You are on page 1of 2

8/17/22, 1:27 PM Navnath Bhaktisar...

Matrathi Kathasaar Aadhyay 28

मुख्य पृष्ट नवनाथसंप्रदाय नवनाथ भक्तिसार पारायण शाबारीविद्या तीर्थयात्रा अनुभव / अभिप्राय
संपर्क

  कथासार - अध्याय :
१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४०

अध्याय २८ कथासार
पिंगलेचे भर्तरीवरील प्रेम; त्याच्या कसोटीकरितां पाठविलेला निरोप; त्याचा दुष्परिणाम
अरण्यामध्यें दत्तात्रेयानें अनुग्रह दिल्यानंतर भर्तृहरीनें संसार करण्यासाठीं त्याजपाशीं बारा वर्षांचीं मुदत मागितली. ती
मिळाल्यानंतर तो उज्जैनीस गेला व रात्रीं भोजन झाल्यानंतर पिंगलेच्या महालांत गेला. महालांत जातांच पिंगलेनें त्यास
सुवर्णाच्या मंचकावरील पुष्पशय्येवर बसवून त्याची पूजा के ली व राजावरील आपलें प्रेम व्यक्त के लें. तीं उभयतां अगदीं जवळ
बसून विनोदाचीं भाषणें करूं लागली. मग राजानें तिला आपल्या डाव्या मांडीवर बसवून तिचे मुके घेतले व सर्वांमध्यें तूं माझी
आवडती आहेस; आपल्या दोघांच्या कु डी दोन, पण प्राण एकच आहे, अशा भावार्थाचीं व विनोदाचीं पुष्कळ भाषणें झालीं.
नंतर पिंगलेनें राजास तांबूल दिला आणि म्हटलें, महाराज, ब्रह्मदेवानें आपला जोडा निर्माण के ला, त्याप्रमाणें योगहि घडू न
आला. आपली एकमेकावरची प्रीति म्हटली म्हणजे जसें मीठ पाण्यांत मिळू न एकत्र होतें, त्याचप्रमाणें आपलें दोघांचें मन एक
होऊन गेलें आहे; परं तु निर्दय कृ तांत के व्हा धाड घालील ही भीति आहे. तुमच्यापूर्वी मी मरावें हा मार्ग उचित होय व ईश्वरकृ पेनें
जर असा योग घडू न आला, तर मी मोठी भाग्यवती ठरे न. असें पिंगला राणी बोलत असतां भर्तृहरे तिला म्हणाला, प्रिये ! ह्या
गोष्टी ईश्वराधीन आहेत, आपल्या कोणाच्या हातांतील नाहींत. त्याचा संके त काय आहे हें आपणांस कसें समजणार ? माझ्यपूर्वीं
तूं मरण इच्छीत आहेस ही गोष्ट कांहीं वाउगी नाहीं. परं तु सूर्यपुत्र ( यम ) अगदी निर्दय आहे. त्याच्यामध्यें विचाराचा लेशसुद्धां
नाहीं. तेव्हां न जाणों, जर तुझ्याअगोदर मी मरण पावलों तर पुढें तूं आपले दिवस कसे काढशील ? तेव्हां पिंगला म्हणाली,
ब्रह्मदेवानें कपाळीं काय लिहिलें आहे हें कळत नाही. पण जर तुम्ही म्हणता अशी गोष्ट घडू न आली, तर मी जीव ठे वणार नाही.
अग्नीत देहाची आहुति तुमच्या समागमें देईन.
पिंगला राणीचें हें भाषण ऐकू न भर्तृहरि म्हणाला, मी जिवंत आहें तोंपर्यत तुझें हें बोलणें ठीक आहे. परं तु स्वतः च्या जिवासारखी
प्रिय वस्तु दुसरी कोणतीच नाही. म्हणून जिवाचा घात कोणाच्यानं करवत नाहीं. मला खूष करण्यासाठी तुझें हें सारें बोलणें;
पण प्रसंग पडल्यानंतर हें बोलणें असेंच राहून जाईल ! राजाच्या या भाषाणावर पिगंलेनें उत्तम दिलें कीं, मी मनः पूर्वक बोललें
तरी तुम्ही तें खरें मानीत नाहीं. परं तु इतकी पक्की खात्री असूं द्या कीं, वैधव्याचा डाग मी माझ्या देहास कदापि लागूं देणार
नाही. कशावरून म्हणाला तर काया, वाचा, मन हीं मी तुम्हांस अर्पण के लीं आहेत. ह्यास साक्ष ईश्वर आहे. तो ईश्वर सत्यवादी
असल्याचें सर्व जग म्हणून सांगतें. म्हणून मी विधवा राहाणार नाहीं हें खचित, अशा रीतीनें त्याची समजुत करून ती उगीच
राहिली व राजानहि ह्या भाषणाचा अनुभव पाहण्याचा निश्चय के ला.
पुढें एके दिवशीं राजा अरण्यांत शिकारीस गेला असतां त्यास राणीच्या ह्या भाषणाची आठवण झाली. तेव्हां त्यानें असा प्रकार
के ला कीं, एक मृग जिवंत धरिला आणि त्याचा वध करून आपला मुकु ट व वस्त्रें त्याच्या रक्तानें भिजविलीं. नंतर तीं एक
सेवकाजवळ देऊन त्यास सांगितलें कीं, हीं वस्त्रें घेऊन तूं पिंगलेकडे जा व तिला सांग कीं, राजा शिकार करीत असतां वाघानें
त्याच्यावर झडप घालून त्याचा घात के ला. हा निरोप तिला कळविल्यासाठी राजानें त्या सेवकास अंवतीस पाठविलें व आपण
अरण्यांत स्वस्थ बसून राहिला.
राजाच्या सेवकानें अवंतीस जाऊन पिंगलेची भेट घेतली व ती रक्तानें भरलेलीं वस्त्रें पुढें ठे वून हात जोडू न उभा राहिला. राजानें
शिकवून ठे विल्याप्रमाणें त्यानें पिंगलाराणीस निरोप सांगितला व राजाच्या कलेवराचें दहन करून त्याच्याबरोबर गेलेलें उष्कर
लौकरच परत येईल, असें म्हटलें. सेवकाचे हे शब्द पिंगलेच्या कानीं पडले मात्र, तोंच तिची जी अवस्था झाली ती वर्णन करतां
येत नाहीं. ती कपाळ बडवून घेऊं लागली. के स तोडूं लागली, हेल काढू न मोठमोठ्यानें रडूं लागली. इतक्यांत राजवाड्यांत हे
दुः खकारक बातमी पसरली. ती ऐकू न राजाच्या बाराशें स्त्रिया रडत ओरडत धांवत आल्या व त्यांनीहि अतिशय शोक के ला.
पिंगलेस मात्र सर्वापैक्षां विशेष दुः ख झालें
शेवटी पिंगलेनें सती जाण्याचा निश्चय करून सर्व तयारी के ली. राजाचें वस्त्र परिधान
के लें, वाणें घेतलीं व समारं भानें स्मशनांत जाऊन अग्नि तयार के ला. सर्वांनी तिला आशीर्वाद दिले. नंतर तिनें अग्निकुं डांत उडी
टाकू न आपलें स्वहित साधून घेतलें. त्या वेळीं संपूर्ण नगरवासी लोक शोक करीत आपपल्या घरीं गेलें.
इकडे अस्तमान होऊन रात्र झाल्यावर राजा नगरांत जावयास निघाला. त्यावेळीं आपल्या मरणाची बातमी सांगण्यासाठी
https://navnathbhaktisar.org/kstart.php?no=28 ई 1/2
8/17/22, 1:27 PM Navnath Bhaktisar... Matrathi Kathasaar Aadhyay 28

राजवाड्यांत जो सेवक पाठविला होता त्याची राजास आठवण होऊन त्याच्या मनांत नानाप्रकारच्या वाईट कल्पना येऊं
लागल्या.
असा मोठा प्रसंग गुदरला असतांहि भर्तृहरीचा बंधु विक्रमराजा स्वस्थ कसा राहिला, ही कल्पना साहजिकच मनांत येते. तसेंच
ज्या नोकरानें राजवस्त्रें नेऊन पिंगलेस दिलीं होतीं, तो तरी या पल्ल्यास गोष्ट येऊन ठे पेपर्यंत स्वस्थ कसा बसला, अशीहि शंका
येते. परं तु या गोष्टीविषयींचा विचार करून पाहतां असें दिसतें कीं, तो सेवक वस्त्रें नेऊन दिल्यानंतर फार वेळ तेथें न राहतां
तसाच परत भर्तृहरीकडे अरण्यांत गेला; परं तु राजा दुसऱ्या रस्त्यानें परतल्यामुळें त्यांची चुकामुक झाली. तो सेवक मागाहून
त्यांस जाऊन मिळाला. तसेंच त्या समयीं विक्रमराजा मिथुलनगरास आपल्या आजोळी गेला होता. सुमंतीक प्रधान, शुभविक्रम
राजा वगैरे मंडळीही राजासमागमें गेलीं होती. राजवाड्यांत फक्त स्त्रियाच होत्या. गांवकरी लोकांनी पिंगलेस सती
जाण्याविषयीं हरकत के ली होती, पण तिच्यापुढें कोणाचें कांही चाललें नाहीं अज्ञानामुळें पिंगला मात्र प्राणास मुकली.
भर्तृहरी राजा गांवाच्या शिवेशीं येतांच द्वाररक्षकांनीं पिंगला सती गेलाचा वृत्तांत कळविला. तेव्हां राजास अत्यंत दुः ख झालें. तो
तसाच रडत, ओरडत स्मशानांत गेला व आपणहि पिंगलेप्रमाणें जळू न जावें, अशा उद्देशानें तो तिच्यासाठीं के लेल्या अग्नींत
उडी टाकू लागला. पण बरोबरच्या लोकांनीं त्यास धरून ठे वल्यामुळें राजाचा कांहीं इलाज चालला नाहीं. पिंगलेची ही अवस्था
झाल्यानें राजास अतिशय दुः ख झालें. तो तिचे एक एक गुण आठवून रडत होता.
पिंगला सती गेली म्हणून भर्तृहरी स्मशानांत
शोक करीत आहे, ही बातमी ऐकू न गांवचे लोकहि धांवत धांवत स्मशानांत आले. तेहि राजाबरोबर मोठमोठ्यानें रडूं लागले.
परं तु त्यांचें तें रडणें वरवर दाखविल्यापुरतेंचि होतें.
राजा शोकसागरांत पडला असतां लोक त्याची समजूत करूं लागलें कीं,
राजन् ! अशाश्वताचा शोक करून काय उपयोग ! ईश्वरावर भरं वसा ठे वून स्वस्थ असावें. अशा रीतीचा लोकांनी राजास पुष्कळ
बोध के ला. परं तु राजाचें तिकडे लक्ष जाईना. शेवटीं लोक आपापल्या घरोघर गेले. राजा मात्र स्मशांनांत पिंगलेच्या चितेशींच
बसून राहिला. राख भरून टाकण्यासाठीं दुसऱ्या दिवशीं लोक स्मशानांत गेले. परं तु भर्तृहरी चित्तेस हात लावूं देईना व
आपणहि तेथून उठे ना. या पल्ल्यास गोष्ट आल्यानंतर लोक निघून गेले. भर्तृहरी मात्र अन्नपाण्यावांचून तसाच तेथें रात्रंदिवस
बसून राहिला.
याप्रमाणें अवंतीमध्यें घडलेला प्रकार दू तांनीं मिथूलेस जाऊन विक्रमराजास सांगितला. तो ऐकू न सत्यवर्मा, शुभविक्रम,
सुमंतीक प्रधान आदिकरून सर्व मंडळींस अत्यंत दुः ख झालें. ते सर्व ताबडतोब उज्जैनीस आले व स्मशानामध्यें जाऊन
पाहतात तों त्यांना पिंगलेचें दुः ख करीत भर्तृहरी रडत बसलेला दिसला. तेव्हां विक्रमराजा भर्तृहरीची समजूत करूं लागला.
परं तु त्याला वेड लागल्यासारखें झालें तो पिंगला ! पिंगला ! असें म्हणून रडत होता. त्यास बोध करितां करितां दहा दिवस
गेल्यावर विक्रमानें पिंगलेची उत्तरक्रिया के ली. नंतर तो राज्यकारभार पाहूं लागला. विक्रमराजा त्यास नित्य जाऊन बोध करीत
असे. याप्रमाणें बारा वर्षें झाली. पण बोध के ल्यानें कांहीं फायदा झाला नाहीं. पिंगलेच्या दुः खाने भर्तृहरीनें अन्न सोडलें होतें व तो
फक्त झाडांची पानें खाऊन व उदक प्राशन करून राहिला होता. त्यायोगानें त्याचें शरीर कृ श झालें.
भर्तृहरीची अशी अवस्था पाहून मित्रावरूणीस ( सूर्यास ) त्याची दया आली. नंतर तो दत्तात्रेयाकडे गेला. दत्तात्रेयानें त्यास
येण्याचें कारण विचारलें असतां मित्रावरूणी म्हणाला, आपणांस सर्व ठाऊक आहे. मीच सांगितलें पाहिजे असें नाहीं. परं तु
सुचवायचें इतकें च कीं भर्तृहरीवर आपली कृ पा असूं द्या म्हणजे झालें. मग मित्रावरुणीस दत्तात्रेयानें धीर देऊन भर्तृहरीबद्दल
काळजी न वाहतां स्वस्थ मनानें जावयास सांगितिलें व मच्छिं द्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ यास मी भर्तृहरीकडे पाठवून त्यास बोध
करून ताळ्यावर आणतो, अशा रीतीनें मित्रावरूणीची समजूत करून त्याची रवानगी के ली.

॥ ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः ॥

  Privacy Policy Terms & conditions  

मराठी वधू वर उघडा

https://navnathbhaktisar.org/kstart.php?no=28 2/2

You might also like