You are on page 1of 101

सेवा क्षेत्र पर्यावरण

सेवा क्षेत्र पर्यावरण


प्रकरण ४ सेवा क्षेत्र पर्यावरण
NOTES
४.० प्रस्तावना
४.१. भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राची भूमिका आणि वाढ
४.२. भारतीय सेवा क्षेत्रासमोरील आव्हाने
४.२.१ व्यवसायाधिष्ठीत आणि ज्ञानाधिष्ठीत क्षेत्र
४.२.२ शिक्षण क्षेत्र
४.२.३ आरोग्य क्षेत्र
४.२.४. विमा
४.२.५ पर्यटन
४.२.६. बँकिंग
४.३. भारतीय सेवा क्षेत्रातील अलीकडील ट्रेंड
४.३.१ डिजिटल अर्थव्यवस्था
४.३.२. ई-कॉमर्स
४.३.३. ई-फायनान्स
४.४ सारांश
४.५ महत्त्वाचे शब्द
४.६ सरावासाठी प्रश्न
४.७ संदर्भ

४.० प्रस्तावना
अर्थव्यवस्थेतील जे क्षेत्र सेवा देण्याच्या संबंधित कार्यामध्ये असते त्याला सेवा क्षेत्र
म्हणतात. सेवा क्षेत्रामध्ये प्रामुख्याने परिवहन, कुरियर, दूरसंचार, रिअल इस्टेट, हॉटेल,
रेस्टॉरंट, आरोग्य, कला आणि मनोरंजन, विमा, वित्तीय सेवा, पर्यटन इत्यादींचा समावेश
होतो. भारताच्या आर्थिक विकासामध्ये सेवा क्षेत्रातील साधारणत: ५५ टक्के योगदान आहे.
अर्थव्यवस्थेचे तिसरे क्षेत्र म्हणूनसुद्धा सेवा क्षेत्राला ओळखले जाते. देशाच्या आर्थिक
विकासामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा हा प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्रापेक्षा जास्त असेल, तर
त्या अर्थव्यवस्थेची गणना विकसित अर्थव्यवस्थेमध्ये केली जाते. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये
सेवा क्षेत्राचे योगदान फार मोठे आहे. १९९१ च्या उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या
धोरणानंतर भारतीय सेवा क्षेत्राने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

उद्दिष्टे
या प्रकरणाच्या अभ्यासानंतर आपणास
• भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राचे महत्त्व स्पष्ट करता येईल.
• भारतीय सेवा क्षेत्रापुढील आव्हाने सांगता येतील.
• भारतीय सेवा क्षेत्रातील अलीकडील प्रवाह सांगता येतील. Self-Instructional
• डिजिटल इकॉनॉमी, ई-कॉमर्स आणि फायनान्स या संकल्पना स्पष्ट करता येतील. Material 89
सेवा क्षेत्र पर्यावरण
४.१. भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राची भूमिका
NOTES भारतातील सेवा क्षेत्राची वाढ ही आर्थिक वाढीच्या पारंपरिक मॉडेल्सना मागे टाकून
पुढे जाण्याचे, झेप घेण्याचे एक अनोखे/अद्वितीय उदाहरण आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ५०
वर्षांच्या अल्पावधीत, सेवा क्षेत्राने देशातील जीडीपीमध्ये (Gross Domestic Product;
स्थूल देशांतर्गत उत्पादन ) सिंहाचा वाटा उचलला आहे. भारतातील जीडीपीमध्ये या क्षेत्राचे
योगदान ६०% पेक्षा जास्त आहे. तथापि, अद्याप या क्षेत्रात उपलब्ध श्रमिक शक्तीपैकी
केवळ २५%कामगारांनाच नियुक्त केले जाते/काम मिळते/रोजगार मिळतो. परिणामी
आपला बहुसंख्य नोकरदार वर्ग शेती (जिथे मंदी आहे) आणि उत्पादन क्षेत्र (ज्याचा अजून
पूर्ण क्षमतेने विकास झालेला नाही) यांवरच रोजगारासाठी अवलंबून आहे. हे भारतातील
भविष्यकालीन आर्थिक विकासासाठी मोठे आव्हान आहे. ते पेलण्यासाठी भारतातील सेवा
उद्योगाच्या क्षमतेचा त्वरित उपयोग करण्यास चालना देणारा नवीन, चौकटीबाहेरचा विचार
करण्याची आवश्यकता आहे. ‘इन्व्हेस्ट इंडिया’ भारतीय अर्थव्यवस्थेमधील सेवा क्षेत्रातील
योगदानाचा, त्याच्या यशाचा आढावा घेते आणि भविष्यात न्याय्य/समान आर्थिक वाढ
घडवू शकतील अशा घटकांवर संशोधन करते.

(i) निव्वळ राष्ट्रीय उत्पादनामध्ये वाटा


सद्य:स्थितीत घटक परिव्ययानुसार/किमतीनुसार (राष्ट्रीय उत्पादन) देशाच्या निव्वळ
उत्पादनात सेवा क्षेत्राचा सर्वाधिक/अधिकतम वाटा आहे. २०००-२००१ नुसार सेवा क्षेत्राचा
राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा ४८.५% आहे आणि याखेरीज, एकूण कार्यरत लोकसंख्येपैकी
२२.९% लोक या क्षेत्रात कार्यरत आहेत.

(ii) औद्योगिकीकरणास मदत करते


उद्योगांचा विकास देशातील वाहतूक, दळणवळण, वीज, बँकिंग इत्यादींच्या कामगिरीवर
आणि सुधारणांवर अवलंबून आहे. कच्चा माल, तयार वस्तू तसेच मजुरांची आवश्यक
ठिकाणी ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था मदत करते. दळणवळणाच्या/संपर्काच्या
साधनांमुळे औद्योगिक वस्तूं(च्या) बाजारपेठेचा विस्तार होण्यास मदत होते. वीज आणि
बँकिंग सेवा दुर्गम भागातील उद्योगांना भरभराट करण्यास मदत करतात.

(iii) शेतीचा विस्तार करते


सेवा क्षेत्र चांगल्या संपर्क (नेटवर्क) सुविधा देऊन कृषी उत्पादन विकसित करण्यास
मदत करते. तसेच कच्चा माल आणि तयार वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी
नेण्यासही मदत करते.

(iv) प्रादेशिक असंतुलन दूर करते


सेवा क्षेत्र सुव्यवस्थित परिवहन आणि संपर्क सेवा पुरवते. देशातील मागासलेल्या
प्रदेशात शिक्षण आणि वैद्यकीय सोयींचा विस्तार करते तसेच पुरेशी बँकिंग सेवादेखील
प्रदान करते. अशा रीतीने सेवा क्षेत्र देशातील प्रादेशिक असंतुलन आणि विषमतेची समस्या
Self-Instructional दूर करण्यास मदत करते.
Material 90
सेवा क्षेत्र पर्यावरण
(v) बाजारपेठेची वाढ
सेवा क्षेत्र कृषी आणि औद्योगिक या दोन्ही क्षेत्रांना विविध प्रकारच्या सेवा पुरवते.
तस्मात अन्य प्रकारे हे क्षेत्र कृषीजन्य आणि औद्योगिक उत्पादनांसाठी (तयार माल तसेच NOTES
कच्चा माल किंवा निम -तयार वस्तू) योग्य बाजारपेठ वाढवण्यास साह्यभूत ठरते.

(vi) उच्च दर्जाचे जीवनमान


वाहतूक आणि दळणवळण, बँकिंग आणि विमा, शिक्षण आणि आरोग्य इत्यादी
क्षेत्रांतील चांगल्या सेवांमुळे जीवनमानाची गुणवत्ता किंवा देशातील राहणीमान वाढते व
देशाला आर्थिक विकासाचा मार्ग तयार करण्यासाठी साह्यभूत होते. तसेच सेवा क्षेत्र देशाच्या
मानव विकास निर्देशांकाचे (Human Development Index, एचडीआय) मूल्य
सुधारण्यासदेखील मदत करते.

(vii) उत्पादकता वाढ


हे क्षेत्र कामगार वर्गाला पुरेसे तांत्रिक शिक्षण आणि योग्य वैद्यकीय सुविधा देऊन मदत
करते. शिवाय, वाहतूक आणि संपर्क/संप्रेषण प्रणालीचे सुव्यवस्थित नेटवर्क कामगारांमधील
गतिशीलता आणि माहिती वाढवते. या सर्व गोष्टींमुळे मजूर अधिक कुशल आणि कार्यक्षम
झाल्यामुळे त्याच वेळी उत्पादकता (मजुरांची उत्पादन क्षमता) वाढू शकते.

(viii) आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ


आंतरराष्ट्रीय व्यापार वाढविण्यासाठी उत्तम प्रकारे विकसित सेवा क्षेत्राची, विशेषत:
वाहतूक, दळणवळण, बँकिंग इत्यादींची मदत होते. त्यामुळे हे देशातील परकीय चलनाचा
साठा वाढविण्यातही सहाय्यकारी होते.

भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राची वाढ


विकासाचे अर्थशास्त्र असे सूचित करते, की विकासाच्या टप्प्यांमध्ये जीडीपीमधील
सेवा क्षेत्राचा वाटा वाढतो आणि प्राथमिक क्षेत्राचा वाटा घटतो. सेवा या जागतिक आर्थिक
वाढीचे नेतृत्व करतात, त्यामुळे त्यांना विकासाचे इंजिन तसेच आर्थिक वाढीसाठी आवश्यक
सहभागी घटक असे मानले जाते.
रोजगार निर्मितीची क्षमता आणि राष्ट्रीय उत्पन्नामधील योगदान या दोन्ही बाबींमध्ये सेवा
क्षेत्र हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मोठा भाग आहे. या सेक्टरमध्ये माहिती व संप्रेषण
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अत्यंत आधुनिक कार्यांपासून ते अनौपचारिक/अप्रमाणित क्षेत्रातील
कामगारांकडून (उदाहरणार्थ, भाजी विक्रेते, फेरीवाले, रिक्षा चालक इत्यादी) दिल्या गेलेल्या
साध्या सेवांपर्यंतच्या विविध कामांचा समावेश आहे. सुमारे ४५ लाख कोटी रुपयांपेक्षा
अधिक जीडीपीपैकी निम्म्याहून अधिक जीडीपी सेवा क्षेत्रातून मिळतो. सेवा क्षेत्र ज्याला
तृतीयक क्षेत्रदेखील म्हटले जाते, त्याचा वार्षिक वाढीचा दर १० टक्के आहे. हे क्षेत्र एक
चतुर्थांशापेक्षा जास्त श्रमिकांना रोजगार पुरवित आहे. या क्षेत्राचा परकीय थेट गुंतवणुकीत
(एफडीआय) मोठ्या प्रमाणावर आणि एकूण निर्यातीत एक तृतीयांश वाटा आहे.
सेवा क्षेत्रात व्यापार, पर्यटन, दळणवळण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि
माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा (आयटीएस), समुदाय आणि वैयक्तिक सेवा, आर्थिक सेवा, Self-Instructional
करमणूक उद्योग इत्यादी सेवांचा समावेश आहे. या सेवांचे स्वरूप असे आहे, की त्यामुळे Material 91
सेवा क्षेत्र पर्यावरण
इतर क्षेत्रांची (उदा. उद्योग आणि शेती) वाढ होते. सेवांमध्ये व्यापार हा भारताच्या
जीडीपीमधील एक महत्त्वाचा विभाग आहे. २००९-२०१० या वर्षात व्यापारातील (घाऊक
NOTES आणि किरकोळ तसेच संघटित आणि असंघटित क्षेत्रातील मिळून) जीडीपी ९.१ टक्क्यांनी
वाढला. उत्पन्नातील वाढ आणि ग्राहकसंख्येतील वाढ यामुळे किरकोळ व्यवसायालाही
चालना मिळाली. तथापि, इतर क्षेत्रांतील उच्च वृद्धीमुळे गेल्या चार वर्षांत एकूण जीडीपीतील
व्यापाराचा हिस्सा जवळपास १५ टक्क्यांवर स्थिर राहिला.
पर्यटन हे भारतासह जगाच्या बऱ्याच भागांत आर्थिक वाढीचे प्रमुख इंजिन आहे. संयुक्त
राष्ट्रांच्या पर्यटन संघटनेनुसार (यूएन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन), पर्यटन क्षेत्र जगातील
एकूण रोजगारांपैकी ६ ते ७ टक्के रोजगार थेट आणि लाखो रोजगार अप्रत्यक्षपणे उपलब्ध
करून देत.े पर्यटन देशाच्या परकीय चलन उत्पन्नातदेखील महत्त्वाची भूमिका बजावते.
२००४ ते २००९ या सहा वर्षांच्या कालावधीत परदेशी पर्यटकांच्या संख्येत आणि
पर्यटनामधून मिळणाऱ्या परकीय चलनात अनुक्रमे ८.१ टक्के आणि १४.५ टक्के वाढ
झाली. वैद्यकीय पर्यटन, ग्रामीण पर्यटन हे पर्यटनाच्या वाढीस कारणीभूत ठरणारे काही
नवीन प्रवाह आहेत.
हॉटेल आणि रेस्टॉरंट्स क्षेत्र हा पर्यटन क्षेत्राचा एक महत्त्वाचा उपघटक आहे. चांगल्या
प्रतीच्या आणि परवडणाऱ्या हॉटेल खोल्यांची उपलब्धता देशातील पर्यटनाच्या वाढीस
चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. सध्या देशात ९५८०७ खोल्यांची क्षमता
असणारी १५९३ वर्गीकृत हॉटेल्स आहेत. हॉटेल्स क्षेत्रात राहण्याचे विविध प्रकार असतात.
यात स्टार श्रेणी हॉटेल, हेरिटेज प्रकारची हॉटेल, टाइमशेअर रिसॉर्टस अपार्टमेंट हॉटेल,
गेस्ट हाऊस आणि बेड आणि ब्रेकफास्ट आस्थापनांचा समावेश आहे. २००४-२००९ या
कालावधीत हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये ८.५ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.
दूरसंचार क्षेत्रातही लक्षणीय वाढ झाली आहे. सन १९९९मध्ये टेलिफोन ग्राहकांची
संख्या २२.८ दशलक्ष होती. त्यात वाढ होऊन ही संख्या २००३ मध्ये ५४.६ दशलक्ष झाली
आणि त्याही पुढे जाऊन २०१० मध्ये नोव्हेंबर-अखेरीस ती ७६४.७७ दशलक्ष झाली.
बिनतारी जोडणीचाही /वायरलेस कनेक्शनचाही या वाढीत मोठा वाटा आहे कारण मार्च
२००१ ते नोव्हेंबर २०१०च्या अखेरीपर्यंतच्या काळात बिनतारी जोडणीची /वायरलेस
कनेक्शनची संख्या ३.५७ दशलक्षावरून ७२९.५८ दशलक्षापर्यंत वाढली आहे. टेलि-
डेन्सिटी, जी २.३२ टक्के होती, ती नोव्हेंबर २०१० मध्ये वाढून ६४.३४ टक्के झाली आहे.
तथापि, ग्रामीण टेलि-डेन्सिटी (नोव्हेंबर २०१०मध्ये ३०.१८ टक्के) आणि शहरी टेली-
डेन्सिटी (नोव्हेंबर २०१० मध्ये१४३.९५ टक्के) यांच्यामध्ये मोठी तफावत आहे. यावरून
असे दिसते, की या क्षेत्रात खूप मोठी अनुपयोजित/अद्याप वापरात न आणलेली पणनक्षमता
आहे. ब्रॉडबँडला बऱ्याचदा जलदगती आंतरजाल/हायस्पीड इंटरनेट असे संबोधले जाते
कारण त्यात सामान्यत: विदा संप्रेषणाचा /डेटा ट्रान्समिशनचा दर जास्त असतो. ब्रॉडबँडची
ग्राहकसंख्या २००५ ते नोव्हेंबर २०१० अखेर ०.१८ दशलक्षांवरून १०.७१ दशलक्षांपर्यंत
वाढली आहे.
माहिती तंत्रज्ञान आणि त्यावर आधारित (IT and ITES आयटी आणि आयटीएएस)
सेवांमध्ये भारताला ज्ञान अर्थव्यवस्था म्हणून ब्रँड आयडेंटिटी / खास ओळख मिळाली
आहे. आयटी-आयटीएएस उद्योगात चार प्रमुख घटक आहेतः माहिती तंत्रज्ञान सेवा,
Self-Instructional व्यवसाय प्रक्रिया आउटसोर्सिंग (बीपीओ), अभियांत्रिकी सेवा तसेच संशोधन व विकास
Material 92 (आर अँड डी) आणि सॉफ्टवेअर उत्पादने. भारतात सेवा क्षेत्रातील वाढीच्या नेतृत्वाची धुरा
सेवा क्षेत्र पर्यावरण
आयटी-आयटीएस क्षेत्राकडे आहे. जीडीपी, रोजगार आणि निर्यात यांमधली वाढ टिकवून
धरल्यामुळे हे क्षेत्र वृद्धीचे इंजिन आहे, असे म्हणता येईल. या क्षेत्राने भारताच्या जीडीपीमध्ये
आपले योगदान २००४-२००५ मधील ४.१ टक्क्यांवरून २००९-२०१० मध्ये ६.१ टक्के NOTES
आणि २०१०-११ मध्ये अंदाजे ६.४ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. या उद्योगाने उच्च स्तरीय
शिक्षणात लक्षणीय वाढ घडवण्यातदेखील मदत केली आहे. या उद्योगात २००९-२०१०
मधील मध्यम वाढीच्या (६.२ टक्के) तुलनेत २०१०-२०११ मध्ये अदमासे १९.५ टक्क्यांची
वेगवान/उत्तम वाढ झाली आहे. तसेच २००४ ते २००९ च्या दरम्यान, आयटी आणि
आयटीएएसच्या निर्यातीत तब्बल २२.२ टक्के वाढ झाली.
वर उद्धृत केलेल्या/ विशद केलेल्या सेवांव्यतिरिक्त, अन्य अनेक सेवांमध्ये भरघोस/
प्रचंड वाढीची संभावना आहे. यात कायदेशीर सेवा, सल्ला देण,े रिअल इस्टेट सर्व्हिसेस,
सामुदायिक आणि वैयक्तिक सेवा, सामाजिक सेवा, संशोधन आणि विकास, लेखापरीक्षा/
हिशेबतपासणी आणि खाते सेवा इत्यादी सेवा येतात. सेवा क्षेत्रातील कार्यांचे वैविध्य पाहता
त्याच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी काळजीपूर्वक आखलेल्या आणि नावीन्यपूर्ण/
आगळ्यावेगळ्या धोरणांची आवश्यकता आहे.
सेवा क्षेत्र रोजगारप्रवण/ मोठ्या प्रमाणात नोकऱ्या देणारे क्षेत्र म्हणून गणले जात नाही.
तरी भारतात अजूनही सेवा क्षेत्राला प्राथमिक क्षेत्र सोडून या तृतीयक क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या
कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आहे असे म्हणता येईल कारण काम करणाऱ्या लोकसंख्येच्या ५५
टक्क्यांहून अधिक कर्मचारी प्राथमिक क्षेत्रात काम करत आहेत. या विसंगतीचे मुख्य कारण
म्हणजे देशातील कुशल कामगारांची कमतरता होय. ही विसंगती दूर करण्यासाठी उपलब्ध
असलेला एकमेव मार्ग म्हणजे प्रशिक्षणाद्वारे कर्मचारीवर्गातील कौशल्य वाढविणे. जसे
जीडीपीमध्ये वाढ घडवून आणण्यात सेवा क्षेत्र यशस्वी झाले तसेच ते रोजगार उपलब्ध
करून देण्यात यशस्वी झाले, तर देशातील विषमता बऱ्याच प्रमाणात कमी करता येईल.
उदारीकरणानंतरच्या काळात भारताने निःसंशयपणे सेवाक्षेत्राच्या पुढाकाराने/
नेतृत्वाखाली झालेल्या (आर्थिक) वाढीचा अनुभव घेतला आहे; परंतु अशी वाढ टिकवणेही
तितकेच महत्त्वाचे आहे आणि शाश्वत वाढीसाठी भारताने विशेषत्वाने आपल्या पायाभूत
सुविधा आणि मानवरूपी पुंजीत/भांडवलात सुधारणा केली पाहिजे. परिवहन, दळणवळण,
पर्यटन इत्यादी सेवांच्या वाढीसाठी पायाभूत सुविधांचा विकास महत्त्वाचा आहे, तर आयटी
आणि आयटीएएस, संप्रेषण, बीपीओ, लेखा सेवा, कायदेशीर सेवा, वित्तीय सेवा इत्यादी
सेवांसाठी कुशल कर्मचाऱ्यांची भरती आवश्यक आहे. भारताने यापूर्वीच सेवा क्षेत्रात आपले
खास स्थान निर्माण केले आहे. आता भारताने सेवा क्षेत्राचा साधन म्हणून उपयोग करून
दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, उत्पन्न आणि प्रादेशिक समानता इत्यादी उद्दिष्टे साध्य
करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

४.२. भारतीय सेवा क्षेत्रासमोरील आव्हाने व्यवसाय


अधिष्ठित क्षेत्र
बऱ्याचदा व्यवसायांचे उद्योगानुसार किंवा क्षेत्रानुसार वर्गीकरण केले जाते. उद्योग हा Self-Instructional
अनेक व्यवसायांचा एक समूह असतो. यांच्यामध्ये कामाचा सामाईक दुवा असतो. Material 93
सेवा क्षेत्र पर्यावरण
उदारणार्थ कार तयार करणे किंवा किराणा सामान विक्री. छोटे उद्योग मोठ्या उद्योग
क्षेत्रामध्ये म्हणजे सर्वसामान्य उत्पादन क्षेत्रामध्ये आणले जाऊ शकतात. वैयक्तिक व्यवसाय
NOTES हा त्याच्या कामाच्या स्वरूपावरून विशिष्ट उद्योगाशी संबंधित म्हणून वर्गीकृत केला जाऊ
शकतो. उदाहरणार्थ कार उत्पादन व्यवसायाची एक लहान वित्तीय सेवाही असू शकते जी
ग्राहकांना नवीन कार विकत घेण्यासाठी वित्तपुरवठा करत असते; परंतु ही वित्तीय सेवा
केवळ पूर्ण व्यवसायाच्या फक्त दहा टक्के असेल आणि कार उत्पादन ८० टक्के असेल,
तर या व्यवसायाचे आर्थिक सेवा उद्योगात वर्गीकरण करताना कार उत्पादन उद्योगात
वर्गीकरण केले जाईल.

अर्थशास्त्रज्ञ अर्थव्यवस्थेचे सर्वसाधारणपणे तीन क्षेत्रांमध्ये वर्गीकरण करतात.


प्राथमिक क्षेत्र,
द्वितीय क्षेत्र आणि
तृतीयक क्षेत्र.

प्राथमिक क्षेत्रात कृषी, पशुपालन, मासेमारी, खाणकाम या क्षेत्रांचा प्रामुख्याने


समावेश होतो. प्राथमिक क्षेत्र हे कच्च्या मालाचा पुरवठा करते. शेतीपूरक व्यवसायांचा जसे
पशूपालन, दूध व्यवसाय, कुक्कुटपालन, मधमाशीपालन इत्यादींचाही समावेश प्राथमिक
क्षेत्रात केला जातो. माणसाच्या उत्क्रांतीतही तो सर्वप्रथम निसर्गावर अवलंबून होता. त्यामुळे
त्या वेळची अर्थव्यवस्था शेती, पशुपालन, मासेमारी, खाणकाम अशा निसर्गाकडून उपलब्ध
होणाऱ्या गोष्टींवर अवलंबून होती म्हणून, या क्षेत्राला प्राथमिक क्षेत्र असे म्हणतात.
प्राथमिक क्षेत्राला काही वेळा कुरुक्षेत्रही म्हणतात. अविकसित देशांमध्ये प्राथमिक क्षेत्राचा
त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठा वाटा असतो, तर विकसित देशांमध्ये प्राथमिक क्षेत्राचा
वाटा हा अत्यल्प किंवा नगण्य असतो.

द्वितीय क्षेत्र
द्वितीय क्षेत्रात उत्पादन, प्रक्रिया व बांधकाम यांचा समावेश असतो. मनुष्यप्राण्याने
निसर्गनिर्मित गोष्टींवर प्रक्रिया करून नवनव्या वस्तूंचे उत्पादन व निर्माण सुरू केले म्हणून
हे द्वितीय क्षेत्र झाले. प्राथमिक क्षेत्रातील कच्च्या मालाचा वापर करून उच्च मूल्य असणाऱ्या
अंतिम वस्तूंची निर्मिती दुय्यम क्षेत्रामध्ये केली जाते. उदाहरणार्थ खाणीतील लोखंडाचा
वापर यंत्र निर्मितीसाठी होतो.

तृतीय क्षेत्र
अर्थव्यवस्थेतील तिसरे क्षेत्र म्हणजे सेवाक्षेत्र. तृतीयक क्षेत्रात अर्थव्यवस्थेतील सर्व
प्रकारच्या अदृश्य स्वरूपातील सेवांचा समावेश होत असल्याने त्यास सेवा क्षेत्र असे
संबोधले जाते. सेवा क्षेत्रातील उद्योगांना ‘ज्ञान अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करावे लागते.
सेवांची निर्मिती व पुरवठा हे या क्षेत्राचे प्रमुख वैशिष्ट्य असून ग्राहकांना सामान्य दर्जाच्या
सेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश असतो. सेवा क्षेत्रात प्रामुख्याने व्यापार, वाहतूक,
दळणवळण, वित्तपुरवठा व व्यावसायिक स्वरूपाच्या अदृश्य सेवांचा समावेश होतो.
Self-Instructional ग्राहकांची गरज ओळखून तिची जलद व कमीतकमी किंमतीला पूर्तता करणे हे सेवा क्षेत्राचे
Material 94 वैशिष्ट्य आहे. ‘बँकिंग’ या सेवा क्षेत्रातील महत्त्वाच्या घटकाकडे पाहिल्यास माहिती व
सेवा क्षेत्र पर्यावरण
संचार तंत्रज्ञानाचा वापर करून किमान मनुष्यबळाच्या साहाय्याने किमान खर्चात उत्तम व
चोवीस तास उत्कृष्ट सेवा देण्यात झालेले बदल सहज समोर येतात.
उत्पादकता, उपयुक्तता, क्षमता, टिकाऊपणा आणि संभाव्यता यांत सुधारणा करण्यासाठी NOTES
माणसाने आपल्या ज्ञानाचा व वेळेचा उपयोग करून केलेल्या सर्व बाबी सेवा क्षेत्रात येतात.
अशा अदृश्य सेवांत वस्तूत सुधारणा करणे, सल्ला देण,े मदत, अनुभव, चर्चा, तज्ज्ञता
यांचा समावेश होतो. सद्य:स्थितीत सेवा क्षेत्राची व्याप्ती वाढत असून त्याची काही उदाहरणे
पुढीलप्रमाणे: शिक्षण, दूरसंचार, पर्यटन, वित्तपुरवठा, माध्यमे, आदरातिथ्य, कायदेविषयक
सेवा, अन्नप्रक्रिया उद्योग, सल्ला सेवा, गुंतवणूक, किरकोळ विक्री सुविधा इत्यादी.

ज्ञानाधिष्ठित क्षेत्र
ज्ञानाधिष्ठित क्षेत्र हे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेचे एक चतुर्थ क्षेत्र
म्हणून ओळखले जाते. हे ज्ञानावर आधारित आहे आणि त्यात विशिष्ट संशोधन आणि
विकास (संशोधन आणि विकास) समाविष्ट आहे.
ज्ञानाधिष्ठित क्षेत्र विस्तृत संकल्पना दर्शविते, ज्यात ज्ञान आणि माहितीवर आधारित सर्व
सेवांचा समावेश आहे, म्हणजेच आरोग्य, शिक्षण, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान इत्यादी.
चतुर्थ क्षेत्र हे उच्च शिक्षणावर आधारित आहे आणि त्यासाठी अत्यधिक कुशल कामगार
आवश्यक आहेत. ज्ञानाधिष्ठित क्षेत्र विशेषत: प्रगत देशांमध्ये वाढत आहे आणि इतर
क्षेत्रांमध्ये, विशेषत: उद्योग आणि सेवांमध्येही नावीन्य आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका
बजावतात.
ज्ञानाधिष्ठित क्षेत्र नवीन बाजारपेठ विकसित करते, नवीन उद्योग तयार करते, नावीन्यपूर्ण
सेवा, उत्पादने किंवा कामाच्या पद्धती तयार करते म्हणूनच ज्ञानाधिष्ठित क्षेत्र देशाच्या
अर्थव्यवस्थेसाठी आणि समाजाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे.

व्याख्या
अर्थव्यवस्थेचे क्षेत्र जे ज्ञानाधिष्ठित क्रियांवर आधारित असते आणि भौतिक साधनांपेक्षा
बौद्धिक भांडवलावर अधिक अवलंबून असते अशा क्षेत्राला ज्ञानाधिष्ठित क्षेत्र असे म्हणतात.
ज्ञानाधिष्ठित क्षेत्रामध्ये प्रामुख्याने हायटेक मॅन्युफॅक्चरिंग जसे संगणक, इलेक्ट्रॉनिक्स,
एरोस्पेस; सेवा क्षेत्रातील उद्योग जसे शिक्षण, आरोग्य सेवा, सॉफ्टवेअर डिझाईन, विमा,
माहिती आणि संप्रेषण यांसारख्या सेवा यांचा समावेश होतो.
पारंपरिक क्षेत्रामध्ये आर्थिक घडामोडींमध्ये उत्पादनांचे मुख्य घटक जमीन, कामगार,
भांडवल, उद्योजक हे असतात, तर ज्ञानाधिष्ठित क्षेत्रामध्ये लाईनवर कामगारांनी वस्तूचे
उत्पादन करण्यापासून ते कामाच्या पद्धतीमध्ये लवचिकता आणणे, तसेच उत्पादन निर्मिती
आणि विपणनाच्या प्रक्रियेमध्ये नवीन व्यावसायिक कल्पनांचा समावेश करणे यांचा अंतर्भाव
असतो.

ज्ञानाचे प्रकार
अप्रच्छन्न ज्ञान - तथ्ये, आकडेवारी, डेटा.
ध्वनित ज्ञान - गोष्टी कशा कार्य करतात, अनुभव, निर्णय, अंतर्ज्ञान, लोकांशी
वागण्याचा मार्ग. Self-Instructional
Material 95
सेवा क्षेत्र पर्यावरण
शैक्षणिक पात्रता ही एखाद्याचे अप्रच्छन्न ज्ञान दर्शवते आणि काही प्रमाणामध्ये ध्वनित
ज्ञान दर्शवते; परंतु ज्ञानाधिष्ठित क्षेत्रामध्ये ज्ञान हे स्वतः अनुभव घेऊन काम करून
NOTES मिळवले जाते जे पारंपरिक शिक्षण पद्धतीच्या पलीकडील असते.
नावीन्य आणि ज्ञान हे अर्थव्यवस्थेसाठी नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. काही अर्थशास्त्री
असे म्हणतात, की गेल्या काही दशकांमध्ये आधुनिक अर्थव्यवस्था ही अधिक ज्ञानाधिष्ठित
अर्थव्यवस्था बनत चालली आहे. तंत्रज्ञानाच्या उद्योगांची वाढ, सेवा क्षेत्राची वाढ, स्वयं
रोजगारात वाढ, आणि बौद्धिक संपदा म्हणजेच पेटंटच्या संख्येमध्ये वाढ दर्शवतात.

ज्ञानाधिष्ठित क्षेत्राची वैशिष्ट्ये


• ज्ञान आणि माहिती उत्पादकतेचे प्रमुख वाहक असतात. उच्च तंत्रज्ञान गुंतवणूक
आणि उद्योगांची वाढ.
• शिक्षण, संप्रेषण आणि माहिती यांसारख्या ज्ञान केंद्रित सेवांमध्ये वाढ.
• ज्ञान हे एक अमर्यादित संसाधन आहे. भांडवल वापरून संपून जाऊ शकते; परंतु
ज्ञान नाही. ज्ञान हे न गमावता वाटले जाऊ शकते. ज्ञान वाटल्यामुळे किंवा
सामायिकरण केल्यामुळे एकूण ज्ञान वाढविण्यात मदत होते.
• उच्च कुशल कामगार / विद्यापीठ पदवी मागणी वाढ.
• इनोव्हेशन उत्पादक आणि वापरणाऱ्यांना चालना देत.े उदाहरणार्थ मुक्त स्रोत
प्लॅटफॉर्म / ग्राहक फीडबॅक.
• एका उद्योगापासून दुसऱ्या उद्योगात ज्ञान पसरते.
• ज्ञानाधिष्ठित क्षेत्र हे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेशी निगडित असते आणि ज्ञानाचा
जागतिक प्रसार करते.
• ज्ञानाधिष्ठित क्षेत्र आणि हाय-टेक इंडस्ट्री उत्पादन प्रक्रियांच्या वाढीव
स्वयंचलनासाठी बढावा देते ज्यामुळे कामगार बाजारात वेगवान बदल घडतात.

ज्ञानाधिष्ठित क्षेत्राचे महत्त्व


• व्यवसायास अधिक कार्यक्षम, गतिमान आणि नावीन्यपूर्ण होण्यास मदत करू
शकते.
• उत्पादनात नवीनता आणि सानुकूलिता आणणे शक्य होते.
• बौद्धिक भांडवल महत्त्वाची भूमिका बजावते. उद्योगांना अर्थव्यवस्थेच्या नवीन
पद्धतीशी जुळवून घेत कामगारांना आकर्षित करणे आणि टिकवून ठेवणे आवश्यक
बनते.
• ज्ञानाचा प्रसार करणे आणि नवीन कार्य पद्धतींचा लाभ मिळविण्यासाठी सहयोगी
नेटवर्कना मदत करू शकतात.
• नवीन वाढीचे सिद्धांत मानवी भांडवलाची क्षमता आणि वाढत्या ज्ञानावर आधारित
आर्थिक वाढीचे नवीन स्रोत आणि उत्पादकता उच्च स्तरावर प्रदान करण्यावर भर
देतात.

Self-Instructional
Material 96
सेवा क्षेत्र पर्यावरण
ज्ञानाधिष्ठित क्षेत्राच्या समस्या
• ज्ञानाधिष्ठित क्षेत्रामुळे उच्च कुशल आणि कमी कुशल कामगारांमधील वेतन
असमानता वाढत आहे. जरी या वेतन असमानतेची इतर कारणे असली तरी NOTES
ज्ञानाधिष्ठित क्षेत्र हे एक कारण असू शकते.
• ज्ञानाधिष्ठित क्षेत्र हे ‘गिग अर्थव्यवस्था’ वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. गिग
अर्थव्यवस्था ही एक मुक्त बाजारपेठ असून त्यात कंत्राटी रोजगार हे सर्वसामान्य
असतात. यामुळे उच्च बौद्धिक क्षमता असणाऱ्यांना अधिक संधी निर्माण होतात;
परंतु कमी कौशल्य असणाऱ्या कामगारांना तात्पुरते आणि कमी पगाराचे काम
मिळू लागते.

शिक्षण क्षेत्र
शिक्षण क्षेत्रातील मुख्य समस्या व आव्हानांचा विचार पुढील उपशीर्षकांतर्गत केला
गेला आहे –
१. शिक्षणावर होणारा खर्च
२. शैक्षणिक प्रवेशाचा/ नाव नोंदणीचा एकूण आकृतिबंध
३. क्षमतांचा वापर
४. पायाभूत सुविधा
५. पी.पी.पी. मॉडेल (PPP.model)
६. विद्यार्थी-शिक्षक प्रमाण
७. मान्यता व ब्रँडिंग – दर्जासाठीची मानके
८. परदेशात शिक्षण घेणारे विद्यार्थी

पुढील परिच्छेदांत वरील गोष्टींचे थोडक्यात वर्णन दिले आहे.

१. शिक्षणावरील खर्च
शिक्षणावर, विशेषत: उच्च शिक्षणावर केलेल्या खर्चाबाबत सांगायचे, तर सरकारने सन
२०१०-२०११ या वर्षात सुमारे १५,४४० कोटी रुपये खर्च केल.े ही रक्कम या वर्षाच्या
सुधारित अंदाजपत्रकाच्या अंदाजे ८५ टक्के इतकी आहे. नुकत्याच झालेल्या एनएसएसओच्या
६६ व्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे, की सन १९९९ ते २००९ या दरम्यान
शिक्षणावर केलेला खर्च देशातील ग्रामीण भागात ३७८ टक्क्यांनी आणि शहरी भागात ३४५
टक्क्यांनी वाढला आहे. सर्वेक्षणात असे दिसून आले आहे, की मुलांच्या शिक्षणावरील
खर्चात ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी ६३ टक्के आणि शहरी कुटुंबांसाठी ७३ टक्के इतकी
तीव्र वाढ दिसून येत.े तथापि, जर आपण शिक्षणावर होणारा खर्च जीडीपीच्या टक्केवारीच्या
तुलनेत मोजला, तर भारत काही विकसित/विकसनशील देशांपेक्षा मागे पडला आहे.

२. शैक्षणिक प्रवेशाचा/ नाव नोंदणीचा एकूण आकृतिबंध


सध्या भारतात व्यवसाय व्यवस्थापनासह उच्च शिक्षणातील विविध शाखांत १.८६
कोटी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे/नाव नोंदवले आहे/ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. Self-Instructional
इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी विविध प्रवाहात शिकत असूनही, उत्पादनाच्या क्षेत्रात Material 97
सेवा क्षेत्र पर्यावरण
कोणतेही मोठे/महत्त्वाचे बदल दिसून आलेले नाहीत. याचे कारण असे की (आत्मसात
केलेली) कौशल्ये आणि गुणवत्ता आर्थिक उपक्रमांसाठी निरुपयोगी आहे आणि म्हणूनच
NOTES या शिक्षित व्यक्तींच्या नोकरी मिळवण्याच्या व ती टिकवण्याच्या क्षमतेबद्दल गंभीर चिंता
निर्माण झाली आहे. २०१० मध्ये भारतातील उच्च शिक्षणासाठी एकूण नावनोंदणी गुणोत्तर/
प्रमाण (जीईआर) १२ टक्के होते; पण देशात वेगवेगळ्या राज्यांत नोंदणी पातळी निरनिराळी
असते. आपण हेदेखील समजून घेणे आवश्यक आहे, की आपली नोंदणी पातळी इतर
देशांपेक्षा खूप खाली आहे. उदाहरणार्थ, एका अहवालानुसार, जीईआर चीनमध्ये २३
टक्के, ब्राझीलमध्ये ३४ टक्के, ब्रिटनमध्ये ५७ टक्के, ऑस्ट्रेलिया व रशिया या देशांमध्ये
७७ टक्के आणि अमेरिकेमध्ये ८३ टक्के आहे. या संदर्भात, २०२० पर्यंत विद्यार्थ्यांची
संख्या वाढवून ३० टक्क्यांपर्यंतच्या जीईआरपर्यंत पोहोचवणे हे सरकारी अधिकाऱ्यांसाठी
एक मोठे आव्हान आहे. अर्थात जेआरई स्कूल ऑफ मॅनेजमेंटसारख्या नवीन संस्थांची
सुरुवात भारतातील जीईआर जलद वाढविण्याच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी उत्प्रेरकाची
भूमिका बजावू शकते यात काही शंका नाही. एक सकारात्मक पाऊल म्हणून अकराव्या
पंचवार्षिक योजनेच्या उर्वरित कालावधीसाठी सरकारने शैक्षणिक संस्थांची स्थापना किंवा
विद्यमान शैक्षणिक संस्थांचा विस्तार, आठ विद्यापीठांची स्थापना,१लाख विद्यार्थ्यांची नावे
नोंदविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयांचा विस्तार तसेच राष्ट्रीय सरासरीपेक्षा
कमी जीईआर असणाऱ्या प्रदेशात आदर्श महाविद्यालये स्थापित करण्याच्या योजनांसाठी
राज्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

३. क्षमतेचा वापर
भारतीय शिक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी ज्याकडे लक्ष दिले पाहिजे असे आणखी
एक आव्हान म्हणजे क्षमता वापर सुधारणे. उदाहरणार्थ, उच्च शिक्षणासाठी भारतातील
क्षमतेच्या वापरावर नुकत्याच झालेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे, की एमबीएच्या
बाबतीत क्षमता वापर महाराष्ट्रात ५७ टक्के आणि हरियाणामध्ये ७२ टक्के आहे. काही
विशिष्ट राज्यांच्या बाबतीत शैक्षणिक संस्थांमध्ये जागा अनेक रिक्त/ न भरलेल्या राहतात.
एकीकडे आपल्याला आपला जीईआर सुधारण्याची आवश्यकता आहे, तर दुसरीकडे उच्च
शिक्षण देण्यासाठी तयार केलेल्या संस्था / महाविद्यालये / शाळा तयार केलेल्या क्षमतेचा
पूर्णपणे वापर करत असल्याची खातरजमाही करणे जरुरीचे आहे.

४. पायाभूत सुविधा
नवीन संस्था/महाविद्यालयांमध्ये (खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील दोन्ही) क्षमतेचा पूर्ण
वापर न होण्याचे /रिक्त जागांचे प्रमाण अधिक असण्याचे एक कारण म्हणजे संस्था
चालविण्यासाठी आवश्यक भौतिक पायाभूत सुविधा पुरवण्यातली त्यांची असमर्थता.
चांगल्या दर्जाच्या संस्थांची श्रेणी/ गुणानुक्रम ठरवण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत
सुविधांमध्ये जागा(रिअल इस्टेट),अत्याधुनिक वर्ग खोल्या, ग्रंथालय, वसतिगृह,े फर्निचर,
क्रीडा सुविधा, वाहतूक, व्यावसायिक इमारती इत्यादींचा समावेश आहे. दर्जेदार भौतिक
पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी राजकीय हेतूने प्रेरित नसलेल्या खाजगी क्षेत्राचा सहभाग
महाविद्यालयांच्या स्थापनेत आपण निश्चित करायला हवा.
Self-Instructional
Material 98
सेवा क्षेत्र पर्यावरण
५. पीपीपी मॉडेल
सरकार जीईआर, गुणवत्ता, गुंतवणूक, पायाभूत सुविधा इत्यादी अनेक मापदंडांनुसार
शिक्षणपद्धती सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे; परंतु शिक्षणात प्रचंड गुंतवणूक NOTES
करून मोठे फेरबदल घडवून आणण्यामध्ये आपण शासनाला असणाऱ्या मर्यादा
ओळखण्याची गरज आहे. मला खात्रीने वाटते, की भारतातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी
खासगी क्षेत्राने विशिष्ट भूमिका बजावण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात, शिक्षणातील
सार्वजनिक - खाजगी भागीदारीच्या (पब्लिक प्रायवेट पार्टनरशिप / पीपीपी) मॉडेलची
शक्यता पडताळणे उपयुक्त ठरेल. यामुळे महागड्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून
देण्याकरता सरकारवर पडणारा बोजा कमी होईल आणि इतकेच नव्हे तर अत्याधुनिक
इमारती, प्रयोगशाळा, ग्रंथालये, वसतिगृहे इत्यादींची निर्मितीदेखील होऊ शकेल. याशिवाय
विद्यापीठे / महाविद्यालये आणि कॉर्पोरेट कंपन्या यांच्या सहकार्याने संशोधन आणि
विकासाचे संयुक्त प्रकल्प उभे राहू शकतील. विद्यार्थ्यांना सुट्टीच्या कालावधीत इंटर्नशिप
किंवा कॉर्पोरेट प्रशिक्षणातून औद्योगिक कार्यप्रणालीची ओळख होईल तसेच इंटर्नशिप/
प्रशिक्षण इत्यादींसाठी कॉर्पोरेट्सद्वारे प्रमाणपत्रेही मिळतील. यातून संस्थांच्या ब्रँडिंगमध्ये व
प्रतिमा तयार होण्यात मदत होईल. तसेच विद्यार्थ्यांची नोकरीसाठीची सिद्धता व पात्रता
वाढवता येईल.

६. विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर/प्रमाण
भारतीय शिक्षण प्रणाली सुधारण्याचे आणखी एक आव्हान म्हणजे विद्यार्थी शिक्षकांचे
गुणोत्तर/प्रमाण सुधारणे. जगातल्या तुलना करण्याजोग्या काही देशांपेक्षा भारतात हे प्रमाण
खूप जास्त आहे. उदाहरणार्थ विकसित देशांमध्ये हे प्रमाण ११.४ आहे, तर भारताच्या
बाबतीत ते २२.० इतके आहे. सीआयएस (१०.९), वेस्टर्न एशिया (१५.३) आणि लॅटिन
अमेरिका (१६.६) मध्येही हे बरेच कमी आहे. यामुळे (कमी गुणोत्तरामुळ)े दर्जेदार शिक्षक
भरती करण्याची आवश्यकता निर्माण होते आणि वर्ग हाताळण्यासाठी शिक्षकांना आवश्यक
मदत मिळते. मला असेही वाटते, की विकसित देशांप्रमाणेच ज्यात विद्यार्थ्यांना अर्धवेळ
अध्यापनाची नेमणूक दिली जाते, तशी आपणही खालच्या स्तराचे वर्ग हाताळण्यासाठी
तांत्रिक/उच्च शिक्षणात देऊ शकू का ही शक्यता पडताळून पाहायला हवे. अशा नेमणुकांमुळे
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च अंशतः भागविण्यास मदत होईल अशीही अपेक्षा आहे.

७. मान्यता व ब्रँडिंग – गुणवत्तेची मानके


आपल्या मोठ्या लोकसंख्येची कौशल्ये आणि नैसर्गिक क्षमता सुधारण्यासाठी आपल्या
शिक्षण प्रणालीचा दर्जा आणि मानके वाढवण्याची आवश्यकता आहे. जागतिकीकरणामुळे
जगात बऱ्याच संधी उपलब्ध असूनही आपले बरेच व्यावसायिक (अभियंते / डॉक्टर /
व्यवस्थापन व्यावसायिक) बेरोजगार आहेत हे सर्वज्ञात आहे. याला कारणीभूत असलेला
एक मुख्य घटक म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव. यामुळे अर्हताप्राप्त; परंतु नोकरीस
अयोग्य असा गट तयार होतो. आपल्याला विद्यापीठे / महाविद्यालये यांचे क्षमतामापन
आणि मानांकन (रेटिंग आणि रँकिंग) करण्यासाठी यंत्रणा उभारणे / सक्रिय करणे आवश्यक
आहे. सध्या भारतात संस्था / महाविद्यालयांना मान्यता मिळवण्याची सक्ती नाही. अधिकृत
मान्यता देण्याच्या प्रस्तावावर सरकारने आधीच चर्चा सुरू केली आहे. आपण विद्यापीठे, Self-Instructional
महाविद्यालये / शाळा यांना मान्यता देणे आवश्यक आहे. फायनान्शियल टाईम्सने नुकत्याच Material 99
सेवा क्षेत्र पर्यावरण जागतिक स्तरावर केलेल्या बिझिनेस स्कूल्सच्या २०११ या वर्षासाठी असलेल्या मानांकनात
पहिल्या पंधरामध्ये भारतातील प्रसिद्ध बिझिनेस स्कूल्सपैकी फक्त दोनच संस्थांचा अकराव्या
व तेराव्या क्रमांकावर सामावेश आहे. सर्वोच्च मानांकन मिळवणाऱ्या बहुतेक संस्था
NOTES अमेरिकेच्या होत्या. या क्रमवारीत चीनदेखील भारतापेक्षा पुढे होता. त्याच अहवालात असे
दिसले, की या दोन शाळांच्या शुल्काच्या मोबदल्यात मिळणाऱ्या शिक्षणाच्या मूल्यासंदर्भात
विचार करता/ शुल्काच्या मानाने तिथे मिळणाऱ्या शिक्षणाचे मूल्य तुलनेने अमेरिकेच्या
काही सर्वोत्तम शाळांच्या इतके उच्च नाही. तथापि, एक सकारात्मक बाब म्हणजे या उच्च
दर्जाच्या भारतीय शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक जागतिक दर्जाचे, डॉक्टरेट मिळवलेले
आणि विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचविणारे आहेत. क्वाक्वारेली सिमंड्सच्या २०१०
सालच्या विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीत, जगातील २०० नामांकित विद्यापीठांच्या यादीत
फक्त एक भारतीय शैक्षणिक संस्था समाविष्ट आहे, तर ५३ संस्था अमेरिकन आहेत,
वेबमेट्रिक्सच्या २०११ च्या मानांकनानुसार तर कोणतेही भारतीय विद्यापीठ आढळत नाही;
पण याच यादीमध्ये ९९ अमेरिकन विद्यापीठे समाविष्ट आहेत. ही मानांकने प्रामुख्याने असे
दर्शवतात, की आपल्याला जागतिक मानके असलेली उत्कृष्टता केंद्रे (सेंटर्स ऑफ
एक्सलन्स) विकसित करण्याची आवश्यकता आहे. अलीकडच्या काळात उच्च शिक्षणाचे
मापदंड विकसित करण्यामध्ये खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग पाहता दर्जासंदर्भात जागतिक
कसोट्यांवर उतरणाऱ्या/ जागतिक मानांकनाच्या मापदंडांवर क्षमता सिद्ध करणाऱ्या अधिक
संस्था ज्या भागात कमी जीईआर आहे तिथे निर्माण/स्थापन करण्याची आपल्याला
आवश्यकता आहे. मला असे समजले आहे, की जेआरई स्कूल ऑफ मॅनेजमेंटची स्थापना
एशिया-पॅसिफिकमधील सर्वात मोठ्या खाजगी शैक्षणिक गटाच्या सहकार्याने केली गेली
आहे आणि म्हणूनच जागतिक स्तरावरील दर्जेदार शिक्षणासाठी प्रयत्न करणे हे या संस्थेचे
मुख्य उद्दिष्ट असेल.

८. परदेशात शिक्षण घेणारे विद्यार्थी


सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, भारतात उच्च शिक्षण संस्था सर्वाधिक आहेत. असे
असूनही आम्हाला असे दिसले, की परदेशात उच्च शिक्षण घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांची
संख्या वाढत आहे. विकिपीडियाच्या अहवालानुसार २००६ साली, १.२ लाख विद्यार्थ्यांनी
परदेशात उच्च शिक्षण घेण्याचा पर्याय निवडला, त्यांपैकी सुमारे ७६,००० विद्यार्थ्यांनी
अमेरिकेला गंतव्यस्थान म्हणून पसंती दिली. अमेरिकेनंतर पसंतीक्रमात यू.के., कॅनडा
आणि ऑस्ट्रेलिया हे देश होते. तथापि, २०१०-११ मध्ये, अंदाजे १.०३ लाख विद्यार्थ्यांनी
अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला होता. ऑस्ट्रेलियातही प्रवेश घेणाऱ्यांची संख्याही
वाढत आहे. (ऑस्ट्रेलियात) २००४ ते २००९ या कालावधीत वेगवेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये
प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३०,००० वरून ९०,००० पर्यंत वाढली. त्याचप्रमाणे,
उच्च शिक्षणासाठी पसंतीक्रमात दुसऱ्या क्रमांकाचे गंतव्यस्थान असलेल्या यूकेत शिक्षण
घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १९९९ ते २००९ च्या दरम्यान दुपटीने वाढली. २००९ मध्ये
सुमारे १९,२०५ विद्यार्थी यूकेमध्ये शिकत होते. वित्तीय संस्थांकडून कर्ज काढून परदेशात
शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना अनेक घटक प्रोत्साहित करतात. यात
पुढील घटक अंतर्भूत असतात: अ) शिक्षणाची गुणवत्ता, (ब) समृद्धीत वाढ आणि आकांक्षा
आणि (क) सामाजिक प्रतिष्ठा तसेच मिळणारे एक्सपोजर आणि अनुभव. विद्यार्थ्यांचा हा
Self-Instructional कल बदलण्यासाठी आपल्याला (भारतात) शैक्षणिक संस्थांची रचना करताना या त्रुटींचा
Material 100 विचार करावा लागेल.
आरोग्य सेवा क्षेत्र पर्यावरण

लोकसंख्या
लोकसंख्येनुसार भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताची लोकसंख्या १९८५ NOTES
मध्ये ७६० दशलक्ष होती. २०१५ मध्ये ती अंदाजे १.३ अब्ज झाली.

पायाभूत सुविधा
वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी विद्यमान पायाभूत सुविधा पुरेशा नाहीत.
सार्वजनिक आरोग्य सेवा संस्थांमध्ये निधीची कमतरता आहे तसेच कर्मचारी कमी आहेत.
डॉक्टर- रुग्ण गुणोत्तर प्रमाण १:१७०० असून निराशाजनक आहे. रुग्णालयाच्या बेड आणि
परिचारिकांच्या संख्येमध्ये भारताची चीन आणि अमेरिकेशी तुलनाच होऊ शकत नाही.
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांवर (सीएचसी) तज्ज्ञांची संख्या ८१ टक्क्यांनी कमी आहे
(फक्त १९ टक्के).

ग्रामीण-शहरी असमानता
ग्रामीण भागातील लोकसंख्या ७०% आहे; परंतु तेथे मिळणाऱ्या आरोग्य सेवांचे प्रमाण
केवळ ३०% आहे. ग्रामीण भागातील मागणी-पुरवठ्यातील प्रचंड तफावत यावरून दिसून
येत.े भारतात शहरी भागात खाजगी क्षेत्राचे अधिक केंद्रीकरण आहे, तर प्राथमिक आरोग्य
केंद्रात (पीएचसीमध्ये) ३००० पेक्षा अधिक संख्येने डॉक्टरांची कमतरता आहे. बहुसंख्य
आरोग्य सेवा शहरी भागात केंद्रित आहेत.

कमी सरकारी खर्च


सार्वजनिक आरोग्यावरील खर्च एकूण आरोग्यावरील खर्चापैकी केवळ १.२% आहे.
हा खर्च जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शिफारस केलेल्या ५% खर्चाच्या
तुलनेत कमालीचा कमी आहे.

मोठ्या प्रमाणात करावा लागणारा वैयक्तिक खर्च


खिवैयक्तिक खर्च म्हणजे रूग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांना करावा लागणारा खर्च.
भारतामध्ये आरोग्य सेवेवर होणारा वैयक्तिक खर्च खर्च 62 टक्क्यांपर्यंत आहे. हा
अमेरिकेतील %13.4, यूकेमध्ये 10 टक्के आणि चीनमध्ये %54 इतका आहे. म्हणजे
अमेरिकेत ८६. ६ टक्के , युके मध्ये ९० टक्के आणि चीन मध्ये ४६ टक्के खर्च हे सरकार
करते. या देशांच्या तुलनेत भारतात आरोग्यावरील वैयक्तिक खर्च खूप जास्त आहे.

रोगांचा दुहेरी बोजा


मातामृत्यू, बालमृत्यू, संसर्गजन्य रोगांच्या समस्या अजूनही अस्तित्वात/भेडसावत
असतानाच उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या जीवनशैलीमुळे ओढवणाऱ्या आजारांमध्ये
वाढ होत आहे. या परिस्थितीस आजाराचे दुहेरी ओझे म्हटले गेले आहे. २०१५ मध्ये
होणाऱ्या मृत्यूंपैकी अर्धे मृत्यू जीवनशैलीच्या आजारांमुळे झाले.

क्षेत्रातील गैरप्रकार Self-Instructional


दुय्यम दर्जाच्या आणि बनावट औषधांची विक्री, अनावश्यक रुग्णालयात दाखल करणे Material 101
सेवा क्षेत्र पर्यावरण
आणि शोषण.
होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी अशा पर्यायी आरोग्यसेवांकडे पुरेसे लक्ष दिले गेलेले
NOTES नाही.

विमा
विमा म्हणजे काय?
भविष्यात होणाऱ्या संभाव्य नुकसानापासून स्वत:ला वाचवण्यासाठी एखाद्या घटकाला
एकरकमी रक्कम देणे म्हणजे विमा होय. अशाप्रकारे, जेव्हा काही दुर्दैवीपणाचे प्रकरण येते
तेव्हा विमा उतरवणारा आपणास त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करतो.

व्याख्या
जस्टीस लॉरेन्स यांच्या मते, विमा हा एक असा करार आहे, की ज्याद्वारे एक पक्ष
(विमा कंपनी) दुसऱ्या पक्षाने (विमेदार) दिलेल्या योग्य मोबदल्याच्या बदल्यात दुसऱ्या
पक्षास करारात नमूद केल्याप्रमाणे संभाव्य धोक्यापासून नुकसान पोहोचल्यास त्याची भरपाई
करण्याचे आश्वासन देतो.
डब्ल्यू. ए. डिन्स डेल
विमा ही एक योजना असून तिच्याद्वारे विमेदार संभाव्य धोक्यापासून होणाऱ्या
नुकसानीची विशिष्ट प्रमाणात भरपाई करण्याची जबाबदारी योग्य मोबदल्यात विमा
कंपनीवर सोपवतात.
कार्यात्मक व्याख्या
विमा हे हानीचे वाटप करण्याचे साधन आहे. यामध्ये काही लोकांची झालेली हानी
अनेक लोकांमध्ये वाटली जाते.

विम्याचे प्रकार

१. जीवन विमा, जीवन संरक्षण हे विमी म्हणजे विम्याचे पारंपरिक प्रकार आहेत, जे
आपणास आणि आपल्या प्रियजनांना अचानक आपत्ती किंवा आपत्तीपासून वाचवण्यासाठी
डिझाइन केलेले आहेत. प्रारंभी हे कुटुंबांच्या उत्पन्नाचे रक्षण करण्यासाठी डिझाइन केले
होते; परंतु त्यानंतर, ते केवळ संरक्षण उपाय म्हणून विकसित केले गेले आहेत आणि संपत्ती
जतन करण्याच्या पर्यायासाठी आहेत. कर नियोजन, एखाद्या व्यक्तीवर अवलंबून असणारी
संख्या, चालू बचत,आर्थिक लक्ष्ये इ.

२. बिगर जीवन विमा किंवा सामान्य विमा : जीवनाशिवाय कोणत्याही प्रकारचे


कव्हरेज या श्रेणीमध्ये येतात. विम्याचे बरेच प्रकार आहेत जे आपल्या गरजेनुसार आपल्या
जीवनातील प्रत्येक पैलू व्यापतात.

आरोग्य विमा : हे आपल्या आयुष्यात उद्भवू शकणारे वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया


Self-Instructional खर्च समाविष्ट करतात. सामान्यत: आरोग्य विमा सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये कॅशलेस सुविधा
Material 102 उपलब्ध आहेत.
सेवा क्षेत्र पर्यावरण
मोटर विमा: हे विविध परिस्थितींविरुद्ध वाहन(दुचाकी किंवा चारचाकी) संबंधित हानी
आणि दायित्वे कव्हर करतात. हे वाहनांच्या नुकसानाविरुद्ध संरक्षण आणि वाहनाच्या
मालकाविरुद्ध कायद्याने नमूद केलेल्या कोणत्याही तृतीय पक्षाच्या उत्तरदायित्वासाठी NOTES
संरक्षण देतात.

प्रवास विमा: हे आपणास आपत्कालीन परिस्थितीपासून किंवा तुमच्या प्रवासादरम्यान


झालेल्या नुकसानापासून वाचवतात. हे आपणास वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, चोरी
किंवा सामान गमावण्यापासून वाचवतात.

गृह विमा: हे पॉलिसीच्या व्याप्तीवर अवलंबून घर आणि / किंवा आतील सामग्री


व्यापतात. हे घर नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींपासून सुरक्षित करतात.

सागरी विमा: हे वाहतुकीदरम्यान होणारे संभाव्य नुकसान किंवा नुकसानीपासून


सामान, कार्गो इत्यादीला कव्हर करतात. व्यावसायिक विमा हे बांधकाम, ऑटोमोटिव्ह,
अन्न, ऊर्जा, तंत्रज्ञान इत्यादी उद्योगातील सर्व क्षेत्रांसाठी समाधानाची ऑफर देतात. जोखीम
संरक्षणाच्या गरजा व्यक्तींमध्ये वेगवेगळ्या असू शकतात; परंतु विमा पॉलिसीची मूलभूत
कामे कमी-अधिक प्रमाणात समान असतात.
भारताच्या विमा उद्योगात ५७ विमा कंपन्या आहेत. २४ कंपन्या जीवन विमा व्यवसायात
आहेत, तर ३३ बिगर जीवन-विमा कंपन्या आहेत. जीवन विमाधारकांपैकी लाइफ इन्शुरन्स
कॉर्पोरेशन(एलआयसी)ही सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव कंपनी आहे. बिगर जीवन विमा
विभागात सार्वजनिक क्षेत्रातील सहा विमा कंपन्या आहेत. या व्यतिरिक्त, जनरल इन्शुरन्स
कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (जीआयसीआय) ही एकमेव राष्ट्रीय विमा कंपनी आहे. भारतीय
विमा बाजाराच्या इतर भागधारकांमध्ये एजंट्स (वैयक्तिक आणि कॉर्पोरेट), दलाल, सर्व्हेअर
आणि आरोग्य विमा दाव्यांची सेवा देणारे तृतीय-पक्ष प्रशासक यांचा समावेश आहे.
विमा उद्योगाच्या सार्वजनिक मक्तेदारीतून स्पर्धात्मक वातावरणामध्ये झालेल्या
संक्रमणामुळे आता या क्षेत्रातील नवीन विमा कंपन्या आणि ग्राहक दोघांसाठीही लक्षवेधक
आव्हाने निर्माण झाली आहेत.
संघटनेच्या यशाचे मापदंड केवळ परताव्याच्या दरावरच नव्हे तर कॉर्पोरेट कारभाराच्या
गुणवत्तेवरही ठरवले जातात. कॉर्पोरेट कारभाराच्या चांगल्या पद्धतींचे पालन कंपन्या तसेच
नियामकांनी केले पाहिजे. विमा क्षेत्रात आयुर्विमा/एलआयसीने प्रशंसनीय काम केले असले
तरीही, या क्षेत्रातून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी नावीन्यपूर्ण उत्पादने आणि वितरणाचे
नवीन स्रोत / मार्ग निर्माण करण्यास अद्याप बराच वाव आहे.
सध्या उत्पादन व बाजार यांच्यातील संबंधांत विमा-प्रतिनिधी /एजंट्सद्वारे व्यक्तिगत
स्वरूपात होणाऱ्या विक्रीचे वर्चस्व आहे. याच कारणाने विमा प्रतिनिधींना/एजंट्सना
लोकसंख्येच्या आवश्यकतेचे मूल्यांकन करण्यासाठी गुंतागुंत समजून घेता यायला हवी.
त्यानंतरच त्यांनी लोकांच्या गरजांनुरूप योग्य पॉलिसीबाबत /घेण्याबाबत सल्ला द्यावा.
तसेच कंपन्यांना ग्राहक संबंध व्यवस्थापनाचे रूपांतर मूल्याधारित सेवार्थी/ग्राहक संबंधात
करावे लागेल. ग्राहक संबंध व्यवस्थापनाच्या अथवा सीआरएम (कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट)
आव्हानात तीन उप-आव्हानांचे पिरॅमिड असेल. ही उप-आव्हाने म्हणजेच उत्पादने विकसित Self-Instructional
करणे, किंमत ठरवण्याची यंत्रणा आणि तंत्रज्ञान व्यवस्थापन. विमा व्यवसाय सरासरी आणि Material 103
सेवा क्षेत्र पर्यावरण
जोखमीच्या प्रसारावर आधारित आहे. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास आणि रस टिकवून
ठेवण्यासाठी किंमतीची रचना लवचिक ठेवणे हे भारतीय विमासुरक्षा प्रदान करणारांसाठी/
NOTES विमा कंपन्यांसाठी एक आव्हानात्मक काम असेल.
आज बहुतेक विमा कंपन्या करप्रणालीस जोडलेल्या आहेत, म्हणजेच विमा कंपन्या
ग्राहक समूहाच्या ग्राहकांना अनुकूल असलेल्या उत्पादनाची किंमत ठरवू शकत नाहीत.
ग्राहकांना सेवा देण्याचा मार्ग म्हणजे बाजाराचे विभाजन करणे आणि बाजाराच्या त्या त्या
भागासाठी योग्य उत्पादन योग्य किंमत आकारून देण/े देऊ करणे. भारतात (विमा बाजारात)
अद्याप वापरात न आणलेली मोठी क्षमता आहे, ती वापरण्याचे लक्ष्य ठेवणे आवश्यक
आहे. वितरण व्यवस्था ही शहरी, अर्ध-शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांपर्यंत
पोहोचण्याचे एक माध्यम आहे. त्यामुळे विमा कंपनीने किंमती, वितरण, जोखीम व्यवस्थापन
आणि गुंतवणुकीचे निर्णय यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

विमा क्षेत्रापुढील आव्हाने


विम्याची कमी घनता :
भारतामध्ये आजही मोठ्या प्रमाणावर लोक विम्याचा वापर करत नाहीत. खास करून
गरीब जनता ही विम्याच्या संरक्षणापासून वंचित असते. विम्याची कमी घनता ही एक मोठी
समस्या आहे

ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष आणि शहरी भागावर लक्ष केंद्रित:


आजही विम्याचे वितरण करताना विमा कंपन्या प्रामुख्याने शहरी भागावर लक्ष केंद्रित
करतात. त्यामुळे ग्रामीण भागाकडे त्यांचे दुर्लक्ष होते. उदारीकरणानंतरसुद्धा ग्रामीण भागात
विम्याचे वितरण ही एक प्रमुख समस्या आहे.

विमा उत्पादनांमध्ये कुटुंबांकडून कमी गुंतवणूक:


भारतामध्ये सर्वसाधारणपणे भारतीय कुटुंबे ७७% गुंतवणूक स्थावर मालमत्तांमध्ये
करत असते. ११% सोन्यामध्ये, ७ टक्के वस्तूंमध्ये आणि ५ टक्के आर्थिक मालमत्ता जसे
ठेवी, बचत खाती, शेअर्स, म्युच्युअल फंड, जीवन विमा, सेवानिवृत्त खाती यामध्ये करत
असतात. भारतीय कुटुंबांकडून विमा उत्पादनांमध्ये नगण्य किंवा काहीच गुंतवणूक केली
जात नाही. बऱ्याच वेळा विम्याकडे संरक्षण म्हणून न पाहता गुंतवणुकीचे साधन म्हणून
पाहिले जाते.

अपुरी विमा उत्पादने:


विम्याची घनता वाढवण्यासाठी विमा नसलेल्या ग्रामीण भागात आणि शहरी भागातील
गरीब लोकांना विमा कवचाखाली आणले जाणे आवश्यक आहे; परंतु अपुऱ्या विमा
उत्पादनांमुळे हे शक्य होत नाही. बऱ्याचदा लोकांना आवश्यक असणाऱ्या विमा पॉलिसी
विकल्या जातात.

Self-Instructional भांडवलाचा अभाव:


Material 104 मूलतः विमा ही एक अति उच्च भांडवल वापरणारी आर्थिक सेवा आहे. वाढत्या विमा
सेवा क्षेत्र पर्यावरण
कंपन्यांना अधिकच्या भांडवलाची आवश्यकता भासते. भारतातील अनेक विमा कंपन्यांना
भांडवलाची समस्या भेडसावत आहे. काही कंपन्या तर भांडवलाच्या अटीची पूर्तता
करण्यासाठी संघर्ष करत आहेत. NOTES

अनिष्ट स्पर्धा:
खाजगी कंपन्यांना विमा व्यवसायाची परवानगी दिल्यामुळे विमा व्यवसायामध्ये अनिष्ट
स्पर्धा निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणावर कसर ठेवून व्यवसाय करण्याकडे अनेक
खाजगी कंपन्यांचा कल असल्यामुळे व्यवसायातील स्थैर्य कमी होऊन व्यवसायात अनेक
प्रकार निर्माण झाले आहेत.

उच्चस्तरीय व्यवस्थापनाचा अभाव:


सरकारी मालकीच्या विमा कंपन्यांमध्ये अनेक उच्चशिक्षित आणि कौशल्ये प्राप्त
अधिकारी कार्यरत आहेत. या अधिकाऱ्यांना वेतनाची हमी आणि विविध सोयी शासनाद्वारे
पुरवण्यात येतात. खाजगी क्षेत्रात मात्र कार्यक्षमतेला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे
उच्चशिक्षित आणि कुशल व्यवस्थापक एका खाजगी कंपनीत कधीच टिकून राहत नाहीत.
त्यामुळे खाजगी कंपन्यांमध्ये सातत्याने उच्चस्तरीय व्यवस्थापनाचा अभाव जाणवत राहतो.

अकुशल मनुष्यबळ:
विमा एजंट बनण्यासाठी भारतामध्ये चलनविषयक जुजबी ज्ञान पुरेसे आहे. त्यामुळे
विमा व्यवसायाची संबंधित विशेष प्रशिक्षणावर भर दिला जात नाही. यामुळे प्रशिक्षित
मनुष्यबळाचा अभाव यामुळे विमा व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे.

पर्यटन:
आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या आगमनात (आयटीए) भारताचा वाटा अत्यल्प म्हणजे
केवळ १.१ टक्के असून भारत २४ व्या क्रमांकावर आहे. असे असले तरी आंतरराष्ट्रीय
पर्यटनातून मिळणाऱ्या निधीच्या (आयटीआर) बाबतीत भारताची स्थिती काहीशी बरी आहे.
आयटीआरमध्ये भारताचा वाटा १.८ टक्के असून तो १४व्या क्रमांकावर आहे. या क्षेत्रातील
धोरणात्मक सूचना आणि समस्यांमध्ये अंतर्भूत काही गोष्टी पुढे दिल्या आहेत. कमीतकमी
पाच प्रमुख पर्यटनस्थळांमध्ये तीन मूलभूत गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. त्या अशा:
विशेष पर्यटन संरक्षण दल असणारा पर्यटनाला अनुकूल आणि पर्यटकांकरता सुरक्षित
भारत देश; स्वच्छता, आरोग्यसुरक्षा आणि स्वीकारार्ह वातावरण; आणि पर्यटनाच्या उत्तम
पायाभूत सुविधा. या पायाभूत सुविधांमध्ये शहरांच्या मधोमध वाहणाऱ्या नद्यांच्या परिसराचे
सुशोभीकरण करणे, हॉटेल खोल्यांची संख्या वाढवून पर्यटकांना राहण्याची सोय करणे
आणि महत्त्वाच्या पर्यटन स्थळांमध्ये मूलभूत सुविधा सुधारण करणे यांचा समावेश आहे.
यासाठी काही क्षेत्राचे खाजगीकरण करून किंवा 'अॅडॉप्ट हेरिटेज प्रोजेक्ट'/ ‘वारसा-स्थळ
दत्तक घ्या’ यांसारख्या सरकारी योजनांच्या धर्तीवर सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या तसेच
शासकीय पाठबळाच्या आधारे सुधारणा घडवून आणता येतील. ई-व्हिसा आणि इमिग्रेशन
प्रक्रियेत आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. जसे की दिल्ली विमानतळावरील
ई-व्हिसा काउंटरची संख्या वाढवली, तर सध्याचा सरासरी ३ तासांचा प्रतीक्षाकाळ कमी Self-Instructional
करता येईल. Material 105
सेवा क्षेत्र पर्यावरण
(पर्यटनविषयक सुधारणांचा) आणखी एक भाग म्हणजे वैद्यकीय पर्यटनाला चालना
देण.े यासाठी वैद्यकीय पर्यटनाची सोय असणाऱ्या रुग्णालयांसाठी आयात सुविधा देण,े
NOTES वैद्यकीय पर्यटकांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, विमानतळांवर रुग्णवाहिका सेवा,
हेलिकॉप्टरने वैद्यकीय पर्यटकांना रुग्णालयात नेणे आणि वैद्यकीय व्हिसा, इमिग्रेशन आणि
इतर औपचारिकतांसाठी जलदगती क्लियरन्स आदि सेवांचे पॅकेज उपलब्ध करून देता
येईल.
पर्यटन क्षेत्रातील जीएसटीशी संबंधित समस्यांमध्ये पुढील मुद्द्यांचा समावेश आहे :
तरतुदीचे ठिकाण आणि पर्यटन सेवांमधून मिळालेल्या परदेशी चलनाच्या उत्पन्नाला निर्यात
किंवा डीम्ड निर्यात मानण्याची गरज; तसेच इतर प्रतिस्पर्धी देशांतील कराच्या दरांच्या
तुलनेत खूपच जास्त (सरासरी ५ टक्के) असलेले भारतातील जीएसटीचे दर. तसेच
पर्यटनातील निर्यात इतर निर्यातीप्रमाणे आणि सेवांप्रमाणेच समजली जाण्याची आणि अशा
व्यवहारांना शून्य रेट किंवा इनपुट टॅक्स न थांबवता खूप कमी दराने कर आकारला
जाण्याची गरज आहे. टूर ऑपरेटर सेवांसाठी इनपुट टॅक्स क्रेडिट देण्याचा विचार करणे
आवश्यक आहे; आणि भारतातील वस्तू खरेदी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांना जीएसटी
परताव्याची एक सोपी यंत्रणा तयार करणे जरुरीचे आहे.

भारतीय पर्यटन क्षेत्रापुढील आव्हाने


पायाभूत सुविधांचा अभाव :
स्थिर पर्यटनासाठी योग्य पर्यटन सुविधा, आरोग्य सुविधा, तत्पर, विनाविलंब आणि
अखंड वाहतूक व्यवस्था आणि इतर मानवी संसाधने आवश्यक आहेत. आयसीटी तत्परता
घटकात भारत ११२ वा आणि डब्ल्यूईएफच्या ट्रॅव्हल अँड टुरिझम कॉम्पिटिव्हनेसी इंडेक्स,
२०१४ मधील आरोग्य आणि स्वच्छता घटकांमध्ये १०४ व्या क्रमांकावर आहे. हे मुळात
आपल्या देशातील हलक्या दर्जाच्या पायाभूत सुविधांना प्रतिबिंबित करते. पर्यटन क्षेत्रासाठी
आर्थिक संसाधनांचे अयोग्य वाटप हे यामागील महत्त्वपूर्ण कारणांपैकी एक आहे. २०१७-
१८ च्या बजेटवर नजर टाकल्यास आपणास दिसून येते, पर्यटनसारख्या समृद्ध आणि
आशादायक क्षेत्रासाठी केवळ १८४० कोटींचे वाटप केले गेल.े

मानवी संसाधने:
अत्यंत कुशल मानवी संसाधने हा पर्यटन क्षेत्रातील एक अपरिहार्य भाग आहे. आपल्या
भारतीय पर्यटन आणि पर्यटन उद्योगाची वाढ कायम राखण्यासाठी विविध स्तरांवर मोठ्या
प्रमाणात कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बँकिंग, अभियांत्रिकी
आणि औषध यांसारख्या इतर क्षेत्रांत मनुष्यबळात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. यामुळे
हळूहळू पर्यटन क्षेत्रासाठी उपलब्ध असलेल्या मानवी संसाधनांत घट झाली. त्यामुळे
आतिथ्य आणि पर्यटन या दोन्ही क्षेत्रांत काम करणाऱ्या कुशल कामगारांना मोठी मागणी
आहे.

अपुरा प्रचार आणि विपणन:


Self-Instructional एखाद्या देशाच्या पर्यटन उद्योगाच्या सुधारणेसाठी उत्कृष्ट जाहिरात आणि मार्केटिंग
Material 106 महत्त्वाचे आहे. भारतात, पर्यटन उद्योगास मदत करण्यासाठी आणि प्रगतीसाठी देण्यात
सेवा क्षेत्र पर्यावरण
आलेल्या आर्थिक पाठबळाचे प्रमाण इतर देशातील पर्यटनस्थळांच्या तुलनेत अगदी कमी
प्रमाणात आहे. सध्याच्या काळात पारंपरिक विपणन तंत्राकडून भारताला प्रचंड सुधारण्याची
आवश्यकता आहे आणि त्याचबरोबर आधुनिक पद्धतींचाही वापर गरजेचा आहे. NOTES

कर आकारणी:
एअरलाइन्स सुविधा,हॉ टेल आणि टूर ऑपरेटरसह संपूर्ण उद्योगांवर उच्च कर
आकारण्यात येतो. जेव्हा पर्यटनाचा विचार केला जातो तेव्हा इतर कमी खर्चाच्या देशांसमोर
पर्यटनामध्ये मागे राहण्याचे हे एक मुख्य कारण आहे. उदाहरणार्थ, हवाई तिकिटांच्या
किंमतीचा विचार करता हे दर 29 राज्यांमध्ये करप्रणालीमुळे बदलतात.

सुरक्षा समस्या:
भारतीय पर्यटन व्यवसायासमोर पर्यटकांची सुरक्षा एक गंभीर समस्या आहे. हे एक
मोठे आव्हान आहे. विदेशी महिलांबरोबर दुर्व्यवहार, चोरी, क्रेडीट कार्ड फ्रॉड, आयडेंटिटी
चोरी, फूड पॉयझनिंग, दहशतवाद आणि सार्वजनिक हिंसाचार यांसारख्या समस्या
भेडसावत आहेत.

बँकिंगः
बँका प्रत्येक अर्थव्यवस्थेचा आधार असतात. बँका आर्थिकदृष्ट्या निरोगी राहणे फार
महत्त्वाचे आहे. अन्यथा, आर्थिक संकटाचा आघात एखाद्या देशाला मंदीकडे नेऊ शकतो,
जसे २००८ साली अमेरिकेत घडले. असे घडण्याची शक्यता विशेषतः भारतासारख्या
विकसनशील देशात अधिक आहे. ही गोष्ट भारतासारख्या विकसनशील देशासाठी विशेष
खरी आहे. "बँका या अर्थव्यवस्थेच्या जीवनरेखा असतात आणि त्या विशेषतः विकसनशील
देशांत आर्थिक वाढीला चालना देण्यात आणि ती टिकवून ठेवण्यात उत्प्रेरकांसारखे काम
करतात. भारतही याला अपवाद नाही."- एस.एस.मुंद्रा, डेप्युटी गवर्नर्, रिझर्व बँक ऑफ
इंडिया. तथापि, भारतीय बँकांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे,
ज्याचा त्यांच्या नफा आणि आर्थिक स्थिरतेवर परिणाम झाला आहे.

मालमत्तेची गुणवत्ता:
भारतातील बँकांना सर्वांत मोठा धोका म्हणजे थकित/बुडित कर्जात वाढ. गेल्या काही
वर्षांतील अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे थकित/बुडित कर्जे किंवा अनर्जक मालमत्तेत / नॉन-
परफॉर्मिंग अॅसेट (एनपीए) मध्ये वाढ झाली. ही अशी कर्जे आहेत ज्यांची कर्जदाराने
परतफेड केली नाही. अशी कर्जे हे बँकेचे नुकसान आहे. बँकिंग प्रणालीतील एकूण
कर्जापैकी निव्वळ एनपीए रक्कम फक्त २.३६% आहे. ही संख्या फारशी चिंताजनक
भासत नाही. तथापि, यात पुनर्गठित मालमत्तेचा समावेश नाही. जेव्हा कर्ज घेणारा परतफेड
करण्यास असमर्थ असतो तेव्हा बँक जास्त कालावधी देऊन कर्जफेड अधिक लवचिक
करते. पुनर्गठित मालमत्तादेखील बँकेच्या नफ्यावर दबाव आणते. एकत्रितपणे, अशा
तणावग्रस्त मालमत्तांचा बँकिंग प्रणालीतील एकूण कर्जापैकी १०.९% हिस्सा आहे. त्यातही
ही फक्त अशी कर्जे आहेत जी तणावग्रस्त मालमत्ता म्हणून आधीच घोषित केली गेली Self-Instructional
आहेत. आयएमएफच्या अहवालानुसार, भारतातील एकूण कर्जाच्या ३६.९% कर्जांत Material 107
सेवा क्षेत्र पर्यावरण
जोखीम आहे; पण बँकांमध्ये फक्त ७.९% तोटा सोसण्याची क्षमता आहे. त्यामुळे जर ही
कर्जेदेखील थकित/बुडित झाली, तर बँकांना मोठे नुकसान सहन करावे लागेल.
NOTES
भांडवलाची पर्याप्तता/पूर्तता :
थकित/बुडित कर्जापासून संरक्षणाचा एक उपाय बँका योजतात. तो असा, की 'तरतूद'
म्हणून पैसे बाजूला ठेवणे. हा पैसा कर्ज देण्यासह इतर कोणत्याही उद्देशांसाठी वापरला
जाऊ शकत नाही. परिणामी बँकांना त्यांच्या विविध कामांसाठी कमी भांडवल उपलब्ध
होते. भांडवल पर्याप्तता गुणोत्तर /कॅपिटल अॅडक्वसी रेश्यो बँकेचे भांडवल किती आहे हे
मोजते. जेव्हा हे घसरते तेव्हा बँकेला कर्ज देण्यासाठी पैसे उसने घ्यावे लागतात किंवा
ठेवीदारांचे पैसे वापरावे लागतात. तथापि, हे पैसे बँकेच्या स्वतःच्या भांडवलापेक्षा
धोकादायक आणि महाग आहेत. उदाहरणार्थ, ठेवीदार त्याच्या इच्छेनुसार केव्हाही पैसे
काढून घेऊ शकतो. त्यामुळे भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण किंवा सीएआर (बहुतेकदा
सीआरएआर किंवा कॅपिटल टू रिस्क अॅसेटस रेश्यो/भांडवल व जोखमीचे प्रभावी मालमत्ता
प्रमाण म्हणून ओळखले जाते) कमी होणे चिंताजनक आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय
बँकांमध्ये विशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सीआरएआरमध्ये सातत्याने घट झाली
आहे. शिवाय, बॅंकांना; विशेषत: जास्त थकित कर्ज असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील
बँकांना सहजपणे पैसे उभारता येत नाहीत. जर बँकांनी लवकरच त्यांच्या भांडवलाची स्थिती
सावरली नाही तर काही बँका आरबीआयने निश्चित केलेली किमान भांडवली आवश्यकता
पूर्ण करण्यात अपयशी ठरतील. अशा वेळी त्यांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

असुरक्षित फॉरेक्स एक्सपोजर:


“परकीय बाजारपेठेतील उलटसुलट आवर्तनांमुळ/े हालचालींमुळे जास्त परदेशी कर्ज
घेतलेल्या भारतीय कंपन्यांच्या हिशेबांवर लक्षणीय ताण पडण्याची शक्यता आहे,” असे
मुंद्रा यांनी आपल्या भाषणात सांगितले. या ताणामुळे भारतीय बँकांकडून घेतलेले कर्ज परत
करण्याच्या त्या कंपन्यांच्या क्षमतेवर दुष्परिणाम होऊ शकतो. यामुळ,े आरबीआयची
इच्छा आहे, की बँकांनी ज्यांना कर्ज दिले आहे अशा कंपन्या डॉलर्समधील अनावश्यक
कर्ज घेणार नाहीत /घेऊन उघड्यावर येणार नाहीत याची खात्री करून घ्यावी/ याची
काळजी घ्यावी.

कर्मचारी आणि तंत्रज्ञान:


सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतून सध्या अधिक कर्मचारी निवृत्त होत आहेत. ज्येष्ठ,
अधिक अनुभवी कर्मचाऱ्यांची जागा तरुण कर्मचारी घेत आहेत. मात्र हे कनिष्ठ पातळीवर
घडते. त्यामुळे मध्यम आणि वरिष्ठ पातळीवर बरीचशी पोकळी निर्माण होईल. "मध्यम
फळीच्या व्यवस्थापनाच्या अनुपस्थितीमुळे बँकांच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर विपरित
परिणाम होऊ शकतो कारण वरिष्ठ व्यवस्थापनाची धोरणे व्यवहार्य कार्ययोजनांमध्ये
रूपांतरित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका मध्यम फळीच्या अधिकाऱ्यांनीच बजावली," असे
डेप्युटी गव्हर्नर म्हणाले. या शिवाय, बँकांना - विशेषत: सरकारी मालकीच्या बँकांना
चांगले उत्पादन देण्यासाठी तंत्रज्ञानाचा अंगीकार/ स्वीकार करण्याची आवश्यकता आहे.
Self-Instructional यामुळे बँकांना अधिक कार्यक्षम बनविण्यातदेखील मदत होईल.
Material 108
सेवा क्षेत्र पर्यावरण
ताळेबंद व्यवस्थापनः
गेल्या काही वर्षांत अनेक बँकांनी (भविष्यातील थकित कर्जासाठी) तरतुदी म्हणून पैसे
बाजूला ठेवण्यास विलंब करण्याचा प्रयत्न केला आहे. यामागचे एक कारण असे आहे की NOTES
बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा कार्यकाळ कमी असतो, त्या काळात त्यांना जास्त
निव्वळ नफा जाहीर करून गुंतवणूकदारांना खूश करायचे असते.
दीर्घकालीन विचार करता, ताळेबंदीतील तरतूद लांबणीवर टाकणे नुकसानकारक
आहे. यामुळे आर्थिक दबावाचा सामना करण्याची बँकेची क्षमता कमी होते. भारतीय
बँकांमधील भांडवलाची कमतरता लक्षात घेता ही समस्या आणखीनच त्रासदायक आहे.
बँकांनी दीर्घ काळ टिकून राहण्यासाठी उच्च निव्वळ नफा जाहीर करण्याऐवजी टाळेबंदी
व्यवस्थापनातील अडचणी ओळखून समस्या सोडवल्यास प्राधान्य दिले पाहिजे. "हे
ध्यानात घेतले पाहिजे, की सीईओ / सीएमडी जातील आणि येतील; परंतु संस्था
कायमस्वरूपी अस्तित्वात असतात, आणि त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवू शकणारी एकमेव
गोष्ट म्हणजे मजबूत आणि सक्षम ताळेबंद." मुंद्रा म्हणाले. दीर्घकालीन विचार करता,
तरतूद लांबणीवर टाकणे नुकसानकारक आहे. यामुळे आर्थिक दबावाचा सामना करण्याची
बँकेची क्षमता कमी होते. भारतीय बँकांमधील भांडवलाची कमतरता लक्षात घेता ही समस्या
आणखीनच त्रासदायक आहे. खरे पाहता, दीर्घ काळ टिकून राहू शकत नाही असा उच्च
निव्वळ नफा जाहीर करण्याऐवजी व्यवस्थापनाने अडचणी ओळखून समस्या सोडवल्यास
गुंतवणूकदार अधिक आनंदी होतील, असे डेप्युटी गव्हर्नर म्हणाले.

४.३ भारतीय सेवा क्षेत्रातील नवीन प्रवाह - डिजिटल


अर्थव्यवस्था
एकविसाव्या शतकात, डिजिटल अर्थव्यवस्था मुख्यतः जागतिक अर्थव्यवस्थेच्या
वाढीला चालना देण्यासाठी उदयास आली आहे. तसेच ती ऊर्जा, पर्यावरण आणि
असमानतेसह सर्वांना समान असलेल्या अनेक जागतिक आव्हानांचा प्रभावीपणे सामनाही
करेल. तथापि, इंटरनेटच्या उपलब्धतेसह डिजिटल संसाधनांच्या असमान वितरणामुळे
जागतिक पातळीवरील सर्व विभाग आणि प्रदेशांना मिळणाऱ्या फायद्यांबाबत प्रश्न उभे
राहिले आहेत. डिजिटल विभाजन कमी करण्यासाठी, नागरिकांना सक्षम करण्यासाठी आणि
नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपल्याला डिजिटल तंत्रज्ञान आणि इंटरनेटचा
वापर करण्याची आवश्यकता आहे.
आपल्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाने हे सिद्ध केले आहे, की डिजिटलायझेशनमध्ये
अनेक सामाजिक, आर्थिक आव्हानांवर विचारमंथन करून अधिक समानता असलेला
समाज निर्माण करण्याचे प्रचंड सामर्थ्य आहे. आपण मोठ्या प्रमाणावर डिजिटलायझेशन
करत आहोतच; पण त्याच वेळी कर्मचाऱ्यांच्या विदेचे /डेटाचे संरक्षण आणि गोपनीयता
सुनिश्चित करण्यासाठी योग्य ती पावले उचलली जात आहेत. आम्हाला खात्री आहे, की
डेटाचा वापर करताना त्याचे अनामिकत्व अबाधित राखूनच डिजिटल तंत्रज्ञानाचे फायदे
मिळवता येतील. Self-Instructional
डिजिटल इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्थेशी निगडित अशा विविध कृतींचा समुच्चय Material 109
सेवा क्षेत्र पर्यावरण
ज्यात डिजिटल माहितीचा उपयोग करणे, उत्पादनक्षमतेतील वाढ आणि आर्थिक संरचनेच्या
इष्टतमीकरण / ऑप्टिमायझेशन यांना चालना देणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणून माहिती आणि
NOTES संप्रेषण तंत्रज्ञानाचा (आयसीटी) प्रभावी वापर करणे यांचा समावेश असतो. इंटरनेट, क्लाउड
संगणन, बिग डेटा, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), फिन-टेक आणि इतर नवीन डिजिटल
तंत्रज्ञानाचा उपयोग; माहिती संकलित करण्यासाठी, संग्रहित करण्यासाठी, विश्लेषित
करण्यासाठी आणि डिजिटल स्वरूपात इतरांबरोबर वाटून घेण्यासाठी / इतरांपर्यंत
पोचवण्यासाठी आणि सामाजिक क्रिया-प्रतिक्रियांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी
केला जातो.
आपण ‘डिजिटल इंडिया’ हा कार्यक्रम देशातील सर्वसामान्यांना सक्षम बनविण्याच्या
निश्चित हेतूने तीन महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करून राबवित आहोत: प्रत्येक
नागरिकाच्या उपयोगासाठी पायाभूत डिजिटल सुविधा, मागणीनुसार सेवा आणि प्रशासन,
नागरिकांचे डिजिटल सक्षमीकरण.
केवळ शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेल्या डिजिटल सशक्तीकरणातूनच इंटरनेटच्या प्रचंड
क्षमतेचा मुक्त व संपर्ण ू वापर होऊ शकतो. यासाठी तीन महत्त्वाचे घटक आवश्यक आहेतः
ब्रॉड संबद्धता/संलग्नता, ई-साक्षरता आणि स्थानिक भाषांमध्ये डिजिटल साहित्याची उपलब्धता.
डिजिटल इंडियाने भारतात डिजिटल परिवर्तनाच्या आरंभासाठी मजबूत पायाभरणी
केली आहे. आधार, जॅम त्रिकूट (जन धन खाती, आधार आणि भ्रमणध्वनी/मोबाइल),
भीम, ई-साइन, डिजिटल लॉकर, आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम (एईपीएस) सारखे प्रोग्रॅम्स
आता पूर्वी कल्पनाही करता आली नसती अशा मार्गाने आपल्या समाजाला जोडू आणि
सक्षम करू शकत आहेत. १.१७ अब्ज लोकांना(ज्यापैकी ९९ टक्के प्रौढ आहेत)
‘आधार’च्या रूपाने एक वेगळी डिजिटल ओळख मिळाली आहे. याखेरीज १ अब्ज
मोबाईल वापरणारे आणि त्यांची १ अब्ज बँक खाती आहेत. या तीन गोष्टींच्या समुच्चयाचा
उपयोग सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या विविध सरकारी योजना आणि
कार्यक्रमांमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता आणण्यासाठी होत आहे.
पुढील काही वर्षांत १ ट्रिलियन डॉलर्सची डिजिटल अर्थव्यवस्था तयार करण्याची
डिजिटल इंडियाची क्षमता आहे. शेती, आरोग्य, शिक्षण आणि कौशल्यनिर्मिती यावर विशेष
भर दिला जात आहे. २०३० सालापर्यंत जगाच्या शाश्वत विकासासाठी संयुक्त राष्ट्रांनी १७
उद्दिष्टे स्वीकारली आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून हि लक्ष्य साध्य करता येईल.
डिजिटल इंडिया तंत्रज्ञानाचे सबलीकरण राबवित आहे ज्यामळ ु े आहे रे आणि नाही रे
गटांमधील दरी सांधली जाईल. भारताची डिजिटल कथा ही जगातील सर्व जगभरात वाखाणल्या
जाणाऱ्या/ प्रशंसाप्राप्त कमी किमतीच्या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाची कहाणी आहे.
‘भारतनेट’ या महाप्रकल्पाद्वारे इंटरनेट अॅक्सेसची समस्या सोडविण्याचा प्रयत्न भारत करीत
आहे. या प्रकल्पांतर्गत २ लाख किलोमीटरहून अधिक नेटवर्क वापरून आपल्या सर्व म्हणजे २.५
लाख पंचायतींमध्ये लवकरच जीबी कनेक्टिव्हिटी कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना सेवा पुरविण्यासाठी सार्वजनिक-खासगी क्षेत्राच्या संयुक्त
भागीदारीतून २.५ लाखाहून अधिक सार्वजनिक सेवा केंद्रे (कॉमन सर्व्हिस सेंटर्स सीएससी)
डिजिटल कियोस्क म्हणून चालविण्यात येत आहेत. सीएससी हे सार्वजनिक-खासगी
क्षेत्राच्या भागीदारीचे (पीपीपी)असे वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल आहे जिथे सूक्ष्म-उद्योजक
Self-Instructional उपजीविकेचे शाश्वत साधन निर्माण करून भारतातील खेड्यांमध्ये डिजिटल क्रांती घडवत
Material 110 आहेत.
सेवा क्षेत्र पर्यावरण
आता एक अब्जावर भारतीय रहिवासी मोबाइल वापरत आहेत आणि जवळजवळ
४५० दशलक्ष नागरिकांकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटी/आंतरजाल संलग्नता आहे.
भारतात डिजिटल पेमेंट्स, मेक इन इंडिया, स्टार्ट-अप इंडिया, स्किल इंडिया, १०० NOTES
स्मार्ट सिटीज, ५० मेट्रो प्रोजेक्ट्स आणि स्वच्छ भारत हे डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना
देणारे प्रमुख प्रकल्प म्हणून ओळखले जातात .
येथे अधोरेखित करण्याचा/सांगायचा मुद्दा हा आहे, की डिजिटल परिवर्तन हे सखोल,
संरचित विचारप्रक्रियेचे फलित आहे. ही गोष्ट डिजिटल पुढाकारांच्या अनुक्रमात दिसून
येत.े या पुढची पायरी म्हणजे सर्वसामान्यांत या परिवर्तनाचा अधिकाधिक शिरकाव करणे
ही आहे.
यासाठी भारत कनेक्टिव्हिटी, प्रशिक्षण आणि कौशल्यवाढ यांवर लक्ष केंद्रित करत
आहे. मोबाइल जोडणीमुळे ग्रामीण टेलि-डेन्सिटी ५०.०४ टक्क्यांच्याही वर पोचली आहे.
भारत बीपीओ योजनेअंतर्गत, ४८३०० जागा मंजूर झाल्या आहेत, तर ईशान्येकडील
बीपीओसाठी ५००० पेक्षा जास्त जागा मंजूर झाल्या आहेत.
मीआयटीवाय(MeitY) अंतर्गत राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेने
(एनआयईएलआयटी) ५,५०,००० विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रातील नोकरीसाठी प्रशिक्षण
दिले आहे. दूरसंचार क्षेत्र कौशल्य संस्थेने (टेलिकॉम सेक्टर स्किल कौन्सिल - टीएसएससी)
देशभरातील १५७ प्रशिक्षण-सहयोगींचा एक गट/पॅनल तयार केले आहे आणि आतापर्यंत
१.२१ लाख लोकांना दूरसंचार प्रशिक्षण अभ्यासक्रमात प्रशिक्षण दिले आहे. डिजिटल
साक्षरता अभियानांतर्गत सुमारे ४.४ दशलक्ष उमेदवार प्रशिक्षणासाठी दाखल झाले आहेत,
आणि ६,३५,००० हून अधिक उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

ई-कॉमर्स
कृषी उत्पादनांसारख्या पारंपरिक ऑफलाइन बाजाराचे रूपांतर आणि नियोजन
करण्यासाठी ई-कॉमर्स डिजिटल प्लॅटफॉर्म स्वीकारून त्याचा लाभ घेण्याकरता भारत
सरकार सक्रिय आहे. शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करण्यासाठी विविध राज्यांच्या भाजी
मार्केटशी जोडण्यासाठी सरकारने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. तसेच, स्टार्ट-अप
इंडिया, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया आणि इनोव्हेशन फंडसारखे मुख्य उपक्रम
ई-कॉमर्स उद्योगाच्या वाढीस हातभार लावत आहेत.

इंटरनेट वापराच्या टक्केवारीत (इंटरनेट पेनिटरेशनमध्ये) वाढ


दूरसंचाराच्या पायाभूत सुविधांमधील महत्त्वपूर्ण सुधारणांमुळे भारतातील इंटरनेट
वापराच्या टक्केवारीत वाढ होत आहे. त्याबरोबरच ई-कॉमर्स उद्योगही वाढत आहे.
घटणाऱ्या डेटा शुल्काबरोबरच ३ जी आणि ४जी सेवा भारतात प्रगतिपथावर असतानाच
इंटरनेट डेटाच्या व्ययात लक्षणीय वाढ होत आहे. आशियात भारत इंटरनेट वेगाबाबत सर्वांत
खालच्या स्थानावर आहे, तरीही भारतातील डेटा दर अमेरिकेच्या तुलनेत ३ पट स्वस्त
आणि चीनपेक्षा २ पट स्वस्त आहेत. नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क (एनओएफएन)
सारख्या सरकारी योजनांमुळे ग्रामीण भागातील इंटरनेटचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढू शकते.
त्याचबरोर ई-कॉमर्स कंपन्यांना तेथील प्रचंड बाजारपेठेतील क्षमता पडताळणे शक्य होऊ
शकते. Self-Instructional
Material 111
सेवा क्षेत्र पर्यावरण

स्मार्टफोन वापरातली वाढ


NOTES गेल्या काही वर्षांत स्मार्टफोनच्या वापरात प्रचंड वाढ झाली आहे आणि येत्या काही
वर्षांत यात अधिक भर पडणे अपेक्षित आहे. भारतात स्मार्टफोन घेण्याची क्षमता; तीव्र
स्पर्धेमुळे कमी किंमती, सुलभतेने मिळणारा कंटेन्ट आणि इंटरनेट आधारित सेवांचा प्रसार
यांसारख्या; अनेक घटकांनी प्रभावित आहे. एका अहवालानुसार, मोबाइल-आधारित
ई-कॉमर्स विक्रीत जागतिक स्तरावर भारताचा वाटा सर्वाधिक म्हणजे ४५ टक्के आहे.
ई-कॉमर्स साइटवरची जवळपास ७० ते ७५ टक्के व्यवहार हे मोबाइल फोन वापरून
होतात, असे अग्रगण्य ई-कॉमर्स कंपन्यांनी सांगितले आहे. त्यामुळे मोबाइल अनुप्रयोगांमधून
(अॅप्समधून) या कंपन्यांना जास्त उत्पन्न मिळते जसे की, फ्लिपकार्टसाठी ५० टक्के, तर
किक्करसाठी ७० टक्के.

नवीन पेमेंट सोल्यूशन्सची उत्क्रांती


भारतीय ई-कॉमर्स व्यवहारांत कॅश ऑन डिलिव्हरी (सीओडी) ही मूल्य याद करण्याची
सर्वांत लोकप्रिय पद्धत आहे; पण ई-कॉमर्स कंपन्यांसाठीदेखील रोख व्यवहारामुळे
प्रशासकीय खर्चात वाढ होते म्हणूनच या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवीन डिजिटल
पेमेंट सोल्यूशन्स विकसित होत आहेत. याशिवाय भारत सरकारच्या पुढाकाराने ‘जन धन
योजना’ योजनेच्या माध्यमातून बँकिंग सुविधा वाढविण्यात आल्याने डेबिट कार्डसमध्ये
११० दशलक्षाहून अधिक वाढ झाली आहे. यामुळे ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक पेमेंट करता येऊ
शकेल. ई-कॉमर्समधील पेमेंट प्रक्रिया सुलभ करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वॉलेट्स आणि
पारंपरिक बँकांकडून डिजिटल पेमेंट उत्पादनेही सुरू केली गेली आहेत.

हायपर-लोकल कंपन्या आणि इंडिया पोस्टची लॉजिस्टिक स्पेसकरता


भागीदारी
ग्राहकांना दुसऱ्या दिवशी उत्पादने वितरित केली जात आहेत. घेतलेला माल परत
करणे, ग्राहक सेवेचे उच्च मापदंड आणि मोठ्या प्रमाणात वितरण हाताळणे या आव्हानांमुळे
या उद्योगात अखेरच्या टप्प्यातील वितरणासाठी अनेक तृतीय-पक्षाच्या लॉजिस्टिक
सेवादात्यांची वाढ दिसून आली आहे. प्रामुख्याने द्वितीय व तृतीयस्तरीय शहरांमध्ये
पोहोचण्यासाठी तृतीय-पक्षाच्या लॉजिस्टिक सेवादात्यांबरोबर ई-कॉमर्स कंपन्यांच्या
भागीदारीची संख्या वाढत आहे. तसेच ग्राहकांना उत्तम सेवेचा अनुभव देण्यासाठी आणि
वितरणावर अधिक नियंत्रण ठेवण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्या स्वतःचा लॉजिस्टिक विभाग
काढण्यासाठी प्रवृत्त होत आहेत.

ई-कॉमर्सची वाढ वाढविण्यासाठी जीएसटी


जीएसटीमुळे सर्व राज्यांत वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर लागू होईल अशी एकल
सर्वसमावेशक अप्रत्यक्ष कर व्यवस्था लागू करण्याची अपेक्षा केली जात आहे. जीएसटीच्या
अंमलबजावणीत सर्व्हिस टॅक्स, सेंट्रल एक्साईज ड्युटी, केंद्रीय स्तरावर अतिरिक्त कस्टम
ड्युटी आणि राज्य स्तरावर सीएसटी, व्हॅट आणि प्रवेश कर समाविष्ट करणे अपेक्षित आहे.
Self-Instructional यामुळे पारदर्शकता आणि देशांतर्गत सीमेवरील करांचे सरलीकरण, दुप्पट कर आकारणीच्या
Material 112 घटना न होणे तसेच पुरवठा साखळीची कार्यक्षमता सुधारणे अशा अनेक मार्गांनी ई-कॉमर्स
सेवा क्षेत्र पर्यावरण
इंडस्ट्रीच्या संचालनातील कार्यक्षमता वाढेल.
ई-कॉमर्स लाखो लोकांचे जीवन बदलत आहे; परंतु असेही बरेच लोक आहेत जे
ऑफलाइन शॉपिंगला प्राधान्य देतात. जर येत्या काही वर्षांत ई-कॉमर्सला प्रचंड प्रभाव NOTES
निर्माण करायचा असेल, तर या प्राधान्यक्रमाचा व्यवसायावर नक्कीच परिणाम होईल.
ई-वित्त
ई-फायनान्स म्हणजे ऑनलाईन बँकिंग, इलेक्ट्रॉनिक व्यापार यांची सोय करणे, विमा,
गहाणखत आणि इलेक्ट्रॉनिक पैसे यांसारख्या वित्तीय उत्पादनांचे वितरण, आर्थिक माहिती
आणि विश्लेषण इंटरनेटद्वारे किंवा अन्य सार्वजनिक नेटवर्कद्वारे संप्रेषण करणे इत्यादी.
वित्तीय बाजारात आता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात समाशोधन/ क्लिअरिंग आणि व्यवहाराची
पूर्तता /सेटलमेंट, शीर्षकाचे हस्तांतरण होते.
यामुळे स्मार्टफोनवर आधारित ऑनलाइन शॉपिंग संस्कृतीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी
ऐतिहासिकदृष्ट्या रोखीने वर्चस्व असलेल,े भारताचे ई-कॉमर्स पेमेंट्स मार्केट बदलत आहे.
यामुळे कार्ड्स आणि डिजिटल वॉलेट्सचे महत्त्व वाढत आहे.
सध्या भारतात ऑनलाइन खरेदीसाठी सर्वांत जास्त वापरली जाणारी पेमेंट पद्धत म्हणजे
कार्डस आहेत. कार्डस २९% व्यवहारांचे किंवा १०.६ अब्ज डॉलर्स विक्रीचे प्रतिनिधित्व
करतात. असे असूनही राष्ट्रीय स्तरावर कार्डचा वापर कमी आहे. कार्ड वापराचा दर डेबिट
कार्डासाठी दरडोई ०.६४ तर क्रेडिट कार्डसाठी ०.०२ आहे. ह्यावरून हे सूचित होते, की
रोख रकमेचा वापर जसजसा कमी होईल तसतसा कार्डांना आणखी मोठा वाटा मिळवण्याची
संधी आहे.
भारतातील कार्डाचा वापर २०२१ पर्यंत ५३ टक्के वार्षिक वृद्धी दराने वाढणे अपेक्षित
आहे.
भारतात वेगाने वाढणारी आणखी एक पेमेंटची पद्धत म्हणजे डिजिटल वॉलेट्स. सध्या
एकूण ई-कॉमर्स पेमेंट्सच्या एक चतुर्थांश भागासाठी डिजिटल वॉलेट्स वापरली जातात.
डिजिटल वॉलेट्स वापर २०२१ पर्यंत ८० टक्के वार्षिक वृद्धी दराने वाढणे अपेक्षित आहे.
तेव्हा विक्रीचा ३४.८ टक्के वाटा घेणारी डिजिटल वॉलेट्स ही ऑनलाइन पेमेंटची
प्राथमिक पद्धत असेल. एअरटेल मनी आणि पेपाल या सर्वाधिक लोकप्रिय पर्यायांसह
भारतात आत्ताही अनेक डिजिटल वॉलेट पर्याय उपलब्ध आहेत.
भारताच्या ऑनलाइन पेमेंट मार्केटमध्ये अद्यापही रोखीचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. एकूण
विक्रीपैकी १७ टक्के विक्रीत रोख रक्कम वापरली जाते. असे मुख्यतः कॅश-ऑन-डिलीव्हरी
पद्धतीच्या दीर्घकाळ टिकलेल्या लोकप्रियतेमुळे होते. यामुळे ई-कॉमर्स व्यापाऱ्यांना नेहमीच्या
नसलेल्या आणि ग्रामीण ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत करते. तसेच पैसे न मिळाल्यामुळे
होणाऱ्या नुकसानाची जोखीमदेखील कमी करते - जर ग्राहकाने पैसे दिले नाहीत, तर ती
वस्तू सरळ व्यापाऱ्याकडे परत पाठवली जाते. सन २०२१पर्यंत रोख रकमेचा भारतातला
वाटा कमी कमी होत जाऊन केवळ १० टक्के राहील. कार्ड आणि डिजिटल वॉलेटचा
अवलंब वाढेल आणि नियामक बदलांमुळे बदलत्या पेमेंट्सच्या लँडस्केपला उत्तेजन
मिळेल.
जसा भारतातील बँकिंगचा विस्तार वाढेल तशी बँक ट्रान्सफर्समध्ये वेगाने वाढ होईल.
सध्या ही पद्धत पाचपैकी एका इ-कॉमर्स व्यवहारात वापरली जाते. या पद्धतीचा वापर
२०२१ पर्यंत ८४ टक्के वार्षिक वृद्धी दराने वाढणे अपेक्षित आहे, आणि ह्या पद्धतीचा Self-Instructional
बाजारातील वाटा ३०.२ टक्के असेल. Material 113
सेवा क्षेत्र पर्यावरण
प्रश्नांच्या साहाय्याने आपली प्रगती पडताळा.
१. ज्ञानाधिष्ठित क्षेत्र म्हणजे काय?
NOTES २. शिक्षण क्षेत्रातील मुख्य समस्या कोणत्या?
३. विमा म्हणजे काय?
प्रश्नांची उत्तरे पडताळा.
१. अर्थव्यवस्थेचे क्षेत्र जे ज्ञानाधिष्ठित क्रियांवर आधारित असते आणि भौतिक
साधनांपेक्षा बौद्धिक भांडवलावर अधिक अवलंबून असते अशा क्षेत्राला ज्ञानाधिष्ठित क्षेत्र
असे म्हणतात.
२. १. शिक्षणावर होणारा खर्च २. शैक्षणिक प्रवेशाचा/ नाव नोंदणीचा एकूण आकृतिबंध
३. क्षमतांचा वापर ४. पायाभूत सुविधा ५. पी.पी.पी. मॉडेल (PPP.model) ६.
विद्यार्थी-शिक्षक प्रमाण ७. मान्यता व ब्रँडिंग – दर्जासाठीची मानके ८. परदेशात शिक्षण
घेणारे विद्यार्थी.
३. भविष्यात होणाऱ्या संभाव्य नुकसानापासून स्वत:ला वाचवण्यासाठी एखाद्या
घटकाला एकरकमी रक्कम देणे म्हणजे विमा होय.

४.४ सारांश
कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचे विभागणी ही तीन क्षेत्रांमध्ये होते - प्राथमिक (शेती
व संबंधित क्षेत्रे), द्वितीय (औद्योगिक क्षेत्र) आणि तृतीयक (सेवा क्षेत्र) होते. सेवा
क्षेत्राच्या बाबतीत जगामध्ये भारताचा आठवा क्रमांक असून सेवा क्षेत्राचे राष्ट्रीय उत्पन्न
१५०० महापद्म डॉलर्स आहे. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सेवा क्षेत्राचा जवळपास ५५ टक्के वाटा
आहे. सेवा क्षेत्रातील शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, विमा क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, बँकिंग व्यवसाय
क्षेत्र, अनेक समस्यांचा सामना करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे अर्थव्यवस्थेची वाटचाल
ही डिजिटल इकॉनॉमीकडे सुरू आहे. ई-कॉमर्स आणि ई-फायनान्स यांनी अर्थव्यवस्थेमध्ये
महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

४.५ महत्त्वाचे शब्द


प्राथमिक क्षेत्र
द्वितीय क्षेत्र
तृतीयक क्षेत्र
सेवाक्षेत्र
ज्ञानाधिष्ठित क्षेत्र
शिक्षण क्षेत्र
आरोग्य क्षेत्र
विमा क्षेत्र
Self-Instructional पर्यटन क्षेत्र
Material 114 बँकिंग व्यवसाय क्षेत्र
सेवा क्षेत्र पर्यावरण
डिजिटल इकॉनोमी
ई-कॉमर्स
ई- फायनान्स NOTES
ई-बँकिंग
ई- वॉलेट
विलिनीकरण आणि एकत्रीकरण

४.६ स्वयं मूल्यमापनासाठी स्वाध्याय प्रश्न (लघु व


दीर्घ प्रश्न)
लघु प्रश्न
१. अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण स्पष्ट करा.
२. शिक्षण क्षेत्रातील आव्हाने थोडक्यात स्पष्ट करा.
३. विम्याचे विविध प्रकार स्पष्ट करा.
४. ई-कॉमर्सची संकल्पना स्पष्ट करा.
५. ई- फायनल म्हणजे म्हणजे काय?

दीर्घ प्रश्न
१. भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राची भूमिका स्पष्ट करा.
२. शिक्षण क्षेत्रासमोरील आव्हाने सविस्तरपणे स्पष्ट करा.
३. विमा क्षेत्रासमोरील आव्हाने सविस्तरपणे स्पष्ट करा.
४. पर्यटन क्षेत्रासमोरील आव्हाने सविस्तरपणे स्पष्ट करा.
५. डिजिटल अर्थव्यवस्था संकल्पना स्पष्ट करा.

४.७ अधिक वाचनासाठी साहित्य


• Dutt Ruddar and K.P.M Sundaram (2001): Indian Economy, S
Chand & Co. Ltd. New Delhi
• Mishra S.K & V.K Puri (2001) “Indian Economy and –Its
development experience”,. Himalaya Publishing House.
• Kapila Uma (2017): Indian Economy: Policies and Performances,
Academic Foundation
• Bardhan, P.K. (9th Edition) (1999), The Political Economy of
Development in India, Oxford University Press, New Delhi
• Jalan, B. (1996), India’s Economic Policy- Preparing for the
Twenty First Century, Viking, New Delhi. Self-Instructional
Material 115
बँकिंग पर्यावरण
बँकिंग पर्यावरण
प्रकरण ५ बँकिंग पर्यावरण
NOTES
५.० प्रस्तावना
५.१ बँकिंग
५.१.१ व्याख्या
५.१.२. कार्ये
५.१.३. भारतातील बँकिंगची बदलती रचना
५.१.४. नवीन खाजगी बँका
५.१.५. लघु बँका
५.१.६. पेमेंट बँका
५.२ बँक खाती -
५.२.१. बँक खात्याचे प्रकार
५.२.२ बँक खाते उघडण्याची प्रक्रिया व खात्यांचे संचालन
५.३. भारतीय बँकिंग वातावरणातील अलीकडील ट्रेंड
५.३.१. ई-बँकिंग
५.३.२. ई-वॉलेट्स
५.३.३. बँक विलीनीकरणे आणि एकत्रीकरण
५.४ सारांश
५.५ महत्त्वाचे शब्द
५.६ सरावासाठी प्रश्न
५.७ संदर्भ

५.० प्रस्तावना
प्रगत अर्थव्यवस्थेमध्ये बँकांचे स्थान महत्त्वाचे आहे. अर्थव्यवस्थेमध्ये बँका पैसारूपी
रक्ताचा प्रवाह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतात म्हणूनच बँकांना धमन्यांची उपमा
दिली गेली आहे. बँकांचे प्रमुख काम ठेवी स्वीकारणे व कर्जे देणे हे आहे. बँका पतनिर्मितीच्या
प्रक्रियेद्वारे पतरूपी पैसा निर्माण करतात. उद्योगधंद्यांना कर्जाच्या माध्यमातून भांडवल
पुरविण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. आधुनिक काळाबरोबर बँका बदलत गेल्या आहेत.
आजच्या काळात बहुतेक बँक व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने चालतात. इंटरनेट बँकिंग
मोबाईल बँकिंग यांनी बँकिंगची परिभाषा बदलली आहे.

उद्दिष्टे
या प्रकरणाच्या अभ्यासानंतर आपल्याला
• बँक म्हणजे काय हे स्पष्ट करता येईल.
• भारतीय अर्थव्यवस्थेतील बँकांचे महत्त्व विशद करता येईल.
• बँकेतील खात्याचे प्रकार स्पष्ट करता येतील. Self-Instructional
• ई- बँकिंग, ई- वॉलेट संकल्पना स्पष्ट करता येतील. Material 117
बँकिंग पर्यावरण
५.१ बँकिंग
NOTES
५.१.१ व्याख्या
आधुनिक बँकांच्या विविध उपक्रमांमुळे 'बँक' किंवा 'बँकिंग' ची व्याख्या अनेक
अर्थशास्त्रज्ञांनी खालीलप्रमाणे केल्या आहेत.

डॉ. एल. हर्बर आणि एल. हार्ट यांच्या मते, “बँकर म्हणजे अशी व्यक्ती जी आपल्या
व्यवहारात ठेवीदारांकडून आणि ठेवीदारांकरिता चालू खात्यावर पैसे स्वीकारते आणि त्यांनी
दिलेल्या धनादेशावर पैस े देत.े  

चेंबरच्या विसाव्या शतकाच्या शब्दकोशात बँकेची व्याख्या “पैसे ठेवून घेण,े कर्ज देणे
आणि देवाणघेवाण करण्यासाठीची संस्था” अशी केली जाते.

क्रोथरच्या व्याख्येनुसार, “बँकेचा व्यवसाय म्हणजे स्वत:च्या आणि इतरांच्या कर्जाचा


व्यवहार करून पतनिर्मिती करणे.” 

प्रा. केंट बँकेची व्याख्या करतात, “ज्या संस्थेचे मुख्य कार्य लोकांकडून त्यांच्याकडील
शिल्लक रक्कम किंवा बचत केलेले पैसे स्वतःकडे ठेवून घेणे व याच पैशातून गरजू
लोकांना कर्ज म्हणून पैसे देणे हे असते.” 

भारतीय बँकिंग नियंत्रण कायदा १९४९ च्या व्याख्येनुसार बँकिंग कंपनी म्हणजे अशी
कंपनी जी भारतामध्ये बँकेचा व्यवसाय करते आणि बँकिंग या शब्दाची व्याख्या  लोकांकडून 
कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी पैसे स्वीकारणे आणि आणि हे पैसे त्यांच्या
मागणीनुसार परत करणे किंवा धनादेश, ड्राफ्ट, ऑर्डर याद्वारे परत करणे.  

वरील व्याख्यांवरून हे स्पष्ट होते, की बँक ही एक अशी संस्था आहे जी लोकांकडील


ठेवी स्वीकारते आणि त्याद्वारे पत तयार करून कर्जाचे वाटप करते. 

अर्थव्यवस्थेतील बँकांची भूमिका:


प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत बँका अतिशय उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण भूमिका
बजावतात. अर्थव्यवस्थेतील पैशाच्या  पुरवठ्यावरील एका मोठ्या भागावर त्यांचे नियंत्रण
असते आणि ते कोणत्याही देशात उत्पादन आणि उत्पादन पद्धती यावर प्रभाव टाकू शकतात.
बँकांचे आर्थिक महत्त्व जाणून घेण्यासाठी आपल्याला बँकांच्या सामान्य व महत्त्वपूर्ण
कामांचा आढावा घ्यावा लागेल.

१. भांडवलाच्या निर्मितीची कमतरता दूर करणे :


कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये भांडवली जमा (किंवा) निर्मितीची पुरेशी मात्रा
Self-Instructional असल्याशिवाय आर्थिक विकास शक्य नाही. भांडवलाच्या निर्मितीची कमतरता म्हणजे
Material 118 समुदायाद्वारे कमी बचत. विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये भांडवलाची गंभीर कमतरता प्रति
बँकिंग पर्यावरण
कामगार कमी प्रमाणात भांडवली उपकरणे तयार होणे आणि मर्यादित ज्ञान, प्रशिक्षण आणि
वैज्ञानिक प्रगती यांमधून दिसून येते. या वेळी बँका महत्त्वाची भूमिका बजावतात.  भांडवलाची
कमतरता दूर करण्यासाठी बँका बचत आणि गुंतवणुकीस प्रोत्साहित करतात. सशक्त  NOTES
बँकिंग प्रणाली समुदायातील छोट्या  बचतींना एकत्र करते आणि त्यांना उत्पादक उद्योगातील
गुंतवणुकीसाठी उपलब्ध करते. या व्यवस्थेमध्ये खालील महत्त्वपूर्ण परिणामांचा समावेश
आहे.

i) बॅंकांमध्ये आकर्षक व्याज दर देऊन ठेवी गोळा करतात आणि अशा प्रकारे बचत
सक्रिय भांडवलामध्ये रूपांतरित करतात. अन्यथा ती रक्कम निष्क्रिय राहिली असती.
ii) बँका, ही बचत उद्योगधंद्यांना कर्जाद्वारे वितरित करतात जी राष्ट्र निर्मितीत उपयुक्त
आहेत.
iii) हे समुदायाच्या आर्थिक संसाधनांचा इष्टतम उपयोग करण्यास सुलभ करते.

२) वित्त व पतपुरवठा :
बँका ह्या उद्योग आणि व्यापारासाठी वित्त व पतपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण स्रोत
आहेत. उद्योगांमध्ये पत ही सर्व वाणिज्य आणि व्यापाराचे वंगण असते म्हणूनच, बँका सर्व
उद्योगधंद्यांसाठी  महत्त्वाची भूमिका बजावतात  आणि त्यामुळेच  सशक्त बँकिंग प्रणालीच्या
उपस्थितीत वाणिज्य व व्यापार चालू शकतात.
बँका विदेश व्यापार यामध्येसुद्धा प्रमुख भूमिका बजावतात. मोठ्या बँका परकीय चलन
व्यवसायदेखील करतात. पूर्वीची आयात यंत्रे व इतर आवश्यक उपकरणे सक्षम करण्यासाठी
स्थगित पेमेंट्स, देशांतर्गत औद्योगिक उपक्रम आणि परदेशी कंपन्यांमधील व्यवस्था
संपविण्यात मदत करतात.

३) बाजाराचा आकार :
बँका व्यापार आणि उद्योगांना बाजारपेठा विकसित करण्यासाठी कर्ज देऊन बाजाराचा
आकार वाढवतात.  सशक्त बँकिंग प्रणालीमुळे उद्योगांना त्यांचे कार्यक्षेत्र वाढविणे शक्य
आहे. व्यावसायिक बँका खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करतात.
वस्तू बॅंकेच्या हमीभावावर पुरवल्या जातात ज्यायोगे उद्योग आणि वाणिज्य यांना त्यांच्या
उत्पादनांसाठी बाजारपेठांचा विकास करणे आणि शोधणे शक्य  होते. बँका कर्ज देताना 
व्यापार जोखीम  पत्करतात. जेव्हा  उद्योगांची ही जोखीम बँकांमुळे नाहीशी होते तेव्हा
मोठ्या प्रमाणात बाजारपेठेतील अर्थव्यवस्था विकसित  होण्यास सुरुवात होते. 

४) संतुलित प्रादेशिक विकासाचे इंजिन: 


वाणिज्यिक बँका अर्थव्यवस्थेच्या निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये निधीचे योग्य वाटप करण्यास
मदत करतात. बँका प्रामुख्याने नफ्यासाठी काम करतात. जेव्हा बँक अधिक उत्पादक
वापरासाठी आपले कर्ज देते तेव्हा त्यांचा नफा अधिकाधिक होईल. शाखा बँकिंगचा परिचय
वेगवेगळ्या प्रदेशांमधून निवडणे शक्य करते. विकासाची क्षमता असणारा प्रदेश अधिक
बँक निधी आकर्षित करतो; परंतु अलीकडच्या वर्षांत, क्षेत्रीय विकासाकडे बँकांचा दृष्टिकोन
बदलत आहे. बँका आर्थिक विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा तयार करण्यात मदत Self-Instructional
करतात. अशा प्रकारे बँका ही देशातील संतुलित क्षेत्रीय विकासाची इंजिने आहेत. Material 119
बँकिंग पर्यावरण
५) शेती व शेती निगडीत कामांना अर्थसाहाय्य देणे:
वाणिज्य बँक शेतकऱ्यांना उत्पादकता आणि उत्पन्न वाढवण्यासाठी कर्ज देत.े
NOTES शेतकर्‍यांना उत्पादन वाढवण्यासाठी, शेतीचे आधुनिकीकरण व यांत्रिकीकरण, सिंचनाची
सुविधा पुरविणे व जमीन  सपाटीकरण, व पोत वाढवण्यासाठी  पैशांची आवश्यकता असते. 
शेतकरी अशा कामांसाठी बँकांकडून मध्यम ते दीर्घ मुदतीचे  कर्ज घेतात. 
पशुपालन, दुग्ध पालन, मेंढ्या पैदास, कुक्कुट पालन आणि फलोत्पादन या शेती
निगडित क्षेत्रांना बँक अर्थ पुरवठा करतात. 

६) लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी


लोकांचे राहणीमान हे त्यांच्या उपभोग घेण्याच्या पद्धतीवर मोजले जाते. गृहोपयोगी
वस्तू आणि इतर स्थावर मालमत्ता खरेदीसाठी बँका ग्राहकांना कर्ज देतात, ज्यामुळे लोकांचे
जीवनमान  उंचावते. मानवी भांडवल निर्मितीस उत्तेजन देण,े चलनविषयक धोरण तयार
करणे आणि प्रत्येक विकसनशील देशाच्या उद्योजकांना आर्थिक जीवनात व्यावसायिक
बँकांनी बजावलेल्या इतर काही भूमिका आहेत.

व्यापारी बँका: 
बँक ही एक संस्था आहे जी नफ्यासाठी काम करते. व्यापारी बँकेचे पारंपरिक कार्य
लोकांकडून ठेवी स्वीकारणे आणि अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्रांना पतपुरवठा  करणे 
असते. तथापि, आधुनिक अर्थव्यवस्थेची उत्क्रांती आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा अविभाज्य
भाग म्हणून बँकिंग व्यवस्थेच्या वाढीसह, व्यावसायिक बँकांच्या दृष्टिकोनात बदल झाला
आहे. या बँकांनी आपल्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बँकिंग सेवा प्रदान करण्यास सुरवात
केली आहे. तथापि, व्यावसायिक बँकिंगचे मूळ कार्य अपरिवर्तित राहिले. सुरुवातीच्या
काळात व्यावसायिक बँका नफा मिळविण्यासाठी संयुक्त स्टॉक कंपनी म्हणून काम करत
होत्या. पूर्वी बँक अल्प-मुदतीच्या, मध्यम मुदतीच्या कर्जाच्या  गरजा भागवत होत्या आणि
व्यापारी आणि उद्योगपतींना भांडवल  देत होत्या. अलीकडील दिवसांत बँका व्यापारी आणि
उद्योगपतींना दीर्घ मुदतीसाठी कर्ज देतात.
सर्वसाधारण बँकांच्या कार्याचे स्थूलमानाने
(१) प्राथमिक कार्ये आणि
(२) दुय्यम किंवा पूरक कार्ये, असे दोन विभाग पडतात :

व्यावसायिक बँकांची प्राथमिक कार्ये:


व्यावसायिक बँका करत असलेल्या विविध कार्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता
येईल:

१. ठेवी स्वीकारणे किंवा ठेवीदारांना ठेवी देण्यासाठी आकर्षित करणे :


बँका लोकांकडून पैशाच्या रूपात ठेवी स्वीकारतात. या ठेवी सुरक्षित ठेवून, मागणी
केल्यावर वा विशिष्ट मुदत संपल्यावर, ग्राहकाला परत देण्याची जबाबदारी बँक घेत.े
Self-Instructional यामुळे ग्राहकाचा पैसे सुरक्षित ठेवण्याचा प्रश्न सुटतो, तर बँकेजवळ अनेक ग्राहकांचा
Material 120 मिळून मोठा निधी ठेवींच्या स्वरूपात एकत्र होतो. या ठेवी निरनिराळ्या खात्यांवर जातात.
बँकिंग पर्यावरण
या खात्यांचे प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे आहेत.
व्यावसायिक बँका लोकांच्या बचतीचे पैसे गोळा करून ठेवी स्वीकारतात. या ठेवींचे
तीन प्रकार आहेत. NOTES

बचत ठेव : ज्यांच्याकडे वापर न होता पैसे पडून असतात त्यांच्यासाठी बचत खाते
तिजोरीसारखे काम करते. या खात्यातील रकमेवर नाममात्र व्याज मिळते आणि ठेवीदाराच्या
मागणीनुसार देय रकमेचा बयाणा करण्याचा अधिकार बँकांना असतो. प्रत्यक्षात ठरावीक
कालावधीत किती वेळा आणि प्रत्येक वेळी किती रक्कम काढता येईल यावर बँक निर्बंध/
मर्यादा घालते. ठेवीधारकास धनादेशाची सुविधाही दिली जाते.

ब) मागणी ठेव: मागणी ठेवी चालू खात्यात ठेवल्या जातात. ठेवीदाराच्या मागणीनुसार
रक्कम खात्यातून काढू शकतात; परंतु खातेदाराला देय रक्कम आणि रक्कम किती वेळा
काढणार ह्याची पूर्वसूचना द्यावी लागते. या खात्यातील रकमेवर व्याज मिळत नाही. उलट
या खात्याच्या देखभालीसाठी बँक शुल्क आकारते.

क) मुदत ठेवी: यांना टाइम डिपॉझिट/ वेळ ठेवी असेही म्हणतात. जमा केलेली
रक्कम नियोजित/ठरलेला कालावधी पूर्ण करण्याआधी काढली जाऊ शकत नाही. या
ठेवींवरच्या व्याजाचा दर नियोजित कालावधीच्या लांबीनुसार वेगवेगळा असतो.

२. कर्जे व अग्रिमे / आगाऊ रकमा देणे: कर्जे आणि आगाऊ रकमा (अॅडव्हान्स)
देण्यासाठी बँका अनेक मार्ग अवलंबतात. या प्रक्रियांमध्ये विविध प्रकार आहेत.

अ) पतकर्ज : बँक काही तारण घेऊन व्यक्ती किंवा कंपन्यांना कर्ज मंजूर करते.
कर्जाचे पैसे कर्जदाराच्या खात्यात जमा केले जातात आणि कर्जदार आवश्यकतेनुसार
रक्कम काढू शकतात. बँक कर्जदाराची पत /स्टॉक (समभाग) मूल्य असेल त्यानुसार
कर्जाच्या रकमेची मर्यादा ठरवते. हे मूल्य एका तऱ्हेने बँकरची मिळकत होते. कर्जदार
क्रेडिट लिमिट/ पत मर्यादेएवढी किंवा त्यापेक्षा कमी रक्कम काढू शकतो. बँक फक्त
काढलेल्या रकमेवरच व्याज आकारते.

अधिकर्ष सुविधांची तरतूद : या सुविधा प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह ग्राहकांकरता


उपलब्ध केल्या जातात. खात्यात पुरेशी शिल्लक नसली तरीही ग्राहक आवश्यक वेळी
धनादेश देऊ आणि पैसे काढू शकतो. ग्राहक फक्त अधिकर्ष काढलेल्या रकमेवरच
बँकेला व्याज देतात.

क) कसर घेऊन/सवलतीच्या दरात हुंड्या वटविणे: हे कार्य सामान्यत: तीन


महिन्यांकरिता व्यावसायिक कागदपत्रे, वचनपत्र नोट्स/प्रॉमिसरी नोट्स/ आणि हुंड्या
सवलतीत घेऊन केले जाते. हुंड्यांच्या दर्शनी किंमतीवर व्याज शुल्क व वसुली वजा
केल्यानंतर बँका शिल्लक रक्कम ग्राहकाला देतात. जेव्हा हुंडीची मुदत संपते, तेव्हा बँका
हुंडी लिहून देणाराकडून पैसे वसूल करतात. Self-Instructional
Material 121
बँकिंग पर्यावरण
३. पैसे किंवा पत निर्मिती: बँकेने मंजूर केलेल्या प्रत्येक कर्जामुळे ठेव तयार होते
कारण जेव्हा एखादी बँक एखाद्या ग्राहकाला कर्ज मंजूर करते, तेव्हा त्याच्या नावावर एक
NOTES खाते उघडले जाते आणि कर्जाची रक्कम त्याच्या खात्यात जमा केली जाते. आवश्यक
असेल तेव्हा कर्जदार पैसे काढतो. अशा ठेवींच्या निर्मितीमुळे अर्थव्यवस्थेच्या पैशाच्या
साठ्यात वाढ होते आणि या पैशाच्या व्यवहारांमुळे /देवघेवीमुळे नवीन पैशांची निर्मिती होते.

बँकांकडून होणारी पतनिर्मिती : बँका पैशाच्या स्वरूपात ठेवी स्वीकारतात.


साधारणतः या ठेवी ग्राहकाने मागणी केल्याबरोबर परत द्यावयाच्या असतात. असे
असूनदेखील बँका या ठेवींचा उपयोग इतरांना कर्ज देण्यासाठी करतात. याचे प्रमुख कारण
हे, की ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी सर्व ठेवी रोख पैशाच्या स्वरूपात स्वतःजवळ
ठेवण्याची बँकांना गरज भासत नाही. एकूण ठेवींच्या काही ठरावीक टक्के रक्कम रोख
ठेवून बँका ग्राहकांच्या परतफेडीच्या मागण्या पूर्ण करू शकतात व राहिलेली रक्कम
अर्जदारांना कर्जाऊ देऊन, त्यांच्यावर व्याज मिळवू शकतात. उदा., एखाद्या बँकेकडे रु.
१,०००.०० ची एकूण ठेव असेल आणि अनुभवाने फक्त १० टक्के म्हणजे रु. १००.००
रोख ठेवून जर ती बँक ग्राहकांच्या परतफेडीच्या मागण्या पुरवू शकत असेल, तर रु.
१,००० – रु. १०० = ९००रुपये अर्जदारांना कर्ज म्हणून देण्यासाठी बँक वापरू शकेल;
परंतु हा व्यवहार येथेच थांबत नाही. बँकेकडून कर्ज घेणारा इसम हा साधारणतः कर्जाची
सर्व रक्कम एकदम उचलून नेत नाही. बँकेला आपल्या नावाने खाते उघडण्याची तो विनंती
करतो व कर्ज म्हणून मंजूर झालेली रक्कम त्या खात्यात जमा करतो. त्यानंतर जरूर पडेल
त्याप्रमाणे तो बँकेतून पैसे काढतो. म्हणजे बँकेने दिलेल्या कर्जामुळे ठेवी निर्माण होतात,
असे म्हणणे फारसे वावगे ठरणार नाही. आता या ठेवीला रोख निधी ठेवण्याचा तोच नियम
लागतो. म्हणजे रु. ९००.०० पैकी बँक फक्त रु. ९०.०० स्वतःजवळ ठेवून बाकीचे पैसे
म्हणजे रु. ९००.०० – रु. ९० = रु. ८१०.०० फक्त इतर अर्जदारांना कर्जाऊ देऊ शकते.
त्यांतून परत ठेव आणि परत रोखीचे प्रमाण, अशा तऱ्हेने रोख रकमेच्या ठेवींच्या कित्येक
पट बँक पतपैसा निर्माण करू शकते. आपल्या उदाहरणात १० टक्के हे रोख रकमेचे ठेवीशी
प्रमाण गृहीत धरल्यामुळे मूळ ठेवींच्या १० पट म्हणजे रु. १०,०००.०० पर्यंत बँक कर्जाऊ
रकमा देऊ शकते. म्हणजेच रु. १०,००० – रु. १,००० = रु. ९,०००.०० हा बँकेने
आपल्या कर्ज देण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे निर्माण केलेला पतपैसा आहे. रोख रकमेचे
ठेवीशी प्रमाण वेगळे असेल, तर त्याप्रमाणे पतपैशाच्या निर्मितीत बदल होईल.
अशा तऱ्हेने बँका पतनिर्मिती करतात आणि बँकांनी निर्माण केलेला पैसा, मुळातील
रोख रकमेच्या कितीतरी अधिक पट असू शकतो. अर्थात बँकेच्या पतनिर्मितीवरही काही
मर्यादा आहेत, त्या पुढीलप्रमाणे : (१) बँकांची पतनिर्मिती ही रोख रकमेच्या मूळ ठेवीवर
अवलंबून असते. साहजिकच देशात व्यवहारात असलेला एकूण रोख पैसा, ही बँकांच्या
पतनिर्मितीवरील महत्त्वाची मर्यादा आहे. (२) देशातील व्यक्तींना वा संस्थांना किती पैसा
रोख स्वरूपात स्वतःजवळ ठेवण्याची सवय आहे, तिच्यावर बँकांची पतनिर्मिती अवलंबून
असते. जर त्यांना जास्त पैसा रोख स्वरूपात जवळ ठेवण्याची सवय असेल, तर तितक्या
प्रमाणात पतनिर्मिती कमी होईल. (३) बव्हंशी प्रत्येक देशात बँकांवर कायद्याने काही निर्बंध
घातलेले असतात. उदा., एकूण ठेवींपैकी काही ठरावीक टक्के रक्कम मध्यवर्ती बँकेकडे
Self-Instructional प्रत्येक बँकेने ठेवलीच पाहिजे असे बंधन असते, यामुळे बँकांच्या पतनिर्मितीवर मर्यादा
Material 122 येतात. (४) कर्जदारांनी बँकेकडे कर्ज मागितले, तरच बँक पत-निर्मिती करू शकते. तेव्हा
बँकिंग पर्यावरण
कर्जाच्या मागणीवरही पतनिर्मिती अवलंबून असते.

४) दुय्यम किंवा पूरक कार्ये: बँका करत असलेली इतर काही महत्त्वाची कार्ये NOTES
पुढीलप्रमाणे आहेत -

अ) निधी हस्तांतरण: आधुनिक काळात व्यापार आणि व्यवसायाच्या प्रक्रिया


गुंतागुंतीच्या झाल्या आहेत. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी निधी हस्तांतरित
करणे कठीण जाते. बँका धनादेश, बँक ड्राफ्ट आणि पे ऑर्डर, प्रवासी धनादेश इत्यादी
विविध पत साधनांचा उपयोग करून ही अडचण दूर करण्यास मदत करतात. बँकांद्वारा
कार्यक्षमतेने केल्या जाणाऱ्या या प्रक्रियेस ‘क्लिअरिंग/समाशोधन’ असे म्हणतात.

ब) प्रतिनिधीची कार्ये: व्यावसायिक बँका त्यांच्या ग्राहकांसाठी आर्थिक प्रतिनिधी


म्हणून काम करतात. त्या त्यांच्या ग्राहकांच्या वतीने विम्याचे हप्ते, निवृत्ती वेतन तसेच
लाभांशाची वसुली किंवा भांडवलाची मागणी इत्यादी सर्व प्रकारची देयके देतात. तसेच त्या
आपल्या ग्राहकांच्या वतीने सोने, चांदी आणि सिक्युरिटीज खरेदी करतात आणि विकतात.

क) सामान्य ग्राहकोपयोगी सेवा: व्यावसायिक बँका सामान्यतः काही ग्राहकोपयोगी


सेवा देतात –
i) ग्राहकांच्या मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षिततेसाठी सेफ्टी लॉकर/तिजोरी प्रदान करणे.
ii) ग्राहकांना पतपत्र जारी करणे.
iii) सार्वजनिक संस्था आणि महामंडळांद्वारे हमीवर कर्ज उभारणी करणे.
iv) व्यापार, वाणिज्य आणि उद्योगाशी संबंधित आकडेवारी आणि माहिती संकलित
करणे.
अशा प्रकारे, व्यावसायिक बँका समुदायाला बहुमोल सेवा देतात. विकसित बँकिंग
प्रणाली म्हणजे औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीची हमी होय. ही प्रगत आर्थिक समाजाची
जीवनरेखा आहे. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये व्यावसायिक बँकिंगचे वर्णन
‘विकास बँकिंग’ म्हणून केले जाऊ शकते. प्राधान्य असलेली क्षेत्रे, कमकुवत विभाग आणि
रोजगारनिर्मिती योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात बँका महत्त्वपूर्ण विकासात्मक
भूमिका बजावतात.

मध्यवर्ती/ केंद्रीय बँका


बँकांची कार्ये निर्देशित करण्यासाठी एखादी सर्वोच्च संस्था असेल तरच देशातील
बँकिंग व्यवस्था सर्व घटकांचा समन्वय साधून पद्धतशीरपणे कार्य करू शकते. अशी शिखर
संस्था ‘मध्यवर्ती बँक’ म्हणून ओळखली जाते. देशाची मध्यवर्ती बँक ही एक स्वायत्त
संस्था असते. तिच्यावर नियंत्रण व देखरेखीचे अधिकार सोपवले जातात. ती देशातील
आर्थिक आणि बँकिंग प्रणालीचे नियंत्रण करते. दुसऱ्या महायुद्धानंतर सन १९२९ मध्ये
ब्रसेल्स येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेने प्रत्येक देशात बँक स्थापन करण्याची
शिफारस केली होती. इंग्लंडची मध्यवर्ती बँक म्हणजेच बँक ऑफ इंग्लंड १६९४ मध्ये Self-Instructional
Material 123
बँकिंग पर्यावरण
स्थापन झाली. या बँकेने मध्यवर्ती बँकिंगच्या कल्पनेचा पाया घातला म्हणून तिला 'मध्यवर्ती
बँकांची जननी' म्हणून ओळखले जाते. फ्रान्सच्या ‘बँक ऑफ फ्रान्स’ नावाच्या मध्यवर्ती
NOTES बँकेची स्थापना सन १८०० मध्ये झाली. अमेरिकेत फेडरल रिझर्व्ह बँकांच्या स्वरूपात सन
१९१४ मध्ये मध्यवर्ती बँकिंग प्रणालीची स्थापना झाली.
आधुनिक बँकिंगची सुरूवात भारतात सतराव्या शतकात झाली. ईस्ट इंडिया कंपनीच्या
काही अधिकाऱ्यांनी बँका सुरू केल्या व काही काळ चालविल्या. एकोणिसाव्या शतकाच्या
सुरूवातीला तीन इलाखा बँका (प्रेसिडेन्सी बँका) अस्तित्वात आल्या व आधुनिक बँकिंग
व्यवसायाला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. भारतीय बँकिंग क्षेत्रात १९२० साली एक
महत्त्वाची घटना घडली. सन १९२० मध्ये बँक ऑफ बाँबे, बँक ऑफ कलकत्ता आणि
बँक ऑफ मद्रास या तीन प्रेसिडेन्सी बँकांचे एकत्रीकरण करून ‘इंपीरिअल बँक ऑफ
इंडिया’ची स्थापना करावी, असा कायदा संमत झाला. १९२१ मध्ये इंपीरिअल बँकेच्या
कार्यास सुरूवात झाली. १९२१ ते १९३५ पर्यंत, म्हणजेच रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपर्यंत,
इंपीरिअल बँक मध्यवर्ती बँकेचीही काही कार्ये करीत होती. १९२६ मध्ये सरकारने सर
हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली रॉयल कमिशन ऑफ इंडिया करन्सी अँड फायनान्स
स्थापन केले. परंतु सरकार व विधिमंडळ यांच्यातील मतभेदांमुळे मध्यवर्ती बँक अस्तित्वात
आली नाही. १९३१ मध्ये सेंट्रल बँक इन्क्वायरी कमिटीने रिझर्व बँक स्थापन करण्याची
शिफारस केली. त्यानुसार १९३१ मध्ये विधिमंडळात रिझर्व बँक ऑफ इंडिया ऍक्ट संमत
झाला. १ एप्रिल १९३५ पासून रिझर्व बँक ऑफ इंडिया स्थापना झाली.

मध्यवर्ती बँकेची व्याख्या:

मध्यवर्ती बँकेची व्याख्या तिच्या कार्यानुसार केली गेली आहे. अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या
काही व्याख्या खाली दिल्या आहेत.

स्मिथच्या मते, “मध्यवर्ती बँकिंगची प्राथमिक व्याख्या म्हणजे या बँकिंग प्रणालीमध्ये


चलनी नोटा काढण्यावर एकाच बँकेचे संपूर्ण नियंत्रण किंवा अवशिष्ट मक्तेदारी असते.”

एच.ए. शॉ यांनी केलेली मध्यवर्ती बँकेची परिभाषा अशी आहे : “बँक म्हणून जी
पतनियंत्रण करते ती मध्यवर्ती बँक. "
हॉट्रेच्या शब्दांत, “मध्यवर्ती बँक म्हणजे कर्ज मिळवण्याचा शेवटचा उपाय / अंतिम
सावकार /धनको.”

सॅम्युएल्सनच्या म्हणण्यानुसार, “मध्यवर्ती बँक म्हणजे बँकर्सची बँक. आर्थिक आधार


नियंत्रित करणे आणि उच्च-शक्तीच्या पैशावर अंकुश ठेवून समुदायाचा चलन पुरवठा
नियंत्रित करणे हे तिचे कर्तव्य आहे.”

Self-Instructional
Material 124
बँकिंग पर्यावरण
मध्यवर्ती बँक आणि व्यावसायिक बँकातील फरक :

खालील बाबींमध्ये मध्यवर्ती बँक व व्यावसायिक बँकांमध्ये मूलभूत फरक आहेत. NOTES
१. मध्यवर्ती बँक ही देशातील आर्थिक आणि बँकिंग प्रणालीची सर्वोच्च संस्था आहे.
व्यावसायिक बँक ही केवळ बँकिंग प्रणालीची घटक असते आणि ती मध्यवर्ती बँकेच्या
अधीन असते.

२. चलनी नोटा काढण्याची मक्तेदारी मध्यवर्ती बँकेकडे असते. व्यावसायिक बँकांना


हा अधिकार नाही.

३. मध्यवर्ती बँक नफा मिळवणारी संस्था नाही. सरकारच्या सर्वसाधारण आर्थिक


धोरणाला प्रोत्साहन देणे हे तिचे उद्दिष्ट आहे; परंतु, व्यावसायिक बँकांचे प्राथमिक उद्दिष्ट
त्यांच्या भागधारकांकरता नफा मिळवणे हे असते.

४. मध्यवर्ती बँक देशातील परकीय चलन साठ्यावर देखरेख करते. व्यावसायिक बँका
केवळ मध्यवर्ती बँकेच्या निर्देशानुसार परकीय चलन व्यवहार करतात.

५. मध्यवर्ती बँक हे सरकारचेच एक अंग आहे आणि ही बँक सरकारचे बँकर आणि
आर्थिक सल्लागार म्हणून काम करते, तर व्यावसायिक बँका केवळ सामान्य लोकांसाठी
सल्लागार आणि बँकर्स म्हणून काम करतात.

मध्यवर्ती बँकेची कार्ये :


जगभरात मध्यवर्ती बँकेची प्रमुख कार्ये सारखीच असतात; परंतु ध्येयधोरणांचा आशय
व आवाका देशपरत्वे तसेच त्या त्या देशाच्या आर्थिक स्थितीनुसार कालपरत्वेही बदलतो.
सहसा सर्व मध्यवर्ती बँकांचे ध्येय उच्च वृद्धिदरासहित आर्थिक स्थैर्य मिळवणे आणि
पैशाच्या योग्य व्यवस्थापनातून अनुकूल बाह्य/परदेशी देय स्थिती प्राप्त करणे हे असते.
मध्यवर्ती बँक पार पाडीत असलेल्या सर्वसामान्य कार्यांविषयी खाली विवेचन केले आहे.

१. चलन नियामक:
चलनी नोटा काढणे हे मध्यवर्ती बँकेचे सर्वांत महत्त्वाचे कार्य आहे. मध्यवर्ती बँकेला
व्यवहारात वापरासाठी वैध चलन म्हणजेच चलनी नोटा व नाणी काढण्याचा अधिकार
आहे. मध्यवर्ती बँकेच्या इश्यू /जारीकर्ता विभागावर व्यावसायिक बँकांना चलनी नोटा व
नाणी यांचा पुरवठा करण्याची जबाबदारी असते. देशातील आर्थिक परिस्थितीचा विचार
करून मध्यवर्ती बँक पट व चलन नियंत्रित करते. नोटा जारी करण्याच्या पद्धतीनुसार
मध्यवर्ती बँकेला जारी केलेल्या चलनाच्या किमतीच्या प्रमाणात विशिष्ट रक्कम किंवा
निश्चित किंमतीचे ई -सोने आणि परकीय चलन यांचा साठा ठेवावा लागतो. भारतीय
रिझर्व्ह बँकेला ११५ करोड रुपये किमतीचे सोने आणि ८५ करोड रुपये किमतीचे परकीय
चलन राखीव ठेवावे लागते; पण नोटा काढण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.
नोटांच्या प्रचालनाची मक्तेदारी असल्याने मध्यवर्ती बँकेला होणारे फायदे पुढीलप्रमाणे: Self-Instructional
Material 125
बँकिंग पर्यावरण
जारी केलेल्या नोटा एकसारख्या असतात आणि पैशाच्या पुरवठ्यावर योग्य नियंत्रण
ठेवता येते.
NOTES आर्थिक प्रणालीमध्ये स्थिरता आणणे आणि लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे.
सरकारला चलनाच्या मुद्रणातून नफा मिळतो.

२. सरकारी बँकर, प्रतिनिधी व सल्लागार :


मध्यवर्ती बँक सरकार / शासनाकरता बँकर, आर्थिक प्रतिनिधी व सल्लागार म्हणून
काम पहाते. बँकर म्हणून ती केंद्र व राज्य सरकारच्या ठेवी ठेवते आणि सरकारांच्या वतीने
देय देते. ती सरकारच्या वतीने परदेशी चलन खरेदी करते आणि विकते. तसेच देशातील
सोन्याचा राखीव साठा ठेवते. वित्तीय म्हणून मध्यवर्ती बँक ९० दिवसांपेक्षा कमी
कालावधीसाठी सरकारला अल्प-मुदतीचे कर्ज देते व राज्य सरकार आणि स्थानिक संस्था
यांना कर्जे आणि अग्रिमे देते. ती सरकारच्या वतीने संपूर्ण सार्वजनिक कर्जाचे व्यवस्थापन
करते. ही बँक सल्लागार म्हणून अवमूल्यन, परकीय चलन धोरण आणि अर्थसंकल्पीय
धोरण यांसारख्या महत्त्वपूर्ण आर्थिक आणि वित्तीय समस्यांसाठी सरकारला उपयुक्त सल्ला
देते.

३. व्यावसायिक बँकांच्या रोख राखीव ठेवीचे संरक्षक :


व्यावसायिक बँकांना रोख ठेवीची काही टक्के रक्कम मध्यवर्ती बँकेकडे ठेवणे
आवश्यक आहे. या ठेवीच्या आधारे, धनादेशांचे समाशोधन सुलभ करण्यासाठी मध्यवर्ती
बँक एका बँकेतून दुसर्‍या बँकेत निधी हस्तांतरित करते.

४. परकीय चलन साठ्याचे संरक्षक व व्यवस्थापन:


मध्यवर्ती बँक देशाचे परकीय चलनाचा साठा ठेवते आणि त्याचे व्यवस्थापन करते.
परदेशी चलनांच्या विनिमयासाठीचा स्थानिक चलनाचा दर ही बँक निश्चित करते. परकीय
चलनाच्या दरामध्ये चढउतार होत असल्यास, विनिमय दराची अस्थिरता कमीत कमी
राखण्यासाठी बँक परकीय चलनाची खरेदी अथवा विक्री करते.

५. अंतिम सावकार/ कर्जदाता:


देशाची आर्थिक संरचना कोसळण्यापासून वाचवण्यासाठी मध्यवर्ती बँक व्यावसायिक
बँका, बिल दलाल आणि त्यांच्या वित्तीय संस्थांना पुन्हा सूट आणि दुय्यम अग्रिमे या
स्वरूपात मदत करून अंतिम कर्जदाता (लेंडर ऑफ द लास्ट रिझॉर्ट) म्हणून काम करते.
मध्यवर्ती बँक अशा संस्थांना त्यांच्या कठीण परिस्थितीत मदत करण्यासाठी कर्ज देते.

६. समाशोधनाचे कार्य:
मध्यवर्ती बँक इतर बँकांसाठी समाशोधनालय / ‘क्लिअरिंग हाऊस’ म्हणून काम करते
आणि परस्पर दायित्व समाशोधन प्रणालीद्वारे निकाली काढले जाते. मध्यवर्ती बँकेकडे
व्यावसायिक बँकांचे रोकड साठे असल्याने मध्यवर्ती बँकेला ‘क्लिअरिंग हाऊस’ म्हणून
काम करणे सोपे जाते.
Self-Instructional
Material 126 ७. पत-नियंत्रक:
बँकिंग पर्यावरण
अर्थव्यवस्थेमधील चलनघट आणि चलनवाढीचा दबाव नियंत्रित करण्यासाठी मध्यवर्ती
बँकांचे महत्त्वपूर्ण काम म्हणजे व्यावसायिक बँकांचे पत-निर्मिती करण्याचे सामर्थ्य नियंत्रित
करणे. यासाठी, मध्यवर्ती बँक संख्यात्मक किंवा परिमाणात्मक पद्धती आणि गुणात्मक NOTES
(निवडक) पद्धतींचा अवलंब करते. परिमाणात्मक पद्धतींचे उद्दिष्ट पत-किंमत आणि पत-
प्रमाण नियंत्रित करणे हे आहे. यासाठी पुढील पद्धती वापरल्या जातात: i)मध्यवर्ती बँकेचा
दर, ii)खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी-विक्री आणि iii) राखीव रोख निधीच्या
प्रमाणात बदल. गुणात्मक पद्धती पत वापर आणि दिशा नियंत्रित करतात. यात i) तारण-
सीमांच्या आवश्यकतांचे नियमन ii) ग्राहकपत नियमन, iii) पतवाटप करणे, iv)
मध्यवर्ती बँकेद्वारे थेट कारवाई करणे आणि v) नैतिक प्रभाव टाकणे, यांचा समावेश होतो.

वरील कार्यांखेरीज, मध्यवर्ती बँक अनेक अतिरिक्त कार्ये करते. बँकेला I) पत, ii)
किंमतीच्या पातळीतील चढउतार iii) परकीय चलन मूल्यातील चढउतार यासंबंधीच्या सर्व
समस्यांचा अभ्यास करावा लागतो. तसेच ती आर्थिक आकडेवारी गोळा करणे, संशोधन
करणे आणि माहिती देणे ही कामेही करते. मध्यवर्ती बँक आंतरराष्ट्रीय नाणे निधी
(आयएमएफ) आणि जागतिक बँकेशी संबंधित बाबी हाताळते. एकंदरीत मध्यवर्ती बँक
देशाची आर्थिक संरक्षक आहे.

नवीन खाजगी बँका


खाजगी क्षेत्रातील बँकिंग प्रक्रियेत सरकारी मालकीच्या वित्तीय संस्थांऐवजी प्रामुख्याने
व्यक्ती किंवा खाजगी व्यवसाय संस्था यांच्या मालकीच्या व ते चालवत असलेल्या वित्तीय
संस्था समाविष्ट असतात. याउलट सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग उपक्रम सरकारी मालकीचे
असतात व त्यांच्या संचलनात शासनाचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे सहभाग असतो. मुक्त
उद्योगाला प्राधान्य देणाऱ्या देशांमध्ये खाजगी क्षेत्रातील बँकिंग जास्त प्रमाणात उपलब्ध
असते. जरी खाजगी क्षेत्रातील बँका आणि इतर वित्तीय संस्थांवर शासनाचे थेट नियंत्रण
नसले तरी त्यांना बँकिंग क्षेत्राला लागू असणाऱ्या सरकारी नियमांचे पालन करावे लागते.
सन १९९१ मधील आर्थिक आणि वित्तीय क्षेत्रातील सुधारणा लागू केल्यानंतरच्या
काळात अस्तित्वात आलेल्या बँकांना ‘नवीन खासगी क्षेत्रातील बँका’ म्हणतात. त्यानंतर
१९९३मध्ये बँकिंग नियमन कायद्यात बदल करण्यात आले व भारतीय बँकिंग क्षेत्रात नवीन
खासगी क्षेत्रातील बँकांना प्रवेश देण्यात आला. तथापि, नवीन खासगी क्षेत्रातील बँकांच्या
स्थापनेसाठी काही निकष निश्चित केले गेले होते, त्यातील काही निकष असे:

१. बँकेचे किमान निव्वळ मूल्य २०० करोड रुपये असले पाहिजे.


२. बँक प्रवर्तकांचा भरणा झालेल्या भांडवलातील हिस्सा किमान २५ टक्के असायला
हवा.
३. स्थापनेपासून/काम सुरू केल्यापासून तीन वर्षांच्या काळात बँकेने समभाग
लोकांसाठी खुले करायला हवे व त्यांचे मूल्य ३०० करोडपर्यंत वाढले पाहिजे.

भारतातील नवीन खाजगी बँकांची यादी: Self-Instructional


१. बँक ऑफ पंजाब मर्यादित (सेंचुरियन बँकेत विलीनीकरण) Material 127
बँकिंग पर्यावरण
२. सेंचुरियन बँक ऑफ पंजाब (एचडीएफसी बँकेत विलीनीकरण)
३. डेव्हलपमेंट क्रेडिट बँक
NOTES ४. एचडीएफसी बँक मर्यादित
५. आयसीआयसीआय बँक मर्यादित
६. इंडसइंड बँक मर्यादित
७. कोटक महिंद्रा बँक मर्यादित
८. अॅक्सिस बँक (पूर्वीची युटीआय बँक)
९. यस (वायइएस) बँक मर्यादित’

रिझर्व बँकेने २००५ साली भारतात परदेशी बँकांच्या कार्यरत असण्यासाठी दिशानिर्देशक
धोरण जाहीर केले. यात भारतातील बँकिंग क्षेत्रातील स्थैर्य आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या
उद्देशाने दोन मार्ग व क्रमाक्रमाने /टप्प्याटप्प्याने प्रगतीचे धोरण आखण्यात आले आहे.
यापैकी एक मार्ग म्हणजे खाजगी व सार्वजनिक या दोन्ही क्षेत्रांत देशी बँकिंग प्रणालीचे
विलिनीकरण/एकत्रीकरण आणि दुसरा मार्ग म्हणजे परदेशी बँकांची टप्प्याटप्प्याने व
समक्रमित/ समान गतीने होणारी वाढ. हे धोरण दोन टप्प्यांत विभागलेले होते. पहिला टप्पा
मार्च २००५ ते मार्च २००९ या कालावधीसाठी होता. या पहिल्या टप्प्यात मिळालेल्या
अनुभवाचा आढावा घेतल्यानंतर दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करायची होती; परंतु जेव्हा
पहिल्या टप्प्यात मिळालेल्या अनुभवाचा आढावा घेण्याची वेळ आली तेव्हा जागतिक
वित्तीय बाजारात उलथापालथ घडत होती आणि जगभरातल्या बँकांच्या आर्थिक
सामर्थ्याबाबत साशंकता होती. त्या वेळी परदेशी बँकांबाबतचे तत्कालीन धोरण व प्रक्रिया
पुढे चालू ठेवणेच योग्य असे ठरवण्यात आले.
मार्च २०१३ पर्यंत २६ देशांतील ४३ परदेशी बँका, ‘शाखा’ या स्वरूपात कार्यरत
आहेत, तर २२ देशांतील ४६ परदेशी बँकांची प्रातिनिधिक कार्यालये भारतात आहेत.
विभेदक/ विशिष्ट सेवा पुरवण्यासाठी वेगवेगळे परवाने देण्याबाबतची चर्चा अजूनही
अगदीच नवीन असली तरी मर्यादित बँकिंग परवान्यासह क्रेडिट कार्ड जारीकर्ता म्हणून एक
परदेशी बँक अस्तित्वात आहे. याखेरीज बऱ्याच परदेशी बँकांनी देशात बँकेतर वित्तीय
संस्था (एनएफबीसी) म्हणून शिरकाव केला आहे व अनेक बँकांनी सेवा वितरण केंद्रे
(कॅप्टिव्ह सेंटर्स) उभारली आहेत. प्रातिनिधिक कार्यालये म्हणून भारतात कार्यरत असलेल्या
परदेशी बँका बरेचदा स्थानिक बँकांमध्ये प्रतिनिधी बँक या नात्याने काम करतात. यामुळे
परदेशी बँकांना भारतीय उद्योगसंस्थांना व वित्तीय संस्थांना परदेशी चलनात कर्जे देण्याची
संधी देणारा उपयुक्त मंच/प्लॅटफॉर्म प्राप्त होतो. एकूण बँक-शाखांच्या तुलनेत परदेशी
बँकांच्या शाखांचे प्रमाण एक टक्क्याहूनही कमी असले तरी त्यांच्या बँकिंग क्षेत्रातील
संपत्तीचे प्रमाण जवळपास ७ टक्के आणि नफ्याचे प्रमाण तब्बल ११ टक्के आहे.
शाखा म्हणून भारतात उपस्थित असलेल्या परदेशी बँकिंग समूहांनीही विशेष सेवा
देण्यासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करण्यासाठी या संधीचा वापर केला. यामुळे वित्तीय
महागात (काँग्लोमरेट) किंवा मोठ्या फ्रेंचाइजीची स्थापना झाली. शाखांचे नेटवर्क
वाढवण्यासंबंधीच्या लवचिकतेच्या अभावी बँकेतर वित्तीय संस्थांनीसुद्धा किरकोळ ग्राहकांना
लक्ष्य करणाऱ्या परदेशी बँकांना त्यांच्या कामासाठी आवश्यक असा आवाका/ व्याप्ती
Self-Instructional वाढवण्याची संधी निर्माण केली.
Material 128 परदेशी बँका बाजारातील विशिष्ट गरजा ओळखण्यासाठी, उत्पादने तयार करण्यात
बँकिंग पर्यावरण
आणि संघटनात्मक बांधकामे विकसित करण्यात नावीन्यपूर्ण मार्ग चोखाळतात. याचे उत्तम
उदाहरण म्हणजे १९९० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात भारतीय बाजारपेठेची विशिष्ट
समस्या असलेली रोख संकलन आणि चेक वटविण्याच्या प्रक्रियेतील अकार्यक्षमता लक्षात NOTES
घेऊन सादर केलेली रोख व्यवस्थापन योजना. सिटी कॅश आणि सिटी चेक ही उत्पादने
यावरच आधारित होती. अधिक महत्त्वाची बाब ही, की या बँकांकडे भारतीय बाजरामधील
उणिवांवर उपाय शोधण्यासाठी एक खास विभाग होता. भारतात यशस्वी झालेली उत्पादने
इतर उगवत्या/ उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये प्रविष्ट केली जात. प्रतिभूतता (सेक्युरिटायझेशन),
परदेशी चलन डेरीव्हेटीव्हज, ट्रॅव्हलर्स चेक्स, शृंखलाबद्ध वित्तपुरवठा आणि क्रेडिट
स्कोअरकार्ड अशी याची अनेक उदाहरणे आहेत.
या बँकांनी अनेकदा त्यांच्या देशांतील जोखीम व्यवस्थापन पद्धती लागू केल्या.
त्याचप्रमाणे कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी, विकासाची/आर्थिक धोरणांची शाश्वतता आणि
वारसा इमारती, स्थानिक कला व हस्तकलांचे संरक्षण इत्यादी मुद्द्यांवर पुढाकार घेतला.
या संदर्भातील त्या बँकांच्या योगदानातून स्थानिक सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा
भाग होण्यासाठी पावले उचलली गेली.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑगस्ट २०१५ मध्ये ११ संस्थांना पेमेंट बँका, तर सप्टेंबर
२०१५ मध्ये १० संस्थांना लघु वित्त बँका (एसएफबी) स्थापन करण्यास परवानगी दिली
आहे. या बँका लोकसंख्येच्या विशिष्ट गटाच्या गरजांवर वर लक्ष केंद्रित करून त्यानुसार
सेवा पुरवतात.
लघु वित्त बँका स्थापन करण्याचे उद्दिष्ट वित्तीय समावेश वाढवणे हे असेल. याकरता
(१) बचतीच्या माध्यमांची (सेव्हिंग व्हेइकल्स) तरतूद (२) छोटे व्यवसायिक, लहान आणि
सीमांत शेतकरी; सूक्ष्म आणि लघु उद्योग तसेच इतर असंघटित क्षेत्रातील संस्था यांना उच्च
तंत्रज्ञान-कमी खर्चाच्या कार्यप्रणालीतून पतपुरवठा करण्याची तरतूद केली जाईल.
नचिकेत मोर समितीने आर्थिक समावेशाबाबत एसएफबीची शिफारस केली होती.

एसएफबीच्या क्रियाकलापांची व्याप्ती:


लघु वित्त बँका प्रामुख्याने मूलभूत बँकिंग उपक्रम राबवू शकतील. यात ठेवी स्वीकारणे
आणि लहान व्यावसायिक घटक, लहान आणि सीमांत शेतकरी, सूक्ष्म आणि लघु उद्योग
आणि असंघटित क्षेत्रातील घटकांना कर्ज देण्याचा समावेश आहे.
लघु वित्त बँकांच्या कामकाजाच्या क्षेत्रात कोणतेही बंधन येणार नाही.

लघु वित्त बँक (एसएफबी) स्थापन करण्यासाठीचे निकष:


वित्त क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्ती / व्यवसाय, बँकेतर वित्त कंपन्या
(एनबीएफसी), सूक्ष्म वित्त कंपन्या, स्थानिक क्षेत्रातील बँका एसएफबी स्थापन करण्यास
पात्र आहेत.
लघु वित्त बँकांसाठी किमान भरणा केलेले भांडवल रु. १०० करोड असायला हवे.
अशा बँकेच्या भरणा केलेल्या भांडवलामध्ये प्रवर्तकांचे किमान प्रारंभिक योगदान
कमीत कमी ४० टक्के असेल आणि बँकेचा व्यवसाय सुरू होण्याच्या तारखेपासून १२

Self-Instructional
Material 129
बँकिंग पर्यावरण
वर्षांच्या आत हळूहळू ते २६ टक्क्यांपर्यंत खाली आणले जाईल.
लघु वित्त बँकेत परदेशी भागभांडवल खासगी क्षेत्रातील बँकांच्या थेट परकीय
NOTES गुंतवणुकीच्या (एफडीआय) धोरणानुसार (वेळोवेळी केल्या जाणाऱ्या सुधारणांप्रमाणे)
असेल.
लघु वित्त बँकांना समयोजित निव्वळ बँक कर्जापैकी (एएनबीसी) ७५ टक्के कर्जवाटप
प्राधान्य क्षेत्र कर्जपुरवठा (पीएसएल) म्हणून वर्गीकरणासाठी रिझर्व्ह बँकेने पात्र ठरवलेल्या
क्षेत्रांत करणे आवश्यक आहे.
लघु वित्त बँकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निकषानुसार रोख राखीव प्रमाण
(सीआरआर) आणि वैधानिक चलनि‍धी प्रमाण (एसएलआर) राखणे आवश्यक आहे.
त्याच्या कर्जाच्या पोर्टफोलिओच्या कमीतकमी ५० टक्के कर्जे आणि अग्रिमे रु. २५
लाख असणे आवश्यक आहे.

लघु वित्त बँका काय करू शकतात?


• ग्राहकांसाठी परकीय चलन विक्री.
• म्युच्युअल फंड, विमा आणि पेन्शनची विक्री.
• एका पूर्ण बँकेत रूपांतरित होऊ शकते.
• लघु वित्त बँका काय करू शकत नाहीत?
• मोठ्या कर्जांना मुदतवाढ देणे.
• साहाय्यक कंपन्या तयार करू शकत नाहीत आणि अत्याधुनिक उत्पादनांमध्ये
व्यवहार करू शकत नाहीत.

पेमेंट बँका
पेमेंट बँक स्थापन करण्याचे उद्दिष्ट वित्तीय समावेश वाढवणे हे असेल. यासाठी पुढील
सेवा प्रदान केल्या जातील: (१) छोटी बचत खाती (२) स्थलांतरित कामगार कामगार,
कमी उत्पन्न असणारी कुटुंब,े लहान व्यवसाय, इतर असंघटित क्षेत्रातील संस्था आणि इतर
वापरकर्त्यांसाठी पेमेंट / रेमिटन्स सेवा.
त्या ग्राहकांना कर्ज देणार नाहीत आणि त्यांचा निधी सरकारी कागदपत्रांमध्ये आणि बँक
ठेवींमध्ये जमा करावा लागेल.

उपक्रमांची व्याप्ती
मागणी ठेवी (डिमांड डिपॉझिट)ची स्वीकृती- पेमेंट्स बँकेत सुरुवातीला वैयक्तिक
ग्राहक जास्तीत जास्त १००,००० रुपयांचा निधी खात्यात ठेवू शकतील.
एटीएम / डेबिट कार्ड जारी करणे - पेमेंट्स बँका क्रेडिट कार्ड जारी करू शकत
नाहीत.
विविध मार्गांद्वारे देयके आणि पैसे पाठविणे.
दुसर्‍या बँकेचे व्यवसाय प्रतिनिधी (बीसी) म्हणून काम करणे. (बीसीसंबंधी रिझर्व्ह
बँकेच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुसार)
Self-Instructional म्युच्युअल फंड युनिट्स आणि विमा उत्पादने इत्यादी साध्या आर्थिक उत्पादनांचे
Material 130 विना-जोखीम वितरण.
बँकिंग पर्यावरण
पेमेंट्स बँक कर्ज देऊ शकत नाही.

पेमेंट बँका स्थापनेचे निकष NOTES


विद्यमान नॉन-बँक प्री-पेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) जारीकर्ता; आणि इतर घटक
जसे की व्यक्ती / व्यावसायिक; बानेत्र वित्त संस्था (एनबीएफसी), कॉर्पोरेट व्यवसाय
प्रतिनिधी (बीसी), मोबाईल टेलिफोन कंपन्या, सुपरमार्केट चेन, कंपन्या, रहिवाशांच्या
मालकीच्या आणि त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या वास्तविक क्षेत्र सहकारी संस्था आणि
सार्वजनिक क्षेत्रातील संस्था पेमेंट्स बँक स्थापित करण्यासाठी अर्ज करू शकतात.
पेमेंट्स बँका स्थापन करण्याची पात्रता म्हणजे प्रवर्तक / प्रवर्तकांचे गट व्यावसायिक
अनुभवाचा विश्वासार्ह पूर्वेतिहास असलेले ‘सक्षम आणि योग्य’ असावेत किंवा त्यांनी त्यांचे
व्यवसाय कमीतकमी पाच वर्षांसाठी चालवलेले असावेत.
लघु वित्त बँकांसाठी किमान भरणा केलेले भांडवल रु. १०० कोटी असेल.
शासकीय बाँडमधील किमान ७५ टक्के ठेवी आणि कमाल २५ टक्के इतर अनुसूचित
व्यावसायिक बँकांकडे असतील.
पेमेंट्स बँकेच्या भरणा केलेल्या भांडवलामध्ये प्रवर्तकांचे प्रारंभिक योगदान व्यवसाय
सुरू झाल्यापासून पहिल्या पाच वर्षांत किमान ४० टक्के असेल.
ग्राहकांच्या तक्रारी हाताळण्यासाठी बँकेकडे सामर्थ्यशाली ग्राहक तक्रार कक्ष असावा.
सामान्यपणे स्वीकारले जाणारे मानदंड आणि निकषांना अनुसरून सुरुवातीपासूनच
बँकेचे कार्य पूर्णपणे नेटवर्क आणि तंत्रज्ञानावर आधारित असले पाहिजे.

पेमेंट बँका काय करू शकतात?


• इंटरनेट बँकिंग सेवा देणे, म्युच्युअल फंडांची विक्री, विमा आणि निवृत्तीवेतन देणे.
• व्यवसाय प्रतिनिधित्व आणि एटीएम घेणे.
• ग्राहकांसाठी देयके भरण्याची सेवा उपलब्ध करणे.
• मोबाइल फोनवरून रकमेचे हस्तांतरण आणि प्रेषण करण्याची सेवा उपलब्ध
करून देणे.
• बँकेपेक्षा कमी शुल्कात फॉरेक्स सेवा देणे.
• प्रवाशांना संपूर्ण भारतभर डेबिट किंवा एटीएम कार्ड म्हणून वापरता येईल असे
फॉरेक्स कार्ड देणे.
• ‘अॅपल पे’ सारख्या तृतीय पक्षाला कार्ड स्वीकृती देणे.

पेमेंट बँका काय करू शकत नाहीत?


• क्रेडिट कार्ड देणे.
• कर्जाची मुदत वाढवणे.
• भारताबाहेर पैसे पाठवणे.
• अनिवासी भारतीयांकडून ठेवी स्वीकारणे.

Self-Instructional
Material 131
बँकिंग पर्यावरण
५.२.बँक खाती- खात्यांचे प्रकार, कार्यपद्धती व
NOTES संचालन
बँक खात्यांचे विविध प्रकार:
बचत खाते, नियमित बचत खाते, चालू खाते, आवर्ती ठेव खाते, निश्चित ठेव खाते,
डिमॅट खाते, अनिवासी खाते

१) बचत खाते: -
अ) मूलभूत बचत बँक ठेव खाते (बीएसबीडीए)
हे खाते सामान्य बँकिंग सेवा मानले जाईल.
या खात्यासाठी, किमान शिल्लक ठेवणे आवश्यक नाही.
खातेदारांना एटीएम कार्ड / एटीएम कम डेबिट कार्ड, रूपे कार्ड दिले जाईल.
एका महिन्यात जमा केल्या जाणाऱ्या ठेवींच्या संख्येवर कोणतीही मर्यादा असणार
नाही; परंतु खातेदारांना एका महिन्यात जास्तीत जास्त ४ वेळा पैसे काढण्याची मुभा असेल,
ज्यात एटीएमद्वारा पैसे काढणेदेखील समाविष्ट आहे.
वरील सुविधा निःशुल्क दिल्या जातील. मूलभूत बचत बँक ठेव खाते वापरत
नसण्याबद्दल किंवा वापरत नसलेले खाते कार्यान्वित करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले
जात नाही.
या खात्यासाठी अधिकर्षाची (ओव्हरड्राफ्टची) सुविधा रु. ५००० / - पर्यंत मिळते.
ब) मूलभूत बचत बँक ठेव खाती स्मॉल स्कीम (बीएसबीडीएस)
ह्या खात्यांसाठी किमान कागदपत्रे म्हणजे स्वयंसाक्षांकित रहिवास पुरावा आणि
छायाचित्रे लागतात. या खात्यासाठी केवायसी सादरीकरणात सवलत आहे.
एकूण कर्ज एका वर्षात १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे .
कोणत्याही वेळी जास्तीत जास्त शिल्लक रु. ५०,००० पर्यंत असावी.
रोख रक्कम काढणे आणि हस्तांतरणे एका महिन्यात रु. १०, ००० / - पेक्षा जास्त
नसावी.
या खात्यात केवायसी औपचारिकता पूर्ण केल्याशिवाय परदेशी खात्यातून रक्कम जमा
केली जाऊ शकत नाही.
हे खाते केवळ कोअर बँकिंग सोल्यूशनशी संबंधित बँकांमध्ये किंवा अशा शाखांमध्ये
उघडले जाऊ शकते, जिथे अटींच्या पूर्ततेची शहानिशा करणे बँकेच्या कर्मचारी वर्गाला
शक्य आहे.

२) नियमित बचत बँक खाते


कोणतीही रहिवासी वैयक्तिक-एकल खाती, संयुक्त खात्यांमधील दोन किंवा अधिक
व्यक्ती, संघटना, क्लब इत्यादी या खात्यास पात्र आहेत.
ठेवीदारास माफक ऋणाचा पर्याय उपलब्ध.
दर वर्षी दोन विनामूल्य धनादेश पुस्तके दिली जातात.
Self-Instructional निःशुल्क इंटरनेट बँकिंग सुविधा दिली जाते.
Material 132 शिलकीची चौकशी, एनईएफटी, बिल पेमेंट, मोबाईल रिचार्ज इत्यादी सेवा मोबाइल
बँकिंग पर्यावरण
फोनद्वारे दिल्या जातात.
विद्यार्थी आवश्यक कागदपत्रे देऊन हे खाते शून्य शिल्लक ठेवून उघडू शकतात.
NOTES
३) चालू खाते
कोणतीही रहिवासी वैयक्तिक खाती, संयुक्त खात्यांमधील दोन किंवा अधिक व्यक्ती,
संघटना, मर्यादित कंपन्या, धार्मिक संस्था, शैक्षणिक संस्था, धर्मादाय संस्था, क्लब इत्यादी
या खात्यास पात्र आहेत.
देयके अमर्यादित वेळा दिली जाऊ शकतात.
देशाच्या कोणत्याही भागातून संबंधित खात्यात निधी पाठविला जाऊ शकतो.
अधिकर्षाची सुविधा उपलब्ध असते.
इंटरनेट बँकिंग सुविधा उपलब्ध असते.

४) आवर्ती ठेव खाते संचयी ठेव योजना


कोणतीही रहिवासी वैयक्तिक खाती, संयुक्त खात्यांमधील दोन किंवा अधिक व्यक्ती,
संघटना, क्लब, संस्था विशेषत: आरबीआयने परवानगी दिलेल्या एजन्सीज इत्यादी, हे खाते
एकल / संयुक्त नावे उघडण्यास पात्र आहेत.
नियतकालिक / मासिक हप्ता रू ५०/ पासून सुरू होणार्‍या कोणत्याही रकमेसाठी असू शकतो.
खाते ६ महिन्यांपासून ते १२० महिन्यांपर्यंतच्या १ महिन्याच्या पटीतल्या कोणत्याही
कालावधीसाठी उघडले जाऊ शकते.
योजनेच्या सुरुवातीला हप्त्यासाठी निवडलेली रक्कम दरमहा देय असते.
एकदा हप्त्यांची संख्या निश्चित केल्यावर त्यात बदल करता येत नाही.
मंजूर व्याजदर प्रत्येक तिमाहीमध्ये चक्रवाढीने वाढविला जातो.
परिपक्वतेनतं रची रक्कम अंतिम हप्ता जमा झाल्यानतं र एक महिन्याने ग्राहकांना दिली जाते.
ठेवीदारास पासबुक देण्यात येते.
एकत्रित ठेवींवरील आयकर कायद्यात नुकत्याच झालेल्या बदलांनुसार व्याजावर
टीडीएस लागू होतो.

५) मुदत ठेव खाते


अ) शॉर्ट डिपॉझिट पावती
बँका ग्राहकांकडून ७ दिवसांपासून कमाल १० वर्षांपर्यंतच्या काळासाठी ठेवी
स्वीकारतात.
किमान ७ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त; परंतु १७९ दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवी
‘शॉर्ट डिपॉझिट’ म्हणून वर्गीकृत केल्या आहेत.
या योजनेअंतर्गत ७ ते १४ दिवसांच्या कालावधीसाठी किमान ५ लाख रुपयांची रक्कम
जमा करता येते.

ब) मुदत ठेव पावती


कोणतीही रहिवासी वैयक्तिक-एकल खाती, संयुक्त खात्यांमधील दोन किंवा अधिक
व्यक्ती, संघटना, अज्ञान, सोसायटी, क्लब इत्यादी या खात्यास पात्र आहेत. Self-Instructional
महानगरांत आणि शहरी शाखांमध्ये एफडीआरची रक्कम किमान १०,००० रुपये, तर Material 133
बँकिंग पर्यावरण
ग्रामीण आणि अर्ध शहरी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ती ५,००० रुपये आहे.
शासकीय पुरस्कृत योजनांतर्गत ठेवण्यात येणाऱ्या अनुदानासाठी, मार्जिन मनी, बयाणा
NOTES रक्कम आणि कोर्टाने संलग्न केलेल्या / आदेश दिलेल्या ठेवींसाठी किमान रकमेचे निकष
लागू होणार नाहीत.
परिपक्व होण्यापूर्वी ठेवीदार त्यांच्या ठेवीची रक्कम परत करण्यास सांगू शकतात.
मॅच्युरिटीपूर्वी रकमेची परतफेड करण्यास परवानगी आहे.
व्याजदर ठेवींच्या कार्यकाळानुसार आणि बँकेनुसार बदलतो. तसेच बँक जेव्हा दर
बदलते तेव्हा व्याजदर बदलतो.
ज्येष्ठ नागरिकांना एका वर्षासाठी आणि त्यापेक्षा जास्त काळासाठी ठेवलेल्या ठेवींवर
०.५०% जादा व्याजदर लागू होतो.

६) डिमॅट खाते
समभागांवर तणावमुक्त व्यवहार करण्यासाठी वापरले जाते.
व्यक्ती, अनिवासी भारतीय, विदेशी संस्थागत गुंतवणूकदार, परदेशी नागरिक, कॉर्पोरेट,
विश्वस्त, क्लिअरिंग हाऊस, वित्तीय संस्था, क्लिअरिंग मेंबर, म्युच्युअल फंड, बँका आणि
इतर डिपॉझिटरी खाते.
हे खाते उघडण्यासाठी फॉर्म भरावा लागतो. अर्जदाराचा फोटो तसेच मतदार ओळखपत्र
/ पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्सची छायाप्रत जोडावी लागते. अर्जदारास
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच डिमॅट खाते क्रमांक दिला जातो.
या खात्याअतं र्गत प्रदान केलले ्या सुविधा म्हणजे - डिमॅट खाती उघडणे व वापरणे,
डिमटेरियलायझेशन, रीमटेरियलायझेशन, खरेदी, विक्री, तारण ठेवणे व रद्द करणे, सुरक्षित ताबा.

७) अनिवासी खाते
अ) एनआरओ (अनिवासी सामान्य रुपये) खाते
ब) एनआरई (अनिवासी बाह्य रुपये) खाते
क) एफसीएनआर (परकीय चलन अनिवासी) खाते
तपशील एफसीएनआर एनआरई एनआरओ
अनिवासी भारतीय / अनिवासी भारतीय /
पीआयओ / पीआयओ /
ओसीआय ओसीआय
(बांगलादेश / (बांगलादेश / भारताबाहेर
खाते उघडणे पाकिस्तानमधील पाकिस्तानमधील राहणारी कोणतीही
व्यक्ती / घटकांना व्यक्ती / घटकांना व्यक्ती
आरबीआयची पूर्व आरबीआयची पूर्व
मंजुरी आवश्यक मंजुरी आवश्यक
आहे) आहे)
Self-Instructional
Material 134
बँकिंग पर्यावरण
दोन किंवा अधिक
दोन किंवा अधिक दोन किंवा अधिक अनिवासी
अनिवासी व्यक्तींसह अनिवासी व्यक्तींसह व्यक्तींसह एका NOTES
एका स्थानिक एका स्थानिक स्थानिक
जवळच्या जवळच्या जवळच्या
संयुक्त खाते
नातेवाईकाच्या नावे. नातेवाईकाच्या नावे. नातेवाईकाच्या
'प्रथम निर्देशित ' प्रथम निर्देशित नावे. ' प्रथम
किंवा उत्तरजीवी किंवा उत्तरजीवी निर्देशित किंवा
व्यक्ती यानुसार’ व्यक्ति यानुसार’ उत्तरजीवी व्यक्ति
यानुसार’
यूएस डॉलर, पाउंड,
स्टर्लिंग, येन, युरो,
पैसे ज्या खात्यात
ऑस्ट्रेलियन डॉलर भारतीय रुपये भारतीय रुपये
नामांकन आहे
आणि कॅनेडियन
डॉलर
परवानगी मिळू परवानगी मिळू
नामांकन परवानगी मिळू शकते
शकते शकते
बचत, चालू,
बचत, चालू, निश्चित,
खाते प्रकार केवळ मुदत ठेव निश्चित, आवर्ती
आवर्ती ठेव
ठेव
बँकांना ठेवींसाठी बँकांना ठेवींसाठी बँकांना ठेवींसाठी
व्याजदर निश्चित व्याजदर निश्चित व्याजदर निश्चित
व्याज दर
करण्याची परवानगी करण्याची परवानगी करण्याची
आहे आहे परवानगी आहे
१ वर्षापेक्षा कमी १ वर्षापेक्षा कमी निवासी
मुदत ठेवी-
आणि ५ वर्षांपेक्षा आणि १० वर्षांपेक्षा खात्यांप्रमाणे लागू
कालावधी
जास्त नाही जास्त नाही आहे
एनआरओ
ठेवींवरील
व्याजावरील
आयकर करपात्र नाही करपात्र नाही
टीडीएस
३०.९०% वजा
करावेत
स्वदेशी
स्वदेशी स्वदेशी
प्रत्यावर्तन पाठविण्यायोग्य
पाठविण्यायोग्य पाठविण्यायोग्य
नाही
Self-Instructional
Material 135
बँकिंग पर्यावरण
कर्जाच्या रकमेवर
कर्जाच्या रकमेवर
कोणत्याही प्रकारच्या
कोणत्याही प्रकारच्या
NOTES भारतात कर्ज आर्थिक
आर्थिक मर्यादेशिवाय १) परवानगी आहे
१) खातेदारांना मर्यादेशिवाय मानक
मानक मार्जिन २) परवानगी आहे
२) तृतीय पक्षाकडे मार्जिन
आवश्यकतांच्या
आवश्यकतांच्या
अधीन
अधीन

१) कर्जाच्या
१)कर्जाच्या रकमेवर
रकमेवर कोणत्याही
परदेशातील कर्ज कोणत्याही प्रकारच्या
प्रकारच्या आर्थिक
१) खातेदारांना आर्थिक मर्यादेशिवाय १) परवानगी नाही
मर्यादेशिवाय
स्टँडर्ड मार्जिन
स्टँडर्ड मार्जिन
आवश्यकतांच्या २) परवानगी नाही
आवश्यकतांच्या
२) तृतीय पक्षाकडे अधीन
अधीन
२) परवानगी नाही
२)परवानगी नाही

परकीय चलन कर्ज


भारत १) परवानगी नाही
१) परवानगी आहे १)परवानगी नाही
१) खातेधारकास २) परवानगी नाही
२)परवानगी नाही २) परवानगी नाही
२) तृतीय पक्षाकडे

५.३ भारतीय बँकिंग क्षेत्रातील अलीकडील ट्रेंडस्/


प्रवाह:
ई-बँकिंग, ई-वॉलेट्स, बँक विलीनीकरण आणि एकत्रीकरण
ई-बँकिंगमध्ये माहिती तंत्रज्ञान (आय.टी.) आधारित बँकिंगचा समावेश आहे. या
पद्धतीत बँकिंग सेवा संगणक नियंत्रित प्रणालीद्वारे दिल्या जातात. यामध्ये ग्राहकांशी थेट
संपर्क/ सन्मुखता (इंटरफेस) आहे. ग्राहकांना बँकेच्या आवारात जाण्याची गरज नाही.

ई-बँकिंगचे फायदे
• बँकांसाठी सेवेचा खर्च कमी होतो.
• बँकेच्या आवारात जाण्याची आवश्यकता नसल्यामुळे ग्राहकांना सोयीस्कर आहे.
• त्रुटी कमी होण्याचे प्रमाण खूप कमी आहे.
• ग्राहक कधीही एटीएम मशीनमधून पैसे काढू शकतो.
Self-Instructional • क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यांमुळे ग्राहकांना किरकोळ दुकानातून सूट मिळू
Material 136 शकते.
बँकिंग पर्यावरण
• ग्राहक एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सहजपणे निधी
हस्तांतरित करू शकतात.
NOTES
ई-बँकिंग अंतर्गत लोकप्रिय सेवा :
स्वयंचलित टेलर मशीन्स (एटीएम), क्रेडिट कार्डे, डेबिट कार्डे, इलेक्ट्रॉनिक फंड
ट्रान्सफर (ईएफटी), मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, टेलि-बँकिंग, होम बँकिंग, डिमॅट
सुविधा, चेक ट्रंकेशन पेमेंट पद्धत

स्वयंचलित टेलर मशीन (एटीएम):


एटीएम एक संगणकीकृत दूरसंचाराचे साधन आहे. यामुळे ग्राहकांना मानवी
हस्तक्षेपाशिवाय सार्वजनिक ठिकाणी आर्थिक व्यवहार करता येतात. एटीएममुळे ग्राहकांना
रोख रक्कम काढणे, मिनी स्टेटमेंटची विनंती इ. अनेक बँकिंगची कामे करता येतात.
एटीएमचे फायदे असेः

२४ तास सेवा : एटीएम २४ तास सेवा प्रदान करतात. दिवसा किंवा रात्री कोणत्याही
वेळी ग्राहक काही मर्यादेपर्यंत रोख रक्कम काढू शकतो.

ग्राहकांसाठी सोयीस्कर : एटीएम बँकेच्या ग्राहकांना सोयीचे आहे. आजकाल एटीएम


सुविधा फक्त बँकेच्या आवारात असण्याऐवजी इतर अनेक ठिकाणी, जसे की विमानतळांवर,
रेल्वे स्थानकांवर इत्यादी उपलब्ध असतात.

कर्मचार्‍यांसाठी कमी काम : एटीएम बँकेच्या कर्मचार्‍यांवर कामाचा दबाव कमी


करतात आणि त्यामुळे बँक आवारातल्या रांगा टाळल्या जातात.

त्रुटीविरहित सेवा : एटीएमशी मानवी त्रुटींचा संबंध नाही त्यामुळे एटीएम कोणत्याही
त्रुटीशिवाय सेवा प्रदान करतात. ग्राहक अचूक रक्कम मिळवू शकतो.

प्रवाशांसाठी फायदेशीर : एटीएम प्रवाशांसाठी खूप उपयुक्त ठरतात. एटीएममुळे


त्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बाळगण्याची आवश्यकता उरलेली नाही.

इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण : इलेक्ट्रॉनिक हस्तांतरणात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ग्राहकांच्या


खात्यात पैसे जमा होतात किंवा खर्ची पडतात. बँक ग्राहक रोख रक्कम न बाळगता क्रेडिट
किंवा डेबिट कार्डचा वापर करून वस्तू आणि सेवा खरेदी करू शकतात. बँकर्सकडून
ग्राहकांना कार्डे दिली जातात. या प्रणालीचे काम पिन (वैयक्तिक ओळख क्रमांक) वर
चालते.
व्यवहार करण्यासाठी ग्राहक कार्ड रीडर डिव्हाइस/ कार्ड वाचणारे उपकरण वापरून
कार्ड स्वाइप करतो. इलेक्ट्रॉनिक बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगच्या विकासामुळे ग्राहकांना
त्यांच्या सेवांचा उपयोग करण्यास मदत झाली.
Self-Instructional
Material 137
बँकिंग पर्यावरण
टेलि-बँकिंग :
हल्ली याचा वापर वाढत्या प्रमाणात केला जातो आहे. हे विपणन, बँकिंग सेवांसाठी
NOTES एक वितरण चॅनेल आहे. ग्राहक फोनवर कुठूनही आणि कधीही व्यवसायाशी निगडित
रोख-विरहित बँकिंग करू शकतो. टेलि-बँकिंगची सेवा देण्यासाठी स्वयंचलित व्हॉइस
रेकॉर्डरचा वापर केला जातो.

मोबाइल बँकिंग :
बँकांनी अलीकडेच सुरू केलेली ही आणखी एक महत्त्वपूर्ण सेवा आहे. ग्राहक त्याचा
उपयोग सेल फोनच्या मदतीने करू शकतात. बँक विशिष्ट सॉफ्टवेअर बसवते आणि
ग्राहकांना या सेवेचा वापर करता यावा म्हणून संकेतशब्द देते.

होम बँकिंग :
भारतीय बँकिंग क्षेत्रातील हा आणखी एक महत्त्वाचा नवीन बदल आहे. ग्राहक त्यांच्या
घरातून किंवा कार्यालयातून अनेक व्यवहार करू शकतात. ते टेलिफोनच्या मदतीने शिल्लक
तपासू शकतात आणि निधी हस्तांतरित करू शकतात; परंतु आपल्या देशात याचा वापर
तितकासा लोकप्रिय झालेला नाही.

इंटरनेट बँकिंग :
भारतीय बँकिंग क्षेत्रात हा अलीकडचा ट्रेंड/कल आहे. माहिती तंत्रज्ञानात झालेल्या
विकासाचा हा परिणाम आहे. इंटरनेट बँकिंग म्हणजे ज्याच्याकडे वैयक्तिक संगणक व
ब्राउझर आहे असा कोणताही वापरकर्ता किंवा ग्राहक त्याच्या बँक वेबसाइटवर कनेक्ट
होऊ शकतो/संपर्क साधू शकतो आणि इलेक्ट्रॉनिक वितरण वाहिनीद्वारे उपलब्ध असलेली
कोणतीही सेवा वापरू शकतो. दूरस्थ ठिकाणी प्रतिसाद देण्यासाठी मानवी चालक नसतात.
बँक वेबसाइटच्या मेनूमध्ये सूचीबद्ध सर्व सेवा उपलब्ध असतील.

डिमॅट बँकिंग
डिमॅट बँकिगं म्हणजेच डी-मटेरियलायझेशन. भारतीय बँकिगं क्षेत्रात ही अलीकडील
अस्तित्वात आलेली बाब आहे. ज्या ग्राहकाला स्टॉक मार्केटमध्ये किंवा समभागात गुतं वणूक
करायची इच्छा असेल त्यांचे व्यावसायिक बँकांत हे खाते असणे आवश्यक आहे. अशा
प्रकारच्या खात्यांची देखभाल करण्यासाठी ग्राहकांना बँकांना काही वार्षिक शुल्क द्यावे लागते.

क्रेडिट कार्डे:
क्रेडिट कार्ड म्हणजे एक लहान प्लॅस्टिक कार्ड. उपभोक्ता या कार्डचा वापर देय
द्यायची एक प्रणाली म्हणून करतो. यामुळे कार्डधारकांना वस्तू आणि सेवा खरेदी करता
येतात. या वस्तू आणि सेवांसाठी पैसे देण्याकरता कार्डधारक वचनबद्ध असतो. कार्ड
जारीकर्ता एक फिरते खाते तयार करून ग्राहकांना (किंवा वापरकर्त्याला) एक ऋणव्यवस्था
देतो ज्यामधून वापरकर्ता व्यापाऱ्यास पैसे भरण्यासाठी किंवा इतर वापरासाठी रोख रक्कम
म्हणून पैसे घेऊ शकतो. क्रेडिट कार्ड चार्ज कार्डपेक्षा वेगळे आहे. चार्ज कार्डमध्ये प्रत्येक
Self-Instructional महिन्यात संपूर्ण देय रक्कम भरणे आवश्यक आहे. याउलट, क्रेडिट कार्डे ग्राहकांना कर्जाची
Material 138 थकबाकी देतात. या थकबाकीवर व्याज आकारले जाते. क्रेडिट कार्ड रोख कार्डपेक्षाही
बँकिंग पर्यावरण
वेगळे असते, जे कार्डच्या मालकाद्वारे चलनाप्रमाणे वापरले जाऊ शकते. बहुतेक क्रेडिट
कार्डे बँकांद्वारे किंवा पतसंस्थांकडून दिली जातात.
NOTES
डेबिट कार्ड :
डेबिट कार्ड हे बँक कार्ड किंवा चेक कार्ड म्हणूनदेखील ओळखले जाते. हे एक
प्लॅस्टिक कार्ड आहे जे कार्डधारकास त्याच्या किंवा तिच्या बँक खात्यात / वित्तीय संस्थेत
इलेक्ट्रॉनिक प्रवेश प्रदान करते. काही कार्डांकडे संग्रहित मूल्य असते ज्यातनू पैसे दिले
जातात, तर बहुतेक कार्डांबाबत कार्डधारकाच्या बँकल े ा पैसे देणाऱ्याच्या निर्देशित खात्यातनू
पैसे काढून प्राप्तकर्त्याच्या खात्यात भरण्यासाठी संदशे पाठविला जातो. खरेदी करताना रोख
पैशांसाठी पर्यायी पेमटें पद्धत म्हणून या कार्डचा वापर केला जाऊ शकतो. काही वेळा ही कार्डे
केवळ इंटरनेटवरील वापरासाठी तयार केलल े ी असतात आणि म्हणून वस्तुरूपात कोणतेही
कार्ड नसते. बर्‍याच देशांमध्ये डेबिट कार्डचा वापर इतका व्यापक झाला आहे, की त्यांच्या
वापराच्या प्रमाणाने धनादेशाला मागे टाकले आहे किंवा त्यांनी संपर्ण ू पणे धनादेशांची आणि
काही प्रमाणात रोखीच्या व्यवहारांचीही जागा घेतली आहे. क्रेडिट कार्डांप्रमाणेच डेबिट कार्ड
टेलिफोन आणि इंटरनेट खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जातात. तथापि, क्रेडिट कार्डच्या
विपरीत, डेबिट कार्डचा वापर करून दिलेला निधी धारकाच्या नंतरच्या तारखेला परत
देण्याऐवजी ताबडतोब धारकाच्या बँक खात्यातनू वर्ग केला जातो.
चेक ट्रंकेशन पेमेंट सिस्टम (सीटीपीएस) :
ट्रंकेशन म्हणजे चेक काढणाऱ्या (ड्रॉवर) बँकेने काढलेल्या कागदी चेक्सचा ते
वटवणाऱ्या (ड्रॉई) बँकेकडे जाणारा लोंढा/ प्रवाह थांबवण्याची प्रक्रिया. कागदी चेकमध्ये
ड्रॉई बँकेकडे जाण्यापूर्वी कुठे तरी काटछाट/ ट्रंकेशन केले जाते आणि एमआयसीआर
फिल्ड्स, सादरीकरणाची तारीख, सादर करणारी बँक यांसारख्या संबंधित माहितीसह
चेकची इलेक्ट्रॉनिक प्रतिमा, ड्रॉई बँकेकडे पाठवली जाते. अशा रीतीने ट्रंकेशन प्रक्रियेच्या
अंमलबजावणीमुळे अपवाद वगळता प्रत्यक्ष चेक्स एका शाखेकडून दुसऱ्या शाखेकडे
पाठवण्याची गरज उरणार नाही.
परिणामी धनादेश वटण्यासाठी लागणारा वेळ, त्याच्या वाहतुकीची किंमत आणि
प्रक्रियेत होणारा विलंब इत्यादी प्रभावीपणे कमी होईल आणि अशा प्रकारे धनादेश संकलन
किंवा वसुलीची प्रक्रिया वेगवान होईल.

ई-वॉलेट :
ई-वॉलेट हा इलेक्ट्रॉनिक कार्डचा एक प्रकार आहे. याचा वापर संगणक किंवा
स्मार्टफोनद्वारे ऑनलाइन केलेल्या व्यवहारांसाठी केला जातो. त्याची उपयुक्तता क्रेडिट
किंवा डेबिट कार्डसारखीच आहे. देयके देण्यासाठी ई-वॉलेट त्या व्यक्तीच्या बँक खात्याला
जोडलेले असणे आवश्यक आहे.
ई-वॉलेटमध्ये प्रामुख्याने सॉफ्टवेअर आणि माहिती असे दोन घटक आहेत. सॉफ्टवेअर
हा घटक वैयक्तिक माहिती संग्रहित करतो आणि डेटा सुरक्षित आणि कूटबद्ध करतो. माहिती
हा घटक म्हणजे वापरकर्त्याने दिलेल्या तपशिलांचा डेटाबेस आहे. यात त्यांचे नाव, पत्ता,
देय द्यायची पद्धत, देय रक्कम, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड तपशील इत्यादींचा समावेश आहे.
ई-वॉलेट खाते सुरू करण्यासाठी वापरकर्त्यास त्याच्या / तिच्या उपकरणावर Self-Instructional
सॉफ्टवेअर स्थापित करावे लागते आणि संबंधित आवश्यक माहिती भरावी लागते. Material 139
बँकिंग पर्यावरण
ऑनलाइन खरेदी केल्यानंतर, ई-वॉलेट आपोआप पेमेंट फॉर्मवरील वापरकर्त्याच्या
माहितीमध्ये भरते. ई-वॉलेट सक्रिय करण्यासाठी वापरकर्त्याला त्याचा संकेतशब्द टाकावा
NOTES लागतो. एकदा ऑनलाईन पेमेंट झाल्यावर ग्राहकाला इतर कोणत्याही वेबसाइटवर ऑर्डर
फॉर्म भरण्याची आवश्यकता नसते कारण माहिती डेटाबेसमध्ये संग्रहित होते आणि
स्वयंचलितपणे अद्ययावत केली जाते.

विलीनीकरण :
सध्या बँकिंग क्षेत्रातील परिस्थिती रणांगणसदृश आहे. त्यामुळे प्रत्येक नवीन बँक नव्या
आर्थिक योजना बनवून इतरांवर मात करण्याचा प्रयत्न करते. विलीनीकरण आणि
एकत्रीकरणाची ढाल घेणे हा स्पर्धेपासून बचावण्याचा सर्वांत सुरक्षित मार्ग आहे. दोन भिन्न
घटकांना एकत्र करून एका घटकामध्ये विलीन करण्याची ही सर्वांत प्रभावी पद्धत आहे.
उदारीकरण आणि इतर धोरणांमुळे बँकिंग क्षेत्राला सोयीस्करपणाची सीमा पार
करण्यासाठी कार्यकक्षा वाढविणे ही मूलभूत गरज आहे. हा ब्लॉग आपणास बँकिंग क्षेत्राच्या
कामगिरीवर विलीन आणि एकत्रीकरणाच्या परिणामाचे मूल्यांकन करण्यास मदत करेल.

बँकांमध्ये विलीनीकरण आणि एकत्रीकरणाची कारणे :


पुढील उद्दिष्टांसाठी बँका विलीनीकरण आणि एकत्रीकरण स्वीकारतात -
• बाजारातील स्पर्धेची पातळी कमी करण्यास मदत होते.
• स्पर्धेत वाढ न करता बाजारपेठ वाढविणे.
• दोन्ही बँकांची संसाधने मिळून बँक अधिक मालमत्ता मिळवते.
• कमी प्रमाणात गुंतवणूक करूनही अधिक भांडवल वापरायला मिळते.
• दोन बँका एकत्र झाल्या, की त्यांची ग्राहकसंख्याही दुप्पट होते.
• जागतिक पातळीवर स्पर्धा करण्याची संधी मिळते.

विलीनीकरण आणि एकत्रीकरणाचा परिणाम बँकांच्या उत्पादनक्षमतेला चालना


देण्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवितो. याशिवाय, या प्रक्रियेमुळे बाजारात विकासासाठी
प्रयत्नशील असलेल्या; परंतु आवश्यक संसाधने आणि भांडवल नसलेल्या इतर बँकांपेक्षा
वरचढ होणे शक्य होते.

बँकांचे विलीनीकरण करण्याबाबत सरकारचे मत-


ऑगस्ट २०१९ मध्ये, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातील १०
बँकांचे चार मोठ्या बँकांमध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली. त्यामुळे बँकिंग
क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेसाठी चालना देणाऱ्या घटनांची मालिका तयार झाली.
एका आठवड्यानंतर, केंद्र सरकारने सांगितले, की या विलीनीकरणामुळे भारतातील
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची एकूण संख्या कमी होईल. ही संख्या २७ बँकांवरून १२
बँकांवर येईल. त्याव्यतिरिक्त, सरकारने पीएसबीमध्ये ५५,२५० कोटी रुपयांची भांडवली
गुंतवणूक जाहीर केली.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यानुसार कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक एकाच
Self-Instructional संस्थेत विलीन होतील. तर, युनियन बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक आणि आंध्रा बँक
Material 140 एकत्रितपणे एक घटक म्हणून काम करतील. त्याचप्रमाणे इंडियन बँक आणि अलाहाबाद
बँकिंग पर्यावरण
बँकही एक घटक बनतील. पुढ,े निर्मला म्हणतात की सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक
ऑफ इंडिया स्वतंत्रपणे कार्यरत राहतील.
या एकत्रीकरणानंतर, देशात आधी २७ पीएसबी होत्या त्या आता केवळ १२ राहतील. NOTES
विलीनीकरण आणि एकत्रीकरणामुळे पंजाब नॅशनल बँक भारतातील दुसर्‍या क्रमांकाची
पीएसबी म्हणून उदयास येईल, जिचा एकूण व्यवसाय १७.५ लाख कोटी रुपये आहे.
तसेच, सिंडिकेट बँक आणि कॅनरा बँकेच्या विलीनीकरणानंतरच्या एकूण व्यवसायाची
गणना १५.२० लाख कोटी रुपयांपर्यंत जाते म्हणूनच, ही भारतातील चौथी सर्वांत मोठी
पीएसबी होईल.

शासकीय घोषणेनंतरची परिस्थिती


अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर येथे काही स्पष्ट बदल दिसू शकतात:
युनायटेड बँक, पीएनबी आणि ओबीसी यांचे एकत्रीकरण १८ लाख कोटी रुपयांच्या
महसुलासह दुसर्‍या क्रमांकाची पीएसबी तयार करेल. त्यांचे शाखांचे जाळे देशात दुसर्‍या
क्रमांकावर असल्यान,े त्यांची देशात आणि जागतिक पातळीवर उपस्थिती जाणवेल. तसेच
चालू व बचत खाती (सीएएसए) मोठ्या प्रमाणावर असतील.
एकत्रित स्वरूपात अलाहाबाद आणि इंडिया बँक ही ८.०८ लाख कोटी रुपयांच्या
व्यवसायासह ७ व्या क्रमांकाची सर्वांत मोठी पीएसबी असेल. त्यामुळे दोन्हीसाठी भरीव
प्रमाणात लाभ मिळेल तसेच नव्या एकत्रित बँकेकडे उच्च सीएएसए आणि कर्ज देण्याची
क्षमता असेल.
युनायटेड बँक, आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकांच्या विलीनीकरणानंतर ती १४.६ लाख
कोटी रुपयांचा व्यवसाय असलेली ५ व्या क्रमांकाची पीएसबी असेल. तीनही बँकांना
भरपूर लाभ देणारी ही चौथी मोठी शाखा होईल.

बँकिंग क्षेत्रावर विलीनीकरण आणि एकत्रिकरणाचा प्रभाव


छोट्या बँकांचे मोठ्या बँकामध्ये विलीनीकरण हे एक परिपूर्ण संघटन असेल आणि
त्यात दोघांचाही फायदाच होईल हे निर्विवाद आहे. सरकारने वेगवेगळे आर्थिक सामर्थ्य
असलेल्या बँकांना एकत्र करण्याचे धोरण ठेवून निर्णय घेतला आहे. उदाहरणार्थ, या
योजनेनुसार पंजाब बँक आणि इंडियन बँक या त्यांच्याबरोबर विलीन झालेल्या बँकांच्या
तुलनेत अधिक मजबूत आहेत.
निर्मला सीतारामन यांच्या सादरीकरणात, त्यांनी बँक बोर्डाचे सामर्थ्य वाढवणे यांसारख्या
काही प्रशासकीय सुधारणांची घोषणा केली. हा निर्णय सरकारी बँकांमध्ये राजकीय
हस्तक्षेपाच्या मूलभूत समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी घेण्यात आला आहे. त्या पुढे म्हणाल्या,
की बँकांचे विलीनीकरण आणि एकत्रीकरण यांमुळे निधीच्या गरजा पूर्ण होतील आणि
अर्थव्यवस्थेची वाढ सुधारेल.
या निर्णयानुसार, भांडवलातील तफावतीमुळे विलीनीकरण झालेल्या लहान बँकांपेक्षा
मोठ्या बँकांची कर्ज देण्याची क्षमता वाढेल.
पंजाब नॅशनल बँकेच्या बाबतीत विचार केला, तर जेव्हा ती ओरिएंटल बँक ऑफ
कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियामध्ये विलीन होईल तेव्हा ती १८ लाख कोटी
रुपयांच्या व्यवसायासह दुसर्‍या क्रमांकाच्या बँकेचे स्थान प्राप्त करेल. Self-Instructional
सरकारच्या निर्णय ठाम असला तरी अनेक गुंतवणूकदार त्याविरोधात प्रश्न उपस्थित Material 141
बँकिंग पर्यावरण करत आहेत. त्यांचा असे वाटते, की कदाचित मोठ्या बँका मोठ्या व्यावसायिक प्रकल्पांना
पुरेसा निधी देऊ शकणार नाहीत.
भूतकाळातील उदाहरणे पाहिल्यास विविध लहान बँका एकत्रित झाल्या आणि त्यांच्या
NOTES कर्जाची सुविधा वाढविल्या, ज्याचा परिणाम यशस्वी झाला म्हणूनच विलीनीकरण आणि
एकत्रीकरणाचा परिणाम आर्थिक आणि बँकिंग क्षेत्रात अधिक सकारात्मकच आहे असे
म्हणता येईल.
बँक विलीनीकरणाच्या घोषणेनंतर इंडिया बँक आणि इतर ब भक्कम बँकांच्या
समभागांमध्ये मोठी घसरण दिसून आली. बँकांच्या विलीनीकरणाद्वारे कामकाज
चालवण्यातील फायदे मिळतील की नाही याबाबतचा पेच अजूनही कायम आहे.
या विलिनीकरणाद्वारे मोठ्या बँकांच्या वित्तपुरवठ्याची बिघडती स्थिती सुधारेल.
याशिवाय विलीनीकरण आणि एकत्रीकरणामुळे वाईट कर्जामुळे ग्रस्त असलेल्या बँकांना
मदत होईल. विलीनीकरणानंतर दिवाळखोर होण्याची भीती न बाळगता बँका कर्जे वाढवू
शकतात.

प्रश्नांच्या साहाय्याने आपली प्रगती पडताळा.


१. बँकेची व्याख्या सांगा.
२. बँकेचे प्रमुख कार्य सांगा.
३. ठेवींचे तीन प्रकार प्रकार सांगा.
४. ई- बँकिंग म्हणजे काय?

प्रश्नांची उत्तरे पडताळा.


१. बँकिंग कंपनी म्हणजे अशी कंपनी जी भारतामध्ये बँकेचा व्यवसाय करते, आणि
बँकिंग या शब्दाची व्याख्या लोकांकडून कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी पैसे
स्वीकारणे आणि आणि हे पैसे त्यांच्या मागणीनुसार परत करणे किंवा धनादेश, ड्राफ्ट,
ऑर्डर यांद्वारे परत करणे.  
२. ठेवी स्वीकारणे आणि कर्जे देणे ही प्राथमिक कार्ये आहेत.
३. बचत ठेव, मागणी ठेव आणि मुदत ठेव हे ठेवींचे तीन प्रकार आहेत.
४. ई-बँकिंगमध्ये माहिती तंत्रज्ञान (आय.टी.) आधारित बँकिंगचा समावेश आहे. या
पद्धतीत बँकिंग सेवा संगणक नियंत्रित प्रणालीद्वारे दिल्या जातात. यामध्ये ग्राहकांशी थेट
संपर्क/ सन्मुखता (इंटरफेस) आहे. ग्राहकांना बँकेच्या आवारात जाण्याची गरज नाही.

५.४ सारांश :
भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये बँकांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ठेवी
स्वीकारणे आणि कर्ज देणे या प्राथमिक कार्याबरोबर ग्राहकांचा प्रतिनिधी म्हणून विविध
प्रकारची कार्य बँका करतात. तसे ते खातेदारांना उपयुक्त सेवा पुरवण्याचेही काम करतात.
भारतामध्ये सरकारी मालकीच्या बँका, खाजगी बँका, लघु बँका, पेमेंट बँका कार्यरत
आहेत. चालू खाते, बचत खाते, मुदत ठेव खाते आणि आवर्ती ठेव खाते ही प्रमुख चार
Self-Instructional खाती आहेत. आधुनिक काळामध्ये ई-बँकिंग, ई-वॉलेट यांसारख्या सुविधा बँकांकडून
Material 142 दिल्या जात आहेत. नजिकच्या काळामध्ये बँकांचे विलीनीकरण व एकत्रीकरणाच्या घटना
वाढल्या आहेत. बँकिंग पर्यावरण

५.५ महत्त्वाचे शब्द : NOTES

बँक
खाजगी बँका
लघु बँका
पेमेंट बँका
चालू खाते
बचत खाते
मुदत ठेव खाते
आवर्ती ठेव खाते
ई-बँकिंग
ई-वॉलेट
विलीनीकरण
एकत्रीकरण
डेबिट कार्ड
क्रेडिट कार्ड
आरटीजीएस
एन ईए टी

५.६ स्वयं मूल्यमापनासाठी स्वाध्याय प्रश्न (लघु व


दीर्घ प्रश्न) :
लघु प्रश्न
१. बँक म्हणजे काय ते स्पष्ट करा.
२. व्यापारी बँका म्हणजे काय ते स्पष्ट करा.
३. लघु वित्त बँका काय करू शकतात?
४. पेमेंट बँका कोणत्या सेवा प्रदान करतात?
५. ई-बँकिंगचे फायदे सांगा.
६. ई-वॉलेट म्हणजे काय ते सांगा.

दीर्घ प्रश्न
१. मध्यवर्ती बँकेची संकल्पना स्पष्ट करा. त्याची कार्य विशद करा.
२. बँकांची प्राथमिक आणि दुय्यम कामे स्पष्ट करा
३. अनिवासी खात्यांची संकल्पना स्पष्ट करा.
४. बँकिंग क्षेत्रावर विलीनीकरण आणि एकत्रीकरणाचा काय प्रभाव पडला? Self-Instructional
Material 143
बँकिंग पर्यावरण
५.७ अधिक वाचनासाठी साहित्य :
NOTES • Desai, S. S. M. (1979) Rural Banking in India, Bombay,
• Government of India, Report of The Banking Commisstion,
New Delhi, ( 1972)
• Rae, Weston, (1980) Domestic and Multinational Banking :
The Effects of Monetary Policy, London
• Reserve Bank of India, Functions and Working, Bombay,
(1970).
• Reserve Bank of India, History of the Reserve Bank of India :
1935-1951. Bombay, 1970.
• Reserve Bank of India, Report on Currency and Finance :
Annual, Bombay.
• Reserve Bank of India, Trend and progress of Banking in
India : Annual, Bombay.
• Shah, Munubhai, (1970) New Role of Reserve Bank in India’s
Economic Development, Bombay,.

Self-Instructional
Material 144
भारतीय अर्थव्यवस्थेचा आढावा
भारतीय
प्रकरण ६ भारतीय अर्थव्यवस्थेचा आढावा अर्थव्यवस्थेचा...

NOTES

६.० प्रस्तावना
६.१. भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने
६.१.१ गरिबी
६.१.२. रोजगार
६.१.३. असमानता
६.१.४. अनौपचारिक क्षेत्र
६.२ धोरणात्मक उपाययोजना (अलीकडील दोन-तीन कार्यक्रम)
६.२.१. गरिबी निर्मूलन कार्यक्रम
६.२.२.रोजगार निर्मिती कार्यक्रम
६.२.३. कृषी विकास कार्यक्रम
६.२.४. कौशल्य विकास कार्यक्रम
६.३ सारांश
६.४ महत्त्वाचे शब्द
६.५ सरावासाठी प्रश्न
६.६ संदर्भ

अध्यापनाची उद्दिष्टे :
या प्रकरणाच्या अभ्यासानंतर आपणास
• दारिद्र्य म्हणजे काय, आणि भारतातील दारिद्र्याची कोणती कारणे आहेत हे स्पष्ट
करता येईल.
• बेरोजगारी म्हणजे काय आणि त्याची प्रमुख कारणे कोणती आहेत हे सांगता येईल.
• विषमता म्हणजे काय, असमानतेचे विविध प्रकार स्पष्ट करता येतील.
• अनौपचारिक क्षेत्र म्हणजे काय हे स्पष्ट करता येईल.
• सरकारने राबवलेल्या धोरणात्मक योजना कोणत्या आहेत ते स्पष्ट करता येईल.

६.० प्रस्तावना
भारत स्वतंत्र होत असताना भारतीय अर्थव्यवस्था संकटात होती. वसाहतवादामुळे भारत
स्वतःच्या विकासाची गरज न भागवता तो परदेशी भूमीची गरज भागवत होता, दुसरीकडे
भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या अर्ध्या शतकादरम्यान, जगामध्ये सर्वत्र कृषी आणि उद्योगधंद्यांचा
विकास आणि विस्तार होत होता.
ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सामाजिक क्षेत्राच्या वाढीसाठी कधीही महत्त्वपूर्ण बदल केलेले
नाहीत आणि यामुळे अर्थव्यवस्थेच्या उत्पादक क्षमतेस अडथळा निर्माण झाला. स्वातंत्र्याच्या
काळात, भारतातील साक्षरतेचे प्रमाण केवळ १७ टक्के होते, सरासरी आयुर्मान ३२.५ वर्षे Self-Instructional
होते म्हणून, भारत स्वतंत्र झाल्यानंतर अर्थव्यवस्थेची पद्धतशीर बांधणी करणे हे त्या Material 147
भारतीय
अर्थव्यवस्थेचा... काळाच्या सरकारसमोरील खरे आव्हान होते. विकास आणि विकासाची गरज ही राजकीय
नेतृत्वासमोर मोठी मागणी होती. १९५६ मध्ये घेतले गेलेले बरेच महत्त्वपूर्ण आणि सामरिक
NOTES निर्णय जे अजूनही भारताच्या आर्थिक प्रवासाला आकार देत आहेत.
आज भारत जगातील सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आणि क्रय शक्तीच्या
आधारावर भारतीय अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा जीडीपी २. ९ ट्रिलियन
डॉलर एवढा आहे. तरीसुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेपुढे अनेक समस्या आहेत जसे गरिबी,
बेरोजगारी, विषमता. या प्रकरणामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील समस्या आणि
त्यावर सरकारने योजलेल्या उपायांची माहिती करून घेणार आहोत.

६.१ भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने:


गरिबी :
जगातील विकसनशील देशांना दोन मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्या आहेत
मोठ्या प्रमाणावर गरिबी व मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी. या समस्या एकमेकांशी जोडलेल्या
आहेत. उत्पन्न नसल्याने लोक गरीब आहेत. उत्पन्न नाही कारण ते बेरोजगार आहेत.
अशीही काही प्रकरणे आहेत जेव्हा लोक नोकरी करतात किंवा गरीब असतात. शतकानुशतके,
गरिबीची समस्या भारतात आहे. दारिद्र्य कमी करणे हे भारतातील नियोजनाचे प्रमुख लक्ष्य
आहे. आम्हाला गरीब आणि त्यांच्या तंतोतंत सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीबद्दल
माहिती असणे आवश्यक आहे. जर हि माहिती असेल तरच सरकार दारिद्र्य दूर करण्यासाठी
प्रभावी धोरणे अवलंबू शकते.

व्याख्या :
गरिबीची अनेक प्रकारे व्याख्या केली गेली आहे. जागतिक बँकेने ( १९९०) गरिबीची
व्याख्या केली आहे, की “किमान जीवनमान प्राप्त करण्यातली असमर्थता”.
दांडेकरांच्या शब्दांत ( १९८१ ) “कशाही पद्धतीने पुरेशा उत्पन्नाचा अभाव म्हणजे
गरिबी.” अशा प्रकारे निर्वाहाकरता लागणाऱ्या मूलभूत वस्तू खरेदी करण्यासाठी पुरेसे
उत्पन्न न मिळणे हा दारिद्र्याच्या व्याख्येतील महत्त्वाचा मुद्दा आहे.

गरिबीचे प्रकार

१. सापेक्ष दारिद्र्य
वस्तुतः दारिद्र्य ही सापेक्ष संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्नाची लोकांमध्ये वाटणी कशा
प्रकारे झाली आहे यावर समाजातील सामाजिक कल्याण बऱ्याच प्रमाणावर अवलंबून
असते.
जेव्हा दोन व्यक्ती किंवा दोन समूह किंवा दोन वस्तू किंवा दोन देश यांची तुलना
करावयाची असते तेव्हा सापेक्ष या शब्दाचा उपयोग केला जातो. एकाच देशातील उच्च
Self-Instructional उत्पन्न आणि न्यून उत्पन्न असणाऱ्या लोकांच्या उत्पन्नाची आणि उपभोगाची तुलना केली
Material 148 जाते तेव्हा सापेक्ष दारिद्र्य या संकल्पनेचा वापर केला जातो.
भारतीय
उच्चतम उत्पन्न गटातील लोकसंख्येशी तुलना करता सर्वांत खालच्या उत्पन्न गटातील अर्थव्यवस्थेचा...
लोक दारिद्र्यात आहेत असे मानले जाते तेव्हा त्यास सापेक्ष दारिद्र्य म्हणतात.
सापेक्ष दारिद्र्य ही संकल्पना तुलनेवर आधारलेली आहे. इतरांच्या तुलनेत दारिद्र्य असा NOTES
दारिद्र्याचा अर्थ लावता येतो. सर्वांचे उत्पन्न सारखे राहिले, तर सापेक्ष दारिद्र्याचा प्रश्नच
उद्भवला नसता; पण प्रत्येक देशात उत्पन्न वाटपातील विषमता असते. काही लोकांना
सरासरीपेक्षा जास्त उत्पन्न मिळते म्हणजे इतरांना सरासरीपेक्षा कमी उत्पन्न मिळते.
सरासरीपेक्षा ज्यांना फार कमी उत्पन्न मिळते त्यांना रूढ व्यवहारात सहभागी होता येत नाही.
त्यांना सर्वसाधारण जीवनमान मिळत नाही. अशा लोकांना दरिद्री म्हणावे. सापेक्ष दारिद्र्याची
संकल्पना उत्पन्नाच्या विषम वाटपाशी संबंधित आहे. सर्व देशांत सापेक्ष दारिद्र्य आढळते.
विषमता जितकी कमी तितके सापेक्ष दारिद्र्य कमी आढळते.

२. निरपेक्ष दारिद्र्य
ज्या वेळी दारिद्र्याची मोजणी करण्यासाठी कुठल्या तरी निरपेक्ष मानकाचा वापर केला
जातो तेव्हा त्याला निरपेक्ष दारिद्र्य म्हणतात.
ज्या व्यक्तीला आपल्या प्राप्त उत्पन्नातून किमान गरजा भागवणेही शक्य नसते त्यास
निरपेक्ष दरिद्री मानले जाते.
निरपेक्ष दारिद्र्याचा संबंध किमान निर्वाह पातळीशी जोडला जातो. निरपेक्ष याचा अर्थ
इतरांची तुलना न करता असा होय. जीवन जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य, डाळी,
तेल, दूध, भाजीपाला, कपडे इत्यादी वस्तूंची आवश्यकता असते. व्यक्तीला दररोज
साप्ताहिक किंवा मासिक उत्पन्न मिळते. त्यातून वरील वस्तू खरेदी करणेही शक्य नसेल, तर
त्या व्यक्तीस दरिद्री मानण्यात येत.े व्यक्तीला आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी काही
किमान उत्पन्न मिळवणे गरजेचे असते. जर व्यक्तीचे उत्पन्न या पातळीपेक्षाही कमी असेल,
तर ती व्यक्ती निरपेक्ष दृष्टीने दरिद्री समजली जाते.
जेव्हा लोकांकडे पुरेसे अन्न, कपडे आणि निवारा नसतो तेव्हा आपण म्हणतो, की ते
संपूर्ण दारिद्र्यात आहेत.
सापेक्ष गरिबी म्हणजे भिन्न वर्गातील लोक किंवा समान गटातील लोकांच्या किंवा भिन्न
देशांमधील लोकांच्या उत्पन्नातील फरक होय. जर आपण देशाच्या लोकसंख्येची उत्पन्नाच्या
आधारे वेगवेगळ्या वर्गांत विभागणी केली आणि जर आपण एकूण लोकसंख्येच्या सर्वोच्च
२० टक्के लोकांची तळातल्या २० टक्के लोकांशी तुलना केली, तर आपण असे म्हणू
शकतो, की आपण सापेक्ष गरिबीचा अभ्यास करीत आहोत.

३. तात्पुरती किंवा दीर्घकालीन गरिबी


भारतासारख्या देशात, जेव्हा कमी पाऊस पडतो, तेव्हा पिकाचे उत्पन्न येत नाही आणि
शेतकरी तात्पुरते गरिबीच्या नमुन्यात प्रवेश करतात; परंतु जेव्हा ते दीर्घकाळ गरीब असतात,
तेव्हा आपण त्याला दीर्घकालीन किंवा संरचनात्मक गरिबी म्हणतो. उदाहरणार्थ, जेव्हा
बऱ्याच गरीब देशांमधील शेतकरी पावसावर अवलंबून असतात आणि जेव्हा शेतीचे उत्पादन
कमी येत,े तेव्हा आपण म्हणतो, की शेतकरी दीर्घकालीन दारिद्र्यात आहेत.

Self-Instructional
४. प्राथमिक गरिबी आणि दुय्यम गरिबी Material 149
भारतीय प्रसिद्ध समाजशास्त्रीय संशोधक, सीबोहम राऊंट्री याच्या मते प्राथमिक गरिबीपेक्षा
अर्थव्यवस्थेचा... अधिक लोक दुय्यम गरिबीमुळे ‘मानवी गरजांचे मोजमाप’ ओलंडण्यापासून वंचित राहतात.
प्राथमिक दारिद्र्य आणि दुय्यम गरिबी यांच्यातला फरक राऊंट्री (१९०१०) यांनी स्पष्ट
NOTES केला आहे. प्राथमिक गरिबी म्हणजे “ज्या कुटुंबांची एकूण कमाई केवळ शारीरिक
कार्यक्षमतेच्या देखभालीसाठी आवश्यक असणाऱ्या किमान गरजेच्या वस्तू मिळवण्यासाठीही
पुरेशी नसते अशी अवस्था.”
"दुय्यम गरिबी म्हणजे अशी अवस्था ज्यामध्ये कमाईतील काही भाग इतर उपयोगी
अथवा निरुपयोगी बाबींवर (उदाहरणार्थ दारू, जुगार आणि अकार्यक्षम घरकाम इत्यादी)
खर्च झाला नसता, तर केवळ शारीरिक कार्यक्षमतेसाठी देखभाल करण्यासाठी ती पुरेशी
झाली असती. राऊंट्री म्हणतात, की प्राथमिक गरिबीपेक्षा अधिक लोक दुय्यम गरिबीमुळे
‘मानवी गरजांचे मोजमाप’ ओलांडण्यापासून वंचित राहतात. (प्राथमिक गरिबी म्हणजेच
अपुरे उत्पन्न).

५. ग्रामीण गरिबी आणि शहरी गरिबी


ग्रामीण भागातील बहुतांश लोक गरीब आहेत कारण त्यांच्याकडे जमिनीसारखी
मालमत्ता नाही आणि ते शेतमजूर म्हणून काम करतात; त्यांचे वेतन कमी आहे आणि त्यांना
वर्षात काही महिनेच काम मिळते. दुसरीकडे शहरी गरीब लोक बरेच तास काम करतात;
परंतु त्यांना कमी वेतन मिळते. ते मुख्यतः असंघटित किंवा अनौपचारिक क्षेत्रात काम
करतात. ते ‘उप-नियोजित’/अर्धनियुक्त असतात. उप-नियोजित/अर्धनियुक्त नोकरदार
म्हणजे असे लोक
१) जे अर्धवेळ काम करतात; परंतु पूर्णवेळ काम इच्छित आहेत;
२) पूर्णवेळ काम करणारे कुटुंबप्रमुख जे आपल्या कुटुंबाला दारिद्र्य रेषेच्या पलीकडे
जाण्यासाठी पुरेसे पैसे कमवत नाहीत आणि
३) निराशाग्रस्त कामगार जे आता काम शोधतच नाहीत.

गरिबीची इतर परिमाणे


उत्पन्नावर आधारित किंवा आर्थिक दृष्टिकोनाव्यतिरिक्त, गरिबीची इतरही परिमाणे
आहेत. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती निवाऱ्याने गरीब, आरोग्याने गरीब, शिक्षणाने गरीब,
किंवा इच्छित शारीरिक किंवा मानसिक गुणधर्मांनी गरीब असण्याचा विचार करू शकते.

गरीब कुटुंबांची लक्षणे

सर्वसाधारणपणे, प्रति व्यक्ती सर्वांत कमी उत्पन्न असणारी कुटुंबे प्रमाणात मोठी असतात
ज्यात बरीच मुले किंवा आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेले बरेच सदस्य असतात. सहसा
नेहमीच्या वर्षात, गरीब लोकांचे सर्व उत्पन्न या नाही तर त्या प्रकारच्या बाबीवर खर्च होते.
बहुशः यापैकी निम्मा खर्च खाण्यासाठी /अन्नासाठी होतो. साहजिकच मुख्य अन्नधान्याच्या
किंमती (अन्नधान्य, डाळी, तेल, भाज्या) त्यांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण असतात. गरीब
कुटुंबे सहसा मुलींपेक्षा मुलांसाठी शिक्षणामध्ये गुंतवणूक करतात. गरीब लोक राजकारणात
फारसा भाग घेत नाहीत. एका अर्थाने ते वंचित असतात. अर्थात काही अपवादात्मक
Self-Instructional उदाहरणेही आहेत. गुन्हेगारी, अस्वस्थता आणि गरिबांपर्यंत पोहोच नसणे हे दारिद्र्याचे
Material 150 सहसंबंधी घटक मानले जातात.
भारतीय
• सर्वसाधारणपणे, प्रति व्यक्ती सर्वात कमी उत्पन्न असणारी कुटुंबे मोठी प्रमाणात अर्थव्यवस्थेचा...
असतात ज्यात बरीच मुले किंवा आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेले बरेच सदस्य असतात.
• सहसा नेहमीच्या वर्षात, गरीब लोकांचे सर्व उत्पन्न या नाही तर त्या प्रकारच्या NOTES
बाबीवर खर्च होते. बहुशः यापैकी निम्मा खर्च खाण्यासाठी /अन्नासाठी होतो. साहजिकच
मुख्य अन्नधान्याच्या किंमती (अन्नधान्य, डाळी, तेल, भाज्या) त्यांच्या कल्याणासाठी
महत्त्वपूर्ण असतात.
• गरीब कुटुंबे सहसा मुलींपेक्षा मुलांसाठी शिक्षणामध्ये गुंतवणूक करतात.
• गरीब लोक राजकारणात फारसा भाग घेतात. एका अर्थाने ते वंचित असतात.
अर्थात काही अपवादात्मक उदाहरणे ही आहेत.
• गुन्हेगारी, बेकारी, आजारपण आणि जीवनावश्यक सुविधांचा गरिबांपर्यंत पोहोच
नसणे हे दारिद्र्याचे सहसंबंधी घटक मानले जातात .
• बऱ्याच देशांमध्ये दारिद्र्य हे जाती आणि वंशाशी संबंधित आहे. भारतातील
अनुसूचित जाती जमातीमधील लोक तसेच आदिवासी आणि यूएसए मधील कृष्णवर्णीय ही
ठळक उदाहरणे आहेत.

एखाद्या देशातील दारिद्र्य हे प्रामुख्याने दोन घटकांवर अवलंबून असते


१) राष्ट्रीय उत्पन्नाची सरासरी पातळी आणि
२) त्याच्या वितरणातल्या असमानतेचे प्रमाण

दारिद्र्यरेषा
दारिद्र्यरेषा म्हणजे किमान उत्पन्न, वापर किंवा सामान्यत: वस्तू आणि सेवा मिळण्याची
किमान शक्यता. जीवनमान या रेषेच्या खाली गेल्यास व्यक्ती गरीब मानल्या जातात.
दारिद्र्य रेषा ही खर्चाची अशी पातळी आहे ज्यावर किमान उष्मांकाचे अन्न आणि यांखेरीज
इतर अपरिहार्य वस्तूंच्या खरेदीची हमी असते.
हे लक्षात घ्यायला हवे, की गरिबांमध्येही गरिबीच्या प्रमाणामध्ये फरक आहे. तेव्हा
सरकारी धोरणांचे लक्ष सर्वांत गरीब लोकांवर केंद्रित असले पाहिजे.
अनेक देशांमध्ये वापरली जाणारी दारिद्र्य रेषा पोषणाधारित असते.

भारतातील दारिद्र्य
दांडेकर आणि रथ यांनी अपेक्षित सेवनाच्या किमान पातळीनुसार आहाराचे मूल्य
२,२५० कॅलरीज् एवढे निश्चित केल.े नियोजन आयोगाने दरमहा रु. २०/- दरमहा (म्हणजे
वार्षिक २४० रुपये) स्वीकारले, तर दांडेकर आणि रथ यांनी ग्रामीण लोकसंख्येसाठी त्याहून
कमी म्हणजे कमीतकमी (रु. १८० /- दर डोई प्रति वर्ष) आणि शहरी लोकसंख्येसाठी
त्याहून अधिक म्हणजे कमीतकमी (रु. २७०/- दरडोई प्रति वर्ष) अशी रक्कम १९६०-६१
च्या किंमतीनुसार सुचवली. १९६८-६९ च्या किंमतीनुसार ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येसाठी
याच रकमा अनुक्रमे रु. ३२४/- आणि रु. ४८६/- होत्या. या आधारे त्यांचा अंदाज असा
होता, की ग्रामीण भागातील ४० टक्के लोकसंख्या आणि शहरी लोकसंख्येपैकी ५० टक्के
लोक दारिद्र्य रेषेखालील आहेत.
पी.डी.ओझा यांच्या मते ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील लोकांची टक्केवारी Self-Instructional
१९६१ मध्ये ५२ टक्क्यांवरून वाढून १९६७-६८ मध्ये ७० टक्के झाली. Material 151
भारतीय बी.एस.मिन्हास यांनी दरडोई वार्षिक किमान खर्च रु. २४०/- घेऊन असा निष्कर्ष
अर्थव्यवस्थेचा... काढला, की जवळजवळ निम्मी ग्रामीण लोकसंख्या (५२ टक्के) १९६८ मध्ये दारिद्र्य
रेषेखालील जीवन जगत होती.
NOTES पी.के.बर्धन यांच्या अभ्यासानुसार असा निष्कर्ष काढला गेला आहे, की दारिद्र्यरेषेखालील
ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारी १९६०-६१ मध्ये ३८ टक्क्यांवरून वाढून १९६८-६९ मध्ये
५४ टक्के झाली आहे.
माँटेकसिंग अहलुवालिया यांच्या ग्रामीण दारिद्र्यावरच्या अभ्यासाचा ( १९७७ ) निष्कर्ष
असा होता, की ग्रामीण भागातील दारिद्र्य सुरुवातीला १९५० च्या मध्यभागी घटले आणि
५० टक्क्यांवरून १९६०-६१ मध्ये ते ४० टक्क्यांपर्यंत खाली आले; परंतु १९६७-६८ मध्ये
ते ५६.५ टक्क्यांपर्यंत वाढले. जेव्हा जेव्हा शेतीची उपज चांगली होती तेव्हा ग्रामीण दारिद्र्य
कमी होते, आणि जेव्हा शेती कमी होते तेव्हा ग्रामीण दारिद्र्य वाढते. हे लक्षात घ्यायला हवे,
की अहलुवालियांनी ग्रामीण भागासाठी १९६०-६१ मध्ये खर्चाची पातळी दरडोई प्रति महिना
रु. १५/- आणि शहरी भागासाठी दरमहा रु. २०/- अशी वापरली होती. अहलुवालिया यांनी
हे मान्य केले, की या पातळीवरील खर्च हा अत्यल्प पातळीवरील जीवनमान दर्शवितो.
सातव्या वित्त आयोगाने ‘वृद्धिंगत गरिबी रेखा’ ही संकल्पना वापरली. त्यामध्ये दरडोई
खाजगी ग्राहक खर्चासह सार्वजनिक खर्च; जसे की
(१) आरोग्य आणि कुटुंब नियोजन
(२) पाणीपुरवठा व स्वच्छता;
(३) शिक्षण;
(४) पोलिस, कारागृह व कोर्टाचे प्रशासन;
(५) रस्ते; आणि
(६) समाजकल्याण हेही विचारात घेतले.
जुलै २०१३ मध्ये नियोजन आयोगाने 'तेंडुलकर गरीबी रेषेच्या' आधारे २०११-१२
मधील दारिद्र्य आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार देशातील गरिबांची संख्या
२९. ८ दशलक्ष किंवा २१.९ टक्के इतकी आहे.े
नियोजन आयोगाने ग्रामीण व शहरी भागातील अनुक्रमे दरडोई मासिक खर्च ४९.१
आणि ५६.६ रुपये घेऊन दारिद्र्यरेषेचा अंदाज बांधला. जागतिक बँकेने भारतात १९८८
मध्ये ३९.६ टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखालील असल्याचे म्हटले आहे. ग्रामीण
भागासाठीची टक्केवारी ४१.७ टक्के व शहरी भागात ३९.६ टक्के होती.
नियोजन आयोगाच्या म्हणण्यानुसार भारतात दारिद्र्याचे प्रमाण १९७३-७४ मध्ये ५३.९
टक्के होते ते घटून १९८७-८८ मध्ये ३९.३ झाले. याच वर्षात ग्रामीण दारिद्र्य ५६.४
टक्क्यांवरून ३९.१ टक्क्यांवर आणि शहरी दारिद्र्य ४९.२ टक्क्यांवरून ४०.१ टक्क्यांवर
उतरले.
तक्ता : भारतातील टक्केवारी व गरिबांची संख्या

वर्ष गरिबांची टक्केवारी गरिबांची संख्या (लाख)


३२१
१९७३-७४ ५४.९
३०७
१९८७-८८ ३८.९
Self-Instructional
Material 152
भारतीय
३२० अर्थव्यवस्थेचा...
१९९३-९४ ३६.०
२६०
१९९९-२००० २६.१ NOTES

स्रोत: नियोजन आयोग, भारत सरकार.

भारत सरकारनुसार सध्या शहरी भागातील दारिद्र्यरेषा दरमहा रु. २९६ आणि ग्रामीण
भागासाठी दरमहा रु. २७६ अशी आहे. दररोज रु.१० पेक्षा कमी कमावणारे लोक दारिद्र्य
रेषेखालील समजले जातात. जीओआयनुसार, ही रक्कम वैद्यकीयदृष्ट्या मृत्यूपासून बचाव
करण्यासाठी पुरेसे म्हणजे दररोज २२०० कॅलरी इतके अन्न खरेदी करण्यास पुरेशी आहे.
कमाईच्या या पातळीवर, अगदी भारतासारख्या गरीब देशातही दररोज रु. १० वर निर्वाह हे
एक भयानक दुःस्वप्न आहे. भारतातील विकासाची सर्वांत मोठी शोकांतिका ही आहे, की
सुमारे २६० दशलक्ष लोक अद्यापही दररोज १० रुपयांपेक्षाही कमी उत्पन्नात जगत आहेत.

भारतातील दारिद्र्याची कारणे


१. आर्थिक विकासाचा मंद वेग
भारतात आर्थिक विकासाचा वेग कमी असल्यामुळे दारिद्र्य असल्याचे दिसून येत.े
१९५१ ते ८१ च्या कालखंडात भारतातील वृद्धी दर सरासरीने फक्त ३.५ टक्के होता. १९८१
ते १९९१ या काळात तो ५ टक्क्यांपर्यंत वाढला. १९९१ नंतरच्या आर्थिक सुधारणा काळात
वृद्धी दर ५.५ टक्के ते सहा टक्क्यांपर्यंत वाढला; पण सध्या आर्थिक वृद्धी दर पुन्हा कमी
झालेला दिसून येतो. लोकसंख्या वाढीच्या वेगाच्या मानाने आर्थिक वृद्धी दर कमी असल्याने
भारतातील दारिद्र्याचे प्रमाण जास्त आहे.

२. आर्थिक विषमता
साधनसंपत्तीच्या मालकी हक्कामुळे भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे विभाजन खूप असमान
झाले आहे. १९९१-९२ च्या रिझर्व्ह बँकेच्या पाहणीनुसार भारतातील २० टक्के अति गरीब
लोकांना राष्ट्रीय उत्पन्नाचा फक्त ८ टक्के हिस्सा मिळतो, तर दहा टक्के श्रीमंत लोकांना
राष्ट्रीय उत्पन्नाचा ३० टक्के वाटा मिळतो. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात आर्थिक विषमता
हेच दारिद्र्याचे मूळ कारण आहे. भारतात काही थोडे लोक श्रीमंत आहेत, तर फार मोठी
लोकसंख्या दारिद्र्यात आहे.

३. दरडोई उत्पन्न कमी


भारताचे दरडोई उत्पन्न कमी असल्यामुळे दारिद्र्य आढळते. विकसित देशांच्या तुलनेत
भारतातील दरडोई उत्पन्नाचे प्रमाण कमी आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार
भारताचे दरडोई उत्पन्न $२१०० आहे, तर अमेरिकेसारख्या प्रगत देशाचे उत्पन्न $ ६५,१००
आहे. देशातील दरडोई उत्पन्न कमी असल्यामुळे दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण
मोठे आहे.
Self-Instructional
Material 153
भारतीय
अर्थव्यवस्थेचा... ४. चलनवाढ
सातत्याने वाढणाऱ्या किमती हेही दारिद्र्याचे एक कारण आहे. जेव्हा किमतीत वाढ होते
NOTES तेव्हा पैशाची खरेदी शक्ती कमी होते आणि समाजातील कनिष्ठ मध्यम आणि गरीब
वर्गाच्या वास्तव उत्पन्नात पुन्हा घट होते. लोकांच्या राहणीमानाचा दर्जा खालावतो. चलन
वाढीमुळे देशातील गरीब लोकांच्या संख्येत वाढ झालेली आहे.

५. शिक्षणाचे कमी प्रमाण


भारतात २००१ च्या जनगणनेनुसार साक्षरतेचे प्रमाण ६५.३८ टक्के होते, तर २०११ च्या
जनगणनेनुसार हे प्रमाण ७४ .०४ टक्क्यांपर्यंत वाढले म्हणजे अजूनही २६ टक्क्यांपेक्षा
जास्त लोकसंख्या निरक्षर आहे. निरक्षर लोकांना साक्षर लोकांपेक्षा कमी वेतन मिळते.
त्यामुळे त्यांच्यात दारिद्र्य मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसते.

६. बेरोजगारी आणि अर्धरोजगारी


भारतात बेकारीची समस्या गंभीर आहे. लोकसंख्या वाढीच्या तुलनेने रोजगार निर्मितीच्या
वाढीचे प्रमाण कमी आहे. उद्योग-व्यापार क्षेत्रातही रोजगाराच्या संधींचे प्रमाण कमी असते.
परिणामी बेकारीचे प्रमाण जास्त असल्याचे आढळते. बेकारीमुळे दारिद्र्यातही भर पडलेली
दिसून येते.

७. लोकसंख्येची वाढ
लोकसंख्येच्या दबावामुळे प्रत्येक उत्पन्न कमावणाऱ्या सदस्यावर बरेच जण अवलंबून
असतात. तसेच छुपी बेरोजगारी हीदेखील एक समस्या आहे. शेतामध्ये केवळ चार
व्यक्तींसाठी काम असू शकते; पण सहा किंवा सात जण शेतावर असतील, तर अतिरिक्त
व्यक्तींची सीमान्त उत्पादकता शून्य आहे.

• भारतीय शेतीची उत्पादनक्षमता कमी आहे. त्यामुळे शेतीत गुंतलेले बहुतेक लोक
गरीब आहेत.
• ग्रामीण भागातील बहुतेक लोकांकडे पुरेशी मालमत्ता विशेषत: जमीन नाही. याचे
मुख्य कारण म्हणजे काही थोडक्या कुटुंबांच्या हातात जमीन एकवटलेली आहे.
• गरिबीच्या घटनांमध्ये प्रादेशिक बदलदेखील जास्त आहेत. उदाहरणार्थ १९८७-८८
मध्ये भारतातील ५८ टक्के गरीब लोक उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम
बंगाल आणि मध्य प्रदेश अशा पाच राज्यांत राहत होते.
• शहरी भागातील अनेक कामगारांना उप-रोजगाराचा त्रास सहन करावा लागला. ते
श्रमिक गरीब आहेत. ग्रामीण भागातून शहरी भागात लोकांचे स्थलांतर हेदेखील
शहरी दारिद्र्याचे एक कारण आहे.

बेरोजगारी
पूर्ण रोजगाराचा अर्थ
Self-Instructional पूर्ण रोजगार म्हणजे अशी परिस्थिती ज्यामध्ये काम करण्यास सक्षम आणि काम
Material 154 करण्यास इच्छुक अशा सर्व कामगारांना वाजवी वेतनात रोजगार मिळतो. याचा अर्थ असा
भारतीय
होत नाही, की सर्व प्रौढांकडे नोकरी आहे. अर्थव्यवस्थेचा...

बेरोजगारीचा अर्थ NOTES


बेरोजगारी म्हणजे अशी परिस्थिती ज्यामध्ये काम करण्यास सक्षम आणि काम करण्यास
इच्छुक असलेल्या कामगारांना रोजगार मिळत नाही.

रोजगारीचा अंदाज
वर्षाच्या २७३ दिवसांसाठी रोज ८ तास काम करणाऱ्या व्यक्तीला प्रमाणित व्यक्ती
वर्षाच्या आधारे नोकरदार समजले जाते. एनएसएसच्या (राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण) २७ व्या
फेरीत निष्पन्न झालेले बेरोजगारीचे तीन अंदाज खाली दिले आहेत.

१. साधारण प्रमुख स्थिती बेरोजगारी


हे लोक वर्षातील एका मोठ्या भागासाठी बेरोजगार राहिलेल्या व्यक्ती म्हणून मोजले
जातात. नियमित रोजगाराच्या शोधात असलेल्यांसाठी हे मोजमाप अधिक योग्य आहे, उदा.
सुशिक्षित आणि कुशल व्यक्ती ज्या लहानसहान / प्रासंगिक काम स्वीकारत नाहीत. याला
‘खुली बेकारी’ असेही संबोधले जाते.

२. साप्ताहिक स्थिती बेरोजगारी


याचा अर्थ सर्वेक्षण केलेल्या आठवड्यात एक तास कामही न मिळालेल्या व्यक्ती.

३. दैनिक स्थिती बेरोजगारी


सर्वेक्षण केलेल्या आठवड्यात ज्या लोकांना एक दिवस किंवा काही दिवस काम
मिळाले नाही अशा लोकांची संख्या दर्शवते.
बेरोजगारीचे किंवा बेकारीचे खालील प्रमुख प्रकार आहेत

१. घर्षणात्मक बेकारी
एक रोजगार सोडून दुसरा रोजगार मिळण्यापूर्वी काही काळ कामकरी बेकार असतो.
उपलब्ध असलेल्या रोजगारांची संख्या इच्छुक कामकऱ्यांइतकी व प्रसंगी अधिक असूनही
काम करणाऱ्याला पुरेशा माहितीअभावी अगर स्थलांतर व नोकरीतील बदल नकोसा वाटत
असल्यामुळे अशा प्रकारची बेकारी उद्‌भवते.

२. हंगामी बेकारी
काही उद्योगधंद्यांच्या हंगामी स्वरूपामुळे कामकऱ्यांना मिळणारा रोजगार हंगामी
स्वरूपाचा असतो व विशिष्ट हंगामात त्यांना काम मिळू शकत नाही. तेवढ्या हंगामापुरते ते
कामकरी ‘बेकार’ म्हणून गणले जातात. हंगामी कामकरी हंगामानंतर अन्य प्रकारचा रोजगार
शोधतात; परंतु तो लगोलग न मिळाल्यास मध्यंतरीच्या काळात घर्षणात्मक बेकारी उद्‌भवते.

३. संरचनात्मक बेकारी:
विशिष्ट अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक संतुलनाच्या अभावी त्या अर्थव्यवस्थेत Self-Instructional
संरचनात्मक बेकारी उद्‌भवते : Material 155
भारतीय
अर्थव्यवस्थेचा... निरनिराळ्या उत्पादन घटकांतील असंतुलन : उदा., श्रम व भांडवल वा भूमी.
अर्थव्यवस्थेत श्रम उपलब्ध असूनही त्याला पूरक असणारे भूमी अगर भांडवलासारखे
NOTES उत्पादन घटक उपलब्ध नसतील, तर रोजगार निर्माण होणार नाही व बेकारीची परिस्थिती
ओढवेल.
काही विशिष्ट प्रकारच्या श्रमाला पुरेशी मागणी नसल्यामुळे त्या श्रमाच्या बाबतीत
बेकारी उद्‌भवेल. याला विविध कारणे असू शकतात. एक म्हणजे उत्पादनतंत्रातील
बदलामुळे अगर मागणीतील बदलामुळे विशिष्ट प्रकारच्या श्रमाला बाजारात मागणी उरत
नाही. दुसरे, एखाद्या प्रदेशातून उद्योगव्यवसाय उठून गेले अगर कमी झाले आणि तेवढ्या
प्रमाणावर श्रमिक स्थलांतरित झाले नाहीत, तर त्या प्रदेशात बेकारी उद्‌भवते. तिसरे म्हणजे,
एखाद्या प्रदेशात बाहेरून फार मोठ्या प्रमाणावर श्रमिक स्थलांतरित होऊन आले – उदा.,
निर्वासितांचा लोंढा आला-तर त्या प्रदेशात त्यांना लगोलग रोजगार उपलब्ध होऊ शकत
नाही म्हणून ही बेकारी उद्‌भवते.

४. अपुरा रोजगार - न्यून रोजगार - अर्धबेकारी


देशातील बेकारीच्या परिस्थितीमुळे अंगी असलेल्या कुशलतेपेक्षा कमी कुशल आणि
म्हणून कमी वेतनाचा रोजगार कामकऱ्याला स्वीकारावा लागतो, त्याला ‘न्यून रोजगार’
म्हणतात.
सक्षम कामकरी दर आठवड्याला सामान्यतः जेवढे काम करू इच्छितो, त्यापेक्षा त्याला
कमी काम मिळते. उदा., आठवड्यात सामान्यतः कामकऱ्याची सहा दिवस काम करण्याची
क्षमता धरली, तर त्याला त्यापेक्षा कमी म्हणजे दोन किंवा तीनच दिवस काम मिळते. पुरेशा
रोजगारीचा अभाव हाही देशातील एकूण बेकारीच्या परिस्थितीचाच एक भाग आहे.

५. अदृश्य बेरोजगारी
काही वेळा व्यक्तींना त्यांच्या कुवतीपेक्षा कमी प्रतीचे काम करावे लागते किंवा
पात्रतेपेक्षा कमी वेतनावर काम करावे लागते अशा प्रकारच्या बेरोजगारीला अदृश्य बेरोजगारी
असे म्हणतात. या प्रकारात व्यक्तीला जरी काम मिळाले असले तरी ते अपुरे असते व
व्यक्ती ते नाईलाजाने स्वीकारते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे केवळ व्यक्ती
नोकरीवर आहेत याचा अर्थ त्या बेकार नाहीत असा होत नाही. अशा बेरोजगारीला अदृश्य
बेरोजगारी असे म्हणतात.

६. तांत्रिक बेरोजगारी
उत्पादनाच्या तंत्रात बदल झाल्यामुळे नवनवीन आधुनिक तंत्रांचा वापर जर उद्योगात
केला जात असेल, तर मानवी श्रमाची जागा यंत्र घेते व त्या कामगारांना बेकार व्हावे लागते.
तेव्हा त्यास तांत्रिक बेकारी असे म्हणतात.

७. छुपी बेरोजगारी
छुपी बेरोजगारीचा अर्थ असा, की बेरोजगार व्यक्तीच्या तसेच समाजाच्या पण लक्षात
येत नाही. या प्रकारात प्रत्यक्ष व्यक्ती जरी काम करत असताना दिसत असली तरी त्याच्या
Self-Instructional कामामुळे प्रत्यक्ष उत्पादनात वाढ झाल्याचे दिसत नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले, तर
Material 156 प्रत्यक्ष व्यक्ती काम करीत असल्या तरी सामाजिक व आर्थिक दृष्टिकोनातून त्या बेकार
भारतीय
असतात म्हणूनच अशा बेरोजगारांना छुपी बेरोजगारी असेही म्हटले जाते. अर्थव्यवस्थेचा...

८. हंगामी बेरोजगारी NOTES


औद्योगिक क्षेत्रातील कामगारांत या प्रकारच्या बेकारी आढळून येतात. कामगारांना
वर्षभर कामं मिळतातच असे नाही. तीन महिने, सहा महिने काम मिळते, व इतर वेळी
बेरोजगारीत जीवन जगावे लागते त्याला हंगामी बेरोजगारी म्हणतात.

जगात बेरोजगारांचा सर्वांत मोठा संचय भारतामध्ये असल्याचे दिसते. सीएमआयई


(सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी) च्या मते, भारतात ऑक्टोबरमध्ये बेरोजगारीचा दर
६.९ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. बेरोजगारांची संख्या जी २०१७ मध्ये १४ दशलक्षांवर आली
होती ती आता जवळपास ३० कोटी आहे. यामुळे बेरोजगारांना नोकरी देण्यात अपयशी
ठरणाऱ्या अर्थव्यवस्थेत काय दोष आहे हा प्रश्न पडतो.
ज्यांना नोकऱ्या हव्या आहेत आणि जे काम करण्यास इच्छुक आहेत अशा बेरोजगारांची
अधिकाधिक निराशा होत आहे. यामुळे त्यांच्या मनावर एक गंभीर मानसशास्त्रीय परिणाम
होतो जो विविध मार्गांनी प्रकट होत आहे. गेल्या वर्षीपासून बेरोजगारीचे प्रमाण जवळजवळ
सतत वाढत आहे. सन २०१८ मध्ये नोकरदार व्यक्तींची अंदाजे संख्या ३९७ दशलक्ष होती
जी २०१७ मध्ये काम करत असलेल्या ४०७ दशलक्षांपेक्षा २.४ टक्क्यांनी कमी आहे. (
२०१२ मध्ये भारताची एकूण कामगार संख्या ४८७ दशलक्ष होती.)
बेरोजगारी वाढण्याची कारणे अनेक आहेत. त्यांपैकी एक मुख्य कारण म्हणजे भारतीय
अर्थव्यवस्थेच्या वाढीचे प्रमाण निरंतर उच्च नाही कारण गुंतवणूक कमी आहे आणि जास्तीत
जास्त रोजगार निर्मिती करणाऱ्या उत्पादन क्षेत्राची वाढ गोगलगायीच्या वेगाने होत आहे.
सप्टेंबर २०२० मध्ये उत्पादन वाढीचा औद्योगिक निर्देशांक ४.२ टक्के होता. यात वस्तुनिर्माण
क्षेत्राची वाढ समाविष्ट असते. औद्योगिक व पायाभूत सुविधा क्षेत्रातील मंदी, विशेषत:
बांधकाम क्षेत्र आणि आयटी कमी निर्यात वाढीमुळे वर्षात केवळ १.९ टक्के नोकरभरती
झाली आहे.
असे निदर्शनास आले आहे, की खासगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रांतील
नोकऱ्या कमी होत आहेत. कॉर्पोरेट भारत वसुली अपेक्षित गतीपेक्षा कमी गतीने होत
असल्यामुळे कमी कर्मचारी घेत आहे. गेल्या ३ वर्षांत २०१७-१८ मध्ये इंडिया इंकच्या
कर्मचाऱ्यांची संख्या-वाढ सर्वांत कमी आहे. एका अहवालानुसार (कॅपिटलिन कंपन्यांच्या
वार्षिक अहवालानुसार ) २०१८ अखेर बीएसई २०० निर्देशांकातील भाग असलेल्या १७१
सूचीबद्ध कंपन्यांमार्फत ३.५. दशलक्ष लोकांना रोजगार मिळाला होता. ते बहुतेक कायम
कर्मचारी होते कारण बहुतेक कंपन्या कंत्राटी कामांवर असलेल्या आणि उप-कंत्राटदार
म्हणून काम करणाऱ्यांचा अहवाल देत नाहीत. गेल्या आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये सुमारे
६४,३८० कर्मचारी या कंपन्यांत भरती झाले, त्या तुलनेत त्या पूर्वीच्या वर्षीचा आकडा
१,१६,३०० होता. २०१४ मध्ये या सूचीबद्ध कंपन्यांमध्ये १८३७०७ कर्मचारी रुजू झाले होते.
कॉर्पोरेट क्षेत्रातील १० पैकी जवळपास ६ नवीन नोकऱ्या औद्योगिक नोकरभरतीमुळे
मिळत होत्या; परंतु गेल्या तीन वर्षांत मोठ्या उद्योगांच्या मंद वाढीमुळे कर्मचारी-संख्या
केवळ ०.५ टक्क्यांनी वाढली आहे. तसेच नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या आणि किरकोळ
बँका गेल्या तीन वर्षांत नोकरीनिर्मिती करणाऱ्या प्रमुख कंपन्या होत्या; पण सध्याच्या रोकड Self-Instructional
टंचाईच्या संकटाचा सामना करत असल्यामुळे त्यांनी नोकरभरतीत कपात केली आहे. Material 157
भारतीय
अर्थव्यवस्थेचा... सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन
गडकरी यांनी कबूल केले, की सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्या गोठल्या आहेत. सर्वसाधारणपणे
NOTES उदारीकरणानंतर अनेक आर्थिक उपक्रमांमधून माघार घेतल्यामुळे सार्वजनिक क्षेत्र संकुचित
झाले आहे. आयटीमुळे बँकांमध्ये नोकऱ्या कमी झाल्या आहेत; परंतु ग्रामीण भागातील
तरुणांमध्ये अजूनही सरकारी नोकरीला प्राधान्य जास्त म्हणजे ८२ टक्के आहे. त्यामुळे ते
नवीन गटांसाठी आरक्षण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
लाखो तरुणांनी भारतीय रेल्वेने घेतलेल्या ऑनलाइन भरती परीक्षेसाठी अर्ज केला आहे.
त्यात साधारणतः १२०,००० रिक्त पदांसाठी २४ दशलक्षाहून अधिक अर्ज आले . अगदी
पीएचडी असलेले लोकही सरकारी नोकरीच्या निम्नस्तरीय रिक्त जागांसाठी अर्ज करत
आहेत. यावरून हे स्पष्ट होते, की सामाजिक सुरक्षितता आणि उच्च किमान वेतनामुळे
लोकांना सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्या किती तीव्रतेने हव्याशा वाटतात / लोक सार्वजनिक
क्षेत्रातील नोकऱ्यांच्या किती तीव्रतेने मागे लागले आहेत.
कृषी क्षेत्रात, शेती सोडून व शहरांमध्ये काम मिळवण्यासाठी जाण्याची इच्छा
असलेले तरुण अधिकअधिक निराश होत आहेत. आज सुमारे १६ टक्के सुशिक्षित तरुण
बेरोजगार आहेत. ही स्थिती विशेषतः उत्तरेच्या राज्यांमध्ये तीव्र आहे. त्यांच्याकडे चांगले
जीवन जगण्याइतके वेतन देणाऱ्या नोकरीसाठी आवश्यक कौशल्यांचा अभाव आहे.
दुसरीकडे पेरणी, तणाची कोळपणी, उफणणी, आणि कापणी यांसारख्या शेतकामांच्या
यांत्रिकीकरणामुळे ग्रामीण भागातील महिला मोठ्या प्रमाणात बेरोजगार झाल्या आहेत.
जास्तीत जास्त ग्रामीण महिला बेरोजगार आहेत कारण मनरेगामध्ये कोणतेही राज्य महिलांना
१०० दिवस काम देत नाही. वास्तविक वेतनात आलेली मंदी आणि वेळेवर आणि नेमक्या
पगाराची खात्री देण्यातली सरकारची असमर्थता ही ग्रामीण महिलांना सर्वांत मोठ्या रोजगार
योजनेपासून दूर राहण्यासाठी परावृत्त करते.
शहरी भागात, महिला ऑटोमेशन/स्वयंचलनामुळे सचिव किंवा तत्सम नोकऱ्या आणि
इतर कमी पगाराच्या नोकऱ्या गमावत आहेत. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार भारतात
ऑटोमेशनच्या वापरामुळे भविष्यात ६९ टक्के नोकऱ्या कमी होतील. भारतातील बेरोजगारीच्या
वाढीसाठी मोठ्या प्रमाणात ऑटोमेशन जबाबदार आहे. सरकारला अधिक मानवी श्रमाधारित
उद्योगांना प्रोत्साहन द्यावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वरोजगार आणि सूक्ष्म, लघु व
मध्यम उद्योग (एमएसएमई) वाढविण्यावर भर देत आहेत आणि त्यांच्या वाढीसाठी अनेक
आर्थिक सवलती दिल्या आहेत.
ज्यामध्ये बऱ्याच एमएसएमईंचा समावेश अनौपचारिक क्षेत्रात होतो जे शेवटी नोकरी
शोधणाऱ्या लोकांना रोजगार देतात; परंतु या क्षेत्रात सामाजिक सुरक्षितता नाही आणि
बऱ्याचदा अमानवी परिस्थितीत काम करावे लागते. नोकरी शोधणाऱ्यांपैकी ९४ टक्के
लोकांना अनौपचारिक क्षेत्रात काम करणे भाग पडते. त्यामुळे आव्हान हे आहे, की
स्वयंरोजगार आणि लघु उद्योगांचे वर्चस्व असलेली आधुनिक चैतन्यशील अर्थव्यवस्था
निर्माण करणे जेणेकरून त्यामध्ये अधिकाधिक लोकांना रोजगार मिळू शकेल.
यामुळे रोजगाराचे चिंताजनक स्वरूप सुधारू शकते. श्रमिकशक्तीपैकी दोन तृतीयांश
लोक प्रासंगिक कामगार म्हणून काम करतात, तर केवळ १७ टक्के संघटित क्षेत्रात पगारदार
म्हणून काम करतात. सप्टेंबर २०१६ मध्ये जाहीर झालेल्या ५व्या राष्ट्रीय रोजगार-बेरोजगारी
Self-Instructional सर्वेक्षणानुसार केवळ ६० टक्के लोकांना पूर्ण वर्षासाठी काम मिळाले, तर ३५ टक्के
Material 158 लोकांनी केवळ ६ ते ११ महिने काम केल.े नोकऱ्यांची स्थिती अशा प्रकारे अस्थिर आणि
भारतीय
अनौपचारिक स्वरूपाची आहे. दुर्दैवाने, राष्ट्रीय रोजगार-बेरोजगारी सर्वेक्षण बंद केले गेले अर्थव्यवस्थेचा...
आहे. त्यामुळे आता विश्वासार्ह आकडेवारीसाठी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने
भारतातील रोजगार संख्या जाहीर करण्याची प्रतीक्षा करावी लागेल. NOTES
भारतातही बऱ्याचशा नोकऱ्या कमी दर्जाच्या आहेत आणि म्हणूनच लोकांना चांगल्या
नोकऱ्या मिळण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. याकरता कौशल्य प्रमाणपत्र तसेच
ध्येयकेंद्रित औद्योगिक धोरण आणि राष्ट्रीय रोजगार धोरण आवश्यक आहे. देशांतर्गत
स्पर्धेला उत्तेजन देण्याची आणि परदेशी स्पर्धेपासून देशी उद्योगांचे संरक्षण करण्याचीदेखील
गरज आहे. हे आवश्यक आहे कारण आपले बरेच लघु उद्योग चिनी उत्पादनांच्या भरमसाठ
आवकीमुळे नष्ट झाले आहेत. सरकारने निर्यातीला जोरदार बढावा द्यावा लागेल आणि
काही प्रमाणात आयातीला पर्याय निर्माण करावे लागतील.
भारतातील बेरोजगारीला अनेक कारणे जबाबदार आहेत. ती पुढीलप्रमाणे-

१. दारिद्र्य
भारतात दारिद्र्य व बेरोजगारी या दोन्ही समस्या तीव्र स्वरूपाच्या आहेत. अनेक
व्यक्ती गरीब असण्याचे कारण बेकारी हे आहे; पण त्याचबरोबर व्यक्तीचे दारिद्र्यही
बेकारीस कारणीभूत आहे. व्यक्ती गरीब असल्यामुळे त्यांच्याकडे साधनसामग्रीची कमतरता
असते. त्यामुळे त्यांना फायदेशीर रोजगार मिळवता येत नाही. गरिबीमुळे शिक्षण व
प्रशिक्षणावर खर्च करणे शक्य होत नाही. व्यवसाय सुरू करण्यात अडचणी येतात, नोकरी
मिळवण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो. गरीब लोकांना तो खर्च करता येत नाही त्यामुळे
त्यांना बेकार राहावे लागते.

२. लोकसंख्येतील अतिरिक्त वाढ


भारतात लोकसंख्या अतिरिक्त आहे. लोकसंख्येचा विस्फोट झाल्याचा अनुभव येत
आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे श्रम दलात मोठ्या प्रमाणात वाढ झाली मात्र वाढलेल्या श्रम
दलाला सामावून घेता येईल एवढ्या प्रमाणात रोजगार संधी देशात निर्माण न झाल्यामुळे
बेकारीचे प्रमाण जास्त आहे.

३. अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचा कमी वेग


अर्थव्यवस्थेतील रोजगार संधी या आर्थिक वृद्धीशी संबंधित असतात. आर्थिक वृद्धीचा
दर जास्त असेल, तर मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेतील शेती उद्योग व सेवा क्षेत्रात रोजगार
निर्माण होतो. भारतात नियोजन काळात अपेक्षित वेगाने आर्थिक वृद्धी घडून न आल्याने
पुरेशा रोजगार संधी निर्माण झाल्या नाहीत. भारतात आर्थिक विकासाचा वेग कमी असल्यामुळे
दारिद्र्य असल्याचे दिसून येते. १९५१ ते ८१ च्या कालखंडात भारतातील वृद्धी दर सरासरीने
फक्त ३.५ टक्के होता. १९८१ ते १९९१ या काळात तो ५ टक्क्यांपर्यंत वाढला. १९९१
नंतरच्या आर्थिक सुधारणा काळात वृद्धी दर ५.५ टक्के ते सहा टक्क्यांपर्यंत वाढला; पण
सध्या आर्थिक वृद्धी दर पुन्हा कमी झालेला दिसून येतो. एका बाजूला अतिरिक्त लोकसंख्या
व दुसऱ्या बाजूला आर्थिक वृद्धीचा अल्प वेग यामुळे देशात बेकारी मोठ्या प्रमाणात निर्माण
झाली.
Self-Instructional
Material 159
भारतीय
अर्थव्यवस्थेचा... ४. मागासलेली शेती
भारतात मोठ्या प्रमाणावरील बेकारीचे व अर्ध बेकारीचे प्रमुख कारण म्हणजे भारतीय
NOTES शेतीचे स्वरूप हे आहे. भारतात ६५ टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे
मात्र शेती प्रगत नाही. शेतीत परंपरागत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. भारतात दरडोई
शेतीची उपलब्धता कमी आहे. शेतीत आवश्यकतेपेक्षा जास्त लोकसंख्या काम करत आहे.
शेतकरी गरीब असल्याने ते आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत वापर करू शकत नाहीत. भारतीय
शेतीचे स्वरूप हंगामी आहे. तसेच दारिद्र्यामुळे कुक्कुटपालन, दूध व्यवसाय, मधमाशी
पालन, मासेमारी, अन्न प्रक्रिया अशा इतर पूरक किंवा पर्यायी स्वरूपाच्या रोजगार संधी
उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणावर बेकार आहेत.

५. औद्योगिकीकरणाचा अल्प वेग


नियोजन काळात देशात औद्योगिकीकरणाचा वेग वाढवण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर
प्रयत्न करण्यात आले. पायाभूत उद्योगांची सार्वजनिक क्षेत्रात उभारणी, पायाभूत सुविधांची
उपलब्धता, औद्योगिक धोरणात योग्य बदल, खाजगी क्षेत्रातील उद्योगधंद्याच्या वाढीत
प्रोत्साहन यांद्वारे देशात औद्योगिकीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या
प्रयत्नांना काही प्रमाणात यश येऊन देशात औद्योगिक प्रगती झाली मात्र शेती क्षेत्रातील
अतिरिक्त लोकसंख्येला सामावून घेता येईल एवढ्या प्रमाणात रोजगार संधी औद्योगिक
क्षेत्रात निर्माण झाल्या नाहीत. तसेच सर्वत्र सारखा व समतोल औद्योगिक विकास झाला
नाही. त्यामुळे औद्योगिक प्रगती कमी असलेल्या भागात लोकांना शेतीवरच अवलंबून राहावे
लागते. त्यामुळे देशात बेकारीचे प्रमाण मोठे आहे.

६. भांडवलप्रधान तंत्रावरील भर
भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेत शेती क्षेत्रावर भर दिला. मात्र दुसऱ्या योजनेपासून
औद्योगिक क्षेत्रावर भर देण्यात सुरुवात झाली. औद्योगिक विकास प्रामुख्याने भांडवल
प्रधान उत्पादन तंत्राच्या स्वीकारावर आधारलेला आहे. भांडवलप्रधान तंत्रामुळे रोजगार संधी
पुरेशा प्रमाणात निर्माण होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे बेकारीची समस्या निर्माण झाली.

७. सदोष शिक्षण व्यवस्था


भारतातील सुशिक्षितांची बेकारी वाढण्यास भारतातील सदोष शिक्षण पद्धती जबाबदार
आहे. अर्थव्यवस्थेतील मनुष्यबळाच्या गरजा विचारात घेऊन शिक्षणपद्धती विकसित
करण्यात आली नाही. त्यामुळे कारकुनी किंवा तत्सम नोकरी करू इच्छिणाऱ्या बेकारांची
संख्या वाढत गेली. व्यावसायिक स्वरूपाच्या शिक्षणावर भर न दिला गेल्याने स्वयंरोजगार
करू इच्छिणाऱ्यांचे प्रमाण कमी राहिले. अलीकडे व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वैद्यकीय,
माहिती व तंत्रज्ञान इत्यादी व्यावसायिक विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे; परंतु या शिक्षणात
नियोजनाचा अभाव आहे. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत
आहे; पण तेवढ्या रोजगार संधी निर्माण न झाल्याने व्यवसायिक शिक्षण घेतलेले विद्यार्थीही
मोठ्या प्रमाणावर बेरोजगार आहेत.

Self-Instructional ८. विषमता
Material 160 जेव्हा व्यक्तींमध्ये भौतिक संपत्ती किंवा एकूणच राहणीमानासाठीची आर्थिक परिस्थिती
भारतीय
समान नसते तेव्हा परिणामांची असमानता उद्भवते. विकास सिद्धांत प्रामुख्याने उत्पन्न / अर्थव्यवस्थेचा...
संपत्ती, शिक्षण, आरोग्य आणि पोषण यांसारख्या जीवनमानातील असमानतेशी संबंधित
आहे. तथापि, अर्थशास्त्रज्ञ सहसा उत्पन्न किंवा वापर या दृष्टीने या मोर्चांवरील प्रगतीचा NOTES
आढावा घेतात. ‘समानतेचा अभाव असलेली; विशेषत: प्रतिष्ठा, अधिकार आणि संधी
यांमध्ये समानता नसलेली स्थिती,’ असे संयुक्त राष्ट्र संघाने विषमतेचे वर्णन केले आहे.

विषमतेचे ढोबळ वर्गीकरण अशा प्रकारे केले जाऊ शकते:

आर्थिक विषमता: व्यक्ती किंवा समाजातील भिन्न गट यांच्यात उत्पन्न आणि संधीचे
असमान वितरण म्हणजेच आर्थिक विषमता.
सामाजिक विषमता : जेव्हा समाजातील संसाधनांचे समाजातील निकषांनुसार
आसमान वितरण केले जाते तेव्हा सामाजिक विषमता निर्माण होते. यामुळे समाजाने
ठरवलेल्या प्रवर्गांनुसार विशिष्ट आकृतिबंध तयार केले जातात. उदा. धर्म, नातलग, प्रतिष्ठा,
वंश, जाती, वांशिक वारसा, लिंग इत्यादी. समाजातील निकषांवर अवलंबून वेगवेगळ्या
प्रवर्गांसाठी सत्ता, प्रतिष्ठा आणि संपत्तीच्या स्त्रोतांचे असमान वितरण केले जाते.
या दोन्ही श्रेणी एकमेकांशी खोलवर निगडित आहेत आणि एका प्रकारची विषमता
दुसऱ्या विषमतेवर परिणाम करते, उदा. लिंगामुळे होणारी सामाजिक विषमता महिलांच्या
उत्पन्नावर मोठा परिणाम करते. पुरुषप्रधान समाजात लिंगानुसार वेतनात मोठा फरक असतो
.
भारतात असमानतेचे परिमाण:
भारतात सामाजिक असमानतेचे विशिष्ट प्रकार खालीलप्रमाणे आहेत:
लिंग - २०१८ सालच्या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टनुसार भारत १४९ देशांपैकी १४२ व्या
स्थानावर आहे.
लैंगिक असमानता मोजण्याचे चार मापदंड म्हणजे आर्थिक सहभाग आणि संधी,
आरोग्य आणि तग धरण्याची शक्ती, शैक्षणिक यश/अर्हताप्राप्ती आणि राजकीय सबलीकरण.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या मते भारतात स्त्री - पुरुषांमध्ये वेतनातील फरक
सर्वांत जास्त आहे. स्त्रियांना पुरुषांपेक्षा ३४% कमी वेतन दिले जाते.
देशातील शेतकी कामगार वर्गात ४२ टक्क्यांहून अधिक महिलांचा समावेश आहे, तरीही
भारत मानव विकास सर्वेक्षणानुसार (आयएचडीएस) त्यांच्याकडे एकूण शेतीच्या दोन
टक्क्यांपेक्षाही कमी शेतीची मालकी आहे.

जाती
शिक्षण, उत्पन्न, आरोग्य यांसारख्या संसाधनांमध्ये व्यक्तीसाठी मूल्यवान असलेल्या
संसाधनांच्या प्राप्तीसाठी जात ही महत्त्वाची निर्णायक बाब आहे.
जागतिक असमानता डेटाबेसनुसार भारतातील उच्च जातीच्या कुटुंबांनी २०१२ मध्ये
राष्ट्रीय वार्षिक सरासरी घरगुती उत्पन्नापेक्षा जवळपास ४७ टक्के अधिक कमाई केली
आहे. या जातींतील सर्वोच्च१० टक्के लोकांकडे गटातील संपत्तीपैकी ६० टक्के संपत्तीची
मालकी होती.
Self-Instructional
Material 161
भारतीय
अर्थव्यवस्थेचा...
धर्म
NOTES एखाद्या व्यक्तीच्या संसाधने जमवण्याच्या क्षमतेसाठी धार्मिक ओळख महत्त्वपूर्ण आहे.
धार्मिक ओळखीमुळे पूर्वग्रह निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आर्थिक अपवर्जन होऊ शकते
/ आर्थिक बाबींतून लोकांना वगळले जाऊ शकते आणि नोकरी आणि रोजीरोटीच्या
संधींवर प्रभाव टाकू शकणाऱ्या इतर प्रकारचा भेदभावही होऊ शकतो.
लोकसंख्येच्या तुलनेत ख्रिस्ती, पारशी आणि जैन या अल्पसंख्याकांचा उत्पन्न व
उपभोगाचा वाटा मोठा आहे, तर मुस्लिम आणि बौद्ध समाजाची आर्थिक संसाधनांपर्यंत
पोहोच लक्षणीय प्रमाणात कमी आहे.

वांशिकता
आदिवासींचे समुदाय, त्यांची विशिष्ट संस्कृती, भाषा, बोली, भौगोलिक स्थान, प्रथा
इत्यादींच्या आधारे वांशिक गट म्हणून ओळखले गेले आहेत.
सन २०१५-१६ च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात (एनएफएचएस- ४) असे दिसून
आले आहे, की अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येपैकी ४५.९ लोक संपत्तीच्या निम्नतम
ब्रॅकेटमध्ये आहेत. तुलनेने हे प्रमाण अनुसूचित जातींमध्ये २६.६ टक्के, इतर मागासवर्गीयांत
(ओ.बी.सी.) १८.३ टक्के तर इतर जातींमध्ये ९.७ टक्के आहे.

आर्थिक असमानता
सन २०१७-१८ च्या भारतीय आर्थिक सर्वेक्षणात सन २०१९-२०साठी गुंतवणुकीतील
आणि खपातील अपेक्षित वाढीचा विचार करून भारताच्या ‘वास्तविक जीडीपी’ची ७ टक्के
वाढ प्रक्षेपित/प्रोजेक्ट केली आहे. मागील विकास दराच्या आकडेवारीपेक्षा ही कमी झाली
असली तरी भारत अजूनही जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. त्याच
आर्थिक सर्वेक्षणात म्हटल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला पाच ट्रिलियन
अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी खासगी
गुंतवणुकीतून आर्थिक वाढीची रणनीती बनविली आहे. या वाढीच्या दरामुळे एकूण विचार
करता भारत सर्वांत प्रभावी कामगिरी करणाऱ्या देशांपैकी एक म्हणून उठून दिसतो; परंतु
दुसरीकडे असमानतेसंदर्भात असलेल्या उपाययोजनांबाबत, भारताची कामगिरी कमी प्रभावी
आहे.
२०१८ च्या जागतिक असमानता अहवालानुसार भारत हा जगातील सर्वांत असमान
देशांपैकी एक आहे. २०१६ मध्ये भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामधील सर्वोच्च दहा टक्के
कुटुंबांचा वाटा ५५ टक्के होता. ही सर्व देशांमध्ये नवीन सहस्राब्दीमधे (२०००–१५)
नोंदविण्यात आलेली सर्वांत जास्त वाढ आहे. या संख्येमुळे मध्यपूर्वेच्या( ६१ टक्के)
पाठोपाठ भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. १९८० सालामध्ये जेव्हा भारताची वाढ मंदावली
होती, तेव्हा पहिल्या दहा टक्के उत्पन्नातील हिस्सा अवघा ३१ टक्के होता.
जीडीपीच्या आधारे क्रय शक्ती समतेच्या संबंधात अमेरिका, चीन आणि भारत या
जगातील तीन मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. या तीन देशांपैकी भारत हा असा एकमेव देश
आहे जिथे सन १९९५ ते २०११ पर्यंत गिनी गुणांक (० ते १ दरम्यानचे असमानतेचे एक
Self-Instructional परिमाण, जेथे शून्य संपूर्ण समानता दर्शविते तर एक, अत्यंत असमानता दर्शवतो) सातत्याने
Material 162 वाढत गेला. सन १९९५ मध्ये तो ०.३१२ होता व वाढत जाऊन सन २०११ मध्ये तो ०.३४९
भारतीय
झाला. अर्थव्यवस्थेचा...
सहा दशकांपेक्षा अधिक काळासाठी भारताच्या वाढीच्या अनुभवाचा दीर्घकालीन
अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास ग्राहकांच्या खर्चावरील भारताच्या राष्ट्रीय नमुन्यांच्या NOTES
सर्वेक्षणावर आधारित होता. या अभ्यासामुळे सिद्ध होते, की १९९० च्या दशकाच्या
सुरुवातीच्या वर्षांत वाढीसह उपभोग असमानतेत वाढ झाली आणि त्यामागील दशकांतील
असमानता कमी होण्याच्या प्रक्रियेत उलट दिशेने बदल झाला.
अखिल भारतीय कर्ज व गुंतवणूक सर्वेक्षण (एडीआयएस) च्या आकडेवारीत वाढती
संपत्तीची असमानता दर्शविली गेली आहे. यात सर्वोच्च १० टक्के लोकांकडचा संपत्तीचा
वाटा १९९१ ते २०१२ या काळात ५२ टक्क्यांवरून ६३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, तर त्याच
काळात तळातल्या ५० टक्के लोकांकडचा संपत्तीचा वाटा ९ टक्क्यांवरून घसरून ५
टक्क्यांवर आला आहे. एडीआयएसमध्ये आकडेवारीत कॉर्पोरेट संपत्तीचा समावेश नाही,
यामुळे संपत्तीच्या असमानतेतली वाढ कमी दर्शवली जाण्याची शक्यता आहे.
हे सर्व पुरावे दर्शवित आहेत, की सर्वांत श्रीमंत कुटुंबे उर्वरित देशवासीयांपेक्षा अशा
(विषम) प्रकारे प्रगती करत आहेत. त्यामुळे भारताच्या आर्थिक वाढीचा अनुभव पाच
ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या चकचकीत आभासी प्रतिमेपेक्षा खूपच कमी
चमकदार वाटतो.

आर्थिक विषमतेची कारणे:


• राष्ट्रीय उत्पन्नाच्या विषम विभागणीला थोड्याबहुत प्रमाणात भांडवलशाही किंमत-
यंत्रणा, तर बऱ्याच अंशी भांडवलशाहीच्या आधारभूत संस्था कारणीभूत झालेल्या आहेत.
• समाजातील मालमत्तेच्या विषम विभाजनामुळे तसेच निरनिराळ्या व्यवसायांमध्ये
आणि उद्योगधंद्यांमध्ये कामगारांना व मजुरांना प्राप्त होणाऱ्या कमीअधिक उत्पन्नामुळे आर्थिक
विषमता निर्माण झाली आहे.
• मालमत्तेच्या खाजगी हक्कामुळे मूठभर धनिक वर्गातील व्यक्तींना भांडवलावरील
व्याज, जमिनीचा खंड, भाडेपट्टी, स्वामित्व शुल्क व भांडवलाच्या विनियोगापासून मिळणारा
नफा अशा वेगवेगळ्या मार्गांनी उत्पन्न मिळते.
• तसेच मालमत्तेवरील वंशपरंपरागत वारसाहक्कामुळेही आर्थिक विषमतेत मोठी
भर पडते.
• भांडवलशाही देशांत प्रामुख्याने दोन वर्ग दिसून येतात: एक वर्ग जमीनजुमला,
मालमत्ता स्वाधीन असलेल्या धनिकांचा व दुसरा वर्ग केवळ मानवी श्रमशक्तीशिवाय दुसरे
काहीच हाती नसलेल्या निर्धनांचा म्हणजे श्रमिकांचा. धनिकवर्गाला वर सांगितलेल्या अनेक
मार्गांनी उत्पन्न लाभते. याउलट श्रमिकवर्गाला केवळ मजुरी, मासिक वेतन, मेहनताना या
स्वरूपात उत्पन्न मिळते. औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या भांडवलशाही देशांत राष्ट्रीय उत्पन्नाचा
३० ते ३५ टक्के भाग एकूण लोकसंख्येच्या १० टक्के असलेल्या भांडवलदार वर्गाकडे, तर
उरलेले ६५ ते ७० टक्के उत्पन्न उर्वरित ९० टक्के जनतेला प्राप्त होते.
• निरनिराळ्या उद्योगधंद्यांत मजुरीचे दर वेगवेगळे असतात. वैद्यक, अभियांत्रिकी,
वकिली वगैरे उच्च व्यवसायांत प्रवेश मिळविण्यासाठी शिक्षणावर बराच खर्च करावा
लागतो. त्यामुळे अशा लायक व्यक्तींचा पुरवठा, त्या त्या व्यवसायातील मागणीच्या मानाने
बराच मर्यादित राहतो म्हणून ह्या व्यवसायांत वैयक्तिक उत्पन्नाचे प्रमाण अधिक असते. Self-Instructional
• गरीब जनतेला उच्च शिक्षण किंवा प्रशिक्षण यांवर अधिक खर्च करणे परवडत Material 163
भारतीय
अर्थव्यवस्थेचा... नाही. वेतनातील व अर्जनातील विषमता यांमुळे निर्माण होते.
• समाजातील आर्थिक विषमता बहुतांशी मालमत्तेच्या विषम विभाजनामुळे व
NOTES मालकी हक्काच्या परंपरागत प्राप्तीमुळे निर्माण झाली आहे.
• निरनिराळ्या उद्योगधंद्यांतील कमीअधिक वेतनांमुळे किंवा मजुरीच्या दरांमुळे
निर्माण होणारी आर्थिक विषमता त्या मानाने मर्यादित स्वरूपाची असते.

असंघटित/अनौपचारिक क्षेत्र
असंघटित क्षेत्रात व्यक्ती किंवा घरगुती मालकी किंवा भागीदारी आधारावर चालणाऱ्या
आणि एकूण दहापेक्षा कमी कामगार असणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या विक्री आणि उत्पादनात
भाग घेणाऱ्या सर्व खाजगी उद्योगांचा समावेश होतो.
असंघटित कामगार म्हणजे जे असंघटित क्षेत्रामध्ये किंवा घरगुती कामे करतात, तसेच
संघटित क्षेत्रांमध्ये कुठल्याही सामाजिक सुरक्षा लाभाशिवाय काम करतात अशा कामगारांना
असंघटित कामगार असे म्हणतात.

संघटित कामगारांचे वर्गीकरण :


१. व्यवसायानुसार : अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतकरी, मासेमारी करणारे,
जनावरांचे संगोपन करणारे (विड्यांना लेबल लावणे, पॅकिंग करणे अशा स्वरूपाचे काम
करणारे) विविध व्यवसायांतील कामगार, बांधकामावर काम करणारे, जनावरांच्या
चामड्याचे काम करणारे, विणकाम करणारे, कारागीर, विटा व दगड खाणीत काम
करणारे, लाकडे कापण्याच्या मिलमध्ये काम करणारे इत्यादी.

२. रोजगाराच्या स्वरूपानुसार : बांधील शेत कामगार, वेठबिगार, स्थलांतरित कामगार,


कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपाची कामे करणारे मजूर इत्यादी.

३. विशेष आपत्तीग्रस्त स्वरूपाचे कामगार : ताडी गोळा करणारे, सफाई कामगार,


ओझी वाहणारे हमाल, जनावरांच्या गाड्या हाकणारे, इत्यादी.

४. सेवा प्रकारातील कामगार : घर काम करणारे, नाभिक, भाज्या व फळ विक्रेते,


वर्तमान पत्र विक्रेते इत्यादी.

असंघटित क्षेत्राची वैशिष्ट्ये :


• भारतातील जवळपास ९१ टक्के लोक अनौपचारिक क्षेत्रात काम करून जगतात,
तर औपचारिक/संघटित क्षेत्रात केवळ ६.५ आणि घरगुती क्षेत्रात ०.८ टक्के लोक काम
करतात. पाच दक्षिण आशियाई देशांपैकी भारत आणि नेपाळमध्ये (९०.७ टक्के )
अनौपचारिक कामगारांचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. बांगलादेश (४८.९ टक्के ), श्रीलंका
(६०.६ टक्के) आणि पाकिस्तान (७७.६ टक्के) यांची या आघाडीवर बरीच चांगली
स्थिती आहे.
• अनौपचारिक अर्थव्यवस्थेतील महिला आणि पुरुष (एक सांख्यिकीय चित्र)
Self-Instructional तृतीय आवृत्ती या अहवालात असे म्हटले आहे, की सर्वांना योग्य/ प्रतिष्ठा राखणारे काम
Material 164 मिळण्यासाठी औपचारिक अर्थव्यवस्थेच्या दिशेने स्थित्यंतर ही जरुरी अट आहे. तसेच या
भारतीय
अहवालानुसार आशिया-पॅसिफिकमध्ये जवळजवळ १.३ अब्ज लोक - किंवा काम अर्थव्यवस्थेचा...
करणाऱ्या लोकसंख्येतील ६८.२ टक्के लोक अनौपचारिक अर्थव्यवस्थेत काम करतात.
• या अभ्यासात असेही दिसले, की या प्रदेशात २५ व अधिक वयोगटातील प्रौढ NOTES
कामगारांच्या संख्येच्या (६७.१%) तुलनेत अनौपचारिक अर्थव्यवस्थेत काम करणाऱ्या
१५-२४ वयोगटातील तरुणांची संख्या (९८.३) वाढत आहे.
• शिक्षणाची पातळी जितकी जास्त तितकी औपचारिक रोजगार मिळण्याची संधीही
जास्त असते. प्राथमिक शिक्षण घेतलेल्या ९० टक्के कामगारांच्या तुलनेत तृतीय-शिक्षित
कामगारांपैकी ३१ टक्के कामगार अनौपचारिक रोजगारामध्ये आहेत.
• अनौपचारिक अर्थव्यवस्था या क्षेत्राच्या सामाजिक-आर्थिक विकासाचा प्रमुख
भाग आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अहवालात असे नमूद केले आहे, की अनौपचारिक
नोकऱ्या प्रामुख्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात (८५.२ टक्के) आहेत, तर शहरी भागात
जवळजवळ अर्धा रोजगार (४७.४ टक्के) अनौपचारिक स्वरूपाचा आहे.
• आशिया-पॅसिफिक प्रदेशात बहुतेक सर्व शेती रोजगार (९४.७ टक्के) अनौपचारिक
आहेत आणि दक्षिण आशियामध्ये (ज्यात भारत आहे) ही टक्केवारी ९९.३ पर्यंत पोचली
आहे. औद्योगिक क्षेत्रात, अनौपचारिक रोजगाराचा हिस्सा (६८.८ टक्के) सेवा क्षेत्राच्या
(५४.१ टक्के) तुलनेत जास्त दिसतो.

अनौपचारिकता: जगभरातील घटना


जागतिक स्तरावर दोन अब्ज लोक - नोकरी करणाऱ्या एकूण लोकांपैकी ६१ टक्के
लोक अनौपचारिक अर्थव्यवस्थेत काम करतात. या अहवालात असे म्हटले आहे, की
जगातील ९३ टक्के अनौपचारिक रोजगार हे उदयोन्मुख आणि विकसनशील देशांमध्ये आहे
आणि यात शिक्षणाची पातळी ही एक महत्त्वाची बाब आहे.
अहवालात असे म्हटले आहे की, “जागतिक स्तरावर जेव्हा शिक्षणाची पातळी वाढत
जाते तेव्हा अनौपचारिकतेची पातळी कमी होते,” तसेच माध्यमिक व तृतीयक शिक्षण पूर्ण
केलेल्या लोकांत अनौपचारिक रोजगार स्वीकारण्याची शक्यता कमी असते.
त्या अहवालातील दोन लेखक, फ्लोरन्स बोनेट आणि विक्की लेंग यांनीदेखील
निदर्शनास आणून दिले आहे, की सर्व अनौपचारिक कामगार गरीब नसले तरी गरिबी हे
अनौपचारिकतेचे कारण आणि परिणाम दोन्ही आहे.
अनौपचारिकतेचे तिच्या सर्व रूपातील प्रमाण जास्त असल्याने कामगार, उपक्रम/
उद्योग आणि समाज यांच्यावर अनेक प्रतिकूल परिणाम होतात. विशेषतः सर्वांसाठी
प्रतिष्ठेच्या योग्य कामाची प्राप्ती आणि शाश्वत व सर्वसमावेशक विकास साकार करण्यासाठी
अनौपचारिकता हे एक मोठे आव्हान आहे,” असे आयएलओच्या सांख्यिकी विभागाचे
संचालक राफेल डायझ दे मदीना, यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
कृषी क्षेत्रात जगभरात सर्वाधिक प्रमाणात अनौपचारिक रोजगार (९३.६ टक्के) आहे.
उद्योग (५७.२ टक्के ) आणि सेवा क्षेत्र (४७.२ टक्के) यात अनौपचारिकता कमी आहे.
विशेषत: अरब राज्ये आणि आशिया-पॅसिफिकमधील सेवा क्षेत्रात अनौपचारिकता तुलनेने
कमी आहे.
तथापि, जेव्हा अनौपचारिक रोजगार हा रोजगाराचा मुख्य स्रोत असतो, तेव्हा विशेषत:
उदयोन्मुख आणि विकसनशील देशांमध्ये, सर्व क्षेत्रांमध्ये अनौपचारिकेची पातळी उच्च Self-Instructional
असते, असे अहवालात नमूद केले आहे. Material 165
भारतीय
अर्थव्यवस्थेचा... ६.२ धोरणात्मक उपाय
NOTES गरिबी निर्मूलन कार्यक्रम; रोजगार निर्मिती कार्यक्रम; कृषी विकास कार्यक्रम,
कौशल्य विकास कार्यक्रम

गरिबी निर्मूलन कार्यक्रम


गरिबी निर्मूलन कार्यक्रम हे देशातून दारिद्र्य निर्मूलनासाठी आर्थिक आणि मानवतावादी
मार्गाने उचलले जाणारे पाऊल आहे. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार जर एखादी व्यक्ती
दिवसाला १ डॉलर्स किंवा त्याहून कमी दिवस जगत असेल तर तो / ती अत्यंत गरीबीत
जीवन जगत आहे आणि सध्या जगातील ६७६७६७ दशलक्ष लोक या श्रेणीत आहेत.
मागील जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार २०११ मध्ये भारतातील २८८ दशलक्ष लोक
दिवसाला १.९० $ डॉलर्सपेक्षा कमी खर्चात जगतात. दारिद्र्य निर्मूलन आणि गरीब कुटुंबांना
मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी भारत सरकारने विविध कार्यक्रम व योजना सुरू केल्या.
प्रधानमंत्री आवास योजना आणि २०२२ पर्यंत सर्वांसाठी गृहनिर्माण यांसारख्या योजना
विकसित केल्या गेल्या ज्यायोगे ग्रामीण व शहरी गरिबांना घरे उपलब्ध करून देण्यात
येतील. स्टार्ट-अप इंडिया आणि स्टँड अप इंडिया यांसारख्या ताज्या सरकारी योजना
लोकांचे जीवन निर्वाह करण्यासाठी सक्षम बनविण्यावर लक्ष केंद्रित करतात.

धोरणात्मक उपाय (अलीकडील दोन-तीन कार्यक्रम):


गरिबी निर्मूलन कार्यक्रम:

१. प्रधानमंत्री जन-धन योजना:


मूलभूत बचत बँक खात्याची उपलब्धता, दुर्बल घटकांना विमा व पेन्शन सुविधा, विमा
व निवृत्तीवेतन यांसारख्या विविध वित्तीय सेवांची उपलब्धता सुनिश्चित करणे हे पंतप्रधान
जन-धन योजनेचे उद्दिष्ट आहे. केवळ प्रभारी तंत्रज्ञानाचा वापर केल्यास परवडणाऱ्या
किंमतीवर व्यापक प्रसार शक्य आहे.
पीएमजेडीवाय हे आर्थिक समावेशावरील राष्ट्रीय मिशन आहे ज्यात देशातील सर्व
कुटुंबांच्या सर्वसमावेशक आर्थिक समावेशासाठी एकात्मिक दृष्टिकोन समाविष्ट आहे. या
योजनेमध्ये, प्रत्येक कुटुंबासह किमान एक मूलभूत बँक खाते, आर्थिक साक्षरता, पत, विमा
आणि निवृत्तीवेतन सुविधा यांचा समावेश आहे. बँकिंग सुविधा देण्याची कल्पना केली
आहे. या व्यतिरिक्त रु. डेबिट कार्ड लाभार्थ्यांना दिले जाईल ज्यात अपघात विमा संरक्षण
एक लाख रुपयांचा समावेश आहे. या योजनेत सर्व सरकारी लाभ (केंद्रीय / राज्य /
स्थानिक संस्थांकडून प्राप्त झालेल्या) लाभार्थ्यांच्या खात्यात योजनाबद्ध करण्याचे आणि
केंद्र सरकारच्या थेट लाभ (डीबीटी) योजनेची कल्पना आहे. कमकुवत कनेक्टिव्हिटी,
ऑनलाईन व्यवहार यांसारख्या तांत्रिक अडचणी सोडवल्या जातील. दूरसंचार ऑपरेटरमार्फत
मोबाइल बँकिंग आणि रोख पैसे काढणे केंद्र म्हणून त्यांची स्थापना केलेली केंद्रे या
योजनेंतर्गत आर्थिक समावेशासाठी वापरली जाण्याची योजना आहे. या व्यतिरिक्त देशातील
तरुणांना या मिशन मोड कार्यक्रमात भाग घेण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न केले जात
Self-Instructional आहेत.
Material 166
भारतीय
योजनेचा तपशील अर्थव्यवस्थेचा...
प्रधानमंत्री जन-धन योजना (पीएमजेडीवाय) हे एक राष्ट्रीय वित्तीय समावेशन मिशन
आहे जे परवडणाऱ्या मार्गाने वित्तीय सेवा, बँकिंग / बचत आणि ठेवी खाती, पैस,े कर्ज, NOTES
विमा, निवृत्तीवेतनाची सुविधा सुनिश्चित करते.
कोणतीही बँक शाखा किंवा व्यवसाय प्रतिनिधी (बँक मित्र) आउटलेटमध्ये खाते
उघडता येत.े पीएमजेडीवाय खाती शून्य शिल्लक ठेवून उघडली जात आहेत. तथापि, जर
खातेदारांना पुस्तक तपासायचे असेल, तर त्याने किमान शिल्लक मापदंड पाळला पाहिजे.
प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
• जर आधार कार्ड / आधार नंबर उपलब्ध असेल, तर इतर कागदपत्रांची
आवश्यकता नाही. जर पत्ता बदलला असेल, तर सध्याच्या पत्त्याचे स्वत:चे प्रमाणीकरण
पुरेसे आहे.
• जर आधार कार्ड उपलब्ध नसेल, तर खालीलपैकी कोणत्याही अधिकृत वैध
कागदपत्रांची (ओव्हीडी) आवश्यकता असेलः मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स,
पॅनकार्ड, पासपोर्ट आणि नरेगा कार्ड. जर आपले कागदपत्र या कागदपत्रांपैकी असतील,
तर ते ‘ओळख आणि पत्त्याचा पुरावा’ म्हणून काम करू शकतात.
• जर एखाद्या व्यक्तीकडे वर नमूद केलेली ‘वैध सरकारी कागदपत्रे’ नसतील; परंतु
बँकेने त्याला 'कमी जोखीम' म्हणून वर्गीकृत केले असेल, तर तो खालील कागदपत्रे सादर
करून बँक खाते उघडू शकतो:

केंद्र / राज्य सरकार विभाग, वैधानिक / नियामक प्राधिकरण, सार्वजनिक क्षेत्रातील


उपक्रम, अनुसूचित व्यावसायिक बँका आणि सार्वजनिक वित्तीय संस्था यांनी जारी केलेल्या
अर्जदाराचा फोटो असलेले ओळखपत्र;
राजपत्रित अधिकाऱ्याने त्या व्यक्तीचे योग्य सत्यापित छायाचित्र असलेले पत्र दिले.

या योजनेशी संबंधित विशेष फायदे खालीलप्रमाणे आहेत


• ठेवींवरील व्याज.
• एक लाख रुपयांचा अपघात विमा संरक्षण.
• किमान शिल्लक आवश्यक नाही.
• प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत लाभार्थीच्या मृत्यूच्या सामान्य शर्तीची भरपाई
केल्यास ३०,००० रुपयांचा जीवन विमा देय असेल.
• भारतभर सहज निधी हस्तांतरण.
• सरकारी खात्यातील लाभार्थ्यांना या खात्यांमधून लाभ हस्तांतरण मिळेल.
• सहा महिन्यांपर्यंत या खात्यांच्या समाधानकारक कामकाजानंतर ओव्हरड्राफ्टची
सुविधा दिली जाईल.
• पेन्शन, विमा उत्पादनांमध्ये प्रवेश.
• पंतप्रधान जन-धन योजनेंतर्गत वैयक्तिक अपघात विमा अंतर्गत दावे देय असेल,
जर रुपे कार्डधारकाकडे कोणत्याही शाखेत, बँक मित्र, एटीएम, पीओएस, ई-कॉमर्स
इत्यादी चॅनेलवर किमान एक यशस्वी आर्थिक किंवा गैर-आर्थिक व्यवहार असेल, तर
स्वतःच्या बँकेमार्फत अपघाताची तारीख (बँक ग्राहक / रुपे कार्डधारक त्याच बँकेच्या Self-Instructional
वाहिनीवर व्यवहार) आणि / किंवा इतर बँक (बँक ग्राहक / रुपे कार्डधारक इतर बँक Material 167
भारतीय चॅनेलवर व्यवहार) तारखेच्या ९० दिवसांच्या आत केले असल्यास विमा कार्यक्रम २०१६-
अर्थव्यवस्थेचा... १७ या आर्थिक वर्षाअंतर्गत समाविष्ट करण्यास पात्र आहे.
• ५०००/- पर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा प्रत्येक कुटुंबासाठी फक्त एका खात्यात
NOTES उपलब्ध आहे, मुख्यत: कुटुंबातील स्त्रीसाठी.

२. दीनदयाल अंत्योदय योजना:


दीनदयाल अंत्योदय योजनेचे उद्दिष्ट कौशल्य विकास आणि इतर उपाययोजनांद्वारे
रोजगाराच्या संधींमध्ये वाढ करून शहरी व ग्रामीण गरिबी कमी करणे हे या योजनेचे उद्दिष्ट
आहे. कार्यक्रमाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन मेक इन इंडिया, सामाजिक आणि आर्थिक
उन्नतीसाठी कौशल्य विकास आवश्यक आहे. दीनदयाल अंत्योदय योजना, गृहनिर्माण व
शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू करण्यात आली. भारत सरकारने या
योजनेसाठी ५०० कोटींची तरतूद केली आहे.
ही योजना राष्ट्रीय शहरी आजीविका मिशन (एनयूएलएम) आणि राष्ट्रीय ग्रामीण
आजीविका मिशन (एनआरएलएम) चे एकत्रीकरण आहे.
राष्ट्रीय शहरी आजीविका मिशन (एनयूएलएम) यांना दीनदयाल अंत्योदय योजना - (डे-
एनयूएलएम) आणि हिंदीमध्ये राष्ट्रीय शहरी आजीविका मिशन असे नाव देण्यात आले आहे.
या दीनदयाल अंत्योदय योजनेंतर्गत सर्व ४०४१ शहरे व शहरे यांचा समावेश असेल. सध्या,
सर्व शहरी दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमांमध्ये केवळ ७९० शहरांचा समावेश केला आहे.

दीनदयाल अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय शहरी आजीविका मिशन:


शहरी गरीब कुटुंबांचे दारिद्र्य आणि जोखीम कमी करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
त्यांना स्वयंरोजगार आणि कुशल वेतन मिळणाऱ्या रोजगाराच्या संधींचा उपयोग करण्यास
समर्थ करून त्यांचे जीवनमान टिकवून ठेवता येईल. शहरी बेघरांसाठी टप्प्याटप्प्याने
अत्यावश्यक सेवांसह सुसज्ज निवारा देण्याचेही या योजनेचे उद्दिष्ट असेल. या योजनेमध्ये
शहरी रस्ता विक्रेत्यांना योग्य जागा, संस्थात्मक पत आणि सामाजिक सुरक्षा आणि
रोजगाराशी संबंधित अडचणी लक्षात घेता उभरत्या बाजारातील संधींमध्ये त्यांचे प्रवेश
सुनिश्चित करण्यासाठी कौशल्य प्रदान करण्याशी संबंधित आहे.

डीएवाई-एनयूएलएम चे घटक
या योजनेचे दोन घटक आहेत, एक ग्रामीण भारतासाठी आणि दुसरा शहरी भारतासाठी.
दीनदयाल अंत्योदय योजना म्हणून नियुक्त केलेला शहरी घटक गृहनिर्माण व शहरी
गरिबी निर्मूलन मंत्रालय (एचयूपीए) द्वारे लागू केला जाईल.
दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना म्हणून नियुक्त ग्रामीण भाग ग्रामीण
विकास मंत्रालयामार्फत राबविला जाईल.

योजनेची ठळक वैशिष्ट्ये


कौशल्य प्रशिक्षण आणि प्लेसमेंटद्वारे रोजगार - या अभियानांतर्गत शहरी गरिबांना
प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांना कार्यक्षम बनविण्यासाठी १५ हजार रुपयांची तरतूद
करण्यात आली आहे, जी ईशान्य आणि जम्मू-काश्मीरसाठी प्रति व्यक्ती १८ हजार रुपये
Self-Instructional आहे. शहरी गरिबांना बाजारपेठ देण्याच्या कौशल्यांमध्ये प्रशिक्षण देण्याची शहरी नागरिकांची
Material 168 मोठी मागणी शहर जीवन निर्वाह केंद्रांच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल.
सामाजिक एकता आणि संस्था विकास - सदस्यांच्या प्रशिक्षणासाठी बचत गट भारतीय
(एसएचजी) तयार करण्याच्या माध्यमातून हे केले जाईल, ज्यामध्ये प्रत्येक गटाला १०,००० अर्थव्यवस्थेचा...
रुपयांचे आरंभिक पाठबळ दिले जाते. नोंदणीकृत भागातील स्तरीय महासंघांना ५०,०००
रुपयांची मदत दिली जाते. NOTES

शहरी गरिबांना अनुदान - सूक्ष्म उद्योग व गट उपक्रमांच्या स्थापनेतून स्वयंरोजगारास


चालना दिली जाईल. या अंतर्गत गट प्रकल्पांवर वैयक्तिक प्रकल्पांसाठी २ लाख रुपयांचे
व्याज अनुदान आणि १० लाख रुपयांचे व्याज अनुदान देण्यात येणार आहे.

शहरी निराधारांसाठी निवारा - शहरी बेघरांसाठी निवारा बांधण्यासाठी लागणाऱ्या


खर्चाचा संपूर्ण खर्च योजनेंतर्गत आहे.

इतर साधने - विक्रेत्यांसाठी विक्रेता बाजारपेठ विकसित करणे आणि पायाभूत सुविधा
स्थापित करणे आणि कचरा उचलणारे आणि अपंगांसाठी विशेष प्रकल्प इत्यादीद्वारे
कौशल्यांचा प्रचार करणे.

योजनेचा प्रभाव:
• शहरी गरीबांची मालकी आणि फायदेशीर सहभाग आणि सर्व प्रक्रियांमध्ये त्यांचा
• सहभाग.
• संस्था रचना आणि क्षमता मजबूत करण्यासह प्रोग्राम डिझाइन आणि
अंमलबजावणीत
• पारदर्शकता.
• सरकारी अधिकारी आणि समुदायाची जबाबदारी.
• उद्योग आणि इतर भागधारकांसह भागीदारी.
• समुदाय स्वावलंबन, स्वावलंबन, स्वत:ची मदत आणि परस्पर मदत.

मार्गदर्शक तत्त्वे
राष्ट्रीय शहरी आजीविका मिशनचा (एनयूएलएम) मूळ विश्वास असा आहे, की गरीब
लोक उद्योजक असतात आणि गरिबीतून बाहेर पडण्यासाठी उत्सुक असतात. त्यांच्या
क्षमतेचा अर्थपूर्ण व शाश्वत रोजीरोटी निर्माण करण्यासाठी उपयोग करण्याचे आव्हान आहे.
राष्ट्रीय नागरी आजीविका मिशन (एनयूएलएम) असा विश्वास ठेवते, की कोणताही
उपजीविका कार्यक्रम केवळ वेळेवरच राबविला जाऊ शकतो, जर तो गरीब आणि त्यांच्या
संस्थांनी प्रशासित केला तर. अशा मजबूत संस्थात्मक संरचना गरिबांना त्यांच्या वैयक्तिक
मानवी, सामाजिक, आर्थिक आणि इतर मालमत्ता तयार करण्यात मदत करतात. अशा
प्रकारे ते सरकारी आणि खाजगी क्षेत्रांकडून अधिकार, हक्क, संधी आणि सेवा मिळविण्यास
सक्षम करतात आणि त्याच वेळी त्यांचे ऐक्य बळकट करतात, अभिव्यक्ती आणि व्यवहाराची
शक्ती वाढवतात.
संविधान (७४ वा दुरुस्ती) अधिनियम, १९९२ नुसार शहरी गरिबी निर्मूलन हे शहरी
स्थानिक संस्था (यूएलबी) चे कायदेशीर कार्य आहे. म्हणूनच शहरी स्थानिक संस्था
(यूएलबी) शहरे / शहरांमध्ये राहणाऱ्या शहरी गरीब लोकांशी संबंधित त्यांच्या सर्व Self-Instructional
कौशल्यांचा आणि जीवनाचा समावेश असलेल्या सर्व विषयांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये Material 169
भारतीय प्रमुख भूमिका निभावण्याची आवश्यकता आहे.
अर्थव्यवस्थेचा... शहरी गरिबांना कौशल्य विकास आणि कर्जाच्या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सामील
करणे हा एनयूएलएमचा उद्देश आहे. बाजारपेठवे र आधारित कामे आणि स्वयंरोजगारासाठी
NOTES शहरी गरिबांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा आणि सहज कर्ज मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल.
पिरॅमिडच्या पृष्ठभागावरील शहरी लोकसंख्येचा एक भाग स्ट्रीट विक्रेते आहेत. रस्ते
विक्री स्वयंरोजगाराचे साधन प्रदान करते आणि अशा प्रकारे मोठ्या सरकारी हस्तक्षेपाशिवाय
शहरी दारिद्र्य निर्मूलनाचे उपाय म्हणून काम केले जाते. त्यांना शहरी पुरवठा साखळीत
प्रमुख स्थान आहे आणि ते शहरी भागातील आर्थिक विकासाच्या प्रक्रियेचा अविभाज्य
आहेत. एनएलयूएमचे उद्दिष्ट आहे, की त्यांना त्यांच्या कामासाठी योग्य साइट्स प्रदान
करणे, संस्थात्मक पत, सामाजिक सुरक्षा प्रदान करणे आणि उदयोन्मुख बाजारातील संधींचा
फायदा घेण्यासाठी त्यांची कौशल्ये वाढविणे. त्या अनुषंगाने शहरी बेघरांना टप्प्याटप्प्याने
आवश्यक त्या सोयीसुविधा निवारा देण्याचे उद्दिष्ट एनयूएलएमचे आहे.
कौशल्ये, उपजीविका, उद्योजकता विकास, आरोग्य, शिक्षण, सामाजिक साहाय्य इ.
ची कार्ये राबविणारी मंत्रालये / विभाग आणि राज्य सरकारच्या कार्यक्रमांशी संबंधित
योजना / कार्यक्रमांमधील अभिसरण यावर एनयूएलएम जोर देईल. सर्व संबंधित विभागांना
ग्रामीण-शहरी स्थलांतरितांचे कौशल्य प्रशिक्षण, प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण आणि शहरी
गरीब लोकांच्या आजीविका दरम्यानचा पूल म्हणून एक सहकार्य धोरण तयार करण्यासाठी
सहकार्य करण्याची विनंती केली जाईल.
शहरी बेघर लोकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार आणि निवारा कामात मदत मिळवून
देण्यासाठी खासगी क्षेत्राचा सहभाग मिळविणे हे एनयूएलएमचे उद्दिष्ट आहे. हे शहरी
बेघरांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार आणि निवारा प्रदान करण्यात तसेच शहरी गरीब
उद्योजकांना ज्यांना स्वयंरोजगार मिळवायचा आहे आणि स्वत:चा खाजगी लघु उद्योग
किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करू इच्छितात त्यांना तांत्रिक, विपणन आणि एकत्रित
साहाय्य प्रदान करण्यात मदत करते. खाजगी आणि नागरी संस्था क्षेत्रातील सक्रिय
सहभागाची तरतूद करणे.

योजनेची देखरेख :
रिअल-टाइम आणि नियमितपणे या योजनेच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने
मंत्रालयाने एक ऑनलाइन वेब-आधारित व्यवस्थापन माहिती प्रणाली (एमआयएस)
विकसित केली आहे. एमआयएस २० जानेवारी २०१५ रोजी सुरू करण्यात आली.
एमआयएस प्रशिक्षण प्रदाता, प्रमाणपत्र संस्था, बँका आणि स्रोत संस्था यांसारख्या
भागधारकांना थेट आवश्यक माहिती थेट मिळविण्यास सक्षम करते, ज्याचा उपयोग
देखरेखीसाठी आणि इतर उद्दिष्टांसाठी केला जाऊ शकतो आणि शहरी स्थानिक संस्था,
राज्ये आणि एच.यू. पी.ए. मंत्रालयदेखील चालवू शकते.
याव्यतिरिक्त, संचालनालय डे-एनयूएलएम योजनेच्या अंमलबजावणीच्या प्रभावी
देखरेखीसाठी राज्य / केंद्रशासित प्रदेशांशी नियमितपणे आढावा बैठक आणि व्हिडिओ
कॉन्फरन्स आयोजित करेल.

३. प्रधानमंत्री किसान मानधन योजना:


Self-Instructional देशातील सर्व भूधारक लघु व किरकोळ शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी
Material 170 प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केली आहे.
• या शेतकऱ्यांची कमी बचत आहे आणि वृद्धापकाळापर्यंत जगताना त्यांचे जगण्याचे भारतीय
कोणतेही साधन नसते. वृद्धापकाळानंतर त्यांना निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी अर्थव्यवस्थेचा...
मदत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
• या योजनेंतर्गत सर्व पात्र लघु व सीमांतिक शेतकऱ्यांना ३,००० /- रुपये निश्चित NOTES
पेन्शन देण्यात येईल. ही एक ऐच्छिक व योगदान आधारित पेन्शन योजना आहे.
• भारतीय जीवन विमा महामंडळाने व्यवस्थापित केलेल्या पेन्शन फंडामधून
शेतकऱ्यांना पेन्शन दिली जाईल.
• निवृत्तीच्या तारखेपर्यंत म्हणजेच वयाच्या ६० वर्षे होईपर्यंत शेतकऱ्यांना पेन्शन
फंडामध्ये दरमहा रु. ५५ ते २०० रुपयांपर्यंतचे योगदान द्यावे लागेल.
• केंद्र सरकारही पेन्शन फंडामध्ये समान रकमेचे समान योगदान देईल.
• जे शेतकरी १८ वर्षे व त्यापेक्षा जास्त व ४० वर्षे वयाचे आहेत ते या योजनेत
सहभागी होण्यासाठी पात्र आहे.
• छोट्या व सीमांत शेतकऱ्यांचे पती-पत्नीसुद्धा स्वतंत्रपणे या योजनेत सामील
होण्यास पात्र आहेत आणि ६० वर्षांचे झाल्यावर त्यांना ३०००/- चे स्वतंत्र पेन्शनही
मिळेल.
• या योजनेत सामील झालेले शेतकरी नंतर कोणत्याही कारणास्तव पुढे जाण्याची
इच्छा नसल्यास ते ही योजना नंतर सोडू शकतात. पेन्शन फंडाचे त्यांचे योगदान
व्याजासह त्यांना परत देण्यात येईल.
• सेवानिवृत्तीच्या तारखेआधीच शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास पती / पत्नी मृत
शेतकऱ्याच्या उर्वरित वयापर्यंत बाकीचे योगदान देऊन ही योजना पुढे चालू ठेवू
शकतात.
• सेवानिवृत्तीच्या तारखेपूर्वी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास, जोडीदाराने पुढे चालू
ठेवण्याची इच्छा केली नाही तर शेतकऱ्याने व्याजासहित केलेले एकूण योगदान
पती / पत्नीला दिले जाईल.
• सेवानिवृत्तीच्या तारखेआधी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास, जोडीदार नसेल, तर
व्याजासह एकूण योगदान नामनिर्देशित व्यक्तीला दिले जाईल.
• सेवानिवृत्तीच्या तारखेनंतर जर शेतकरी मरण पावला तर पती / पत्नीला पेंशनच्या
५०% म्हणजे कौटुंबिक पेन्शन म्हणून दरमहा १५०० रुपये मिळतील.
• जर शेतकरी पीएम-किसन योजनेचा लाभार्थी असेल तर तो / ती पीएम-किसान
लाभ ज्या बँक खात्यात त्याला / तिला लाभ मिळतो त्याच बँक खात्यातून थेट
अनुदान देण्यास परवानगी देऊ शकते.
• या योजनेत सामील होण्यासाठी इच्छुक पात्र शेतकरी जवळील कॉमन सर्व्हिस
सेंटर (सीएससी) ला त्यांचा आधार क्रमांक आणि बँक पासबुक किंवा खात्याच्या
तपशिलासह भेट देतील.
• नंतर पंतप्रधान-किसान राज्य नोडल अधिकाऱ्यामार्फत किंवा इतर कोणत्याही
मार्गाने किंवा ऑनलाईन नोंदणी करून घेण्याची पर्यायी सुविधादेखील उपलब्ध
करून देण्यात येईल.
• या योजनेंतर्गत नोंदणी नि:शुल्क आहे आणि सीएससी केंद्रांवर शेतकऱ्यांना त्यासाठी
कोणतेही पैसे देण्याची गरज नाही.
Self-Instructional
Material 171
भारतीय रोजगार निर्मिती कार्यक्रम
अर्थव्यवस्थेचा...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना:
NOTES महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमाची अंमलबजावणी १९७७ पासून महाराष्ट्रात सुरू
झाली. राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ नुसार दोन योजना सुरू होत्या.
ग्रामीण भागात अकुशल व्यक्तींकरिता रोजगार हमी योजना व महाराष्ट्र रोजगार हमी
अधिनियम, १९७७ कलम १२(ई) नुसार वैयक्तिक लाभाच्या योजना.

• सदर योजनांना राज्य शासनाच्या निधीतून अर्थसाहाय्य केले जात होते.


• सन २००५ मध्ये केंद्र शासनाने संपूर्ण भारतात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा
(विद्यमान नाव - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा) लागू केला.
तसेच केंद्र शासनाने ज्या राज्यांनी पूर्वीपासून रोजगार हमी अधिनियम मंजूर केला
होता, अशा राज्यांना केंद्र शासनाच्या अधिनियमातील कलम २८ अन्वये त्यांचा
कायदा राबविण्याची मुभा दिली होती.
• तद्नुसार महाराष्ट्र शासनाने सन २००६ मध्ये पूर्वीचा कायदा ठेवण्याचा पर्याय
स्वीकारला आहे. मात्र, विधानमंडळाने केंद्रिय कायद्यास अनुसरून राज्यास निधी
मिळवण्याच्या अनुषंगाने १९७७ च्या कायद्यात आवश्यक त्या सुधारणा केल्या,
त्यामुळे योजना राबविण्याच्या कार्यपद्धतीत बदल झाला आहे.
• सद्य:स्थितीत राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियिम, १९७७ (दिनांक ६
ऑगस्ट, २०१४ पर्यंत सुधारित) अंमलात आहे व या कायद्यांतर्गत खालील दोन
योजना सुरू आहेत :-

अ) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र (MGNREGS)


या योजनेंतर्गत केंद्र शासन १०० दिवस प्रति कुटुंब रोजगाराची हमी देते व १०० दिवस प्रति
कुटुंब मजुरीच्या खर्चासाठी निधी पुरवते. प्रति कुटुंब १०० दिवसावरील प्रत्येक मजुराच्या,
मजुरीच्या खर्चाचा आर्थिक भार राज्य शासन उचलते.

ब) महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ सुधारित कलम (१२) (ई) नुसार
वैयक्तिक लाभाच्या योजना अनुदान तत्त्वावर प्रतिपूर्ती योजना म्हणून राबविण्यात येतात.

उदा. :
१) सिंचन विहिर योजना
२) रोहयोंतर्गत फळबाग लागवड योजना.

याशिवाय राज्य शासनाचा निधी पुढील बाबींकरिता वापरला जातो.

१) राज्य रोजगार हमी योजनेतील प्रगतीपथावरील अपूर्ण (कुशल) कामे पूर्ण


करण्याकरिता.
२) राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला देण्याकरिता.
Self-Instructional
Material 172
भारतीय
योजनेचे उद्देश अर्थव्यवस्थेचा...
अकुशल रोजगाराची पूर्तता, दीर्घकालीन टिकणारी कामे व त्याद्वारे सामाजिक पायाभूत
सोयी उपलब्ध करून देऊन ग्रामीण जनतेचे राहणीमान उंचावेल व कायमस्वरूपी मालमत्ता NOTES
तयार करणे हे योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. योजनेमध्ये वैयक्तिक व सार्वजनिक कामांचा
समावेश आहे.

योजनेचे स्वरूप
ग्रामीण भागात राहाणाऱ्या व अंगमेहनतीची कामे करणाऱ्या मजुरांना रोजगार उपलब्ध
व्हावा यासाठी राज्याची रोजगार हमी योजना व केंद्राची ग्रामीण रोजगार हमी योजना यांची
सांगड घालून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंमलात आणली आहे.
सन २००५ मध्ये केंद्र शासनाने संपूर्ण भारतात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा
(विद्यमान नाव - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा) लागू केला.

अ) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र (MGNREGS) या


योजनेंतर्गत केंद्र शासन १०० दिवस प्रति कुटुंब रोजगाराची हमी देते व १०० दिवस प्रति
कुटुंब मजुरीच्या खर्चासाठी निधी पुरवते. प्रति कुटुंब १०० दिवसावरील प्रत्येक मजुराच्या,
मजुरीच्या खर्चाचा आर्थिक भार राज्य शासन उचलते.

ब) प्रति दिन मजुरीचे दर केंद्र शासन निर्धारीत करते. सन २०१९-२० मजुरी दर रु.
२०६/- इतका आहे.

क) अकुशल भाग ६० %, व कुशल भाग ४० % असणारी कामे योजनेत समाविष्ट


आहेत.
ड) ऑनलाईन पद्धतीने माहितीचे संकलन केले जाते. सर्व माहिती nrega.nic.in
संकेतस्थळावर उपलव्ध.
लाभार्थी पात्रता
१. केंद्रिय कायद्याच्या परिशिष्ट १ मधील कलम १(iv) प्रमाणे योजना
अ) मग्रारोहयो विहिरी
ब) शेततळे (यंत्रसामुग्रीचा वापर न करता)
क) फळबाग लागवड
ड) भूसुधारणा
२. प्रत्यक्ष कामावर येणारा खर्च शासनाकडून करण्यात येतो.
३. जॉब कार्ड आवश्यक आहे.
४. ग्रामसभेद्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात येते व गटविकास अधिकारी प्रशासकीय
मान्यता देतात.
५. सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतीकडून अंमलबजावणी.
६. यंत्रसामुग्री वापण्यास मुभा नाही.
७. १५ दिवसांत मजुरी प्रदान करणे.
८. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यातील तरतुदीनुसार परिच्छेद २ Self-Instructional
मधील लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. Material 173
भारतीय ९. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन
अर्थव्यवस्थेचा... करणे बंधनकारक.

NOTES पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी)


वर्णन : खादी व ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) ही योजना राष्ट्रीय स्तरावरील
नोडल एजन्सी म्हणून राबविली आहे. राज्य स्तरावर ही योजना राज्य केव्हीआयसी
संचालनालय, राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळे (केव्हीआयबी) आणि जिल्हा उद्योग केंद्रे
(डीआयसी) आणि बँकांच्या माध्यमातून राबविली जाते. या योजनेंतर्गत शासकीय अनुदान
लाभार्थी / उद्योजकांना त्यांच्या बँक खात्यांमधील अंतिम वितरणासाठी ओळखल्या गेलेल्या
बँकांमार्फत केव्हीआयसीमार्फत दिले जाते.
मदतीचे स्वरूप मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राअंतर्गत मान्य असणाऱ्या प्रकल्प / युनिटची कमाल
किंमत २५ लाख रुपये आणि व्यवसाय / सेवा क्षेत्राखालील १० लाख रुपये आहे.

कोण अर्ज करू शकेल?


• कोणतीही व्यक्ती, १८ वर्षांपेक्षा जास्त वयाची.
• उत्पादन क्षेत्रात १० लाख रुपये जास्त आणि सेवा आणि व्यवसाय क्षेत्रात रु. ५
लाख किमतीच्या प्रकल्पांसाठी किमान आठवा मानक पास.
• पीएमईजीपीअंतर्गत केवळ नवीन प्रकल्प मंजुरीसाठी विचारात घेतले जातात.
• बचत गट (बीपीएलच्या सदस्यांसह ज्यांनी त्यांचा इतर कोणत्याही योजनेंतर्गत
लाभ घेतला नसेल तर), संस्था नोंदणी अधिनियम १८६० अंतर्गत नोंदणीकृत संस्था; उत्पादन
सहकारी संस्था आणि धर्मादाय विश्वस्त संस्थादेखील पात्र आहेत.
• विद्यमान युनिट्स (पीएमआरवाय अंतर्गत, आरईजीपी किंवा भारत सरकार किंवा
राज्य सरकारच्या कोणत्याही इतर योजना अंतर्गत) आणि ज्या युनिट्सने आधीपासून भारत
सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही इतर योजनेत शासकीय अनुदानाचा लाभ घेतला
आहे ते पात्र नाहीत.

पीएमईजीपी अंतर्गत लाभार्थ्यांचे स्वतःचे अनुदानाचा


लाभार्थींचे प्रवर्ग योगदान (प्रकल्प खर्चाचे) दर
क्षेत्र (प्रकल्प / युनिटचे
शहरी ग्रामीण
स्थान)
सामान्य श्रेणी १०% १५% २५%
विशेष (एससी / एसटी /
ओबीसी / अल्पसंख्यांक
/ महिला, शारीरिक अपंग, ०५% २५% ३५%
माजी सैनिक, एनईआर,
हिल आणि सीमा क्षेत्र इ.)

पीएमईजीपी अखिल भारतीय उपलब्धि – 


Self-Instructional पीएमईजीपीची प्रगती XI(२००८-०९ to २०११-१२) & XII Plan
Material 174 (२०१२-१३ to २०१५-१६)
भारतीय
एमएम साहाय्य अर्थव्यवस्थेचा...
एमएम अंदाजे
अनुदानाचा केलेल्या
वर्ष सबसिडी जारी रोजगार
उपयोग # प्रकल्पांची NOTES
(कोटी) उत्पन्न
(कोटी) संख्या
इलेव्हन
योजना एकूण
३१३१.६५ ३०६७.६९ १,६४,२८३ १६,०५,८६५
(२००-०-०९
ते २०११-१२)
२०१२-१३ १२२८.४४ १०८०.६६ ५७,८८४ ४,२८,२४६
२०१३-१४ ९८८.३६ १०७६.४५ ५०,४९३ ३,७८,९०७
२०१४-१५ १०७३.१७ # ११२२.५४ ४८,१६८ ३,५७,५०२
२०१५-१६ १०१३.५३ * ८७२.४४ * ३८१०३ * २७८१६० *
बारावी
४३०३.५ ४१५२.०९ १९४६४८ १४४२८१५
योजना एकूण
भव्य एकूण
[अकरा
७४३५.१५ ७२१९.७८ ३५८९३१ ३०४८६८०
आणि बारावी
योजना]
मागील वर्षाच्या वापरात नसलेल्या शिल्लक निधीसह
३०.०३.२०१६ पर्यंत रिलीझ आणि सर्व आकडेवारी
कृषी विकास कार्यक्रम
प्रधानमंत्री फसल बीमा योजना – पीएमएफबीवाय
प्रधानमंत्री फसल बीमा योजना (पीएमएफबीवाय) खरीप २०१६ पासून सुरू केली गेली
असून पेरणीपूर्वीपासून ते काढणीनंतरच्या अवस्थेपर्यंत सर्व प्रतिकार न करता येणाऱ्या
नैसर्गिक जोखमीविरुद्ध पिकांसाठी व्यापक जोखीम संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी
परवडणारे पीक विमा देऊन शेती उत्पादनास समर्थन देण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेने ८
पीक हंगाम पूर्ण केले आहेत आणि ही राज्ये / केंद्रशासित प्रदेशात (केंद्रशासित प्रदेशात)
राबविली जात आहेत.
ही योजना सुरू झाल्यानंतर कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय (एमओए आणि
एफडब्ल्यू), भारत सरकार (मॅन्युअल हस्तक्षेप) कमी करण्यासाठी आणि वापर कमी
करण्याच्या उद्देशाने या योजनेस अधिक प्रभावी, पारदर्शक आणि स्वयं-प्रशासन करण्यासाठी
प्रयत्न करीत आहे.
या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या भूतकाळातील अनुभवांच्या आधारे (२०१६ ते
२०१८ दरम्यान) विविध संशोधन संस्थांचे अभ्यास अहवाल आणि भागधारकांकडून
मिळालेला अभिप्राय विचारात घेऊन या योजनेचा आढावा घेण्यात आला व सुधारित Self-Instructional
ओ.जी. ०१ ऑक्टोबर २०१८ जाहीर करण्यात आल्या. Material 175
भारतीय योजनेची उद्दिष्टे
अर्थव्यवस्थेचा... • पीएमएफबीवायचे लक्ष्य कृषी क्षेत्रात शाश्वत उत्पादनास मार्गदर्शनाद्वारे समर्थन
देणे आहे.
NOTES • अनावश्यक उद्भवणाऱ्या घटनांमुळे पिकांचे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना
आर्थिक साहाय्य प्रदान करणे.
• शेतकऱ्यांची शेती सुरू ठेवण्यासाठी त्यांचे उत्पन्न स्थिर ठेवणे.
• शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण आणि आधुनिक शेती पद्धती अवलंबण्यास प्रोत्साहित
करणे.
• शेतकऱ्यांची पत वाढवणे, पिकांची विविधता आणि कृषी क्षेत्राची वाढ आणि
स्पर्धात्मकता वाढविणे तसेच उत्पादनाच्या जोखमीपासून शेतकऱ्याचे संरक्षण करणे.

योजनेची व्याप्ती
पीक विमा योजना जाहीर केलेल्या भागातील शेती करणारे आणि भाडेकरी शेतकऱ्यांसह
सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तथापि, विमा उतरवलेल्या पिकांमध्ये आणि
जमिनींमध्ये शेतकऱ्याचा विमायोग्य हितसंबंध असले पाहिजेत. अशा शेतकऱ्यांना राज्यातील
प्रचलित भूमी अभिलेखांची आवश्यक कागदपत्रे, पुरावे सादर करणे आवश्यक आहे
(रेकॉर्ड ऑफ राईट्स (आरओआर), जमीन ताब्यात प्रमाणपत्र) (एलपीसी) इत्यादी आणि
/ किंवा लागू करार / करार तपशील / इतर कागदपत्रे संबंधित राज्याने परवानगी दिलेली)
भागधारक / भाडेकरू शेतकरी आणि त्यासंबंधीचे सूचना सरकारच्या अधिसूचनेमध्ये असणे
आवश्यक आहेत. शेतकऱ्यांनी आधार क्रमांक आणि पेरणीच्या पिकाविषयी माहिती देणे
आवश्यक आहे.
पीएमएफबीवाय अंतर्गत काय समाविष्ट आहे?
प्रधानमंत्री फसल विमा योजना पीक विम्यात खालील बाबींचा समावेश करेलः
• भूस्खलन, गारपीट इत्यादी स्थानिक नैसर्गिक आपत्ती.
• पूर, कोरडे- ओले दुष्काळ, इत्यादी.
• पीक कापणीनंतर झालेल्या नुकसानीची भरपाईही या योजनेत करता येईल.
चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, इत्यादीमुळे या परिस्थिती उद्भवू शकतात.
• स्थानिक आपत्ती: अधिसूचित भागामध्ये मुसळधार पाऊस, दरडी कोसळणे आणि
पूर यांसारख्या स्थानिक जोखमीच्या घटनांमुळे बाधित स्वतंत्र शेतांचे नुकसान / नुकसान.
पुढीलपैकी कोणत्याही कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण लागू होणार
नाही.
• युद्ध आणि नातेवाईकांचा धोका
• आण्विक धोका
• दंगा
• द्वेषयुक्त नुकसान
• द्वेषाची चोरी किंवा कृत्य
घरगुती आणि / किंवा वन्य प्राणी चरणे आणि इतर प्रतिबंधित जोखीम कव्हरेजमधून
वगळल्या जातील. पीक नुकसानीचा अंदाज त्वरित काढण्यासाठी रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान,
स्मार्टफोन किंवा ड्रोन वापरण्याची योजना या योजनेद्वारे प्रस्तावित आहे.
Self-Instructional
Material 176
पीएमएफबीवायची वैशिष्ट्ये कोणती आहेत? भारतीय
प्रधानमंत्री फसल बीमा योजना (पीएमएफबीवाय) ची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेतः अर्थव्यवस्थेचा...

• अपूर्व कारणास्तव पीक नुकसानाविरुद्ध संपूर्ण विमा संरक्षण योजना. NOTES


• शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर करणे आणि नवीन शेती पद्धतींना चालना देणे हा
यामागील हेतू आहे.
• पेरणीपूर्व व काढणी नंतरच्या पिकाच्या होणाऱ्या नुकसान विम्यासाठी पात्र राहील.
• ही योजना मोठ्या प्रमाणात आपत्तींसाठी प्रत्येक अधिसूचित पिकासाठी 'फील्ड
अॅप्रोच बेसिस' (म्हणजे परिभाषित क्षेत्रे) वर लागू केली जाईल.
• सर्व विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना पिकासाठी ‘अधिसूचित क्षेत्र’ म्हणून परिभाषित
केले जावे ज्यास समान जोखीम आणि प्रति हेक्टर उत्पादनासाठी समान खर्चाचा सामना
करावा लागतो.
• प्रत्येक हेक्टर क्षेत्राला तुलनात्मक शेतीच्या उत्पन्नामुळे व अधिसूचित क्षेत्रातील
जोखमीमुळे समान पीक तोटा होतो.
• अधिसूचित पिकासाठी विम्याचे युनिट लोकसंख्यानिहाय एकसमान जोखीम
प्रोफाइल असलेल्या क्षेत्रासह मॅप केले जाऊ शकते.
• परिभाषित जोखमांमुळे स्थानिक आपत्ती आणि पिकानंतरच्या नुकसानीच्या
जोखमीसाठी, नुकसानीच्या आकलनासाठी विम्याचे युनिट बाधित वैयक्तिक शेतकऱ्याचे
विमा क्षेत्र असेल.
• पीएमएफबीवाय शेतकऱ्यांना प्रीमियम तरतुदींचा कॅप्शिंग तसेच विम्याच्या
रकमेवरील अन्य कपात काढून कोणत्याही प्रकारची कपात न करता संपूर्ण विम्याचा दावा
मिळवून देण्यास सोय करतो.
• भूस्खलन आणि गारपिटीबरोबरच, पूरक्षेत्र (पूर)देखील वैयक्तिक शेतीच्या
पातळीवर मूल्यांकन करण्यासाठी स्थानिक आपत्ती म्हणून समाविष्ट केले गेले आहे.
• पीएमएफबीवाय आता शेतीनंतरच्या नुकसानीसाठी वैयक्तिक शेतीच्या पातळीवर
मूल्यांकन केले जाते. यामध्ये देशभरात अवेळी आणि चक्रीवादळाच्या पावसामुळे होणाऱ्या
नुकसानीचा समावेश आहे ज्यामध्ये दोन आठवड्यांपर्यंत कोरडी ठेवलेली पिके नष्ट
होतात.
• रोखलेली पेरणी आता विम्याच्या रकमेच्या २५% पर्यंत दाव्यांसह प्रदान केली
जाते.
• जिल्ह्यांचा गट विमा कंपनीला देण्यात येईल. अशा प्रकारच्या क्लस्टर पद्धतीमुळे
पॉलिसीची प्रभावी अंमलबजावणी होईल. विमा कंपनीचे लोकेशन बिडिंग प्रक्रियेद्वारे ठरवून
३ वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी असेल.
• पीक हानीच्या वेगवान आणि कार्यक्षम अंदाजासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरले
जाते. ड्रोन्स, स्मार्टफोन आणि रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजीचा वापर केल्यास विमा हक्कांचा
तोडगा लवकर निघेल.
• सुधारित प्रशासन, उत्तम पारदर्शकता आणि समन्वय आणि माहितीचा प्रसार व्हावा
यासाठी पीक विम्याचे ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
• विम्याची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जमा केली
जाते. Self-Instructional
• तसेच, युनिफाइड पॅकेज विमा योजना (यूपीआयएस) यांना खरीप २०१६ च्या Material 177
भारतीय हंगामात देशातील ४५ जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यास मान्यता
अर्थव्यवस्थेचा... देण्यात आली होती, यासाठी यंत्रणा, जीवन, अपघात, घर आणि विद्यार्थी-सुरक्षा तसेच
शेतकऱ्याच्या अधिसूचित पिकांसह (पीएमएफबीवाय / हवामान आधारित पीक विमा योजने
NOTES अंतर्गत - डब्ल्यूबीसीआयएस) यांसारख्या इतर मालमत्ता / उपक्रमांची माहिती दिली गेली
होती.

प्रधानमंत्री किसान संपदा योजना


पीएम किसान संपदा योजना ही अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने (एमओएफपीआय)
सुरू केलेली एक केंद्रीय योजना आहे.
पीएम किसान संपदा योजना हे एक व्यापक संकुल आहे जेणेकरून फार्म गेटपासून
रिटेल आउटलेटपर्यंत कार्यक्षम पुरवठा साखळी व्यवस्थापनासह आधुनिक पायाभूत सुविधा
निर्माण करणे शक्य आहे. या योजनेमुळे देशातील अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या वाढीस चालना
मिळते आणि शेतकऱ्यांनाही चांगले उत्पन्न मिळण्यास मदत होते. ग्रामीण भागात मोठ्या
प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, प्रक्रियेची पातळी
वाढविणे, शेती उत्पादनांचा अपव्यय कमी करणे आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थाची
निर्यात वाढविणे हे एक मोठे पाऊल आहे.

पंतप्रधान किसान संपदा योजनेची वैशिष्ट्ये


• याचा खर्च ६००० कोटी आहे.
• सन २०१९-२० या वर्षात ही योजना लागू केली जाईल.
• अन्नाची नासाडी कमी करण्याच्या उद्देशाने विद्यमान व नवीन योजनांचे एकत्रीकरण
करणे, ग्राहकांना वाजवी दरात दर्जेदार भोजन उपलब्ध करून देणे आणि त्याचबरोबर
शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
• संपदा ही एक छत्री योजना आहे ज्याचा कालावधी १५४व्या वित्त आयोगाच्या
चक्रानुसार आहे. या योजनेंतर्गत विविध योजना राबविल्या जाणार आहेत.

पंतप्रधान किसान संपदा योजनेची वर्तमान स्थिती:


अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने फेब्रुवारी २०२० मध्ये पंतप्रधान किसान संपदा योजनेंतर्गत
३२ प्रकल्पांना मंजुरी दिली. हे प्रकल्प भारतातील १७ राज्यांत पसरलेले आहेत आणि
त्यासाठी रु. ४०६ कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.

इतर तपशीलः

रोजगार निर्मिती - पीएमकेएसवाय अंतर्गत ३२ प्रकल्प ग्रामीण भागातील रोजगाराच्या


संधींवर विशेष लक्ष देऊन थेट / अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करतील.

आधुनिक प्रक्रिया करण्याचे तंत्र - मंत्रालयाने कृषी उत्पादनांचे शेल्फ लाइफ


सुधारण्यासाठी आणि शेतकऱ्यांना स्थिर महसूल मिळवून देण्याची आधुनिक खाद्य प्रक्रिया
तंत्र विकसित केले आहे.
Self-Instructional
Material 178
भारतातील अन्न प्रक्रिया बाजारपेठेचे मूल्य - भारतातील अन्न प्रक्रिया बाजारपेठेचे भारतीय
मूल्य अंदाजे रु. आर्थिक वर्ष २०१८ मध्ये २६ अब्ज डॉलर्स आणि आर्थिक वर्ष २०२४ अर्थव्यवस्थेचा...
पर्यंत अंदाजे रु. ५३ अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहचेल, आणि वित्त वर्ष २०२० ते २०२४
कालावधीत १२.०९% च्या सीएजीआरने विस्तारित होईल. NOTES

प्रधानमंत्री किसान संपदा योजना


योजना स्थिती
मेगा फूड पार्क चालू आहे
एकात्मिक कोल्ड साखळी आणि मूल्य वर्धित पायाभूत चालू आहे
सुविधा
अन्न प्रक्रिया आणि संरक्षण क्षमतांचे निर्माण / विस्तार नवीन
अॅग्रो-प्रोसेसिंग क्लस्टर्ससाठी पायाभूत सुविधा नवीन
बॅकवर्ड आणि फॉरवर्ड सप्लाय लिंकेज तयार करणे नवीन
अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता हमी मूलभूत सुविधा चालू आहे
मानव संसाधन आणि संस्था चालू आहे
किसान संपदा योजनेची अंमलबजावणी
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने (एमओएफपीआय) फार्म ते मार्केटपर्यंतच्या खाद्य
शृंखलांसह अन्न प्रक्रियेसाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने ४२
मेगा फूड पार्क, २३६ एकात्मिक शीत साखळी तयार करण्यास मान्यता दिली आहे.
धान्य प्रक्रिया क्षेत्राला चालना देण्याबाबतची पावले उचलली जात आहेत. जेणेकरून
कापणीनंतरची नासाडी आणि घटीचे प्रमाण शून्य पातळीवर आणता येईल.
कृषी गटांची ओळख करून त्यांना अनुदान देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे जेणेकरून
उत्पादन केंद्रांकडून बाजारात अन्न उत्पादनांचे हस्तांतरण विनाव्यत्यय होईल.
संपदाचे उद्दिष्ट पुरवठा साखळी जोडणे, विद्यमान अन्न प्रक्रिया युनिट्सचे आधुनिकीकरण
/ विस्तार, प्रक्रिया व संरक्षण क्षमता निर्माण करणे इ. आहेत. भारतातील अन्न प्रक्रिया क्षेत्रात
नूतनीकरण करण्यासाठी हे सर्वसमावेशक पॅकेज आहे.
या योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून रोजगाराच्या संधी निर्माण, प्रक्रिया केलेल्या
अन्नाच्या निर्यातीला चालना मिळेल व अन्नाची नासाडी कमी होईल.
अन्न उत्पादन प्रक्रियेच्या क्षेत्राला चालना देण्यासाठी भारतात उत्पादित अन्न उत्पादनांच्या
संदर्भात ई-कॉमर्सद्वारे व्यापारात १००% थेट परदेशी गुंतवणूकीला परवानगी देण्यासारख्या
अन्य उपाययोजना सरकारने केल्या आहेत.
कौशल्य विकास कार्यक्रम
१. पंतप्रधान कौशल्य केंद्र योजना
देशाच्या बेरोजगार तरुणांना रोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी पंतप्रधान कौशल्य विकास
योजनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल.े या योजनेंतर्गत देशातील तरुणांना रोजगार
उपलब्ध होण्यासाठी विविध कोर्सेसमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार असून तरुणांना रोजगार Self-Instructional
उपलब्ध होण्यासाठी विविध अभ्यासक्रमांत प्रशिक्षण दिले जाईल. पंतप्रधान कौशल्य Material 179
भारतीय
अर्थव्यवस्थेचा... विकास २०२० चा फायदा देशातील दहावी, बारावीच्या ड्रॉप आऊटला (मध्येच शाळा
सोडलेल्याला) होऊ शकतो. पीएमकेव्हीवाय अंतर्गत प्रशिक्षण हे क्षेत्र कौशल्य परिषद
NOTES आणि संबंधित राज्य सरकार यांच्या देखरेखीखाली असेल.
या योजनेंतर्गत देशातील बेरोजगार तरुणांना बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर,
फूड प्रोसेसिंग, फर्निचर व फिटिंग्ज, हॅन्डक्रॉफ्ट, रत्ने व दागिने व चामड्याचे तंत्रज्ञान
यांसारख्या सुमारे ४० तांत्रिक क्षेत्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देशातील
तरुण त्यांच्या इच्छेनुसार प्रशिक्षण घेऊ इच्छित असलेला कोर्स निवडू शकतात (युवक ज्या
कोर्समध्ये त्यांना पाहिजे तसे प्रशिक्षण घेऊ शकतात.) प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना
(पीएमकेव्हीवाय) अंतर्गत भारत सरकारने देशातील प्रत्येक राज्य व शहरात प्रशिक्षण केंद्रे
सुरू केली असून त्यामध्ये लाभार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाईल. या प्रधान मंत्री कौशल्य
विकास योजना २०२० अंतर्गत केंद्र सरकार पुढील ५ वर्षांसाठी तरुणांसाठी उद्योजकता
शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते.
पंतप्रधान कौशल्य विकास योजनेचा उद्देश २०२०
• आपल्याला माहिती आहेच की, देशात बेरोजगार असे बरेच तरुण आहेत आणि
काही तरुणांना आर्थिक दुर्बलतेमुळे रोजगार मिळण्याचे प्रशिक्षण मिळू शकत नाही,
या सर्व अडचणी लक्षात घेऊन ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे.
• पंतप्रधान कौशल्य विकास योजना २०२० अंतर्गत देशातील तरुणांना रोजगार
उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देण.े
• या योजनेद्वारे देशातील सर्व तरुण संघटित केले जातील आणि त्यांच्या कौशल्यांमध्ये
वाढ करून त्यांच्या क्षमतेनुसार रोजगार मिळेल.
• उद्योग संबंधित, अर्थपूर्ण आणि कौशल्य आधारित प्रशिक्षण देऊन युवकांना
कौशल्य विकासासाठी प्रोत्साहित करणे आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध
करून देण.े

पंतप्रधान कौशल्य विकास योजना कसे कार्य करते?


प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना २०२० अंतर्गत देशातील तरुणांना जोडण्यासाठी
सरकारने अनेक दूरसंचार कंपन्यांना यात सहभागी करून घेतले आहे. या मोबाइल कंपन्या
संदेशाद्वारे सर्व लोकांना ही योजना उपलब्ध करून देण्याचे काम करतात.
या योजनेअंतर्गत मोबाईल कंपन्या या योजनेशी संबंधित लोकांना संदेश देतील आणि
उमेदवाराला मिस कॉल द्यावा लागेल असा नि:शुल्क टोल नंबर देतील.
मिस कॉल केल्यावर, तुम्हाला एका क्रमांकावरून कॉल येईल, त्यानंतर तुम्हाला
आयव्हीआर सुविधेशी जोडले जाईल. यानंतर, उमेदवाराला सूचना दिल्यानुसार त्याची
माहिती पाठवावी लागेल.
आपण पाठविलेली माहिती कौशल्य विकास योजना प्रणालीमध्ये संरक्षित केली जाईल.
ही माहिती मिळाल्यानतं र अर्जदारास त्याच्या निवासस्थानाजवळील प्रशिक्षण केंद्राशी जोडले
जाईल.

Self-Instructional
पंतप्रधान कौशल्य विकास योजनेतील अभ्यासक्रमाची यादी
Material 180 • अपंगत्व अभ्यासक्रम असलेल्या व्यक्तीसाठी कौशल्य परिषद
भारतीय
• आतिथ्य आणि पर्यटन कोर्स अर्थव्यवस्थेचा...
• टेक्सटाईल कोर्स
• टेलिकॉम कोर्स NOTES
• सुरक्षा सेवा कोर्स
• रबर कोर्स
• रिटेल कोर्स
• ऊर्जा उद्योग अभ्यासक्रम
• प्लंबिंग कोर्स
• खनन अभ्यासक्रम
• करमणूक व माध्यम कोर्स
• लॉजिस्टिक कोर्स
• जीवन विज्ञान कोर्स
• आयटी कोर्स
• लोह आणि स्टीलचा कोर्स
• जमीन व्यवस्थापन प्रणाली
• आरोग्य सेवा कोर्स
• ग्रीन जॉब्स कोर्स
• जेम्स आणि ज्वेलरी कोर्स
• फर्निचर आणि फिटिंग कोर्स
• फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री कोर्स
• इलेक्ट्रॉनिक्स कोर्स
• बांधकाम अभ्यासक्रम
• वस्तू आणि भांडवल अभ्यासक्रम
• विमा, बँकिंग आणि वित्त अभ्यासक्रम
• सौंदर्य आणि निरोगीपणा
• ऑटोमोटिव्ह कोर्स
• गारमेंट कोर्स
• कृषी अभ्यासक्रम
प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना २०२० पात्रता
• या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
• ही योजना केवळ त्यांच्यासाठी आहे जे बेरोजगार आहेत आणि ज्यांना उत्पन्नाचा
स्रोत नाही.
• महाविद्यालय / शाळा सोडणे - अर्जदारास हिंदी व इंग्रजी भाषांचे मूलभूत ज्ञान
असणे आवश्यक आहे.
• दहावी किंवा बारावीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण सोडले आहे त्यांना
एकत्रित केले जाईल आणि त्यांना एकाच ठिकाणी कौशल्य दिले जाईल.
पंतप्रधान कौशल्य विकास योजना २०२० साठीची कागदपत्रे Self-Instructional
• अर्जदाराचे आधार कार्ड Material 181
भारतीय
अर्थव्यवस्थेचा... • ओळखपत्र
• मतदार ओळखपत्र
NOTES • बँक खाते पासबुक
• मोबाइल नंबर
• पासपोर्ट आकाराचा फोटो

जन शिक्षण संस्थान
पूर्वी श्रमिक विद्यापीठ म्हणून ओळखले जाणारे जन शिक्षण संस्थान (जेएसएस) ही
योजना मार्च १९६७ पासून देशात स्वयंसेवी संस्थांच्या नेटवर्कमार्फत राबविली जात आहे.
प्रथम श्रमिक विद्यापीठ मुंबई [वरळी] येथे स्थापन करण्यात आले आणि बॉम्बे सिटी
सोशल कौन्सिल एज्युकेशन कमिटीने ही संस्था चालू केली. ही संस्था प्रौढ शिक्षण क्षेत्रात
गुंतलेली एक स्वयंसेवी संस्था आहे. या प्रकल्पाच्या यशानंतर भारत सरकारने टप्प्याटप्प्याने
देशात अशा संस्थांचे जाळे उभारण्यासाठी एक योजना विकसित केली.
वर्षानुवर्षेच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थेत परिवर्तनामुळे या बहु-शैक्षणिक
संस्थांची भूमिका आणि व्याप्ती अनेक पटींनी वाढली आहे. बदललेल्या परिस्थितीत श्रमिक
विद्यापीठ (एसव्हीपी) चे लक्ष शहरी भागातील औद्योगिक कामगारांकडून नॉन-साक्षर,
नवशिक्षित, अकुशल आणि बेरोजगार तरुणांकडे विशेषत: एससी / एसटी / ओबीसी /
अल्पसंख्याक / दिव्यांग / महिलांकडे गेल.े विशेषतः ग्रामीण भागातील वंचितांना देश
त्यानुसार एसव्हीपींचे नामकरण २००० साली जन शिक्षण संस्थान (जेएसएस) असे केले
गेल.े
जन शिक्षण संस्थानची योजना परिणामी जुलै २०१८ मध्ये मानव संसाधन विकास
मंत्रालयाकडून (एमएचआरडी) कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाकडे
(एमएसडीई) हस्तांतरित केली गेली.

उद्दिष्टे :
• अपंग / नवशिक्षित आणि शैक्षणिक प्राथमिक शिक्षण घेतलेल्या ८ वीपर्यंतच्या
विद्यार्थ्यांमधील व्यावसायिक कौशल्य आणि तांत्रिक ज्ञानात सुधारणा करणे उत्पादक
क्षमता वाढविणे आणि त्यांच्या रोजगाराच्या संधींमध्ये वाढ करणे.
• कौशल्य / अपस्किलिंगद्वारे जिल्ह्यातील पारंपरिक कौशल्ये ओळखणे आणि
प्रोत्साहन देण.े .
• कौशल्य विकासासाठी दाखल केलेल्या इतर विभाग / एजन्सीशी सहयोग आणि
समन्वय साधणे.
• सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रणालींचे ज्ञान आणि समजून घेण्याची श्रेणी
विस्तृत करणे आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे
• राष्ट्रीय मूल्यांचा प्रचार करणे आणि राष्ट्रीय कार्यक्रमांसह संरेखित करणे.
• स्वयंरोजगारास चालना देणे आणि क्रेडिट गट व कन्सोर्टियम सदस्यतेच्या साह्याने
Self-Instructional कर्जासहित आर्थिक साहाय्य मिळवून देण.े
Material 182
सद्य:स्थिती भारतीय
अर्थव्यवस्थेचा...
सध्या २७ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशातील २८८ जन शिक्षण संस्था आहेत,
त्यांपैकी १७ जेएसएस कार्यरत नाहीत. नवीन ८३ जन शिक्षण संस्था स्थापन करण्याचा NOTES
निर्णय घेतला गेला आहे.

मिशन मोड प्रोजेक्ट (एमएमपी):


मिशन मोड प्रोजेक्ट (एमएमपी) हा राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स योजनेत [ नॅशनल ई गव्हर्नन्स
प्रोजेक्ट (एनईजीपी)] एक स्वतंत्र प्रकल्प आहे जो बँकिंग, जमीन नोंदी किंवा व्यावसायिक
कर इत्यादींच्या बाबींवर लक्ष केंद्रित करते .
एनईजीपी मधील "मिशन मोड" म्हणजे ज्यात प्रकल्प, त्याची उद्दीष्टे, विस्तार स्पष्टपणे
परिभाषित केले जातात आणि त्यांच्या अंमलबजावणीची अंतिम मुदत आणि कार्यक्षमता
मोजण्याचे परिमाण आणि सेवा स्तर याचा समावेश आहे.
एनईजीपीमध्ये 44 मिशन मोड प्रोजेक्ट्स (एमएमपी) आहेत, ज्यांचे पुन्हा राज्य, केंद्रीय
किंवा समवर्ती प्रकल्पांमध्ये वर्गीकृत केले गेले आहे. प्रत्येक राज्य सरकार वैयक्तिक
गरजांनुसार पाच विशिष्ट एमएमपी देखील निर्धारित करू शकते.
या मुख्य योजनेतील काही महत्वाच्या योजनांची माहिती खाली दिलेली आहे
केंद्रीय मिशन मोड प्रकल्प (केंद्रीय एमएमपी)
बँकिंग
परिचालन कार्यक्षमता सुधारणे आणि व्यवहार करताना होणारा विलंब कमी करण्याच्या
दृष्टीने बँकिंग एमएमपी हे एक उचलले पाऊल आहे. एमएमपीचे उद्दीष्ट बँकिंग क्षेत्रातील
वैयक्तिक बँकांकडून राबविलेल्या विविध ई-सेवांना सुलभ करणे आहे. बँकिंग विभागाने
दिलेल्या व्यापक रूपरेषा आणि मार्गदर्शनासह एमएमपी संबंधित बँकेमार्फत राबविली जात
आहे.
भारतात कोअर बँकिंग तंत्रज्ञानाच्या विकासामुळे भारतीय ग्राहकांना "केव्हाही, कोठेही
बँकिंग" ची सुविधा देण्यात आली आहे. आता ही मोहीम विविध बँकांच्या कोअर बँकिंग
उपायाचे समाकलन करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, ज्याद्वारे संचालन व्यवहारांमध्ये
लागणारा वेळ कमी होईल आणि ग्राहक सेवेत वाढ होणे अपेक्षित आहे. यामुळे नियमांचे
पालन करणे सुलभ होईल.
बँकिंग एमएमपीमध्ये खालील सेवांचा समावेश आहे
• सिक्युरिटायझेशन अॅण्ड रिक न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सिअल अॅसेस्ट अॅण्ड
इनफोर्स अॅक्ट (सरफेसी कायदा) २००२ अंतर्गत इलेक्ट्रॉनिक सेंट्रल रजिस्ट्री
• एक भारत एक खाते - सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी
• इलेक्ट्रॉनिक मॅक्रो पेमेंट सिस्टम

केंद्रीय उत्पादन शुल्क


केंद्रीय अबकारी आणि सेवा कर उत्पादनात नियमितपणे व्यापार आणि उद्योग
चालविण्यासाठी केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमाशुल्क मंडळाने (सीबीईसी) ऑटोमेशन Self-Instructional
ऑफ सेंट्रल अबकारी आणि सेवा कर (एसीईएस) नावाचे एक सॉफ्टवेअर विकसित केले Material 183
भारतीय
अर्थव्यवस्थेचा... आणि राबविले आहे. . करदात्यांची सेवा सुधारणे, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि भारतात
अप्रत्यक्ष करामध्ये कार्यक्षमता आणणे हे एसीईएस चे उद्दीष्ट आहे. हा अनुप्रयोग वेब
NOTES आधारित आणि कार्यप्रवाह आधारित प्रणालींद्वारे केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सेवा कराच्या
सर्व प्रमुख प्रक्रियां स्वयंचलित करतो.

केंद्रीय अबकारी कर एमएमपीमध्ये पुढील सेवांचा समावेश आहे


• ऑनलाईन नोंदणी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क निर्धारितीची ऑनलाइन दुरुस्ती
• ऑनलाईन नोंदणी आणि सेवा कर निर्धारितीचे ऑनलाइन पुनरावलोकन
• इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केंद्रीय उत्पादन शुल्क परतावा दाखल करणे
• सेवा कर विवरण इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दाखल करणे
• विभागीय परवानग्या, आणि कामकाजाच्या कालावधीत निर्धारणाद्वारे सादर
केलेल्या दाव्यांसह इलेक्ट्रॉनिक पद्धतीने माहिती भरणे ,
• अद्वितीय दस्तऐवज ओळख क्रमांक असलेल्या कागदपत्रांची त्वरित ई-पावती
• ऑनलाईन दाखल केलेल्या कागदपत्रांची फाइल, फाईल व सद्य स्थिती पाहणे
• दावे, परवानग्या, निर्धारणाद्वारे दाखल केलेल्या माहितीवर कार्यवाही करणे
• महसूलचे पुन्हा-विनियोजन (ईझीटचा उपयोग करून बँकांकडून देयकाची
माहिती आणि निर्धारकांनी दिलेल्या विवरणपत्रामध्ये दिलेली माहिती परत
मिळाल्यास पुन्हा विनियोग)
• व्यवसायाशी संबंधित गोष्टींबद्दल वापरकर्त्यांना ऑनलाइन संदेश / सतर्कता
• स्वयंचलित अहवाल तयार करणे
• जोखीम मापदंडांमधून एकक -आधारित आणि लेखापरीक्षण केलेल्या
निकालांचा मागोवा घेण्यासह लेखापरीक्षण नियामक
• कारणे दाखवा नोटीससाठी ऑनलाईन दाखल करणे
• तात्पुरती मूल्यांकन करण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे
• दाव्यांचा परतावा ऑनलाईन दाखल करणे
• निवडलेल्या निर्यातीशी संबंधित कागदपत्रे ऑनलाईन दाखल करणे

ई-कार्यालय
माहिती व दळणवळण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कार्यालयांना आधुनिक
करण्याची गरज भारत सरकारने मान्य केली आहे. ई-कार्यालय मिशन मोड प्रकल्प
प्रशासकीय सुधारणा व लोक तक्रार विभागाने सरकारी कृती आणि सेवा वितरण प्रक्रियेत
कार्यक्षमता सुधारण्यासाठी हाती घेतला आहे.
या योजनेचे लक्ष्य कार्य प्रवाह आणि नियम आधारित फाइलचे मार्गक्रमन सुलभ
करणे, फायली आणि कार्यालयीन आदेशाची द्रुत शोध आणि पुनर्प्राप्ती, प्रमाणीकरणासाठी
डिजिटल स्वाक्षरी, फॉर्म आणि अहवाल देणारे घटक वाढविणे हे आहे.

ई-कार्यालयाद्वारे देऊ केलेल्या सेवा खालीलप्रमाणे आहेत


• फाइल्स पाठविताना / प्राप्त करताना डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र आणि
Self-Instructional कूटबद्धीकरणाद्वारे सुरक्षा वाढविणे
Material 184 • वापरकर्त्याचे नाव आणि संकेतशब्दाद्वारे प्रवेश स्वाक्षरीसह प्रमाणीकरण करणे .
भारतीय
• ई-फाइल्स / पावत्या पहाण्यासाठी / संपादित करण्यासाठी भूमिका आधारित अर्थव्यवस्थेचा...
प्रवेश, अशा प्रकारे अत्यंत गोपनीय प्रकारच्या फाइल्स / पावत्या सुरक्षित केल्या जातात.
• फायली / पावती परत मिळवण्यासाठी व त्यांच्या प्रलंबित, पावतीच्या फाइल्स / NOTES
पावतींच्या विशिष्ट श्रेणी दर्शविण्यासाठी सतर्कता प्रदान करण्यासाठी शक्तिशाली शोध
यंत्रणा.
• कार्यप्रवाह आधारित प्रणालीद्वारे आपत्ती व्यवस्थापनासाठी बॅक-अप घेणे.
• विभागांमधील संवाद आणि समन्वय सुधारण्यासाठी, संदेश पाठविणे, निर्देशिका
सेवा तयार करणे, चर्चा मंच आणि फायली / पावत्या हस्तांतरणासाठी संदेश वाहक
काढणे

आयकर:
ही योजना सर्वसमावेशक सेवा स्थापन करण्यासाठी भारतीय आयकर विभागामार्फत
राबविण्यात आली आहे ज्यायोगे नागरिकांना त्याची आयकर संबंधित सर्व कामे कोणत्याही
वेळी, आयकर विभागाकडे करता येतील. कंपन्यांनी दरवर्षी आयकर विवरण परतावा सादर
करणे बंधनकारक आहे.

याच्या सेवा खालीलप्रमाणे आहेत


• पॅन व टॅनचे वाटप
• बीजक स्थिती चौकशी
• पॅन / टीएएन अर्जाची ई-फाईलिंग
• प्राप्तिकर परतावा संगणकीकृत प्रक्रिया
• आपल्या पॅन / टॅन सुविधा जाणून घेणे
• संगणीकृत आयकर विवरण पत्र दाखल करणे (ई-फाइलिंग)
• पॅन / टॅक अनुप्रयोगांची स्थिती आणि तक्रार निवारणचा मागोवा घेणे
• विभागाच्या वेबसाइटद्वारे वेबवरील कर माहिती प्रसारित करणे
• बॅच पद्धतीने पॅन चौकशी करणे
• ऑनलाईन कर लेखा प्रणाली मार्फत कर देयकाचा हिशेब
• ऑनलाइन कर गणना
• संगणकीकरण, फाइलिंग, प्रोसेसिंगपासून देयकांपर्यंतची सर्व टीडीएस कार्ये
• डाउनलोड करण्यायोग्य ई-मेल
• ऑनलाईन वार्षिक माहिती परतावा दाखल करणे आणि वार्षिक माहिती
परतावा फाइलिंग माहिती
• ऑनलाईन रिटर्न तयारी सॉफ्टवेअर
• कराचे ई-पेमेंट
• बीजक डाउनलोड करणे
• परतावा त्वरित वितरणासाठी बँकर फंड

प्रश्नांच्या साहाय्याने आपली प्रगती पडताळा:


१. दारिद्र्यरेषा म्हणजे काय ? Self-Instructional
२. बेरोजगारी म्हणजे काय? Material 185
भारतीय
अर्थव्यवस्थेचा... ३. विषमता म्हणजे काय?
४. असंघटित क्षेत्र म्हणजे काय?
NOTES
प्रश्नांची उत्तरे पडताळा.
१ दारिद्र्यरेषा म्हणजे किमान उत्पन्न, वापर किंवा सामान्यत: वस्तू आणि सेवा
मिळण्याची किमान शक्यता. जीवनमान या रेषेच्या खाली गेल्यास व्यक्ती गरीब मानल्या
जातात. दारिद्र्यरेषा ही खर्चाची अशी पातळी आहे ज्यावर किमान उष्मांकाचे अन्न आणि
अन्नाखेरीज इतर अपरिहार्य वस्तूंच्या खरेदीची हमी असते.

२ बेरोजगारी म्हणजे अशी परिस्थिती ज्यामध्ये काम करण्यास सक्षम आणि काम
करण्यास इच्छुक असलेल्या कामगारांना रोजगार मिळत नाही.

३ समानतेचा अभाव असलेली; विशेषत: प्रतिष्ठा, अधिकार आणि संधी यामध्ये


समानता नसलेली स्थिती

४. असंघटित क्षेत्रात व्यक्ती किंवा घरगुती मालकी किंवा भागीदारी आधारावर


चालणाऱ्या आणि एकूण दहापेक्षा कमी कामगार असणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या विक्री
आणि उत्पादनात भाग घेणाऱ्या सर्व खाजगी उद्योगांचा समावेश होतो.

६.३ सारांश :
भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था असूनही ती विकसित देशांच्या
अर्थव्यवस्थेशी स्पर्धा करताना दिसून येत.े भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या
क्रमांकाची अर्थव्यवस्था असूनसुद्धा दारिद्र्य, बेरोजगारी, सामाजिक आणि आर्थिक विषमता
या गंभीर समस्या आहेत. तसेच असंघटित क्षेत्रांत काम करणाऱ्या कामगारांची संख्या ही
९१ टक्केपर्यंत आहे. या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सामाजिक सुरक्षा
योजनांचा लाभ होत नाही. बऱ्याचदा सरकारी योजनांचा लाभ या असंघटित क्षेत्रांतील
कामगारांना मिळत नाही यामुळे त्यांच्या दारिद्र्यात वाढ होते वा आर्थिक विषमता वाढते.
दारिद्र्य, आर्थिक विषमता कमी व्हावी तसेच रोजगार वाढावा यासाठी भारत सरकार
विविध योजना राबवत असते.

६.४ महत्त्वाचे शब्द :


गरिबी
संपूर्ण गरिबी
सापेक्ष गरिबी
Self-Instructional तात्पुरती गरिबी
Material 186 दीर्घ कालीन गरिबी
भारतीय
प्राथमिक गरिबी अर्थव्यवस्थेचा...
दुय्यम गरिबी
ग्रामीण गरीब NOTES
शहरी गरिबी
दारिद्र्यरेषा
बेरोजगारी
पूर्ण रोजगार
खुली बेरोजगारी
साप्ताहिक बेरोजगारी
दैनिक बेरोजगारी
विषमता
आर्थिक विषमता
सामाजिक विषमता
आर्थिक विषमता
अनौपचारिक क्षेत्र

६.५ स्वयं मूल्यमापनासाठी स्वाध्याय प्रश्न (लघु व


दीर्घ प्रश्न) :
लघु प्रश्न
१. दारिद्र्य म्हणजे काय?
२. दारिद्र्याची कारणे सांगा.
३. बेरोजगारी म्हणजे काय?
४. विषमतेची व्याख्या सांगा.
५ अनौपचारिक क्षेत्राची व्याख्या सांगा.

दीर्घ प्रश्न:
१. भारतातील दारिद्र्याची कारणे सांगा.
२. बेरोजगारीचे प्रकार सांगा.
३. भारतातील सामाजिक असमानतेचे विशिष्ट प्रकार सांगा.
४. भारतातील असंघटित क्षेत्राचे वैशिष्ट्य सांगा.
५. भारतातील आर्थिक विषमतेची कारणे सांगा.

६.६ अधिक वाचनासाठी साहित्य :


• भारतातील दारिद्र्य: दांडेकर वि. म., रथ नीलकंठ, पुणे १९७३ Self-Instructional
• Indian Economy since 1991, edited by BA Prakash Pearson, Material 187
भारतीय
अर्थव्यवस्थेचा... Delhi.
• Indian Economy, Ashwani Mahajan, S Chand and company,
NOTES New Delhi.
• Indian Economy, Mishra and Puri, Himalaya Publication.
• Dholakin, Jitendra, Unemployment and Employment Policy
in India, New Delhi, 1977.
• Government of India, Planning Commission I, II, III, IV and
V Reports of the Five Year Plans, New Delhi, 1952, 1956, 1961, 1970, 1976,
• Government of India, Report of the Committee of Experts on
Unemployment, New Delhi, 1973.
• Mehta, M. M. Industrialization and Employment With Special
Reference to Asia and the Far East, Bombay, 1976.
• Mishra, G. P. Anatomy of Rural Unemployment and Policy
Prescriptions : A Microscopic View, New Delhi, 1979.
• Puttuswami, K. Unemployment in India : Policy for
Manpower, New Delhi, 1977.
• Raj Krishna, Rural Unemployment : A Survey of Concepts
and Estimates For India, Delhi, 1976.
• Dalton, Hugh, The Inequality of Incomes, London, 1949.
• Tawney, R.H. Equality, New York, 1965.
• Report on Employment in Informal Sector and Conditions of
Informal Employment (2013-14)

Self-Instructional
Material 188

You might also like