्रस्तावना
'बृहदारण्यकोपनिषदा'त जनकाने याज्ञवल्क्य याला विचारले होते: सूर्य अस्ताला
गेल्यावर, अग्नि विझल्यावर माणसाजवळ कोणता प्रकाश असतो? तेव्हा याज्ञवल्क्याने
उत्तर दिले होते: भाषा हा आपला प्रकाश असतो. कारण अंधारात काम करताना आपले हात
दिसत नाहीत, पण आपण ऐकू शकतो आणि त्या दिशेने जाऊ शकतो. हे वाचताना लक्षात
येते की भाषेच्या अंगची प्रकाशमानता हा तिचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. भाषेद्वारेच
आपल्याला जगाची जाणीव होत असते.
भाषा हीच मुळात व्यक्तीच्या भावजीवनाचे अस्तर असते. साहित्य, समाज अथवा
कला, संगीत ,नाट्य, चित्रपट, रंगभूमी, व्यवहार, बाजारपेठा ,सण-उत्सव काहीही घ्या...
या सर्वच क्षेत्रात भाषेचे स्थान निर्विवाद व्यापक व प्रभावी आहे.
शब्द हे अर्थाचे वाहक होत सहाजिकच ज्ञानप्राप्तीचे साधन शब्दच ठरतात.
विद्यार्थीदशेमध्ये शब्दब्रह्माची उपासना करायची ती त्यासाठीच. भाषेतील प्रकाशाचा
अनुभव उपनिषद आकारांनी जसा वर्णन केला आहे, तसाच संत ज्ञानेश्वरांनी ही तो अनुभव
वेगळ्या प्रकारे वर्णन केला आहे. ते लिहितात:
" जैसे बिंब तरी बचके एवढे ! परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे !
शब्दांची व्याप्ती तेणे पाडे ! अनुभवावी !!"
( ज्ञानेश्वरी : अध्याय ४ ओवी २१५ ) Self-Instructional
Material 9
भाषा आणि व्यक्तिमत्त्व
विकास : सहसंबंध या ओवीतील दृष्टांतातून ज्ञानेश्वरांनी भाषेतील प्रकाश तत्वाचे सूचन केले आहे. भाषेचे,
शब्दांचे सामर्थ्य स्पष्ट केले आहे. शब्दांमध्ये अपार अर्थवत्ता ठासून भरलेली असते. तेव्हा
NOTES सध्याच्या स्थित्यंतरातून जाताना भाषेच्या अंगचा अमीट प्रकाश आपल्याला दिशा देईल.
शब्द सामर्थ्याचे मोजमाप जरी अशक्यप्राय असले तरी शब्दांच्या अंतरंगात शिरकाव
करून घेण्याची युक्ती हस्तगत झाली, तर ज्ञानाच्या महालाची कवाडे सताड उघडी होतात.
असा ज्ञानदेवांचा निर्वाळा आहे.
मक्याच्या कणसांची सालं काढल्याखेरीज आतील दाण्यांचे दर्शन होत नसते. तशीच
ही शब्दार्थाला भिडण्याची प्रक्रिया. लौकिक काय अथवा पारलौकिक काय, ज्ञान
संपादनाच्या प्रांतात शब्दांचे आणि पर्यायाने भाषेचे पायाशुद्ध ज्ञान अनिवार्य ठरते ते यासाठी.
आमच्या भाषांना खरंतर हजारो वर्षांची समृद्ध वांग्मयीन परंपरा आहे. हा मोठाच
सांस्कृतिक वारसा आहे. पण आपला भाषाविषयक दृष्टिकोन भाषांच्या विकासाला पूरक
असायला हवा. शिक्षणतज्ज्ञ वा. ब. पटवर्धन यांनी म्हटले आहे की, आपल्या भाषा या
आपल्या पूर्वजांच्या आत्म्याचे नि:श्वास आहेत.
एकंदरीत ,प्रत्येक भारतीय व्यक्तीने आपली भाषा ही आपली चौथी मुलभूत गरज आहे
अशा विचारातून वागायला सुरुवात केली पाहिजे. भाषा आणि साहित्य यांची पालखी
समर्थपणे पुढे नेणारे भोई तयार होणे गरजेचे आहे.
भाषेद्वारे माणसाच्या भावभावना व्यक्त होत असतात. मनातील विचार एकमेकांना
सांगता येतात. म्हणून समाजातील व्यवहार भाषेशिवाय होऊ शकत नाही. आज काळ
बदलला आहे. भाषेमध्ये खूप बदल झालेलाही आपल्या लक्षात येतो आजचे जागतिकीकरण,
उदारीकरण, खाजगीकरण ह्या गोष्टीचा भाषेवरही परिणाम झालेला आहे. म्हणून आजच्या
या २१ व्या शतकामध्ये मानवी समाजाकडे पाहिल्यानंतर माणूस भाषेशिवाय राहू शकत नाही
हे तेवढेच सत्य आहे.
१.२. उद्दिष्टे
१. प्रगत भाषिक कौशल्यांची क्षमता विकसित करणे.
भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. व्यक्ती आणि समूह या मध्ये भाषा ही दुवा
म्हणून ओळखली जाते. संदेश प्रक्रिया ही विकसित करण्यासाठी भाषेची गरज आहे. भाषा
Self-Instructional विज्ञानाच्या अभ्यासकांनी भाषेच्या काही व्याख्या केल्या आहेत. त्या आपल्याला पुढील
Material 10 प्रमाणे सांगता येतात :
भाषा आणि व्यक्तिमत्त्व
१.३. भाषेच्या व्याख्या विकास : सहसंबंध
NOTES
१. डॉ. ना. गो. कालेलकर
मूळ आशयाशी कार्यकारण संबंध नसलेल्या ध्वनी संकेतांनी बनवलेली, समाज
व्यवहाराला साहाय्यभूत अशी ‘भाषा’ ही एक पद्धती आहे.
२. एडवर्ड सपिर
कल्पना, भावना, इच्छा दुसऱ्याला सांगण्याचे व स्वतःच्या इच्छेवर असणारे मानवी
साधन म्हणजे भाषा.
३. नॉम चॉमस्की
अगदी मोजके नियम वापरून अगणित वाक्य तयार करणारी व्यवस्था म्हणजे भाषा.
४. सोस्यूर
भाषा ही एक चिन्हव्यवस्था आहे. ती कोणत्याही कारणपरंपरेने तयार झालेली नाही. ती
एक सर्वाधिक महत्त्वाची समाजाच्या धारणेसाठी आवश्यक असणारी सामाजिक व्यवस्था
आहे.
५. हॉकेट
भाषा ही परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते. भाषेच्या वापराचे
रितीरिवाज समाजाकडून व्यक्तीला मिळतात. भाषेचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे दुसऱ्याला
काही देणे, आपले विचार ऐकविणे यासाठी होतो. म्हणून भाषा ही एक संप्रेषण व्यवस्था
आहे आणि ती अधिक गुंतागुंतीची व सक्षम आहे.
७. श्री. न. गजेंद्रगडकर
यादृच्छिक ध्वनी संकेत यावर आधारलेली आणि समाज व्यवहाराला साहाय्यभूत अशी
पद्धती म्हणजे भाषा होय.
८. गं. ब. ग्रामोपाध्ये
भाषा म्हणजे साध्या व विपक्षितार्थरहित अशा नादलहरीपासून संपूर्ण व अर्थपूर्ण अशा
वाक्यरचनेपर्यंत चढत जाणाऱ्या आकृतिबंधाच्या श्रेणी व त्या सर्वांची मिळून झालेली
एकजीव संघटना होय.
९. प्र. न. जोशी
मनातील विचार आणि कल्पना व्यक्त करण्यासाठी मुखावाटे निघालेल्या ध्वनीचा सार्थ Self-Instructional
समूह म्हणजे भाषा. Material 11
भाषा आणि व्यक्तिमत्त्व
विकास : सहसंबंध १०. भाषा म्हणजे केवळ शब्द नसून मनातील भाव समोरच्यापर्यंत पोहचविण्याचे
माध्यम म्हणजे 'भाषा' होय .
NOTES
११. ध्वनी व अर्थ यांची सांगड घालणारी चिन्हांकित व्यवस्था म्हणजे भाषा होय.
प्रस्तुत व्याख्यांमधून भाषेच्या स्वरूपाविषयी माहिती मिळते. आपल्या मनातील आशय,
विचार, भावना व्यक्त करणारे व परस्परांशी संवाद साधणारे ते एक प्रभावी माध्यम आहे.
म्हणून भाषेद्वारे भाषिक कौशल्याचाही विचार आपण करणे गरजेचे आहे, त्यासाठी आपण
भाषिक कौशल्याचा परिचय थोडक्यात करुन घेणार आहोत.
भाषिक कौशल्ये :
व्यक्तिमत्त्व विकासासाठी भाषिक कौशल्ये अवगत करणे गरजेचे असते. व्यक्तिमत्त्व
विकास आणि भाषिक कौशल्ये यांचा परस्परसंबंध आहे. या कौशल्याने व्यक्तिमत्त्वाची
योग्य अशी जडण - घडण होते. भाषिक कौशल्याच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व
विकासात विशेष भर पडते. भाषिक कौशल्यात श्रवण, वाचन, लेखन, संभाषण, भाषण ही
प्राथमिक कौशल्ये आहेत. त्यांचा आपण येथे विचार करणार आहोत. ' आपल्याला काय
येते' , यापेक्षा काय येत नाही; हे ज्याला ठाऊक तो खरा ज्ञानी!' असे एका विचारवंताने
म्हटले आहे. ज्ञान हे माणसाला घडविते, पंख देते आणि ज्ञानभरारी घेण्यास प्रवृत्त करते;
म्हणून ज्ञान अवगत करण्यासाठी काही कौशल्यांची गरज असते. पूर्वापार वाचन, लेखन व
आकडेमोड ही तीन कौशल्ये सांगण्यात आलेली आहेत. या घटकांच्या अंतरंगात आपण
डोकावलो की, आपला या कौशल्याच्या बाबतीत विकास होत जातो. भाषिक कौशल्ये ही
नुसती शिकण्यासाठीच उपयोगी पडतात असे नाही तर हीच जीवन व्यवहाराची सुद्धा
कौशल्ये ठरतात. ज्ञान आणि जीवन यांची एकत्रित गुंफण करण्यासाठी त्यांचा आपणाला
Self-Instructional नक्कीच उपयोग होतो. आपण जेव्हा श्रवण करत असतो, तेव्हा त्या गोष्टीत एकरूप होणे
Material 12 महत्त्वाचे असते. बोलताना मनातले विचार स्पष्ट व प्रामाणिकपणे इतरांना सांगणे महत्त्वाचे
भाषा आणि व्यक्तिमत्त्व
ठरते. लेखन करताना त्यातील आशय वाचकांपर्यंत पोहोचला पाहिजे, याचे भान ठेवायला विकास : सहसंबंध
हवे. याच पद्धतीने इतर कौशल्यांची तंत्रे आत्मसात करावी लागतात.
NOTES
भाषिक कौशल्ये
• वक्ता जर फार भरभर किंवा फार सावकाश बोलत असेल, तर श्रवणात अडथळा
येतो.
• वक्त्याच्या उच्चारांत दोष असेल तर श्रोत्यांचे श्रवण परिणामकारक होऊ शकत नाही.
• फारच क्षुल्लक कारणांनी अवधान विचलित होऊ देण्याची खोड श्रवणाला मारक
ठरते. सभागृहात ये-जा करणे, कुजबुज करणे इ. मुळे वक्त्याकडे दुर्लक्ष होते.
त्यामुळे श्रवण परिणामकारक होत नाही.
• व्यक्तिमत्त्वविकास साधणे.
• अध्ययन करणे.
२. संभाषणकौशल्य व भाषणकौशल्य
संपर्क साधण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात आपण बोलण्याच्या क्रियेचा वापर करतो.
संभाषणाचे किंवा बोलण्याचे कौशल्य आपल्याला अवगत असेल तर आपले हेतू साध्य
व्हायला त्यांची मदत होते. आपण बोलतो तेव्हा हेतुपूर्वक तर बोलतोच, परंतु ते बोलणे
विचारपूर्वकही करतो. विचारपूर्वक बोलण्यामागे आपली अनुभवाने, सरावाने संपादन
केलेली कौशल्ये असतात. चांगल्या बोलण्याच्या कौशल्यामुळे आपण यशस्वी होतो.
वक्तृत्व व संभाषण या मानवी जीवनातील महत्त्वाच्या कला आहेत. या स्पर्धात्मक
जगामध्ये परिश्रम जेवढे आवश्यक, तेवढेच तुमचे चांगले बोलण्याचे कौशल्यही आवश्यक
ठरते. एखाद्याकडे आकर्षक व्यक्तिमत्त्व नसेल तर त्याची उणीव रसाळ वाणीने, मुद्देसूद व
आकर्षक भाषण/संभाषण शैलीने भरून काढता येईल. तुमचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असेल,
परंतु वाणी नीरस व भाषणशैली निष्प्रभ असेल, तर तुम्हाला फारसे यश मिळणार नाही.
• सभाधारिष्ट् हवे.
• जसे जीवन, जशी साधना तसे वक्तृत्व घडते. शास्त्र, तंत्र व मंत्र नेपथ्यासारखे त्याच्या
मदतीसाठी उभे राहते.
• वैचारिक बैठक पक्की हवी. तिचा विकास व प्रवास हा वाचन, चिंतन, अनुभव किंवा
अनुभूती यावर अवलंबून असतो.
३. वाचन कौशल्य
Self-Instructional वाचन म्हणजे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा....खरंतर वाचन हे परीक्षेसाठी नसते.
Material 16 अक्षर समजणे व ते वाचता येणे हा कौशल्याचा एक भाग आहे. पण वाचलेल्या गोष्टीमुळे
भाषा आणि व्यक्तिमत्त्व
ज्ञान मिळणे ,त्यामुळे विचार प्रवृत्त होणे, चिंतनशीलतेकडे झुकणे इत्यादी गोष्टी जेव्हा विकास : सहसंबंध
घडतात तेव्हा वाचन प्रक्रिया पूर्णत्वाला पोहोचते व हेच वाचक समाजात वैचारिक चळवळ
घडवू शकतात. असे वाचक स्वतः वाचलेले आणि त्यानंतर काही सुचलेले विचार NOTES
समाजापुढे वैशिष्ट्यपूर्ण शैलीत मांडतात. त्यातूनच पुढे सामाजिक उत्थानाची प्रक्रिया सुरू
होते. आशयसंपन्न पुस्तकांनी वाचक घडतो, तसेच या घडलेल्या वाचकांकडून दुसरी
आशयसंपन्न साहित्यनिर्मिती देखील होते म्हणजे या क्रिया परस्परपूरक आहेत.
भाषेच्या एका अंगाचा वाचनाचा प्रधान हेतू हा देवाण-घेवाण हाच राहणार आहे.
वाचकांकडून लेखकाच्या लिपिबद्ध संदेशाला मिळणारे वेगवेगळे प्रतिसाद एकापुढे एक
मांडत गेलो. वाचन प्रक्रियेच्या प्रमुख पायऱ्या म्हणजे अक्षरे, शब्द, वाक्य, त्याचा उच्चार,
त्याचे आकलन, अर्थात अर्थ समजून घेणे व त्यावर स्वतःच्या बुद्धीनुसार क्रिया प्रतिक्रिया
व्यक्त करणे व जे काही त्यातून बोध होईल त्यानुसार वर्तनात बदल करणे.
विद्यार्थ्यांची स्वतःची विचारशक्ती व शिक्षकाने त्याची जागृत केलेली चिकित्सक वृत्ती
या दोहोंचा योग्य संगम घडला की वाचक घडण्याची प्रक्रिया योग्य दिशेने सुरू होते. 'सुजाण
वाचकत्व' ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे .वाचन हे एका रात्रीत जन्माला येणारी
गोष्टच नाही.त्यासाठी अनुभव व प्रयत्न या दोहोंची सांगड घालावी लागते.
वाचनावर काहीसे प्रभुत्व आल्यानंतर लिखित शब्द आणि अर्थ या दोन्हींच्या मधल्या
दुव्याच, उच्चारित शब्दांचे प्रयोजन संपून जाते आणि प्रवास भरभर होऊ लागतो. लिखित
शब्द समोर दिसता क्षणी संलग्न अर्थ आपल्या मनात उमटतो. प्रथम शब्द भरभर वाचता
येतात. मग सोप्या वाक्यातल्या शब्दांचे अर्थ जुळवता येतात. त्यानंतर गुंतागुंतीची वाक्य ,
समग्र परिच्छेदाचे अकलन, लेखाच आकलन, एकूण पुस्तकाचे आकलन, अशी क्रमाक्रमाने
व्याप्ती वाढत जाते.
क्षमतापूर्ण वाचनासाठी वेगवेगळ्या वेगाने वाचण्याचा सराव केला पाहिजे. कारण
गणिताचे सूत्र, कायदेविषयक लिखाण काळजीपूर्वक वाचावे लागते तर मनोरंजनात्मक
कथा, कादंबरी झटकन वाचता येते .वाचन कौशल्याचे शास्त्रीय ज्ञान प्राप्त करण्यासाठी,
पुस्तक चाळून त्यातील सर्वसाधारण कल्पना समजून घेऊन त्यासंदर्भात पडलेल्या प्रश्नांची
नोंद करणे गरजेचे असते व नंतर प्रश्नांची उत्तरे मिळाली की आशयाची पुनरावृत्ती करून
ग्रहण क्षमता वाढवणे शक्य असते साहित्य वाचन प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा घटक
गुणवत्तापूर्ण वाचन महत्त्वाचे असते. वाचकाचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, त्याच्या
आवडीचे विषय, त्याची बुद्धिमत्ता व संवेदनशीलता, त्याचे अनुभव समजून घेण्याची
प्रगल्भता, पुरेशी एकाग्रता, त्याचा भावनिक विकास, वाचनासाठी वेळ मिळेल तेव्हा तत्पर
असणे. विषयाचे आणि भाषेचे पूर्वज्ञान आणि वाचण्यामागचे मागचे उद्दिष्ट किंवा हेतू.
लेखक आपल्या कल्पनेच्या जोरावर प्रतिसृष्टी निर्माण करत असतो, विचारांचे नवीन
नवीन अनुबंध मांडत असतो, आपल्या वाचन कौशल्याच्या जोरावर ती प्रतिसृष्टी
कल्पनाविश्व पुन्हा निर्माण करत असतो. विचारांचे अनुबंध उलगडत असतो. म्हणून वाचन
ही एक सर्जनशील कला आहे. ग्रंथ आपले मित्र आहेत की शत्रू.... हे विशिष्ट ग्रंथ कसे
,कोणत्या हेतूने लिहिले आहेत यावर अवलंबून आहे. चिरंतन मूल्यांचा वारसा जपणारे
दर्जेदार अभिजात साहित्य कोणते आणि पोकळ विचारांचे सवंग उथळ, साहित्य कोणते
त्याची पारख करण्याची जबाबदारी वाचन प्रक्रियेत घडत असते. अशी पारख करता
येण्यासाठीच वस्तुनिष्ठ, तर्काधिष्ठित ,शास्त्रीय विचारसरणीची गरज असते .म्हणूनच Self-Instructional
चिकित्सा प्रधान वाचन हे उच्च पातळीचे वाचन कौशल्य अवगत करणे महत्त्वाचे. Material 17
भाषा आणि व्यक्तिमत्त्व
विकास : सहसंबंध साहित्य वाचनात अगणित व्यक्तिगत फायदे व सामाजिक फायदे दडलेले असतात.
वाचनाची सवय होणे यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. सवय लागल्यानंतर अधिक
NOTES आशयपूर्णपूर्ण, अर्थपूर्ण वाचनाकडे वळता येते.
चिकित्सक विचार करण्याची पात्रता येण्यासाठी एकूण साहित्यिक वाचन दांडगे असावे
लागते. उघड्या डोळ्यांनी जगाचा अनुभव घेण्याची संवेदनशीलता असावी लागते. व्यापक
दृष्टिकोन ,अनुभव आणि चिंतनशील वृत्ती यांचा विकास होण्यासाठी साहित्य वाचनाची
प्रक्रिया आणि आवश्यकता समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
वाचन हे एक महत्त्वाचे अभ्यास कौशल्य आहे. वाचन म्हणजे छापलेल्या मजकुराचा
अर्थ लावणे अशी आपली एक कल्पना आहे. वाचनाची क्रिया दिसते तितकी साधी नसते.
वाचन प्रक्रिया गुंतागुंतीची असते. आपण वाचतो तेव्हा आपणाला अक्षराच्या आकारावरून
अक्षरे कळतात. अक्षरावरून शब्दबोध होतो. शब्दाचा अर्थ लावताना आपले पूर्वज्ञान,
आपल्या कल्पना आणि हेतू यांच्या साहाय्याने मजकुराचे आकलन होते. मजकुराच्या
आकलनाबरोबर महत्त्वाच्या मुद्द्यांची गुंफण होऊन विचारसूत्र तयार होते. ह्या विचारसूत्रांच्या
साहाय्याने मजकुराचा एकेक भाग क्रमाक्रमाने ग्रहण केला जातो. आपली बौद्धिक पात्रता,
मानसिक घडण, शारीरिक क्षमता, आजूबाजूचे वातावरण ह्यांचा आपल्या वाचनक्षमतेवर
कमी- अधिक प्रमाणात प्रभाव पडत असतो. वाचन ही काही निसर्गदत्त देणगी नसून ते एक
कौशल्य आहे आणि म्हणूनच ते अभ्यासाने प्रयत्न करून आत्मसात करता येते
वाचनप्रक्रियेतील घटक :-
शब्दबोध वाचनदिशा पुनर्दृष्टिक्षेप
वाचनप्रक्रियेतील घटक
दृष्टीचा आवाका आकलन
रसग्रहण पातळी
मूल्यमापन पातळी
Self-Instructional
Material 18
भाषा आणि व्यक्तिमत्त्व
वाचनाचे फायदे विकास : सहसंबंध
• बहुश्रुतता वाढते.
• जिज्ञासापूर्ती होते. NOTES
• भाषाकोश समृद्ध होतो.
• शब्दांचे विविध प्रकारचे उपयोग समजतात.
• कल्पनाशक्तीचा विकास होतो.
• संस्कृती आणि परंपरेची ओळख होते.
४. लेखन कौशल्ये
आपल्या मनातील विचार इतरांना सहज समजतील अशा त-हेने योग्य शब्दात लिहिणे
म्हणजे ‘लेखनकौशल्य’ होय. लेखनप्रक्रिया घडविण्यासाठी प्रथम माहितीचे ग्रहण,
आकलन व्हावे लागते. आकलनासाठी पुन:पुन्हा वाचन, श्रवण व चिंतन व्हावे लागते.
मनात निश्चित हेतू ठेवून, आत्मविश्वासाने, संदर्भ पुरेसे तयार झाल्यावर व भाषिक तयारी
असल्यास लेखन होते.
लेखनाचे महत्त्व
• माहिती सुसूत्रपणे स्मरणात ठेवण्यासाठी
• पुनरावलोकनासाठी
• माहिती दीर्घकाळ जतन करण्यासाठी
• प्रसारित करण्यासाठी
• वेळ वाचविण्यासाठी
• व्यवहार सुकर, नेटका व व्यक्तिगत जवळीकीचा वाटण्यासाठी
• आत्माविष्कार व स्वयंमूल्यमापनासाठी
लेखनातील अडचणी
• मानसिक तयारी नसणे.
• आत्मविश्वास नसणे.
• न्यूनगंड वाटणे.
• लिहिण्यायोग्य विषय स्वत:जवळ नसणे.
• लिहिण्याची गरज वाटत नसणे.
• पूर्वतयारी केलेली नसणे.
• तंत्रपद्धती माहिती नसणे.
• पुरेसा वेळ नसणे.
• फार मोठे कष्ट वाटणे.
• परिश्रम करण्याची तयारी नसणे.
• दृष्टीदोष,श्रवणदोष असणे.
• योग्य वातावरण,पुरेसे लेखनसाहित्य, जागा नसणे.
२. डोळ्यांना सहज दिसेल असे स्पष्ट, सुटे, मोकळे, सुवाच्य लिहिणे म्हणजे
सुलेखन होय.
• वाचता येईल असे सुवाच्य मोठे अक्षर असावे.
• सुटे, सरळ, एकसारखे अक्षर असावे.
• नवीन माहितीची भर घालण्यासाठी पुरेशी जागा हवी.
• आवश्यक तेथे अधोरेखा, अंक, चौकटी, रंगीत पेन यांचा वापर करावा.
• शब्दांत, वाक्यांत, परिच्छेदात पुरेसे अंतर हवे.
• सर्व बाजूंनी पुरेसा समास असावा.
३. प्रिन्स मोर्टन: 'संपूर्ण जैविक गुण आणि अर्जित प्रवृत्ती ह्यांच्या समग्रतेला व्यक्तिमत्त्व
म्हणावे.'
वरील दिलेल्या व्याख्यांवरून असे म्हणता येईल की, प्रत्येक माणसाचे आंतररुप आणि
बाह्यरूप हे त्याच्या व्यक्तीमत्वाचे गुण दोष असे म्हणता येईल. हे गुणविशेष लक्षात घेऊन
गुणविशेषांचा संघटित आकृतिबंध म्हणजे व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. असेही म्हणता
येईल की, व्यक्तिमत्त्व म्हणजे आनुवंशिक व सामाजिक प्रक्रियाद्वारा संपादन केलेल्या
गुणांचे व लक्षणांचे सुसंघटित, गतिशील असे समग्ररूप होय.
व्यक्तिमत्व विकास
भावनिक सामाजिक
३. समाजाचा प्रभाव :-
व्यक्ती हा समाजाशिवाय राहू शकत नाही. अनादी काळापासून व्यक्तीला समूह करुन
राहण्याची सवय आहे. म्हणून व्यक्ती आणि समाज यांचा परस्पर संबंध आहे. व्यक्तीचा
जसा समाजावर प्रभाव पडतो तसाच समाजाचा व्यक्तीवर प्रभाव पडत असतो. समाजात
प्रत्येक व्यक्तीचा निरनिराळा दर्जा असतो व त्या दर्जानुसार त्याची कार्ये ठरतात. भारतासारख्या
देशात विविध जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक राहतात म्हणून या देशामध्ये सामाजिक दर्जा
व्यवसायानुसार आणि जातीनुसार या दोन पातळ्यांवर ठरतो. व्यक्तीच्या दर्जानुसार समाजात
व्यक्तीला कार्य करावे लागते. समाजाचे व्यक्तीवर नियंत्रण असते. रूढी, परंपरा, सामाजिक
नीतिनियम इ. चा व्यक्तीच्या जीवनशैलीवर व्यापक प्रभाव पडतो. समाजाच्या नियमांचे
उल्लंघन करून मनाला वाटेल तसे मनुष्याला वागता येत नाही. समाजात राहून मनुष्याला
सामाजिक आदर्शांचा अंगीकार करावा लागतो. समाजात काही लोक प्रस्थापित नियमांना
विरोध करणारे असतात, तर काही परंपराप्रिय असतात. व्यक्ती व समाजाच्या अशा
संघर्षामुळे व्यक्तिमत्त्वविकासात अनेक अडचणी निर्माण होतात. प्रत्येकजण आपापल्या
सदसद्विवेकाला अनुसरून ह्या अडचणीचे निवारण करण्याचा प्रयत्न करतो व त्यातून
त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे स्वरूप निश्चित होते.
१.५. सारांश
भाषा भावनाविकासाला साहाय्य करणारी आहे. बुद्धीबरोबर भावनेचा विकास होणे,
व्यक्तिविकासाच्या दृष्टीने आवश्यक आहे. अंत:करण संवेदनक्षम असणे, इतरांच्या सत्प्रवृत्त
भावनांशी समरस होता येणे, हीच सुसंस्कृतता आणि रसिकता हे भाषेमुळे सहजशक्य आहे.
त्यातूनच व्यक्तिमत्त्वविकास घडून येतो. भाषा ही प्रामुख्याने सामाजिक विनिमयासाठी आहे.
त्या विनिमयाला आरंभ आत्मनिवेदनापासून होतो. स्वत:च्या गरजा, विचार व भावना
दुसऱ्याला कळवून त्याचे लक्ष स्वत:कडे वेधून घ्यावयाचे, त्याला आपल्या गरजा तृप्त
करण्यासाठी प्रवृत्त करावयाचे, हा भाषेचा प्रमुख उद्देश आहे; तर दुसऱ्या बाजूने इतरांचे
मनोगत जाणून घेऊन त्यानुसार आपल्या विचार वर्तनांत बदल करावयाचा, हेही भाषेचेच
कार्य आहे. अशा त-हेने भाषा, व्यक्तीचा समाजाशी संबंध प्रस्थापित करते. व्यक्तीला
विचार करण्यास माध्यम म्हणून उपयोगी पडणे हे भाषेचे दुसरे कार्य आहे. मानवांना होणारे
ज्ञान, त्यांच्या इच्छा-आकांक्षा व संकल्प भाषाच प्रकट करते. व्यावहारिक जीवनाच्या
पातळीवर दैनंदिन जीवनाच्या गरजा पार पाडण्यासाठी भाषेचा उपयोग प्रामुख्याने होतो.
भाषा हे कौटुंबिक व सामाजिक व्यवहाराचे साधन आहे. ते यशस्वी व परिणामकारक रीतीने
हाताळता येण्यासाठी एक साधणीभूत विषय म्हणून श्रवण, वाचन, संभाषण, भाषण, लेखन
ही कौशल्ये विकसित व्हायला हवीत. त्यातूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण
होऊन त्यांचा विकास होऊ शकतो.
Self-Instructional
Material 26
भाषा आणि व्यक्तिमत्त्व
१.७. सरावासाठी प्रश्न विकास : सहसंबंध
Self-Instructional
Material 27
१.२. लोकशाहीतील जीवनव्यवहार आणि
लोकशाहीतील
जीवनव्यवहार...
NOTES प्रसारमाध्यमे
१.२.१. प्रस्तावना
१.२.२. उद्दिष्टे
१.२.३. लोकशाहीतील जीवनव्यवहार
१.२.४. प्रसारमाध्यमे
१.२.५. भारतीय राज्यघटना आणि प्रसारमाध्यमे
१.२.६. लोकशाहीचा चौथा खांब
१.२.७. प्रसारमाध्यमांचे ठळक विशेष
१.२.८. प्रसारमाध्यमे आणि संसदीय विशेष अधिकार
१.२.९. प्रसारमाध्यमे आणि न्यायालये
१.२.१०. प्रसारमाध्यमे व इतर कायदे
१.२.११. प्रसारमाध्यमाची तत्त्वे
१.२.१२. सारांश
१.२.१३. महत्वाचे शब्द
१.२.१४. सरावासाठी प्रश्न
१.२.१५. अधिक वाचनासाठी पुस्तके
१.२.१ प्रस्तावना
भारत देशाचा व्यवहार हा लोकशाहीच्या माध्यमातून चालत असतो. स्वातंत्र्यापूर्वीच्या
कालखंडामध्ये देश गुलामीच्या छायेत जगत होता. १९ व्या शतकात अनेक समाजसुधारकांनी
आपल्या लेखणीमधून प्रबोधनाचे काम केले. यासाठी आपले विचार जनसामान्य माणसापर्यंत
पोहचविण्यासाठी ‘वृत्तपत्र’ या माध्यमाचा आधार घेतला. या प्रसारमाध्यमाचा उपयोग पुढे
जाऊन झाला. लोकशाहीचा चौथा खांब म्हणून प्रसारमाध्यमांना आपल्या लोकशाहीत स्थान
आहे. या सगळ्याचे विवेचन पुढे सविस्तरपणे आपल्याला पाहता येते.
स्वातंत्र्यापूर्वीच्या कालखंडात इंग्रजांनी जरी आपल्या सोयीसाठी संदेशनाचा शोध
लावला. तरी त्याचा फायदा भारतीयांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर स्वातंत्र्यानंतर घेतला.
वृत्तपत्रातून, आकाशवाणीतून, दूरदर्शन या सगळ्या प्रसारमाध्यमांचा वापर करून जनतेला
बळ देण्याचे काम केले.
भारतीयांच्या मनात राष्ट्रवादाची भावना निर्माण व्हावी आणि सर्व भारतीयांनी एक होऊन
परकीय सत्तेची हकालपट्टी व्हावी, या हेतूने तत्कालीन समाजसुधारकांनी-देशभक्तांनी
आपल्या लेखणीचा वापर केला. त्यावेळी वृत्तपत्रे हे एकमेव प्रसारमाध्यम असे सशक्त
प्रसारमाध्यम होते. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपल्याला अनेक वर्तमानपत्रांच्या योगदानाचा विचार
Self-Instructional करावा लागतो. त्यामध्ये आपले विचार सर्वसामन्य जनतेकडे पोहचावेत यासाठी महाराष्ट्र
Material 28 बालशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र काढले. त्यानंतर विष्णुशास्त्री
लोकशाहीतील
चिपळूणकर, म. फुले, लो. टिळक, गोपाल आगरकर, डॉ. बाबासहेब आंबेडकर अशा जीवनव्यवहार...
अनेक समाजसुधाराकांमुळे समाजप्रबोधन झाले.
स्वातंत्र्यानंतर मात्र ‘नभोवाणी’चा सर्व कार्यभार हा सरकारच्या नियंत्रणात आणला गेला NOTES
कारण दुसऱ्या महायुद्धात आकाशवाणीने महत्त्वाची भूमिका पार पाडली. म्हणून भारताचे
पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सर्व हक्क सरकारच्या नियंत्रणात घेतले.
अनेक आकाशवाणी केंद्रातून वेळोवेळी देशाच्या कल्याणाच्या संदर्भाच्या सूचना देण्यात
आल्या. म्हणून प्रसारमाध्यमांना खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत गेले.
आजच्या काळात विविध क्षेत्रामध्ये प्रसारमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला
दिसतो. तसेच जनसामान्यांवर सुद्धा याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर पडलेला आहे. तसेच
वृत्तपत्र, आकाशवाणी आणि दूरदर्शन ह्या प्रसारमाध्यमांचा प्रभाव खूप काळापर्यंत
समाजामध्ये टिकून आहे. परंतु आजच्या अत्याधुनिक जगामध्ये एका बाजूने सामाजिक
माध्यमांचा प्रभाव ही तेवढाच जलद गतीने लोकांच्या मनात रुजला आहे. आज सोशल
माध्यमांचा प्रसार जागतिकीकरणामुळे अधिकच घट्ट होत चाललेला आहे. आजच्या
अत्याधुनिक युगामध्ये माहितीचा विस्फोट होत चालेला आहे. म्हणून संदेशवहन इतक्या
जलद गतीने होत आहे की एक-दोन सेकंदात काय घडले आहे, याची इत्यंभूत माहिती
तत्काळ फेसबुक, टेलिग्राम, ट्विटर, इस्टाग्राम, व्हॉटस्अॅप सारख्या सोशल मीडियावर
पोहचत असते. अशा या सोशल माध्यमाच्या जलद संदेशनामुळे सर्व लहानांपासून थोरांपर्यंत
आकर्षित झाले आणि साहजिकच वृत्तपत्र, आकाशवाणीसारख्या अगोदरच्या प्रसारमाध्यमांना
नकळतपणे उतरती कळा लागली. मात्र स्वातंत्र्योत्तर काळानंतर भारतीय संविधानाने प्रदान
केलेल्या मूलभूत हक्कांपेक्षा ‘अभिव्यक्ती’ स्वातंत्र्याचा लाभ घेऊन एक नवी जीवनदृष्टी
लाभल्यामुळे भारतीय प्रसारमाध्यमांनी आपले महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले. ब्रिटिश
राजवटीमध्ये भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या गोपनीय कायद्यामुळे प्रशासकीय
स्तरावरील कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत किंवा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचत
नव्हती.
इ.स. २००० नंतर भारत सरकारने सर्व भारतीयांना माहितीचा अधिकार प्राप्त करुन
दिला. या अधिकारामुळे आपण कोणत्याही प्रकारची राजकीय, सामाजिक अथवा
प्रशासकीय माहिती केवळ स्वबळावर मिळवू शकतो. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या
देशात संविधानाने दिलेली मूलभूत हक्क आणि कर्तव्य ही त्या-त्या नागरिकाची जबाबदारी
आहे. हवी ती माहिती मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारचे आमिष न देता मिळवता येते. या
माहिती अधिकारामुळे प्रसारमाध्यमांचेही स्थान मजबूत झाले. भारतीय नागरिकांच्या मूलभूत
हक्कांना देखील अधिक बळकटी प्राप्त झाली. माहिती अधिकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य
जनतेला आपल्या हक्कांची-अधिकारांची जाणीव होऊन त्यांच्यात अपेक्षित जागरूकता
निर्माण झाली. त्यामुळेच अन्यायाविरुद्ध आवाज उठवून आपल्याला हवे ते मिळविण्याच्या
सर्वसामान्यांच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थाने सामाजिक विकासाला गती मिळाली आणि
सर्वांगीण विकासाचे चक्र गतिमान झाले व त्याआधारे सामूहिक विकासाची फळे समाजातील
शेवटच्या घटकांपर्यंत पोहचली जाऊ लागली. तसेच लोकशाहीमुळे सर्वसामान्यांच्या
जगण्यामध्ये आमूलाग्र बदल घडून आला. या जगण्याच्या जीवनमूल्यामुळे भारतासारखा
देश समता बंधुतेने राहू लागला. भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारामुळे
विकसनशील राष्ट्र विकसित होण्याच्या मार्गावर आहेत, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. Self-Instructional
Material 29
लोकशाहीतील
जीवनव्यवहार... १.२.२. उद्दिष्टे
NOTES १. लोकशाहीतील जीवनव्यवहार आणि प्रसारमाध्यमे यांचे परस्परसंबंध स्पष्ट करणे.
२. प्रसारमाध्यमांसाठी लेखनक्षमता विकसित करणे.
३. लोकशाहीतील जीवन कसे चालते आणि आजची स्थिती स्पष्ट करणे
या जगात प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचा संदर्भ प्रत्येक देशातील संविधानात NOTES
आढळतो. या संविधानात काही कलमे अशी आहेत त्यामुळे प्रत्येक पत्रकार आपले कार्य
सुव्यवस्थितपणे करू शकतो. प्रसारमाध्यमांतील लोकांना जे स्वातंत्र्य मिळते त्यावरून त्या
देशातील नागरिकांचे स्वातंत्र्य ठरते. आज भारतातील प्रसारमाध्यमे लोकशाहीत अपेक्षित
असलेले स्वातंत्र्य उपभोगत आहे. भारतात वृत्तपत्राची सुरूवात मुख्यत्वेकरून स्वातंत्र्यपूर्व
काळात इंग्रजांच्या जुलूम व अत्याचारापासून बचावासाठी झाली. सर्वप्रथम प्रसारमाध्यमातील
पत्रकाराच्या लेखणीचे अस्त्र म्हणून इंग्रजांना विरोध दर्शविण्यासाठी २९ जानेवारी १७८०
मध्ये ‘जेम्स हिकी’ यांनी 'बेंगॉल गॅझेट' नावाचे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले. १७८९ मध्ये
बॉम्बे मध्ये 'बॉम्बे हेरॉल्ड' नावाच्या वृत्तपत्राची सुरुवात झाली.
वृत्तपत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी ईस्ट इंडीया कंपनीच्या काळात ‘लॉर्ड वेलस्ली’ याने
सन १७९९ मध्ये 'प्रेस रेग्युलेटिंग अॅक्ट' म्हणजे प्रेस नियंत्रण अधिनियम लागू केला. या
अधिनियमामुळे वृत्तपत्रात संपादक, मुद्रक आणि मालकाचे नाव यांचा स्पष्टपणे उल्लेख
करणे असे बंधनकारक करण्यात आले. १८ जून १८५७ मध्ये इंग्रज सरकारने “गेगीग
अॅक्टची” सुरूवात केली. इ.स. १८७८ च्या अधिनियमाद्वारे वृत्तपत्रावर कठोर निर्बंध
लादण्यात आले. मॅजिस्ट्रेटना ‘व्हर्नाक्युलर अॅक्ट’मुळे सर्वाधिकार मिळाले. प्रादेशिक
भाषेतील वृत्तपत्रासाठी हे अधिनियम लागू करण्यात आले. व्हर्नाक्युलर अॅक्टमुळे
वृत्तपत्रासंबंधीचे सर्व अधिकार मॅजिस्ट्रेटकडे असल्यामुळे, मॅजिस्ट्रेटचा निर्णय हा अंतिम
निर्णय असे, त्याच्या विरोधात कोणतीही अपील करण्याची परवानगी नसे. परंतु हा नियम
इंग्रजी वृत्तपत्रांना लागू करण्यात आला नव्हता.
लॉर्ड हेस्टिंग याच्या विरोधात लॉर्ड एडम्स यांनी सन १८२३ मध्ये नियम केले. यानुसार
परवाना नसताना प्रकाशन केल्यास ४०० रु. दंड व नियमाचे उल्लंघन केल्यास मॅजिस्ट्रेट
मुद्रणालय जप्त करीत असे. कोणाचेही परवाना जप्त करण्याचा अधिकार मॅसिस्ट्रेटला होता.
त्या अधिकारामुळेच राजा राममोहन रॉय बांचे 'मिरात-उल-अखबार' हे वृत्तपत्र बंद पडले.
सन १८३५ साली गव्हर्नर जनरल चार्ल्स मेटकाफ यांनी १८२३ चे नियम रद्दबातल ठरवून
भारतीय भाषेतील वृत्तपत्रांना स्वातंत्र दिले.
सन १८५७ मध्ये भारतीय भाषेतील वृत्तपत्रावर पुन्हा एकदा ‘गदर’च्या कारणामुळे
निर्बध घालण्यात आले. वृत्तपत्राच्या प्रकाशनापूर्वी सरकारकडून नियमानुसार परवानगी घेणे
बंधनकारक होते. वृत्तपत्राने वृत्तपत्राच्या प्रकाशनापूर्वी प्रत्येक मुद्रित सामग्री, प्रकाशन आणि
मुद्रण संस्थेचे नाव देणे बंधनकारक होते. याच नियमानुसार पुस्तक प्रकाशनापूर्वी एक
महिना अगोदर पुस्तक सरकारकडे द्यावे लागत. १८७० च्या अधिनियम द्वारा ‘भारतीय दंड
संहिता कलम १२४-ए’ द्वारे राजद्रोहात्मक सामग्री प्रकाशित करणाऱ्या व्यक्तीला आजीवन
कारावास शिक्षा करण्यात येत असे.
या सर्व अधिनियमाद्वारे सरकारने वृत्तपत्रीय कायद्यात कठोर निर्बंध आणले. त्यामुळे
मॅजिस्ट्रेटला सर्वाधिक अधिकार होते. लॉर्ड कर्झनने वृत्तपत्र कायद्यात बदल घडवून त्यातील
अधिनियम अधिक कडक करण्यात आले. मॅजिस्ट्रेटला सर्वतोपरी अधिकार म्हणजेच
एखाद्या वृत्तपत्रात आपत्तीजनक मजकूर छापून आल्यास किंवा सरकार विरोधात बातमी
आल्यास वृत्तपत्राची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार देण्यात आला. पुढील काळात ‘भारतीय Self-Instructional
रक्षा विनिमय कायदा सन १९९४’ मध्ये अमलात आणला. त्यामुळे भारतातील वृत्तपत्रावर Material 35
लोकशाहीतील
जीवनव्यवहार... कडक नियंत्रण ठेवण्यात आले. त्याचेच रूपांतर १९३१ साली ‘भारतीय प्रेस अधिनियम’ व
त्यापुढील काळात १९३५ मध्ये पूर्ण स्वरूपात त्याचे रूपांतर करण्यात आले. तत्कालीन
NOTES पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी २६ जून १९७५ साली आणीबाणी लागू केल्यानंतर
वृत्तपत्रावर कठोर निर्बंध लागू केले. आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर १९७५ मध्ये ‘नवा
प्रेस अधिनियम’ अमलात आला.
१. समानतेचा हक्क
१.२.१२. सारांश
एकूणच लोकशाहीमध्ये प्रसारमाध्यमांची भूमिका ही ‘ओपिनियन् मेकर्स’ अर्थात मत
निर्मात्याची आहे हे निर्विवाद आहे. त्यामुळे जनमत तयार करण्यापासून तर जनतेचा आवाज
सत्ताधारी शासनापर्यंत पोहचविण्याचे काम प्रसारमाध्यमाद्वारेच केले जाते. ज्यामुळे
लोकशाही शासनप्रणाली बळकट होण्यास मदत होते. नागरिकांचे सार्वभौमत्व अबाधित
ठेवून लोकशाही व्यवस्था ही जिवंत ठेवण्याचे महत्कार्य आज प्रसारमाध्यमांद्वारे होत आहे.
Self-Instructional त्यादृष्टीने विचार केला तर लोकशाही व्यवस्थेमध्ये व्यक्तीला सर्वतोपरी व्यक्तिविकासाच्या
Material 40 दृष्टीने प्रवृत्त करणे, त्याचे व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवून त्याचे
लोकशाहीतील
सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैचारिकदृष्ट्या दृढीकरण करण्याची जीवनव्यवहार...
जबाबदारी प्रसारमाध्यमांनी स्वीकारलेली आहे. त्यामुळेच प्रसारमाध्यमांचे लोकशाही
व्यवस्थेमध्ये असणारे महत्त्व हे त्रिकालाबाधित आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. NOTES
त्यायोगेच मानवी आणि नैतिक मूल्यांची पाठराखण होवून लोकशाहीमूल्ये विकसित होतात
आणि लोकशाही व्यवस्थेचा पाया असणारे 'लोक' हे सर्वार्थाने बळकट होतात.
२.१ प्रस्तावना
२.२. उद्दिष्टे
२.३. वृत्तपत्राचे स्वरूप
२.३.१. बातमीचा अर्थ
२.३.२. बातमी म्हणजे काय
२.३.३. बातमीबाबत
२.३.४ बातमी शोधण्यातील कौशल्य
२.३.५. बातमीची रचना (घटक)
२.४.. बातमीची भाषा
२.५ वृत्तपत्रासाठी बातमीचे विषय
२.६. सारांश
२.७. महत्वाचे शब्द
२.८. सरावासाठी प्रश्न
२.९. अधिक वाचनासाठी पुस्तके
२.१ प्रस्तावना
प्रसारमाध्यमांची विभागणी ही दृक् प्रसारमाध्यमे आणि श्राव्य प्रसारमाध्यमे अशी केली
जाते. दृक् प्रसारमाध्यमांमध्येच अंतर्भूत असलेले माध्यम म्हणजे- मुद्रित माध्यम, प्रिंट
मीडिया. यात वृत्तपत्राचा समावेश होतो. आकाशवाणी हे श्राव्य माध्यम आहे. विविध
वाहिन्या, संगणक आणि दृक्-श्राव्य माध्यमांमध्ये विभागली जातात. या सर्व माध्यमांची
आपापली स्वतंत्र वैशिष्टे आहेत. मात्र या सर्व माध्यम प्रकारांचा समाजावर बरा-वाईट प्रभाव
पडत असतो. ‘प्रसारमाध्यम’ हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो. आजच्या
आधुनिक काळात लोकशाही व्यवस्थेमध्ये अत्याधुनिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी विविध
माध्यमांच्याद्वारे शोध घेतला जातो. ज्ञानप्राप्ती आणि ताज्या घडामोडींची माहिती देण्यासाठी
प्रसारमाध्यमे महत्त्वाची भूमिका पार पाडतात. एक व्यक्ती म्हणून व्यक्तिमत्त्व संपन्नता आणि
देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून आत्मविश्वासाने उभे राहण्यासाठी सामान्य माणूस ते
बुद्धिमंत हे प्रसारमाध्यमावरच अवलंबून असतात, असे म्हटल्यावर वावगे ठरणार नाही.
कारण प्रसारमाध्यमे हे लोकशिक्षणाची भूमिका पार पाडत असतात.हे खरे असले तरी मुद्रित
माध्यमांनाही काही लेखनकौशल्ये आपल्या माध्यमातून मांडावी लागतात.
सकाळी उठल्याबरोबर आपण चहा घेतल्यानतंर आपल्या हातात वृत्तपत्र हवे असते.
वृत्तपत्रे ही वाचकांची कुतूहलता निर्माण करणारे साधन आहे. देशाच्या सर्व कानाकोपऱ्यातील
घटना सर्वसामान्यपर्यंत पोहचवण्याचे काम हे माध्यम करत असते. म्हणून आपल्याला Self-Instructional
वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्या या सर्व समावेशक असल्याकारणाने वृत्तपत्रातील लेखन आजच्या Material 43
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन स्थितीला महत्त्वपूर्ण ठरते.
अ) बातमी म्हणजे काय? ब) बातमीची भाषा आणि मांडणी, क) एकूण माध्यमातील
NOTES बातमीचे महत्व, ड) बातमीची रचना आणि तिचे वेगळेपण या सर्वांचाच आपण अभ्यास
करणार आहोत.
‘वृत्तपत्र' म्हणजेच बातमी अथवा वृत्त देणारे पत्र म्हणजेच बातम्या देणारे, माहिती
देणारे साधन-वर्तमानपत्र होय. कोणत्याही वर्तमानपत्राचे मुख्य भांडवल असते ती बातमी.
एखाद्या चांगल्या, चवदार, चमचमीत भोजनासाठी मसाला आणि मीठ आवश्यक असते,
तसेच चांगल्या वर्तमानपत्रासाठी बातम्या आवश्यक असतात. या मूळ भांडवलावरच
वृत्तपत्राची रचना होत जाते आणि ती पूर्णत्वाला नेता येते.
२.२. उद्दिष्टे
• वृत्तपत्रांचे स्वरूप स्पष्ट करता येईल.
• वृत्तपत्रांचा इतिहास सांगता येईल.
• प्रमुख वृत्तपत्रे व त्यांचे कार्य स्पष्ट करता येईल. मराठीतल्या पत्रसृष्टीचा बदल कसा
होत गेला ह्याचे विवेचन करता येईल.
• स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर पत्रसृष्टीच्या स्वरूपातील भेदाची कारणमीमांसा करता
येईल
लोकशाहीवादी दैनिक
समाजवादी दैनिक
Self-Instructional
Material 45
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन 'कोण', 'काय', 'कोठे', 'केव्हा' आणि 'का' हे ते प्रसिद्ध 'क'कार आहेत. या सगळ्यांची
एकत्र बांधणी केली की, बातमी होऊ शकते. रोजचा अंक/वर्तमानपत्र वाचतानाही
NOTES आपल्याला त्याची कल्पना येऊ शकते. संपूर्ण जगभरातील पत्रसृष्टीत हे पाच 'क'कार
सर्वमान्य आहेत. त्यांपैकी एकही 'क'कार नसला तरी बातमी अपुरी, अर्धवट राहण्याची
शक्यता असते. याच्याच बरोबरीने हे सारे 'कसे' घडले हेही सांगण्याची आवश्यकता असते.
त्या दृष्टीने 'कसे' हाही घटक महत्त्वाचा असतो. याचाच अर्थ एकूण 'क' कार ६ होतात.
त्यांची उत्तरे असणारे तपशील बातमीच्या इंट्रोमध्ये देणे आवश्यक असते. यातील काही
उत्तरे बातमीतल्या तपशिलात येतात, ज्याने बातमीला पूर्णता प्राप्त होते.
सुरवातीला ताज्या घडामोडी म्हणजे बातमी होय. बातमी अथवा वृत्त देणारे पत्र म्हणजेच
वृत्तपत्र होय. सगळीकडच्या बातम्या देणारे पत्र म्हणजेच वृत्तपत्र. एका वाहिनीवर मध्यंतरी
NEWS या शब्दाची फोड करताना ‘North (उत्तर), East (पूर्व), West (पश्चिम)
आणि South (दक्षिण) या दिशांचा उल्लेख करून सर्व दिशांचे कव्हरेज आम्ही करतो’,
अशी जाहिरात केलेली पाहायला मिळाली. वृत्तपत्रांचे सामर्थ्य, त्यांची शक्ती बातम्यांच्या
संकलनात, सर्वप्रथम, अधिकाधिक बातम्या देण्याच्या एकूण व्यापक यंत्रणेशी जोडलेली,
सामावलेली असते.
डॉ . प्रकाश मेदनकर यांनी 'उपयोजित मराठी' या त्यांच्या ग्रंथात बातमीच्या
व्याख्या दिलेल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे...
• “बातमी म्हणजे अनेक लोकांना ज्यात रस वाटेल अशा नुकत्याच घडलेल्या घटनेची
वस्तुनिष्ठ माहिती”
• “घटना घडल्यावर ती महत्त्वाची असल्यास तिचे नि:पक्षपाती, काटेकोर निवेदन
म्हणजे बातमी.”
• “पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण (पू.प.उ.द.) या चारही दिशांच्या कक्षेत पडणारा
महत्वपूर्ण (हल्ली अंतराळात घडलेल्या घडामोडींचीही बातमी असते.)”
वरील सर्व व्याख्यांवरून घटना घडली तरच बातमी होऊ शकते, म्हणजेच समाजात
उत्सुकता व कुतूहल निर्माण करणाऱ्या घटना घडल्यानंतर ती बातमी होऊ शकते हे स्पष्ट
होते. म्हणजेच जॉन बी बोगार्टच्या मते, '’कुत्रा माणसाला चावला. ही बातमी होऊ शकत
नाही; पण माणूस कुत्र्याला चावला, ही घटना मात्र बातमी होऊ शकते.' ज्याप्रमाणे 'बातमी
म्हणजे एखादी अनपेक्षित घटना. त्या घटनेत एक वेगळेपण असणे गरजेचे आहे. एखादी
घटना लोकांना कळावी म्हणून तिची वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याजोगी माहिती म्हणजे
बातमी. अशा प्रकारे मेदनकारांच्या व्याख्यांचा ऊहापोह करता येतो.
२.३.३. बातमीबाबत :
बातमी देणे म्हणजे वस्तुस्थितीचे चित्रण करणे होय, आपले कोणतेही पूर्वग्रह बातमी
लिहिताना ठेवणे म्हणजे व्यावसायिक प्रतारणाच म्हणावी लागेल. म्हणूनच असे म्हटले जाते
की, 'Facts are sacre , but comment is free.’ म्हणजेच वस्तुस्थिती पवित्र आहे,
पण त्यावरची मते मुक्त असू शकतात. येथे वस्तुस्थिती म्हणजे घडलेली घटना अर्थात
Self-Instructional बातमी असा अर्थ अपेक्षित आहे. Facts च्या जागी आपण News हा शब्द घेऊ शकतो.
Material 46 वृत्तपत्रासंबंधी लिहिल्या गेलेल्या अनेक पुस्तकांमधून वर्तमानातील ताज्या घडामोडीबाबत
प्रसारमाध्यमांसाठी
सांगण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. लेखन
(३) न्यायालये
(९) वाङमयीन संस्था, विद्यापीठे, परीक्षा मंडळे, नाट्यनिर्मिती संस्था, आदी स्रोत
(१०) राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नेते, तसेच कामगार संघटनांचे नेते आणि
पदाधिकारी
(११) अलीकडच्या काळात बिगर शासकीय स्वयंसेवी संघटना अथवा कृतिगट यांनाही
बातम्यांचे स्रोत मानावे लागेल. सरकारी धोरणांचा, कायद्याच्या अंमलबजावणीचा एकूण
परिणाम, त्याचे जनजीवनावरील परिणाम या सर्वांबाबत वृत्तपत्रांकडे तपशीलवार माहिती
अशा संघटनांकडून अथवा कृतिगटांकडून येत असते.
२. काही वेळा, कोण, केव्हा, कोठे, कसे, काय, कधी आणि का ? या 'क' कारांनी
बातमीचा शिरोभाग लिहिणे अपेक्षित असते.
३.कधी कधी काही बातम्यांना वाङ्मयीन किंवा ऐतिहासिक संदर्भ असतात. त्यांचा
उल्लेख प्राधान्याने शिरोभागातच करणे आवश्यक असते.
६) इंग्रजी किंवा इतर भाषेतून बातमी ही भाषांतरित होत असेल तर वाचकाला आकलन
होईल अशी शब्दयोजना त्यात असावी.परभाषेतील शब्दांना पर्याय देताना स्वभाषेतील
प्रचलित शब्दांचाच वापर करावा.
९) बातमीच्या भाषेमुळे वाचकाच्या मनात संभ्रम अथवा भीती निर्माण होईल, अशी Self-Instructional
भाषिक योजना करू नये. Material 53
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन १०) वृत्तपत्रांचा वाचक हा सर्वच वयोगटातील व सर्व स्तरांतील असतो. त्यामुळे प्रत्येक
वयोगटाला साजेल अशा स्वरूपाची वाक्यरचना हवी.
NOTES
१) बातमी ही वस्तुनिष्ठ असावी. जशी घटना घडलेली असेल तसेच तिचे निवेदन
बातमीत असावे.
४) बातमीमुळे जातीय दंगली, दोन धर्मात तेढ निर्माण होवून सामाजिकस्वास्थ बिघडणार
नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
५) बातमीमुळे एखाद्या सामान्य किंवा प्रथितयश व्यक्तीची किंवा संस्थेची हेतु पुरस्पर
बदनामी होता कामा नये.
६) बलात्कार, घरगुती हिंसा, महिलांवरील अत्याचार यांचे भडक वर्णन बातमीत करू
नये. बलात्कार किंवा अन्याय झालेल्या महिलेचे खरे नाव, पत्ता यांचा बातमीत उल्लेख
करू नये त्यासाठी काल्पनिक नाव वापरावे व तसा काल्पनिक नाव वापरल्याचा निर्देशही
करावा.
२.६. सारांश
अशाप्रकारे ऐकूण, पाहून व नोंद घेऊन लिहिलेला वृत्तांन्त हा खरा अधिकृत वृत्तांन्त
असतो. अशा वृत्तांन्त प्रश्नचिन्ह उभे केले गेले तरीही वृत्तांन्तवरील खरेपणाचा तपशील
नोंदवता येऊ शकतो. बातमी लेखन करताना वर उल्लेखिलेलेली पथ्य पाळली गेली तर
बातमी लेखनाचे कौशल्य सहज हस्तगत करता येते.
Self-Instructional अजून काही उदाहरणे पुढीलप्रमाणे :
Material 54
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन
NOTES
Self-Instructional
Material 55
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन
NOTES
Self-Instructional
Material 56
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन
NOTES
Self-Instructional
Material 57
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन २.७. महत्वाचे शब्द
NOTES १. मुद्रित माध्यम : MAULTI MEDIA
२. प्रिंट मीडिया : मुद्रण माध्यम
३. बातमीचे स्त्रोत्र : News sources
४. HARD NEWS : अतिमहत्वाचे
५. SOFT NEWS : क्रीडा, मनोरंजन, पुरस्कार याबाबतच्या बातम्या
Self-Instructional
Material 58
प्रसारमाध्यमांसाठी
२.२. नभोवाणीसाठी भाषणाची लेखन
संहितालेखन NOTES
२.२.१. प्रास्तावना
२.२.२. उद्दिष्टे
२.२.३. भाषण लेखन : स्वरुप व तंत्र
२.२.४. आकाशवाणीवरील भाषणाचे स्वरूप
२.२.५. भाषण लेखनाचे तंत्र
२.२.६. आकाशवाणीवरील भाषण
२.२.७. आकाशवाणीवरील भाषण, चर्चा व मुलाखत
२.२.८. नभोभाषणाची भाषाशैली
२.२.९. नभोभाषणाची सुरुवात आणि शेवट
२.२.१०. नभोभाषणाचे विषय
२.२.११. नभोभाषणासाठी सूचना
२.२.१२ नमुना भाषण
२.२.१३. सारांश
२.२.१४. महत्वाचे शब्द
२.२.१५. सरावासाठी प्रश्न
२.२.१६ अधिक वाचनासाठी पुस्तके
२.२.१. प्रास्तावना
भाषण, चर्चा व मुलाखती हा
नभोवाणी प्रसारणाचा महत्त्वाचा भाग आहे.
वेगवेगळ्या प्रासंगिक महत्त्वाच्या विषयांवर
व प्रश्नांवर तज्ज्ञ व्यक्तींच्या भाषणातून
श्रोत्यांना उपयुक्त माहिती मिळते. ही
भाषणे सुलभ भाषेत आटोपशीर व
आकर्षक शैलीत असतात. समाजात
वेळोवेळी काही वाद, समस्या उत्पन्न होतात,
न्यावर तज्ज्ञांची चर्चा घडवून आणून
संबंधित प्रश्नांच्या वेगवेगळ्या पैलूंवर
प्रकाश टाकता यावा यासाठी चर्चा आयोजित केल्या जातात. चर्चेचे सूत्रसंचालन करणाऱ्यांची
भूमिका महत्त्वाची असते. चर्चा नियोजित आराखड्याप्रमाणे चालेल व त्यात सर्व महत्त्वाच्या
मुद्यांचा ऊहापोह होईल याची काळजी त्याने घ्यावयाची असते. नभोवाणीवरून विविध
प्रकारच्या मुलाखतीही प्रसारित होतात. त्यातून श्रोत्यांना एखाद्या प्रश्नाची, योजनेची माहिती, Self-Instructional
विशेष कर्तबगारी गाजवणाऱ्या व्यक्तीचे मनोगत, इत्यादी समजू शकते. थोडक्यात, माहिती Material 59
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन देणे, घडलेल्या घटनांच्या विविध बाजू व दृष्टिकोन पुढे आणणे या हेतूने नभोवाणीवर
भाषण, चर्चा व मुलाखत अशा विविध आकृतिबंधातून संप्रेषण घडवून आणले जाते.
NOTES नभोवाणीवरील भाषण हे साधारणत: १० मिनिटांचे असते. त्यापुढे त्याचा अवधी गेला
की तो कंटाळतो, म्हणून अगदीच अपवादात्मक परिस्थितीत १५ मिनिटांचे भाषण प्रसारित
केले जाते. नभोवाणीवरील भाषण हे लिहून काढलेले असले तरी ते निबंधवजा असून चालत
नाही. ते संभाषणवजा, अनौपचारिक शैलीतील असावे लागते. निबंध अथवा लेख हा वाचून
समजावून घ्यायचा असतो. त्यामुळे त्यात लांब पल्लेदार वाक्ये, अवघड शब्द, अवघड
युक्तिवाद, तपशीलवार माहिती आणि आकडेवारी यांचा समावेश केला तरी चालतो.
वाचकाला एखादा मुद्दा समजला नाही तर तो तेवढा भाग पुन्हा वाचू शकतो, एखादा शब्द
अडला तर शब्दकोशात त्याचा अर्थ पाहू शकतो. मुळातच लेख वाचताना त्याचे सर्व लक्ष
त्यात एकवटलेले असते. नभोवाणीच्या श्रोत्याची मन:स्थिती एवढी स्वागतशील असेलच
असे नाही. शिवाय नभोवाणीवरील भाषणातील एखादा शब्द, एखादा वाक्यांश त्याला
समजला नाही तर तेवढा भाग पुन्हा ऐकून तो समजावून घेण्याची सोय नसते. नभोभाषणातील
भाषा अतिशय सोपी असावी. त्यात अवजड कृत्रिम अलंकारिक वाक्यरचना असू नये.
लेखात ‘खालीलप्रमाणे', 'वरीलप्रमाणे', 'मागीलप्रमाणे’, असे संकेत चालू शकतात.
नभोभाषणात ते चालत नाहीत कारण नभोभाषण हे डोळ्यांऐवजी कानातून मनात उतरत
असते. लिखित मजकुरात 'व' सारखे उभयान्वयी अव्यय चालू शकते; परंतु नभोवाणीवर‘
आणि 'हे अधिक ठसठशीत, स्पष्ट अव्यय वापरणे इष्ट असते.
२.२.२. उद्दिष्टे
• नभोवाणीवरील मुलाखतींचे प्रकार व त्या कशा घेण्यात येतात यांची माहिती सांगता
येईल.
Self-Instructional • मुलाखत घेणाऱ्याने कोणती पथ्ये पाळावीत त्याच्या नोंदी करता येतील.
Material 60
प्रसारमाध्यमांसाठी
नभोवाणीवरील भाषणात फार सूक्ष्म तपशील, आकडेवारी अथवा नावांच्या याद्या लेखन
चालत नाहीत, एखाद्या प्रकल्पाचा खर्च १३२ कोटी ९७ लाख ३ हजार २३२ रुपये असा
असेल तर नभोवाणीवर सांगताना ही रक्कम १.३२ कोटी ९७ लाख रुपये अशी सांगणे उचित NOTES
ठरेल. आकडेवारी व तपशिलाचा भडिमार केला तर तो श्रोत्याच्या लक्षात तर राहत नाहीच,
उलट त्याने श्रोता कंटाळून रेडिओ बंद करतो किंवा दुसरे केंद्र लावतो. अशा प्रकारे
आपल्याला आकाशावाणी वरील भाषणाची संहिता तयार करण्याविषयीचे विस्तृत विवेचन
पुढे पाहूयात.
२. वेळेची मर्यादा लक्षात घेतली म्हणजे मग एका मिनिटाला १०० ते १२० शब्द बोलता
येतात त्यानुसार वाक्यरचना असावी.
६. संहितेचे प्रत्येक पान हे परिपूर्ण असावे. पानाच्या शेवटी वाक्य अर्धवट ठेवू नये.
वाक्य पूर्ण करून कागदावरील मजकूर संपवावा.
१. आपले भाषण कागदाच्या एका बाजूला स्पष्टपणे मोठ्या अक्षरात लिहावे म्हणजे
ध्वनिमुद्रणाच्या वेळी वाचन करताना अडचण येणार नाही.
२. भाषण कागदाच्या अर्ध्या तुकड्यांवर लिहावे. छोटे कागद हाताळणे सोपे जाते.
३. ध्वनिमुद्रणापूर्वी सर्व कागद सुटे करून, क्रमवार लावून ठेवावेत. वाचताना कागदांचा Self-Instructional
फर्र-फर्र आवाज होणार नाही याची काळजी घ्यावी. Material 65
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन ४. प्रत्येक पानावरील शेवटचे वाक्य त्याच पानावर करावे, अर्धवट वाक्य तोडून पुढील
पानावर नेले तर वाचन करताना कदाचित खंड पडण्याची शक्यता असते.
NOTES
५. ध्वनिमुद्रणापूर्वी संहितेचे काळजीपूर्वक वाचन करावे आणि त्यात अवघड उच्चार
असलेले शब्द त्याचप्रमाणे महत्त्वाचे वाक्यांश अधोरेखित करावेत. स्वल्पविराम,
पूर्णविराम, उद्गार-चिन्ह, प्रश्नचिन्ह, इत्यादी चिन्हेही स्पष्टपणे लिहावीत म्हणजे वाचन
करताना त्यांचा योग्य वापर करता येईल.
७. संपूर्ण भाषण एकाच वेगात वाचावे. मध्येच भरभर किंवा संथ वाचन करू नये.
आवाजाची तीव्रताही समान ठेवावी.
८. वाचताना तोंडाचा मचमच किंवा मिटक्या मारल्याचा आवाज होऊ देऊ नये.
९. तोंडापासून मायक्रोफोन फार जवळ अथवा फार दूर ठेवू नये. साधारणपणे १० ते १२
इंचांवर मायक्रोफोन ठेवावा.
१०. ध्वनिमुद्रणाच्या वेळी कागद फार विखरून दूरदूर ठेवू नयेत. तसे केले तर तोंड
मायक्रोफोनपासून दूर जाण्याची आणि आवाजाच्या पातळीत फरक पडण्याची शक्यता
असते.
११. आकाशवाणीवरील भाषणात नुसती माहिती लिहून चालत नाही. तर ज्यांना उद्देशून
ती माहिती सांगायची आहे, त्यांच्याशी ‘मित्रहो’, वगैरेसारखी संबोधने वापरून संवाद
साधायचा असतो. अधूनमधून ‘आता तुमच्या हे लक्षात आलं असेल’ अशासारखे
वाक्यप्रयोग करून हा संवाद सतत बोलता ठेवायचा असतो.
१३. 'असे', 'तसे', 'घेणे', 'देणे' यांऐवजी ‘असं’, ‘तसं’, ‘घेणं’, ‘देणं’ असे बोलीभाषेतील
शब्द वापरलेले आहेत.
१४. मोठी लांबलचक वाक्ये न वापरता छोटी श्रवण सुलभ वाक्ये वापरलेली आहेत.
१५. आशयाची मांडणी पहिल्या उताऱ्यात ऐतिहासिक क्रमाने केली आहे. पण नंतरच्या
भाषणात त्याचा क्रम उलटा आहे. आजच्या संदर्भाकडून भूतकाळाकडे व परत वर्तमान
Self-Instructional संदर्भाकडे असा त्याचा प्रवास आहे. त्यामुळे श्रोत्यांची उत्सुकता वाढण्यास मदत झाली
Material 66 आहे.
प्रसारमाध्यमांसाठी
१६. भाषणाच्या शेवटी सर्व विवेचनाचा मथितार्थ सांगून ‘नाणी ही राजकीय व सांस्कृतिक लेखन
इतिहासाची प्रतिनिधी कशी असतात’, हा मुद्दा ठसठशीतपणे लक्षात आणून द्यावा लागतो.
अशा प्रकारे आपल्याला नभोवाणीच्या भाषणासंदर्भात काही महत्त्वाच्या बाबी लक्षात NOTES
घ्याव्या लागतात.
उठ सासुरवाशिन बाई
उठ मध्यम राती मांड दयन तू नीट
अन् चालव बाई घरोद
गोठ्यातल्या ढोरासारखी ती राबराब राबत असते. आणि थोडं कुठे कमी-अधिक झालं
तर सासूची वटवट सुरू होते. डोळ्यांतले आसू आपले आपणच पुसून तिला कामाला
लागावं लागतं. तिला कुठलंही स्वातंत्र्य नाही. तिला आपलं म्हणणं मांडण्याची सोय नाही.
तिनं सगळं मुक्तपणे सोसायचं आणि पेलवेनासं झालं तर माहेरची आठवण काढून स्वत:च
स्वत:ची समजूत काढायची. म्हणून बहिणाबाई म्हणतात,
उठ सासुरवाशिन बाई
घे सोशीसन घे घालू नको नोवाद
कर माहेराची याद
आणि ह्या सगळ्या दिव्यातून जात असतानाच हरवलली फुकणी सापडते आणि सारे
चित्रच पालटून जाते. फुंकून फुंकून आग पाखडली जाते. तडा तडा विस्तव वाजू लागतो
आणि चुल्ल्यावर ताजी भाकर शिजू लागते. स्त्रीमन एवढ्याशा स्थितिबदलानंही हरखून
जातं. जसजशी भाकरीची टोपली भरत जाते तसतसं तिचं मनही फुलत जातं आणि ज्या
चुल्यावर ती ओरडलेली, खेकसलेली असते त्या चुल्याची मुद्रा तिला आता प्रसन्न, हसरी
वाटू लागते.
घराचं घरपण राखण्यात, त्याला सजवण्यात, त्याच्यात चैतन्याचे प्राण फुकण्यात
आयुष्यभर धडपडत असते. गुढीपाडव्याचा सण आला की घरातली पडझड दुरुस्त करा,
घर पोतारून काढा आणि सडा सारवण करून दाराशी गुढी उभारा यात ती मग्न असते.
पोळ्याचा सण आला की बैलांना पुरणाच्या पोळ्यांचा नैवद्य करताना ती बैलांच्या कष्टमय
जीवनाशी एकरूप होते. ढोरासारखं राबणाऱ्या स्त्रीला बैल हा आपला समदु:खी प्राणी
वाटतो आणि पुरणाच्या पोळ्या रांधून झाल्यावर ती एकच मागणं मागते-
भूक-तहानेचा विसर पाडणाऱ्या ह्या झोक्याच्या आंदोलनांनी तिचं पोट भरतं. ती तृप्त होते. Self-Instructional
आखाजीच्या दिवशी ती गौर सजवते, सखी-साजणींना बोलावते, टिपऱ्या फुगड्यांत नादावते. Material 69
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन इतकी खेळते, इतकी खेळते की खेळून खेळून तिचे हातपाय आंबतात. हे विसाव्याचे चार
दिवस संपले की पुन्हा शेतीच्या मशागतीला ती ताजीतवानी होऊन सरसावते. पुन्हा एकदा
NOTES आखाजीची वाट पाहत ती वर्षभर कष्टत राहते. स्त्रीचं आयुष्य पराधीन असते. नवऱ्याच्या
हातावर तिच्या सौभाग्याची रेखा आखलेली असते. तो असतो तो पर्यंत सर्व कष्ट मंगलमय
असतात. तो गेला तर कुंकवाखालची रेघ उघडी पडते, तळहातावरची धनरेषा अर्थशून्य
बनते. तेव्हा अगतिक होऊन ती विव्हळते
रडून रडून तिचे अश्रू सुकून जातात आणि एकच प्रश्नचिन्ह तिला सतावत राहतं -
एवढं असले तरी स्त्री सोशिक आहे, समजूतदार आहे. दु:ख गिळून वर्तमान साजरा
करायची तिला जी सवय आहे, ती अशा वेळी स्वत:ची समजूत काढते आणि भविष्यात
काहीही वाढून ठेवलेलं असो, ज्योतिषाजवळ ती एकच मागणी मागते
आणि मग कुंकू पुसलं गेलं तरी गोधन उरलेलं असतं, बांगड्या फुटल्या तरी मनगटातलं
कर्तृत्व शिल्लक राहिलेलं असतं, मंगळसूत्र तुटलेलं असलं तरी गळ्याची शप्पथ मागे
राहिलेली असते आणि ह्या मागे राहिलेल्या खुणांच्या जोरावर भविष्याला ती सामोरी जायला
तयार होते. एकटेपणाने, अगदी एकटेपणानं. म्हणून आजूबाजूच्या सहानुभूती दाखवणाऱ्यांना
ती म्हणते
"नका नका आयाबाया। नका करू माझी कीव
झालं झालं समाधान । आता माझा माले जीव"
सदर दिल्या गेलेल्या उदाहरणात हे स्रीच्या जीवनातील वास्तव मांडले गेले आहे. परंतु
साहित्यक्षेत्रातील असून बहिणाबाई यांच्या ‘जात्यावरच्या ओव्या’ आपले खरे जीवन
जगण्याच्या अर्थाचे विवेचन अभ्यासकाने या कवितेतून केले आहे.
Self-Instructional
Material 70
प्रसारमाध्यमांसाठी
२.२.१३. सारांश लेखन
आकाशवाणीचे भाषण पूर्वनियोजित, प्रसारणापूर्वी लिहून काढलेले असे असते. त्यामुळे NOTES
या लेखनाचेही एक तंत्र असते. ते लक्षात ठेवून 'भाषण संहिता' लिहावी लागते. आकाशवाणीचे
भाषण, लिखित संहितासमोर ठेवून केले जात असले तरी इथे लेखनाची भाषा लिखित किंवा
ग्रांथिक असून चालत नाही. त्यामुळे प्रकट भाषणाची सर्व वैशिष्ट्ये लक्षात घेऊनच हे
भाषण लिहावे लागते. वेळ मर्यादेत भाषण पूर्ण करण्यासाठी ते नीटपणे वाचताही आले
पाहिजे. त्यासाठी हे लेखन स्पष्ट, खाडाखोड नसलेले, दोन शब्दांत योग्य अंतर असलेले ,
ठळक असे असावे लागते. कधी-कधी भाषण लिहून देणाराच ते सादर करतो असे नाही.
अशावेळी भाषण वाचणाऱ्या त्या दुसऱ्या व्यक्तीलाही ते अर्थ व भावासह समजले पाहिजे.
यासाठी विरामचिन्हांचा योग्य त्या ठिकाणी, उचित वापर करणे अतिशय महत्त्वाचे ठरते.
यामुळे वाचणाऱ्याला शब्दाचा योग्य उच्चार करून आवाजात चढ-उतार करणे शक्य होते.
आकाशवाणीचे भाषण हे श्रोत्यांशी संवाद साधणारे, संभाषणवजा असते. त्यामुळे यात
‘असे, तसे, इथे-तिथे, घेणे-देणे’ असे ग्रांथिक शब्द न वापरता ‘इथं-तिथं, असं-तसं, घेणं-
देणं, राहिलं-झालं’ असे बोलीभाषेचे शब्द वापरायचे असतात. श्राव्य माध्यमासाठीचे,
श्रोत्यांना ऐकवण्याचे हे भाषण असल्याने त्याला ‘खालीलप्रमाणे, वरीलप्रमाणे, मागीलप्रमाणे’
असे शब्द चालत नाहीत. तसेच या ‘भाषणात' व 'ऐवजी' आणि हे अधिक स्पष्ट व
ठसठशीत अव्यय वापरणे योग्य ठरते.
Self-Instructional
Material 72
प्रसारमाध्यमांसाठी
२.३ दूरचित्रवाणी - माहितीपटासाठी लेखन
संहितालेखन NOTES
२.३.१. प्रस्तावना
२.३.२. उद्दिष्टे
२.३.३. संहिता आणि तिची गरज
२.३.४. माहितीपटासाठी संहिता लेखन
२.३.५. संहितालेखनाचे तंत्र-
२.३.६. माहितीपट (डॉक्युमेंटरी) म्हणजे काय ?
२.३.७. माहितीपटाची निर्मितीची प्रक्रिया
२.३.८. माहितीपटासाठी संशोधन
२.३.९. माहितीपटाची रचना
२.३.१०. माहितीपटाचे निवेदन
२.३.११. माहितीपटाचे संहितालेखन
२.३.१२. सारांश
२.३.१३.महत्वाचे शब्द
२.३.१४ सरावासाठी प्रश्न
२,३,१५ अधिक वाचनासाठी पुस्तके
२.३.१. प्रस्तावना :
श्राव्य माध्यमे मानवी संपर्क प्रक्रिया दिवसेंदिवस अधिक विकसित करीत आहेत.
मानवी संपर्क प्रक्रियेत हळूहळू होत गेलेले क्रांतिकारक बदल हे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होत
असलेले आपल्याला दिसतात. मुद्रित साधनांप्रमाणेच दृक-श्राव्य माध्यमांचेही जनसंपर्क
प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आपल्याला नाकारता येत नाही. डॉ. वि. ल. धारूरकर
दृक्-श्राव्य साधनांचे महत्त्व सांगताना म्हणतात की, “वृत्तपत्रे, गृहपत्रे, इतर जनसंपर्कपत्रिका
इत्यादीमध्ये संदेशांचे वहन होऊ शकत नाही. निरक्षरांच्या संवाद मर्यादांना छेदून जाऊन
हजारो लोकांपर्यंत पोहोचण्याचे सामर्थ्य केवळ दृक-श्राव्य साधनांमध्ये असते.”
एकाचवेळी अमर्याद लोकांपर्यंत पोहोचण्याचे दृक-श्राव्य माध्यमांच्या क्षमतेमुळेच
नभोवाणी व दूरचित्रवाणी या माध्यमांचे महत्त्व वाढलेले आहे. लोकांशी संपर्क करण्याचे हे
अत्यंत प्रभावी व परिणामकारक तसेच वेगवान माध्यम आहे. दृक्-श्राव्य साधनांमध्ये
आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, माहिती, दूरध्वनी, इंटरनेट इत्यादींचा समावेश होतो.
एखाद्या विशिष्ट संस्थेला आपला हेतू, ध्येय आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या माध्यमांचा
उपयोग करणे गरजेचे वाटू शकते. या माध्यमांच्या उपयोगातून ते अधिक लोकांपर्यंत या
गोष्टी पोहोचवू शकतात. म्हणून आजचे युग हे माध्यमांचे युग आहे आणि या माध्यमांच्या
युगामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीची तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगती झालेली आहे. Self-Instructional
चित्रपट हे दृक्-श्राव्य माध्यमांपैकी अत्यंत महत्त्वाचे माध्यम होय. चित्रपटाचा Material 73
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन जनमानसांवर होत असलेला प्रभावी असा परिणाम आपण नेहमीच पाहत असतो. साहित्य
हा समाजाचा आरसा आहे. तसेच चित्रपट सुद्धा समाजाचा एक आरसा आहे, हे म्हणणे
NOTES अतिशयोक्त ठरणार नाही. लोकांपर्यंत एखादा विषय पोहोचविण्याच्या दृष्टीने चित्रपट
अनेक दृष्टीकोनातून फायदेशीर ठरत असतात. कारण संवादाच्या प्रभावी माध्यमांपैकी
चित्रपट हे महत्त्वाचे माध्यम मानले जाते. अनेक शास्त्रज्ञांच्या मते, कानावर ऐकलेल्या
गोष्टींपेक्षा डोळ्याद्वारे पाहिलेल्या गोष्टींचा परिणाम हा अधिक असतो आणि चित्रपटातून
डोळ्यांवर दिसणाऱ्या व्हिज्युअलच्या माध्यमातून हा परिणाम अत्यंत वेगात साधला जातो.
डोळे आणि कान म्हणजे दृष्टी आणि श्रवण या दोन्ही संवेदना एकाचवेळी काम करत
असतात.
२.३.२. उद्दिष्टे
येईल.
४. लेखनाची उद्दिष्टे व प्रकार कसे निश्चित करायचे, याची माहिती सांगता येईल.
५. संहितेची भाषा कशी असायला हवी व संहितालेखनाचे तंत्र कोणते हे स्पष्ट करता
येईल.
६. दृक्-श्राव्य रूपात कार्यक्रमाची निर्मिती कशी होते, याची माहिती देता येईल .
२) आपल्याला काय सांगायचे आहे? म्हणजेच संहिता लेखनाचा हेतू/ उद्दिष्ट कोणते?
१. ज्या विषयावर माहितीपट निर्माण करायचा आहे त्या विषयावर आधारित सर्वच
मुद्द्यांचे संशोधन करणे.
३. आपल्या माहितीपटाचे नेमके स्वरूप कसे असावे यासंबंधी काही एक निश्चित करणे
आवश्यक असते. त्यासाठी विविध माहितीपट पाहून आपल्याला आपली दृष्टी निश्चित
करावी लागते. इंटरनेटवर अनेक विषयांवरचे विविध माहितीपट उपलब्ध आहेत त्याद्वारे
आपला गृहपाठ काही प्रमाणात होऊ शकतो.
७. एक चांगली कथा एका सर्वसामान्य प्रेक्षकांना नेहमीच खिळवून ठेवत असते. त्यामुळे
त्याच्या भावनेला स्पर्श करेल असे कथाविषय माहितीपटासाठी निवडणे आवश्यक आहे.
८. संहितालेखन करताना साहित्याची भाषा साधी, प्रवाही आणि आवश्यक तेथे बोली
स्वरुपाची असायला हवी. क्लिष्ट आणि अलंकारिक भाषा ही सामान्य प्रेक्षकाच्या
आकलना पलीकडची असते.
Self-Instructional
Material 76
प्रसारमाध्यमांसाठी
२.३.५. संहितालेखनाचे तंत्र लेखन
Self-Instructional
Material 77
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन २.३.७. माहितीपटाची निर्मितीची प्रक्रिया
NOTES (१) प्रत्यक्ष चित्रीकरण :
प्रत्यक्ष चित्रीकरण करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते. एखादी घटना
घडत असताना घेतलेली दृश्ये माहितीपटात अधिक प्रभावी ठरतात. उदाहरणार्थ : नर्मदा
बचाव आंदोलनाविषयी माहितीपट बनविण्याचे १९९८-१९९९ साली ठरले असते, तर
माहितीपटाच्या निर्मात्याला/दिग्दर्शकाला चित्रीकरणाच्या काळात घडलेल्या विविध घटनांचे
प्रत्यक्ष चित्रण करता आले असते. पुराच्या पाण्यात डोमखेडी गावात निर्धाराने थांबलेले
आंदोलक, मेधा पाटकर यांची भाषणे इत्यादी घटनांचे चित्रण करणे शक्य होते. या घटना
घडतील तसे त्यांचे चित्रण करावे लागते. निर्मात्याच्या सोयीने त्या घटना घडू शकत नाहीत;
परंतु त्या घटनांबद्दलचे आंदोलकांचे अथवा अन्य अधिकारी व्यक्तींचे भाष्य मात्र निर्माता
स्वत:च्या सोयीने, हव्या त्या वेळेस, हव्या त्या पार्श्वभूमीवर घेऊ शकतो.
एखाद्या वृद्धाश्रमावर, त्या संस्थेच्या इतिहासावर नव्हे, तेथील व्यवस्थापनेवर माहितीपट
बनविणे चित्रणाच्या दृष्टीने सामाजिक चळवळीवरील माहितीपटाच्या तुलनेत अधिक सोपे
असते.
उदाहरणार्थ :
एखाद्या वृद्धाश्रमावर माहितीपट बनविताना आवश्यक ते सर्व प्रसंग निर्माता व
संस्थाचालक यांच्या परस्परसोयीने चित्रित करता येतात. गरज वाटल्यास त्याकरिता काही
प्रसंग (पूर्णपणे सत्यावर आधारित) मुद्दाम घडवून आणून चित्रित करणे शक्य असते.
उदाहरणार्थ :
त्या वृद्धाश्रमातील दिवाळी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरी होत असेल व दिवाळी नुकतीच
होऊन गेली असेल, तर (खर्च परवडणार असेल तर) दिवाळीतील ते वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम
मुलांकडून पुन्हा करून घेतले तरी चालू शकते; पण हा उपाय वरचेवर वापरला जात नाही.
चित्रणाचे योग्य नियोजन असेल तर तशी वेळही येत नाही. प्रसंगांची पुनर्निर्मिती करण्याच्या
मुद्याची नैतिकतेच्या दृष्टीनेही चाचपणी केली पाहिजे. अन्यथा सत्य घटनांचे वास्तववादी
चित्रीकरण या माहितीपटाच्या मूळ हेतूलाच तडा जाण्याची शक्यता असते.
Self-Instructional
Material 78
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन
NOTES
Self-Instructional
Material 80
प्रसारमाध्यमांसाठी
२.३.१०. माहितीपटाचे निवेदन लेखन
१. थीम निवडणे
काही माहितीपट फक्त काही विशिष्ट गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करतात. कदाचित
अशी एखादी घटना असू शकते की, जी बहुतेक लोकांना ठाऊक नसते. एक अनोळखी
व्यक्ती ज्याची एक आकर्षक जीवनकथा किंवा वेळेत हरवलेल्या इतिहासाचा एक मनोरंजक
कालावधी असतो. या प्रकारच्या दस्तऐवजीकरणाची उत्तम उदाहरणे जगाच्या कार्यपद्धती
किंवा मूळ लोक कसे आहेत याबद्दल अधिक सामान्य मुद्दे दर्शविण्यासाठी मूळ थीम
वापरतात. म्हणून कोणत्याही विषयाची निवड करण्यापूर्वी त्याची थीम निवडणे आवश्यक
आहे. त्यायोगे माहितीपट लेखन कोणत्या दिशेला न्यायचे हे ठरविता येते. तसेच त्या
थीमसाठी आपल्याला शक्य तेवढी जास्तीत जास्त माहिती मिळवणे आवश्यक आहे.
माहितीपटातील लोक, ठिकाणे याबद्दल जाणून घेण्यासाठी काही पुस्तके, इंटरनेटवरील
माहिती मिळवणे महत्त्वाचे आहे.
३. माहितीपट बनविणे
माहितीपटाला प्रत्यक्षात उतरविण्यापूर्वी स्वत:लाच अनुसरून काही प्रश्न विचारा,
त्यायोगे माहितीपट बनविताना अधिक सुलभ होईल.
उदा .
१. मी दाखवित असलेल्या कार्यक्रमाबद्दल किंवा व्यक्तींबद्दल प्रेक्षकांना कसे वाटेल?
२. प्रत्येक दृश्यातून मी कोणता संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत ?
३. दृश्यांना व्यवस्थित करण्याचा उत्तम मार्ग कोणता आहे ? जेणेकरून संदेश ओलांडू
शकेल?
४. माहितीपटातील ध्वनी आणि प्रतिमा कशा वापरल्या तर त्या अधिक प्रभावी
ठरतील?
यासारखे काही प्रश्न स्वत:च स्वत:ला विचारून त्याच्या अपेक्षित उत्तराच्या अनुषंगाने
माहितीपट बनविल्यास प्रेक्षकांपर्यंत योग्य तो संदेश नक्कीच पोहचला जाईल आणि
माहितीपटाला यशस्वी करता येईल. अर्थातच माहितीपटाच्या संहितेसाठी विषयाची निवड,
सादरीकरण ते सादरीकरणाचे विविध टप्पे, दृश्य माध्यमांचा प्रभाव, शब्दांचा वापर आदी
विषयांवर सांगोपांग विचार करून माहितीपटाचे संहितालेखन होणे अपेक्षित आहे.
२.३.१२. सारांश
मराठी प्रसारमाध्यामांचा विचार करता आपल्याला जीवनात जर पुढे काही करायचे
असेल तर भाषेवर आपले प्रभुत्व असणे गरजेचे आहे. त्यासाठी माणसाकडे कोणते ना
कोणते भाषिक कौशल्य उपजत किवा आत्मसात करता येतात. मग ती भाषा कुठलीही असो
आपल्या व्यक्तिमत्त्व विकासात त्याचे स्थान महत्त्वाचे आहे. भाषा ही सामाजिक संस्था
आहे कारण भाषेशिवाय कोणताही व्यक्ती जगू शकत नाही. आज लोकशाहीमध्ये जगत
असताना आपल्या जीवनव्यवहारात प्रसारमाध्यमांना महत्त्वाचे स्थान आहे. लोकशाहीमध्ये
प्रसारमाध्यमांना चौथा खांब आहे असे आपण मानतो. जरी आपल्या राज्यघटनेमध्ये स्वतंत्र
स्थान नसले तरी, प्रसारमाध्यमांना आज खूप महत्त्व दिले जाते.
प्रसारमाध्यमांसाठी लेखन या घटकामध्ये समाविष्ट असणारी वृत्तपत्रे, नभोवाणी आणि
दूरचित्रवाणी या दृक्-श्राव्य माध्यमांविषयी अधिक विस्ताराने जाणून घेण्याचा प्रयत्न आपण
केलेला आहे. त्याचबरोबर वृत्तपत्रांतील बातमी लेखन करताना मुद्रितशोधनाची आवश्यकता
Self-Instructional का असते हेही विस्ताराने अभ्यासलेले आहेत. वृत्तपत्रामध्ये बातमीलेखन, नभोवाणीसाठी,
Material 84 संहितालेखन आणि माहितीपटाचे संहितालेखन करताना अनेक महत्त्वपूर्ण बाबींचा अभ्यास
प्रसारमाध्यमांसाठी
करून त्याच्या विविध पायऱ्यांचे अनुकरण करत हे संहितालेखन होणे अपेक्षित आहे. लेखन
तद्नुसार सर्वच घटकांचे संहितालेखन कसे व्हावे याविषयी विवेचन केलेले आहे.
NOTES
Self-Instructional
Material 85
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी मराठी
नवमाध्यमे आणि
भाग-२ नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांसाठी...
१.१.१. प्रस्तावना
भाषेला मानवी जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. कारण भाषा ही मानवी
व्यवहारातील अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. परस्परांशी संवाद साधणारी सर्वमान्य अशी
भाषा लोकसमूह तिला स्वीकारतो. ‘भाष’ म्हणजे बोलणे या संस्कृत धातूपासून ‘भाषा’ हा
शब्द तयार झाला आहे. मानवी समूह भाषेशिवाय जीवनाच्या विविध क्षेत्रांत काम करू
शकत नाही. या अर्थाने भाषा ही जीवनातील अपरिहार्य घटक आहे. जीवन व्यवहारात
जितक्या मोठ्या प्रमाणात भाषेचा वापर होतो, तेवढी ती समृद्ध होते. माणूस भाषेशिवाय राहू
शकत नाही. कारण आपण एकमेकांचे भाव-भावना, संवेदना, सुख-दु:ख अशा नानाविविध
गोष्टी भाषेच्या माध्यमातून व्यक्त करू शकतो.
भाषा दळणवळणनाचे साधन आहे. हे अनादी काळापासून चालत आलेली परंपरा आहे.
सुरुवातीला माणूस हावभावाची भाषा बोलत होता. नंतर तो समूह करू लागला. नंतर त्या
समूहाची एक भाषा तयार केली. दळणवळण होण्यासठी त्याने भाषेचा वापर केला. नंतर
हीच भाषा पुढे त्या समूहाची मुख्य भाषा म्हणून ओळखली जाऊ लागली. एखाद्या समूहाची
त्या परिसरात वापरली जाणारी भाषा ही त्या समूहाची मातृभाषा असते. त्याला आपण समूह
भाषा असेही म्हणत असतो. मराठी ही आपली मातृभाषा आहे. त्या भाषेला प्रमाणभाषा
म्हणून ओळखतो. दैनदिन जीवनात आपण संदेशनाचे कार्य याच प्रमाणभाषेतून करत
असतो. Self-Instructional
Material 87
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात जग खूप जवळ आले आहे. जगाबरोबर
आपल्याला स्पर्धा करण्यासाठी आपल्याला अत्याधुनिक तंत्रज्ञान ही अवगत हवे आहे.
NOTES सुरुवातीला अनेक नविन प्रसारमाध्यमाची आपली ओळख झाली. आज जागतीकीकरणामुळे
आजून नवसमाज माध्यमांची नव्याने ओळख झाली. उदा. whatssapp, websites,
twitter अशा अनेक नव समाज माध्यमांची ओळख करुन घेणे गरजेचे आहे.
१.१.२. उद्दिष्टे
व्यक्ती भाषा
समाज जीवन हे सातत्याने बदलत असते. तसेच त्या-त्या समाज घटकातील जीवन NOTES
व्यवहारही बदलत राहतात. या बदलत्या जीवन-व्यवहाराचा माध्यमांवरही परिणाम होणे
स्वाभाविक आहे. माध्यमे ही जगभर घडणाऱ्या घटनांची माहिती आपल्यापर्यंत पोहचवीत
असतात. प्राचीन काळापासून आपले विचार एक दुसऱ्याला समजावेत, कळावेत, आपल्या
कुटुंबातील, गावातील खुशाली दुसऱ्यांना कळावी म्हणून निरोप्याच्या हस्ते निरोपाची देवाण-
घेवाण करून प्रसारमाध्यमांचेच काम साधले जात असे. पुढे हेच कार्य लोककलांच्या
माध्यमातून घडू लागले. उदा. कीर्तन, प्रवचन, लोकनाट्य, भारूड, भजन इत्यादी सर्व
प्रकारातून श्रोत्यांच्या मनावर उत्तम संस्कार घडविले जात असत. एका अर्थाने माध्यमांचा
उपयोग हा आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेला आहे.
समाज परिवर्तन-बदल-विकास हा जसजसा होत गेला तसतशी विविध प्रकारची संवाद
माध्यमे निर्माण होत गेलेली आपल्याला दिसून येतात. आपल्या अवती-भवती घडणाऱ्या
नवनवीन घटना, होणारे बदल, शासनाबद्दलची माहिती, बदलते हवामान अशा विविध
घटकांची अतिशय मौल्यवान माहिती समाजापर्यंत तत्काळ पोहचवण्यासाठी त्या-त्या
टप्प्यावर दृक, श्राव्य, दृक-श्राव्य अशा विविध प्रकारांतील माध्यमांची निर्मिती होण्यास
सुरूवात झाली. म्हणूनच ही सर्व माध्यमे महत्त्वाची आहेत.
सुरूवातीच्या काळात वृत्तपत्रे, नभोवाणी (रेडिओ), दूरदर्शन यांचा उल्लेख आपल्याला
करावा लागेल. समाजात परिवर्तन व्हावे, लोकांना विज्ञानवादी, भौतिकवादी बनविणे,
समाजातील अज्ञान नष्ट करून समाजात विचार जागृती घडवून आणणे समाजाचे वैचारिक
भरण-पोषण करणे, समाजामध्ये रुढी, परंपरा या विषयीचे मूलभूत चिंतन मांडणे, शिक्षणाचे
महत्त्व पटवून देणे असे विविध महत्त्वाचे हेतू ठेवून या माध्यमांची निर्मिती झालेली दिसून येते.
आपण सुरुवातीला कोणती माध्यमे प्रामुख्याने महत्त्वाची ठरली त्यांची ओळख करून घेऊ.
सुरूवातीची माध्यमे
सुरुवातीच्या माध्यमांचा आपण विचार केला तर असे दिसून येते की, या माध्यमांमधूनही
समाजजागृतीचे, लोकजागृतीचे कार्य मोठ्या प्रमाणावर घडून आलेले दिसते. त्यामध्ये
वृत्तपत्र, नियतकालिके, आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमांनी सुरूवातीच्या काळात Self-Instructional
अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेली दिसून येते. Material 93
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... • वृत्तपत्र
NOTES आपल्या समाजाची जनजागृती व्हावी या उद्देशातून वृत्तपत्राचा जन्म झाला. शासन
आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून वृत्तपत्रांचा विकास झाला. वृत्तपत्रातून अगदी
समाजातील छोट्या-छोट्या गोष्टींपासून ते एखाद्या महत्त्वाच्या विषयावरील वैचारिक आणि
प्रबोधनात्मक लेखन करुन जनतेमध्ये प्रबोधन आणि जागृती करण्याचे काम केले आहे.
सर्वप्रथम विचार केला तर वृत्तपत्रातून १९ व्या शतकामध्ये प्रबोधनात्मक महाराष्ट्र
म्हणून पुढे येत होता. अनेक समाजसुधारकांनी स्वतः वृत्तपत्र काढून जनतेपर्येंत आपले
विचार करून लेखन होऊ लागले. त्यामुळे समाज परिवर्तनाच्या चळवळीचे अत्यंत प्रभावी
असे साधन म्हणून वृत्तपत्राकडे पाहिले जाते. आजही वृत्तपत्र हे माध्यम प्रभावीपणे
समाजामध्ये लोकजागृती करण्याचे कार्य करत आहे. या संदर्भात काही महत्वाच्या बाबी
आपल्याला सांगता येईल. ते पुढीलप्रमाणे
• विविध लेख, अग्रलेख, माहितीपर लेखन, वृत्तपत्रातील विविध स्तंभ वा सदरे हे ज्ञान,
प्रबोधन आणि माहिती देत असतात.
• भारतीय परंपरेत आधुनिक काळात वृत्तपत्रांना विशेष महत्त्वाचे स्थान आहे. कारण
याच काळामध्ये अनेक वृत्तपत्रांनी समाजमनाला प्रबोधीत केले. स्वातंत्र्याची ज्योत
मनामध्ये पेटवली. समाजसुधारकांचे म्हणणे सामान्यांपर्यंत पोहचवले. त्यामुळेही
समाजसुधारणेची चळवळ सक्षम बनू शकली.
• आकाशवाणी
लिखित स्वरूपातला मजकूर, माहिती लोकांपर्यंत पोहोचली आणि आकाशवाणीसारख्या
श्राव्य माध्यमाच्या शोधामुळे माणसाचे जगणे सोपे झाले. समाजात घडणाऱ्या गोष्टी
आकाशवाणीच्या माध्यमातून खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले. त्यामुळे माणसाच्या दैनंदिन
जगण्याला गती मिळाली. समाजाच्या सर्व स्तरातील माहिती आकाशवाणीवरून प्रसारित
होणाऱ्या कार्यक्रमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. मुद्रित माध्यम हे दीर्घकाळ
टिकणारे असले तरी त्याचा वाचक हा थोडाफार का होईना साक्षर असणे गरजेचे होते; परंतु
आकाशवाणीच्या श्रोत्याला साक्षर असणे गरजेचे नसून तो एखादी माहिती ऐकून घेऊन त्या
ज्ञानाचा, मनोरंजनाचा फायदा त्याला घेता येतो. अशा या माध्यमाचा शोध जी. मार्कोनी यांनी
लावला. या केंद्राची सुरुवात भारतात १९२६ ला झाली. ‘इडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी' या
एका खासगी कंपनीने पहिले प्रसारण मुंबई येथे केले. भारतातील पहिले रडिओ प्रसारण केंद्र
२३ जुलै १९२७ रोजी मुंबई येथे सुरू झाले. या केंद्राचे कार्यक्षेत्र ४८ कि. मी. इतके होते व
यानंतर कोलकता, अलाहाबाद, डेहराडून इ. ठिकाणी रेडिओ केंद्रे सुरू झाली. स्वातंत्र्योत्तर
कालखंडात आकाशवाणी या माध्यमाने आपला 'बहुजन हिताय-बहुजन सुखाय' या
ब्रीदवाक्याने जनमानसाच्या मनात आपले स्थान निर्माण केले. २१ व्या शतकातही रेडिओचे
विविध चॅनल्स सुरू झाले व आकाशवाणीवर एफ. एम. रेडिओ, रेडिओ मिर्ची, रेडिओ
टोमॅटो, विविधभारती यांसारखी चॅनल्स सुरू झाला. रेडिओच्या माध्यमातून प्रसारित होणारी
माहिती, कार्यक्रम यांतून लोकांची करमणूक होऊ लागली. सर्वसामान्यांना परवडेल असे हे
माध्यम असल्याने घराघरांत आकाशवाणी प्रसारित झाली.
आकाशवाणीसाठी लेखन : आकाशवाणी हे माध्यम श्राव्य असल्याने आकाशवाणीवरून
प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची उद्घोषणा केली जाते. उद्घोषनेतून श्रोत्यांना माहिती पुरविली
जाते. सध्या आकाशवाणीची विविध प्रसार केंद्रे सुरू झाली आहेत, श्रोता एखाद विशिष्ट
असे प्रसारकेंद्र ऐकत असतो. म्हणून श्रोत्यांना त्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची
माहिती पुरविणे गरजेचे आहे. हे सर्व निवेदनाच्या माध्यमातून केले जाते. आकाशवाणीसाठी
लेखन करताना त्यामध्ये कल्पकता, योजकता व सहजता येणे अत्यंत गरजेचे आहे.
आकाशवाणीवर प्रसारित या सर्व कार्यक्रम बोल्याने ऐकलेच पाहिजेत असे नमून, जे
श्रोत्याच्या मनावर अवलंबून आहे. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या बातम्या, कार्यक्रम
श्रोते ऐकतीलच असे नाही, म्हणून महत्त्वाच्या बातम्यांची शीर्षक (Lead) अगोदर घ्यावीत
व त्यानंतर बातमीच्या शीर्षकाचा पुनरुच्चार करून बातमीचा तपशील द्याचा. आकाशवाणीचा Self-Instructional
श्रोतृवर्ग हा सर्वसामान्य असल्याने व संमिश्र वर्गातला असल्याने बातमीची भाषा त्यांना Material 95
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... समजेल, उमजेल अशी साधी व सोपी असावी लागते. एकसारखे निवेदन असल्याने ते
अॅक्सिलेटर सारखे असावे लागते. बातम्या व श्रुतीकालेखनासारखे कार्यक्रम हे श्रोत्यांना
NOTES प्रबोधनात्मक सामाजिक माहिती पुरवत असतात. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या या
कार्यक्रमांच्या संदर्भात पु. ल. देशपांडे म्हणतात, "संवाद आणि निवेदन यांचे प्रमाण अगदी
व्यवस्थित असले पाहिजे. निवेदन हे अललश्रशी सारखे असावं, लीशरज्ञ सारखं असू नये.
चतुर ड्रायव्हर गिअर बदलताना जसा बदलतो, तस निवेदकानं नाट्याच गिअर बदलले
पाहिजे. रेडिओ श्रुतीकेत अपरिहार्य म्हणून निवेदन करताना निवेदकाने घ्यावयाची काळजी
देशपांडे यांनी सांगितली आहे. दिवसभरात प्रसारित होणारे कार्यक्रम हे निवेदनात्मक
असल्याने देशपांडे याची ही प्रतिक्रिया रास्त आहे. प्रसारमाध्यमे जनसामान्यांच्या दैनंदिन
जीवनात संदेशवहनाचे कार्य करतात, त्यामुळे त्यांना अनन्यसाधारण असे महत्व आहे.
परंतु, प्रत्येक माध्यमांना काही ना काही मर्यादा पडतात.
भारतातील आकाशवाणी हे पहिले प्रसारमाध्यम आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार
नाही. स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून आकाशवाणीचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. भारतात
वर्तमानपत्रांची सुरूवात अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाली असली तरी 'श्राव्य' माध्यम
म्हणून आकाशवाणीने केलेले कार्य भरीव असे आहे. जेव्हा कोणतीच सुविधा पोहचलेली
नव्हती अशा काळात आकाशवाणीने लोकांचे मनोरंजन, प्रबोधन करण्याचे महत्त्वपूर्ण काम
केलेले दिसून येते. श्राव्य माध्यम म्हणून नंतर
आकाशवाणीची लोकप्रियता खूपच वाढत
गेलेली दिसून येते. महाराष्ट्रासारख्या राज्यात
तर १९७२ पर्यंत म्हणजेच दूरदर्शनचे
आगमन होईपर्यंत आकाशवाणी हे राज्यात
एकमेव प्रभावी जनसंपर्क माध्यम
स ा म ा न ्यां स ा ठ ी घराघरात उपलब्ध होते.
स म ा ज ा च ्या ज ड ण घ ड ण ी त
आकाशवाणीचा वाटा मोठा आहे. नवभारतीयांच्या
मनातली, विचारातली राष्ट्रीय अस्मिता फुलविण्याचे, टिकवण्याचे कामही रेडिओने केलेले
दिसून येते. भारताच्या स्वातंत्र्योत्तर नियोजनबद्ध वाटचालीत, विकासात रेडिओने एक
जबाबदारी पार पाडली आहे. पंचवार्षिक योजना, लोककल्याणकारी योजना, कुटुंबकल्याण,
अंधश्रद्धा निमूर्लन, साक्षरता, विज्ञाननिष्ठा या बाबी ग्रामीण समाज जीवनापर्यंत पोहचविण्याचे
व रुजविण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आकाशवाणीने केलेले दिसून येते.
सद्य: स्थितीतही आकाशवाणी आपले वेगळेपण जपून आहे. आजही आकाशवाणीसारख्या
माध्यमाचा उपयोग बरेचसे लोक प्रवास करताना, निवांत असताना, घरामध्ये करमणूक,
मनोरंजनात वेळ घालविण्यासाठी, चांगले कार्यक्रम आवर्जून ऐकण्यासाठी करताना दिसून
येतात. आकाशवाणी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून काळानुरूप बदल घडवून आणत
आहे. आज वेब-रेडिओ नावाचा नवा प्रकार अस्तित्वात आलेला आहे. चोवीस तास
चालणारा एक युथ व्हाइस हा वेब रेडिओ लोकाप्रिय ठरत आहे. त्याचबरोबर चोवीस तास
मनोरंजन करणारे एफ.एम. चैनल्स आकाशवाणी प्रसारित करीत आहे. एकूणच आपण
विचार केला तर असे दिसून येते की, बदलत्या काळातही आकाशवाणी आपले अस्तित्व
Self-Instructional टिकवून आहे.
Material 96
नवमाध्यमे आणि
• दूरदर्शन समाजमाध्यमांसाठी...
भाषण, चर्चा व मुलखाती हा नभोवाणी प्रसारणाचा महत्वाचा भाग आहे. मनोरंजनाचे NOTES
सर्वात जुने, स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे माध्यम म्हणजे नभोवाणी होय. आजही
खेड्यापाड्यातून तसेच शहरातही आकाशवाणीची लोकप्रियता टिकून आहे. १९२६ साली
“इंडियन ब्रॉडकॉस्टिंग कंपनी” या खाजगी संस्थेमार्फत भारतामध्ये आकाशवाणी प्रसारणाला
सुरूवात झाली होती. तत्कालीन ब्रिटिश राज्यकत्यांनी त्याबाबत करार करून भारतातील
मुंबई या ठिकाणी २३ जुलै १९२७ रोजी पहिले नभोवाणी केंद्र स्थापन झाले व त्यांनीच या
केंद्राला 'आकाशवाणी' हे नाव दिले. 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' हे ब्रीदवाक्य घेवून
आकाशवाणीची वाटचाल सुरू झाली. भारत सरकारनेही 'आकाशवाणी' हे नाव आवडीने
स्वीकारले. १९२७ साली अवघे मुंबई हे एक केंद्र असणाऱ्या आकाशवाणीची आज चारशेहून
अधिक केंद्र स्थापन झालेली आहे. त्यामध्ये काही पूर्ण केंद्रे आहेत तर काही सहक्षेपण
केंद्रांचाही समावेश आहे.
दूरदर्शनवर कला, संगीत, गीत, नाट्य, चित्रपट, क्रीडा, वृत्त घडामोडी इ. सर्वच
क्षेत्राला स्थान मिळाले. त्यामुळे विविध स्तरातील लोकांना दूरदर्शनने आकर्षित केले. एका
अर्थाने सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा या सर्वच क्षेत्रांना दूरदर्शनने
कवेत घेतले त्यामुळे अत्यंत कमी कालावधीत लोकांना लोकप्रियता मिळविण्यामध्ये
दरदर्शनने कमी काळात आघाडी घेतलेली दिसून येते. योग्य ती माहिती, ज्ञान देण्याचे कार्य
दूरदर्शनने केलेले दिसून येते. १९८०-९० नतरच्या कालखंडात ग्रामीण भागापर्यंत दूरदर्शन
संच पोहचले. त्यामुळे ग्रामीण जीवनातही प्रचंड वेगाने बदल घडवून आणण्याचे कार्य
दूरदर्शनने आपल्याला केलेले दिसून येते.
१९९० नंतर मात्र मनोरंजन क्षेत्रात तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलांमुळे नवे परिवर्तन घडून
येण्यास प्रारंभ झाला. विविध भाषांतील प्रादेशिक वाहिन्या सुरू झालेल्या दिसून येतात.
त्यामुळे आज तर २४ तास वृत्त प्रसारण करणाऱ्या वाहिन्यांत दिवसेंदिवस भरच पडत आहे.
त्यामुळे दूरदर्शन पाहणाऱ्यांची संख्या आज मर्यादित झालेली दिसून येते. आज तंत्रज्ञानामध्ये
गतीने होणाऱ्या बदलांमुळे मोबाईलवरही आपल्याला अनेक वृत्तवाहिन्या सहजपणे पाहता
येतात. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान हे जसजसे बदलत जाईल तसतशी आपल्याला नवनवीन
आव्हाने पेलावीच लागतील किंबहुना त्यांना सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही.
Self-Instructional
Material 97
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... १.१.७. नवमाध्यमे आणि समाजमाध्यमे (सोशल
NOTES मीडिया)
नवमाध्यमे, समाजमाध्यमांकडे पाचवा स्तंभ म्हणून पाहिले जात आहे. हा पाचवा
स्तंभही लोकशाहीच्या विकासासाठी महत्त्वाचा मानला जाऊ लागला आहे; मात्र अनेकदा
आशयाच्या मुद्द्यावरून पारंपरिक माध्यमे विरुद्ध नवमाध्यमे अशी परिस्थिती निर्माण होऊ
लागली आहे. माध्यमांमधील हे कलह सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असले, तरी त्याचे
परिणाम मात्र या माध्यमांचे ग्राहक मानल्या जाणाऱ्या सर्वसामान्यांवरही होत आहेत.
त्यामुळेच त्यांचा व्यापक विचार करणे आवश्यक आहे.
सुदृढ लोकशाहीसाठी प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य हा तसा आपल्याकडचा एक निर्विवाद
मुद्दा. माध्यमांवरील बंधनांचा संबंध थेट आणीबाणीशी जोडला जाण्याचा आपल्याकडचा
इतिहास विचारात घेता, प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याला तसे कोणीही नाकारत नाही.
लोकशाहीच्या विकासासाठी प्रसारमाध्यमांनी या पूर्वीच्या काळात केलेले कार्य पाहता,
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणूनच आपल्याकडे त्यांचा विचार केला जातो. त्याच अनुषंगाने
आता नवमाध्यमे, समाजमाध्यमांकडे पाचवा स्तंभ म्हणूनही पाहिले जात आहे. चौथ्या
स्तंभापाठोपाठ आलेला हा पाचवा स्तंभही आपल्याकडे लोकशाहीच्या विकासासाठी म्हणून
महत्त्वाचा मानला जाऊ लागला आहे. असे असताना आता अनेकदा आशयाच्या मुद्द्यावरून
पारंपरिक माध्यमे विरुद्ध नवमाध्यमे अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. आशयाला
आव्हान दिले जात असताना, त्यातून माध्यम प्रकारांच्या विश्वासार्हतेलाही आव्हान दिले
जाऊ लागले आहे. माध्यमांमधील हे कलह सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असले, तरी
त्याचे परिणाम मात्र या दोन्ही प्रकारच्या माध्यमांचे ग्राहक मानल्या जाणाऱ्या सर्वसामान्यांवरही
होत आहेत. त्यामुळेच या कलहांचा व्यापक विचार करणे महत्त्वाचे ठरत आहे.
माध्यमांच्या स्वरूपांचा विचार करता पारंपरिक माध्यमे आणि नवमाध्यमे ही तशी
पूर्णपणे वेगळी. त्यामुळे दोन भिन्न प्रवृत्तीच्या माध्यमांमध्ये असलेल्या अंतर्गत कलहाला
उगाचच असे महत्त्व देणे ही बाब सर्वसामान्यांच्या लेखी तशी चुकीचीही ठरू शकते. असा
कलह वास्तवात आहे की नाही, हा प्रश्नही सर्वसामान्यांना पडू शकण्याइतकी वेगळी
परिस्थिती आपल्या आजूबाजूला आपण अनुभवत आहोत; मात्र ‘दोघांच्या भांडणात
तिसऱ्याचा लाभ’ या उक्तीचा विचार या ठिकाणी करायचा झाल्यास, या भांडणाचा लाभ
होणारा तो ‘तिसरा’ कोण, या प्रश्नाचे उत्तर हा मात्र सर्वांसाठीच तितकाच महत्त्वाचा आणि
गंभीर मुद्दा ठरू शकतो. लोकशाही व्यवस्थेमध्ये माध्यमांना चौथ्या स्तंभाचा दर्जा मिळत
असताना उर्वरित तीन स्तंभ कोणते, हे पाहणे या निमित्तानेच उचित ठरते. या तिन्ही स्तंभांचा
आणि चौथ्या-पाचव्या स्तंभांच्या उभारणीसाठी झटू पाहणाऱ्यांचा या दोन स्तंभांच्या भांडणाने
काही फायदा-तोटा होऊ शकतो का, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्यास, आपण
एका वेगळ्या निष्कर्षापर्यंत निश्चितच पोहोचू शकतो.
आताच्या वाढत्या औद्योगिकीकरणाच्या युगात तंञज्ञानाचा प्रसार देखील झपाट्याने होत
आहे. आताची पिढी म्हणजे अगदी आताच्या या युगाला सुट होणारीच म्हणावी लागेल.
त्यात भरीसभर म्हणजे, आज कालची लहान मुले ही असामान्य व्यक्तिमत्वात गणली गेली
Self-Instructional पाहिजेत. आधुनिक तंञज्ञानाने तर अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत काही गोष्टींचे सर्वांना
Material 98 वेड लावले आहे. मग तो मोबाईल असो वा काँम्प्युर, हल्ली तर आय-पॉड,
नवमाध्यमे आणि
आय-पॅड, आय-फोन यांसारख्या गोष्टी फार प्रचलित आहेत. परंतु या सर्व गोष्टींच्या समाजमाध्यमांसाठी...
वापरामध्ये मोठ्यांपेक्षा लहानांचा वाटा जास्त अहे. आजच्या पिढीला ह्या सर्व गोष्टींचे ज्ञान
हे सर्व साधारण माणसापेक्षा जास्त आहे. या सर्व गोष्टीमध्ये दिवसेंदिवस होणारे नवनविन NOTES
बदल हे देखिल आजच्या पिढी साठी साधारण आहे.
आधुनिक तंञज्ञानामुळे आपल्याला नवनविन गोष्टी पहावयास तसेच अनुभवायला
मिळतात. यामुळे मिळणारे ज्ञान देखील अत्यंत महत्वाचे ठरते. अशा ह्या तंञज्ञानाच्या
जोरावर सध्या जगाच्या चारही दिशांना फिरत आहेत ते सोशल नेटवर्कींगचे वारे. सोशल
नेटवर्कींगचे हे वारे प्रत्येक घरात देखील घुमत आहेत. जर आपल्याला सोशल नेटवर्कींग
बद्दल विचारले तर आपल्याला बोटावर मोजता येईल एवढेच उत्तरे सांगु शकतो, परंतू ते
तितकेच नसुन त्याहुन अधिक आहे.
सोशल नेटवर्कींगकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोण हा वेगळा आहे. कोणी या
सोशल नटवर्कींगला व्यसन ह्या दृष्टीकोणातून पाहतात तर कोणी काळाची गरज ह्या
दृष्टीकोनातून पाहतात.परंतु वस्तुस्थिती ही वेगळीच आहे.ही काळाची गरज तर आहेच पण
काहीजण त्याला व्यसन म्हणून स्विकारतात. आज आपल्या जगाच्या कानाकोपऱ्यात
घडणाऱ्या गोष्टींची माहीती सोशल नेटवर्कींद्वारे कोणत्याही वेळी मिळवता येते.तसे पाहता
आपल्या जीवनात काही गोष्टींमुळे तोटेही होतात अथवा फायदेही होतात तसेच या सोशल
नेटवर्कींमुळेही फायदे ही आपल्याला होऊ शकतात किंवा तोटेही होऊ शकतात.
२१ व्या शतकाच्या प्रारंभी व तंत्रज्ञानाद्वारे आलेले डिजिटल माध्यम, हे आतापर्यंतच्या
सर्व माध्यमांना कवेत घेऊ पाहणारे आर्थिक, सामाजिक, राजकीय व वैश्विक दृष्ट्याही
क्रांतिकारक बदल घडविणारे माध्यम आहे. या माध्यमाचा झपाट्याने विस्तार होण्यात
समाज माध्यमांची मोलाची भूमिका आहे. काही तज्ज्ञांच्या मते 'सिक्सडिग्रीज कॉम' हे
पहिले सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे. हे संकेतस्थळ १९९७ साली सुरू झाले. सर्वप्रथम
येथे सदस्यांना 'प्रोफाईल' म्हणजे 'माहिती पान' उघडण्याची व मित्र मंडळ तयार करण्याची
मुभा दिली. त्यानंतर १९९८ मध्ये मित्रमंडळ तयार करण्याची व मित्रमंडळ सूची शोधण्याची
मुभा दिली. मात्र या संकेतस्थळाला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. तथापि, या संकेतस्थळाच्या
निर्मिती आधी देखील या प्रकारचा ऑनलाईन संवाद अथवा देवाण-घेवाण घडत असे.
प्रोफाईल व संवाद साधणे हे जरी या सेवेचे मूळ उद्दिष्ट असले तरी सोशल नेटवर्किंग
संकेतस्थळांची सुरूवात वेगवेगळ्या हेतूंनी झाली. उदा . 'सायवर्ल्ड' हा कोरियन परिसंवाद
मंच होता. स्कायरॉक ही सुरुवातीला फ्रेंच ब्लॉगिंग सेवा होती. एकविसाव्या शतकाबरोबरच
आलेली, डिजिटल तंत्रज्ञानाची देण असलेली ही समाज माध्यमे प्रारंभी 'सोशल नेटवर्किंग
प्लॅटफॉर्म' असे तांत्रिक नाव धारण करून आली. समाजाकडून होणारा वाढता वापर व
लोकप्रियता यातून या माध्यमांना 'समाज माध्यमे' असे नाव रूढ झाले. एक प्रकारे, "मुक्त
अशा व्यासपीठावर अप्रत्यक्षपणे एकत्र येऊन समानधर्मी लोकांनी संदेश वा इतर बाबींची
देवाण-घेवाण करण्यासाठी महाजालाआधारे निर्माण केलेले समूहगट म्हणजे समाज
माध्यम”. अशी या समाज माध्यमाची व्याख्या करता येईल. इंटरनेटवर उपलब्ध असणारा,
विविध व्यक्तींशी संपर्क साधू देणारा व ते जपू देणारा मंच म्हणजे सोशल नेटवर्क सेवा. '
सोशल नेटवर्क अथवा सामाजिक जाळे म्हणजे असे गट जिथे आंतर महाजालाद्वारे समान
विचारांची, सारख्या आवडी-निवडीची माणसे एकत्र येतात. ही सेवा मुख्यतः इंटरनेटवरवरील
विविध संकेतस्थळांच्या मार्फत पुरवली जाते. अशा संकेतस्थळांना 'सोशल नेटवर्किंग Self-Instructional
संकेतस्थळे' असे म्हणतात. Material 99
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... एखाद्या सोशल नेटवर्क सेवेचा पाया म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्या सोशल नेटवर्किंग
संकेतस्थळावर तयार केलेले 'प्रोफाइल' अर्थात व्यक्तिगत माहितीचे 'माहिती पान'. एखाद्या
NOTES व्यक्तीचा इंटरनेटवरील आविष्कार म्हणजे हे प्रोफाईल पान होय. सोशल नेटवर्किंग
संकेतस्थळे व्यक्तीला अशा प्रकारची प्रोफाईल बनवण्याची, त्या संकेतस्थळावरील इतर
व्यक्तींशी ओळख व मैत्री करण्याची; तसेच विविध माहितीची देवाण-घेवाण करण्याची
संधी देतात. वेळेची मर्यादा, निवडीची अट नसलेल्या पण सर्व प्रकारच्या अभिव्यक्तीला
सामावून घेईल, अशा मोठ्या माध्यमाच्या गरजेतून समाज माध्यमांची निर्मिती झाली.
अप्रत्यक्षरित्या परस्परांच्या किंवा आपल्या समूहाच्या संपर्कात राहून, संदेशांची देवाणघेवाण
करण्याच्या, अभिव्यक्तीच्या, निर्मितीच्या हेतूने या समाज माध्यमांचा वापर करणाऱ्यांची व
त्यांच्याद्वारे माहिती मिळविणारे, माहितीची देवाण-घेवाण करणाऱ्यांची संख्या दररोज लाखाने
वाढते आहे. १९८९ ला इंटरनेटचा जन्म झाल्यानंतर, भारतात संगणक आयात करू पाहणाऱ्या
टाटा समूहास सरकारने परवानगी नाकारली होती. संगणकास यंत्र मानण्यास तयार नसलेल्या
सरकारकडून त्यावेळी संगणक आयातीवर मूळ किमतीच्या ३०० टक्के कर होता. आज
मात्र, भारतासह एकूण जगात या नवमाध्यमांचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस
लाखोने वाढते आहे. जागतिक पातळीवर इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वापराचे
सर्वेक्षण व विश्लेषणात्मक अभ्यास करणाऱ्या 'हुटसूट' कंपनीच्या जानेवारी २०१८ च्या
अहवालानुसार भारतात, एकूण लोकसंख्येपैकी ३४ टक्के लोक इंटरनेटचा वापर करतात.
दरवर्षी ३ ते ४० टक्क्यांनी यात वाढ होते. सोशल मीडियाचा वापर करणारे लोक दररोज
सरासरी २.३६ मिनिट यासाठी वेळ राखून ठेवतात.
१.१.८. सारांश
जगातील इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येचा अभ्यास करणाऱ्या ‘सॅटीस्ट' या वेबसाईटच्या
अंदाजानुसार भारतात ३७ कोटींहून अधिक लोक या माध्यमांचा वापर करतात. यांच्या
अंदाजानुसार येत्या पाच वर्षात भारतात प्रत्येक घरात समाज माध्यमांचा वापर होईल. हे
लक्षात घेता, वापरकर्त्यांना त्याबद्दलची माहिती असणे आवश्यक आहे. किंबहुना, साक्षर-
शिक्षित असणे एवढेच या डिजिटल युगात पुरेसे नाही; तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे अपत्य
अशा फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, चार्ट-लाईक, युट्युब.. या समाज
माध्यमांबद्दल व त्यांच्या वापराबद्दल साक्षर असणे आवश्यक आहे.
Self-Instructional
Material 101
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी...
१.२ नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांचे
NOTES प्रकार – ब्लॉग, फेसबुक, ट्विटर
१.२.१ प्रास्ताविक
१.२.२ उद्दिष्टे :
१.२.३ समाजमाध्यमे म्हणजे काय?
१.२.४ नवमाध्यम आणि समाजमाध्यमांचे प्रकार
१.२.५ ब्लॉग
१.२.६ फेसबुक
१.२.७ ट्विटर
१.१.८. सारांश
१.१.९. महत्वाचे शब्द
१.१.१०. सरावासाठी प्रश्न
१.१.११. अधिक वाचनासाठी पुस्तके
१.२.१ प्रास्ताविक
नवमाध्यमे, समाजमाध्यमांकडे पाचवा स्तंभ म्हणून पाहिले जात आहे. हा पाचवा
स्तंभही लोकशाहीच्या विकासासाठी महत्त्वाचा मानला जाऊ लागला आहे; मात्र अनेकदा
आशयाच्या मुद्द्यावरून पारंपरिक माध्यमे विरुद्ध नवमाध्यमे अशी परिस्थिती निर्माण होऊ
लागली आहे. माध्यमांमधील हे कलह सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असले, तरी त्याचे
परिणाम मात्र या माध्यमांचे ग्राहक मानल्या जाणाऱ्या सर्वसामान्यांवरही होत आहेत.
त्यामुळेच त्यांचा व्यापक विचार करणे आवश्यक आहे.
लोकशाहीच्या विकासासाठी प्रसारमाध्यमांनी या पूर्वीच्या काळात केलेले कार्य पाहता,
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणूनच आपल्याकडे त्यांचा विचार केला जातो. त्याच अनुषंगाने
आता नवमाध्यमे, समाजमाध्यमांकडे पाचवा स्तंभ म्हणूनही पाहिले जात आहे. चौथ्या
स्तंभापाठोपाठ आलेला हा पाचवा स्तंभही आपल्याकडे लोकशाहीच्या विकासासाठी म्हणून
महत्त्वाचा मानला जाऊ लागला आहे. असे असताना आता अनेकदा आशयाच्या मुद्द्यावरून
पारंपरिक माध्यमे विरुद्ध नवमाध्यमे अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. आशयाला
आव्हान दिले जात असताना, त्यातून माध्यम प्रकारांच्या विश्वासार्हतेलाही आव्हान दिले
जाऊ लागले आहे. माध्यमांमधील हे कलह सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असले, तरी
त्याचे परिणाम मात्र या दोन्ही प्रकारच्या माध्यमांचे ग्राहक मानल्या जाणाऱ्या सर्वसामान्यांवरही
होत आहेत. त्यामुळेच या कलहांचा व्यापक विचार करणे महत्त्वाचे ठरत आहे.
यापूर्वीचा तो काळ आणि सध्याचा काळ यामधील एक महत्त्वाचा फरक म्हणजे
नवमाध्यमांचे वा समाजमाध्यमांचे अस्तित्त्व. यापूर्वी अशी लोकांच्या थेट हातात गेलेली माध्यमे
Self-Instructional अस्तित्वात नव्हती. त्यामुळे लोकांना म्हटले तर लोकशाही मार्गाने वा म्हटले तर अगदीच
Material 102 झुंडशाही करत विशिष्ट निर्णय प्रक्रियेला विरोध करण्याची, तशा प्रक्रियेमध्ये थेट हस्तक्षेप
नवमाध्यमे आणि
करण्याची संधी कधीही मिळालेली नव्हती. समाजमाध्यमांच्या येण्याने ती मिळाली आहे. समाजमाध्यमांसाठी...
पर्यायाने ‘पूर्वीच्या काळात पारंपरिक माध्यमांनी आपल्याला अशी संधी नाकारली,
समाजमाध्यमांनी ती मिळवून दिली, हीच खरी लोकशाही,’ अशी एक वेगळी भावनाही आता NOTES
तीव्र होऊ लागली आहे. ही जाणीव तीव्र करून त्याचा पुन्हा स्वार्थासाठी वापर करून घेऊ
शकणाऱ्यांना यामुळे एक मोठी संधी निर्माण झाली आहे. अशी संधी पारंपरिक माध्यमांनी त्यांना
अवचितच कधी दिली असती. त्यातूनच समाजामध्येही पारंपरिक माध्यमे विरुद्ध नवमाध्यमे
असा एक वेगळा संघर्ष सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थात तो सुरू
होण्यापेक्षाही तो सुरू होण्याला चालना दिली जात आहे, हेही आपण लक्षात घ्यायला हवे.
ट्विटर, फेसबुक, ब्लॉग, ई-पेपर, व्हिडिओ कॉन्फरसिंग अॅप, मायस्पेस यांसारख्या
सोशल नेटवर्किंग साईट्सचा आजच्या तरुणांवर मोठा प्रभाव पडत आहे. त्यामुळे एका
बाजूला माहिती - तंत्रज्ञानाचा वेगाने होणारा प्रसार लक्षात घेता आपल्याकडे ही नवमाध्यमे
व समाजमाध्यमे कशा पद्धतीने वापरायला हवीत यादृष्टीने प्रबोधन होणेही आवश्यक आहे.
या प्रबोधनाची सुरुवात आपल्या कुटुंबापासून व्हायला हवी, कारण आज प्रत्येक कुटुंबात
ही माध्यमे आहेत. त्यामुळे ही सर्व माध्यमे वापरताना आपण व्यवस्थितपणे विचार करणेही
तितकेच आवश्यक आहे.
समाजमाध्यमांवर आपले अस्तित्व तर जाणवले पाहिजे पण लिहित बसायला वेळ
नाही, टाईप करायचा कंटाळा आहे, काहीजण तर मराठी टायपिंग फार कंटाळवाणे आहे
म्हणून लिहित नाही. मग अशावेळी समाजमाध्यमांवर आपले अस्तित्व दाखवण्याचा एकमेव
पर्याय असतो. फॉरवर्ड आणि शेअरिंग त्यातही उजवे-डावे गट ठरलेले असतात, मग
आपापल्या गटाकडून आलेली कुठलीही गोष्ट डोळे झाकून शेअर करत राहणे हे कर्तव्य
होऊन बसते आणि येथेच समाजमाध्यमे जनतेच्या मनाचा खरा अंदाज येण्यापासून दूर
राहतात, मग हा अंदाज येणार कसा? म्हणूनच नवमाध्यमे आणि समाजमाध्यमे हाताळताना
आपण विचारपूर्वक, डोळसपणे विचार करायला हवा. आपल्याला व्यक्त व्हायचे साधन
मिळाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही तर व्यक्त होणे ही जरी आपल्या दृष्टीने सहज
कृती असेल तरी आपण जेव्हा व्यक्त होतो तेव्हा आपण व्यक्त केलेले मत, विचार क्षणार्धात
लाखो लोकांपर्यंत पोहचत असतात.
१.२.२ उद्दिष्टे
NOTES
आज मात्र, आधुनिक तंत्रज्ञानामुळे हा फरकही पुसला गेला आहे. कारण सर्वच संपर्क
माध्यमे इलेक्ट्रॉनिक तंत्राद्वारे चालविली जात आहेत. चित्र, अक्षरलेखन व व्यंगचित्रे सुद्धा
आज या इलेक्ट्रॉनिक तंत्राच्या साहाय्याने तयार होत आहेत. संपर्क क्षेत्र तज्ज्ञ पॉल गिल्स्टरने
म्हटल्याप्रमाणे, “आपल्या जगात काहीतरी प्रचंड गहन फेरफार घडत आहेत." त्यामुळे या
बदलांना आपण फार तर ‘इलेक्ट्रॉनिक क्रांती' व 'डिजिटल क्रांती' असे म्हणू शकतो आणि
याद्वारे आलेल्या संपर्क माध्यमांचे वर्गीकरणही ‘इलेक्ट्रॉनिक माध्यमे' व 'डिजिटल माध्यमे'
असे करू शकतो.
१.२.५. ब्लॉग
ब्लॉग हे एक ऑनलाइन जर्नल किंवा माहिती देणारी वेबसाइट आहे ज्यामध्ये जुन्या
पोस्ट खाली जातात आणि नवीन पोस्ट वरती दिसतात. हा एक प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये
लेखक स्वत:ची किवा अन्य माहिती तुमच्या द्वारे पोचवण्याचा प्रयत्न करत असतात. ११९४
मध्ये ब्लॉग ची सुरुवात झाली व सुरुवातीला यामध्ये स्वत: विषयी माहिती शेअर केली जात
होती.
तुम्ही जेव्हा इंटरनेटवर कोणत्याही विषयाची माहिती शोधत असता व त्या माहितीचे
उत्तर एका लेखा स्वरूपात तुम्हाला भेटते. यालाच आपण 'ब्लॉग ' म्हणतो. समजा तुम्हाला
'ऑनलाइन पैसे कसे कामवायचे ' याविषयी माहिती पाहिजे तेव्हा तुमच्या समोर गूगलचे
बरेचसे पेजेस ओपन होतात त्या माहितीलाच आपण ब्लॉग म्हणू शकतो.
तसेच आपल्या मनामध्ये विचार येत असतात की ब्लॉग कोणत्या विषयावर लिहायचा.
आज इंटरनेटवर दररोज लाखो ब्लॉग अपलोड होत असतात. यामध्ये ' पर्सनल ब्लॉग '
:आपल्या स्वत:विषयी माहिती लिहिणे, टेक्नॉलजी विषयी माहिती, हेल्थ विषयी, पॉलिटिक्स,
विविध प्रॉडक्ट चे रिव्यू करणे, इत्यादी.
Self-Instructional
Material 105
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... 'ब्लॉग' हे असे माध्यम आहे जिथे तुम्ही सहजपणे व्यक्त होऊ शकता. आज जगभरात
कोट्यवधी माणसे ब्लॉग वाचतात, लिहितात.त्यामध्ये अगदी खाद्यपदार्थांपासून ते राजकीय
NOTES गोष्टींपर्यंत सगळ्या विषयावर लिहिले जाते. ब्लॉगचा फायदा असा की, तुम्ही तुमचे विचार
जगभरातील लोकांपर्यंत पोहचवू शकता. पैसे मिळविण्याचा विषय फार नंतरचा आहे. पण
आता ब्लॉगच्या माध्यमातून 'व्यक्त होणे ' आवश्यक आहे. पण जर तुम्हाला लिहायची
इच्छा नसेल, मात्र वेगवेगळ्या विषयांवर वाचायला आवडत असेल किंवा एखाद्या विषयावर
जास्त माहिती हवी असेल तर त्या विषयाचा गुगलवर शोध घेऊन इतरांनी लिहिलेले ब्लॉग
तुम्ही नक्कीच वाचू शकता. यामध्ये साहित्याबरोबरच ट्रव्हल, फुड, चित्रकला, शिक्षण,
निसर्ग, पर्यावरण, शेती, व्यवसाय, आवडते छंद अशा अनेक विषयांवर ब्लॉग असतात.
डॉ. संदीप माळी लिखित 'उपयोजित मराठी ' या पुस्तकामधून ब्लॉग पोस्ट बद्दलच्या
पायऱ्या पुढील प्रमाणे :-
• ब्लॉग लेखनाची रचना
• मथळा
आपल्या ब्लॉग पोस्टचे शीर्षक संभाव्य वाचकांचे लक्ष वेधून घेईल असे असावे.
लोकांनी गुगल सर्च किंवा कुठल्याही सर्च इंजिनमध्ये एखाद्या विषयासंदर्भात शोध
घेतला तर आपला विषय आकर्षक मथळ्याने त्यांच्यासमोर आला पाहिजे. आपण
लिहित असलेल्या विषयाचा शोध घेताना लोक सामान्यपणे वापरू शकणारे मुख्य
कीवर्ड (वाक्यांश) आपल्या ब्लॉगच्या मथळ्यामध्ये असल्याची खात्री करा.
• प्रकाशित तारीख
आपल्या ब्लॉगची प्रकाशित तारीख शक्यतो लिहिताना नोंदवावी. आपण वारंवार
आपला ब्लॉग अद्ययावत केल्यास, पोस्ट तारखांमुळे आपल्या वाचकांना अलीकडील
नवीनतम पोस्ट कोणती आहे, हे निश्चित करण्यात मदत करू शकतात.
• ब्लॉगपोस्टची वर्गवारी
आपण तयार केलेल्या प्रत्येक ब्लॉग पोस्टसाठी श्रेणी - tag - वापरण्याची पद्धत
आहे. ज्यामुळे आपल्या ब्लॉगचे वाचन करणारे आणि आपला ब्लॉग अॅक्सेस करणारे
जे इंटरनेट सर्फर्स असतात त्यांना जास्तीतजास्त वेळ आपल्या ब्लॉगवर ऑनलाइन
थांबणे भाग पडते.
• परिचय
आपल्या ब्लॉग पोस्टचा पहिला परिच्छेद असा लिहावा की, जो लोकांना खिळवून
ठेवेल आणि लोकांना पूर्ण ब्लॉग पोस्ट वाचण्याची इच्छा होईल. तसेच पूर्ण ब्लॉग
पोस्ट वाचल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा लोक त्यांची मते नोंदवतील.
• मुख्य सामग्री
ब्लॉग पोस्ट मधील हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो कारण या मुख्य सामग्रीमध्ये
Self-Instructional ब्लॉग पोस्ट - मुख्य मजकूर - समाविष्ट असतो. इंटरनेट वापरकर्त्याने त्याच्या
Material 106 आवश्यक असणाऱ्या माहिती संदर्भात शोध घेताना त्याला आपला ब्लॉग सापडलेला
नवमाध्यमे आणि
असतो. त्यामुळे आपली माहिती अधिकाधिक परिपूर्ण असावी आणि परिचयाच्या समाजमाध्यमांसाठी...
परिषदांमध्ये आपण ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांची पूर्तता या मुख्य सामग्री
मध्ये झाली पाहिजे, याची दक्षता ब्लॉगरने घेणे अत्यंत गरजेचे आहे. NOTES
• उप-मथळे
ब्लॉग पोस्ट मध्ये उप-मथळे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असतात. या उप-मथळ्यांच्या
माध्यमातून अत्यंत सुव्यवस्थितपणे विषयाची मांडणी करता येते. आजच्या
धकाधकीच्या जीवनात एखाद्या वाचकाला नेमका विषय शोधायचा असेल तर उप-
मथळे त्याला ब्लॉगपोस्ट वाचताना फायदेशीर ठरत असतात. त्यामुळे वाचकांनी
पूर्णवेळ ब्लॉग वाचून त्याचा जास्त वेळ घालवण्यापेक्षा अतिघाईतल्या वाचकांसाठी
हे उप-मथळे फायदेशीर ठरतात.
• ठळक मजकूर
आपल्या ब्लॉग पोस्ट मधील जो मजकूर अत्यंत महत्त्वाचा असेल तो - बोल्ड करणे
- ठळक करणे - गरजेचे असते किंवा त्याला एका विशिष्ट square बॉक्स मध्ये
विशिष्ट रंगाचे बॅकग्राऊंड टाकून मांडणे महत्त्वाचे असते. आपल्या ब्लॉग पोस्ट
मधील हा जो मजकूर आहे तो हायलाईट झाला पाहिजे म्हणजे महत्त्वाचे मुद्दे वाचकाच्या
नजरेतून सुटणार नाही. अशी काळजी ब्लॉगरने घेणे गरजेचे आहे.
• माध्यम
आपल्या ब्लॉग पोस्ट मधील मजकुराच्या आणि सामग्रीच्या अनुषंगाने त्याच्याशी
संबंधित प्रतिमा (इमेजेस) आणि व्हिडिओ यांचा वापर केला पाहिजे. जेणेकरून
आपल्याला जो मुद्दा चर्चेला घ्यायचा आहे त्यासंबंधी अधिक सविस्तर माहिती
वाचकाला होईल.
• निष्कर्ष
ब्लॉग पोस्ट मध्ये जो मजकूर आपण मांडलेला आहे त्याचा थोडक्यात सारांश ब्लॉग
पोस्टच्या शेवटी असावा. हे साधारण एक ते दोन परिच्छेद असावे. जेणेकरून आपण
कोणतीही सामग्री वाचलेली आहेत हे वाचकाला समजेल.
Self-Instructional
Material 107
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... १.२.६. फेसबुक
NOTES आपल्या भारताची खरी ओळख म्हणजे आपली संस्कृती. या संस्कृतीला समोर ठेवूनच
भाषा, सण-उत्सव, राहणीमान, पेहराव, अन्न कृती इ. गोष्टींचा समावेश त्यात होतो.
महिलाविषयक संस्कृती दर्शनाबद्दल 'Social media today.com' या
संकेतस्थळामध्ये अनेक गोष्टी अंतर्भूत केल्या आहेत. ' युनेस्को'च्या सांस्कृतिक विकासाच्या
प्रकियेला फेसबुकने गती दिली. शब्द, चित्र व व्हिडिओ यांच्या एकत्रित वापरातून फेसबुकने
व इतर सोशलमीडीयाने संस्कृतीला, मानवजीवन शैलीला समृद्ध केले. सांस्कृतिक संवर्धन
हा एकमेव उद्देश फेसबूकचा नसला मानवी संस्कृतीचे मूळ येथे मोठ्या प्रमाणात दिसते.
३) नोंदणी करा
फेसबुकमध्ये आपल्या मोबाईल नंबरची नोंदणी करा. फेसबुकवर प्रवेश करताच, पहिले
पान उघडेल त्यास ' होम पेज '(मुखपृष्ठ) असे म्हणतात.
NOTES २) गोपनीयता : फेसबुकवर वैयक्तिक प्रोफाईल बरोबर प्रायव्हसी सेटिंग ग्रुप आणि
पॅसेज म्हणजे पब्लिक क्लोज सिक्रेट ग्रुप, पोस्ट (संदेश). पोस्ट ची लांबी, पोस्ट करण्याची
वेळ पोस्टमधील सातत्य प्रतिपादन, त्याची उपयुक्तता इत्यादी सुविधा असतात.
३) भाषा : फेसबुकमध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती इतर अनेक भाषांमधून संपर्क
साधण्याची सुविधा उपलब्ध आहे. फेसबुकमध्ये 100 हून अधिक भाषा आहेत. यामुळे
फेसबुकचा जगभरातील लोक वापर करतात.
• फेसबुकचे फायदे
१. या वापरामुळे व्यक्ती, व्यापार आणि समुदाय हे एकत्र येतात. समान रुची असणाऱ्या
व्यक्तींचा समूह अधिकांश वेळा फेसबुक ग्रुप बनवतात. या ग्रुपद्वारे सदस्य एकत्र येऊन
माहितीची देवाणघेवाण (शेअर) करतात आणि आवडीच्या विषयांवर चर्चा करतात.
२. वरील काही सहभाग असलेले व्यक्ती तिची माहिती पोस्ट, फोटो, व्हिडिओ टाकत
असतात, यामुळे इतर फेसबुक वापर करताना जवळच चुकीची माहिती जाते.
३. आपली माहिती फोटो चोरून तिचा दुरुपयोग करण्यासारखेच सायबर गुन्हे यांनी ही
वाढले आहेत
• फेसबुकच्या लोगोचा व इतर ठिकाणी असलेला निळा रंग का ठेवण्यात आला आहे,
हे तुम्हाला माहित आहे का? फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग ला कलर ब्लाइंडनेस
आहे. फक्त निळा रंग त्यांना नीट दिसू शकतो व ते ओळखू शकतात. म्हणूनच
फेसबुकचा रंग निळा ठेवण्यात आला आहे.
• फेसबुकवर एक अशी व्यक्ती आहे की, ज्या व्यक्तीला आपण कधीही ब्लॉक करू
शकत नाही. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्या प्रोफाईलला आपल्याला
कधीही ब्लॉक करता येणार नाही.
• फेसबुकवर सध्या आपल्याला जे लाईक करण्याचं ऑप्शन येते, त्याचे नाव आधी
AWESOME’ असे होते. ते बदलून ‘LIKE’ केले गेले.
१.२.७. ट्विटर
ही एक विनामूल्य सोशल नेटवर्क सेवा आणि मायक्रो ब्लॉगिंग सेवा आहे. तिच्या
वापराद्वारे वापरकर्ता त्यांचे ट्विट्स म्हणजेच संदेश वा माहिती अद्ययावत इतरांना पाठवू
शकतात, वाचण्यास प्राप्त करून देऊ शकतात. या माध्यमाद्वारे किंवा वेबसाईटद्वारे असे
संदेश पाठविता व इतरांचे वाचता येतात. तसेच, फोटो जीआयएफ प्रतिमेत रूपांतरित केले
जाऊ शकतात. अमित मिश्रा यांच्या मते जर तुम्ही समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक
किंवा खाजगी क्षेत्रातील कंपनीला सातत्याने ईमेल अथवा पत्रव्यवहार करून थकला असाल
किंवा संबंधितांना भेटूनही ते काम जैसे थेच राहत असेल तर, तुम्हाला ट्विटरची मदत
घ्यावीच लागेल. त्यांच्या मते, आपल्या समस्या संबंधितांपर्यंत पोहोचविण्यासाठी ट्विटर हे
आता नव्या जमान्याचे हत्यार म्हणून उदयाला येत आहे. ट्विट, ट्विटरहॅण्डल, ट्वीट लिस्ट,
फॉलोअर्स, संदेश सेवा (शोर्ट मेसेज सर्विस), रिट्विट हे या माध्यमातील काही महत्त्वाचे
घटक होत. ट्विट (संदेश) करताना २८० अक्षरांची मर्यादा पाळावी लागते. परंतु, लांबलचक
वाक्य टाकायची असतील तर त्यासाठी जो पर्याय उपलब्ध आहे त्याला 'ऑनलाईन ट्वीट'
असे म्हणतात. त्यासाठी एक ट्वीट केल्यानंतर १. असा आकडा टाकायचा, याचाच अर्थ
या नंतर आणखी एक ट्विट येणार आहे, असा त्याचा अर्थ होतो. पुढचे ट्वीट टाकल्यानंतरही
ते पूर्ण झाले नसेल तर त्यापुढे २. असा आकडा टाकायचा असतो. थोडक्यात, विषयावर
खूप माहिती द्यायची असेल तेव्हाच अशा प्रकारच्या इनलाइन ट्वीट ची गरज असते.
बोलीभाषेत यूजर नेमलाच ‘ट्विटर हँडल' म्हटले जाते. ट्वीटर हँडल चे महत्त्व यासाठी
आहे की, जेव्हा कुणाला तक्रार नोंदवायची असते; त्यावेळी संबंधित व्यक्ती ट्विटर हँडलद्वारे
तक्रारीची नोंदणी करते.
ट्विटरवर उपस्थित असणारी आणि तुमचे अनुकरण करणारी मंडळी म्हणजे तुमचे
'फॉलोअर' होय. ही मंडळी तुमचे विचार वाचण्यासाठी कायम उत्सुक असतात. तुम्हालाही
जर कोणाचे विचार पटत असतील तर, तुम्हीही संबंधितांना फॉलो करू शकता. जर कोणाला Self-Instructional
फॉलो करायचे असेल तर त्याच्या अकाउंटवर जाऊन उजव्या बाजूला दिलेल्या फॉलो Material 113
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... बटणावर क्लिक करावे लागते. ज्यावेळी आपण दुसऱ्या कुणाच्या अकाउंटवरील ट्विट
आपल्या अकाउंटवरून पुन्हा करतो त्याला 'रिट्विट' असे म्हणतात, दुसऱ्या भाषेत फॉरवर्ड
NOTES करणे. कुणीही अथॉरिटी आपल्या अकाउंटवर येऊन प्रतिक्रिया देते किंवा त्याला रिट्विट
करते. 'निळा पक्षी' हा ट्विटरचा लोगो किंवा सांकेतिक ओळख आहे. या ‘ट्विटर बर्ड' द्वारे
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर ट्विटर या समाज माध्यमांची ओळख बनली आहे.
इंटरनेटवर २००८ मध्ये या सेवेची सुरुवात झाली. विशेषत: तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या
या माध्यमाचा वापर आपले मत व प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी अमिताभ बच्चनसारखे
अनेक सेलिब्रिटी करताना दिसतात. २८० शब्दांच्या मर्यादेत ट्विटरवर दृश्य व्यक्त केले
जाऊ शकते. वापरकर्त्याला आपल्या बद्दलच्या ताज्या बातम्या यावरून प्रसिद्ध केल्या जात
असतात. त्यामुळे सचिन तेंडुलकर, अभिषेक बच्चन, ऋतिक रोशन असे अनेक तरुण-
तारांकित या माध्यमावर दिसून येऊ लागले आहेत.
ट्विटरवर अकाऊंट तयार करण्यास आपल्याला मोबाईल मध्ये क्रोम ब्राउजर वा ट्विटर
अॅप वापरू शकतो. आपण ट्विटर अकाउंट तयार करण्यास क्रोम ब्राउजर चा वापर शकतो.
iii) नंतर या स्टेप ला फॉलो करा. तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाका.
vi) नंतर आपल्या मोबाइल नंबरवर verification कोड येईल. तो कोड तेथे टाका.
ix) नेक्स्ट करून प्रोफाइल पिक्चर अॅड करा. व स्कीप फॉर नाऊ वर क्लिक करा.
xi) नंतर तुमचा इंट्रेस्ट अॅड करा वा स्कीप फॉर नाऊ वर क्लिक करा.
xii) तुम्हाला ट्वीटरचे अॅप डाउनलोड करायचे असेल तर डाउनलोड नाऊ वर क्लिक
करा. किंवा नॉट टूडे ला क्लिक करा.
Self-Instructional ट्विटर अकाऊंट वापरण्यासाठी आपल्याला पुढील गोष्टी माहीत असणे आवश्यक
Material 116 आहे.
१. ट्विटर युजर नेम नवमाध्यमे आणि
२. ट्विटस समाजमाध्यमांसाठी...
३. रिट्वीट
४. फॉलोवर्स अँड फॉलोविंग NOTES
५. हॅशटॅग
१. युजर नेम :- ट्वीटर आपल्याला प्रत्येक नावाच्या पुढे @ चे चिन्ह (@) पाहायला
मिळते. हे चिन्ह वापरकर्त्याला युजर नेम समोर वापराली जाते
२. ट्विटस :- जेव्हा आपण ट्विटर वर काही लिहतो वा पोस्ट करतो त्यास ट्विटस असे
म्हणतात
५. हॅशटॅग :- (#) ट्विटरवर पोस्ट लिहिताना याचा वापर केला जातो व जे लोक
हॅशटॅग वापरतात तेव्हा ते ग्रुप सारखेच कार्यकर्ते ज्यात लोक त्या विषयावर चर्चा करतात
या हॅशटॅग कहा वापर करून कोणीही सहभागी होऊ शकते
१. जेव्हा आपण ट्विटर उघडतो तेव्हा आपल्याला प्रथम होम बटन दिसते त्यावर
आपल्याला आपण करीत असलेल्या सर्व लोकांचे ट्विट्स पाहायला मिळतात
२. सर्च हे सर्व बटन वापरून आपण आपल्या मित्रांना व मैत्रिणींशी संपर्क साधू शकतो
५. ट्विट बटनावर क्लिक केले तर आपण आपल्या ट्विटर खात्यावर ट्विट करून आपले Self-Instructional
विचार शेअर करू शकतो. Material 117
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... • ट्विटरचे फायदे
NOTES १. ट्विटरच्या मदतीने प्रसिद्ध आणि आपल्या आवडीच्या कलाकारांची आपल्याला
संवाद साधता येतो आणि माहिती मिळते.
५. आपले फेवरेट सेलिब्रिटींना फॉलो करून त्यांच्याबाबत जास्तीची माहिती प्राप्त करू
शकतो.
• तोटे
१. ट्विटरवर काही पारिभाषिक शब्द असल्याने ते शब्द समजण्यात गोंधळ होतो तसेच
काही वेळेस त्याचा वेगळा अर्थ देखील काढला जातो.
२. ट्विटरच्या बाबत जास्त माहिती नसल्याने काही वेळेस लोकांना व्हेरिफाईड खाते
ओळखता येत नाही.
३. शब्दमर्यादेमुळे काही ट्विटरचा वापर करण्यास टाळतात किंवा घाबरतात.
४. ट्विटर मधून बऱ्याच काही गोष्टींच्या अफवाही उडवल्या जातात.
५. बराच वेळ त्या सोशल माध्यमांमध्ये आपण अडकून असतो.
१.१.८. सारांश
अशाप्रकारे ट्विटर बाबतीत माहिती आपल्याला सांगता येते. ट्विटरच्या दृष्टिकोनातून
आजच्या या समाज माध्यमाचा उपयोग आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये बऱ्याच अंशी
होतांना दिसतो. परंतु त्याचे काही गुणदोष आहे. आपण त्याचा किती काळ किती वेळ
उपयोजन करायचा हे ठरवले पाहिजे व तेवढाचया सोशल माध्यमांचा उपयोग कसा व
कशासाठी केला पाहिजे याचं भान आजच्या तरुण पिढीला असणे गरजेचे आहे.
Self-Instructional
Material 119
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी...
१.३ नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांविषयी
NOTES साक्षरता, दक्षता, वापर आणि परिणाम
१.३.१ प्रस्तावना
१.३.२. उद्दिष्टे
१.३.३ नवमाध्यमे आणि समाजमाध्यमे साक्षरता
१.३.४नवमाध्यमे आणि समाजमाध्यमे यांच्या वापरातील दक्षता
१.३.५ समाजमाध्यमांचा वापर
१.३.६नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांचे परिणाम
१.१.७ सारांश
१.१.८ महत्वाचे शब्द
१.१.९ सरावासाठी प्रश्न
१.१.१० अधिक वाचनासाठी पुस्तके
१.३.१ प्रस्तावना
आज आपण पाहतो आपले जीवन माहिती तंत्रज्ञानाशी अगदी घट्टपणे जोडलेले आहे.
किंबहुना आपणही अपरिहार्यपणे जोडले गेलो आहोत. परंतु ही नवमाध्यमे आणि समाजमाध्यमे
जेव्हा आपण वापरतो, हाताळतो, आपल्या मुलांच्या हातामध्ये देतो तेव्हा आपण ज्ञान,
माहिती, मनोरंजन इ. हेतू या माध्यमांचे डोळ्यासमोर ठेवलेले असतात. पण या माध्यमांची
दुसरी एक महत्त्वाची बाजू आहे ती म्हणजे ही माध्यमे वापरताना आपण ती कशा प्रकारे
उपयोगात आणायची आहेत. याविषयी ज्ञान मिळविणेही तितकेच आवश्यक आहे तसेच ही
माध्यमे हाताळताना वेगवेगळ्या गोष्टींची दक्षता घेणेही अत्यावश्यक आहे. या नवमाध्यमे व
समाजमाध्यमे यांचे फायदे आणि परिणाम यांचाही विचार करण्याची आज तर मला वाटत
नितांत गरज आहे. कारण आज प्रत्येकाकडे किंबहुना प्रत्येक घराघरात, कुटुंबात ही
समाजमाध्यमे पोहचलेली आहेत. या माध्यमांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर आज विशेषतः
तरुणाई मोठ्या प्रमाणात करताना दिसून येत आहे. हा वाढता वापर लक्षात घेता या माध्यमांच्या
वापराविषयी एक प्रकारची चांगली समज समाजामध्ये निर्माण होणे ही काळाची गरज आहे.
कारणमाध्यमाचा प्रभाव मानवावरहोण्याऐवजी मानवाचा जर ही माध्यमे वापरण्यावर प्रभाव
राहिला तर ते अधिक योग्य होईल. आत्ताचे तंत्रज्ञान इतके विकसित झाले आहे की , समाज
माध्यमाचा वापर करण्यासाठी संगणकाची सुद्धा गरज पडत नाही. व्यक्तिबरोबरच नव्हे तर
अनोळखी लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. व्यावसायिक फायद्यासाठी
या माध्यमाचा चांगला उपयोग करता येतो. तसेच ग्लोबल स्तरावर पोहचण्यासाठी हे एक
शक्तीशाली साधन आहे. म्हणूनच नवमाध्यमे व समाजमाध्यमे ही मानवाच्या प्रगतीसाठी खूप
दिशादर्शक अशी माध्यमे आहे. परंतु या माध्यमाविषयक साक्षर, दक्ष असणेही तितकेच
Self-Instructional आवश्यक आहे. या घटकात आपण नवमाध्यमे व समाजमाध्यमांविषयक साक्षरता, दक्षता,
Material 120 वापर आणि परिणाम याविषयी चर्चा करणार आहोत.
नवमाध्यमे आणि
१.३.२. उद्दिष्टे समाजमाध्यमांसाठी...
NOTES
१.नवमाध्यमे आणि समाजमाध्यमे यांच्या वापरातील दक्षताघेणे.
२. ग्रुप अॅडमीन, ग्रुप निर्माते यांनी कोणती काळजी घ्यावी हे समजीन घेणे.
• ग्रुपमधील सर्व सदस्यांना ग्रुप निर्माण करायचा उद्देश व ग्रुपची नियमावली समजावून
सांगावी.
• सर्व ग्रुप सदस्यांना सूचना द्याव्यात की, जर कोणी ग्रुप सदस्याने सदर ग्रुपवर काही
आक्षेपार्ह पोस्ट, मेसेजेस, व्हिडिओ किंवा तत्सम बाबी पाठवल्या गेल्यास त्या
सदस्याला तत्काळ या ग्रुपमधून वगळण्यात येईल.
• ग्रुप निर्मात्याने ग्रुपवर शेअर होणाऱ्या पोस्टचे नियमितपणे परीक्षण केले पाहिजे. Self-Instructional
Material 123
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... • ग्रुप निर्मात्याने परिस्थितीनुसार गरज पडल्यास ग्रुप सेटिंग बदलून ‘ओन्ली अँडमीन’
(Only Admin) असे करावे. जेणेकरून अनावश्यक मेसेज ग्रुपवर टाळता येतील.
NOTES
• जर काही सदस्य सूचना देऊन सुद्धा आक्षेपार्ह पोस्ट टाकत असतील तर त्यांना
ग्रुपवरून काढून टाकावे किंवा त्यांची तक्रार नजीकच्या पोलीस ठाण्यात करावी.
• सर्वप्रथम, ग्रुप अॅडमीन ने ‘व्हॉट्सअॅप ग्रुप रुल्स’ नावाची जी पीडीएफ फाइल आहे
तिला डाउनलोड करून घ्यावी, व त्यातले जे नियम आपल्या ग्रुप साठी योग्य वाटेल
त्यांना कॉपी करून घ्यावे. त्यानंतर आपल्या मोबाइल मध्ये व्हॉट्सअॅप ला सुरू
करावे. ज्या ग्रुप मध्ये तुम्ही अॅडमीन आहात त्या ग्रुप मध्ये जावे.
• त्यानंतर ग्रुप मध्ये गेल्यावर वर त्याच्या नावावर क्लिक करावे. नंतर तुम्हाला तिथे
‘अॅड ग्रुप डिस्क्रिप्शण’ या ऑप्शन वर क्लिक करावे. व तुम्ही ज्या नियमांना कॉपी
केल होत त्या नियमांना तिथे पेस्ट करून द्या. याने तुम्ही बनवलेल्या ग्रुप मधील सर्व
सदस्य ते नियम वाचू शकतील व जे नवीन सदस्य ग्रुप चे सभासद होऊ इच्छितात
त्यांनाही ते नियम वाचता येईल.
• फायदे
• सोशल मीडिया मुळे लोकांमध्ये समनुभूती वाढतांना आपल्याला दिसून येत आहे.
बातमी वाचल्यापेक्षा प्रत्यक्षात तिचे फोटो बघितल्याने माणूस जास्त द्रवीत होतो ज्याने
Self-Instructional त्यातील इतरांप्रति समामुभूती वाढण्यास मदत होते.
Material 124
नवमाध्यमे आणि
• सोशल मीडियामुळे समजसेवेला वेळ आलेला आपल्याला दिसून येत आहे. सुरुवातील समाजमाध्यमांसाठी...
कुठे दुर्घटना झाली तर तिची माहिती आपल्याला मिळण्यास फार वेळ लागत होता,
पण आता तीच माहिती तत्काल मिळाल्याने योग्यवेळी योग्य त्यांना मदत करणे शक्य NOTES
झाले आहे.
• इंटरनेटच्या वेगामुळे दूरवरची सर्व कामे सोपी झाल्यामुळे याचा आबालवृद्धांना Self-Instructional
चांगलाच उपयोग झाल्यामुळे समाजमाध्यम जगातील सर्वांच्या आवडीचे अतिशय Material 125
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... महत्त्वाचे माध्यम झाले आहे.
NOTES • समाजमाध्यम पैसे मिळविण्याचे माध्यम बनले आहे. डिजिटल माध्यमाद्वारे तुम्ही
अनेक पद्धतीने पैसे कमवू शकता.
• तोटे
• समाजमाध्यमांच्या अतिवापरमुळे तरुणांमध्ये चिड-चिडेपान वाढत चालला आहे,
त्यांच्यातील संयम हरवत चाललेला आहे.
• समजमध्यमांद्वारे संभाषण साधने आणि प्रत्यक्ष भेटूण गप्पा करणे यात फरक
असल्याने, समजमध्यमांमुळे नात्यांमधील गोडवा कमी झालेला आपल्याला दिसून
येतो.
• सोशल मीडियावर आभासी ओळख निर्माण करणे सोपे जाते आणि सोशल मीडियावर
फेसलेस राहता येते. कारण खोट्या नावाने अकाऊंट उघडून आणि टोपण नावाने
टाकलेली पोस्ट पटकन कुणाला कळत नाही. या कारणांमुळे गुन्हेगार बिनधास्त गुन्हे
करतात.
• सकारात्मक परिणाम
१. एखादी माहिती आपल्या नोकरी संदर्भात असेल किंवा योग्य दिशा देण्यासंदर्भात
असेल तर ते मिळवण्यासाठी कोणती कौशल्य व कोणती माहिती आवश्यक आहे ते यातून
मिळवता येते.
२. एखाद्या घटनेविषयी सद्य स्थितीला काय चाललेले आहे याची अद्ययावत माहिती या
समाज माध्यमांद्वारे आपण कितीही दूर असू किंवा देशाच्या बाहेर असू तरीही ती माहिती
आपल्याला तात्काळ मिळत असते.
४. एखाद्या गोष्टीची आवडछंदनिवडी यांच्या आधारे आपले ग्रुप्स, पेजेस निर्माण करू
शकतात. याद्वारे विचारांनी देवाण-घेवाण करुन अपारंपरिक करियरची माहिती त्याद्वारे
मीळू शकते.
५. डिजीटल साक्षरता. आजच्या जगात क्षेत्र कुठलेही असो, पण त्याची पहिली मागणी
ही तुम्ही डिजीटल साक्षरता ही आहे. याच समाजमाध्यमांमुळे आपल्याला डिजीटल
साक्षरता प्राप्त करणे सहज शक्य होते.
Self-Instructional
Material 127
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... • नकारात्मक परिणाम
NOTES डॉ. चिने. आणि डॉ. शळ्के यांनीही काही नकारात्मक परिणाम सांगितले सुचवले
आहेत, ते पुढील प्रमाणे.
१. अभ्यास करताना सोशल मीडिया साइट्स चेक करत राहण्यामुळे एकाग्रता भंग
पावते. परिणामी अभ्यासातील लक्ष कमी-कमी होत जाताना दिसते.
३. हँकिंग सारख्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून यामुळे पैसे मिळवण्याचे
अनेक गैरमार्ग मुलांना समजू लागले आहेत जे योग्य नाहीत.
९. नवमाध्यमांद्वारे माहिती वाचकाला सत्य वाटते व त्यावरून त्याची मते तो तयार करत
असतो. त्यामुळे कोणतीही बातमी व त्याची सत्यता पडताळणी अवघडच झालेली आहे.
चुकीच्या माहितीवरून वाचकांची मते तयार झाल्यास त्याचा समाजावर मोठा परिणाम होतो.
Self-Instructional
Material 129
वेबसाईट आणि ब्लॉग, ट्विटरसाठी लेखन
वेबसाईट आणि ब्लॉग,
घटक २ ट्विटरसाठी लेखन
लेखन
२.१.१ प्रस्तावना
२.१.२ उद्दिष्टे
२.१.३. वेबसाईट म्हणजे काय?
२.१.४ मराठी वेबसाईटची गरज
२.१.५ वेबसाईटचे प्रकार
२.२.१. ब्लॉग
२.२.२. ब्लॉग लेखन म्हणजे काय?
२.२.३. ब्लॉग कसा तयार करावा?
२.२.४ विविध ब्लॉग मध्ये कशा प्रकारे पोस्ट करता येतील
२.२.५काही ब्लॉगची उदाहरणे
२.२.६ ब्लॉग लेखनाचे फायदे
२.३.१. ट्वीटर
२.३.२ ट्विटरचा उपयोग
२.३.३. रँकिंग्स
२.३.४. मायक्रोब्लॉगिंग सेवा (Microblogging service)
२.३.५. सारांश
२.३.६. महत्वाचे शब्द
२.३.७ सरावासाठी प्रश्न
२.३.८ अधिक वाचनासाठी पुस्तके
२.१.१ प्रस्तावना
आज आपण अनेक प्रकारच्या वेबसाईटचा वापर आपल्या विविध कामांसाठी करत
असतो. पण तरीही अनेकांना ‘वेबसाईट म्हणजे काय?’ हा प्रश्न विचारल्यास तारांबळ
उडते. कारण बहुतेक जणांना ते ज्या साईटचा वापर आपले काम करण्यासाठी करत
असतात, ती नेमकी काय आहे हेच माहीत नसते. त्यामुळे नेमकी वेबसाईट म्हणजे काय?
हे सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण खालील काही व्याख्यांची मदत घेऊ.
Self-Instructional
Material 131
वेबसाईट आणि ब्लॉग,
ट्विटरसाठी लेखन
NOTES
२.१.२ उदिष्टे
१. मराठी वेबसाईटची गरज आज काय आहे ते समजून घेणे.
२. ब्लॉग कसा तयार करावा त्याची गरज काय
३. विविध ब्लॉग मध्ये कशा प्रकारे पोस्ट करता येतील याचा उपयोग का
केला जातो
४. ब्लॉग लेखनाचे फायदे काय आहेत ते समजून सांगणे
५. ट्विटरचा उपयोग आज कशासाठी केला जातो.
६. मायक्रोब्लॉगिंग सेवा
५) निर्देशिका आणि संपर्क पृष्ठे :-निर्देशिका किंवा संपर्क पृष्ठ असे एक स्थान
आहे जेथे वापरकर्ते आपल्याशी किंवा इतरांशी संपर्क साधू शकतात.जेव्हा आपल्याला
संस्थेमधील व्यवसाय किंवा लोकांच्या भांडारांची यादी करायची असते तेव्हा या प्रकारची
वेबसाईट चांगली कार्य करते. उदाहरणार्थ, स्थानिक रेस्टॉरंट निर्देशिका मध्ये मेनू, किंमतीची
श्रेणी, फोन नंबर आणि पुनरावलोकने असलेले खाद्यपदार्थ आहेत. संस्थेचे स्वरूप निर्देशिका
वेबसाईटसाठी संधी तयार करते. उदाहरणार्थ, शहरातील स्थानिक दंतचिकित्सकांची एक
संघटना प्रत्येक सदस्याची यादी करू शकते, त्यांचे कौशल्य क्षेत्र आणि त्यांची संपर्क
माहिती ही इतरांसाठी कामी येऊ शकते.
मानता निर्देशिका वेबसाईट -
मानता एक व्यवसाय निर्देशिका आहे जी स्थानावर आधारित लहान व्यवसाय दर्शविते.
कीवर्ड शोध क्षमतेव्यतिरिक्त, साईट रेस्टॉरंट्स, कंत्राटदार आणि डॉक्टर यासारख्या क्षेत्रात
श्रेणी ब्राउझिंग प्रदान करते. कंपन्या निर्देशिकेत प्रवेश जोडू शकतात आणि जाहिरातींद्वारे
साईट पैसे कमवू शकते.
६)वेब पोर्टलवेबसाईट :- वेब पोर्टल म्हणजे एका विशिष्ट प्रकारचे ग्राहक किंवा
वापरकर्ते एकत्र येऊन अशा प्रकारची वेबसाईट वापरत असतात. जसे की कॉलेज, शालेय
पोर्टल, बी.एस.एन.एल.चे पोर्टल, एच.पी. गॅसचे पोर्टल इ.
११) व्हिडिओ वेबसाईट :- आपल्या आयुष्यात अनेक सुखाचे क्षण येत असतात. हे
क्षण जतन करून ठेवण्यासाठी फोटो किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करून आपण ठेवतो. जसे की
युट्यूब कॉम. (www.youtube.com) या व्हिडिओ वेबसाईटवर आपण व्हिडिओ
अपलोड करू शकतो. इतर वापरकर्त्यांनी अपलोड केलेले व्हिडिओ पाहू शकतो. या
वेबसाईडचा वापर उत्पादनाची माहिती, चित्रपट, गाणी, पर्यटन स्थळे इ. विषयी व्हिडिओ
स्वरूपात मिळते.
वरील प्रमाणे वेबसाईटचे महत्त्वपूर्ण प्रकार आपल्याला पाहावयास मिळतात.
२) येथे Gmail.com मध्ये तयार केलेला इ-मेलचा पत्ता व त्याचा पासवर्ड टाइप करा.
१) येथे क्लिक करा, म्हणजे तुम्ही साइन इन व्हाल. म्हणजेच वेब साईट बनविण्याची
प्रक्रिया सुरु होईल.
Self-Instructional
Material 138
३. वेबसाईटवर प्रसिद्ध करावयाच्या विषयास अनुसरून ब्लॉग (शीर्षक) येथे टाइप वेबसाईट आणि ब्लॉग,
करावे. ट्विटरसाठी लेखन
४. तुम्हाला हवा असणारा तुमच्या वेबसाईटचा पत्ता येथे तयार करावा लागतो, त्यासाठी
एखादा शब्द किंवा शब्दसमूह येथे टाईप करा. शब्दांमध्ये स्पेस सोडू नये. समजा तुम्ही येथे NOTES
‘myblog’ असे टाईप केले, तर तुमच्या वेब साईटचा पत्ता http://www.myblog.
blogspot.com/ असा होईल.
तुम्ही टाइप करत असलेला शब्दसमूह अगोदर इतर कोणी वापरला नसेल, तरच
तुम्हाला त्या नावाचा पत्ता मिळतो, अन्यथा हा पत्ता उपलब्ध नाही, असे सांगितले जाते.
यासाठी या पर्यायाच्या खाली दिलेला "उपलब्धता जाँचे" हा पर्याय वापरुन तुम्ही टाइप
केलेला पत्ता उपलब्ध आहे की नाही, हे प्रथम तपासावे. नसेल तर दुसरा शब्दसमूह टाइप
करावा लागेल.
३) क्लिक करा.
Self-Instructional
Material 139
वेबसाईट आणि ब्लॉग,
ट्विटरसाठी लेखन
NOTES
१. आता जर तुम्हाला (वेबसाईट कशी दिसते, हे पाहायचे असेल तर येथे नवीन विंडो
चालू होऊन त्यामध्ये तुमची वेबसाईट दिसू लागेल.
२. वेब साईटवर प्रसिद्ध केलेल्या मजकुरामध्ये बदल करायचा असेल तर येथे क्लिक
करा. आवश्यक ते बदल केल्यानंतर पुन्हा वर क्लिक करावे. “पोस्टप्रकाशित करे” वर
क्लिक करावे.
३. वेब (साईटमध्ये जर मराठी किंवा हिंदी मजकुर प्रसिद्ध करायचा असेल, तर त्याबद्दल
माहिती समजून घेण्यासाठी येथे क्लिक करावे.
तुमची वेबसाईट तयार झाली आहे, पण त्यामध्ये अजुन अॅडसिन्स प्रसिद्ध
केलेल्या नाहीत.
iii) त्यानंतर तिथे आपली माहिती भरावी. ज्यात आपला ई-मेल अॅड्रेस, पूर्ण नाव, फोन NOTES
नं. याप्रकारची माहिती येत असते.
iv) ही सर्व माहिती भरली गेल्यानंतर तिथे आपल्याला अनेक प्रकारांचे पर्याय येतात.
जसे, व्यावसायिक, वैयक्तिक, डिजायनर, ब्लॉग, गाणे, कार्यक्रम इ. येत असतात.
vii) यानंतर यातही वेगवेगळे असे टॅम्प्लेट असतात, ज्यात व्यावसायिक, शैक्षणिक,
मनोरंजन इ. असतात. त्यातील आपण आपल्याला हवा तो टॅम्प्लेट निवडू शकतो.
ix) नंतर वेबसाईटच एक प्रतिरूप येईल. ज्यात आपल्याला हवे तसे बॅकग्राउंड बदलणे,
प्रोफाइल फोटो बदलणे, साईज बदलणे इ. बदल करू शकतो.
xii) त्यानंतर Contact me मध्ये तुम्ही तुमचा फोन नं., पत्ता, इ. गोष्टी देऊ
शकतात. ज्याच्या मदतीने तुमच्या वेबसाईटवर कोणाला काही अडचणी येत असेल तर
ते थेट तुमच्याशी संवाद साधून त्या दूर करू शकतात.
या प्रकारे तुमची फार कमी वेळेत व विनामूल्य स्वतःची वेबसाईट तयार झालेली
असेल. तुम्ही नंतर काळानुसार तिच्यात सुधारणाही (Update) करू शकतात.
NOTES ४) शोध इंजिनची तयारी करा :-आपल्या रहदारीस (वापरकर्ते) वाढवण्याचा सर्वात
मौल्यवान मार्ग म्हणजे आपल्या शोध परिणामांवर आपली साईट मिळवणे.यासाठी आपली
साईट तयार करण्याच्या सुरुवातीच्या काळात Search Engine Optimization
(C.E.O) विचारात घेणे महत्त्वाचे आहे. ऑनलाईन विपणनाचा एक महत्त्वाचा भाग,
एसईओ हे स्वतः एक विज्ञान आहे. त्याचे मुख्य घटक पुढीलप्रमाणे आहेत.
• कीवर्ड संशोधन :- आपल्या संभाव्य साईट अभ्यागत किंवा क्लायंटच्या भूमिकेमध्ये
स्वत:ला ठेवा. ते Google वर कोणते प्रश्न किंवा वाक्ये शोधतील जे त्यांना
आपल्या वेबसाईटवर घेऊन जाऊ शकतात?त्यांच्या शोध क्वेरीमधील कीवर्ड आपल्या
एसईओ धोरणाला मार्गदर्शन करतील. कीवर्ड रिसर्च टूल्सचा वापर करून, आपण
कोणत्या कीवर्डला लक्ष्य केले पाहिजे यावर आपण माहिती देण्यास सक्षम असाल.
• मजकूर :- आपल्या मेनूपासून आपल्या सामान्य प्रश्न, पृष्ठ, ब्लॉग, फूटर किंवा
बायो सेक्शनपर्यंत आपल्या वेबसाईटवरील प्रत्येक मजकुराचे एसईओ लक्षात घेऊन
लिहिले जावे.आपल्या वेबसाईटला चालना देण्यासाठी एसईओच्या अनेक टिप्स
असताना, गुणवत्तेवर कोणतीही तडजोड न करता आपल्या कीवर्डला आपल्या
साईटच्या मजकूर सामग्रीमध्ये समाकलित करण्यासाठी सूक्ष्म आणि मोहक मार्ग
शोधणे ही सामान्य कल्पना आहे. शोध इंजिन क्रॉलर हुशार आहेत आणि जर
आपल्याला एखाद्या जाहिरातीसारखे वाटत असेल तर ते आपल्याला खाली स्थान देऊ
शकतात.
• मेटा टॅग :-Google सारख्या शोध इंजिनने आपला मेटाडेटा वाचला. ते काय
पाहतात ते काय आहे आणि ते शोध परिणामांमध्ये आपली साईट कशी सादर करतात
यावर नियंत्रण ठेवणे आपल्यावर अवलंबून आहे. आपली सामग्री अनुकूलित
करण्याच्या आणि आपल्या पृष्ठांमध्ये काय आहे हे शोध इंजिनला मदत करण्याच्या
उद्देशाने आपल्या साईटवर सानुकूल मेटा टॅग जोडण्यासाठी वेळ देणे चांगले आहे.
• Alt मजकूर :-आपल्या एसइओ प्रयत्नांमध्ये ‘प्रतिमा’ देखील प्रमुख भूमिका
निभावतात. आपण आपल्या वेबसाईटवर अपलोड केलेल्या प्रत्येक प्रतिमेमध्ये ‘Alt
मजकूर’ (‘पर्यायी मजकूरासाठी छोटा’) असावा. Alt मजकूर एक अतिशय लहान
ओळ आहे जी शोध इंजिनला प्रतिबिंबित करतात त्यानुसार स्पष्ट करते. त्याऐवजी हे
आपल्या प्रतिमा शोध परिणामांमध्ये ‘सापडले’ म्हणून अनुमती देते, म्हणूनच आपल्या
सर्व प्रतिमांसाठी एसईओ अनुकूल एलईडी मजकूर लिहिणे महत्त्वाचे आहे.
• दुवा इमारत :- मोकळेपणाने सांगायचे तर आपल्याकडे आपल्या साईटशी दुवा
साधणारी अन्य वेबसाईट असल्यास शोध इंजिनच्या परिणामावरील आपले रँकिंग
सुधारण्याची शक्यता आहे. आपण आपली वेबसाईट डिरेक्टरीमध्ये सबमिट करुन
आपली सर्व सोशलमीडिया प्रोफाइल आपल्या साईटशी लिंक करत असल्याचे
सुनिश्चित करुन आणि साईट अभ्यागतांना आपली सामग्री सामायिक करण्यास
प्रोत्साहित करुन प्रारंभ करू शकता.
हे लक्षात ठेवा की एसईओ ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे जी एकदा आपली
Self-Instructional वेबसाईट सुरू झाल्यानंतर समाप्त होत नाही. टिकाऊ परिणाम जिंकण्यासाठी आपल्याला
Material 144 त्यास परिष्कृत करणे आवश्यक आहे.
वेबसाईट आणि ब्लॉग,
५. आपल्या साईटला व्यावसायिक बनवा :- आपल्या व्यवसायाचा किंवा सेवेचा ट्विटरसाठी लेखन
ऑनलाईन चेहरा म्हणून काम करण्याव्यतिरिक्त, आपण स्वत:ला विचारावे की आपली
वेबसाईट आपल्या व्यावसायिक यशामध्ये आणखी वृद्धी कशी करू शकते. आपल्या NOTES
उद्योगावर किंवा क्षेत्रावर अवलंबून आपली साईट असंख्य वैशिष्ट्ये ऑफर करीत आहे जी
आपल्या लक्ष्य बाजाराला अधिक आकर्षित करेल. उदाहरणार्थ.,
• wix बुकिंग :- अपॉइंटमेंट्स ऑनलाईन बुक करण्यासाठीचा एक उत्तम उपाय जो
तुम्हाला बुकिंग घेण्यास आणि पेमेंट्स मिळविण्यात मदत करतो, तसेच आपले
वेळापत्रक अधिक कार्यक्षमतेने व्यवस्थापित करते आणि त्यांच्या सेवा सर्वोत्कृष्ट
प्रकाशात दाखवतो.
• विक्स स्टोअर्स :- ऑनलाईन स्टोअर तयार करणे आणि व्यवस्थापित करण्याचा
सर्वात सोपा मार्ग, ज्यात प्रगत विपणन साधने, सुरक्षित ऑनलाईन देयके आणि
एकाधिक विक्री चॅनेल यासारख्या व्यावसायिक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. आपण
आपली उत्पादने अत्यंत मोहक मार्गाने सादर केल्याची खात्री करण्यासाठी शेकडो
डिझाइन वैशिष्ट्ये आहेत. आपण सुरुवातीपासून आपली वेबसाईट तयार करण्यास
प्रारंभ करू शकता किंवा यापैकी ऑनलाईन स्टोअर टेम्पलेट्सपैकी एक निवडू
शकता.
• विक्स फिटनेस:- फिटनेस तज्ज्ञासाठी एक शक्तिशाली सर्वसमावेशक समाधान. प्रगत
जिम व्यवस्थापन सॉफ्टवेअर, ऑनलाईन बुकिंग आणि देयके आणि सोयीस्कर
कर्मचारी आणि वेळापत्रक व्यवस्थापन आपल्याला आपला व्यवसाय सहजतेने
चालविण्यात मदत करतात. आपण काही काळ उद्योगात आला असलात किंवा
फिटनेस व्यवसाय कसा सुरू करायचा याचा विचार करत असाल, तर हे व्यासपीठ
आपल्याला आवश्यक असलेली व्यावसायिक साधने देईल.
• विक्स म्युझिक :- संगीतकारांसाठी एक अत्याधुनिक व्यासपीठ आहे. ज्यांना त्यांच्या
संगीताची ऑनलाईन जाहिरात करण्याची इच्छा आहे, ते याद्वारे संपूर्ण सर्जनशील
स्वातंत्र्य राखून त्यांचे प्रेक्षक वाढवू शकतात. विक्स म्युझिक आपल्याला आपल्या
वेबसाईटवर आपले संगीत थेट विकण्याची आणि १००% नफा ठेवण्याची परवानगी
देते.
• अत्यावश्यक अॅप्स :- विक्स अॅप मार्केटमध्ये अॅप्सची एक मोठी निवड आहे जी
आपल्याला आपल्या वेबसाईटची जास्तीत जास्त क्षमता पूर्ण करण्यात मदत करेल.
उदाहरणार्थ, आपल्या अभ्यागत विश्लेषकांचा मागोवा घेण्याचे साधन, आपली विक्री
वाढविण्यात मदत करण्यासाठी एक काउंटडाउन टाइमर, आपल्या अभ्यागतांना
प्रभावित करण्यासाठी अत्याधुनिक मजकूर अॅनिमेशन आणि बरेच काही.
Self-Instructional
Material 146
वेबसाईट आणि ब्लॉग,
• खालील वेबसाईट्सना नक्की भेट द्या ट्विटरसाठी लेखन
१) www.maayboli.com NOTES
२) www.maitrin.com
३) www.marathicorner.com
Self-Instructional
Material 147
वेबसाईट आणि ब्लॉग,
ट्विटरसाठी लेखन ४) www.collegecatta.com
NOTES
५) www.marathimati.com
६) www.kaustubhkasture.com
Self-Instructional
Material 148
वेबसाईट आणि ब्लॉग,
७) www.aathvanintligani.com ट्विटरसाठी लेखन
NOTES
२.२.१ ब्लॉग
‘ब्लॉग’ हे एक ऑनलाईन जर्नल किवा माहिती देणारी वेबसाईट आहे ज्यामध्ये जुन्या
पोस्ट खाली जातात आणि नवीन पोस्ट वरती दिसतात. सुरुवातीला ब्लॉगमध्ये स्वत:विषयी
माहिती शेअर केली जात होती. तुम्ही जेव्हा इंटरनेटवर कोणत्याही विषयावर माहिती शोधत
असता व त्या माहितीचे उत्तर एका तुम्हाला लेखा स्वरुपात भेटते. गूगलच पेज ओपन
होतात त्या माहितीलाच आपण ‘ब्लॉग’ म्हणू शकतो. तसेच आपल्या मनामध्ये विचार येत
असतात की ब्लॉग कोणत्या विषयावर लिहायचा. टेक्नॉलजी विषयी माहिती, हेल्थ विषयी,
पॉलिटिक्स, विविध प्रॉडक्टचे रिव्हिव्यू करणे, इत्यादीविषयीची माहिती लिहिण्यासाठी
वापरले जातात.
• होस्टिंगसाठी तुम्ही गूगल चे ब्लॉगर जे फ्री प्रॉडक्ट आहे याचा किंवा काही पैसे
इन्वेस्ट करून वर्डप्रेस मध्ये वेबसाईट बनवू शकता.
• तुमच्या रेलटेड टॉपिक वर ब्लॉग पोस्ट लिहायला सुरुवात करा आणि वेळेवर तुमच्या
वेबसाईट वर अपलोड करत रहा.
१.न्यूज वेबसाईट :- हा सध्या मुख्य आणि ट्रेडिंग मध्ये टॉपिक आहे. न्यूज वेबसाईट
सुरू करण्यासाठी तुम्हाला एक टिमची आवश्यकता असते, पण तुम्ही wordpress
Self-Instructional मध्ये प्लगिन च्या मदतीने Automode मध्ये तुमची वेबसाईट सुरू करू शकता. यासाठी
Material 150 तुम्हाला एक चांगली होस्टिंग आणि प्लुगिनसाठी पैसे invest करावे लागतात.ही
वेबसाईट आणि ब्लॉग,
वेबसाईट सुरू करण्यासाठी तुम्ही एका परटिक्युलर टॉपिक वर सुरू करू शकता. ट्विटरसाठी लेखन
उदाहरणार्थ फक्त स्पोर्ट्स, हेल्थ न्यूज, पॉलिटिक्स, बिजनेस रेलटेड किवा सर्व टॉपिक
तुम्ही एकाच वेबसाईट वर कवर करू शकता. याविषयी अधिक माहितीसाठी तुम्हाला NOTES
यूट्यूबवर खूप विडियो भेटतील याच्या मदतीने तुम्ही न्यूज वेबसाईट सुरू करू शकता.
५. शेअर मार्केट :- यामध्ये तुम्ही शेअर मार्केट काय आहे? शेअर मार्केटमध्ये पैसे कसे
गुंतवायचे? म्युचअल फंड काय आहे? एसआयपी काय आहे? इत्यादीविषयी माहिती
तुम्ही लिहू शकता.
१०. प्रॉडक्ट रिव्यू :- तुम्ही कोणत्याही एका प्रॉडक्ट विषयी माहिती लिहू शकता. या
ब्लॉग मध्ये तुम्ही दोन प्रकारे पैसे कमवू शकता एक Adsense आणि दूसरा एफिलिएट
मार्केटिंग करून, यासाठी तुम्हाला एक चांगला ऑप्शन आहे. अॅमझोनचा एफिलिएट
मार्केटिंग प्रोग्राम जॉइन करून तुम्ही प्रॉडक्ट विषयी माहिती तुमच्या वेबसाइट वर अपलोड
करू शकता.
११. ट्रॅवल ब्लॉग :- हा एक चांगला टॉपिक आहे. ट्रॅवल ब्लॉग मध्ये तुम्ही भारतामधील
किवा जगामधील ठिकाणाबद्दल माहिती लिहू शकता. यामध्ये तुम्ही दोन प्रकारे तुमच्या
ब्लॉगला monitisation करू शकता एक म्हणजे एफिलिएट मार्केटिंग आणि
दूसरा adsense द्वारे.
१२. इतिहास विषयी माहिती :- हा एक चांगला टॉपिक आहे व तुम्हाला जास्त सर्च
करावे लागणार नाही. आज इतिहास विषयी एवढे टॉपिक आहेत की तुम्ही यामध्ये
चांगल्या लिहू शकता आणि सध्या लोक इतिहास वाचणे पसंत करत आहेत. हा एक
चांगला Marathi Blog साठी टॉपिक आहे.
१४. गेमिंग :- टप्याटप्याने विडियो गेम विषयी गाइड, गेम विषयी रिव्हीव्यू, एखादा
नवीन गेम लॉच झाल्यावर त्याच्या विषयी माहिती हे सगळे टॉपिक तुम्ही आपल्या ब्लॉग
मध्ये समाविष्ट करू शकता. हा एक चांगला Marathi Blog साठी टॉपिक आहे.
१५. ग्रीन ब्लॉग :- ग्रीन बिल्डिंग ब्लॉग हा एक चांगला विषय आहे, यामध्ये तुम्ही एक
चांगले आणि इको फ्रेंडली घरांविषयी माहिती लिहू शकता, तसेच तुम्ही एफिलिएट
मार्केटिंग करून इको फ्रेंडली प्रॉडक्ट कोणते आहेत त्याचे रिव्हीव्यू आपल्या ब्लॉग मध्ये
लिहून पैसे कमवू शकता. तसेच यामध्ये इको फ्रेंडली घर काय आहे याविषयी टिप्स,
त्याच्या मटेरियल विषयी माहिती, साऊंड प्रूफ मटेरियल आयडिया इत्यादी विषयी माहिती
Self-Instructional तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये लिहू शकता. हा एक चांगला Marathi Blog साठी टॉपिक
Material 152 आहे.
वेबसाईट आणि ब्लॉग,
१६. शिक्षण आणि करिअर ब्लॉग :- विशिष्ट नोकरी किंवा उद्योगांसाठी करिअर ट्विटरसाठी लेखन
सल्ला, करिअर कोचिंग, नवीन नोकरी मिळविण्यासाठी नवीन कौशल्ये शिकणे, हायस्कूल
किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अभ्यास स्वयंरोजगार, इत्यादी टॉपिक्स तुम्ही यामध्ये NOTES
कवर करू शकता. हा एक ब्लॉगसाठी उत्तम असा टॉपिक आहे.
२. www.alotmarathi.com:
३. inmarathi.com :-
NOTES
५. marathiblog.in :-
ह्या ब्लॉग मध्ये विविध टॉपिक वर माहिती शेअर केली आहे. यामध्ये तुम्हाला ललित,
ग्रेट मराठी, साहित्य, टेक्नॉलजी, मनोरंजन, हेल्थ, निसर्ग, इत्यादी विषयी माहिती वाचायला
भेटते.
६. bhavamarathi.com :-ही एक साईट वेगवेगळ्या टॉपिकवर लेख
लिहित असते. यामध्ये हेल्थ, लेटेस्ट न्यूज, ट्रॅवल याविषयीची माहिती, असे बरेच विषय
या ब्लॉग मध्ये समाविष्ट केले जातात.
७. yuvrajpardeshi.com :-या वेबसाइटचे लेखक डॉ. युवराज परदेशी
आहेत. यांच्या वेबसाईट मध्ये बिजनेस, फेसबूक लाईव, जनरल माहिती, पोलोटिकल
विषयी माहिती, टेक्नॉलजी माहिती, सोशल माहिती विषयीची इत्यादी माहिती तुम्हाला या
वेबसाइटवर वाचायला भेटेल. ही एक Marathi Blog वेबसाईट आहे.
८. www.historicalmaharashtra.info: महाराष्ट्राचा इतिहास
:-महाराष्ट्राचा इतिहास या वेबसाईटवर आपल्या महाराष्ट्र राज्याविषयी लेख वाचायला Self-Instructional
मिळतील. यामध्ये महाराष्ट्रातील थोर विचारांबद्दल माहिती, महाराष्ट्रातील कवी ग्रंथाबद्दल Material 155
वेबसाईट आणि ब्लॉग,
ट्विटरसाठी लेखन माहिती, पॉलिटिक्स विषयी माहिती तुम्हाला या वेबसाईटवर वाचायला मिळेल.
९. techvarta.com :-या वेबसाईटमध्ये वेगवेगळे टॉपिक समाविष्ट केले गेले
NOTES आहेत, यामध्ये संगणकाविषयी माहिती, स्मार्ट फोन, सोशलमीडिया, चालू घडामोडी,
विविध गॅझेट विषयी माहिती, इत्यादी विषयी माहिती तुम्हाला या वेबसाईट वर वाचायलामिळेल.
१०. mr.vikaspedia.in:-या वेबसाईट वर विविध सरकारी योजनाबद्दल
माहिती वाचायलामिळेल. नवीन सरकारी योजनेविषयी माहिती, विविध सरकारी स्कीमबद्दल
माहिती तुम्हाला या वेबसाईट वर वाचायला मिळेल.इ.
२.२.७. ट्वीटर
रुबी ऑन रेल्स (Ruby on Rails) वापरून ट्विटरची निर्मिती करण्यात आली आहे.
रुबी संगणक प्रोग्रामिंग भाषेसाठी रुबी ऑन रेल्स हा एक विशेष वेब-अनुप्रयोग
फ्रेमवर्क(Web-application framework) वापरून तयार केले गेले होते.हे संवाद
किंवा संप्रेषण साधणारे साधन अन्य ऑनलाईनसेवांसह मुक्तपणे रूपांतरित करण्यास आणि
समाकलनास अनुमती देते. 2006 मध्ये इव्हान विल्यम्स (Evan Williams) आणि बिझ
स्टोन (Biz Stone) यांनी ही सेवा तयार केली होती, त्या प्रत्येकाने याअगोदर गुगलसह
काम केले होते. विल्यम्सज्यांनी यापूर्वी लोकप्रिय वेब ऑथोरिंग टूल ब्लॉगर तयार केले
होते, त्यांनी ऑडिओच्या (Audio) एका प्रकल्पासह प्रयोग करण्यास सुरुवात केली –
शॉर्ट मेसेज सर्व्हिस एस.एम.एस. (SMS) ज्याला नंतर ‘ट्विटर’ म्हणतात. उत्पादनाचे
भविष्य पाहून विल्यम्सने ऑडिओ विकत घेतले आणि त्याचा विकास करण्यासाठी
ऑब्व्हियस कॉर्पोरेशनची सुरुवात केली. नंतर अभियंता जॅक डोर्सी (Jack Dorsey)
व्यवस्थापन गटात सामील झाले आणि मार्च-2007 मध्ये ट्विटरची निर्मित आवृत्ती ऑस्टिन,
टेक्सास येथे एका परिषदेत झाली.त्यानंतरच्या महिन्यात ट्विटर, इन्कॉर्पोरेट यांची निर्मिती
Self-Instructional केली गेली.त्याच्या स्थापनेसाठी ट्विटर हा मुख्यत: सोशल नेटवर्किंग घटकांसह एक
Material 156 विनामूल्य एसएमएसची सेवा देत असे. ट्विटर मध्ये बॅनर जाहिरीती किंवा सदस्यता
वेबसाईट आणि ब्लॉग,
शुल्कातून थेट महसूल उत्पन्न मिळणे याचा अभाव होता. 2009 मध्ये अभ्यागतांच्या ट्विटरसाठी लेखन
संख्येत 1300 टक्के वाढ होत असताना, ट्विटर ही एक महत्त्वाची उत्सुकतेपेक्षा जास्त
असल्याचे स्पष्ट झाले.तथापि, एका वर्षामध्ये सोशल नेटवर्किंगची जुगलबंदी फेसबुकने NOTES
पहिल्यांदाच नफ्यात बदलली, एप्रिल-2010 मध्ये ट्विटरने “जाहिरात केलेले ट्विट” –
शोध परिणामात दिसणार्या जाहिराती – त्याचे प्राथमिक कमाईचा स्रोत म्हणून अनावरण
केले.
ट्विटरचा वापर मायस्पेस आणि फेसबुकसारख्या अनेक सामाजिक आंतरजाल
संकेतस्थळांवर लोकप्रिय आहे.कोणी निश्चित व्यक्ती कोणत्या वेळेत काय काम करत
आहे, हे जाणणे ट्विटरचे मुख्य काम आहे.ही मायक्रो-ब्लॉगिंग सारखी आहे. या ठिकाणी
कोणीही आपले विचार थोडक्यात व्यक्त करू शकतो. ट्विटरच्या साहाय्याने अगदी कमी
शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करता येतात, किंवा संवाद साधता येतो. ट्विटरवर मात्र अधिकाधिक
२८० शब्दांची मर्यादा आहे.
ट्विट्स ही २८० (पूर्वी १४०) अक्षरापर्यंतची लिखित पोस्ट असते. लेखक ही पोस्ट
आपल्या पानावर प्रकाशित करतो आणि ती कोणीही वाचू शकतो. वेबसाईट, लघु संदेश
सेवा (SMS), किंवा बाह्य अनुप्रयोगांच्या माध्यमातून ट्विट पाठवता येते आणि तिचे उत्तर
मिळवता येते. इंटरनेटवर ही सेवा नि:शुल्क आहे. परंतु एस.एम.एस. च्या माध्यमातून
पाठविल्यास फोनचा चार्ज पडतो. ट्विटरवर लाईव्ह फोटोना सरळ Gif (Graphics
Interchange Format) इमेजमध्ये बदलता येते, व यासाठी कोणत्याही अॅपची गरज
नसते.
२.२.९ रँकिंग्स
ट्विटरचे मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्नियामध्ये ७९५, फ़ॉल्सम स्ट्रीटवर आहे.
ट्विटर ही अलेक्सा इंटरनेटच्या वेब यातायातच्या विश्लेषणाद्वारे विश्वभरातील सर्वात
लोकप्रिय वेबसाईटच्या रूपात २६व्या श्रेणीवर आली आहे. तसे अनुमानित दैनिक
वापरकर्त्यांची संख्या बदलत राहते, कारण कंपनी सक्रिय खात्यांची संख्या देत नाही. तसे
फेब्रुवारी २००९ मध्ये compete.com ब्लॉग द्वारे ट्विटरला सर्वात जास्त प्रयोग करणारे
सामाजिक नेटवर्कच्या रूपात तिसरे स्थान दिले आहे. त्यानुसार नवीन सभासदांची संख्या
साधारण ६० लाख आणि मासिक निरीक्षकांची संख्या ५ कोटी ५० लाख आहे. प्रत्यक्षात
मात्र फक्त ४०% नियमित वापरकर्ते आहेत. मार्च २००९ मध्ये Nielsen.com ब्लॉगने
ट्विटरच्या सदस्य समुदायाची नोंदणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी ट्विर वर पण काही असुरक्षिततेच्या बातम्या येत होत्या. ट्विटर एका
आठवड्यात दोनदा ‘फिशिंग स्कॅम च्यात आले. यामुळे ट्विटरद्वारा उपयोक्ताला सावधानतेचा
इशारा देण्यात आला की ते ‘डायरेक्ट मेसेज’वर या कोणत्याही संदिग्ध लिंकला क्लिक
करू नये. साइबर अपराधी उपयोक्ता लोकांना फसवणूक करून उपयोक्ता नाव आणि
पासवर्ड इत्यादीची चोरी करतात त्यांच्याद्वारे उपयोक्ताला ट्विटरवर आपल्या मित्रांकडून
डायरेक्ट मेसेजच्या आत छोटेसे लिंक मिळते. त्यावर क्लिक करताच उपयोक्ता एक खोट्या
वेबसाईटवर पोहोचतो. हे एकदम ट्विटरच्या होम पेज सारखे दिसते. इथेच उपयोकत्याला
आपली लॉग-इन माहिती एंटर करण्यासाठी म्हटले जाते, ठीक तसेच जसे की ट्विटर च्या
मूळ पृष्ठ वर असते आणि या प्रकारे ही माहिती चोरली जाते. एक उपयोक्ता डेविड कैमरन
ने आपल्या ट्विटरवर जसेच एंटर की दाबली तो खराब संदेश त्यांच्या ट्विटर मित्रांच्या
यादीतील उपयोक्ता पर्यंत पोहचला. त्यामुळे हे स्कॅम जगातील इंटरनेटपर्यंत पोहोचले.
सुरक्षा विशेष तज्ज्ञा अनुसार साइबर अपराध्याने चोरलेलेल्या माहितीचा प्रयोग बाकीच्या
खात्याला ही हॅक करण्यात करू शकतात किंवा याने कोणत्या तरी दूरच्या कंप्यूटरमध्ये
जपून ठेवली असलेल्या माहितीला हॅक करू शकतात. यापासून वाचण्यासाठी उपयोक्तांचा
आपल्या खात्याचा पासवर्ड कोणता तरी कठीण शब्द ठेवून ठेवायला हवा आणि एकच
पासवर्डचा प्रयोग करू नये. जर एखाद्याला हे कळाले की त्यांच्या ट्विटर खात्यातून संदिग्ध
संदेश पाठवले जाते तर त्याने आपल्या पासवर्डला लगेच बदलणे महत्त्वाचे आहे. तसेच
आपल्या ट्विटर खात्याची सेंटिंग्स किंवा कनेक्शन एरिया सुद्धा तपासा. जर तिकडे कोणत्या
थर्ड पार्टीची ऐप्लिकेशन संदिग्ध वाटते तर त्या खात्याला एक्सेस करण्यासाठी परवानगी
देऊ नये. ट्विटरने पण सुरक्षा कडक करण्यासाठी पासवर्डच्या रूपात प्रयोग होणारे ३७०
शब्दांचा निषेध करून त्या अनुसार पासवर्डच्या या शब्दांच्या बद्दल अनुमान लावणे सोपे
आहे.
Self-Instructional
Material 158
वेबसाईट आणि ब्लॉग,
२.२.१० मायक्रोब्लॉगिंग सेवा (Microblogging service) ट्विटरसाठी लेखन
वैयक्तिक संगणक किंवा भ्रमणध्वनीद्वारे संदेश वितरीत करणारी ऑनलाईन लघु स्तंभ NOTES
लेखन सेवा ट्वीटरमध्ये मायस्पेस (Myspace) आणि फेसबुक (Facebook) यांसारख्या
सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांसारखे त्वरित संदेशवहन इन्स्टंट मॅसेजिंग; (instant
messaging) या तंत्रज्ञानाचा समावेश करून संक्षिप्त संदेशाद्वारे किंवा “ट्विट” करून
दिवसभर संवाद साधू शकणाऱ्या वापरकर्त्यांचे जाळे तयार करण्यात आले आहे.
वापरकर्ता भ्रमणध्वनीचा कळफलक (कीपॅड) किंवा संगणकावरुन संदेश तयार करतो
आणि ट्विटरच्या सर्व्हरवर पाठवितो, पाठविणाऱ्याच्या यादीमध्ये असणाऱ्या इतर
वापरकर्त्यांना पुढे तो संदेश forward करण्यात येतो. संदेश मिळणाऱ्या वापरकर्त्यास
अनुयायी म्हंटले जाते. Followers. यासोबतच वापरकर्ता विशिष्ट विषयांवर मागोवा ठेवू
शकतो, संवादावर प्रतिक्रिया नोंदवू आणि दिलेल्या ट्विटर फीडवरील लाखो अनुयायांना
प्रेषित करू शकतो.ट्विट कोणत्याही विषयावर असू शकतात परंतु ते २८० अक्षरांपेक्षा जास्त
असू शकत नाहीत.
Self-Instructional
Material 159
वेबसाईट आणि ब्लॉग,
ट्विटरसाठी लेखन १) www.memarathi.com
NOTES
२) www.departmentforeducation.com
3) www.barkhdutt.com
Self-Instructional
Material 160
वेबसाईट आणि ब्लॉग,
२.२.११ सारांश ट्विटरसाठी लेखन
आपल्या सर्व विवेचनातून असे दिसून येते की आज या समाज माध्यम यांचा वापर NOTES
कसा केला जात आहे. जगासोबत जगण्यासठी या सर्व नव समाजमाध्याम यांची हाताळणी
आपल्याला जमली पाहिजे तेव्हा आपण काळाबरोबर चालू शकतो. आज वेब, tiwter,
ब्लॉग यांसारख्या माध्यमांची गरज आपल्याला आहे. टी एक जगण्याची आणि संपर्काचे
माध्यम झाले आहे.
Self-Instructional
Material 162
व्यावसायिक
२.३. व्यावसायिक पत्रव्यवहार पत्रव्यवहार
NOTES
२.३.१ प्रस्तावना
२.३.२. उद्दिष्टे
२.३.३ पत्रलेखनाचे मुख्य प्रकार
२.३.४. पत्रलेखन कसे करावे?
२.३.५. सारांश
२.३.६. महत्वाचे शब्द
२.३.७. सरावासाठी प्रश्न
२.३.८. अधिक वाचनासाठी पुस्तके
२.२.१. प्रस्तावना
सामान्यत: आज आपण तंत्रज्ञानाच्या युगात पत्रव्यवहार करणे विसरून गेलो आहेत.
आज त्याची जागा सामाजिक माध्यमांनी घेतली आहे. एखादा एस. एम. एस. तत्काळ
पाठवता येतो. संगणकीय माध्यमामुळे एखादे पत्र आपण तात्काळ ईमैल च्या माध्यमातून
तात्काळ पाठवू शकतो. पूर्वी हाताने लिहिलेली पत्रे वाचण्यासाठी जी आतुरता असायची ती
आता राहिली नाही. पत्रलेखन लिहण्यासाठी जी शैली, जो आपलेपणा लिहिण्यात असायचा
ती परिस्थिती आता राहीली नाही. एक साचलेपण आणि मर्यादा आलेल्या दिसतात.
एकमेकाशी बोलण्यासाठी संवाद करण्यासाठी वेळ नाही. म्हणून पूर्वी जो आपलेपणाचा
भाव पत्रलेखनात आशयाचा तो आज दिसत नाही. कारण संवाद हा फक्त सामाजिक
माध्यमानुसार होतांना दिसत आहे. तसेच प्रेम, आपुलकीची भावनाही बोथट होत चालली
आहे.
एखाद्या वेळेस आपण पूर्वी पत्रलेखन करतांना ज्या आठवणी आठवून आठवून
लिहायचो त्या गोष्टी आज कमी होतांना दिसत आहे. पत्रलेखन हा एकमेकांची विचारांची
देवाणघेवाण करण्यासठी मह्त्वाचे माध्यम आहे. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी,
समाजात जागरूकता पसरविण्यासाठी एक अतिशय सर्वोत्तम मार्ग आहे.
‘महोदय’- सारखा निर्देश त्यात पुरेसा असतो. मायना लिहिण्याच्या पूर्वी पुष्कळदा
पत्राचा विषय आणि पूर्वकालीन पत्राचा संदर्भ एकाखाली एक देण्याची पद्धत आढळते (३)
मसुदा : हा पत्राच्या मजकुराचा भाग असतो. सामान्यपणे सुस्पष्टता, समर्पकता, संपूर्णता,
सविनयता, संक्षिप्तता, संभाषणात्मकता व समंजसपणा असे सप्त ‘स’ गुण पत्राच्या मजकुरात
असावेत अशी अपेक्षा असते (४) समाप्तीचा मायना : पत्राचा मजकूर समाप्त झाल्यावर
स्वतःची स्वाक्षरी करण्यापूर्वी पत्रलेखकाला समाप्तीचा मायना लिहावा लागतो. आईवडिलांना
व इतर वडीलधाऱ्यांना लिहिलेल्या पत्राचा शेवट पुष्कळदा ‘आपला आज्ञाधारक’ या
वचनाने केला जातो. याशिवाय ‘आपला’, ‘आपलाच’, ‘तुझा’, ‘तुझाच’, ‘आपला
स्नेहांकित’, ‘आपला स्नेहाकांक्षी’ असेही समाप्तिचे मायने वापरले जातात. व्यावसायिक
पत्रलेखनात ‘आपला’, ‘आपला विश्वासू’ यांसारखे प्रयोग केले जातात (५) स्वाक्षरी : पत्राच्या Self-Instructional
शेवटी उजव्या बाजूला खाली पत्रलेखकाची स्वाक्षरी असते. Material 163
व्यावसायिक
पत्रव्यवहार परिणामकारक पत्रलेखन करणे, ही एक कला मानली जाते. पत्रलेखनासाठी वापरण्याचा
कागद वा छापील पत्रशीर्षे, टपाल खात्याकडून उपलब्ध होणारी कार्डे अंतर्देशीय पत्रे व
NOTES पाकीटे यांतून योग्य त्या प्रकाराची करावयाची निवड, पत्रलेखनातील हस्ताक्षर, भाषाशैली,
मसुद्यातील परिच्छेदयोजना, पत्र हस्ताक्षरात लिहावयाचे की टंकलिखित करून घ्यावयाचे
याचा विवेक व पत्रावर पत्ता लिहिण्याची पद्धती यांसारख्या अनेक दृष्टींनी परिणामकारक
पत्रलेखनाचा विचार करण्यात येतो. या सर्व अंगोपांगांचा काटेकोर विचार करणारे
पत्रलेखनाचे एक शास्त्रच जणू आधुनिक काळात उदयास आले आहे.
आज आपण पाहतो मोबाईल, इंटरनेट, फेसबुक, व्हाट्सअॅप, ट्वीटर या नवमाध्यमे व
समाजमाध्यमांमुळे आपण यावरील माध्यमांद्वारेच संवाद साधत असतो. परंतु आजही
खेडेगावात, ज्यांच्याकडे पुरेसा वेळ आहे, ज्यांना लेखनाची आवड आहे, ज्यांना चांगले
नवनवीन संदेश समाजाला द्यायचे आहेत असे लोक पत्रलेखन आवर्जून करताना दिसून
येतात. पत्रलेखनात शब्दांच्या माध्यमातून आपल्याला विचार, भावना आणि संवेदना अत्यंत
तीव्रपणे प्रकट करता येतात. एका अर्थाने पत्रलेखन करणाऱ्या व्यक्तीचा पत्रवाचकावर
नक्की प्रभाव पडतो. म्हणूनच पत्र हे अभिव्यक्तीचे एक शक्तिशाली आणि सुलभ असे
माध्यम आहे.
२.३.२ उद्दिष्टे
• पत्रलेखनाचे प्रकार
i) औपचारिक पत्र
ii) अनौपचारिक पत्र
Self-Instructional
Material 165
व्यावसायिक
पत्रव्यवहार सरकारी कार्यालये, प्राचार्य, प्रकाशक, व्यावसायिक संस्था, दुकानदार इत्यादींसाठी
लिहिले जाणारे जे पत्रलेखन असते त्याला औपचारिक पत्रलेखन असे म्हणतात.
NOTES
व्यावसायिक पत्रलेखन करताना पुढील गोष्टी लक्षात घ्याव्यात.
• पत्राची सुरूवात करताना वरती उजव्या कोपऱ्यात पत्ता लिहिण्यापूर्वी आपले पूर्ण नाव
लिहावे. त्याखाली पूर्ण पत्ता पिनकोडसहित लिहावा.
• पत्र ज्याला लिहायचे आहे त्याचे नाव आणि संबंध लक्षात घेऊन मायना लिहावा.
• त्याखाली पत्राचा विषय व काही संदर्भ असल्यास तो सुद्धा लिहावा. योग्य, नेटक्या
शब्दांत मजकूर लिहावा. परिच्छेद पाडावेत. पाल्हाळ असू नये.
• पत्राच्या वरच्या बाजूस उजव्या कोपऱ्यात पत्रलेखकाचे नाव, पत्ता, तारीख लिहावी.
Self-Instructional
Material 166
व्यावसायिक
३. चांगले पत्रलेखन करण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात पत्रव्यवहार
• सोपी भाषा शैलीः वाचक समजू शकेल अशी सोपी भाषा वापरा.
डॉ.निखील पाटील,
ग्रंथपाल,
ग्रंथालय विभाग,
झुलाल भिलाजीराव महाविद्यालय, देवपूर, धुळे.
दि.१० फेब्रुवारी २०२१
प्रति,
मा. प्रकाशक,
शब्दवैभव प्रकाशन, पुणे.
Self-Instructional
विषय : मराठी विषयाची पुस्तके पाठवणेबाबत... Material 167
व्यावसायिक
पत्रव्यवहार महोदय,
उपरोक्त विषयानुसार आमच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी शैक्षणिक वर्षे २०२०-
NOTES २१ साठी मराठी विषयाची काही निवडक पुस्तके खरेदी करावयाची आहेत. तुमच्या
प्रकाशनाची सूची आम्हाला पाहण्यास मिळाली आहे. त्या यादीतील काही निवडक पुस्तके
आम्ही खरेदी करू इच्छित आहोत. कृपया ती पुस्तके लवकरात लवकर ग्रंथालयासाठी
पाठवावीत. ही विनंती.
खरेदी करावयाच्या पुस्तकांची यादी पुढीलप्रमाणे :-
वरील पुस्तके तातडीने पाठवून आम्हाला सहकार्य करावे. तसेच आपण महाविद्यालयाच्या
ग्रंथालयासाठी सवलतीच्या दरात देण्यात यावी ही विनंती.
पुस्तके मिळाल्यानंतर त्वरित आपले बिल आर टी जी एस ने पाठवीण्यात येईल, याची
नोंद घ्यावी.
आपला विश्वासू
डॉ. निखिल पाटील
उदाहरणासाठी काही पत्रांचे विषय पुढे देत आहे. तुम्ही या विषयांवर पत्रलेखन
लिहिण्याचा प्रयत्न करा.
१. बोनाफाईड प्रमाणपत्र मिळावे यासाठी पत्रलेखन करा.
२. तुमच्या परिसराच्या स्वच्छतेसाठी आरोग्य अधिकारी यांना पत्र लिहा.
३. तुमच्या क्षेत्रातील वाढलेल्या अनियमित बीज-भारनियम संकटाबद्दल वीज अधिकान्यांना
पत्र लिहा.
४. वाढत्या जलप्रदूषणाबद्दल नियंत्रण विभागाला पत्र लिहा.
५. बस थांबा सुरू करण्यासाठी आगारप्रमुखांना पत्र लिहा.
मयूर सोनवणे
हडपसर, पुणे
दि. ०९ एप्रिल २०२१
प्रति,
मा. संचालक,
स्थानिक स्वराज संस्था,
शाखा –कोथरूड
महोदय,
मा. संचालक साहेब आपण आपल्या संस्थेत मला काम करण्याची संधी दिल्याबद्दल
सुरूवातीला मी आपला मनापासून आभारी आहे.
माझ्या शैक्षणिक पात्रतेचा सकारात्मक विचार करून आपण माझ्यावर जो विश्वास
दाखवला आहे, त्या विश्वासास मी नक्की पात्र ठरेन अशी मी आपल्याला ग्वाही देतो. मी
पुन्हा एकदा आपले मनापासून खूप आभार मानतो. धन्यवाद.
आपला विश्वासू
मयूर सोनवणे Self-Instructional
Material 169
व्यावसायिक
पत्रव्यवहार २. मित्राला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे पत्र लिहा.
दीपक मोरे
NOTES साक्री रोड, धुळे,
जिल्हा धुळे– ४२४००१
प्रति,
मित्रवर्य, मुकुंद
यास नमस्कार,
मुकुंद सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. तू लहानपणापासूनचा माझा
बालमित्र आहे. तुझा स्वभाव हा मनमिळावू, सर्वांना मदत करणारा, सर्वांशी प्रेमाने वागणारा
असा आहे. तू आता आयुष्याच्या खूप महत्त्वाच्या टप्प्यावर आहेस. आता तुला तुझ्या
करिअरची दिशा ठरविण्याचाही हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे तू आता खूप अभ्यास
कर, चांगले कष्ट घे आणि तुझं आयुष्य उज्वलपणे उभं करण्याचा प्रयत्न कर.
आजच्या तुझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मला माझ्या वैयक्तिक कारणामुळे
उपस्थित राहता येत नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. त्यामुळेच मी हे पत्र तुझ्यासाठी
लिहिले आहे. पुढील वाढदिवसाच्या निमित्ताने नक्की भेटू. धन्यवाद!
आपला विश्वासू
दीपक मोरे
२.२.५. सारांश
अशा प्रकारे आज आपण व्यवसायिक पत्रव्यवहार कसा करू शकतो ते आपण उदा.
पहिले त्यामध्ये सुरुवातीला औपचारिक आणि अनपाचारिक पत्र लेखन पहिले परतू आज
नविन इमेल किवा एस एम एस आपण पत्र लेखन करू शकतो. म्हणून आज व्यवसायिक
पत्र लेखन आज online मध्यामाद्व्रारे केले जातात. त्याचे उपयोजन करणे आज गरजेचे
आहे.
Self-Instructional
Material 171