Professional Documents
Culture Documents
तापात वापरता येण्यासारखी आयुर्वेदाची काही औषधे
तापात वापरता येण्यासारखी आयुर्वेदाची काही औषधे
१. महासुदर्शन घनवटी
१ अ. ताप : ताप येण्याची शक्यता असतांना किंवा ताप आलेला असतांना २ – ३ दिवस
एकेका गोळीचे चूर्ण कोमट पाण्यासह दिवसातून २ – ३ वेळा घ्यावे . ३ वर्षांखालील मुलांना पाव
प्रमाणात, तर ३ ते १२ वर्षे वयाच्या मुलांना अर्ध्या प्रमाणात औषध द्यावे. काही वेळा तापामध्ये
कोरड्या खोकल्याची ढास लागते. अशा वेळी मात्र हे औषध न वापरता संशमनी वटीसारखे
अन्य औषध वापरावे.
१ आ. पित्त होणे : घशात किंवा छातीत जळजळ होत असतांना हे औषध चावून खाल्ल्यास
लाभ होतो. त्रास होईल, तेव्हा १ गोळी चावून खावी. गोळी अत्यंत कडू असते.
२. संशमनी वटी
हे औषध नुकत्याच आलेल्या तापापेक्षा जुन्या तापामध्ये अधिक चांगले कार्य करते. (नुकत्याच
आलेल्या तापामध्ये महासुदर्शन घनवटी हे औषध घ्यावे .) या औषधामध्ये गुळवेलीसह
लोहभस्म, सुवर्णमाक्षिक भस्म आणि अभ्रक भस्म हे घटक असतात. यांमुळे रक्त सकस
बनण्यास साहाय्य होते. सर्वसाधारण रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठीही या औषधाचा
उपयोग होतो. कोरोना महामारीच्या काळामध्ये हे औषध फारच प्रसिद्ध झाले. गर्भवती,
बाळं तीण, लहान मुले, नाजूक प्रकृतीची माणसे, तसेच वयोवृद्ध यांनाही हे औषध निर्धाेकपणे
वापरता येते. दिवसातून एकेका गोळीचे चूर्ण २ वेळा घ्यावे. ३ वर्षांखालील मुलांना पाव
प्रमाणात, तर ३ ते १२ वर्षे वयाच्या मुलांना अर्ध्या प्रमाणात औषध द्यावे.
२ अ. जुनाट ताप : अंगात मुरलेल्या जुनाट तापामध्ये याचा चांगला उपयोग होतो. अशा
तापांमध्ये काही वेळा प्लीहा (स्प्लीन) वाढते. त्या वेळीही हे औषध उपयुक्त ठरते. हे औषध १
मास घ्यावे.
२ आ. पण्डु रोग : शरीर क्षीण होणे, थकवा आणि पण्डु रोग (हिमोग्लोबिन न्यून असणे)
यांमध्येही हे उपयुक्त आहे. हे औषध १ ते ३ मास घ्यावे . यांसह रक्त वाढवणारी अन्य औषधेही
घ्यावीत.
२ इ. पुष्कळ दिवसांचा खोकला : १ – २ आठवडे औषध घ्यावे. १ मासापेक्षा अधिक दिवस
खोकला चालू असल्यास वैद्यांचा सल्ला घ्यावा.
२ ई. श्वेतप्रदर (योनीमार्गातून पांढरा स्राव होणे) आणि वीर्यस्राव : १ ते ३ मास औषध घ्यावे.
३. जयमंगल रस
औषधे स्वतःच्या मनाने न घेता वैद्यांच्या मार्गदर्शनानुसारच घ्यायला हवीत; परंतु काही वेळा
वैद्यांकडे लगेच जाता येण्यासारखी स्थिती नसते. काही वेळा वैद्यांकडे जाईपर्यंत लगेच औषध
मिळणे आवश्यक असते, तर काही वेळा थोडीफार औषधे घेतल्यावर वैद्यांकडे जाण्याची वेळच
येत नाही. त्यामुळे ‘प्राथमिक उपचार’ म्हणून येथे आयुर्वेदाची काही औषधे दिली आहेत.
औषधे घेऊन बरे न वाटल्यास आजार अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.