Professional Documents
Culture Documents
Untitled
Untitled
४.० प्रस्तावना
अर्थव्यवस्थेतील जे क्षेत्र सेवा देण्याच्या संबंधित कार्यामध्ये असते त्याला सेवा क्षेत्र
म्हणतात. सेवा क्षेत्रामध्ये प्रामुख्याने परिवहन, कुरियर, दूरसंचार, रिअल इस्टेट, हॉटेल,
रेस्टॉरंट, आरोग्य, कला आणि मनोरंजन, विमा, वित्तीय सेवा, पर्यटन इत्यादींचा समावेश
होतो. भारताच्या आर्थिक विकासामध्ये सेवा क्षेत्रातील साधारणत: ५५ टक्के योगदान आहे.
अर्थव्यवस्थेचे तिसरे क्षेत्र म्हणूनसुद्धा सेवा क्षेत्राला ओळखले जाते. देशाच्या आर्थिक
विकासामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा हा प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्रापेक्षा जास्त असेल, तर
त्या अर्थव्यवस्थेची गणना विकसित अर्थव्यवस्थेमध्ये केली जाते. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये
सेवा क्षेत्राचे योगदान फार मोठे आहे. १९९१ च्या उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या
धोरणानंतर भारतीय सेवा क्षेत्राने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
उद्दिष्टे
या प्रकरणाच्या अभ्यासानंतर आपणास
• भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राचे महत्त्व स्पष्ट करता येईल.
• भारतीय सेवा क्षेत्रापुढील आव्हाने सांगता येतील.
• भारतीय सेवा क्षेत्रातील अलीकडील प्रवाह सांगता येतील. Self-Instructional
• डिजिटल इकॉनॉमी, ई-कॉमर्स आणि फायनान्स या संकल्पना स्पष्ट करता येतील. Material 89
सेवा क्षेत्र पर्यावरण
४.१. भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राची भूमिका
NOTES भारतातील सेवा क्षेत्राची वाढ ही आर्थिक वाढीच्या पारंपरिक मॉडेल्सना मागे टाकून
पुढे जाण्याचे, झेप घेण्याचे एक अनोखे/अद्वितीय उदाहरण आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ५०
वर्षांच्या अल्पावधीत, सेवा क्षेत्राने देशातील जीडीपीमध्ये (Gross Domestic Product;
स्थूल देशांतर्गत उत्पादन ) सिंहाचा वाटा उचलला आहे. भारतातील जीडीपीमध्ये या क्षेत्राचे
योगदान ६०% पेक्षा जास्त आहे. तथापि, अद्याप या क्षेत्रात उपलब्ध श्रमिक शक्तीपैकी
केवळ २५%कामगारांनाच नियुक्त केले जाते/काम मिळते/रोजगार मिळतो. परिणामी
आपला बहुसंख्य नोकरदार वर्ग शेती (जिथे मंदी आहे) आणि उत्पादन क्षेत्र (ज्याचा अजून
पूर्ण क्षमतेने विकास झालेला नाही) यांवरच रोजगारासाठी अवलंबून आहे. हे भारतातील
भविष्यकालीन आर्थिक विकासासाठी मोठे आव्हान आहे. ते पेलण्यासाठी भारतातील सेवा
उद्योगाच्या क्षमतेचा त्वरित उपयोग करण्यास चालना देणारा नवीन, चौकटीबाहेरचा विचार
करण्याची आवश्यकता आहे. ‘इन्व्हेस्ट इंडिया’ भारतीय अर्थव्यवस्थेमधील सेवा क्षेत्रातील
योगदानाचा, त्याच्या यशाचा आढावा घेते आणि भविष्यात न्याय्य/समान आर्थिक वाढ
घडवू शकतील अशा घटकांवर संशोधन करते.
द्वितीय क्षेत्र
द्वितीय क्षेत्रात उत्पादन, प्रक्रिया व बांधकाम यांचा समावेश असतो. मनुष्यप्राण्याने
निसर्गनिर्मित गोष्टींवर प्रक्रिया करून नवनव्या वस्तूंचे उत्पादन व निर्माण सुरू केले म्हणून
हे द्वितीय क्षेत्र झाले. प्राथमिक क्षेत्रातील कच्च्या मालाचा वापर करून उच्च मूल्य असणाऱ्या
अंतिम वस्तूंची निर्मिती दुय्यम क्षेत्रामध्ये केली जाते. उदाहरणार्थ खाणीतील लोखंडाचा
वापर यंत्र निर्मितीसाठी होतो.
तृतीय क्षेत्र
अर्थव्यवस्थेतील तिसरे क्षेत्र म्हणजे सेवाक्षेत्र. तृतीयक क्षेत्रात अर्थव्यवस्थेतील सर्व
प्रकारच्या अदृश्य स्वरूपातील सेवांचा समावेश होत असल्याने त्यास सेवा क्षेत्र असे
संबोधले जाते. सेवा क्षेत्रातील उद्योगांना ‘ज्ञान अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करावे लागते.
सेवांची निर्मिती व पुरवठा हे या क्षेत्राचे प्रमुख वैशिष्ट्य असून ग्राहकांना सामान्य दर्जाच्या
सेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश असतो. सेवा क्षेत्रात प्रामुख्याने व्यापार, वाहतूक,
दळणवळण, वित्तपुरवठा व व्यावसायिक स्वरूपाच्या अदृश्य सेवांचा समावेश होतो.
Self-Instructional ग्राहकांची गरज ओळखून तिची जलद व कमीतकमी किंमतीला पूर्तता करणे हे सेवा क्षेत्राचे
Material 94 वैशिष्ट्य आहे. ‘बँकिंग’ या सेवा क्षेत्रातील महत्त्वाच्या घटकाकडे पाहिल्यास माहिती व
सेवा क्षेत्र पर्यावरण
संचार तंत्रज्ञानाचा वापर करून किमान मनुष्यबळाच्या साहाय्याने किमान खर्चात उत्तम व
चोवीस तास उत्कृष्ट सेवा देण्यात झालेले बदल सहज समोर येतात.
उत्पादकता, उपयुक्तता, क्षमता, टिकाऊपणा आणि संभाव्यता यांत सुधारणा करण्यासाठी NOTES
माणसाने आपल्या ज्ञानाचा व वेळेचा उपयोग करून केलेल्या सर्व बाबी सेवा क्षेत्रात येतात.
अशा अदृश्य सेवांत वस्तूत सुधारणा करणे, सल्ला देण,े मदत, अनुभव, चर्चा, तज्ज्ञता
यांचा समावेश होतो. सद्य:स्थितीत सेवा क्षेत्राची व्याप्ती वाढत असून त्याची काही उदाहरणे
पुढीलप्रमाणे: शिक्षण, दूरसंचार, पर्यटन, वित्तपुरवठा, माध्यमे, आदरातिथ्य, कायदेविषयक
सेवा, अन्नप्रक्रिया उद्योग, सल्ला सेवा, गुंतवणूक, किरकोळ विक्री सुविधा इत्यादी.
ज्ञानाधिष्ठित क्षेत्र
ज्ञानाधिष्ठित क्षेत्र हे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेचे एक चतुर्थ क्षेत्र
म्हणून ओळखले जाते. हे ज्ञानावर आधारित आहे आणि त्यात विशिष्ट संशोधन आणि
विकास (संशोधन आणि विकास) समाविष्ट आहे.
ज्ञानाधिष्ठित क्षेत्र विस्तृत संकल्पना दर्शविते, ज्यात ज्ञान आणि माहितीवर आधारित सर्व
सेवांचा समावेश आहे, म्हणजेच आरोग्य, शिक्षण, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान इत्यादी.
चतुर्थ क्षेत्र हे उच्च शिक्षणावर आधारित आहे आणि त्यासाठी अत्यधिक कुशल कामगार
आवश्यक आहेत. ज्ञानाधिष्ठित क्षेत्र विशेषत: प्रगत देशांमध्ये वाढत आहे आणि इतर
क्षेत्रांमध्ये, विशेषत: उद्योग आणि सेवांमध्येही नावीन्य आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका
बजावतात.
ज्ञानाधिष्ठित क्षेत्र नवीन बाजारपेठ विकसित करते, नवीन उद्योग तयार करते, नावीन्यपूर्ण
सेवा, उत्पादने किंवा कामाच्या पद्धती तयार करते म्हणूनच ज्ञानाधिष्ठित क्षेत्र देशाच्या
अर्थव्यवस्थेसाठी आणि समाजाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे.
व्याख्या
अर्थव्यवस्थेचे क्षेत्र जे ज्ञानाधिष्ठित क्रियांवर आधारित असते आणि भौतिक साधनांपेक्षा
बौद्धिक भांडवलावर अधिक अवलंबून असते अशा क्षेत्राला ज्ञानाधिष्ठित क्षेत्र असे म्हणतात.
ज्ञानाधिष्ठित क्षेत्रामध्ये प्रामुख्याने हायटेक मॅन्युफॅक्चरिंग जसे संगणक, इलेक्ट्रॉनिक्स,
एरोस्पेस; सेवा क्षेत्रातील उद्योग जसे शिक्षण, आरोग्य सेवा, सॉफ्टवेअर डिझाईन, विमा,
माहिती आणि संप्रेषण यांसारख्या सेवा यांचा समावेश होतो.
पारंपरिक क्षेत्रामध्ये आर्थिक घडामोडींमध्ये उत्पादनांचे मुख्य घटक जमीन, कामगार,
भांडवल, उद्योजक हे असतात, तर ज्ञानाधिष्ठित क्षेत्रामध्ये लाईनवर कामगारांनी वस्तूचे
उत्पादन करण्यापासून ते कामाच्या पद्धतीमध्ये लवचिकता आणणे, तसेच उत्पादन निर्मिती
आणि विपणनाच्या प्रक्रियेमध्ये नवीन व्यावसायिक कल्पनांचा समावेश करणे यांचा अंतर्भाव
असतो.
ज्ञानाचे प्रकार
अप्रच्छन्न ज्ञान - तथ्ये, आकडेवारी, डेटा.
ध्वनित ज्ञान - गोष्टी कशा कार्य करतात, अनुभव, निर्णय, अंतर्ज्ञान, लोकांशी
वागण्याचा मार्ग. Self-Instructional
Material 95
सेवा क्षेत्र पर्यावरण
शैक्षणिक पात्रता ही एखाद्याचे अप्रच्छन्न ज्ञान दर्शवते आणि काही प्रमाणामध्ये ध्वनित
ज्ञान दर्शवते; परंतु ज्ञानाधिष्ठित क्षेत्रामध्ये ज्ञान हे स्वतः अनुभव घेऊन काम करून
NOTES मिळवले जाते जे पारंपरिक शिक्षण पद्धतीच्या पलीकडील असते.
नावीन्य आणि ज्ञान हे अर्थव्यवस्थेसाठी नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. काही अर्थशास्त्री
असे म्हणतात, की गेल्या काही दशकांमध्ये आधुनिक अर्थव्यवस्था ही अधिक ज्ञानाधिष्ठित
अर्थव्यवस्था बनत चालली आहे. तंत्रज्ञानाच्या उद्योगांची वाढ, सेवा क्षेत्राची वाढ, स्वयं
रोजगारात वाढ, आणि बौद्धिक संपदा म्हणजेच पेटंटच्या संख्येमध्ये वाढ दर्शवतात.
Self-Instructional
Material 96
सेवा क्षेत्र पर्यावरण
ज्ञानाधिष्ठित क्षेत्राच्या समस्या
• ज्ञानाधिष्ठित क्षेत्रामुळे उच्च कुशल आणि कमी कुशल कामगारांमधील वेतन
असमानता वाढत आहे. जरी या वेतन असमानतेची इतर कारणे असली तरी NOTES
ज्ञानाधिष्ठित क्षेत्र हे एक कारण असू शकते.
• ज्ञानाधिष्ठित क्षेत्र हे ‘गिग अर्थव्यवस्था’ वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. गिग
अर्थव्यवस्था ही एक मुक्त बाजारपेठ असून त्यात कंत्राटी रोजगार हे सर्वसामान्य
असतात. यामुळे उच्च बौद्धिक क्षमता असणाऱ्यांना अधिक संधी निर्माण होतात;
परंतु कमी कौशल्य असणाऱ्या कामगारांना तात्पुरते आणि कमी पगाराचे काम
मिळू लागते.
शिक्षण क्षेत्र
शिक्षण क्षेत्रातील मुख्य समस्या व आव्हानांचा विचार पुढील उपशीर्षकांतर्गत केला
गेला आहे –
१. शिक्षणावर होणारा खर्च
२. शैक्षणिक प्रवेशाचा/ नाव नोंदणीचा एकूण आकृतिबंध
३. क्षमतांचा वापर
४. पायाभूत सुविधा
५. पी.पी.पी. मॉडेल (PPP.model)
६. विद्यार्थी-शिक्षक प्रमाण
७. मान्यता व ब्रँडिंग – दर्जासाठीची मानके
८. परदेशात शिक्षण घेणारे विद्यार्थी
१. शिक्षणावरील खर्च
शिक्षणावर, विशेषत: उच्च शिक्षणावर केलेल्या खर्चाबाबत सांगायचे, तर सरकारने सन
२०१०-२०११ या वर्षात सुमारे १५,४४० कोटी रुपये खर्च केल.े ही रक्कम या वर्षाच्या
सुधारित अंदाजपत्रकाच्या अंदाजे ८५ टक्के इतकी आहे. नुकत्याच झालेल्या एनएसएसओच्या
६६ व्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे, की सन १९९९ ते २००९ या दरम्यान
शिक्षणावर केलेला खर्च देशातील ग्रामीण भागात ३७८ टक्क्यांनी आणि शहरी भागात ३४५
टक्क्यांनी वाढला आहे. सर्वेक्षणात असे दिसून आले आहे, की मुलांच्या शिक्षणावरील
खर्चात ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी ६३ टक्के आणि शहरी कुटुंबांसाठी ७३ टक्के इतकी
तीव्र वाढ दिसून येत.े तथापि, जर आपण शिक्षणावर होणारा खर्च जीडीपीच्या टक्केवारीच्या
तुलनेत मोजला, तर भारत काही विकसित/विकसनशील देशांपेक्षा मागे पडला आहे.
३. क्षमतेचा वापर
भारतीय शिक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी ज्याकडे लक्ष दिले पाहिजे असे आणखी
एक आव्हान म्हणजे क्षमता वापर सुधारणे. उदाहरणार्थ, उच्च शिक्षणासाठी भारतातील
क्षमतेच्या वापरावर नुकत्याच झालेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे, की एमबीएच्या
बाबतीत क्षमता वापर महाराष्ट्रात ५७ टक्के आणि हरियाणामध्ये ७२ टक्के आहे. काही
विशिष्ट राज्यांच्या बाबतीत शैक्षणिक संस्थांमध्ये जागा अनेक रिक्त/ न भरलेल्या राहतात.
एकीकडे आपल्याला आपला जीईआर सुधारण्याची आवश्यकता आहे, तर दुसरीकडे उच्च
शिक्षण देण्यासाठी तयार केलेल्या संस्था / महाविद्यालये / शाळा तयार केलेल्या क्षमतेचा
पूर्णपणे वापर करत असल्याची खातरजमाही करणे जरुरीचे आहे.
४. पायाभूत सुविधा
नवीन संस्था/महाविद्यालयांमध्ये (खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील दोन्ही) क्षमतेचा पूर्ण
वापर न होण्याचे /रिक्त जागांचे प्रमाण अधिक असण्याचे एक कारण म्हणजे संस्था
चालविण्यासाठी आवश्यक भौतिक पायाभूत सुविधा पुरवण्यातली त्यांची असमर्थता.
चांगल्या दर्जाच्या संस्थांची श्रेणी/ गुणानुक्रम ठरवण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत
सुविधांमध्ये जागा(रिअल इस्टेट),अत्याधुनिक वर्ग खोल्या, ग्रंथालय, वसतिगृह,े फर्निचर,
क्रीडा सुविधा, वाहतूक, व्यावसायिक इमारती इत्यादींचा समावेश आहे. दर्जेदार भौतिक
पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी राजकीय हेतूने प्रेरित नसलेल्या खाजगी क्षेत्राचा सहभाग
महाविद्यालयांच्या स्थापनेत आपण निश्चित करायला हवा.
Self-Instructional
Material 98
सेवा क्षेत्र पर्यावरण
५. पीपीपी मॉडेल
सरकार जीईआर, गुणवत्ता, गुंतवणूक, पायाभूत सुविधा इत्यादी अनेक मापदंडांनुसार
शिक्षणपद्धती सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे; परंतु शिक्षणात प्रचंड गुंतवणूक NOTES
करून मोठे फेरबदल घडवून आणण्यामध्ये आपण शासनाला असणाऱ्या मर्यादा
ओळखण्याची गरज आहे. मला खात्रीने वाटते, की भारतातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी
खासगी क्षेत्राने विशिष्ट भूमिका बजावण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात, शिक्षणातील
सार्वजनिक - खाजगी भागीदारीच्या (पब्लिक प्रायवेट पार्टनरशिप / पीपीपी) मॉडेलची
शक्यता पडताळणे उपयुक्त ठरेल. यामुळे महागड्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून
देण्याकरता सरकारवर पडणारा बोजा कमी होईल आणि इतकेच नव्हे तर अत्याधुनिक
इमारती, प्रयोगशाळा, ग्रंथालये, वसतिगृहे इत्यादींची निर्मितीदेखील होऊ शकेल. याशिवाय
विद्यापीठे / महाविद्यालये आणि कॉर्पोरेट कंपन्या यांच्या सहकार्याने संशोधन आणि
विकासाचे संयुक्त प्रकल्प उभे राहू शकतील. विद्यार्थ्यांना सुट्टीच्या कालावधीत इंटर्नशिप
किंवा कॉर्पोरेट प्रशिक्षणातून औद्योगिक कार्यप्रणालीची ओळख होईल तसेच इंटर्नशिप/
प्रशिक्षण इत्यादींसाठी कॉर्पोरेट्सद्वारे प्रमाणपत्रेही मिळतील. यातून संस्थांच्या ब्रँडिंगमध्ये व
प्रतिमा तयार होण्यात मदत होईल. तसेच विद्यार्थ्यांची नोकरीसाठीची सिद्धता व पात्रता
वाढवता येईल.
६. विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर/प्रमाण
भारतीय शिक्षण प्रणाली सुधारण्याचे आणखी एक आव्हान म्हणजे विद्यार्थी शिक्षकांचे
गुणोत्तर/प्रमाण सुधारणे. जगातल्या तुलना करण्याजोग्या काही देशांपेक्षा भारतात हे प्रमाण
खूप जास्त आहे. उदाहरणार्थ विकसित देशांमध्ये हे प्रमाण ११.४ आहे, तर भारताच्या
बाबतीत ते २२.० इतके आहे. सीआयएस (१०.९), वेस्टर्न एशिया (१५.३) आणि लॅटिन
अमेरिका (१६.६) मध्येही हे बरेच कमी आहे. यामुळे (कमी गुणोत्तरामुळ)े दर्जेदार शिक्षक
भरती करण्याची आवश्यकता निर्माण होते आणि वर्ग हाताळण्यासाठी शिक्षकांना आवश्यक
मदत मिळते. मला असेही वाटते, की विकसित देशांप्रमाणेच ज्यात विद्यार्थ्यांना अर्धवेळ
अध्यापनाची नेमणूक दिली जाते, तशी आपणही खालच्या स्तराचे वर्ग हाताळण्यासाठी
तांत्रिक/उच्च शिक्षणात देऊ शकू का ही शक्यता पडताळून पाहायला हवे. अशा नेमणुकांमुळे
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च अंशतः भागविण्यास मदत होईल अशीही अपेक्षा आहे.
लोकसंख्या
लोकसंख्येनुसार भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताची लोकसंख्या १९८५ NOTES
मध्ये ७६० दशलक्ष होती. २०१५ मध्ये ती अंदाजे १.३ अब्ज झाली.
पायाभूत सुविधा
वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी विद्यमान पायाभूत सुविधा पुरेशा नाहीत.
सार्वजनिक आरोग्य सेवा संस्थांमध्ये निधीची कमतरता आहे तसेच कर्मचारी कमी आहेत.
डॉक्टर- रुग्ण गुणोत्तर प्रमाण १:१७०० असून निराशाजनक आहे. रुग्णालयाच्या बेड आणि
परिचारिकांच्या संख्येमध्ये भारताची चीन आणि अमेरिकेशी तुलनाच होऊ शकत नाही.
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांवर (सीएचसी) तज्ज्ञांची संख्या ८१ टक्क्यांनी कमी आहे
(फक्त १९ टक्के).
ग्रामीण-शहरी असमानता
ग्रामीण भागातील लोकसंख्या ७०% आहे; परंतु तेथे मिळणाऱ्या आरोग्य सेवांचे प्रमाण
केवळ ३०% आहे. ग्रामीण भागातील मागणी-पुरवठ्यातील प्रचंड तफावत यावरून दिसून
येत.े भारतात शहरी भागात खाजगी क्षेत्राचे अधिक केंद्रीकरण आहे, तर प्राथमिक आरोग्य
केंद्रात (पीएचसीमध्ये) ३००० पेक्षा अधिक संख्येने डॉक्टरांची कमतरता आहे. बहुसंख्य
आरोग्य सेवा शहरी भागात केंद्रित आहेत.
विमा
विमा म्हणजे काय?
भविष्यात होणाऱ्या संभाव्य नुकसानापासून स्वत:ला वाचवण्यासाठी एखाद्या घटकाला
एकरकमी रक्कम देणे म्हणजे विमा होय. अशाप्रकारे, जेव्हा काही दुर्दैवीपणाचे प्रकरण येते
तेव्हा विमा उतरवणारा आपणास त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करतो.
व्याख्या
जस्टीस लॉरेन्स यांच्या मते, विमा हा एक असा करार आहे, की ज्याद्वारे एक पक्ष
(विमा कंपनी) दुसऱ्या पक्षाने (विमेदार) दिलेल्या योग्य मोबदल्याच्या बदल्यात दुसऱ्या
पक्षास करारात नमूद केल्याप्रमाणे संभाव्य धोक्यापासून नुकसान पोहोचल्यास त्याची भरपाई
करण्याचे आश्वासन देतो.
डब्ल्यू. ए. डिन्स डेल
विमा ही एक योजना असून तिच्याद्वारे विमेदार संभाव्य धोक्यापासून होणाऱ्या
नुकसानीची विशिष्ट प्रमाणात भरपाई करण्याची जबाबदारी योग्य मोबदल्यात विमा
कंपनीवर सोपवतात.
कार्यात्मक व्याख्या
विमा हे हानीचे वाटप करण्याचे साधन आहे. यामध्ये काही लोकांची झालेली हानी
अनेक लोकांमध्ये वाटली जाते.
विम्याचे प्रकार
१. जीवन विमा, जीवन संरक्षण हे विमी म्हणजे विम्याचे पारंपरिक प्रकार आहेत, जे
आपणास आणि आपल्या प्रियजनांना अचानक आपत्ती किंवा आपत्तीपासून वाचवण्यासाठी
डिझाइन केलेले आहेत. प्रारंभी हे कुटुंबांच्या उत्पन्नाचे रक्षण करण्यासाठी डिझाइन केले
होते; परंतु त्यानंतर, ते केवळ संरक्षण उपाय म्हणून विकसित केले गेले आहेत आणि संपत्ती
जतन करण्याच्या पर्यायासाठी आहेत. कर नियोजन, एखाद्या व्यक्तीवर अवलंबून असणारी
संख्या, चालू बचत,आर्थिक लक्ष्ये इ.
अनिष्ट स्पर्धा:
खाजगी कंपन्यांना विमा व्यवसायाची परवानगी दिल्यामुळे विमा व्यवसायामध्ये अनिष्ट
स्पर्धा निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणावर कसर ठेवून व्यवसाय करण्याकडे अनेक
खाजगी कंपन्यांचा कल असल्यामुळे व्यवसायातील स्थैर्य कमी होऊन व्यवसायात अनेक
प्रकार निर्माण झाले आहेत.
अकुशल मनुष्यबळ:
विमा एजंट बनण्यासाठी भारतामध्ये चलनविषयक जुजबी ज्ञान पुरेसे आहे. त्यामुळे
विमा व्यवसायाची संबंधित विशेष प्रशिक्षणावर भर दिला जात नाही. यामुळे प्रशिक्षित
मनुष्यबळाचा अभाव यामुळे विमा व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे.
पर्यटन:
आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या आगमनात (आयटीए) भारताचा वाटा अत्यल्प म्हणजे
केवळ १.१ टक्के असून भारत २४ व्या क्रमांकावर आहे. असे असले तरी आंतरराष्ट्रीय
पर्यटनातून मिळणाऱ्या निधीच्या (आयटीआर) बाबतीत भारताची स्थिती काहीशी बरी आहे.
आयटीआरमध्ये भारताचा वाटा १.८ टक्के असून तो १४व्या क्रमांकावर आहे. या क्षेत्रातील
धोरणात्मक सूचना आणि समस्यांमध्ये अंतर्भूत काही गोष्टी पुढे दिल्या आहेत. कमीतकमी
पाच प्रमुख पर्यटनस्थळांमध्ये तीन मूलभूत गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. त्या अशा:
विशेष पर्यटन संरक्षण दल असणारा पर्यटनाला अनुकूल आणि पर्यटकांकरता सुरक्षित
भारत देश; स्वच्छता, आरोग्यसुरक्षा आणि स्वीकारार्ह वातावरण; आणि पर्यटनाच्या उत्तम
पायाभूत सुविधा. या पायाभूत सुविधांमध्ये शहरांच्या मधोमध वाहणाऱ्या नद्यांच्या परिसराचे
सुशोभीकरण करणे, हॉटेल खोल्यांची संख्या वाढवून पर्यटकांना राहण्याची सोय करणे
आणि महत्त्वाच्या पर्यटन स्थळांमध्ये मूलभूत सुविधा सुधारण करणे यांचा समावेश आहे.
यासाठी काही क्षेत्राचे खाजगीकरण करून किंवा 'अॅडॉप्ट हेरिटेज प्रोजेक्ट'/ ‘वारसा-स्थळ
दत्तक घ्या’ यांसारख्या सरकारी योजनांच्या धर्तीवर सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या तसेच
शासकीय पाठबळाच्या आधारे सुधारणा घडवून आणता येतील. ई-व्हिसा आणि इमिग्रेशन
प्रक्रियेत आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. जसे की दिल्ली विमानतळावरील
ई-व्हिसा काउंटरची संख्या वाढवली, तर सध्याचा सरासरी ३ तासांचा प्रतीक्षाकाळ कमी Self-Instructional
करता येईल. Material 105
सेवा क्षेत्र पर्यावरण
(पर्यटनविषयक सुधारणांचा) आणखी एक भाग म्हणजे वैद्यकीय पर्यटनाला चालना
देण.े यासाठी वैद्यकीय पर्यटनाची सोय असणाऱ्या रुग्णालयांसाठी आयात सुविधा देण,े
NOTES वैद्यकीय पर्यटकांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, विमानतळांवर रुग्णवाहिका सेवा,
हेलिकॉप्टरने वैद्यकीय पर्यटकांना रुग्णालयात नेणे आणि वैद्यकीय व्हिसा, इमिग्रेशन आणि
इतर औपचारिकतांसाठी जलदगती क्लियरन्स आदि सेवांचे पॅकेज उपलब्ध करून देता
येईल.
पर्यटन क्षेत्रातील जीएसटीशी संबंधित समस्यांमध्ये पुढील मुद्द्यांचा समावेश आहे :
तरतुदीचे ठिकाण आणि पर्यटन सेवांमधून मिळालेल्या परदेशी चलनाच्या उत्पन्नाला निर्यात
किंवा डीम्ड निर्यात मानण्याची गरज; तसेच इतर प्रतिस्पर्धी देशांतील कराच्या दरांच्या
तुलनेत खूपच जास्त (सरासरी ५ टक्के) असलेले भारतातील जीएसटीचे दर. तसेच
पर्यटनातील निर्यात इतर निर्यातीप्रमाणे आणि सेवांप्रमाणेच समजली जाण्याची आणि अशा
व्यवहारांना शून्य रेट किंवा इनपुट टॅक्स न थांबवता खूप कमी दराने कर आकारला
जाण्याची गरज आहे. टूर ऑपरेटर सेवांसाठी इनपुट टॅक्स क्रेडिट देण्याचा विचार करणे
आवश्यक आहे; आणि भारतातील वस्तू खरेदी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांना जीएसटी
परताव्याची एक सोपी यंत्रणा तयार करणे जरुरीचे आहे.
मानवी संसाधने:
अत्यंत कुशल मानवी संसाधने हा पर्यटन क्षेत्रातील एक अपरिहार्य भाग आहे. आपल्या
भारतीय पर्यटन आणि पर्यटन उद्योगाची वाढ कायम राखण्यासाठी विविध स्तरांवर मोठ्या
प्रमाणात कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बँकिंग, अभियांत्रिकी
आणि औषध यांसारख्या इतर क्षेत्रांत मनुष्यबळात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. यामुळे
हळूहळू पर्यटन क्षेत्रासाठी उपलब्ध असलेल्या मानवी संसाधनांत घट झाली. त्यामुळे
आतिथ्य आणि पर्यटन या दोन्ही क्षेत्रांत काम करणाऱ्या कुशल कामगारांना मोठी मागणी
आहे.
कर आकारणी:
एअरलाइन्स सुविधा,हॉ टेल आणि टूर ऑपरेटरसह संपूर्ण उद्योगांवर उच्च कर
आकारण्यात येतो. जेव्हा पर्यटनाचा विचार केला जातो तेव्हा इतर कमी खर्चाच्या देशांसमोर
पर्यटनामध्ये मागे राहण्याचे हे एक मुख्य कारण आहे. उदाहरणार्थ, हवाई तिकिटांच्या
किंमतीचा विचार करता हे दर 29 राज्यांमध्ये करप्रणालीमुळे बदलतात.
सुरक्षा समस्या:
भारतीय पर्यटन व्यवसायासमोर पर्यटकांची सुरक्षा एक गंभीर समस्या आहे. हे एक
मोठे आव्हान आहे. विदेशी महिलांबरोबर दुर्व्यवहार, चोरी, क्रेडीट कार्ड फ्रॉड, आयडेंटिटी
चोरी, फूड पॉयझनिंग, दहशतवाद आणि सार्वजनिक हिंसाचार यांसारख्या समस्या
भेडसावत आहेत.
बँकिंगः
बँका प्रत्येक अर्थव्यवस्थेचा आधार असतात. बँका आर्थिकदृष्ट्या निरोगी राहणे फार
महत्त्वाचे आहे. अन्यथा, आर्थिक संकटाचा आघात एखाद्या देशाला मंदीकडे नेऊ शकतो,
जसे २००८ साली अमेरिकेत घडले. असे घडण्याची शक्यता विशेषतः भारतासारख्या
विकसनशील देशात अधिक आहे. ही गोष्ट भारतासारख्या विकसनशील देशासाठी विशेष
खरी आहे. "बँका या अर्थव्यवस्थेच्या जीवनरेखा असतात आणि त्या विशेषतः विकसनशील
देशांत आर्थिक वाढीला चालना देण्यात आणि ती टिकवून ठेवण्यात उत्प्रेरकांसारखे काम
करतात. भारतही याला अपवाद नाही."- एस.एस.मुंद्रा, डेप्युटी गवर्नर्, रिझर्व बँक ऑफ
इंडिया. तथापि, भारतीय बँकांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे,
ज्याचा त्यांच्या नफा आणि आर्थिक स्थिरतेवर परिणाम झाला आहे.
मालमत्तेची गुणवत्ता:
भारतातील बँकांना सर्वांत मोठा धोका म्हणजे थकित/बुडित कर्जात वाढ. गेल्या काही
वर्षांतील अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे थकित/बुडित कर्जे किंवा अनर्जक मालमत्तेत / नॉन-
परफॉर्मिंग अॅसेट (एनपीए) मध्ये वाढ झाली. ही अशी कर्जे आहेत ज्यांची कर्जदाराने
परतफेड केली नाही. अशी कर्जे हे बँकेचे नुकसान आहे. बँकिंग प्रणालीतील एकूण
कर्जापैकी निव्वळ एनपीए रक्कम फक्त २.३६% आहे. ही संख्या फारशी चिंताजनक
भासत नाही. तथापि, यात पुनर्गठित मालमत्तेचा समावेश नाही. जेव्हा कर्ज घेणारा परतफेड
करण्यास असमर्थ असतो तेव्हा बँक जास्त कालावधी देऊन कर्जफेड अधिक लवचिक
करते. पुनर्गठित मालमत्तादेखील बँकेच्या नफ्यावर दबाव आणते. एकत्रितपणे, अशा
तणावग्रस्त मालमत्तांचा बँकिंग प्रणालीतील एकूण कर्जापैकी १०.९% हिस्सा आहे. त्यातही
ही फक्त अशी कर्जे आहेत जी तणावग्रस्त मालमत्ता म्हणून आधीच घोषित केली गेली Self-Instructional
आहेत. आयएमएफच्या अहवालानुसार, भारतातील एकूण कर्जाच्या ३६.९% कर्जांत Material 107
सेवा क्षेत्र पर्यावरण
जोखीम आहे; पण बँकांमध्ये फक्त ७.९% तोटा सोसण्याची क्षमता आहे. त्यामुळे जर ही
कर्जेदेखील थकित/बुडित झाली, तर बँकांना मोठे नुकसान सहन करावे लागेल.
NOTES
भांडवलाची पर्याप्तता/पूर्तता :
थकित/बुडित कर्जापासून संरक्षणाचा एक उपाय बँका योजतात. तो असा, की 'तरतूद'
म्हणून पैसे बाजूला ठेवणे. हा पैसा कर्ज देण्यासह इतर कोणत्याही उद्देशांसाठी वापरला
जाऊ शकत नाही. परिणामी बँकांना त्यांच्या विविध कामांसाठी कमी भांडवल उपलब्ध
होते. भांडवल पर्याप्तता गुणोत्तर /कॅपिटल अॅडक्वसी रेश्यो बँकेचे भांडवल किती आहे हे
मोजते. जेव्हा हे घसरते तेव्हा बँकेला कर्ज देण्यासाठी पैसे उसने घ्यावे लागतात किंवा
ठेवीदारांचे पैसे वापरावे लागतात. तथापि, हे पैसे बँकेच्या स्वतःच्या भांडवलापेक्षा
धोकादायक आणि महाग आहेत. उदाहरणार्थ, ठेवीदार त्याच्या इच्छेनुसार केव्हाही पैसे
काढून घेऊ शकतो. त्यामुळे भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण किंवा सीएआर (बहुतेकदा
सीआरएआर किंवा कॅपिटल टू रिस्क अॅसेटस रेश्यो/भांडवल व जोखमीचे प्रभावी मालमत्ता
प्रमाण म्हणून ओळखले जाते) कमी होणे चिंताजनक आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय
बँकांमध्ये विशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सीआरएआरमध्ये सातत्याने घट झाली
आहे. शिवाय, बॅंकांना; विशेषत: जास्त थकित कर्ज असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील
बँकांना सहजपणे पैसे उभारता येत नाहीत. जर बँकांनी लवकरच त्यांच्या भांडवलाची स्थिती
सावरली नाही तर काही बँका आरबीआयने निश्चित केलेली किमान भांडवली आवश्यकता
पूर्ण करण्यात अपयशी ठरतील. अशा वेळी त्यांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
ई-कॉमर्स
कृषी उत्पादनांसारख्या पारंपरिक ऑफलाइन बाजाराचे रूपांतर आणि नियोजन
करण्यासाठी ई-कॉमर्स डिजिटल प्लॅटफॉर्म स्वीकारून त्याचा लाभ घेण्याकरता भारत
सरकार सक्रिय आहे. शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करण्यासाठी विविध राज्यांच्या भाजी
मार्केटशी जोडण्यासाठी सरकारने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. तसेच, स्टार्ट-अप
इंडिया, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया आणि इनोव्हेशन फंडसारखे मुख्य उपक्रम
ई-कॉमर्स उद्योगाच्या वाढीस हातभार लावत आहेत.
४.४ सारांश
कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचे विभागणी ही तीन क्षेत्रांमध्ये होते - प्राथमिक (शेती
व संबंधित क्षेत्रे), द्वितीय (औद्योगिक क्षेत्र) आणि तृतीयक (सेवा क्षेत्र) होते. सेवा
क्षेत्राच्या बाबतीत जगामध्ये भारताचा आठवा क्रमांक असून सेवा क्षेत्राचे राष्ट्रीय उत्पन्न
१५०० महापद्म डॉलर्स आहे. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सेवा क्षेत्राचा जवळपास ५५ टक्के वाटा
आहे. सेवा क्षेत्रातील शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, विमा क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, बँकिंग व्यवसाय
क्षेत्र, अनेक समस्यांचा सामना करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे अर्थव्यवस्थेची वाटचाल
ही डिजिटल इकॉनॉमीकडे सुरू आहे. ई-कॉमर्स आणि ई-फायनान्स यांनी अर्थव्यवस्थेमध्ये
महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.
दीर्घ प्रश्न
१. भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राची भूमिका स्पष्ट करा.
२. शिक्षण क्षेत्रासमोरील आव्हाने सविस्तरपणे स्पष्ट करा.
३. विमा क्षेत्रासमोरील आव्हाने सविस्तरपणे स्पष्ट करा.
४. पर्यटन क्षेत्रासमोरील आव्हाने सविस्तरपणे स्पष्ट करा.
५. डिजिटल अर्थव्यवस्था संकल्पना स्पष्ट करा.
५.० प्रस्तावना
प्रगत अर्थव्यवस्थेमध्ये बँकांचे स्थान महत्त्वाचे आहे. अर्थव्यवस्थेमध्ये बँका पैसारूपी
रक्ताचा प्रवाह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतात म्हणूनच बँकांना धमन्यांची उपमा
दिली गेली आहे. बँकांचे प्रमुख काम ठेवी स्वीकारणे व कर्जे देणे हे आहे. बँका पतनिर्मितीच्या
प्रक्रियेद्वारे पतरूपी पैसा निर्माण करतात. उद्योगधंद्यांना कर्जाच्या माध्यमातून भांडवल
पुरविण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. आधुनिक काळाबरोबर बँका बदलत गेल्या आहेत.
आजच्या काळात बहुतेक बँक व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने चालतात. इंटरनेट बँकिंग
मोबाईल बँकिंग यांनी बँकिंगची परिभाषा बदलली आहे.
उद्दिष्टे
या प्रकरणाच्या अभ्यासानंतर आपल्याला
• बँक म्हणजे काय हे स्पष्ट करता येईल.
• भारतीय अर्थव्यवस्थेतील बँकांचे महत्त्व विशद करता येईल.
• बँकेतील खात्याचे प्रकार स्पष्ट करता येतील. Self-Instructional
• ई- बँकिंग, ई- वॉलेट संकल्पना स्पष्ट करता येतील. Material 117
बँकिंग पर्यावरण
५.१ बँकिंग
NOTES
५.१.१ व्याख्या
आधुनिक बँकांच्या विविध उपक्रमांमुळे 'बँक' किंवा 'बँकिंग' ची व्याख्या अनेक
अर्थशास्त्रज्ञांनी खालीलप्रमाणे केल्या आहेत.
डॉ. एल. हर्बर आणि एल. हार्ट यांच्या मते, “बँकर म्हणजे अशी व्यक्ती जी आपल्या
व्यवहारात ठेवीदारांकडून आणि ठेवीदारांकरिता चालू खात्यावर पैसे स्वीकारते आणि त्यांनी
दिलेल्या धनादेशावर पैस े देत.े
चेंबरच्या विसाव्या शतकाच्या शब्दकोशात बँकेची व्याख्या “पैसे ठेवून घेण,े कर्ज देणे
आणि देवाणघेवाण करण्यासाठीची संस्था” अशी केली जाते.
प्रा. केंट बँकेची व्याख्या करतात, “ज्या संस्थेचे मुख्य कार्य लोकांकडून त्यांच्याकडील
शिल्लक रक्कम किंवा बचत केलेले पैसे स्वतःकडे ठेवून घेणे व याच पैशातून गरजू
लोकांना कर्ज म्हणून पैसे देणे हे असते.”
भारतीय बँकिंग नियंत्रण कायदा १९४९ च्या व्याख्येनुसार बँकिंग कंपनी म्हणजे अशी
कंपनी जी भारतामध्ये बँकेचा व्यवसाय करते आणि बँकिंग या शब्दाची व्याख्या लोकांकडून
कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी पैसे स्वीकारणे आणि आणि हे पैसे त्यांच्या
मागणीनुसार परत करणे किंवा धनादेश, ड्राफ्ट, ऑर्डर याद्वारे परत करणे.
i) बॅंकांमध्ये आकर्षक व्याज दर देऊन ठेवी गोळा करतात आणि अशा प्रकारे बचत
सक्रिय भांडवलामध्ये रूपांतरित करतात. अन्यथा ती रक्कम निष्क्रिय राहिली असती.
ii) बँका, ही बचत उद्योगधंद्यांना कर्जाद्वारे वितरित करतात जी राष्ट्र निर्मितीत उपयुक्त
आहेत.
iii) हे समुदायाच्या आर्थिक संसाधनांचा इष्टतम उपयोग करण्यास सुलभ करते.
२) वित्त व पतपुरवठा :
बँका ह्या उद्योग आणि व्यापारासाठी वित्त व पतपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण स्रोत
आहेत. उद्योगांमध्ये पत ही सर्व वाणिज्य आणि व्यापाराचे वंगण असते म्हणूनच, बँका सर्व
उद्योगधंद्यांसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्यामुळेच सशक्त बँकिंग प्रणालीच्या
उपस्थितीत वाणिज्य व व्यापार चालू शकतात.
बँका विदेश व्यापार यामध्येसुद्धा प्रमुख भूमिका बजावतात. मोठ्या बँका परकीय चलन
व्यवसायदेखील करतात. पूर्वीची आयात यंत्रे व इतर आवश्यक उपकरणे सक्षम करण्यासाठी
स्थगित पेमेंट्स, देशांतर्गत औद्योगिक उपक्रम आणि परदेशी कंपन्यांमधील व्यवस्था
संपविण्यात मदत करतात.
३) बाजाराचा आकार :
बँका व्यापार आणि उद्योगांना बाजारपेठा विकसित करण्यासाठी कर्ज देऊन बाजाराचा
आकार वाढवतात. सशक्त बँकिंग प्रणालीमुळे उद्योगांना त्यांचे कार्यक्षेत्र वाढविणे शक्य
आहे. व्यावसायिक बँका खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करतात.
वस्तू बॅंकेच्या हमीभावावर पुरवल्या जातात ज्यायोगे उद्योग आणि वाणिज्य यांना त्यांच्या
उत्पादनांसाठी बाजारपेठांचा विकास करणे आणि शोधणे शक्य होते. बँका कर्ज देताना
व्यापार जोखीम पत्करतात. जेव्हा उद्योगांची ही जोखीम बँकांमुळे नाहीशी होते तेव्हा
मोठ्या प्रमाणात बाजारपेठेतील अर्थव्यवस्था विकसित होण्यास सुरुवात होते.
व्यापारी बँका:
बँक ही एक संस्था आहे जी नफ्यासाठी काम करते. व्यापारी बँकेचे पारंपरिक कार्य
लोकांकडून ठेवी स्वीकारणे आणि अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्रांना पतपुरवठा करणे
असते. तथापि, आधुनिक अर्थव्यवस्थेची उत्क्रांती आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा अविभाज्य
भाग म्हणून बँकिंग व्यवस्थेच्या वाढीसह, व्यावसायिक बँकांच्या दृष्टिकोनात बदल झाला
आहे. या बँकांनी आपल्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बँकिंग सेवा प्रदान करण्यास सुरवात
केली आहे. तथापि, व्यावसायिक बँकिंगचे मूळ कार्य अपरिवर्तित राहिले. सुरुवातीच्या
काळात व्यावसायिक बँका नफा मिळविण्यासाठी संयुक्त स्टॉक कंपनी म्हणून काम करत
होत्या. पूर्वी बँक अल्प-मुदतीच्या, मध्यम मुदतीच्या कर्जाच्या गरजा भागवत होत्या आणि
व्यापारी आणि उद्योगपतींना भांडवल देत होत्या. अलीकडील दिवसांत बँका व्यापारी आणि
उद्योगपतींना दीर्घ मुदतीसाठी कर्ज देतात.
सर्वसाधारण बँकांच्या कार्याचे स्थूलमानाने
(१) प्राथमिक कार्ये आणि
(२) दुय्यम किंवा पूरक कार्ये, असे दोन विभाग पडतात :
बचत ठेव : ज्यांच्याकडे वापर न होता पैसे पडून असतात त्यांच्यासाठी बचत खाते
तिजोरीसारखे काम करते. या खात्यातील रकमेवर नाममात्र व्याज मिळते आणि ठेवीदाराच्या
मागणीनुसार देय रकमेचा बयाणा करण्याचा अधिकार बँकांना असतो. प्रत्यक्षात ठरावीक
कालावधीत किती वेळा आणि प्रत्येक वेळी किती रक्कम काढता येईल यावर बँक निर्बंध/
मर्यादा घालते. ठेवीधारकास धनादेशाची सुविधाही दिली जाते.
ब) मागणी ठेव: मागणी ठेवी चालू खात्यात ठेवल्या जातात. ठेवीदाराच्या मागणीनुसार
रक्कम खात्यातून काढू शकतात; परंतु खातेदाराला देय रक्कम आणि रक्कम किती वेळा
काढणार ह्याची पूर्वसूचना द्यावी लागते. या खात्यातील रकमेवर व्याज मिळत नाही. उलट
या खात्याच्या देखभालीसाठी बँक शुल्क आकारते.
क) मुदत ठेवी: यांना टाइम डिपॉझिट/ वेळ ठेवी असेही म्हणतात. जमा केलेली
रक्कम नियोजित/ठरलेला कालावधी पूर्ण करण्याआधी काढली जाऊ शकत नाही. या
ठेवींवरच्या व्याजाचा दर नियोजित कालावधीच्या लांबीनुसार वेगवेगळा असतो.
२. कर्जे व अग्रिमे / आगाऊ रकमा देणे: कर्जे आणि आगाऊ रकमा (अॅडव्हान्स)
देण्यासाठी बँका अनेक मार्ग अवलंबतात. या प्रक्रियांमध्ये विविध प्रकार आहेत.
अ) पतकर्ज : बँक काही तारण घेऊन व्यक्ती किंवा कंपन्यांना कर्ज मंजूर करते.
कर्जाचे पैसे कर्जदाराच्या खात्यात जमा केले जातात आणि कर्जदार आवश्यकतेनुसार
रक्कम काढू शकतात. बँक कर्जदाराची पत /स्टॉक (समभाग) मूल्य असेल त्यानुसार
कर्जाच्या रकमेची मर्यादा ठरवते. हे मूल्य एका तऱ्हेने बँकरची मिळकत होते. कर्जदार
क्रेडिट लिमिट/ पत मर्यादेएवढी किंवा त्यापेक्षा कमी रक्कम काढू शकतो. बँक फक्त
काढलेल्या रकमेवरच व्याज आकारते.
४) दुय्यम किंवा पूरक कार्ये: बँका करत असलेली इतर काही महत्त्वाची कार्ये NOTES
पुढीलप्रमाणे आहेत -
मध्यवर्ती बँकेची व्याख्या तिच्या कार्यानुसार केली गेली आहे. अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या
काही व्याख्या खाली दिल्या आहेत.
एच.ए. शॉ यांनी केलेली मध्यवर्ती बँकेची परिभाषा अशी आहे : “बँक म्हणून जी
पतनियंत्रण करते ती मध्यवर्ती बँक. "
हॉट्रेच्या शब्दांत, “मध्यवर्ती बँक म्हणजे कर्ज मिळवण्याचा शेवटचा उपाय / अंतिम
सावकार /धनको.”
Self-Instructional
Material 124
बँकिंग पर्यावरण
मध्यवर्ती बँक आणि व्यावसायिक बँकातील फरक :
खालील बाबींमध्ये मध्यवर्ती बँक व व्यावसायिक बँकांमध्ये मूलभूत फरक आहेत. NOTES
१. मध्यवर्ती बँक ही देशातील आर्थिक आणि बँकिंग प्रणालीची सर्वोच्च संस्था आहे.
व्यावसायिक बँक ही केवळ बँकिंग प्रणालीची घटक असते आणि ती मध्यवर्ती बँकेच्या
अधीन असते.
४. मध्यवर्ती बँक देशातील परकीय चलन साठ्यावर देखरेख करते. व्यावसायिक बँका
केवळ मध्यवर्ती बँकेच्या निर्देशानुसार परकीय चलन व्यवहार करतात.
५. मध्यवर्ती बँक हे सरकारचेच एक अंग आहे आणि ही बँक सरकारचे बँकर आणि
आर्थिक सल्लागार म्हणून काम करते, तर व्यावसायिक बँका केवळ सामान्य लोकांसाठी
सल्लागार आणि बँकर्स म्हणून काम करतात.
१. चलन नियामक:
चलनी नोटा काढणे हे मध्यवर्ती बँकेचे सर्वांत महत्त्वाचे कार्य आहे. मध्यवर्ती बँकेला
व्यवहारात वापरासाठी वैध चलन म्हणजेच चलनी नोटा व नाणी काढण्याचा अधिकार
आहे. मध्यवर्ती बँकेच्या इश्यू /जारीकर्ता विभागावर व्यावसायिक बँकांना चलनी नोटा व
नाणी यांचा पुरवठा करण्याची जबाबदारी असते. देशातील आर्थिक परिस्थितीचा विचार
करून मध्यवर्ती बँक पट व चलन नियंत्रित करते. नोटा जारी करण्याच्या पद्धतीनुसार
मध्यवर्ती बँकेला जारी केलेल्या चलनाच्या किमतीच्या प्रमाणात विशिष्ट रक्कम किंवा
निश्चित किंमतीचे ई -सोने आणि परकीय चलन यांचा साठा ठेवावा लागतो. भारतीय
रिझर्व्ह बँकेला ११५ करोड रुपये किमतीचे सोने आणि ८५ करोड रुपये किमतीचे परकीय
चलन राखीव ठेवावे लागते; पण नोटा काढण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.
नोटांच्या प्रचालनाची मक्तेदारी असल्याने मध्यवर्ती बँकेला होणारे फायदे पुढीलप्रमाणे: Self-Instructional
Material 125
बँकिंग पर्यावरण
जारी केलेल्या नोटा एकसारख्या असतात आणि पैशाच्या पुरवठ्यावर योग्य नियंत्रण
ठेवता येते.
NOTES आर्थिक प्रणालीमध्ये स्थिरता आणणे आणि लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे.
सरकारला चलनाच्या मुद्रणातून नफा मिळतो.
६. समाशोधनाचे कार्य:
मध्यवर्ती बँक इतर बँकांसाठी समाशोधनालय / ‘क्लिअरिंग हाऊस’ म्हणून काम करते
आणि परस्पर दायित्व समाशोधन प्रणालीद्वारे निकाली काढले जाते. मध्यवर्ती बँकेकडे
व्यावसायिक बँकांचे रोकड साठे असल्याने मध्यवर्ती बँकेला ‘क्लिअरिंग हाऊस’ म्हणून
काम करणे सोपे जाते.
Self-Instructional
Material 126 ७. पत-नियंत्रक:
बँकिंग पर्यावरण
अर्थव्यवस्थेमधील चलनघट आणि चलनवाढीचा दबाव नियंत्रित करण्यासाठी मध्यवर्ती
बँकांचे महत्त्वपूर्ण काम म्हणजे व्यावसायिक बँकांचे पत-निर्मिती करण्याचे सामर्थ्य नियंत्रित
करणे. यासाठी, मध्यवर्ती बँक संख्यात्मक किंवा परिमाणात्मक पद्धती आणि गुणात्मक NOTES
(निवडक) पद्धतींचा अवलंब करते. परिमाणात्मक पद्धतींचे उद्दिष्ट पत-किंमत आणि पत-
प्रमाण नियंत्रित करणे हे आहे. यासाठी पुढील पद्धती वापरल्या जातात: i)मध्यवर्ती बँकेचा
दर, ii)खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी-विक्री आणि iii) राखीव रोख निधीच्या
प्रमाणात बदल. गुणात्मक पद्धती पत वापर आणि दिशा नियंत्रित करतात. यात i) तारण-
सीमांच्या आवश्यकतांचे नियमन ii) ग्राहकपत नियमन, iii) पतवाटप करणे, iv)
मध्यवर्ती बँकेद्वारे थेट कारवाई करणे आणि v) नैतिक प्रभाव टाकणे, यांचा समावेश होतो.
वरील कार्यांखेरीज, मध्यवर्ती बँक अनेक अतिरिक्त कार्ये करते. बँकेला I) पत, ii)
किंमतीच्या पातळीतील चढउतार iii) परकीय चलन मूल्यातील चढउतार यासंबंधीच्या सर्व
समस्यांचा अभ्यास करावा लागतो. तसेच ती आर्थिक आकडेवारी गोळा करणे, संशोधन
करणे आणि माहिती देणे ही कामेही करते. मध्यवर्ती बँक आंतरराष्ट्रीय नाणे निधी
(आयएमएफ) आणि जागतिक बँकेशी संबंधित बाबी हाताळते. एकंदरीत मध्यवर्ती बँक
देशाची आर्थिक संरक्षक आहे.
रिझर्व बँकेने २००५ साली भारतात परदेशी बँकांच्या कार्यरत असण्यासाठी दिशानिर्देशक
धोरण जाहीर केले. यात भारतातील बँकिंग क्षेत्रातील स्थैर्य आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या
उद्देशाने दोन मार्ग व क्रमाक्रमाने /टप्प्याटप्प्याने प्रगतीचे धोरण आखण्यात आले आहे.
यापैकी एक मार्ग म्हणजे खाजगी व सार्वजनिक या दोन्ही क्षेत्रांत देशी बँकिंग प्रणालीचे
विलिनीकरण/एकत्रीकरण आणि दुसरा मार्ग म्हणजे परदेशी बँकांची टप्प्याटप्प्याने व
समक्रमित/ समान गतीने होणारी वाढ. हे धोरण दोन टप्प्यांत विभागलेले होते. पहिला टप्पा
मार्च २००५ ते मार्च २००९ या कालावधीसाठी होता. या पहिल्या टप्प्यात मिळालेल्या
अनुभवाचा आढावा घेतल्यानंतर दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करायची होती; परंतु जेव्हा
पहिल्या टप्प्यात मिळालेल्या अनुभवाचा आढावा घेण्याची वेळ आली तेव्हा जागतिक
वित्तीय बाजारात उलथापालथ घडत होती आणि जगभरातल्या बँकांच्या आर्थिक
सामर्थ्याबाबत साशंकता होती. त्या वेळी परदेशी बँकांबाबतचे तत्कालीन धोरण व प्रक्रिया
पुढे चालू ठेवणेच योग्य असे ठरवण्यात आले.
मार्च २०१३ पर्यंत २६ देशांतील ४३ परदेशी बँका, ‘शाखा’ या स्वरूपात कार्यरत
आहेत, तर २२ देशांतील ४६ परदेशी बँकांची प्रातिनिधिक कार्यालये भारतात आहेत.
विभेदक/ विशिष्ट सेवा पुरवण्यासाठी वेगवेगळे परवाने देण्याबाबतची चर्चा अजूनही
अगदीच नवीन असली तरी मर्यादित बँकिंग परवान्यासह क्रेडिट कार्ड जारीकर्ता म्हणून एक
परदेशी बँक अस्तित्वात आहे. याखेरीज बऱ्याच परदेशी बँकांनी देशात बँकेतर वित्तीय
संस्था (एनएफबीसी) म्हणून शिरकाव केला आहे व अनेक बँकांनी सेवा वितरण केंद्रे
(कॅप्टिव्ह सेंटर्स) उभारली आहेत. प्रातिनिधिक कार्यालये म्हणून भारतात कार्यरत असलेल्या
परदेशी बँका बरेचदा स्थानिक बँकांमध्ये प्रतिनिधी बँक या नात्याने काम करतात. यामुळे
परदेशी बँकांना भारतीय उद्योगसंस्थांना व वित्तीय संस्थांना परदेशी चलनात कर्जे देण्याची
संधी देणारा उपयुक्त मंच/प्लॅटफॉर्म प्राप्त होतो. एकूण बँक-शाखांच्या तुलनेत परदेशी
बँकांच्या शाखांचे प्रमाण एक टक्क्याहूनही कमी असले तरी त्यांच्या बँकिंग क्षेत्रातील
संपत्तीचे प्रमाण जवळपास ७ टक्के आणि नफ्याचे प्रमाण तब्बल ११ टक्के आहे.
शाखा म्हणून भारतात उपस्थित असलेल्या परदेशी बँकिंग समूहांनीही विशेष सेवा
देण्यासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करण्यासाठी या संधीचा वापर केला. यामुळे वित्तीय
महागात (काँग्लोमरेट) किंवा मोठ्या फ्रेंचाइजीची स्थापना झाली. शाखांचे नेटवर्क
वाढवण्यासंबंधीच्या लवचिकतेच्या अभावी बँकेतर वित्तीय संस्थांनीसुद्धा किरकोळ ग्राहकांना
लक्ष्य करणाऱ्या परदेशी बँकांना त्यांच्या कामासाठी आवश्यक असा आवाका/ व्याप्ती
Self-Instructional वाढवण्याची संधी निर्माण केली.
Material 128 परदेशी बँका बाजारातील विशिष्ट गरजा ओळखण्यासाठी, उत्पादने तयार करण्यात
बँकिंग पर्यावरण
आणि संघटनात्मक बांधकामे विकसित करण्यात नावीन्यपूर्ण मार्ग चोखाळतात. याचे उत्तम
उदाहरण म्हणजे १९९० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात भारतीय बाजारपेठेची विशिष्ट
समस्या असलेली रोख संकलन आणि चेक वटविण्याच्या प्रक्रियेतील अकार्यक्षमता लक्षात NOTES
घेऊन सादर केलेली रोख व्यवस्थापन योजना. सिटी कॅश आणि सिटी चेक ही उत्पादने
यावरच आधारित होती. अधिक महत्त्वाची बाब ही, की या बँकांकडे भारतीय बाजरामधील
उणिवांवर उपाय शोधण्यासाठी एक खास विभाग होता. भारतात यशस्वी झालेली उत्पादने
इतर उगवत्या/ उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये प्रविष्ट केली जात. प्रतिभूतता (सेक्युरिटायझेशन),
परदेशी चलन डेरीव्हेटीव्हज, ट्रॅव्हलर्स चेक्स, शृंखलाबद्ध वित्तपुरवठा आणि क्रेडिट
स्कोअरकार्ड अशी याची अनेक उदाहरणे आहेत.
या बँकांनी अनेकदा त्यांच्या देशांतील जोखीम व्यवस्थापन पद्धती लागू केल्या.
त्याचप्रमाणे कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी, विकासाची/आर्थिक धोरणांची शाश्वतता आणि
वारसा इमारती, स्थानिक कला व हस्तकलांचे संरक्षण इत्यादी मुद्द्यांवर पुढाकार घेतला.
या संदर्भातील त्या बँकांच्या योगदानातून स्थानिक सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा
भाग होण्यासाठी पावले उचलली गेली.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑगस्ट २०१५ मध्ये ११ संस्थांना पेमेंट बँका, तर सप्टेंबर
२०१५ मध्ये १० संस्थांना लघु वित्त बँका (एसएफबी) स्थापन करण्यास परवानगी दिली
आहे. या बँका लोकसंख्येच्या विशिष्ट गटाच्या गरजांवर वर लक्ष केंद्रित करून त्यानुसार
सेवा पुरवतात.
लघु वित्त बँका स्थापन करण्याचे उद्दिष्ट वित्तीय समावेश वाढवणे हे असेल. याकरता
(१) बचतीच्या माध्यमांची (सेव्हिंग व्हेइकल्स) तरतूद (२) छोटे व्यवसायिक, लहान आणि
सीमांत शेतकरी; सूक्ष्म आणि लघु उद्योग तसेच इतर असंघटित क्षेत्रातील संस्था यांना उच्च
तंत्रज्ञान-कमी खर्चाच्या कार्यप्रणालीतून पतपुरवठा करण्याची तरतूद केली जाईल.
नचिकेत मोर समितीने आर्थिक समावेशाबाबत एसएफबीची शिफारस केली होती.
Self-Instructional
Material 129
बँकिंग पर्यावरण
वर्षांच्या आत हळूहळू ते २६ टक्क्यांपर्यंत खाली आणले जाईल.
लघु वित्त बँकेत परदेशी भागभांडवल खासगी क्षेत्रातील बँकांच्या थेट परकीय
NOTES गुंतवणुकीच्या (एफडीआय) धोरणानुसार (वेळोवेळी केल्या जाणाऱ्या सुधारणांप्रमाणे)
असेल.
लघु वित्त बँकांना समयोजित निव्वळ बँक कर्जापैकी (एएनबीसी) ७५ टक्के कर्जवाटप
प्राधान्य क्षेत्र कर्जपुरवठा (पीएसएल) म्हणून वर्गीकरणासाठी रिझर्व्ह बँकेने पात्र ठरवलेल्या
क्षेत्रांत करणे आवश्यक आहे.
लघु वित्त बँकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निकषानुसार रोख राखीव प्रमाण
(सीआरआर) आणि वैधानिक चलनिधी प्रमाण (एसएलआर) राखणे आवश्यक आहे.
त्याच्या कर्जाच्या पोर्टफोलिओच्या कमीतकमी ५० टक्के कर्जे आणि अग्रिमे रु. २५
लाख असणे आवश्यक आहे.
पेमेंट बँका
पेमेंट बँक स्थापन करण्याचे उद्दिष्ट वित्तीय समावेश वाढवणे हे असेल. यासाठी पुढील
सेवा प्रदान केल्या जातील: (१) छोटी बचत खाती (२) स्थलांतरित कामगार कामगार,
कमी उत्पन्न असणारी कुटुंब,े लहान व्यवसाय, इतर असंघटित क्षेत्रातील संस्था आणि इतर
वापरकर्त्यांसाठी पेमेंट / रेमिटन्स सेवा.
त्या ग्राहकांना कर्ज देणार नाहीत आणि त्यांचा निधी सरकारी कागदपत्रांमध्ये आणि बँक
ठेवींमध्ये जमा करावा लागेल.
उपक्रमांची व्याप्ती
मागणी ठेवी (डिमांड डिपॉझिट)ची स्वीकृती- पेमेंट्स बँकेत सुरुवातीला वैयक्तिक
ग्राहक जास्तीत जास्त १००,००० रुपयांचा निधी खात्यात ठेवू शकतील.
एटीएम / डेबिट कार्ड जारी करणे - पेमेंट्स बँका क्रेडिट कार्ड जारी करू शकत
नाहीत.
विविध मार्गांद्वारे देयके आणि पैसे पाठविणे.
दुसर्या बँकेचे व्यवसाय प्रतिनिधी (बीसी) म्हणून काम करणे. (बीसीसंबंधी रिझर्व्ह
बँकेच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुसार)
Self-Instructional म्युच्युअल फंड युनिट्स आणि विमा उत्पादने इत्यादी साध्या आर्थिक उत्पादनांचे
Material 130 विना-जोखीम वितरण.
बँकिंग पर्यावरण
पेमेंट्स बँक कर्ज देऊ शकत नाही.
Self-Instructional
Material 131
बँकिंग पर्यावरण
५.२.बँक खाती- खात्यांचे प्रकार, कार्यपद्धती व
NOTES संचालन
बँक खात्यांचे विविध प्रकार:
बचत खाते, नियमित बचत खाते, चालू खाते, आवर्ती ठेव खाते, निश्चित ठेव खाते,
डिमॅट खाते, अनिवासी खाते
१) बचत खाते: -
अ) मूलभूत बचत बँक ठेव खाते (बीएसबीडीए)
हे खाते सामान्य बँकिंग सेवा मानले जाईल.
या खात्यासाठी, किमान शिल्लक ठेवणे आवश्यक नाही.
खातेदारांना एटीएम कार्ड / एटीएम कम डेबिट कार्ड, रूपे कार्ड दिले जाईल.
एका महिन्यात जमा केल्या जाणाऱ्या ठेवींच्या संख्येवर कोणतीही मर्यादा असणार
नाही; परंतु खातेदारांना एका महिन्यात जास्तीत जास्त ४ वेळा पैसे काढण्याची मुभा असेल,
ज्यात एटीएमद्वारा पैसे काढणेदेखील समाविष्ट आहे.
वरील सुविधा निःशुल्क दिल्या जातील. मूलभूत बचत बँक ठेव खाते वापरत
नसण्याबद्दल किंवा वापरत नसलेले खाते कार्यान्वित करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले
जात नाही.
या खात्यासाठी अधिकर्षाची (ओव्हरड्राफ्टची) सुविधा रु. ५००० / - पर्यंत मिळते.
ब) मूलभूत बचत बँक ठेव खाती स्मॉल स्कीम (बीएसबीडीएस)
ह्या खात्यांसाठी किमान कागदपत्रे म्हणजे स्वयंसाक्षांकित रहिवास पुरावा आणि
छायाचित्रे लागतात. या खात्यासाठी केवायसी सादरीकरणात सवलत आहे.
एकूण कर्ज एका वर्षात १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे .
कोणत्याही वेळी जास्तीत जास्त शिल्लक रु. ५०,००० पर्यंत असावी.
रोख रक्कम काढणे आणि हस्तांतरणे एका महिन्यात रु. १०, ००० / - पेक्षा जास्त
नसावी.
या खात्यात केवायसी औपचारिकता पूर्ण केल्याशिवाय परदेशी खात्यातून रक्कम जमा
केली जाऊ शकत नाही.
हे खाते केवळ कोअर बँकिंग सोल्यूशनशी संबंधित बँकांमध्ये किंवा अशा शाखांमध्ये
उघडले जाऊ शकते, जिथे अटींच्या पूर्ततेची शहानिशा करणे बँकेच्या कर्मचारी वर्गाला
शक्य आहे.
६) डिमॅट खाते
समभागांवर तणावमुक्त व्यवहार करण्यासाठी वापरले जाते.
व्यक्ती, अनिवासी भारतीय, विदेशी संस्थागत गुंतवणूकदार, परदेशी नागरिक, कॉर्पोरेट,
विश्वस्त, क्लिअरिंग हाऊस, वित्तीय संस्था, क्लिअरिंग मेंबर, म्युच्युअल फंड, बँका आणि
इतर डिपॉझिटरी खाते.
हे खाते उघडण्यासाठी फॉर्म भरावा लागतो. अर्जदाराचा फोटो तसेच मतदार ओळखपत्र
/ पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्सची छायाप्रत जोडावी लागते. अर्जदारास
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच डिमॅट खाते क्रमांक दिला जातो.
या खात्याअतं र्गत प्रदान केलले ्या सुविधा म्हणजे - डिमॅट खाती उघडणे व वापरणे,
डिमटेरियलायझेशन, रीमटेरियलायझेशन, खरेदी, विक्री, तारण ठेवणे व रद्द करणे, सुरक्षित ताबा.
७) अनिवासी खाते
अ) एनआरओ (अनिवासी सामान्य रुपये) खाते
ब) एनआरई (अनिवासी बाह्य रुपये) खाते
क) एफसीएनआर (परकीय चलन अनिवासी) खाते
तपशील एफसीएनआर एनआरई एनआरओ
अनिवासी भारतीय / अनिवासी भारतीय /
पीआयओ / पीआयओ /
ओसीआय ओसीआय
(बांगलादेश / (बांगलादेश / भारताबाहेर
खाते उघडणे पाकिस्तानमधील पाकिस्तानमधील राहणारी कोणतीही
व्यक्ती / घटकांना व्यक्ती / घटकांना व्यक्ती
आरबीआयची पूर्व आरबीआयची पूर्व
मंजुरी आवश्यक मंजुरी आवश्यक
आहे) आहे)
Self-Instructional
Material 134
बँकिंग पर्यावरण
दोन किंवा अधिक
दोन किंवा अधिक दोन किंवा अधिक अनिवासी
अनिवासी व्यक्तींसह अनिवासी व्यक्तींसह व्यक्तींसह एका NOTES
एका स्थानिक एका स्थानिक स्थानिक
जवळच्या जवळच्या जवळच्या
संयुक्त खाते
नातेवाईकाच्या नावे. नातेवाईकाच्या नावे. नातेवाईकाच्या
'प्रथम निर्देशित ' प्रथम निर्देशित नावे. ' प्रथम
किंवा उत्तरजीवी किंवा उत्तरजीवी निर्देशित किंवा
व्यक्ती यानुसार’ व्यक्ति यानुसार’ उत्तरजीवी व्यक्ति
यानुसार’
यूएस डॉलर, पाउंड,
स्टर्लिंग, येन, युरो,
पैसे ज्या खात्यात
ऑस्ट्रेलियन डॉलर भारतीय रुपये भारतीय रुपये
नामांकन आहे
आणि कॅनेडियन
डॉलर
परवानगी मिळू परवानगी मिळू
नामांकन परवानगी मिळू शकते
शकते शकते
बचत, चालू,
बचत, चालू, निश्चित,
खाते प्रकार केवळ मुदत ठेव निश्चित, आवर्ती
आवर्ती ठेव
ठेव
बँकांना ठेवींसाठी बँकांना ठेवींसाठी बँकांना ठेवींसाठी
व्याजदर निश्चित व्याजदर निश्चित व्याजदर निश्चित
व्याज दर
करण्याची परवानगी करण्याची परवानगी करण्याची
आहे आहे परवानगी आहे
१ वर्षापेक्षा कमी १ वर्षापेक्षा कमी निवासी
मुदत ठेवी-
आणि ५ वर्षांपेक्षा आणि १० वर्षांपेक्षा खात्यांप्रमाणे लागू
कालावधी
जास्त नाही जास्त नाही आहे
एनआरओ
ठेवींवरील
व्याजावरील
आयकर करपात्र नाही करपात्र नाही
टीडीएस
३०.९०% वजा
करावेत
स्वदेशी
स्वदेशी स्वदेशी
प्रत्यावर्तन पाठविण्यायोग्य
पाठविण्यायोग्य पाठविण्यायोग्य
नाही
Self-Instructional
Material 135
बँकिंग पर्यावरण
कर्जाच्या रकमेवर
कर्जाच्या रकमेवर
कोणत्याही प्रकारच्या
कोणत्याही प्रकारच्या
NOTES भारतात कर्ज आर्थिक
आर्थिक मर्यादेशिवाय १) परवानगी आहे
१) खातेदारांना मर्यादेशिवाय मानक
मानक मार्जिन २) परवानगी आहे
२) तृतीय पक्षाकडे मार्जिन
आवश्यकतांच्या
आवश्यकतांच्या
अधीन
अधीन
१) कर्जाच्या
१)कर्जाच्या रकमेवर
रकमेवर कोणत्याही
परदेशातील कर्ज कोणत्याही प्रकारच्या
प्रकारच्या आर्थिक
१) खातेदारांना आर्थिक मर्यादेशिवाय १) परवानगी नाही
मर्यादेशिवाय
स्टँडर्ड मार्जिन
स्टँडर्ड मार्जिन
आवश्यकतांच्या २) परवानगी नाही
आवश्यकतांच्या
२) तृतीय पक्षाकडे अधीन
अधीन
२) परवानगी नाही
२)परवानगी नाही
ई-बँकिंगचे फायदे
• बँकांसाठी सेवेचा खर्च कमी होतो.
• बँकेच्या आवारात जाण्याची आवश्यकता नसल्यामुळे ग्राहकांना सोयीस्कर आहे.
• त्रुटी कमी होण्याचे प्रमाण खूप कमी आहे.
• ग्राहक कधीही एटीएम मशीनमधून पैसे काढू शकतो.
Self-Instructional • क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यांमुळे ग्राहकांना किरकोळ दुकानातून सूट मिळू
Material 136 शकते.
बँकिंग पर्यावरण
• ग्राहक एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सहजपणे निधी
हस्तांतरित करू शकतात.
NOTES
ई-बँकिंग अंतर्गत लोकप्रिय सेवा :
स्वयंचलित टेलर मशीन्स (एटीएम), क्रेडिट कार्डे, डेबिट कार्डे, इलेक्ट्रॉनिक फंड
ट्रान्सफर (ईएफटी), मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, टेलि-बँकिंग, होम बँकिंग, डिमॅट
सुविधा, चेक ट्रंकेशन पेमेंट पद्धत
२४ तास सेवा : एटीएम २४ तास सेवा प्रदान करतात. दिवसा किंवा रात्री कोणत्याही
वेळी ग्राहक काही मर्यादेपर्यंत रोख रक्कम काढू शकतो.
त्रुटीविरहित सेवा : एटीएमशी मानवी त्रुटींचा संबंध नाही त्यामुळे एटीएम कोणत्याही
त्रुटीशिवाय सेवा प्रदान करतात. ग्राहक अचूक रक्कम मिळवू शकतो.
मोबाइल बँकिंग :
बँकांनी अलीकडेच सुरू केलेली ही आणखी एक महत्त्वपूर्ण सेवा आहे. ग्राहक त्याचा
उपयोग सेल फोनच्या मदतीने करू शकतात. बँक विशिष्ट सॉफ्टवेअर बसवते आणि
ग्राहकांना या सेवेचा वापर करता यावा म्हणून संकेतशब्द देते.
होम बँकिंग :
भारतीय बँकिंग क्षेत्रातील हा आणखी एक महत्त्वाचा नवीन बदल आहे. ग्राहक त्यांच्या
घरातून किंवा कार्यालयातून अनेक व्यवहार करू शकतात. ते टेलिफोनच्या मदतीने शिल्लक
तपासू शकतात आणि निधी हस्तांतरित करू शकतात; परंतु आपल्या देशात याचा वापर
तितकासा लोकप्रिय झालेला नाही.
इंटरनेट बँकिंग :
भारतीय बँकिंग क्षेत्रात हा अलीकडचा ट्रेंड/कल आहे. माहिती तंत्रज्ञानात झालेल्या
विकासाचा हा परिणाम आहे. इंटरनेट बँकिंग म्हणजे ज्याच्याकडे वैयक्तिक संगणक व
ब्राउझर आहे असा कोणताही वापरकर्ता किंवा ग्राहक त्याच्या बँक वेबसाइटवर कनेक्ट
होऊ शकतो/संपर्क साधू शकतो आणि इलेक्ट्रॉनिक वितरण वाहिनीद्वारे उपलब्ध असलेली
कोणतीही सेवा वापरू शकतो. दूरस्थ ठिकाणी प्रतिसाद देण्यासाठी मानवी चालक नसतात.
बँक वेबसाइटच्या मेनूमध्ये सूचीबद्ध सर्व सेवा उपलब्ध असतील.
डिमॅट बँकिंग
डिमॅट बँकिगं म्हणजेच डी-मटेरियलायझेशन. भारतीय बँकिगं क्षेत्रात ही अलीकडील
अस्तित्वात आलेली बाब आहे. ज्या ग्राहकाला स्टॉक मार्केटमध्ये किंवा समभागात गुतं वणूक
करायची इच्छा असेल त्यांचे व्यावसायिक बँकांत हे खाते असणे आवश्यक आहे. अशा
प्रकारच्या खात्यांची देखभाल करण्यासाठी ग्राहकांना बँकांना काही वार्षिक शुल्क द्यावे लागते.
क्रेडिट कार्डे:
क्रेडिट कार्ड म्हणजे एक लहान प्लॅस्टिक कार्ड. उपभोक्ता या कार्डचा वापर देय
द्यायची एक प्रणाली म्हणून करतो. यामुळे कार्डधारकांना वस्तू आणि सेवा खरेदी करता
येतात. या वस्तू आणि सेवांसाठी पैसे देण्याकरता कार्डधारक वचनबद्ध असतो. कार्ड
जारीकर्ता एक फिरते खाते तयार करून ग्राहकांना (किंवा वापरकर्त्याला) एक ऋणव्यवस्था
देतो ज्यामधून वापरकर्ता व्यापाऱ्यास पैसे भरण्यासाठी किंवा इतर वापरासाठी रोख रक्कम
म्हणून पैसे घेऊ शकतो. क्रेडिट कार्ड चार्ज कार्डपेक्षा वेगळे आहे. चार्ज कार्डमध्ये प्रत्येक
Self-Instructional महिन्यात संपूर्ण देय रक्कम भरणे आवश्यक आहे. याउलट, क्रेडिट कार्डे ग्राहकांना कर्जाची
Material 138 थकबाकी देतात. या थकबाकीवर व्याज आकारले जाते. क्रेडिट कार्ड रोख कार्डपेक्षाही
बँकिंग पर्यावरण
वेगळे असते, जे कार्डच्या मालकाद्वारे चलनाप्रमाणे वापरले जाऊ शकते. बहुतेक क्रेडिट
कार्डे बँकांद्वारे किंवा पतसंस्थांकडून दिली जातात.
NOTES
डेबिट कार्ड :
डेबिट कार्ड हे बँक कार्ड किंवा चेक कार्ड म्हणूनदेखील ओळखले जाते. हे एक
प्लॅस्टिक कार्ड आहे जे कार्डधारकास त्याच्या किंवा तिच्या बँक खात्यात / वित्तीय संस्थेत
इलेक्ट्रॉनिक प्रवेश प्रदान करते. काही कार्डांकडे संग्रहित मूल्य असते ज्यातनू पैसे दिले
जातात, तर बहुतेक कार्डांबाबत कार्डधारकाच्या बँकल े ा पैसे देणाऱ्याच्या निर्देशित खात्यातनू
पैसे काढून प्राप्तकर्त्याच्या खात्यात भरण्यासाठी संदशे पाठविला जातो. खरेदी करताना रोख
पैशांसाठी पर्यायी पेमटें पद्धत म्हणून या कार्डचा वापर केला जाऊ शकतो. काही वेळा ही कार्डे
केवळ इंटरनेटवरील वापरासाठी तयार केलल े ी असतात आणि म्हणून वस्तुरूपात कोणतेही
कार्ड नसते. बर्याच देशांमध्ये डेबिट कार्डचा वापर इतका व्यापक झाला आहे, की त्यांच्या
वापराच्या प्रमाणाने धनादेशाला मागे टाकले आहे किंवा त्यांनी संपर्ण ू पणे धनादेशांची आणि
काही प्रमाणात रोखीच्या व्यवहारांचीही जागा घेतली आहे. क्रेडिट कार्डांप्रमाणेच डेबिट कार्ड
टेलिफोन आणि इंटरनेट खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जातात. तथापि, क्रेडिट कार्डच्या
विपरीत, डेबिट कार्डचा वापर करून दिलेला निधी धारकाच्या नंतरच्या तारखेला परत
देण्याऐवजी ताबडतोब धारकाच्या बँक खात्यातनू वर्ग केला जातो.
चेक ट्रंकेशन पेमेंट सिस्टम (सीटीपीएस) :
ट्रंकेशन म्हणजे चेक काढणाऱ्या (ड्रॉवर) बँकेने काढलेल्या कागदी चेक्सचा ते
वटवणाऱ्या (ड्रॉई) बँकेकडे जाणारा लोंढा/ प्रवाह थांबवण्याची प्रक्रिया. कागदी चेकमध्ये
ड्रॉई बँकेकडे जाण्यापूर्वी कुठे तरी काटछाट/ ट्रंकेशन केले जाते आणि एमआयसीआर
फिल्ड्स, सादरीकरणाची तारीख, सादर करणारी बँक यांसारख्या संबंधित माहितीसह
चेकची इलेक्ट्रॉनिक प्रतिमा, ड्रॉई बँकेकडे पाठवली जाते. अशा रीतीने ट्रंकेशन प्रक्रियेच्या
अंमलबजावणीमुळे अपवाद वगळता प्रत्यक्ष चेक्स एका शाखेकडून दुसऱ्या शाखेकडे
पाठवण्याची गरज उरणार नाही.
परिणामी धनादेश वटण्यासाठी लागणारा वेळ, त्याच्या वाहतुकीची किंमत आणि
प्रक्रियेत होणारा विलंब इत्यादी प्रभावीपणे कमी होईल आणि अशा प्रकारे धनादेश संकलन
किंवा वसुलीची प्रक्रिया वेगवान होईल.
ई-वॉलेट :
ई-वॉलेट हा इलेक्ट्रॉनिक कार्डचा एक प्रकार आहे. याचा वापर संगणक किंवा
स्मार्टफोनद्वारे ऑनलाइन केलेल्या व्यवहारांसाठी केला जातो. त्याची उपयुक्तता क्रेडिट
किंवा डेबिट कार्डसारखीच आहे. देयके देण्यासाठी ई-वॉलेट त्या व्यक्तीच्या बँक खात्याला
जोडलेले असणे आवश्यक आहे.
ई-वॉलेटमध्ये प्रामुख्याने सॉफ्टवेअर आणि माहिती असे दोन घटक आहेत. सॉफ्टवेअर
हा घटक वैयक्तिक माहिती संग्रहित करतो आणि डेटा सुरक्षित आणि कूटबद्ध करतो. माहिती
हा घटक म्हणजे वापरकर्त्याने दिलेल्या तपशिलांचा डेटाबेस आहे. यात त्यांचे नाव, पत्ता,
देय द्यायची पद्धत, देय रक्कम, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड तपशील इत्यादींचा समावेश आहे.
ई-वॉलेट खाते सुरू करण्यासाठी वापरकर्त्यास त्याच्या / तिच्या उपकरणावर Self-Instructional
सॉफ्टवेअर स्थापित करावे लागते आणि संबंधित आवश्यक माहिती भरावी लागते. Material 139
बँकिंग पर्यावरण
ऑनलाइन खरेदी केल्यानंतर, ई-वॉलेट आपोआप पेमेंट फॉर्मवरील वापरकर्त्याच्या
माहितीमध्ये भरते. ई-वॉलेट सक्रिय करण्यासाठी वापरकर्त्याला त्याचा संकेतशब्द टाकावा
NOTES लागतो. एकदा ऑनलाईन पेमेंट झाल्यावर ग्राहकाला इतर कोणत्याही वेबसाइटवर ऑर्डर
फॉर्म भरण्याची आवश्यकता नसते कारण माहिती डेटाबेसमध्ये संग्रहित होते आणि
स्वयंचलितपणे अद्ययावत केली जाते.
विलीनीकरण :
सध्या बँकिंग क्षेत्रातील परिस्थिती रणांगणसदृश आहे. त्यामुळे प्रत्येक नवीन बँक नव्या
आर्थिक योजना बनवून इतरांवर मात करण्याचा प्रयत्न करते. विलीनीकरण आणि
एकत्रीकरणाची ढाल घेणे हा स्पर्धेपासून बचावण्याचा सर्वांत सुरक्षित मार्ग आहे. दोन भिन्न
घटकांना एकत्र करून एका घटकामध्ये विलीन करण्याची ही सर्वांत प्रभावी पद्धत आहे.
उदारीकरण आणि इतर धोरणांमुळे बँकिंग क्षेत्राला सोयीस्करपणाची सीमा पार
करण्यासाठी कार्यकक्षा वाढविणे ही मूलभूत गरज आहे. हा ब्लॉग आपणास बँकिंग क्षेत्राच्या
कामगिरीवर विलीन आणि एकत्रीकरणाच्या परिणामाचे मूल्यांकन करण्यास मदत करेल.
५.४ सारांश :
भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये बँकांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ठेवी
स्वीकारणे आणि कर्ज देणे या प्राथमिक कार्याबरोबर ग्राहकांचा प्रतिनिधी म्हणून विविध
प्रकारची कार्य बँका करतात. तसे ते खातेदारांना उपयुक्त सेवा पुरवण्याचेही काम करतात.
भारतामध्ये सरकारी मालकीच्या बँका, खाजगी बँका, लघु बँका, पेमेंट बँका कार्यरत
आहेत. चालू खाते, बचत खाते, मुदत ठेव खाते आणि आवर्ती ठेव खाते ही प्रमुख चार
Self-Instructional खाती आहेत. आधुनिक काळामध्ये ई-बँकिंग, ई-वॉलेट यांसारख्या सुविधा बँकांकडून
Material 142 दिल्या जात आहेत. नजिकच्या काळामध्ये बँकांचे विलीनीकरण व एकत्रीकरणाच्या घटना
वाढल्या आहेत. बँकिंग पर्यावरण
बँक
खाजगी बँका
लघु बँका
पेमेंट बँका
चालू खाते
बचत खाते
मुदत ठेव खाते
आवर्ती ठेव खाते
ई-बँकिंग
ई-वॉलेट
विलीनीकरण
एकत्रीकरण
डेबिट कार्ड
क्रेडिट कार्ड
आरटीजीएस
एन ईए टी
दीर्घ प्रश्न
१. मध्यवर्ती बँकेची संकल्पना स्पष्ट करा. त्याची कार्य विशद करा.
२. बँकांची प्राथमिक आणि दुय्यम कामे स्पष्ट करा
३. अनिवासी खात्यांची संकल्पना स्पष्ट करा.
४. बँकिंग क्षेत्रावर विलीनीकरण आणि एकत्रीकरणाचा काय प्रभाव पडला? Self-Instructional
Material 143
बँकिंग पर्यावरण
५.७ अधिक वाचनासाठी साहित्य :
NOTES • Desai, S. S. M. (1979) Rural Banking in India, Bombay,
• Government of India, Report of The Banking Commisstion,
New Delhi, ( 1972)
• Rae, Weston, (1980) Domestic and Multinational Banking :
The Effects of Monetary Policy, London
• Reserve Bank of India, Functions and Working, Bombay,
(1970).
• Reserve Bank of India, History of the Reserve Bank of India :
1935-1951. Bombay, 1970.
• Reserve Bank of India, Report on Currency and Finance :
Annual, Bombay.
• Reserve Bank of India, Trend and progress of Banking in
India : Annual, Bombay.
• Shah, Munubhai, (1970) New Role of Reserve Bank in India’s
Economic Development, Bombay,.
Self-Instructional
Material 144
भारतीय अर्थव्यवस्थेचा आढावा
भारतीय
प्रकरण ६ भारतीय अर्थव्यवस्थेचा आढावा अर्थव्यवस्थेचा...
NOTES
६.० प्रस्तावना
६.१. भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने
६.१.१ गरिबी
६.१.२. रोजगार
६.१.३. असमानता
६.१.४. अनौपचारिक क्षेत्र
६.२ धोरणात्मक उपाययोजना (अलीकडील दोन-तीन कार्यक्रम)
६.२.१. गरिबी निर्मूलन कार्यक्रम
६.२.२.रोजगार निर्मिती कार्यक्रम
६.२.३. कृषी विकास कार्यक्रम
६.२.४. कौशल्य विकास कार्यक्रम
६.३ सारांश
६.४ महत्त्वाचे शब्द
६.५ सरावासाठी प्रश्न
६.६ संदर्भ
अध्यापनाची उद्दिष्टे :
या प्रकरणाच्या अभ्यासानंतर आपणास
• दारिद्र्य म्हणजे काय, आणि भारतातील दारिद्र्याची कोणती कारणे आहेत हे स्पष्ट
करता येईल.
• बेरोजगारी म्हणजे काय आणि त्याची प्रमुख कारणे कोणती आहेत हे सांगता येईल.
• विषमता म्हणजे काय, असमानतेचे विविध प्रकार स्पष्ट करता येतील.
• अनौपचारिक क्षेत्र म्हणजे काय हे स्पष्ट करता येईल.
• सरकारने राबवलेल्या धोरणात्मक योजना कोणत्या आहेत ते स्पष्ट करता येईल.
६.० प्रस्तावना
भारत स्वतंत्र होत असताना भारतीय अर्थव्यवस्था संकटात होती. वसाहतवादामुळे भारत
स्वतःच्या विकासाची गरज न भागवता तो परदेशी भूमीची गरज भागवत होता, दुसरीकडे
भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या अर्ध्या शतकादरम्यान, जगामध्ये सर्वत्र कृषी आणि उद्योगधंद्यांचा
विकास आणि विस्तार होत होता.
ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सामाजिक क्षेत्राच्या वाढीसाठी कधीही महत्त्वपूर्ण बदल केलेले
नाहीत आणि यामुळे अर्थव्यवस्थेच्या उत्पादक क्षमतेस अडथळा निर्माण झाला. स्वातंत्र्याच्या
काळात, भारतातील साक्षरतेचे प्रमाण केवळ १७ टक्के होते, सरासरी आयुर्मान ३२.५ वर्षे Self-Instructional
होते म्हणून, भारत स्वतंत्र झाल्यानंतर अर्थव्यवस्थेची पद्धतशीर बांधणी करणे हे त्या Material 147
भारतीय
अर्थव्यवस्थेचा... काळाच्या सरकारसमोरील खरे आव्हान होते. विकास आणि विकासाची गरज ही राजकीय
नेतृत्वासमोर मोठी मागणी होती. १९५६ मध्ये घेतले गेलेले बरेच महत्त्वपूर्ण आणि सामरिक
NOTES निर्णय जे अजूनही भारताच्या आर्थिक प्रवासाला आकार देत आहेत.
आज भारत जगातील सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आणि क्रय शक्तीच्या
आधारावर भारतीय अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा जीडीपी २. ९ ट्रिलियन
डॉलर एवढा आहे. तरीसुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेपुढे अनेक समस्या आहेत जसे गरिबी,
बेरोजगारी, विषमता. या प्रकरणामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील समस्या आणि
त्यावर सरकारने योजलेल्या उपायांची माहिती करून घेणार आहोत.
व्याख्या :
गरिबीची अनेक प्रकारे व्याख्या केली गेली आहे. जागतिक बँकेने ( १९९०) गरिबीची
व्याख्या केली आहे, की “किमान जीवनमान प्राप्त करण्यातली असमर्थता”.
दांडेकरांच्या शब्दांत ( १९८१ ) “कशाही पद्धतीने पुरेशा उत्पन्नाचा अभाव म्हणजे
गरिबी.” अशा प्रकारे निर्वाहाकरता लागणाऱ्या मूलभूत वस्तू खरेदी करण्यासाठी पुरेसे
उत्पन्न न मिळणे हा दारिद्र्याच्या व्याख्येतील महत्त्वाचा मुद्दा आहे.
गरिबीचे प्रकार
१. सापेक्ष दारिद्र्य
वस्तुतः दारिद्र्य ही सापेक्ष संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्नाची लोकांमध्ये वाटणी कशा
प्रकारे झाली आहे यावर समाजातील सामाजिक कल्याण बऱ्याच प्रमाणावर अवलंबून
असते.
जेव्हा दोन व्यक्ती किंवा दोन समूह किंवा दोन वस्तू किंवा दोन देश यांची तुलना
करावयाची असते तेव्हा सापेक्ष या शब्दाचा उपयोग केला जातो. एकाच देशातील उच्च
Self-Instructional उत्पन्न आणि न्यून उत्पन्न असणाऱ्या लोकांच्या उत्पन्नाची आणि उपभोगाची तुलना केली
Material 148 जाते तेव्हा सापेक्ष दारिद्र्य या संकल्पनेचा वापर केला जातो.
भारतीय
उच्चतम उत्पन्न गटातील लोकसंख्येशी तुलना करता सर्वांत खालच्या उत्पन्न गटातील अर्थव्यवस्थेचा...
लोक दारिद्र्यात आहेत असे मानले जाते तेव्हा त्यास सापेक्ष दारिद्र्य म्हणतात.
सापेक्ष दारिद्र्य ही संकल्पना तुलनेवर आधारलेली आहे. इतरांच्या तुलनेत दारिद्र्य असा NOTES
दारिद्र्याचा अर्थ लावता येतो. सर्वांचे उत्पन्न सारखे राहिले, तर सापेक्ष दारिद्र्याचा प्रश्नच
उद्भवला नसता; पण प्रत्येक देशात उत्पन्न वाटपातील विषमता असते. काही लोकांना
सरासरीपेक्षा जास्त उत्पन्न मिळते म्हणजे इतरांना सरासरीपेक्षा कमी उत्पन्न मिळते.
सरासरीपेक्षा ज्यांना फार कमी उत्पन्न मिळते त्यांना रूढ व्यवहारात सहभागी होता येत नाही.
त्यांना सर्वसाधारण जीवनमान मिळत नाही. अशा लोकांना दरिद्री म्हणावे. सापेक्ष दारिद्र्याची
संकल्पना उत्पन्नाच्या विषम वाटपाशी संबंधित आहे. सर्व देशांत सापेक्ष दारिद्र्य आढळते.
विषमता जितकी कमी तितके सापेक्ष दारिद्र्य कमी आढळते.
२. निरपेक्ष दारिद्र्य
ज्या वेळी दारिद्र्याची मोजणी करण्यासाठी कुठल्या तरी निरपेक्ष मानकाचा वापर केला
जातो तेव्हा त्याला निरपेक्ष दारिद्र्य म्हणतात.
ज्या व्यक्तीला आपल्या प्राप्त उत्पन्नातून किमान गरजा भागवणेही शक्य नसते त्यास
निरपेक्ष दरिद्री मानले जाते.
निरपेक्ष दारिद्र्याचा संबंध किमान निर्वाह पातळीशी जोडला जातो. निरपेक्ष याचा अर्थ
इतरांची तुलना न करता असा होय. जीवन जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य, डाळी,
तेल, दूध, भाजीपाला, कपडे इत्यादी वस्तूंची आवश्यकता असते. व्यक्तीला दररोज
साप्ताहिक किंवा मासिक उत्पन्न मिळते. त्यातून वरील वस्तू खरेदी करणेही शक्य नसेल, तर
त्या व्यक्तीस दरिद्री मानण्यात येत.े व्यक्तीला आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी काही
किमान उत्पन्न मिळवणे गरजेचे असते. जर व्यक्तीचे उत्पन्न या पातळीपेक्षाही कमी असेल,
तर ती व्यक्ती निरपेक्ष दृष्टीने दरिद्री समजली जाते.
जेव्हा लोकांकडे पुरेसे अन्न, कपडे आणि निवारा नसतो तेव्हा आपण म्हणतो, की ते
संपूर्ण दारिद्र्यात आहेत.
सापेक्ष गरिबी म्हणजे भिन्न वर्गातील लोक किंवा समान गटातील लोकांच्या किंवा भिन्न
देशांमधील लोकांच्या उत्पन्नातील फरक होय. जर आपण देशाच्या लोकसंख्येची उत्पन्नाच्या
आधारे वेगवेगळ्या वर्गांत विभागणी केली आणि जर आपण एकूण लोकसंख्येच्या सर्वोच्च
२० टक्के लोकांची तळातल्या २० टक्के लोकांशी तुलना केली, तर आपण असे म्हणू
शकतो, की आपण सापेक्ष गरिबीचा अभ्यास करीत आहोत.
Self-Instructional
४. प्राथमिक गरिबी आणि दुय्यम गरिबी Material 149
भारतीय प्रसिद्ध समाजशास्त्रीय संशोधक, सीबोहम राऊंट्री याच्या मते प्राथमिक गरिबीपेक्षा
अर्थव्यवस्थेचा... अधिक लोक दुय्यम गरिबीमुळे ‘मानवी गरजांचे मोजमाप’ ओलंडण्यापासून वंचित राहतात.
प्राथमिक दारिद्र्य आणि दुय्यम गरिबी यांच्यातला फरक राऊंट्री (१९०१०) यांनी स्पष्ट
NOTES केला आहे. प्राथमिक गरिबी म्हणजे “ज्या कुटुंबांची एकूण कमाई केवळ शारीरिक
कार्यक्षमतेच्या देखभालीसाठी आवश्यक असणाऱ्या किमान गरजेच्या वस्तू मिळवण्यासाठीही
पुरेशी नसते अशी अवस्था.”
"दुय्यम गरिबी म्हणजे अशी अवस्था ज्यामध्ये कमाईतील काही भाग इतर उपयोगी
अथवा निरुपयोगी बाबींवर (उदाहरणार्थ दारू, जुगार आणि अकार्यक्षम घरकाम इत्यादी)
खर्च झाला नसता, तर केवळ शारीरिक कार्यक्षमतेसाठी देखभाल करण्यासाठी ती पुरेशी
झाली असती. राऊंट्री म्हणतात, की प्राथमिक गरिबीपेक्षा अधिक लोक दुय्यम गरिबीमुळे
‘मानवी गरजांचे मोजमाप’ ओलांडण्यापासून वंचित राहतात. (प्राथमिक गरिबी म्हणजेच
अपुरे उत्पन्न).
सर्वसाधारणपणे, प्रति व्यक्ती सर्वांत कमी उत्पन्न असणारी कुटुंबे प्रमाणात मोठी असतात
ज्यात बरीच मुले किंवा आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेले बरेच सदस्य असतात. सहसा
नेहमीच्या वर्षात, गरीब लोकांचे सर्व उत्पन्न या नाही तर त्या प्रकारच्या बाबीवर खर्च होते.
बहुशः यापैकी निम्मा खर्च खाण्यासाठी /अन्नासाठी होतो. साहजिकच मुख्य अन्नधान्याच्या
किंमती (अन्नधान्य, डाळी, तेल, भाज्या) त्यांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण असतात. गरीब
कुटुंबे सहसा मुलींपेक्षा मुलांसाठी शिक्षणामध्ये गुंतवणूक करतात. गरीब लोक राजकारणात
फारसा भाग घेत नाहीत. एका अर्थाने ते वंचित असतात. अर्थात काही अपवादात्मक
Self-Instructional उदाहरणेही आहेत. गुन्हेगारी, अस्वस्थता आणि गरिबांपर्यंत पोहोच नसणे हे दारिद्र्याचे
Material 150 सहसंबंधी घटक मानले जातात.
भारतीय
• सर्वसाधारणपणे, प्रति व्यक्ती सर्वात कमी उत्पन्न असणारी कुटुंबे मोठी प्रमाणात अर्थव्यवस्थेचा...
असतात ज्यात बरीच मुले किंवा आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेले बरेच सदस्य असतात.
• सहसा नेहमीच्या वर्षात, गरीब लोकांचे सर्व उत्पन्न या नाही तर त्या प्रकारच्या NOTES
बाबीवर खर्च होते. बहुशः यापैकी निम्मा खर्च खाण्यासाठी /अन्नासाठी होतो. साहजिकच
मुख्य अन्नधान्याच्या किंमती (अन्नधान्य, डाळी, तेल, भाज्या) त्यांच्या कल्याणासाठी
महत्त्वपूर्ण असतात.
• गरीब कुटुंबे सहसा मुलींपेक्षा मुलांसाठी शिक्षणामध्ये गुंतवणूक करतात.
• गरीब लोक राजकारणात फारसा भाग घेतात. एका अर्थाने ते वंचित असतात.
अर्थात काही अपवादात्मक उदाहरणे ही आहेत.
• गुन्हेगारी, बेकारी, आजारपण आणि जीवनावश्यक सुविधांचा गरिबांपर्यंत पोहोच
नसणे हे दारिद्र्याचे सहसंबंधी घटक मानले जातात .
• बऱ्याच देशांमध्ये दारिद्र्य हे जाती आणि वंशाशी संबंधित आहे. भारतातील
अनुसूचित जाती जमातीमधील लोक तसेच आदिवासी आणि यूएसए मधील कृष्णवर्णीय ही
ठळक उदाहरणे आहेत.
दारिद्र्यरेषा
दारिद्र्यरेषा म्हणजे किमान उत्पन्न, वापर किंवा सामान्यत: वस्तू आणि सेवा मिळण्याची
किमान शक्यता. जीवनमान या रेषेच्या खाली गेल्यास व्यक्ती गरीब मानल्या जातात.
दारिद्र्य रेषा ही खर्चाची अशी पातळी आहे ज्यावर किमान उष्मांकाचे अन्न आणि यांखेरीज
इतर अपरिहार्य वस्तूंच्या खरेदीची हमी असते.
हे लक्षात घ्यायला हवे, की गरिबांमध्येही गरिबीच्या प्रमाणामध्ये फरक आहे. तेव्हा
सरकारी धोरणांचे लक्ष सर्वांत गरीब लोकांवर केंद्रित असले पाहिजे.
अनेक देशांमध्ये वापरली जाणारी दारिद्र्य रेषा पोषणाधारित असते.
भारतातील दारिद्र्य
दांडेकर आणि रथ यांनी अपेक्षित सेवनाच्या किमान पातळीनुसार आहाराचे मूल्य
२,२५० कॅलरीज् एवढे निश्चित केल.े नियोजन आयोगाने दरमहा रु. २०/- दरमहा (म्हणजे
वार्षिक २४० रुपये) स्वीकारले, तर दांडेकर आणि रथ यांनी ग्रामीण लोकसंख्येसाठी त्याहून
कमी म्हणजे कमीतकमी (रु. १८० /- दर डोई प्रति वर्ष) आणि शहरी लोकसंख्येसाठी
त्याहून अधिक म्हणजे कमीतकमी (रु. २७०/- दरडोई प्रति वर्ष) अशी रक्कम १९६०-६१
च्या किंमतीनुसार सुचवली. १९६८-६९ च्या किंमतीनुसार ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येसाठी
याच रकमा अनुक्रमे रु. ३२४/- आणि रु. ४८६/- होत्या. या आधारे त्यांचा अंदाज असा
होता, की ग्रामीण भागातील ४० टक्के लोकसंख्या आणि शहरी लोकसंख्येपैकी ५० टक्के
लोक दारिद्र्य रेषेखालील आहेत.
पी.डी.ओझा यांच्या मते ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील लोकांची टक्केवारी Self-Instructional
१९६१ मध्ये ५२ टक्क्यांवरून वाढून १९६७-६८ मध्ये ७० टक्के झाली. Material 151
भारतीय बी.एस.मिन्हास यांनी दरडोई वार्षिक किमान खर्च रु. २४०/- घेऊन असा निष्कर्ष
अर्थव्यवस्थेचा... काढला, की जवळजवळ निम्मी ग्रामीण लोकसंख्या (५२ टक्के) १९६८ मध्ये दारिद्र्य
रेषेखालील जीवन जगत होती.
NOTES पी.के.बर्धन यांच्या अभ्यासानुसार असा निष्कर्ष काढला गेला आहे, की दारिद्र्यरेषेखालील
ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारी १९६०-६१ मध्ये ३८ टक्क्यांवरून वाढून १९६८-६९ मध्ये
५४ टक्के झाली आहे.
माँटेकसिंग अहलुवालिया यांच्या ग्रामीण दारिद्र्यावरच्या अभ्यासाचा ( १९७७ ) निष्कर्ष
असा होता, की ग्रामीण भागातील दारिद्र्य सुरुवातीला १९५० च्या मध्यभागी घटले आणि
५० टक्क्यांवरून १९६०-६१ मध्ये ते ४० टक्क्यांपर्यंत खाली आले; परंतु १९६७-६८ मध्ये
ते ५६.५ टक्क्यांपर्यंत वाढले. जेव्हा जेव्हा शेतीची उपज चांगली होती तेव्हा ग्रामीण दारिद्र्य
कमी होते, आणि जेव्हा शेती कमी होते तेव्हा ग्रामीण दारिद्र्य वाढते. हे लक्षात घ्यायला हवे,
की अहलुवालियांनी ग्रामीण भागासाठी १९६०-६१ मध्ये खर्चाची पातळी दरडोई प्रति महिना
रु. १५/- आणि शहरी भागासाठी दरमहा रु. २०/- अशी वापरली होती. अहलुवालिया यांनी
हे मान्य केले, की या पातळीवरील खर्च हा अत्यल्प पातळीवरील जीवनमान दर्शवितो.
सातव्या वित्त आयोगाने ‘वृद्धिंगत गरिबी रेखा’ ही संकल्पना वापरली. त्यामध्ये दरडोई
खाजगी ग्राहक खर्चासह सार्वजनिक खर्च; जसे की
(१) आरोग्य आणि कुटुंब नियोजन
(२) पाणीपुरवठा व स्वच्छता;
(३) शिक्षण;
(४) पोलिस, कारागृह व कोर्टाचे प्रशासन;
(५) रस्ते; आणि
(६) समाजकल्याण हेही विचारात घेतले.
जुलै २०१३ मध्ये नियोजन आयोगाने 'तेंडुलकर गरीबी रेषेच्या' आधारे २०११-१२
मधील दारिद्र्य आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार देशातील गरिबांची संख्या
२९. ८ दशलक्ष किंवा २१.९ टक्के इतकी आहे.े
नियोजन आयोगाने ग्रामीण व शहरी भागातील अनुक्रमे दरडोई मासिक खर्च ४९.१
आणि ५६.६ रुपये घेऊन दारिद्र्यरेषेचा अंदाज बांधला. जागतिक बँकेने भारतात १९८८
मध्ये ३९.६ टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखालील असल्याचे म्हटले आहे. ग्रामीण
भागासाठीची टक्केवारी ४१.७ टक्के व शहरी भागात ३९.६ टक्के होती.
नियोजन आयोगाच्या म्हणण्यानुसार भारतात दारिद्र्याचे प्रमाण १९७३-७४ मध्ये ५३.९
टक्के होते ते घटून १९८७-८८ मध्ये ३९.३ झाले. याच वर्षात ग्रामीण दारिद्र्य ५६.४
टक्क्यांवरून ३९.१ टक्क्यांवर आणि शहरी दारिद्र्य ४९.२ टक्क्यांवरून ४०.१ टक्क्यांवर
उतरले.
तक्ता : भारतातील टक्केवारी व गरिबांची संख्या
भारत सरकारनुसार सध्या शहरी भागातील दारिद्र्यरेषा दरमहा रु. २९६ आणि ग्रामीण
भागासाठी दरमहा रु. २७६ अशी आहे. दररोज रु.१० पेक्षा कमी कमावणारे लोक दारिद्र्य
रेषेखालील समजले जातात. जीओआयनुसार, ही रक्कम वैद्यकीयदृष्ट्या मृत्यूपासून बचाव
करण्यासाठी पुरेसे म्हणजे दररोज २२०० कॅलरी इतके अन्न खरेदी करण्यास पुरेशी आहे.
कमाईच्या या पातळीवर, अगदी भारतासारख्या गरीब देशातही दररोज रु. १० वर निर्वाह हे
एक भयानक दुःस्वप्न आहे. भारतातील विकासाची सर्वांत मोठी शोकांतिका ही आहे, की
सुमारे २६० दशलक्ष लोक अद्यापही दररोज १० रुपयांपेक्षाही कमी उत्पन्नात जगत आहेत.
२. आर्थिक विषमता
साधनसंपत्तीच्या मालकी हक्कामुळे भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे विभाजन खूप असमान
झाले आहे. १९९१-९२ च्या रिझर्व्ह बँकेच्या पाहणीनुसार भारतातील २० टक्के अति गरीब
लोकांना राष्ट्रीय उत्पन्नाचा फक्त ८ टक्के हिस्सा मिळतो, तर दहा टक्के श्रीमंत लोकांना
राष्ट्रीय उत्पन्नाचा ३० टक्के वाटा मिळतो. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात आर्थिक विषमता
हेच दारिद्र्याचे मूळ कारण आहे. भारतात काही थोडे लोक श्रीमंत आहेत, तर फार मोठी
लोकसंख्या दारिद्र्यात आहे.
७. लोकसंख्येची वाढ
लोकसंख्येच्या दबावामुळे प्रत्येक उत्पन्न कमावणाऱ्या सदस्यावर बरेच जण अवलंबून
असतात. तसेच छुपी बेरोजगारी हीदेखील एक समस्या आहे. शेतामध्ये केवळ चार
व्यक्तींसाठी काम असू शकते; पण सहा किंवा सात जण शेतावर असतील, तर अतिरिक्त
व्यक्तींची सीमान्त उत्पादकता शून्य आहे.
• भारतीय शेतीची उत्पादनक्षमता कमी आहे. त्यामुळे शेतीत गुंतलेले बहुतेक लोक
गरीब आहेत.
• ग्रामीण भागातील बहुतेक लोकांकडे पुरेशी मालमत्ता विशेषत: जमीन नाही. याचे
मुख्य कारण म्हणजे काही थोडक्या कुटुंबांच्या हातात जमीन एकवटलेली आहे.
• गरिबीच्या घटनांमध्ये प्रादेशिक बदलदेखील जास्त आहेत. उदाहरणार्थ १९८७-८८
मध्ये भारतातील ५८ टक्के गरीब लोक उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम
बंगाल आणि मध्य प्रदेश अशा पाच राज्यांत राहत होते.
• शहरी भागातील अनेक कामगारांना उप-रोजगाराचा त्रास सहन करावा लागला. ते
श्रमिक गरीब आहेत. ग्रामीण भागातून शहरी भागात लोकांचे स्थलांतर हेदेखील
शहरी दारिद्र्याचे एक कारण आहे.
बेरोजगारी
पूर्ण रोजगाराचा अर्थ
Self-Instructional पूर्ण रोजगार म्हणजे अशी परिस्थिती ज्यामध्ये काम करण्यास सक्षम आणि काम
Material 154 करण्यास इच्छुक अशा सर्व कामगारांना वाजवी वेतनात रोजगार मिळतो. याचा अर्थ असा
भारतीय
होत नाही, की सर्व प्रौढांकडे नोकरी आहे. अर्थव्यवस्थेचा...
रोजगारीचा अंदाज
वर्षाच्या २७३ दिवसांसाठी रोज ८ तास काम करणाऱ्या व्यक्तीला प्रमाणित व्यक्ती
वर्षाच्या आधारे नोकरदार समजले जाते. एनएसएसच्या (राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण) २७ व्या
फेरीत निष्पन्न झालेले बेरोजगारीचे तीन अंदाज खाली दिले आहेत.
१. घर्षणात्मक बेकारी
एक रोजगार सोडून दुसरा रोजगार मिळण्यापूर्वी काही काळ कामकरी बेकार असतो.
उपलब्ध असलेल्या रोजगारांची संख्या इच्छुक कामकऱ्यांइतकी व प्रसंगी अधिक असूनही
काम करणाऱ्याला पुरेशा माहितीअभावी अगर स्थलांतर व नोकरीतील बदल नकोसा वाटत
असल्यामुळे अशा प्रकारची बेकारी उद्भवते.
२. हंगामी बेकारी
काही उद्योगधंद्यांच्या हंगामी स्वरूपामुळे कामकऱ्यांना मिळणारा रोजगार हंगामी
स्वरूपाचा असतो व विशिष्ट हंगामात त्यांना काम मिळू शकत नाही. तेवढ्या हंगामापुरते ते
कामकरी ‘बेकार’ म्हणून गणले जातात. हंगामी कामकरी हंगामानंतर अन्य प्रकारचा रोजगार
शोधतात; परंतु तो लगोलग न मिळाल्यास मध्यंतरीच्या काळात घर्षणात्मक बेकारी उद्भवते.
३. संरचनात्मक बेकारी:
विशिष्ट अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक संतुलनाच्या अभावी त्या अर्थव्यवस्थेत Self-Instructional
संरचनात्मक बेकारी उद्भवते : Material 155
भारतीय
अर्थव्यवस्थेचा... निरनिराळ्या उत्पादन घटकांतील असंतुलन : उदा., श्रम व भांडवल वा भूमी.
अर्थव्यवस्थेत श्रम उपलब्ध असूनही त्याला पूरक असणारे भूमी अगर भांडवलासारखे
NOTES उत्पादन घटक उपलब्ध नसतील, तर रोजगार निर्माण होणार नाही व बेकारीची परिस्थिती
ओढवेल.
काही विशिष्ट प्रकारच्या श्रमाला पुरेशी मागणी नसल्यामुळे त्या श्रमाच्या बाबतीत
बेकारी उद्भवेल. याला विविध कारणे असू शकतात. एक म्हणजे उत्पादनतंत्रातील
बदलामुळे अगर मागणीतील बदलामुळे विशिष्ट प्रकारच्या श्रमाला बाजारात मागणी उरत
नाही. दुसरे, एखाद्या प्रदेशातून उद्योगव्यवसाय उठून गेले अगर कमी झाले आणि तेवढ्या
प्रमाणावर श्रमिक स्थलांतरित झाले नाहीत, तर त्या प्रदेशात बेकारी उद्भवते. तिसरे म्हणजे,
एखाद्या प्रदेशात बाहेरून फार मोठ्या प्रमाणावर श्रमिक स्थलांतरित होऊन आले – उदा.,
निर्वासितांचा लोंढा आला-तर त्या प्रदेशात त्यांना लगोलग रोजगार उपलब्ध होऊ शकत
नाही म्हणून ही बेकारी उद्भवते.
५. अदृश्य बेरोजगारी
काही वेळा व्यक्तींना त्यांच्या कुवतीपेक्षा कमी प्रतीचे काम करावे लागते किंवा
पात्रतेपेक्षा कमी वेतनावर काम करावे लागते अशा प्रकारच्या बेरोजगारीला अदृश्य बेरोजगारी
असे म्हणतात. या प्रकारात व्यक्तीला जरी काम मिळाले असले तरी ते अपुरे असते व
व्यक्ती ते नाईलाजाने स्वीकारते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे केवळ व्यक्ती
नोकरीवर आहेत याचा अर्थ त्या बेकार नाहीत असा होत नाही. अशा बेरोजगारीला अदृश्य
बेरोजगारी असे म्हणतात.
६. तांत्रिक बेरोजगारी
उत्पादनाच्या तंत्रात बदल झाल्यामुळे नवनवीन आधुनिक तंत्रांचा वापर जर उद्योगात
केला जात असेल, तर मानवी श्रमाची जागा यंत्र घेते व त्या कामगारांना बेकार व्हावे लागते.
तेव्हा त्यास तांत्रिक बेकारी असे म्हणतात.
७. छुपी बेरोजगारी
छुपी बेरोजगारीचा अर्थ असा, की बेरोजगार व्यक्तीच्या तसेच समाजाच्या पण लक्षात
येत नाही. या प्रकारात प्रत्यक्ष व्यक्ती जरी काम करत असताना दिसत असली तरी त्याच्या
Self-Instructional कामामुळे प्रत्यक्ष उत्पादनात वाढ झाल्याचे दिसत नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले, तर
Material 156 प्रत्यक्ष व्यक्ती काम करीत असल्या तरी सामाजिक व आर्थिक दृष्टिकोनातून त्या बेकार
भारतीय
असतात म्हणूनच अशा बेरोजगारांना छुपी बेरोजगारी असेही म्हटले जाते. अर्थव्यवस्थेचा...
१. दारिद्र्य
भारतात दारिद्र्य व बेरोजगारी या दोन्ही समस्या तीव्र स्वरूपाच्या आहेत. अनेक
व्यक्ती गरीब असण्याचे कारण बेकारी हे आहे; पण त्याचबरोबर व्यक्तीचे दारिद्र्यही
बेकारीस कारणीभूत आहे. व्यक्ती गरीब असल्यामुळे त्यांच्याकडे साधनसामग्रीची कमतरता
असते. त्यामुळे त्यांना फायदेशीर रोजगार मिळवता येत नाही. गरिबीमुळे शिक्षण व
प्रशिक्षणावर खर्च करणे शक्य होत नाही. व्यवसाय सुरू करण्यात अडचणी येतात, नोकरी
मिळवण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो. गरीब लोकांना तो खर्च करता येत नाही त्यामुळे
त्यांना बेकार राहावे लागते.
६. भांडवलप्रधान तंत्रावरील भर
भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेत शेती क्षेत्रावर भर दिला. मात्र दुसऱ्या योजनेपासून
औद्योगिक क्षेत्रावर भर देण्यात सुरुवात झाली. औद्योगिक विकास प्रामुख्याने भांडवल
प्रधान उत्पादन तंत्राच्या स्वीकारावर आधारलेला आहे. भांडवलप्रधान तंत्रामुळे रोजगार संधी
पुरेशा प्रमाणात निर्माण होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे बेकारीची समस्या निर्माण झाली.
Self-Instructional ८. विषमता
Material 160 जेव्हा व्यक्तींमध्ये भौतिक संपत्ती किंवा एकूणच राहणीमानासाठीची आर्थिक परिस्थिती
भारतीय
समान नसते तेव्हा परिणामांची असमानता उद्भवते. विकास सिद्धांत प्रामुख्याने उत्पन्न / अर्थव्यवस्थेचा...
संपत्ती, शिक्षण, आरोग्य आणि पोषण यांसारख्या जीवनमानातील असमानतेशी संबंधित
आहे. तथापि, अर्थशास्त्रज्ञ सहसा उत्पन्न किंवा वापर या दृष्टीने या मोर्चांवरील प्रगतीचा NOTES
आढावा घेतात. ‘समानतेचा अभाव असलेली; विशेषत: प्रतिष्ठा, अधिकार आणि संधी
यांमध्ये समानता नसलेली स्थिती,’ असे संयुक्त राष्ट्र संघाने विषमतेचे वर्णन केले आहे.
आर्थिक विषमता: व्यक्ती किंवा समाजातील भिन्न गट यांच्यात उत्पन्न आणि संधीचे
असमान वितरण म्हणजेच आर्थिक विषमता.
सामाजिक विषमता : जेव्हा समाजातील संसाधनांचे समाजातील निकषांनुसार
आसमान वितरण केले जाते तेव्हा सामाजिक विषमता निर्माण होते. यामुळे समाजाने
ठरवलेल्या प्रवर्गांनुसार विशिष्ट आकृतिबंध तयार केले जातात. उदा. धर्म, नातलग, प्रतिष्ठा,
वंश, जाती, वांशिक वारसा, लिंग इत्यादी. समाजातील निकषांवर अवलंबून वेगवेगळ्या
प्रवर्गांसाठी सत्ता, प्रतिष्ठा आणि संपत्तीच्या स्त्रोतांचे असमान वितरण केले जाते.
या दोन्ही श्रेणी एकमेकांशी खोलवर निगडित आहेत आणि एका प्रकारची विषमता
दुसऱ्या विषमतेवर परिणाम करते, उदा. लिंगामुळे होणारी सामाजिक विषमता महिलांच्या
उत्पन्नावर मोठा परिणाम करते. पुरुषप्रधान समाजात लिंगानुसार वेतनात मोठा फरक असतो
.
भारतात असमानतेचे परिमाण:
भारतात सामाजिक असमानतेचे विशिष्ट प्रकार खालीलप्रमाणे आहेत:
लिंग - २०१८ सालच्या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टनुसार भारत १४९ देशांपैकी १४२ व्या
स्थानावर आहे.
लैंगिक असमानता मोजण्याचे चार मापदंड म्हणजे आर्थिक सहभाग आणि संधी,
आरोग्य आणि तग धरण्याची शक्ती, शैक्षणिक यश/अर्हताप्राप्ती आणि राजकीय सबलीकरण.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या मते भारतात स्त्री - पुरुषांमध्ये वेतनातील फरक
सर्वांत जास्त आहे. स्त्रियांना पुरुषांपेक्षा ३४% कमी वेतन दिले जाते.
देशातील शेतकी कामगार वर्गात ४२ टक्क्यांहून अधिक महिलांचा समावेश आहे, तरीही
भारत मानव विकास सर्वेक्षणानुसार (आयएचडीएस) त्यांच्याकडे एकूण शेतीच्या दोन
टक्क्यांपेक्षाही कमी शेतीची मालकी आहे.
जाती
शिक्षण, उत्पन्न, आरोग्य यांसारख्या संसाधनांमध्ये व्यक्तीसाठी मूल्यवान असलेल्या
संसाधनांच्या प्राप्तीसाठी जात ही महत्त्वाची निर्णायक बाब आहे.
जागतिक असमानता डेटाबेसनुसार भारतातील उच्च जातीच्या कुटुंबांनी २०१२ मध्ये
राष्ट्रीय वार्षिक सरासरी घरगुती उत्पन्नापेक्षा जवळपास ४७ टक्के अधिक कमाई केली
आहे. या जातींतील सर्वोच्च१० टक्के लोकांकडे गटातील संपत्तीपैकी ६० टक्के संपत्तीची
मालकी होती.
Self-Instructional
Material 161
भारतीय
अर्थव्यवस्थेचा...
धर्म
NOTES एखाद्या व्यक्तीच्या संसाधने जमवण्याच्या क्षमतेसाठी धार्मिक ओळख महत्त्वपूर्ण आहे.
धार्मिक ओळखीमुळे पूर्वग्रह निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आर्थिक अपवर्जन होऊ शकते
/ आर्थिक बाबींतून लोकांना वगळले जाऊ शकते आणि नोकरी आणि रोजीरोटीच्या
संधींवर प्रभाव टाकू शकणाऱ्या इतर प्रकारचा भेदभावही होऊ शकतो.
लोकसंख्येच्या तुलनेत ख्रिस्ती, पारशी आणि जैन या अल्पसंख्याकांचा उत्पन्न व
उपभोगाचा वाटा मोठा आहे, तर मुस्लिम आणि बौद्ध समाजाची आर्थिक संसाधनांपर्यंत
पोहोच लक्षणीय प्रमाणात कमी आहे.
वांशिकता
आदिवासींचे समुदाय, त्यांची विशिष्ट संस्कृती, भाषा, बोली, भौगोलिक स्थान, प्रथा
इत्यादींच्या आधारे वांशिक गट म्हणून ओळखले गेले आहेत.
सन २०१५-१६ च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात (एनएफएचएस- ४) असे दिसून
आले आहे, की अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येपैकी ४५.९ लोक संपत्तीच्या निम्नतम
ब्रॅकेटमध्ये आहेत. तुलनेने हे प्रमाण अनुसूचित जातींमध्ये २६.६ टक्के, इतर मागासवर्गीयांत
(ओ.बी.सी.) १८.३ टक्के तर इतर जातींमध्ये ९.७ टक्के आहे.
आर्थिक असमानता
सन २०१७-१८ च्या भारतीय आर्थिक सर्वेक्षणात सन २०१९-२०साठी गुंतवणुकीतील
आणि खपातील अपेक्षित वाढीचा विचार करून भारताच्या ‘वास्तविक जीडीपी’ची ७ टक्के
वाढ प्रक्षेपित/प्रोजेक्ट केली आहे. मागील विकास दराच्या आकडेवारीपेक्षा ही कमी झाली
असली तरी भारत अजूनही जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. त्याच
आर्थिक सर्वेक्षणात म्हटल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला पाच ट्रिलियन
अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी खासगी
गुंतवणुकीतून आर्थिक वाढीची रणनीती बनविली आहे. या वाढीच्या दरामुळे एकूण विचार
करता भारत सर्वांत प्रभावी कामगिरी करणाऱ्या देशांपैकी एक म्हणून उठून दिसतो; परंतु
दुसरीकडे असमानतेसंदर्भात असलेल्या उपाययोजनांबाबत, भारताची कामगिरी कमी प्रभावी
आहे.
२०१८ च्या जागतिक असमानता अहवालानुसार भारत हा जगातील सर्वांत असमान
देशांपैकी एक आहे. २०१६ मध्ये भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामधील सर्वोच्च दहा टक्के
कुटुंबांचा वाटा ५५ टक्के होता. ही सर्व देशांमध्ये नवीन सहस्राब्दीमधे (२०००–१५)
नोंदविण्यात आलेली सर्वांत जास्त वाढ आहे. या संख्येमुळे मध्यपूर्वेच्या( ६१ टक्के)
पाठोपाठ भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. १९८० सालामध्ये जेव्हा भारताची वाढ मंदावली
होती, तेव्हा पहिल्या दहा टक्के उत्पन्नातील हिस्सा अवघा ३१ टक्के होता.
जीडीपीच्या आधारे क्रय शक्ती समतेच्या संबंधात अमेरिका, चीन आणि भारत या
जगातील तीन मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. या तीन देशांपैकी भारत हा असा एकमेव देश
आहे जिथे सन १९९५ ते २०११ पर्यंत गिनी गुणांक (० ते १ दरम्यानचे असमानतेचे एक
Self-Instructional परिमाण, जेथे शून्य संपूर्ण समानता दर्शविते तर एक, अत्यंत असमानता दर्शवतो) सातत्याने
Material 162 वाढत गेला. सन १९९५ मध्ये तो ०.३१२ होता व वाढत जाऊन सन २०११ मध्ये तो ०.३४९
भारतीय
झाला. अर्थव्यवस्थेचा...
सहा दशकांपेक्षा अधिक काळासाठी भारताच्या वाढीच्या अनुभवाचा दीर्घकालीन
अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास ग्राहकांच्या खर्चावरील भारताच्या राष्ट्रीय नमुन्यांच्या NOTES
सर्वेक्षणावर आधारित होता. या अभ्यासामुळे सिद्ध होते, की १९९० च्या दशकाच्या
सुरुवातीच्या वर्षांत वाढीसह उपभोग असमानतेत वाढ झाली आणि त्यामागील दशकांतील
असमानता कमी होण्याच्या प्रक्रियेत उलट दिशेने बदल झाला.
अखिल भारतीय कर्ज व गुंतवणूक सर्वेक्षण (एडीआयएस) च्या आकडेवारीत वाढती
संपत्तीची असमानता दर्शविली गेली आहे. यात सर्वोच्च १० टक्के लोकांकडचा संपत्तीचा
वाटा १९९१ ते २०१२ या काळात ५२ टक्क्यांवरून ६३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, तर त्याच
काळात तळातल्या ५० टक्के लोकांकडचा संपत्तीचा वाटा ९ टक्क्यांवरून घसरून ५
टक्क्यांवर आला आहे. एडीआयएसमध्ये आकडेवारीत कॉर्पोरेट संपत्तीचा समावेश नाही,
यामुळे संपत्तीच्या असमानतेतली वाढ कमी दर्शवली जाण्याची शक्यता आहे.
हे सर्व पुरावे दर्शवित आहेत, की सर्वांत श्रीमंत कुटुंबे उर्वरित देशवासीयांपेक्षा अशा
(विषम) प्रकारे प्रगती करत आहेत. त्यामुळे भारताच्या आर्थिक वाढीचा अनुभव पाच
ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या चकचकीत आभासी प्रतिमेपेक्षा खूपच कमी
चमकदार वाटतो.
असंघटित/अनौपचारिक क्षेत्र
असंघटित क्षेत्रात व्यक्ती किंवा घरगुती मालकी किंवा भागीदारी आधारावर चालणाऱ्या
आणि एकूण दहापेक्षा कमी कामगार असणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या विक्री आणि उत्पादनात
भाग घेणाऱ्या सर्व खाजगी उद्योगांचा समावेश होतो.
असंघटित कामगार म्हणजे जे असंघटित क्षेत्रामध्ये किंवा घरगुती कामे करतात, तसेच
संघटित क्षेत्रांमध्ये कुठल्याही सामाजिक सुरक्षा लाभाशिवाय काम करतात अशा कामगारांना
असंघटित कामगार असे म्हणतात.
डीएवाई-एनयूएलएम चे घटक
या योजनेचे दोन घटक आहेत, एक ग्रामीण भारतासाठी आणि दुसरा शहरी भारतासाठी.
दीनदयाल अंत्योदय योजना म्हणून नियुक्त केलेला शहरी घटक गृहनिर्माण व शहरी
गरिबी निर्मूलन मंत्रालय (एचयूपीए) द्वारे लागू केला जाईल.
दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना म्हणून नियुक्त ग्रामीण भाग ग्रामीण
विकास मंत्रालयामार्फत राबविला जाईल.
इतर साधने - विक्रेत्यांसाठी विक्रेता बाजारपेठ विकसित करणे आणि पायाभूत सुविधा
स्थापित करणे आणि कचरा उचलणारे आणि अपंगांसाठी विशेष प्रकल्प इत्यादीद्वारे
कौशल्यांचा प्रचार करणे.
योजनेचा प्रभाव:
• शहरी गरीबांची मालकी आणि फायदेशीर सहभाग आणि सर्व प्रक्रियांमध्ये त्यांचा
• सहभाग.
• संस्था रचना आणि क्षमता मजबूत करण्यासह प्रोग्राम डिझाइन आणि
अंमलबजावणीत
• पारदर्शकता.
• सरकारी अधिकारी आणि समुदायाची जबाबदारी.
• उद्योग आणि इतर भागधारकांसह भागीदारी.
• समुदाय स्वावलंबन, स्वावलंबन, स्वत:ची मदत आणि परस्पर मदत.
मार्गदर्शक तत्त्वे
राष्ट्रीय शहरी आजीविका मिशनचा (एनयूएलएम) मूळ विश्वास असा आहे, की गरीब
लोक उद्योजक असतात आणि गरिबीतून बाहेर पडण्यासाठी उत्सुक असतात. त्यांच्या
क्षमतेचा अर्थपूर्ण व शाश्वत रोजीरोटी निर्माण करण्यासाठी उपयोग करण्याचे आव्हान आहे.
राष्ट्रीय नागरी आजीविका मिशन (एनयूएलएम) असा विश्वास ठेवते, की कोणताही
उपजीविका कार्यक्रम केवळ वेळेवरच राबविला जाऊ शकतो, जर तो गरीब आणि त्यांच्या
संस्थांनी प्रशासित केला तर. अशा मजबूत संस्थात्मक संरचना गरिबांना त्यांच्या वैयक्तिक
मानवी, सामाजिक, आर्थिक आणि इतर मालमत्ता तयार करण्यात मदत करतात. अशा
प्रकारे ते सरकारी आणि खाजगी क्षेत्रांकडून अधिकार, हक्क, संधी आणि सेवा मिळविण्यास
सक्षम करतात आणि त्याच वेळी त्यांचे ऐक्य बळकट करतात, अभिव्यक्ती आणि व्यवहाराची
शक्ती वाढवतात.
संविधान (७४ वा दुरुस्ती) अधिनियम, १९९२ नुसार शहरी गरिबी निर्मूलन हे शहरी
स्थानिक संस्था (यूएलबी) चे कायदेशीर कार्य आहे. म्हणूनच शहरी स्थानिक संस्था
(यूएलबी) शहरे / शहरांमध्ये राहणाऱ्या शहरी गरीब लोकांशी संबंधित त्यांच्या सर्व Self-Instructional
कौशल्यांचा आणि जीवनाचा समावेश असलेल्या सर्व विषयांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये Material 169
भारतीय प्रमुख भूमिका निभावण्याची आवश्यकता आहे.
अर्थव्यवस्थेचा... शहरी गरिबांना कौशल्य विकास आणि कर्जाच्या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सामील
करणे हा एनयूएलएमचा उद्देश आहे. बाजारपेठवे र आधारित कामे आणि स्वयंरोजगारासाठी
NOTES शहरी गरिबांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा आणि सहज कर्ज मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल.
पिरॅमिडच्या पृष्ठभागावरील शहरी लोकसंख्येचा एक भाग स्ट्रीट विक्रेते आहेत. रस्ते
विक्री स्वयंरोजगाराचे साधन प्रदान करते आणि अशा प्रकारे मोठ्या सरकारी हस्तक्षेपाशिवाय
शहरी दारिद्र्य निर्मूलनाचे उपाय म्हणून काम केले जाते. त्यांना शहरी पुरवठा साखळीत
प्रमुख स्थान आहे आणि ते शहरी भागातील आर्थिक विकासाच्या प्रक्रियेचा अविभाज्य
आहेत. एनएलयूएमचे उद्दिष्ट आहे, की त्यांना त्यांच्या कामासाठी योग्य साइट्स प्रदान
करणे, संस्थात्मक पत, सामाजिक सुरक्षा प्रदान करणे आणि उदयोन्मुख बाजारातील संधींचा
फायदा घेण्यासाठी त्यांची कौशल्ये वाढविणे. त्या अनुषंगाने शहरी बेघरांना टप्प्याटप्प्याने
आवश्यक त्या सोयीसुविधा निवारा देण्याचे उद्दिष्ट एनयूएलएमचे आहे.
कौशल्ये, उपजीविका, उद्योजकता विकास, आरोग्य, शिक्षण, सामाजिक साहाय्य इ.
ची कार्ये राबविणारी मंत्रालये / विभाग आणि राज्य सरकारच्या कार्यक्रमांशी संबंधित
योजना / कार्यक्रमांमधील अभिसरण यावर एनयूएलएम जोर देईल. सर्व संबंधित विभागांना
ग्रामीण-शहरी स्थलांतरितांचे कौशल्य प्रशिक्षण, प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण आणि शहरी
गरीब लोकांच्या आजीविका दरम्यानचा पूल म्हणून एक सहकार्य धोरण तयार करण्यासाठी
सहकार्य करण्याची विनंती केली जाईल.
शहरी बेघर लोकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार आणि निवारा कामात मदत मिळवून
देण्यासाठी खासगी क्षेत्राचा सहभाग मिळविणे हे एनयूएलएमचे उद्दिष्ट आहे. हे शहरी
बेघरांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार आणि निवारा प्रदान करण्यात तसेच शहरी गरीब
उद्योजकांना ज्यांना स्वयंरोजगार मिळवायचा आहे आणि स्वत:चा खाजगी लघु उद्योग
किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करू इच्छितात त्यांना तांत्रिक, विपणन आणि एकत्रित
साहाय्य प्रदान करण्यात मदत करते. खाजगी आणि नागरी संस्था क्षेत्रातील सक्रिय
सहभागाची तरतूद करणे.
योजनेची देखरेख :
रिअल-टाइम आणि नियमितपणे या योजनेच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने
मंत्रालयाने एक ऑनलाइन वेब-आधारित व्यवस्थापन माहिती प्रणाली (एमआयएस)
विकसित केली आहे. एमआयएस २० जानेवारी २०१५ रोजी सुरू करण्यात आली.
एमआयएस प्रशिक्षण प्रदाता, प्रमाणपत्र संस्था, बँका आणि स्रोत संस्था यांसारख्या
भागधारकांना थेट आवश्यक माहिती थेट मिळविण्यास सक्षम करते, ज्याचा उपयोग
देखरेखीसाठी आणि इतर उद्दिष्टांसाठी केला जाऊ शकतो आणि शहरी स्थानिक संस्था,
राज्ये आणि एच.यू. पी.ए. मंत्रालयदेखील चालवू शकते.
याव्यतिरिक्त, संचालनालय डे-एनयूएलएम योजनेच्या अंमलबजावणीच्या प्रभावी
देखरेखीसाठी राज्य / केंद्रशासित प्रदेशांशी नियमितपणे आढावा बैठक आणि व्हिडिओ
कॉन्फरन्स आयोजित करेल.
ब) महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ सुधारित कलम (१२) (ई) नुसार
वैयक्तिक लाभाच्या योजना अनुदान तत्त्वावर प्रतिपूर्ती योजना म्हणून राबविण्यात येतात.
उदा. :
१) सिंचन विहिर योजना
२) रोहयोंतर्गत फळबाग लागवड योजना.
योजनेचे स्वरूप
ग्रामीण भागात राहाणाऱ्या व अंगमेहनतीची कामे करणाऱ्या मजुरांना रोजगार उपलब्ध
व्हावा यासाठी राज्याची रोजगार हमी योजना व केंद्राची ग्रामीण रोजगार हमी योजना यांची
सांगड घालून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंमलात आणली आहे.
सन २००५ मध्ये केंद्र शासनाने संपूर्ण भारतात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा
(विद्यमान नाव - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा) लागू केला.
ब) प्रति दिन मजुरीचे दर केंद्र शासन निर्धारीत करते. सन २०१९-२० मजुरी दर रु.
२०६/- इतका आहे.
योजनेची व्याप्ती
पीक विमा योजना जाहीर केलेल्या भागातील शेती करणारे आणि भाडेकरी शेतकऱ्यांसह
सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तथापि, विमा उतरवलेल्या पिकांमध्ये आणि
जमिनींमध्ये शेतकऱ्याचा विमायोग्य हितसंबंध असले पाहिजेत. अशा शेतकऱ्यांना राज्यातील
प्रचलित भूमी अभिलेखांची आवश्यक कागदपत्रे, पुरावे सादर करणे आवश्यक आहे
(रेकॉर्ड ऑफ राईट्स (आरओआर), जमीन ताब्यात प्रमाणपत्र) (एलपीसी) इत्यादी आणि
/ किंवा लागू करार / करार तपशील / इतर कागदपत्रे संबंधित राज्याने परवानगी दिलेली)
भागधारक / भाडेकरू शेतकरी आणि त्यासंबंधीचे सूचना सरकारच्या अधिसूचनेमध्ये असणे
आवश्यक आहेत. शेतकऱ्यांनी आधार क्रमांक आणि पेरणीच्या पिकाविषयी माहिती देणे
आवश्यक आहे.
पीएमएफबीवाय अंतर्गत काय समाविष्ट आहे?
प्रधानमंत्री फसल विमा योजना पीक विम्यात खालील बाबींचा समावेश करेलः
• भूस्खलन, गारपीट इत्यादी स्थानिक नैसर्गिक आपत्ती.
• पूर, कोरडे- ओले दुष्काळ, इत्यादी.
• पीक कापणीनंतर झालेल्या नुकसानीची भरपाईही या योजनेत करता येईल.
चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, इत्यादीमुळे या परिस्थिती उद्भवू शकतात.
• स्थानिक आपत्ती: अधिसूचित भागामध्ये मुसळधार पाऊस, दरडी कोसळणे आणि
पूर यांसारख्या स्थानिक जोखमीच्या घटनांमुळे बाधित स्वतंत्र शेतांचे नुकसान / नुकसान.
पुढीलपैकी कोणत्याही कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण लागू होणार
नाही.
• युद्ध आणि नातेवाईकांचा धोका
• आण्विक धोका
• दंगा
• द्वेषयुक्त नुकसान
• द्वेषाची चोरी किंवा कृत्य
घरगुती आणि / किंवा वन्य प्राणी चरणे आणि इतर प्रतिबंधित जोखीम कव्हरेजमधून
वगळल्या जातील. पीक नुकसानीचा अंदाज त्वरित काढण्यासाठी रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान,
स्मार्टफोन किंवा ड्रोन वापरण्याची योजना या योजनेद्वारे प्रस्तावित आहे.
Self-Instructional
Material 176
पीएमएफबीवायची वैशिष्ट्ये कोणती आहेत? भारतीय
प्रधानमंत्री फसल बीमा योजना (पीएमएफबीवाय) ची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेतः अर्थव्यवस्थेचा...
इतर तपशीलः
Self-Instructional
पंतप्रधान कौशल्य विकास योजनेतील अभ्यासक्रमाची यादी
Material 180 • अपंगत्व अभ्यासक्रम असलेल्या व्यक्तीसाठी कौशल्य परिषद
भारतीय
• आतिथ्य आणि पर्यटन कोर्स अर्थव्यवस्थेचा...
• टेक्सटाईल कोर्स
• टेलिकॉम कोर्स NOTES
• सुरक्षा सेवा कोर्स
• रबर कोर्स
• रिटेल कोर्स
• ऊर्जा उद्योग अभ्यासक्रम
• प्लंबिंग कोर्स
• खनन अभ्यासक्रम
• करमणूक व माध्यम कोर्स
• लॉजिस्टिक कोर्स
• जीवन विज्ञान कोर्स
• आयटी कोर्स
• लोह आणि स्टीलचा कोर्स
• जमीन व्यवस्थापन प्रणाली
• आरोग्य सेवा कोर्स
• ग्रीन जॉब्स कोर्स
• जेम्स आणि ज्वेलरी कोर्स
• फर्निचर आणि फिटिंग कोर्स
• फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री कोर्स
• इलेक्ट्रॉनिक्स कोर्स
• बांधकाम अभ्यासक्रम
• वस्तू आणि भांडवल अभ्यासक्रम
• विमा, बँकिंग आणि वित्त अभ्यासक्रम
• सौंदर्य आणि निरोगीपणा
• ऑटोमोटिव्ह कोर्स
• गारमेंट कोर्स
• कृषी अभ्यासक्रम
प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना २०२० पात्रता
• या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
• ही योजना केवळ त्यांच्यासाठी आहे जे बेरोजगार आहेत आणि ज्यांना उत्पन्नाचा
स्रोत नाही.
• महाविद्यालय / शाळा सोडणे - अर्जदारास हिंदी व इंग्रजी भाषांचे मूलभूत ज्ञान
असणे आवश्यक आहे.
• दहावी किंवा बारावीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण सोडले आहे त्यांना
एकत्रित केले जाईल आणि त्यांना एकाच ठिकाणी कौशल्य दिले जाईल.
पंतप्रधान कौशल्य विकास योजना २०२० साठीची कागदपत्रे Self-Instructional
• अर्जदाराचे आधार कार्ड Material 181
भारतीय
अर्थव्यवस्थेचा... • ओळखपत्र
• मतदार ओळखपत्र
NOTES • बँक खाते पासबुक
• मोबाइल नंबर
• पासपोर्ट आकाराचा फोटो
जन शिक्षण संस्थान
पूर्वी श्रमिक विद्यापीठ म्हणून ओळखले जाणारे जन शिक्षण संस्थान (जेएसएस) ही
योजना मार्च १९६७ पासून देशात स्वयंसेवी संस्थांच्या नेटवर्कमार्फत राबविली जात आहे.
प्रथम श्रमिक विद्यापीठ मुंबई [वरळी] येथे स्थापन करण्यात आले आणि बॉम्बे सिटी
सोशल कौन्सिल एज्युकेशन कमिटीने ही संस्था चालू केली. ही संस्था प्रौढ शिक्षण क्षेत्रात
गुंतलेली एक स्वयंसेवी संस्था आहे. या प्रकल्पाच्या यशानंतर भारत सरकारने टप्प्याटप्प्याने
देशात अशा संस्थांचे जाळे उभारण्यासाठी एक योजना विकसित केली.
वर्षानुवर्षेच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थेत परिवर्तनामुळे या बहु-शैक्षणिक
संस्थांची भूमिका आणि व्याप्ती अनेक पटींनी वाढली आहे. बदललेल्या परिस्थितीत श्रमिक
विद्यापीठ (एसव्हीपी) चे लक्ष शहरी भागातील औद्योगिक कामगारांकडून नॉन-साक्षर,
नवशिक्षित, अकुशल आणि बेरोजगार तरुणांकडे विशेषत: एससी / एसटी / ओबीसी /
अल्पसंख्याक / दिव्यांग / महिलांकडे गेल.े विशेषतः ग्रामीण भागातील वंचितांना देश
त्यानुसार एसव्हीपींचे नामकरण २००० साली जन शिक्षण संस्थान (जेएसएस) असे केले
गेल.े
जन शिक्षण संस्थानची योजना परिणामी जुलै २०१८ मध्ये मानव संसाधन विकास
मंत्रालयाकडून (एमएचआरडी) कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाकडे
(एमएसडीई) हस्तांतरित केली गेली.
उद्दिष्टे :
• अपंग / नवशिक्षित आणि शैक्षणिक प्राथमिक शिक्षण घेतलेल्या ८ वीपर्यंतच्या
विद्यार्थ्यांमधील व्यावसायिक कौशल्य आणि तांत्रिक ज्ञानात सुधारणा करणे उत्पादक
क्षमता वाढविणे आणि त्यांच्या रोजगाराच्या संधींमध्ये वाढ करणे.
• कौशल्य / अपस्किलिंगद्वारे जिल्ह्यातील पारंपरिक कौशल्ये ओळखणे आणि
प्रोत्साहन देण.े .
• कौशल्य विकासासाठी दाखल केलेल्या इतर विभाग / एजन्सीशी सहयोग आणि
समन्वय साधणे.
• सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रणालींचे ज्ञान आणि समजून घेण्याची श्रेणी
विस्तृत करणे आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे
• राष्ट्रीय मूल्यांचा प्रचार करणे आणि राष्ट्रीय कार्यक्रमांसह संरेखित करणे.
• स्वयंरोजगारास चालना देणे आणि क्रेडिट गट व कन्सोर्टियम सदस्यतेच्या साह्याने
Self-Instructional कर्जासहित आर्थिक साहाय्य मिळवून देण.े
Material 182
सद्य:स्थिती भारतीय
अर्थव्यवस्थेचा...
सध्या २७ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशातील २८८ जन शिक्षण संस्था आहेत,
त्यांपैकी १७ जेएसएस कार्यरत नाहीत. नवीन ८३ जन शिक्षण संस्था स्थापन करण्याचा NOTES
निर्णय घेतला गेला आहे.
ई-कार्यालय
माहिती व दळणवळण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कार्यालयांना आधुनिक
करण्याची गरज भारत सरकारने मान्य केली आहे. ई-कार्यालय मिशन मोड प्रकल्प
प्रशासकीय सुधारणा व लोक तक्रार विभागाने सरकारी कृती आणि सेवा वितरण प्रक्रियेत
कार्यक्षमता सुधारण्यासाठी हाती घेतला आहे.
या योजनेचे लक्ष्य कार्य प्रवाह आणि नियम आधारित फाइलचे मार्गक्रमन सुलभ
करणे, फायली आणि कार्यालयीन आदेशाची द्रुत शोध आणि पुनर्प्राप्ती, प्रमाणीकरणासाठी
डिजिटल स्वाक्षरी, फॉर्म आणि अहवाल देणारे घटक वाढविणे हे आहे.
आयकर:
ही योजना सर्वसमावेशक सेवा स्थापन करण्यासाठी भारतीय आयकर विभागामार्फत
राबविण्यात आली आहे ज्यायोगे नागरिकांना त्याची आयकर संबंधित सर्व कामे कोणत्याही
वेळी, आयकर विभागाकडे करता येतील. कंपन्यांनी दरवर्षी आयकर विवरण परतावा सादर
करणे बंधनकारक आहे.
२ बेरोजगारी म्हणजे अशी परिस्थिती ज्यामध्ये काम करण्यास सक्षम आणि काम
करण्यास इच्छुक असलेल्या कामगारांना रोजगार मिळत नाही.
६.३ सारांश :
भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था असूनही ती विकसित देशांच्या
अर्थव्यवस्थेशी स्पर्धा करताना दिसून येत.े भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या
क्रमांकाची अर्थव्यवस्था असूनसुद्धा दारिद्र्य, बेरोजगारी, सामाजिक आणि आर्थिक विषमता
या गंभीर समस्या आहेत. तसेच असंघटित क्षेत्रांत काम करणाऱ्या कामगारांची संख्या ही
९१ टक्केपर्यंत आहे. या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सामाजिक सुरक्षा
योजनांचा लाभ होत नाही. बऱ्याचदा सरकारी योजनांचा लाभ या असंघटित क्षेत्रांतील
कामगारांना मिळत नाही यामुळे त्यांच्या दारिद्र्यात वाढ होते वा आर्थिक विषमता वाढते.
दारिद्र्य, आर्थिक विषमता कमी व्हावी तसेच रोजगार वाढावा यासाठी भारत सरकार
विविध योजना राबवत असते.
दीर्घ प्रश्न:
१. भारतातील दारिद्र्याची कारणे सांगा.
२. बेरोजगारीचे प्रकार सांगा.
३. भारतातील सामाजिक असमानतेचे विशिष्ट प्रकार सांगा.
४. भारतातील असंघटित क्षेत्राचे वैशिष्ट्य सांगा.
५. भारतातील आर्थिक विषमतेची कारणे सांगा.
Self-Instructional
Material 188