You are on page 1of 5

थोर गुरू परंपरा असणारा मातंग समाज

https://www.lokmat.com/jalgaon/matang-society-great-guru-tradition/

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 05:15 PM2019-10-


13T17:15:47+5:302019-10-13T17:16:04+5:30

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘बारा बलुतेदार’ या सदरात लिहिताहेत अ‍ॅड.माधव


भोकरीकर...
थोर गुरू परंपरा असणारा मातंग समाज

सकल जगताला आपल्या भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाने दीपवून टाकणाऱ्या, भगवान श्रीकृ ष्णाचे गुरू कोण? हा
प्रश्न आपल्यापैकी कोणाला पडत नसेल. त्यावेळी गुरुगृही जायचे, ते गुरुची ज्ञानसाधना किती आहे हे पाहून,
हीच आपली संस्कृ ती आणि परंपरा आहे. उज्जैनी वनात एक सांदीपनी नावाचे ऋषी परिवारासह राहत असत.
चार वेद ग्रहण के लेले, पचविलेले, अहंकारविरहित असे हे ऋषी. अरण्यात शिंदीच्या झाडावरील पनाळ्या ते
आपल्या मंत्रोच्चाराने झाडावर न चढता तोडत असत. त्यामुळे त्यांचे नाव शिंदीपाल पडले होते.
भगवान श्रीकृ ष्ण आणि त्यांचे थोरले बंधू बलराम तसेच त्यांचा मित्र सुदामा यांना सांदीपनी ऋषीकडून अनुग्रह
प्राप्त झाला आहे. ते त्यांचे गुरू आहेत ही भावना. श्रीकृ ष्ण, बलराम, सुदामा हे सांदीपनी ऋषीकडे आश्रमात
चौसष्ट दिवस होते. या काळात त्यांनी सर्व विद्या आपल्या गुरूं कडून अवगत के ल्या. 'तुला रे भगवंता काय
शिकवायचे?' असे म्हणणारे सांदीपनी ऋषी, हे आपले गुरुचे कर्तव्य मात्र चोख बजावत होते.
दक्षिणेत मंदिरे
शिवशक्तीच्या दहावा अवतारापैकी नववा अवतार, शंकर पार्वतीने मातंग-मातंगी म्हणून घेतला. मातंगी
महादेवाची कश्ती असून सर्व देवदेवताची वरदायिनी आहे. मातंगी देवीला संतती व संपती राखणारी देवी म्हणून
पुजले जाते. दक्षिण भारतात मातंगीस मांगम्मा असेही म्हणतात. तिरुपती बालाजी, चेन्नई येथे देवीची मंदिरे
आहेत. आंध्र, गुजरात, तामिळनाडू या प्रांतामध्ये मातंगी मंदिरे आहेत. महालक्ष्मी तुळजापूरची देवी ही
मातंगाचीच आई आहे, ही भावना आहे.
जो तो आपल्या कर्माने श्रेष्ठ अथवा कनिष्ठ
आपल्या कोणाच्याही मनात जातींबद्दलच्या श्रेष्ठत्वाबद्दल अथवा कनिष्ठतेबद्दल प्रश्न निर्माण झाले किंवा के ले
गेले, तर त्याचे उत्तर अगदी सोपे आहे, 'परमेश्वराने कोणालाही श्रेष्ठ अथवा कनिष्ठ म्हणून जन्माला घातले नाही.
जो तो आपल्या कर्माने 'श्रेष्ठ अथवा कनिष्ठ' होतो आणि ठरतो. आपल्याला श्रेष्ठ व्हायचे का कनिष्ठ व्हायचे, हे
आपण आपलेच ठरवावे आणि त्याप्रमाणे आपले कर्म करावे.' आपले वाडवडील चिरंतन सत्य सांगून गेले
आहेत की, ऋषींचे कू ळ आणि नदीचे मूळ शोधू नये.
सुरुवातीला अत्यंत छोटी, क्षुद्र वाटणारी व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने अत्यंत श्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचते. त्यावेळी
तिचे पूर्वीचे, जन्मजात असलेले लघू रूप आपल्याला विसरावे लागते, ते तिच्या कर्तृत्वाने! आपल्या समाजाचा
एक भाग असलेला, प्राचीन गुरुकु लाची परंपरा असलेला, हा मातंग समाज, या अवस्थेत का, कसा आणि
कोणामुळे , कोणत्या चुकीमुळे आला, याचा विचार के वळ त्याच समाजाने नाही, तर आपण सर्वांनीच करायला
हवा. ती कारणे समजली म्हणजे आपल्या कर्तृत्वाला पायबंद कशामुळे बसू शकतो, आपली प्रगतीची घसरण
का होते हे आपल्याला समजू शके ल; त्यावर उपाययोजना करता येईल. समाजाची जशी गरज असते, त्यानुसार
समाज ती गरज भागवत असतो. बारा बलुतेदार आणि बारा अलुतेदार, हा त्याचाच परिपाक! समाजाचा गाडा
सुरळीत चालावा यासाठी जी विविध कर्तव्ये तत्कालीन समाजधुरिणांनी नेमून दिली, त्यांच्या व्यवसायावरून व
कर्तव्यावरून, ही गेल्या काही काळात दिसत असलेली जातीव्यवस्था निर्माण झाली. आज याचे पूर्वीइतके
स्वरूप उरले नाही, हे आपल्या शिक्षणाने, समजुतीने!
गावाचे रक्षण करणाºया जमातीतील जी मंडळी होती, त्यातील हा 'मातंग समाज'! हिंदू धर्मातील मूळचा रांगडा,
आक्रमक, प्रामाणिक असलेला हा समाज, गावचा संरक्षणकर्ता होता.
गावाचे संरक्षण करायचे तर स्वाभाविकपणे, गावात शिरण्याच्या वाटेवर यांचा पहारा तथा वस्ती असायची.
यांच्यातील परंपरेने आलेला हा गुण शिवाजी महाराजांनी ओळखला, म्हणून त्यांच्या काळात त्यांनी काही
ठिकाणी गडांचे, घरांचे, चौक्यांचे पहारे ताठ किल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी, ही या समाजाकडे सोपविली
होती. महाराजांच्या सांगण्यावरून रायगडावर तोफ चढवणारे 'सर्जेराव मांग' व बाजी पासलकर या शिलेदाराची
घोडी चोरून विजापूरकराला भेट देण्यासाठी घेऊन जाणाºया मर्क तराव व सोनू दळवीचा कर्दनकाळ ठरलेले,
बाजी पासलकरांचे विश्वासू सहकारी जातीने 'येल्या मांग' होते. शिवाजीकालीन बखरीत व पोवाड्यात यांचा
उल्लेख आढळतो.
स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी त्यांना अडचणीच्या ठरलेल्या लोकांना, समाजाला वैयक्तिकपणे अथवा
सामूहिकपणे कोणत्यातरी मार्गाने त्रास देण्याची योजना के ली होती. त्यात त्यांनी रामोशी, मातंग अशा आक्रमक
जातींना गुन्हेगार ठरविले. त्यांना गावातून तडीपार के ले.
त्यांच्यावर खोटेनाटे आरोप के ले. तेव्हा या समाजातील लोकांनी इंग्रजांच्या विरोधात गावागावातून संघर्ष के ला.
या समाजातील उस्ताद लहुजी राघोजी साळवे यांनी आपल्या तालमीत अनेक क्रांतीकारकांना आपल्या
तालमीतून कु स्त्यांचे डाव, तलवार चालविणे, लाठ्या-काठ्या चालविणे याचे प्रशिक्षण दिले होते. अनेक शूरवीर
या तालमीतून तयार झाले होते. आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके हे यांच्याच तालमीतले! (पूर्वार्ध)
-अ‍ॅड.माधव भोकरीकर

Video Player is loading.


Current Time 0:42
/
Duration 3:45
Loaded: 46.13%
Remaining Time -3:03
Web Title: Matang society with great Guru tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines
from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news
from all cities of Maharashtra.

टॅग्स :literatureJalgaonसाहित्यजळगाव
आणखी वाचा

You might also like