Professional Documents
Culture Documents
दलित पँथर
क्रांतिकारी चळवळीतील नोंदी
2
दलित पँथर : क्रांतिकारी चळवळीतील नोंदी
- प्रा.डॉ.विठ्ठल शिंदे
Cover Design :
- Tejas Sutar
ebook Edition:
April 2022
Pages:335
Price: 200/-
ISBN : 978-93-92466-38-0
$$$$$
अर्पण
3
पँथरमधील तमाम ज्ञात- अज्ञात
लढावू कार्यकर्त्यांना
$$$$$
अनुक्रम
प्रकरण १
दलित पँथर चळवळीचा इतिहास :
काही नोंदी
4
प्रकरण २
दलित पँथर
काही लेख व निबंध
१) दलित पँ थर : मुक्तीचे महाद्वार
२) पँथरच्या लढ्यातील आदिवासी भूमिहीन शेतमजूर आंदोलन
३) मुरबाड तालुक्यातील आदिवासी, भूमिहीन शेतमजुरांचा पँ थरने काढलेला मेळावा
४) भारतीय दलित पँ थरचा इगतपुरी तालुका मेळावा
५) इगतपुरी तालुका जाहीर सभा
६) चिंतन – मंथन
$$$$$
प्रकरण ३
पँथर शहिदांची गाथा
१) पँ थर्सना स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा मिळावा
२) पँ थर चळवळीतील पहिला शहीद : भागवत जाधव
३) पँ थर शहीद : आनंद एस. मुत्तू
४) शहीद बाबा मोरे
५) पँ थर शहीद : रामकिशन करौतिया
६) शहीद पँ थर : दे वराम लिहितकर
७) स्मृ तिशे ष प्रकाश सावं त यांचा सामाजिक जीवनपट
८) स्मृ तिशे ष पँ थर : मनोहर अं कुश
९) स्मृ तिशे ष : रामसिं ग धनाजी सोनवणे
१०) स्मृ तिशे ष : मिलिं द रणदिवे
११) शोकसभा वृत्तांत
प्रकरण ४
मनोगते
१) पँथर संस्थापक राजा ढाले : ब्लँक पँथर व नामदेव ढसाळांबाबत बोलताना
२) सुरेश सावंत: बुध्दाची, डॉ. बाबासाहेबांची चळवळ ही मानवी मुक्तीची चळवळ
३) प्रा. अरुण कांबळे यांची विठ्ठल शिंदे यांनी घेतलेली मुलाखत
5
४) रामदास आठवले यांचे भाषण
५) पैंथर अॅड. बापुराव पखिड्डे यांचे भाषण
६) भाई रमेशचंद्र परमार यांचे दलित पँन्थरच्या पहिल्या राष्ट्रव्यापी अधिवेशनातील पँन्थर यांचे अध्यक्षीय भाषण
७) अॅड. राहुलन आंबावडेकर यांचे भाषण
८) रामकिशन करौतिया यांची रत्नप्रभा गरकल यांनी घेतलेली मुलाखत
$$$$$
प्रकरण ५
पँथर अधिवेशने, ठराव आणि
समकालीन संघटना
१) दलित पँ थरचे पहिले अधिवे शन
२) ठाणे जिल्ह्यातील पँ थर चळवळ
३) भीमशक्तीचे विराट दर्शन !,दादर
४) ठाणे- मुंबई एकत्रितपणे काढलेल्या विधानसभेवरील मोर्चाचे निवेदन
५) दलित एकता परिषद पु णे
६) दलित ऐक्य परिषदे च्या निमित्ताने
७) दलितांचे ऐक्य ही काळाची गरज पँ थर ने ते रामदास आठवले यांची मु लाखत
८) सोलापूर येथे संपन्न झालेल्या दोन दिवशीय राज्यव्यापी अधिवेशनाचा वृतांत
९) अधिवेशनात संमत झालेले ठराव
१०) समकालीन संघटना
११) समता सेना भूमिका व धोरण
१२) दलित मुक्ति सेना
$$$$$
6
प्रकरण १
दलित पँथर चळवळीचा इतिहास :
काही नोंदी
$$$$$
7
यांच्या दु:खद अंतिम क्षणांचा साक्षीदार बनून धुमसत राहिलो. खूप वेदनांचा, अश्रूधारांचा अनुभव घेतला. पँथरच्या
ऐतिहासिकतेचा, क्रांतिकारकतेचा गांभिर्याने विचार करून अभ्यासक, इतिहास लेखकांनी पँथरचा कालखंड चिरेबंद करायला
हवा होता पण दृष्टीअभावी हे महत्कार्य होऊ शकलेले नाही. म्हणून माझा पँथरचा वास्तव इतिहास लिहिण्याबाबत आग्रही
दृष्टिकोन आहे.
पँथर म्हणजे संतप्त झालेला अन शिवराळ भाषा वापरणारा युवक नाही. विद्रोही म्हणजे हिंसक युवा नव्हे, तर
अहिंसक मार्गाने प्रतिकार करणारा, व्यवस्थाही बदलणारा युवक होय.
आजच्या युवापीढीने हे समजून घ्यावे असे विनम्र आवाहन मी करतो. आपल्या वैचारिक शौर्याला वाचन, मनन,
चिंतनाची जोड द्या. जोश असण्यापेक्षा होश असू द्या. उत्तर भारतात भीमआर्मीच्या चंद्रशेखर रावणची वाटचाल चांगली आहे;
दिशादर्शक आहे. गुजरात मधील जिग्नेश मेवानी यांनी नेमका जोर धरला आहे. उमरखालीद आणि कन्हैय्या कु मार फारच
प्रभावी ठरत आहेत. डावे-उजवे न करता (ढाले-ढसाळची निर्मिती न करता ) सर्व आंबेडकरवादी म्हणून या सर्वांचा आवाज
बुलंद व्हावा असे वाटते आहे. खरोखर महाराष्ट्रात पँथर उभी राहात असेल तर छोटे, मोठे गट त्वरित बरखास्त करून
सर्वांची एक कार्यशाळा घ्यायला हवीय, त्यातून नवे नेतृत्व उभे राहू शकते. कोणत्याही आरपीआय
$$$$$
गटाच्या वळचणीला उभे न राहता स्वतंत्र उभे राहता येते का ते पहायला हवेय. बघा अजमावून काहीतरी. नवं घडेल,
महाराष्ट्रातली जनता अनेक वर्षे आक्रं दते आहे. तिला उत्तम प्रतिसाद देवून खंबीर, स्वयंभू उभे रहा.
पँथरच्या इतिहास लेखनाचा विचार करतांना पुन्हा एकदा शरणकु मार लिंबाळे, डॉ. लता मुरुगकर, ज.वि. पवार,
बबन लव्हात्रे, कमलेश यादव, पी.के . बोर्डे, दत्ता जाधव, नामदेव ढसाळ, राजा ढाले, भूपेश थुलकर अशा अनेकांच्या
भूमिकांचे अंक चाळावे लागले. जवळपास सर्वच पुस्तकांत 'स्व' चरित्र परता आली आहे, त्यामुळे तो इतिहास ठरत नाही.
इतिहासाची लेखनशैली ही येथे आलेली नाही. मात्र या सर्वांत बबन लव्हात्रे यांचे पुस्तक बऱ्याच अंशी मार्गदर्शक आहे.
मुंबईतील पँथरची यादी मी गौतम सोनवणे यांच्याकडे मागितली होती पण कमलेश यादव यांच्या पुस्तकाने खूप नावे मला
दिली. पी.के . बोर्डेच्या जयभीमनगरने माहिती पुरविली. रायगड जिल्ह्याची कार्यकर्ता यादी पँथर प्रकाश पगारे यांनी देवून
माझे परिश्रम कमी के ले. कमलेश यादव, बबन लव्हात्रे, प्रकाश पगारे, अरुण पाठारे, गौतम सोनवणे, पी.के .बोर्डे, सुरेश
सावंत, ज.वि.पवार, भूपेश थुलकर, दत्ता जाधव, (कोल्हापूर) यांचे हार्दिक आभार !
खैरलांजीतील सामुहिक हत्याकांड, रमाबाई आंबेडकर नगरातील सामुदायिक हत्याकांड, सोनाई, जवखेडा, खर्डा,
नवी मुंबई हत्याकांड, नाशिकमधील दंगल या सर्व घटनांत समाजाला पँथरची आठवण झाली. आणि पँथरच्या आगमनाची
सर्व समाजाने वाट पाहिली. आजही खूप मोठी गटबाजी आहे, विचारहीन वाटचाल, दिशाहीन तडजोडी आणि उघड उघड
जातीयवाद व जातीय-धार्मिक दहशतवाद आहे. निष्पाप विचारकें द्री अहिंसक समतावादी कार्यकर्ते, गायक-कवी-
साहित्यिक, विचारवंतांना देशद्रोही, नक्षलवादी ठरवून तुरुं गात डांबण्यात येत आहे. एल्गार परिषद घेणाऱ्यांना,भीमा
कोरेगाव (२०१९) हल्ले रोखणाऱ्यांनाच यु.ए.पी.ए. सारखे कायदे करून कें द्रीय सत्तेचा क्रू र चेहरा दृश्यमान होताना दिसतो
आहे. अशा काळात या मस्तवालांना रोखणारे संघटन हवे आहे; ज्या संघटनेच्या डरकाळीने आणि जोरकस आंदोलनांनी
शोधक क्रू र सत्ताधिश अन् तितके च संविधान विरोधी परंपरावादी कर्मठांना घाम फु टेल. सर्व रस्ते बंद करणाऱ्या, प्रसंगी
छातीवर गोळी झेलणाऱ्या, सत्ताधाऱ्यांचे व्यवहार ठप्प करणाऱ्या बलदंड संघशक्तीचा उगम होईल असे स्वप्न मी पाहात
आहे!
$$$$$
8
१९७२ साली जन्माला आलेली दलित पँथर १९७४ पर्यंत ठीक, कार्यरत होती. १९७४ नंतर मतभेद, वादविवाद
सुरू झाले. १९७५ ते ७७ ही दोन वर्षे हा वाद बऱ्यापैकी वाढल्याने १९७७ ला दलित पँथरचे तत्कालीन अध्यक्ष आणि
सरचिटणीस अनुक्रमे राजा ढाले आणि ज.वि.पवार यांनी कोणालाही विश्वासात न घेता पँथर बरखास्त के ली. या
बरखास्तीमागे वाद होता मार्क्सवाद की आंबेडकरवाद ? की बौध्दतत्त्व ? यावर कार्यक्रम जाहिरनामा तयार करायचा हा
पहिला मुद्दा होता. तर दुसरा मुद्दा असा होता की दलित पँथरचा संस्थापक कोण? ज.वि.पवार, राजा ढाले, नामदेव ढसाळ,
प्रा. अरुण कांबळे, भाई संगारे, उमाकांत रणधीर, रामदास आठवले, रामदास सोरटे, दयानंद म्हस्के , अर्जुन डांगळे, प्रल्हाद
चेंदवणकर, अविनाश महातेकर, लतिफ खाटीक, सुरेश सावंत, बाळू खैरमोडे, सुहास सोनवणे, सुनिल दिघे, रतनकु मार
पाटलीपुत्र, उमर पठाण,रामटेके , एल.डी. भोसले, जयदेव गायकवाड,खडताळे, वामन निंबाळकर, अनंत बच्छाव, यापैकी
काहीजणांनी आपण संस्थापक असल्याचे घोषित के ले. दलित पँथरची जी पहिली कार्यकारिणी झाली तिच्यात काही पँथरचा
समावेश होता. दलित पँथर ही संघटना अमेरिके तल्या ‘ब्लॅक पँथर’ला समोर ठेऊन जन्मास आली त्यामुळे ‘ब्लॅक पँथर’
प्रमाणे मार्क्सवादी विचारसरणी भारतातल्या महाराष्ट्रात जन्माला आलेल्या दलित पँथरचीही असावी असं काहीना वाटत होतं
मात्र संघटेत काम करणाऱ्या साहित्यिक, अभ्यासक आणि कार्यकारिणी सदस्यांनी आम्ही ‘आंबेडकरवादी’ आहोत त्या
अनुषंगाने जाती अंतासाठी दलित वर्गाचं म्हणजे पिळल्या गेलेल्या, नाडल्या गेलेल्या, उपेक्षित, वंचित, अन्यायग्रस्त जाती
धर्म विरहीत नाकारलेल्या नाही रे वर्गाचं प्रतिनिधित्व करणारं हे संघटन बुद्ध तत्वज्ञान, फु ले तत्त्वज्ञान, कबीर विचार, साऱ्या
समता प्रवाहाला मान्यता देत होतं. त्यात काही गैर नव्हतंच, कारण दलित पँथर या संघटनेचं प्रेरणास्थान, वैचारिक
अधिष्ठान असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीच मांडलेली ही भूमिका होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही
प्रणाली भारतीय समाजाला दिली. लोकशाही संविधान दिले. सामुहिक नेतृत्वाचं रूप किं वा एकत्रित चर्चेचं, निर्णय
घेण्याचं सूत्र, म्हणून सहकारी तत्त्वाचं रुपही मान्य के लं. त्यामुळं कोणतंही संघटन नोंदणीकृ त होतांना त्याला कमीत
कमी सात व जास्तीत जास्त अकरा सदस्यांची गरज लागते हे विचारात घेतलं गेलं. एखाद्या संघटनेचं संस्थापन
आकरा पेक्षा कमी लोक करू शकत नाहीत. एक किं वा दोन लोक संघटेच्या संस्थापनेत सूचक असतात, तसे पँथरच्या
संस्थापनेत एक / दोन लोक होते. त्यांनी सर्व घटकांना विश्वासात घेऊन दलित पँथर संघटनेची स्थापना के ली आणि
पँथरने करावयाच्या कार्यक्रमांची यादी तयार झाली. नामदेव
$$$$$
ढसाळही ‘विद्रोह’ अंकाचा संदर्भ देत आणि ‘अस्मितादर्श’ व ‘टाईम्स’ च्या अंकातले वाचल्याचा संदर्भ देत ब्लॅक पँथर
शिवसेना यांची शैली स्वीकारल्याचे मान्य करतात. राजा ढाले यांनी आपल्याला ब्लॉक पॅथरबाबत वाचून सविस्तर माहिती
वाचून माहिती होती हे कथन करतात. लिटल मॅगेझीन चळवळीनत ढाले - ढसाळ या दोघांचाही सहभाग होता. त्या सर्वांना
पँथर नाव मान्य झाले होते पण त्यांनी मार्क्सवादी विचार स्वीकारला नव्हता. बुद्ध धम्माची बाजू ढाले घेत होते तर
ढसाळांचा कल मात्र मार्क्सवादी बाजूने होता. ढसाळ सांसदीय लोकशाहीवर टीका करीत असत; बाबासाहेबांना अनेक
सभांतून 'डॉक्टर' असं एके री संबोधित असत. धर्मांतराने जातीयता नष्ट होईल असे त्यांना मान्य नव्हते. मात्र त्याचा
आंबेडकर-मार्क्स समन्वयाचा विचार होता त्यालाच ढालेंचा विरोध होता.
पँथर संघटनेची नेमकी स्थापना कधी झाली याबाबत जे जे लिहिले गेले आहे त्याचा संदर्भासह अर्थ लावण्याचा
प्रयत्न करतांना असे लक्षात येते की, गगन बावड्याचे बौद्धाच्या बहिष्काराचे व स्त्रियांच्या नग्न धिंडीचे प्रकरण पँथरपूर्व
काळात हाताळले गेले. पँथरबाबत बातम्या ‘नवाकाळ’ ‘प्रजासत्ताक’ इ. वृत्तपत्रात आल्या, पेरूमल/गायकवाड (दादासाहेब)
समिताचा खूप मोठा प्रभाव आंदोलकांवर होता. (२४ मे १९७२) दलित युवक आघाडी सारखी संघटनाही यात सामील
होती. बाप्टी रोड, सिद्धार्थ नगर, मुंबईला मेळावा ९ जुलै १९७२ ला झाला तरी कोणतीही कार्यकारिणी स्थापन झाली
नव्हती. १५ ऑगस्ट १९७२ चा राजा ढालेचा साधनाच्या अंकातील तिरंग्यावरील टीकापर लेख गाजत होता आणि
पँथरची पत्रके निघत होती. पँथर महाराष्ट्रभर पोहोचत होती. ५ डिसेंबर १९७२ रोजी कल्याण येथे महाराष्ट्रातली पहिली
छावणी स्थापन झाली त्यानंतर २४ डिसेंबर १९७२ नांदेड, ३० जाने, १९७३ औरंगाबाद आणि १. फे ब्रु.१९७३ वर्धा येथे
छावण्या स्थापल्या गेल्या. पँथर संघटनेची स्थापना होण्याऐवजी प्रचार बैठका, मोर्चे आणि अत्याचाराविरुद्ध प्रतिहल्ले यावर
9
पँथर्सनी भर दिला (नामदेव ढसाळ) द-पँथर:- एक संघर्ष पृ.७९) आणि दि. २० मे १९७३ रोजी झालेल्या सभेत
पँथरने पहिली कार्यकारिणी घोषित के ली. ती अशी होती.
अध्यक्ष : राजा ढाले
उपाध्यक्ष: विठ्ठल साठे
सचिव : ज.वि. पवार
उपसचिव : भाई संगारे
कोषाध्यक्ष : अविनाश महातेकर
संरक्षण मंत्री : नामदेव ढसाळ
संचार मंत्री: थोरात
जनसंपर्क मंत्री :उध्दव साळवे
स्त्री कक्ष प्रमुख : जयवन्ता जगधने
$$$$$
या प्रक्रियेत वरील पदाधिकाऱ्यांसोबत रामदास सोरटे, अर्जुन डांगळे, दया पवार, बाबुराव बागूल, विजय
तानाजी कदम, दादाभाऊ साळवे, फु लपगार बंधू, सुरेश भद्रिगे, हुसेन दलवाई, लतिफ खाटीक, अनिल बर्वे, रामदास
आठवले, अरुण कांबळे, बाबुराव शेजवळ, सुनील दिघे, एस्. एम्. खडताळे, प्रल्हाद चेंदवणकर, बाळ खैरमोडे, गंगाधर
आंबेडकर, अनिल कांबळे, बबन लव्हात्रे, चंद्रकांत काळे, बाळ तिगोटे, सुरेश सावंत (पृ.१७८) उमाकांत रणधीर, अनंत
बच्छाव, उमेश माने, वसंत कांबळे, दयानंद म्हस्के , जयदेव गायकवाड, मनोहर अंकु श, चंद्रकांत कसबे, इत्यादी कार्यकर्ते,
नेते सामील होते. साहित्यिकांपैकी काहीजण पँथरपासून दूर गेले तर काही कार्यकर्येही आपापल्या कामात गुंतून गेले. वरील
कार्यकारिणी १७ फे ब्रु. १९७४ रोजीच्या ‘साप्ताहिक मनोहर’ मध्येही छापून आली होती. तिच्यात उमाकांत रणधीर,
रामदास आठवले, मारुती सोनवणे, अनंत बच्छाव, भीमराव जाधव, सुहास सोनवणे, यांच्याही नावांचा समावेश होता. ९
जुलै १९७२ ऐवजी पहिल्या कार्यकारिणीचा अस्तित्व दिनांक २० मे १९७३ हाच पँथरचा स्थापनादिन ठरतो.
दलित पँथरने जी कामे करायला सुरुवात के ली त्यापैकी अतिशय महत्त्वाचं काम म्हणजे अन्यायाचा प्रतिकार
होय. उपेक्षित, वंचित वर्गावर सतत अन्याय अत्याचार होत आले आहेत पण स्वतंत्र भारतात अन्यायाचे तीव्र स्वरूप हे
इलाया पेरुमल समितीच्या अहवालाने सर्व समाज घटकांसमोर आणले. बलात्कार करणे, विहीरीवर पाणी भरु न देणे,
बहिष्कार टाकणे, मारहाण करणे, नरबळी देणे, स्त्रीची नग्न धिंड काढणे, खून करणे, परंपरेच्या विरोधकांना निपटू न
काढणे, विहिरीच्या पाण्यात मानवी विष्ठा टाकणे, डोळे काढू न अंध बनविणे, या सर्व प्रकारच्या अन्यायाने सुशक्षित युवा
वर्ग संतप्त झाला. मोर्चे, आंदोलने, घेराव, सभा उधळणे, रास्ता रोको करणे, जळजळीत विचार मांडणे, कविता, लेख
लिहीणे यांच्या सहाय्याने राजव्यवस्था, धर्मव्यवस्था, संस्कृ ती, कु चकामी सरकारी धोरणे यांच्यावर तो तुटुन पडु लागला.
दलित पँथरचे दुसरे कलम म्हणजे त्यावेळच्या रिपब्लिकन गटबाजीवर प्रहार करणे होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(१९५६) असे पर्यन्त 'शेडयुल्ड कास्ट फे डरेशन' ही सामाजिक राजकीय संघटना फे डरेशनरूपात अथवा पक्षरुपात
अस्तित्वात होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९५६ साली झालेल्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या संकल्पनेतील,
त्यांनी लिहिलेल्या खुल्या पत्रावर व पक्षाच्या घटनेवर आधारित 'रिपब्लिकन पक्ष ३जाने १९५७ रोजी नागपूर मुक्कामी
स्थापन झाल्या. या पक्षात एन्. शिवराज,
$$$$$
दादासाहेब गायकवाड, अॅड. बी. सी. कांबळे, बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे, रा.सु.गवई, दादासाहेब रूपवते, आर. डी.
भंडारे, भैय्यासाहेब आंबेडकर, इ.दींनी काम के ले. मात्र पुढील काळात रिपब्लिकन पक्षांचे वेगवेगळे गट निर्माण झाले. गट
निर्माण होतांना काँग्रेस पक्षासह विरोधी पक्षासोबत युती करायची किं वा नाही, पक्षाचं कामकाज ठीक होत आहे किं वा नाही.
उच्चविद्याविभुषित नेतृत्व असावे की सामान्यांचे प्रतिनिधीत्व करणारे नेतृत्व हवे. अशी काही कारणे दिसत असली तरी
सत्ताधारी कांग्रेसशी युती करून वेगवेगळी पदे, मंत्री पदे, महामंडळे पदरात पाडू न घेणे हे फारच मोठे कारण होते. सत्तेतील
10
वर्गाबरोबर युती असतांना ही अन्याय अत्याचार थांबविले जात नाहीत, त्यामुळे दलित पँथरचा प्रचंड राग रिपब्लिकन
पुढाऱ्यांवर होता. तो या टोकापर्यंत गेला की या गटबाज पुढा-यांशी आमचा काही संबंध नाही. अशी भूमिका दलित पँथरने
घेतली. याला पँथरच्या पहिल्या नागपूर अधिवेशनात विरोध झाला दलित पँथरच्या अशा भूमिके ने साहजिकच रिपब्लिकन
ऐक्याचे प्रयोग सुरु झाले. तुटते पुन्हा जोडले जाणे अशा पद्धतीने हे प्रयोग होत राहिले. संपूर्ण समाज एकत्रित येतोय ही गोष्ट
पँथर्ससह रिपब्लिकनांना उर्जा, आनंद, समाधान देत होती. पँथरचे संघटन या अंगाने वाढत होते. १९७२ पासून काही
अन्याय अत्याचार पुढे येत गेले आणि दलित पँथरचे युवा प्रतिकारबद्ध होत गेले. पुण्याजवळील गगनबावडा येथील प्रकरण
घडले. एका उपेक्षित वंचित समाजापैकी बौद्धस्त्रीची नग्न धिंड काढण्यात आली संपूर्ण बौद्ध वस्तीवर बहिष्कार टाकण्यात
आला. विशेष म्हणजे सत्ताधारी काँग्रेस पक्षातील एका मंत्र्याच्या नातेवाईकानेच हे दुष्कृ त्य के ले होते. पत्रकारांनी प्रकरण
लावून धरलं. पँथरने मंत्र्यांना निवेदन देवून न्यायाची मागणी के ली. मुंबईच्या वस्ती वस्तीत युवा वर्ग चर्चा करीत होता.
पँथर चळवळीत सामील होण्यासाठी मनाने तयार होत होता. पँथरचे मेळावे, बैठका चर्चासत्रे, व्याख्याने यांना प्रतिसाद
मिळत होता. पँथरनेतेच मार्गदर्शक असावेत असा आग्रह होत असे. अशाच 'काळा स्वातंत्र्य दिन’ हा राजा ढाले यांचा
लेख पुण्याहून निघणाऱ्या ‘साधना’ मासिकातून १५ ऑगस्ट १९७२ रोजी प्रकाशित झाला. 'साधना' हे समाजवादी पक्षाचे
मुखपत्र होते. राजा ढाले यांनी लेखात उपस्थित के लेले प्रश्न आणि स्त्री स्वातंत्र्याची तुलना अत्यंत बोचरी होती. स्त्रीची अब्रू
अन् तिरंग्याचा अवमान हे मुद्दे सर्वच चर्चेत होते. पँथरचे लोक हे बौद्धिकदृष्ट्या आणि तत्त्वज्ञानाच्या पातळीवर किती पक्के
आणि निर्भिड आहेत हे जनमानसावर ठसले जात होते. पँथरमध्ये अनेकांचे नेतृत्व, वक्तृ त्व व प्रश्न मांडण्याची पद्धत फारच
प्रभावी होती, कविता, विधाने, विचारांची श्रृंखला पेरित पँथरनेते व्यवस्थेवर, पुढाऱ्यांवर, प्रतिपक्षावर तुडू न पडत होते.
काही वक्त्यांची शिवराळ भाषा सोडली तर अनेकांचे वक्तृ त्व बहरून येत असे.
$$$$$
वरळीची सभा बहिष्काराची भुमिका मांडण्यासाठी होती. यात लाठीमार झाला, ढाले जखमी झाले. एवढ् यात
वरळीची दंगल पेटली. मुद्दा कोणाला मतदान करायचे हा होता. काँग्रेस की समाजवादी, साम्यवादी पक्ष. पँथरने रणनीती
आखली. रोझा देशपांडेंना मदत के ली. घडलं भलतंच. पोलिस खाते सत्ताधारी काँग्रेसच्या प्रभावाखाली होते त्यांनी
शिवसेनेच्या मुलांची आणि पँथरची झुंज लावून दिली. पुढे भस्मे आयोग स्थापन झाला. त्यात कोणालाही शिक्षा झाली
नाही. पँथरचे नाव सर्व महाराष्ट्रात पोहोचले. बी.बी.सी. लंडनने पँथरच्या बातम्या दिल्या. खूप मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग
पँथरकडे आकर्षित झाला. मुंबईत पँथरच्या १२७ च्या आसपास छावण्या उभ्या राहिल्या.
गौतम सोनवणे, तानाजी गायकवाड, डी. एम. चव्हाण, दयाल बहादुरे, चिंतामण गांगुर्डे, राजा गांगुर्डे, मनोहर
जाधव, बाळ गरुड, डी.एम. गायकवाड, विठ्ठलराव साठे, सत्यभामा साठे, मनोहर अंकु श गायकवाड, निशांत सातपुते,
मधुकर देशनेहरे, मधुकर कांबळे, पांडु रंग माळी, शिवमूर्ती कांबळे, राम झेंडे, रघुनाथ विश्वनाथ पवार, सुरेश बारशिंग, धांडोरे
बाबुराव उत्तम, भालचंद्र कांबळे, बनसोडे, नामदेव वाघमारे, आंबेडकरदास, मोहन पवार, मारुती सावंत, प्रकाश भोसले,
चंद्रकांत कसबे, प्रकाश साळवे, हरी गमरे, दादू थोरात, रमेश घोक्षे, लिंबराज गायकवाड, काळखैर, जालींदर कांबळे, बापू
प्रधान, शिवाजी साईनाथ ढसाळ, मारुती सोनवणे, बाळासाहेब बनसोडे, मुस्ताकबाबा, तांबे मास्तर, सुनील पवार, विवेक
पवार, सन आसवारे, लक्ष्मण रूपवते, बबन साळुंखे, भगवान इगवे, प्रा.ए.पी. माघाडे, लक्ष्मण मुराळ, वसंत माने, जोगेंद्र
गजभिये, हारिहरशर्मा, नटराज सराज, जिवारी पन्नालाल, कश्यप, कु बेर नामदेव, आनंद रणदिवे, यशवंत सर्से, दुर्योधन
रणखांबे, एच्. एन्. काटे, बाळ रणखांबे, प्रमोद सरतापे, विक्रम खरात, अप्पा कांबळे, श्यामराव भोसले, सुधीर जाधव,
ललित निरभवने, तुकाराम दवणे, वृद्धानंद शिंदे, चोखाजी पा, विठ्ठल लोखंडे, राजा साहेबराव घरवाढवे, नागोराव दवणे,
अशोक गायकवाड, सैय्यद वैकवाला, सुरेश खराटे, भाई माळणकर, के . शिलवंत, मामा डी.एम् चव्हाण, मनिष ढगे,
मनोहर जाधव, श्रीधर साळवे, अविनाश आहिरे, उदयराज तोरणे, डॉ.अक्रम खान, श्रावण निकाळजे, सुनील गडकरी,
अशोक पाटील, समाधान नावकर, राघुभाई मकवाना, भाऊराव पवार, झेंडे मास्तर, वामन झवरे, चरणसिंग चावरिया,
जी.एस. मोरे, संचत कांबळे, अशोक पळसपगार, किशोर भालेराव, एस् .एम्. अंधेरीकर, अशोक साबळे, के शव जाधव,
11
चंद्रकांत कांबळे, श्याम निकम, बाळकृ ष्ण उर्फ भाईकदम, आनंद कांबळे, किसन माने, देवजी मोहिते, चंद्रकांत हंडोरे,
सिद्धार्थ कासारे, किर्ती ढोले, विवेक पवार, हरिहर यादव, कमलेश यादव,
$$$$$
रमेश गायकवाड, दिलीप जगताप, अर्जुन माघाडे, बबन मोरे, रतन आसवरे, विजय वाघचौरे, भीमराव सावतकर, चंद्रकांत
कसबे, प्रेम गोहिल, व्ही.जे. बालन, मावजी मारू, भगवान भाई चुडासमा, सुरेश बद्रीके , मिलिंद कांबळे, धम्मा कांबळे,
गोविंद जाधव, गोविंद सोनवणे, पांडु रंग वाडेकर, सुमेध जाधव, दिपक नाते, मानजी राठोड, उमेश अहिरे, भूमिसिंग राठोड,
संजय लादे, अजित माने, शिरगोपीकर (राजा), गुरव, चंद्रकांत शिशुपाल टोपीवाले कांबळे, रमाशंकर तुफानी, दीपक गमरे,
सिध्दार्थ कांबळे, निरंजन सपकाळ, दुर्गा साबळे, विनायक पाठारे, विनायक बोढारे, अॅड. वि.के . बरवे, यांचा समावेश
होता.
संपूर्ण महाराष्ट्रात पहिली पँथर दंगल कल्याण मध्ये व्याख्यानमाले प्रसंगी झाली आणि दि. ५ डिसें १९७२ रोजी
पहिली छावणी स्थापन झाली. ठाणे जिल्ह्यात पँथर संघटन खूप वेगाने खेडोपाडी आणि झोपडपट्ट्यातील वस्तीत वाढले.
जवळपास सर्वच ठिकाणी पँथर्स उभे राहिले. १९७४ ते १९७७ काही मूलभूत प्रश्नांवर पँथरने लढे दिले. १९७७ नंतर
मात्र अतिशय जोमाने निष्ठेने पँथर्सनी कार्य के ले. अन्याय अत्याचाराच्या प्रकरणांसोबत दैनंदिन जनजीवनातील प्रश्न पँथरने
सोडविले.
या संघर्षात ठाणे जिल्हयातील पँथर्सने व सिध्दार्थ विहार होस्टेलने दिलेले कार्यक्रम तर राबविलेच पण
स्वतःच्या जिल्हयात कार्यकर्त्यांनी आपल्या भोवतालचे प्रश्न धसास लावले. या कामी सुरेश सावंत, अण्णासाहेब रोकडे,
श्याम गायकवाड, रमेश जाधव, एकनाथ जाधव, विठ्ठल शिंदे, बाळ भोईर, बाळ भालेराव, बाबा मोरे, देवराम लिहितकर,
अशोक बच्छाव, मिलींद रणदिवे, हरिष दोंदे, विश्वनाथ जाधव, शंकर गुंजाळ, ईश्वर गायकवाड, रमेश इंगळे, दीपक गंगावणे,
दीपक चिते, दासू ढोंबे, लक्ष्मण कोबाळकर, एस्. बी. वाघमारे, अरुण कांबळे, मारुती जाधव, विजय भालेराव,
शांताराम निकम, एल्.आर.काकलीस, महेश काकळीस, प्रमोद शिंदे, प्रवीण खरे, पी.जी. पाटील, मधुकर पंडित,
बी.बी.मोरे, जगन सोनवणे, आनंद एस्. मॅथ्यू, डब्ल्यू. जी. उबाळे, लक्ष्मण गांगुर्डे, एन्. एस्. आढाव, प्रल्हाद
गायकवाड, महादेव सोनवणे, अमीन, ललिता अमीन, गजमल खैरे, रमेश घोटीकर, किसन जाधव, श्रीधर साळवे, लिलाबाई
शिंदे, अर्जुन शिंदे, गोविंद संकट, रमेश चव्हाण, हिरामण पगारे, सुरेश सावंत, मधु तांबे, सुनील गायकवाड, प्रभाकर ढेंगळे,
भीमराव दोंदे, हरिदास बुकाणे, पावसे, चाहू म्हात्रे, दत्तू जाधव, रामकिशन करौतिया, श्याम पंडित, रवींद्र शेजवळ, प्रकाश
गांगुर्डे(मास्तर), देविदास भोईर, बिश्वास जोशी, मालतीबाई पंडित, कलाबाई गांगुर्डे, शांताबाई मोरे, वेणूबाई दोंदे, लालू
मजिद शेख, जाईबाई गरुड, मधुतांबे, मलिक जाधव, सुलेमान शेख, हिराबाई रोकडे (बाई), जाकीर शेख , युसुफ टेलर,
रमेश भागे, सिद्राम ओव्हाळ, गणपत करलाद, दत्तु कसबे, अण्णा माने, महादेव रायभोळे, भीमराव भालेराव, नाना पवार,
सत्यवान जाधव, सुनील दिवे, मार्तंड चिकणे, पंडित दिवे, राजू शिंदे, भारत शिंदे, विनोद कालिकडा, राजेंद्र पवार, रमेश
काशिनाथ बर्वे, अशोक कर्डक, गौरव दोंदे, जनार्दन शिंदे, चिंतामण जाधव, मधुकर खंडीझोड, कै लास पवार, दशरथ पवार,
प्रकाश लोखंडे, सामील होती. इगतपुरीतून वसंत पवार, अरुण पाठारे, के . बी बनकर, डी.आर.पवार, कमलदास गांगुर्डे,
कवी शरदचंद्र चंद्रमोरे, आनंद देहाडे, दिनकर देहाडे, यादव पंडित, सुनील जगताप, सुरेश खातळे, सुनील रोकडे, शशिभाई
उबाळे, मदन जाधव, अशोक भडांगे, अरविंद भालेराव, दशरथ गवळी, जगन पांडव, बबन शिंदे, मधुकर शिंदे, राजू शिंदे,
शिवाजी शिंदे, मगन रूपवटे, जगन जगताप, भीमराव जगताप, बाळू चंद्रमोरे, सकाहरी चंद्रमोरे, अशी खेड्यापाड्यातील
इगतपुरी तालुक्यातील पँथर कार्यरत होते. नासिक मधून, फकीरा जगताप, दादाभाऊ निकम, जयंत भालेराव,
बाळासाहेब तिगोटे, विश्वनाथ काळे, प्रियकीर्ती त्रिभुवन, करुणा सागर पगारे, चंद्रशेखर काळे, राजभोज (कळवण), मधुकर
शेजवळ, तानसेन ननावरे, बाबुराव शेजवळ, किशोर घाटे, प्रकाश लोंढे, रवि खंडागळे, रंजन जगताप, शंकर काकळीज,
विठ्ठलराव उन्हवणे, प्रल्हाद जाधव (बालपँथर), सुरेश बच्छाव, रमेश गाडे, रमेश पंडित, सुरेश जाधव, अनिल भालेराव,
नामदेव गायकवाड, शांताराम देहाडे, रमेश मकासरे, रमेश इंगळे, बी.जी. पगारे, गणेश दोंदे, बाबुलाल निकम, चंद्रशेखर
काळे, भिराज जाधव, रमेश जाधव, सुरेश दलोड, भारत कार्या, प्रकाश भालेराव, नानासाहेब भालेराव, साराभाई
वेळुंजकर, हरिभजन चावरिया, रॉबर्टदादा साळवे, पंडित खरे, पापा जावळे, मुरली के दार, संजय लोखंडे, दिलीप
पगारे, विदर्भात- बबन लव्हाने, नाना रहाटे, विनायक बलांडे, भूपेश थुलकर, बी. एल. सुटे, अनिल गोंडाणे, कृ ष्णा गणवीर,
12
प्रकाश गजभिये, प्रकाश रामटेके , मोहन पाटील, डी.एन्. खंदारे, के शव धाबर्डे, भिवाजी बडगे, राजेश ढेंगरे, अरुण मेश्राम,
अशोक मेश्राम, पुरण मेश्राम, यशवंत मेश्राम, भीमराव म्हस्के , रवी शेंडे, अशोक शंभरकर, भीमराव बनसोड, रमेश रहाटे,
प्रा. धर्मादास बनसोड, भगवान वंजारी, हरिष वंजीर ध्रुवकु मार बनसोड, रमेश खोब्रागडे, दिनेश सवाई, रवींद्र थूल,
देवखाजी खंडारे, अशोक हातमोडे, कमलादेवी खरे, राऊत गुरुजी, पुंडलिक इंगोले, भीमराव कांबळे, सुधाकर तायडे, गौतम
तोडे, सोमेश कवाडे, बाळकृ णालं आमटे, रामदास डोंगरे, श्रीकृ ष्ण रायपुरे, त्र्यंबक शिरसाठ, अशोक नागदिवे, समाधान
तावडे, अर्जुन गवई, धर्मा खराटे, सुरेश तायडे, प्रल्हाद
$$$$$
तावडे, ज्ञानदेव सोनोने, आर. एन्. वाकोडे, प्रभाकर सोनोने ही पँथर मंडळी १९८३ पर्यन्त कार्यरत होती.
पश्चिम महाराष्ट्र तून, दत्ता जाधव, प्रा- हुलस्वार, गंगाधर आंबेडकर, रोहिदास गायकवाड, सुर्यकांत वाघमारे,
नवनाथ कांबळे, राजा तळभंडारे, राजा इंगळे, राजा सरवदे, संजय गायकवाड, भीमराव सावतकर, एस्. आर. गायकवाड,
कु मार तळभंडारे, अजित लामतुरे, किशोर तपासे, राजाराम चांदणे, राजेंद्र संगरे, शशिकांत सकटे, अशोक आगाणे,
प्रकाश सूर्यवंशी, बाळकृ ष्ण माने, जयराज चव्हाण, राजा भोसले, उत्तम पवार, पँथर हैदर पटेल, पॅ. शब्बीर शेख, शांताराम
रोकडे, हे पँथर कार्यरत होते.
रायगड जिल्ह्यातून साहेबराव धावारे, प्रकाश महाडिक, बी. एस्. महाडिक, काशिनाथ रूपवते, पी. एन्.
गायकवाड, श्रीरंग वाहुळकार, सुरेश वाघमारे, कृ ष्णा साळुंखे, मोहन अवसरमोल, के . के . गायकवाड, एम्. एस. जाधव,
नरेंद्र गायकवाड, संजय गायकवाड, तुळशीराम जाधव, प्रभाकर ओव्हाळ, प्रकाश पगारे, शाम कांबळे, राहुल डाळिंबकर,
विजय डाळिंबकर, उत्तम जाधव, शरद मोरे, एन्. बी. आढाव, महेंद्र धनगावकर, रविंद्र ओव्हाळ, भगवान निळे, हिरामण
निळे इ. पँथर आघाडीवर होते.
मराठवाडा परिसरातून गंगाधर गाडे, प्रितमकु मार शेगावकर, डॉ. गजानन सुबडे, रतनकु मार पंडागळे, गौतम खरात,
दौलत खरात, रमेश खंडागळे के प्रकाश जाधव, दिलीप साळवे, अशोक गायकवाड, मिलिंद वाघ, दिलीप जोगदंडे, सुरेश
स्वरगिरे, शांतीलाल दाभाडे, पी-एस्. अंभोरे, साहेबराव हिवाळे, एल, आर. साळवे, बाबु पेंटर, बंडू प्रधान, हौसाबाई काळे,
संजय बनसोडे, यादवराव शेजुळ, अंजनाबाई जोगदंडे, छाबाई येहाळे, समिंद्राबाई बनकर, नाद्राबाई मिसाळ, प्रभु बनकर,
सुदाम मिसाळ, अशोक काळे, पार्वताबाई ढगे, बी.आर. साळवे, प्रभू शरणांगत, प्रकाश भटकर, अशोक जगताप, प्रल्हाद
सरदार, रघुनाथ शिंदे, दीपक किर्तीकर, काकासाहेब वाके कर, दिनकर ओंकार, वीर मास्तर, बाबु नरवडे, प्रकाश जावळे,
प्रकाश निकाळजे, अशोक गाडे माधव बोर्डे, संभाजी वाघमारे, पूष्पाबाई बोर्डे, लक्ष्मण दाभाडे, श्रीधर रगडे, संपत बाबा
सुरडकर, पैठणेबाई, रघुनाथ खंडाळकर , मंडाबाई मोरे, भावराव मोरे, ब्रम्हानंद चव्हाण मिलिंद शेळके , यशपाल सरवदे, टी
एम्. कांबळे, एस्. एम्. प्रधान, सुरेश गायकवाड, नरेंद्र गायकवाड, विजयानंद जाधव, गौतम गवई हे पँथर्स
चळवळीत होते.
$$$$$
१९७७ च्या दरम्यान सुरवातीच्या काळात पँथरने मांडलेले व हाताळलेले प्रश्न असे होते
१) नवोदित बौद्धांना मागासवर्गीयांना मिळणाऱ्या सर्व सवलती कें द्रशासनाकडू न
मिळाल्याच पाहिजेत.
२) सर्व शासकीय निमशासकीय संस्थांतून व कं पनी अॅक्टखाली मंजूर झालेल्या
गिरणी कारखान्यातून मागासवर्गीयांच्या राखीव जागा भरल्याच पाहिजेत.
३) दलितांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी स्वतंत्र न्यायालय व
13
स्वतंत्र पोलिस पथक यांची स्थापना करण्यात आली पाहिजे.
४) वर्णव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या साहित्यावर बंदी घाला.
५) शेती जमिनीचे राष्ट्रियीकरण झालेच पाहिजे.
६) दलितांवर होणाऱ्या अत्याचारांना त्वरित प्रतिबंध करा
७) शेत मजूरांना किमान वेतन रूपये ७ मिळालेच पाहिजे.
१९७७ नंतर १८८० साली भारतीय दलित पँथर जन्माला आली वा रूपांतरीत
झाली. त्यावेळचे पँथर समोरील प्रश्न वाढत गेले –
८) मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आहे.
९) महागाई निर्देशांकानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृतीत वाढ व्हावी.
या सोबत काही प्रश्नांची भर पडली.
१०) सिलींग जमीनींची फे रतपासणी करून फे र वाटप करावे व दलितांच्या गडप
करण्यात आलेल्या जमिनी त्यांना परत कराव्यात.
११)१०+२+३ ही समाजद्रोही शिक्षण पध्दत बंद करावी.
१२) दलित विद्यार्थ्यांसाठी तालुका व जिल्हानिहाय वसतिगृहे सुरु करण्यात यावे.
१३) आणीबाणीत जमिनदोस्त करण्यात आलेल्या झोपडपट्यांतील लोकांना
मोबदला मिळावा.
१४) बेकारांना काम देण्यात यावे.
नामांतराचा प्रश्न १९७८ साली संमत झाला तरी दंगली झाल्या, सत्याग्रह निघाले परिषदा झाल्या आणि १४
जानेवारी १९९४ साली मा. शरद पवार मुख्यमंत्री असतांना त्यांनी निर्णय घेतला. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ होत
राहिली. मंडल आयोगाचा प्रश्न पँथरनेच समाजासमोर आणला. अॅड. जनार्दन पाटील हे ओबीसी समाजाचे नेते जगन्नाथ
कोठेकर, अॅड.हिरालाल पोतदार, आदी मंडळी पँथर सोबत कार्यरत होती. प्रा. अरूण कांबळे, डॉ. माईसाहेब आंबेडकर,
प्रा. पुष्पा भावे, मृणाल गोरे, बाबा आढाव, भैय्यासाहेब
$$$$$
आंबेडकर, रासु गवई, दादासाहेब रूपवते यांनी पँथरच्या पाठीशी खंबीर उभे राहाणे पसंत के ले. बौद्धांच्या सवलतींचा
आणि, मंडल आयोग यांचा प्रश्न १९९० मध्ये तत्कालिन पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग यांनी सोडविला. प्रा.अरुण कांबळे
त्यांच्या सोबत होते. रामविलास पासवानांसह संसद भवनात बाबासाहेबांचे तैलचित्र मागे काढले व ‘भारतरत्न’ पदवी
त्यांनीच बहाल के ली. देशातील लालकृ ष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी या हिंदुत्वाचा आग्रह धरणाऱ्या नेत्यांनी देशातील
वातावरण बिघडवून टाकले व विश्वनाथ प्रतापसिंग यांना सर्वोच्च पदाचा राजीनामा द्यावा लागला. या नेत्यांनी शिवसेनेला
सोबत घेऊन बाबरी मशीद ६ डिसेंबर, १९९१ ला उध्वस्त के ली. मुंबईत आणि देशात दंगलीचे वातावरण तयार झाले.
१९९२ बॉम्ब स्फोटांनी अवघे जनजीवन विस्कळीत झाले. १९८८ मध्ये ‘रिडल्स’ प्रश्न समोर आला. १९८९ साली
सर्वांचे ऐक्य घडवून आणण्यासाठी आंबेडकरी संघटनांनी पँथर बरखास्त के ली. मास मुव्हमेंट, दलित मुक्तीसेना, बुद्धिष्ट फ्रं ट,
युवक रिपब्लिकन अशा ज्या सामाजिक संघटना अल्प जनमतात होत्या त्याही एकाच वेळेस बरखास्त झाल्या, पँथरच्या
लोकपाठींच्यापुढे इतर सर्व संघटना यांचा लोकसहभाग गमावून बसल्या होत्या. राजाभाऊ ढाले, नामदेव ढसाळ, रा. सु.
गवई, जोगेंद्र कवाडे, बाळासाहेब आंबेडकर यांना पँथरचा अडसर दूर करायचा होता. त्यांच्यापैकी कोणीही रिपब्लिकन
पक्षाची सामाजिक संघटना पँथर असावी असे प्रतिपादन के ले नाही. १८८५ नंतर आलेल्या बाळासाहेब आंबेडकरांना
तुल्यबळ किं बहुना त्यापेक्षा जास्त पँथर हे संघटन होते. पुढील काळात या दोन गटांचे ऐक्य व्हावे असे आंबेडकरी समाजाला
वाटत राहिले. रामदास आठवले, अनिल गोंडाणे, प्रा. अरुण कांबळे, गंगाधर गाडे, एस्. एम् प्रधान, टी. एम. कांबळे,
दयानंद मस्के , चंद्रकांत हंडोरे, अशी जी पँथर्सची नेते मंडळी होती त्यांना आता रस्त्यावरची लढाई नको होती. या
मंडळींची राजकीय महत्त्वाकांक्षा प्रबळ झाली होती. त्यांच्यातील अनेकांचे लक्ष लालदिव्याच्या गाडीकडे लागले होते.
14
रामदास आठवले यांना पहिल्यांदा लालदिव्याची गाडी मिळाली. पण पँथरची संघटनेची गाडी जळून खाक झाली.
१९७२ ते १९७७ आणि १९७७ ते १९८९ साधारणता १५/१६ वर्षांचा पँथरचा इतिहास उज्ज्वल आहे. त्याला कोणी
अनुलेखाने मारू नये आणि गैरसमजाने काळा इतिहास रंगवू नये. मी यासाठी थोडं क्रमाने लिहिले आहे की या यादींच्या
आधारे समाजातील काही इतिहासकारांना पँथरचा इतिहास लिहिता यावा. जे लोक १९७४ ला पँथर सोडू न गेले त्यात
नामदेव ढसाळ, भाई संगारे (१९७६) अविनाश महातेकर (१९७६), अर्जुन डांगळे यांचा समावेश होतो. १९७४ ते ७७ या
काळात राजा ढाले, ज.वि. पवार यांनी पदे सांभाळली. १९७७ नंतर १९७२ पासून पँथरमध्ये कार्यरत असलेले पँथर पुढे
आले १९७७ ते १९८९ या कालावधीतील पँथरचे पदाधिकारी झाले. १९७४ ते १९७७ या काळात जे लोक पँथर सोडू न
गेले ते परत एखादा अपवाद वगळता कोणीही पँथरमध्ये आले नाहीत. सुरेश सावंत यांनी १९८५ मध्ये पुन्हा पँथरमध्ये प्रवेश
के ला. नामांतर
$$$$$
आंदोलन, मंडल आयोग, रिडल्स प्रश्न, यासारख्या कांही आंदोलनात पँथर सोडू न गेलेले लोक या आंदोलनात का
आले? खरोखर आले का? की त्यांनी विरोध के ला? घ्या सर्व ऐतिहासिक नोंदी, दलित मुक्ती सेना, बुद्धिस्ट फ्रं ट, बामसेफ,
युवक रिपब्लिकन, यांचा जन्म त्या वेळची नियतकालिके पत्रके नव्या इतिहासकारांना वाट दाखवतील पँथरचा ‘इतिहास’
अन् एखाद्याचे ‘स्वकथन’ त्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
इतिहासाकडे वस्तुनिष्ठ पद्धतीने, त्रयस्तवृत्तीने, तटस्थवृत्तीने पाहायला हवे. असे झाले तर कालविपर्यास टळेल,
कार्यकर्त्यांच्या कामाचे योग्य मूल्यमापन होईल. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी उभे राहिलेलं संघटन क्रांतिकारक,
निःखार्थी, लोकशाही वृत्तीचे तरीही जरब बसवणारे, दरारा निर्माण करणारे असू शकते, त्याचा पँथर संघरना हा ऐतिहासिक
पुरावा आहे. ज.वि. पवार यांनी पँथर संघटनेच्या सुरवातीच्या खूप इंत्यभूत नोंदी के ल्या आहेत. आंबेडकरी चळवळीतल्या
क्रांतिकारक इतिहासाची ती महत्त्वाची ‘साधने’ आहेत. ही संशोधन साधने वापरून चळवळीचा इतिहास तपासता येईल.
मात्र त्यातून अनावश्यक फू टकळबाबी वगळाव्या लागतील, ज.वि.नी आपला ‘मी’, ‘आम्ही’ याला वगळले असते तर तो
इतिहास निश्चित होऊ शकला असता. ज.विं.च्या लेखनाला स्वकथनाचे रूप आले आहे. ते ठीक नाही. मात्र ज.विं.चे सर्व
समाजाने आभारच मानले पाहिजेत. त्यांच्या सारखा जागृत कार्यकर्ता पँथरमध्ये होता म्हणूनच दैनंदिनी सारख्या नोंदी त्यांनी
के ल्या आहेत. अनेकांना पँथर चळवळीचे ऐतिहासिक रूप समजतच नव्हते. त्या पार्श्वभूमीवर ज.वि. पवारांचे कार्य
निश्चितच मोठे आहे.
$$$$$
जातीअंताचे लक्ष
15
दलित पँथरने जाती तोडोची भूमिका घेतली होती. पँथर असे पर्यन्त कोणी कोणाला जात विचारली नाही,
आमचे कवी व मित्र दया हिपराळे यांनी मातंग तरुणांचा शोध घेतला त्यात जास्तीत जास्त मांग तरुण पँथरमध्ये कार्यरत होते
असं निरिक्षण त्यांनी नोंदविले आहे. 'दलित' ही 'वर्ग' संकल्पना होती. पँथर ही बिबळ्यावाघाची, नरडीचा घोट घेणाऱ्या
लढाऊ माणसाची प्रतिमा होती. अन्यायग्रस्त, अपमानीत, उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित नाकारला गेलेला असा वर्ग दलित
संकल्पनेतून प्रतित होत होता. मात्र जातीग्रस्त समाजाने दलितवर्ग तसाच न ठेवता जाती घटक तयार के ला. पँथरमध्ये
बौद्ध, मातंग, चर्मकार, मोची, ढोर, भटके विमुक्त, वडार, वाल्मिकी, मेघवाल, तेलगु, तमीळ, अस्पृश्य जाती, कर्नाटकी
अस्पृश्य, आग्री, बंजारा, गोंधळी, बंजारी अशा खालच्या थरातील जातींसोबत गरीब मराठा, देशमुख जातीतील लोक
पँथरमध्ये कार्यरत होते. यात कोणावर ही ‘बौद्ध’ होण्याचा दबाव नव्हता. कार्यकर्ते बाबासाहेबांचे विचार वाचीत होते, पचवित
होते. त्याचा प्रसार-प्रचार करीत होते. पँथरच्या सभांची सुरुवात ज्या महापुरुषांना वंदन करून के ली जायची त्यात तथागत
गौतम बुद्ध होते, या निमित्ताने अनेकांनी मा. का. देशपांडे यांचे 'संत आणि सायन्स' हे पुस्तक प्रस्तावनेपासून वाचलेले
असायचे. बाबासाहेब आंबेडकरांना कार्यकर्ते विशेषणे लावायचे, संकल्पना वापरायचे त्याला बऱ्याचदा टाळ्या मिळत असत.
गांधीजी आणि बाबासाहेब यांच्यातला संघर्ष समजून घेताना अनेक कार्यकर्त्यांनी दोन्ही महापुरुषांच्या अनेक पैलूंचा अभ्यास
के ला होता. गांधीजींची भूमिका सामाजिकदृष्ट्या परंपरावादी, वर्णवादी असल्याचे कार्यकर्त्यांना कळले होते. त्यामुळे
गांधीजींबाबत विशेष आदर कार्यकर्त्यांत नव्हता. गोपाळ गोडसेंचे 'गांधी हत्या आणि मी' हे पुस्तक अनेक तरुणांनी वाचले
होते. ‘महात्मा’ नव्हे तर ‘क्रांतिपिता’ असे पँथर्स जोतिबा फु ले यांना संबोधित होते. जोतिबांचे ‘अखंड’ ते ‘गुलामागिरी,’
‘शेतकऱ्याचा आसूड’ असं समग्रवाङ्मय अनेक तरुण वाचून त्यांचे संदर्भ घेते होते. सभेच्या प्रारंभी संत कबीर, संत
गाडगेबाबा, संत रविदास यांचा उल्लेख होत असे. बंकामेळा, कर्ममेळा, सोयराबाई यांचाही संत ककय्या, यांचाही उल्लेख होई
मात्र चोखामेळ्याला पँथरने कधी अग्रभागी आणले नाही. शाहीर अण्णाभाऊ साठे, जलसेकार भीमराव कर्डक यांचाही पँथर्स
उल्लेख करीत असत. अशी पँथरची सभा आणि तिची रचना होती यांचा प्रबोधनासाठी खूपच उपयोग होत असे. खाजगित
कधी चर्चेचे रूपांतर भांडणात होत असे. चर्चेत मार्क्सवाद, गांधीवाद यांचीही चर्चा होत असे. पँथरमध्ये नव्याने आलेल्यांना
ही मोकळी चर्चा खूप मार्गदर्शक वाटे. त्यासोबत दलित
$$$$$
साहित्य, दलित नाटक आणि एकू णच वैचारिकता समजून घेऊन अनेक सशक्त पँथर तयार होत असत. शिवसेनेचा वैचारिक
विरोध करून त्यांची परंपरावादी भूमिका मोडीत काढायची याचा विचार सतत पँथर करीत असत. आणि त्या भूमिके वर
अखंड प्रहार करीत असत.
16
$$$$$
ढाले की ढसाळ ? :
जनतेचे प्रश्न सोडवताना पँथरचा दृष्टिकोन सकारात्मक होता. कोणताही समाज व्यक्ती किं वा गट, संघटना यांना
मदत करतांना पँथरने आपपर भाव कधी बाळगला नाही. आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला प्रथम निर्भय करून त्याच्यापाठीशी
खंबीर उभे राहाण्याचे आश्वासन दिले जात असे. संघर्षात डोक्याला कफन बांधण्याची भूमिका घेतल्याने कोणाविषयी
पँथरला भिती वाटत नव्हती. पँथरचे शिष्टमंडळ, किं वा कार्यकर्त्यांचा संच कु ठेही भिडत असे. कष्ट घेत असे. अन्यायग्रस्ताला
सोबत घेऊन त्यालाही वस्तुस्थितीचा अनुभव देत असे. कु ठलाही आडपडदा न ठेवता अतिशय पारदर्शक असा हा व्यवहार
असायचा. पँथरवर माता भगिनींचा विश्वास होता. आपले दु:ख सारी जनता पँथरवर टाकू न मोकळी होत होती. ही
विश्वासर्हता जो पर्यन्त टिकली तोवर पँथरचं लढाऊपण अबाधित होतं.
पँथर संघटना काहीनी दोन वर्षात सोडली त्यांना नंतरच्या काळात खूप वाईट वाटले. काही प्रमाणात ते पँथरवर
टीका करीत राहिले. दोन वर्षात पँथर संपली असं म्हणतांना त्यांना खूप बरं वाटत असे. पण पँथर तर अव्याहत १७ वर्षे
कार्यरत होती. अखेरच्या काळात राजाभाऊ ढाले यांनी पँथर पुन्हा उभी राहात असेल तर काम करायची माझी तयारी आहे
असं लोकांशी बोलतांना अनेकदा म्हटलं होतं. राजाभाऊ ढाले त्यांनी पुढील काळात वैचारिक तडजोडी के ल्या. तरीही
नामदेव ढसाळ सारख्या व्यक्तीला ‘पँथर’ म्हणूनच सन्मानित के ले. नामदेव ढसाळाचं पँथरच रूप हे खोटं, मुखवटा धारण
के लेलं होतं.
राजा ढाले पुढील काळात मार्समुव्हमेंट व भारतीय बहुजन महासंघात होते. तरीही शेवटी त्यांच वर्णन लोकांनी
‘पँथर राजा ढाले’ असंच के लं. पँथर ते रिपब्लिकन अशी वाटचाल असलेल्या कार्यकर्त्यांची खरी ओळख पँथर हीच
शिल्लक राहातेय. पँथरचं काम, पँथरचा त्याग, पँथरच धैर्य, पँथरचा इतिहास त्यात काम करणाऱ्यांना सन्मानाने डोक्यावर
घेईल यात वाद नाही. पँथरचे प्रामाणिक इतिहास लेखन होणं आवश्यक आहे. महाराष्ट्र पातळीवर पँथर हे समुह संघटन
असले तरी प्रत्येक विभागात काही नाव कमावलेले, प्रभावी ठरलेले पँथर होते. या व्यक्तित्वांचा प्रभाव जनमानसांवर होता.
त्यात राजा ढाले, नामदेव ढसाळ, अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, ज. वि. पवार, भाई संगारे, सुरेश सावंत, श्याम
गायकवाड.
यांच्या नंतर पुढील काळात प्रा. अरुण कांबळे, मनोहर अंकु श, साराभाई वेळुंजकर, विठ्ठलराव साठे, प्राचार्य
रमेश जाधव, प्रा.डॉ. विठ्ठल शिंदे, प्रा. एकनाथ जाधव, श्याम पंडित, गंगाधर गाडे, एस्.एम्. प्रधान, यशपाल सरवदे,
प्रितमकु मार शेगावकर, रामदास आठवले, प्रियकीर्ती त्रिभुवन, डॉ. माईसाहेब आंबेडकर, प्रेम गोहिल, सिद्राम ओव्हाळ, आम.
$$$$$
अनिल गोंडाणे, चंद्रकांत हंडोरे, रमेश मकासरे, रमेश इंगळे, वसंत पवार, वसंत कांबळे, कमलाकर जाधव, दिलीप चंदने,
यांच्या बरोबरच पँथरमध्ये काही कौशल्य संपन्न लोक होते. कार्यक्रमाचे आयोजन, चर्चा, आर्थिक मदत उभी करणे अशा
कामात गौतम सोनवणे, कमलेश यादव, (कवी) उमाकांत रणधीर, तानाजी गायकवाड यांचा समावेश होता. ह्या व्यक्तींचा
17
एकू ण व्यवहार तडजोडशून्य होता. वक्तृ त्व अत्यंत प्रभावित करणारे होते. आंबेडकर विचारांसोबत अन्य संदर्भाचा त्यांचा
अभ्यास होता. लोकांचा त्यांच्या शब्दांवर विश्वास होता. त्यांनी आपल्या भाषणाद्वारे एक चाहतावर्ग निर्माण के ला होता.
सुरेश सावंत, श्याम गायकवाड पूर्ण वेळ कार्यकर्ते नेते होते. मनोहर अंकु श फौजेतून व रमेश इंगळे सेवेतून बडतर्फ झाले
होते. मनोहर अंकु श आणि भाई संगारे यांचे अपघाती निधन झाले. रामदास आठवले, गंगाधर गाडे, एस्. एम्. प्रधान, अनिल
गोंडाणे पूर्णवेळ कार्यकर्ता होते. अविनाश महातेकर, ज.वि.पवार, भाई संगारे, राजा ढाले, प्रा. अरुण कांबळे, प्रा. विठ्ठल
शिंदे, प्रा. एकनाथ जाधव, प्राचार्य रमेश जाधव, प्रेम गोहिल, इ.शिक्षण घेत व अल्पकाळ सेवा करून पँथरसाठी पूर्णवेळ देत
होते. जास्त वेळ सोडला तर पँथरच्या अखेरीस यातील काहींनी नोकरीत जोडू न घेणे पसंत के ले. साधारणतः १९८३ ते
१९८९ पर्यंतच्या काळात अनेकांनी सेवेत जाणे पसंत के ले.
पँथरचे पहिले अधिनेशन नागपूर मध्ये १९७४ साली झाले पण राजा ढाले, ज.वि. पवारांनी पँथर १९७७ ला
बरखास्त के ल्यामुळे दुसरे अधिवेशन झाले नाही, ते देश पातळीवरील पहिले, अधिवेशन होते. या अर्थवेशनाने पँथर भारतभर
पोहचली म्हणून ‘भारतीय दलित पँथर’ असे नाव तिला प्राप्त झाले. दलित पँथरचे नेते गेले तरी पँथर मध्ये सुरवाती पासून
असलेल्यांनी पुढील काळात दुसरे आणि तिसरे अधिवेशन अशी दोन अधिवेशने घेतली. दुसरे अर्धवेशन मुंबईतील दादर येथे
सावरकर स्मारकात झाले तर तिसरे अधिवेशन सोलापूर येथे झाले. प्रचंड मोठी अशी ही अधिवेशने झाली. या दरम्यान
दलित परिषदेचा (१९८८) मोठा कार्यक्रम पँथरने घेतला त्यात डॉ. माईसाहेब आंबेडकर, भाई रमेशचंद्र परमार, राहुलन
आबावडेकर, गंगाधर गाडे, रामदास आठवले संयोजक होते. प्रा. जोगेंद्र कवाडे, विठ्ठल साठे, उपस्थित होते. (बाळासाहेब
आंबेडकर व राजा ढाले अनुपस्थित होते.)
पँथरचे कार्यक्रम अत्यंत गर्दीचे प्रचंड असे होत असत. साधा स्थानिक पातळीवरील मोर्चा देखील पाच ते दहा
हजारांचा असायला. आणि अन्य सभा संमेलन, स्मृतीदिनाला जवळपास वीस हजार लोक उपस्थित राहायचे.
पँथरचे कार्यकर्ते नि:स्वार्थी होते. पायाला भिंगरीबांधून शहरातील वस्त्या न वस्त्या मुलांनी उभ्या के ल्या, जाग्या
के ल्या. राजा ढाले यांच्यानंतर कोण ? असा प्रश्न पडला तेव्हा प्रा. अरुण कांबळे सारखा विद्वान युवक पुढे आला. मुंबईतील
झोपडपट् ट्यात फिरणारे,
$$$$$
'ग्रासरूट' वर काम करणारे, गौतम सोनवणे सारखे कार्यकर्ते किती त्याग करू शकले याचा सहज हिशोब मांडता येतो. गौतम
सोनवणे सतत पडद्यामागे पँथरचा कणा बनून राहिला. हा युवक विज्ञान शाखेचा पदवीधर पण त्याने नोकरी के ली नाही.
प्रसंगी उपाशी, अडचणीच्या दिवसांना तोंड दिले, नामांतराचा प्रश्न सुटेपर्यन्त वय होऊन गेले. उशीरा लग्न के ले. एकु लती
एक कन्या झाली. तिचेही अल्पवधीत निधन झाले. इतकं शोकाकु ल आयुष्य वाट्याला आलेले लोक भ्रष्टाचार न करता जगत
आलेत आणि समाजाला त्यांचा आधार वाटतोय हे अतिशय महत्त्वाचे आहे. पँथरच्या भल्या काळात अन् बुऱ्या काळातही
आपले मानणारे, हे पँथरासारखे जबाबदार अन स्वच्छ चारित्र्याचे लोक आजही खंबीरपणे पाय रोवून उभे आहेत. पँथरचा हा
संस्कार जोवर आहे तोवर पँथरीबाण्याला उणेपण येऊ शकणार नाही. मी एका गौतम सोनवणेचं उदाहरण दिल पण असे
शेकडो गौतम झोपडी झोपडीतला अंधार दूर करण्यासाठी आयुष्य भिरकावून देत होते. खेड्यापाड्यातील प्राथमिक
सामाजिक . सांस्कृ तिक बदलाला पँथरच्या आगमनानेच प्रत्यक्ष सुरुवात झाली. म्हणून प्रत्यक्ष झगडे, मारामाऱ्या, संघर्ष
अन् जाती युद्धेही झाली. पँथर लढत राहिले. प्रत्येक तालुक्यात शेकडो पँथर्स रोज फिरायचे. पायी फकिर बनून, बौद्ध
भिक्सूसबनून समाजात मिसळायचे. त्यांच्यातला घास खायचे आणि चटई, गोणपाट, घोंगडीवर झोपायचे, समाजाला याच
तर वागण्याने बळ दिले. श्रेय घेण्यासाठी उपटसुंभाची गर्दी जमते. झळ सोसायची तयारी नसते. अनेक अशा आंबेडकर
विचारशून्य आणि चळवळीचा कणा तुटलेल्या सांडांनी पँथरला नीट समजूनच घेतले नाही. म्हणून आंबेडकरी समाजाच्या
युवा पीढ़ीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पँथर बरखास्त झाल्यानंतर रिपब्लिकनांना सत्तेची, सुखाची स्वप्ने पडू लागली.
पुढील काळ तडजोडींचा, सत्तेचा कोपरा उपभोगण्याचा आहे. आंदोलने न करता घरात बसणाऱ्या, साखळीला बांधलेल्या
श्वानांना चळवळ कळणे मुश्किल आहे. घराबाहेर पडू न आयुष्यातील काही काळ जवानी, सुख संपत्ती, ऐषआराम, प्रेमाची
गुलाबी थंडी झुगारणारा कु र्बानी देणारा पँथर सार्वजनिक पातळीवर संपल्या सारखा वाटत असला तरी जीवंत माणसांच्या
मनान तो अजूनही धगधगतो आहे.
18
पँथरची तीन अधिवेशने झाली त्यात जे दुसरे अधिवेशन मुंबईत दादर येथे सावरकर स्मारकात चैत्यभूमी शेजारी
झाले त्यातले ठराव अत्यंत महत्त्वाचे ठरतात. पँथर अधिवेशनातले ठराव म्हणजे पँथरपुढील प्रश्न होते. पँथर्सची भूमिका
होती. पँथरची कार्यप्रणाली अन् दिशाबध्दता होती असे म्हणता येते.
$$$$$
सर्वजातीसमुहांना प्रभावाखाली ठेवलेले आहे. हा प्रभाव बहुजनजातीनी मान्य के लेला आहे त्यांना ईश्वरा विरुद्ध बोललेले
खपत नव्हते. पँथरच्या हल्ल्यांनी बहुजन वर्गाच्या आधुनिक काळातील अनेक युवकांना वैचारिक दृष्ट्या जागे के ले हे
ऐतिहासिक सत्य आहे. पँथरचे हल्ले ब्राम्हणवर्गावर का होते त्याचे हे कारण आहे. ब्राम्हण दालितांना काही त्रास देत नाहीत
दलितांना त्रास मराठे आणि बहुजन मागासवर्गातील जाती देतात त्यांना तुम्ही दूषणे द्या असा जो मतलबी अन् फसवा सूर्
होता त्याचा भंडाफोड़ करण्याचे काम पँथर्सनी के ले. समाज जागृतीचे हे पँथरचे कार्य खूप बारकाईने न्याहाळल्यास राष्ट्रीय
एकात्मतेचे ज्वलंत आणि अपूर्व तथा ऐतिहासिक होते यात शंका नाही. पँथरने धार्मिक प्रश्न उचलणे योग्यच होते.
19
पँथर्सवरील आरोप पँथर्स अनेक सभासंमेलने बैठकांतून खोडू न काढायचे. आरोप तीन प्रकारचे होते. हे आरोप
करणारे लोक भारतीय बौद्ध महासभेत काम करणारे किं वा आरपीआय गटात सामील झालेले लोक असत. त्यांना पँथरने
कधी ही जुमानले नाही.ते आरोप असे होते.
१) पँथरचें लोक हिंसेचे समर्थक आहेत.
२) पँथर्सचे लोक मार्क्सवादी आहेत.
३) पँथर्स बुद्धधम्म विरोधक आहेत.
पँथरने हिंसेचे कधीही समर्थन के ले नाही. पँथर ही क्रांतिकारी विचारांची संघटना होती. अन्याय निपटू न काढला
पाहिजे. ठोशास ठोसा दिला पाहिजे. अरेला कारे के ले पाहिजे. इट का जबाब पत्थर से देंगे, अशा काही पँथरशैलीच्या आधारे
काही लोकांनी पँथरला हिंसावादी ठरवण्याचा प्रयत्न के ला. पँथरने अन्यायाच्या विरोधात सूडबुद्धी ठेवून वागायला कधीही
शिकविले नाही. अन्यायाचा प्रतिकार करीत “लाठी-गोली खाऐंगे फिरभी आगे जायेंगे असे म्हणत किं वा जयभीम के नारे पे
खून रहे तो बहने दो” अशा घोषणा, गर्जना देणारे हा पँथरचा दबलेला आक्रोश, अन् कोंडलेला आवाज होता. त्याला हिंसक
म्हणणे गैर होते. आव्हानांच्या निर्भय भाषेला बुलंद होण्याची प्रक्रिया समजून घेतांना स्वत:ला बाबासाहेबांचे अनुयायी
म्हणणारे लोक खुजे पडत होते हेच वास्तव होते. अनेक पँथर यासाठी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म' मधील बाबासाहेबांनी
के लीली तर्क शुद्ध चर्चाच मांडीत असत. बाबासाहेब हिंसेचा अर्थ घेताना: will to kill and need to kill इच्छा'
आणि 'गरज' यातला फरक लक्षात आणून देतात. गरजेनुसार के लेली हिंसा ही हिंसा ठरत नाही, दंश करायला आलेला
साप, मटण किं वा जीवाला पोषक मटण खाणं आवश्यक असेल तर त्याला हिंसा मानता येत नाही अशी पँथर्स अरुण साधू
यांनी अबकडई दिवाळी अंकात ‘दलित पँथर' या शीर्षकाने लेख लिहितांना १९७३/१९७४ साली पँथरची काही वैशिष्टये
नमूद के ली. पँथरची डाव्या, संसदीय लोकशाहीला विरोध करणारी आणि सशस्त्र लढ्यावर विश्वास असणारी प्रतिमा
जाहिरनाम्याने के ली होती. हा जाहीरनामा नामदेव ढसाळांनी लिहिलेला नव्हता तर तो नक्षलप्रभावीत मित्रांनी लिहिल्याचे
उघड झाले होते. नामदेव
$$$$$
ढसाळांना पँथरने काढू न टाकले आणि त्यांनी पँथरचे फु टकळ कार्यक्रम करित अधिवेशने आयोजित के ली तरी आयुष्यभर या
एका व्यक्तिने ही भूमिका मरेपर्यन्त घेतली. अरुण साधू लिहितात सशस्त्र क्रांतीचा उघड उच्चार करणाऱ्या पँथर संघटने
समोर मोठे आव्हान होते. क्रांतीचे आव्हान पेलण्यासाठी पँथरमध्ये सामर्थ्य नाही, असे अरुण साधुंचे मत होते. पत्रकारांनी
पँथरची अशी विपरित प्रतिमा तयार के ली होती, जी फक्त नामदेव ढसाळ आणि त्यांच्या भोवती फिरणाऱ्या कार्यकर्त्यांनांच
मान्य होती. साधू तेव्हा लिहितात," संघटनात्मक आणि वैचारिक ताकद कमविल्याशिवाय हे सामर्थ्ये पँथरमध्ये आलेच
नसते. पँथरच्या नेत्यांमध्ये विचारांची स्पष्टता नव्हती. जे धुसर रोमँटिक विचार होते, त्याबाबत एक वाक्यता नव्हती.
समोरची उद्दिष्टे स्पष्ट नव्हती आणि कार्यक्रमही नव्हते. पँथरच्या नेत्यांमध्ये बुद्धीमत्तेची चमक निश्चितच होती. पण संघटन
कौशल्य नव्हते.” पुढील काळात अरूण साधूंची मते खरी तर काही खोटी ठरली. संघटना बांधणी विषयी शेवटचे अध्यक्ष
रामदास आठवले पर्यन्त कोणालाही राज्य पातळीवर नीट बांधणी करता आली नाही. शेवटी पक्षातील दोन्ही चांगल्या व
वाईट प्रवृतीच्या खांद्यावर रामदास आठवले हात टाकीत राहिले. दोघेही त्यांच्याशी प्रामाणिक राहिले. रामदास आठवले
यांनी सांघिक नेतृत्व झुगारून व्यक्तीकें द्रियता स्वीकारली व शक्य होईल, तेथे स्वतःची मनमानी पद्धत चालू ठेवली. अनेक
सभांतून ते कार्यकर्त्यांनाच, दम देत असतं ही फारच दु:खद बाब होती.
भगवान बुद्ध आणि तत्कालीन शासनकर्ते राजे यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा ही अनेकदा हवाला दिला जात
असे, पँथर्सना मार्क्सवादी म्हटले जाई. पँथर्स बौद्ध धम्म पाळीत नाहीत असेही आरोप होते. नामदेव ढसाळ आणि राजा
ढाले यांच्या विसंवादी चर्चांचा प्रभाव समाजावर होता त्यातून अनेक गैरसमज जन्माला आले होते. पँथर्सच्या बहुतेक
नेत्या कार्यकर्त्यांनी मार्क्सवाद आधाशासारखा वाचला होता. मार्क्सचे तत्वज्ञान क्रांतिकारी आहे यावर अनेकांचा विश्वास
होता. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचे काठमांडू तील ‘बुद्ध की कार्ल मार्क्स’ हे भाषण वाचनात आले आणि 'स्टेट' बाबत
मार्क्सची विधानं समोर आली, तेव्हा अनेकांनी खोलात जाऊन चिंतन के ले होते. ‘State will wither’ स्टेट
आपोआप नष्ट होईल त्या आधी कामगारांची हुकु मशाही येईल, याचा विचार करता 'स्टेट' म्हणजे सामुहिक विचार पद्धती
कु ठेच नष्ट होत नाही. शिवाय ‘धर्म’ आवश्यक असतो, तो 'धम्म' म्हणजे नीती, किं वा आचरणाच्या माध्यमातून अस्तित्वात
20
यावा लागतो. या सारखे बाबासाहेबांनी लेखनातून मांडलेले सत्य कार्यकर्ते जाणून होते. ते बुद्ध खूप नीट समजून घेत होते
आणि बाबासाहेबांचे विचार किती कृ तीशील आहेत. हे तुलना करून जाणून घेत होते त्यामुळे पँथर्सनी धम्म स्वीकाराने जात
नष्ट होईल, या भूमिके वर ठाम राहाणे पसंत के ले. सांसदीय लोकशाही हाच जगासमोर पर्याय असल्याचे मत पँथर मांडित
राहिले. जे जे विरोधक पँथर्सची ही चर्चा ऐकत असत त्यांचे गैरसमज बऱ्याच अंशी दूर होत. पँथर्स बुद्ध धम्म विरोधक
आहेत, असा प्रचार काही भेदरलेल्या कच्च्या आंबेडकरवाद्यांनी के ला. मुळात
$$$$$
पँथरच्या सडेतोड मांडणी पुढे या पारंपरिक बौद्धांचा टिकाव लागत नसे. पालीभाषा, त्रिपिटक, पारंपरिक बौद्ध वाङ्मय याचं
परिशिलन न करता, बुद्ध आणि त्यांचा धम्म' ग्रंथाचं नीट आकलन करुन न घेता अवैज्ञानिकदृष्टीने पछाडलेल्या तथाकथित
बौद्ध व्यक्तींनी पँथर धम्म विरोधक, वाटले असावेत धम्म स्वीकार विजयादशमीला नागपूर येथे झाला, की १४ ऑक्टोबर
रोजी ? याचे उत्तर पँथर्सनी दिले. १४ ऑक्टोबर १९५६, बौद्ध भिक्खूंचे वर्तन तपासावे की तपासू नये ? पँथर्सना वाटे,
तपासावे. 'भंतेजींच्या 'श्रध्दा' संकल्पना, पाया पडणे नाकारावे का ? पँथर्सना वाटे, नाकारावे. बुध्दाच्या जन्माची
भविष्यवाणी, त्यांचा अलौकिक वावर पँथर्सना मान्य होता का? नव्हता. बुद्धाचा गृहत्याग कोलियशाक्य संघर्षातून रोहिणीच्या
पाणी वाटपातून झाला, हे पँथर्सना मान्य होते. अनेक बुद्धसिध्दान्त पँथर्सच्या मुखोदगत होते. याचा अर्थ पँथर्सना वैज्ञानिक
बुद्ध हवा होता. काहींना पारंपरिक आध्यात्मिक बुद्ध हवा होता. पँथर्सना बौद्ध विधितिले संस्कार वास्तवाच्या कसोटीवर
तपासायचे होते आणि तेच खरे आहेत असे मांडायचे होते. त्यामुळे या वैचारिक मतभिन्नतेच्या पोटी पारंपरिक बौद्धांनी
पँथर्सवर बुद्ध धम्म विरोधक असल्याचा आरोप के ला होता, तो तद्दन खोटा अन् तकलादू होता. त्याला जाहीरसभांतून
उत्तरे दिली जात होती.
$$$$$
21
विचारवंत, लेखक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत या प्रतिमा उजळ करण्याचा आटोकाट प्रयत्न के ला. राजा ढाले यांच्यावर ७०
च्या आसपास गुन्हे दाखल होते. ढाले नामदेव ढसाळांच्या वर्तनावर नाखूष होते. या वर्तनाचा ढालेंना खूप त्रास झाला.
ढसाळ तर ठिकठिकाणी तडजोड करीत अन् कार्यकर्त्यांना लुबाडीत निघाले. ठाणे जिल्हयातील एक विज्ञानशाखेचे
पदवीधर, नाटककार, कवी, लेखक यांचा प्रवास अत्यंत वेदनादायी आणि दुःखद होता. त्यांनी पँथर सोडली होती, तरी
पँथरचा लढाऊबाणा सोडला नव्हता. त्यांना आपले दोन भाऊ गमवावे लागले, त्यांच्यापाठी ठाणे जिल्हयातील पँथर आणि
संपूर्ण समाज सतत उभा राहिला. त्यांनी व गायकवाड कु टुंबाने के लेला त्याग महाराष्ट्राच्या पातळीवर अतुलनीय व
श्रेष्ठदर्जाचा ठरतो. गंगाधर गाडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता त्यांना मिसाखाली अटक करून तुरूं गात ही
टाकले होते. अत्यंत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या रायगड जिल्हयातील प्रकाश पगारे आणि श्याम कांबळे या युवकांना के वळ
सूडबुद्धीने षडयंत्र रचून राजकीय प्रतिस्पर्धी समजून खुन्याच्या गुन्ह्यात तुरूं गवास भोगावा लागला. अण्णासाहेब रोकडे यांना
समाजसेवेसाठी तडीपार व्हायची वेळ आली होती तर कल्याण बुद्धभूमीच्या जमीन संघर्षात तुरुं गात टाकण्यात आले होते.
हे कोणत्याही अर्थाने 'राजकीय कै दी' मानले गेले नाहीत तर त्यांना 'गुन्हेगार कै दी’ बनविण्याचा आटोकाट प्रयत्न के ला गेला
होता. त्यातूनही हे लोक उभे राहिले आणि आजही खंबीर उभे आहेत. शिक्षण घेता घेता अनेकांना जास्त शिकायची
आंबेडकरी प्रेरणा पँथरच्या माध्यमातून मिळत राहिली. वाचनाचे, चर्चेच वेड लागले, सामाजिक कार्याची गोडी लागली. तर
काहींना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. पूर्णवेळ कार्यकरणाऱ्या कार्यकर्त्यांचा बऱ्याच अशी कोंडमारा झाला. उपासमार,
दारिद्र्य, अस्थिरता सहन करून आज ही पँथर ताठ, विनम्र कण्याने उभे आहेत. त्यांना विनम्र प्रणामच के ला पाहिजे.
$$$$$
पँथर ही कलाप्रिय चळवळ होती. पँथरमध्ये अनेक साहित्यिक वादक, गायक, कवी, गीतकार, पत्रकार, संपादक
प्रारंभा पासूनच चळवळीचा एक भाग म्हणून राहिले आहेत. राजा ढाले, नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे , प्रा अरुण कांबळे,
उमाकांत रणधीर, एस.एम्.अंधेरीकर, प्रा. विठ्ठल शिंदे, अविनाश महातेकर, प्रल्हाद चेंदवणकर, ज. वि. पवार बाबुराव
बागूल, मनोहर जाधव, मनोहर अंकु श, दादाभाऊ साळवे, बबन लव्हात्रे, वामन निंबाळकर, लक्ष्मण माने, शरणकु मार
लिंबाळे, दत्ता जाधव, सयाजी वाघमारे, यांनी प्रारंभापासून चळवळीला पुरक लेखन के ले. सुरेश सावंत, श्याम गायकवाड,
भूपेश धुलकर, प्रकाश बनसोडे, एकनाथ जाधव प्रा.वि. सो. शिंदे, रमेश इंगळे, महेश काकळीस यांनी काही अंकांचे
संपादकपद सांभाळून ते प्रकाशित के ले. वामनदादा कर्डकांसारखे कवी-गायक पँथरच्या मंचावरून कधी गायिले नाही तरी
त्यांची अनेकगीते पँथरचा विचार जनमानसात पसवणारी होती. पँथरच्या कार्यक्रमात ‘ऐक्य विचार’ आघाडीवर होता,
वामनदादांनी सर्वांनी एकतेने नांदण्याचा आग्रह धरला. पँथरच्या मोर्चा आंदोलनात मंचावर येऊन अग्रभागी असलेला
कवी/गायक होता मनोहर जाधव. “अब्रुच्या पुन्हा वैरी करीतो चिंधडया”... सारखे गीत दत्ता जाधव गुरुजी गातं किं वा
“प्रत्येक पँथरामध्ये भागवता दिसे तू आज" “राजा ढालेची आज्ञा आम्ही पाळली शिवतिर्थावरी गीता जाळली', नामांतर
सत्याग्रहासाठी "तुम चलो हम चले चलो औरंगाबाद". विलास घोगरे यांचं गाणं ‘जळतोय मराठवाडा’ फारच लोकप्रिय झाले.
विलास घोगरेने पँथरचे समर्थन के ले. पँथर विठ्ठल शिंदे यांची अनेक गाणी गाईली जात होती. “छावणी चित्यांची जिथे जिथे
आहे तिथे लांडग्यांची मौत उभी आहे” हे गाणे लोकप्रिय ठरले. त्यांच्या अनेक गाण्यांच्या ओळी पँथरने रंगविलेल्या भिंतीवर
झळकल्या होत्या. प्रभाकर पोखरीकर ह्यांचाही पँथरच्या प्रत्यक्ष आंदोलनात गीतांच्या माध्यमातून सहभाग होता. महाराष्ट्र
पातळीवर अनेक पँथर रचना करत गात होते त्यांचा शोध अपरिहार्य ठरतो. साहित्य, पत्रकारिता, संपादन, गीत लेखन,
कविता लेखन, कथा लेखन या सर्व अंगानी हा कलावंत शोध अपेक्षित आहे. ‘चंदर’ च्या जीवनावरील सा. जयभीमतील इ.
मो. नारनवरेंची कथा किं वा दिवाकर शेजवळ यांची पत्रकारिता यांनी त्यात्या काळात पँथर्सना बळ दिले आहे.
ग्रामीण आणि शहरी परिसरातील जनतेला पँथरने निर्भय के ले. पोलिसखाते, सरकारी यंत्रणा यांनी वंचित
समाजाच्या बाजूनेच उभे राहावे, असा पँथरचा आग्रह होता. पोलिस, फॉरेस्टर, किं वा मामलेदार यांना भिणारा माणूस
त्यांच्याशी सरळ 'आपल्या मोडक्या तोडक्या भाषेत संवाद साधू लागला, भांडू लागला, गाऱ्हाणे मांडू लागला. पँथरने हे
शहाणपण बाबासाहेबांचे विचार रूजवून ग्रामीण भारताला दिले होते. पँथरमुळे आपसातले वाद मिटत होते. शहरी भागात
असलेल्या गुन्हेगार टोळ्या एके काळी पँथरचे
$$$$$
22
मान्य करून सुधरत होत्या. कित्येक वॅगन लुटणाऱ्या, चाकू सुरी, तलवारी चालवणाऱ्या युवकांनी पँथरच्या प्रबोधनाने आपला
मार्ग तपासून घेतला, ते युवक समाजाचे संरक्षक कवच बनले होते. गावागावात वंचित उपेक्षित समाजातील अज्ञानामुळे
'भावबंदकी' 'जात पंचायती’ आस्तित्वात होत्या, पँथर्सनी या भाऊबंदकीचे वाद मिटविले, सर्वांना एक के ले होते. लग्न
समारंभातील दारु पिऊन भांडणं करणाऱ्यांना ठिकाणावर आणले. अज्ञानी सोयरे मंडळींतील कमालीचे विरोधक पँथर
एकत्र बसविले. मानपानातून आलेले रुसवे फु गवे अन् भांडणतंटे पँथरमुळे थांबले. बौद्ध विवाह पद्धतीचे शांत, संयमी,
आदर्शरूप पँथरमुळे घडत जात होते, हे कोणालाही नाकारता येणार नाही.
पँथरने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाने ऐतिहासिक ठरलेल्या स्थळांना भेटी देऊन तेथे जाहीर सभा घेत
प्रबोधन सुरु के ले. लाखो लोक त्या स्मृतीस्थळांना भेटी देवू लागले, चैत्यभूमीदादर, दीक्षाभूमी नागपूर सोडता, महाड
चवदार तळे, भीमा कोरेगाव स्मृती स्तंभ, पुणे, सातारा भीमाई स्मारक, देहूरोड धम्मविहारांत प्रथम बुद्धमूर्ती (१९५४)
स्थापना दिवस, नाशिक काळाराम मंदिर सत्यागृह स्मृती, येवले येथील मुक्तीभूमी, भागवत जाधव शहीद स्मृती दिन,
लव्हलेन भायखळा, आता नामांतर दिवस आणि शहीद स्मृती दिवस औरंगाबाद, या शिवाय स्थानिक पातळीवरील
स्थळांना जागृतीसाठी सतत जनतेसमोर तेवत ठेवण्याचे कार्य पँथर्सनी के ले आहे. त्यातून अखंड जागृतीचा अग्नी आणि
चळवळीचा जिवंतपणा पँथर्सनी तेवत ठेवला. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी या संवादाचा फायदा होत गेला. कालांतराने
कर्मकांड सोडू न उत्सव अन् चिंतनाचे सोहळे म्हणून या कार्याला महत्त्व येऊ शकते. गरब्यात, गणपतीत किं वा अन्य
अंधश्रध्द परंपरांत सामील होण्याचे अन् नाचण्याचे प्रकार पुढील काळात आंबेडकर समुहातून लुप्त होऊ शकतात. बुध्दाच्या
जीवनकाळाशी जोडण्याचा प्रयत्न पँथरचा होता, मात्र सर्वच 'पौर्णिमा' पाळणं अन् उपोसथव्रत किं वा उपासतापास करणं
याला पँथरचा विरोध होता.
पँथरकाळात, पँथरमाध्यामातून आंबेडकरी जनतेने हाताळलेले जे प्रश्न आहेत, त्या प्रत्येक प्रश्नाच्या प्रारंभापासून
मांडणी करायला हवीय. उदा. नामातरांचा प्रश्न प्रथम कोणी मांडला? आंदोलन कोणी उभारले ? पाठींबा कोणी दिला?
यातून जे लोक आयते श्रेय घेण्यासाठी उभे राहिले त्यांचा चिकित्सक, भंडाफोड होण्याची शक्यता आहे नामांतराच्या काळात
कोणत्या नेत्याने काय प्रतिक्रिया दिली ? नामांतराचे समर्थन के ले की काही मतभेद नोंदवून अप्रत्यक्ष विरोधच के ला. हे सर्व
स्पष्ट होणं आवश्यक आहे. नामांतराबाबत ज्यांनी ऐन धामधुमीच्या काळात आंदोलनातील हवा काढू न घेण्याची विधाने
के ली, तेच लोक निर्लज्जपणे नामांतराचा प्रश्न आम्ही सोडवला असे म्हणू लागले तर तो इतिहासाचा विषयास ठरेल. विपर्यास
नामांतराच्या आंदोलनात ज्यांचा पुढाकार होता, त्यांची साक्ष तपासणे हे
$$$$$
जास्त महत्त्वाचे ठरेल. ६ डिसें १८७९ नंतर 'चळवळीचे दिवस' म्हणून लिहिलेल्या अनुभवांत प्रा. अरूण कांबळे यांनी
म्हटले आहे की, " दु:खाची बाब म्हणजे या सत्याग्रहात रा.सु. गवई, बॅ. खोब्रागडे, प्रकाश आंबेडकर, राजा ढाले, नामदेव
ढसाळ आदी दलित नेते सहभागी झाले नाहीत" (पृ. ५) यामुळेच 'नामांतर’ ‘मंडल आयोग’, 'रिडल्स प्रकरण' 'राखीव
जागा विरोधी आंदोलने, 'बौद्धाच्या सवलती’, इ. प्रश्नांबाबत अभ्यासकांनी सर्व बाबी तपासल्या पाहिजेत. फक्त फु टीचे चित्र
उभे करू नये तर एकजुटीचे नेमके दर्शन घडविले गेले पाहिजे हा दृष्टिकोन नाही. वास्तवाला डावलू शकत नाही.
१) ‘भावनिकतेतून बाहेर पडा’ या पुस्तिके त बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की, अत्याचाराची तीव्रता संपल्यावर पँथर
कार्यक्रमाच्या स्वरूपात पर्याय देऊ शकली नाही म्हणून मी असं म्हणेन की, पँथरचं विघटन ही एक नैसर्गिक बाब होती.
२) माझ्याकडे सत्ता नव्हती त्यावेळी नामांतराच्या प्रश्ना पासून गायरान जमिनीचा प्रश्न, बौध्दांच्या सवलती, हे जे
विनासत्ता आम्ही मांडू शकलो, यावरून एक लक्षात घेतलं पाहिजे की, सत्ता कु णाला काहीच देऊ शकत नाही.
३) पँथरनं जातीच्या, धर्माच्या या आधाराला ठोकायला सुरुवात के ली. हे करीत असतांना हा पँथर मायथॉलॉजीमध्ये
असलेली विडंबन मांडीत होता. पँथर चळवळ सुद्धा एक जातीय झाली.
23
४) प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी पँथरला व एकू णच जात व्यवस्थेच्या हल्ल्याला, सत्तेला ज्या विकृ त पद्धतीने
प्रतिक्रिया देवून मांडले आहे, याची अभ्यासकांना सप्रमाण चर्चा करून मांडणी करावी लागेल, अशी अनेकांची मते दडलेली
असू शकतात.
डॉ. लता मुरुगकर, शरणकु मार लिंबाळे, अँड. बापुराव पखिड्डे, कमलेश यादव, राहुल एस प्रधान, दत्ता
जाधव, प्रा अरुण कांबळे, बबन लव्हात्रे, पी. के . बोर्डे या काही चिंतकांचे लेखन महत्वाचे आहे. पण बबन लव्हात्रे आणि
दत्ताजाधव यांचे लेखन अतिमहत्वाचे आहे. या दोघांनी खूप महत्वाच्या नोंदी करून ठेवून पुस्तके लिहिली आहेत. नोंदी ज.
वि. पवारांनीही चांगल्या के ल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात अण्णासाहेब रोकडे यांच्यासह प्रा.डॉ. विठ्ठल शिंदे, सुधाकर बर्वे,
भुपेश थुलकर यांनी आपल्या दैनंदिनी स्वरूपाच्या नोंदी के ल्या
$$$$$
आहेत. मात्र बबन लव्हात्रे यांनी विदर्भातील पँथर चळवळीचा इतिहास लिहिला आहे त्यांचे कार्य मोठेच ठरते. गौतम
सोनवणेंसह अनेक पँथर्सनी आपल्या जवळचे फोटो लेख, पत्रे, पत्रके सारेकाही २००५ जुलै २६ च्या महापुरात गमावले
आहे. आज हयात असलेल्यांच्या मुलाखती घेऊन आणि त्या तपासून अनेक नोंदी मिळवता येऊ शकतात. विदर्भाचे अर्धे
काम झाले आहे पण मराठवाडा विभाग, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, कोल्हापूर किं बहुना ठाणे जिल्ह्यासह प्रत्येक
जिल्ह्याचा इतिहास लिहिला जाणं आवश्यक आहे. हे कार्य ऐतिहासिक आणि तितके च मोठे आहे. त्यासाठी साधारत २५
ते ३० सदस्यांची एक बृहद समिती तयार करून अभ्यासक, संशोधकांना साहाय्य करायला हवे आहे. दलित पँथर
चळवळीचा इतिहास लिहिला जाऊ शकतो. या कामी शासकीय अर्थसाहाय्य मिळाले तर जरा जलदगतीने कार्य तडीस
नेता येऊ शकते. जिवंत आंबेडकरवाद्यांचा क्रांतिकारी इतिहास लुप्त होण्याआधी नव्या पिढीसमोर यावा, हीच प्रामाणिक
तळमळ माझ्यासह अनेकांच्या मनात आहे, असे मला जाणवले आहे.
$$$$$
24
डॉ. माईसाहेब आंबेडकर यांना रिपब्लिकन पुढारी वर्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूस जबाबदार
ठरवून त्यांची चहुबाजूंनी कोंडी के ली. आंबेडकरी समाज डॉ. माईसाहेबांच्या विरुद्ध गेला. ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या
ग्रंथात बाबासाहेब आंबेडकरांनी साधरणत: नऊवर्षे आपल्याला लेकरासारखं जगवलं, सांभाळलं, निर्णयात साथ
दिली अशा अर्थाचे गौरवोद्गार होते, ते छापलेच नाहीत. त्यामुळे बाबासाहेबांचा एकमेव पुत्र यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब
आंबेडकर यांनीही माईसाहेबांना समजून घेतले नाही. उलट बाबासाहेबांच्या आदेशाप्रमाणे माईसाहेब भैय्यासाहेबांच्या
विवाहप्रसंगी उपस्थित राहिल्या होत्या. नातू प्रकाशराव ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनीही माईसाहेबांचा सांभाळ के ला
नाही. जवळपास १४ वर्षे अज्ञातवासात माईंना 'शापित' जीवन जगावे लागले. डी.डी.बावीसकर, विजय सुरवाडे व परिवाराने
माईसाहेबांना आईसारखेच सांभाळले. पँथर संघटनेच्या राजा ढाले पासून ते प्रा.अरुण कांबळे, रामदास आठवले, गंगाधर
गाढे पर्यन्त सर्वांनी माईसाहेबांना सार्वजनिक जीवनात आणले. त्यांचे मन:पूर्वक स्वागत के ले. समाजात त्यांचा सन्मान के ला.
नामातरांच्या घटनेत १९७९च्या लॉगमार्ग अथवा महामोर्चात, अथवा सत्याग्रहात सर्व वर्तमानपत्रांच्या प्रथत पानावरील
चौकटींनी माईंच्या तसबीरी व्यापल्या होत्या. १९८० च्या प्रथम भारतीय पातळीवरील दिल्लीच्या तालकटोरा मैदानावरील
अधिवेशनात माईंनी अध्यक्ष म्हणून साधारणतः दीड/दोन तास अस्खालित इंग्रजीत भाषण दिल्याचे मी प्रत्यक्ष समोर
बसून ऐकले आहे. ठाणे जिल्हयातल्या आदिवासी भूमिहीन शेतमजूर आंदोलनात माईसाहेब उपस्थित होत्या. पुढील
वाटचाल त्यांची समाजासमोर आलेली आहे. पँथर्सनी माईसाहेबांवरील कलंक पुसून टाकला, माई निर्दोष आहेत हे
समाजाला पटवून दिले. रमाईचे अन् माईसाहेबांचे खूप मोठे सांभाळल्याचे ऋण डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समाज व
चळवळीवर आहेत, हे मान्य के ले. हे ऐतिहासिक सत्य आता रूढ होत आहे. विजय सुरवाडे, देवचंद अंबादे यांच्या
पुढाकाराने माईंनी आपल्या आठवणी कथन के ल्या आणि विजय सुरवाडे, वैशाली भालेराव, यांच्या लेखनाने लोकांच्या
मनातील गैरसमज व विषारी भावना बदलायला भाग पाडले. याचा प्रभाव हिंदी पट्ट्यातील बौध्दाचार्य यांच्यासह अनेक
नेत्यांवर, बुद्धिवंतावर आणि सामान्य जनतेवरही पडला. पँथर संघटनेतील विचारवंत, साहित्यिक, प्रामाणिक चिकित्सक व
अभ्यासू कार्यकर्त्यांमुळेच हे शक्य झाले, हे वास्तव कोणालाही मान्य होऊ शके ल असे वाटते.
$$$$$
अन्याय-अत्याचार निपटू न काढण्यासाठी पँथर्सला निमंत्रणे येत आणि छावण्यांची उद्घाटने होत असत. ज्या
ठिकाणी छावणीचा जन्म होई, त्याला काही दिवस आधी एखादा 'राडा,' ‘दंगा' होत असे. खून खराबा पँथर्सना नको
होता. पण विषम व्यवस्थेचे पायिक सतत पँथरवाल्यांशी टक्कर घेऊ पाहात असत. पँथरमध्ये सुशिक्षित मुलांचा भरणा जास्त
होता. नेतृत्व करणाऱ्यांत शिकणारी मुले जास्त होती. लेखणी हे त्यांचे प्रभावी हत्यार होते. पण प्रतिकारासाठी कधी
त्यांना समोरासमोरच्या लढाईत शस्त्रसज्ज व्हावं लागत असे. खिशात दगड भरण्यांपासून ते वस्तीत मिरचीचे पाणी तयार
करून ठेवण्यापर्यन्तची प्रतिकार शस्त्रे पँथर्सना बाळगावी लागत. लाठी काठी, झेंड्याची काठी, शिगा, रामपुरी चाकू , वस्तरा,
साईकल चैन, तर कधी चकचकती तलवार पँथर्सला हाती धरावी लागे. स्वसंरक्षणाची जय्यत तयारी पँथर नेत्यांची आणि
प्रमुखांची असायची. अनेकदा गाव व वस्ती वाड्यावरील सभेच्या स्थळी खूप दबावाचे वातावरण असायचे. पँथर्सना ते
मोकळे करावे लागे. हमखास येणारा अनुभव म्हणजे पँथरच्या सभांतील कधी लाईट घालविली जायची तर कधी
विरोधकांकडू न दगडमारा होत असायचा पण तरीही डोक्याला कफन बांधलेल्या पँथर्सनी भितीचा कडाडू न विरोधचा के ला
प्रसंगी पोलिस यंत्रणेचे सहकार्य घेतले अन आपल्या वक्तव्यातून विरोधकांचे लचके तोडले, त्यांना गर्भगळीत के ले,
त्याचवेळेस पँथर तरुणांचे मनोधैर्य वाढवित त्यांना निर्भय के ले.
ठाणे जिल्हयातील प्रत्येक तालुका, प्रत्येक छावणी आणि प्रत्येक विभाग लढाऊपणे काम करीत असे याच काळात
पँथरचे बालेकिल्ले तयार झाले होते. कल्याणमधील अशोक नगर वालधुनी, पोर्टरचाळ, आनंदवाडी, सिद्धार्थनगर,
25
कोळसेवाडी, आधारवाडी, रमाबाई नगर बौद्धवाडा, मोहना गाळेगाव, शिवाय कसारा, खर्डी, मुरबाड, भिवंडी, निजामपूर,
आंबोडे, पालघर उल्हासनगर मधील दहाचाळ, उल्हासनगर नं. ४, शहाड फाटक, चोपडाकोर्ट आंबेडकरनगर,
कै लासकॉलनी, गोल मैदान, म्हारळगाव, फॉलवर लाईन, सम्राट अशोक नगर, आनंद नगर, सुभाष नगर, फर्स्टगेट,
शांतीनगर, विठ्ठलवाडी, १४ नंबर शाळा, अंबरनाथ मधील चिंचपाडा, आंबेडकर नगर, ऑर्डनब्स फॅ क्टरी.
ठाण्यातील आंबेडकर रोड, चिरागनगर शिवाईनगर, विटावा, तुर्भेस्टोर, विष्णुनगरदिघा, इ. स्थळी राहणारे पँथर्स
प्रत्येक लढयात सर्व ताकदीनिशी तयार असायचे. काही प्रकार घडला असल्यास पँथर्स तयारीनिशी मोठ्या संख्येने घराबाहेर
पडत असत. याच विभागांत सततच्या बैठका, मेळावे, परिषदा होत असत. अनेक पँथर्सची जेवण व राहण्याची
$$$$$
व्यवस्थाही होत असे. पँथर्सनी अनेक वस्त्यांना आपल्यात सामावून घेऊन लढाऊ बनविले होते त्यामुळे बालक, युवक,
स्त्री वर्गातही शिकण्याची जिद्द निर्माण होत गेली अन् प्रतिकाराची सज्जता जन्माला आली. विचार बंडखोर असला की
बंडखोर, निर्भय पीढ़ी जन्माला येते हे सत्य अनुभवता येत होते. पँथरने हिंदू धर्म त्यागण्याच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या
क्रांतिकारी सांस्कृ तिक घोषणेचा सुवर्ण महोत्सव येवल्यात साजरा के ला. कोणत्याही जाती धर्मातून आलेल्या पँथरला कधीही
बुद्धधम्म स्वीकारासाठी दबाव टाकला नाही; सक्ती के ली नाही. पण भारतभर अधून मधून धम्म स्वीकाराचे कार्यक्रम
पँथरतर्फे होत राहिले. महाराष्ट्र ात प्रातिनिधीक धम्म स्वीकार सोहळा चैत्यभूमीवर १९८१ या वर्षी धम्म स्वीकार सुवर्ण
महोत्सवी वर्षात (२५वर्षे) संपन्न के ला. तोवर नामांतराच्या आंदोलनाने खूपच उग्ररूप धारण के ले होते. मराठवाड्यात
झालेल्या हिंसक हल्ल्यात उपेक्षित, वंचितांचे सुधारित रूप किं वा कौटुंबिक विकास (राहणीमान) ठेचून काढला गेला होता.
उपेक्षित वर्गात या बाबत प्रचंड चीड होती. जातीपातींवर अन्याय करणारा हा ब्राम्हणी प्रवृत्तीचा हिंदू धर्म आम्हाला नको,
अशी एक भावना फारच तीव्रतेने उसळी मारीत होती. त्या काळात मुंबई ठाणे परिसरातील मेघवाल गुजराती समाज, तमिळ
भाषिक पँथर, मोची समाज, चर्मकार वर्ग मातंग, वाल्मिकी तरुण फारच अस्वस्थ होते. मराठा समाजातील गरीब पँथर व
विचारांनी आंबेडकरवादी असलेले आदिवासी, भटके विमुक्त, मुस्लिम, ख्रिस्ती लोक आपल्या जाती धर्माचा त्याग करायला
तयार झाले होते. १९८१ साली प्रेम गोहिल, मावजीभाई मारु, व्ही. जे. बालन, पी. सिद्धार्थन, रामकिशन करौतिया,
रामसिंग सोनवणे, लिलाबाई शिंदे, शंकर गुंजाळ, अशोक साळुंखे, इ. नी जाहीर धम्म स्वीकार के ला. व्ही. जे. बालन यांनी
'रावण' हे नाव धारण के ले. याच धम्मस्वीकाराचा परिणाम अनेक ओ.बी.सी (अन्यमागास वर्गातील) बांधवावरही झाला
होता.
पँथरच्या दबावाने मागासवर्गीयांच्या जागा भरल्या गेल्या. महाराष्ट्रात १९६० नंतर बौद्धांनाही अनुसुचित जातीच्या
सवलती मिळत गेल्या. यशवंतराव चव्हाण आणि दादासाहेब गायकवाड यांची युती आणि त्यानंतर शरद पवाराच्या प्रत्यक्ष
कृ तीने या सवलती चालू झाल्या. त्यानंतर अनेक वर्षे अनुशेष भरला गेला नव्हता. दलित पँथरच्या प्रभावाने बॅकलॉग
भरायला सुरुवात झाली. बाबासाहेब आंबेडकरांनी के लेल्या या विकास तरतुदीने आणि पँथरच्या प्रभावाने अनेकांना सरकारी
व खाजगी सेवेतही रोजगार मिळाला. अनेकांचा अधिकारी बनण्याचा मार्ग मोकळा झाला. रेल्वे खातेही गोरगरिबांची
रोजगारासाठी ‘आई’ मानली गेली. मोठया प्रमाणात रेल्वेत भरती के ली गेली. जवळपास सर्वच खात्यांत युवकयुवतींना संधी
मिळाली. पँथरमध्ये कार्यरत असलेले अनेक युवक पुढील काळात प्राध्यापक, मंत्रालयातील आणि विविध स्तरावरील
अधिकारी झाले. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, निबंधक, बँक मॅनेजर ते विद्यापीठ कु लगुरू, कु लसचिव
$$$$$
पदापर्यन्त पोहोचले. स्थानिक पातळीवर पँथर संघटनेने अनेक बेरोजगारांना कं पनीच्या सेवेत मोर्चे काढू न, चर्चा करून
रोजगार मिळवून दिले. अशा सर्वतऱ्हेचा आर्थिक विकासा सोबत पँथरने अनेकांना ट्रक्स, टेम्पो, रिक्षा या साठी रोजगार
उपलब्ध करून देण्यात मदत के ली. महात्माफु ले विकास महामंडळाची स्थापना झाल्यामुळे आर्थिक सहकार्याचे वर्ग मोकळे
झाले होते.
पँथर प्रबळ होत गेली. गावागावात संघटन उभे राहिले. विषम समाज व्यवस्थेला आणि भांडवली व्यवस्थेसोबत
सत्ताधारी वर्गालाही अधिक समजून घेऊन नवे आंदोलनातले चर्चेचे व उपाय योजनांचे पर्यायही मांडणे आवश्यक ठरत गेले.
‘आंबेडकर स्कू ल (१९८५) सारखी योजना ही आखली गेली. त्यातून अपेक्षित बौद्धीक कु वत असलेले कार्यकर्ते तयार
26
करता आले असते. ती योजना प्रा. अरुण कांबळे, रामदास आठवलेंसह अनेकांना दाखविण्यात आली होती. मात्र ती
प्रत्यक्षात आली नाही. पर्याय म्हणून पँथरने आधीपासूनच 'कार्यकर्ता शिबीरे’ आणि 'सांस्कृ तिक कार्यक्रम’ सुरु के ले होते.
सांस्कृ तिक कार्यक्रमात अनेक पथनाटये के ली गेली, त्यात कार्यकर्ते भूमिका करीत आणि रस्त्यावर गाणी गात असत. मोर्चे
आंदोलनात गाणी गायली जायची पण मोर्चाच्या प्रचाराच्यासाठी चौकाचौकात गाणी सादर होऊन नाटिकांद्वारे वास्तव मांडले
जाई. त्याचा खूप खोलवर परिणाम होत असे. ठाणे जिल्हा पातळीवर वैतरणा मोडक - सागर येथे पँथरचे शिबीर झाले.
एकनाथ जाधव खर्डीला राहात होते, त्यांनी मुंबई महापालिके चे अधिकारी आयु. डाळींबकर यांच्या सहकार्याने शिबीर
आयोजनात पुढाकार घेतला. यावेळी चर्चेसाठी हुसेन दलवाई, प्रा. गोपाळ दुखंडे सर उपस्थित होते. गांधी-आंबेडकर
मुद्यांवर खूप मतभेद झाले. पण छान चर्चा रंगली. महादेव सोनवणे नगरसेवक असतांना उल्हासनगर महानगर पालिका
(नगरपरिषद) सभागृहात कार्यकर्ता शिबीर झाले. सर्वांनी सहकार्य करून यशस्वी शिबीर पार पाडले. प्रा. अरुण कांबळे,
मनोहर अंकु श, रमेश इंगळे, इत्यादींनी मार्गदर्शन के ले. आर. के . तलरेजा महाविद्यालयात प्रा. विठ्ठल शिंदे सेवारत असतांना
त्या महाविद्यालयाचे प्राचार्य-डॉ. मॅथ्यू यांनी उद्घाटन पर मार्गदर्शन के ले होते. शिबिरे जाणीवपूर्वक आयोजिली जात होती.
वस्तुतः पँथरच्या रात्रभर चालणाऱ्या बैठका ह्या संस्कार शिबीरांपेक्षा कमी दर्जाच्या नव्हत्याच.
पँथरला सुरवातीला विरोध होई पण नंतरच्या काळात सर्व समाज पँथर्सचे स्वागतच करीत असे. अनेक माय
भगिनी पँथरची गाणी गावागावात जात्यावरही गात असत. वस्त्यात, अनेक गावात पँथर्स आल्यावर सामुदायिक भोजनाची
तयारी होत असे. फारच उशिर झालेला असेल तर प्रत्येक घरातून भाकरी, भाजी, भात व काही अन्य खाद्य पदार्थ गोळा
के ले जात. चटकन होणारा प्रकार म्हणजे भुर्जीपाव किं वा भाकरी पिठलं रांधलं जाई. आज प्रश्न पडतो की त्या काळी
पँथर्सना खरोखर लोकांना आपण त्रास देतो आहोत असे किं चितही वाटत नसे आणि समाजही या क्रांतिकारकांना, भीम
सैनिकांना सांभाळणे आपले कर्तव्य आहे, असे मानून त्यांची सर्व निस्वार्थपणे सोय करीत असे.
$$$$$
पँथरचा हा झंझावाती संचार खरोखर फारच ऐतिहासिक होता; स्वप्नवत होता याची कोणालाही कल्पना नव्हती.
जवळपास डोक्याला कफन बांधून बेभान सुटणे इतके च पँथरला ठाऊक होते, पण आज पँथरचा प्रत्येक क्षण नव्यापिढी
समोर मोलाचा ठरतो आहे.
'रिडल्स' प्रकरणात पँथरने पुढाकार घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'रिडल्स इन हिंदुजम’ हा ग्रंथ लिहिला
आहे. महाराष्ट्र शासनाने तो प्रकाशित करायचे ठरविले. शासनाच्या या कृ तीला हिंदूधर्मीय परंपरावादी संघटनांनी विरोध
दर्शविला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मराठा महासंघाचे शशिकांत पवार आदी संघटनांनी कडाडू न विरोध के ला.
त्यांनी व्यक्तीश: कोणीही हे साहित्य वाचले नसल्याचा निर्वाळा दिला. 'लोकसत्ताचे संपादक माधव गडकरी, यांनी हे प्रकरण
जनतेसमोर आणले. पण त्याला वैचारिक पातळीवर विरोध करतांना पँथरचे प्रमुख व आंबेडकरी समाजाचे प्रतिनिधी म्हणून
प्रा. अरुण कांबळे अग्रभागी होते. दुर्गा भागवत, तर्क तीर्थ लक्ष्मीशास्त्री जोशी यांचे मुद्दे प्रा अरुण कांबळे यांनी सप्रमाण
खोडले. बाबासाहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्यांना पँथर्सनी चांगलाच धडा शिकविला. शिवसेनेने काढलेल्या
मोर्चाच्या तिप्पट प्रचंड मोर्चा आंबेडकरी जनतेने काढला. विरोधकांचे आणि महाराष्ट्र शासनाचेही धाबे दणाणले प्रा. अरुण
कांबळे यांनी लिहिलेले 'रामायणातील संस्कृ ती संघर्ष' या पुस्तकाने वैचारिकच नव्हे तर शारीरिक हत्या करण्यापर्यन्तचे
वादळ उठले होते. ‘माझे विचार स्वातंत्र्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही' 'व “मी कोणालाही भीक घालीत नाही” अशा
मजकु राचे एक पत्रक प्रा. कांबळे यांनी प्रकाशित के ले होते. प्रा. अरुण कांबळे यांनी नीळकं ठ खाडीलकरांसह सर्वांना प्रत्युत्तर
दिले. समाजवादी आणि साम्यवादी मित्र पक्षांनी या प्रकरणी 'रिडल्स' समर्थनाची भूमिका घेतली होती (१९८८) आंबेडकर
विचार संवर्धन समितीच्या वतीने मुंबई येथे अभूतपूर्व ७ लाखांचा प्रचंड मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र शासनाला शेवटी
निर्णय घेऊन ‘रिडल्स’ छापावे लागले. पँथर प्रा. अरुण कांबळे यांना अनेक खुनाच्या धमक्या आल्या. हैद्राबाद येथे
‘रामायणातील संस्कृ ती संघर्षा’वर चार खटले दाखल के ले होते. त्याचा विचार करता प्रा. कांबळे यांचा हैद्राबादच्या हुसेन
सागरात मृतदेह सापडला या बाबत त्यांची हत्या झाली. असावी, असा संशय त्यांची भगिनी प्रा. मंगल (गौरी) तिरमारे यांनी
27
व्यक्त के ला होता पण शासकीय यंत्रणेने व समाजाने त्याकडे गांभिर्याने पाहिले नाही. प्रा. अरुण कांबळे यांचा हा टोकाचा
संघर्ष आणि त्याग पँथरच्या रिडल्स प्रश्नावर प्रकाश टाकू न चळवळीचा सन्मान करतो, असेच म्हणावे लागेल.
$$$$$
'रामायणातील संस्कृ ति संघर्ष’ या पुस्तकातील काही भाग' दि. २९ मे १९८२ ला नवशक्ती दैनिकात प्रसिद्ध
झाला. त्यामुळे आपल्या भावना दुखावल्या आहेत, अशा स्वरूपाची कायदेशिर तक्रार चोपडा, जि. जळगाव येथील काही
मंडळीकडू न नोंदविण्यात आली. (फौजदारी खटला क्र. ७००/८२) अशाच तऱ्हेचे खटले भरण्याचे प्रकार महाराष्ट्रात व
महाराष्ट्राबाहेर प्रतिगाम्यांकडू न सुरू करण्यात आले. कर्तारसिंग थत्ते यांनी १०० कोटींचा राम-सीता संरक्षणनिधी गोळा
करण्याची घोषणा के ली. काही कीर्तनकार मंडळींनीही या पुस्तकाविरुद्ध प्रचारमोहीम सुरू के ली, निधीही गोळा करण्यात
आला. हैद्राबाद हायकोर्टात या संबंधांत खटलाही भरण्यात आला. आंबेजोगाई येथील साहित्यसंमेलनात या पुस्तकाविरुद्ध
निषेधाचा ठराव के ला नाही तर बॉम्ब टाकण्याची घोषणाही संबंधितांनी के ली. प्रा.कांबळे विरुद्ध मोर्चे काढण्यात आले. सभा
घेण्यात आल्या. अटक करण्याची मागणी के ली गेली. प्रतिमेचे दहनही करण्यात आले. पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी
करण्यात आली.
या सगळ्या प्रकारामुळे प्रा.अरुण कांबळे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल के ली. (क्रिमिनल कु र्डू रीट
पिटीशन नं. ५५८/१९८३) या याचिके चा निर्णय न्यायमूर्ती जे. जे. तातेड व न्यायमूर्ती कु डू कर यांनी दिला. उच्च
न्यायालयात हे पुस्तक विजयी झाले. याचे सर्व श्रेय प्रा.कांबळेंचे महाविद्यालयीन जीवना पासूनचे मित्र आणि प्रसिद्ध
वकील अॅड. नितिन प्रधान यांना जाते. अॅड. नितिन प्रधान यांनी हा स्वतःवरील खटला आहे, असे समजून स्वतःच्या
सर्व शक्तीनिशी (शारीरिक व आर्थिक सुद्धा) 'रामायणातील संस्कृ ति संघर्षाला’ उच्च न्यायालयात न्याय मिळवून दिला. त्यांचे
आभार मानणे हे त्यांना आणि मला दोघांनाही आवडणार नाही असे प्रा. अरुण कांबळेंनी म्हटले आहे. हा मित्र-भाव
आयुष्यात सर्वात महत्त्वाचा आहे असे समजतो. त्याहीपेक्षा ' या पुस्तकातील विवेचन मला पूर्णपणे मान्य आहे', ही वैचारिक
भूमिका प्रधान यांनी घेतल्यामुळे ते आम्हा बुद्धी प्रामाण्यवाद्याच्या कु टुंबियातील झाले हे वेगळेच! अॅड् . प्रधान यांच्या
सुविद्य पत्नी शुक्ला प्रधान याही महाविद्यालयीन जीवनातील सहाध्यायी. त्याही या लढ्यात सहभागी झाल्या. त्यांचाही
उल्लेख या "ठिकाणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माझ्या प्रा. अरुण कांबळे प्रमाणेच या खटल्यात 'नवशक्ती'चे माजी
संपादक पु. रा. बेहेरे, प्रकाशक, लखोटिया व अक्षर प्रतिरूप'चे अरुण नाईक यांनाही गोवण्यात आले. या सर्वांना या
प्रकरणात त्रास झाला, परंतु त्यांनी तो आनंदाने सहन के ला, या गोष्टीचा विशेष उल्लेख करणे महत्त्वाचे आहे.
हैद्राबाद उच्च न्यायालयातही 'रामायणातील संस्कृ तिसंघर्ष' दोषमुक्त ठरले हे या ठिकाणी नमूद करावयास हवे. असे
प्रा. अरुण कांबळेंनी मांडले आहे.
$$$$$
पँथरमधील महिला :
पँथरमध्ये सदस्य बनणाऱ्या महिला धाडसीच होत्या. प्रत्येक वस्तीतील महिला या पँथरची ताकद होत्या. प्रत्येक
घरातील महिलेला बाहेर काढणे आणि तिच्याहाती पँथरचा निळा झेंडा देणे हे कार्य महिला पँथर करीत असत. हे काम
पायाभूत आणि प्रारंभिक असे व अतिशय महत्त्वाचे होते. पँथरचा एखादा मोर्चा कमीत कमी पाच हजारांचा असायचा.
स्थानिक पातळीवरील मोर्चात तर महिला गाणी गात, प्रोत्साहीत करीत. मोर्चा तहसील कचेरी, नगरपालिका किं वा स्थानिक
पोलिस कार्यालयावर नेतांना त्यांना कधीच भीती वाटत नसे. कधी कधी त्या लहान मुला मुलींनाही सोबत घेत असत.
28
"जयभीम के नारे पे खून बहे तो बहने दो,' ‘लाठी गोली खाएंगे ! फिर भी आगे जाएंगे’ ह्या घोषणांनी आसमंत, सारा परिसर
दणाणून जात असे. हमारी मांगे पूरी करो, वर्ना कु र्सी खाली करो” ही बऱ्याचदा त्यांची आवडती घोषणा असायची.
आपण संघर्ष करतोय, संघटन वाढवतोय आणि आपल्या मागण्या मंजूर करून घेतोय याची त्यांना पुरेपुर जाणीव
होती. पँथरवर सरकारी हल्ला होत असेल, पोलिस खाते काही डावपेच करून कार्यकर्त्याना छळू पाहत असेल, अशा
ठिकाणी नेहमी महिला पुढाकार घेऊन 'कडे' करीत पँथर्सना संरक्षण देत असत. पोलिसांना किं वा विरोधक जातीयवाद्यांना
जाब विचारण्या इतपत अनेक पँथर महिलांत ताकद होती. कोणीही विना कारण बळाचा वापर करीत असत तेव्हा पँथर
महिला नेहमी मध्यस्थी करीत. अनेक महिलांनी बंदूकधारी पोलिसांची कृ ती हाणून पाडतांना त्यांचा दंड पकडू न त्या
कृ तीपासून त्यांना त्यांनी परावृत्त के लेले आहे.
कधी कधी स्थानिक गुंड पँथर कार्यकर्त्यांना दुखापत करण्याच्या इराद्याने समोरा समोर येत तेव्हा कमरेचा पदर
खोचून काही पँथर महिला मदतीला धावत असत. पोलिस अधिकांऱ्यापर्यन्त आपला आवाज पोहचवताना त्यांनी कधी रात्र,
दगड गोटे, काट्यांची पर्वा के ली नाही.
खेड्यापाड्यातून येणाऱ्या पँथर्सना पँथर महिलांनी कधी उपाशी पोटी जावू दिले नाही. कितीही संख्या असो आणि
कितीही रात्र असो पँथर्स माऊल्यांनी मोठ्या श्रमाने स्वयंपाक बनवून अनेकांना क्षुधाशांती बहाल के ली आहे. उदरभरणाचा
प्रश्न हा माणुसकीशी जोडला गेलेला आहे. बाहेर गावाहून आलेल्या स्त्री-पुरुष पँथर्सची सोय चोखपणे आमच्या महिला पँथर
करीत असत, आणि माणुसकीचं दान उधळीत असत. पँथरमुळे गावपातळीपासून शहरापर्यन्त सारा भेदभाव मिटविण्याचा
प्रयत्न महिला पँथर करीत असत. अडचणीत असलेल्या स्त्रियांना मदत करण्याच्या कर्तव्याचा महिला पँथर्सनी अंगिकार
के ला होता. सासू सुनांचे भांडण असो, सुनेचा कौटुंबिक छळ असो, सार्वजनिक नळावरील
$$$$$
भांडणे असोत, महिला पँथर आवर्जून दुर्बलांची बाजू घेत असतं. दारू पिणारे पती आणि मारझोड करणारे पुरुष पँथरला
मनातून घाबरत असत. धाकाने का होईना महिला पँथर कौटुंबिक हिंसाचाराला दूर करून शांतता प्रस्थापित करीत असत.
एखाद्या गैरमार्गाच्या कोणत्याही स्त्री-पुरुषाला थेटपणे भिडण्याचे, बोलण्याचे आणि समजावण्याचे धाडस ही खूप मोठी व
दुर्मिळ बाब महिला पँथरकडे असायची.
पँथरमध्ये काम करणाऱ्या महिलांनी आपल्या पदाचा, ओळखीचा वापर करून काही व्यक्तींना नोकरीवर रुजू करून
घ्यायला मदत के ली. एका व्यक्तीला नोकरी देवून त्यांची कु टु ंबे उभी के ली. उसनेपासने, कर्ज फु रवठा करणाऱ्या पँथर
महिला आपल्या दातृत्वाने उठू न दिसायच्या.
अल्पशिक्षित असलेल्या महिलांना श्रवण करून व काही पुस्तके वाचून बाबा - साहेबांची चळवळ कळत असे.
त्यातून समाजकारण आणि राजकारण त्या समजून घेत असत. एकोप्याची ताकद या महिलांना समजल्यामुळे पँथर संघटन
असे पर्यन्त त्यांनी हेवेदावे के ले नाहीत, संघटनेच्या शिस्तीला तडा जाऊ दिला नाही. सर्व प्रकारच्या आंदोलनात या पँथर
सक्रिय असत.
महिला पँथरमध्ये बौद्धिक वाढ होत आलेली असे. देव, देवता, सण, उत्सव आणि पारंपरिक रुढीग्रस्त जीवनाला
अनेकांनी समज येताच त्यागले होते. जात न पाळणे, भविष्य ग्रह, तारे, फल ज्योतिष, बुवाबाजी या अनेक किचकटबाबी
आमच्या महिला पँथर्सनी सोडू न दिल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. थोडक्यात जात-पात सोडू न देऊन बुद्धाचा
समतेचा विचार स्वीकारणाऱ्या महिला पँथर्सचा प्रवास दिवसेंदिवस विकासाकडे होताना दिसला आहे. कोणीही काही न
सांगता किती तरी महिलांनी जन्माने आग्री, मराठा, देशमुख, चर्मकार, मातंग, मोची, वाल्मिकी, वडार, गोंधळी असताना
जाती आपल्या जीवनातून हद्दपार के ल्या होत्या. पँथरला विचारातून उभारलेल्या आंदोलनातून पँथर महिलांना जे शिकता
आले, ते ते त्यांनी स्वीकारले आणि आपले कौटुंबिक तथा सामाजिक जीवन समृद्ध के ले. पँथर चळवळीत काम करणाऱ्या
अनेक नेत्यांना, कार्यकर्त्यांना आपल्या विभागातील अनेक महिला आज नजरेसमोर दिसत असतील, ज्या महिला पँथर्सना
आपण विसरू शकत नाही त्यांचा उल्लेख करणे क्रम प्राप्त आहे. पद्मावती रणदिवे म्हणजे पँथर मिलिंद रणदिवे याच्या
मातोश्री. पती पंडित मगन रणदिवे रेल्वेत कार्यरत. त्यांचे राहाते घर रेल्वे क्वार्टर पँथरचे कार्यालय आणि वसतिगृह,
भोजनगृह झालेले. त्यांचे कु टुंब तसे मोठेच. रवि, राजू सह दोन बहिणी पण डॉ. विठ्ठल शिंदे यांची पुस्तकं बऱ्याचदा घरात
रचलेली असायची. पदमावतीबाई यांना डॉ. विठ्ठल उर्फ मास्तर 'मावशी’ म्हणत असत. विठ्ठलच्या किं वा वि.सो. च्या
29
पुस्तकांना मावशी नवागताला हात लावू द्यायची नाही. "माझ्या विठ्ठलची ती पुस्तकं आहेत, त्याला विचारूनच ती
वाचायला" न्या अशी म्हणायची. पँथर विठ्ठल आणि पँथर
$$$$$
मिलिंद सख्ख्या भावासारखं राहात असत. पद्मावती रणदिवे यांच्या नात्यातील के .बी. भालेराव यांना बाबासाहेब
आंबेडकरांनी परदेशात शिक्षणासाठी पाठविलेले. पद्मावती रणदिवे, यांचे भाऊ म्हणजे मूळ संगमनेरचे अभंग
कु टुंबीय. भाऊ रूपसेन अभंग राजकीय चळवळीत कार्यरत. त्यांचे रिपब्लिकन व. काँग्रेसवाल्यांशी चांगले मैत्रीचे संबंध,
पण त्यांनी पँथरला कधी विरोध के ला नाही. दादा-साहेब गायकवाड आणि दादासाहेब रूपवते यांच्यावर प्रेम करणारं हे
अभंग अशोकनगर वालधुनीत राहत होते. अशा कु टुंबातील पद्मावती रणदिवे सामाजिक बांधिलकीचं अन् मातेचं बाळकडू
पिऊनच पँथरच्या चळवळीत धडाडीने कार्य करीत असत. प्रसंगी भावांच्या राजकारणाविरोधात जाऊन पद्मावती रणदिवे
यांनी मुलगा मिलिंद रणदिवे यांची सामाजिक-राजकीय बाजू घेऊन पँथरच्या पाठीशी त्या उभ्या राहिल्या.
कलाबाई गांगुर्डे या पँथरसाठी रात्रंदिवस राबत असत. कलाबाई निवृत्ती गांगुर्डे यांच मूळगाव पिंपळगाव बसवंत
(जि. नाशिक) असलं तरी अशोकनगर वालधुनीतील पँथर चळवळीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. स्थानिक
आंदोलनात तर त्यांचा पुढाकार असे पण त्यासोबत राज्य पातळीवरील आंदोलनात आणि मुरबाडच्या आदिवासी भूमिहीन
आंदोलनातही त्यांचा सक्रीय सहभाग होता. पँथर मनोहर अंकु श यांच्या दौऱ्या दरम्यान अनेकजण झटत होते. त्यात
कलाबाई गांगुर्डे, राहीबाई आल्हाट, शांताबाई मोरे, शांताबाई पराड, वत्सला मोरे, हौसाबाई गांगुर्डे (साळवे), वेणुबाई दोंदे,
लक्ष्मीबाई शिंदे, झिंगाबाई रोकडे, जनाबाई सोनवणे यांनी श्रम तर के लेच पण पँथरवर नेहमी मायेची छाया धरली. पँथर
विठ्ठल शिंदे यांचे सर्व कु टुंबीय पँथरमध्ये राबत राहिले. पैकी लक्ष्मीबाई शिंदे यांनी रात्री अपरात्री थकल्या, भागल्या
पँथर्सना भाकरतुकडा खाऊ घातला आणि वेळेवर निळा झेंडा हातात धरून मोर्चाही काढला. पँथर चंद्रभागा (सीताबाई
हनुमंत जगताप ह्या पँथर विठ्ठल शिंदे यांच्या मोठ्या भगिनी होत्या.
अशोकनगर वालधुनीच्या गायकवाड चाळीत राहायला असलेल्या जाईबाई गरुड या पँथरचा बुलंद आवाजच
होत्या. आपल्या लहानपणी त्यांनी मनमाड येथील कार्यक्रमात बाबासाहेब आंबेडकरांना पाहिले होते. बाजरीची भाकरी अन्
बोंबलाची चटणी त्यांनी खास बाबासाहेबांसाठी तयार के ली होती. त्यांचे पती रेल्वेत होते. जाईबाईंची सर्व मुले शिकली.
त्यांना मुले अन - मुली होत्या. पैकी मोठा मुलगा रेल्वेत, अधिकारी होता. तर मधला मुलगा रंगनाथ नानाजी गरुड पँथरचा
सहानुभुतीदार राहात, शिक्षण घेत, महसूल खात्यात कामाला लागला. पुढे उपजिल्हाधिकारी पदापर्यन्त पोहोचला.
जाईबाईचा दरारा होता. महिलांची भांडणे ती झटक्यात सोडवीत असे. जाईचा आवाज कडक होता, तितके च अत:करण
अत्यंत मृदू व प्रेमळ होते. कलाबाई गांगुर्डेना पँथर मुळे नोकरीत जाता आले. वत्सलाबाई मोरे, लिलाबाई शिंदे नाही
पँथरने नोकऱ्या मिळवून दिल्या. कलाबाईचा मुलगा प्राध्यापक झाला. प्रा. प्रदीप गांगुर्डे याने समाजशास्त्राची पीएच. डी
पदवी प्राप्त के ली. प्रदीप
$$$$$
गांगुर्डे समोर प्रा. विठ्ठल शिंदे आणि प्रा. एकनाथ जाधव यांचा समर्थ वारसा होता. कलाबाईने आपल्या मुलांसोबत मुलींना
योग्य मार्ग दाखवला. त्यांच्या मुली उत्तमस्थितीत जीवन जगत आहेत. कलाबाई गांगुर्डे यांचे भाऊ अशोकनगर, वालधुनीत
राहात आले आहेत पण प्रत्यक्षात त्यांचे भाऊ दादागिरी करणाऱ्या टोळीच्या जवळचे होते. जरी त्यांनी पँथरला विरोध
के ला नाही तरी पँथरपाठी ते उभे राहिले ही नाहीत. त्यांच्या ऐवजी कलाबाई कं बर कसून खंबीर उभ्या राहिल्या. शांताबाई
वाघ यांना कलेची आवड होती. त्या उत्तम गायन करायच्या. वामनदादा कर्डकांची गाणी त्यांना तोडंपाठ होती. वाघबाई
म्हणजे सौजन्याची साधी भोळी मूर्ती. घरची परिस्थिती बेताचीच. पण पर्वा न करता त्या पँथरसाठी वेळ देत होत्या.
पँथरची सभा असली की वक्त्यांच्या भाषणाआधी वाघ बाईंची गाणी कानावर पडत. पँथरची गाणी त्यांनी मिळविली
होती. ती गाणी त्या गाऊन श्रोत्यांना प्रोत्साहित करीत असत. लिलाबाई शिंदे शांतीनगर उल्हासनगर मध्ये राहात असत.
त्यांच्या घरासमोर शक्ती प्लॅस्टीक कं पनी होती. या कं पनीने समोरची वसाहतच पाडू न नष्ट करण्याचा सरकारी हुकु म काढला
होता. त्यावेळेस पँथरचे अध्यक्ष असलेले प्रा. अरुण कांबळे प्रत्यक्ष उपस्थित राहिले. रामदास आठवले, मनोहर अंकु श,
30
प्रा. एकनाथ जाधव, प्रा. विठ्ठल शिंदे, बाळभोईर, मिलिंद रणदिवे, महादेव सोनवणे, ईश्वर गायकवाड असे सारे
पँथर्स खंबीर उभे राहिले व हुकु म रद्द के ला.
लिलाबाई शिंदे देशमुख या मराठा समाजाच्या होत्या. त्यांना आयुष्यात खूप सुख दुःखांचा सामना करावा
लागला. पती निधनानंतर दोन मुले अन एक मुलगी असा आटोपशीर संसार असला तरी खूप ओढाताण होत होती.
उपासमार सहन करीत मुलांना शिक्षण दिले. स्वतः पँथरच्या कार्यकर्त्यांकडू न शिक्षण व मार्गदर्शन घेतले. आपल्या
जीवनात आमुलाग्र बदल करतांना आपल्याला भावासमान पँथर विठ्ठल शिंदे यांचे सहकार्य घेतले. विठ्ठल शिंदे यांनी
लिलाबाईंना सभेतून भाषण देण्याइतपत तयार के ले. पुढे पँथरने आयोजित के लेल्या १९८१च्या ‘बुद्ध धम्म स्वीकार’
अभियानात चैत्यभूमीवर त्यांनी धम्मदीक्षा घेतली. "माझ्या-बाबासाहेबांच्या अन् बुद्धाच्या विचाराने मला सुखाचे अन
आनंदाचे दिवस मिळाले, ते मी मरेपर्यन्त विसरणार नाही.” अशा त्या म्हणत असत. आणि अखेरपर्यन्त हे वचन त्यांनी
पाळले. अशा ह्या भीमाच्या वाघीणी पँथर महिला निष्ठेने काम करीत असत. त्यांच्या सोबत याही महिलांचा समावेश करायला
हवा. त्यात हिराबाई (प्रल्हाद) रोकडे, चंपाबाई मगर, पंचशीला घोडके , शोभाताई के दारे, हौसाबाई गायकवाड, गंगूबाई
गायकवाड, भोईर, सोनके अर्जुन शिंदे, जयश्री श्रीधर जाधव, गोविंद सकटे, वंदना (खरे), वसंत शिरसाठ, कलावती
देवराम लिहितकर, पुष्पा बाबा मोरे, रामसिंग सोनवणे, पार्वती ढगे, जाधवबाई, मालतीबाई पंडित, लीलाबाई उबाळे, शोभा
नागसेन सोनवणे, बुकाणेबाई, रत्नप्रभा गरकल, भालेरावबाई (चंद्रशेखरची आई) अरुण काकळीजची आई, अरुण कांबळे,
मारुती जाधव, गुलाब जगताप (गुरुजी), नीलम सुरेश सावंत, मनिषा गणपत
$$$$$
करलाद, रुक्मिणीबाई साठे, जगधने, शांताबाई वाघ, कलाबाई गांगुर्डे, लक्ष्मीबाई शिंदे, झिंगाबाई रोकडे, जनाबाई सोनावणे,
चंद्राभागा हनुमंत जगताप, जाईबाई गरुड, लिलाबाई शिंदे, गऊबाई गायकवाड यांचा आवर्जून उल्लेख करता येतो.
‘दलित पँथर’ चळवळीला बरखास्त होऊन काही वर्षे होताहेत. या वर्षांत अनुभवाला येते की नामांतराच्या
प्रश्नाच्या निमित्ताने पँथरला पुसून टाकण्याचे जोरदार प्रयत्न त्यावेळी सोबत असलेले समाजवादी, साम्यवादी करताना
दिसताहेत. शांताराम पंदेरे नावाच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने दि. ३ जाने. २०२१ रविवारच्या म.टा. संवाद पुरणीत
पानभर लिहिलेल्या लेखात 'क्रांतिचे अर्धेचक्र' या शीर्षकाखाली' आपले विचार मांडले आहेत. नामांतराची मागणी
आंबेडकरवादी विद्यार्थी आणि समुह यांनी के ली होती. त्यांनी नामांतर प्रश्नाच्या मागणीपासून ती मान्य होईपर्यन्तची
मांडलेली वाटचाल अर्ध सत्यावर आधारित आहे, असे लक्षात आल्यावाचून रहात नाही. समाजवाद्यांच्या जनसंघटना
विद्यार्थी व दलित विभागाच्या संघटनांची आणि व्यक्तींची बरोबर नोंद घेतली आहे. उदा. युक्रांद दयुआघाडी, शिवाय
समाजवाद्यांतील पुरोगामी विचारवंताचाही फार नेमका उल्लेख करून नामांतर घडवून आणण्याचे श्रेय घेतले आहे. काही
किती ठळक गोष्टी बघा... “पँथर, भारतीय दलित पँथर' या संघटनेचा कु ठेच उल्लेख वा संदर्भच नाही”. दलित पँथरला
वगळून नामांतराचा प्रश्न सुटला का? नामांतराच्या अखेरच्या टप्प्यात झालेल्या आंदोलनात पँथर बरखास्त झालेली होती,
तरी त्या प्रश्नासंबंधी आंदोलनात विभागाविभागातील माजी पँथर मोठया प्रमाणावर कार्यरत होते, हे कसे विसरता येईल?
नामांतराचे फक्त ठराव विद्यापीठाच्या समितीने, कृ ती समितीने के ले अन् लगेच नामांतर झाले, असे घडलेले नाही. पँथरचे
लाखोंचे ‘मोर्चे’, ‘परिषदा’, ‘रास्ता रोको’ ते ‘नागरिकत्व त्याग’ करण्याचे आंदोलन कसे डोळ्याआड करता येईल?
मराठवाड्यातील हिंसाचारात कोणत्या लोकांनी बौद्ध, मातंगांना वाचविले? नैतिक पाठबळ कोणी दिले? ते लढणारे
लोक पँथरचेच होते. दु:खीत जनतेला हृदयाचा आसरा पँथर्सनी दिला. आणि आंबेडकरी जनतेला ठोकू न काढण्याची संधी
पँथरने दिली, अशी जहरी टीका करून पँथरच्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्याची कटही रचला गेला. त्यात बाळासाहेब
आंबेडकरांपासून बीएसपीवाले सारे साम्यवादी, समाजवादी बहुजन वंचितवादी सामील होते. कोणत्याही पुरोगामी
उच्चवर्गीयांनी आमच्या बांधवांचे संतप्त अश्रू पुसले नाहीत. प्रत्येक प्रश्नाचे श्रेय लाटण्याच्या स्वार्थातून चुकीचा इतिहास नोंद
झाला आहे. त्याची साधार व सारासार कागदपत्रांच्या आणि मुलाखतींच्या आधारे तपासणी करण्याची गरज आहे, सत्य व
नवा इतिहास नोंदण्याची आवश्यकता आहे.
$$$$$
31
सामाजिक किं वा अर्धराजकीय पक्ष संघटनांत संघर्ष का व्हावा? :
फक्त ताकद वाढवण्यासाठी संघर्ष होतो. माझ्यासोबत किं वा माझ्यापक्षासोबत किती लोक आहेत, हे
दाखविण्यासाठी संघर्ष होत आला आहे. वस्तुत: आंबेडकरवादी युवकांचा सामाजिक किं वा अर्धराजकीय कार्यक्षेत्रात संघर्ष
होण्याचा प्रश्नच येत नाही. श्रेयाची मोठेपणाची, स्वतंत्र व्यक्तिमत्वाची छाप पाडण्याची स्पर्धा करण्याची काही एक गरज
नाही. आंबेडकरवादी युवकाला, युवा वर्गाला सम्यकक्रांती करायची असते. मानव मुक्ती करून समग्र विकास साधायचा
असतो. त्यासाठी या प्रवाहात त्यांचे सर्वांचे तत्त्वज्ञान जर आंबेडकरवादी अन वैचारिक आदर्शजर बाबासाहेब आंबेडकर
असतील तर हे सर्व लोक सहप्रवासी ठरतात. समांतर अंतर राखून आपण निवडलेल्या कामात गतीमानता आणू शकतात.
समाजात विविध प्रश्न आहेत. उदा. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा प्रश्न, अपंग, मूकबधीर, दिव्यांगाचे प्रश्न, विधवांचे प्रश्न,
आर्थिक दुर्बल गटांचे प्रश्न, सामाजिक अन्यायाचे प्रश्न, कौटुंबिक हिंसाचार, विद्यार्थी समस्या, नैसर्गिक आपत्ती, नशापान,
अंधश्रध्दा, यांच्या विरुद्ध जागृती करुन काही सुधारणा घडवून आणण्याची इ. ही कामे हा युवा वर्ग करु शकतो. एकच एक
प्रश्न घेऊन संस्था, संघटना उभ्या राहू शकतात आणि एकमेकांशी सुसंवादी राहून एकमेकांना सहकार्य करू शकतात. परंतु
आंबेडकरवादी वर्ग अद्यापही बुद्ध, फु ले, बाबासाहेबांना समजून घेऊनही समंजस झालेला नाही, असेच म्हणावे लागते. यापुढे
तरी हा संघर्ष, ही स्पर्धा टाळता येईल का ?
कधी कधी एकाच व्यक्तीत विविध प्रकारची कार्ये करण्याची क्षमता असते. अशा व्यक्तीस आपण अष्टपैलू, अनेक
पैलूधारी, व्यक्तिमत्व म्हणून गौरव करायला हवा. हे तेवढेच खरे आहे की सर्वव्यापी क्षमताधारी व्यक्तिलाही त्याच्या खास,
आवडत्या प्रकारात जास्त गती असते. म्हणून बाकीचं सारं बंद कर, कु ठंही लुडबुड करू नकोस, असे सल्ले जर आपण
त्याला देत असू तर आपण विशिष्ट व्यक्तिमत्वाच्या गुणवत्तेचा दुस्वास करतो आहेत, गुणवत्तेवर जळतो आहोत, असा अर्थ
निघतो. समाज, व्यक्ती त्याच्या मनातील आंदोलन निःस्वार्थीपणे समजून घेण्यासाठी महत्वाकांक्षी, अल्पसंतुष्ट असण्यापेक्षा
सामाजिक-राजकीय कार्यात उडी घेणाऱ्या व्यक्तिमत्त्वात चिकित्सक व्यापकवृत्तीची जोपासना होणे गरजेचे आहे. जिथे
निवडणूक प्रक्रिया नाही, मतांचा वापर होत नाही आणि जिथून आपल्या व्यक्तीमत्वाला किं वा समाजकार्याला धोका पोहोचत
नाही, तिथे सामाजिकदृष्ट्या एका विचारांचे लोक जरूर एकत्र येऊ शकतात. नव्या पिढीने त्या दिशेने प्रयत्न करावा.
जिवंत विचारांची विद्रोही पँथर जन्माला येऊ शकते.
पँथरने भूतकाळातील चुका टाकल्या पाहिजेत. नेतृत्वाने संघटन बांधणी करायला हवी. नवी घटना, नियमावली
यातून लोकशाही विचार प्रक्रिया बळकट करता येईल.
$$$$$
‘कु णाला कु णाचा मेळ नाही’ अशा वस्तुस्थितीत प्रत्येक घटकाला धोका संभवतो. विक्रीची शक्यता जाणवते. लाचारी
वाढण्याची आणि बांधिलकी झिडकारण्याची स्पर्धा सुरू होण्याची शक्यता वाटते. अनेक षडयंत्रे, विविध संभ्रमावस्था आणि
त्यातून होणारी ससेहोलपट रोखायला वैचारिक बळाची, पक् क्या वैचारिकतेची बैठक तयार होणे, क्रमप्राप्त ठरते. आंबेडकरी
विचाराला समांतर जाण्याचं धाडस आपल्या कमकु वत अन कच्च्या व्यक्तिमत्वाचे द्योतक आहे, हे मनात ठासून भरावे....
ठाणे जिल्हा मुंबईच्या खालोखाल भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा आहे. आज महानगरे, महापालिका वाढतच आहेत.
पँथरच्या वेळेस विकें द्रीकरण झालेले नव्हते. 'आता न्याय मिळवून घेतांना स्थानिक पातळीवरील संस्था, व्यवस्था जास्त
बळकट आणि प्रभावी ठरत आहेत.’ पँथरच्या शहिदांची संख्या ठाणे जिल्हयात जास्त आहे. आनंद एस. मुथ्यू, बाबा मोरे,
रामकिशन करौतिया, देवराम लिहितकर हे १९८९ पूर्वीचे पँथर कार्यकर्ते शहीद झाले. त्या नंतरच्या विषम सामाजिक
संघर्षात अशोक गायकवाड, नरेश गायकवाड, दीपक जाधव हे पँथरीबाण्याचे युवक शहीद झाले. यांना पुरेपुर न्याय मिळाला
नाही. संपूर्ण समाजाच्या वाटयाला अगतिकता आणि तडफड आली. परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या संस्था, सत्तांनी या सर्व
बाबींचा गांभिर्याने विचार करून योग्य तो मार्ग काढायला हवा. यासाठी माझे समता सैनिकांबाबतचे स्वातंत्र्य योद्ध्यांच्या
सन्मानाबाबतचे विवेचन लक्षात घेता येईल.
पँथरचे एक वैशिष्ट्य राहिले की सतत जनआंदोलने करीत राहिल्यामुळे पँथर मधून काही लोक निघून गेले किं वा
पँथर बरखास्त के ली, तरी पँथर संघटन थांबले नाही, नष्ट झाले नाही. काहींनी गटबाजी के ली पण तरीही त्यांचा टिकाव
32
लागला नाही. नामदेव ढसाळांसारख्या कवीला वार्षिक अधिवेशने भरविण्यापलिकडे आणि मोजक्या नातेवाईक
अनुयायांपलीकडे संघटन नेता आले नाही. पँथरच्या नावाने नेमलेले निर्णय, लाचार तडजोडी या आंबेडकरी विचाराच्या
अनुयायांना कधीच पटल्या नाहीत. त्यामुळे त्यांना पाठबळ मिळाले नाही. नंतरच्या काळात नामदेव ढसाळ, भाई संगारे,
अविनाश महातेकर, ज.वि. पवार, राजा ढाले, अर्जुन डांगळे, श्याम गायकवाड, सुरेश सावंत, डॉ हरिष अहिरे, प्रा. जोगेंद्र
कवाडे, यांना पँथरच्या तोडीचे संघटन उभे करता आले नाही. सुरेश सावंत यांनी युवक रिपब्लिकनची स्थापना के ली.
१९७७ ते १९८५ पर्यन्त त्यांनी खूप प्रयत्न के ले पण त्यांच्या बाजूने लोक उभे राहिले नाहीत ‘युवकरिप. ते रा.स.दल’
अशा संघटनांच्या माध्यमातून त्यांनी काही कार्यक्रम दिले. मात्र त्यांचा पँथरच्या चळवळीशी असलेला संबंध तुटला नव्हता.
त्यांनी १९८५ साली पँथरमध्ये पुन्हा प्रवेश के ला, त्यानंतर पँथर बरखास्ती पर्यन्त अतिशय जोमाने कार्य के ले आणि
त्यानंतरही त्याचे कार्य चालू राहिले. एक निरीक्षण असे नोंदवितो की पँथर नागपूर येथील १९७४ च्या अधिवेशनात सुरेश
सावंत सहभागी होते, वरळीच्या दंगलीस प्रमुखांपैकी होते, अत्यंत निष्ठेने आदिवासी परिसरात अन ठाणे
$$$$$
जिल्हा पातळीवरही कार्यरत होते तरी पँथरच्या महाराष्ट्र पातळीवरील नेतृत्वाने त्यांची दखल घेतली नाही. पँथरच्या
पहिल्या कार्यकारिणीत सुरेश सावंत, श्याम गायकवाड यांचा समावेश असायला हवा होता, पण तसे घडले नाही. ठाणे
जिल्हा पातळीवरील अनेकांना प्रतिनिधीत्व मिळायला हवे होते पण इतरही सक्षम लोकांचा समावेश राज्य कार्यकारिणीत
झाला नाही. पुढील काळातही ठाणे जिल्हयाला रिपब्लिकन पक्षानेही सतत डावलले आहे. मी जेव्हा पँथरच्या समकालीन
संघटनांचा विचार करतो तेव्हा त्या संघटना ठाणे जिल्हयात जास्त आहेत हे दिसते. आपल्याला डावलले गेले या खंतेपोटी,
तर या संघटना जन्माला आल्या नसाव्यात. मला वाटतं तेच खरं असावं.
श्याम गायकवाड यांनी ‘बुध्दीष्ट फ्रं ट' स्थापन के ली, त्यांना अत्यंत कर्मठतेने लढणारा युवक उभा करायचा होता.
त्यांची राजाभाऊ ढाले यांच्याशी अनेकदा विसंवादी चर्चा व्हायची. श्याम गायकवाड यांचे वाचन प्रचंड होते. त्यामुळे
राजाभाऊं शी त्यांचे खटके उडत. श्यामदादा गायकवाड यांना नामदेव ढसाळ, भाई संगारे, अविनाश महातेकर इत्यादींची
डावी भूमिका मान्य होती. पुढे या नेत्यांच्या वर्तणुकीला आणि त्यांच्या वैचारिक अधोपणाला कं टाळून त्यांनी ‘बुद्धिष्ट फ्रं ट,’
‘समता सेना' असा प्रवास करणे पसंत के ले. त्यांनी जोगेंद्र कवाडे यांनाही साथ दिली. आपल्या पातळीवर त्यांनी प्रचंड
ताकदीचे, व्यवस्थेशी टक्कर देणारे संघटन उभे के ले. त्यांचेही पँथर संघटनेशी जिव्हाळ्याचे संबंध होते. पँथर सदैव त्यांच्या
सुख-दुःखात सहकार्य करीत आली आहे.
प्रा. जोगेंद्र कवाडे यांची दलित मुक्ती सेना स्थापन झाली. महाराष्ट्राच्या अनेक भागातून त्यांना प्रचंड प्रतिसाद
मिळाला. प्रा. कवाडेसर मुक्ती सेना स्थापनेकरिता पँथरने उभारलेल्या विद्यापीठ नामांतर लढ्यात स्वत:हून सामील झाले.
विदर्भातील माध्यमांनी त्यांना लाँगमार्चचे प्रणेते के ले. ‘साप्ताहिक जयभीम’चाही त्यात मोठा वाटा आहे. त्यांना मिळालेल्या
प्रसिध्दीचा त्यांनी फायदा घेऊन संघटन उभे के ले. पँथरवर नाराज असलेले बरेच त्रयस्थ युवक कवाडेसरांसोबत गेले.
कवाडेसरांचे वक्तव्य अत्यंत प्रभावी होते, पण भावनाशील आणि काहीसे शिवराळ होते. विचारांचा भाग कमी असल्यामुळे
जीव द्यायला तयार असलेले लोक उभे राहिले, पण वैचारिकता उंचावणारे संघटन उभे राहिले नाही. अनेकदा श्रोते सरांचे
भाषण ऐकू न भारावून जायचे आणि थीजून जायचे. पँथरमध्ये निष्ठेने काम करणारा कोणताही कार्यकर्ता दलित मुक्ती सेनेत
गेला नाही. तात्पर्य बरखास्त करूनही पँथर संघटन बरखास्त झाले नाही आणि ‘मासमुव्हमेंट’, ‘बुद्धिष्ट फ्रं ट’, ‘युवक
रिपब्लिकन’, ‘समता सेना’, ‘दलित मुक्ती सेना’ या समकालीन पर्यायी संघटना उभ्या राहूनही पॅथर बरखास्त आली नाही.
शेवटी पुढाऱ्यांनी ऐक्यासाठी पँथरला डावपेच आखून कायमचे संपवून टाकले. याचे एकच महत्वाचे कारण होते, की १९८९
च्या ऐक्यापर्यन्त आणि नंतरही जनता पँथरवर प्रेम करीत होती. गरज म्हणूनही आंबेडकरी जनतेला पँथर हवी
$$$$$
होती. पँथर बरखास्त होऊनही अनेकांनी आपल्या मनातील पँथरबाणा पुढील काळात कधीही सोडला नाही. नि:स्वार्थ
निर्भिड, लढाऊ, विशाल मनाचा, मैत्रेय पँथर मना मनात उगवत राहीला आहे.
33
$$$$$
34
१६) दलित पँथरची १३वर्षे, भास्कर जाधव / दै. श्रमिक विचार /
१७) साप्तासनद : प्रा.एकनाथ जाधव / विठ्ठल शिंदे : प्रेरणा : १९८५ /
१८) पँथर टीकाकारांची चिरफाड : प्रा विठ्ठल शिंदे
१९) अखेरच्या टप्यातील नामांतर आंदोलन: डॉ. विठ्ठल शिंदे
२०) प्रा. एकनाथ जाधव गौरवग्रंथ / मो.ज. कटारे / गोदा प्रकाशन
२१) दलित पँथर: अधोरेखित सत्य/ अर्जुन डांगळे/ लोकवाड् :मय ग्रह / मुंबई
$$$$$
प्रकरण २
दलित पँथर
काही लेख व निबंध
१) दलित पँ थर : मुक्तीचे महाद्वार
२) पँथरच्या लढ्यातील आदिवासी भूमिहीन शेतमजूर आंदोलन
३) मुरबाड तालुक्यातील आदिवासी, भूमिहीन शेतमजुरांचा पँ थरने काढलेला मेळावा
४) भारतीय दलित पँ थरचा इगतपुरी तालुका मेळावा
५) इगतपुरी तालुका जाहीर सभा
६) चिंतन – मंथन
७) ‘सनद’ला प्रकाशन सोहळा
८) ठाणे जिल्ह्याची कार्यकत्यांचे रं गले ले शिबीर
९) ठाणे जिल्हा पँ थरचा कार्यअहवाल
१०) पँथरच्या संघर्ष काळातील माझा अनुभव
35
$$$$$
१. धगधगती पँथर :
36
लोकशाही पध्दतीत बसत नाही. बहुमतांने लोकशाही पध्दतीने एखादा विचार मांडून
ठराव मांडून, ठराव सं मत करून योग्य दिशे ने अं मलबजावणीसाठी निर्णय घे णे महत्वाचे
असते . हे सामु हिक काम असते . दलित ने ते वा पँ थर्स म्हणजे बाबासाहे ब नाहीत, त्यामु ळे
त्यांना सामु दायिक ने तृत्व व पध्दतीच अवलं बावी लागते . कोणीही एक व्यक्ती परिपूर्ण
नसते . दोषी, निर्दोषींचा तांडा चळवळीत असतोच. पण शक्य तितका मोड घे ऊन
चळवळीशी एकनिष्ठ राहन ू निर्णय घे णे, हे एकट्या व्यक्तीचे काम नाही. जनसामान्यांची
पँ थर चळवळ आज हाच मार्ग अवलं बीत असताना ती व्यक्तिवादी आणि सामु दायिक
ने तृत्व सं कल्पने विरुध्द कशी असू शकते ?
सौदे बाजी कुठे आहे ? याबाबत केवळ सं भर् म निर्माण व्हावा, एवढं भोंगळ लिहीलं
आहे . सं दर्भासह नामोल्ले खासह थोडसं लिहीलं असतं तर थोडं स्पष्ट झालं असतं . नाव
घे ऊन लिहिण्याची हिम्मत कदाचित त्यां च्यात नसावी. मात्र त्यातून त्यां च्या मु द्दयाला
आव्हान करावं एवढं बळच त्या मु द्दयात नाही. तूर्त एवढे च म्हणता ये ईल की जे
सत्ते च्याद्वारे सौदे बाजी करीत हाडूक चघळतात त्यांना कायमची लूत लागली आहे .
समाजाने त्यांना कधीच दरू भिरकावून दिले आहे . आं बेडकरी समाज त्यांना योग्य तो
धडा शिकवत असतोच. हा पँ थर सौदे बाज आहे काय? पँ थरला सांसदीय लोकशाही
मान्य आहे . आजचं राजकीय वातावरण वे गळं बनले लं आहे . 'कामगारशक्ती, शे तकरी
सं घटना, शिवसे ना यु क् रांद वा राजकारणापासून अलिप्त आहोत, असे म्हणणाऱ्या
सं घटना पक्ष आज राजकीय आराखड्यात आहे त. सांसदीय लोकशाहीला विरोध करणारे
डावे उजवे काय असतील ते निवडणु कीय पध्दतीद्वारे खु र्च्या बळकावत आहे त. यावे ळी
पँ थर सामाजिक / सां स्कृतिक / की राजकीय चळवळ असा सं भर् म निर्माण होऊ शकतो.
एकू ण राजकीय वातावरणाचा परिणाम म्हणून पँ थरने समझोत्याचा विचार केला
असल्यास गै र ते काय ? बाबासाहे ब आं बेडकरांचा वारसा मानणारी पँ थर काय विचार करु
शकते ? दलित चळवळीला, दलित समाजाला पोषक व बाबासाहे ब आं बेडकरां च्या
स्वाभिमानी वै चारिक बै ठकीला गालबोट न लावता समग्र परिवर्तनासाठी वे गवे गळ्या
ठिकाणी निरनिराळ्या सं दर्भात निरनिराळे मार्ग चोखाळावे लागतात. त्याचप्रकारे
भारतीय दलित पँ थर कधी 'नकारात्मक, भूमिकेतून तर कधी राजकीय डावपे च म्हणून
कधी वजनगट म्हणून अजमावण्यासाठी, परीक्षा म्हणून राजकीय निवडणूकीय निर्णय
घे तला असल्यास ती बाब सर्वस्वी सं घटनात्मक व्युहाची आहे . कोण्या एका व्यक्तीने
ठरले ल्या साचे बंद मार्गाचा अवलं ब पँ थरने करावा, असा आग्रह असण्याचे कारण काय
? सं घटनात्मक सौदे बाजीचे एखादे तरी उदाहरण दे ता ये ईल काय ?
$$$$$
४. साहसीवीर कोण? :
37
बनविणे कोणाला मान्य आहे ? तो विचार तर प्रवाहीत होणारा, या मातीतला स्वतं तर्
मूळ विचार आहे . 'अत्त दीप भव' चा महान मूलमं तर् दे णाऱ्या बु ध्दीच्या कसोटीला महान
मूल्य प्रदान करणाऱ्या बु ध्दानु यायी बाबासाहे बांचा शब्द अं तिम असल्याचा त्यात दावा
कोण करतोय ? आं बेडकरी शब्दप्रमाण्य, ग्रंथप्रामाण्याला विरोध करणारा विचार
आहे . पण विरोधासाठी विरोध करुन चळवळीची राजकीय तु ं बडी आणि विद्वत्ते ची
प्रतिष्ठित झुल सं भाळणाऱ्या वाचाळवीरांची टिमकी पिटणाऱ्यांना काय म्हणावे ? वांझ
विचारां च्या उचलटाकीपे क्षा दलित ने तृत्व कृतीशील आहे एवढे खास.
दलित सामाजावर एवढा वै चारिक अत्याचार करून हे महोदय थांबले नाहीत तर
बाबासाहे बांचा लढा कसा पु रोगामी व डावा म्हणून बरोबर होता, असा शे रा मारला आहे .
सु र्याला सूर्य म्हणून सं बोधण्यासारखं आहे . हे यु गं धर बाबासाहे ब मानव मु क्तीचे
शिल्पकार होते , हे सिध्द करण्यासाठी एखाद्या दुबळ्या माणसाने भाष्य करण्याची काय
गरज आहे ? भावनिकता कोठे नाही ?
काही लोकांना आपलं स्वतःचं तत्वज्ञान गोंजारण्याचा फार सोस असतो. त्यां च्या
ठराविक फुटपट् ट्या असतात. त्यांनी उभारले ला लढा फुकट, तकलाद ू असला तरी तो
रचनात्मक खरा वाटत असतो दुसऱ्यां च्या लढ्यांना ठराविक शिक्का मारून वे गळा
ठरवायला मात्र ते सदा सज्ज असतात. भावनिक लढा प्रामु ख्याने अन्याय
अत्याचाराशी जोडले ला असतो. ये थील अत्याचार जात, धर्म, वर्ग यां च्या मिश्रणातून
बनले ल्या व्यवस्थे चा परिपाक असतात. अत्याचार विरोधी लढा न उभारला तर त्यातून
'आर्थिक उत्थापन साध्य होत नसे ल तरी मानसिक बळकटी आल्यावाचून राहात नाही.
अन्याया विरुध्द पे टून, चिडून उठले ले मन योग्य दिशा मिळाल्यास काय करु शकत
नाही ? भावनिक पे टणे हीच खरी
$$$$$
वर्ण वर्ग सं घर्ष हातात हात घालून पु ढे जायला हवे त. एकत्रित लढे उभारल्यास
शोषितांचे प्रश्न सु टू शकतात, हे पँ थरला मान्य नाही, असा एखादा निर्बुध्दच म्हणू
शकतो. वस्तु तः इथल्या डाव्यांना मात्र नामां तर दं गलीनं तर शहाणपण सु चलं . पँ थरने
सर्व पु रोगामी घटकांना बरोबर घे ऊन व्यापक, सर्वसमावे शक आं दोलनाचा प्रयत्न केला
38
आहे च. बऱ्याचदा परिवर्तनवादी ढोंगी असल्याचे ही पँ थरच्या लक्षात आले आहे . त्यां च्या
ठराविक मर्यादाही स्पष्ट जाणवल्या आहे त. ने ते म्हणून मिरवणाऱ्या काही मित्रवर्याना
उदार अं त:करणाने पँ थर मित्रच मानतात. ही पँ थरची सोशिकता नाही काय?
क् रां ती कशाशी खातात? सनसनाटीखे रीज लिहिणाऱ्या काही कच्च्या लोकांनी
क् रां तीचा गै रअर्थ घे तला आहे . बाबासाहे बांना अभिप्रेत असले ली रक्तहीन क् रां ती
पँ थरला हवी आहे हिं साचार कोणत्याही संख्येने का होईना स्थानिक पातळीवर पँ थर त्या
पदावर काम करीत आहे . जाती जातीत एकोपा निर्माण करुन दलितार्गत तमाम गरीबांना
एका निळ्या झें ड्या खाली आणण्याचे काम पँ थर करीत आहे . पँ थर मध्ये बौध्द तरुण
बहुसं ख्य असले आणि ने तृत्व करीत असले तरी दलित शोषितांचा आवाज बु लंद करणारे
व्यासपीठ तयार करण्याचा प्रयत्न पँ थर करीत आहे . रिपब्लिकन पक्षाला बौध्दांचा पक्ष
म्हणून जो डाग लागला होता, तो यशस्वी प्रयत्न पँ थरने केला, हे त्यां च्या व्यापकते चे
बोलके चित्र नाही काय?
एका बाजूने बौध्द सं घटनां च्या टीकेचा विषय पँ थर होत आहे तर दुसऱ्या बाजूने
'भारत बौध्दमय, करण्याची घोषणा उचलून धरल्यामु ळे पँ थर फुटली, असे म्हणणाऱ्या
डाव्यां च्या टीकेचा विषय पँ थर होत आहे . या दोन्हीच्या कचाट्यातून मार्ग काढतांना
बु ध्दाचा मध्यम मार्गच पँ थरला अभिप्रेत आहे . लोकशाहीच्या सं कल्पने पर् माणे
समाजवादी
$$$$$
39
८. प्रसंगी जीवाची बाजी लावतात पँथर ! :
अन्याय नाही ते थे कमीत कमी प्रतिकार तरी ठरले ला आहे . हे एक समीकरणच आहे .
पँ थर अन्यायाचा प्रतिकार कायदे शीर मार्गानी करीत असतात, अन्यायग्रस्तांना शक्य
ती मदत करीत असतात. या उपर ही अन्याय, प्रतिकाराबाबत टीकाच होत असे ल तर
टीकाकारांचा दृष्टिकोणच चु कीचा आहे , असे म्हटल्यास वावगे ठरू नये . पूर्वी अन्याय
घडे ल ते थे जमावाने लोक जात असत. आता पध्दत बदलली आहे . ज्यांना वाटतं य पँ थर
काही करीत नाही त्यांना पँ थरने उघड हिं साचार करावा असे तर वाटत नाही ना? मिश्र
समाज व्यवस्थे चे बु रुज उध्वस्थ करण्यासाठी कठोर साधनांचा वापर करावा लागे ल, अशा
वे ळी दं गेखोर म्हणून पँ थरलाच बदनाम करणारे लोक असतील? त्यांना आवर कोण
घालील. प्रत्ये क माणूस लढाऊ प्रवृ त्तीचा व्हायला हवा आहे , बाकीच्यांनी मवाळ,
पळपूटं धोरण स्वीकारून अन्यायाच्या निमित्ताने पँ थरला झोडपणे , बदनाम करणे किती
सं युक्तिक आहे ?
40
१०.पँथरचा आदिवासी भूमीहीन लढा! :
पँ थरने समाजकार्यातून निवृ त्ती घे तले ली नाही. तिचे कार्यही थांबले ले नाही. खर
तर सतत कार्यरत असणारी चळवळ पँ थर आहे . असे असताना पँ थरला पत्रकी म्हणता
ये णार नाही. आजवरच्या पत्रकांत अने क मागण्या झाल्या, रचनात्मक कार्यक् रम काही
प्रश्नांसाठीच आखले गे ले. आणखीन लढे उभारायला हवे त, याची जाणीव पँ थर्सना आहे ,
कोणताही प्रश्न चु टकी सरशी सु टणारा नसतो. चिवट झुंज पँ थर दे तच आहे . दरम्यान
प्रश्न वाढतच आहे त. कोणत्याही प्रश्नापासून दरू न जाणाऱ्या, त्यागी व निष्ठावान
पँ थरला घोषणाबाज, पत्रकबाज कसे बरे म्हणता ये ईल ?
$$$$$
ज्यांनी कधी खोलात जावून विचार केला नाही त्रयस्था सारखे पाहन ू , छापून
आले ल्या मजकू राचा अभ्यास करून, मनात पूर्वग्रह ठे वून लिहीले . त्यांना पँ थरच्या
मनातला पीळ, त्याची जिद्द, धडाडी, मृ त्युला सामोरे जाणाऱ्या धाडसी निष्ठा
कळल्याच नाहीत, इथला समीक्षक जातीय-वर्णीय चक् रात अडकल्याने पक्षीय वै चारिक
बां धिलकीत फसल्याने , व व्यक्तीगत हे व्यादाव्याने घसरत गे ला. विशु ध्द टीके अभावी
दिवं गत भै य्या साहे बाच्या भावना त्याला कळल्या नाहीत. भै य्यासाहे ब म्हणाले होते .
'पँ थर लोखं डाचे चणे पचविणारी चळवळ आहे तर न्यायमूर्ती वी. के. कृष्णअय्यर यांनी
म्हटले , दलित शक्तीत सत्यता आहे . 'दलित पँ थर एक प्रतीक आहे , दलित मु क्ती
41
अवश्यभावि आहे ' अर्थ उघड आहे . पँ थर दलित क् रां तीकारी शक्तीचे प्रतिक आहे .
दलित शक्तीचे प्रदर्शन पँ थरने अने कदा केले आहे . मुं बई ये थे द्वितीय राष्ट् रीय
अधिवे शन प्रसं गी कार्यकर्त्यांचे प्रचं ड भीमदर्शन व लाखोंचा 'क् रां तीमार्च, पाहन ू
अने क वृ ध्द आं बेडकरावादी म्हणाले होते , हिच खरी ताकद, हाच खरा रिपब्लिकन पक्ष
आहे . पँ थर यावे ळी जाहीर केले ल्या ठरावांना कॉ. अहिल्या रां गणे कर यांनी ‘मु क्तीनामा’
असे म्हटलं होते .
ही ताकद दलित मु क्तीचे महाद्वार, हत्यार होत आहे शहीदां च्या त्यागावर उभ्या
असले ल्या या सं घटने स कोणीही ने ता नसतांना ते प्रचं ड वाढत आहे . लं डन शहरात
गर्बर् े च्या ने तृत्वाखाली परदे शात आं बेडकरवादी जनते ची सहानु भती मिळवीत आहे .
जपान मधल्या बिरांकुमीनाना जागतिक दलितांना ने तृत्व करायला समर्थ वाटले ली पँ थर
अधिक अं तर्मुख होत आहे , ह्यात सं शय नाही. कर्मचाऱ्यांमध्ये ‘भारतीय कर्मचारी सं सद’
म्हणून तर विद्यार्थ्यांमध्ये ‘भारतीय विद्यार्थी सं सद’ या नावाने ही वाढत आहे .
भविष्यात दलितां च्या जीवनातील काळाकुट् ट अं धार पाहता हे सं घटन जपायला
हवे . पण अशा प्रसं गी काही त्रुटी ही दरू व्हायला हव्यात. या त्रुटी प्रत्ये क पक्ष
सं घटनांमध्ये असू शकतात तरीही पँ थर सारख्या चळवळीत त्या असू नये त. या
सं घटने त कधी कधी बु ध्दीवादी वर्गाची गळचे पी झाल्यासारखी वाटते .
क् रां तिकारकत्वाच्या नावाखाली सं धीसाधू वै यक्तिक काम करून घे णारे भासमारु चमचे
जगत असतात. ते अल्प असले तरी नडणारे आहे त ह्या त्रुटी झपाट्याने दरू व्हायला
हव्यात. एकचं एक प्रश्नाचा पाठ पु रावा करुन कठोर प्रसं गाना खोली व नवचै तन्य तयार
करायला हवे . बु ध्दीवादी वर्ग प्रशिक्षीत कार्यकरर्त्यांच आणखीन वाढायला हवा,
सं घटनात्मक सै ध्दां तिक चूका टाळल्या जाव्यात, हे काम पक्ष श्रेष्टींनी ठरविले तर
काहीही कठीण नाही. ज्यांना वाटतंय विझत चालले ला निखारा आहे . त्यांनाही तो
$$$$$
42
$$$$$
43
गां वी एका व्यक्तीच्या नावावर १० एकर जमीन मिळाली. वडिलां च्या नावे १० एकर पण
वडिल सध्या मयत आहे त. शिवाय त्याच्या वडिलोपार्जित खाजगी मालकीची जमीन ही
काही एकर आहे च. एकत्र कुटु ं ब असतांना हा प्रकार कां व्हावा? खाजगी जमीन
असले ल्यांना जमिनी दिल्या गे ल्या. हे सूर्य प्रकाशाएवढे स्वच्छ आहे . अशा अने क
प्रकारां साठी ही एकच दाखले बाज घटना पु रे शी आहे .
$$$$$
१९७८ पूर्वी भूमिहिनांनी अतिक् रमण केले , ते अने क स्वरूपां त. कोणी भातशे ती
केली. कोणी वरकड (वरई, नागली माळावर वगै रे) केली. कोणी पाचोळा काढून हक्क
सां गितला, तर कोणाला अतिक् रमणाबाबत दं ड झाले आहे त.
हजार भूमिहिनांपैकी ४००/५०० प्रकरणे अशी आहे त की, त्यांची नोंद १०/२०
वर्षांपासून अतिक् रमण करुनही वन व महसूल खात्याने केले ली नाही. त्यांना दं ड
झाले ले नाहीत. तर ‘डोंगरन्हावे ’ नावाच्या गां वी जवळ जवळ ७० भूमिहिनां ना दं ड
झाले त, पण अद्यापही जमिनी नावे झाले ल्या नाहीत. काही प्रकरणे ७८ पूर्वी
पासूनची आहे त. तर काही १९७८ च्या दरम्यानची आहे त. पण जे थे १९७८ पूर्वीच्या
अतिक् रमीत प्रकरणांची नोंद नाही. ते थे अतिक् रमणाचा पु रावा कोणता धरता ये ईल?
केवळ दं डाच्या नोंदीचा पु रावा इतरांना अन्यायकारक ठरे ल हे नि:सं शय! मग याला
जबाबदार कोण? तर सं बंधीत खातीच ! कारण एखाद्या ठिकाणी रोपे लावण्याचा प्रकार
झालाच तर पोलिस यं तर् णे च्या बळाचा वापर करून रोपे उपटू न टाकली जातात, व
त्याच मु ळे कायदे शीर केस न होण्यामु ळे नोंदी झाल्या नाहीत. शिवाय एक वे ळ रोप
उपटू न टाकल्यावर पु न्हा त्याच भूमिहीनाने ते थेच राबून कसण्यास सु रुवात केली, तरी या
खात्यांनी लक्ष दिले ले नाही. या सर्व अनागोंदी कारभारामु ळे समर्पक पु रावा शोधणे
कठीण जाणार आहे . शिवाय याच विभागात सर्क ल व तलाठी यांनी भोळ्या भाबड्या
लोकांकडून काही रक्कम घे वन ू जमिनी दे ण्याचे प्रकारही झाले आहे त. असा हा भोंगळ
व कष्टकऱ्यांचे रक्त पिणारा प्रकार आहे . या सर्व परिस्थितीचा स्पष्ट आले ख
काढल्यावर एक सोयीस्कर व सोपा मार्ग आढळतो, तो असा कीं, भूमिहीनांना योग्य
सं धी दे ण्यासाठी व त्यांचे आर्थिक राहणीमान सामाजिक स्थर सु धारण्यासाठी
अतिक् रमणाची मु दत आणखी दहा वर्षांनी वाढविणे . यामु ळे उरले ल्या भूमिहीनांना सदर
सं धीचा लाभ होईल. तो एक 'लॉटरी नं बर' ठरणार नाही. यांचे मु ख्य कारण म्हणजें
ये थील आदिवासी, भूमिहीन, शे तमजु राची परिस्थिती अत्यं त भरडून टाकणारी आहे .
स्वातं त्र्य मिळू न ३४ वर्षे झाली, पण तळचा माणूस अजूनही पारतं त्र्यात आहे .
आज ही त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न सु टले ला नाही. आदिवासीची लं गोटी बदलली
नाही. सकाळी जे वण केले तर दुपारच्या व सां जच्या भाकरीचा प्रश्न ‘आ’ वासून
उभाराहात आहे . घरात दिवा लागत नाही. मु लां च्या शिक्षणाचा प्रश्न तसाच आहे .
रोजगार मिळतो, पण तोही भरपूर नाही. पाटलाघरी मरे पर्यं न्त राबूनही कामाचा योग्य
मोबदला मिळत नाही. जिथे
44
$$$$$
दोन पोरां ला दियाची का जो मं जरू ी करतो त्यांनी खायाची. पाणी टिपळू नशान पितो.
ढोरं मोठ्या लोकांची पाणी वापरतात, पण आदिवासी गटारात. पनवे ल तालु क्यापासून
आमचं आर्ज हयीत, पण काहीच कलला नाही. आता मीठ भाकरी मिललं च अशी आशा
हे . शे ती, कर्ज, पाणी मिलला पाहिजे . मु लं शिकवू. जमीन ये वस्तीत पिकवू, जमीन सोडून
कुट जानार नाही. हुभा ऱ्हाणार. पु ढं जायाची हितु , हा आमी समींदरन सारकं
खवळला हुत, ‘माघार नाही’ भूमिहीन कुणबी बांधव म्हणतो “५० वर्सापासून निवल
45
भूमिहीन मोल मजूरी, चाकरी धरायची, सरई धरायची. आमचा पोट भरत नाही. सर्क ल
भाऊसाहबानी फसावला."
आज त्यां च्या वीजे चा पाण्याचा, घराचा, रस्त्याचा प्रश्न आहे च! शिक्षक आला
तर पु स्तके - पाट्या नसतात, जे थे शाळा आहे , ते थे शिक्षक नाही. आले तर वे ळेवर
अजिबात नाहीच. कित्ये क वाड्या, पाडे अं धारातच आहे त. पाणी टिपळू न प्यावे लागते .
ते ही कोसोदरू जाऊन आणावे लागते ! त्यातच रोगराई पसरते . वै द्यकिय मदत केंद्र
अपु रीचं ! जवळजवळ नगण्यच!
लेख.
(प्रसिद्धी : दै. सकाळ ३१ डिसेंबर, १९८१ )
$$$$$
दि. १८ एप्रिल ८१. मु रबाडहन ू ठिक दुपारी २.००वा ‘नढई' ये थे बसथां ब्यावर बस
थांबली. रस्त्याच्या बाजूलाच दहा पं धरा आदिवासी भूमिहीन बसले ले रस्त्याच्या
कडे लाच उभ्या असले ल्या झाडाच्या बुं ध्याला एक बोर्ड लटकवले ला. 'दलित पँ थर
आदिवासी सं घ, मु रबाड तालु का.’
नढई गावाहन ू टें भरे ' गावी जमीन अतिक् रमणासाठी जायचे असते . भरपु र चटका
दे णारा फुफाटा तु डवित गाडीरस्ता सोडून पायवाट लागते . आजु बाजूला विस्तीर्ण डोंगर
पसरले ले. पायवाटे ला लागताच एक दृश्य दिसते . अत्यं त रोमांचकारी, एका आं ब्याच्या
46
झाडाखाली पोलिसांचा अधिकाऱ्यांसहीत ताफा व जं गलखात्याचा ताफा. त्यां च्या
समवे त काही भूमिहीन, आदिवासी बसले ले. पँथर कार्यकर्त्यांना पाहताच दुरुनच भराभर उठू न
उभे राहिले . आम्ही आं ब्याच्या झाडाजवळ पोहचताच चहुबाजूने झुडपा झुडपातून
पं चवीस-तीस जणांचा जथा झाडाकडे कू च करु लागतो. विस्तीर्ण माळावर आजूबाजूने
ये णाऱ्या या झुंडी एक वे गळे च वातावरण निर्माण करीत होत्या. 'जयभीम' वगै रे होतो.
हात जोडून, वाकू न भीतभीत ‘जयभीम' म्हणणारे आदिवासी अजूनही उभे च. बसण्याची
विनं ती केली. एकसाथ बसले . प्रत्ये काच्या चे हऱ्यावर वे गवे गळे भाव होते . कोठे उत्साह,
कोठे सं भर् म. महिलाही दहा-पं धरा, घोषणा सु रू होतात. 'दलित एकता जिं दाबाद',
‘भारतीय दलित पँ थरचा विजय असो’ ‘निळा झें डा जिं दाबाद', ‘बाबासाहे ब
आं बेडकरांचा, महात्मा फुल्यांचा विजय असो’, ‘भूमिहीनाना जमिनी मिळाल्याच
पाहिजे त' वगै रे.
सर्व साधारण सभा, तशा यापूर्वी सभा झाले ल्या. शे तकरी भवन मधील मे ळावा
सु द्धा यापूर्वीचा. ठाणे जिल्हा दलित पँ थर अध्यक्ष एकनाथ जाधव म्हणाले , "गे ल्या
महिनाभरापासून सरकारी, जमिनीवर, जं गलखात्याच्या जमिनीवर तु मच्या सहकार्याने
अतिक् रमण चालू आहे . तु मचे सहकार्य असे ल तर या पडीक जमिनीत मोती पिकवू.
कष्टकरी, भूमिहीनांना न्याय मिळवून दे व.ू हा प्रश्न तु मचा आहे . आम्ही स्वार्थी नाही.
तु मच्या भाकरीचा, जीवन मरणाचा प्रश्न आहे . या साठी लढा दे ऊ". बाबामोरे , दलित
पँ थर उपाध्यक्षांनी जोशपूर्ण भाषण करून सर्वांची मरगळ दरू केली. ते म्हणाले , “तु म्ही
बड्यांना
$$$$$
रक्तावर जगवता. पे टून उठा. जे लला घाबरु नका. एकजु ट करा. चां गले कपडे घाला.
जमीन तु मच्या मालकीची, बडा माणूस तु मच्या तळहातावर. पृ थ्वी तु मच्या घामावर
उभी आहे . तु मची एकजूट तु टली तर बडे लोक तु म्हाला कापतील. आम्ही उपास तापास
काढले त. तु म्ही आम्ही एक आहोत. पँ थर मध्ये या. (ये वू ये वू ). आदिवासीबाईकडे
पाटलाने पाहिले तर त्याचे डोळे काढू (टाळ्या) डोक्यावर घे तले ल्यांना पायाखाली
तु डवू."
सरचिटणीस बाळ भोईर, म्हणाले , "शिक्षणावर भर द्या. असे ल नसे ल ते विकू न
शिकवा. कोणालाही घाबरू नका."
विठ् ठल शिंदे, सं घटक म्हणाले , "ढे ऱ्या पोटाचे , पांढऱ्या कपड्याचे , आतून काळे
असले ले तु मच्याकडे मते मागण्यासाठी आले . आम्हाला पै से नको, मत नको, तु मची
माया हवी, प्रेम द्या. आमच्या पासून तु म्हाला दरू करणारे अने कजण आहे त. तु म्हाला
जातीच्या नावावर भडकावतील, आदिवासी बाईची इज्जत लु टतील; मारतील, या
पासून हुशार व्हा. तु म्ही जं गलचे राजे पण जं गल कोणाच्या नावावर आहे ? अतिक् रमणे
कां ? माणसाला माणूस बनवू. जातपात फेकू न द्या. भाकरीचा प्रश्न सु टला तरी
स्वाभिमानासाठी लढावे लागे ल. दारु वगै रे व्यसने सोडून द्या. आदिवासी म्हणजे इथले
मु ळचे राहणारे . या दे शाचे आपण राजे होतो. आपल्याला जिं कून गु लाम बनविले आहे .
गु न्हे गार बनविले आहे ."
या कार्यक् रमास एक 'नारू' झाले ला 'पोवाळे ' चा आदिवासी बां धव काठीचा
आधार घे त घे त लं गडत आला होता.
वर्णव्यवस्थे ने नटले ल्या या समाजात गावकुसाबाहे रच्या जीवनाच्या पलिकडे
जं गलात रानावनात भटकणारा हा माणूस जखमे चे ओझे स्वातं त्र्याच्या बत्तीशीतही
47
वाहात आहे . अजूनही त्याची लं गोटी बदलली नाही. अजूनही सांजच्या भाकरीची
सोडवणूक झाले ली नाही. त्याचे पोट खपाटीला गे लेले आहे .
‘भारतीय दलित पँ थर आदिवासी सं घ मु रबाड' या सं घटने ची स्थापना होण्यास
वे गळे कारण आहे . 'नढई' गावचा तु काराम दे वू मु कणे या आदिवासीवर वे ठबिगार
करण्यास नकार दिल्याने प्राणघातक हल्ला झाला. त्याच्या उपचाराची व सं रक्षणाची
सं पर्ण
ू जबाबदारी पँ थर्सने घे तली. त्याच्यावरील अन्यायाला वाचा फोडली. या
प्रकरणातून पँ थर कार्यकर्त्यावर विश्वास बसल्याने पु ढील कार्यक् रम आखणे सोपे झाले .
या सं घटने च्या बां धणीसाठी कमलाकर जाधव, दिलीप चं दने , अनं ता जाधव, मिलिं द
रणदिवे , तातोबा धनगर, अण्णा धनगर, भगवान खरे , चिमणराव जाधव तसे च नानकाच्या
वाडी चे नामदे व भला 'मास्तर' यांनी अहोरात्र कष्ट घे तले . आज ते पु र्णवे ळ काम करीत
आहे त. आजचा मु ख्य प्रश्न म्हणजे जमिनीवर ‘अतिक् रमणाचा' आहे . या साठी अने क
कार्यक् रम झाले . जवळपास पं चवीस सभा, मे ळावे , बै ठका होत आहे तच.
$$$$$
आजवर खालील गावांना जमीन वाटप करून अतिक् रमण केले आहे . तसे हे
अतिक् रमण १९७८ पूर्वी पासूनचे च आहे . यातील काही गावांच्या नोंदी खालीलप्रमाणे आहेत.
अजून सं पर्ण
ू मु रबाड तालु क्यातील जमिनीवर अतिक् रमण करावयाचे आहे . बरे च
भूमिहीन कार्यकर्त्यां ना ये वन
ू भे टत आहे त. अडचणी ये त आहे त. पूर्वी झाले ल्या
अतिक् रमणात वशिले बाजी झाली. मोठ्या भावाला १० एकर जमीन व धाकट्या भावाला
गु रुचरण दे तात, व आदिवासी भूमिहीनाचा पाय रोवू दे त नाहीत. ज्याना प्लॉट होते .
त्यांना जागा मिळाल्या ; पण इतरांना मात्र काहीच नाही. म्हशीच्या प्रकरणात पै से
कबु ल करून फक्त ३० रु. दे वन ू म्है स पाटील वापरतो. असे अने क अनु भव, दुःखभरी
प्रकरणे त्या दुःखाच्या खाईत बु डाले ल्या वाड्यांतन
ू ऐकायला मिळतात.
दि. २ मे ८१ रोजी मु रबाड ये थे शिवाजी चौकात एक भव्य मे ळावा दलित पँ थर
मु रबाडच्या वर्धापन दिनानिमित्त झाला. तो दिवस. जाहीर सभे च्या स्वरूपात आदिवासी,
भूमिहीन, शे तमजूरांचा मे ळावा.
प्रा.अरूण कांबळे व रामदास आठवले प्रमु ख वक्ते . रामदास आठवले मुं बई
बाहे र. ठिक दु.३ वा. गाडी मु रबाड थांब्यावर थां बली. कार्यकर्ते वाट पहातच होते .
48
उत्स्फू र्त स्वागत. आदिवासींनी दोन ‘डोलीबाजे ' आणले होते . प्रत्ये काच्या कपाळाला
निळ्या कापडाच्या पट् टया. त्यावर ‘दलित पँ थर, मु रबाड’ लिहीले ले. कोणाच्या
खां द्यावर निळ्या पताका टाचणीने टोचले ल्या. काहींच्या कपाळाला निळा गु लाल
लावले ला. प्रा. साहे बांनी लावायला विरोध केला. अधून मधून घोषणा गर्जत होत्या.
प्रा. अरूण कांबळे जिं दाबाद घोषणा. या
$$$$$
घोषणे स त्यांचा विरोध. वाजत गाजत नाचत स्टे जकडे कुच. हजार दीड हजार
आदिवासी, भूमिहीन सकाळी दहा वाजल्यापासून काखोटीला भाकरी बां धन ू दरू दरू च्या
खे ड्यांमधून आले ले. दुपारी चारच्या सु मारास कडक ऊन. तशीच सभे ला सु रुवात होते .
सर्वजण शांत बसले ले. सर्वप्रथम नानकाच्या वाडीचे रामा पिलू पारधींनी आपली व्यथा
मांडली. नं तर रामू बाळू हिलम व नामदे व भला मास्तरांनी आपल्याच भाषे त दुःख
मांडले . स्वतःच्या भाषणाला स्वतःच टाळ्या दिल्या. प्रमु ख वक्ते प्रा.अरुण कांबळे
म्हणाले , "नाही रे वर्गाची एकजु ट काळाची गरज आहे . सं घटना बलशाली करा. दगडांना
सोडा आता, त्यांचा उपयोग धरणांसाठी, इमारतींसाठी करा. ‘रामराम’ ने कां ही दिले
नाही. तो सोडून द्या. राक्षस म्हणून रावणाला, आदिवासींना मारले . शं बकू मारला. दारू
सोडा. दारूने आपल्या आठरा पिढ्या निकामी झाल्या. माणसासारखे जगायचे .
मजूरां च्या सोसायट्या स्थापन करून काम उक्त घे ऊन कार्यकर्त्यांनी ते करावे . मजूरीत
वाढ होवून स्री-पु रुषांना समान वे तन मिळविण्यासाठी, लाचारीचे जीवन झटकू न
दे ण्यासाठी, शिक्षणाचे महत्व पटविण्यासाठी कार्यकर्त्यां नी झटावे . तळाचा माणूस
स्वतं तर् होणे , ही या जीवंत काळाची गरज आहे . आदिवासींचे शोषण थांबले च
पाहिजे .” रमेश इंगळे यांनी विचार मां डले की, “ज्याला अजीर्ण होवून झोप ये त नाही
त्याला झोप मिळण्यासाठी व ज्याच्या पोटात कण नाही, म्हणून झोप ये त नाही. त्याला
झोप ये ण्यासाठी ठोस कार्य करावे . अजीर्ण झाले ल्याचे कमी करावे व कां ही नसले ल्यांना
पोटभर द्यावे . आपला लढा केवळ आर्थिक नसून सामाजिक, सां स्कृतिक, शै क्षणिक बदल
घडवून आणण्याचा आहे ? अशोक बच्छाव यांनी सवलतींची टक्केवारी समजावून
सां गितली.
मौजे नढई गां वी आदिवासी बं धच्ू या घरावरील कौले चार वर्षे गायब झाली.
चौकशीअं ती ती एका पु ढाऱ्याच्या घरावर मजबूत असल्याचे उजे डात आले . कौले
मिळवून दिली.
तर करवे ळे ये थील तु काराम बापू डबाळे यांचे प्लॉट गायब झाले . तलाठी
उडवाउडवीची उत्तरे दे त आहे .
मौजें मोहोप. भूमिहीन कुणबी बां धवाकडून २०० रुपये लाच घे ऊन प्लॉट नावावर
दे तो असे खोटे सां गनू सर्क लभाऊसाहे बांनी फसविले . जमीन अद्याप नावावर नाही.
किती एकर आहे हे ही माहित नाही. सभा सं पल्यावर ‘टे ंभरे ’ चे भूमिहीन भे टले .
म्हणाले , "साये ब आमच्या गावचा पं गू पाटील म्हणतो की, ये ठ जमीन कसु नको. नाहीत
मा बघून घे ईन. साये ब तु म्ही सां गा, त्याला बराबर करतु " त्याला समजावले . स्थानिक
कार्यकर्त्यांना
$$$$$
49
भे टायला सां गितले . नानकाच्या वाडीचे ‘मास्तर’ आले , "साये ब तु म्ही आमच्या वाडीला
ये ऊन गे ल्यावर काही पु ढारी आले , ते म्हणाले पै से दे ऊ नका. हे लोक तु म्हाला
फसवतील. ते तु मच्या जातीचे न्हाहित', वगै रे.
मौजे डोंगरन्हावे ये थील प्रसं ग आठवला. दि. १९ एप्रिल ८१ रोजी ७० भूमिहीन
असले ल्या व जवळपास २०/२५ वर्षापासूनचे अतिक् रमण असले ल्या मराठा आगरी
भूमिहीनांनी कार्यक् रम आखला होता. गावी प्रत्यक्ष गे ल्यावर उपस्थिती फारच कमी
असल्याचे जाणवले . स्थानिक भूमिहीनाने सां गितले की, पवार नावाचे रिप. पार्टीचे
कार्यकर्ते समजणारे व मी बाबासाहे बां च्या बरोबरीचा (वयाने नव्हे ) सर्वांना सां गणारे
गृ हस्य दहशत पसरवित आहे त. ‘दलित पँ थरच्या मागे जाऊ नका. पोलीस स्टे शनच्या
धमक्या वगै रे दे वन ू सां गितले वगै रे,’ छोट्याशा सभे त सदर बावळट पु ढाऱ्याचा
समाचार खरपूसपणे घे तल्यावर सर्व गाव सभा ऐकायला आला व पँ थरच्या बाजूने उभा
राहिला.
सायं काळी सभा आटोपल्यावरही डोलीबाजा व नाच चालूच होता. साहे बांना
पोहचविल्याशिवाय आम्ही घरी जाणार नाही, असे आदिवासींनी बजावले . शे वटी बस
सु रू होईपर्यन्त कार्यक् रम चालूच होता.
$$$$$
ठिकठिकाणी जं गलाजं गलात अतिक् रमण करून त्या ठिकाणी निळ्या झें ड्यांची
गर्जना गगनभे दी होऊन, तो स्वाभिमानाने फडकणारा निळा झें डा अजूनही उं च उं च
जाणार आहे , तो कार्यकर्त्यां च्या राबण्यातून योग्य दिशा दे ऊन या जमावाला सां भाळतो
कठीण काम आहे . या बाबतीत कार्यकर्ते जागरूक आहे तच, असे अडथळे , असे प्रेम
यांची जाणीव ठे वून कार्यकर्ते या महाराष्ट् रातील ३० लाख आदिवासी व भूमिहीन गरीब
शे तकऱ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतील, ते व्हा ‘दलित पँ थर' तळागाळातील
माणसांची होणार आहे . व बाबासाहे बांना अभिप्रेत असले ला त्यांचा उपे क्षित समाज
50
गवसणार आहे . उपे क्षितांना बाबासाहे बां चे वै यक्तिक किरणे मिळणार आहे त सु दृढ
बनण्यासाठी. अजून बरीच माहिती गोळा करायची आहे . प्रश्न समजून घ्यायचे आहे त.
आजच्या सं घटने तनू च मागास जाती, जमाती, भटक्या विमु क्त जाती जमाती आर्थिक
दुबळे एकंदरीत आर्थिक, राजकिय, सामाजिक, सां स्कृतिक दृष्ट्या दडपले ल्यांची
एकजूट करण्याची प्रक्रिया सु रु होणार आहे . त्याचीच ही खूण आहे . आज आदिवासी
भूमिहीन शे तमजूर हळू हळू जागा होवू पहात आहे !
...
[ दि. २ मे १९८१ रोजी ठाणे जिल्हा भारतीय दलित पँथरने मुरबाड तालुक्यात काढलेल्या आदिवासी, भूमिहीन,
शेतमजूर यांच्या जमीनवाटप या प्रश्नावर काढलेल्या मेळाव्याचा वृत्तांत.
पँथर संघटक विठ्ठल शिंदे यांनी हा वृत्तांत दि. ५ मे १९८१ रोजी लिहिला आहे.]
$$$$$
दि. १मे, १९८६ रोजी इगतपुरी येथे हा ऐतिहासिक मेळावा घेण्यात आला. इगतपुरी तालुक्यात १९८२ साली
भारतीय दलित पँ थर स्थापन झाले यां मेळाव्याची जयप्रकाश डोळस, रमेश इंगळे , मदन जाधव, नगरसेवक
रमेश गाढे, यांनी नियोजन के ले. तर या मेळाव्याचे उदघाटन सुरेश सावंत यांनी के ले यां प्रसंगी वसंत पवार, वि.सो. शिंदे,
सुरेश बारशिंग, रमेश इंगळे यांची भाषणे झाली. या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष रमेश गाढे होते. इगतपुरी तालुक्याला
बु द्धकालीन इतिहास आहे येथील भिरं गी लोणी व आदिवासी डोंगरदऱ्यातील माणूसाचा
कायापालट करण्यासाठी पँ थर कार्यरत राहील असे सूचित करण्यात आले.
मेळाव्यातील सहभागी :
वसं त पवार, सु रेश सावं त, रमे श इं गळे , सु रेश बाराशिं ग, प्रियकीर्ती त्रिभु वन,
फकीरा जगताप, श्याम पं डित, के.बी. बनकर, विठ् ठल शिं दे, इ.ए.निकम साहे ब, अनिल
51
भाले राव, गां गुर्डे, शं कर डां गळे , जयप्रकाश डोळस, रामजी पाटील (पत्रकार), बागूल
(मनमाड) जीवन अहिरे , (भावली) जयराम डं बाळे , बबन शिं दे (शे नवड बु .||), निं बाजी
शिं दे (वाळविहीर), पिराजी उबाळे (फां गुळगव्हाण), शांताराम शे जवळ (कसारा) मिलिं द
रणदिवे (कल्याण), मारुती बनकर (मनमाड), टी. एम्. जगताप (माजी नगरसे वक
कल्याण), सु रेश पाटोळे , वानखे डे साहे ब (इगतपु री), शिरीष पाटील, अशोक सोनवणे
(कसारा), नाना रत्नपारखी दै . गावकरी पत्रकार (इगतपु री) डबाले (भावली), नगरसे वक
गायकवाड, गौतम मोरे (ना.रोड) रवि शे जवळ (कसारा), रमे श गाढे इत्यादी,
त्या दिवशी इगतपु री तालु क्याला मौलिक ठरणारा, इतिहासात लिहणारा १ मे १९७३ ही
छावणीची सु रवातही याच दिवशी. जे वृ क्ष लावले , त्याच्या फां द्या वाढल्या, वृ क्ष झालं
हा क्षण मी अत्यं त महत्वाचा मानतो. मी तर सु रुवातीचा सहप्रवासी. पँ थरने सर्वत्र झे प
घे तली आहे . फलश्रुती अशी घोषणा करू, ‘गाव तिथे पँ थर’ झाल्यावर सं बध अन्याय
निपटू न काढून बाबां च्या स्वप्नाचा समाज निर्माण करू.ये थील प्रश्नांची चर्चा करणार
आहोत.
पँ थरची १४ वर्षाची वाटचाल काय? दलित समाज वै कल्यग्रस्त.ज्यांनी
बाबासाहे बांची चळवळ अं गाखां द्यावर घे तली ते गु पचूप. मु लभूत विचार रुजविणारी
व्यापक अर्थाने सर्वाना बरोबर घे ऊन जाणारी हवी होती.
ही क् रां तिकारी ताकद ध्ये य निष्ठते ने उभी राहिली. शिव्या दे णारे पँ थर ला मानू
लागले . अन्यायकर्त्याला भीती कोणाची ? तर पँ थरचीच (टाळ्या) प्रतिगाम्यांची भं बेरी
उडाली आहे . त्यांनी जरी दोस्तीचा हात पु ढे केला तरी आम्ही ओळखून आहोत. आम्ही
मानवतावादी म्हणून जाऊ पण त्यांनी मनूचा विचार काढून टाकू न आं बेडकरी विचार
स्वीकारणार असतील तरच, फुले - बाबा - शाहू यांचा वसा घे णार का? आम्हाला तर
मित्र हवे त.
या दे शाच्या अखं डते ची काळजी एकाच व्यक्तीला. (टाळ्या) बाबासाहे बांनी
राष्ट् रवादी समाजवाद, मानवता धर्म मानला. तर धर्माच्या नावावर राष्ट् र का?
खलिस्तानवादी दे शाला तोडण्याचा प्रयत्न करीत आहे , जो धर्म आड ये ईल त्याला
सु तासारखा सरळ करावा, हे बाबा म्हणाले . पण दे शाने , राज्यकर्त्याने बाबासाहे ब
स्वीकारावे त. मानवी मु क्तीच्या स्वातं त्र्याचा विचार बाबासाहे बांना निस्पृ ह से वेने काम
पँ थरला करायचे आहे . प्रश्न समजावून घे ऊन, आव्हाने पे लण्यास समर्थ असले पाहिजे .
मार्क्स , ले निनची परं परा जशी, तसे स्वप्न पाहन ू आपण आं बेडकर विचाराची
स्वप्न जागे पणी पाहू व शोषितांचे राज्यआणू सं कटावर सावित्री बाईसारखे काम करू.
एक ना एक दिवस राज्य बाबासाहे बां च्या विचाराचे ये ईल. (टाळ्या)
पाणी, अज्ञान, अं धश्रद्धा, भांडवलदारी (योग्य वे तन न दे णे), भय्यासाहे ब
म्हणाले त्या प्रमाणे , मानवी मु क्तीची, लोखं डाचे चणे पचविणारी चळवळ आहे . पँ थरने
समाज प्रगतीचा गाडा पु ढे च ने ला आहे .
52
आपण जर सै न्य, मग सै निकांना शिस्त हवी. विषमते विरुद्ध लढतांना लढा
कळायला हवा. वर्गीय व वर्णीय समाज निर्मिण्याचे काम करायला हवे . आमच्या दे शाचा
आदर्श परकीयांचा. निळू भाऊ खाडीलकरांना रशियाला जाऊन आल्यावर कळले .
श्रमाला सन्मान हवा हा बाबांचा आर्थिक विचार. ‘राज्य समाजवाद’ रुजविला गे ला
पाहिजे .
निराश तरुण मित्रांना एक सल्ला. नु सत्या क् रां तीच्या कविता करू नका,
कवितांना जीवन बनवा. बु द्धाने विचार मांडले पण तो पायी फिरला. कवी आम्हाला
लढयातला हवा तरुणांकडून फार अपे क्षा आहे , खां द्याला खांदा लाऊन बहुजन
समाजाला बरोबर घे ऊन जाऊ
$$$$$
या. नामदे व गायकवाड, गौरव दोंदे , निजाम, दशरथ गवळी, सु रेश शिं दे या सर्व जु न्या
जाणत्यांचा, पायाच्या दगडांचा उल्ले ख केलाच पाहिजे , वसं त पवार, के. बी. बनकर,
रमे श गाढे ही झुंजार मं डळी आहे त तसेच अधरवड गावचे नाशिक जिल्ह्यातील पँथर कवी कैलास
पगारे हेही या मेळाव्याला आले हे सारे आजचे ने तृत्व आहेत.
वसंत पवार
“आम्ही जिथे गे लो तिथे हिजडे , हिजडे काही करू शकत नाही म्हणून मी पँ थर
मध्ये काही वर्षापूर्वी आलो. सोशलवर्क म्हणजे ‘सोसल ते कर’ दुसऱ्या पक्षात जाणारे ,
पाटलाच्या हाकेने घाण उचलणारे खापरे ‘महार’ आहे त. कोण आहेत ते शोधू.
परिसंवादातील भाषणे :
या मेळाव्यात राखीवजागा व समाज परिवर्तन : ऐक्य या विषयावर परिसं वाद
सु तर् संचालन : रमे श इंगळे .
वि.सो. शिंदे :
समाज ऐक्य करण्यासाठी समाज परिवर्तन केलं पाहिजे त्याची गरज आहे .
वै चारीक परिवर्तन केले पाहिजे , त्यासाठी राखीव जागा पाहिजे . राखीव जागा विरोधात
दलिता दलिता मध्ये झगडे लावण्याचे प्रयत्न म्हणजे च राखीव जागांना विरोध.
राखीव जागांची तरतूद समजावून घे तली पाहिजे . ७ पै से आदीवासी, ४ पै से भटक्या
विमु क्तासाठी, १० पै से ओ.बी.सी. करीता = एकू ण ३४ मं डळ आयोगा मध्ये पहिल्या
क् रमांची तरतूद ६६ पै की १२ टक्के शहानव कुळ मराठा, राखीव जागांचा बॅकलॉग
भरला जात नाही, तो जातो कुठे ? दलितांची प्रगतीचा नवा नाही विचार पटत नाही,
त्याचा प्रत्यय, मराठवाडा विद्यापीठात नामां तरत आला, आर्थिक सवलती दिल्या म्हणजे
जात बदलत नाही, धं द्याने जात बदलत नाही. जो पर्यं त सामाजिक विषमता आहे
तोपर्यं त राखीवजागा राहील्या पाहीजे . राखीव जागांचा भरणा नाही होत त्याला शासन
जबाबदार आहे .सामाजिक परीवर्तन करण्यासाठी भारतीय दलित पँ थर आहे .
निकम :
राखीव जागा ते थे मागितल्या. ‘स्वतं तर् मतदार सं घ’ हेही माध्यम होते.
रे ल्वे कडे लक्ष घालावे . माणसाच्या उत्कर्षाच्या आड ये णारी हिं सा आपणास नको आहे .
53
$$$$$
सुरेश बारशिंग :
राखीव जागा बं द झाल्या पाहिजे त. जातीच्या नावावरच्या सवलती
बं द करा. ब्राह्मण, वै श्य, क्षत्रिय ह्या सवलती बं द करा. ये थे योग्य माहिती द्यावी
लागते . ब्राम्हणां च्या पं गती बसविणं ही सु द्धा सवलतच. वै द्यकीय क्षे तर् फार्मसिटी
मधले डॉक्टरांची प्रकरणं जरा जाहीर करा. डॉ. च्या शिक्षणाचा काय उपयोग, जर
समाजाला लु टण्याची सनद त्याला मिळते . रसे ल म्हणाला, असु रक्षितता जे थे ते थे बं ड.
अमे रिका, राशियातसु द्धा, दक्षिण आफ्रिकेत सु द्धा सवलती. गु णवान जर तु म्ही तर दे श
पारतं त्र्यात का गे ला? भ्रष्टाचार, महागाई, जातीयवाद ही या गु णवान (९९%)च्या
लोकां ची दे णगी. ज्या दिवशी स्वत:च्या पायावर उभे राह,ू त्या दिवशी पां गुळगाडा फेकू न
दे ऊ, कारण आम्हाला वे गळी माणसं तयार करायची आहे त, जी कारकू न, शिपाई नव्हे
तर अशी स्वाभिमानी बापाची ले करे उभा करायची आहेत (टाळ्या).
रमेश इंगळे :
समाज परिवर्तनासाठी: समाजातील अडचणी काय? सामाजिक ऐक्य व
त्यातून राष्ट् रीय ऐक्य हवं . शूदर् ाला अपं गत्व आलं . त्यांना विशे ष सं धी हवी.
सं विधानात या गोष्टी आहे त म्हणूनच परिवर्तनाला वाव आहे . बॅ कलॉग भरला जात
नाही. कारण प्रशासन त्यांचं. किती कुणबी, गरीब मराठा हा ६६% त ये त आहे . ८५%
टक्के मागासले ला दे श. मराठा माणसाला ज्ञानी करण्याचं काम आमचं ते आमचं
तत्वज्ञान. त्याचं दुःख, त्यांची व्यथा या मार्गाने दरू करू केंद्रापे क्षा राज्य मोठे असे
झाले तर दे शाला मारक ठरते. समाज परिवर्तनशिवाय राष्ट् रीय एकात्मता नाही
(टाळ्या).
पँथर्सचे कविसंमेलन :
$$$$$
जयप्रकाश डोळस :
54
१) धरण समस्या १७ गावे गे ली. १९७० साली भातशे ती १०००रु, माळरान ८००रु,
रब्बी(पानवड) १२०रु, भावली धरण, मु कणे धरण होऊ घातले य. सध्या तीच समस्या तोच
दर.
२) सरकारी योजना आमच्यापर्यन्त पोहचत नाहीत, बै ल व गाई, बी बीयाणे , इं जिन वगै रे
(तलाठी हे डक्वार्टरला राहतात का ?)
३) रोड : त्रंबकेश्वर म्ह्सु ली. रोजगार हमी कामे व्हावी.
४) जाने / डिसें मध्ये Interview झाल्या ते व्हा, ५० लोकांनी अर्ज केले .
55
$$$$$
वि.सो. शिं दे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के ले व तालु क्यातील जनतेच्या समस्या मांडल्या. या
सभेतील वक्ते पुढीलप्रमाणे होते : रवि शे जवळ, अशोक बहिरव, चं दर् कांत कसबे , प्रियकिर्ती
त्रिभु वन, सु रेश सावं त, सु रेश बारशिं ग, रामदास आठवले , राहुलन आं बावडे कर
भाषण:
मर्यादा पु रुषोतम रामने जन्म लिया है । अयोध्यानगरी का कृष्ण भी मथु रा आग्रा कें
नं गी नारी को उठाने वाले भगवान जनम लिया| उसी कां गर् े स के इं दिरा का जन्म भी
अलहाबाद में उनका पु त्र - राजीव लाडले बे टे भी उ-प्रदे श में | ऐसे महान प्रदे श का
आदमी जहाँ गं गा यमु ना बहती है | राम ते री गं गा मै ली – राजकपूर ने कहा | महाराष्ट् रके
लोग फटे कपड़े पहनके वहाँ आते है | इलाहाबाद की सं गमनगरी भी गं दी नगरी हो चु की
(हं सी) इसलिए की वे राज पर बै ठे थे ।
हमारे उत्तर प्रदे शों में डकैती हुयी / फुलन दे वी ने ठाकुरोंको गिनगीन कर मारा /
चमार को भगा दे ने को कहाँ ।... धार्मिकता के नाम पर गं दा करने वाला गं दा नगर... /
बाबासाहब जै सा भगवान होना नही (टाळ्या). अं गर् े जो कें पहले मु गलोंने उसके पहले
हिं दओू ंने कुशाणहन ू आर्य ने दिया. एकसात राज करने वाला हिं द,ू मु स्लिम... उस वक्त
चारपाई पर बै ठने का शिस्त था सत्ता का अधिकार नही था / राजा का चपराशी इस दे श
का ठाकू र था / ब्राम्हण था / हम नं गे थे / मु स्लिमोंका पु छो हमारी अवस्था क्या थी /
56
लाल किल्ला... मगर गरीबोंका क्या / हिं द ू हरिजन कहाँ , क्या कहाँ / नागरिकों की तबाह,
गु लाम करने वाले लोग / समता का स्वाभिमान का इतिहास एकमात्र डॉ.बाबासाहब
आं बेडकर है / मूर्ती से तु म्हारे समाज का नु कसान - तब तो नाम नहीं ले ते / ८ मई को
दलित अल्पसं ख्य परिषद हमारे यहा है |
भारतीय दलित पँ थर की आवाज दे श की आवाज़ है / काँ गर् े स के लोग पँ थर में
जा रहे है / महाराष्ट् र के बाहर जाके दे खो महार नही है / सं पर्ण
ू महार महाराष्ट् र के तरफ
नमक हराम नहीं है / अपने घरों मे बाबा की तसवीर है , गां धी को उठाया है / बाबू
जगजीवन बुरे है । गद्दार है । सभी मानने है भं गी, चमार स्वीकार करती है / दलितोंकी
आवाज है , एक आं दोलन
$$$$$
रामदास आठवले :
57
$$$$$
चिंतन – मंथन
(दि. १ मे १९८६)
58
निवडणु कीचा विचार केला. त्यामु ळे सामाजिक विचाराची पीछे हाट झाली आणि गरिबांचे
प्रश्न आहे त ते थेच व तसे च आ वासून उभे राहिले त. खऱ्या अर्थाने या तालु क्याला
ने ताच लाभला नाही. लोकांचे प्रश्न सोडवणारा त्यां च्याशी हितगु ज करणारा व त्यांना
आधार वाटणारा सामान्य कार्यकर्ताही या भागात मिळत नाही. लूट करणारे व स्वतःचे
खिसे भरणारे फक्त सहानु भत ू ी दाखवून बगल दे णारे च पोटबाबू मात्र बाजारात, यात्रेत,
समारं भात किंवा सरकारी कार्यक् रमात भरपूर दिसतील. पण बें बीच्या दे ठापासून
कळवळा वाटणारा व माणसातली अस्मिता जागृ त करून, त्याला ताठकण्यावर उभा
करणारा आं बेडकरी प्रेरणे चा ने ता आढळत नाही. आदिवासी, मराठा, आग्री, कानडी,
कुणबी, माळी अशा असं ख्य ८०% बहुजन समाजावर अं कुश ठे वून त्यांना एकत्रित
घे ऊन जाणारा खरा बहुजन ने ता दृष्टीस पडत नाही. आणि विविध समाज घटकाला
एखादा आपल्या ज्ञातीतला आदर्श लागतो, तसा आदर्श निर्माण होत नसल्याने
सामाजिक बां धिलकीचा ने ता वा कार्यकर्ता मिळत नाही. तोवर समाजाची घडी बदलणार
नाही. पॅ ं थरच्या या प्रयत्नांमुळे जर एखादा वफादार ने ता व कार्यकर्ता निर्माण झाला तर
सर्व तालु का पॅ ं थरला धन्यवाद दे ईल!
प्रश्नांची सोडवणूक करताना ते प्रश्न कार्यकर्त्याला ठाऊक असले पाहिजे त.
नु सते माहित असून उपयोग नाही तर त्याचा खोलवर अभ्यास ही हवा असतो. उत्तरे
भरपूर मिळतात पण खरे तर प्रश्नच मिळायला हवे त. म्हणजे ते कार्यकर्त्याला
सतावतात, त्यांचं डोकं चीनभीन करून सोडतात आणि त्यातूनच तो मार्ग काढण्याचा
प्रयत्न करतो. यासाठी तालु क्यातील प्रश्न धुं डाळायला हवे त. ये थील सामाजिकस्तर
अभ्यासायला हवाय. ये थील विविध पातळीची सं स्कृती पहायला हवी आहे . आपल्या
दे शाची स्थिती तीच नै सर्गिकरित्या अशी आहे की आपण बर्याचदा दुष्काळाच्या छाये त
असतो. त्याला इगतपु री तालु का अपवाद कसा असे ल. ये थे दुष्काळ असो नसो पाण्याचा
मात्र दुष्काळ सतत असतो. कोसो दरू जाऊन पाणी दर्या-खोर्यातून आणावे लागते .
घाण व दषि ू त पाणी सर्रास लोक अमृ त समजून तहाने ने व्याकुळ घरोघरी पितात.
जनावरांचे हाल होतात. लोक व्याधीग्रस्त होतात. सोयरीक जु ळताना सु द्धा लोक
आपली मु लगी काही गावी दे ताना धसका घे तात. अशावे ळी अने क गावे पाण्यावाचून
तडफडत असली तरी त्यांची गाऱ्हाणी वे शीवर टां गली जात नाहीत. टँ करने पाणी
पु रविण्याची शासनाची योजना असली तरी ह्या गावाकडे कोणीही पाहत नाही. आणि
हक्कांसाठी भांडायचं लोकांनाही बऱ्याच ठिकाणी माहीतच नाही. पॅ ं थरने ही हक्काची
जाणीव करून द्यायला हवी आहे , पॅ ं थर ती दे णार आहे .
पाण्याचे दुर्भिक्ष्य टाळावं यासाठी पाझर तलावाची भक्कम योजना आखण्यात
आली. काही ठिकाणी पाझरतलाव झाले ; पण प्रश्न सु टण्याऐवजी अजु नच वाढला
आहे . कारण ज्यांच्या जमिनी पाझर तलावात गे ल्या ते लोक अक्षरशः रडत आहे त.
कारण त्यांना नु कसान भरपाई अजूनही मिळाली नाही. ज्यांना थोडीशी मिळाली
त्यां च्या अज्ञानाचा फायदा घे ऊन काही कागदां वर आं गठे घे ऊन त्यांना अक्षरश:
फसवल्याचे लोक बोलत आहे त. या प्रकरणात
$$$$$
अत्यं त भयानक गोष्टही घडली आहे की, आदिवासी स्री ह्या तालु काच्या भूमिपु त्र
असून तो या पाझर तलावाच्या ठिकाणी भूमिहीन झाला आहे . पूर्वी जगण्याचं साधन
होतं , जमिनीचा एखादा तु कडा होता. आता सर्वत्र अं धारी अं धार आहे . इगतपु री
तालु क्यातील पाझरतलाव परिसरातील अशा हृदयद्रावक कथा आहे त. या कथांची
गाथा तयार करून व्यथा वे शीवर टां गण्यासाठी हा वाकले ला व दुबळा झाले ला, सरकारी
59
अधिकाऱ्याला घाबरले ला ठाकर, आदिवासी बां धव पॅ ं थरला जागृ त करावा लागे ल.
त्याला त्याच्या गु लामगिरीची जाणीव करून दे त दे त सं घशक्तीचं बळ त्याच्या पाठीशी
उभं करावं लागे ल.
रोजगारहमीची कामे ठिक ठिकाणी सु रू झाली आहे त. पण या ना त्या कारणाने
मजु रांची पिळवणूक सु रूच आहे . ‘शु क्रवारी’ पगाराची वाट पाहत आशाळभूत नजरे ने
बिचाऱ्या मजु रांनी पहावे आणि ते थे त्यां च्या ‘साहे ब’ म्हणून काम करणाऱ्यांने त्यांना
दातांचे पाणी गिळत बसायला लावले , भलतीसलती न पटणारी कारणे सां गन ू त्यांचा
पगार तीन तीन आठवड्यापर्यं त लांबवावा हे असं बिनधास्त घडत आले लं आहे . आजही
घडत आहे . बऱ्याचदा पाझर तलावांनी भूमिहीन केले ली कुटु ं बे आपल्या तान्हुल्या
बाळाला कडे वर घे ऊन राबताना दिसतात. सं ध्याकाळची भ्रां त पडले ल्या एखाद्या
घराला ३/४ घरे मिळू न मदत करताना दिसतात तर कधी उं बरे , करवं दे, आं ब्यावर, ठे चा
करून खाण्यावर ही भारत भूमीची ले करे कसे बसे जगताना दिसतात. एखाद्या रस्त्याचं
काम सु रू असलं की गावच्या श्रीमं त मं डळींचा दबदबा असल्यामु ळे त्यां च्या स्वतःच्या
डोक्यातील योजने पर् माणे रस्ते फिरवले जातात. सरकारी प्लॅ निंग (योजना) धाब्यावर
बसवून गरिबां च्या शे तातून रस्ते काढले जातात. पण श्रीमं तांचे शे त समोर आले तर
त्यां च्या बां धावरून रस्ता घे ऊन वळण घे ऊन पु ढे भिडविला जातो. ही माणसं वाकणारी
व्यवस्था, ज्या व्यवस्थे ने आमचे लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी खिशात टाकले
आहे त, त्यांना वाकवण्याचं काम पॅ ं थर ला करावं लागे ल.
अज्ञान नाहीसे करण्यासाठी ज्ञानाची पे रणी करावी लागे ल. ज्ञान ग्रंथात किंवा
कागदावर रे खाटलं गे लं आहे ते समजण्यासाठी लिहिता वाचता यायला हवे शिकवणे
जरुरीचे आहे . लिहिता वाचता ये ण्यासाठी शाळांची महत्त्वाची भूमिका असणार आहे .
पण तालु क्याच्या अने क ठिकाणच्या शाळा फक्त नावालाच उभ्या आहे त. जे थे शिक्षक
एक महिन्याने जाऊन सह्या मारून पगाराला हजर होतो. सबब असते की मु ले मिळत
नाही, मु ले शाळे त ये त नाही, पण त्यासाठी खास प्रयत्न करायची तयारी मात्र
आमच्या शिक्षकांत नसते . सरपं च पाटील व सामाजिक कार्यकर्ते यांचे वजन खर्ची करून
बालकां च्या पालकावर जर दडपण आणले तर बऱ्याचदा असे प्रश्न सु टू शकतात. मला
वाटतं या प्रकरणात पॅ ं थरने जातीने लक्ष घातले किंवा स्वतं त्र्य बालवाड्या, सं स्कार
केंद्रे, अं गणवाड्या, प्राथमिक शाळांची योजना राबवावी. इयत्ता दहावी पास वा
दहावीपर्यं त शिकले ल्या अने क ग्रामीण छावण्यातले पॅ ं थर ही कामे व्यवस्थित करू
शकतील.वस्तीगृ हापासून ‘स्वतं तर् शाळा’ ‘विविध सहकारी सं स्था’, ‘छोटे कारखाने ’
अशा कितीतरी योजना या औद्योगिक पट् ट्यात सु रू करता ये ण्यासारख्या आहे त.
$$$$$
60
होतं व त्यामु ळे प्रत्ये क सामाजिक जाणिवे चा तरुण या बाबीला विरोध करू पाहतो.
यातूनच सं घर्ष पे टतो. कधी तो व त्याचे बां धव मार खातात तर कधी गाववाल्यांना चोप
मिळतो. पु ढे कोर्टकचे ऱ्या होतात. हे तं टे, बखे डे तालु क्याच्या गावी चालतात. माणसांची
मनं कटू होतात. दुभंगली जातात. मन दुभंगणारा हा कार्यक् रम बं दच करावा किंवा
सं ताच्या चां गल्या उक्ती, अभं गावली सादर करव्यात असा आग्रह पॅ ं थरला धरावा
लागे ल. समाजजीवनाच्या पातळी बाहे र गे ल्यास कठोर झुंजही द्यावी लागे ल.
इगतपु री तालु क्यात मं डल आयोगात ये णाऱ्या जाती जमाती आहे त. अस्पृ श्य,
आदिवासी, बौद्ध, आग्री, गरीब मराठा, कानडी, सु तार, सोनार, न्हावी, लोहार अशा
अठरापगड जाती आलु तेदार बलु तेदार ही ये तात, पण ज्यां च्या साठी ह्या आयोगाची
मांडणी आहे , त्यांनाच तो कळले ला नाही. त्यांचे प्रबोधन होणे गरजे चे आहे . या मं डल
आयोगात ये णाऱ्या जाती कुठल्यातरी प्रांतवादी, सं कुचित जातियवादी सं घटने त काम
करण्याकडे प्रवृ त्व होतात व नाहक आपली डोकी सटकवून घे तात. राखीव जागांना
विरोध करण्यापर्यं त जातात. बाबासाहे बांचा पु तळा पाडण्याचा कुटील डाव रचतात
स्वतः ही अत्यं त घाणे रडी परं परा ते पु ढे चालवतात. त्यांना आं बेडकरी विचारांची दिक्षा
दिली पाहिजे .
आपण नक्की कोणासाठी लढतो व कोणाच्या विरोधात लढतो. आपल्या
खां द्यावरून बं दुका झाडण्याचे काम कोण करतो. याची जाणीव या यु वकांना करून
द्यायला हवी. हे महत्त्वाचे कार्य कार्यक् रमाच्या माध्यमातून पँथर ला करावे लागे ल.
पँ थर मधल्या तरुणांना हे समजले आहे म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक करावे . इतर
आमचा दुस्वास करतात. अं गावर कपडे नसले ला ठाकर आदिवासी आमच्याशी
जातीभे दाने वागतो, असे म्हणून त्यां च्यापासून पळू न जाणे योग्य नाही. आज ना उद्या
त्यांचे अज्ञान दरू होईलच. मग बाजाराच्या गावी आदिवासी स्रीची होणारी विटं बना
किंवा बोरली व इतर ठिकाणची, यात्रेच्या ठिकाणची कुचं बणा मिटायला फार काळ
लागे ल काय?
$$$$$
परिस्थिती अशी आहे की डॉ. बाबासाहे ब आं बेडकर वस्तीगृ हात शिकू न गे लेल्या,
आदिवासी तरुणांना नं तर एकत्र करू शकेल, सामाजिक दृष्टीने त्यांना लढ्यात ओढू
शकेल. इयत्ता दहावीपर्यं त शिक्षण झाले ले ठाकर आदिवासी समाजाचे जवळ-जवळ
शं भरच्यावर तरुण तालु काभर मिळतील त्यांना एकत्र आणले पाहिजे .
इगतपूरी तालु क्याला तसे एकमु खी सामाजिक ने तृत्व नसले तरी सु रेश सावं त, वि.
सो. शिंदे, के.बी बनकर, वसं त पवार, दिनकर पवार, रमे श गाढे , अशोक गां गुर्डे, बाळ गां गुर्डे,
अरुण पठारे , भं डागे , जाधव, दे हाडे , डोळस, आदिवासी शहरी पातळीवरच्या कार्यकर्त्या
सोबत बबन शिं दे, रमे श रोकडे , अशोक रूपवटे , उबाळे , के.बी. पं डित, अरुण दोंदे ,
नारायण जगताप,(साकुर) हिरामण शिं दे, आदिवासी ग्रामीण पातळीवरचे कार्यकर्ते ही
झटत आहे त. गरीब मराठा समाजाच्या कामापासून सर्वांची कामे ते करीत आहे त व
त्यामु ळे भावी काळात पँ थर चळवळीला तालु क्यात नक्की भवितव्य आहे. ‘गाव ते थे
पँ थर’ ही घोषणा त्यामु ळे क्वचितच प्रत्यक्षात ये ऊ शकेल अशी खात्री वाटल्याने
नवनिर्वाचित कार्य करणिला हार्दिक शु भेच्छा मी व्यक्त करतो. ने ते रामदास आठवले ,
राहुल आं बेडकर, रमे श इं गळे , सु रेश बारशिं ग, प्रियकीर्ती त्रिभु वन यां च्या साक्षीने
61
दिवसभराच्या पँ थर मे ळाव्यात जे ठराव सं मत करण्यात आले ते लक्षात घे तले तर या
तालु क्याच्या इतिहासातील महत्त्वाच्या मु द्द्यांनी कोरले जाणारे ठराव असे च म्हणावे
लागे ल. ठराव असे ...
सतरा जिल्ह्यात पँ थर, आम्हाला पद नको. भीमशक्ती व शिवशक्ती एकत्र आली
तर चां गले . पण प्रयत्न काय? पण हे च अत्याचार करतायत. आता अन्याय सहन
करणार नाही, हे ठरवू व चळवळ गतिशील करू.
ठराव
ठराव क् र.१:
दे शाची राष्ट् रीय एकात्मता व अखं डता कायम राहावी, या भूमिकेशी
भारतीय दलित पॅ ं थर सहमत असून पं जाब मध्ये नु कते च स्वतं त्र्य खलीस्तानांची केले ली
घोषणा दे शाच्या एकात्मते ला व अखं डते ला तडा जाणारी आहे . त्यां च्या भा.द.पँ. या
मे ळाव्याद्वारे तीव्र निषे ध करीत आहे .
ठराव क् र.२ :
सं सदीय लोकशाहीची बूज राखण्यासाठी विधिमं डळाच्या दोन्ही
सभागृ हाने एक मताने सं मत केले ल्या मराठवाडा विद्यापीठ नामां तर ठरावाची त्वरित
अं मलबजावणी करावी.
$$$$$
ठराव क् र. ३ :
राज्यांमधील अवर्षणामु ळे, महाराष्ट् रामध्ये पाण्याची तीव्र टं चाई,
भासत असून सर्वत्र दुष्काळाची दाट छटा पसरली आहे .
ठराव क् र.४ :
इगतपु री तालु क्यामध्ये रोजगार हमीवर काम करणाऱ्या मजु रांना
मं जुरी दे ण्यास शासकीय अधिकारी हे तू पु रस्कर दिरं गाई करीत असून अशा
अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी व मजु रांना नियमित वे तन मिळावे .
ठराव क् र.५:
इगतपु री तालु क्यातील धरणाखाली गे लेल्या आदिवासी, दलितां च्या
तसे च धरणग्रस्तां च्या जमिनीचा योग्य मोबदला धरणग्रस्तांना मिळत नसून, त्याची
शासकीय पातळीवर त्वरित चौकशी व्हावी व धरणग्रस्तांना त्यां च्या जमिनीचा
मोबदला त्वरित मिळावा, तसे च त्यां च्या मु लांना शासकीय से वेमध्ये प्राधान्य मिळावे
या शासनाच्या निर्णयाचे काटे कोर पालन करावे .
ठराव क् र.६:
आदिवासीच्या जमिनी जमीनदाराकडे कर्जापोटी गहाण असतात, त्या
जमिनी त्वरित त्यां च्या ताब्यात दे ण्यात याव्यात.
62
ठराव क् र.७ :
आदिवासी समाज व आर्थिकस्थिती सु धारण्यासाठी त्यां च्या मु लांना
शिक्षण दे णे आवश्यक आहे , आदिवासींना सक्तीचे शिक्षण शासनाने लागू करावे .
ठराव क् र.८:
ये थे सु रू झाले ल्या औद्योगिक विभागातील कारखान्यात इगतपु री
आदिवासी बे रोजगारांना प्राधान्य दे ण्यात यावे .
ठराव क् र.९ :
दिनांक १४/६/८३ रोजी इगतपु री ये थे डॉ. बाबासाहे ब आं बेडकरांचा
पु तळ्याची विटं बना झाली अद्याप आरोपी पकडले नाहीत तरी या प्रकरणाची गु प्तचर
खात्यामार्फ त चौकशी व्हावी.
ठराव क् र.१०:
रोजगार हमी योजना, आदिवासी विकास महामं डळ, म. फुले विकास
महामं डळ व बँ केचे अधिकारी व इतर शासकीय कार्यालयामार्फ त राबविणाऱ्या मागास
वर्गीय विकासाच्या योजना राबविण्याचे आदे श काटे कोरपणे पाळावे .
$$$$$
ठराव क् र. ११:
पाणीटं चाई असले ल्या गावांना पाणीपु रवठा व्हावा. उदा. शे नवड बु णा,
फां गुळ गव्हाण
ठराव क् र. १२:
पाणी वाटपातील भे दभाव नष्ट करावा. उदा. तळे गाव
ठराव क् र.१३ :
हरिनाम सप्ताहात होणाऱ्या दलितां च्या विटं बने ला पायबं द घालावा.
ठराव क् र.१४ :
‘हरिजन सप्ताह’ दलित वस्तीत साजरा करू नये . अथवा
बाबासाहे बां च्या विचारावर हा सप्ताह सु रु करावा.
ठराव क् र.१५:
इगतपु रीच्या मार्के टच्या हॉलला ‘आं बेडकर हॉल’ नाव द्यायचे जाहीर
झाले त्याची अं मलबजावणी त्वरित करावी.
ठराव क् र.१६:
उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला त्वरित मिळावा.
ठराव क् र.१७:
63
रोजगार हमीचे रस्ते श्रीमं तां च्या शे ताच्या बां धावरून न ने ता
योजने पर् माणे सरळच न्यावे त. उदा.शेनवड बुद्रुक.
ठराव क् र.१८:
काही ठिकाणी रस्ते झाले तरी रस्ते दुरुस्ती किंवा बससे वा नाही याचा
त्वरित विचार व्हावा. उदा फां गुळगव्हाण, वाळविहीर
ठराव क् र.१९:
सी.टी. सर्वे ८२४/अ ही पडीक जमीन अतिक् रमित गृ ह धारकां च्या नावे
करून द्यावी.
ठराव क् र.२०:
मं डल आयोगाची अं मलबजावणी झालीच पाहिजे .
$$$$$
‘गाव ते थे पॅ ं थर छावणी’ अशी घोषणा पॅ ं थरने १ मे १९८६ रोजी झाले ल्या तालु का
अधिवे शनात केली त्या प्रसं गी माननीय सु रेश सावं त, विठ् ठल शिं दे, चिं तामण जाधव,
प्रकाश लोखं डे, भीमसे न चं दर् मोरे , मधु कर खं डीझोड, रमे श शे जवळ, भीमराव जगताप,
जगन जगताप, पोपट जगताप, लहानु जगताप, बाळू गां गुर्डे, अशोक पाटील, दिनकर
दे हाडे , धरमदास पु नाजी, मु रलीधर गाडे , यशवं त घाटे साव, भिकाजी पवार, भास्करराव
रोकडे , यु वराज रोकडे , कोंडाजी पगारे , चं दर पगारे , काशिनाथ हरी शिं दे, नानाजी
निं बाजी झनकर, पांडुरं ग झनकर, दिनकर झनकर होते . ठरल्याप्रमाणे इगतपु री
तालु क्याच्या दौऱ्याचा आराखडा तयार करण्यात आला. रविवार दि. १४ ऑक्टोबर
१९७९ रोजी प्रत्ये क गावाला अं धारात ठे चकाळत भे ट दे ऊन लोकांची मते , त्यां च्या
समस्या जाणून घे ण्याचा प्रारं भ झाला. माहिती मिळवून घे ताना एकू ण लोकसं ख्या
त्यांचे जातीनिहाय प्रमाण, शाळा, विहिरी, मं दिर प्रवे श, यु वकांना शिक्षण, राजकीय
पक्ष, सामाजिक सं घटना, भारूड, भजन, हरिनाम सप्ताह, पं चशील मिश्रण पाठ
असले ल्यांची सं ख्या लग्नविधी करणारे लोक, जातीय सं घर्षाची प्रकरणे किती ? पाटील
सरपं चांची माहिती मराठवाड्याविषयी, नाशिक जिल्ह्याविषयी किती जणांना माहिती
आहे . गावात वर्तमानपत्र ये तात का ? जमिनींची प्रकरणे , बँ कांची, महात्मा फुले
महामं डळाची कर्जव्यवसाय किती, भाऊबं दकीचावाद, निरं कारी बाबांची सं गत, विविध
प्रकारचे दाखले मिळवताना ये णाऱ्या अडचणी, भ्रष्टाचार इत्यादी गोष्टींची माहिती
मिळविण्याचे ठरले . दौंडत उं बरकोण, खं बाळे पासून धामणी पर्यं तचा एक पट् टा पूर्ण
केला टाकेद पर्यं त दुसरा टक्का आधारवड, खे ड, वासाळी, बे लगाव, भरविर, धामणगाव,
कोपरगाव, बे लगाव, तराळे , काकुस्ते , मुं ढेगाव, पाडळी, तळोघ, तळोशी, आं बेवाडी,
कावनई, मु कणे , त्रंबकेश्वर, नांदगाव, पिं प्रिसदो, इं दोरे , आं बेवाडी, मानवे ढे, टाके,
शे नवड, बोरली, भावली, फां गुळगाव, तळे गाव, चिं चले खै रे अशा जवळपास १२०
64
गावांना भे टी दिल्या, छावण्यांचे फलक लावले . कार्यकारीणी तयार केल्या अने क गावात
सु धारणांचा अभाव दिसला. सामाजिक दृष्ट्या ‘भरवीर’ या गावी बौद्ध आणि मराठा
समाजात ‘झनकर’ हे एकच आडनाव आढळले . आदिवासी महादे व कोळी समाजात
शिक्षणाचे प्रमाण वाढत असल्यासारखे दिसते . अने क मु ले इगतपु रीच्या डॉ. बाबासाहे ब
आं बेडकर वस्तीगृ हात शिक्षण घे ताना आढळली. जवळपास सर्वच बौद्ध समाजातील
शे तकरी कामगार आणि विद्यार्थी क् रां तीचा अर्थ समजून घे ण्याचा प्रयत्न करीत आहे त,
असे ही दिसले .
$$$$$
दि. २८ नोव्हें १९८५ रोजी मुं बई मराठी ग्रंथसं गर् हालयात प्रा. अरुण कांबळे
यां च्या अध्यक्षते खाली 'सनद'चा प्रकाशन सोहळा साजरा झाला. प्रकाशक म्हणून
मुं बई सकाळचे सं पादक आत्माराम सावं त हे होते . मोतीराम कटारे यां च्या
सूतर् सं चालनानं तर सं पादक एकनाथ जाधव यांनी प्रास्ताविक केले . आपली भूमिका
मांडतांना ते म्हणाले , "पाहुणे बोलवतांना आम्हाला 'नवाकाळ' चे सं पादक खाडीलकर
साहे बांकडून विशे ष वाईट अनु भव आला. काहीजणांकडून मनोबल खच्चीकरण करण्याचा
प्रयत्न झाला, पण हा आमचा प्रयत्न अल्पस्वल्प नाही तर अतिशय प्रगल्भ असा
आहे . आम्ही नवखे असलो तरी ज्ये ष्ठ व श्रेष्ठ मं डळींनी आम्हाला उणीवा दाखवाव्यात.
अनु भव सां गावे त."
आपल्या प्रकाशकीय भाषणात आत्माराम सावं त म्हणाले की, “प्रा.अरुण
कांबळेंनी सां गीतल्या प्रमाणे दलित समाजाचा आवाज उठविण्यासाठी हे साप्ताहिक
सु रु झाले याची मला कल्पना आहे . मी या व्यवसायात २६ वर्षे आहे पण मला हे धाडस
झाले नाही. अनु भव असा आहे की, नवीन व्यक्तीचं धाडस स्थिर होईपर्यं त अने क
अडचणी ये तात. यात व्यवहार आहे . विचाराची गोष्ट असली तरी तिलाही जमाखर्च
आहे . एखाद्या विचाराची बां धिलकी मानणारी वृ त्तपत्रे फार काळ टिकत नाहीत, हा
इतिहास आहे . शून्यातून निर्मिती हा भाग वे गळा, पण या गर्दीत, स्पर्धेत मला लहान
व्यक्तींची भीती वाटते . माझ्या शु भेच्छा आहे त. पण ये णाऱ्या सं कटाची ही मला चाहलू
लागते . व्यवहारी बाजू कमी पडणे बरोबर नाही. हे पत्रक दलितां च्या कामाचे , सं वादाचे
आशा स्थान ठरे ल, अशी मी आशा बाळगतो. मित्रहो ! गतिरोधकाची जाणीव ठे वा.
तु म्ही शिरावर ओझं घे ऊन निघालात. बऱ्या वाईटां शी सं बंध आला तरी कोणालाही न
दुखावता ठिकाणावर पोहचा. 'ही 'सनद' दलिताची उद्धारक, दलितांचा उद्गार ठरो!
सं पादक यांना मनोबल लाभो ही अपे क्षा व्यक्त करून सहकार्याचे त्यांनी अभिवचन दिले .”
प्रमु ख पाहुणे म्हणून नवशक्तीचे सह सं पादक म्हणाले , "मित्रहो मनोबल हारु
नका. आज आपण माणूसकीची सनद द्यायला जमलो आहोत. आज एका वे गळ्या
यु गाची पहाट झाली आहे . हे तर क् रां तीपर्व आहे . भूतकाळाचा व वर्तमान काळाचा
65
विचार करुन बं दक ू ा पे रल्या पाहिजे त. ज्याला ज्याला स्वातं त्र्याची आस लागली आहे ,
तो तो दलित आहे . 'सनद'च्या धाडसाचे सर्व थरांतन ू स्वागत झाले पाहिजे . झाडाचे ,
पाखराचे इमान आहे , पण माणसे इमान विकतात म्हणून ती मातीमोल होतात. चं दर् ाच्या
कले नं हे 'सनद' वाढणार आहे . कारण ये थे पूर्वग्रह नाही" आपल्या भाषणात वर्धापन
दिनाची अपे क्षा त्यांनी व्यक्त केली.
$$$$$
$$$$$
अध्यक्षां च्या भाषणानं तर कार्यकारी सं पादक वि. सो. शिं दे यांनी समारोप केला.
'ठिणगी', 'बं ड, 'जयभीम', 'आम्रपाली', 'दलित नारा' चा सं दर्भ दे ऊन व वे ळेवर मार्मिक
66
विवे चन करुन 'सनद'च्या सदरांची मर्यादा स्पष्ट केली. वाचकां च्या पाठींब्याची
विनम्रपणे अपे क्षा करून ते म्हणाले की, "सर्व समाज घटकांना बोलतं करायचा आमचा
विचार आहे . हे पॅ थरचे मु खपत्र नाही, कोणत्याही पक्ष सं घटने चे पत्र नाही, तर
आं बेडकरी विचाराचे मु खपत्र आहे ' (टाळ्या) शे वटी पु ष्प गु च्छ दे ऊन अध्यक्षां च्या
परवानगीने कार्यक् रमाचा समारोप झाला. या कार्यक् रमात मुं बईचे विशे ष प्रतिनिधी
मोतीराम कटारे यांनी कठोर परिश्रम घे तले .
या कार्यक् रमाला बरीच साहित्यिक, कवी मं डळी हजर होती. सभागृ ह गच्च
भरले ले होते .
जाहीर निमंतर् ण
प्रमु ख पाहुणे :
विश्वनाथ बावळे (सं पादक, शिवने र)
परे न जां भळे (सहसं पादक, नवशक्ति)
चं दर् शे खर वाघ (उपसं पादक, लोकसत्ता)
अप्पासाहे ब रणपीसे (अध्यक्ष, महाराष्ट् र बौद्ध साहित्य
परिषद)
आपले ,
एकनाथ जाधव - सं पादक
विठ् ठल शिं दे- कार्यकारी सं पादक.
मोतीराम कटारे
सं योजक व विशे ष प्रतिनिधी, मुं बई
$$$$$
67
योजनाबद्धता एक आवश्यक अं ग मानले जाते . कार्यकर्त्याला सामाजिक व्यवस्थे चा
परिचय करून घ्यावा लागतो.
उपे क्षित वर्गासाठी कार्य करणारा कार्यकर्ता सर्वच पातळ्यां वर सबल होण्याची
गरज असते . त्याच्या सबलते चा प्रथम भाग वै चारिक, मानसिक सामर्थ्याचा असतो. ही
सबलता न आली तर अने क धोके सं भवतात. व्यक्तीगत स्वरुपात परं परागत भयगं डातून
त्याच्या मनात न्यूनगं ड निर्माण होऊ शकतो. परिणामी तडजोडवादी आणि दुबळी,
बोटचे पी कधीकधी स्वार्थी लाचार भूमिका तो बिनदिक्कत अं गिकारु लागतो. तर कधी
भाषणबाजीच्या आहारी गे लेला अपरिपक्क कार्यकर्ता, 'पु ढारी' अभिनिवे शात वावरू
लागतो. त्याच्या ह्या अहं गंडी वर्तनातून समाजाला निष्क्रियता व तु सड्यावृ त्तीचा
दणका बसण्याची भीती असते . ने तेगिरी अं गात घु सल्यावर ज्यां च्या जीवावर, धर्मावर,
क्षे तर् कामावर त्याची ने तेगिरी पोसले ली असते , त्यांनाही तो विसरतो. दुय्यम वागणूक
दे तो.
सदर परिस्थिती टाळावी व आत्पोरोक्षणात्मक वाटचालीचे कार्यकर्त्यांचे भान सु टू
नये म्हणून ठाणे जिल्हा पातळीवरील सामाजिक कार्यकर्त्यांचे शै क्षणिक प्रशिक्षण
शिबिर उल्हासनगर ये थे आयोजित करण्यात आले .२४ व २५ सप्टें बर १९८८ रोजी
झाले ल्या प्रमु ख कार्यकत्यां च्या शिबिरात, एकू ण बारा विषयां वर चर्चात्मक परिसं वाद
झाले . शिबिरातील विषय व प्रदिपाद्य मु द्दे यांची त्रोटक माहिती पाहिल्यास
जिल्हयातील एका कार्यशाळे ची गरज या शिबिराने अल्पशी का होईना पूर्ण केल्याचे
दिसून ये ईल.
दोन दिवसांचे हे मनोमिलन स्वरुपाचे शिबिर व्यापकते चे प्रतिकच होते . शै क्षणिक
सं दर्भ लाभले ल्या शिबिराचे उद्घाटन आर. के. तलरे जा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.
मॅ थ्यूसर यांनी केले . मार्गदर्शन करताना त्यांनी म्हटले , "कार्यकर्ता हा समाज सं घटक
असतो. आजच्या काळाचं भान ठे वणारा कार्यकर्ता प्रगतशील, पु रोगामी असू शकतो.
पु राण काळाच्या गोष्टी एकते च्या मार्गात अडथळाच निर्माण करू शकतात. जो अशक्त
असतो तो दलित, हा दलित सर्वत्र सापडे ल. म्हणून सर्व उपे क्षितांना एकत्र करायला
हवे . त्यासाठी पिळवणूक करणाऱ्या स्थितीशील धर्मांचे पु ररुज्जीवन करायची गरज
नाही. समानता, एकते साठी प्रत्यक्ष कृतीचीच गरज आहे . ह्या तु कडे वजा समाजातून
प्रतिक् रीयावाद्यांचे प्रस्थ हटवायला पाहिजे , तरच
$$$$$
68
सां स्कृतिक बदलात सापडतो त्या स्त्री मु क्तीच्या लढ्यात दलित स्रीची जागृ तीचं
प्रमु ख मानायला हवी, असा विचार प्रकर्षाने मांडला गे ला.
मानसिक दिलासा
कोणत्या पायऱ्यांनी मागता ये ईल, या कायदे संबंधी विषयाची रुक्षता टाळू न रं ग भरीत
अॅड.. गोपाल भगत व अॅड. बी.जी. बनसोडे यांनी माहिती करून दिली. प्रत्यक्ष
जन आं दोलनात भाग घे णाऱ्या व दै नंदिन प्रश्न सोडविणाऱ्या कार्यकर्त्याला मूलभूत
अडचणी ये तात. त्यांची कलमांसह माहिती पु रवून पोलिस न्यायालये , नागरिक, स्रीया
यां च्या अधिकार कर्तव्यांची मांडणी, करून एक प्रदीर्घ वै चारिक घु सळण कार्यकर्त्यात
झाली. कायदा हा अत्यं त जिव्हाळ्याचा विषय असल्याने सर्वच शिबिरार्थी हिरीरीने
चर्चेत उतरले , हे या परिसं वादाचे विशे ष होय.
व्यक्ती कशी घडत जाते ? तिचा विकास कसा होतो? या मूलगामी प्रश्नांची चर्चा
घडवून आणण्यामागे एक सु प्त उद्दे श होता तो कार्यकर्त्यांना ने तृत्व गु णांपर्यं त
पोहचविण्याचा. बी.के. सीतासावंत या शिक्षण क्षे तर् ातील अनु भवी कार्यकर्त्याने
व्यक्तिमत्व विकासाचे टप्पे नमूद करून ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्ले षण,
मूल्यमापनापर्यं तची वाटचाल करावयाचे दिग्दर्शन केले . एकाअर्थी आत्मपरिक्षणात्मक
व्याख्यान होते . आपण कोणत्या स्तरावर आहोत, याची जाणीव होणे म्हणजे आत्मभान
घे णे, आवश्यक असते . व्यक्तींनी थोर पु रुषां च्या चरित्राचा व्यासं ग वाढवून आपले
व्यक्तिमत्व तपसण्याचा पोक्त सल्ला हा या विषयातला अं तिम टप्पा ठरला.
कार्यकर्त्यांना 'दलित' या सं ज्ञेत ये णाऱ्या उपे क्षितांची केवळ तोंड ओळखच
नाहीतर सं पर्ण ू माहिती असावयास हवी. भटक्या विमु क्तांचे, मोची समाजाचे ,
अल्पसं ख्यांकांचे आदिवासींचे प्रश्न सर्वांना भे डसावीत आहे त. प्रा. वि.सो. शिंदे त्यांची
ओळख करून दे ण्यासाठी स्वतः आं बेडकरी प्रेरणे चे आदिवासी कवी कार्यकर्ते भुजंग
मेश्राम आल्याने विषयाला वजन प्राप्त झाले .
69
ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना ग्रामीण रचना तर शहरी भागातील
कार्यकर्त्यांना नागरी रचना कळणे महत्त्वाचे असते . "नगरपालिका रचना व कार्यपद्धती'
जाणून घे णे त्यादृष्टीने फायदे शीर ठरते . नगरसे वक महादे व सोनावणे व पी. एस. रोकडे
यांनी शासकीय, अशासकीय समित्या वे गवे गळ्या शाखा व निवडणूक सं दर्भात माहिती
दिली. अधिकारी वर्ग व राजकीय डावपे च खे ळणारे , बे रकी लोक जमीन बाबी पासून
झोपडपट् टी सु विधांपर्यं त कसे पद्धतशीर उपे क्षित ठे वू शकतात. याचे मार्मिक विश्ले षण
केल्याने कार्यकर्त्याला प्रत्ये क प्रश्नावर किती सखोलपणे पाहायला लागे ल ते स्पष्ट
झाले .
70
एकत्रित विचार केल्यास एक जाहीर नामा आं बेडकरी समाजाचा तयार होऊ शकतो.
आज पु न्हा एकदा तसा प्रयत्न आवश्यक वाटल्याने 'आं बेडकरी समाजाचा जाहीरनामा'
सु रेश सावं त व रमे श इंगळे यांनी मांडला. समाज परिवर्तनाचा सम्यकमार्ग अवलं बन ू
बे कार, शे तमजूर, मजूर, अन्यमागास, अल्पसं ख्यांक, दलितां च्या शोषणामु क्तीतून
जाती-वर्ग विहीन राज्य आणण्याचा विचार त्यांनी मांडला, प्रत्यक्ष जाहीरनामा त्यांनी
मांडला नाही, तरी त्याची पार्श्वभूमी मात्र तयार केली. या पार्श्वभूमीतून भावी
जाहीरनामा ये ऊ शकेल.
$$$$$
$$$$$
71
प्रति
मा. अध्यक्ष
भारतीय दलित पॅ ं थर,
महाराष्ट् र राज्य.
सविनय जयभीम.
संघटनात्मक कार्य :
अन्याय प्रतिकार :
72
विधायकता:
जाधव, अनं त जाधव, काथोड जाधव, दिलीप चं दने इत्यादी कार्यकर्ते अहोरात्र झटत
होते . कामगार प्रश्न उल्हासनगर मधील लहान उद्योग धं द्यातील कामगारां वरील
अन्याय अत्याचारा विरुद्ध आवाज उठवून त्यांचे प्रश्न सोडवित असता, बिस्कीट
कामगारां च्या यु नियन बाबत प्रयत्नशील आहोत ठाणे , कल्याण, भिवं डी, उल्हासनगर
इत्यादी महानगरपालिका मधील कामगारांचे काही प्रश्न सोडवून सहानु भत ू ी निर्माण
केली आहे . उल्हासनगर मधील कामगार शक्ती हमालांची यु नियन हाताळली आहे .
विद्यार्थी चळवळ विद्यार्थ्यांना जागृ त करून विद्यार्थ्यां च्या प्रश्नावर मोर्चे काढले
आहे त. विद्यार्थी सं सद या नावाने आर.के. तलरे जा कॉले ज, चांदीबाई कॉले ज
उल्हासनगर ये थे कामकाज सु रू आहे . आज पर्यं त लहान-सहान उद्योग धं दे काढण्यात
मदत करून ‘महात्मा फुले ’ महामं डळ योजना राबवून ५००० च्यावर लोकांना कर्ज
मिळवून दिले . ५ मे टॅडोर काढून साठ रिक्षा काढण्याचा प्रयत्नात आहोत. नामांतर
आं दोलनात सक्रिय भाग घे ऊन जिल्ह्यातून प्रत्ये क तालु का, जिल्हा वार हजारो मोर्चे
काढून, हजारो निवे दने दिली आहे त. मं डल आयोगाच्या प्रश्नावर प्रचार पत्रके
काढली. नामांतर मं डळ आयोगाच्या तालु का वार परिषदा होऊन ओबीसींना जागृ त
73
करण्यात यश मिळाले . दिनांक ६ डिसें बर १९७९ औरं गाबाद ये थील आं दोलनात भाग
घे ण्यासाठी पाच हजारावर पँ थर्स जिल्ह्यातून गे ले होते ६ सप्टें बर ते १३ सप्टें बर ८३ च्या
लढ्यात दररोज हजारो रुपयांत सामील झाले होते . प्रत्ये क लढा यशस्वी करण्यात ठाणे
जिल्हा आघाडीवर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे . दिले ल्या आदे शानु सार इसवी
सन ७९ च्या लोकसभा व १९८२ च्या पोटनिवडणु कीत अनु क्रमे काँ गर् े स व डॉक्टर दत्ता
सामं त यांना पाठिं बा दे ऊन प्रचार कार्यात भाग घे तला. ये थे भरले ल्या अधिवे शनासाठी
शे कडो कार्यकर्त्यांनी राबून जिल्ह्यामध्ये वातावरण अधिवे शन करून यशस्वी करण्यास
तन-मन-धनाने मदत केली आहे आजपर्यं तच्या पँ थर कार्याचा अनु भवावरून आम्ही
जिल्हा कार्यकारणी खालील ठराव अधिवे शनात विचारार्थ पाठवीत आहोत.
ठराव क् रमांक १ :
ठराव क् रमांक २ :
सं घटनात्मक बां धणी करावी. सं घटने ची घटना तयार करावी. पूर्णवे ळ काम
करणाऱ्या कार्यकर्त्यांना महिना हजार रुपये द्यावे त्यां च्या कामाचा आढावा घ्यावा.
कार्यकर्त्यां च्या मध्ये ठरवाव्यात. या कार्यकर्त्यांची योग्य दखल घ्यावी.
ठराव क् रमांक ३ :
ठराव क् रमांक ४ :
74
ठराव क् रमांक ५ :
ठराव क् रमांक ६ :
रचनात्मक कार्यक् रमाची रूपरेषा ठरवावी वरील निवे दनाचा विचार व्हावा ठाणे
जिल्हा या अधिवे शनात तन-मन-धनाने सामील होत आहे . हार्दिक शु भेच्छा!
आपला विनित
भारतीय दलित पँ थर, ठाणे – जिल्हा.
सर्व कार्यकारीणी सदस्य
आणि
बाळभोईर प्रा. विठ्ठल शिंदे,
(अध्यक्ष), (सरचिटणीस)
$$$$$
75
नाही. अशा प्रकारची विधाने आठवले करीत, अक्षरश: बे भान सु टले होते . आठवले अशी
विधाने फक्त स्वत:ला वाचवण्यासाठी व आपण लढतो आहोत, लाचार झालो नाही, असे
दाखविण्यासाठी करताहे त. ही गोष्ट सु ज्ञ जनते च्या लक्षात केव्हाच आली होती. वस्तूत:
नामांतराचा प्रश्न सोडवून घे णे, ही त्यांची सामाजिक जबाबदारी होती. समाजातला
लढाऊ, तळागाळातला वर्ग त्यां च्याकडे होता. त्या आठवलें नी मात्र या प्रश्नावर
दादागिरी व फसवे गिरीच केली. आठवले नामांतर करू शकत नाही, हे गृ हीत धरून लोक
नव्या आं दोलनाची वाट पाहत होते . मनात असो नसो पण मं तर् ी झाल्यावर जो विश्वास
आठवलें वर टाकला होता, त्याला तडा गे ला होता!
प्रत्ये क गट आपापल्या पद्धतीने व सवडीने नामांतर प्रश्नांकडे पाहत होता.
आठवले गटाने सर्व आं दोलने मोडीत काढून बसायचे ठरवले होते . प्रा. कवाडें ची दलित
मु क्ती से ना व रिप. पक्ष, २७ जु लै १९७८ चा वर्धापन दिन साजरा करावा. तसा हा प्रश्न
हाताळीत होता.
$$$$$
१५ ऑगस्ट १९९३ रोजी आमदार उपें द्र शें डे यांनी मुं बईत ‘सम्राट हॉटे ल’ समोर
आमरण उपोषण सु रू केले . नामांतर आं दोलनाच्या दुसऱ्या टप्प्यातील आं दोलनाला
याच उपोषणाने खरी सु रुवात झाली. उपोषण दि. २२. ८. ९३ रोजी म्हणजे ८ दिवसांनी
मागे घे ण्यात आले . मा. श्याम गायकवाड व मी काही कार्यकर्त्यांसोबत त्यां च्या
भे टीसाठी गे लो. आम्ही खूपच उशिरा त्यांना भे टलो, कारण मु रबाड तालु क्यातील
दलित-आदिवासींवरील अन्याय अत्याचाराच्या निषे धार्थ तहसीलदार व पोलीस
कार्यालयावर दि. २०.८.९३ रोजी काढले ल्या मोर्चा च्या तयारीत आम्ही गु ं तलो होतो.
प्रकृती खालावल्यामु ळे आमदार शें डे ना ‘सें ट जॉर्जेस’ रुग्णालय; मुं बई ये थे
जबरदस्तीने भरती करण्यात आले होते . शें डें चे उपोषण मागे घे ण्यात व मुं बईतील
जनते त जागृ ती घडू न दे ण्यात दलित सं घटनातीलच काही नेते व पु रोगामी आघाडीचे
काही घटक कार्यरत असल्याचे समजून अतीव दुःख झाले . श्रेयाच्या लढाईत त्यांनी
आमदारांना एकटे पाडण्याचा प्रयत्न केला होता.
सं पर्ण
ू ठाणे जिल्हा तथा मुं बईमध्ये उपोषणाची लहर पोहोचवून जनमत उभे
करण्याचा ठाम विश्वास आमदारांना आम्ही दिला. मात्र वे ळ निघून गे ली होती.
खोरीपचे अध्यक्ष माजी आमदार मा. मोगा, रमाकांत रामटे के, वासु देवराव बागडे ,
विमलसूर्य चिमणकर आदिना आम्ही भे टलो. आमदार शें डे यां च्या म्हणण्यानु सार शरद
पवार नामांतरासाठी अध्यादे श १२ सप्टें बर ९३ ला काढतात, असे कळले मात्र तोवर न
थांबता आं दोलन सु रू ठे वावे व त्यासाठी आमदारांनी स्वतःच्या सहीनिशी मुं बईतल्या
आं बेडकर वाद्यांची बै ठक बोलवावी, असे आम्ही सु चवले . सर्वजण कामाला लागले
76
आमदारांनी दि. २६.८.९३ रोजी एक प्रेस साठी दिले होते त्यातील ओळी महत्त्वाच्या
होता. “माझा निर्धार कायम, आता मागे जाणे नाही. माझ्या उपोषणाची तात्पु रती
स्थगिती ही मु ख्यमं त्र्यां च्या वे ळकाढूपणाला दिले ली सवलत नसून आमच्या
आं दोलनातील पहिला टप्पा होता. माझा निर्धार आजही या क्षणीही कायमच आहे .
नामांतरासाठी शहीद होईल, तडजोड स्वीकारणार नाही. व या क्षणी हे उपोषण तात्पु रते
स्थगित झाले असले तरी सप्टें बर महिन्यामध्ये हे आं दोलन अत्यं त वे गाने सु रू करावे ,
असा आमचा विचार आहे .
दिनांक ३१.६.१९९३ रोजी ठीक सायं काळी ४.४५ वाजता डॉ. आं बेडकर कॉले ज,
वडाळा ये थे बै ठक झाली. जय भीम वाघमारे यांनी उपशाम यां च्या सं योजना खालील
सभे चे प्रास्ताविक केले . मा. वाघमारे , मा. धावरे , मा. राजा ढाले , मा. श्याम गायकवाड,
चिं तामण
$$$$$
गां गुर्डे, ज.वि. पवार, विमलसूर्य चिमणकर, इं दुताई खोब्रागडे , प्रा आसवरे , कीर्ती ढोले ,
आप्पासाहे ब अडसूळ, छाया खोब्रागडे , मा. गरुड, अॅड. माने (यांचे भाषण बं द
पाडले ) व्ही.के. सोनवणे , साराभाई वाळुं जकर, अशोक पाटील, प्रवीण आयवळे , आमदार
शें डे व मी स्वतः या सभे त बोललो.
उत्तम शें डे म्हणाले , “उपोषणाने नवीन चै तन्य निर्माण व्हावी ही भूमिका होती. हा
लढा माझा एकट्याचा किंवा खोब्रागडे गटाचा नाही. या प्रश्नावर मी जीव दे ईन किंवा
गोळी खाईन.” उपोषणाचा मार्ग आपला आहे काय? २५ लाखाचे प्रकरण काय? आदी
विषयावर गरमागरम चर्चा झाली. मी माझ्या भाषणात या सर्व बाबींचा खरपूस समाचार
घे तला. ज.वी. पवारांनी मला मध्ये च अडवले . या त्यां च्या आवृ त्तीवर मी कडाडून हल्ला
चढविला आणि त्याची भूमिकाच साफ बदलून टाकली. बै ठकीत पु न्हा चां गलं वातावरण
तयार झालं . निर्णायक मोठे आं दोलन उभारण्याचा व मुं बईत नामांतर परिषद घे ण्याच्या
माझ्या सूचने ला राजा ढाले यांनी दुजोरा दिला. “सं शयवादी होऊ नये तर चां गल्या
लोकांनी एकत्रित ये ऊन लढा चालू ठे वावा”, असे मार्गदर्शन त्यांनी केले . साराभाई
वे ळूंजकर यांनी, मी व श्याम गायकवाड यांनी आठवलें चा रीप पक्ष त्वरित सोडावा असा
आग्रह धरला.
पु ढील बै ठक दिनांक ७ सप्टें बर १९९३ रोजी दुपारी २ वाजता आमदार निवासात
ठरल्याप्रमाणे झाली बै ठकीत सर्वांसोबत तानसे न ननावरे ही उपस्थित होते . या बै ठकीत
असे ठरले की पु ढील बै ठक दिनांक १२.९.९३ रोजी वडाळ्याला घ्यावी. मात्र ही बै ठक
झालीच नाही. आमदारांना १२ तारखे च्या मु ख्यमं त्र्यांनी बोलावले ल्या बै ठकीत जायला
मु भा दे ण्यात आली. याच बै ठकीत आम्ही नामांतर आं दोलन या शीर्षकाचा आग्रह
धरला. १३ सप्टें बर १९९३ रोजी डॉ. बापूसाहे ब काळदाते यां च्या अध्यक्षते खाली एक
समिती स्थापन करण्यात आली. त्याच दिवशी राजा ढाले , प्रा. कवाडे , डां गळे , महाते कर
यांची वृ त्तपत्रात नामांतराबाबत स्वतं त्र्य बातमीपत्रे ही झळकली.
१६ सप्टें बर १९९३ ला सरकारी काळदाते समितीची घोषित झाले ली बै ठकही
झाली नाही. १७ सप्टें बरला कल्याण महानगरपालिकेवर रिप. पार्टी आठवले गटाचा
मोर्चा ने ण्यात आला होता. या मोर्चात श्याम गायकवाड व मी नागरी सु विधांसोबतच
नामांतराच्या प्रश्नावर बोललो.
दि.१८ सप्टें बर ९३ ला ने रुळला ‘जागृ ती’ पु स्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा
होता. ना आठवले प्रमु ख पाहुणे होते .
77
३) महाराष्ट्रदौरा :
घे तली. औरं गाबादला पोहोचल्यावर पॅ ं थरचे जावळे , दाभाडे . द.मु . से नेचे अॅड
नारायणे , गोपाळराव आरोटे , डॉ. गं गाधर पानतावणे , अविनाश डोळस (दरू ध्वनीवरून)
यांची भे ट घे तली. विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भे ट घे तली. सं यमी व
परिणामकारक आं दोलनाचा त्यांनी आग्रह धरला. त्यांचे व आमचे विचार जु ळले .
श्रीरं ग वारे यांची भे ट झाली. बी. एस आलटे , एस.बी वाघमारे , प्रा. एन. एस. आलटे ,
गोविं द वारुळे , बाळकृष्ण जाधव, प्रो. उत्तम कांबळे , राजे श वानखे डे, सु भाष गायकवाड,
जी.आर. मोरे यांनी अत्यं त स्पष्ट भूमिका या विद्यार्थी ने त्यांनी घे तली. त्यांनी
औरं गाबादहुन परतताना नाशिकला बाबूराव बागूल यांची भे ट घे तली. स.न जाधवांकडे
किशोर घाटे यां च्याशी सविस्तर चर्चा झाली. दि.७ आक्टोंबर ९३ कार्यकर्ता बै ठकीची
जबाबदारी त्यांनी स्वीकारली. ‘सम्यक’ क् रां तीचे जयं त भाले राव, बाळासाहे ब शिं दे
यां च्याशी सं पर्क साधला. इगतपु री, कसाराच्या कार्यकर्त्यांची चर्चा झाली. गं गाधर गाडे ,
दिल्लीत असल्यामु ळे भे ट झाली नाही. दौऱ्यात हे ठरले की नामांतराबाबत ने मले ल्या
‘काळदाते समितीची’ निष्क्रियता पाहन ू आमदार शें ड्यांनी त्वरित राजीनामा द्यायचा.
तो त्यांनी योग्य वे ळी दिलाही!
पु ढे दिनांक २९ सप्टें बर ९३ रोजी ‘गणे श विसर्जन’ झाले . ३० सप्टें बर ९३ रोजी
महाराष्ट् राला व दे शाला हादरा दे णारा ‘भूकंप’ मराठवाड्यात झाला. व आम्ही आमदार
ने ताजी राजगडकर शें डे , श्याम गायकवाड सर्वजण किल्ला, उमरग्याकडे निघालो. २
ऑक्टोंबर ला भूकंपग्रस्त गावांना भे टी दे ऊन परतलो, त्यानं तर सं पर्ण ू कार्यक् रम ठप्प
झाले होते .
78
अशोक निकम व त्याचे सहकारी तक्षशील विद्यालयाच्या प्रां गणात शांत केले व म्हटले ,
"गौतमच्या आत्महत्या नं तर आता या सरकारचे त्यां च्या समस्यांचे व विषम यं तर् णे चे
दहन करूया" सर्व यु वक शांत झाले व नामांतराच्या आं दोलनाला सु रुवात करून
नामांतर होईपर्यं त लढू या असा विचार निर्धार
$$$$$
केला गे ला. आठवले आले नाही म्हणून बचावले अन्यथा गवईंच्या सभे ची ‘१९७७’
साली पॅ ं थरने केले ली अवस्था तब्बल १७ वर्षांनी त्याच ठिकाणी पाहायला मिळाली
असती! या सभे च्या वातावरणाला साजे से प्रा. दामोदर मोरे यांनी गौतम वर कविता
सादर केली. दि २७ नोव्हें बर रोजी विरोधी पक्षने ते गोपीनाथ मुं डे यांनी काळदाते
समितीचा राजीनामा दिला व मतपरिवर्तनाशिवाय नामांतर नाही, असे निवे दन
मु ख्यमं तर् ी शरद पवार यांनी केले .
६) आठवलें ची दादागिरी :
79
नामांतर होणारच आहे ... शरद पवार ते करणारच आहे त. वगै रे.” आठवले यांचे पोरकट
भाषण ऐकू न आमची डोकी आणखीन भडकली. समाजाला स्वतःची मालमत्ता समजून
सत्ते चा माज चढले ले आठवले असे कसे बोलू शकतात? वसं तदादांचे धोतर सोडण्याची
भाषा करणारे आठवले , गवईची सभा उधळणारे आठवले , जगजीवरामां च्या सभे त
घु सणारे आठवले , स्वतः वसं तदादा, गवई, जगजीवनराम आणि सत्ते च्या साधनां चा गर्व
असले ल्या एखाद्या गाव पाटला सारखे कसे बोलू शकतात? आम्ही अचं बित झालो.
दि. ९ डिसें बर ९३ रोजी मुं बईच्यावतीने नामांतरासाठी ५०००(पाच हजार)
(वृ त्तपत्रांतला आकडा ५०हजार ) भीम सै निकां चा मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चात
भाई सं गारे णी “नामांतरासाठी आम्ही ठाकरे शी यु ती करू,” असे म्हटले , आठवलें नी या
म्हणण्याला दुजोरा दिला. अरुण कांबळेंना फारसे बोलू दिले नाही.
दि १० डिसें बर १९९३ रोजी पु ण्यात समता परिषद झाली. अॅड जनार्दन पाटील
यां च्या ओ.बी.सी सं घटने चा नामांतरास पाठींबा होता पूर्वीपासून रामदास आठवले यांनी
शरद पवारां वर पूर्ण विश्वास टाकला होता. प्रा. अरुण कांबळे , रा.सु गवई यांनी शरद
पवारां च्या भूमिकेचे समर्थन केले होते . जनता मात्र मै दानात होती. काळ झपाट्याने पु ढे
जात होता. एक एक दिवस मोलाचा होता. दि.१३ डिसें बर ९४ ला नागपूर ये थे हिवाळी
अधिवे शन सु रु होणार होते . मुं बईत ठरल्याप्रमाणे अधिवे शनावर प्रचं ड मोर्चे ने ण्याची
तयारी सु रू केल्याचे व नामांतर आं दोलन या एकाच नावाखाली सं घटित व्हायचे काम
उपें द्र शेंडे , प्रा. जोगें द्र कवाडे यां च्या ने तृत्वाखाली विदर्भ परिसरात सु रू झाले होते .
गं गाधर गाडें ची तयारी सु रू होती. प्रकाश आं बेडकरांचा ही मोर्चा निघणार होता.
आठवलें नी स्वतं तर् मोर्चा आयोजिला होता. नागपूरच्या दि.१३ डिसें बर ९३ च्या मोर्चात
सहभागी होण्यासाठी आम्हा ठाणे जिल्ह्यातल्या मं डळींना निमं त्रित केले गे ले होते . पण
विदर्भ, औरं गाबाद, मराठवाड्याच्या परिसरात आं दोलन करण्याचे काम त्या मं डळींनी
विभागून घे तल्यामु ळे आम्ही तिकडे जाण्याऐवजी ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा व मुं बई
परिसरात आं दोलन उभारण्याचे ठरवले व त्यासाठी प्राथमिक बै ठक दि. ११/१२/१९९३
रोजी सायं ४ वा. पं चायत समिती सभागृ ह, कल्याण ये थे घे तली.
७) महत्वपूर्ण बै ठका :
80
८) आमरण उपोषण सु रु :
९) नामांतर आंदोलन :
ठाण्यात तीन नावाजले ल्या व्यक्ती उपोषणास बसल्या. रामदास आठवले यांचे
‘ने तृत्व दुबळे ’ आहे . असा १९८५ मध्ये दिले ल्या राजीनाम्यात उल्ले ख करणारे ठाणे
जिल्हा भा.द पॅ ं थरचे माजी जिल्हाध्यक्ष व व्ही.पी सिं गां च्या सरकारात यु वकां च्या
सरकारी आघाडीत प्रतिनिधित्व मिळाले ले प्रा एकनाथ जाधव! ठाण्याबाहे रील
दलितांचे केंद्रस्थान ठरले ले व ठाणे कोर्टात स्वप्रतिमा असले ले, बहुजन समाज
(कां शिराम) पार्टीचे कार्यकर्ते अॅड बी.जी. बनसोडे ! आठवले गटाचे मूलतः
गटतटविरोधी असले ले हाडाचे , तळमळीचे कार्यकर्ते व रि.पा. ठाणे शहराचे अध्यक्ष
आनं द बु काणे ! असे एकाचवे ळी एक उपोषण कर्ते ठाणे शहरात आमरण उपोषणास बसले .
आमरण उपोषणाचा कणा असले ले, ठाण्यातील जनते च्या हृदयावर विराजमान
झाले ले लाडके कार्यकर्ते प्रमोद इं गळे , निर्भिडचे जगन्नाथ मोरे , उन्हवणे मामा,
सु पर् सिद्ध कार्यकर्ते रमे श पं डित, लोंढे , अॅड. राजय गायकवाड, विलास खांबे, इं दुताई
खांबे, ताराबाई काकळीस, पांडुरं ग सोनवणे , शाहीर असे कितीतरी कार्यकर्ते मोठ्या ने टाने
व जिद्दीने
$$$$$
कामाला लागले व नामांतर आं दोलनाची धु रा त्यांनी खां द्यावर घे तली. गटां च्या अहं कार
बाळगले ल्या काही मं डळींच्या छातीत धडकी भरल्यासारखं वाटत होतं हे उपोषण
लवकर उठवा, असे केविलवाणे उद्गार ते काढू लागले होते . कारण उपोषणाची लहर
समाजात पसरून जागृ ती घडत होती. त्याने काही गटाधिपती हादरून जात होते . हे
घडणारच होते ! ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असले ल्या उपोषणाला प्रचं ड प्रतिसाद
मिळाला. आमरण उपोषण दि.२३ डिसें बर १९९३ रोजी लोकाग्रहाच्या रे ट्यामु ळे मागे
घे तले , तरी साखळी उपोषण दि. ५/१/९४ पर्यं त म्हणजे तब्बल १३दिवस सु रूच राहिले .
दि १७डिसें बर १९९३ रोजी नागपूरची विधानसभा नामांतर घोषणांनी दणाणली.
आमदार मखराम पवार, भिमराव केराम यांनी सभाध्याक्षांकडे कू च केली. अध्यक्षांचा
निषे ध कुंडलिक घोडके (शे .का.प.) व वामनराव चटप (ज.द.) यांनी केला.
81
दि १९ डिसें बर १९९३ रोजी सोलापूर महानगरपालिकेत प्रचं ड गोंधळ माजला व
प्रेक्षक गॅ लरीतून नामांतरवाद्यांनी घोषणायु द्ध आरं भले . दि. २० डिसें बर १९९३ रोजी
भं डारा जिल्ह्यात बिर्ला ये थे कुमारी सु हासिनी बनसोडे , हिने नामांतरासाठी आत्मदहन
केले .
आम्ही केले ल्या विनं तीला झुगारून व वृ त्तपत्रातून प्रसिद्ध झाले ल्या
मुं बईमधील अने क नामांतरवादी तरुणां च्या पत्रांचा विचार न करता, आठवले दि. २२
डिसें बर १९९३ रोजी ‘मातोश्री’ बं गल्यावर ठाकरे यां च्या भे टीसाठी गे ले. ठाकरे
सापासारखे उलटले आणि आठवले आपण यशस्वी झालो असा ढोल बडवत सु टले !
शे वटी ठाणे जिल्ह्यातील व मुं बईतील जनते चे म्हणणे खरे ठरले ! जी व्यक्ती
बाबासाहे बां वर खु लेआम आरोप करते . सतत दलितांना शत्रूवत पाहते . दलितांची
टिं गलटवाळी करते अशा व्यक्तीला भे टायला जाऊ नये , असे आं दोलकांचे मत होते .
शिवाय ठाकरे काही महाराष्ट् राचे ‘राज्यपाल’ नव्हते , नामांतर करण्यासाठी त्यां च्या
परवानगीची गरज काय असा रास्त सवाल जनता करीत होती. ज्यांना सामाजिक
समते च्या आं दोलनाला पाठिं बा द्यायचा असे ल त्यांनी तो द्यावा, त्यासाठी त्यांचे मन
वळवण्याचा बावळटपणा करण्यात काय अर्थ अत्यं त खोटी व समाज विरोधी मते ठाकरे
नामक व्यक्ती बिनधास्त मांडून सै निकांची माथी भडकवते , नीतिधै र्य वाढवते . तर इकडे
फुले आं बेडकरीनी विचारांची तलवारीच्या पात्यासारखी धार आठवले नामक व्यक्ती
बोथट करते व तरुणांचे मनोधै र्य खचवते , ही बाब आम्हा जातीयवाद्यां शी सं घर्ष केले ल्या
नामांतर वाद्यांना अजिबात रुचणारी नव्हती. तरीही आठवले ठाकरें ना भे टले व दुसऱ्यांदा
समाजाच्या नजरे तून उतरले ! त्यांची एवढी घसरण झाली की, पँ थर आठवले मांजर
झाल्याचे लोकांनी पाहिले .
ठाणे जिल्ह्यातील आं दोलनाला जनते तन ू मोठ्या प्रमाणावर पाठिं बा मिळत
होता. रमे श भागे या नव्या मुं बईतल्या कार्यकर्त्याला आम्ही ‘आत्मदहन’ करण्यापासून
परावृ त्त केले . २५ डिसें बर १९९३ रोजी नागपूरला उपें द्र शें डे यां च्या ने तृत्वाखाली मा.
पं तप्रधान पी.व्ही नरसिं हराव यां च्या समोर आं दोलकांनी निदर्शने केली. लाठीमार
करण्यात आला. १९ निदर्शकाना अटक करण्यात आली. असे आं दोलन महाराष्ट् रभर जोर
धरीत होते . आणि २६ डिसें बर १९९३ रोजी औरं गाबाद मु क्कामी नामांतराचा मार्ग सु कर
होण्यासाठी दलितांनी सवर्णां वरील खोटे खटले मागे घ्यावे त, असे आठवलें नी आवाहन
केले . लगे चच दहा खोटे खटले आठवले यां च्या कार्यकर्त्यांनी मागे ही घे तले . खरं तर बाळ
ठाकरें नी सां गितल्याप्रमाणे हे
$$$$$
खटले मागे घ्यायचे आवाहन आठवले यांनी केले होते . याबाबत समाजात तीव्र
सं तापाची लाटच आली. ज.वि. पवार, विवे क पं डित तथा ‘महानगर’ मधून अने क पत्र
ले खकांनी व समाजधु रीणांनी आठवलें च्या या आव्हानावर चीड व्यक्त केली. विवे क
पं डित तर ‘वसई’ च्या उपोषणकर्त्यांनसमोर बोलतांना म्हणाले ‘हा अधिकार आठवलें ना
कोणी दिला?’ खरं तर हा केंद्राचा कायदा तो मोडीत आठवले कसे काढू शकतात?
जातीवादां च्या केसे स काय खोटे असतात? या आव्हानाने आठवले यांची प्रतिमा
समाजात पार कोसळली! नामांतर व्हावे , कसे ही व्हावे , त्यासाठी आठवले घायकुतीला
आले त. काकुळतीला आले त व अगतिक झाले त असे च चित्र दिसत होते . आम्ही
उपोषणासाठी जनजागृ तीला फिरत असतांना लोक अक्षरशः आठवलें ना शिव्या दे ताना
दिसत होते . आठवले यांचे समर्थकही त्यां च्यावर टीका करू लागले होते . पक्षीय
बां धिलकी पाळणाऱ्या त्यां च्या काही कार्यकर्त्यांची गोष्ट निराळी होती. या काळातला
82
एक एक दिवस लाख मोलाचा होता. समाजातल्या घडामोडीतून ‘नामांतर आं दोलनास’
आणखीन धार चढत होती!
नामांतर आं दोलनाचे ‘अं बरनाथ’ हे केंद्र बनून राहिले होते . एरव्ही समाज
समतावादी चळवळीचे हे शहर म्हणजे बाले किल्लाच आहे ! सर्व प्रथम ये थेच आमरण
उपोषण सु रू करण्यात आले . व सर्व जिल्हाभर पसरले . पी. सिद्धार्थन, निवृ त्ती दिवे कर,
विजय जाधव
$$$$$
विनायक तिटकरे, भास्कर ससाणे , विलास यादव,दायम्मा, मीनाक्षी से ल्वराज, सौ. वनिता
ताई चन्ने , नीलमताई वाघमारे , राजन चव्हाण, किशोर गरुड इत्यादी कार्यकर्त्यां च्या
कार्यातून अं बरनाथ मधून सं च उभा राहू शकला.
कसार्यात कार्यकर्ते आमरण उपोषण सोडायला तयार नव्हते उपोषणाला फक्त
‘चारच’ कार्यकर्ते बसावे त, अशा सूचना केंद्रीय समितीने दिल्या होत्या. पण कसाऱ्यात
‘२०’ लोक उपोषणाला बसले . शहापूर तहसीलदार लोकांना समजावून थकले . शे वटी
नामांतर आं दोलकांना समजावले गे ले. बाकी ‘१६’ जणांना माघार घ्यायला भाग पाडले .
यावे ळी ‘महिला वर्ग’ नाराज झाला होता,पण मी जे व्हा आमरण उपोषण मागे घे ऊन
कासाऱ्यात साखळी उपोषण सु रू केले . ते व्हा महिलांना विशे ष आनं द झाला.
“बाबासाहे बां च्या नावासाठी त्यांनाही ‘एक’ दिवस उपोषणात भाग घे ता ये ईल. याचे
त्यांना मोठे समाधान वाटायचे .” एका महिले ने भाषणात सां गितले कसाऱ्यातीलच
विजय डोंगरें ना रूग्णालयात भरती करूनही उपोषण चालूच ठे वले . या कासाऱ्यातल्या
‘नामांतर आं दोलनाचा’ रे टा एवढा जबरदस्त होता की, आठवले गटाने सु रेश सावं तां च्या
ने तृत्वाखाली काढायचा ठरले ला दि.५ तारखे चा शहापूर तहसील कार्यालयावरील मोर्चा
83
रद्द करावा लागला. ‘जमाव बं दीचे ’ कारण कार्यकर्त्यांनी दिले असले तरी नामांतर
आं दोलनाचाच तो विजय होता. आहे हे नि:सं शय!
वसईच्या नामांतर आं दोलनामागे खं बीर ने तृत्व होते , यशवं त गायकवाड! उपोषण
काळात ते रुग्णालयात भरती होते , मात्र त्यांचे मार्गदर्शन व मानसिक पाठिं बा
वसईकरांना धीर व उभारी दे ऊन गे ला! दि.२७/१२/९३ पासून कार्यकर्ते उपोषणास बसले .
या कार्यकर्त्यांनी ‘चार’ दिवस ‘पाणी’ सु द्धा घे तले नव्हते . उपोषणाची सां गता
करण्यासाठी श्याम गायकवाड, प्रा. एकनाथ जाधव, सु रेश घोडे स्वार, रमे श बर्वे , व मी
स्वतः वसईला गे लो. ‘श्रमिक मु क्ती सं घटने चे’ विवे क पं डितही पाठिं बा दे ण्यासाठी
आपल्या कार्यकर्त्यांसह आले होते . आम्ही सर्वांनीच अत्यं त प्रभावीपणाने आमची
भूमिका मांडली. उपोषणकर्ते मोठ्या तयारीचे कार्यकर्ते वाटले . कांबळे व ईश्वर धु ळे
नामक कार्यकर्ते आठवलें च्या वरील टीकेवर थोडे हळवे पणाने चर्चा करीत होते ; पण
आमची भूमिका स्पष्ट झाल्यावर आं दोलनाच्या प्रवाहापु ढे त्यांचा टिकाव लागला
नाही. ते ही आं दोलनात सामील झाले . ‘वाडा’ ये थे अं कुश थोरात यां च्या पु ढाकाराने
उपोषण सु रू झाले . मु रबाडचे उपोषण मोठ्या त्रासाने रात्री ११:३० वाजता
कडाक्याच्या थं डीत व अपुर् या साधनां च्या आधारे सु रू केले . केंद्रिय समितीकडून
प्रत्ये क ठिकाणी बॅ नर, पोस्टर, व्यं गचित्रे दे ण्यात ये त होती; ती इथे ही दिली गे ली.
मात्र या ग्रामीण परिसरात अण्णा माळवे गु रुजी, इं गळे साहे ब व खांडण्याच्या
मं डळीने जे धाडस दाखवले ते कौतु कास्पदच!
उपोषण चालू असताना महत्त्वपूर्ण घटना घडत होत्या. डहाणूचे शिवसे नेचे
नगरसे वक नगिनदास दे वा यांनी व आम. राम तोलानी यांनी नामांतरपदी राजीनामा
दिला. काँ गर् े सच्या महाराष्ट् र कमिटीने ठराव करून शरद पवारांनी नामांतर करावे , असा
आदे श दिला. कधी नव्हे ती विलासराव दे शमु ख, डॉ. पदमसिं ह पाटील या
मराठवाड्यातल्या काँ गर् े सच्या सत्ताधारी ने त्यांनी नामवं तरावर बोलायला सु रुवात
केली. प्रकाश आं बेडकरांनी
$$$$$
84
१२) अडथळ्यांवर मात :
ठाणे रायगड जिल्ह्यात दोन टप्प्यात आं दोलन झाले . पहिला टप्पा उपोषणाचा व
ु
दसरा मोर्चाचा. पहिल्या टप्प्यात आं दोलकाला पोलिस यं तर् णा व गटातटात
अडकले ल्या कार्यकर्त्यांचा विरोध झाला. पोलीस यं तर् णा उपोषणाच्या परवानगी विषयी
विचारीत असे . आम्ही म्हणत असू “हे आमचे आं दोलन आहे , यात परवानगीचा प्रश्न
ये तोच कुठे ?” त्यावर पो. निरीक्षक, सहाय्यक आयु क्तांकडे सहा, आयु . उपायु क्तांकडे
पाठवी. पण आमची भूमिका रास्त असल्यामु ळे व वाटचाल नियमबद्ध असल्यामु ळे
पोलिसांची इच्छा असून, ते आम्हाला अडवू शकत नव्हते . पोलिस यं तर् णा जिल्हाभर
सु रू असले ल्या आं दोलनांची व्याप्ती लक्षात घे ई व अडथळे दरू होत.
रिप. पक्षातील गटातटावर आं धळे प्रेम करणाऱ्या निर्बुद्ध व दिशाहीन चमचा
कार्यकर्त्यांचा आं दोलकाना त्रास झाला. वस्तुत: जनता तशी कोणत्याही गटाची
नसते . गटाचे असतात ते पु ढारीपणाची हवा डोक्यात गे लेले बिनडोक कार्यकर्ते ! रिप. पक्ष
प्रकाश आं बेडकर गटाच्या अर्धवट कार्यकर्त्यांनी आम्हाला वे ळोवे ळी आडवे लावले .
लोकांमध्ये सं भर् म निर्माण करणारी चर्चा केली. कल्याणचे रमे श साळवे , उल्हासनगरचे
रमे श आढाव यांनी शाब्दिक पाठिं बा दिला तरी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनी
विरोधच केला. एका बै ठकीत तर लोकच चिडले . आपल्या गटाची शे खी मिरविणाऱ्या व
नामांतर आं दोलकावर सं शय घे णाऱ्या विष्णू धनराव नामक कार्यकर्त्यां ला अक्षरश: खाली
बसवले , बोलू दिले नाही. आणि खरे च होते , या सच्चा प्रवाहा पु ढे कुणाचाही
आठमु ठेपणा मोडीतच निघाला असता!
$$$$$
85
वसईतल्या उपोषणकर्त्यांना आठवलें च्या पी. ए. चा फोन आला. दरू ध्वनीवरून
‘उपोषण’ त्वरित मागे घ्या. साहे बांचा आदे श आहे , असे फर्मावण्यात आले . मात्र
तथाकथित आदे शास त्वरित प्रत्यु त्तर करण्यात आले की, “आम्ही आठवलें च्या
सां गण्यावरून उपोषणास बसलो नाही. वसई तालु का “नामांतर आं दोलनाच्याच पाठीशी
उभा राहील” पी. ए. ची दातखिळ बसली.
कार्यकर्ते जु मानत नाहीत, असे लक्षात आल्यावर रोकडें नी सं बंध नसले ल्या
जिल्हा, तालु का, शाखा कार्यकर्त्यां च्या सहीने एक पत्र काढले , त्यात काही कार्यकर्त्यांना
काढून टाकले . माझे नाव पहिले च होते . आमचा लढा तत्त्वांसाठी होता त्यामु ळे मला
त्याचे वाईट वाटले नाही व मी गं भीरही झालो नाही. चु कीच्या धोरणाविरुद्ध सं धी
मिळाल्यास आम्ही गु लामासारखे न वागता असे च वाघासारखे वागतो हे आठवले सु द्धा
जाणतात. आम्ही आमच्या मूळ प्रकृतीनु सार आं बेडकरी बाण्याने च वागलो. दलितांचे
शत्रू असले ल्या ‘सामना’ पत्रकात आम्ही ‘नामांतर विरोधक’ म्हणून बातमी दिली;
पण पक्षातून काढून टाकल्याची प्रत्यक्ष नोटीस दिली नाही! पक्षातून काढले , त्यापै की
केवळ ‘राजू रणदिवे ’ या कार्यकर्त्यासच मोठे दुःख झाले !
$$$$$
उपोषण म्हणजे ‘आठवले बचाव’ उपोषण होते ; पण जे व्हा नामांतर आं दोलकां च्या वतीने
उल्हासनगरात ‘आमरण उपोषण’ सु रू झाले ते व्हा १७/१२/९३ पर्यं तच असणारे ‘साखळी
उपोषण’ रोकडे , रामसिं ग, प्रल्हाद गायकवाड आदींनी २२/१२/९३ पर्यं त मु द्दाम चालू
ठे वले . लोकांमध्ये सं भर् म निर्माण करण्याचा प्रयत्न केला. उपोषणाचे दोन बु थ
नगरपालिके समोर दिसत होते . अॅड तिडके, रा.सु . कामगार कार्यकर्ते बाबू शिं दे,
शिवाजी निकम, सु रेश निकम, बाबु राव बगाडे यांची प्रकृती चिं ताजनक
झाली.तिकडच्या बु थवरील मं डळी मात्र आरामशीर खाऊन पिऊन रात्री झोपायला
बु थवर ये ऊन उपोषणाचे कर्मकांड पूर्ण करीत होती. उल्हासनगरला असा या मं डळींनी
गोंधळ माजवला तरी आं दोलकांनी त्याच्या इशार्य ावर नाचायचे नाकारले , त्यांना
झुगारून दिले !
रोकडे आणि कंपूने शे वटचा विरोधाचा पवित्रा उचलला. तो तर अत्यं त भयानक
होता. यास सालस पु ढाऱ्यांनी मु रबाडचे कार्यकर्ते विलास धनगर (एल.एल.बी. दुसरे वर्ष)
व शोभाताई इं गळे (जिल्हा महिला दक्षता समिती, सदस्य) यां च्यावर खोटी पोलिस केस
गु दरून त्यांना छळायचा कुटील डाव रचला. मात्र आम्ही त्यांचे दात त्यां च्या घशात
ू ठे वून सूड
घालून त्यांचा डाव उधळू न लावला. एवढे च नाही तर त्यां च्या खां द्यावर बं दक
घे ऊ पाहणाऱ्या एच.डी. पाटील नामक पोलीस फौजदाराला आं दोलकांचा धसका घे ऊन,
मु रबाड तालु क्यातून पळ काढावा लागला. या प्रसं गातून हे मात्र सिद्ध झाले की,
स्वतःला वाचवण्यासाठी हे लोक कोणत्याही थराला जातील. कोणाशीही तडजोड
करतील व चां गल्या लोकां वर मारे करी सु द्धा घालतील. आम्ही यातून बरे च काही
शिकलो. तमाम जनता या विषारी लोकांपासून सावध झाली.
दि १७ डिसें बर ९३ ते ५ जाने ९४ अत्यं त कमी दिवसात लोकांनी दिले ला प्रचं ड
प्रतिसाद अवर्णनीयच होता. दिवसें दिवस नामांतर होणार, आज होणार, उद्या होणार
अशा बातम्या दे ऊन पत्रकार व सरकार आं दोलनातील हवा काढून घे ण्याचा आटापिटा
करीत होते , पण लोक इरे ला पे टले होते . तारीख जाहीर झाल्याशिवाय किंवा अध्यादे श
काढल्याशिवाय आं दोलन मागे घे तले जाणार नाही, हा जनते चा निर्धार होता. एवढ्या
कमी अवधीत लोकां शी यु द्धपातळीवर सं पर्क साधावा लागत होता. कार्यकर्ते
झपाटल्यासारखे राबत होते . आं दोलनाचा प्रचार-प्रसार प्रत्ये क जण आपापल्या
पातळीवर अव्याहतपणे करीत होता; हे च या आं दोलनाचे यश होते !
दि.४ जाने ९४ रोजी मुं बईत काही नामांतर समर्थकांची बै ठक झाली.
आं दोलनाचा मोर्चा दि ५ जाने ९४ रोजी असल्यामु ळे आम्ही बै ठकीला जाऊ शकलो
नाही पण १२ तारखे चा धरणे धरण्याचा कार्यक् रम जाहीर झाल्याचे वाचले . मुं बईत
87
प्रत्यक्ष आं दोलन सु रू झाले च नव्हते . उशिरा का होईना, १२ जाने ९४ रोजी प्रारं भ
होतो आहे त्यात आपण सामील व्हायचं , असा आम्ही निर्धार करीत होतो. ५ जाने वारी
९४ चा मोर्चाही महत्त्वाचा होता. त्यां च्या यशस्वीते साठी झटायचे होते .
$$$$$
बं दी हुकू म मोडून कले क्टर कचे रीवर मोर्चा काढायचे ठरले . कार्यकर्ते कामाला
लागले . ठाणे ये थील उपोषण वगळता अन्य सर्व ठिकाणची उपोषणे मागे घे तली गे ली.
मोर्चावर लक्ष केंद्रित केले गे ले. पोस्टर्स निघाले . केंद्रीय कार्यालयातून श्याम
गायकवाड यां च्या सहीनिशी सूचना पत्रके निघत होती. आं दोलकांना महत्त्वाच्या
सूचना दे ण्यात ये त होत्या. कार्यकर्त्यांनी गटागटाने झें डा, बॅ नर न घे ता ठाण्याच्या गाव
दे वी मै दानावर हजर व्हावे , अशी महत्त्वपूर्ण सूचना दिल्याने लोक विभागा विभागातून
तयारीत होते .
तयारी पूर्ण झाली होती, तरी कार्यकर्ते सं पर्कासाठी फिरत होते . ते वढ्याच ४ जाने
९४ म्हणजे मोर्चाच्या आदल्या दिवसापासूनच कार्यकर्त्यां च्या अटकसत्राला सु रुवात
झाली. अटकसत्राची सु रुवात प्रथम कल्याण शहरात झाली. आनं दवाडीतील ‘आदम
शे ख’ या कार्यकर्त्याला दुपारीच पोलिसांनी ताब्यात घे तले . केंद्रीय समितीवरील
जवाबदारी आणखीनच वाढली. भाई कांबळे , रमे श बर्वे , एकनाथ जाधव असे आम्ही काही
कार्यकर्ते विभाग वाटून घे ऊन रात्री पोलिसां च्या गाड्या फिरत होत्या त्यांना चिं गारी
दे ऊन आम्ही वस्ती वस्तीत गे लो. लोकांना धीर दे ऊन मोर्चा निघणारच, हा निर्धार
कळवला.
दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रत्यक्ष मोर्चाच्या दिवशी पोलीस यं तर् णे ने सर्व दलित
वस्त्या अक्षरश: ‘सील’ करून टाकल्या. कोणी बाहे र पडणार नाही याची खबरदारी घे तली
तरी ठरल्याप्रमाणे कार्यकर्ते बाहे र पडले व ठाण्याला हजर झाले . अं बरनाथ,
उल्हासनगर, ठाणे या ठिकाणी लोकांना अटक करण्यात आली.
ठाणे स्टे शन बाहे र ५-६ पोलिस व्हॅ न आं दोलकांना अटक करण्यासाठी सज्ज
होत्या. ठाणे रे ल्वे स्थानकावरही साध्या पोशाखात पोलिस यं तर् णा पे रली होती.
पोलिसां च्या हाती तु री दे ऊन लोक स्टे शनच्या बाहे र सहीसलामत पडताना दिसत होते .
प्रा. जाधव व मी सर्व बाबी न्याहाळीत होतो. काही लोक गावदे वी मै दानात अटक होत
होते . नामांतर घोषणा दणाणत होत्या. “मी ठाण्यात आलो आहे . उपोषणाच्या ठिकाणी
निघा” असा चिठ् ठीवरील सं देश वाचून आम्ही जिल्हाधिकारी कचे रीकडे निघालो. कोणी
कोणाशी बोलत नव्हते . एकापाठोपाठ एक निघून ठरले ल्या ठिकाणी प्रकट झालो. दीडशे
दोनशे कार्यकर्ते आवारात ठाणे कले क्टर परिसरात जमले ले पाहन ू , आम्ही श्याम
गायकवाडांना उपोषण स्थळी घे ऊन आलो. उपोषण स्थळी पोहोचताच जी.एम. वाघमारे ,
आप्पा खै रे वगै रे कार्यकर्त्यांनी ठाणे कोर्टातून निघून घोषणा द्यायला सु रुवात केली.
प्रथम उपोषण सोडून घे तले . लढ्याची यशस्वीरित्या मांडणी केली गे ली. उपोषण कर्ते
88
सोबत घे ऊन आम्ही सर्वजण घोषणा दे त अटक झालो. पोलीस अधिकारी सु तकर यांनी
अटक करून आम्हाला कोंडदे व स्टे डियमकडे
$$$$$
$$$$$
89
१७) नामांतर जनते च्या लढ्यामुळेच :
ही गोष्ट शं भर टक्के खरी आहे की, जनते च्या लढ्यामु ळे नामांतर झाले .
नामांतराचा खरा ‘हिरो’ गौतम वाघमारे आहे . लढणारे सर्व सै निक विजयाचे वाटे करी
आहे त. आयते ‘श्रेय’ उपटणाऱ्या कोणाही उपटसुं भाने शं भरदा विचार करावा.
नामांतराचे श्रेय लाटायला अश्लाघ्य प्रयत्न करू नये .
नाही. कारण प्रकाश आं बेडकरांनी लढे उभारले नाही. नामांतराचा प्रश्न ‘मृ त
प्रश्न’ म्हटले . आधी ‘सत्तातर मग नामांतर’ अशी त्यांची घोषणा होती. म्हणजे सत्तां तर
नाही तोवर नामांतर नाही. बहुजन महासं घाच्या कोणत्याही अधिवे शनात नामांतराचा
ठराव घेतला नाही. कोणता ‘बहुजन समाज’ नामांतराच्या प्रश्नां वर दलितांपाठी उभा
राहिला, हे स्पष्ट झाले नाही. प्रकाश आं बेडकरां च्या बहुजन समाजाची राजकीय
शक्ती प्रकटली नाही. त्यामु ळे त्यां च्या धास्तीने नामांतर झाले , असे होणे नाही.
भा.ज.पक्ष, जनता दल, पु रोगामी, डावी आघाडी यां च्यामु ळे नामांतर झाले , असा
विचार करणे गै र आहे . पत्रकी व काही ठिकाणी प्रत्यक्ष लढ्यातला सहभाग त्यांचा
राहिला पण प्रत्ये काचा सहभाग राजकीय शक्ती वाढवणे व दलितांची सहानु भत ू ी
मिळवणे , असा राजकीय हे तन ू े प्रेरित असल्यामु ळे त्यां च्यामु ळे नामांतर झाले असे
म्हणता ये त नाही.
$$$$$
अर्धसत्य. कारण यु तीचे पहिले कलम नामांतराचे होते पण रामदास आठवलें नी कसून
प्रयत्न कधी केल्याचे ऐकिवात नाही. नामांतर करतो, नाहीतर राजीनामा दे तो असे
फक्त रामदास म्हणत राहिले . मराठवाड्याचा दौरा करून मनपरिवर्तनाचा प्रयत्नही
90
केला नाही. चिडून अथवा प्रश्न सोडवू शकत नाही, म्हणून अथवा नै तिक जबाबदारी
समजून कधीही पाऊल उचलले ले नाही.३ वर्ष मं त्रिपद उपभोगले पण स्वतं तर् अस्तित्व
ठे वून एकदाही सरकारला ठणकावले नाही. रिपब्लिकन मं तर् ी म्हणून वजन न
वाढवल्याने शरद पवारांना भीती वाटे ल अशी परिस्थिती राजीनामा दे वन
ू ही होत नव्हती,
म्हणून आठवलें च्यामु ळे नामांतर झाले असे म्हणणे गै र आहे .
अर्धसत्य. कारण १५ वर्षात हा प्रश्न त्यांनी सोडवला नाही. अने क निवडणु कां तही
धसास लावला नाही. मराठवाड्यातील जनते चे परिवर्तनही केले नाही तर २/३ बै ठकांना
व ४/५ महिन्यात प्रश्न सु टतो कसा, हाही एक प्रश्नच आहे . याचा अर्थ असा की
शरद पवारांना नामांतर करायचे होते पण ‘राजकीय घडी’ भरायची वाट पाहत होते .
याचा अर्थ मतां च्या राजकारणासाठी हा प्रश्न त्यांना वापरायचा होता. तरी समता
परिषदे त केले ल्या घोषणे प्रमाणे मार्चपूर्वी नामांतर करायचे , असे जाहीर केले असताना,
१४ जाने वारीसच नामांतर का केले ? याचा अर्थ सरकार ‘अध्यादे श’ कधीही काढू शकत
होते . नामांतर त्यांनी ठरवले असते तर कधीही झाले असते . म्हणजे नामांतर त्यांनीच
केले नाही. तरीसु द्धा या वे ळेस २६ जाने वारी वा १४ एप्रिल पर्यं तसु द्धा त्यांना थांबता
ये ऊ नये , असे काय घडले की ज्यामु ळे त्यांना १४ जाने वारीसच नामांतराचा अध्यादे श
काढावा लागला. या प्रश्नांचे उत्तर आहे महाराष्ट् रात बिघडत चालले ली सामाजिक
परिस्थिती! सामाजिक परिस्थिती बिघडवली कोणी तर आं दोलनाने ! कसे व कुठे होते
आं दोलन? आं दोलन सं पर्ण ू महाराष्ट् र भर होते . विशे षत: जाने वारीपासून परिस्थितीच
अनियं त्रित होती. असं घटीत आं दोलनात प्रत्ये क जण आपला ने ता, आपला अनु यायी
असतो व यामु ळे परिस्थिती अधिक धोकादायक बनण्याची शक्यता असते . नामांतर
प्रश्नां वर ने मके हे च घडले !
नामांतराच्या मागणीसाठी ३१ जिल्ह्यांमध्ये रस्ता रोको, उपोषणे , मोर्चे, प्रतिमा
दहन, जे लभरो अशा प्रकारची अने क आं दोलने केली गे ली. मराठवाडा, विदर्भ, ठाणे ,
मुं बई, (अल्प) सातारा, सां गली, रायगड, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, भु सावळ, धु ळे,
नाशिक इतर ठिकाणी ठळकपणे आं दोलने सु रू होती. या काळात गौतम वाघमारे
(नांदेड), सु हासिनी बनसोडे (भं डारा), प्रतिभा तायडे (बु लढाणा), शीला डोंगरे (भं डारा),
शरद पाटोळे (सोलापूर) नारायण गायकवाड (सोलापूर) या सहा नामांतर वाद्यांनी
आत्मबलिदान केले . तर नाशिक नागपूर सोलापूर, चं दर् पूर, सातारा, अकोला,
अहमदनगर, वर्धा, ठाणे ,
$$$$$
91
राज्यपालाकडे काढला व नामांतर झाले ! विजय लढणाऱ्या, रक्त सां डणाऱ्या,
आत्मबलिदान व जीव कुर्बान करणाऱ्या जनते चा झाला! मात्र त्याच काळत मराठवाड्यात दोन
विद्यापीठे अस्तित्वात आली. एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि दुसरे रामानंद तीर्थ विद्यापीठ !
१९७२ ते १९९५ बरोबर २३ वर्षानं तर वयात आले ल्या, तरण्या मु लां नी पूर्वी पॅ ं थर
यु वकांने असलेल्या विचारले , ते च प्रश्न विचारायला सु रुवात केली आहे . मात्र या
वे ळेस तरुण भांबावले ले आहे त. त्यांना फक्त ऐक्य हवे आहे . निळ्या भोपळ्याची का
होईना मोट बां धायची आहे . मागे पॅ ं थर्सनी रिप. पक्षाची आपला काही सं बंध नाही, अशी
भूमिका घे तली होती. आत्ताच्या यु वकांनी पु ढाऱ्यांचा भ्रष्टाचार, घोडचु का, नाकर्ते पण
सर्व काही पोटात घालून (माफ करून) ने तेपदी विराजमान व्हायची सं धी दिली आहे .
यावे ळीच्या ने त्यांना त्यांनी नालायक म्हटले . यावे ळीचे ने ते फारसे लायक आहे त असे ही
नाही. तरीही सं तप्त यु वकांनी त्यांना स्वीकारले आहे हा मूलभूत फरक लक्षात घ्यायला
हवा.
ऐक्य प्रक्रिया १९७४ पासून सु रू आहे . १९८९ ला दलित ऐक्य झाले . तत्पु र्वी
पु ण्याला ऐक्य परिषद बोलावली गे ली. काही लोक आले . राजा ढाले , प्रकाश आं बेडकर
आले च नाहीत, प्राध्यापक अरुण कांबळे नी हे तवि ू षयी सं शय व्यक्त केला. या परिषदे त
विठ् ठल साठे , बाबासाहेब गोपले, बाळकृष्ण रे णके, रवींदर् बागडे , प्रा. जोगें द्र कवाडे , रा. सु .
गवई, डॉ. माईसाहे ब आं बेडकर, नामदे व ढसाळ, अँ ड. जनार्दन पाटील, जगन्नाथ
कोठे कर इ. मं डळी हजर होती, रामदास आठवले , गं गाधर गाडे यां च्या पु ढाकाराने ही
परिषद घे तली होती.
१९८९ ला सर्वजण एकत्रित आले . आठवलें नी काँ गर् े सशी यु ती केली. प्रकाश
आं बेडकरांनी खासदार पद दिले ल्या जनता दलात डाव्या आघाडी सोबत जातो, असं
म्हणून स्वतं तर् उमे दवार उभे केले . प्रकाश आं बेडकरां च्या उमे दवारांमुळे से ना-
भाजपच्या जवळपास २० उमे दवारांना सहज निवडून ये ता आले . आणि आठवलें च्यामु ळे
जवळपास २० उमे दवार काँ गर् े सचे निवडून आले . रि.प जनते ची ताकद ओळखून
रस्त्यावरचा रामदास, शरद पवार कडून मं तर् ी करण्यात आला. यु तीच्या मं त्रिपदाचा
फायदा घे ऊन आठवलें नी समाजाचा
$$$$$
फायदा केला नाही. स्वतं तर् बाणा टिकवला नाही. खासदारकी मिळाले ल्या बाळासाहे ब
आं बेडकरांनी राष्ट् रीय स्तरावर रि.प. पक्ष वाढवला नाही. राजा ढाले , ज.वि. पवार
पॅ ं थरच्या मं तरले ल्या दिवसानं तर जीव ओवाळू न टाकणाऱ्या जनसमूहाला अं तरले होते .
अविनाश महातेकर, अर्जुन डां गळे पँ थर पासून फेकले गे ले. पण प्रकाश आं बेडकरांमुळे
तरले गे ले, ने तृत्वपदी विराजमान झाले . नामदे व ढसाळ, भाई सं गारे , टी. एम. कांबळे ,
आठवलें ना साहे ब म्हणू लागले , “सभा सं मेलनात गौरवपर भाषणे ठोकू लागले .
साहे बां च्या विरोधात सत्य कथन करणाऱ्यां वर डाफरू लागले . अलीकडे नामदे व ढसाळ,
भाई सं गारे , चं दर् कांत हं डोरे व गे ली २०-२१ वर्षे रामदास सोबत आले ल्या आम. टी. एम
कांबळे , रामदासला सोडून बं ड करून बाहे र पडले . सं घटने त पाय रोवण्यासाठी चाचपडू
लागले . लोक त्यांना वचकू लागले रा. सु . गवई, बी.सी. कांबळे या बु जु र्गने त्याबाबत
जनता मूग गिळु न होती. त्यांचा समाजाला फारसा फायदा नव्हता व तोटाही नव्हत्या.
आमदार शें डे व खोब्रागडे गटाची मं डळी नागपूर आणि विदर्भ सां भाळू न होते . कवाडे
92
सरांचा शहर मिळू न एखादा सरसे नापती उरला होता. तशात मुं बईच्या यु वकांनी ‘उठाव’
केला. ६ डिसें बरला उपोषण केले . (१९९५ ला) कोणी बसवले की काय मु लांना?
तोडमोड, दगडफेक केली. आठवलें ची सभा उधळली. प्रकाश आं बेडकरांचा
स्टे जची मोडतोड केली. यु वकांना ठाणे जिल्हा व इतर भागातल्या यु वकांनी साथ दिली.
पु ढारी घाबरले . आपल्या मागचा अनु यानी सरतो आ,हे हे कळले च होते . त्यात यु वकांचा
रे टा त्यामु ळे नाईलाजाने त्यांना एकत्रित बसावं लागलं .ऐक्य झाल्याचं घोषित केलं
गे लं.
जाणकारांचा अनु भवी विश्रात व्यक्तींचा विश्वास बसला नाही व आजही बसत
नाही पण समाज मोठा भावनाशील! ऐक्याबाबत कोणी बोलायचे नाही, विरोधाचा सूर
खपवून घे तला जाणार नाही अशी जणू त्याने तं बी दिले ली. दुसरे कार्यक् रम घ्यायचे
नाही, हे ही सां गनू ठे वले ले. त्यामु ळे सर्वत्र सामसूम आहे , मात्र पूर्वी ये वढा उत्साह
दिसत नाही. जनते च्या मनात भीती आहे , भीती खरी आहे . काळच याची उत्तरे दे ईल.
तूर्त पाहत रहावे , तरी भविष्यात पु ढचं दिसणाऱ्या, धोक्यांची वाच्यता केली तर बिघडले
कुठे ? रिप.ऐक्य टिकावे , असे मनापासून वाटत असले तरी जर पु ढाऱ्यांनी तोडले तर ते
तोडले तर आपण काय करणार ?
घातला. क्षणभर गृ हीत धरू की अध्यक्षीय मं डळातले ने ते पदाचा गै रवापर करणारे आहे व
पद मिळाले नाही तरी काय करणार आहे त. ही रिप जनते च्या दृष्टीने अस्मिताची बाब
आहे . रामदास आठवले , म्हणाले लोकसभे त पद नको, छाव अगर गोष्ट या मं डळींनी
पदांचा पक्षीय सत्ते चा वापर केला आहे . सर्वजण किमान १० वर्षे पक्षाच्या प्रमु ख पदावर
विराजमान होत आले ले आहे त. आता त्यांनी नव्या कर्तूत्वाला वाव द्यावा, दुसऱ्या
पक्षातील कार्य कर्त्यांना सं धी द्यावी. सर्व ने त्यांनी सल्लागार समितीत राजकीय नामा.
व्यवहार समितीत राहावे अथवा राष्ट् रीय पातळीवर पक्ष बां धण्यात वे ळ खर्ची करावा.
महाराष्ट् राचा अध्यक्ष यां च्यापै की कोणीही होऊ नये हे कटाक्षाने पाळावे . महाराष्ट् र
राज्याचा अध्यक्ष फुले आं बेडकरी विचारांचा अन्य मागास अथवा बौद्धे तर सै निक
दलित असावा. निदान तूर्त तयारीतला कार्यकर्ता मिळत नसलाच तर मुं बई प्रदे शाचा
तरी अध्यक्ष अन्य वर्गांपैकीच जाणीवपूर्वक करावा. निरनिराळ्या आघाड्या जनसं घटना
उभ्या करण्यामागे कार्यक्षम कार्यकर्ते हवे त. सामान्य, सां स्कृतिक, यु वक, शिक्षक,
कर्मचारी, सामा. धार्मिक यां च्या क्षे तर् ात प्रभावीपणे शिरकाव करणाऱ्या कार्यकर्त्यांना
जाणीवपूर्वक मान्यता दे ऊन उभे करता ये ईल.
93
रिप. ऐक्य म्हणजे रिप. गटांचे ऐक्य नव्हे . रिप. जनते चे ऐक्य होय. फुले
आं बेडकरी विचार मानणाऱ्यांचे ऐक्य यात कोणी सामील होत असे ल तर त्याचे स्वागत
करायला हवे . काही लोकांना जाणीवपूर्वक या प्रक्रिये त लढायला हवे . दुसऱ्या पक्षातले
लोक कार्यकर्ते आपल्याकडे ये ऊन हा प्रवाह दषि ू त करतील, असं मानणारा ने ता अथवा
कार्यकर्ता दुबळा या सदरात मोडतो. जो आपले पद कोणी हिसकावून घे ईल म्हणून
आपापल्या गटात गटां गळ्या खात फिरतो तो गटा तटां च्या ऐक्याची भूमिका डोक्यात
घे ऊन फिरतो आहे असे समजावे , महाराष्ट् रात समाजकारण, राजकारण बदलणारा पक्ष
रिप. पक्ष ठरणार आहे . तर काँ गर् े स जर बहुजन समाज प्रांतीय सं घटना सर्व उपे क्षित
घटक यां च्यात विखु रले ला फुले -आं बेडकरी अनु यायी रिप. ऐक्यात जोडायला हवा. या
घडीला मगरूर भूमिका ठे वून टाळाटाळीचे , डावला डावलीचे गलिच्छ राजकारण केले
तर, सच्चा दिले ले रिप. ऐक्य साध्य होणार नाही रिप. ऐक्य हे बौद्धांचे ऐक्य हा शिक्का
पु सायला आले तर नु सते सर्वांना बरोबर घे ण्याचा विचार करून भागणार नाही, तर
प्रत्यक्ष प्रवाहात सहभागी करून घे ण्याचे निमं तर् ण व आग्रह व्हायला हवा.
भटकेविमु क्तांचे लक्ष्मण माने , लक्ष्मण गायकवाड, खाडे , विठ् ठलराव साठे , अशोक
शिं दे, रवींदर् बागडे , ने ताजी राजगडकर व त्यांचा आमदार सं घ छगन भु जबळ, अँ ड.
जनार्दन पाटील, राजाराम साळवी यांसारख्या मं डळींना आवाहन करायला हवे
काँ गर् े समधील एन.एम कांबळे , नासिकराव तिरपु डे , दाता रूपवते इ. यांची विचारणा व्हावी.
चित्र जो वर स्पष्ट होत नाही, तोवर लोक इकडे यायला बघतील. आं बेडकरी ऐक्य /
रिप. ऐक्य ही एक
$$$$$
ताकद व्हावी, असे ज्या अन्य पक्षात काम करणाऱ्या अथवा आयत्याची भूमिका घे ऊन व
गटबाजीला कंटाळू न चार हात दरू आहे त असे सक्षम, जाणकार व वै चारिक पात्रता
तथा कार्य-कर्तृत्व बाळगून आहे त. असे कार्यकर्ते त्यां च्या समोर रिप. पक्षाची सर्व
राष्ट् रीय पक्ष महत्त्वाच्या प्रश्नां वरची भूमिका स्पष्ट व्हायला हवी आहे . खु ल्या
आर्थिक धोरणाबाबत रिप. पक्षाचे मत काय? एन्रॉन हटावा, असे रिप. पक्षात वाटत
नाही काय? यु तीच्या सरकारात चु कीच्या निर्णयां वर रिप. पक्षाची भूमिका ने मकी काय
आहे ? अल्पसं ख्यांक आयोग रद्द करण्यात आला. श्रीकृष्ण आँ योग गु ं डाळण्यात आला
याबाबत रिप. पक्षाची भूमिका स्पष्ट व्हायला हवी.
शे तसारा जमीन प्रश्नांबाबत रिप. पक्षाची भूमिका ने मकी काय आहे ? सामाजिक
विषमता नष्ट करणारा रिप. पक्षाचा ने मका कार्यक् रम काय आहे ? सांपर् दायिक
जातीयवादी शक्तीबरोबर फुले -आं बेडकरवाद्यांचे वै चारिक सख्य होऊ शकत नाही, अशा
वे ळेस रिप. से ना ने त्यां शी भाजपच्या कार्यकर्त्यां शी जे जिव्हाळ्याचे सं बंध आहे व
मै तर् ीचे सं बंध आहे व ते तु टणार आहे काय? काहीं काँ गर् े सवाल्यां शी दोस्ती आहे , ती
तु टणार आहे की ते काँ गर् े स वाद्यांचे हातचे बाहुले बनून राहणार आहे त? काही लोकांनी
वै चारिक दिवाळखोरी केली आर्थिक भ्रष्टाचार केला फुले -आं बेडकरवाद लाचारी
पत्करली क् रां तीच्या गप्पा मारीत असत. अत्यं त षंढाचं राजकारण केलं ते त्यांनी
कबूल केले का? यापु ढे तशी चूक होणार नाही याची खात्री दिली आहे का? काशीराम
यांना बहुजन पक्ष रिप. ऐक्यात घ्यावा पण त्यांनी आपण B. J. P. बरोबर गे लो, ही चूक
झाली, हे कबु ल व्हावं . अशी अट जनता टाकत आहे . तशी अट यां च्या बाबतही टाकता
ये ईल अन्यथा मै दानात लढणाऱ्या व आं बेडकरी राजकारण करून सं घर्षाच्या वाटे ने
जाणाऱ्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना सततचा धोका या पु ढाऱ्यांपासून वाटत राहील
पु ढारी कितीत विकला जातो हे एकदा कळले की त्याचा रे ट वाढवून समाज विकत
94
घ्यायला वे ळ लागत नाही. हे जनते ला, विरोधकांना ने मके ठाऊक आहे , ते व्हा पक्षाची
भूमिका ने मकी स्पष्ट व्हायला हवी.
जनते ला हे ठाऊक आहे व जनमानसात हीच चर्चा आहे , की आगामी सर्वत्रिक
निवडणु कीत काँ गर् े स बरोबर रिप. पक्ष गोदामात कोठे घबाड मिळाले , असे समजावे .
स्वतं तर् निवडणु का लढवल्या तर भाजप से नावाल्यांनी यांना खिशात टाकले असे
समजावे . रिप. पक्ष डाव्या लोकशाही आघाडी बरोबर राहिला तर योग्य मार्गां वर आतून
ने मका दिशे ने वाटचाल करतो आहे , असे समजावे . ही अगदी तळातल्या सामान्य
मतांची चर्चा आहे . ने तेमंडळींनी व त्यां च्या छोट्या छोट्या गावपातळीतीलआवृ त्यांनी
ही बाब गां भीर्याने लक्षात घ्यावी.
वरिष्ठांचे ऐक्य झाले तरी स्थानिक पातळीवर ऐक् य प्रक्रिये त फार मोठा
रस्सीखे च सु रू झाली आहे . आणि ते स्वाभाविकच आहे . महत्त्वाच्या प्रमु ख पक्षालाही
आपणच लायक
$$$$$
आहोत. असे प्रत्ये क गटातला कार्यकर्ता म्हणू लागला आहे त्यामु ळेच पक्षीय रचना
वाटे त अं मलात ये णे आवश्यक आहे . कामाचे वाटप व इच्छुकांना काम करण्याची सं धी
मिळावी, या दृष्टीने पक्षाची घटना, कार्यपद्धती यायला हवी. अध्यक्षीय मं डळापासून ही
बां धणी सु रू व्हावी. अध्यक्षीय मं डळातल्या सदस्यांनी सर्व प्रथम राजीनामा दे ऊन
बरखास्त करून अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायला हवी. पक्षांतर्गत निवडणु कां द्वारे दोन
वर्षांसाठी कार्यक्षम अध्यक्ष निवडला जातो. ज्यांनी मोक्याची पक्ष पदे उपभोगली आहे त,
त्यांनी जाणीवपूर्वक निवडणूक प्रक्रिये तन ू दरू राहावे . समाजाचे हित लक्षात घे ऊन,
ने ते, पक्ष, विराजमान व्हावे व अनु भवाधिष्ठित मोठ्यांनी मार्गदर्शन करावे .
यातून नवा ने ता पु ढे ये ऊ शकेल कदाचित खराखु रा आं बेडकरवादी कार्यकर्ता
सं पर्ण
ू समाजाला मिळू न जाईल हीच पद्धत खालपर्यं त यावी. अध्यक्षीय मं डळाला
कार्यकर्त्यांची मर्जी राखून त्यांना खु श करण्यासाठी स्वतः च्या विभागात जे सभा
घे ण्याचे खे ळ सु रू झाले त्यांना यातूनच योग्य आळा घालू शकतो.
दुसरे व महत्त्वाचे म्हणजे पॅ ं थर यांसारखी नवीन पु नर्रचित एखादी सामाजिक
सं घटना आज असायला हवी. वे गवे गळ्या सभे त काम करणाऱ्या जनसं घटना तर
हव्याच, पण क् रां तिकारक सु धारणा आले ली एखादी सामाजिक सं घटना असायलाच हवी
प्रत्यक्ष राजकारणात भाग घे ऊन चालणार नाहीत. तर उमे दीतले , अनु भवाच्या आधारे
भविष्यात राजकारण करू इच्छितात असे भावी कार्यकर्ते या सं घटने तन ू तयार होऊ
शकतील. वाचन, ले खन, चिं तन करून तयार होतील कोणतीही तडजोड न करता यातील
विषमता व अन्य प्रश्नावर विद्रोही भूमिका घे तील. रिप. पक्षाला राजकीय असल्याने
तडजोडी व नव्या जोडाजोड करीत वाटचाल करावी लागे ल अवघा समाज जोडतांना मने
जोडणारा मध्यम मार्ग स्वीकारून बे रजे चे व सं पर्ण ू समाजाचे राजकारण त्यांना करावे
लागे ल. राजकीय क्षितीजा आवरून विचारात बु द्ध ठे वून उच्चारातून बु द्ध बाळगावा
लागे ल. आमचे तु मचे धिक्कारावे लागे ल. मानसिकता न बदलले ल्या भारतीय समाजाला
सोबत घे ऊन जाताना पु न्हा महाराजांचे, बौद्धांचे राजकारणाचे शिक्के नाही याची
खबरदारी पाळावी लागे ल.
गे ल्या काही वर्षात आं बेडकरी चळवळीला बु द्धीवादाचे वावडे होते . शिकले ला
कार्यकर्ता हा टिं गलटवाळकीचा विषय झाला होता. कार्यकर्त्यांमधला सं वाद तु टला
होता. तो सं वाद सु रू करावा लागे ल. खराखु रा फुले आं बेडकरी विचारसरणीचा सशक्त
सं वाद प्रवाह ट् रेंड तयार करावा लागे ल. पु ढाऱ्यांनी आजवर आपला सोयीनु सार
बाबासाहे ब सां गितले त. खरे कोण सां गतो. हे कार्यकर्त्यांना व अनु यायी जनते ला
95
कळे नासे झाले आहे . ‘ऐक्य’ म्हटले की लोक हरवून जातात त्यासाठी उपोषण करतात.
आं दोलनाचा इशारा दे तात. दगडफेक करतात. तोडून टाकण्याची भाषा करतात ने मका
चु कार हे रून ने त्यावर बहिष्कार टाकणारा,
$$$$$
बार मध्ये जाणारे , गु ं डागर्दी करून भाई झाले ले, खं डणी वसूल करणारे कार्यकर्ते
प्रमु ख पदी हवे त. से नेची मु ले दादागिरी करतात. आपली का नको अन मु क्ती वाद केला
जातो. पण शे वटी गु ं ड हा गु न्हे गारच असतो. तो कोणत्याही पक्षाचा अथवा चळवळीचा
नसतो. तो कधीही विकला जाऊ शकतो. अलीकडे भाई लोकांना पदक दे ण्याचं थ्रिल
कार्यकर्ते जपत आले त.चै त्यभूमीवरील घटने ला साक्षी ऐक्याच्या घोषने नंतच्या सभा
ऐकल्या २८ जाने वारी ९६ ची सभा ऐकली व काही प्रश्न अनु त्तरीत राहिले . फार मन
लावून सभा ऐकल्या ले ख वाचले निवे दने वृ त्त वाचली.
$$$$$
प्रकरण : ३
पँथर शहिदांची गाथा
१) पँ थर्सना स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा मिळावा
२) पँ थर चळवळीतील पहिला शहीद : भागवत जाधव
३) पँ थर शहीद : आनंद एस. मुत्तू
४) शहीद बाबा मोरे
96
५) पँ थर शहीद : रामकिशन करौतिया
६) शहीद पँ थर : दे वराम लिहितकर
७) स्मृ तिशे ष प्रकाश सावं त यांचा सामाजिक जीवनपट
८) स्मृ तिशे ष पँ थर : मनोहर अं कुश
९) स्मृ तिशे ष : रामसिं ग धनाजी सोनवणे
१०) स्मृ तिशे ष : मिलिं द रणदिवे
११) शोकसभा वृत्तांत
- वामनदादा कर्डक
$$$$$
राष्ट् रीय सन्मानाने मानवं दना दे तील. समाज व दे शासाठी लढणाऱ्या या सै निकांना
सर्वतोपरी सन्मानीत करणे बं धनकारक राहील असे कायदे अशी व्यवस्था तयार करण्याचे
काम आता समता सै निकांनी करायला हवे आहे . आजपर्यं त कोणत्याही सामाजिक
सै निकाला, शहीदाला स्वातंत्र्य सै निकाचा दर्जा दिला गे ला नाही. सामूहिक
हत्याकांडात जे लोक मारले गे ले. रस्त्यावरच्या लढाईत जे लोक शहीद झाले . जात धर्म
धनदांडग्यां च्या विरोधात निर्भयणे भूमिका घे ऊन, चळवळी उभारून , वै चारिक यु द्ध
पु कारून जे लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले त्या शूर सै निकां च्या मृ त्यूचे मोल कमी का
ले खले गे ले? हा सवाल यापु ढील पीढीने आत्ता विचारायलाच पाहिजे . शहीदांना
यामु ळे न्याय मिळे ल असे नव्हे , नु कसान भरपाई होईल असे नव्हे . मात्र त्यातून नवी
समाजव्यवस्था तयार व्हायला मदत होईल हे मात्र निश्चित.
प्रबोधनाच्या आभियानाची, जात धर्म धनदांडग्या प्रवृ त्तीचा समूळ नाश
करणारी कोणती यं तर् णा किंवा योजना आजवर दे शातल्या सत्ते वरील किंवा सत्ते बाहे रील
पक्षसं घटनांनी राबविली नाही. महाराष्ट् र सरकारच्या काही योजना गाव पातळीवर
पोहचतात पण त्या जात धर्म- अर्थ भे दवृ तीला स्पर्शही करीत नाहीत ‘तं टामु क्त गाव’,
‘हागणदारी मु क्त गां व’, ‘गाडगे बाबा स्वच्छता अभियान’ सारख्या योजना सं पशे ल
फसल्यात. या योजनांचा अन् समाज मनाच्या 'मु क्तीचा' अथवा 'स्वच्छते चा' काहीही
सं बंध नाही. गावोगावी तं टे होतात त्यांना मिटविण्यासाठी समित्या असतात त्या
समित्यात त्या त्या विभागातील राजकारणात सक् रीय असले ले लोकप्रतिनिधी घे तले
जातात परिणामी स्थानिक पातळीवरील राजकीय धे डांचा या सर्व प्रक्रिये वर फार
मोठा दबदबा असतो. यामु ळे सारे 'परिवर्तन' मरून जाते . म्हणजे स्थानिक राजकारणातले
हे प्रतिनिधी फार सज्जन वगै रे असतात, जबाबदार असतात त्यां च्या मनात काही
जात-धर्म वगै रे भे द नसतात असं मानून आखले ल्या या योजना आहे त.
98
गावोगावी ‘कीर्तने ’ होतात, ‘हरिनाम सप्ताह' होतात, भजन, पूजन, तु ळशी माळ
घालणे , बै ठकांना बसणे , स्वाध्याय परिपाठ, वगै रे बऱ्याच घडामोडी चालू असतात पण हे
सारे प्रकार माणसांना स्वाभिमान बहाल करून समानते ने वागा व जात धर्मापलिकडे
जा असे सां गणारे नसतात. तिथे गे लला माणूस भक्तीप्रवण होतो. थोडा पापभिरु होतो,
सज्जनपनाचा काही काळ बु रखा पां घरतो पण जाती धर्म-अर्थभे दा बाबत तितकाच
कर्मठ, मागास विचारांचा असतो. अने कदा न्यूनगं डाच्या आहारी जाऊन आत्महत्ये चा
मार्ग पत्करणारा पराभूत - वृ त्तीचा होतो. आजचे राज्यकर्ते पारं परिक आकृतीबं धाचा
गौरव व वापर करण्याऐवजी लोककलां च्या नावे पु न्हा या कालबाह्य विचारांना खतपाणी
घालतात. लोकपरं परां च्या आकृतीबं धाचा वापर करून सरकारी पक्षाला नवे प्रबोधक
तयार करता ये ऊ
$$$$$
शकतात पण आपली 'जात' आपला 'धर्म' व आपली उच्चवर्णीय प्रतिष्ठा त्यातून धु ळीस
मिळे ल याची भिती राज्यकर्यांना वाटते की काय ? कारण सारे राज्यकर्ते उच्चवर्णीय
किंवा उच्चवर्णीयां च्या बाजूचे आहे त हे वास्तव नाकारता ये त नाही.
जे व्यवस्थे च्या विरोधात जातात, सं विधांनातील मु लभूत अधिकारांची गळचे पी
होते म्हणून प्रचार करतात. जनसमु हांना क् रूर चे हरा दाखवण्याचा मार्ग अवलं बतात
त्यांच्यावर यु .ए.पी.ए ,राडा, एन, एस, ए, मिसा, पोटा वगै रे गु न्हे दाखल करून
तु रुं गात डांबनू त्याच्या सत्कार्यासाठीची काही वर्षे सडवून टाकतात. या व्यवस्था
विरोधकाचे माध्यम गाणे असो, कविता, कथा, कादं बरी किंवा वै चारिक ले खन असो
त्यांना सत्ताधारी वर्गाचे लोक हिं सक मानतात. स्फोटक अन जनमताचा भडका
उडविणारी हत्यारे किंवा भावना दुखावणारे , षडयं तर् मानून खोट्या निराधार गु न्ह्यात
अडकवतात. ‘नक्षलवादी’ अन ‘दे शद्रोही’ 'अतिरे की' या आरोपांचे तथ्य, उलगडणारी,
अन्वयार्थ लावणारी सत्यशोधन समिती अस्तित्वात यायला हवी. न्यायालयात
जाण्यापूर्वी त्या त्या राज्यात निरपे क्ष कार्य करण्याचे अधिकार अशा मानवी हक्क
आयोगाच्या समित्यांना असावे त आणि त्यांनाही तपासणारी अशी अनियं त्रित
न्यायदान (बहुदा से वा निवृ त्त न्यायमूर्ती, पोलिस अधिकाऱ्यांची) समिती अस्तिखात
असावी, या समितीत जात धर्म, प्रतिनिधीत्व घटकांचा समावे श असावा.
दलित पँ थरच्या बरखास्ती पर्यन्त (१९८९) जे लढाऊ लोक व्यवस्थे शी सं घर्ष
करताना धारातिर्थी पडले त्यांना सरसकट 'शहीद' म्हणायला हरकत नाही. मात्र पँ थर
चळवळीत कार्य करताना व नं तरही नै सर्गिक मृ त्यू आले ल्यांना शहीद म्हणून
स्वीकारायला समतावादी समाज तयार होत नाही. पॅ थर अस्तीत्वात असे पर्यन्तच्या
लढाऊ सै निकांना त्यां च्या मृ त्यूनंतर स्मृ तिशे ष ही उपाधी लावली जाते . कारण
आठवणींच्या रूपाने जे शिल्लक राहिले ते ‘स्मृ तिशे ष’ होत . विचारांनी बदलले ला समाज
‘कैलासवाशी’, ‘स्वर्गवाशी’, ‘दिवं गत’, 'कालकथित' असे विशे षण न लावता 'स्मृ तिशे ष
म्हणणे च मान्य करतात. आपल्या मागचा जनसमु ह किंवा आपली ताकद कमी पडली
म्हणून जे मृ त्यूला कवटाळतात किंवा शत्रूवत विषम व्यवस्थे चे बळी ठरतात त्या
शहिदांना त्रिवार वं दन !
शहिदांचा स्मृ तीदिन समाजासाठी स्फू र्तीदिन असतो. हा स्फुर्तीदिन पु ढील अने क
पिढ्यांना प्रेरणा दे त असतो. या दिवशी रडगाणे गायचे नसते . तर गं भीरपूर्वक
आळवायचे असते , वीरगाणे , शहिदांची जीवने नवी चे तना आणतात, मरुनही जीवन
जगण्यात धन्यता असते याचा पु न्हा पु न्हा प्रत्यय आणून दे तात, जगात रोज अने क
99
जीव जन्माला ये तात अन् नष्टही होतात; पण लोक काहीच जीवांना स्मरतात;
अनु सरतात व वं दनीय मानतात. मरणाचा सोहळा होण्याचा सन्मान मिळतो शहिदांना!
$$$$$
आं बेडकरी चळवळीत अने क शहीद झाले त. आबे डकरी अनु यायांचे हे यु द्ध
स्वकियां विरुद्ध होते व आजही अस्तित्वात आहे मात्र यामु ळे ते कमी मोलाचे आहे . असे
मात्र नाही. व्यक्तिला, समाजाला, राष्ट् राला राजकीय स्वातं त्र्याची जितकी
आवश्यकता असते तितकीच किंबहुना त्याच्यापे क्षा जास्त सामाजिक, मानसिक,
भावनिक, सां स्कृतिक स्वातं त्र्याची आवश्यकता असते . राजकीय स्वातं त्र्यासाठी
लढणाऱ्याला स्वातं त्र्य सै निक म्हणून सन्मान मिळतो तो. 'समते साठी' लढणाऱ्या
'सै निकाला' आजवर मिळाले ला नाही. समता सै निक सु द्धा मानवता प्राप्त करून
घे ण्यासाठी, आपल्या मु क्तीसाठी प्रसं गी प्राणही गमावतो, मात्र 'समाज'साठी
मरणाऱ्यांचे जीवन आजही राज्यकर्त्यां च्यादृष्टीने स्वातं त्र्य सै निकाचे जीवन ठरत नाही.
ही मोठी खं त शहीदां बाबत अस्तित्वात असल्याचे दिसते . आं बेडकरी चळवळीतल्या
शहीदांना आजवर असे च उपे क्षित जीवन जगावे लागले असले तरी जनते कडून
मिळणाऱ्या सन्मानात काही कमतरता राहिली आहे असे म्हणता ये त नाही. जनते ने,
जनते च्या कालावत प्रतिनिधीनी ले खणीद्वारे या शहिदांना अभिवादन केले ले आहे .
$$$$$
100
गां भिर्याने साजरा होई. या कार्यक् रमातून अने कांना बळ मिळत असे . हळू हळू शहीद
दिनांतील गां भीर्य लोप पावत असल्याचे दिसते . शहीद भागवत जाधववर आदरांजली
वाहणारे गीत, पँ थर कवी मनोहर जाधव याने लिहिले होते . पँ थरच्या अने क मोर्चा,
आं दोलनात, अधिवे शनात ते जनसमु दायाला चे तवी व भागवतच्या स्मृ ती जाग्या करी.
मनोहरने लिहिले होते –
क् रां तिपु त्र भागवत रामजी जाधव याचा जन्म २४ एप्रिल १९४८ रोजी
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालु क्यातील तडदहसोळ या गावी झाला. वडील
मुं बईत म्यु न्सिपल कामगार होते , भागवतचे शिक्षण ठाकू रद्वारच्या आयडियल मॉर्मिं ग
स्कू लमध्ये व नं तर इ. १० वी पर्यं त भायखळा नाईट हायस्कू लमध्ये झाले . पु ढे त्याने
इं डियन टे क्निकल इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घे त आपली नाट्यकला जोपासली.
दलितां वरील अन्याय अत्याचाराच्या घटना वाचून तो अस्वस्थ होत असे . नं तर तो
पँ थरच्या चळवळीत सक् रीय झाला आणि एक धाडसी पँ थर म्हणून वावरू लागला.
आर. डी. भं डारे यांची बिहारच्या राज्यपालपदी ने मणूक झाल्याने त्यां च्या
मतदारसं घातील जागा रिकामी झाली होती. मध्य मुं बईतील ही मध्यावधी,
पोटनिवडणूक दि. १३ जाने वारी १९७४ रोजी घे ण्यात ये णार होती. या निवडणु कीत इं दिरा
काँ गर् े सचे रामराव आदिक, भा. जनसं घाचे व्ही. आर. पं डित, हिं दु महासभे चे विक् रम
सावरकर व कम्यु निस्ट पक्षाच्या रोझा दे शपांडे हे प्रमु ख उमे दवार होते . काँ गर् े सच्या
उमे दवारांस भारतीय रिपब्लिकन पक्ष व शिवसे ना यांचा पाठिं बा होता. पँ थरने या
निवडणु कीवर बहिष्कार टाकायचे ठरविले होते . मात्र काँ गर् े सने प्रकाशित केले ल्या
प्रसिद्धीपत्रकात पँ थरने काँ गर् े सला पाठिं बा दिल्याचे जाहीर केले होते . या निवडणु कीत
101
पँ थरचा निर्णय अत्यं त महत्त्वाचा ठरणार होता. कारण जनते ची सहानु भत ू ी व कल
पँ थरकडे होता. अशा वे ळेस आपल्याबाबत आले ला खोटा प्रचार खोडून टाकण्यासाठी
आं बेडकर मै दानावर पँ थरने दि. ५ जाने वारी १९७४ रोजी एक सभा आयोजित केली
होतो. आं बेडकर मै दानावर सभा चालू असताना व्यासपीठाच्या दिशे ने दगड
भिरकावण्यात आले . सर्वत्र गोंधळ माजला पँ थरचे ने ते जखमी झाले . पोलिसांनीही
पँ थरच्या राजा ढालें सह एकू ण एकोणीस 'जणांना अटक केली. अटक केले ल्या ने त्यांना
सोडून दे ण्यात यावे या मागणीसाठी यु वक क् रां तीदलाने मोर्चा काढला. पँ थरने ही एक
स्वतं तर् मोर्चा काढला. सु रुवातीला छोटा असले ला मोर्चा पु ढे खूप मोठा झाला.
मोर्चातील महिलांना भागवत जाधव मार्गदर्शन करीत होता. सावधानते च्या सूचना दे त
होता आणि रे ल्वे वर्क शॉप भागात अचानक वरून एक पाट्यासारखा सिमें टचा मोठा
तु कडा फेकला गे ला. हा भिरभिरणारा तु कडा सरळ भागवत जाधवच्या डोक्यात बसला.
त्याचा जखमी दे ह भागवतचे मोठे भाऊ सी.रा. जाधव व अन्य पँ थर्सनी उचलून धरला.
भागवतला उपचारासाठी के.ई.एम. इस्पितळात ने ण्यासाठी धावपळ सु रु झाली. एक
मनस्वी कलावं ताची जीवन धडपड चालली होती आणि इस्पितळात ने ता ने ताच
भागवतची तडफड शांत झाली. विषमतावादी व्यवस्थे ने एका पँ थरचा बळी घे तला
होता!
पँ थरच्या सभे त झाले ल्या दगडफेकीनं तर वरळीचे वातावरण सतत धु मसत
राहिले . जाने वारी ते एप्रिल या चार महिन्यात वरळीत दं गलीच्या एकू ण सत्तावीस
घटना घडल्या. त्यात एकू ण सात माणसांचा मृ त्यू झाला व जवळपास चौऱ्याहत्तर लोक
जखमी झाले या सात मृ तांपैकी चार नवबौद्ध होते तर तीन हिं द ू होते . वरळीत दं गलीची
चौकशी करण्यासाठी 'भस्मे आयोगाची’ घोषणा करण्यात आली. मात्र या चौकशी
आयोगाला पँ थरने
$$$$$
विरोध दर्शविला. दं गलीची कारणे शोधण्यासाठी कम्यु निस्ट व .सोशॅ लिस्ट पक्षांनीही
स्वतं तर् समिती स्थापन केली होती. वसं तराव नाईकांचे सरकार महाराष्ट् रात सत्ते वर
असतांना त्यानीच हा 'भस्मे आयोग' घोषित केला. मात्र पु ढे या आयोगाचे काय झाले हे
कोणालाही कळले नाही. पं थरच्या हिं द ू दे वदे वतां वरील प्रक्षोभक टिकेमु ळे ही दं गल
घडली असा जो प्रचार वृ त्तपत्रांनी केला होता तो अपप्रचार असल्याचे स्पष्ट झाले .
आं बेडकर मै दानातील सभे त कोणीही निं दानालस्ती करणारी भाषणे केली नव्हती. मग
दं गल का उसळली? तर इथे ही दं गल घडवून आणण्याचा व पँ थरच्या ताकदीला दडपून
टाकण्याचा तो एक पूर्वनियोजित कट होता. पँ थरचे अस्तित्व ही ज्यांची डोकेदुखी होती
त्यांना पँ थरला चिरडायचे होते . पोलीस प्रमु ख बलसारा व कनोजिया यांची भूमिका
पक्षपाती असल्याचे दिसले होते . भस्मे कमिशनने कम्यु निस्टां वर ठपका ठे वला ही
गोष्टही मनाला खटकते . मात्र आयोगानी म्हटले आहे की, "दं गल काळातील हिं दच ू े
वागणे अगदी असहिष्णू होते .' थोडक्यात काय तर इतर काही आयोगाप्रमाणे हाही
आयोग फार काही मु ळाशी जाऊन सत्य शोधू शकला नाही. 'भस्मे कंमिशन'ने भागवत
जाधवच्या डोक्यात पडले ल्या पाट्याची, "तु कड्याबाबतची ही घटनाही फारशी
गां भीर्याने घे तली नाही.
मृ त्यु चे गूढ उकलले गे ले नाही. ज्या 'विषम व्यवस्थे तील एक छोटी व्यवस्था
म्हणजे असे 'आयोग' आहे त ते आपल्याला न्याय दे वू शकणार नाहीत असे त्यावे ळी
पँ थरला वाटत होते . त्यामु ळे त्याचवे ळी त्यांनी भस्मे आयोगावर अविश्वास दर्शविला
होता. सत्ते वरील सरकार आणि आयोग भागवतला न्याय दे ऊ शकले किंवा नाही हे स्पष्ट
102
होत गे ले आहे . मात्र एवढे खरे की आं बेडकरी जनते च्या मनामनात वसले ली भागवतची
प्रतिमा कोणाला पु सता ये णार नाही. ते च भागवतचे उचित स्मारक आहे . भागवतच्या
मृ त्यु ने दिले ला सं देश कवी बबन लव्हात्रे नमूद करतो, तो मला मोलाचा वाटतो.
लव्हात्रे म्हणतात –
पु स्तिकेत जो इशारा दिला अन् आपल्या शत्रूचा परिचय करून दिलाय तो सं देश
आं बेडकरवाद्यांनी लक्षात ठे वायलाच हवा. वसं त धामणकर लिहितात, 'माझे परमप्रिय
स्ने ही क् रां तीपु त्र भागवत रामजी जाधव यांचा क् रूर बळी घे ऊन जात्यां ध
प्रस्थापितांनी, लाल भाईच्या कपटी बगलबच्च्यांनी, फसव्या लोकशाहीच्या
बांडगु ळांनी आणि त्यां च्या हुकू माची तामिली करणाऱ्या गद्दार गै ररिपब्लिकन पु ढाऱ्यानी
जो आक् रस्ताळे पणा केला आहे तो अक्षम्य आहे . भागवतच्या रक्ताशी इमान राखरा
पँ थर्स ते रक्त वाया जाऊ दे णार नाहीत. भागवतच्या आणि अन्य पँ थर्सच्या रक्ताची
किंमत केव्हातरी या नराधमांना मोजावी लागणार आहे . ती वे ळ लवकरच ये वो.
धामणकरांनी सां गितले ले धर्मां ध, सत्ताधारी व आं बेडकरद्रोही आजही तसे च
समोर ठाकले ले आहे त; त्यांना भु ईसपाट करणारी यं तर् णा उभी करण्याची ताकद,
नक्कीच ये ईल याची मला खात्री वाटते .
103
$$$$$
ठाणे जिल्हयातील पँ थरचा पहिला शहिद हा आनं द एस्. मॅत्तू. त्याचे मूळचे नाव
होते मॅ थ्थू.
मॅत्तू तामिळनाडूतील होता. त्याची मातृ भाषा तमिळ होती. काही वर्षांपासून तो
महाराष्ट् रातल्या ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर ये थे आं बेडकर नगर, चोपडा कोर्ट
परिसरात राहात होता. मु त्तू अल्पशिक्षित असला तरी त्याच्यात प्रचं ड सामाजिक
बां धिलकी होती. अन्यायाविरुद्ध मनात चिड निर्माण होत असल्याने त्याने १९७४ पासून
पँ थर सं घटने त काम करायला सु रुवात केली. ठाणे जिल्हा दलित पँ थर सं घटने त त्याला
सं रक्षणप्रमु ख हे पद दे ण्यात आले . छोटे कुटु ं ब अन् सु खी सं सार होता. मु त्तल ू ा एक
कन्या होती. मु त्तू उंचापु रा अन धिप्पाड यु वक होता. त्याचा भाषणापे क्षा काम करण्यावर
भर होता. मु त्तच्ू या मनात प्रचं ड आशावाद अन कार्य करण्याचे धाडस होते . पँ थर
चळवळही प्रस्थापित व्यवस्थे चा बु रुज उध्वस्त करण्याचे कार्य पँ थर मु त्तल ू ा करायचे
होते . गै र मराठी भाषिक धाडसी यु वक म्हणून मु त्तच ू ी प्रतिमा जनमानसात पक्की झाली
होती. पँ थर सं घटना जात, धर्म, भाषा, प्रांत यांची बं धने तोडणारी सं घटना आहे अशी
मु त्तची
ू ठाम समजूत होती, तसा त्याचा विश्वास होता. या भावने तन ू च त्याने पँ थरमध्ये
राहणे पसं त केले होते , कल्याण मोहना जवळील तिपन्ना नगर आणि अं बरनाथमधील
तमिळ भाषिक बां धवां शी मु त्तच ू ा जवळू न सं बंध होता मु त्तू आणि श्यामदादा गायकवाड
यांचा स्ने ह होता. त्यांनी मु त्तचू े आनं द एस. मॅत्तू हे असे नामांतर केले . तथागत गौतम
बु द्धाचे परमशिष्य आनं द आणि बाबासाहे ब आं बेडकरांचे बं धू आनं द या दोन्ही
महत्वाच्या व्यक्तींचे नाव मॅ थ्थूला बहाल करण्यात आले होते . मु त्तू विषयी कवी किशोर
नरवडे १९७७ साली ‘बं ड’ मासिकात म्हणतो.
मे रे अजीज मे रे मीत
हृदय मे ज्वालामु खी और आखो में
अग्नी शिखाएँ ले कर
जीने वाले
सर्वंकष कान्ती के केंद्रबिं द मॅत्तू
दलितोंके मु क्तिसं गर् ामके वीर
अपनी करतूत से चमकणे वाले
$$$$$
ते जोपु ं ज
तु झे हमसे छिनने वाली
104
मनहस ू घडी
ते रे मरने की खबर
फैलाने वाला अखबार
अैसी खबर न लाता
तो
मे रा मन कहता
कान्तीवीर कभी नहीं मरते
वे रहते हे बनकर प्रेरणा
सदै वही रहते हैं चिरं जीव
ते रे रक्तकणोंका कणकण अंगारा
बनकर दहकेगा
हमारे सबके हृदयोमें
प्रेरक बने गा आतं क मचा दे गा
इस दे शके कोने कोने में !
मे री श्रद्धा अपार मे रे पॅ न्थर
ते रे स्मृ ति को एक नही
करोडो प्रणाम वारं वार
मु त्तू तथा मॅत्तूमु ळे अने क मराठी आणि हिं दी भाषिक यु वाकां ना प्रोत्साहन मिळत
असे . मॅत्तूच्या केवळ अस्तित्वाने अने क पँ थरच्या अं गात उत्साह सं चारत असे . मॅत्तू हा
धाडसी होता. बं डखोर होता. मात्र तो हिं सावादी किंवा गु न्हे गारी प्रवृ त्तीचा नव्हता.
अन्यायकर्त्याला मारझोड करणे , ठार मारणे अशी त्याची कार्यप्रणाली नव्हती तर
अन्यायकर्त्यां च्या बे बंद वागणु कीला लगाम घालून, अडथळा निर्माण करून त्याच्या
वर्तणु कीत बदल घडवून आणणारी परिवर्तनवादी अशी त्याची कार्यप्रणाली होती.
कोणत्याही पँ थरला समाजात वै चारिक बदल घडवायचा होता, सशस्तर् क् रां ती ही
आं बेडकरी विचारात बसत नाही हे जाणणारे सर्व पँ थर होते म्हणून सर्व पँ थर अन्यायाचा
प्रतिकार करणारे , सामाजिक प्रबोधन करणारे योध्दे होते . आनं द एस्. मॅत्तू हा त्या पै की
एक होता.
वरळीची दं गल आणि भागवत जाधवचे शहीद होणे या ऐतिहासिक घटना आनं द
एस्. मॅत्तू यां स माहित होत्या. डिसें १९७२ पासून म्हणजे कल्याणच्या सिद्धार्थ नगरात
पँ थरची छावणी उभी राहिली ते व्हा पासून घडले ल्या अने क नाट्यपूर्ण सं घर्षशील आणि
स्फोटक घटनांचा पॅ थरं मॅत्तू हा साक्षीदार होता. ठाणे जिल्हा पँ थरच्या पहिल्या
कार्यकारणीत सं रक्षण प्रमु ख होण्याचा मान पँ थर मॅत्तू यांस मिळाला होता. गरीब,
दुबळ्या, असहाय्य निराश्रीत जनते चे सं रक्षण करण्याचे काम मॅत्तूने अगदी निष्ठापूर्वक
केले .
$$$$$
105
राहिली. मु त्तू या वस्तीचा रहिवासी पॅ थर असल्यामु ळे सर्वां शी त्याची जिव्हाळ्याची
मै तर् ी होती. एके दिवशी कंपनीतील कामावरून तो आं बेडकरनगरात आला आपल्या
पत्नी व मु लीशी बोलत असतांना कोणी तरी त्याच्या कानावर घातले की जवळच
असले ल्या मोहटादे वीच्या मं दिराजवळील कौशल नगरात एका बौद्ध महिले वर अन्याय
झाला आहे . वे ळ साधारणत ८ ते ९ वाजे ची होती. त्यावे ळेस ते थे बी. बी. मोरे हे
कार्यकार्य आले . त्यांची दोघांची चर्चा झाली. मु त्तू अत्यं त अस्वस्थ झाला होता. तो
बी.बी. मोरे यांना म्हणाला की "चला आपण कौशल नगरला जाऊ. अन्यायाचे प्रकरण
समजून घे ऊ. चार पाच पँ थर कार्यकर्ते त्यात मोरे , खै रे, बागु ल, अन्यायकर्त्याच्या घरी
जाऊन चौकशी करू लागले. मु त्तचे ू तोंड त्या महिले च्या दाराकडे होते . विरोधकांनी तोवर
मारामारी सु रु केली. मु त्तन
ू े दोन माणसाना रोखून धरले . अरे हम बात करने कु आया है !
हम तु म्हारा लोग है ! हम पँ थर है ! असं समजण्यास पाठमोरा असताना मु त्तच्या ू डोक्यात
लोखं डी सळईची उपट टाकली. बे सावध असले ला निःशस्त्र व समजूत करायला
निघाले ला मु त्तू आपल्या अजस्त्र दे हासह चक्कर ये ऊन दारातच कोसळला. सारे पँ थर
गां गरून गे ले कारण सारे बे सावध होते . बी.बी.मोरे , खै रे अचानक झाले ल्या हल्याने
भे दरले . वस्तीत अं धार होता. त्यात काहींनी अं धाराचा आसरा घे तला व आपापला जीव
वाचवला, चोपडा आं बेडकर नगरात ही दु:ख वार्ता समजली. ते व्हा लाठ्या नं ग्या
तलवारी घे ऊन मोठ्या तरण्याबांड मु लांचा समूह कौशल नगराकडे धावत सूटला, मात्र
काहीही उपयोग झाला नाही, जमिनीवर कोसळल्यावर मु त्तू नावाचा निःशस्तर् भिम
सै निक गतप्राण झाल्यात जमा होता. उल्हासनगरच्या सें ट् रल हॉस्पीटलला ने ता ने ताच
मु त्तच
ू ा प्राण गे ला होता. गै र मराठी भाषिक, आं बेडकर विचारांचा निष्ठावं त तमिळ
मद्रासी भाषिक पँ थर महिले वरील अन्याय दरू करता करता शहीद झाला. तो दिवस
होता १८ जाने वारी १९७६ मु त्तचे ू भाऊ शहाडच्या सै च्यु री मिल मध्ये कामाला होते .
त्यांना निरोप पाठवण्यात आला. मु त्तची ू पत्नी मु त्तच्या
ू निष्प्राण दे हावर पडून हं बरडा
फोडून रडत होती. छोट्या मु लीला काही कळत नव्हतं . ती फक्त भिरभीर पाहात होती.
मु त्तच्या
ू शहीद होण्याची वार्ता सं पर्ण
ू ठाणे जिल्हयात वाऱ्यासारखी पसरली. अं बरनाथचे
पँ थर श्यामदादा गायकवाड आपल्या कार्यकर्त्यांसह धावून आले . अण्णासाहे ब रोकडे ,
रमे श जाधव, हरिदास दोंदे , बाळ भाले राव, विठ् ठल शिं दे, एकनाय जाधव, लक्ष्मण
गां गुर्डे, लक्ष्मण कोबाळकर, डब्ल्यू. जी उबाळे , एस.बी.
$$$$$
वाघमारे , मिलिं द रणदिवे , श्याम पं डित, दत्तू जाधव, अप्पा खै रे, साळवे ,अशोके बच्छाव,
चु डामण मोरे , रामसिं ग सोनवणे , हिरामय पगारे , बाबा मोरे रामकिशम करौतिया, सु भाष
करौतिया, प्रल्हाद साळवे , बाळ भोईर, सु रेश सावं त, पी.ओ. सोनवणे , असे अने क पक्ष
ू अं त्ययात्रा दुसऱ्या दिवशी
सं घटनाचे कार्यकर्ते मोठ्या सं ख्ये ने उपस्थित झाले . मु त्तची
दुपारी निघाली. शांतीनगरच्या स्मशानभूमीत अं त्यसं स्कार व शोकसभा झाली. या
शोकसभे ला पँथर अध्यक्ष राजाभाऊ ढाले , भाई सं गारे , ज.वि पवार अविनाश
महाते कर, रामदास आठवले उपस्थित राहिले होते .
पँथरच्या जिल्हा कार्यकारिणीने पँथर शहीद आनं द एस. मॅत्तू याच्या कुटु ं बाला
आर्थिक मदत दे ण्याचा व त्याच्या मु लीच्या शिक्षणाची जबाबदारी घे ण्याचा निर्णय
घे तला होता.
मु त्तच्या
ू हत्त्याऱ्यांत गु ं ड बौद्ध यु वकांचा हात होता. पै की खै रे आणि अजून
एकाला अटक करून तु रुं गात धाडण्यात आले . तरीही आनं द एस. मॅत्तू यास खराखु रा
न्याय मिळाला नाही. अजूनही लोक मु त्तच्या ू स्मारकाची वाट पहात आहे त. १९७६ ते
106
१९८१ पर्यन्त सलग पाच वर्ष मु त्तच ू ा शहिददिन, नित्यने माने पँ थरने साजरा केला पण पु ढे
पॅ थरच त्याला विसरून गे ले. पँ थर शहिद आनं द एस. मॅत्तू यां च्या आठवणींना उजाळा
दे त त्याला न्याय मिळे ल याची वाट आं बेडकरी जनता आजही पाहात आहे असे मोठया
कष्टाने च म्हणावे मु त्तचे ू बलिदान, त्याचा रणां गणात लढून सर्वस्व अर्पण करण्याचा
त्याग वाया जाऊ नये असे अनेकांना वाटते .
बहुतेक पँथर१९७४ नं तर मु त्तला ू पाहात आले होते. जमिनीवर फुफाट्यात बसून
अनेकांनी मु त्तलू ा ऐकले अन् पाहिले होते . त्याचं एकच भाषण असायचं - ‘मे रेकु बोलने कु
नय आताय, मै काम करने वाला पैं थर हँ ।ू हाम को बाबासाब के राय पर चलना हाय | आप
भाषण करो, बाकी जातीवाद के खिलाफ हम लड़े गा. हमे जियें गा. बाबासाब के लिए,
मरे गा पैं थर के लिए। "असं काहीसं तोडकं मोडकं मु त्तू बोलायचा. पण त्याने
म्हटल्याप्रमाणे तो पँथर चळवळीसाठीच शहीद झाला, सर्व कार्यकर्त्यामध्ये आपल्या
तब्बे तीमु ळे अनू डोईवरील दाट केसांमुळे मु त्तू उठू न दिसायचा. मु त्तू बाबत अने कांना
विचारले पण काही अपवाद वगळता मला कोणीही नीट माहिती दिल्ली नाही. एका
पँ थरची शहादत अशी दुर्लक्षणे आं बेडकरी चळवळीला परवडणारी नाही असे मला
खात्रीनं वाटतं .
'मु त्त'ू चे नाव 'आनं द' करणारे आणि मु त्तला
ू अतिशय जीव लावणारे पँ थर ने ते
श्यामदादा गायकवाड म्हणाले , "उल्हासनगरात १९७४ ला शे वटी छावण्या स्थापन
झाल्या. उल्हासनगरातील चोपडा कोर्टाजवळ पँ थरचे चां गले कार्यकर्त्यै कार्यरत होते .
बु धा खरोटे यांनी सॅ म्यु अल एस्. मॅत्तू या तमिळ कार्यकर्त्यांची ओळख करून दिली. मॅत्तू
दलित होता. पी.जी. पाटील यांनी त्याचे नामां तर केले . नाव आनं द एस्. मॅत्तू झाले . तो
स्वतः बौद्ध झाला,
$$$$$
बौद्ध होण्याची कोणीही अट घातले ली नव्हती. मॅत्तू पँ थरचा जिल्ह्याचा सं रक्षणमं तर् ी
झाला. प्रत्ये क वस्ती - वस्तीत मॅत्तू सोबत ये त असे . मु त्तू सावऱ्याच्या मोर्चात होता. तो
दर महिन्याला पँ थरला चां गली मदत द्यायचा. पँथर्स १८ जाने . १९७६ ला वाडा- -
मोखाड़ा दौऱ्यावर होते. रमे श जाधव माझ्या सोबत पँ थर दौऱ्यावर होता. आम्ही
भिवडीत पोहचलो. भिवं डी निजामपु रात फोन, मोबाईल नव्हते . आम्ही बोर्ड लिहिला.
आम्ही उल्हासनगरात आलो, पार्थिव तसे च ठे वले होते . साधारणतः १० हजार लोक जमा
झाले होते . मु त्तला
ू मारणारे लोक दलितांमधले च होते . एका बाईवर अन्याय झाला होता.
या अत्याचाराची दाद विचारण्यासाठी मूत्तू उल्हासनगरच्या कौशलनगरात गे ला होता.
त्याची हत्या झाली. पँ थर चळवळीचं खूप मोठ् नु कसान झालं . मु त्तू अत्यं त धाडसी पँ थर
होता. अत्यं त उमदा पँ थर अन् माणूस होता. वर्णन करायचे तर शिसवासारखा काळा,
रे खीव अन् धिप्पाड होता. बं डसाठी मु त्तन ू े विद्रोहीची जयभीम अॅक्शन घे तली ती
आम्ही ‘बं ड’च्या मु खपृ ष्ठावर छापली. मु त्तू सर्वार्थानं समर्पित कार्यकर्ता होता. त्याची
पत्नी आणि मु लगी नं तर हा परिसर सोडून निघून गे ली. त्याच्या अं त्ययात्रेत नामदे व
ढसाळ सोडून राजा ढाले अविनाश महाते कर, भाई सं गारे असे सर्वजण होते , मात्र
त्यावे ळच्या सभे त ते एकमे कां वर शे रेबाजी करीत होते .”
१९७६ चा पहिला स्मृ तिदिन पँथर्सनी केला. दलित पँ थर ठाणे जिल्हा अध्यक्ष -
प्र. स. रोकडे पँ थर माधवराव बोडे औरं गाबाद, पँ थर रं जन जगताप, नाशिक, पँ थर रमे श
कांबळे , पु णे पँथर सु भाष भोसले , पु णे , पँ थर, बाबु राव शे जवळ, मुं बई, पँ थर सयाजी
वाघमारे , पँ थर अविनाश ननावरे मुं बई, सु लोचनाबाई नगराळे नगर से विका कल्याण,
एस. बी. वाघमारे (भरतीय बौद्ध महासभा) हे प्रथम स्मृ तिनी उपस्थित होते , पँ थर्सना
107
उपस्थितीचे आवाहन करणाऱ्यांत सरचिटणीस श्याम गायकवाड, सं घटक रमे श जाधव,
भिवं डी पँ थर प्रमु ख यशवं त गायकवाड, भिवं डी तालु का उपप्रमु ख वसं त कां बळे , वाडा
तालु का प्रमु ख डॉ. जयवं त थोरात, सं घटक, एन. एस आढाव, मधु कर पं डित, बळीराम
गायकवाड बु धाजी खरोटे , कांचन उबाळे एकनाथ जाधव, बाबासाहे ब छत्तीसे यांचा
समावे श होता. रात्री ९ वा, दत्ता जाधव यांचा एक घोटभर पाण्यासाठी हा कार्यक् रम
आं बेडकरनगर उल्हासनगर- ३(चोपडा कोर्टाजवळ) ये थे सं पन्न झाला.
आनं द एस. मॅत्तू हा प्रारं भीच्या छावणी उद्घाटन प्रसं गी उपस्थित राहात असे .
कल्याण, मोहने , चिकणघर, बारावे म्हारळ आधारवाडी उन्हासनगर २, महाकाली
टे ंम्पल, शहाड फाटक, सम्राट अशोक नगर, स्टे शन विभाग, दहाचाळ विभाग,
सु भाषनगर, अं बरनाथ सावरे , ठाणे आनं दनगर, भिं वडी (निजामपूर) गोरसई, पडघे ,
नांदकर, दे वपे , मु रवाड
$$$$$
किन्हवली, कसारा, खर्डी (शहापूर तालुका) ये थे पँ थर सं रक्षण प्रमु ख आनं द एस. मॅत्तू
छावणी उद्घाटनाला उपस्थित असल्याची नोंद मिळते . त्यानं तर सतत पाच वर्षे
कार्यक् रम झाले . पु ढे लोकांनी बं द केले . मु त्तला
ू मरणोत्तर न्यायही मिळाला नाही.”
$$$$$
108
शहिद बाबा मोरे
(दि.१ जुन, १९८५ मोहना ता. कल्याण जि. ठाणे)
बाबा माधव मोरे याचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील गेवराई तालु क्यातील उमापूर हे
खे डेगाव. बाबाचा जन्म कल्याण मध्ये झाला. एन आर.सी. मोहना, गाळे गाव या
परिसरात मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातील काही कुटु ं बे रहिवासली त्या पै की बाबा
मोरे यां चे मोरे कुटु ं ब हे होय. माधव मोरे हे एन्. आर सीत कामगार म्हणून कामाला होते .
त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय रां गडे वाटावे असे होते . तब्बे तीने मजबूत असे वाटणारे
माधव मोरे . हे अतिशय प्रेमळ हृदयाचे ग्रहस्थ होते . बाबावर त्यांचे नितांत प्रेम होते .
बाबाने न्यू हायस्कू ल मधून अकरावीची परिक्षा पास केली होती. कल्याणचे शिवसै निक
अरविं द मोरे , किरण समे ळ हे बाबा मोरे याचे वर्गमित्र होते . बाबाला रमे श, चं दर् कांत,
शारदा व रं जना अशी चार भावं डे होती. बाबाची आई अत्यं त साधी असली तरी फारच
करारी होती. अत्यं त सु गरण असणारी आई फारच प्रेमळ होती. माणूसकी तिच्यात
ओतप्रोत भरले ली होती. बाबाची शरीरयष्टी आई - बाबासारखी मजबूत होती. बाबाची
परिस्थिती हालाखीची नव्हती; त्यामु ळे तो खात्या पित्या घरचा मु लगा होता. मध्यम
उंची, मजबूत बां धा, किंचित घारे डोळे , गोरा रं ग आणि चे हऱ्यावर सतत हासू. असं
त्याचं व्यक्तिमत्त्व कोणालाही आकर्षूण घे त असे . त्याच्या बोलण्यात मिश्कीलपणा
होता. अधून मधून विनोद करण्याची त्याला सवय होती. त्याच्या सहवासात कधी
कंटाळा ये त नसे . तो अत्यं त निर्भय अन् धाडसी होता. गावगु ं ड आणि दादा लोकांना तो
कधीच भीत नसे . मूळ कोकणातले लोक स्वतःला गाववाले समजतात आणि बाहे र
गावाहन ू आले ल्यांना बाहे रचे उपरे , घाटी समजतात. पण बाबाने हा भे द कधी मानला
नाही आणि गाववाल्यांना कधी जु मानले नाही. वयाच्या १८-१९ व्या वर्षी तो दलित
पँ थरच्या चळवळीकडे आकर्षित झाला. बं डखोर पँ थर आणि क् रां तिकारी वाटचाल
त्याला खूप आवडली. उत्पन्नाचे साधन शोधणे आवश्यक होते म्हणून बाबा १९७७/ ७८
साली एन्. आर.सी.च्या पॅ कींग खात्यात कामगार म्हणून रुजू झाला. १९७९ मध्ये
औरं गाबाद ये थील पै ठणगे ट ये थे राहाणाऱ्या अल्पशिक्षित पु ष्पा नावाच्या बौद्ध
यु वतीशी बाबा मोरे विवाहबद्ध झाला. बाबाने अतिशय सु खाने सं सार उभा केला.
विवाहानं तर त्या उभयतांना सं गर् ाम, कु. क् रां ती, आणि तक्षशीला अशी तीन अपत्त्ये
झाली. सं गर् ामच्या जन्माच्या वे ळी नामां तरांचे आं दोलन चालू होते . अशा सं घर्षकाळात
जन्मले ल्या मु लाचे नाव त्याने सं गर् ाम ठे वले . क् रां ती, तक्षशीला या नावांतन ू च
बाबाच्या मनात ठासून भरले ल्या आं बेडकरी बु द्ध तत्त्वज्ञानाचा परिचय होतो. बाबा मोरे
यास विवाहानं तर साधारणतः सहा वर्षे पु ष्पा मोरे यां च्याशी सं सार करता आला पण या
अल्पकाळातही बाबा मोरे यांनी आपल्या कुटु ं बाला पँ थरशी आणि समाजाशी जोडले .
आपल्या पत्नीला जीवापाड जपले आणि खूप सु ख दिले . त्यां च्या
$$$$$
पत्नी पु ष्पा मोरे म्हणतात, “ने हमी बाहे र राहाणारे माझे पती एखादा दिवस
आमच्यासाठी दे त. त्यांनी मला कधीही दुखावले नाही, मारहाण केली नाही. ते ने हमी
म्हणायचे मला बाहे रचं टें शन आहे , तु झा चे हरा ने हमी हसता पाहिजे . आत्याचा म्हणजे
त्यां च्या आईचा स्वभाव तापट होता. ते व्हा हे मला म्हणायचे आई काही बोलली तर
समजून घ्यायचं .” त्यांचा स्वभाव खोडकर, सिरीयस गोष्ट सां गितली तरी हसवत,
मस्करी करीत. कसा सं सार झाला कळलं च नाही. आम्ही नवरा-बायको असण्यापे क्षा
एकमे कांचे मित्र-मै त्रिणी होतो. मला ते 'मॅ डम' म्हणायचे .
109
एकदा छोटा भाऊ चं दर् कात अं बरनाथ आयटीआय मध्ये असतांना राजू रणदिवे ,
चं दर् कात या मु लांना शिवसै निकांनी घे रले . त्यावे ळेस बाबा मोरे आणि नरे श गायकवाड
यांनी मध्यस्थी केली मात्र ते थे से नेबरोबर मारामारी झाली. शिवसे नेशी दुष्मनीला
ते व्हा पासून सु रुवात झाली.
एन. आर. सीत कामाला असल्यामु ळे बाबा मोरे यांचा सं पर्क कामगार ने ते दत्ता
सामं त, टी.एस्. बोराडे यां च्याशी आला. दत्ता सामं तां च्या यु नियनमध्ये बाबा मोरे याला
खूप मान मिळू लागला. बाबा मोरे याचे वक्तव्य चां गले होते . पण त्याचा प्रभाव
अने कांना सहन होत नव्हता. गाववाल्यां च्या, शिवसै निकां च्या, कंपनी मालक केडिया
यां च्या, कॉ ंग्रेसवाल्यां च्या अन् पोलिसां च्या डोळ्यात बाबा मोरे खु पत होता. एन.आर.
सी. कंपनी १८ महिने बं द होती. दत्ता सामं तां च्या मार्गदर्शनाखाली बाबा मोरे यांनी
कंपनी सु रु केली. मालक आणि अन्य घटकांना बाबाचे कृत्य मान्य नव्हते . बाबाच्या
खूनाचा कट ते व्हाच शिजला होता. मात्र बाबा मोरे अतिशय निर्भय होऊन पँ थरसाठी
काम करीत होता आपला मार्ग न्यायाचा आहे आपण का कोणास भ्यायचे असा त्याचा
साधा सरळ हिशोब होता.
बाबा मोरे पँ थरच्या जिल्हापातळीवरील प्रत्ये क मोर्च्यात, आं दोलनात, चर्चेत,
बै ठकीत, सभा सं मेलनात भाग घे त असे . शहीद भागवत जाधव हा पँ थरचा पहिला
शहीद, त्याचा स्मृ तिदिन ‘शहीद स्मृ ती दिन’ म्हणून ठाणे जिल्ह्याच्या वतीने मोहन्यात
प्रतिवर्षी साजरा होत असे . या अभिवादन सभांना राजा ढाले , रामदास आठवले , दयानं द
मस्के, प्रा. अरुण कांबळे , गं गाधर गाडे , डॉ. माईसाहे ब आं बेडकर, श्याम गायकवाड,
सु रेश सावं त, राहुलन आं बावडे कर, श्याम पं डित, विठ् ठल शिं दे, एकनाथ जाधव, रमे श
जाधव, बाळ भोईर, अण्णासाहे ब रोकडे , एस. बी. वाघमारे , लक्ष्मण कोबाळकर, भोसले ,
बी.बी. मोरे , दत्तू जाधव, अशोक बच्छाव, बाळ भाले राव, हरिष दोंदे , विश्वनाथ जाधव
अशी जवळपास जिल्हा, तालु का आणि छावणी प्रमु खांची उपस्थिती लाभत होती.
मोहने परिसरात पँ थरची काही अधिवे शने झाली. काही महत्त्वाच्या सभा, बै ठका
झाल्या. दासू ठोंबे , शिवराम मोहिते ,
$$$$$
उध्दव गाडे , भोसले , अश्रू डोळस, बाबासाहे ब छत्तीसे , भाऊजी गायकवाड पु ढाकार
घे त असत.
बाबा मोरे यांनी नामां तर लढयात भाग घे तला. नामांतरासाठी काढण्यात आले ल्या
नामांतर सत्याग्रहात किंवा लॉगमार्चमध्ये बाबा मोरे आपल्या सहकाऱ्यासोबत
पोलिसां चा पहारा चु कवून औरं गाबाद पर्यं त पोहचला. मु रबाड तालु क्यात पँ थरने
उभारले ल्या भूमिहीन शे तमजूर आं दोलनात बाबा मोरे याने भाग घे तला. विनादे णगी
अने क विद्यार्थ्यांना बाबाने शाळा, महाविद्यालयात प्रवे श मिळू न दिला.
बाबा मोरे याचे एन. आर. सी. मोहने कंपनीशी जीवाभावाचे नाते होते . बाबा मोरे
याने मोहना परिसराला पँ थर चळवळीचे रूप दिले . सर्वसामान्य माणसाला त्याने निर्भय
केले अन् अन्यायाच्या विरोधात उभे राहायला शिकविले . बाबा मोरे हा एक पँ थर होता,
दत्ता सामं त यां च्या यु नियनचा कार्यकर्ता होता. त्याच्या या दुहेरी अस्तित्वामु ळे त्याची
अने कांना अडचण वाटत होती. यु नियनची अन् पँ थरची सं पर्ण ू ताकद त्याच्या पाठीशी
उभी होती. अने क लढाऊ यु वक त्याच्या सोबत राहात असत. पण तितक्याच प्रमाणात
त्याच्या शत्रुंची सं ख्या ही वाढली होती. शत्रुंच्या मनात जातीय, प्रादे शिक विखार
होता. मोरे वाहिनी म्हणतात कंपनीचे मालक, कां गर् े स पार्टी, शिवसे ना सं घटन असे सारे
110
एकत्रित ये ऊन षडयं तर् आखत होते . बाबा मोरे त्याकडे दुर्लक्ष करीत असे . त्याच्यावर
अने क छोटे -मोठे हल्ले झाले . कित्ये कदा काही गु ं डांनी पोलिसांना सोबत घे ऊन
पाठलाग केला व कोंडित पकडले पण बाबाने आपल्या बे डरवृ त्तीने कोणलाही जु मानले
नाही, तो आपले कर्तव्य करीत राहिला. अशा सं कट समयी सामान्य जनते ने बाबा मोरे
यास आपल्या कुटु ं बात, हृदयात आसरा दिला.
बाबाला शत्रूंची चाल समजली होती म्हणून सं रक्षणासाठी त्याने आपल्याजवळ
रिव्हॉल्वर बाळगली होती. एका विद्यार्थ्याला प्रवे श मिळवून दे ण्याची विनं ती
करण्यासाठी काही लोक त्याच्या घरी आले . सारे जण बाबासोबत जे वले . तिथून रिक्षाने
निघाले असता एक जवळचा कार्यकर्ता रे ल्वे लाईन पार करताना भे टला बाबाची पत्नी
पु ष्पा मोरे यांनी म्हटले तो माणूस रतन म्हात्रे होता. त्याने बाबाच्या जवळचा घोडा
(रिव्हॉल्वर) काढून घे तला. रिक्षा पु ढे गे ली. आधारवाडी कल्याणकडे जात असतांना एका
निर्जन स्थळी रिक्षा थांबली. बाबा विचारपूस करताच त्या एका ताटात जे वणाऱ्या
सु पारीबाज मित्रांनी हत्यारे काढली. बाबाने प्रतिकार केला. एक दोघांना जमिनीवर
लोळवले पण त्यातल्या काही जणांनी कमरे ला लपवले ल्या तलवारी उपसल्या आणि
बे सावध, निःशस्र बाबावर प्रहार केले . बाबा मोरे गतप्राण झाला. असा हा बे डर पँ थर
शहिद झाला.
बाबा मोरे यांचा मृ तदे ह कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पीटल मधून सजवले ल्या
ट् रकवर ठे वण्यात आला. ट् रक सजविण्यासाठी पँ थर्सजवळ काही रक्कम नव्हती.
अशावे ळेस पोलिस खात्यात से वेला असले ले पँ थर समर्थक वसं त गं भीर शिरसाठ हे
धाऊन आले . अं त्ययात्रेस सु रुवात झाली. अं त्ययात्रा कल्याणच्या डॉ. बाबासाहे ब
आं बेकर उद्यानाजवळू न
$$$$$
निघून मोहने , गाळे गावकडे जात होती. अने कांना हुंदके अनावर झाले . प्रत्ये क पँ थर
ने त्याच्या, कार्यकर्त्याच्या माता भगिनींच्या डोळ्यांत अश्रु होते . मोहने परिसरातील
मातांनी हं बरडा फोडला. ज्या एन्.आर.सी. कंपनीसाठी बाबाने सं घर्ष केला त्या
कंपनीच्या गे टवर अं त्ययात्रा ये ताच अने कां च्या मनाचा बां ध फुटला, सर्वत्र आक् रोश
दाटला.
बाबा मोरे यां च्या अं त्ययात्रेत स्वतः डॉ. दत्ता सामं त, टी. एस. बोराडे , प्रा.
अरुण कांबळे , रामदास आठवले , इ. मोठे ने ते उपस्थित होते . त्यांनी बाबाच्या स्मृ तिंना
अभिवादन केले . जवळ् पास पं धरा ते वीस हजार लोक अं त्ययात्रेत पायी चालत होते .
मारे कऱ्यांना पोलिसांनी अटक केली. ठाण्याच्या से शन कोर्टात खटला चालला. हे
हत्या प्रकरण मिटविण्यासाठी शिवसै निक शाबीर शे ख, आनं द दिघे , औरं गाबादचे भाऊ
जगन कांबळे यांनी मध्यस्थी केल्याचे पु ष्पा मोरे सां गतात. त्यांचे औरं गाबादचे भाऊ
जगन कांबळे यां च्यावर दबाब टाकू न दहा लाखात हे प्रकरण मिटवावे असा तगादा
मागे लागल्याचं त्या सां गतात. त्यांनी या सर्व प्रकरणात नकुल पाटील (कॉग्रेस), रतन
म्हात्रे (यूनियन), केडिया (मालक), कपोते , मोहन इश्वाद (शिवसै निक) यांचा हात
असल्याचे पु ष्पा मोरे सां गतात. वरीलपै की दिलिप कपोते , आनं द दिघे , मोहन इश्वाद,
रतन म्हात्रे, शाबीर शे ख यांनाही मरण आल्याचे किंवा त्यांचे खून झाल्याचे पु ढील
अल्प काळात घडले आहे . ज्यांनी प्रत्यक्ष बाबावर प्रहार केले त्यात बाळा पाटील,
शत्रुघ्न पाटील, भोईर, रमे श पाटील (बिल्डर), इस्माइल शे ख (बल्ल्याणी), जगताप
यांची नावे नोंदली गे ली आहे त. नै सर्गिक न्यायासारखं काहीसं घडलं आहे . बाळाला
ले प्रसी झाला, शत्रुघ्न पाटलाला डायबीटीसमु ळे पाय कापयला लागला, जगतापला
111
त्याच्या सु नेनं मिठी मारली त्यात तो जळू न मे ला. मोहन इश्वाद जे लमधून सु टून
आल्यावर कल्याणात त्याचा खून झाला. रतन म्हात्रे याचाही खून साला.
लग्न होऊन सहा वर्षात पु ष्पा मोरे यांना विधवापण आले . त्या म्हणतात, “मी
भांडी घासली, कष्टाची कामे केली, शिलाई केली, अन् तीन मु लांचा सां भाळ केला.
सं गर् ाम, क् रां ती आणि तक्षशीला यांना स्वतःच्या पायावर उभं केलं . सं गर् ाम कॉम्पु टर
ऑपरे टर आहे आणि चळवळीत काम करतो. क् रां ती आणि तक्षशीला पदवीधर होऊन
काम करतात” त्या पु ढे म्हणतात, ‘मी प्रसं गी भीक मागितली पण रक्त कधीही विकले
नाही. माझ्या समाजाने , मला खूप इज्जत दिली, सपोर्ट दिला. त्याचा मला गर्व वाटतो,
मी रामदास आठवले साहे बां शिवाय कोण्या मं त्र्या - सं त्र्याला मानीत नाही. आमची
ताकद कमी पडली नाही तर ह्या हत्याऱ्यांना लाईफ लागली असती.’
बाबा मोरे यां च्या स्मृ ती कायम ताज्या ठे वण्यासाठी बाबा मोरे यां च्या नावाने
आष्टीला एक नगर वसवले आहे . आणि ते थेच त्यां च्या नावाने शाळाही सु रु केली आहे .
पँ थर बाबा मोरे यां च्या योध्दावृ त्तीला अन् त्यां च्या पाठीशी खं बीर उभ्या राहिले ल्या
पु ष्पा मोरे या वीर पत्नीला विनम्र प्रणाम. पु ष्पा वहिनींना कौटु ं बिक सु खाचे क्षण
उपभोगता ये वो आणि
$$$$$
उत्तम आरोग्य लाभो अशी अपे क्षा महाराष्ट् रातील लाखो पँ थर्सनी केली होती. शहीद
बाबा मोरे यां च्या निधनाचे वृ त्त महाराष्ट् र टाईम्ससह अने क स्थानिक वृ त्तपत्रां नी
छापले त्यातून या लढावू योध्याच्या कार्याची कल्पना ये ते.
112
$$$$$
‘राम नाम सत्य है ’ हा घोष दिला गे ला पण नं तर ‘बु द्धम सरणम् गच्छामि’ असा घोष
दिला गे ला. २१ मे १९८६ रोजी झाले ल्या श्रद्धांजली सभे चे सूतर् सं चालन ठाणे जिल्हा
113
पँ थर सरचिटणीस प्रा. डॉ. विठ् ठल शिं दे यांनी केले . दोन मिनिटे उभे राहनू श्रद्धांजली
ू
वाहिली गे ली. या सभे त सफाई मजदर काँ गर् े सचे आशे राम टाक, ठाणे जिल्हा पँ थरचे
सल्लागार पी.एस. तथा अण्णासाहे ब रोकडे , श्री. आजाद, आरपीआय प्रकाश
आं बेडकर गटाचे नगरसे वक रमे श आढाव, आर.पी.आय. गवई गटाचे श्री. डी. एस्.
प्रधान, आणि व्ही. बी ससाणे साहे ब, बु द्धीष्ट फ् रं ट व श्रमिक सं घाचे श्यामदादा
गायकवाड, श्री गं गाशरण, ठाणे जिल्हा पँ थर अध्यक्ष बाळ भोईर, श्री. बाबु लाल
ढकोलिया, महाराष्ट् र राज्य पँ थर कार्यकर्ता सु रेश सावं त यांनी उपस्थित राहन ू
आदरांजली वाहिली.
पँथर रामकिशन करौतिया यां च्या या पूर्वनियोजीत हत्ते त कंछीराम सु मेरा
ढिलोर, प्रकाश ढीलोर, राजू पारचा, महें द्र पाथरिया, अर्जुन भे नवाल सोबत सहा-
सात व्यक्तीचा समावे श होता राजू पारचा, प्रकाश डीलोर पप्पू कागडा हे लोक सामिल
होते . पु ढे यांचीही पु ढील काळात हत्या झाली.
पँ . रामकिशन करौतिया यांना त्यांची मु ले आणि वडील पन्नालाल सु द्धा ‘चाचा’
म्हणत असत. त्यांचा छोटा मु लगा जगदीश करौतिया अत्यं त हळव्या मनाचा होता. तो
अं तर्बाह्य अस्वस्थ होता. त्याने आपल्या निष्पाप पित्याच्या हत्ये चा बदला घे तला.
वातावरण जरा शांत झाले . करौतिया कुटु ं बील मु लगा राधाचरण अत्यं त धाडसीवृ त्तीचा
परं तु त्याने निर्णय घे तला की हे हत्यासत्र, सूडसत्र थांबविले पाहिजे . त्याने पु ढाकार
घे तला व पँ थरमध्ये कार्यरत झाला. तो पु ढील काळात काँ गर् े स पक्षाशी जोडला गे ला.
आपले वडिल रामकिशन 'चाचा' यां च्या पश्च्यात त्याने सकारात्मक राजकारण करीत
आपली पत्नी मालती करौतिया यांना उल्हासनगर महानगरपालिकेत महापौरपदी
विराजमान केले . आपल्या वडिलांचे स्वप्न साकार केले . आजही राजकारणात ते सक् रीय
आहे त. जगदिश करौतिया बाळासाहे ब आं बेडकरां च्या पक्षात कार्यरत होता.
उल्हासनगरात रिक्षा यु नियनचा तो प्रमु ख ने ता होता. २०१९ मध्ये त्याचा आजारी पडून
नै सर्गिक मृ त्यू झाला.
रामकिशन करौतिया यां च्या श्रद्धांजली सभे त आशे राम टाक, पी.एस.रोकडे ,
श्री. आजाद, रमे श आढाव, डी.एस.प्रधान, व्ही.बी.ससाणे , शामदादा गायकवाड,
गं गाशरण, सु रेश सावं त आणि प्रा. विठ् ठल शिं दे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दि.२१मे १९८६ रोजी रामकिशन यां च्या हत्ते नंतर झाले ल्या आदरांजली सभे त
भारतीय दलित पँ थरचे अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित होते . रामकिशन करौतिया
पँ थरमध्ये सतत कार्यरत असत. त्यांनी मोची समाज सु धार सं घटने च्या अने क
कार्यक् रमात भाग घे तला. शहिद स्मृ तिदिनाचे कार्यक् रम व्हायचे त्यात त्यांचा पु ढाकार
असायचा. दत्ता सामं त यु नियन मध्ये त्यां च्या सोबतचा कार्यकर्ता सु भाष करौतिया हा
कार्यरत होता, त्याचाही खून करण्यात आला. त्या आधी १९८५ मध्ये बाबा मोरे यांचे
दत्ता सामं त यु नियन
$$$$$
मधील वर्चस्व सं पविण्यासाठी हत्या करण्यात होती. रामकिशन करौनियाच्या हत्ये मागे
असे सु डाचे कितितरी पदर आहे त हे नमु द करावे से वाटते . भाषण करताना रामकिशन डॉ.
बाबासाहे ब आं बेडकरांचा ‘बाबा आं बेडकर’ असा उल्ले ख करायचा हे आज ही आठवत
राहते . वार्ड क् र. २१ चे ते लोकप्रिय उमे दवार होते त्यां च्या पूर्वनियोजित खूनात सामील
असले ल्या हिं दस ू े ना. शिवसे ना सं घटने तील हिं सक गु ं डाना त्वरित पकडण्याची मागणी
पँ थर व सर्व आं बेडकरवादी सं घटनांनी केली होती.
114
करौतिया कुटु ं बाने आं बेडकरी विचारांसाठी खूप मोठे योगदान दिले आहे . प्रत्ये क
वे ळेस हे कुटु ं ब ठाणे जिल्ह्यातील आं दोलनात सहभागी झाले . शक्य होईल ते व्हा त्यांनी
दुःखितांचे अश्रु पु सले त, त्यांना मानसिक पाठबळ पु रविले आहे . जगदीश रामकिशन
करौतिया उर्फ रिचा आपल्या वडिलां च्या हत्ये ने खूपच हळहळत राहिला. कारण रिचाने
कधी कोणाची लाचारी पत्करली नाही. जगदीश उर्फ रिचा, राधाचरण, बहादरू हे सर्वच
जण अत्यं त बे डरवृ त्तीचे होते . रिचाने अस्पृ श्यता पाळणाऱ्या हिं दी भाषिक प्रदे शातील
एका प्रधानाच्या डोक्यात गोळी घालून त्याला ठार केले होते . कारण गाववाल्यांनी या
शहरातील 'छोऱ्याला घे रून त्याचा घातपात करण्याचा कट रचला होता, आजही
रिचाचा नु सता विषय निघाला तर उच्चवर्णीय ठाकुर हादरून जातात. राधाचरण मु ळे
रिचा वाचला होता व शांत झाला होता अन्यथा पोलिसांनी केव्हाच त्याचा एन्कौटर
केला असता. मात्र रिचाचे प्रत्ये क धु मासान भांडण अन्यायाच्या विरोधातच झाले ले
होते . हिं सेचा करौतिया परिवाराला तिटकारा आहे पण स्वाभिमान डिवचला जात असे ल
ते थे त्यांनी ठोशास ठोसा मात्र दिला आहे . बाबा मोरे यांची हत्या झाली त्या
हत्याऱ्यां पै की बाळा पाटील हा जे लमध्ये असतांना पँ थर करौतिया भावांनी या निष्पाप
कार्यकर्त्याला मारल्याबद्दल बे दम बदडला होता, दे वराम लिहितकरां च्या हत्ये त
असले ल्या तीन गु न्हे गारांपैकी एका पाकीटमाराला करौतिया बं धन ू ी आधारवाडी
जे लमध्ये बे दम मु का मार दिला. कार्यकर्त्यां ना मारणारे हे गु ं ड अक्षरशः त्यां च्या पाया
पडत होते . श्यामदादा गायकवाडाचे बं धू नरे श / अशोक यांची हत्या झाले ली पाहन ू
सारे च पँ थर, रिपब्लिकनचे लढाऊ लोक चिडले होते त्यात जसे महादे व सोनवणे , अरुण
कांबळे , बाळ भाले राव, हरीष दोंदे , विठ् ठल शिं दे, बाळ भोईर पी.सिद्धर्थन आणि सर्व
समाज चिडला अन् हळहळला होता त्यात रामकिशन करौतियांचे भाऊ राधाचरण
करौतिया, रिचा करौतिया, बहादरू करौतिया या सर्वांचा सहभाग होता,
‘सनद’साठी घे तले ल्या मु लाखतीत रामकिशन करौतिया त्यांनी म्हटले आहे की,
पँ थरमधील लोक फार निष्ठावं त आहे त हे पाहन ू मी पँ थरमध्ये प्रवे श केला. ह्या
समाजाचा स्वीकार केला, मी भारतीय दलित पँ थरमध्ये गे ल्यावर वाल्मिकी समाजास
सु धारु शकेल, वाल्मिकी समाजातील तळागळातील जी माणसे आहे त त्यांची आर्थिक
स्थिती व्यवस्थित नसल्यामु ळे त्यां च्या मु लांना शाले य शिक्षण घे ता ये त नाही व शिक्षण
नसल्यामु ळे हा समाज
$$$$$
सु धारु शकत नाही, उच्च पातळीवर ये ऊ शकत नाही. दारु पिणे आपसात किंवा इतरां शी
भां डणे , वाईट वागणे ह्या घाणे रड्या सवई सोडून बाबासाहे बां च्या विचारां मु ळे परिवर्तन
होते म्हणून वाल्मिकी समाजाने मानवधर्माकडे वळायला पाहिजे .
हरिजन लोक गे ले त्यांना भरपूर मार दे त असत असे च आमच्या लोकांना गाडी,
टां गा आणि बस यामध्ये बसण्यास बं दी होती आमचे लोक हे पायाने चालत जात हे मी
स्वतः पाहिले आहे . जे व्हा डॉ. बाबासाहे ब आं बेडकर यांनी चळवळ केली व घटना
बनविली त्यामु ळे आमचा हा ज़ो छळ चालू होतो थोडाफार कमी आहे . त्यामु ळे मी व
आमचे सर्व लोक बाबासाहे बांनाच आमचा परमे शव ् र मानतो. आजपर्यं त जितके दे व-
दे वता व चमत्कार करणारी माणसे निर्माण झाली हे सर्व जातीयवाद करणारे आहे त,
पै सेवाले , श्रीमं त आहे त म्हणजे च जातीयवादाचे ठे केदार आहे त. खरोखर मला फारच
आश्चर्य वाटते की दे व-दे वता सु द्धा याच लोकां मध्ये जन्माला ये तात कां ? आमच्यात का
नाहीं? शे वटी आम्हीही माणसं च आहोत? परं तू हे दे व जन्मास ये त नाही हे माणसांनी
बनवले ले असतात. कारण ज्यांनी वे द-पु राण यांतील काल्पनिक कथा वाचले ल्या आहे त
115
ते च लोक भगवं ताला (दे वाला) तयार करतात. सत्यपरिस्थित जर विचार केला तर
परमे श्वर हा नाहीच व चमत्कार वगै रे काही नाही जर चमत्कार व परमे श्वर असे ल तर
ू हिं दुस्थानात एक समाज असता. जातीयवाद नसता. सर्व लोक हे प्रेमाने आनं दाने
सं पर्ण
राहिले असते . मी तर असं सां गतो की अजूनपर्यं त कोणताही परमे श्वर किंवा चमत्कार
निर्माणच झाले ला नाही. मी कोणत्याही दे वाला किंवा दे वाच्या फोटोला मानत नाही
परं तु आमच्या समाजातील काही लोकांना हे पटत नाही ते मानतात. मी फक्त
बाबासाहे ब व भगवान बु द्ध यांनाच मानतो. कारण त्यां च्या इतिहासावरून, चरित्रावरून
व त्यांनी केले ल्या कार्यावरून त्याच्यात समदृष्टीची भावना आहे . ते च परमे श्वर
असतात, चमत्कारी असतात. सर्वात श्रेष्ठ असतात मग ती माणसं का असे नात.
रामकिशन करौतिया यांचे हे विचार आजही दलितां च्या सां स्कृतिक उन्नतीसाठी
महत्वाचे आहे त. मोजी समाज मुफ्ती परिषदेत दि. २३/२४ फे ब्रु. १९८६ रोजी लासी हॉल, उल्हासनगर येथे बोलत
असताना म्हणाले ;
जातीय भावना पसरविणऱ्याला देशद्रोहीच मानायला हवे आहे. ‘भारतीय’ विचारधारा मांडणारे नेते आज दुर्मिळ
होत आहेत. जातीच्या नावावर भांडणे करणारे दुश्मनांनी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा (संदर्भ: उल्हासनगर, भैय्यासाहेब
आंबेडकरनगर) तोडला त्याला फासावरच लटकवले पाहिजे. मित्रहो ! अन्यायाच्या विरुद्ध उभे राहू या.
$$$$$
अॅड. सलामतराय :
१९४७ च्या नंतरही आज मुक्तीची भाषा का करावी लागते हे समजून घ्यायला हवे. राजेशाही जमिनदारी नष्ट
करण्यासाठी निकराची झुंज दिली; बलिदान के ले तरीही गरीबांची आर्त पुकार का बरे येत आहे ? आणि ही आवाज ४ कोटी
बेरोजगारांची आहे. ५०% भूमिहीन शेतकरी आहे. आम्हाला के वळ आर्थिक मुक्ती नको. बाबासाहेबांनी अस्पृश्यतेचा लवलेश
नसलेल्या बौद्ध धर्माची निवड का के ली हे समजून घ्या. लोक कर्माने मोठे होतात. आणि एक होऊन लढलो तर मोची
समाजाचीच नाही तर पूर्ण देशाची मुक्ती करू
१ राधाचरण
२ जगदीश उर्फ रिचा
३ बहादूर
रामकिशनच्या सूनबाई उपमहापौर मालती राधाचरण करौतिया म्हणाल्या,
“माझे सासरे, रामकिशन करौतिया जी यांनी मला कधीही सून म्हणून वागविले नाही, ते मला आपली' 'बेटी'
मानीत होते. माणूस म्हणून जिंदादिल, शेरदिल माणूस म्हणून ते फारच श्रेष्ठ होते. आम्हाला प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक
क्षणाला त्यांची आठवण येत राहिली आणि कमतरता भासत राहिली आमचे करौतिया कु टूंबाने बाबासाहेब आंबेडकर यांच्या
विचारासाठी आपली जीवने त्यागली आहेत.”
रामकिशन करौतिया यांचे थोरले चिरंजीव राधाकरण करौतिया यांनी आपल्या वडिलांच्या हत्येनंतर सर्व करौतिया
कु टुंबाला पित्याची छाया दिली आणि मायेची उब दिल्ली. ते आपल्या वडिलां विषयी म्हणतात-
माझे वडील कडक शिस्तीचे होते पण फारच प्रेमळ होते. त्यांची आपल्या भावांतर व सर्वच कु टुंबावर खूप प्रेम होते,
मला प्रेरणा माझ्या वडिलांकडू न मिळाली. सामाजिक व विचार प्रेरणा पँथर साठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांकडू न मिळाली
116
पण मी पप्पांना (चाच्याला) जवळून पाहात मोठा झालो. माझे वडिल कळव्याच्या मफतलात कं पनीत असतांना पँथरचे
रोकडे साहेब न माझ्या वडिलांचे जेवणाचे डबे मी घेऊन येत असे, माझे वडिल बुद्धिवादी, विचारी आणि धोरणी होते. त्यांनी
जीवनात कधीच तडजोड के ली नाही. ते लढाऊ व स्वाभिमानी होते. त्यांनी संघर्ष करतांना सत्य कधी सोडले नाही,
माझ्या वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी मी पँथरमध्ये दाखल झालो आठी राजकारणात आलो.
$$$$$
माझ्या वडिलांचा इतका प्रभाव होता की त्यांच्या लोकप्रियतेमुळे ते निवडू न आले असते, पण विषमतावादी लोकांनी त्यांचे ते
स्वप्न चिरडू न टाकले. माझी पत्नी तिनदा निवडू न आली. आम्ही आमच्या पप्पाचे स्वप्न साकार के ले आहे.
$$$$$
117
सावं त, रविं दर् शे जवळ, या काही ठराविक लढाऊ यु वकां ची नावे समाजसं रक्षक म्हणून
जिल्हाभर पसरली होती. यापै की प्रत्ये क पँ थर अन्यायाचा प्रतिकार करतांना सरळ
सरळ भिडायला तयार असायचा. दे वराम लिहितकर हा या प्रकारात बसणारा धाडसी
यु वक होता.
देवराम उद्धव लिहितकर / भागरथा उद्धव लिहितकर. १ सुमिला २ अशोक ३गौतम ४ शकुं तला. मुले : रविंद्र,
उर्मिला, उज्वला, अमोल. मु.पो. हिवरा मजरा ता. मारेगाव, जि. यवतमाळ कलावती (इ.७वी) दि १४/८/८७ रेखी वर्क्स
मॅनेजर पोयशा इंडस्ट्रीअल कं . लि. कळवा यांना कलावती लिहितकर यांनी प्यूनच्या नोकरीसाठी अर्ज के ला होता. नोकरी
मिळाली नाही.
०९. फे ब्रु. १९८५ देवराम लिहितकर यांचा थोरला मुलगा रविंद्र देवराम लिहितकर डोळखांब, ता शहापूर.
दे वराम लिहितकर ‘छुट फटका' प्रकारातील पँ थर होता. एकदा अशोक नगर
वालधु नीतील एका प्रकरणात बौद्ध मु लीला उचलून ने ईल, अशी धमकी एका तडीपार
गु ं डाने दिली होती. त्या मु लीच्या रक्षणाची जबाबदारी पँ थरवर आली होती आणि
प्रत्ये क गल्लीत तलवारी, लाठया चमकत होत्या. उत्तर प्रदे शातून आले ला हा मु स्लिम
समाजाचा तडीपार गु ं ड होता. अखे रीस एका बोळकां डीत मिलिं द रणदिवे ने त्याला
पकडले . दे वराम लिहितकर तिथे आला होता. धिप्पाड दे हाच्या दे वरामने गु ं डाला
मै दानात घे तले आणि 'छुट फटके' लगावले . गु ं डाने तोंडात लपवून ठे वले ले ब्ले ड्स
काढले . मिलिं दने त्याची जाम धु लाई केली. वालधनी अशोक - नगर मध्ये बौद्ध आणि
मु स्लिम एकत्र राहात होते . तसे विविध प्रकारचे गु न्हे गार ही शांतपणे राहात होते ,
मात्र काही ‘नामचीन’ किंवा ‘चिं धीचोर’ लोकांना त्रास द्यायचे . कित्ये क वे ळेस पोलिस
छळाला आणि त्यांचे आईवडिल आणि आं बेडकरी समाजाला घाबरून कित्ये क गु ं डांनी
‘ढिमरा’ नावाच्या जागे वर रे ल्वे रुळावर आत्महत्या केल्या होत्या. भं गार गोळा
करून, दादागिरी करणारे , पाकीटमार, चै न खे चणारे , बलात्कारी, खु नी, हाफमर्डरचे गु न्हे
असले ले तडीपार, असे विविधरं गी गु न्हे गार या विभागात होते . ते पँ थरला टरकू न होते .
अने कांचे बळी आपसातल्या दुश्मनीमु ळे गे ल्याचे ही दिसत होते . पोलिस खात्यातील
शिपायांना गल्लीबोळातून चालणे ही जड जायचे , अशा चिं चोळ्या गल्ल्या शे वटी वस्ती
ओलांडून वालधु नी नदीला मिळायच्या. नदीच्या
$$$$$
काठावरील सं डासां त गु न्हे गार लपले ले पोलिसांना कळत नसायचे अशा किचकट अन्
बे रकी वस्तीतल्या गु न्हे गारां वर दे वराम लिहितकर, मिलिं द रणदिवे , हिरामण पगारे ,
भाऊ पाठारे यांचा बऱ्यापै की वचक होता. इब्राहिमचा भाऊ, यु सु फ यां ने जाधवां च्या
लहानी नावाच्या मु ली बरोबर लग्न केले होते , तर अफजल याने सोनवणे च्या मु ली
बरोबर लग्न करून तो रिक्षा चालवीत होता. हे दोघे ही आता माणसात आले होते .
त्यामु ळे ते पँ थरला मान दे त असत. दे वराम लिहितकर त्यांचा मित्र झाला होता.
ठाणे जिल्हयाचे पँ थर अधिवे शन ‘मोहने ’ ये थील एका हॉलमध्ये घे तले होते .
कार्यकारिणीची निवड होत असतांना सं रक्षण प्रमु खाची निवड करतांना यु वकांना त्या
पदावर ये ण्यासाठी आवाहन केले गे ले. क्षणभर शांतता पसरली. दुसऱ्याच क्षणी एक
मजबूत बां ध्याचा किंचित घाऱ्या डोळ्यांचा तरुण उभा राहिला. हाफ शर्ट, फू ल पँ टीतला
चे हऱ्यावर करारी बाणा असले ला हा तरुण स्वे च्छे ने पु ढे ये ऊन सं रक्षण प्रमु ख पदी
यायला तयार झाला. डोक्याला कफन बां धन ू मै दानात उतरले ला दे वराम लिहितकर
किंचीत गाववाल्यांची आग्री बोली बोलत होता. मु ळचा तो विदर्भातील होता. दे वराम
बौद्ध पद्धतीने विवाहबध्द झाला होता. कलावती यां च्या काकाचे अकोला जिल्ह्यातील
दादापूर ये थे बाजारात कपडयाचे दुकान होते . या जोडप्याला रवि दे वराम लिहिकरा
118
सोबत २ मु ले झाली. रवी दे वराम लिहितकर याने पु णे ये थील लोहगाव ये थन ू वसतिगृ हात
राहनू एम. एस डब्ल्यू पर्यन्त शिक्षण घे तले .
दे वराम लिहितकर कल्याणमधील ने तिवली ये थे राहायला होता. तो ठाण्याच्या /
कळव्याच्या पोयशॉ कंपनीत कामगार म्हणून कामाला होता. पगार बऱ्यापै की होता
त्यामु ळे परिस्थिती चां गली होती. एक सु खी कुटु ं ब म्हणून त्याच्या उल्ले ख करता ये ईल.
केवळ सामाजिक बां धिलकी पोटी दे वरामने पँ थर मध्ये प्रवे श केला होता. ने तिवली
आणि परिसरातील दारुचे अड्डे त्याने उध्वस्त केले आणि वे श्याव्यवसाय करणाऱ्यांना
वस्तीतून निघून जायला भाग पाडले . दे वराम निर्व्यसनी होता. बु द्ध आणि बाबासाहे ब
त्याचे आदर्श होते . तो त्यांचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करीत होता.
ने तिवलीची ओमबाबा टे कडी म्हणजे परप्रां तीय बाबा, बु वा, गु ं ड जे थे वसले आहे त अशी
वस्ती. त्याने ती गु ं डगिरी मोडून काढली. काँ गर् े सच्या काही लोकांना दे वरामचा हा
निपटू न काढण्याचा सपाटा धोकादायक वाटला. या परिसरात नकुलपाटील साहे बांचा
दबदबा होता आणि ते थील शिवसै निकांचे त्यां च्याशी मै तर् ीचे सं बंध होते . दे वरामने
ने तिवलीतील बु द्ध विहाराच्या जागे साठी प्रयत्न केले . ने तिवलीतील नामदे व जाधव
आणि दे वरामची बहिण सु मित्रा शं भरकर यांनी धम्म प्रचाराचे कार्य सु रु केले . सं ख्ये ने
अल्प असले ला बौद्ध समाजाला दे वराम लिहितकर अशोक लिहितकर यांनी रात्री
बे रात्री साथ दिली. दे वरामने दाक्षिणात्य डॉक्टर/वै द्य नायर यांचा जीव वाचवला. आणि
आपली मे हुणी हिचा विवाह त्यां च्याशी लावून दिला. डॉ.नायर आयु र्वे दाचे वै द्य होते .
नायरां प्रमाणे अने क उपे क्षित, वंचित कुटु ं बांना दे वरामने उभे केले . हे करतांना कोणतीही
अपे क्षा त्याने ठे वली नाही. आम्ही अशा हिं द-ू मु स्लिम बहुसं ख्यांकां च्या वस्तीत राहतांना
विकसित होतांना बहुसं ख्यांकांना आवडत नाही.
$$$$$
ते केल्या कामाचे कधीही कौतु क करीत नाहीत. मात्र सं धी मिळाल्यास अडथळे जरूर
निर्माण करतात. ईश्वर अन् रुढीग्रस्त अं धश्रद्धाना साफ करून समते चा प्रकाश
दे णारे लोक त्यांना शत्रू वाटतात. दे वराम लिहितकर यालाही तशीच वागणूक
मिळाली.
दे वरामाच्या मुख्य प्रयत्नामु ळे नवी मुं बई परिसरात पँ थर सं घटना वाढली. जे व्हा
वस्त्या उठवून मोठे कारखाने , इमारती बां धल्या गे ल्या ते व्हा वस्तीत अतिरिक्त आले ला
समु ह दे वरामने पँ थरच्या साहाय्याने कल्याणच्या मोकळ्या जागे वर वसवण्यासाठी आम्हा
कार्यकर्त्यांना सोबत घे तले . विठ् ठलवाडी, १४ नं बर शाळा, उल्हासनगर मधील
बिल्डरला विरोध करण्यात दे वराम पँ थरमध्ये आघाडीवर होता. एकदा हळदी समारं भात
झाले ल्या बाचाबाचीमु ळे एकाला अपमानित व्हावे लागले . दे वरामने कोणाचाही विरोध
न जु मानता त्या टोळीला बदडून काढले . दे वराम असा बे डर आणि बलदं ड होता.
जिल्हा पातळीवरील आणि महाराष्ट् रराज्य पातळीवरील जवळपास सर्वच
आं दोलनात दे वराम लिहितकर भाग घे त असे . पँ थर अधिवे शन, ठाणे -मुं बई मोर्चे,
नामातरांचे आं दोलन आरक्षण विरोधकां च्या विरोधातील मोर्चे, सभा, बै ठका, मु रबाड
तालु क्यातील भूमिहीन शे तमजूर आं दोलनात त्याने सक् रीय सहभाग घे तला.
झोपडपट् टीवासीयांना सु विधा मिळवून दे ण्यात तो पँ थरसोबत अग्रेसर होता.
अल्पशिक्षित असला तरी कल्याण विधानसभा मतदार सं घातून दे वरामने पँ थरतर्फे
(१९८०) निवडणूकही लढविली होती. पँ थर सं घटने ने सोपविले ल्या कामात त्याने कधीच
कुचराई केली नाही. दे वराम लिहितकर हा पँथरनिष्ठ आं बेडकरी विचारांचा कार्यकर्ता
होता.
119
अशोकनगर वालधु नी ये थील नाक्यावरील दुकानात अरुण गज्बे यां च्यावर
चं दर् कांत (चं द)ू कांबळे यां ने तलवारीने हल्ला करून त्यां चा खून केला. अशोकनगर
वालधु नी ये थन ू निघून कांबळे थे ट दे वराम लिहितकर याच्या ने तिवली ये थील घरी गे ला.
दे वरामने त्याला घरात घे तले नाही. तो तिथून निघून गे ला. सर्व पँ थर्स दे वरामकडे
पोहोचले . रामसिं ग सोनवणे , अण्णासाहे ब रोकडे , राधाचरण करौतिया व त्याचे भाऊ
तसे च विठ् ठल शिं दे, मिलिं द रणदिवे त्यात होते . त्यांनी दे वराम लिहितकर यांना
हत्ये च्या बाबत चौकशी केली. ते व्हा त्याने सां गितले , गज्बे चं वागणं आपल्याला
पटत नव्हतं पण माझा काही सं बंध नाही. चं द ू कांबळे माझ्याकडे का आला हे च मला
कळत नाही. पँ थरमध्ये असल्यामु ळे चं द ू कांबळे गज्बे च्या हाताखाली काम करीत होता.
त्याने पँ थर ने त्यां वर हल्ला केला होता. दारू अड्डावाला पदमची बायको हिच्या सोबत
चं द ू कांबळे राहत होता. त्यां च्यात दारूच्या अड्ड्यावरून वाद वाढला होता. त्याला
अशोक नगर मध्ये पँ थर छावणीने प्रवे श दिला नाही म्हणून त्याने शांतीनगरच्या
छावणीत प्रवे श मिळवला.
त्याच्याशी मी रागाने न बोलता ये थन ू त्वरित जायला सां गितले . यावर विठ् ठल
शिं दे, मिलिं द रणदिवे यांनी त्याला सां गितले की “वालधु नीच्या लोकांचा तु झ्यावर
सं शय आहे . तू इथून बाहे रगावी निघून जा." त्यावर तो म्हणाला, माझा कां हीही सं बंध
नाही, मी कशाला
$$$$$
भिऊ. खरोखर दे वराम लिहितकरचा खून प्रकरणात काहीही सं बंध नसल्याने तो निर्धास्त
राहिला. आणि दि २६ जून १९८७ रोजी दुपारी केस कापण्यासाठी रोडवरील टपरीवर
दे वराम बसला असतांना ३-४ शस्रधारी हत्याऱ्यां नी त्याचा पाठलाग करीत त्यांची
हत्या केली. तो निःशस्त्र योध्दा रक्ताच्या थारोळ्यात सिमें टच्या रस्त्यावर कोसळला
आणि शहीद झाला. हत्याऱ्यांची (सं शयित) नावे जाहीर झाली. पोलिसांनी अटक केली.
त्यात (१) अशोक उर्फ वाकडया सं . पगारे (२) अशोक नगर, वालधु नी यांची नावे होती.
अशोक नगर, वालधु नीच्या गज्वें च्या नागपूर ये थील नाते वाईकां च्या मदतीने केवळ
सं शयावरून दे वराम लिहितकर यांची हत्या केली. असे लोक म्हणत होते . त्यापै की .
ठाणे शे सन कोर्टने सजा सु नावली. या हत्ये ने लिहीतकर कुटु ं ब पु रते उद्ध्वस्त झाले ,
हादरून गे ले. कलावती वहिनीनी आपली ४ मु ले घे ऊन कायमचे कल्याण सोडले पण
मु लांचे शिक्षण पूर्ण केले . चं द ू कांबळे यां च्या कुटु ं बाला अशोक नगर सोडून जावे लागले .
त्याचा मोठा भाऊ आनं द कांबळे याचा आधारवाडी जे लमध्ये मृ त्यू झाला. दे वराम
लिहितकरांची अं त्ययात्रा कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातून निघून लोकग्राम,
बै ल बाजार स्मशानभूमीत जाणार होती. अण्णासाहे ब रोकडे नी आक्षे प घे तला की
हत्याऱ्यां ना पकडत नाही तोवर प्रेत ताब्यात घे णार नाही. अण्णांना अने कांनी
समजावले तरी प्रेतयात्रा दीपक हॉटे लजवळील बाजारातून न्यायचा आग्रह त्यांनी
धरला. तोवर रामदास आठवले , गौतम सोनवणे , मनोहर अं कुश, यां च्यासह ठाणे
जिल्हयातील कार्यकर्ते उपस्थित झाले होते . ठरल्याप्रमाणे अं त्ययात्रा बाजारातून
जात असतांना एका दुकानातील टां गले ल्या मालाला धक्का लागला, हुल्लडबाजी
झाली. चपलां ची फेका फेक झाली. तसाच पोलिसांनी हवे त फायरिं ग करून लाठी चार्ज
सु रु केला. नळकांडी फुटल्या बरोबर रामदास आठवले खाली पडले , त्यावर एकनाथ
जाधव पडले त्यां च्याशे जारी विठ् ठल शिं दे, रामसिं ग सोनवणे होते . पोलिसांची एक
लाठी एकनाथच्या हाताच्या कोपऱ्याला लागली. त्याला कार्यकर्त्यांनी पोलिस लाईन
मधील सोनवणे बाळदकर यां च्या घरी ने ऊन दवापाणी केले व परत अं त्ययात्रा सु रु
120
झाली. लाठीचार्ज बं द यामु ळे केला की पोलिस अधिकारी यांनी रामदास आठवलें ना
त्यावे ळेस ओळखले म्हणून पु ढील अनर्थ टळला. अण्णासाहे ब रोकडे यां च्यावर
सु रुवातीपासून लक्ष असले ला त्यागी नावाचा पोलिस अधिकारी फारच चिडला होता.
“मे री चले तो इस गं जे को मे जमीन में गाड दंु गा " असे तो म्हणाला. त्याला इतरां नी
शांत केलं . पँ थरचे ते बु जु र्ग ने ते आहे त, असे समजावले .हत्ये मुळे अने कांना अश्रू
अनावर झाले . गावावरून आले ला दे वरामच्या आईचा विलाप अजूनही इतकी वर्षे
कानान गु ं जतो आहे ! शहिद दे वराम लिहितकर अमर रहे ! च्या घोषणा कानावर अधून
मधून आदळत राहातात! रामदास आठवले समाजकल्याणमं तर् ी असताना पँ थर
स्मृ तिशे ष वसं त पवार (इगतपु री) यां च्या पत्नीस साहाय्य केले त्यांना स्वयं पाकीण
म्हणून नोकरी मिळवून दिली, तद्वतच दे वराम लिहितकर यां च्या पत्नीसही पँ थरने
स्वयं पाकी पदावर रुजू करण्यासाठी एकनाथ गायकवाड (मं तर् ी) यांचे सहकार्य घे तले .
पण त्यांची फसवणूक एकाकार्यकर्त्याने केला व स्वयं पाकीण म्हणून स्वतःच्या बायकोला
स्वयं पाकीण पदी रुजू करून घे तले . दि. ५जु लै१९८७ रोजी शहीद
$$$$$
दे वराम लिहितकर यांचा जलदान विधी जिल्हा पँ थर कार्यकारीणीत पार पडला पँ थरने
दिले ल्या निवे दनात खु नाचे सूतर् धार आणि हत्यारे यांना अटक करण्याची मागणी दि.
२२जु लै१९८७च्या पँ थर मोर्चात महाराष्ट् र कार्यकारिणीने केली. कटाच्या सु तर् धारांचा
उल्ले ख पत्रकात केला आहे . त्यात खं डू मल्हारी रोकडे , मारुती अं कुश सोनवणे , अनं त
जाधव यां च्या नावांचा उल्ले ख आढळतो. आरोपी म्हणून वाकड्या व एकाला पकडण्यात
आले .
डोक्यात निळी टोपी, अं गात पांढरा झब्बा आणि शु भ्र पांढरे धोतर ने सले ला
त्याचा दे ह, निळा झें डा फडकत असले ल्या एका मोठ्या मालवाहू मोटारीवर बर्फाच्या
लादीवर सु रक्षित माडात फुलां च्या चादरीत पु ष्पहारांमध्ये गु ं डाळले ला होता. दे वराम
लिहितकर अमर रहे चा काळीज चिरुन जाणारा दर्दघोष सु रू झाला आणि कल्याणच्या
महापालिकेच्या रूग्णालयापासून अं त्ययात्रेला सु रुवात झाली. महाराष्ट् र राज्य दलित
पँ थरचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मानवं दना दिल्यावर रितसर शोकयात्रेला
सु रुवात झाली होती. प्रत्ये क कार्यकर्ता हळहळत होता, हुंदके दे त होता. दे वरामच्या
आठवणी जाग्या करीत होत्या; अं तर्मनाला टोचीत होत्या. एक चित्ता, अन्यायावर झडप
घालणारा चित्ता चिरनिद्रा घे त पहुडला होता. ज्याने अन्याय, अत्याचारां चे गं डस्थळ
फोडून टाकण्याचा प्रयत्न केला, तोच कार्यकर्ता अन्यायाचा शिकार झाला होता. तो
लढला, समते साठी उभा राहिला. आयु . कलावती लिहितकर, अशोक लिहीतकर,
नामदे व जाधव, सु मित्रा गायकवाड, सखु बाई जाधव, लिलाबाई मुं डेकरु, निर्मला
महे शकर, सु शिलाबाई पवार, बे बी वाघ, सं घमित्रा महे शकर, पार्वती जाधव, दिशा
म्हस्के, शशिकला पवार, बबनबाई शिं दे, बे बी गु जर, मं जुळा बारसे यांनी सर्वांना सोबत
घे ऊन बु द्धविहार उभे केले . आपल्या विरोधात वागणाऱ्या लोकांचा त्याने कधी द्वे ष केला
नाही. डावपे च आखणे , षडयं तर् रचणे हे त्याच्या स्वभावात नव्हते . सरळमार्गी, भोळ्या
स्वभावाच्या दे वरामला त्याचीच जबर किंमत आयु ष्यात मोजावी लागली.
दि. २६जून १९८७ रोजी कटींग दाढी करण्यास गे लेल्या दे वरामवर शस्रधारी
गु ं डांनी हल्ला केला व निःशस्त्र लढणारा भीमसै निक मु ख्य रस्त्यावरच रक्ताच्या
थारोळ्यात पडला आणि गत प्राण झाला. क् रुर व्यवस्थे ने दे वराम लिखितकरांचा
बळी घे तला. पशिस्थतीशी झुंजत हा योध्दा शहीद झाला.
121
शहीद दे वराम लिहितकरां च्या पाठीशी रामदास आठवले , मनोहर अं कुश, बाळ
भोईर, विठ् ठल शिं दे, किशोर शिं दे, मिलिं द रणदिवे , शिवराम मोहिते , दासू ठोंबे , रघु नाथ
आव्हाड, नारायण कसबे , भिमराव दोंदे , हरिदास चिकणे , खं डागळे , भास्कर ससाणे , शं कर
गु ं जाळ, महमद इस्माईल शे ख, दीपक गं गावणे , अण्णासाहे ब रोकडे , नारायण जाधव,
नामदे व जाधव, सं तोष महे शकर, लक्ष्मण जाधव, श्रावण महे शकर, रामशिं ग सोनवणे
इत्यादी पँ थर खं बीरपणे उभे राहिले आणि शहीद दे वराम लिहितकरांसाठी महाराष्ट् र
शासन
$$$$$
व पोलिस यं तर् णे कडे न्याय मागत राहिले . ज्या पोलिस अधिकाऱ्याने (के.पी.रघु वं शी)
अं त्ययात्रेवर लाठीहल्ला करण्याचा आदे श दिला. त्यां च्यावर काहीही कारवाई केली
नाही. सत्ते तल्या काँ गर् े स शासनाने पँ थर्सना अजिबात सहकार्य केले नाही.
दे वराम लिहितकर याने आनं दनगर ने तिवली परिसरातील दारू अड्डेवाले , वे श्या
व्यवसाय करणारे दलाल यां च्याशी सरळसरळ दुश्मनी घे तली होती. ने तिवली म्हणजे
ओमबाबा टे कडीवर उत्तरभारतीय व्यक्तींनी, मु स्लीम समाजातील काही गरजवं तांनी,
शिवाय ठाणे जिल्हा परिसरातील काही आगरी आणि बौद्धांनीही आपल्या वसाहती
वसवल्या होत्या. बौद्धां तील काँ गर् े स (आय)वाले पँ थरवाल्यां वर नाराज होते . दे वराम
धाडसी होता पण तो गु ं ड नव्हता. त्याने गु ं डांची टोळी उभी केली नव्हती,
काँ गर् े सवाल्यांना दे वरामची लोकप्रियता खटकत होती, सट् टा बिटींग, जु गार
अड्डेवाले , आणि दारू अड्डेवाले , वे श्या व्यवसायाचा धं दा करणारे दलाल दे वरामच्या
विरोधात गे ले होते . दे वरामने अल्पसं ख्य असले ल्या बौद्ध समाजासाठी कार्य सु रु केले .
प्राथमिक शाळा बां धण्याचा प्रयत्न केला ते व्हा त्या जागे वरून इतरांनी वाद सु रु केले .
दे वरामने बौद्धविहारासाठी सढळ हस्ते मदत दिली व सभा बै ठकां साठी ओटा बां धला
त्यालाही ते थील विध्वंसक प्रवृ त्तीच्या लोकांनी विरोध केला. अशा वे ळेस पँ थर
कार्यकारिणीच्या जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यां नी दे वराम लिहितकर यास पाठींबा
दिला. ते थील बौद्ध महिला पँ थर व मु स्लिम समाज दे वराम लिहितकर यां च्या पाठीशी
होते .
दि. २९ सप्टें बर १९७९ रोजी बु द्ध विहार ‘मोहने ’ ये थे १३ पँ थरची नवी ठाणे
जिल्हा कार्यकारिणी अस्तित्वात आली. या दिवशी भारतीय दलित पँ थर नावाने
कामकाज सु रु झाले . प्रा. अरुण कांबळे यांना अध्यक्षपदी सं धी मिळाल्याने सं पर्ण ू
पँ थरचे भांबावले पण नष्ट झाले . गटबाजी ही सं पुष्टात आली. या जिल्हा कार्यकारिणीत
ठाणे जिल्हा अध्यक्षपदी प्रा. एकनाथ जाधव विराजमान झाले , बाळ भोईर सरचिटणीस
म्हणून कार्यरत झाले . प्रा. विठ् ठल शिं दे, मिलिं द रणदिवे , अण्णासाहे ब रोकडे , हरिष
दोंदे , बाळासाहे ब भाले राव, बाबा मोरे , अशोक बच्छाव, दासू ढोंबे , इत्यादीसोबत दे वराम
लिहितकर यांचा समावे श दलित पँ थर जिल्हा सं रक्षण प्रमु ख म्हणून झाला होता.
दे वराम लिहितकरांनी १९७९च्या ६ डिसें बरला झाले ल्या मराठवाडा विद्यापीठाला
बाबासाहे ब आं बेडकरांचे नाव दे ण्याच्या नामां तर सत्याग्रहात (लाँ ग मार्च) सर्व
ताकदनिशी भाग घे तला होता.
नवी मुं बईकडे जातांना ठाण्यावरून बसचा प्रवास करावा लागे . पँ थरचे
पदाधिकारी ठाण्यावरून पायी पायी ‘कळवा’ परिसरातील ‘विटावा’ या गावी पोहोचत
असत. दे वराम लिहितकरचा जवळचा सहकारी गणपत कडलाग हा विटाव्याचा मूळ
रहिवासी दे वराममु ळे पँ थरमध्ये सामील झाला. विटावागाव पूर्णपणे पाटील
आडनावाच्या कोळी आग्री समाजाचा, असं सर्व माहित होतं . या गावात गणपतचे दोन
122
तीन भाऊ आणि त्यांचे कुटु ं ब राहात होते . गणपतने आपल्या शे तातच घर बां धले होते .
गणपतची सर्व जमीन काही लोकांनी हडप केली होती. त्याच्यावर झाले ल्या अन्यायाला
निपटून काढण्यासाठी गणपतने पँ थरकडे धाव घे तली
$$$$$
होती. गणपत कडलाक धाडसी होता. त्याने सं पर्ण ू गावाशी टक्कर घ्यायला मागे पुढे
पाहिले नाही. त्याच्यासोबत दे वराम लिहितकर हा झुंजार भीमसै निक सतत उभा
राहिला, पँ थरची छावणी उभी राहिली ते व्हा प्रा. एकनाथ जाधव, प्रा. विठ् ठल शिं दे,
बाळ भोईर, रमे श भागे , दत्तू कसबे , अण्णा माने , इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते यां च्या
मार्गदर्शनाने आणि पाठींब्याने दे वराम लिहितकर याने गणपतला न्याय मिळवून दिला.
पँ थरच्या कार्यकर्त्यांचे महसूल जमिनी प्रकरणी, हाडकी हाडवळा, इनामी जमिनी,
जं गलजमिनी, गावठाण जमिनी बाबतच्या अभ्यासाने अने क ठिकाणी जे यश मिळत
होते , ते विटाव्यातही मिळाले होते . किमान गणपत कडलागचा परिवार ये थे स्थिर झाला
होता. प्रा. एकनाय जाधव व प्रा. विठ् ठल शिं दे यांचा एम. ए. वर्गातला मित्र शाहीर
दामोदर (पाटील) विटावकर याच गावात राहात होता आणि जवळच्या कंपनीत
कामाला होता. त्याच्या मध्यस्थीने गावातील गावकऱ्यांचे आणि गणपत कडलागचे
भांडण कायमचे सामं जस्याने मिटविण्यात आले होते . दे वराम लिहितकर प्रत्ये क क्षणी
सावली प्रमाणे पँ थर पदाधिका-यांसोबत राहात असे .
विष्णूनगर, दिघा ते सानपाडा, तु र्भेस्टोर पर्यन्तच्या पट् ट्यात पँ थर
कार्यकर्त्यांसोबत दे वराम लिहितकर कायमस्वरूपी राहात असे . दे वरामला बऱ्यापै की
पगार होता त्यामु ळे नवी मुं बईतल्या दौऱ्यात पॉयशा कंपनीतला कामगार दे वराम
लिहितकर सर्वांचे हसत मु खाने स्वागत करून चहानास्ता जे वणाची सोय करीत असे .
नवी मुं बई तु र्भा स्टोरचे सिद्राम ओव्हाळ, नामदे व गायकवाड, योगेश कांबळे , सु धाकर
सोनवणे (अ.नगर), ही मं डळी सोलापूरहन ू आले ली. ही पँ थर छावणी अत्यं त तगडी,
धाडसी होती. तु र्भे स्टोर छावनी तर पँ थरचा बाले किल्ला बनले ली. विष्णूनगर, सानपाडा
ये थील बहुतां शी पँ थर्स मं डळी मराठवाडा विभागातून ये ऊन स्थायिक झाले ली होती. या
प्रत्ये क विभागातील पँ थर प्रतिकू ल परिस्थितीत आपलं सं घटन लढाऊवृ त्तीचं च
बनवित होते . जे व्हा नवी मुं बई, ठाणे जिल्ह्यापासून वे गळी करण्याची चर्चा सु रु झाली.
ते व्हा या सर्व अतिक् रमित जागा ते थील गरीब दुबळ्यांना सोडाव्या लागल्या. काही
जणांना नव्या बां धकाम प्रकल्पात कुठे सं धी मिळविण्याचा प्रयत्न झाला, तर
काहींना पँ थर्सनी कल्याणच्या ने तीवली परिसरातील जयभीमनगर, पिसवली ये थे
नवीन वसाहती वसवून कायमचे स्थिर केले . हजारो एकराचे पट् टे पँ थर्सनी अतिक् रमण
करून कायमचे बळकावले असते , मात्र तसे न करता केवळ गरजूंची निवारा सोय मात्र
पँ थर्सनी केली. त्यात दे वराम लिहितकरांचे मोठे कार्य आहे .
दे वराम लिहितकराच्या सोबत नवी मुं बई परिसरात रमे श भागे , दत्तू कसबे ,
मनोहर ढगे , अण्णा माने , गायकवाड हे पँ थर एकत्र कार्य करीत. शिवाय पोयशॉ
कंपनीतही काम करीत. भागे सु परवायझर होते बाकी कामगार होते . या कंपनीत
महिलांचाही एक स्वतं तर् विभाग होता. त्यात विष्णूनगरच्या हवाईबाई गायकवाड ह्या
अत्यं त धाडसी व निष्ठावं त पँ थर महिला कार्यकर्त्या होत्या. नवी मुं बईत पहिली
छावणी विष्णूनगर, दिघा हीच होती. विष्णूनगरचे लोक पूर्वी कळवा स्टे शन जवळच्या
आनं द नगरात राहात होते . महादश ू े ठ यांची
$$$$$
123
ती जागा होती. जमीन खाली करण्यावरून त्यांनी अन्याय करायला सु रुवात केली. अशा
वे ळेस प्रा. एकनाथ जाधव, प्रा. विठ् ठल शिं दे, बाळभोईर यां च्या सोबत पोलिस
स्टे शनला जाऊन दे वराम लिहितकर यांनी त्यांना धीर दिला. पोलिसांबरोबर झाले ल्या
चर्चेतून पँ थर कार्यकर्त्यांनी पर्याय शोधला आणि विष्णु नगरच्या खु ल्या जागे वर
विष्णूनगर, दिघा ही वसाहत वसली. पँ थर ने त्यां च्या दबावामु ळे नव्या विष्णूनगर
वसाहतीला दोन महिने सं रक्षणासाठी पोलिस पहारा लावण्यात आला होता. पु ढील
काळात दे वराम लिहितकर, प्रा. विठ् ठल शिं दे, बाळ भोईर या पँ थर ने त्यांचा सतत या
नगराशी जागता पहारा होता.
दे वराम लिहितकर यां च्या पोयशा कंपनीत काम करणारी धडाडीची कार्यकर्ता
हवाईबाई गायकवाड यांना पँ थर दे वराम लिहितकरां च्या शहादतीबाबत खूप वे दना
झाल्या. त्या म्हणाल्या, "आम्ही मराठवाड्यातल्या लातूर, उस्मानाबाद, मधून आलोया.
आम्हाला कोनी वाली नव्हता. पण पँ थरनं सहारा दिला. आमची पोयशा कंपनीपासून
दे वराम लिहितकरां शी वळख व्हती. त्यायनी कंपनीच्या लोकांना, कामगारांना दमात
घे ऊनशान म्हनलं की महिलांना कुनी बोलायचं नाय. दे वराम भाऊ महिलांचा लयं दबाव
यायचाचं , आनखीन आमचा महिलांचा पगार ये ळवर मिळाला पायजे ल म्हणून
मालकाला बी सां गायचं . किती कौतु क करावं दे वरामभाऊचं . आता चिरगु ट मानसं
आकाडत्यात, पन ह्यो वाघासारखा बाप्या हासून बोलायचा अन् आमाला लय मान
दियांचा, दे वराम लिहितकर हा लय भारी मानूस व्हता. त्याचं वागणं , कार्य करणं , लयं च
भारी व्हतं . गरीब दुबळ्याला हमीशा त्याईनी मदत केली. दे वरामभाऊ दत्ता सामं त
कामगार यु नियन चे कार्यकर्ते व्हते , लिडर व्हते ." जवळू न सं बंध आले ल्या या कामगार
महिले ने उभे केले ले दे वराम लिहितकरांचे व्यक्तिमत्त्व खरचं बोलके आहे , हे मान्य
करावे लागते .
रमे श भागे या निष्ठावं त, तडफदार पँ थर कार्यकर्त्यांने एक सभे चा प्रसं ग कथन
करून दे वरामचे लढाऊ चित्र उभे केले . एकदा सानपाडा छावणी अध्यक्ष जानराव
यांनी उद्घाटनाचा कार्यक् रम घे तला होता. या घटने ला मराठवाड्यात झाले ल्या
हिं साचाराचा आणि अत्याचाराचा सं दर्भ होता. या उद्घाटनाला शिवसे नेचे काही
कार्यकर्ते उपस्थित राहिले होते . त्यांनी जात, धर्म, अन्यायाबाबत गोलमाल भूमिका
मांडली. त्या सभे त प्रा.विठ् ठल शिं दे यांनी वर्णव्यवस्थे वर आणि अत्याचार कर्त्यां च्या
प्रवृ तीवर घणाघाती हल्ला केला. श्रोते अन् शिवसै निक चौफेर हल्ल्याने गां गरले ,
हादरले अन् चवताळले दे खील, जानराव थोडे खचले होते . त्यां च्याकडे पाहन ू प्रा.
विठ् ठल शिं दे यांनी आपले मु द्दे पु राव्यासह मांडून आव्हानच दिले . म्हणाले , आता
तु म्हाला कोनाला घाबरण्याचे कारण नाही. मी जाहीरच वै चारिक आव्हान दिले आहे .
माझे मु द्दे खोडायचे असतील त्यांनी मै दानात यावे , असे म्हणून –
$$$$$
ह्या त्यां च्या कविते च्या ओळी सादर केल्या. शिवसै निकांचा स्थानिक
विभागावरचा दबदबा हरवला जातोय. याला घाबरून त्यांनी भावना दुखावल्याचा
कां गावा केला. एक दोन शिवसै निक हमरी-तु मरीवर आले . ते व्हा दे वराम लिहितकर आणि
पँ थरफौज कडे करून उभी राहिली. पँ थरची गर्जना ऐकू न माहोल शांत झाला. दे वराम
124
लिहितकर, रमे श भागे मधस्थी पडून म्हणाले , तु म्ही विनाकारण रागावू नका.
त्यां च्याशी चर्चा करा. ते तु म्हाला पटवून दे तील, त्यांची बाजू इतका अमानवी अत्याचार
होतोय त्याबाबत आम्ही बोलायचं नाही का? हे ऐकू न शिवसे नेतील समं जस सै निकांनी
शांतता राखायला सां गितले . पण म्हणाले तु मचे वक्ते आमच्या विरोधात बोलले ना ?
त्यावर प्रा. विठ् ठल शिं दे, म्हणाले , मी शिवसे नेचे नावही घे तले नाही. अन्यायग्रस्त
लोकांना चिरडणाऱ्या व्यवस्थे विरूद्ध आम्ही बोलतो, आम्ही शिव्याही दे त नाही तर
विचारां वर हल्ला करतो; त्याचे पु रावे दे तो, चां गली भाषा बोलतो. विद्रोही भाषे त
एकही शब्द तु म्ही गलिच्छ दाखवून द्या. मी आता माफी मागतो. बं धन ू ो, आम्ही
व्यक्तिगत पातळीवर अजिबात टीका करीत नसतो ! या सं वादाद्वारे शांतता प्रस्थापित
झाली व वातावरण निवळले . अशा प्रकारे गर्दीत घु सून मोठ्या धाडसाने विरोधी विचार
करणाऱ्या बलदं ड लोकांचा हात पकडण्याची हिम्मत, दे वराम लिहितकर या पँ थर मध्ये
होती. पँ थर दे वराम लिहितकर बाबत रमे श भागे गहिवरून बोलत होते . ते म्हणाले ,
“दे वराम लिहितकर हे आमच्या घरातील एखाद्या व्यक्तीसारखे आम्हाला वाटत असत.
सर्वात आधी त्यांचा नी आमचा सं बंध आला. दे वराम पँ थरचा ढाण्या वाघ होता.
आपल्या कामाने , धाडसाने तो आमचा प्रिय पाठीराखा बनला होता. दे वरामने कधी
गद्दारी केली नाही तर गद्दारांना, समाजाच्या दुश्मनांना ठिकाणावर आणले . असे
प्रामाणिक अन् निःस्वार्थी पँ थर फार कमी होऊन गे ले.”
पँ थरच्या जवळपास सर्वच मोर्चे आं दोलनात आघाडीवर असणाऱ्या कलावती
गां गुर्डे यांनी दे वराम लिहितकरां बाबत बोलतांना म्हटले की “दे वराम लिहितकरांचा
स्वभाव एखाद्या नादान मु लासारखा होता, त्याच्या अं गी फार ‘मु रले पण’ नव्हते ,
त्यामु ळे आयु ष्यात दे वरामची फसवणूक झाली. दे वराम मनाने फारच चां गला माणूस
होता. आपली कामं पटकन व्हावीत आपल्यालाही मोठे पण मिळावं , या साठी हा बे डर
माणूस कोणाशीही टक्कर घे त असे . समाजाला सर्व बाबतीत मदत करणे , हे तो आपले
पँ थर म्हणून कर्तव्य मानीत असे . दे वरामला चां गले घरदार, नोकरी होती त्यामु ळे तो
सर्वांसाठी धावत असे . दे वराम मरायला कधीही घाबरत नव्हता. अरूण गज्वे आपला
विरोधक आहे . तो पँ थरचा काटा आहे हे त्याला माहित होते पण त्याचा काटा काढावा,
खून करावा असं तो कधीही बोलला नाही. मु ळात
$$$$$
षडयं तर् रचणं , प्लॅ नींग करणे हा त्याचा स्वभाव नव्हता. समोरा समोर ललकारने हा
त्याचा रोखठोक स्वभाव होता. त्यामु ळे गु न्हे गारी प्रवृ त्तीच्या व्यक्तींनी दे वरामला
फसवले . होऊन काही बळकावता यावे या इर्षे पोटी चं द ू कांबळे , आनं द कांबळे यां च्या
सु डबु ध्दीने कांबळे , गज्वे , चं द ू कांबळे , आनं द कांबळे यांनी जसा हल्ला प्रा. विठ् ठल
शिं दे (मास्तर) मिलिं द रणदिवे यां च्यावर केला तसाच पु ढील काळात पँ थर रामसिं ग
सोनवणे यां च्यावरही केला होता. एवढे मात्र खरे की या प्रकरणात सं शयावरून
लिहितकरांचा घात झाला.
दे वराम लिहितकरांच्या घरी सतत कार्यकर्त्यांचा राबता असे . ठाणे जिल्ह्यात
अने क कार्यकर्त्यांची घरे पँ थर चळवळीची केंद्रे आपसु कच बनली होती. दे वराम
लिहितकर यांची पत्नी कलावती लिहितकर यांनी आल्या-गे ल्याची विचापूस केली,
नाष्टा-जे वण निवासाची सोय केली. त्या दे वराम लिहितकर यां च्या पाठीशी खं बीरपणे
उभ्या होत्या. पति-पत्नीच्या सामाजिक उत्तरदायित्वामु ळे त्यांचे घर पँ थर चळवळीचे
जिवं त केंद्र बनून गे ले होते . दे वराम लिहितकरां च्या सोबत वयोवृ द्ध आई या सु द्धा
125
मु लाच्या कार्यात सहभागी होत्या. आपल्या वाघासारख्या मु लाची हत्या झाली ते व्हा
त्या वे ड्यापिश्या झाल्या होत्या. जवळपास पँ थरच्या सर्व कार्यकर्त्याशी या माऊलीचे
मु लाप्रमाणे सं बंध तयार झाले होते .
दे वराम लिहितकरां च्या हत्ये नंतर सर्व जबाबदारी कलावती लिहितकर यां च्यावर
ये ऊन पडली होती. त्यांना हे शहर सोडून जावे से वाटले . त्या म्हणतात, "माझे कुटु ं ब
स्थिरस्थावर होते , मु ले लहान होती त्यांचे शिक्षण करणे , त्यांना स्वतःच्या पायावर उभे
करणे , हे माझं कर्तव्य होतं . पण सारं उद्ध्वस्त झालं होतं . कल्याणमध्ये जिवाला जीव
दे णारी विश्वासू माणसं होती. माझ्या नावावर काही खोल्या होत्या पण तरीही ही
जीवाभावाची माणसं सोडून मी पु ण्याकडे जायला निघाली. तिथे माझे काका राहात होते .
पु ण्याला गे ल्यावर मु लांना वसतिगृ हात टाकले . आज माझा मोठा मु लगा रवी डोळखांब
(शहापूर) ये थे आश्रम शाळे वर अधिक्षक आहे . दोन्ही मु लींना शिक्षित करून त्यां चे
विवाह करून दिले आहे त. सर्वात लहान मु लगा अजून बे रोजगार आहे . मी स्वतः
मूळगावी यवतमाळ जिल्ह्यात रहिवासले आहे . त्यावे ळी ने तिवली (कल्याण) सोडतांना
खूप वे दना झाल्या, माझी सर्व स्वप्ने जळू न गे ली होती. माझ्याजवळ माझ्या पतीच्या
मु लां च्या, दादां च्या आठवणी हृदयात साठवून आणि जवळच्या नाते वाईकांनी मारले ले
डं क काळजावर कोरून ठे ऊन मी पु ण्याची वाट धरली होती. आज ३५ वर्षांनी मी माझ्या
कर्तव्यात कमी पडले की नाही याचा हिशोब कसा मांडू? मं तर् ी झाले ल्या रामदास
आठवले यांनी दे वरामच्या कुटु ं बाला ओळखही दिली नाही. असा त्यांचा अनु भव राहिला
आहे . मात्र लिहितकर कुटु ं ब जिथे गे ले तिथे धम्मकार्यात, समाजमे ळ्यात सहभागी होत
राहिले आहे . पतीपाठी कुटु ं बाचे सं गोपन करणाऱ्या कलावती लिहितकर या
क् रां तीमाते ला विनम्र प्रणाम !
दे वराम लिहितकर यांचा थोरला मु लगा रविं द्र दे वराम लिहितकर डोळखांब, ता.
शहापूर ये थील आश्रमशाळे वर अधिक्षक म्हणून से वेत आहे . आपली निराधार आई
आणि
$$$$$
बहिणी भावं डां चा भार स्वत:च्या शिरावर घे ऊन सर्वांना सहकार्य करतो आहे . आज
जवळपास ३४/३५ वर्षां च्या वाटचालीत रविं दर् दे वराम लिहितकर याने लोहगाव ये थील
मागासवर्गीय बहुजन वसतिगृ हात प्रतिकू लते वर मात करीत शिक्षण घे तले . पदवी
प्राप्त केल्यावर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालु क्याच्या ठिकाणी आपल्या कुटु ं बात
राहत असून आं बेडकरी समाजाशी बां धिलकीने जोडून घे त धम्म कार्यात मोलाचे
योगदान दे त आहे . आपल्या वाटचालीबाबत रविं दर् लिहितकर म्हणतो, "माझे दादा
फारच प्रेमळ होते . कोणाचे दुःख त्यांना सहन व्हायचे नाही. एका क् रां तीकारक धाडसी
वडिलां च्या पोटी मी जन्म घे तला आणि बाबासाहे ब आंबे डकरां च्या चळवळीशी
जोडला गे लो, याचा मला रास्त अभिमान वाटतो आहे . माझ्या प्रत्ये क सु ख दुःखात
मला दादाचा चे हरा दिसत असे , जणू ते सतत माझ्या पाठीशी उभे आहे त. असे च मला
जाणवत आले आहे . माझी आई कलावती दे वराम लिहितकर हिने वादळातून आग्नितून
आपले जीवन उजळू न घे तले आहे . माझ्या आईच्या त्यागाला तिच्या कष्टाला सीमाच
नाही. तिने घारी सारखे आपल्या पिलां वर नजर ठे वली आणि आम्हा सर्व भावं डांना
आधार दिला. दादां नं तर तीच आमची आई अन् तीच आमचा दादा झाली. माझ्या
बहिणी म्हणतात की, आपल्याला समाजात कोण आहे त ? त्यावर मी त्यांना सां गतो की,
दादाचे पँ थर मित्र अन जिवाला जपणारा आं बेडकरी समाज हे आपले नाते वाईक आहे .
माझे काका आत्या आहे तच, त्यां चेही प्रेम आमच्या वाट्याला आले आहे . हे काही थोडे
126
नाही. माझ्या आईकडचे , माझ्या पत्नीकडचे अने क लोक धम्म कार्यात सक् रीय आहे त.
माझ्या दादाच्या बं डखोर स्मृ तिला माझे कोटी प्रणाम!”
$$$$$
दि. ३० डिसें बर १९९९ रोजी प्रकाशचा प्रथम स्मृ तिदिन. प्रकाश सावं तच्या
मृ त्युने जिवाला चटका लावला. प्रकाश सावं त हे ज्ये ष्ठ सामाजिक ने ते सु रेश सावं त
यांचे बं ध,ू प्रकाश आम्हाला छोटया भावासारखा. मृ त्यु ही निसर्गाहाती असले ली
बाब! मृ त्युविषयी आपण आडाखे बां धीत असतो. मृ त्युने कसे यावे ? कोणत्या काळी
यावे ? कोणावर कोसळावे ? या कोणत्याही प्रश्नाला कोणाजवळ उत्तर नसते . तरीही
जगण्याची उत्कंठा असले ला मानवप्राणी काही गणितं जरूर मांडीत असतो. काही
वयोमर्यादा ठरवीत असतो. ठराविक एका मर्यादे च्या आत कोणाचा अं त झाला असे ल तर
ते दुःख जास्त असह्य होते . अशा कोवळ्या दुःखाला समजून घे णं त्याच्याशी जमवून
घे णं माणसाला जड जाते . अकाली जाणाऱ्याच्या बाबत विवे की माणूसही हळवा होतो;
भावनाशील होतो; कितीही सां भाळले तरी त्याच्या भावनांचा बां ध फुटतोच. काहींच्या
डोळ्यांतन ू पाण्याचे ओघळ वाहात असतात. तर काहींच्या अं तःकरणातून फुटले ल्या
बां धाचे अश्रू ओघळत असतात डोळ्यांतील आसवं दिसतात, लवकर मु क्त करतात.
पण मनातली आसवं , मन कुरतडून टाकतात. प्रकाशचा निचे ष्ट दे ह पाहतांना
आमच्यापै की बहुते कांना गलबलल्यासारखं झालं . मला माझ्या कविते च्या दोन ओळी
आठवल्या -
127
'हिरवे गच्च' जग; त्यातले पिकले ले पान गळू न पडले तर समजू शकतो पण पान अकाली
गळू न पडले तर ते दुःख जास्त 'कवळे ' असते . प्रकाशचे दुःख जास्त कोवळ्यापाना प्रमाणे
आमच्या मनाला भिडले !
झें डा घे ऊन अथवा ठे वन
ू
समाष्टिसाठी जीवन दिले
अथवा ज्यांच्या वंश पीढ़ीने
तन मन धन कण आर्पियले
वंदनीय ती ठरती कुळे
$$$$$
सु रेश सावं तां च्या हातात बाबासाहे बां च्या विचारांचा क् रां तीकारक निळा झें डा.
प्रकाशच्या हातात कामगार यु नियनचा झें डा. कां ही भावां च्या हातात प्रत्यक्ष झें डा
नाही; पण अप्रत्यक्ष ते चळवळीशी जोडले ले. बाबा मालोजी सावं त रे ल्वे त
आर.पी.एफ., माऊली मं जुळाबाई सतत कार्यकर्त्या, मु लां च्या से वेत रत. त्रास सहन
करायचा पण चे हरा सतत हसता ठे वायचा. मूळ कोकणातले दापोली तालु क्यातले हे
कुटु ं ब, पण पु णे , मुं बई असा प्रवास करून 'कसारा' ये थे स्थिरावले ले. कसारा हा कोकण
प्रदे शाचा टोकाचा भाग आणि इगतपु रीला जोडणारा पूल. इगतपु री ही नाशिक
जिल्ह्यात आले ली तरी घाट माथ्यावरील ते कोकणच! भात व मासे , भरपूर पाऊस, आणि
कोकणासारखे राहणीमान, हवामान यामु ळे ते कोकणाला जोडले ले, अशा छोट्या कोकण
घाटाच्या मिश्रणातल्या वसाहतीत स्थिरावले ले सावं त कुटु ं ब कसाऱ्यातील परिसरात
आं बेडकरी विचाराच्याच समाजाचे नव्हे तर सर्व गरीब दुबळ्या समाजाचे आश्रयस्थानच
होते . १९७२ च्या पँ थर वातावरणापूर्वी पासून मोठे बं धू सु रेश सावं त समाज से वेत
कार्यरत होते . प्रकाश सावं तला असा राबत्या कुटु ं बाचा वारसा लाभला, त्यागी भावाचे
पाठबळ मिळाले . आं बेडकरी समाजात वं दनीय ठरले ल्या कुटु ं बात ज्यांचा वरचा क् रमांक
लागे ल, असे हे सावं त कुटु ं ब म्हणून ते वं दनीय त्यातूनच प्रकाशच्या धाडसाचे कौतु क
होत असे .
प्रकाश यु वकांत काम करू लागला ते व्हा त्याच्या धाडसाचे बळ सर्वांना मिळू
लागले . प्रकाशने सु रवातीला कसारा परिसर गाजवून सोडला. त्याच्या वाटचालीने एक
अनु करणीय व आदरणीय दरारा निर्माण केला. कसारा परिसर हा अने क आदिवासी गरीब
दुबळ्या पाड्यांचा परिसर. या परिसरातल्या आदिवासींना प्रकाशचा मोठा धीर वाटत
असे . एकेकाळी ज्याच्या नावाने बड़े बड़े गु न्हे गार टरकत अशा गु ं ड्या दादाच्या
कुटु ं बातला श्यामदादा पं डित. कसाऱ्यात सु रेश सावं तांसोबत पँ थरमध्ये दाखल झाला.
रवि शे जवळ हा धाडसी यु वक चळवळीत उतरला. त्यां च्या बरोबरीचा धाडसी यु वक
म्हणजे प्रकाश सावं त. १९७७ ला बे लछी ये थे दलितांचे हत्याकांड झाले . ते व्हा केंद्रात
जनता पक्षाचे सरकार होते . ठाणे जिल्ह्यातून खासदार रामभाऊ म्हाळगी निवडून गे लेले.
कै. रामभाऊ म्हाळगी यांचा ठाणे जिल्ह्यात सं पर्क दौरा होता. खर्डी-कसारा परिसरात
त्यांचे प्रचं ड स्वागत झाले . खर्डी ये थे सभा झाली. खर्डीच्या सभे त पँ थरवाले हजर होते .
पँ थरच्या तु कडीचे ने तृत्व प्रकाश सावं तकडे होते . प्रकाशने खूप वे ळ वाट पाहिली; पण
खासदार जे व्हा आपल्या प्रश्नां वर बोलत नाहीत. हे लक्षात आले ते व्हा प्रकाश सावं त
हा सळसळत्या रक्ताचा तरूण तडक स्टे जवर गे ला. मोठ्या चपळाईने तो माइकजवळ
पोहोचला. आणि सरळ उपस्थित जनसमु दायाशी सं वाद सु रू केला. जिल्ह्यातील बड़े बड़े
128
ने ते आवाक होऊन पाहात राहिले , प्रकाशने पँ थर बाण्याने दोन प्रश्न उपस्थित केले .
त्याने बे ल्छी हत्याकांडाबाबत तु मची भूमिका काय? व
$$$$$
बौद्धां च्या सवलती दे णार की नाही ?’ असे त्यावे ळचे अत्यत ज्वलं त प्रश्न विचारले .
सभे त क्षणभर गोंधळ झाला; पण सर्वजण सावरले . शे वटी कै. रामभाऊ म्हाळगी यांना
भूमिका स्पष्ट करावी लागली.
कै. यशवं तराव चव्हाण म्हणजे महाराष्ट् रातील मात्तब्बर ने ते. त्यां च्यापु ढे उभे
राहतांना अने कांना घाम फुटे . साहित्य, सं स्कृती-राजकारण यांचा मे ळ घालून विधायक
विकासाचा टप्पा गाठणारे थोर ने ते. पण प्रकाशला त्यां च्यासमोर छातीठोकपणे उभे
राहन ू प्रश्न विचारण्याचे धाडस करावे लागले . कै. यशवं तराव चव्हाण म. ना. बरोरां च्या
समर्थनार्थ कसारा खर्डी परिसरात आले ले होते . कसारा ये थे सभा चालू असतांना भर
सभे त मागासवर्गाच्या सवलतींचा प्रश्न प्रकाशने थे ट कै. यशवं तराव चव्हाणांना
विचारला. काँ गर् े सवाले बिथरले ; पण या बे डर पँ थरवर सरळ हल्ला करण्याचे त्यांनी
टाळले . सभे त गोंधळ माजला. कै. यशवं तराव चव्हाणांनी सविस्तर निवे दन केले . पा. शि.
दे शमु खां च्याही सभे त असे च प्रश्न प्रकाशने विचारले , काँग्रेस, शिवसे ना यु ती
असतांना त्यांनी थोडी दादागिरीची भाषा वापरली. प्रकाश व त्याच्या सहकाऱ्यांनी
लगे च प्रत्यु त्तर दिले . प्रकरण सर्वांना मिटवावे लागले अन्यथा परिस्थिती स्फोटक
बनली असती. ना. विष्णु सावरा आणि आम. बाबु राव माने यांना भीमजयं तीच्या सभे त
प्रश्न विचारून प्रकाशने पे चात पकडले . प्रकाश असा प्रश्न विचारणारा कार्यकर्ता
होता!
प्रश्न असा उपस्थित होतो, की हे पँ थर सभे त का घु सत असत? उत्तर असे की,
रितसर निवे दन द्यायची सं धी त्यांना दिली जात नसे . पोलिस खात्याचा सं शय असे आणि
बड्या राजकीय पक्षां च्या ने त्यां शी पँ थरवाल्यांचे जु ळत नसे . त्या काळातल्या दलित
यु वकांना आपल्या विभागातली सभा म्हणजे मोठा वै चारिक सां स्कृतिक मे ळा वाटत
असे . अशा मे ळ्यात सर्व समाजासमोर दलित, उपे क्षित आदिवासी समाजाची बाजू
मांडली जाते किंवा नाही याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे . अशी कमतरता भासली
किंवा समाजाविरूद्ध काही चालल्याची बाब लक्षात आली तर लगे चच प्रतिक्रिया
व्यक्त होत असे . परिणामांची पर्वा न करता प्रतिक्रिया व्यक्त करणारे व सतत
सं घर्षाला सामोरे जावे , अशी मनोवृ त्ती जोपासणाऱ्या यु वकांचा अग्रणी प्रकाश होता.
खरोखर लढाऊ होता ! समाजासाठी जागृ तपणे काम करणारे लोक 'जागल्याचे ' काम
करतात. प्रकाश समाजक् रां तीच्या वाटचालीचा कंदिल हातात घे ऊन वाट दाखवणारा व
रक्षण करणारा 'जागल्या’ होता!
मृ त्युला कवटाळे पर्यं त प्रकाश समाजकार्यात मग्न होता. महाविद्यालयीन
शिक्षण घे ता घे ता त्याने नोकरी पत्करली. हॉटे ल कार्पोरेशन, मुं बईतल्या कामगारां शी
त्याचे मै तर् ीचे सं बंध जु ळले . हॉटेल कार्पोरेशन ऑफ इं डियातील कामगारांसाठी सतत
झुंजत राहण्याचे काम त्याने केले . मागासवर्गीय कामगारांचा तर तो अत्यं त लाडका,
हॉटे ल कार्पोरेशनमध्ये कामगार सं घटने त त्याने सरचिटणीस पदाचे जबाबदारीचे काम
सां भाळले . सर्व थरांतील कामगारांना
$$$$$
129
न्याय मिळवून दिल्यामु ळेच त्याच्या अं त्यसमयी कित्ये कांना गहिवरून आले . तसा
प्रकाश सावं त खूप छोटा कार्यकर्ता; पण त्याच्या श्रद्धांजली सभे ला पहिल्यांदा सर्व
विभागातले सन्माननीय प्रमु ख व अधिकारी उपस्थित होते . प्रत्ये कजण त्याला
जवळू न ओळखत होते . तो एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून. बघता बघता हा छोटा
प्रकाश किती मोठा होऊन गे ला याचा अचं बा वाटल्यावाचून राहात नाही. प्रकाशच्या
जाण्याने एक न्यायाची बाजू घे णारा धाडसी यु वा ने ता हरपला अशीच व्यवस्थापन,
कामगारांची भावना व्यक्त होत होती. गे ल्यावर्षी कोळसे वाडी कल्याण ये थे अने क
मान्यवरांनी प्रकाशच्या स्मृ तींना अभिवादन केले . या सभे त एकू ण पं चवीस विविध
स्तरां वरील प्रतिष्ठितांनी आदरांजली वाहिली. प्रकाशच्या स्वभावाचे अने क पै ल ू त्यात
उजळू न निघाले . कोकण प्रदे श व मुं बई परिसरांतील अने कांनी रिपब्लिकन
सं कल्पने साठी त्याने कार्य केल्याचा उच्चार केला. या श्रद्धांजली सभे त हरे ष दोंदे , बाळ
भाले राव, प्राचार्य रमे श जाधव, प्रा. एकनाथ जाधव, शाहू साबळे , श्रीकांत तळवटक,
आण्णासाहे ब रोकडे , महानं दा अहिरे , बौद्धाचार्य जाधव, केशव जाधव, किरण चन्ने ,
शै लेंद्र दोंदे , शरद जाधव, उ.ल. सूर्यवं शी, रविं दर् शे जवळ, बाळासाहे ब भोईर, दयानं द
माने प्रा.डॉ. विठ्ठल शिंदे यां च्या भाषणांनी हृदयाचा ठाव घे तला. या श्रद्धांजली सभे चे
वै शिष्ट्य हे की, या सभे ने विखु रले ल्या सर्व चळवळ्या मित्रांना एकत्रित आणले . एका
श्रद्धांजली सभे ने ठाणे , कोकण व मुं बई परिसरातील एका विचाराच्या कार्यकर्त्यांना
एकत्र आणले . मृ त्युनं तरही प्रकाशने केले ले हे मोठे काम होते .
प्रकाश सावं तच्या मनातली खं त अने कांनी बोलून दाखविली. प्रकाश सतत
म्हणत असे , "आज लायकी नसले ले लोक रिपब्लिकन पक्षात खूप मोठे झाले ले दिसतात;
पण ठाणे जिल्ह्यातले , कोकणातले लोक गु णवान असूनही मागे पडले त. आता 'तु म्ही
लोक' एकत्र या. रिपब्लिकन ने तृत्वाने सतत कोकण प्रदे श व नाशिक, जळगाव-धु ळे
भु सावळ पर्यं तच्या पट् ट्यावर अन्याय केलाय."
कार्यकर्ते जे बोलू शकले नाहीत; ते प्रकाश बोलत असे . आजवरचा रिप. पक्ष
आठवले गटाचा इतिहास पाहीला तर प्रकाश खरे च बोलला, असे वाटल्यावाचून
राहणार नाही. कोकण प्रदे श, नाशिक परिसराने आं बेडकरी चळवळीला सतत ताकद
दिली पण महाराष्ट् राच्या प्रस्थापित ने तृत्वाने या परिसरातील एकाही गु णवान
ने त्याला 'ने तृत्वाचा दर्जा’ दिला नाही. केवळ या भागातील कार्यकर्त्यांचा उपयोग करून
घे तला. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अवमान होऊ नये , असे प्रकाशला वाटे व तो अतिशय
पोटतिडकीने बोले . प्रकाशच्या डोक्यात घाटी-कोकणीवाद नव्हता पण रिपब्लिकन
पक्षात हा वाद घु सला आहे , याची जाणीव त्याला होती. पँ थर बरखास्त होऊन
रिपब्लिकन पक्ष अस्तित्वात आला त्या दिवसापासून हे प्रदे शवादाचे खूळ जास्त रूजू
लागले हे स्पष्ट आहे . प्रकाशचा बौद्धजन पं चायतीवर जास्त विश्वास होता.
$$$$$
130
प्रकाश म्हणजे शिडशिडीत अं गकाठीचा पाच फू ट उंचीचा यु वक, ने हमी 'शर्ट इन'
केले ली. चौकोनी चे हरा. भे दक डोळे , हसत बोलणे , बोलण्याची लकब व शै ली जराशी
पु णे री. समाजकार्याचा ध्यास घे तले ला; समाजात मिसळू नही तसा काहीसा एकाकी
राहीले ला, मनाचा मोकळा; पण ठाम निश्चयाचा प्रकाश आता दिसणार नाही. त्याच्या
आठवणी कार्यकर्त्यां च्या मनात ताज्या आहे त, त्या पु ढे ही ताज्याच राहतील. त्याने
घडवून आणले ले समविचारी गु णवान व कर्तृत्ववान कार्यकर्त्यांचे ऐक्य अबाधित राहील
अन् प्रकाशच्या स्मृ तींना उजाळा मिळत राहीला ! छोटा असूनही खूप मोठे काम
केले स; प्रकाशा तु झ्या स्मृ तींना विनम्र अभिवादन!
$$$$$
आयु . मालुजी बें डुजी सावंत विनीत आणि सावंत परिवार आयु ष्मती मंजुळा मालुजी
सावंत
131
कल्याण (पूर्व).
शिवणे कर भावकी : बौध्द विकास मं डळ, मौजे शिरवणे ,
तालु का-दापोली, जिल्हा - रत्नागिरी, मुं बई विभाग.
$$$$$
132
समिती शाखा क् र.४ तर्फे शै क्षणिक शिबीराचे आयोजन. यात सिं हाचा वाटा ३० डिसें बर
१९९९ आसं स्कृतिक मृ त्यु अध्यक्ष टी.जी. गायकवाड (बौ प समिती शा.क् र ४८८
कल्याण-पूर्वचे अध्यक्ष) सूतर् सं चालन केशव जाधव विधी बौद्धाचार्य- शांताराम जाधव
यांनी केले , श्रद्धांजली : प्रा. वि.सो शिं दे, प्रा एकनाथ जाधव, बाळासाहे ब भोईर,
दयानं द माने , किरण अण्णासाहे ब रोकडे , महानं द अहिरे , अरविं द निकाळजे सं घप्रिय
जगताप, हरिष दोंदे , प्रकाश सावंत याच्या श्रद्धांजली सभेचा
$$$$$
कार्यक्रम महाड तालुका मराठा सभागृह, सिध्दार्थ नगर कोळसेवाडी येथे सकाळी ११ वाजता संपन्न झाला. प्रकाश सावंत हा
सेवेत होता. आर्थिक परिस्थिती ठोक होती. प्रकाश हा युवक अविवाहीत राहिला होता. एका बेसावध क्षणी त्याने जीवनाला
कं टाळून या जगाचा निरोप घेतला. खरं तर स्वघातावर जाहीर - चर्चा होत नाही. लोकांना ते आवडत नाही. सामाजिक
चळवळीत काही युवकांनी छातिवर गोळ्या झेलल्या तर कांहीनी आपलेच जीवन स्वतःच्या हाताने संपविले. या युवकांची
घुसमट सच्ची होती. जीवनात काळोखीला छेदता येत नसेल तेव्हा असे निर्णय घेतले जातात. हे निर्णय खूप खाजगी असतात
पण त्यांची हळहळ समाजमन व्यापून टाकते. नामांतर लढ्यात मराठा पुरोगामी युवक मिलाम ढोणे याने असा निर्णय घेतला
आणि आपले जीवन संपविले. नामांतराला होणारा विरोध आणि झालेली जाळपोळ जीवतहानी याने अस्वस्थ होऊन त्याने
आपल्या जगाचा निरोप घेतला. त्या प्रसंगी त्याने डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि डॉ. बाबा आढाव यांना पत्र लिहून आपली
भावना कळविली होती. गौतम वाघमारे याने आत्मदहन के ले. नामांतर होत नाही म्हणून त्याने आक्रोश के ला. गंगाधर गाढे
यांच्याशिवाय कोणी माझ्या मृतदेहाला प्रथम हात लावू नये असेही त्याने लिहून ठेवले होते. गंगाधर गाडे पँथर अनेक सभांतून
काही लोक इनके हकने आहेत की ते वेडे झालेत, मृत्यूला कवटाळतील, बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा
विद्यापीठाला देवून टाका असे म्हटल्याचे माझ्यासह अनेकांनी ऐकले आहे. नामातरांच्या अखेरच्या टप्प्यातील आंदोलनात
ठाणे जिल्ह्यात आलेल्या आंदोलना दरम्यान काही युवक युवतींनी आत्महत्या करून वातावरण पेटवून दिले होते. इगतपुरीचे
पँथरचे धडाडीचे कार्यकर्त्ये इतके अस्वस्थ होते की आई बहिण आणि कौटुंबिक समस्यांना दूर करताना त्याला या
जीवनाचाच कं टाळा आला. त्याने घेतलेला निर्णय एका पँथरने घेतलेला निर्णय हा त्याचा निर्णय होता. आपल्याला पटणार
नाही पण त्याला तो पटला होता. इतके निराधार क्षण प्रकाश सावंत्याच्याही वाट्याला आले आणि त्याने हे जग
व्यकिगत पातळीवरील प्रश्नांच्या भागात अडकू न सोडले. घाटकोपरमाई प्रकारणात गोळीबारात हत्या झाल्या. विश्वास घोगरे
या बुद्धिमान शाहिराला असहय झाले. जयश्रीमचा उच्चार करून त्याने स्वहत्या के ली. या सर्व प्रकरणांतील कर्तृत्ववान
कार्यकर्त्यांच्या त्यागात, क्षमतेत आणि निळेत कु ठे ही उपोषणा आला नाही, समाजानेही तो शेधिला नाही.
$$$$$
पँ थर हिरामण उर्फ भाई सं गारे हे मूळचे नगरचे नामदे व ढसाळ, एल डी. भोसले ,
जयदे व गायकवाड, गं गाधर आं बेडकर, अविनाश महाते कर ही सर्व पँ थर मं डळी पु णे
जिल्हयातून ये ऊन मुं बईत आणि पुण्यात स्थायिक झाले ली. इं दापूर बावडा बहिष्काराचे
प्रकरण आणि शं कराचार्यां च्या पाद्यपूजेचा कार्यक् रम पु ण्यातूनच उर्वरित महाराष्ट् रात
133
पोहोचला. यावे ळच्या पु णे स्थित कार्यक् रमां वर आणि कार्यकर्त्यां वर नामदे व ढसाळांचा
प्रचं ड प्रभाव होता, मनोहर अं कुश यां च्यावरही राजा ढाले सोबत नामदे व ढसाळांचा
प्रचं ड प्रभाव होता. मनोहर अं कुश हे ही पु णे जिल्हयातून ये ऊन मुं बईत सात रस्ता
वी.आय.टी. ये थे वास्तव्यास आले होते . त्यावे ळेस मनोहरचे वय वीस वर्षे असावे .
मनोहर शिवराम अं कुश हे मनोहर अं कुश यांचे पूर्ण नाव. त्याचे वडिल
शिवरामदादा अं कुश हे बाबासाहे ब आं बेडकरां च्या सहवासात चळवळीत कार्यरत होते .
पु णे जिल्ह्यातील आं बेगाव तालु का हा आदिवासी, दुर्गम तालु का, जीवनात प्रचं ड
दारिद्र्य आणि अभावग्रस्तता असले ली शिक्षणाशिवाय कोणताही पर्याय नव्हता.
शिवरामदादांना शिक्षणाचे महत्व कळले होते . म्हणून आपल्या मु लाला शिकवून मोठे
अधिकारी बनविण्याचा त्यांचा इरादा होता. दि. २५ सप्टें बर १९४९ रोजी मनोहरचा
जन्म आं बेगाव तालु क्यातील माळीण या खे ड्यात झाला. साधारणतः काही वर्षापूर्वी
'माळीण' हे गाव अतिवृ ष्टीत झाले ल्या भूस्खलनात गडप झाल्याचा इतिहास आहे . याच
माळीण गां वी मनोहरचा जन्म झाला आणि तालु क्यातच मॅ ट् रीक पर्यन्तचे शिक्षण
मनोहरने पूर्ण केले . मनोहर हा तरुण अं गापिं डाने धिप्पाड होता. बालपणातच तो
बे डरवृ त्तीचा होता. काळी माती अन करवं दी, बाभळीच्या रानातील मोकळा सु साटवारा
प्याले ला हा यु वक आदिवासी प्रदे शाचे कष्टाळू काटक सं स्कार घे ऊन शहराकडे वळत
होता. आपले वडिल आं बेडकरी चळवळीत कार्यरत असून ते मुं बईत आहे त, हे जाणून
मनोहर नावाचा तरुण मुं बईत दाखल झाला. परिस्थिती अत्यं त प्रतिकू ल तरीही
कमालीची जिद्द आणि त्यागीवृ त्ती यामु ळे वडिलांनी त्याच्या शरीरयष्टी सारखा रोजगार
मिळावा म्हणून त्याला भारतीय नौदलात जवान होण्याची सं धी मिळवून दिली. हा
राजबिं डा यु वक दे शाच्या से वेत दाखल झाला. परं तु त्याच दरम्यान अन्याय
अत्याचाराच्या विरोधातला बु लंद आवाज पँ थर रूपाने मुं बईसह महाराष्ट् रात घु मत
होता. शिकले ली आणि
$$$$$
134
१९७४ ची दं गल उसळली-भागवत जाधव पहिला पँ थर शहीद ठरला. दं गलीत
राजा ढाले यांचे डोके फुटले , ते जखमी झाले . मनोहर अं कुश यां च्या सारखे कार्यकर्त्ये त्या
वरळीच्या सभा स्थळापासून अजिबात हलले नाहीत. शे वटी मनोहर अं कुश यां च्यासह
अने क पँ थरना अटक झाली. मनोहर अं कुश यांनी तु रुं गवास भोगला. ते व्हाही ते
नौदलातील जवान होते , साधारणतः याच काळात भगवदगीते चे दहन करण्याची राजा
ढाले यांची घोषणा अने कां च्या लढाऊपणात रोमांच पे रित गे ली. सभे त पे टते गोळे
टाकू न सभा उधळू न लावायचे प्रकार चालूच होते . सताधाऱ्यांना आणि लोकप्रतिधीना
व कर्मठ जातीयवादी सं घटनांना आव्हान दे ण्याचे कार्य पँ थरने सु रूच ठे वले होते .
रिपब्लिकन पु ढाऱ्यां च्या सभा उधळण्याचे कार्यक् रम होत होते . रा.सु .गवई साहे ब यांची
सभा उल्हासनगरच्या सु भाष टे कडीवर ठाणे जिल्हा पँ थरने उधळली होती, जोवर ऐक्य
होत नाही, तोवर सभा होऊ दे णार नाही ही पँ थरची भूमिका होती. त्या सोबतच
केंद्रातील आणि राज्यातील ने ते दलित वंचित, उपे क्षित
$$$$$
वर्गाचे तारणहार समजतात, त्यांनी धडा शिकविण्याचे पँ थरने ठरविले होते . साधारणत:
१९७७-७८च्या दरम्यान उधळसत्र सु रु असतांना केंद्रीय मं तर् ी बाबू जगजीवनराम
यांची सभा शिवाजी पार्क वर घेण्याचे जाहीर झाले . बाबू जगजीवनराम केंद्रातील
दलितांचा चे हरा होते . त्यांची हरिजन सं कल्पनाही अजून टिकू न होती. त्यांना
महाराष्ट् रात धडा शिकवणे महत्त्वाचे होते , पँ थरने निर्णय घे तला की केंद्रीय सं रक्षण
मं तर् ी बाबू जगजीवन राम यांची सभा उधळायली, बस्स, तयारी झाली. लाखोच्या सभे त
काठ्या, हॉकी स्टीक अन पे टते बोळे फेकित पँ थर घु सले . जिवाची पर्वा न करता
निधड्या छातीने , डोक्याला कफन बां धणाऱ्या या यु वकांचे धाडस बघून सारा
जनसमु दाय अचं बित झाला . लोकांची पळापळ सु रू झाली पोलिसांनी धरपकड सु रु
केली. पँ थरना मारझोड करीत जे रबं द करून अटक केली. मनोहर अं कुशराव यांना अटक
झाली. मनोहर अं कुश नौदलात. सं रक्षणमं तर् ी त्यांचे 'बॉस' मनोहर अं कुश यांनी जवान
असल्याचे सां गितले . त्यांना कोर्ट मार्शल झाली, त्यांनी नोकरीवर पाणी सोडले .
पँ थरमध्ये पूर्णवे ळ कार्यकर्ता म्हणून ते राबू लागले .
मनोहर अं कुश दोन वे ळेस सं भर् मीत झाले . पहिल्यांदा जे व्हा नामदे व ढसाळां नी
नवा पँ थरगट उभा करायचं ठरवलं ते व्हा त्या सं भर् मात अकुशांसोबत भाई सं गारे , अर्जुन
डां गळे , अविनाश महाते कर, ही ने ते मं डळी अडकली अन पँ थरपासून दरू गे ली. १९७४
ची अशी स्थिती होती. अने क ठिकाणी १९७४ ते ७६ तु टफू ट सु रु होती. १९७७ च्या राजा
ढाले , ज.वी.पवार यांनी पँ थर बरखास्तीचा निर्णय घे तला, हे पाहन
ू आणि नामदे व गट वाढत
नाही मात्र कार्यकर्ते पँ थरपासून, समाजापासून दरू फेकले जाताहे त, हे पाहन ू दुसऱ्यांदा
मनोहर अं कुश सं भर् मात पडले होते . नामदे वचा निर्णय चु कला, याची त्यांना जाणीव
झाली आणि पँ थर म्हणूनच काम करण्याचा पक्का निर्णय त्यांनी घे तला. पँ थरचे पहिले
राष्ट् रीय अधिवे शन दिल्लीत झाले , १९८० च्या या राष्ट् रीय अधिवे शनानं तर दुसरे
राज्यव्यापी अधिवे शन दादर ये थे झाले . १९८४ साली. त्यात मनोहर अं कुश यांचा खूप
मोठा सहभाग होता. त्यांनी त्यावे ळी टॅ क्सींवर बसून, उभे राहन ू हजारोंच्या पँ थर
जथ्याला दादरकडे ने तांना उद्घोषित केले . या ‘समता मार्च’ च्या पु ढे मनोहर अं कुशांची
शे रोशायरी अन निवे दन अक्षरश: आसमं तात घु मत होते . भारतीय दलित पँ थरच्या
वाटचालीत जितके प्रेम ठाणे जिल्हा पँ थरने रामदास आठवले , प्रा. अरुण कांबळे
यां च्यावर केले , तितकेच प्रेम मनोहर अं कुश यां च्यावर केले . या तिघांनाही
135
प्रत्ये कवे ळी सु ख दुःखात ठाणे जिल्हयाने प्रेमाने जवळ केले . मनोहर अं कुश तर
आदिवासी भूमिहीन, शे तमजूर आं दोलनात सहभागी होतांना कार्यकर्त्यांसोबत
$$$$$
$$$$$
१. डबूलं द्या !
तर…
136
कामगार बं धू आणि भगिनीनो
तु म्ही घाम गाळायचा अस्तोय्
तु म्ही रक्त सांडायच अस्तय्
तु मच्या रक्ताच्या थें बा थें बावर
आभाळ चाटतील सरं जामदारी हवे ल्या
त्यांच्या इं पाला गाड्यातून...
पे ट्रोल ऐवजी तु मचे रक्त द्या
तरच सरकारी दरबारी
नोंद होईल तु मच्या रक्ताची
तु मच्या रक्तात बु डविले ले लाल निशाण
मी बिनधास्त घे तोय माझ्या भटभु ज्या खां द्यावर
ते व्हा माझ्या बंधूनो मला रक्त द्या
आणि माझ्या मागे या पण कामगार बं धू आणि भगिनींनों
मला मात्र माफ करा हं
तु म्ही माझ्या मागे या..!
मी तु मच्या मागे ये ऊ शकत नाही
कारण
तु मचे ने तृत्व करणारा मी
झोपडीत राहच ू शकत नाही
गटारांची वशिले बाजी चालत नाही माझ्याकडे
कारण ? मो ही रहातोय -
तु मच्या रक्तात माखले ल्या
सरं जामी हवे लीत
मला केलतना तु म्हीच मोठं
तु मचे न्याय हक्क मिळविण्यासाठी?
मग?
मला तु म्ही पु ढारी म्हणा
मग मला तु म्ही साहे ब म्हणा
मला तु म्ही रक्त द्या..
$$$$$
तर कामगार बं धनो
भांडवलदार तु म्हाला घमील दे ईल
तु म्ही मला डबु ल द्या
तु मच्या न्याय हक्कासाठी
डबु ल द्याऽऽऽ डबुल द्या ऽऽऽ रक्त द्या.
२. आई.....
आई कशाला जन्म दिलास ?
या भूमीवर ! या धरतीवर !
याच धरणीने जन्म दिलाय
अफाट जाती वृ क्षांना
137
त्यस्थात किर्द अंधारीने
दिसत नाही प्रकाश झोत
चमकत नाही काजवा सु द्धा
पु रा चाचपडता आहे
या आं धार गु हे तील काटे री वं दिखान्यात
आई याच मातीच्या अणु रेणूत
लपले ल्या वर्णभे दां च्या भूकंप स्फोटांनी
चिं धड्यां उडाल्यात शरिराच्या
पु रा भाजून निघालोय बघ
जगतो आहे हजारो वर्षापासून
सडले ल्या महारोग्यासारखा
गावाच्या वे शीबाहे र
शे ठजी-भटजीचे आधु निक दास
पोसताहे त समाजवाद
माझा खून करून माझें रक्त पिवून
जगवताहे त लोकशाही
बहिणीवर सामाईक बलात्कार करून
आई आक् रोश करू नकोस
मी मरणार म्हणून
या गु लामी विरुद्ध पे टले ल्या यु द्धात
आई आडवू नकोस
मी थांबनार नाही
नाही ! नाही ! नाही !
$$$$$
३. आई
स्वातं त्र्यदिनी....
आज ये णार आहे आपल्या घरी
क् रां तिपु त्र – दाढीवाले / सबनम
झोळीवाले - त्यां च्या झोळीतलं दुःख तू ठे वून घे ....
मी -
पिं पळाच्या झाडाखालचा बु द्ध पाहन ू ये तो
डॉ. आं बेडकरां च्या कोटातील पे न काढून घे तो
आणि लिहन ू टाकतो रक्ताने आभाळात
सम्यक क् रां तिः सम्यक क् रां ती: सम्यद क् रां ती.
जून १९७२
138
४. बंड
वस्तीतल्या मु लांचे ते बं ड पाहिले मी
चु पचाप धोरणारे ते षंड पाहिले मी ||
त्यांची अशीच भाषा जु नची मवाळ क् रां ती
मै दानी टाकतांना ते थं ड पाहिले मी ||
सु टली सु साट पोरे आता नव्या दमाची
वणव्यात धावणारी ती झुंड पाहिली मी !!
-धडक मोर्चा
$$$$$
५. गझल
रमलो असाच तें व्हा तू माझ्या करात आली
डोळे मिटू न हलकी धडकी उरात आली
वाटे ल ते करावे जणू तु झ्या सं गतीने
उन्मत्त होवूनिया मस्ती भरात आली
माझे मला न ठावे तू मोर पं खुड्यांची
आसवे गिळीत बसलो माती करात आली
अस्पृ श्य या करांना कवटाळीते स तें व्हा
आत्ताच जात माझी जन्मा घरात आली
आत्ता मलाही कळले माझे अभाळ नाही
ते साक्षीदार खोटे खोटी वरात आली
139
हे गरिबांनो, अबलांनो, महारोग्यानों नि हरामखोरांनो
तु म्ही ठरवा सगळ्यांनीच एक सामूहीक आत्महत्ये चा दिवस
आणि होऊन जाऊ द्या ह्या दे शाला सु जलाम - सु फलाम.
आज करायचीय गु लाबी नशा राष्ट् र प्रतिनिधींनी
आणि आपल्या गोपनीय खोलीत उघडं नागडं होऊन
कवटाळायचं य कुनालाबी
आज जवानांनी निधड्या छातीवर बिल्ले लावायचे त शौर्याचे
$$$$$
140
‘सं तोषा’ या गु डांनी हत्याकांड केले होते . ते पोलिसांना चकवा दे त फिरत होते . त्या
वे ळेस मनोहर अं कुश यां नी उत्तर प्रदे शात प्रवे श केला. धिप्पाड शरीरां च्या मनोहर
अं कुश यांनी आपल्या खां द्यावरून एक काळ्या रं गाची बॉक्सवानी ले दर बँ ग लोंबकळत
ठे वली होती. त्यां च्या मागे पोलिस लागले ती बॉक्स ले दर बॅ ग पिस्तु लसारखी वाटत
होती. पँ थरचा कार्यकर्ता उत्तर प्रदे शात घु सलाय ही वार्ता सर्वत्र पसरली पण त्यामु ळे
दुसऱ्या दिवशीच राधे -सं तोषायांना अटक झाली , पँ थरचा हा दरारा, दबदबा मनोहर
अं कुश यांनी परप्रांतातही निर्माण केला होता.
मनोहक अं कुश नौदल जवान होते . त्यांना रम' मिळत असायची. पण त्यां च्या या
सवयीमु ळे लोकांमध्ये कुजबु ज होऊ लागली. त्यांनी सरळ विपश्यना करण्याचा निर्णय
घे तला. इगतपु री ये थील धम्मगिरीत त्यांनी विपश्यना केली. इगतपु रीचे पँ थर मनोहर
अं कुशां वर बे हद खु ष होते . त्यांनी त्याच्या शिबिराच्या शे वटच्या दिवशी प्रा. विठ् ठल
शिं दे, मिलिं द रणदिवे यांना बोलावून घे तले व त्यांची सभा आयोजित केली. मनोहर
अं कुश ते व्हा गोयं का गु रुजींचा हुबे हुब खर्जातला आवाज काढून बु द्ध विचारावर प्रवचन
दे त होते . मनोहर अं कुशांचे अं तर्बाह्य परिवर्तन आले होते .
महाराष्ट् रात जु लै महिन्यात प्रचं ड पाऊस पडतो जु लै २००५ चा महापूर
आपणास आठवत असे ल. तसाच वादळी वाऱ्याचा प्रचं ड पाऊस २३ जु लै १९८९ या
दिवशी कोसळत होता, रहदारी ठप्प झाली होती. आभाळ फाटले होते . अशा वे ळेस एक
बातमी दरू दर्शनवर घोंगावत आली. एका बे सावध क्षणी मनोहर अं कुश यांचा
लालबागमधील जयहिं द सिने मा जवळ मोटार अपघात झाला. त्यां च्या दुःखद
निधनाची वार्ता काळीज फोडून गे ली. सातरस्ताच्या बी.आय.टी. चाळीवरून
अं त्ययात्रा निघून वरळीच्या स्मशानभूमीत पोहोचली हजारो लोकांनी साश्रू नयनांनी
स्मृ तीशे ष पॅ थर मनोहर अकुंशांना अखे रचा निरोप दिला.
मनोहर अं कुश अमर रहें चा घोष आभाळात निनादत राहिला. इगतपु रीचे पँ थर
धाय मोकलून रडत होते . दिवं गत वसं त पवार यांनी आदरांजलींचा कार्यक् रम
इगतपु रीला आयोजित केल्याचे पत्र ठाणे जिल्हा पँ थर सरचिटणीस प्रा. विठ् ठल शिं दे
यांना लिहिले . ‘नवाकाळ’ मधील बातमी वाचून हे पँ थर्स खूप भावु क झाले होते , मनोहर
अं कुशावर अन्याय झाला आहे . आता निसर्गाने ही त्यां च्यावर अन्याय केला आहे , ही
खं त त्यांनी व्यक्त केली होती. मनोहर अं कुशां च्या भावपूर्ण आदरांजलीचा इगतपु रीचा
जाहीर कार्यक् रम महाराष्ट् रातील पहिलाच कार्यक् रम असावा असे वाटते .
$$$$$
रामसिं ग धनाजी सोनवणे यांचे मूळगाव तळे गाव , पिं परी ता. भोकरदन जिल्हा
जालना (मराठवाडा) आहे . रामसिं ग आपली पत्नी शांताबाई यां च्यासह उल्हासनगरात
आले , इथे च स्थायिक झाले . त्याच्या परिवारात सु निल, अनिल, भारत, शं कर अशी चार
मु ले एकत्रित राहत असत.रामसिं गची मु लगी आणि जावई जळू न मरण पावले . खूप
घाव सोसत त्यांनी पँथर सं घटने त पोहचून आणि मोची समाज सु धार सं घटना स्थापन
करीत पु ढाकार घे णला. प्रा. विठ् ठल शिं दे, एम्. के सोनवणे , तु ळशीराम रिसवाल,
मन्नालाल गां गवे यांना सं स्थापनात सोबत घे ऊन त्यांनी वाटचाल केली. मोची समाजात
सु धारणा करण्यासाठी एक परिवर्तनवादी कार्यक् रम यांनी तयार केला होता. रामसिं ग
सोनवणे हे धडाडीचे कार्यकर्ते होते . त्यांचा अत्यं त जीवघे णा अपघात २००५ साली झाला
141
होता. त्यातूनही ते वाचले होते . पूर्णचे ह-याची मूळ ठे वण बदलली गे ली होती. आवाजात
बदल झाला होता. जे .जें . हॉस्पीटल मध्ये दाखल असतांना रामदास आठवले यांनी
त्यांना खूप सहकार्य केले . पूर्ण बरे झाल्यावर त्यांनी आपले दै नंदिन कार्य सु रु केले मात्र
दि. २७ सप्टें बर२००७ रोजी त्यांचा मूत्रपिं ड नाशाने मृ त्यू झाला. उपे क्षित वंचित
समाजात रामसिं ग सोनवणे यां च्या सारखी माणसं अपवादाने उभी राहतात. त्यामु ळे
त्यां च्या दु:खद निधनाने आं बेडकरी समाजाचे खूप मोठे नु कसान झाले आहे . रामसिं ग
अल्पशिक्षित असला तरी शिक्षणाचे महत्त्व त्याला कळले होते . त्याने आपल्या
विभागात प्राथमिक शाळा सु रु केली. नित्यने माने रोहिदास जयं तीच्या कार्यक् रमाचे
आयोजन करून महाराष्ट् रीय मोची बां धवां ना व पँथरने त्यां ना तो निमं तर् ीत करीत
असे . त्याला समाज मं दिर बां धायचे होते , मात्र ते त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले . रामसिं ग
मराठी भाषे ची ने हमी मोडतोड करीत असे . प्रा. विठ् ठल शिं दे यांना प्राध्यापक, सर न
म्हणता 'गु रुजी' म्हणणे पसं त करी असे . रामसिं गने गटई कामगारांचे प्रश्न धसास
लावले . रामलिं ग सोनवणे बु द्ध, फुले बाबासाहे बांना मानीत असल्यामु ळे रामायण,
महाभारत, अं धश्रद्धा यां च्या पासून दरू होता. त्याच्या एका डोळ्यात ‘टीक’ होती
मात्र तो अत्यं त डोळस होता.
रामसिं ग सोनवणे हा अशिक्षित परं तु अत्यं त समं जस तसे च अने क सं कटांना
तोंड दे णारा व कधीही नाराज न होणारा असा तरुण होता. दोघे ही नवरा बायको
काबाडकष्ट करून तु टपु ंज्या पगारात आपला सं सार करीतच समाजकार्य करत गोर-
गरिबांना, पिडीतांना मदत करण्यासाठी त्यांनी मोची समाज सु धार सं घटना स्थापन केली.
भु सावळ, मराठवाडा (सिल्लोड) भोकरदण, जालना, औरं गाबाद, कन्नड, सोयगाव,
पिझोर, खु लताबाद, जामने र, मध्यप्रदे श, पाचोरा, चाळीसगाव, दे ऊळगाव, पूनगाव,
अं धेरी, मु लुंड, विक् रोळी, भिवं डी, कल्याण, अं बरनाथ, उल्हासनगर, भोपाळ, सोलापूर,
रायपूर, चिखली, नळणी, पिं परी,
$$$$$
वजीरखे डा, डोंगरगाव, आणवी, जाने फळ, आडगाव, कोठे रा, वाकडी, हसनाबाद,
पिंपळगाव, भारसावळी, खातरखे डा, साखरबे ल पळशी, लालवण, वायगाव, लिदोना
ये थील लोक सभासद होऊन ते थे सं घटना स्थापन केली. समाजकार्य करताना ह्या
व्यक्तीवर अने क कठीण प्रसं ग आले . मराठवाडा विद्यापीठ नामां तरच्या वे ळेस
जे लमध्ये गे ले सचिवालयां वर नामां तर मोर्चा गे ला. ते व्हा लाठीमार होऊन
हॉस्पिटलमध्ये मृ तावस्थेत टाकले होते . त्यावे ळेस भा.द.पँ .चे अध्यक्ष प्रा. अरुण
कांबळे होते .भीमनगर, उल्हासनगर ये थील झोपडपट् टी म्युनिसिपालटीने उद्धव ् स्त
केली. त्यावे ळेस जे लमध्ये होते . या सं घटने त असताना काही गु ं डां नी रात्री ९ वाजता
तलवारीने हल्ला केला होता. मु त्तूजयं ती कार्यक् रमानिमित्ताने हल्ला झाला होता.
भा.द.पँ . सं घटने च्या माणसाला वाचवण्यासाठी गे लो असताना भरपूर मारहाण झाली.
त्यामु ळे १० दिवस सरकारी हॉस्पिटलमध्ये ठे वले होते . हे सु द्धा प्रकरण सिं धी लोकांनी
पोलीस स्टे शनला दाबले . ते थे न्याय मिळाला नाही. त्यानं तर कोणताही गु न्हा नसताना
३०७ ह्या कलमाखाली पोलीस स्टे शनला बं द केले . दोन वर्ष जामीन होऊ दिला नाही.
रामदासजी आठवले यांनी जामीन दे ण्यासाठी फार प्रयत्न केले पण उपयोग झाला
नाही. असा अन्याय होऊनही ही व्यक्ती डगमगली नाही उलट जास्तच कणखरपणे
आपले कार्य पु ढे चालू ठे वण्याच्या प्रयत्नात राहिली.
142
१) मोची समाज सु धार सं घटने ची स्थापना २ मे १९८२ मध्ये करण्यात आली. आजपर्यं त
मोची समाजातील ढोर - कटाई - चां भार या लोकां वर जे व्हा अन्याय व्हायचा, सरकारी
अनु दान मिळत नसे . मु लींवर बलात्कार व्हायचे . या सर्व गोष्टी दाबल्या जात होत्या. या
अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारे कोणी नव्हते . खे ड्या-पाड्यातील व शहरातील
कोणताही माणूस या अन्यायाला वाचा फोडत नव्हता. गे ल्या १२ वर्षात भा.द.पँ. मधील
बाबासाहे बांची चळवळ थोडीफार समजू लागली. ते व्हा या समाजाला एकत्र का आणू
नये , असे रामसिं गला वाटू लागले . एका महिले स काही गु ं डांनी मारहाण केली त्याबद्दल
पोलीस स्टे शनला गे लो असता पोलीसांनीच दडपले व खोट्या केसमध्ये टाकले .
ते व्हापासून या समाजाला एकात्रित करण्याचा विचार त्यांनी केला.दलितांना या दे शात
न्याय दे णारी एकच सं घटना भारतीय दलित पँ थरच्या त्यावे ळच्या कार्यकर्त्यांनी
रामसिं गला सहकार्य दे ऊन सु टका केली. समाजाला बाबासाहे बांची चळवळ अजूनही
समजत नाही. बाबासाहे बांनी मोची समाजासाठी काम केले ले आहे , त्यांना वारं वार
सां गण्यासाठी ही सं घटना स्थापना केली. ते भांडण्यासाठी क् रां तीसाठी घाबरतात. त्यांना
स्वतं तर् पणे उभे केले पाहिजे .
२) मोची सं घटना डॉ. बाबासाहे ब आं बेडकरां च्या ले निनस्टॅ लीन किंवा हिं दुत्व विचारावर
नाही.
३) मोची समाज हो प्रथम जे व्हा सं घटना निर्माण केली ते व्हा लोकांनी स्वीकारली जें
सु शिक्षित आहे त त्यांचा विरोध नाही, पण अशिक्षिताना पटवून द्यावे लागते .
$$$$$
४) रामलिं ग सोनवणे म्हणतो - आपल्या या दे शात जे वढे चां भार बां धव आहे त, त्यांना
स्वाभीमानी जीवन जगण्यास बाबासाहे बांनी शिकवले .हे पूर्वी त्यांना कधीच कळले
नव्हते . पण आता सभे तन ू चर्चेतून. ज्या सवलती मिळतात त्या बाबासाहे बांनी तयार
केले ल्या घटने पासून मिळतात. म्हणून आपण त्यांना का मानू नये ! खे ड्या-पाड्यातील
मु लांना शिक्षण कॉले ज, फी या सर्व सवलती कोणापासून मिळतात ? बाबासाहे बांमुळेच
ना? हे त्यांना रामसिं ग सोनवणे भाषणातून पटू न दे त असे , शिक्षण घ्या , सं घटीत व्हा व
आपले हक्क मिळविण्यासाठी सं घर्ष करा हे पटवून देत असे.
५) ह्यातील जी मं डळी आर्य समाजात गे लेली आहे त किंवा ज्यांचे पोट भरले ले आहे हीच
ब्राम्हणवादी (गां धीवादी) मं डळी विरोध करतात. हे लोक आर्यसमाजातून
बाबासाहे बांनी ज्या सवलती दिल्या त्या घे ण्यासाठी परत या समाजात आले . व ही
मं डळी बाबासाहे बां च्या नावाने सं पर्ण
ू मालमत्ता खाऊन परत त्यां च्या नावाला विरोध
करतात. बोलके उदा. द्यायचे झाल्यास के.के. शास्त्री या. दुटप्पी व बामणाऊ वृ त्तीच्या
माणसाचे दे ता ये ईल. विरोधी काही धर्माबाबत गै रसमज, अफवा पसरवून माझ्या
बदनामीचा प्रयत्न करीत असतात.
६) महिला आघाडी आहे . काही महिला सु शिक्षित असल्यामु ळे त्यांना सं घटना करावे
असे वाटले . समाजातील लोकां नी विरोध केला. पण विरोधाला न जु मानता त्यांनी
सं घटना केली.लताबाई एम.के सोनवणे ह्यांनी सु रवात केली आहे .
७) आजवरचे लढे कोणते ? प्रश्न काय आहे त? जें लढें दिले ते समाजाची आर्थिक
उन्नतीसाठी आमच्या समाजातील गटईकामगारांना लायसन व टपऱ्या बां धन ू द्यावा
अशा मागण्या व बे घरांना घर, गायरान जमिनीची वाटप व्हावी. आमच्या समाजाची
‘मोची समाज विकास मं डळ’ म्हणून स्थापना करावी. चर्मकार व महात्माफुले या
मं डळींनी आमची गोची केली, त्यामु ळे आमच्या समाजाचा उत्कर्ष होत नाही. कर्ज पास
143
झाले ल्या रकमे पैकी फक्त पाव भाग रक्कम दिली जाते . कर्जाची रक्कम पूर्ण दिली हे
दाखविले जाते . त्यामु ळे उत्कर्ष होत नाही. त्यासाठी मोर्चे काढले जातात. सरकारकडे
निवे दन दिले जाते पण त्याचा कोणीही विचार करत नाही. यावरून महाराष्ट् रातील
मोची समाजाला कोणीही वाली नाही तर ये थे रहावे कि राहू नये असे वाटू लागले आहे
हा एक प्रकारचा मोची समाजावर अन्याय आहे , म्हणून आम्ही बाबासाहे बां च्या
विचाराप्रमाणे का क् रां ती करू नये ? कारण त्याशिवाय पर्याय नाही.
८) ह्या लढ्यात उतरल्यापासून समाजाने अतिशय सहकार्य केले व अजूनही करत आहे .
कारण ह्या लढ्यामु ळे सं घटीतपणा ये ऊन मोची समाजावरील अन्याय दरू होणार आहे ,
असे निश्चित वाटते .
९) तु मच्या चळवळीचे मित्र कोण? रामसिं ग म्हणतो भारतीय दलित पँ थरने जास्त
सहकार्य केले . वे ळोवे ळी मार्गदर्शन केले . तसे च लढ्यात बरोबरीने भाग घे तले असे
माझ्या बघण्यात आहे . बाबासाहे बां च्या चळवळीला सहकार्य केले . व माझे स्वतःचे
बाबासाहे बां च्या माध्यमातून विचार असल्यामु ळे मला कोणतीही अडचण भासली नाही.
$$$$$
१०) हिं द ू लोक व इतर समाजकंटक हे शत्रु, मोची समाजातील जी भांडवलशाही आहे ,
हीच मं डळी माझ्या विरोधात आहे . ज्यां च्याकडे बं गला, कार, गाडी व कां ही पे शाने
भरपूर मजे त आहे त, हे असे कसे हे कोणीही विचारत नसल्यामु ळे हे माझ्या विरोधात
आहे त. ही जी प्रतिष्ठीत मं डळी आहे त्यांना असे वाटते की हे जे तळागाळातील गरीब
लोक हे सर्व याच्याकडे जातात. ह्यानला मान दे तात तर आपल्याला कोण विचारणार?
ह्या भीतीपोटी ते माझी बदनामी करतात व वाईट नजरे ने पाहतात. हे च माझ्या कार्याचे
व सं घटने चे शत्रू आहे त, कारण हे दलितांसाठी भांडू शकणार नाहीत, पु ढे ते कधीतरी
शाहाणे होतील, अशी आशा मी बाळगतो.
शिकले ले लोक वाममार्गाला लावतात. अडाणी बां धवानी दुर्गुण टाकू न दे ऊन,
शिक्षण घे ऊन दारू न पिता हक्कांसाठी भांडावे . चां भारांनी आजवर बाबांना विरोध केला
ते व्हा आम्ही जगू तोपर्यं त निळ्या झें ड्याखाली काम करू.
बाबासाहे बांनी आमच्यासाठी आत्मसमर्पण केले . स्वाभिमानाने स्वावलं बनाने
जगायला शिकविले , कुत्र्या मांजरासारख्या अवस्थे विरुद्ध सं घर्ष करण्यास, हक्क
मिळवायला शिकविले . अशा यु गपु रुषाचे विचार न घे ता बाहे रील दे शातील पु रुषांचे
विचार आम्ही का घ्यावे त? आं बे डकरी विचार सर्वश्रेष्ठ विचार आहे त. आम्ही
बाबासाहे बांनी आखून दिले ल्या मार्गाने च जाणार, असे ठाम मत आहे .
रामसिं ग सोनवणे ला केवळ अक्षर ओळख होती. त्याचे शिक्षण झाले ले नव्हते .
कुटु ं बाच्या भटकंतीमु ळे त्याचे शिक्षणच झाले नाही. त्याने एका शिक्षित मु लाकडून
वाचायला शिकू न घे तले होते मात्र सही करण्यापलिकडे तो कधी लिहित नसे . प्रा.
विठ् ठल शिं दे यां च्याकडून तो सतत पत्र लिहन ू घे त असे . मोची समाज सु धार
सं घटने चे दरवर्षीचे कार्यक् रम बहुदा रोहिदास जयं तीलाच होत असत. त्यासाठी स्थानिक
आमदारांना निमं त्रित करीत असे . प्रा. विठ् ठल शिं दे, अप्पासाहे ब रोकडे , श्यामदादा
गायकवाड, रामकिशन करौतिया, बाबा मोरे , दे वराम लिहितकर, एम के सोनवणे यांना
सतत निमं त्रित करत असे पण त्या सोबतच उत्तरप्रदे शचे (कानपूर) अॅड. राहल ू न
आं बावडे कर, मनोहर अं कुश, पँ थरचे अध्यक्ष, प्रा. अरूण कांबळे , सरचिटणीस रामदास
आठवले , गौतम सोनवणे , डॉ. माईसाहे ब आं बेडकर, गं गाधर गाडे , प्रा.प्र.ई. सोनकां बळे
यांनाही निमं त्रित करीत असे . त्यां च्या अनु भवाचा, ज्ञानाचा, क् रां तिकारी विचारांचा व
144
प्रबोधनाचा लाभ होईल असा सभां तन ू , मे ळाव्यातून तो प्रयत्न करीत राहिला,
रामसिं ग सोनवणे आं बेडकरी चळवळीशी एकनिष्ठ होता. १९८१ मध्ये त्याने पँ थरच्या
धम्म स्वीकार अभियनात सक्रिय सहभाग घे ऊन बु द्ध धम्म स्वीकार केला होता. सर्वां शी
त्याचे प्रेमाने , जिव्हाळ्याचे सं बंध होते . मात्र रामदास आठवले यां च्यावर विशे ष प्रेम
होते .
$$$$$
$$$$$
145
मोची समाज सुधार संघटनेचे मोर्चा मुक्ती परिषदे पूर्वीचे आवाहन :
$$$$$
146
हाती शस्र धरून रक्तपात करणाऱ्या यु वकांचं सं घटन आहे , अशी पँ थरची प्रतिमा
काही विरोधक, असमं जस व आपल्या अस्तित्वाला धोका पोहचण्याची भीती वाटणाऱ्या
लोकांनी मु द्दाम तयार केली होती. पँ थरचा प्रवास त्यामु ळेच काट्याकुटयांचा,
फुफाटयाचा, चटके दे णाऱ्या रस्त्यांचा झाला होता. अशा प्रतिकू ल परिस्थितीत लोक
आपल्या मु लांना पँ थरमध्ये पाठवायला तयार नसत. त्यामु ळे अने क मु लं पँ थर सं घटने त
आपल्या कुटु ं बाची परवानगी न घे ता, त्यांचा विरोध पत्करून सामील झाली होती.
मात्र ठाणे जिल्हयातील कल्याणच्या वालघु नी अशोक नगरातील पँ थर मिलिं द रणदिवे
यां च्या पँ थरमधील प्रवे शासोबत त्यांचे कुटु ं बही पँ थरमध्ये आले होते .
रणदिवे कुटु ं ब मूळचे नाशिक जिल्यातल्या सिन्नर तालु क्यातील चोंढी गावचे . ते
अशोक नगर वालधु नी म्हणजे वाकडी वालधु नी या वस्तीत रहिवासले . मिलिं दचे वडिल
पं डित मगन रणदिवे रे ल्वे त से वारत. आई पदमाबाई अभं ग कुटु ं बातील मिलिं दचे मामा
रुपसे न अभं ग राजकीय क्षे तर् ात कार्यरत होते . त्यांचे वक्तव्य चां गले होते . अशा
कुटु ं बाची पार्श्वभूमी मिलिं दला लाभली होती. राजू रणदिवे , रविं द्र रणदिवे हे दोघे भाऊ
आपल्या कुटु ं बासोबत आं बेडकरी चळवळीत ओढले गे ले. रणदिवे कुटु ं ब हे पँ थरच्या
काळात चळवळीचं केंद्रच बनून गे लं. खा. रामदास आठवले , मनोहर अं कुश, श्यामदादा
गायकवाड, माजी आमदार अनिल गोंडाणे , औरं गाबादचे जावळे , बाळ भोईर अशी सं पर्ण ू
महाराष्ट् रातील पँ थरवाले एकना एक दिवस रणदिवे कुटु ं बाच्या विसाव्यात रमले आहे त.
आम्ही म्हणजे प्रा. एकनाथ जाधव व मी (प्रा. विठ् ठल शिं दे) तर रणदिवे कुटु ं बातील
मु लं म्हणूनच राहू लागलो होतो. रणदिवे काका रे ल्वे त से वारत आणि त्यांची आर्थिक
परिस्थिती इतकी चां गली नसताना चळवळीतल्या आमच्या सारख्या मु लां च्या खाण्या-
पिण्या-राहण्याची व्यवस्था त्यांनी पाहिली. त्यांचं त्यागीपण शब्दांत
सां गण्यापलिकडचं आहे . रणदिवे कुटु ं बाची सामाजिक बां धिलकी अतु लनीय अशीच
होती.
$$$$$
147
दिवस घालवले . चळवळीच्या वणव्यात मनाला प्रफुल्लीत करणारे विरं गुळयांचे कित्ये क
क्षण आम्ही अनु भवले . चळवळीतल्या प्रत्ये क क्षणात मिलिं दचा सहभाग होता. पँ थर
सं घटने वर त्याचे जीवापाड प्रेम होत. पँ थरला 'अखिल भारतीय दलित पँ थर’ हे रूप
१९८० च्या दिल्लीतील अधिवे शनाने मिळाले . ते व्हाही आम्ही सोबत होतो. दिल्ली
स्टे शन सोडत गाडी मुं बईकडे निघाली. ते व्हा काही दांडग्या प्रवाशांनी आमच्याशी
दादागिरी केली. माझ्या सोबत मिलिं द अन् श्याम पं डित होते . आम्ही त्यांना जशास तसे
उत्तर दिले , त्यामु ळे प्रकरण ते थेच सं पले . दोन हात करायची तयारी दाखविली नसती
तर आम्हाला खूप त्रास झाला असता.
मिलिं द हा अतिशय धाडसी होता. खराखु रा पँ थर होता. डोक्याला कफन बां धन ू
सदा रणमै दानी उडी घे णारा लढाऊ यु वक होता. त्याच्या धाडसी, बे डरपणाचे खूप किस्से
मला ठाऊक आहे त. मिलिं द मर्यादित उंचीचा, मध्यम बां ध्याचा यु वक होता. जाडमिशी
अन् छटाक दाढी व सरळनाक, अन् डोक्यात वे गळी झाक असा हा यु वक होता. मूर्ती
लहान पण त्यांची किर्ती महान होती. अने कदा मला आश्चर्य वाटे की या एवढ्याशा
मूर्तीला बड़े बड़े दादा लोक कसे टरकतात. मिलिं दवर हात टाकण्याची सहसा कोणाची
छाती होत नसे . 'छट ू फटका' हा त्याचा बाणा होता. प्रकरण वालधु नी, अशोक नगर,
शांतीनगर, आनं द नगर, शिवाजी नगर, मिलिं द नगर, चिकणघर कुठले ही असो मिलिं द
ते थे आमच्यासोबत प्रथम पोहचत असे . दे वराम लिहितकर, रामसिं ग सोनवणे ,
राधाचरण करोतिया, श्यामदादा
$$$$$
गायकवाड, श्याम पं डित, हरे ष दोंदे , अरुण कांबळे , महादे व सोनवणे , अशोक बहिरव, दत्तू
जाधव, राहल ू भाले राव, चाहु म्हात्रे, जगन सोनवणे , ईश्वर गायकवाड, आनं द मु थ्थू,
बाबा मोरे , बाळासाहे ब भाले राव, विश्वनाथ जाधव, तु ळशीराम रिसवाल, अर्जुन शिं दे,
श्रीधर साळवे , शहीद नरे श गायकवाड अशा कितीतरी धाडसी यु वकांमध्ये मिलिं द हा
चर्चेचा व कौतु काचा विषय आहे .
विठ् ठलवाडी स्टे शन जवळच्या ने हरू नगराचा पाया पँ थरने घातला.
खडे गोलवली गावच्या ताब्यात असले ल्या जागे त बाजूला कुष्ठरोग्यां ची वसाहत होती.
त्या शे जारच्या जागे त ने हरू नगर वसवताना आमच्या सोबत भीमराव भाले राव, महादे व
रायभोळे होते . त्या वस्तीत गु डघाभर चिखल होता. आताचा पक्का डांबरी रस्ता आहे
ते थे बां ध होता. त्या बां धावर आम्ही पँ थर छावणीचा बोर्ड लावला. गाववाले आडवे
आले . जवळ जवळ समोरासमोर आले ल्या जमावाची हाणामारी सु रु होणार होती. चाहू
म्हात्रे, मिलिं द रणदिवे , फू ल तयारीत होते . कोणी शस्त्राने हल्ला केला असता तर
आम्हीही तसे च उत्तर दिले असते . एवढयात त्यावे ळचे पोलिस अधिकारी श्री. अष्टे कर
ते थे आले . त्यांनी मध्यस्थी केली. गाववाल्यांजवळ जागे ची कागदपत्रे नव्हती. त्यांना
माघार घ्यावी लागली. ज्या ज्या दिवशीच्या ते थन ू पँ थर पु ढाऱ्यांनी स्वत:ची घरं बां धन
ू
विकली पण मला व मिलिं दला साधं झोपडं ही बां धता आलं नाही. आमच्या मनाला
कधीही ते पटलं नाही. मिलिं दच्या बहुतां श आठवणी माझ्या आयु ष्याशी जोडले ल्या
आहे त. त्यामु ळे मिलिं दबाबत लिहित असताना मी स्वतःला त्यातून वगळू शकत नाही.
डॉ. बाबासाहे ब आं बेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला दे ण्यात यावे या
मागणीसाठी लाँ गमार्च जाहीर झाला. सं पर्ण ू महाराष्ट् रातून लोक औरं गाबादकडे निघाले .
अशोक नगर वालधु नीमधून मिलिं द व मी निघालो. सं ध्याकाळच्या रे ल्वे गाडीने जायचे
होते . आमच्या कुटु ं बीयांसोबत आमचे पँ थर सै निक माय भगिनी आम्हाला निरोप
दे ण्यासाठी जमल्या. प्रत्ये काच्या डोळयात आसवं होती. आम्ही निघालोत पण परत
148
सु खरूप ये ऊ, याची खात्री कोणाला नव्हती. अतिशय तप्त वातावरण होते . काँ गर् े स
सरकारचं धोरण दडपशाहीचं होत. आम्ही निर्धास्तपणे निघालो. औरगाबाद स्टे शनलाच
काही लोकांना पकडण्यात आले . आम्ही पु ढच्या चिखलढाणा स्टे शनवर उतरायचा निर्णय
घे तला. ते थन ू दुसऱ्या दिवशी भडकल गे टवर गर्जना दे त अटक झालो. हरसूल
तु रुं गाबाहे र नोंदणी सु रु झाली. मिलिं दचा नं बर आधी लागला. त्याला विसापूर जे ल
मध्ये पाठविण्यात आले . माझा नं बर ये ईपर्यं त महाराष्ट् रातले तु रुं ग भरले गे ले. आम्हाला
ठाणे एस.टी. स्टॅ ण्डवर माघारी पोहचविण्यात आले . मिलिं द विसापूर जे लमध्ये होता.
त्याच्या सोबत माजी नगरसे वक रमेश आढाव, डॉ. भालचं दर् मु णगे कर इत्यादी मं डळी
होती.
पँ थर चळवळीमु ळे समाजातील खूप लोक बदलले , त्यांची नोंद मला इथे घे ता ये त
नाही. मिलिं द पँ थरमु ळे अं तर्बाहय बदलला होता. त्यानं बिडी-सिगारे ट ओढणं सोडून
दिलं
$$$$$
होते . त्याला काही लोक 'बाबा', 'बु वा' म्हणून ओळखत होते . मिलिं दने लिं बू मारण,
भारणं , छम ू ं तर करणं असा सगळा दे व, दै ववाद सोडून दिला होता. शहाडचे
चिं तामणीबाबा मिलिं दच्या नात्यातले पण त्याने दत्ताची भक्ती, सारं सारं सोडलं . या
साऱ्या गोष्टींकडे मिश्कील हासून गालातल्या गालात व्यक्त होणारा मिलिं दला बळ
पँ थरच्या सभांनी, बै ठकांनी दिलं . गां धीवाद, जातीच्या समस्या, निरनिराळ्या समस्या,
बाबासाहे बांचं यु गप्रवर्तक ने तृत्व, समाजातील एकी,बे की, सं घटन यां च्याकडे
पाहाण्याचा चिकित्सक दृष्टीकोन मिलिं दचा पँ थरने दिला होता.
पँ थर बरखास्त झाली. काही पँ थर रिपब्लिकन पक्षात गे ले. काही तटस्थ राहिले
पण मनातून अस्वस्थ, निराश राहिले . सामाजिक पातळीवरील आं दोलने , वस्ती सं पर्क
रोजच्या बै ठका, चर्चा बं द झाल्या. सं वाद तु टले ल्या या वातावरणात मिलिं द सारखा
पँ थर ‘अबोला’ ‘मु का’ झाला.
सामाजिकते कडून व्यक्तिगतते कडे त्याचाही प्रवास सु रु झाला. मिलिं द पु न्हा
आपल्या व्यक्तिगत मित्र परिवाराकडे वळला. मनाला रिझवणाऱ्या गोष्टीत, गर्दीत रमू
लागला. मिलिं दला पत्नी आरती व निखिल आणि रुची (माऊ) ही दोन मु लं आहे त.
कुटु ं बाच्या प्रवासात दोन तीनदा त्याच्यावर सं कटे आली. एकदा भाजला गे ला. त्यातून
तो वाचण्याची शक्यता नव्हती. त्याच्या मदतीला डॉ. अनं त मोकळ, श्यामदादा
गायकवाड असे सारे मित्र धावले . अक्षरश: मृ त्यूच्या जबडयातून मिलिं द सही सलामत
बाहे र पडला. हिं डू फिरु लागला. लोकां शी सं वाद करु लागला. दुसऱ्यांदा अतिशय
गं भीररित्या आजारी पडला. हातपाय सु जले . पोटं तट् ट फुगून आले . लिव्हरला
ग्रासले ले, कावीळ झाले ली पण सावध होता. कल्याण रे ल्वे च्या डॉक्टरांनी औषधांनी
पोटातलं पाणी बाहे र पाडलं . याही वे ळेस त्याने मृ त्यु ला हुलकावणी दिली. आता
अलिकडे ऑक्टोबर २००७ च्या पहिल्या आठवडयात त्याला त्रास होऊ लागला रे ल्वे
अस्पतळात भरती करण्यात आले . मी कुंटु ं बासह भे टायला गे लो. माझ्याशी सावधपणे
बोलला, “तु म्ही मला लोक ओळखता ये त नाहीत असं का म्हणता? मी काय थर्डस्टे पवर
गे लोय काय?” असं माझ्यासमोर घरच्यांना तो म्हणाला. मला म्हणाला, “वि.सो. पोट
ताईट वाटतं य" असा हसत खे ळत आमचा सं वाद चालला होता आणि दोन दिवसानं तर
मिलिं द दि. १५ ऑक्टोबर २००७ च्या रात्री १२.३० मिनीटांनी हे जग सोडून गे ला. वाटलं
होतं याही वे ळेस तो मृ त्यु ला हुलकावणी दे ईल, पण तसं काही घडलं नाही. एक
झं झावती पँ थर मृ त्यु नं गिळला. एक आकाशझे प घे ऊ पाहणारा धाडसी पँ थर कायमचा
149
शांत झाला. मिलिं द तु झ्या धाडसी प्रवासाला हृदयात दाटले ल्या असं ख्य आठवणींना,
जिवं त झाले ल्या कोटी कोटी क्षणांना विनम्र जयभीम!
$$$$$
[पँ थर मिंलिं द पं डित रणदिवे यांचे नु कते च कल्याण ये थे दुःखद निधन झाले .
निधन समयी त्यांचे वय ४९ वर्षे होते . त्यां च्या मागे पत्नी आरती व निखिल आणि रूची
अशी दोन मु झे आहे त. मिलिं द रणदिवे यां च्या अं त्ययात्रेत हजारो भीमसै निक उपस्थित
होते . आदरांजलीवाहण्याचा कार्यक् रम आज दि. २७. ऑक्टो २००७ रोजी शनिवारी
सकाळी १० वाजता अशोक नगर, वालधु नी कल्याण, जि. ठाणे ये थे होत आहे .
त्यानिमित्ताने त्यां च्या जीवन वाटचालीवर प्रकाश टाकणारा प्रा. विठ् ठल शिं दे यांचा
हा ले ख नवनायक मध्ये प्रकाशित झाला होता.]
$$$$$
शोकसभा वृतांत
अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी नवं हत्यार जन्मास ये णारच. प्रस्थापित
व्यवस्था व सरकार मु स्लिमांना अतिरे की ठरवत आलीत. आता आम्हाला नक्षलवादी
हरवत आहे त. रमाबाई हत्याकांड ते खै रलांजी हत्याकांड असा भयानक अत्याचारी
प्रवास आहे . त्याला जाब विचारण्यासाठी पँ थर्स सारख्या यु वक यु वतींनी डोक्याला
कफन बां धन ू मै दानात उतरले पाहिजे . आजची परिस्थिती १९७३ च्या पँ थर जन्माच्या
वे ळे पे क्षा भयं कर वाईट आहे , असे प्रतिपादन ठाणे जिल्ह्यातील आं बेडकरवादी ने ते
150
श्यामदादा गायकवाड यांनी अशोक नगर, जि. ठाणे ये थे बोलतांना केले . पँथर
कार्यकर्ते स्मृ तिशे ष मिलिं द पं डित रणदिवे यां च्या स्मृ तिप्रित्यर्थ आयोजित शोक सभे त
ते बोलत होते .
मिलिं द पं डित रणदिवे हे पँ थर व रिपब्लिकन चळवळीत कार्यरत होते . दि १५
ऑक्टोबर २००७ रोजी त्यां चे कल्याणच्या रे ल्वे इस्पितळात दुःखद निधन झाले . त्यां च्या
मागे त्यांचे आई – वडिल, दोन भाऊ - बहिणी व पत्नी आरती तथा दोन मु लं आहे त. "
मिलिं द रणदिवे यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचे जु ने पँ थरमित्र उपस्थित
होते . शामराव गायकवाड, सु रेश सावं त, प्रा. विठ् ठल शिं दे, प्रा. एकनाथ जाधव,
प्राचार्य रमे श जाधव, आर. एन. गरुड, शरद जाधव, प्रल्हाद जाधव, बाळासाहे ब
भाले राव, बा. का. गायकवाड, राजें द्र दे वळे कर, शै लेश दोंदे , रोहिणीताई जाधव,
मोतीराम कटारे , रमाबाई हाटे , दा. आं . जाधव गु रुजी, सिद्धार्थ मोरे , डॉ. अशोक लोंढे ,
प्रकाश पगारे , मोकळ गु रुजी, टी. एस. वाघमारे , बी. बी. मोरे , डॉ. अनं त मोकळ, दासू
ढोंबे , मनोहर जाधव, नरें द्र मोरे , राजाराम वाघचौडे , चु डामन मोरे , मं गल पाठारे ,
गं गाधर मोहड, बाळा रामटे के, राजू सोनवणे , ल. र. काकळीस, म. जाधव, रमे श गां गुर्डे,
बी. सी. सोनवणे यां च्यासह शे कडो पँ थर उपस्थित होते .
मराठीतील लोकप्रिय कवी प्रा. प्रशांत मोरे व रं गनाथ निरभवने यांनी कविता
सादर करून आदरांजली वाहिली. आदरांजली कार्यक् रमाला अध्यक्षस्थानी ज्ये ष्ठ ने ते
अण्णासाहे ब रोकडे होते तर कार्यक् रमाचे सूतर् सं चालन प्रा. विठ् ठल शिं दे यांनी केले .
कार्यक् रमास प्रचं ड जनसमु दाय उपस्थित होता. प्रारं भी बौद्धाचार्य सु नील गायकवाड
व भन्ते शीलरत्न यांनी बौद्ध विधी पार पाडला.
स्मृ तिशे ष मिलिं द रणदिवे यांना आदरांजली वाहतांना रिपब्लिकन ने ते सु रेश
सावं त म्हणाले , “आं बेडकरी चळवळीत ठाणे जिल्ह्याचं महत्त्वाचं योगदान आहे . ठाणे
जिल्ह्याने मिलिं द रणदिवे सारखे त्यागी, निस्वार्थी, झोकू न दे णारे कार्यकर्ते दिले "
$$$$$
151
मिलिं द पं डित रणदिवे यां च्या श्रद्धांजली सभे नंतर डॉ विठठल शिं दे यांनी
पु ढाकार घे ऊन कार्यकत्यांची बै ठक घे तली. त्यात मिलिं दच्या परिवाराला आर्थिक
सहकार्य करण्याचा मूद्दा चर्चिला गे ला. त्या बै ठकीत मिलिं दचे सासरे सु रतचे (गु जरात)
उपमहापौर बी. सी. सोनवणे हे ही होते . त्यांनी विनम्रपणे आपण आर्थिक मदतीचा
विचार करू नका असा मु द्दा मांडला. त्यांनी२००७ ते २०१० म्हणजे निखिल मिलिं द
रणदिवे हा रे ल्वे त अनु कंपा तत्त्वावर रुजू होई पर्यन्त त्यांनी सर्वतोपरी सहकार्य केले .
मिलिं दच्या निधनाच्या वे ळेस माऊ लहान होती. निखिलला समज आले ली होती. मात्र
पु ढील काळात त्याने आपल्या वडिलां च्या कार्यकर्त्याचा वारसा चालविला नाही.
निखिलने २२ धम्म प्रतिज्ञांचे पालन करून आं बेडकरी समाजात काम करणे आवश्यक
होते . या बाबतीत आरती मिलिं द रणदिवे म्हणतात की “मिलिंद यांचे चां गले गु ण
त्यां च्या मु लांने घ्यायला हवे होते . मिलिं द अतिशय प्रेमळ होते . व्यसनाच्या नादी
लागून त्यांनी आम्हाला जरी त्रास दिला तरी समाजात त्यांची चां गली प्रतिमा होती,
त्यांची चां गली पत होती, त्यांची पें शन आम्हाला मिळाली व निखिलला नोकरीही
मिळाली. मिलिं द व मी मिळू न कल्याणातील आरटीओच्या जवळचे घर खरे दी केले होते .
बु कींगचे पै से माझे बाबा बी.सी. सोनवणे यांनी दिले , व आम्ही एच.डी.एफ.सीचे कर्ज
घे तले . मिलिं दच्या पी.एफ.च्या रकमे तन ू काही कर्ज फेडता आले , मला सं सार उभा
करण्यात श्यामदादा गायकवाड व प्रा.विठ् ठल शिं दे परिवार यांनी खूप सहकार्य केले .
रणदिवे परिवाराने मदत तर काहीही केली नाही. उलट अने कदा खूप त्रास दिला. तो
त्रास आजही चालू आहे . आम्ही स्वतं तर् उभे राहिले लो त्यांना आवडले नसावे .
आम्हाला तर
$$$$$
जगायचे आहे समाजाची सोबत घे ऊन. खं बीरपणे उभे राहात आहोत, मिलिं द यां ची
जरूर आठवण ये त राहिली; यापु ढे ही ये त राहील, माझा निखिल बु द्ध आणि
बाबासाहे बांचे विचार मनात ठे ऊन जे व्हा उभा राहील ते व्हा माझ्या इतके सु खी कोणी
नसे ल. पँ थर मिलिं द रणदिवे यां च्या स्मृ तिंना आमचे विनम्र अभिवादन !”
रणदिवे परिवाराला समाजाने काय दिले , या प्रश्नाचा विचार करायला हवाय.
दलित पँ थरच्या चळवळीने जे वे दनामय व कष्टप्रद कार्य करून सर्वस्वाचा त्याग केला
त्यासोबतच मिलिं द रणदिवे या पँ थरने समाजासाठी ज्या झळा सोसल्या त्याची उतराई
होण्यासाठी अशोक नगर वालधु नी ये थील निवडणु कीत सं धी दे णं एवढ्यापु रतं ते
मर्यादित नाही. रणदिवे परिवाराला पद्मावती पं डित रणदिवे यांना उभे करून दोन
नं बरची मते मिळवून दिली आणि क. डों. म. पा. झाल्यावर राजें द्र पं डित रणदिवे
यांच्या ओ.बी.सी पत्नीला समाजाने नगरसे विका म्हणून निवडून दिले . पण या पती-
पत्नीने मिलिंद रणदिवे यां च्या त्यागाला समजून कोणते ही काम केले नाही.
कोणाबरोबरही त्यांनी तत्त्वहीन तडजोडी केल्या ; पार्ट्या झोडल्या. परिणामी पु ढील
कालखं डात अशोक नगर वालधु नीचा आं बेडकरी बाले किल्ला पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.
चर्चेची, ज्ञानाची, चळवळीची, सहभागाची परं परा त्यांनी पूर्णपणे मोडीत काढली.
एकेकाळी पँ थर चळवळीचे केंद्र ठरले ले रणदिवे परिवार अशोक नगर वालधु नी सोडून
सिन्नर तालु क्यातील गां वी निघून गे ले. आजही पद्मावती आई आणि पं डित रणदिवे
काका म्हणजे मिलिं द रणदिवे यां च्या आई-वडिलां विषयी सं पर्णू आं बेडकरी समाज फारच
आदराने आणि प्रेमाने चर्चा करतांना दिसतो आहे . आपल्या कुटु ं बातील साहित्यिक,
मोठे कार्यकर्ते, शहीद व्यक्ती यांचा वारसा पु ढील काळात जिवं त ठे वण्यासाठी त्याच
कुटु ं बाने जाणीवपूर्वक प्रयत्न करायचे असा आता पायं डाच पडला आहे . या
पार्श्वभूमीवर वरील मु द्याचा विचार व्हायला हवा.
152
$$$$$
प्रकरण ४
मनोगते
१) पँथर संस्थापक राजा ढाले : ब्लँक पँथर व नामदेव ढसाळांबाबत बोलताना
२) सुरेश सावंत: बुध्दाची, डॉ. बाबासाहेबांची चळवळ ही मानवी मुक्तीची चळवळ
३) प्रा. अरुण कांबळे यांची विठ्ठल शिंदे यांनी घेतलेली मुलाखत
४) रामदास आठवले यांचे भाषण
५) पैंथर अॅड. बापुराव पखिड्डे यांचे भाषण
६) भाई रमेशचंद्र परमार यांचे दलित पँन्थरच्या पहिल्या राष्ट्रव्यापी अधिवेशनातील पँन्थर यांचे अध्यक्षीय भाषण
७) अॅड. राहुलन आंबावडेकर यांचे भाषण
८) रामकिशन करौतिया यांची रत्नप्रभा गरकल यांनी घेतलेली मुलाखत
९) पँथर विठ्ठलराव साठेंचा बुलंद आवाज
१०) मंत्री होणं हा पँथर्सचा सन्मान आहे- गंगाधर गाड़े
११) अॅड. प्रितमकु मार शेगांवकरांची भूमिका
१२) डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्या इंग्रजीतील भाषणाचा अंश,
153
$$$$$
शहाणे, रघू दंडवते, भाऊ पाध्ये, कधी कधी 'एक शून्य बाजीराव'च्या स्वगतात रमलेला, रंगलेला माधव वाटवे, मधूनच
भालचंद्र नेमाडे, अधून मधून अरुण कोलटकर असे लोक उगवत असत. त्यात मीही डोकावत असे. एकवेळ गप्पांच्या
ओघात अशोक म्हणाला, "अरे, जमिनीचा एक इंच जाडीचा सुपीक थर निर्माण व्हायला सुमारे चारशे वर्षे लागतात" आणि
मी हडबडलो. आयला ह्याला हे ज्ञान कु ठू न प्राप्त होतं? त्या काळी मी रद्दीतली मासिकं , पुस्तकं धुंडाळत असायचो. अशाच
एका चाळणीत मला 'टाइम' या अमेरिकन साप्ताहिकात नव्यानंच येत असलेल्या Ecology या टॉपिकचा शोध लागला.
मग त्याच्या आसपासच 'ब्लॅक पँन्थर'च्या अमेरिके तील शूट आऊटच्या भानगडीबद्दल, पोलिसांच्या त्यांच्याबद्दलच्या सक्त
कारवायांबद्दल नी पॅन्थर्सच्या बळी जाण्याबद्दल आणि त्यांच्यावरील न्यायालनयीन 'ट्रायल्स' बद्दलचे रकाने 'टाइम' मधून
येऊ लागले. पाठोपाठ मी 'न्युजविक'ही त्यासाठी घेऊ लागलो. तो काळ होता १९६८ व त्यानंतरचा. त्या काळात धीरधीरे
पँन्थरची धीमी पावलं माझ्या मनात उमटू लागली. वाजू लागली. त्यातच देशभर दलितांवर होणाऱ्या भयभीषण अत्याचारांची
हृदयद्रावक कहाणी आकडेवारीतून सांगणारा १९६९-७० चा एलिया पेरूमल कमिशनचा रिपोर्ट बाहेर आला नी मी प्रचंड
अस्वस्थ झालो. आणि या अत्याचारांच्या मूळावर प्राणांतिक घाव घालावा असं मला वाटू लागलं. यातूनच पुढे पँन्थर ही
चळवळ जन्माला आली. पण हा पँन्थर दलित कसा असेल? हा पँन्थर 'दलितत्वा'चा अर्धांगवायू झालेला अथवा लकवा
मारलेला कसा असू शके ल? या पाँईटवर मी अडलो होतो. परंतु हा सारासार विवेक न उरलेल्या दोघांनी, माझ्याकडू न
154
ऐकलेल्या ब्लॅक पँन्थर बद्दलच्या ऐकीव माहितीवर विसंबून माझ्या गैरहजेरीत माझ्या अपरोक्ष त्यांनी दलित पँन्थर या
संघटनेची घोषणा के ली व पहिले कार्यकारी मंडळही 'नवाकाळ' मधून जाहीर के ले. त्याचा इतरत्र एका पुस्तके त मी साधार
ऊहापोह के लेला आहेच. (पहा दलित पँन्थर: वस्तुस्थिती आणि विपर्यास, राजा ढाले) आज ते दोघे कु णाच्या वळचणींना
अंगाचं मुटकू ळं करून इमानी कु त्र्यांसारखे हांपत पडलेले दिसतील आणि आपणाला प्रश्न पडेल की हेच का ते एके काळचे
'पँन्थर' आणि 'पँन्थर चे संस्थापक.
खरं तर, नामदेव ढसाळ आणि माझा परिचय १९७० ला झाला. माझ्या ऑफिसमधले एक सहकारी भीमराव
शिरवाळे यांची कथा 'सत्यकथे'च्या फे ब्रुवारी १९७० च्या अंकात प्रसिद्ध झाली होती. त्यानं ती मला वाचायला दिली. त्याला
प्रोत्साहन देण्यासाठी ती मी वाचली व पाठ थोपटली. त्यानंच मला त्या अंकातील नामदेव ढसाळांची कविताही वाचायला
सांगितली व तोही आपलाच आहे असं मला सांगितलं. ती 'मशिदीच्या वाटेवरून' नावाची सत्यकथेतून प्रसिद्ध झालेली
कविता होती. म्हणजे मी जी 'सत्यकथे'च्या
$$$$$
उंच मिनाराची वाट नाकारली होती. त्याच वाटेवरून हे गवसे गडी अथवा वाट चुकलेले फकीर चालले होते. त्यांना माहितच
नसावे की आदल्याच वर्षी मी 'सत्यकथे' ची होळी के ली आहे. किं वा त्या होळीचा एक चांगला परिणाम म्हणून त्यांच्या कथा,
कवितांची वर्णी 'सत्येकथे'त लागली आहे. परंतु मी 'सत्यकथा' जाळलेली आहे, हे कळल्यावर त्यांच्या मनात एक सुप्त
इसाळ वा असुया निर्माण झाली असावी. आणि ती पहिल्यापासूनच त्यांच्या मनात दबा धरून असावी आणि माझ्या विरूद्ध
सतत काम करीत असावी. खरं तर 'दलित' या शब्दाला माझा तात्त्विक विरोध असताना या बाबुराव बागुलांच्या तत्कालीन
शिष्याने 'दलित पँन्थर' हे अडनिडे नाव जाहीर करण्यात बाजी मारली, परंतु जेव्हा 'महाराष्ट्र टाइम्स'ने आपला अग्रलेख या
नावावर आगपाखड करून गेला, तेव्हा त्या 'दलित' या शब्दात लपलेल्या विरोधाभासावर तर्क शुद्ध भाष्य करण्यासाठी
नामदेव ढसाळ पुढे आले नाहीत. आले ते राजा ढाले आणि त्यांनी या बोलघेवड्यांना चारीमुंड्या चीत के ले. कारण मित्र
संकटात आल्यावर लपून बसणारा मी नाही. मी महाराष्ट्र टाइम्सला दिलेलं ते टोलेजंग उत्तर कोण विसरेल?
आणि नामदेवनं माझ्यावर आणलेली दुसरी बिलामत म्हणजे त्याच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाचा प्रसंग. घड्याळाचे
काटे सहावर सरकले आणि तो प्रेक्षकांनी तुडूंब भरलेला... ताडदेवचा ताटकळलेला रूसी मोदी हॉल अस्वस्थ झाला.
मंचावर सगळे निमंत्रित भाष्यकार आणि अध्यक्ष उपस्थित होते. प्रकाशक नारायण आठवले आणि नामदेव ढसाळ, विजय
तेंडु लकर यांची वाट पाहत होते. इतक्यात नामदेव ढसाळ मंचावरून उतरून थेट शेवटी बसलेल्या मी व गुर्जरापर्यंत आले.
तशा सभागृहातल्या सगळ्या माना गर्रकन मागे वळल्या. नामदेव मला हाताला धरून उठवित होता आणि मी त्याला सांगत
होतो की मी नियोजित वक्ता नाही. आणि मी वर येणार नाही. परंतु सभागृहातल्या सगळ्या नजरा माझ्यावर खिळल्यावर
मला आक्वर्ड वाटलं आणि मी उठत उठत त्याला अट घातली की मी सगळ्यात शेवटी बोलेन. नामदेवनं ते मान्य के लं आणि
शेवटी भयानक नाट्य घटलं. माझ्या आधी सदा कऱ्हाडे, दुर्गा भागवत, प्रभुती चार-पाच वक्ते बोलून झाल्यावर मी बोलायला
उभा राहिलो. महाराचं गाणं आणि बामणाचं लिवणं या म्हणीपासून मी लोकसाहित्याच्या प्रांगणात शिरलो आणि दैवतशास्त्र
आदी दोन-तीन ज्ञानशाखातलं काहीही येत नाही हे सोदाहरण स्पष्ट के लं तसं सभागृहासकट दुर्गाबाईही अवाक् झाल्या.
त्यांची मान होकारार्थी हलू लागली. डोळ्यातून टिपं गळू लागली. समोर बसलेले माझे मित्र अशोक शहाणे, रघू दंडवते, भाऊ
पाध्ये आदी हा प्रकार आ वासून पाहतच राहिले आणि त्यातच मी दुर्गाबाईवर अखेरचा हल्ला चढविला. आणि म्हणालो की,
कवितेतलं यांना काहीच कळत नाही... त्यानंतर प्रकाशकावर मी घसरलो. तो बाहेरच उभा होता. त्याला आतली गडबड ऐकू
गेली, परंतु दरवाजात तुडुंब गर्दी असल्यामुळे तो बाहेरूनच ओरडू लागला, ए भाषण बंद करा!
$$$$$
त्यांना बोलू देऊ नका! हे ऐकल्याबरोबर आमचा सर्वात मागे बसलेला होस्टेलियन मित्र लतिफ खाटीक लोकांच्या अंगावरून
पुढे पळत आला आणि म्हणाला भाषण झालंच पाहिजे कोण बंद पाडतंय ते बघू. समोर येऊन बोला. त्या जनसंमर्दासमोर
नारायण आठवलेंचा आवाज गडप झाला. पुन्हा पाच-दहा मिनिटं मी बोललो आणि थांबलो. खाली उतरलो नी बाहेर
पडण्यासाठी दरवाजाकडे चाललो तर अभिनंदन करण्यासाठी माझ्यावर गर्दीचा लोंढा तुटू न पडला.
155
इतक्यात त्या गर्दीतून वाट काढत प्र. श्री. नेररूकर माझ्या जवळ आले आणि म्हणाले, “अरे बाई एकट्याच
डायसवर बसनू रडताहेत. चल त्यांची माफी माग”. इतक्यात माझ्या बाजूला उभा असलेला भाऊ पाध्ये उसळून म्हणाला,
“माफी कशासाठी? बाईंना सांगा की, त्यानं उभ्या के लेल्या प्रश्नांची उत्तर द्या. माफी कसली”. या माझ्या अडेलतट्टू
वागण्यावर संतापून, त्यानंतर महिन्या पंधरा दिवसातच 'साधना' साप्ताहिकातून प्रकाशित झालेल्या माझ्या 'काळा
स्वातंत्र्यदिन' या लेखाविरूद्ध महाराष्ट्र टाइम्समध्ये निषेधाचं पत्र लिहून दुर्गा भागवतांनी माझ्याविरूद्ध राष्ट्रध्वजाचा अपमान
के ला म्हणून महाराष्ट्रात काहूर उठविलं. सरकारनं के सेस भरल्या, परंतु दुर्गाबाईच्या शाब्दिक ठोक्यांनी ज्याच्या कवितेची
नौका त्यादिवशी कायमची रसातळाला जाणारी ती त्याची डगमगती नैया मी माझ्या शब्दाच्या धारेने उद्धारली होती. तो
नामदेव ढसाळ कु ठल्याही प्रकारचा बंडखोर नाही. उलट तो पावलोपावली व्यवस्थेला नी सर्वांना शरण जाणारा लाचार
मनुष्य आहे. काही लोक चळवळी जगतात, काही लोक चळवळीवर जगतात. असं हे 'पँन्थरचं जग' आहे.
$$$$$
सुरेश सावंत:
बुध्दाची, डॉ. बाबासाहेबांची चळवळ
ही मानवमुक्तीची चळवळ
156
आपण आपले सुखदुःख बाजूला ठेवून आज आपण एकत्रीत येवून आनंदाने साजरा करीत आहोत. आपण या ठिकाणी
आनंदाच्या या प्रसंगी दिनी माझ्या सारख्या या चळवळीत लढणाऱ्या सैनिकांवर जो विश्वास जे प्रेम आणि आमच्यावरील
प्रेमापोटी या शुभदिनी आपण जी सप्रेम भेट दिलीय या बद्दल मी अचंबीत झालोय, भारावुन गेलोय: माझा उर आनंदाने
भरुन आलाय तर कं ठ दाटू न आलाय. मला या ठिकाणी सांगावेसे वाटते आपला हा जनतेचा लढा मानवी मुक्तीचा लढा आहे.
या जनतेच्या पाठीब्यावरच प्रेमापोटीच आम्हाला आमच्या सारख्या मानवी मुक्तीच्या लढ्यातील सैनीकांना जोश पैदा होतो-
नवा जोम पैदा होतो या जनतेच्या प्रेमाचा उतराई होण्यांचे माझ्यासारखे कार्यकर्ते सतत प्रयत्नशील राहतील जनतेच्या
विश्वासाला तडा बसेल असे कोणतेच काम आमच्या हातून घडणार नाही याची
$$$$$
मी या ठीकाणी हमी देतो. या प्रसंगी एक गोष्ट निर्धारपूर्वक सांगाविशी वाटते की, आम्ही विचाराशी एकनिष्टपणे ध्येय प्रेरीत
होऊन या चळवळीत उतरलो आहोत ते डॉ. बाबासाहेब आपल्या चळवळीचे ध्येय गाठण्यासाठी हे ध्येय गाठीत असताना
अनेक हिमालया एवढी संकटे येणारी आहेत याची आम्हाला जाणीव आहे पण डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, बुध्दाचा
विचार आमच्या बरोबर असल्यामुळे आम्ही 'डगमगणार नाही. उलट हिमालयासारखी संकटं जरी आली, तरी आम्ही ती
पार करुच हा आमचा आत्मविश्वास आहे, आमची खात्री आहे, पण त्याच्याही पुढे जावून मी म्हणेन की ध्येय गाठण्यासाठी
प्रसंगी बंदुकीतून निघालेली गोळी उराशी कवटाळू, पण ध्येयापासून कधीच विचित होणार नाही!
शेकडो वर्षापूर्वी या देशांतच महाकारुणिक गौतम बुध्दाने प्रज्ञा, शील, करुणेवर आधारलेली समतेची चळवळ सुरु
के ली आणि बुध्दाची चळवळ डॉ. बाबासाहेबांनी आपल्या अंगा खांद्यावर घेवून या देशांत पुन्हा एकवार जोमाने उभी के ली:
आपल्या या देशाचा अेकं दरीत विचार करता आपल्या देशात समतावादी लोक अल्प आहेत, पण विषमतावादी लोक
बहुसंख्याक आहेत हे कोणालाही नाकबुल करता येणार नाही: आपला देश दांभिक रुढीचे आगर आहे प्रांजलपणे सांगायचे
म्हणजे या देशातील सत्ताधारी मंडळी किंवा या देशातील बडी बडी पुढारी मंडळी की जी या देशाचे भवितव्य घडविण्याच्या
गप्पा करीत आलीय आणि करताहेत या मंडळीनी सामाजीक समतेच्या लढयात प्रामुख्याने कधीच भाग घेतला नाही: मी
अशांना म्हणतो, की बुध्दाचा विचार आपल्याला दूरचा का वाटावा? बुध्दाच्या विचारा शिवाय सामाजिक परिवर्तन होणे
किं वा समता येणे अशक्यप्राय गोष्ट आहे. बुध्दाच्याच विचाराने या देशाचे योग्य असे भवितव्य घडेलः त्यासाठी सामाजिक
समतेच्या लढ्यात सक्रिय भाग घ्यावयास हवाय तरच या देशातील विषमता गाडली जाईल: बडी बडी पुढारी मंडळी किं वा
सरकारने विषमता गाढण्यासाठी आपली ताकदपणाला लावली पाहिजे.
आपल्या देशातील बरेच बड़े बड़े लोक म्हणतात, की भारत हे ही लोकशाही राष्ट्र आहे आणि अमेरिकाही लोकशाही
राष्ट्र आहे. भारतात अस्पृश्यतेचा प्रश्न आहे. तर अमेरिके सारख्या प्रगत राष्ट्रात निग्रोंचा प्रश्न भेडसावीत आहे: मग जगातील
या महत्वाच्या प्रगतशिल राष्ट्रात अजुनही निग्रोचा प्रश्न भेडसवीत आहे मग आपल्याही राष्ट्रात अस्पृश्यतेचा प्रश्न आहे: तो
हळू हळू सुटेल: देशासमोर प्रश्न असतातः अमेरिके समोर निग्रोंचा प्रश्न आहे. भारता समोर अस्पृश्यतेचा प्रश्न आहे.
देशासमोर जो प्रश्न आहे तो महत्वाचाच आहे पण तो सोडवि ण्यासाठी त्या देशातील सत्ताधारी, त्या देशातील जनता किती
प्रयत्नशिल आहे हे अतिशय महत्वाचे आहे. कारण या प्रयत्नांवरच तो प्रश्न सुटण्याचे भवितव्य अवलंबून असते:
आम्ही मान्य करतो की अमेरिके त निग्रोंना माणुसकीची वागणूक दिली जात नाही अजूनही निग्रोंना माणुसकीने
वागविण्यास काही गौरवर्णीय तयार नाहीतः पण याच अमेरिके त निग्रोंच्या प्रश्नासाठी झगडणारी, माणुसकी जपणारी,
माणुसकीच्या, मानवतेच्या
$$$$$
प्रस्थापनेसाठी आपल्या ज्ञानाचे बलीदान देण्यासाठी एका पायावर तत्पर असणारी गोरी माणसे सुध्दा अमेरिके त झालेली
आहेत: या अधुनिक काळातच काय पण कितीतरी वर्षापूर्वी अब्राहम लिंकन अमेरिके त होवून गेला की ज्याने निग्रोंवर
होणारे अन्याय निवारण्यासाठी, निग्रोंचे जीवन सुखी बनविण्यासाठी, निग्रोंच्या उत्थापनासाठी आपले सर्वस्व पणाला लावले:
गोऱ्यांच्या विद्यापिठात निग्रोंना सुध्दा प्रवेश मिळाला पहिजे, तो त्यांचा हक्क आहे, अधिकार आहे आणि त्यांच्या
हक्कासाठी, त्यांच्या अधिकारांच्या प्राप्तीसाठी अध्यक्ष जॉन के नेडी सारखा माणूस आपल्या सर्व अध्यक्षिय अधिकारांचा
157
उपयोग करण्यात कोणत्याही प्रकारे उणा पडत नाही: तिसरे उदाहरण अध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन मानवतेच्या दृष्टीने
पुढाकार घेवून आपल्या मुलीच्या लग्नाला कोणत्याही प्रकारे आडकाठी न करता आपल्या मुलीचे लग्न स्वखुशीने निग्रोबरोबर
लावून देवून गोरे आणि निग्रो यांचे बेटी व्यवहार झाले पाहिजेत असे आग्रहाने सांगतोः जगातील सर्व संपन्न अशा प्रगत
राष्ट्रात अच्युतमपदी असणारी ही सत्ताधारी गोरी माणसं मानवतेंच्या तत्वज्ञानानी भारावून जावून निग्रोंच्या उध्दारासाठी
अविरत मेहनत घेतात तेव्हा निग्रोंच्या उध्दारासाठी झटणाऱ्या त्यांच्यातीलच नेते मंडळी पेक्षा ती मोठी वाटायला लागतातः
स्वतला होणा-या दुःखाची जाणीव होवून ते नष्ट करण्यासाठी माणूस प्रयत्न करतो तेव्हा ती स्वाभाविक क्रिया होईल
परन्तु आपल्याला ज्या दुःखाची जाणीव नसताना सुध्दा त्यांचे दुःख कमी करण्यासाठी दुःखातुन मुक्तता करण्यासाठी जे
आपले सर्वस्व पणाला लागतात ती माणसे नेहमी मोठी ठरतात, ती माणसे मोठी असतात: लिकं न, के नेडी, जॉन्सन सारखी
सत्ताधारी मंडळी किं वा निग्रोंच्या उध्दारासाठी जीवाचे रान करून जेव्हा काही गोरे लोक काम करतांना दिसतात तेंव्हा निग्रोंचे
भविष्यकाळी जीवन अध:कारमय नाही त्यांच्या देशासमोरील हा प्रश्न सुटण्यास फारसा वेळ लागणार नाही याची खात्री
वाटते:
आजही आपल्या देशात अस्पृश्यतेचा प्रश्न अत्यंत भयानक स्वरुपात आहे, आज ही दलितांवर अत्यंत निघृणपणे
अन्याय, अत्याचार होत आहे: आपल्या देशातील सत्ताधारी मंडळींनी हा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने किती प्रयत्न के ले हा
एक प्रश्नच आहे: उलट आमच्या देशातील उच्यतम पदी असणाऱ्या मंडळींना दलितांवर होणारे अत्याचार दिसत नाहीत
त्यांना दाखवुन द्यावे लागतात: आपल्या राष्ट्रपित्यांना दक्षिण आफ्रिके त निग्रोंवर होणारे अत्याचार दिसले पण स्वतःच्या
देशातील दलितांवर होणारे अत्याचार दिसले नाहीतः आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपति डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी बनारस
काशीच्या पंडयाच्या पायाचे तिर्थ पिवून स्वतःला धन्य समजले, परंतू हेच पंडे विषमतेची शिकवणूक देवून मानवतेचा
अपमान करतात ह्याची मात्र त्यांना जाणीव झाली नाही: दुसरे राष्ट्रपति डॉ सर्वपल्ली राधाकृ ष्णन् गीतेवर भाष्य करतात गीतेची
थोरवी गाण्यात आपलं आयुष्य खर्ची घालतात गीतेचे वर्णन करण्यात आपली सारी बुध्दी खर्च करतात परंतु ह्याच गीतेनी
चातुर्वर्ण्यावर आधारित समाजरचनेची निर्मिती करून, विषमतेचो बिजे रोवून माणसांना जनावराच्या बरोबरीने लेखले आहे,
याची त्यांना कल्पना सुध्दा येवू शकली नाही तर भारताचे पहिले
$$$$$
पंतप्रधान नेहरु एकदा गोव्याच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांनी एका मंदिराला भेट दिली, मंदिरात जात असताना मंदिराच्या
बाहेर अनेक दलित मंडळी उभी होती ती त्यांनी पाहिली या दलितांना सुध्दा मंदिरात जावयाचे होते पण दलितांना मंदिरात
जाण्याचा मज्जाब आहे, त्यांना आपल्या बरोबर त्या दलितांना मंदिरात नेता आले नाही: आपण लोकांचे खरे प्रतिनिधी लाडके
पंतप्रधान आहोत ज्या मंदिरात दलितांना प्रवेश नाही तेथे आपण जाणार नाही आणि गेलोच तर दलितांना बरोबर घेवून
जाईन हा बाणा दाखविता आला नाही: मग म्हणावे लागते, की ज्याचे जळते त्यालाच कळते: जे दुःख भोगतात त्यानांच
दुःखाची जाणीव असते: अितरांचे दुःख पाहून ज्यांच्या मनावर काहीच परिणाम होत नाही त्यांना माणसं तरी म्हणावे का?
अमेरिके तील या बड्या माणसांनी त्यांचा स्तर किती मोठा मानवतावादी आहे हे दाखवून दिलंय: पण आपल्या देशात बडी
माणसे जेंव्हा इतरांचे दुःख बघून मूग गिळून बसतात किं वा त्यांच्या दुःखाची थट्टा करतात तेव्हा आमच्या देशातील
उच्यतमपदी असणाऱ्यांचा स्तर काय आहे ही बाब उघडी पडते आणि म्हणुनच डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलंय
की आपणच आपली दु:खे मिटविली पाहिजेत- आपणच अन्याय अत्त्याचारा विरुध्द झगडले पाहिजे. या वेळी बुध्दाचे एक
वाक्य आपल्याला सांगावेसे वाटते “दुःख जेथुन निर्माण होते त्याची कारणे शोधा आणि ती नाहीसी करा:”
धर्मातरानंतर फारच थोड्या दिवसांत डॉ. बाबासाहेबांचे महानिर्वाण झाले: बाबासाहेबांनंतर मधल्या १७ वर्षांत
थोडा फार गोंधळ आपल्या चळवळीत झाला: बाबासाहेबांच्या हयातीत बाबासाहेबांबरोबर काम करणाऱ्या मंडळीत
नेतेपदावरुन बरीच भांडणे झाली: प्रत्येकाने आपला वेगळा सवता सुभा उभारला आणि या गटबाजीतच राजकरण करु
लागले: प्रत्येकाला खुर्चीची हाव सुटली, खुर्च्यांचे राजकारण करण्यात ही नेते मंडळी गुंतलीः व सामाजीक समतेचा लढा
बाजूला राहिला, बाबासाहेबांनी बुध्दाची चळवळ उभारली ती बाजूला राहिली आणि हे चळवळीचे पुढारी म्हणविणारे लोक
फक्त बाबासाहेबांचे किं वा बुध्दाचे नाव मुखी घेवून कृ ती मात्र उलटी करु लागले : जनतेपर्यन्त बुध्दाचे, बाबासाहेबांचे
विचार जनते पर्यंत पोहचवि ण्यांचे काम किं वा बौध्द धम्माचा संपूर्ण प्रचार करणे-माणसांना प्रबुध्द बनविणे - कारण माणसांना
प्रबुध्द बनविल्याशिवाय या देशात समता तरी कशी काय येणार? आणि ही येण्यासाठी सर्वांना बुध्दाच्या मार्गाची कास
158
धरायला हवीयः पण हे विचार जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम कोणीच करीनासे झाले-सगळे आपआपल्या गटात राजकरण
करण्यात गुंतलेले, चळवळीत किती अनास्था पसरलीय किं वा चळवळीचे किती आपण नुकसान करीत आहोत? खुर्च्यांचे
राजकारण करणाऱ्या मंडळीस कशी जाण येणार? अन्याय, अत्याचार याचे निवारण करण्यास सुध्दा या मडळींना फु रसत
मिळत नाही आणि यामुळे सर्वत्र अनास्था, नाउमेदपणा, ही बाब उघडया डोळ्यांनी बघणे निदान डॉ. बाबासाहेबांच्या
विचारांनी फु ललेली आजची तरुण मंडळी कशी बघोल?
$$$$$
डॉ. बाबासाहेबांचे मला एक वाक्य आठवते ते म्हणाले होते की या चळवळीचा 1- प्रगतिचा गाडा मी येथ पर्यंत आणलाय तो
जर तुम्हाला पुढे नेता येत नसेल तर आहे तिथेच राहूद्या पण मागे जाईल असे कोणतेही काम करु नका. गेल्या १७ वर्षाच्या
कालावधीत या चळवळीतील पुढाऱ्यांची अवस्था बघुन मात्र आजच्या तरुणांचा हुंकार जागा झाला त्यांनी ठरविले डॉ.
बाबासाहेब, बुध्द, फु ले आपले खरे पुढारी- तीच खरी आपली अस्मीता, आदर्श-मग या गटबाजीत भांडणाऱ्या बेजबाबदार
माणसांवर विश्वास ठेवायचा नाही. त्यांनी जबाबदारी नाकारलीय ती आपण स्वीकारावयास पाहिजे आणि मग बुध्दाची,
बाबासाहेबांची खरी सामाजिक समतेची चळवळ दलित पँन्थरच्या रुपानं उभी राहीली : आज खऱ्या अर्थाने बुध्दाचे
बाबासाहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम आज ही तरुण मंडळी करते आहे.
आजच्या या सामाजिक समतेचा लढा लढणाऱ्या, मानवी मुक्तीचा लढा लढणाऱ्या, दलित पँन्थर या
चळवळीबाबत आपल्या देशातील काही शिकले सवरलेले लोक म्हणतात की दलित पँन्थर ही राजकीय पार्टीच निर्माण
झालीय. त्यांना खूर्च्यांचेच राजकारण कराचेय हे असं म्हणणाऱ्यात वकील मंडळी सुध्दा आहे म्हणाः मला या सर्वांना
सांगावेसे वाटते ते बाबासाहेबांच्याच भाषेत सांगतो. आमच्या चळवळीचे ध्येय अन्याय, जुलूम, खोटया परंपरा आणि विशिष्ट
खास अधिकार यांचा नायनाट करुन, लोकांना गुलामगिरीतून मुक्त करुन, विषमता गाडू न, समता प्रस्थापित करणे असे
आहे. आमच्या ध्येयाचे प्रचंड काम आमच्या समोर आहे. या देशात समतेचे राज्य प्रस्थापण्यासाठी चार दोन खुर्च्यां
कु चकामी आहेतः खुर्च्या मिळून सामाजीक समता येणार नाही तर इथल्या प्रत्येक माणसाला बुध्दाचा विचार डॉ.
बाबासाहेबांचे विचाराप्रमाणे सुबुध्द बनवायचं आहे आणि जेव्हा या भारतातला प्रत्येक माणुस, समतावादी बनेल तेंव्हाच
समतेचे राज्य या देशात येईल आणि मग प्रत्येकजण प्रबुध्द बनल्यावर दलितच शासनकर्ती जमात बनेंल: म्हणुन पहिल्यांदा
या देशातील लोकांची मने बुध्दाच्या विचाराप्रमाने घडवायला हवीत आणि हे जेंव्हा घडेल तेंव्हा आपल्या देशात अन्याय
होणार नाहीत, जुलूम होणार नाहीत, कोणी अज्ञानी राहणार नाही, आणि देश अतिशय उच्च ठिकाणी गेलेला असेल,
प्रगतलेला असेल म्हणून मी या प्रसंगी म्हणेन की प्रत्येकाने बौध्द बनणे म्हणजेच राष्ट्रीय फार मोठे काम करणे होयः कारण
बौध्द धम्मामुळेच मानवातील भेदनीती नाहीसी होईल व एकसंघपणा येईल. मग असे चांगले काम देशातला तारक असे काम
की देशातला प्रत्येक माणूस प्रबुध्द करण्याचे काम मानवी हक्कासाठी झगडण्याचे काम करणाऱ्या या चळवळीस काय
म्हणायचे हे आत्ता तुम्हीच ठरवा: आम्ही आमचे काम करतो आहोत:
एखादा नदीचा प्रवाह सुरु होतो, तेव्हां तो आपल्याबरोबर गाळ, दगड, धोंडे, गोटे बरोबर आणतो: पण पुढे वाहता
वाहता प्रवाहातून दगड, धोंडे, गाळ. पाला, पाचोळा, गळत जातात, तद्वत चळवळीच्या प्रवाहात सुध्दा अशी माणसे गळत
जातात त्यांची खंत
$$$$$
बाळगायला नकोय. कारण अशी मंडळी गळणारच: परंतु त्यामुळे चळवळीचा प्रवाह थांबत नाही, तर तो वाहत रहातोचः या
चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या अंगी त्यागाची भावना हवीयः आपले ध्येय गाठण्यासाठी प्रसंगी मृत्युची
ही पर्वा के ली नाही पाहिजे: सतत अविरत काम के ले पाहिजे. प्रज्ञा, शील, करुणा या गोष्टी त्यांच्या अंगी हव्यातः जो
कार्यकर्ता जगाला ओरडु न आत्मप्रौढी मारीत फिरतो की मी अमुक के लं-तमुक के लं एवढा त्याग के ला-तेवढा त्याग के ला व
अफवा पसरवित फिरतो त्याला मी कार्यकर्ता म्हणायला तयार नाही. तर तो माणूस चळवळीच्या भल्यासाठी तारक असे
काम करीत नसून चळवळीला मारक असे काम करतो असे मी समजतो: अशी चमचेगिरी करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस मी
या प्रसंगी एक प्रेमाचा संदेश देतोय की, “काटा बन, छु री बन, मगर किसिका कभी चमचा न बन.” आपल्या चळवळीत अशी
चमचेगिरी करणारे लोक कोण आहेत हे ओळखून अशा प्रवृतीस पायबंद घातला पाहिजे: आपली चळवळ, आपल्या
159
मुक्तीचा लढा आहे: यात गोंधळ माजविणाऱ्यांना थारा नाही त्यांनी गोंधळ माजवू नये कारण आपली चळवळ
गोंधळयाची नाही तर बुध्दांच्या विचारांनी, डॉ. बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे या देशात मानवता आणून या देशाचे सपूर्ण
चित्र बुध्दाला डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत आहे असे घडविण्याची चळवळ आहे. ही बुध्दाच्या, डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची
चळवळ आहे ह्या सुविचारांनी ही चळवळ उभी राहीलीयः त्या चळवळीला मरण नाही: कारण बाबासाहेबांचे-बुध्दाचे हे विचार
अभेद्य आहेत, अमर आहेत; आणि याच विचाराची परंपरा या विचारावर आपली चळवळ उभी आहे. आपल्या चळवळीचे तेच
तत्व आहे पण एकदा चांगला विचार लोकापर्यंत पोहचला पाहिजे या साठी प्रचारयंत्रणा हवीयः प्रचार यंत्रणेमुळे एखादा
अविचार सुध्दा लोकांना गुंगीत ठेवतो. अहो, सद्याचेच उदाहरण घ्या ना! एक संतोषी माँ या सिनेमाने लोकांना १६ उपवास
करावयास लावले: हे कशामुळे? तर पिक्चर या प्रचारयंत्रणेच्या साह्यामुळे: म्हणून सुविचार सुध्दा पोहोचवयाला प्रचार यंत्रणा
हवीय: पण तरी सुध्दा मी म्हणेन की बुध्दाचे विचार जगाला तारणारे आहेत. कोणी म्हणतो की या देशात जर आपली
चळवळ जिवंत राहिली नाही तर बुध्दाचे, बाबासाहेबांचे विचार या देशातून उच्चाटले जातील. पण मी अशांना सांगू इच्छितो
की डॉ. बाबासाहेब किं वा बुध्दाचे विचार या देशातूनच काय जगातूनही कधी उच्चाटले जाणार नाहीत त्याचे कारण म्हणजे
मानवाला बुध्दांच्या, बाबासाहेबांच्या विचाराशिवाय तरणोपाय नाही. नव्हे तर ज्या ज्या व्यक्ती जवळ जो जो चांगुलपणा
असणार आहेत. चांगुलपणा म्हणजेच बाबासाहेब किं वा बुध्दाच्या विचाराची जिवंत प्रत्यये होत. मला अभिमानाने सांगावेसे
वाटते, की ज्या विचाराने हा देशातील मूर्त समान किं वा मेलेल्या अवस्थेत असलेल्या दलित समाजाला जागृत के लेय, तो
विचार अभेद्य आहे, अमर आहे, अमृत आहे. अरे ज्या मुळे मेलेले जिवंत होतात ती गोष्ट मरेल? शक्यच नाही: जे या
विचारांस डावलतील किं वा अंगीकारणार
$$$$$
नाहीत त्यांत त्यांची अधोगती आहे म्हणून आपण हे विचार अंगीकारुन ते आचरले पाहिजेत, तरच आपण आपली प्रगति
साधू शकू :
या गांवाचीच गोष्ट घेवूः कांही बडे लोक बडे पुढारी आपल्या बाबत बरेच काही बोलतात की आपल्या समाजातील
लोक दारु पितात: मी आमच्या मंडळीस म्हणेन दारु पिणे ही चुकीची गोष्ट आहे. आपण ही चुकी के ली नाही पाहिजे:
आमच्या सारख्याला जेव्हा हे लोक सांगतात तेव्हा वाईट वाटतेच पण मला या लोकांना जाहिर पणे सांगावसं वाटत की याच
गावात जेव्हा आमची माणसे दारु पितात ही गोष्ट आपल्या नजरेस येते आणि आमच्या मंडळीस तुम्ही नांवे ठेवताः अर्थात
आमचा आणि तुमचा हे बडे लोक ज्या अर्थाने करतात तो अर्थ मला माहित नाही: पण मी या अर्थाने करतो की आंम्ही
मंडळी गरीब व तुंम्ही मंडळी बडे श्रीमंतः तर मी असे म्हणेंन की ज्या वेळेस ह्या बडी-बडी मंडळी लखोपतीची पोरं दारु पिवून
सर्व प्रसिध्द असलेल्या आग्रारोडवर भर बाजारपेठेत जेव्हा तमाशा करतात, ते दिसत नाही काय? अर्थात ही गोष्ट पोलीसांना
पण चांगल्या प्रकारे माहित आहे. मग आमच्या गरीब मंडळीला नावे ठेवणाऱ्यांना मी म्हणेन की आमची ही मंडळी जेव्हा
प्यालेली असेल तेव्हा माझ्यासारखा माणूस समोर येतांना दिसला तर ही दारु प्यालेली मंडळी मग तो कोणीही असो तो
लांबूनच मान खाली घालून निघून जाईल: अगदी गुपचुपपणे, पण समोर येणार नाही आणि आलाच, तर आमच्या नजरेला
नजर मिळविण्याची हिमत ही होत नाही, पण या बड्यांची पोरं जेव्हा पितात आणि त्यांच्या समोर कोणीही कीतीही मोठा
माणूस गेला तरीही त्यांची काहीही कदर करीत नाही: आंम्हा मंडळीवर टीका करणाऱ्या लोकांना म्हणेन की प्रथम
तुमच्याकडे बघा: हे एवढे मोठे कृ त्य कसे दिसत नाही? नाहीच दिसणार: त्यांना शहाणपणा नाहीच शिकविणार. तुम्ही
तुमचेच बरोबर आहे, कारण दारु पिणाऱ्यांनाच शिकवायला पाहिजे: खरं आहे आमची मंडळी दारुला पिते पण तुमची मंडळी
दारुला पित नाही तर दारु तुमच्या मंडळीला पितेः हा आहे फरक तुमच्यात नी आमच्यात मला सांगावस वाटतय की
आमच्या के सेस नक्कीच सुधारतीलः काल परवापर्यंत याच विभागात पिणाऱ्यांची संख्या जास्त होती; पण ती आज अल्प
झालीय. ती काही दिवसांनी तर नष्ट होईल: कारण आम्ही रोगाबरोबर रोगजंतुंचाही नाश करीत आहोत. दारुचे अड्डेच बंद
पाडले पाहिजेत. आपल्याला ते जमणार नाही ते आम्हीच करु. आमच्या मंडळीचं दारु पिणं दिसतयं: पण या गांवाची
शान वाढविण्यात आमचा के वढा हातभार असतो. इतके च काय, पण मला अभिमानानं सांगावसं वाटतंय की या ग्रामीण
विभागातून कसारा हायस्कू लचा ९५% निकाल लागून या ग्रामीण विभागातून या हायस्कूलचा अग्रक्रम आला. त्यांत
आमच्या मुलांचा सिंहाचा वाटा आहे: आज कॉलेजमध्ये किं वा कोणत्याही क्षेत्रात या गांवात प्रकर्षाने चमकणारी मुले ही
160
आमचीच आहेत. पण आमच्या मुलांची कदर कोण कशाला करील? पण आमचा उजवेपणा तुम्हांला नाकारता येणार नाही
म्हणून मी माझ्या विद्यार्थी मित्रांना, तरुणांना सांगेन, की बाबासाहेब म्हणतात-पुढारलेल्या जातींच्या
$$$$$
लोकांशी स्पर्धा करुन तेथे बुध्दीचा प्रभाव पाडल्या शिवाय नुसत्या शिक्षणाने चिज होणार नाही अगर पुढारलेल्या जाती
आपणांस दाबणार नाहीतः उलट आज शेकडो वर्षे असे आपणांस व आपल्या बापजाद्यांना त्यांनी दाबले तसेच तुम्हांस ते
दाबल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून तुम्ही जे शिक्षण घेता ते असे घ्या की त्यामुळे आपले सर्व विद्यार्थी सरस ठरले
पाहिजेतः
माझ्या भगिनींना मी या प्रसंगी सांगेन की ज्या समाजाच्या स्त्रिया पुढारल्यात तो समाज पुढारलेला आहे. ही
वास्तवता आहे. मुलांची जडण घडण घडविणे ही बाब पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या हातात जास्त आहे. ही जबाबदारी प्रामाणिकपणे
पार पाडायला हवीयः स्त्रियांनी आपली बुध्दीमत्ता चुलीपुढेच करपविली नाही पाहिजे, तर आपल्या स्त्रियांनी कोणत्याही
परिस्थितीत मागे राहाता कामा नयेः आपली शैक्षणिक अर्हता वाढविली पाहिजे, इतरांप्रमाणे सर्व चांगल्या क्षेत्रात चमकायला
हवयं: आपण पारंपारिक चालत आलेली सर्व अंधश्रध्देची जूनी मूल्ये झूगारुन दिलीत, तेंव्हा आपल्याला जी नवीन मूल्ये
मिळालीत ती मूल्ये किं वा त्या मूल्याप्रमाणे वागायला हवयं: तरच आपलं जीवन सुखकर होईल. नाही तर अजूनही
आमच्यातली काही मंडळी खंडोबा, म्हसोबा किवा देवाच्या नावानं उपास-तापास करते आहे. ही अत्यंत खेदाची बाब आहे:
हे असे उद्योग सोडू न द्यावयास हवेतः कारण बाबासाहेब म्हणतात चातुर्वण्र्यावर आधारित हिंदू समाज रचना ही मानवतेचा
अपमान करणारी आहे, बुध्दीभेद करणारी आहे अशा या त-हेच्या समाज रचनेत समता मांडू शकत नाही. आणि व्यक्तिचा
विकासही होवू शकत नाही. तर आपला विकास साधावयाचा असेल तर या समाजरचने प्रमाणे चालत आलेल्या रुढींच्या
वाईट चालीरिती टाकावयासच हव्यातः
आज आपण या प्रसंगी आनंदीतपणे एकत्र, सामुदायिकरित्या आपण आनंद उपभोगीत आहात: पण हे सर्व कायम
स्वरुपात टिकवायचं असेल तर आपण आपल्या कर्तव्याचे पालनही करण्यास कोणत्याच प्रकारची कु चराई करु नयेः आपण
जर आपली जबाबदारी आपलं कर्तव्य पार पाडलं नाही तर त्याच्यात आपलीच अधोगती होईल: डॉ. बाबासाहेबांनी
आपल्याला मानवी हक्क मिळवून दिलेतः आपल्याला हक्क मिळवून दिलेत पण त्या बरोबर आपणाला सांगितलेल्या
कर्तव्याचीही जाणीव असणे आवश्यक बाब आहे. या अधुनिक काळात धर्म अफूची गोळी मानणाऱ्या काळात डॉ.
बाबासाहेबांना काही लोकांनी प्रश्न विचारले की धर्म अफूची गोळी मानणाऱ्या या काळात आपण धर्म का स्विकारता?
तेंव्हा बाबासाहेब म्हणतात माझ्या. माणबांना मी हक्क मिळवून दिलेतः पण या बरोबर त्यांना कर्तव्याची जाण बौध्द धर्माच्या
रुपाने देत आहे. तरच त्यांचे हक्क शाबीत राहतीलः
एखाद्या कार्यकर्त्यांचा सत्कार होतो तेव्हा आम्ही म्हणतो की तो जनतेचा सत्कार आहे: बाबासाहेबांच्या, बुध्दाच्या
चळवळीचा सत्कार आहे: कारण एखादी व्यक्ति जेव्हा श्रेष्ठ ठरते तेव्हा तिच्या बरोबर असलेले विचार श्रेष्ठ असतात: म्हणून
व्यक्तिचा सत्कार होत नसून त्याच्या विचारांचा, त्याच्या कार्याचा सत्कार होत असतो: म्हणून मी जाता जाता म्हणतो
$$$$$
की, आपण नुसते धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे कार्यक्रम करुन भागायचे नाही तर बुध्दाचे, बाबासाहेबांचे विचार आचरणात
आणल्याशिवाय आपण आपल्या चळवळीचे ध्येय गाठू शकणार नाही. बुध्दाचे विचार, बाबासाहेबांचे विचार आचरणे
म्हणजे खरा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करणे होय. मी आपल्याला या ठिकाणी हीच विनंती करतो की, बुध्दाच्या
बाबासाहेबांच्या या मानवी मुक्तीच्या चळवळीत आपला प्रत्येकाचा सक्रीय भाग हवायः बुध्दाचे, बाबासाहेबांचे आपण विचार
समजावून घेतले पाहिजेत, अभ्यासले पाहिजेत व त्याप्रमाणे आचरले पाहिजेत आणि यांत आपण कोणत्याही प्रकारची
कु चराई करून चालणार नाही. आपण या कामी कोणतीच कु चराई करणार नाही अशी आशा व्यक्त करुन व आपले सर्वांचे
मन:पूर्वक आभार मानून आणि आपल्याला पुन्हा एकवार अभिवादन करून मी माझे भाषण संपवितो.
$$$$$
प्रा. अरुण कांबळे यांची विठ्ठल शिंदे यांनी घेतलेली मुलाखत : ‘रिडल्स’ प्रकरण व
रामायणातील संस्कृ ती संघर्ष
जगातील कोणतीही शक्ती माझे विचार स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही
प्रश्न: रामायणावर नवा प्रकाश टाकावा असे आपणास का वाटले? यासंबंधीची आपली भूमिका कोणती ?
उत्तर : रामायण आणि महाभारत हे भारतीयांचे जीवनादर्श आहेत. ही महाकाव्ये सनातन भारतीय जीवनाचे
प्रतिनिधीत्व करतात. रामायणातील राम हा आकिटाईप (आदिबंध) आहे. रामायणातील राम शूद्र शंबूकाचा तप करीत
असताना शिरच्छेद करतो. कारण शूद्राला तपश्चर्या करण्याचा, शिक्षण घेण्याचा अधिकार नाही असा मनु स्मृतिचा दण्डक
होता.
तो सुग्रीवाबरोबर लढत असलेल्या वालीचा झाडाआडू न बाण मारून अधर्माने वध करतो. कारण त्याची अशी
धारणा आहे की आदिम जातीतले लोक माणसे नाहीत पशू आहेत. (वा-नर आहेत) त्यांना माणसांचे नियम लागू नाहीत.
शूर्पणखेचे नाक-कान कापून तिला विद्रूप करणारा, अयोमुखीचे स्तन कापण्यास लक्ष्म णाला सांगणारा, त्राटिके स
ठार मारणारा राम, सीतेबरोबर चांगला वागेल अशी अपेक्षाच करणे गैर आहे. 'न स्त्री स्वातंत्र्यंमर्हति' या मनुस्मृतिच्या
आज्ञेचाच तो दास आहे. स्त्री-शूद्रातिशूद्रांचा सनातन शत्रू !
रामायणातील राम कोणत्याही पातळीवर पुरुषश्रेष्ठ नाही. उलट तो कनिष्ठ पातळीचा पुरुष आहे. त्याचा आदर्श तो
काय घेणार ?
त्याला अनेक बायका होत्या याचे पुरावे मी वा. रामायणाच्या आधारे दिले आहेत. तो मांसाहार तर करत होताच
परंतु मद्यपीही होता. सीता रावणाकडू न आणल्यानंतर सीता आणि राम यांचा आवडता उद्योग कोणता ? तर अर्धा दिवस
सर्व देवांची पूजा करावयाची व अर्घादिवस नशापान करून कामक्रीडा करायची. मग राज्य कसले डोंबलाचे करणार ? या
काळात राज्य करीत असे लक्ष्मण ! राम नशापानात आणि कामक्रीडेत मश्गुल ! (वाल्मिकी रामायण, उत्तरकाण्ड, सर्ग ४२
श्लोक २४, २५, २६, २७, २९, ३०) रामराज्याचा हा आदर्श आम्ही घ्यावयाचा का ? हे रामराज्य शंबूकाप्रमाणे आमचा
शिरच्छेद करणार का ? स्त्रियांच्या स्वातंत्र्याला हिरावून घेणार का ? वालीप्रमाणे आम्हाला पशू म्हणून (वानर )
162
$$$$$
वागवणार का ? हा आमचा सवाल आहे. आणि सध्याचे रामाचे वारसदार आम्हाला जी अमानूष वागणूक देतात ती
पाहिल्यानंतर हे रामराज्य म्हणजे दलित-स्त्रिया यांची कत्तल करणारे कत्तल खोर साम्राज्य आहे असे म्हटले म्हणजे बिघडले
कु ठे ?
प्रश्न : हे संशोधन नाही प्रचार आहे, असे म्हटले जाते. याबद्दल आपली भूमिका काय?
उत्तर: रामाचे अंधभक्त कोणत्याच सत्याकडे डोळे उघडू न पाहू शकत नाहीत. श्रद्धा हा रोग आहे. तो माणसाचे मन
विकृ त करतो. त्याची सद्सद्विवेक बुद्धी नष्ट करतो. राम भक्तीची कावीळ झालेल्या विकृ त आकलनाच्या श्रद्धावंताना
रीसर्चवर्क (संशोधन) आणि प्रचारी लेखन यातील फरक कसा कळणार ?
मी मुंबई विद्यापीठातून एम. ए. मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेला विद्यार्थी आहे, प्रबंध लेखनाला (रीसर्च
मेथडॉलॉजी) मला विशेष योग्यता श्रेणी मिळाली आहे. विद्यापीठात सगळे मूर्ख बसवले आहेत का ? गेली ७ वर्षे मी
वाङमयाचे अध्यापन करतो. त्यातून माझी वाङमयीन दृष्टी निश्चित झाली आहे.
गल्लीतल्या टारगट पोरांना एकत्र करून भाषिक किं वा भावनिक पातळीवर त्यांना लढायला प्रवृत्त करायचे, लूटमार
करावयास लावायची, आणि त्याच्या जोरावर दादागिरी चालू ठेवून भाषणे ठोकायची, पुढारीपण करायचे हा माझा उद्योग
नाही. माझी जीवनदृष्टी बुद्ध-फु ले-शाहू महाराज आणि डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या विचारावर पोसलेली आहे. त्यांच्या
तत्त्वज्ञानाचे बीजारोपण करून स्वातंत्र्य-समता व बंधुता या भारतीय घटनेने घोषित के लेल्या तत्त्वांची अंमलबजावणी
जनजीवनात करणे हे मी माझे जीवनव्रत समजतो. मी पूर्णपणे निरीश्वरवादी, धर्म निरपेक्षवादी (सेक्युलर) आणि विज्ञाननिष्ठ
जीवनसरणीचा पाईक आहे. त्याचमुळे कोणत्याही गोष्टीकडे वस्तुनिष्ठपणे मी पाहू शकतो असा माझा दावा आहे. अंधश्रद्धेचे
जोखड माझ्या मानेवर नाही वा भक्तीची झापड माझ्या डोळ्यावर नाही मी सत्यशोधक आहे.
प्रश्न : तुमचे सर्व निष्कर्ष सर्वांनी मान्य करावेत असा तुमचा आग्रह आहे का ?
उत्तर : माझे सगळे निष्कर्ष सर्वांना मान्य व्हावेत असा आग्रह नाही. ज्ञानाच्या संशोधनाच्या क्षेत्रात असा आग्रह
कोणालाच घरता येणार नाही. तो दुराग्रही ठरेल. माझे म्हणणे मी तर्क , अनुमान आणि प्रमाण यांच्या सहाय्याने मांडले आहे.
प्रत्येक गोष्टीला आधार दिला आहे. जागतिक कीर्तीच्या डी.डी. कोसंबी, महापंडित राहुल सांकृ त्यायन ह. घी. सांकलिया
आदी विद्वानांच्या ग्रंथातील अवतरणे दिली आहेत. रामायणातील प्रत्यक्ष पुरावे दिले आहेत. बुद्धिवादाच्या निकषावर माझे
म्हणणे कोणी खोडण्याचा प्रयत्न के ला तर त्या प्रयत्नाचे मी स्वागतच करीन.
$$$$$
काही मर्यादेपर्यंत माझ्या भूमिके चे स्वागत करून, त्याला काही प्रमाणात विवादग्रस्तता दाखवणारे माझे निकटवर्ती
मित्र आणि भारतीय इतिहासाचे गाढे व्यासंगी कॉ. शरद पाटील, थोर पंडित तर्क तीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, समाजवादी नेते व
विद्वान ना. ग. गोरे, खा. यशवंतराव चव्हाण, पत्रकार दिनकर साक्रीकर, समीक्षक प्रा. स. शि. भावे यांनी माझ्या पुस्तकावर
आपला अभिप्राय स्पष्टपणे नोंदवला आहे. हे ज्ञानाचे क्षेत्र आहे. येथे लेखणीला तरवारीचा विरोध करून जमणार नाही.
फु लांच्या बागेमध्ये उपटसुंभ रान रेडयाने धुडगूस घालण्याप्रमाणे हे कृ त्य आहे.
प्रश्न: आपल्या पुस्तकावर खटले भरले आहेत, त्याच्यावर जप्ती आणण्याची शासनाकडे मागणी के ली आहे,
आपल्याला खुनाच्या धमक्या देण्यात येताहेत; याबद्दल आपले मत काय आहे ?
उत्तर : रामायणाची शवचिकित्सा करणारे पुस्तक मी लिहिले म्हणून ज्यांच्या भावना दुखावतात त्यांना मी
विचारतो शंबूकाच्या शिरच्छेदाची कथा सांगणाऱ्या रामायणाच्या पठनाने आमच्या भावना दुखावतात त्याचे काय ? सीतेला
दुष्ट मरणप्राय वागणूक देणाऱ्या, गरोदर असणाऱ्या सीतेचा त्याग करणाऱ्या अमानुष रामाच्या वर्तनाने प्रत्येक स्वातंत्र्यवादी
163
स्त्रीच्या अंतःकरणात संतापाचा आगडोंब उठतो त्याचे काय ? रामलीलेतील रावणाच्या दहनामुळे द्रविडजनतेस आपली
अस्मिता पायदळी तुडवली जाते असे वाटते त्यांचे काय ?
भावना दुखावते असे म्हणणे शुद्ध नाटक आहे. दुसरे तिसरे काही नसून यामागे घृणास्पद जातीयवादी हेतू लपला
आहे. दलितांचे विचार स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा हा दुष्ट कट आहे. तो आम्ही चालू देणार नाही.
न्यायसंस्था माझ्याच बाजूने न्याय देईल याबद्दल मला संशय नाही सुप्रीम कोर्टा पर्यंत जाण्याची माझी तयारी आहे.
हा विचार स्वातंत्र्याचा लढा आहे असे मी समजतो. प्रेसबिलासंबंधात बोलणारे या व्यक्तिस्वातंत्र्यावर आघात करणाऱ्या
सामाजिक दबावा बद्दल मूग गिळून का बसले आहेत ? चोपडा, जि. जळगाव, येथे माझ्यावर खटला भरण्यात आला आहे.
तो चालू आहे.
पेरियारांच्या रामायणावरील पुस्तकावर उत्तरप्रदेश सरकारने बंदी आणली-हाय कोर्टाने ती उठवली. सुप्रीम कोर्टाने
देखिल तोच न्याय दिला आणि बंदी उठवून पेरियारांची बाजू निर्दोष म्हणून घोषित के ली.
या प्रकरणात देखिल सत्य माझ्याच बाजूला आहे. मला दिल्या गेलेल्या मृत्यूच्या धमकीच्या निषेधाची सभा
लंडनमधेही तेथील दलितांनी घेतल्याचं आंबेडकर मेमोरियल ट्रस्टचे गौतम चक्रवर्ती यांनी मला पत्ताने कळवले आहे.
सत्याच्या प्रतिपादनाबद्दल कोणतीही
$$$$$
शिक्षा माझ्या वाट्याला आली तरी ती भोगायला मी तयार आहे. खुनाच्या धमकीबद्दल मी एवढेच सांगतो की, “जो मरणाला
घाबरत नाही तो कधीच मरत नाही आणि जो मरणाला घाबरतो तो कधीच मेलेला असतो" या डॉ. आंबेडकराच्या वचनावर
माझा विश्वास आहे.
अत्याचार खपवून घ्यायला दलितसुद्धा आता मेलेल्या आईचे दूध पिणारे राहिलेले नाहीत, दुबळेपणा त्यांनी टाकू न
दिला आहे. प्रतिकारासाठी आम्हीसुद्धा सिद्ध आहोत. ही अघोषित आणिबाणी आम्ही चालू देणार नाही.
माझ्या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतरही दक्षिणेतील मंडळींकडू न 'कल्चर कॉन्फ्लिक्ट इन रामायण' या नावाने लौकरच
प्रसिद्ध होत आहे. हिंदी भाषांतराचीही जोरदार मागणी आहे. हे दलितांच्या जागृतीचेच लक्षण नव्हे काय ?
प्रश्न : रावणाचे उदात्तीकरण करून आपल्याला काय साधावयाचे आहे ? नव्या युगाचा नायक रावण ठरू शकतो
का ?
उत्तर : मला रावणाला नायकत्व बहाल करावयाचे नाही. तो सर्वांगपरिपूर्ण होता निर्दोष होता असे मला म्हणावयाचे
नाही. मी पुनरुज्जीवनवादी वा पूर्वगौरववादी नाही. रावणावर झालेल्या अन्यायाकडे मी आपले लक्ष वेधतो. या देशातील
दलित-आदिवासी अनायं जनतेचा तो प्रतिनिधी आहे. त्याचे खल नायक म्हणून काळया रंगात रंगवलेले चित्र बरोबर नाही.
रावण हा लोकहितदक्ष बोद्ध-अनार्य राजा होता असे माझे म्हणणे आहे. तो सौदर्यसंपन्न, शक्तिशाली, गुणयुक्त असा
राक्षसाधिपति होता. आपल्या एकदेशीय संस्कृ तीत रावणावर अन्याय झाला आहे असे माझे म्हणणे आहे. ते मी माझ्या
पुस्तकात मांडले आहे.
164
$$$$$
अयोध्या में उत्खनन से उपलब्ध संके त रामायण काल सातवी-आठवी शताब्दी के मध्य झांसी ३ डिसें. (युनी.)
भारतीय के न्द्रिय पुरातत्त्व सर्वेक्षण के भूतपूर्व महानिदेशक तथा इंडियन इन्स्टिटयूट आफ एडवांस स्टडीज सिमला के वर्तमान
निर्देशक वी.पी. लाल के निर्देशन में अयोध्या, नन्दीग्राम और भारद्वाज आश्रम में हुए उत्खनन से यह संके त मिला है कि
रामायणकाल सातवी और आठवी शताब्दी के मध्य रहा होगा।
श्री लाल ने 'रामकबाकी ऐतिहासिकता एक पुरातत्त्वीय अध्ययन' विषयपर यहां बोलते हुए कहा कि वर्तमान वर्ष में
उत्खनन परियोजना के सबसे महत्त्वपूर्ण चरण में चित्रकू ट में उत्खनन काम किया जायेगा। वनवास कालके दौरान एक लम्बे
समय तक यहां रहे थे।
उन्होने कहा कि मंदाकिनी नदीके किनारे बसे चित्रकु ट यद्यपि अधिकांश रूपसे मध्य कालीन युगसे मंदिरोंसे चिरा
हुआ है।
उन्होंने बताया कि इस क्षेत्र में किये गये प्रारंम्भिक कार्योंके दौरान वहां उत्तरी ढंग के काले रंगके मिट्टी के बर्तन मिले
है जो सम्भवतः सातवी या आठवी शताब्दी के है।
('नवभारत टाईम्स' दि. ४ डिसेंबर १९८२)
'रामायण की कथा भी महाभारतकी कथा की तरह बहुत पुरानी है। बुद्धके समय भी वह प्रचलित थी। किन्तु उसको
एक सुन्दर महाकाव्यका रूप इस कृ तिके रूप में दिया गया । जिस समाज और भोगोलिक विस्तारका वर्णन रामायण में आता
है वह शुंग-कालको सूचित करता है, इस प्रकार इसकी रचना ईसासे डेढ़ दो सौ वर्ष पहले हुई । रचयिताका नाम वाल्मिकी है,
जो ठीक भी हो सकता है, किन्तु वाल्मिकी के साथ, जितनी बाते जोड़ दी गई है, वह आदि कविकी ऐतिहासिकतापर सन्देह
पैदा कर देती है। 'महाभारत' की तरह यह भी पालियोंके कालकी रचना है।
$$$$$
इस समयकी कवितायें पालिमें सुरक्षित है। संस्कृ त में उनके नमुने महाभारत और रामायण में मिलते हैं, जो कि
शताब्दियोंतक मौखिक दोहराये जाते। मौर्य-वंश के उच्छेद के बाद शुंग-कालमें स्थायीरूप लेने लगे। हम महाभारत और
रामायण ग्रंथोंपर विचार करते समय उनके भीतर आये कथानकोंके कालपर निर्णय नही देना चाहते। कथानक शताब्दियों
पहले के हो सकते हैं। रामायण की मूलकथा 'दशरथ' जातक के रूपमें हमारे सामने मौजूद है। रामायण और महाभारत में
शुंग-कालके बाद भी क्षेपक होते रहे। पर उनके सबसे पुराने अंश उसी कालके है, जबकि महाभाष्यकार पतंजलि शुंग वंश के
संस्थापक पुष्यमित्रसे यज्ञ करा रहे थे ।
...यद्यपि शुंग कालमें वैदिक- युगके पुनः लौटानेकी कोशिश की गई थी, जिसका सुफल 'महाभारत' और 'रामायण'
है।'
संस्कृ त काव्यधारा पृ. १५४,१५५, ८५, १९८
$$$$$
आज सोलापूरच्या या लढाऊ भूमिवर, भारतीय दलित पँन्थरच्या दृष्ट लागेल, अशा विशाल अधिवेशानामध्ये
सहभागी झालेल्या तमाम पँथर्स कार्यकर्ते, बंधुभगिनी, मित्र आणि चाहतेमंडळी या सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि जयभिम
।
दलित पँन्थरच्या उदयाला आता १७ वर्षे पूर्ण होत आहेत. या सतरा वर्षामध्ये दलित पँन्थरची दोन राज्यव्यापी
अधिवेशने झाली. पहिले नागपूर मुक्कामी १९७४ साली झाले. तर दूसरे १९८४ साली शिवाजीपार्क , मुंबई येथे झाले. या
दोन्ही अधिवेशनांना जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला होता. आणि १९८९ च्या जून महिन्यात सोलापूरच्या भुमिवर
भारतीय दलित पँन्थरचे हे तिसरे राज्यव्यापी अधिवेशन भारतीय दलित पँन्थरच्या लोकप्रियतेचा उच्चांक गाठणार आहे.
भारतीय दलित पँन्थर ही प्रामुख्याने कार्यकर्त्यांची संघटना आहे. / संच आहे. रिपब्लिकनांच्या दुहीच्या
राजकारणामुळे सारा दलित समाज नैराश्यग्रस्त झाला होता. व तरुणपिढी खच्ची होऊन निष्क्रिय झाली होती. परंतु दलित
पँन्थरच्या उदयाबरोबर तरुण पिढीमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आणि दलित पँन्थरच्या ध्वजाखाली हजारो, लाखो
कार्यकर्त्यांनी एक दमदार, कसदार पिढीच तयार झाली. आणि आंबेडकरी चळवळीच्या स्थायी पुन्हा जोमाने वाटचाल सुरू
झाली. आज महाराष्ट्रामध्येच नव्हे तर गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक तामिळनाडू इत्यादी राज्यात आंबेडकरी चळवळीचा व
विचारधनाचा ध्वज फडकत ठेवण्याचे जे महान कार्य चालू आहे, त्याचे सारे श्रेय त्यागपूर्वक आणि निष्ठेने कार्य करणाऱ्या
हजारो पँन्थर कार्यकर्त्यांना आहे. म्हणूनच भारतीय दलित पँन्थर ही आंबेडकरी चळवळीचा मानबिंदू ठरलेली आहे.
मित्रहों, भारतीय दलित पँन्थरचे हे तिसरे राज्यव्यापी अधिवेशन आपण मोठ्या उत्साहात साजरे करीत आहोत.
परंतु आनंदोत्सव साजरा करणे किं वा शक्ती प्रदर्शन करणे हे भा.द. पँ.चे उद्दीष्ट नाही. कारण देशामध्ये व महाराष्ट्रात काही
गंभीर गोष्टी घडत आहेत, घडविल्या जात आहेत. त्याबद्दल तिचाच गंभीर विचार विनिमय करण्यासाठी व कांही भरीव निर्माण
आणि लढ्याची योग्य 'दिशा' आखण्यासाठी आमच्या अधिनेशनाचे प्रयोजन के ले आहे.
166
आज देशाचे आणि पर्यायाने महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण अत्यंत गढू ळ झालेले आहे.
धर्मांध- जातीवादी प्रवृत्तीनी आक्रमक स्वरूप धारण के लेले असून राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी धर्माधतेचा आधार
घेतला आहे. आणि धर्मां-धर्मांमध्ये,
$$$$$
जाती- जातीमध्ये द्वेशाच्या भिंतीउभारायला सुरुवात के ली आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षताच नव्हेतर राष्ट्रीय एकात्मता व
लोकशाही धोक्यात आलेली आहे. आपल्या महाराष्ट्रात या धर्मांध प्रवृत्ती बेगुमान, बेमुर्वतखोर आणि बेलगाम झालेल्या
आहेत. आणि महाराष्ट्राचे काँग्रेस शासन चा प्रवृत्तींना वठणीवर आणण्यासाठी अपयशी ठरत आहे.
“हिंदुत्व” आणि “हिंदुस्थान” या पुकारा करून या धर्मांध प्रवृत्तींनी भारतीय लोकशाहीचा गळा घोटण्याचा
जोरदार प्रयत्न चालविला आहे. ज्या छत्रपती शिवरायांनी सर्व धर्मियांना आणि जातींना समान लेखून महाराष्ट्रात रयतेची व
स्वातंत्र्याची ज्योतप्रज्वलीत के ली त्यात शिवरायांचे नाव घेऊन शिवसेनेसारख्या संघटना धर्मांधतेचा नंगानाच घालीत
आहेत. अल्पसख्यांक मुस्लीमांविरुद्ध आणि दीन-दलित- विशेषत: आंबेडकरी बौद्ध जनतेविरुद्ध शिवसेना नेत्यांनी
जेहाद पुकारला आहे. आणि या जेहादला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे पाठिंबा
देत आहेत. म्हणूनच आज या समान प्रवृत्तींच्या नेत्यांमध्ये शैय्यासोबतीसाठी जोरदार तयारी चालली आहे.
काळ मोठा कठीण आला आहे. मित्रांनो पण काळ कितीही कठीण असो, शत्रू कितीही बलवान असो, दलित जनता
आता पूर्वीसारखी जोहार करणारी राहिली नाही. ती आता जागृत आणि डोळस झालेली आहे. आणि समतेच्या,
स्वातंत्र्याच्या व लोकशाहीच्या शत्रूंशी दोन हात करण्यासाठी ती आता सज्य झालेली आहे.
हा देश सर्वांचा आहे. हिंदूचा आहे, तसाच मुस्लिमांचा, बौद्धांचा, ख्रिश्चनांचा, शिखांचा, जैनांचा आणि पारशांचा
आहे. या सर्वोच्च एकात्मतेच्या सहकाऱ्यांनीच हा भारत देश आणि त्याचा इतिहास घडविला आहे.
आणि म्हणूनच या भारताचा “हिंदुस्तान” बनविण्याचे प्रयत्न आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही असा या
अधिवेशनात तर्फे धर्मांध प्रवृत्तींना आपण इशारा देणे आवश्यक आहे.
ही धर्माधतेची विषारी लाट थोपवून धरण्याची किं वा परतवून लावण्याची या देशाच्या शासनकर्त्यांची म्हणजेच
काँग्रेस शासनाची इच्छा नाही. कारण दिल्लीच्या कें द्र शासनामध्ये प्रत्यक्ष पेशवाईचीच स्थापना झालेली आहे. पहा, कें द्रीय
मंत्रीमंडळामधील एकू ण मंत्र्यांपैकी २५% मंत्री ब्राह्मण आहेत. राष्ट्रपती वेंकटरमण, उपराष्ट्पती शंकरलाल शर्मा, पंतप्रधान
गांधी, नरसिंहराव,के .सी.पंत, वसंत साठे इत्यादी १५ मंत्री ब्राह्मण आहेत. आणि त्यांच्या सोबतीला जवळ जवळ १२ मंत्री
लिंगायत मराठा नाही व ठाकू र या उच्च वर्ण मधील आहेत म्हणजे मंत्री मंडळांच्या निम्म्यापेक्षाही जास्त मंत्री ब्राह्मण व
उच्चवर्णीय आहेत. मग पेशवाईचे रूप धारण के लेल्या पेशवाई सरकारला धर्माधतेची किं वा हिंदुत्वाची लाट थोपविण्याची
इच्छा कशी आणि का बरे व्हावी
तिकडे कें द्रात पेशवाई तर इकडे महाराष्ट्रात मराठाशाही. तिकडे ब्राह्मण मंत्र्यांचा सुळसुळाट तर इकडे महाराष्ट्रात
मराठा मंत्र्यांची भरती. मंत्री मराठा असले तरी या मराठा मंत्र्यांनी महाराष्ट्रातील सामान्य, गरीब मराठा समाजाची घोर उपेक्षा
चालविली असून,
$$$$$
सधन मराठा शेतकरी आणि साखर कारखानादारांचे हितसंबंध जोपासण्यातच मराठा मंत्री धन्यता मानीत आहेत.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये चुकू न एखादा मुस्लिम मंत्री, एखादा दलित मंत्री, एखादा आदिवासी मंत्री, आहे, बौद्ध मंत्री मात्र
एकही नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात शरद पवारांनी बौद्धांना अस्पृश्य करून टाकले आहे. तर अशा या काँग्रेस राजवटीत
सांगण्याचा मुद्दा असा की, शिवसेनेचा बंदोबस्त करण्यासाठी शरद पवारांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री के ले गेले. परंतु “सहन के ले
जाणार नाही,” “कठोर कारवाई करू” अशा लुटुपुटू च्या धमक्या देण्यापलीकडे शरद पवारांनी कांहीच के ले नाही. आणि
हे असेच घडत राहिले तर या देशात अराजक माजून महाराष्ट्र आणि देशही रसातळाला जाणार आहे. म्हणून या धर्मांध,
जातीवादी प्रवृत्तींशी निर्णायक लढा देण्यासाठी भारतीय दलित पँन्थर सिद्ध आहे. हा लढा समतेचा आणि लोकशाहीच्या
प्रतिष्ठेचा असल्यामुळे पुरोगामी संघटनांनी पक्षांनी व विचारवंतांनी या लढ्यात साथ दिली तर त्यांचे हार्दिक स्वागत करू.
167
हे निवडणूक वर्ष आहे. असं म्हटलं जात आहे आणि निवडणुका जवळ आल्या म्हणजे काँग्रेस पक्षाला
दलितांबद्दलच्या प्रेमाचा पान्हा फु टतो असतो. राजीव गांधींनी दलितांच्या राखीव जागांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.
राखीव जागांचा अनुशेष (बॅकलॉग) ३ महिन्यात भरून काढण्याचा निर्णय घेतला. हे सारे निर्णय चांगले आहेत कांही अंशी
दलितांच्या हिताचे आहेत. परंतु हे निर्णय राजीव गांधींना ८५ सालीच घेता आले नसते काय ? नेमके निवडणुकांच्या वर्षातच
हे निर्णय घेऊन राजीव गांधींनी आपल्या हेतुंना स्वार्थाचा डाग लावून घेतला आहे. पंचायतराज आणण्याचे बिल
लोकसभेत संमत करण्यात आले. या बिलांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सर्व पक्षांनी स्वागत के ले आहे. परंतु डॉ. आंबेडकरांनी या
संदर्भात इशारा पूर्वीच दिला होता की, ग्राम-पातळीवर सत्ता आणि अधिकाराचे वाटप झाल्यास त्याचा फायदा उच्चवर्गीय
दलित घेणार आहेत त्यामुळे दलितांची निवडणूक व त्यांच्यावरील अन्याय अत्याचार वाढणार आहेत. म्हणून भारतीय दलित
पँन्थरचा पंचायत राज व्यवस्थेला विरोध आहे.
निवडणुका जवळ आल्यामुळे राजीव गांधींनी ज्या प्रकारे दलितांची धास्ती घेण्याचे नाटक चालविले आहे, त्याच
प्रकारे जनता दलाचे अध्यक्ष व्ही.पी. सिंग हेही नाटक करत आहेत. त्यांनी येत्या निवडणुकीमध्ये ६०% जागा दलितांना
देण्याचे जाहीर के ले आहे. तसेच बौद्धांच्या सवलती आणि मंडल अहवाल धोरण जाहीर के ले आहे. पण ही चक्क धूळफे क
आहे. व्ही.पी.सिंग हे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री असताना आणि कें द्रात अर्थमंत्रीपदी असताना त्यांनी दलित आणि
बौद्धांबद्दल सहानुभुतीचे दोन शब्द कधीच उच्चारल्याचेही ऐकिण्यात नाही. तसेच काँग्रेसमध्ये असताना मंडल अहवालाच्या
अंमलबजावणीचा आग्रह ते इंदिरा गांधी किं वा राजीव गांधींशी धरू शकले असते. परंतु त्यावेळी त्यांना तसं शहाणपण पण
सुचलं नाही. आणि आता आपल्या पंतप्रधानांना नक्कीच लालसेला मूर्तस्वरूप देण्यासाठी दलिताभोवती आपले राजकारण
पसरविण्याचा त्यांनी प्रयत्न चालविला आहे. परंतु दलित जनता आता दुधखुळी राहिली नाही. ती असली नाटकं
करणाऱ्यांना तोंडघशी पाडल्याशिवाय राहणार नाही.
$$$$$
सत्ताधारी काँग्रेस असो की जनता दलासारखे पक्ष असो, या सर्वांना दलितांच्या, मागासवर्गीयांच्या, भटक्या-
विमुक्तांच्या, आदिवासींच्या मूलभूत दुखण्याशी काही सोयर सुतक नाही. त्यांनी फक्त सवलतींची गाजरे दाखवून दलितांची
पिळवणूक के लेली आहे. परंतु सवलती दिसल्या म्हणजे दलित मागासवर्गीय आदिवासी त्यांचे सर्व प्रश्न सुटले या भ्रमात
आम्ही राहू इच्छित नाही. दलित मागासवर्गीय आदिवासी भटके विमुक्त आणि तसाच गोरगरिबांची समस्या खऱ्या अर्थाने
सोडवण्याची इच्छा असेल आणि भारताला समता- स्वातंत्र्य- बंधुता आणि न्याय यावर आधारलेले खरेखुरे लोकशाही राष्ट्र
म्हणून जगात गौरवून घ्यायचे असेल तर इथल्या समाज व्यवस्थेत परिवर्तन घडवून आले पाहिजे. जाती जातीमध्ये
असलेल्या हजारो भिंती हजारो वर्षांपासून अभेक्षपणे उभे आहेत. आणि या देशाची अप्रतिष्ठा करीत आहेत. त्या सर्व भिंती
जमीनदोस्त के ल्याशिवाय हा देश खऱ्या अर्थाने कधीही सुखी आणि समृद्ध होणार नाही.
आर्थिक परिवर्तनासाठी आर्थिक प्रगतीचा ओघ तळागाळातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. त्याकरीता व
निधीचे राष्ट्रीयीकरण करून भूमिहीन शेतमजूरामध्ये त्यांचे वाटप के ले पाहिजे. ग्रामीण भागात उद्योगधंदे उभारून त्यामध्ये
स्थानिक ग्रामीण बेकारांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत. सरकारी उद्योगधंद्यांप्रमाणे सर्व खाजगी कारखान्यांमध्ये दलित-
मागासवर्गीय भटके -विमुक्त आणि आदिवासी त्यांच्या भटके वियुक्त, आदिवासी त्यांच्या आर्थिक स्तरात वेगाने सुधारणा
व्हावी म्हणून त्यांना स्वतःचे उद्योग धंदे काढण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांना बिनव्याजी कर्ज देण्यात यावीत. या सर्व
उपाययोजना त्वरित अंमलात आणल्यास तळागाळात खितपत पडलेला कोट्यवधींचा वनसमुह आर्थिक दृष्टीने उर्जित
अवस्थेला देणार आहे.
पण मित्रहो हे सारे परिवर्तन, या सार्या उपयोजना आपल्यासाठी कोणी करील त्याची शाश्वती नाही. आता
आपल्याला इथली जीर्ण झालेली समाज व्यवस्था तोडण्यासाठी, सर्वांना परिवर्तन घडवून आणण्यासाठी या परिवर्तनाची सूत्रे
आता आपणच आपल्या हाती घेतली पाहिजेत. दलित-बौद्ध-भटके -विमुक्त आदिवासी आणि इतर मागासवर्गीय मिळून आपण
या देशाची ८०% जनता आहोत. आणि या देशाची सत्ता उपभोगण्याचा आपल्या शिवाय कोणाला नैतिक अधिकार नाही.
म्हणून सर्वकश परिवर्तनासाठी आपणा सर्वांच्या उन्नतीसाठी आणि देशाच्या भल्यासाठी आता सर्वांनी एकत्र आलेच पाहिजे
ही काळाची गरज आहे. सर्वकश परिवर्तन घडवून आणण्यासाठी सत्ता परिवर्तन घडणे आवश्यक आहे. आणि सत्ता परिवर्तन
घडवून आणण्यासाठी संसदीय वर्ग अवलंबून निवडणुकींच्या रिंगणात उतरलेच पाहिजे. म्हणून येत्या सार्वत्रिक
168
निवडणुकांच्या लढाईत सहभागी होण्याचा निर्णय आता आम्ही घेतलेला आहे. भारतीय दलित पँन्थर निवडणुका लढविणार
आहेत. आम्हांला याची पूर्ण जाणीव आहे. की सर्वकश सत्तापरिवर्तन घडवून आणणे इतके सामर्थ्य सुद्धा आमच्या पाशी
नाहीय परंतु सत्ता परिवर्तन घडवून आणण्याइतकं सामर्थ्य सध्या आमच्यापाशी नाहीय. परंतु सत्तापरिवर्तन घडवून
आणण्याची सुरुवात म्हणून सर्वांच्या नजरेत भरेल एवढे यश मात्र येत्या निवडणुकीत आम्ही निश्चित मिळवू असा आमचा
आत्मविश्वास आहे.
$$$$$
या निवडणुका लढविण्यासाठी आम्ही दलित, मागासवर्गीय, भटके विमुक्त, आदिवासी आणि समविचारी संघटनांची
आघाडी उभारू. आणि इतर पुरोगामी पथांनी सहकार्याची तयारी दर्शविली तर त्याचेंही सहकार्य घेऊ. परंतु शिवसेना व
भारतीय जनता पक्षासारख्या जातीवादी, प्रतीवादी पक्षांशी कोणत्याही पातळीवर सहकार्याची बोलणी होणार नाहीत.
भारतीय दलित पँन्थरचे स्वरूप आता १९७२ सालामधील पँन्थरपेक्षा वेगळे आणि भारदस्त झालेले आहे. आता
मराठा तरुण देखील पँन्थरकडे आकर्षित होऊ लागला आहे. तसेच मातंग, चर्मकारांसारखे अनुसूचित जाती-जमातीमधील
लोक, मागासवर्गीय समाज, भटक्या विमुक्त जाती, आदिवासी आणि मुस्लीम समाजाला सर्व जाती धर्मामधील माणसे
पँन्थरच्या वेगवान प्रवाहात सामील होऊ लागले आहेत. आम्हाला विश्वास आहे की इथल्या व्यवस्थेत अपेक्षित ठेवलेल्या,
इथल्या व्यवस्थेने पिळवणूक के लेल्या आणि पायाखाली तुडवलेल्या तळागाळातील सर्व जनसमुह आम्ही संघटित करू आणि
समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय व्यवस्थेवर आधारित खऱ्याखुऱ्या लोकशाही भारताच्या उभारणीला सुरुवात करू.
जयभिम जयभारत
$$$$$
दलित पैंथर उस युवा दलित शक्ति का नाम है जो “मान-अप मान, सफलता-असफलता की बगैर परवाह किये,
जिनमें अपना जन्म हुआ, उनकी मुक्ति तक संघर्ष करना अपना कर्तव्य समझती है।"
169
दलित पैंथर क्या है ?
दलित पैंथर एक अम्बेडकरवादी मिलिटेंट युवा संगठन है जो राजनीति के पचड़े में न पड़कर विशुद्ध सांस्कृ तिक एवं
सामाजिक आधार पर युगों से प्रताड़ित, दलित, उत्पीड़ित एवं उपेक्षित समाज में से हीनता की भावना को कु चलकर उसे
अपने अधिकारों की रक्षा करने एवं इंसानियत का जीवन जीने के लिए एक प्रचंड शक्ति के रूप में एकत्रित एवं संगठित करना
चाहता है।
दलित पैंथर का विश्वास है कि दलित समाज के तथा कथित उद्धार के लिए सरकार एवं विभिन्न दलों, संगठनों की
ओर से किए गये प्रयत्न न सिर्फ दिखावा रहे हैं बल्कि उनके शोषण का कारण भी बने हैं। आज स्थिति यह है कि बहरी-गूंगी
बनी संसद एवं सरकार तक उनकी चीत्कार सुनाई भी नहीं देती। दलित किशोरों का जिंदा जला देना, दलित महिलाओं को
नंगा कर सलाखों से दागना, दलित युवतियों का बंदूकों की नोंक पर अपहरण कर उनका सार्वजनिक नीलाम कराना आदि
रोजाना की क्रू रताएँ इसका सबूत हैं। इन परिस्थितियों में उत्पीड़न का प्रतिकार करने का फै सला दलित पँन्थर एक विशुद्ध
मानवतावादी कदम ही मानता है।
दलित पैंथर को जन्म दिया महाराष्ट्र के उन युवा मराठी साहित्यकारों ने जिनके मन में दलितों के शोषण एवं
उत्पीड़न के खिलाफ शोले भड़क उठे थे। इन साहित्य कारों ने अपने आक्रोश को न के वल शब्दों में अभिव्यक्ति दी बल्कि
उसे कार्यरूप में परिणित करना प्रारम्भ कर दिया। अमेरिकी नीग्रो आंदोलन 'ब्लैक पैंथर इनका प्रेरणा स्रोत बना । संघर्ष के
लम्बे दौर ने इस आंदोलन को निखार दिया। फलस्वरूप आज सम्पूर्ण देश का दलित समाज इस
$$$$$
आंदोलन को एकमात्र आशा के रूप में देख रहा है। महाराष्ट्र के बाद आंदोलन चलाने का बीड़ा गुजरात ने उठाया । आज
गुजरात का शान्तिप्रिय दलित युवा 'पददलित समाज के नाम पर खून बहे तो बहने दो !' की गर्जना कर रहा है। गुजरात के
अलावा तमिल नाडु , कर्नाटक तथा आंध्रप्रदेश में भी दलित पँन्थर आंदोलन जड़े जमा रहा है।
अब दिल्ली की बारी
और अब इस आंदोलन ने राजधानी दिल्ली के दरवाजे पर दस्तक दी है। क्या दिल्ली की दलित युवा शक्ति इस
चुनौति से मुंह मोड़ सकती है ? दिल्ली को तो भविष्य में इस आंदोलन की धुरी बनना है और प्रशा है कि यहाँ का नौजवान
अपने कर्तव्य से पूरी तरह जागरूक है। उत्तर प्रदेश एवं पंजाब में भी चिनगारियां भड़क रही हैं, दिल्ली कार्यालय में प्राप्त डाक
इसकी गवाह है।
आव्हान!
दलित पैंथर, दलित समाज के सभी दलों के नेताओं, सरकारी अधिकारियों एवं कर्मचारियों, बुद्धिजीवियों डाक्टर,
प्राध्यापक, वकील, लेखक एवं कवियों, कलाकारों, श्रमिकों, व्यापारियों एवं सबसे अधिक छात्रों को इस अनवरत संघर्ष में
प्रत्यक्ष या परोक्ष रूप से कू द पड़ने का निमंत्रण देता है। दलित पैंथर का विश्वास है कि भारत में जब भी कभी 'समग्र क्रान्ति'
होगी वह दलित वर्ग के हाथों ही सम्पन्न होगी ।
170
दलित पँन्थर डॉ. बाबा साहेब अम्बेडकर को दलित समाज का एकमात्र मुक्तिदाता मानता है। उसका विश्वास है कि
भविष्य में भी उनका दर्शन ही इस समाज का सच्चा पथ-प्रदर्शक होगा ।
रिपब्लिकन पार्टी के नेताओं द्वारा जनता से किया गया विश्वासघात एवं इसकी रोजाना बनती-बिगड़ती शाखाओं से
पैंथर के नेताओं के मन में उत्पन्न आक्रोश में भी अपनत्व का भाव ही छिपा है । कम्युनिस्ट पार्टियां या अन्य कोई दल उसे
अपने लक्ष्य से डिगा नहीं सकते।
$$$$$
समाज से अपेक्षाएं
$$$$$
171
पैंथर साथियो ।
आज के इतिहासिक अवसर पर, मैं सर्वप्रथम मराठवाडा आन्दोलन के उन सभी शहीदो की स्मृति को
अभिवादन करता हूँ जिन्होंने अपने बलिदान से समता, न्याय बन्धुता की प्रचित के लिये सम्पूर्ण भारत के दलितों ने चेतना
जगाई ।
दबेगी कब तलक आवाज, आज हम भी देखेंगे।
सरे बाज़ार देखेंगे, पूरे भारत में देखेंगे ।
भारत में करोडों दलितों की आवाज को योजनाबद्ध तरीकों से उच्चवर्गीय और उच्चवर्गीय अल्पसंख्या को दबा दी
है । दलित जनता शोषण और अत्याचारों की परंपरा से इतनी दब गई हैं कि इन कमनीब लोगों को अपनी मुक्ति की कल्पना
आना भी अस्वाभाविक लगता हैं । हम क्या करें यह तो हमारे भाग्य में लिखा हैं ऐसी कायरता उनके दिलो-दिमाग में घर
कर गई है। एक ऐसी जड जकडन पैदा हो गई थी जहा विद्रोह की संभावना ही नहीं थी। दलित जनता का मन पूरा पूरा
पराजित हो गया था । इन शोषित पीडित, पंगु, मूक समुदाय को अपने एक मसीहा की जरूरत थी। डा० बाबासाहिब
आबेंडकर के रूप में दलितों को अपना मसीहा मिला । जिस मसीहा ने “मूकनायक" की अपनी भूमिका पूरी ताकत और
निष्ठा से निभाई। और “दयापात्रता नहीं,” आत्मसन्मान भरा व्यक्तित्व" देश के पद दलितों को दिलवाने का संघर्ष किया ।
आज इस प्रसंग पर आप सभी साथियों को मैं उस महामानव के अमर उद्गारों को पेश करना चाहता हू । जिंदगी के
अतिंम दिनों से उन्होंने दलित जनता को संदेश दिया था कि, “मैंने तुम्हारे लिये जो कु छ भी किया है वह बहेद मुसिबतों,
अंत्त दु:खो और बेशुमार विरोधियों मुकाबला करके किया हैं । यह दलितों का कारवा आज जहा हैं वहासे सदा आगे ही
बढ़ता रहना चाहिये, बेशक कितनी ही रुकावटे क्यों न आयें। यदि मेरे अनुयायी बले आगे न बढ़ा सकें तो कोई हर्ज नही हैं
इसे यही छोड़ दें पर किसी भी हालत में उसे पीछे धके ल देने का कार्य कभी न करे। "
दबी हुई आवाज को बुलंद करने और कारवा को आगे ले जाने के लिये जिम्मेदारी हम पर सोपी गई हैं. उसे पुरी
करने का संकल्प करने के लिये देश भर के दलित युवाओं के प्रतिनिधि यहां मौजूद हैं। मैं विश्वास के साथ हमारे सभी
साथीयों कि इच्छा को व्यक्त करता हु कि हमारा कारवा अब रुकने वाला नही हैं। जब तक गैर बराबरी, गैरइन्साफी और
शोषण
$$$$$
चलता रहेगा, हमारा संघर्ष भी तब तक चलता रहेगा । दुनिया की कोई भी ताकत हमें रोक नही सकती । दलितों ने पैदा
हुई चेतना विराट अग्निका रूप लेगी और शोषणमुक्ति की मंजिल को पा कर पूर्ण होगी। यह विराट् आंदोलन शोषण के सभी
द्वारों को बंद करेगा। दलितों में उभरी हुई शक्ति को अब नजर अंदाज नहीं किया जायेगा।
में इस विषय में कु छ इसके पहले फिर से दोहराना चाहता हूँ कि दुनिया में शोषण की परंपराओ का अंत होने वाला
हैं। युग की भी यही माँग है। वर्णीवहीन, वर्गीवहीन समाज की स्थापना के रास्तें में जो भी स्थापितहीत आयेंगी उनका
उन्मूलन होने वाला है । सूर्य प्रकाश जितना सत्य है उतना ही यह सत्य है और इस महान युग को पूरा करने के लिये
सफलता-असफलता, मान-अपमान, विजय-पराजय की परवाह किये बगैर आप सब अपना योगदान यहा देने के लिये
उपस्थित हुये हैं। यह बहुत ही आनंद की बात हैं। मैं सब से पहले आप सब का अभिनंदन करता हूँ ।
दलितों के दुःखों की कहानी बहुत लंबी है। महाराष्ट्र की युवा पीढी ने इन थोपे गये दुःखों के प्रति अपना आक्रोश
अपने लेखन से प्रकट करने का प्रयत्न किया भद्रवर्गीय साहित्यकार दलित युवकों की नवरचना की साहित्य मानने को भी
तैयार नहीं थे पर इन युवाओं की रचनाओं में मानवीय दु:खो वेदना और अकथित यातनाओं की अनुभूति थी और उस
अनुभूति को शब्दों में ढाल कर जो रचनायें तैयार हुई उसने एक और तो दलितेतर साहित्यकारो रुढिवादियों जातिवादियों को
परम्परागतिओं को भड्काया तो दूसरी और उन तमाम शोषितों को अपनी जबान दी जिससे अपने दु:खो की समसंवेदना का
अनुभव भी ।
आजदलित साहित्य चर्चा का विषय है। जिन नवशिक्षित आंबेडकरवादी युवकों में साहित्य में दलितलाहित्य को
प्रतिष्ठित किया वह युवकों ने अपनी वेदनाओं को विचार के क्षेत्र से आचार के क्षेत्र में भी परीवतीत किया और नई हलचल पूरे
172
समाज को झकझोर गई जिसे आज दलित पैथर के नाम से पुकारा जाता है। दलित साहित्य और दलित पैथर हमारे रथ के
दो चक्र और आचार के माध्यम में दलित पैथर । विचार और आचार दोनो का जोड क्रांति की दिशा का कदम होगा । मैं
अत्यंत आनंद के साथ यह घोषणा करना चाहता हूँ कि विचार और कर्म की निष्ठा हमारे साथीयों में है । और यह कारण है कि
बम्बई में पैदा हुई चिंगारी पूरे महाराष्ट्र को ही नही अब पूरे भारत में व्याप्त होने जा रहा है। दलित साहित्य और दलित पैंथर
सीमाओं में बध नहीं सकते । देश की दलित युवा पीढि दलित पैंथर में अपनी मुक्ती का पयगाम सुनते है । डा० बाबासाहब
आंबेडकर ने अपने पूरे जीवन काल में दिन रात मेहनत करते करते जो कारवा चलाया उसी विचार को आगे बढ़ाने का
संकल्प हमारा है।
उन्होने कहा था, "हमारा संघर्ष सिर्फ धन या शक्ति की प्राप्ति के लिये ही नहीं है यह मुक्ति का आन्दोलन है।
स्वतंत्रता का संघर्ष है , हमारा संघर्ष मानव व्यक्तित्व को पूर्वजीवीत करने का संघर्ष है । और में फखर के साथ कहना चाहता
हूँ कि मानव व्यक्तित्व प्राप्त करने की लडाई से हम अलग नहीं होते। महाराष्ट्र से उटी आवाज को आज गुजरात प्रतिधोषित
करता
$$$$$
है उसी आवाज को उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, आन्ध्र प्रदेश, हरियाणा, पंजाब और दिल्ली और बिहार के
युवकों में प्रतिधोषित किया है। जानेवाले दिनों में पूरे भारत में यही आवाज गुंजने वाली है।
दलित पैंथर के बारे में बहुत सी भ्रमणाये और गलत फहमियो लोगों के मन में है। कु छ ऐसी है जिस का कोई
वास्तविक आधार नहीं है। और कु छ ऐसी है जो कि जानबुझ कर फहलाई गई है। इसके इतिहास में अभी उतरना नहीं चाहता।
कु छ मोटी भोटी बातों का सिर्फ जिक्र कर देता हूँ ताकी समाधान हो सके ।
एक बात यह उठाई जाती है कि दलित पैंथर को हिंसा में विश्वास है। प्रतिकार कभी भी हिंसा नहीं है। हम तो कहते
हैं कि हमारा हरकदम हम पर होने वाले अत्याचार तय करे। जो कु छ भी निर्णय करना है। वह शोषकों को करना है। जो कि
जब तक शोषण रहेगा धरती पर तूफान भी उठेगा । हमारी कतई जिम्मेदारी उसमें नहीं है ।
अमरिका के रंगभेद की यातना से वस्त्र निग्रो युवकोने "ब्लेकपैंथर" के माध्यम से बंदूक का सहारा लेकर अपनी
वेदनाओं को व्याख्या दी । वहा की धरती में जो चाहिए वही उन्होने किया । तीन करोड अवैध्य बंदुके अमेरीका में भी है और
अभी हर साल ढाई लाख बंदूके रवानगी लोगों के हाथ में जाती है। तो हिंसा होगी ही। वहा का माहोल ही कु छ ऐसा है कि
हिंसा पनपे लेकिन हमारा नाता नीग्रो की वेदनाओं से है उनके तरीकों से नहीं ।
हम डा० बाबा साहब आंबेडकर के अनुयायी है । संसदीय लोकतंत्र में हमारा विश्वास है । इस लिए इतिहास में
हमारा विश्वास होना ना मुमकिन है । सरकार और पुजीपतीयों की जन संगठित कायर क्रू रता का प्रतिकार कभी भी हिंसा
नहीं है। जन जाग्रति के माध्यम से ही ही उस हिंसा का प्रयत्युत्तर दिया जा सकता हैं | हमारी और से हिंसा का आधी
कभी नहीं लिया जायेगा। ऐसी स्पष्ट घोषणा हम यहा कर देना चाहते है ।
"दलित "शब्द के बारे में भी कु छ कहना अप्रासंगिक नहीं होगा । हमारी संगठना मूल सूत्र धार अनुसुचित जाति,
जनजाति, बौध्द और अल्पसंख्यक जातिओ से आयें हैं और इनके दुख भी विशेष प्रकार के हैं ही उसको स्फू ट करना ही
प्रगतशीलता है लेकिन प्रारंभिक नेतृत्व के आधार पर यह संगठन को विशेष जातियों का संगठन कहने वाले लोग जातिवादी
मानसिकता के शिकार है । दलितों के उत्थान में उन्हें विश्वास नहीं है। और दलितों की प्रगति को जो देखना नहीं चाहते वही
लोग दलित पैंथर को जातिवादी संगठन कहते हैं। इस संगठन के द्वार उन सभी लोगों के लिये खुले है। जिन की श्रध्दा,
वर्णविहीन, वर्ग विहीन समाज रचना के पक्ष में है। आर्थिक, सामाजिक राजनैतिक उत्पीडन के शिकार सभी को इस संगठन
का खुला निमन्त्रण है। भारतीय समाज में अनुसुचित जातियों अनुसूचित जनजातियों अल्पसंख्यक लोगों के दुःख के प्रति
ज्यादा ध्यान के न्द्रीत करना स्वाभाविक है। लेकिन इस बात में शंका की गुंजाइश नहीं रहनी चाहिए । कि यह संगठन है और
हमने अपने कर्मो से यह बिलकु ल साबित भी कर दिया है ।
इस जातिवादी मानस को नफरत करते हैं। जाति वाद के सबसे बडे दुश्मन हैं । राजनैतिक और सामाजिक संगठन
जो जाति वाद की पोषण देते हैं वे भी हमारे दुश्मन है।
$$$$$
173
जहा कहा भी जातिवाद को प्रोत्साहित किया जायेगा । वहा अपनी पूरी ताकत से मुकाबला करेगे ही । क्यो की जातिवादी
मानसिकता के शिकार दलित लोग हुए हैं। आर्थिक और सामाजिक, राजनैतिक शोषण की बुनियाद जातिवादी मानस है ।
और इसलिए हमारी लड़ाई भी उससे हैं।
हम यह चाहते हैं कि शोषण का मुकाबला हर स्तर पर हो और तमाम शोषतों के सामुहिक पुरुषार्थ के बगैर दलित
मुक्ति संभव नहीं है। हमारी हर संभव कोशिश यह होगी कि वर्ण विहीन, वर्गविहीन समाज का सपना साकार करने के लिए जो
लोग उत्सुक है वे सभी एक जुट हो भारत भी नहीं भारत के बाहर के शोषितों के प्रति हमारा यही रवैया रहेगा ।
हम संसदीय लोकतंत्र में विश्वास करते हैं लेकिन अभी भारत में जो कु छ संसदिय लोकतंत्र के नाम पर चल रहा
है उसमें हमें श्रद्धा नहीं हो यह तो पूंजीपतियों और जातिवादियों के हित में चलने वाली व्यवस्था है । इस प्रकार के लोकतंत्र
के रहते शोषण खत्म नहीं होगा हमें ऐसे उपयो को खोलना है जिससे उच्चवर्गीय मुखर वर्ग की चालाकी और बदनीयती ढाल
जाय । मताधिकार के शस्त्र का ठीक से उपयोग हो । यह जनजागरण सह ही संभव है। हमारा तत्वज्ञान उदार रहेगा लेकिन
कार्यक्रम उग्र होगे । समाधान की कोई गुंजाइश इसमें नहीं है । उग्रतम कार्यक्रमकों के रूप द्वारा आम लोगों की अपनी शक्ति
का एहसास लिये कहा है। दलित पैंथर की युवा यह कार्य तीव्रता से करेगी ।
हम यह भी मानते है जब तक परंपरागत पूंजीवादी जातिवादी ढांचा बरकरार रहता है तब तक आर्थिक, सामाजिक
और राजनैतिक शोषण खत्म नहीं होगा, हम उस ढाचे को तोड़ देने का प्रयत्न करेंगे । वर्ग समन्वय मेलझोल, पूल, प्रवाह,
शांति, हृदय परिवर्तन, जैसे शब्दों में हमें विश्वास नहीं है, यह षडयन्त्र का भाग है । और शक्ति को गलत मार्ग पर ले जाने
का प्रयास है । हम संकल्प करते है कि जब तक शोषण के प्रवाह को नहीं तोड़ा जायेगा तब तक हमारा चलेगा. रुकजाना
और झूकजाना हमारा स्वभाव नहीं है। हम ऐसे आत्मधाती कदम से हमेशा समान रहेंगे ।
हमारी लड़ाई किसी व्यक्ति से नहीं है, हमारीनफरत भी किसी व्यक्ति से नहीं है हमारी लड़ाई परम्परागत,
रूढ़िवादी, मानस, देववाद और गैरबराबरी और गैर इन्साफीसे हैं।
हम स्पष्ट रूप से मानते हैं कि सामाजिक क्राति के वीनाआर्थिक और राजनैतिक परिवर्तन संभव नहीं है। भारत
की मौजूदा हालत में यही एक मात्र उपाय है । जगविख्यात इतिहासकार आर्नोल्ड टोयन्बी ने भी सही कहा है कि
$$$$$
174
जब नकसलवाद की बात उठी है तो यह देना चाहता हूँ कि नकसली युवकों के साहस और निष्ठाकी हम कद्र करते
हैं लेकिन उनकी दिशा गलत हैं। नक्सल वाद अमीरों के विरुद्ध गरीबी की लड़ाई है ऐसी आम धारणा बनी है। वास्तव में यह
संघर्ष अस्पृश्य और आदिवासीयों के बीच में करवाया गया है जो कि दोनों दलित जातिया है। नक्सलवादी लपी अस्पृश्य
विस्तार में खेली करते हैं और यदि वाली लाग और खान में काम करते हैं । भूख के नाम पर आदिवासी यों भडकाकर
अस्पृश्यों पर हमले को अपर करवाये गये। इस प्रकार यह लडाई चलाई गयी। हिंसा का सहारा लिया गया। प्रदेश के
प्रति अपनी निष्ठा व्यक्त की गई । इसलिये वह आंदोलन मृतप्राय हो गया। सरकारी संघटित हिंसा का जवाब जन आंदोलन है
-छुटपूट हिंसा नहीं ।
मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश में अनुसूचित जातियों पर कई प्रकार के जुल्म होते रहते हैं। संसद भवन में से जो
निवेदन होता है वह आघा तो झूठा होता है और आघा बिगाड़ा हुआ होता है। हर क्षण अपमानित होना दलित जातियों के
लिए जातिवादी और पुंजवादियों ने प्रोप दिया है। पंजाब, हरियाणा, बंगाली, के रल, आन्ध्रा, कर्नाटका राष्ट्र, गुजरात,
राजस्तान की प्रदेशों में अत्याचारों का चक्र चलता रहता है, कभी कभी कोई सीमा के बाहर बात हो जाती है तब यह
अखबारों में छपती है। दो दिन के बाद उसे भगा दिया जाता है और माना जाता की कमनीयों की नीयती है। अनुसूचित जाति
और जनजाति के कमिशनरों की रपेटों के
$$$$$
बारे में कु छ लिखाना अच्छा नहीं लगता क्यों कि जो कु छ भी लिखा जाता है वह समुद्र में बुंद समान है।
अनुसूचित जाति और जन जाति के लोगों के साथ जो अत्याचार होतें हैं उसे से कई गुनें अत्याचार उनकी
महिलाओं के साथ होते हैं। बलात्कार तो बहुत ही सामान्य जात हैं।
आगरा में डा० बाबा साहब आम्बेडकर के जन्म दिन पर दो साल पहले जो आक्रमण हुआ यह हिन्दू मानसिकता
का सबसे बड़ा कलंक है। मराठवाड़ा में डा० बाबासाहेब अम्बेडकर का नाम मराठवाडा विश्वविद्यालय के साथ जोड़ने के लिए
अत्याचारो का जो सिलसिला चला और सारे महाराष्ट्र में योजनाबद्ध रीति से दलितों का शिकार बनाया गया उसे दुनिया के
कोई भी सभ्यजमन में साफ नहीं किया जा सकता। लोकतन्त्र और आजादी की बात करने वालों के नाम शंका करना
स्वाभाविक हैं ।
जैसा अत्याचार अस्पृश्यों और आदिवासीयों पर होता है ऐसा ही संगठित अत्याचार मुसमानों पर होना शुरू हो
गया है। अहमदाबाद नीपडी, नारायण पुरा जैसे कांडों की भी कमी नहीं है।
अभी हाल में बिहार में खिस्ती पहारीयो को भी परेशान किया जा रहा हैं ।
आरक्षण के नाम पर आने वाले दिनों में अत्याचार बढ़ने वाले हैं यह माहौल को देखते हुए तय हैं।
मैं अपनी बात पूरी करने से पहले देहली वासीयों और विशेष कर श्री बापुराव जी पखिड्डे और पैंथर के साथियों को
धन्यावाद दिये बिना नहीं रह सकता ।
महाराष्ट्र के हमारे लडाकू नेता श्री रामदास, श्री गंगाधर गाडे, उमाकांत रणधीर, दयानन्द मस्के , नाना रहाटे,
आर.एम. पाटील, विठ्ठलराव साठे, श्री. एस. एम. प्रधान, प्रितम कु मार शेगावकर, श्री. वामन निंबाळकर, श्री अरुण
कांवले और दूसरे कितने कितने नामी अनामी साथियों को याद करू । मध्यप्रदेश में श्री. डी. कु मार, पंजाब में श्री एस.एल.
विरदी, उत्तरप्रदेश में श्री उत्तर सिंह आनंद और राहुलन अम्बावडेकर जी, राजस्थान में वी. पी. लाहरी, हरियाणा के भीम
सिंह इन्दोरा, गुजरात के श्री नारायण वोरा और वालजी भाई पटेल, ईश्वर के , मधु परमार, मंगल तुरणकर बिहार के .
श्री. गोपाल दास, और रमेश ठाकु र, सभी साथियों को इस प्रसंग पर विशेष रूप से याद करता हूँ हमारी संगठना आठ साल
पुरानी है और अपनो बाल्यावस्था में उसने जो अपना शोहर मेरे साथियों की मेहनत के द्वारा बनाया है जब हमारी जवानी
आयेगी तो हम वादा करते हैं कि शोषण और प्रतिक्रिया के परास्त करके ही सास लंगे। हमारा नेतृत्व का नारा हैं-
उन्हीं को हम रहबरे काबिल समझते हैं । -
जो हस्ती को सफर और कब्र को मंझील समझते हैं ।।
और ऐसे नेतृत्व से हम ऐसी सुबहा लाना चाहते हैं मनहूस
मनहूस समाजी ढाचों में जब जुल्म ना पाते जायेंगे
175
जब हाथ न काटे जायेंगे, जब सर न उछाले जायेंगे
$$$$$
$$$$$
दिनांक २३/२४ फे ब्रु ८६ रोजी मोची समाज सुधार संघटनेच्या वतीने उल्हासनगर नं. १, जि.ठाणे येथे ‘मुक्ती
परिषद’ आयोजित. त्या परिषदेच्या एका परिसंवादात भाग घेण्यासाठी राहुलन उत्तर प्रदेशातून झालेले. उल्हासनगरला ज्या
ठिकाणी परिषद भरवली होती तेथून जवळच काही दिवसापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेकरांचा पुतळा समाजकं टकांनी फोडला
होता. तेथे भेट देवून वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी मोतीराज कष्टे, प्रा. अरूण कांबळे, विठ्ठल शिंदे आदी लोक गेले
176
होते. मुक्ती परिषदेच्या हॉलवर परतलो तेंव्हा ४:00 वाजत आले होते. जेवणावळ चालूच होती. स्टेजवर. रमेश इंगळे,
मनोहर अंकु श, काही स्थानिक कार्यकर्ते होते. त्यांच्यात एक अपरिचीत चेहरा, दाढीधारी त्यांची प्रा. अरुण कांबळ्यांनी
ओळख करून दिली. “हे राहुलन आंबावडेकर. उत्तर प्रदेशाच्या ‘ भा. द. पँन्थरचे प्रमुख. विठ्ठल शिंदेनी चहाला काढले.
'सनद'साठी मुलाखत घ्यावी असे ठरले. चहा पितापीता मुलाखत सुरु झाली. रमेश इंगळे, मनोहर अंकु श, प्रा. अरुण कांबळे
प्रश्न विचारीत, होते.
रमेश इंगळ्यांनी सुरवात के ली. ‘आपण पैंथरकडे काय पाहून आकर्षित झालात? भाषेचा प्रश्न असल्याने
मुलाखत हिंदीत चालू होती. भाषांतरीत करून लिहीत होतो. राहुलन बोलू लागले. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
महानिवार्णानंतर रिपब्लिकन पक्ष सर्व स्तरावर अयशस्वी झाला होता. दलित समाज नेतृत्वा अभावी सैरभैर भटकू लागला
होता. त्यांना दिशा देण्याचे काम भारतीय दलित पँन्थरने के ले. त्यांनी समाजाला पुन्हा मिलीटंट के ले.
'देशात इतरही अनेक ‘मिलीटटं’ संघटना अस्तित्वाला असतांना आपण पँन्थरकडे येण्याचे प्रयोजन ? मनोहर
अंकु श जी विचारताच ते म्हणाले’ आहेत ना देशात अनेक मिलीटंट संघटना परंतु डॉ. बाबासाहेब आबेडकरांची
विचारप्रणाली अंगीकारणारी ऐकमेव संघटना होती भारतीय दलित पँन्थर म्हणून मी पँन्थरकडे वळलो त्यात सर्व श्रेय आहे
मनोहर अंकु श यांना.
मनोहर अंकु श यांचेमुळेच उत्तरप्रदेशात भारतीय पँन्थरची स्थापना होवू शकली. ४-५ एप्रिल १९८० साली आम्ही
पहिले अधिवेशन कानपूर येथे घेतले त्यावेळी हा काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी राज्य स्तरावरील सर्व नेते मंडळी
उपस्थित होती हे आवर्जून सांगावेसे वाटते.
$$$$$
‘उत्तर प्रदेश हे राज्य गांधीवादाने भारावलेले असतांना आंबेडकरी विचारांचा प्रसार करायला बराच त्रास होत
असेल.’ प्रा. अरुण कांबळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना ते म्हणाले. तीथे दोनच चळवळी प्रभावी. एक जनसंघ
व दुसरी समता सैनिक दल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रत्येक चळवळ उत्तरप्रदेशात पोहचली आहे.
'ऑल-इंडिया शेड्यूल कास्ट फे डरेशनचे’ दुसरे अधिवेशन कानपुर शहरात झाले त्यामुळे आंबेडकरी विचार
अगदीच भिन्न आहेत असे नव्हते त्यामुळे हा विचार जनतेपर्यंत पोहचवायला म्हणावा असा त्रास झाला नाही.
बाबूजींची मात्र गंभीर परिस्थीती झाली आहे. जातीला निकटलेले लोकच तेवढे त्यांचे सोबत आहेत. बाबूजींना
दलित मुक्तीचा परिघ कांग्रेसी वर्तुळात दिसला पण काँग्रेसने दलित मुक्तीसाठी काय के ले? उत्तरशुन्य आहे. आजच्या
परिस्थीतीत दलित मुक्तीचा खरा रस्ता कु ठला असेल तर तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे.
आंबेडकरांचे धार्मिक अंग सांगाल काय या प्रश्नावर राहुलन म्हणाले ‘आम्ही संपूर्ण आंबेडकर विचारस्विकृ त के ला
आहे. त्यात धार्मिक अंगही आलेच. उत्तर प्रदेशात धर्म प्रसार करण्यासाठी अनेक धार्मिक संघटना जन्माला आल्या आहेत.
त्यापैकी महत्त्वाची संघटना म्हणजे 'बुद्धीस्ट स्टुडंट फे डरेशन', या संस्थेच्या वतीने आम्ही धर्म प्रचार आणि प्रसाराचे
कार्यक्रम राबवतो. यासंस्थेने धर्मांतराचे कार्यक्रमही घडवून आणलेत १९८४ साली आझमनगर येथे १०,००० लोकांना
बुद्ध धम्माची दिक्षा दिली.
मी स्वतः बुद्धीधमकडे इ.९वी पासुन आकर्षित झालो होतो. आमचेकडे शिक्षणाचा प्रसार कमी झालेला आहे.
रात्रशाळेत असतांना कन्हैयालाल नावाचे आम्हाला शिक्षक होते. ते शिकवायचे कमी आणि बाबासाहेब जास्त सांगायचे.
त्यांनी बाबासाहेबांचे जीवनचरीत्र मनावर बिंबवले. इयत्ता अकरावीत असतांना बाबासाहेबांचा पक्ष म्हणून स्विकारला होता.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन संघर्ष’ हे चंद्रिका प्रसाद जिज्ञासूंचे पुस्तक वाचनात आले. त्या पुस्तकातील
विचारांनी मी भारावून गेलो. नंतर संपूर्ण आंबेडकरी वाड्मय वाचून काढले. चंद्रिका प्रसाद जीज्ञासूंना डॉ. इक्लास लायब्ररीत
बाबासाहेबांवर व्याख्यान देतांना पाहिले. गांधी टोपी डोक्यात होती. परंतु गांधीवादी आढळले नाही. बाबासाहेबांवर बोलता
बोलता हे सद्गृहस्थ रडू लागत व इतरांनाही रडवीत. बाबासाहेबांवर अत्युत्कट प्रेम होते त्यांचे.
177
आज उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यात आमची युनिट्स काम करतात. जिथे आम्ही पोहचलो नव्हतो तीथेही काम
चालू आहे. एखाद्या ठिकाणी आम्ही युनिटस्थापण्यासाठी जातो तीथे ते युनिट आधीच काम करत असते. हे युनिटस
वाढायला एक घटना घडली; राहुलन सांगू लागले.
‘दि. २७ एप्रिल, १९८१. कानपुर शहरात एका पोलीस अधिकाऱ्याने बाबासाहेबांचा पुतळा फोडला. आम्हाला
कळले. मनोहर अंकु श तेंव्हा आमच्या सोबत होते. आम्ही तेथे पोहचलो. परिस्थितीची पाहणी के ली. त्या दिवसापासून
रविदास आश्रमात बैठक घेतली. व मोर्चा काढला. हा एवढा प्रचंड मोर्चा होता. प्रत्येक मोर्चे घेण्यासाठी लाठी काठी,
निळाझेंडा
$$$$$
होता. मोर्चाने पोलीस ठाण्यात वेढा मारला. वरिष्ठ अधिकारी पळून गेले. मोर्चेधारी हट् टाला पेटले होते. त्या
अधिकाऱ्यांना मोर्चेवाल्यांना शरण यावे लागले. त्यांनी माफी मागीतली. पुतळ्याचे काम करून दिले तेंव्हा आंदोलन शांत
झाले.
परिसंवाद सुरु होत असल्याच निमंत्रण घेऊन कु णी कार्यकर्ता आला. मुलाखत आर्धी राहिली.
राहुलन आंबावडेकर (म.प्र./ पँन्थर नेता): " मी कधी अशा कार्यक्रमाला उपस्थित राहात नाही पण येथे बाबासाहेब
आंबेडकरांचा फोटो आहे व बिगर चाभारांनाही बोलावले आहे म्हणूनच मीही हजर आहे. दलित जातीचा जन्म हिंदू
समाजातून झालाय. वर्णाश्रम व्यवस्था जातीवादी व्यवस्था आहे. हिंदूधर्म ग्रंथांनी ही टिकवली आहे. शुद्र, वैश्य, ब्राह्मण
कोणीही नाही. जर मुक्ती पाहिजे असेल तर हिंदुसमाजाला सोडावं लागेल.
हिंदू सणवार सोडावे लागतील. बाबासाहेबांना विरोध करणारा इसम गद्दार आहे. बाबासाहेबांनी चांभार, महार यांच्याच
साठी काम के ले नाही तर सर्वांसाठी के ले आहे. दुसऱ्या नेत्याना नेता मानून आम्हाला चालता येणार नाही. आमची रवानदान
काँग्रेसी असली तरी ही मी असा चांभार आहे ज्याने बाबासाहेबांच्या आंदोलनाचा स्वीकार के ला. जे काँग्रेसवादी आहेत ते
माझा स्वाभिमान पाहून लज्जीत होतात. माझे के वळ २०% नातेवाईक जगजीवनरामला मानतात. उत्तर भारतातला चांभार
गांधीजींना आता मानीत नाही. माझ्या भावाना नम्र निवेदन करतो की तुम्ही फारच भाग्यवान आहात की ज्या प्रदेशात बाबा
साहेब बोलले, चालले त्याच प्रदेशात तुम्ही आहात. मी लांबचा माणूस प्रभावीत होतो. पण जर तुम्ही होणार नसाल तर
फारच मोठी चूक करणार आहात. तुम्हीच तुमच्या पायावर कु ऱ्हाड मारून घेणार आहात. मोर्चा आणि चांभारांना एकत्र आणा
आणि पुनसंघटन करा पुर्ण महाराष्ट्र पिंजून काढा. उत्तर प्रदेश, बिहार, सिंधपूर, रायबरेली येथील अत्याचार, जाळपोळ
करणारे हिंदू आहेत. चांभारांना ते ठेचून काढतात. महाराष्ट्राचा चांभार जर दुसऱ्या संघटनांमध्ये काम करीत असेल तर तो
जयचंडी सारखा सोनेरी लंके ला आग लावीत असेल. हे, दलितांनो, या देशांच्या दलितांनो पँन्थरच्या निळ्या झेंड्याखाली
एकत्र व्हा ! लखनौ मध्ये या आणि लाखोंच्या संख्येतला चांभारांना पाहा! मी काशीचा चांभार, रोहिदास पंथाचाच पण मी हे
मानत नाही, कारण जर या जगात इश्वर असता तर त्याने हे पाशवी अत्याचार थांबवले असते.”
$$$$$
178
भारतीय दलित पँन्थर कार्यालय उल्हासनगर येथे रामकिशन करौतिया बसलेले. जनतेची गाऱ्हाणे ऐकणे चालू..
परिचय वगैरे होऊन घरीच गप्पा मारण्याचे ठरले व सुरुवात के ली. अत्यंत दिलखुलास गप्पा झाल्या दुसरी / विगारी
शिकलेल्या, के वळ लिहिता वाचता येत असलेल्या पण या अनुभवाने मोठ्या असलेल्या पँन्थरची वाणी मात्र खरेच आंबेडकरी
विचाराने भिजल्या सारखी वाटली. स्पष्टपणा, लढाऊबाणा व मदत कार्यातल्या पुढाकाराबाबत रामकिशन यांचा लैकिक
आहे. अंतरंग जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत सौ. रत्नप्रभा गरकल ह्या होत्या. मी प्रथम प्रश्न टाकला.
सुरुवात –
आपण समाज कार्याला सुरवात के व्हा के ली ?
मी समाजकार्य करण्यास सुरवात पुष्कळ दिवसापासून के ली. कमीत कमी २० वर्षे झाली. मी प्रथम शिवसेनेत काम
के ले. त्यानंतर वाल्मिकी समाजात काम के ले. व आता भारतीय दलित पँन्थरचे काम करत आहे.
झाली. पँन्थरमधील लोक फार निष्ठावंत आहेत, हे पाहून मी पँन्थरमध्ये प्रवेश के ला. या समाजाचा स्विकार के ला. मी भा.द.
पँथर मध्ये गेल्यावर वाल्मिकी समाजास सुधारू शके ल. वाल्मिकी समाजातील तळागाळातील जी माणसे आहेत त्यांची
आर्थिकस्थिती ही व्यवस्थित नसल्यामुळे त्यांच्या मुलांना शालेय शिक्षण घेता येत नाही व पशिक्षण नसल्यामुळे हा समाज
सुधारू शकत नाही उच्च पातळींवर येऊ शकत नाही हा समाज कमकु वत असण्याचे कारण असे की, येथे जी स्थानिक माणसे
आहेत तसेच बाहेरील गावाहून इतर ठिकाणाहून येणारी माणसे आहेत त्यांची वर्तणूक ) ही अतिशय वाईट! दारू पिणे,
आपसांत किं वा इतराशी भांडणे करणे, घरातील माणसांना वाईट वागविणे या घाणेरख्या सवयी आहेत. यामुळे त्यांची
आर्थिक परिस्थिती सुधारू शकत नाही ते आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाही. ह्या लोकांनी जर या घाणेरड्या सवयी
सोडत्या तरच हा समाज सुधारू शकतो, समाजातील सर्व व्यक्ती एकत्र येऊ शकतात. भा. व पँन्थरमधील सर्व व्यक्ती एक
आहेत. बाबासाहेबांचे जे ध्येय (उद्देश्य होते ते सर्व मानवधर्मासाठी फारच अनमोल आहे. यासाठी आम्ही सर्व एक होऊ
बाबासाहेबांच्या विचाराधारांमुळे हे परिवर्तन होऊ शकते. याचाच अर्थ असा की, भा.द. पँथर आणि वाल्मिकी आणि
वाल्मिकी समाज यांचे विचार हे फारच वेगळे आहेत.
179
चांभार लोकांनी जसे पिढ्यानपिढ्या चालत आलेले काम सोडले तसेच स्विपर लोक (वा.स.) साफ-सफाई काम
सोडू न देतील. व बाबासाहेबांच्या विचारधाराप्रमाणे अशी ज्या लोकांना भिती वाटली त्यांनीच जबरदस्तीने ‘वा.स’/ ‘हि.
स्वि से.स.’/ स.कॉ.म या नावांचा आमच्यावर शिक्कामोर्तब के ला. स्वतः आमच्या ह्या निरनिराळ्या घटकाचे संचालक
झाले तर या सर्वांना एकत्रित करून त्यांच्यात जर कोणी परिवर्तन करू शके ल असे एकच नाव आहे.
$$$$$
प्रश्न - आपण जेथून आहात तेथील वाल्मिकी समाज कोणता विचार स्विकारतो?
उत्तर - एकच शक्ती आहे ती म्हणजेच भारतीय दलित पँन्थर मी अलिगढचा रहिवासी. तेथून मी आलो तेथील माणस ही
फारच भोळी, भरकटलेली चुकलेली तसेच प्रथमपासून निराश- हताश असलेली. गावात घरे ही बोटावर मोजण्याइतकीच
त्यामुळे लोकवस्ती कमी. बाबासाहेबांनी जे आंदोलन के ले, जो लढा दिला तो एक जात एक समाज किं वा एक धर्म यासाठी
नव्हे. जितक्या अस्पृश्य जाती आहेत, तळागाळातील जे लोक आहेत त्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी परिश्रम के ले.
बाबासाहेबांच्या या आन्दोलनात अनेकांनी काम के ले. मी सर्व इतिहास शास्त्र रामायण व जे हिंदू ग्रंथ आहेत ते चांगल्या
पद्धतीने पाहिलेले आहेत परंतु कशातही भगवान- देवता- लीडर- राजाने आमच्या प्रगतीसाठी बाबासाहेबांच्या शिवाय
काहीही लिहिलेले नाही. जे काही के ले ते बाबासाहेबांनीच !
काही नाही, जर चमत्कार व परमेश्वर असेल तर संपूर्ण हिंदुस्थानात एकच समाज अमता जातीयवाद नसता सर्व लोक हे
प्रेमाने - आनंदाने राहिले असते, मी तर, असा सांगतो कि अजून पर्यंत कोणताही परमेश्वर किं वा चमत्कार निर्माण झालेला
नाही. मी कोणत्याही देवाला किं वा देवाच्या फोटोला मानत नाही परंतु आमच्या समाजातील काही लोकांना हे पटत नाही ते
मानतात. मी फक्त बाबासाहेब व भगवान बुद्ध यानांच मानतो. कारण त्यांच्या इतिहासातून चरित्रावरून व त्यांनी के लेल्या
कार्यावरून त्यांच्यात समदृष्टीची भावना होती. ज्यांच्यात समदृष्टीची भावना आहे तेच परमेश्वर असतात, चमत्कारी
असतात, सर्वात श्रेष्ठ असतात. मग ती माणसका असेनात !
180
उत्तर - हो मी बौद्ध आहे. मी धर्मांतर के लेले आहे. मी ८१च्या ऑक्टोम्बरमध्ये पँन्थरच्या स्टेजवर शिक्कामोर्तब करून मी
बौद्ध धर्म स्विकारला. वाल्मिकी समाजातील पुष्कळ लोकांमध्ये धर्मांतर करून त्यांनी बौद्ध धर्माचा स्विकार करावा हा प्रयत्न
के ला. आणि जोपर्यंत जगेन तोपर्यंत वाल्मिकी समाजातील काय पण इतर समाजातील जे लोक आहेत त्यांना बौद्ध धर्माचे
वैशिष्ट सांगून, पटवून देऊन तो धर्म त्यांनी स्विकारावा असा मनपूर्वक प्रयत्न करीन. सर्व दृष्टीने वा.स.हा पँन्थरमध्ये
आणतच आहे. मी जेथे जातो, ज्या लोकांमध्ये बसतो तेथे त्यांना बाबासाहेब व भगवान बुद्ध यांचे विचार, आदर्श ह्या बदल
चर्चा करून ते त्यांना समजावून सांगतो. थोडयाच दिवसात संपूर्ण उल्हासनगरमध्ये आणि आलिगडमध्ये व इतर
गावागावांमध्ये पँन्थर छावणी सुरू करणार आहे. तसे इतर ठिकाणाहून सुद्धा छावणी सुरू करण्याबद्दल बोलावणे आलेले
आहे.
सर्वात वाल्मिकी समाज मुंबईल जास्त आहे. पाच लाखाहून जास्त टँक रोड, पूना पिपंरी जास्त आहे.
घाटकोपरमध्ये पंत रोड, माटुंगा, कल्याण, मानर वूर्द, चेम्बूर, दादर, ठाणा, मुलुंड इ. ठिकाणी. माझा संपर्क चालू आहे.
प्रश्न - वाल्मिकी समाज राजकिय दृष्ट्या काँग्रेसचा आहे काय ? यावर उपाय काय ?
उत्तर - असं नाही. परंतू आम्हाला बहकवलं जातं. खोटी आश्वासनं दिली जातात. तसेच दुसऱ्यां तऱ्हेने आर्थिक
स्थिती, सामाजिक स्थिती कमजोर करण्यासाठी प्रयत्न के ले जातात. ह्यासाठी बाबासाहेबांच्या उद्देश्यानुसार आमच्यातील
जागृती आणि संघटना जेव्हा मजबूत जातीयवादी राक्षासांवर बंधन आणून आपला हक्क घेतला पाहिजे आपले राज्य आणले
पाहिजे म्हणजेच खऱ्या अर्थाने आपला देश जातीयवादी गुलामागिरीतून सुटू न पूर्णपणे स्वतंत्र होईल!
$$$$$
१९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची नरेपार्क ला जी शेवटची सभा झाली त्या सभेला मी गेलो होतो. त्यां
सभेतल्या बाबासाहेबांच्या भाषणाने मी इतका प्रभावित झालो की दुसऱ्याच दिवसापासून आंबेडकरी चळवळीत सामील
झालो. आजपर्यंत या चळवळीशी माझी नाळ पक्की जोडलेली आहे. १९५६ ते १९७२ सालापर्यंत नायगांवसारख्या विभागात
मी दलित मागासवर्गियांसाठी काम करीत राहिलो. १९६२ साली 'महाराष्ट्र मातंग विकास संघाची' स्थापना के ली. आणि त्या
माध्यमातून आंबेडकरी चळवळीचा छोटासा घटक म्हणून राबत राहिलो माझ्यासारखेच इतर जाती जमातीमधले कार्यकर्ते या
चळवळीत तेव्हापासून आजपर्यंत कार्यरत आहेतच. म्हणून माझी रिप. पक्षाच्या अध्यक्षीय मंडळाला विनंती आहे की,
बौध्देतर कार्यकर्त्यांचाही समावेश या ऐक्य झालेल्या एकसंघ रिपब्लिकन पक्षात असावा त्यामुळे पक्षाची व्यापकता वाढेल
आणि रिप. पक्ष फक्त बौद्धांचाच राहाणार नाही.
माझे कार्य कसे होते हे सांगत बसलो तर पुरा दिवस पुरणार नाही. यामागचा स्वच्छ हेतू येवढाच की बौध्दांशिवाय इतर
जाती-जमातींचे कार्यकर्ते या चळवळीत पूर्वीपासून राबत आहेत. म्हणून त्यांना न्याय मिळणे महत्त्वाचं वाटतं. १९६२ साली
भारतावर चीनचं आक्रमण झालं तेव्हा भारताचं बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल. छोटीशी मदत म्हणून आणि या
देशातील सर्व थरातील लोक जागृत असल्याचा पुरावा म्हणून हिजड्यांकडू न मी २५० ग्रॅम सोनं आणि ५,००५ रुपये
मुख्यमंत्री निधीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना दिले.
१९७२ सालच्या 'पँन्थर' च्या स्थापनेत संस्थापक म्हणून मीही होतो. दलित अन्याय अत्याचाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात
सरकार विरोधी अनेक आंदोलनं के लीत. माझ्यावर या आंदोलनात १९२ के सेस दाखल झाल्या होत्या. त्या वेळी
माझ्याबरोबर राजा ढाले, भाई संगारे, ज. वि. पवार. मनोहर अकुं श, अरुण कांबळे होते आम्ही सर्वांनीच या सर्व गोष्टींना
एकत्रीत तोंड दिले. तेव्हापेक्षा आजची वेळ आमच्यावर वेगळी नसल्यामुळे ऐक्यासाठी आज आम्ही पुढे आलोत. त्याच
दरम्यान मी १९७६ साली ५०० मुलांचा 'नंगा मोर्चा' मंत्रालयावर काढू न दलितांना रोटी कपडा मकान द्या असं सरकारला
निवेदन दिलं. हेही आवर्जून सांगायला हवं. भारतीय समाज व्यवस्थेतल्या चातुर्वर्ण्याचा निषेध म्हणून मुंबईत शिवाजी पार्क वर
181
राजा ढालेबरोबर १०,००० लोकांसमोर 'भगवद् गीता' जाळली होती. १०,००० कार्यकर्त्यांसह आम्हांला आठ
दिवसांची जेल झाली. पुढे 'पैंथर'ची नाशिकची सभा आटोपून मुंबईस परतताना इगतपूरी रेल्वे स्थानकावरच 'पैंथर' च्या
कार्यकर्त्यांवर रेल्वेमध्ये
$$$$$
जातीयवाद्यांकडू न हल्ला करण्यात आला. त्यावेळी देखील 'पँन्थर'च्या वतीने रेल जाळण्याच्या प्रयत्नात दोन हजार 'पैंथर्स'ना
अटक करून के सेस दाखल करण्यात आल्या. जामीन म्हणून एक लाख, छत्तीस हजार रुपये नाशिकचे आंबेडकरी
चळवळीतल्या घराण्यातील चंद्रशेखर काळे यांनी भरले होते. त्यामुळे आमची सुटका झाली होती.
पुढे नेत्यांच्या हेवेदाव्यात देखील मी स्वतः अरुण कांबळेच्या सहकार्यानं पुन्हा 'पैंथर' ची बांधणी के ली. माझा इतका
मोठा सहभाग चळवळीत असतांनाही, नागपूरच्या सीताबर्डी येथील 'पैंथर' च्या पहिल्या अधिवेशनात जी कमिटी निवडली
त्यातून मला पूर्णतः वगळले गेले. पुन्हा एकदा पुढे पँन्थरचे पुनरुजीवन होऊन राजा ढाले अध्यक्ष झाले. तर मी मुंबै
प्रदेशचा अध्यक्ष होतो. कमलेश यादव, रमेश इंगळे, अरुण कांबळे, मनोहर अकुं श हे देखील माझ्याबरोबर होते परंतु अचानक
राजा ढालेंकडू न 'पॅथर बरखास्त करण्यात येऊन, मास मुव्हमेंट' निर्माण के ली गेली. तेव्हा मात्र 'पँन्थर'ची एवढी चांगली
चळवळ 'असताना 'मास मुव्हमेंट' काढली, म्हणून मी मुंबई प्रदेश अध्यक्षपदाच राजीनामा दिला.
त्यानंतरच्या 'पँन्थर'मध्ये फार मोठं निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी रामदास आठवलेंचं नवं नेतृत्व
उद्याला आलं. त्यात उमाकांत रणधीर, कमलेश यादव, अरुण कांबळे इत्यादींची नवी फळी तयार झाली. त्यानंतर
आजपर्यंत तरी रामदास आठवलेंनी सर्व जाती जमातींना त्यांच्या गटात घेऊन नवी चळवळ उभी के ल्याचं दिसतयं.
त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की 'रिडल्स' (१९८८) सारख्या प्रश्नांवर फक्त समाजाला जवळ न करता रिपब्लिकन पक्षामध्ये
महत्त्वाची भूमिका करण्याची संधी द्यावी.
$$$$$
मंत्रिपद मिळाल्यावर काय वाटलं? इतकी वर्ष आम्ही रस्त्यावरची लढाई लढलो. अनेक समस्यांवर प्रखर आंदोलनं
के ली. तुरूं गांत गेलो, पदाची, सन्मांनाची अपेक्षा न करता आम्ही हे करीत होतो. पण एवढ्या वर्षांनंतर माझ्यासारख्या
कार्यकर्त्याला न्याय मिळाला.
मला मिळालेलं मंत्रिपद हा माझ्यासारख्या घरावर तुळशीपत्र ठेवून राजकारणात पडलेल्या हजारो पँथर्सचा सन्मान
आहे.. तुम्ही विदर्भातले, मग कार्यक्षेत्र औरंगाबाद का निवडलंत? कार्यक्षेत्र निवडण्याचा प्रश्न नव्हता. मी औरंगाबादला डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन के लेल्या मिलिंद महाविद्यालयात शिकत होतो. त्या. वेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना
भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांवर मी पुढाकार घेऊन आंदोलनं के ली. नेता बनायचं म्हणून हे काही ठरवून के लं नव्हतं. ही
आमची गरज होती. लढल्याशिवाय शिक्षण आम्हाला मिळणार नाही, याची जाणीव झाल्याने आम्ही लढत राहिलो,
182
औरंगाबादला विद्यार्थ्यांचा नेता झालो. सुरुवात तशी औरंगाबादला झाली तरीही माझं कार्यक्षेत्र मराठवाडा, विदर्भ आणि
पँथर्सच्या चळवळीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरलो.
विशेष असं एखादं आंदोलन सांगता येईल का?
एखादं का, कितीतरी सांगता येतील. मी विद्यार्थी असताना औरंगाबाद विद्यापीठाचा पहिला मागासवर्गीय जनरल
सेक्रे टरी झालो होतो. त्या वेळी भल्या-भल्या राजकीय नेत्यांनी या निवडणुकीत रस घेतला होता. तरीही मला विद्यार्थ्यांनी
जी एस. म्हणून निवडू न दिलं. या काळात आम्ही शिष्यवृत्ती वाढ आंदोलन के लं. त्या वेळी फक्त ३० रुपये महिना शिष्यवृत्ती
मिळायची. सततं दोन महिने हे आंदोलन सुरू होतं. अखेर सरकारने शिष्यवृत्ती शंभर रुपये के ली. पहिल्यांदाच एवढी मोठी
वाढ करण्यात आली होती.
नंतर पँन्थरच्या चळवळीत मी अग्रभागी होतोच. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेबाचं नावं द्यावं, ही मागणी
प्रथम आम्हीच के ली. ग्रामीण भागात पँथर्सने दलितांना संरक्षण दिलं. नामांतर लढा, भूमिहीनांचे प्रश्न, गायरान जमीन आणि
इतर प्रश्नांसाठी आम्ही लढलो. रामदास आठवले मंत्री `झाल्यावर गायरानाचे पट्टे कसणाऱ्यांच्या नावावर करण्यात आले.
मी औरंगाबादसह अनेक शहरांत २२ झोपडपट्ट्या बसवल्या आहेत. दुष्काळातून शहरात येणाऱ्या लोकांना
सरकारी जमिनीवर आसरा दिला. अनुशेष भरण्याचं आंदोलन के लं. कार्यालयात जाऊन आम्ही तोडफोड करायचो आणि
मागासवर्गीयांचा अनुशेष भरायला लावायचो. मध्यंतरी वसमतच्या नारायण धुळेचे गायरान प्रश्नावरून डोळेच
$$$$$
काढण्यात आले होते. त्याला मी जीव धोक्यात घालून गावातून मुंबईला पळवून आणलं आणि या प्रकरणाला वाचा फु टली.
अशा कित्येक घटना आहेत.
मराठवाडा विकास आंदोलनाला तुम्ही विरोध का के लात? आम्ही विरोध नाही के ला. या आंदोलनाला आम्ही
फारसा पाठिंबा नाही दिला. कारण या आंदोलनात काही लोकांचं पक्षांतर्गत राजकारण होतं. शिवाय या विकासात आमचा
वाटा काय, हा प्रश्न होताच.
तुमच्यावर खुनाचा आरोप होता? या प्रकरणात माझा काहीच संबंध नव्हता. या प्रकरणात इतर चौदा कार्यकर्त्यांना
गोवण्यात आलं होतं. खरं तर या काळात पँन्थरचा जोर वाढत होता. त्यामुळे धास्तावलेल्या काही नेत्यांनी मला या
प्रकरणात गोवलं. सर्वोच्च न्यायालयाने मला निर्दोष सोडलं. या प्रकरणामुळे माझं आणि चळवळीचंही बरंच नुकसान झालं.
तसा याआधी मी आणीबाणीत तुरुं गात होतो. अनेक वेळा तुरुं गात गेलो. मला 'मिसा'-खाली ही अटक करण्यात आली होती.
तुम्हाला मंत्री करायला पक्षातून काही नेत्यांनी विरोध के ला ?
हे दुर्दैव आहे. पण काय करणार? ज्यांनी विरोध के ला, ते कधी वॉर्डातूनही निवडू न आले नाहीत. काही मोजके च
लोक वगळता मला कोणाचा विरोध नव्हता.
रामदास आठवलेंनी तुमचीच निवड का के ली?
माझं काम, ज्येष्ठता आणि त्याग बघून के ली असावी. सध्या ते राष्ट्रीय राजकारणात जास्त लक्ष देत आहेत,
महाराष्ट्र मी सांभाळावा, असं त्यांना वाटलं असेल. आम्ही दोघे २० वर्षांहून अधिक काळ सोबत आहोत.
मंत्री म्हणून काही योजना आहेत का ?
संधी मिळाली आहे तर समाजाचं, पर्यायाने राज्याचं भलं करण्याचा प्रयत्न करीन. रामदास आठवले यांनी मंत्री
म्हणून चांगलं कामं के लं होतं. तसंच मी करीन, खात्याचा कारभार तर आहेच, पण कार्यकर्त्यांचे अनेक प्रश्न असतात. ते
सोडवले पाहिजेत.
माझी औरंगाबादला शैक्षणिक संस्था आहे. कॉलेज आहे. तीन शाळा आहेत. माझ्या समाजाने शिकलं पाहिजे,
असा प्रयत्न आहे.
183
$$$$$
खेड्यापाड्यांत जातीयवाद्यांशी लढताना आम्हाला वाघाचं बळ नि चित्याची तडफ देणाऱ्या 'पँन्थर'चा वारंवार
फु टणाऱ्या ऐक्यात बळी गेला, ही माझ्यासह हजारो पँथर्सच्या आयुष्यातली सर्वात मोठी दुःखाची घटना आहे. कारण
बरखास्तीच्या वारातूनही बचावलेला तो जखमी 'पँन्थर' समाजाच्या रक्षणासाठी आम्ही जगवला होता, वाढवला होता. तीच
पँन्थर विसर्जित करावी लागली ही दूरगामी परिणाम करणारी चूक ठरली.
महाराष्ट्रातला दलित समाज जात्याच लढाऊ बाण्याचा, मनोवृत्तीचा आहे. सत्ता येण्याची वाट पाहात समोरच्या
प्रश्नांकडे आणि संघर्षाकडे पाठ फिरवणारा तो नाही, असे सांगत इथल्या दलितांची ही मानसिकता लक्षात घेता बसपा ही
रिपाइंला कदापि पर्याय वा आव्हान ठरू शकत नाही.
पँन्थरची भूमिका ही सर्व समाजातील लोकांचा संघटनेत समावेश करुन जाती निर्मूलन करण्याची होती. डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांचे उद्दिष्ट आणि तत्त्वज्ञान पुढे घेऊन जाणाऱ्या या संघटनेचा अस्त भारतीय समाजावर व विशेषतः
महाराष्ट्रात दूरगामी परिणाम करणारे ठरले आहे. पण या सर्वांमध्ये एक गोष्ट निश्चित मान्य के ली पाहिजे की, पँन्थरमधून
आलेल्यां रिपाइंलाच या सत्तेत समाविष्ट करुन घेण्यात आल्याचे सांगत, यामुळेच शिवसेना-भाजपसारख्या जातियवादी
पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्यात राज्याला यश देशात आता सर्वजनवादी राजकारणाचा प्रयोग होत आहे. पण याची सुरुवात
दलित पँन्थरनेच के ली. आपला पक्ष त्यामुळे राजकीय जातीयवाद नष्ट करण्याची भूमिका घेत आहे. आघाडीच्या
राजकारणाचा प्रयोग म्हणजे राजकारणातील जातीयवाद संपुष्टात आणण्याचा प्रयोग आहे.
सर्व समाजाला राजकारणात सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेत असताना खैरलांजीसारखे मानवतेला शरम
वाटणारी भीषण घटना कशी घडते?
$$$$$
INAUGURAL ADDRESS
by
184
ON THE OCCASION OF THE FIRST NATIONAL CONVENTION OF
DALIT PANTHERS OF INDIA HELD IN DELHI ON 15th MARCH 1900.
We meet here this day under the agesis of the organisation who style
themselves as “Dalit Panthers”.
The very name panther brings to mind the Black Panther Organisation of
America. At though they have nothing to do with that organisation, adoption of
the word Panther has definitely the same inspiration. Black Panthers have
something to do with the Negro movement. Scheduled caste or Depressed class
movements have their origin in the age-old treatements meted to the Dalits by
the upper cast as in Hindu society. Depressed classes or the down troddens
belong to the lowest rung of the caste ladder. For centuries they have been
suppressed and treated worse than animals. The Negros of America are perhaps
better in some ways than the Dapreased Castes of India. They are classed as
Shudras and the at it shudras. A Since the enactment of
$$$$$
the Government of India Act 1935, all these castes are grouped together under
the title the scheduled Castes and the schedule d Tribes. The term Harijan as
imposed upon them by Mahatma Gandhi is strongly resented by these
communities. The word Dalit, as is popularised and adopted by the Dalit
Panther organisation, has wider commotations and is very comprehensive. It
means all those who are socially, economically, politically suppressed, degraded
and ill-treated, it may be a Shudra, at i-shudhra. Why be may be even caste
Pindu or a Brahmin. If a Brahmin is ill- treated may be because of lower,
economic status, if a minority person has been the target of harassment all of
such persons could be categorized as Dalits and could join this organisation.
The word Dalit It atonce brings to our mind Dr.Ambedkar and not Mr.
Gandhi, however, much the Congress and their Harijans may think so. Hence it
will be proper for one to give here in a small synopsis of Dr. Ambedkar and his
mission.
Dr. Ambedkar was born in untouchable family and naturally of poor
parents. His father had great respect for education and learning, with great
difficulty and with all and small means at his command he led foundation of
good eduction for his last child Bhimrao. After finishing his early education and
because of his talents, hard labour and dedication to study, Dr. Ambedkar got-
financial aid from some kind hearted, well me aning caste Hindu personalitles.
This helped him to study higher and higher and acquire academic to degrees by
examination. It is no exagperation that Dr. Ambadkar had chain of degrees all
acquired by sheer hard labour. Dr. Ambedkar himself, having suffered
segregation and vorse sort of treatments, at the hands of the caste Hindus, in his
education days, naturally was attracted to the Negro-Problem and their
$$$$$
185
Ghettos. While, in America, besides his regular his studies, Ambedkir spent/
hisure time in study of the Negro problem and how akin it was to problem of the
depressed classes in India. Immediately after finishing his studies abroad, when
he returned to India he plunged himself into all important task of getting Justice
to his people and their emancipation. Towards this and he utilised all his
energies and means till the wall of his life. This tribute to Dr. Ambedkar, pand it
Nehru descriIbed Dr. Ambedkar as a symbol of revoult. It was absolutely right,
but the unfortunate part of it is, the Congress, and Gandhi did not allow
Ambedkar to go beyond the stage of mere symbol. Dr. Ambedkar should be and
righly enough be remembered as a smouldering valcano throwing out lava every
time. There was need for it. He could not and nobody should tolerate in justice
and at such times he vill burst out as lava of volcano, and keep the Hindu
society on its toes at as! it Is the cooling down of this valcano since his demise,
that the depressed castes are once more faced with innumbrable difficulties and
harassments. All the activities and movements of Gandhi were to keep the
depressed castes where they were graded to be by the Hindu shastras. During all
the discussions and developments before the advent of Indian Independence,
one could notice that Gandhi all along was afraid of vivisection and disruption
of Hinduism if these depressed castes were given political safeguards. Mr.
Gandhi wantod the depressed castes to be utilted as experimental ground for
rindu reformers, who wanted to pose as dedicated social workers for the uplift
of their suppressed bretherns. Dr. Ambedkar rightly was opposed to such
pretentious ideas of Gandhi. It was irony of fate that both these giants should
have come oprosite each other almost at
$$$$$
the very time of the century. Gandhi's ledership of the untouchable was more
"sentimental" and "assumed" while Ambedkar leadership is more natural and
roal.
After his return to India when he had finished his studies abroad, Dr.
Ambedkar himself took the task of helping his people achive social and political
justice. Various groups and associations were formed, mostly under the name of
depressed classes leagues, socities, associations etc. First held All India
Conference of the depressed classes League was held in March 1918. Earlier
during the visit of the then Secretary of State for India, Mr. Montagau, a
demand for separate cloctorate was made in 1917. From here took the political
awakening of the Dalit masses and Dr. Ambedkar's life. Long struggle to get for
them political safeguards. This issue later came up at the two Round Table
conferences convened by the British Government. Ambedkar wanted his people
to be aware of their civil rights such as taking water from common tanks and
wells and their right of worship in temples as is done by the caste Hindus.
186
on 23rd August 1923, Mr. S.K.Bole, a dear friend of Dr. Ambedkar and a
member of social equality league and a member of Bombay Legislative
Council, moved a resolution in the council, to that the effect that all public
water tanks, wells and Dharmshals as maintained out of public funis and
administered by bodies appointed by the Goverment or created by statutes, as
well as by courts, dispensaries, schools, hotels, are to be opened for use by all
Depressed classes community. The resolution was passed and in consequence
all public places were available for use by the depressed castes. As per this
resolution, Mahad chavadar malao (a WATER tank presumed to contain swent
water and
$$$$$
forbidden for use by the untouchable) was thrown open by the Mahad
Municipalitv for the use of the depressed classes. But the local bodies were
reluctant to implement this resolution. A largely attended conference of the
depressed classes was held at Mahad, wherein a resolution was passed and
urged the Government to enjoin on the local bodies to enforce the Bole-
resolution. Thereafter the members and delegates of the depressed classes lead
by Dr.Ambedkar marched peacefully to the site of the Chavadar Talao and had
their first sip of the forbindden water. This was a historical occasion, and the
whole episode gede tremendous awakening to the Depressed Castes who were
kept all along in deep coma by their upper caste bretherns. This episode will and
has remained a torch-light in the minds of all Dalits.
Members of the Depressed classes and the social equality league, of
which Dr. Ambeker and S.K.Bole were founders organised satyagraha at
various places in the then Bombay presidency of particular intrest in this
connection is the saty agaraha at Nasik for entry in the famous kalaram temple
in 1930. This was also successful and thereafter all the Hindu temples were
thrown open to untouchables for worship. It is very ironical now that the Dalits
have taken to Buddhism, they are ill-concerned wheter the temples are open or
closed. All the same it was nacessary to as sort our civil rights of worship in
public places.
All along and while Dr. Ambedkar was pre-occupied with civil rights
activity, he was considering how best to achieve political rights for his people.
Dr. Ambedkar was convinced that without political power there could be no
actual progress in his programme of amelioration of his bretherns. That he was
awaiting for at last happened. The British Goverment convened Round Table
Conference with an intention of
$$$$$
assessing Indian political opinion on the issue of how best Indians could rule by
themselves. There were two Round Table Conferences convened thus, to
discuss the framing of constitution for India which will satisfy the demands of
all the parties and poorle in India. In pursuance of the Simon Commission's
187
recommendations in 1938, the British Goverment commend the first Round
Table Conference in 1930. Dr. Ambedkar was nominated by the British Govt. to
serve on this conference, Brsides Dr. Ambedkar, there were about 100 delegates
representing various political parties and minority groups and the Indian Primes.
It is surprising and strange that inspite of the representative look of the
conference, it was only Dr. Ambedkar who spoke/ forcefully and convincingly
about the plight of untouchable community. It was a shock to the British people
to note that 1/5th India was in such religious bondage.
Dr. Ambedkar put forward in his usual locid and frank way, the plight of
the untouchable in India. He very fearlessly painted the actual condition of the
depressed class people in the context of the Indian society.
Second Round Table conference was convened on 7th Sept.1931. Dr.
Ambedkar took this opportunity to thoroughly acquaint the British Govt. and
the British people what pathetic condition the untouchable people were in
inspite of 150 years of British Rule. The Indian Society remained wehre it was.
Ambedkar roared that no Government whether British or National, could
mitigate the sufferings of the depressed and down-trodden masses. He appealed
for a Goverment which will not be afraid, to amend the social and economic
code of Indian life, which the dictates of justice and expedieney so urgently call
for.
$$$$$
It was in this conference, after the frank and lucid exposure of the status
of the untouchable that the world came to know for the first time, how pitable
and sorrowful was the fate of such buge mass of humanity was in India.
It was here that Ambedkar gave shape to the idea of Political Safeguards
and protection to the depressed classes in the future constitution of Salt-
Governing India. There by for the first time Ambedkar made direct demand for
nolitical rights for his peaple thus:
1) Separate electorates in legislative bodies,Parliament and other clected
bodies.
2) Representation in public services.
3) Representation in all defence services.
Second Round Table Conference was attended by Mr.Gandhi on behalf
of the Congress. Gandhi was very much perturbed by Ambedkar's assertions
about existence of untouchability in India. Gandhi's India was taken "exposed to
the world atmos In the address to the conference Gandhi strongly opposed
ambedkarts surrettes of giving nolitie al safeguarts and protection, and seporate
electorates to these ware going untouchables. While the deltibarat going on in
London, the demand for separate ectorate was gathering momentum in India.
The Depressed classes oragnised a veral meatings and nveryed to Dr.
Ambedkar, who was in London was not to accept any constitution for Indis,
which did not include in it the system of separate electorats for the depressed
classes.
188
On 17th october 1932, the British Goverpresent announed its decision on
comunal problems, of all religious and other minorities in India. According to
this comuns Award all the minorition, Indian Christ Lans, Muslim, sikhs, Andlo
Indians and tolll the Depressed classes wore
$$$$$
granted soparate loctorate for purposes of olcetion to all oleted bodies all over
India Gandhi aver godt. opposed this Communal Award! Tooth and nail,
Gandhi resorted to his usual weapon of fast unto death. Perhaps this fast unto
death stunt of Gandhi started siren the tasu of some came up. With this
announcement by Gandhi rybody started consultations in groups and personally
as to how to old this catastrophy. As a result of these delitberations certain
alternative was arrived at, where by the Depressed clasmes wore to got certain
numbers of reserved seats in both the Legislatives and Privincial as semblies. In
adition they were to get reato in sarrices, and eduo it lonal facilities. This whole
alternate orrstrowat to the demand of separate electorates, is known in Indian
politic इ al history as "poona Pact". This new ternative was put up to Dr.
Ambedker who after long diliberation with his colleagues accepted this new
proposaI it seems the threat of fast by Mr. Gandhi moved Dr. Ambedkar much.
He gave up his original demand of separate cloctorate for safeguarding the
political rights of his people and helped Gandhi to live, what unique
humanitarian service to congress and Gandhi, although Ambedkar maintained
that untouchablis were separate from Hinduism, and that Hindus had nothing to
fear from reservation. But Gandhi in his shrewd-Bania way gave sweet (bitter
within) pill to Dr. Ambedkar, in the form of fast unto death. It is such pretention
and sham concern of Gandhi for the untouchables that has brought untold
misery, suffering and harassment of the Dalits in India.
All, the deliberations betwo on the British Govt. and Indian leaders that
took place at the two Round Table conferences, are incorporated in the Govt. of
Ind la ot 1935. This Act is the cornerston and basis of Indian
$$$$$
constitution, of which Dr. Ambedkar was the chief architect. In this document
Dr. Ambedkar has put in, schedules and clauses for abolishing untouchability,
and quality to lits in the syes of law.
After finishing the work of the Round Table Conference, Dr. Ambadkar
returned to India fully do termined to put into action all whatever he achieved in
London. He had to awaken his masses to the reality of the situation and make
them party, to the new programmo announced by the British and the Poons
Pact. He had to form political forums and parties. He had to mobilise public
opinion for this. With intontion of furthering the objective, Ambedkar formed a
party naming it as "The Independent Labour Party". This party included not
only scheduled caste Community but also factory and mill workers and the 1
189
and-less labour. This party fought clcctions for the then Frorinces. The Farty
had nut up few candidates but wor remarkable success. Out of 15 reserved, the
party returned 13. Under the flag of this party, Ambedkar and his party put in
remarkable work and archived a lot.
Later on in 1942 Dr. Ambedkar or form Party, melse to pan carlier
Independent Labour Party and named it as “the scheduled caste Federation".
Perhaps its very inmuno was surgest of cestist element, and didn't succeed much
in ciret ton. In 1956, Dr. Ambedkar was considering to form on all
comprehensive party under the style of the pepublient arty", his idea was to
form a wide based party of all Scheduled casta, scheduled tribes, and other
religious minorities. He felt a party of this tyne could cover up the interest of all
minorition and in our of time it could work as an effective opposition to
congress and replace it. Born democrat that he was Dr. Ambedkar thought to
nurture
$$$$$
190
In lia claims to be a land of learning. Dalit Panthers having the good-fortune of
belonging to Dr. Ambedkarts community, they have inherited the spirit of
dedicated work for the mellorat ton of suffering of the Dalit community. They
have learnt in a hard way, the meaning of the word revolt against all in just lee
whereave it is, from the Master or Guru. They have learnt the mantra "ducte.
Organise and Ag itato". It is this that is the foundat lon of the polit ran thire
Organisation. They hawe experienced this bear truth, that with out agitation you
cannot achieve anything. Only when you realise you are in bondare that you
revelt, to the revolution must continue, if you want to assert your fund mental,
man, political, civil and other rights. In the modern world nobody serves you on
platter, these rights. Dearning from the of their followorkers, the Dalit panther
Leadership com realise what the Ir the only leder told them and guited them to
do.
Dalit panthers, so to say took birth in early 1972. Till then they were
yough wing of the presently called Republican Party of India. The work ing
style of the existing Republican Party did not appeal to many a young man in
the community. This portual in-fight and group ism-tendency of the publican
Farty, is totally a failure from that Dr. Ambedkar, their le der hat exnected of
them. Dalit panthers have achiev a lot during their short existence. If one cannot
be in nosition of powr, one at 1s 1st should bring to the notice of power what
atrocities and carnages, the Dalit community is exposed to. It is here that the
Dalit panth r, is doing commend able work pert teul arly in rural Maharashtra
and Gujarat States. Wher wer there is atrocity, raping, looting and other
hasment, it & the Dalit panther, who is first to reach the spot, make thorough
enquiries and take to the matter to the Police, and higher-up
$$$$$
authorities. Till the grivances are redressed the Dalit Panthers do not rest. Such
dedicated, devoted batch of workers are a must, particularly where political
parties have failed to use their legislative powers to this end. Dalit Panthers
adopt ways which are non-violent such as Morchas, Cheraos, Hartal and such
other methods to archive their objectives. Their recent activity has been, a long
march they had organised to archive their demand for renaming of Marthwada
University in Maharashtra after Dr. Ambedkar. Unfortunately because of the
mean tactics and the wavering mentality of the then ruling party in Maharashtra
failed the Dalit Panthers this programme is temporarily suspended. A
resoluation, to the effect of charging the name of Marathwada university aften
Dr. Ambedkar was duely approved and passed by both the houses of
Maharashtra Legislature and yet the objective failed. Why? because the caste-
Hindus in the region did not and do not want it. They feal a Dalit aders prastige
will be elevated by this act. The panthers take it as in issue of in justice, when a
just demand democratically sanotioned its not, carried, out come of this of
denial was the terrible carnege, firing and massacre of all the small huts and
hovels of the poor Dalit in the off villages of Maharashtra, to tally reducing to
191
ashes all their small balongings, and above all most inhuman and cruel act of
the century, to bura human beings alive. Who went to console and Sympathise
and give whatever help they could, wore the Dalit Panther workers. What were
the others, leaders and parties doing when this colossal calamity took place?
May be some M.P.S. visited the spot after the was cooling. Many of them
perhaps were afraid to enter this region of Maharashtra that is where and how
the need and existence of Dalit Panthers arises.
$$$$$
While we are at the role of the Dalit Panthers and their need, I would like
to review in short the political party which concerns itself with this orderous
task of uplift and welfare of the scheduled caste and others listed untouchables.
There is no regular assessment of the actual work done by the scheduled
caste legislators; elected either on reserved seats or otherwise, on the basis of
the promotion of interest of their people. The existing scheduld caste Party
which works under the name of the Republic Party of India has no consolidating
influence on the Dalit masses. In States like Maharashtra, it s dominated by
Mahars and Buddhist, as in U.P. the domination is of Jatavs There is no unity or
hotorenuity in the scheduled caste masses. Their elected members are the lelitest
among the scheduled caste masses. The Republic an party has had very
fluctuating fortunes as could be judged from the election results since 1951.
This makes it clear, that the party has falled as an effective political instrument,
or even as an effective conglomeration of assorted groups. The domination of
the one particular group in the Republic an Party has led to factionalism and
divisions. There is poor leadership activated by poor “offers”. This leads to
temptation for corrutpion. The leadership whatever there is, has chosen the
strategy of working with and thoroughly well-established political parties and at
times with the party in power. Such alliances and aligments and have definite
disadvantages. This has led to diminution of bargaining power of the party. This
in fact leads to lack of ability in the schedule caste Legislatures, to ensure
effective implementation of policies and programmes, designed to ameliorate
the plight of their fellow-men. This Happens because of poor leadership which
in turn leads to want of
$$$$$
united front and thereby frustrates any attempt at effective voice in any party
forums. Thus the scheduled caste leaders have failed to extract the price of their
affiliation to other parties despite their vast numbers. At this they have
identified themselves with recognised political parties particularly the ruling
party. Should however some Scheduled caste member happens to be smrt,
intelligent, elever, and presentable he is tonce “co-opted” or “accommodated”,
or “absorbed” by the ruling party. This process has almost driven Indian
political system to one party democracy. So whatever precise role they may
192
play within the legislature, the scheduled Cast legislaters and and politicians are
unable to translate their legislative power into effective political instrument for
the welfare of the Dalit community. That is why the scheduled Caste legislators
are indifferent to the atrocities and carnages committed on their on bretherns.
What have the scheduled caste legislators done to enforce strictly the anti-
touchability act, and the bonded labour climination law. Have they taken any
interest in the Implementation of land reforms, minimum wages act and such
other measures initiated by the Government towards helping the Dalit masses.
Have the scheduled caste persons or the ir leaders taken to direct action, if the
process of persuntion or pressurization of the Government has failed. Have they
tried to mobilise publice opinion to gain their point. Take the case of Babu
Jagjivan Ram. He has been in the Parliament right from 1946. Has decorated
various positions in the political set-up of this country. He is praised for all such
commendable activities, but not much is known about Babuji as "crusader for
the oppressed" or the “emaneipator of the downtrodden”. Leave alone this, in
certain cases the scheduled caste
$$$$$
Legislators are not able to safeguard and promote the dignity of their own
“elite” legislative group, or members of Gram Panchayats etc.
Under such circumstances it is very necessary and is happening at a very
opportune time, when we Neal a cadre of selfloss, ded leated, devoted ferless
batch or bride of workers of whatever age-group they may be. This role of the
Dalit Panthers is all the more welcome when every day morning newspayers
bring us such saddening and heart-rend ring tales of sorrow from the Dalit
population.
I feel at this stage a small survey of the politice-social situation in India
today is very much desirable.
Some times in 1975, there was that ghastly and cruel, Inguman incidence,
in a village of Maharasthri, when two Dalit males had to loose their eyes. In a
most inhuman act the eyes of two brothers were pulled out so thoroughly that
mere sockets remained. It was a well-planned act by the upper caste Maratha
chief of the village with the aid of his honchmen. Now who is responsible for
this, it was not merely the wrath of one or two people, but the country-old caste-
system with caste pre- judiced mind. Who is to look after these two blind
brothers and their families. Has any action been taken to punish the culprits?
There are criminal and civil cases lodged in the courts. Justice is very slow in
this country, and sometimes the culprit’s just escape because of delayed justice.
In 1978, there were series of incidents involving Scheduled caste population in
outrages and violence. Then there are incidents of violence in Tamil Nadu and
Madhya Pradesh. In 1977 we witnessed the most pathetic incidence of atrocities
committed at Belchi in Bihar when all Harijans were burnt alive. Vary recently
193
in the month of February, to be precise, it was 6th February, by mid-night in
pleasant moonlit night, 14
$$$$$
Dalit persons were killed in cold-blooard fashion. Their houses were turned to
ashes. This also happened in Bihar, in a village called parasbigha. The
immediate cause leading to this crime was a land dispute. A local Bhumidar
landlord in the habit of illegal encroachment of lands happened repeat his
performance on a piece of land lotted to Dalits for settlement. These people
naturally reclaimed their land for their housing and farming which enraged the
bhomihars landlords tried to avenge this and an earlier suspected murder of one
of them, just after the elections were over. This ghastly act was committed on
6th February 1980, when the thatched roofs of hutments vers set ablaze taking
care previously to lock the entry door, thereby preventing the escape of inmates
who were brutally shot and animals burnt. The carnage lasted for an hour,
leaving parasbigha devasted, smoke filled with burnt huts, charred and bullet
ridden bodies lying scattered. This armed and palnned attack later was also by
the Bhum thar landlord. Two days later there was further trouble in Dohia
District in Gaya (Bihar).
In yet one very sad incidene recurred and unfolding the same sequence as
happened in parasbigha and Dohia in February last. This happened bearly 20
days after parabigha on 25th Feb, 1980. At Pipra village in Poonpoon block of
patna, Bihar, carnage of and arson and shooting raid took place at midnight.
Here 14 persons were shot dead, the marauders brutally gunned the entire
family of nine people and did not spare a child of two who was shot and then
thrown in the fire. In this case the whold affair spearked off, because of non-
payment of minimum daily wages at the rate prescribed by the Bihar
Government to the Land-less Harijan labour. This disputeled to murder of one
of the carring landlord in December last, by some unknown persons. There was
$$$$$
retallation which resulted in this orgy of violence and arsons. Besides som?
Harijan-woman was molested by the landebords group. The quarrel that lead to
this outrage was in an area dom inated by Kurmi-landlords and the immediate
cause concerns the land-problem. Noticeable point in this case is lethal wapons
like guns and rifles were used, and professional gang of goondas were the actual
men who committed the crime. Another noticeable fact is the police arrived on
the scene only after the raiders had made good their escape. This incidence is a
repétition of what happened in Belchi village in 1977, and the immediate cause
is land dispute and labour wages.
Some constructive suggestions to the Govarment to deal With these ever
increasing atrocities and carnages on Harijan population of the country: -
1) Government Sould create employment opportunities for the Dalits,
where by the Dalits are not left to the mercies and whims of the local landlords.
194
2) Laws like, anti-antouchablity act, abolition of bonded labour,
minimum wages etc. and such other measures meant for amelioration of the
plight of the untouch ables,must be implemented with priority preference. The
anti-untouchabillty het was onforced only in 1955 while constitution was
adopted in 1950.
3) Harijans fram villages prone to such ghastly or imes should be shifted
to district places and should have integrated housing, along with other castes.
The age old idea of separate Harijan settlements should be droppod altogether,
or discouraged.
4) Where Harijans bastis are huddled together in villages, the approch
roads to important branch offices or police than as should not be through areas
where caste Hindus dominate.
$$$$$
195
Commission expressed the view that police men are increasingly getting corrupt
because of political influence. Experience from observation shows that in many
parts of the country the police have come to acquire virtual immunity from
punishment to crime.
16). Prompt economic rehabilitation of the effected victims.
All attempts of Govt. as well as the social agencies should be for prompt
implementation of acts meant to remove social disabilities. Such acts should not
remain on the papers and one need not take pride in mere participation in
Parliamentary debates. If thecaste Hindus and the Govt. are sincere about
abolishing of untouchability and doing social justice to the down-trodden and,
depressed, their primary task should be prompt, fearless action, not guided by
election or its results. As Dr.Ambedkar, had so painstakingly argued all,
through his life, that the problem of untouchables is more economic than
religious. His resounding words during deliberations when the separate
electorate was debated need to be quoted extensively:
The system of untouchability is a goldmine to the Hindus. In it the 240
million of Hindus have 60 millions of untouchables, to serve as their retinue to
enable the Hindus to maintain pomp and ecomony and to cultivate feeling of
pomp and dignity befitting a master-class, which cannot be fostered and
sustained unless there is beneath a servile class to look down upon. In it, the 240
million of Hindus have 60 million of untouchables, to be used as forced
labourers. In it, the 240 million of Hindus have 60 million of untouchables to do
the dirty work of
$$$$$
soavengers and sweepers, which the Hindu is debarred by his religion, to do and
which must be done by non-Hindus, we could be no other than the
untouchables. In it the 240 million of Hindus have the 60 million untouchabls
who can be used as shock-absorbers in slumps and dead-weight in booms for in
slumps it is the untouchable who is fired first and the Hindu is fired last and in
booms the Hindu is employed first and the untouchabls employed last".
Dr. Ambedkar’s untiring labour, and his utterances are as fresh as ever. If
we, the Dalits have to free ourselves from this age-old slavery, the only way is
to seek economic redressal. IIn-Less we can stanl on our own and are better off
sconomically, social equality has no meaning. Social equality is running away
the more one tries to be after. All the Govt. efforts at trying to raise the
standards of the untouchables, amounts to a hoax. As Will be noted from the
very recent cases of atrocities on the untouchables, the root cause of all the
suffering is more economic. At the core of the whole issue is the problem of
land-distribution, inadequate wages, and the jealousy of the caste Hindus at the
betterment prospects of the untouchables. The caste Hindus seem to feel the
untouchables are pampered children, but in fect it is not so. The Government to
whichever party it belongs has all along proved helpless and innotent to tackle
the problems of the Dalt community. All along there is the lurking fear of losing
196
support of caste Hindus majority. Under such circunstances what hope is there
for the untouchables, but a repetition of that is happening prominently in Bihar
and elsewhere.
Need for organisations like the Dalit panthers is all the more, when all
other agencies have failed. Outsiders cannot realise the depth. of sufferings
faced by the untouchables. It is only those who are one with
$$$$$
them can feel and realise the intensity of their fellow-sufferers. Dalit Panthers
are working to bring to the notice of the Government of the ever incidences of
atrocities, rapes and massacres on Harijans.
In conclusion I would.like to say that as the Dalit Panthers came into
being as a social force, to help ameliorate suffering of their Dalit brethrens, the
organization intends to continue as a social body, We intend to spread our
activities and our Leader's valuable message "Educate, Organize and and
Agitate” to all corners of India. We will have our organisation to work in the
north, particularly Bihar and down South in Andhra pradesh and Tamil Nadu,
besides other backward areas. Our primary concern will be to pressurize the
Government into prompt action and see to that criminals are brought to
judgement immediately, wherever massace and atrocities take place. we will
persuade the Government for prompt implementation of all measures adopted
towards betterment and welfare of the Dalit masses. Dalit panthers would not
identify themselves with any leftist movement or violence. For the present.
Dalit Panthers have no commitment to enter election arena. That however will
be decided by the All India Working Committee of the Dalit panthers.
I request to all the thinking minis and educated persons to come forward
and participate in this our programme for amelioration of inhuman sufferings,
and atrocities etc. of the Dalit masses and minorities in India.
$$$$$
प्रकरण ५
पँथर अधिवेशने, ठराव आणि
समकालीन संघटना
१) दलित पँ थरचे पहिले अधिवे शन
२) ठाणे जिल्ह्यातील पँ थर चळवळ
३) भीमशक्तीचे विराट दर्शन !,दादर
197
४) ठाणे- मुंबई एकत्रितपणे काढलेल्या विधानसभेवरील मोर्चाचे निवेदन
५) दलित एकता परिषद पु णे
६) दलित ऐक्य परिषदे च्या निमित्ताने
७) दलितांचे ऐक्य ही काळाची गरज पँ थर ने ते रामदास आठवले यांची मु लाखत
८) सोलापूर येथे संपन्न झालेल्या दोन दिवशीय राज्यव्यापी अधिवेशनाचा वृतांत
९) अधिवेशनात संमत झालेले ठराव
१०) समकालीन संघटना
११) समता सेना भूमिका व धोरण
१२) दलित मुक्ति सेना
$$$$$
बबन लव्हाले , प्रकाश रामटे के, भिवाजी बडगे , भीमराव नाईक, मधु कर लाडे ,
थॉमस कांबळे , तु का कोचे , विनोद डोंगरे , बबन बनसोड, हर्षकुमार वाघमारे , श्रीकांत
मं डले कर, बबन कठाणे आदि नागपूर शहराच्या विविध क्षे तर् ात राहणारी प्रमु ख पँथर्स
मं डळी नागपूर जिल्ह्याचे ने तृत्व करीत होती. कुणाचे ही मन दुःखावले जाऊ नये यासाठी
नागपूर जिल्ह्याची, शहराची कार्यकारिणी दर सहा महिन्यांनी निवडण्याची प्रथाच
पाडली होती.
198
यामु ळे सु रवातीला भिवाजी बडगे आणि थॉमस कांबळे ला अध्यक्ष होण्याचा
बहुमान मिळाला. सरचिटणीस म्हणून प्रकाश रामटे के, बबन कठाणे आणि तु का कोचे
यांनी जबाबदारी सां भाळली तर जिल्हा सं घटक म्हणून ने हमी बबन बनसोड यांना
ने मण्यात आले एकदा श्रीकांत मं डले कर यांनी सु ध्दा सं घटने च्या सं घटकपदाची
जबाबदारी पार पाडली. भीमराव नाईक हे नियमित सं घटने चे सं रक्षणमं तर् ी राहिले . या
व्यतिरिक्त नागपूर शहराच्या विविध शाखांतील मं डळींनी आपापल्या शाखां ची
जबाबदारी अत्यं त जबाबदारीने सां भाळू न कार्य केले .
दलित पँ थरचा आवाज बु लंद व्हावा तसे च दलित पँ थर सं घटने त कृती
करण्यासोबतच फावल्या वे ळात साहित्य लिहिणाऱ्या तरुणालाही आपली कृती
प्रकाशित करता ये वन ू दलित पँ थर चळवळीच्या बातम्या आदि दे ऊन चळवळीला
शिस्तबध्द स्वरूप प्राप्त व्हावे यासाठी तु का कोचे आदिनी दलित पँ थरचे मु खपत्र
पाक्षिक काढण्याचे ठरविले . मु ख्य सं पादक तु का कोंचे तसे च प्रकाशक भीमराव नाईक
आदिनी प्रयत्न सु रू केले . आणि ३००० दलित पँ थरच्या प्रती छापल्या यासाठी तु का
कोचे यांनी सं पर्ण
ू महिन्याचा पगारच बबन यां च्या हातात दिला होता. ह्या अं काच्या
प्रकाशन समारं भासाठी सु रेश भट आणि प्राचार्य बलराज अहे र यांना दलित पँ थर
कार्यालयात छोटासा कार्यक् रम आयोजित करून बोलाविण्यात आले . दि. १३ मे ७४
रोजी सायं ७ वाजता सु रेश भट यां च्या हस्ते आणि प्राचार्य बलराज अहे र यां च्या प्रमु ख
उपस्थितीत प्रकाशन समारं भ सोहळा पार पडला. दलित पँ थरच्या पाक्षिकामधून
भीमराव नाईक यांनी बे कारीचे आं दोलन दलित पँ थर सं घटने तर्फे करण्यात ये ईल हे
प्रसिध्द झाले होते .
१० जून ७४ रोजी राजा ढाले यांचा विवाह दीक्षाभूमीवर ठरल्यामु ळे त्यांचे
नागपूरला ये णे झाले . यानिमित्त १२ जून ७४ रोजी नागपूर ये थे राजा ढाले यां च्या
प्रमु ख उपस्थितीत बै ठक घे ऊन त्यात आगामी २३, २४ ऑक्टो ७४ रोजी दलित पँ थरचे
राज्यव्यापी पहिले अधिवे शन घे ण्याचे तसे च हे अधिवे शन कसे काय यशस्वी करता
ये ईल यावर सविस्तर बै ठकीत विचार विनिमय करण्यात आला. ज्यांना असे वाटत होते
की दलित पँ थर रूपी वाहनाची राजा ढाले आणि नामदे व ढसाळ ही दोन चाके आहे त
ते व्हा यातून एकाला विस्कळीत केल्याने ह्या वाहनाची गतीच खु ं टली जाऊ शकते ,
यासाठी काही कम्यु निस्ट विचारसरणीचे प्रवक्ते समजल्या जाणाऱ्या प्रवक्त्यांनी तसा
प्रयत्नही सु रू केले ला होता.
$$$$$
199
याच अवस्थे त जाहीरनामा आणि मग 'नामाजाहीर' हा विचारसरणीचा वाद
महाराष्ट् रात धु मसू लागला. सामान्य कार्यकर्त्यां लाही ह्याचे चटके जाणवू लागल्याचे
लक्षात आले . विदर्भातून सामान्य दलित पँ थरचा कार्यकर्ता सु ध्दा पत्र पाठवून ह्याच
सं बंधी विवरण मागवत होता. तर दि. २९ जु लै ७४ रोजी म्हणजे नागपूर
अधिवे शनापूर्वीच रामदास आठवले चे पाठविले ले पत्र मिळाले . त्यातूनही ह्या सर्व
गोष्टीचा स्पष्ट उल्ले ख होता. 'सध्याचा झगडा हा आं बेडकरवाद की मार्क्सवाद असा
आहे , परं तु आपली चळवळ ही आं बेडकरवादीच राहील आदि उल्ले ख रामदासच्या
पत्रात होता.
२३, २४ ऑक्टो. ७४ दलित पँ थरच्या महाराष्ट् र व्यापी अधिवे शनाची सं पर्ण ू
तयारी झाले ली होती. अधिवे शनाच्या महत्त्वपूर्ण कारवाईसाठी हिं दी मोर भवन
ठरविण्यात आले होते . तर खु ल्या अधिवे शनासाठी नागसे न ग्राउं ड (बे झनबाग ग्राऊंड
१० नं पु लाजवळ) ची खु ली जागा ठरविण्यात आली होती. तरी पावसामु ळे भिती वाटत
होती की ऐन वे ळेला पाऊस आला की खु ल्या अधिवे शनाची पं चायत व्हायची! दलित
पँ थरच्या सं बंधित ने त्यांना कार्यकर्त्यांना महाराष्ट् र नी महाराष्ट् राच्या बाहे र उत्तर
प्रदे श, गु जरात, तामिळनाडू आदि राज्यातील सर्व पँ थर्सना अधिवे शनासाठी निमं त्रित
करण्यात आले होते .
२२ ऑक्टो. रोजी सायं काळपर्यं त पँ थर्सची प्रमु ख मं डळी नागपूरला पोहोचली
होती. नागपूर स्टे शनवर जागोजागी बॅ नर लागले ले होते . शिवाय बाहे रून ये णाऱ्या
गाड्यां च्या वे ळेवर स्टे शनवर पँ थर कार्यकर्त्यांचे पथक होते . यासाठी बाहे रून ये णाऱ्या
पँ थर्सना कसलाही त्रास नव्हता. शिवाय त्यांना थांबविण्यासाठी एस. सी. एस. गर्ल्स
हायस्कू ल, पी. डब्ल्यु , एस. कॉले ज, नागसे न हायस्कू , स्वास्तिक हायस्कू ल आदि शाळा
नी कॉले जात त्यांची व्यवस्था केले ली होती. सर्वां च्या राहण्याची आणि जे वणाचीही
व्यवस्था करण्यात आली होती. जे वणाची सं पर्ण ू व्यवस्था इं दोरा बौध्द विहार ये थे
करण्यात आली असून पँ थरचे स्वयं सेवक गाडीने सर्व शाळा कॉले जात जे वण पोहोचवित
होते . दलित पँ थर्सच्या प्रमु ख मं डळीत राजा ढाले , ज. वि. पवार, दादाभाऊ साळवे ,
अरूण कांबळे , रामदास आठवले आणि वसं त धामनकर हे दोन दिवसापूर्वीच म्हणजे दि. २१
ऑक्टो. रोजी नागपूरला ये वन ू थांबले होते .
२२ ऑक्टो. सायं काळी मुं बईचे एम. डी. गायकवाड, एम. एस. अं धेरीकर सोबतच
३०-३५ प्रमु ख पँ थर्स नागपूरला आले . त्याचबरोबर पु ण्याचे रमे श कांबळे , श्याम अवचरे ,
एम बी, जावळे , ठाण्याचे पी. डॉ. भागवत, कसाऱ्याचे सु रेश सावं त, शाम पं डित,
नाशिकच
$$$$$
जयं त भाले राव, करुणासागर पगारे , बाळासाहे ब तिगोटे , औरं गाबादचे गं गाधर गाडे ,
प्रितमकुमार शे गां वकर, उत्तम पवार, कोल्हापूरचे दत्ता जाधव, गोपाळ चांदने , सां गलीचे
नं द ू कांबळे , कळं ब उस्मानाबादचे अशोक गायकवाड, बी. के. भं डारे , साताऱ्याचे एस. सी.
भानगां वकर, बे ळगावचे वसं त राजस, सोलापूरचे बी. के. सावं त, नांदेडचे एस. एस.
प्रधान, भु सावळचे पु ं डलिक भाले राव, जळगावचे पु ं डलिक भै राळे , धु ळ्याचे पु . स. मोरे
तसे च विदर्भाच्या आठही जिल्ह्यातील जिल्हा प्रमु खासोबत तालु का, ग्रामीण
प्रमु खासोबत साडे चार हजार पँ थर्स नागपूरात होणाऱ्या दलित पँ थर अधिवे शनात भाग
घे ण्यासाठी हजर झाले होते .
200
दिल्लीचे अॅड. बापु राव पखिड्डे तसे च गु जरातचे रमे शचं दर् परमारही नागपूरात
दाखल झाले होते . तामिळनाडू मद्रासच्या श्रीमती सत्यवाणी मु थु ह्यांची मात्र
अजूनही प्रतिक्षा होती. परं तु काही अपरिहार्य कारणास्तव त्या ये ऊ शकत नाही हा
टे लिग्राम मिळाल्यावर थोडी निराशा झाली. तरीही हिं दी मोर भवन ज्याला पँ थर
भागवत जाधव हे नां व दे ण्यात आले होते . दि. २३ ऑक्टो. ७४ रोजी सकाळी १० वाजता
श्रीमती सत्यवाणी मु थु यां च्याऐवजी गु जरात दलित पँ थरचे अध्यक्ष रमे शचं दर् परमार
यां च्या हस्ते अधिवे शनाचे उद्घाटन करण्यात आले . (हिं दी मोर भवन) क् रां तीपुत्र
भागवत जाधव नगर हॉल पँ थर्सनी तु डुंब भरले ला असून अर्ध्यापे क्षाही अधिक पँ थर्स
कार्यकर्ते व्हरांड्यात आणि अन्य जागी बाहे र उभे होते .
अधिवे शनाच्या उद्घाटनानं तर अधिवे शनात घे ण्यात ये णाऱ्या महत्त्वपूर्ण
ठरावां वर सर्वं कष चर्चा करण्यात आली. दुपारी ४ वाजता दलित पँ थरचा जाहीरनामा
राजा ढाले यांनी विशद केला. त्यातील सं पर्ण ू भूमिका त्यांनी आपल्या वक्तृ त्वातून
मांडली आणि टाळ्यां च्या आवाजात सर्वांनी जाहीरनाम्यास प्रतिसाद दे ऊन स्वीकृत
केले . तसे च दलित पँ थर्सच्या घटने सही सर्वानु मते मं जुरी प्राप्त झाली. सायं काळी ५-३०
वाजता घटने स मं जरू ी प्राप्त झाल्यानं तर रात्री ९ ते १२ वाजे पावे तो महाराष्ट् राची
कार्यकारिणी सर्वानु मते निवडण्यात आली. अध्यक्ष राजा ढाले आणि महाराष्ट् राच्या पाच
विभागासाठी पाच उपाध्यक्ष बबन लव्हात्रे, गं गाधर गाडे , एस. एम. प्रधान, जयं त
भाले राव आणि पु ण्याचे रमे श कांबळे हे पाचही पँथर्स महाराष्ट् र कार्यकारिणीवर
सर्वानु मते निवडण्यात आले .
अधिवे शनाचे वै शिष्ट असे की, २३ ऑक्टो. रोजी दिवसभर पाऊस असला तरी
कार्यकर्त्यात उत्साह मात्र व्दिगु णीत होता. दुसऱ्या दिवशी पावसाने थोड़ी मे हरबानी
दाखविली असली तरी नागसे न ग्राउं ड, बे झनबाग मै दानावर अतोनात पावसामु ळे काही
जागी पाणी साचले होते . मु रुमाचे ट् रक्स ताबडतोब बोलावून खडड्याना समान करण्यात
आले . दि. २४ ऑक्टो. सायं काळी ६-३० वाजता खु ल्या अधिवे शनाची सं पर्ण ू तयारी
करण्यात ये ऊन १० नं . पु ला शे जारीच मं डप उभारण्यात आला होता. दोन हजार खु र्च्याची
व्यवस्था करण्यात आली होती. दलित पँ थरच्या खु ल्या अधिवे शनाला सु रवात झाली.
ज. वि. पवार यांनी कार्यक् रमाचे सं चालन केले . पँ थरच्या प्रमु खांची भाषणे
आटोपल्यावर दलित पँ थरचे अध्यक्ष राजा ढाले यांनी आपल्या प्रमु ख भाषणाला
सु रवात केली.
$$$$$
डॉ. बाबासाहे ब आं बेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि तथागत बु ध्द यांना
अभिवादन करून तसे च क् रां तीपु त्र भागवत जाधव यांचे स्मरण करून राजा ढाले नी
भाषणाला सु रवात केली, ते म्हणाले , "दलित पँ थर ही चळवळ मे १९७२ पासून
दलितां वर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरूध्द सु रू झाली आणि ती महाराष्ट् र व्यापी
होऊन बसली आहे . एवढे च काय पण या लढावू चळवळीत अभिमानाने या दे शातील
दलित सामिल होत आहे त. दे शभरची दलित जनता पँ थरची आतु रते ने वाट पहात आहे .
पँ थर्सला दे शाच्या कानाकोपऱ्यापासून आमं तर् णे ये त आहे त. दिल्ली, गु जरात ये थे पँ थर
गर्जत आहे . लं डनमध्ये पँ थरचा विभाग सु रू झाला आहे . यावरून दलित पँ थर सर्वत्र
201
फोफावत आहे . वे ळीच तिचा पाया निश्चित तत्वावर रचण्याची नी रोखठोक भूमिका
घे ण्याची वे ळ ये ऊन ठे पली आहे .
"याचा अर्थ असा नव्हे की, पं थरला पायाभूत तत्वज्ञान नव्हते . डॉ. बाबासाहे ब
आं बेडकरांचे विचार पँ थरला पायाभूत होते , परं तु पँ थर दे शभर फोफावू लागली, तसे
राजकीय पक्षाचे डोळे स्वार्थाने लकाकू लागले . या भीमशक्तीच्या चळवळीचा फायदा
डाव्या पक्षांना कसा मिळे ल याच्या कारवाया सु रू झाल्या.
काँ गर् े सला एकमे व विरोधी पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाची कल्पना डॉ.
बाबासाहे ब आं बेडकरांनी मांडली. परं तु दलित पँ थरच्या भूमिकेच्या रिप. पक्षाशी आमचे
रक्ताचे नाते नाही असे आम्ही खाली माना घालून जाहीर करीत आहोत असे म्हटले गे ले.
रिप. पक्षाच्या आजच्या ने तृत्वावर आमचा रोष आहे . परं तु सर्व काळच्या स्पि. पक्षाशी
आमचे नाते नाही असे म्हणणे म्हणजे डॉ. बाबासाहे ब आं बेडकरवादाशी द्रोह करणे होय.
मार्क्सवाद हा जातिप्रभा मोडण्यासाठी नाही तर आर्थिक स्तर मोडण्यासाठी
आहे . परं तु मूळ अस्पृ श्यता व जातियप्रथाच मोडणे हे अवघड काम आं बेडकरवाद्याचे
आहे हे काम ये तील त्यांना बरोबर घे ऊन, न ये तील त्यांना तिथे च सोडून दलित पँ थरला
करावे लागले . १९२६ आणि १९३६ सालचा इतिहास लोकासमोर मांडून डॉ. बाबासाहे ब
आं बेडकरांना कम्यु निस्ट ठरवण्यापे क्षा १९५६ चा इतिहास समोर धरून त्यांना बु ध्दिष्ट
ठरवणे हे च त्यांना न्यायकारी होईल." राजा ढालें नी तब्बल दोन तासपावे तो खु ल्या
अधिवे शनातून आपले विचार मांडले . पावसाने यावे ळी साथ दिली. पाऊस उघडला होता.
परं तु खु च्यपिक्षा जनता अधिक असल्यामु ळे लोक चिखलातही मु ख्य रस्त्यापावे तो उभे
राहन ू ऐकत होते . यावे ळी सात हजाराच्याजनसमूहाने ह्या सभे ला साथ दिली. (बबन
लव्हाने यां च्या “विदर्भातील दलित पँ थर चळवळीचा इतिहास” या ग्रंथाच्या आधारे )
$$$$$
आपले
एकनाथ जाधव
बाळ भोईर
वि. सो. शिंदे
पी एस. रोकड
दे वराम लिहितकर
अण्णा माने
निमं तर् क भारतीय दलित पँ थर, ठाणे जिल्हा
$$$$$
पँथर विचार
डोक्याला कफन बां धन ू आणि तळहातावर शिर घे उन निघाले ल्या ध्ये यवे डया
समता सै निकांची फौज म्हणजे दलित पँ थर !
- प्रा. अरूण कांबळे
203
जब तक शोषण रहे गा, धरतीपर तु फान हो उठें गा। हमारी कतई जिम्मे दारो उसमें
नहीं हैं । विचार और आचार दोनो का जोड़ क् रां ति की दिशा का कदम होगा और उसीका
माध्यम हैं दलित पैं थर ।
- रमेशचंद ्र परमार
Dalit Panthers are the first who reach at the spot of injustice. They are
having good fortune of belonging to Dr. Ambed kar's Communty they have.
inherited the spirit of dedicated work.
- Dr. Sawita alias
Maisaheb Ambedkar.
$$$$$
राष्ट् रीय अधिवे शनाची तारीख २४/२५ नोव्हे ंबर १९८४ ही पक्की झाली. केंद्रिय
कार्यकारिणीने दुसऱ्यांदा घे तले ला हा निर्णय स्वीकारताना जिल्हा, तालु का छावणीचे
कार्यकात्ये थोडे से बिचकतच होते . याही वे ळेस तयारी करून अधिवे शन पु ढे तर ढकलले
जाणार नाही ना? कारण यापूर्वी भिवं डी / मुं बईच्या दं गलीमु ळे ‘मे ’ चे अधिवे शन पु ढे
ढकलावे लागले होते . आणि या वे ळेस ही निवडणूकां चा रागरं ग दिसत होता. तरीही
केंद्रिय कार्यकारिणीच्या पत्रकानु सार हळू हळू कामाला सु रुवात झाली होती. आणि
अचानक दिवं गत पं तप्रधान इं दिराजी गां धी यां च्या खु नाने सबं ध वातावरणात हळवे पणा
आणला. सर्वत्र सर्व कामे ठप्प झाली. प्रचार सभांची जागा बारा दिवसांच दुखवटा
होईपर्यन्त शोकसभांनी घे तली. जाहिर झाले ले कार्यक् रम अशा रितीने पाड पाडले , गेले.
204
अधिवे शनाची वे गाने ये णारी तारीख सर्वांना अस्वस्थ बनवित होती. सरकारी
अधिका-यां च्या पगारां च्या तारखाही हुकल्या होत्या. मदत मिळविणे थोडे से कष्टाचे च
होते ; पण तरीही पँ थर्सनी मोठ्या जिद्दीने कामाला सु रुवात केली. या तारखे पासूनच खरी
कामाला गती आली. रातभर जागून कार्यकर्ते भिं ती रं गवू लागले . ठिकठिकाणी
अधिवे शनाचे बॅ नर्स, पोस्टर्स लावले जाऊ लागले . पत्रके, निमं तर् ण पत्रिका काढणे .
बै ठका, जनजागरणासाठी सायकल मोर्चे, चौक घोषणा गाणी, जाहीरसभा, कोपरा सभा,
इत्यादींना वे ग आला व सर्व वातावरणच ढवळू न निघाले . ज्याच्या त्याच्या तोंडी पँ थर
अधिवे शनाची चर्चा सुरु झाली. मदत करणाऱ्यांनी तन मन धन दे ऊन मदत केली.
या द्वितीय राष्ट् रीय अधिवे शनात यजमानपदाची जबाबदारी मुं बई व ठाणे
विभागाकडे होती. या विभागात निरीक्षक म्हणून रामदास आठवले यांनी प्रत्यक्ष भे टीही
दिल्या. अशा प्रकारे जनजागरण करून लोकमत तयार करता करता अधिवे शनाचा
आदला दिवस ये ऊन ठे पला. या दिवशी छावणी छावणीत बाहे र गावच्या पँथर्स
बां धवां च्या स्वागतासाठीची जय्यत तयारी झाली होती. प्रत्ये क छावणीत जे वणाची व
राहाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कल्याण स्टे शनवर स्वागताचा बॅ नर लावून
दिवसभर कार्यकर्त्ये ठाण मांडून बसले होते . एकदाची गाडी गर्जत आली. आकाशभे दी
घोषणांनी सर्व प्रवाशांचे लक्ष वे धन ू घे तले व अधिवे शनाची जाणीव करून दिली.
छातीवर बॅ चेस, निळ्या रिबिन्स, हातात झें डे , मळले ले कपडे पण अतिप्रसन्न चे हरे .
त्रागा, थकवा पार पळू न गे ल्या सारखा. जयभीम नाद हीच ओळख. स्वागत झाले ,
व्यवस्था झाली आणि दि.२४ नोव्हें ८४ चा दिवस उजाडला.
मात्र रस्त्यात ये णाऱ्या बाबासाहे बां च्या, फुले ंच्या, छत्रपतींच्या पु तळ्यांना
पु ष्पहार अर्पण करून पँ थर्स जवळपासची स्टे शने गाठू न दादरकडे कुच करू लागले .
प्रत्ये क डब्यात
$$$$$
बॅ चधारी पँ थर्स दिसत होते . घोषणांचा, गाण्यांचा पाऊस पडत होता. डब्यातील मं डळी
कौतु क मिश्रीत आश्चर्याने पाहात होती. मोठ्या प्रमाणावर महिला ही सहभागी
झाल्याचे दिसत होते . शाळकरी मु लांचाही उत्साह दांडगा जाणवत होता.
‘विषमते विरुद्ध महायु द्ध’, ‘सम्यकक् रां ती, हमारा सं कल्प’, ही घोषवाक्ये
लिहीले ल्या दे वरूखकर प्रवे शद्वारात स्वागतासाठी यजमान मं डळी उभी होती.
हसतमु खाने स्वागत करून आले ल्या कार्यकर्त्यां ची नोंद करण्याविषयी सु चवित होती.
प्रवे शद्वारा समोरच आतल्या बाजूस ‘शहीद स्मारक’ उभारले होते व त्यावर ‘शहीदां च्या
रक्तावर उभी भारतीय ‘दलित पँ थर’ असे लाल शाईत ठळक अक्षरात लिहन ू प्रत्ये क
अक्षर जिवं त केले होते .
या शहीद स्मारकाच्याच मागे बाबासाहे बांचा भारत दे शात दाखविले ला मोठा
फलक; दुसरीकडे एक बोट वर केले ला फलक. सर्वात वर पँ थर झें डा फडकतोय.
आजूबाजूला चौफेर निळे झें डे , पोचीराम कांबळे दालनाच्याच पु ढे शहीद भागवत जाधव
नगर, ये थे नामां कित गायकां च्या गायनाला केव्हाच सु रुवात झाली होती. दहा बारा हजार
कार्यकर्त्यां च्या समोर उद्घाटन सोहळा पार पाडून अधिवे शनाला सु रुवात होणार होती.
उद्धाटक अजून यायचे होते . ते वढ्यात प्रा. अरुण कांबळे , डॉ. माईसाहे ब आं बेडकर
आल्याचे जाहीर करतात. व लोकांकडून प्रचं ड उस्फुर्त स्वागत होते . 'बाबासाहे ब
205
जिं दाबाद', ‘माईसाहे ब जिं दाबाद’ घोषणा होतात व माईसाहे ब व बाबासाहे ब व गौतम
बु द्धाचा पु तळा ठे वले ल्या त्या जनपीठावर प्रवे शतात. या जनपीठाच्या डाव्या उजव्या
बाजूला सर्वत्र जिल्ह्याचे , राज्यांचे बॅ नर्स भिं तीना लटकवले ले होते . सर्वां च्या चर्चेचा
विषय ठरले ला, चिपळू णकरां चा भला मोठा स्टे ज बॅ नर स्टे जच्या मागच्या बाजूस, मधल्या
खांबांना पँ थर झें डे , स्री पु रुषांसाठी स्वतं तर् व्यवस्था, तसे च पत्रकार / पाहुण्यांसाठी
ही वे गळी सोय केले ली. मनोहर अं कुशांनी सं योजन करून शांतते चं आवाहन केलं . माईनी
पु ष्प वाहिले , हार अर्पण केले व रामदास आठवलें नी प्रास्ताविक मांडले . भारतीय दलित
पँ थरचा कणा असले ल्या या पँ थरने आपले विचार मांडताना म्हटले , "भारतदे श आपला
आहे बाबांचा विचार व निळा झें डा घे ऊन आम्ही गे ली बारा वर्षे वाटचाल करीत आहोत,
आमच्या खऱ्या कामाला अडविण्याचा प्रयत्न कित्ये कांनी केला. करीत आहे , पण जरी
रक्त सांडले तरी हा ध्वज खाली पडू दे णार नाही. छातीचा कोट करून त्याला सां भाळू
(टाळ्या) भारत दे शातील जनते ने हे समजून घे तले पाहिजे . (रामदास आठवले आगे बढो/
हम तु म्हारे साथ है ) जर सर्वच जण एकत्र आले तर सामाजिक व आर्थिक समता
निश्चित आणू. (घोषणा... स्वतः थांबवतात)
नियोजित स्वागताध्यक्ष तथा पँ थरचे जन्मसाक्षी पु रुष उमाकांत रणधीरांनी सर्व
जणांचे स्वागत केले . (ते वढ्यात सु पर् सिद्धसाहित्यिक / नाटककार विजय तें डुलकर
ये तात) त्यांचेही त्यांनी स्वागत केले व म्हणाले हे पँ थर्स महाराष्ट् रात पहिली ठिणगी
पे टविलीत, खे डोपाडी नव्हे तर भारत व बाहे रही बाबांचा विचार तु म्ही पोहचवलात. तु मचे
स्वागत असो ! अभिनं दन असो ! (गर्दी वाढत आहे / महिलांचा भरणा वाढत आहे .)
उद्घाटनाचे नियोजित उदघारक भाई माधवराम बागल हे कोल्हापूरचे समतावादी
विचारवं त वयाची नव्वदावी गाठत आहे त. त्यांची तब्बे त अचानक बिघडल्याने ‘मला
मरण
$$$$$
आले तरीही मी ये ईन’ असे अभिवचन दे ऊनही ये ऊ शकले नाही. म्हणून सु पर् सिद्ध
साहित्यिक विजय तें डुलकर यांनी पँ थर ध्वजारोहण करून उद्घाटन केले . उद्घाटनीय
भाषणात त्यांनी मांडले , “पँ थरचे सु रवातीचे स्फोटक दिवस मी पाहिले त. ती फुलतां ना मी
पाहिली. चळवळीतल्या वातावरणाबाहे रचा माणूस ही जागा होऊन उठला होता. या
तरुणांनी सत्ते त वाटा मागावा असे वाटत होते . या चळवळीतून एक शक्ती मिळे ल असे
हितचिं तकांना वाटत होते . पूर्वीच्या ने तृत्वाचा फरक जाणवत होता. निस्वार्थीपणा होता.
भवितव्य होते , पण ने तृत्वापाठी अनु भव व अभ्यास नव्हता. ते गळ्यात पडलं . त्यांनी
आश्वासनांची पूर्ती केली नाही. त्या प्रमाणात ती ताकद जोपासली, वाढविली नाही.
माझी अपे क्षा आहे हे का झाले याची कारणे पहावीत. एकत्र बसून नीट तपासणी करावी.
धडे घ्यावे त. नव्याने पु ढे जावे . थोडी पीछे हाट झाली तरी नवे नवे ने तृत्व, कार्यकर्त्ये
आले त यातून नव्याने चळवळ जोम धरील. ही चळवळ सर्व तळागळातल्या माणसांची
होईल अशी अपे क्षा. दे शाचं चित्र बदलत आहे . हे चित्र तपासून सं धी सोडू नये .
काळाप्रमाणे या चळवळीचे स्वरूप घडावे . ज्या चळवळीचे ने तृत्व पहिल्या प्रतिचं
तिच सत्ते पर्यन्त पोहचे ल. कुठलीही चळवळ लढाऊ घोषणावर चालत नसते . लढाईचा
अभ्यास, डावपे च, शत्रूची ताकद माहित असायला हवीच. लढाई लढायचीच आहे .
माघार घ्यायची नाही. पु न्हा ही चळवळ मागे गे ली तर मला फार वाईट वाटे ल. फाटाफू ट,
206
मतभे द या पलीकडे ये ऊन तं टे बखे डे मिटवावे त. आता नवी सं धी ये त आहे . शहाणपण व
सावधपणाने पु ढे जावे .”
उद्घाटन सोहळ्याचे पाहण ू े म्हणून बोलतांना गु जरातचे कार्यकर्त्ये नथु भाई
सोलं की म्हणाले , “आम्ही सर्व दलित असलो तरी मनाने दलित नाही. (टाळ्या). आम्हा
जिद्दी तरुणांना बाबासाहे बांचे स्वप्न साकार करायचे आहे . (टाळ्या) आम्ही तर सं घटन
बनविण्यासाठी, वाढविण्यासाठी आलो आहे . ज्यांनी सं घटन बनवून खु र्च्या बळकावल्या
ते समाजाच्या प्रश्नावर तोंड काळे करतात.(टाळ्या) शै क्षणिक सं घटना शिवाय पर्याय
नाही. पण शिक्षण खरे कोणते ? जे आमच्या त्यागावर मोठे होऊन आमच्या पासून तूटुन
जातील ते शिक्षित नाही (टाळ्या) खे डोपाडी हे पँ थरचे वारे घु मावे त. फू टपाड्यावृ तीचे
पँ थर छावणीत जाऊन झोपताहे त, इथे आले ले पँ थर मु डद्यामध्ये जीव ओतण्यासाठी
आले त. (टाळ्या). गु जरात प्रदे शाचे अभिवादन आहे .”
लखनऊ मं डलचे डी. के आनं द सु रुवात करतांना म्हणाले , “करोडोके मसीहा
बाबासाहे ब को मै प्रणाम करता हूँ अत्यं त जोशपूर्ण व प्रभावी शै लीत
श्रोतृ वर्गाच्या अं गात चे तना त्यांनी निर्माण केली. ते भाऊकपणे व गदगदन ू म्हणाले ,
“आज अशा भूमीचे पवित्र दर्शन होत आहे की, त्या भूमीतून उगवले ल्या बाबासाहे ब
नामक सूर्याने सर्व जगाला प्रकाश दिला (टाळ्या) आमचे दुर्भाग्य की; आम्ही त्यांना
डोळ्यांनी पाहू शकलो नाही. आम्ही अने क वर्षांपासून वर्तमान पत्रातल्या बातम्या
वाचीत होतो आणि रोमां चित होत होतो की, कोणते ते नौजवान आहे त जे आपले जीवन
कुर्बान करायला तयार झाले त. रक्त घाम अटवीत आहे त. (टाळ्या) पॅ थरचा जन्म
आमच्याकडे झाला आणि त्याच दिवसापासून अत्याचाराला टक्कर दे ण्याची हिम्मत
आमच्यात आली. पँ थरच्या निर्मातीपासून दुष्मनांची तोंडे आम्ही ठे चली. (टाळ्या)
पँ थरमु ळे आजवर तरी ७ जिल्ह्यात वस्ती जाळण्याची छाती कोणाची झाली
$$$$$
नाही. दे हलू ीच्या प्रकरणात आम्ही अग्रभागी राहन ू छाती ताणून त्याचा सोक्षमोक्ष
लावला. याचा परिणाम म्हणून राजकीय क्षे तर् ात काम करणारे दलित तरुण पँ थर कडे
ओढले गे ले आहे त. यापु ढे भावने च्या आहारी जाऊन नव्हे तर अत्यं त खात्रीपूर्वक ते
म्हणाले , “बस्स! आता महाराष्ट् र भूमीचा केंद्रीय स्तरावरचा आम्हाला आदे श हवा
आहे ,उत्तर प्रदे शाच्या कोपऱ्या कोपऱ्यात तो आम्ही पोहचवू.” वाराणशी मं डलचे
अरविं द कुमार सिद्धार्थ ही अत्यं त जोशात बोलले .
पँ थर ने ते तथा आघाडीचे वक्ते प्रा. अरुण कांबळे हे उभे राहताच टाळ्यांचा
कडकडाट झाला व घोषणा निनादल्या. त्यांचे या वे ळचे भाषण उद्घाटकीय भाषणाच्या
थोड्या रोखाने व उस्फू र्त असे होते ते म्हणाले , “पँ थर ही शक्तीशाली सं घर्षाची घोषणा
आहे . दलित श्रमिकां चे राज्य यावे ही आमची धारणा आहे . बाबासाहे बां च्यानं तर सं पर्ण
ू
भारतभर फक्त एवमे व शक्ती पँ थर फोफावत आहे . अन्याय, अत्याचाराला बिनतोड
उत्तर दे णारी ही सं घटना दलित, शोषित, पीडीतांचे एकत्रिकरण करण्यात यशस्वी झाली
आहे . तसाच पक्ष आम्हाला हवा आहे . १९८० च्या अधिवे शनात भारतीय दलित पँ थर हे
नाव धारण केले ली ही सं घटना आहे .”
सं पर्ण
ू भारतभर प्रचं ड टाळ्या व घोषणा ऐकू ये त होत्या. महाराष्ट् र राज्याचे
अध्यक्ष व अने क सं कटांना तोंड दे वन ू बऱ्याच दिवसानं तर पँ थर्स समोर उभे राहिले ले
गं गाधर गाढे हा एक कुतु हुलाचा विषय होता. त्यांचेही ते वढयात जोरात स्वागत झाले ते
207
म्हणाले , “भारतभूमीत आज परत एकदा सिद्ध झाले आहे की, हे एकमे व सं घटन आहे .
२००च्यावर खून खटल्यात १०७ खून खटल्यात न्याय मिळवून दे ण्याचा प्रयत्न पँ थरने
केला आहे .” नामां तरावर बोलतां ना ते म्हणाले , “नामां तराचा प्रश्न आम्ही सोडणार
नाही. आमच्या निष्ठा प्रेरणा आता नामांतरात गु ं तल्या आहे त. (टाळ्या) या निमित्ताने
आम्ही आमची शक्ती अजमावली, तमाम समतावाद्यांनी आम्हाला पाठींबा दिला. आम्ही
दे शाचा विचार करतो.
जातीयवाद्यांनी हा दे श खायचे ठरविले आहे . पं जाब,आं धर् हे काही उसळते प्रश्न
पाहन ू आम्हाला तु कड्याच्या नकाशाची धास्ती वाटते . आम्ही दे शावर प्रेम करतो. अहो
आम्हाला गावकुसाबाहे र ठे वले , दुःख दिले तरी ही दे शावरचे प्रेम आमचे तसूभरही कमी
झाले ले नाही(टाळ्या) . दे शातल्या प्रत्ये काने आत्मपरिक्षण करावे . दुःखाने व्यथित
झाले ला हा दलित काय करील याची खं त ये थील लोकांना का वाटत नाही? आम्ही
तु कडा मागण्याचा विचार करीत नाही,आज तरी मनात तसा विचार नाही. “त्यांनी
सं योजित हिं दी काव्यपं क्ती ऐकवल्या,
माना की इस जहाँ को गु लशन ना कर सके हम कू छ काटों को कम कर गये
जहाँ से गु जरे थे हम |”.
समते च्या आड ये तील त्यांचा काटा काढू” (टाळ्या), असा बु लंद इशारा शे वटी त्यांनी
दिला.
सं योजक मनोहर अं कुश विजय तें डूलकरां च्या भाषणाकडे वळवून म्हणाले , “बाढ
का पाणी बह गया,बां ध का बाकी है और जिसका नाम भा.द. पँ थर है (टाळ्या).
$$$$$
यानं तर उदघाटन प्रसं गीचे व अधिवे शनाचे शे वटचे भाषण अध्यक्षा डॉ.
माईसाहे ब आं बेडकरांचे झाले .
त्यां च्या भाषणात इं दिराजींना त्यांनी व सर्व जणांनी श्रद्धांजली वाहिली. फ् रें च
क् रां तीतील सूत्राबाबतचे त्यांचे विवे चन व ‘दे वाकडे प्रार्थना’ करतो आदिसारखी
वाक्ये सु ज्ञ आं बेडकरवाद्यांना खरचटल्यावाचून राहिली नाहीत. डॉ माई साहे बां च्या
भाषणाने मात्र पूर्वीचा स्फुर्तीशाली ताबा खं डीत झाल्यासारखा वाटला. सर्वसामान्यां च्या
हृदयालभिडणारे व त्यां च्या बोलीपासून दरू असले ले हिं दी इं गर् जी मिश्रीत भाषण तसे
् मं तांना विचार करायला लावणारे झाले . प्रथम सत्र समाप्त झाले .
बु दधि
चर्चा सत्राला व्याख्यानाचे रूप आले होते . त्यामु ळे एक एक वाक्यच बोलल्या.
२) दुसरे चर्चा सत्र ‘दलित आणि अल्पसं ख्यांक एकते वर एस.एम.प्रधान यां च्या
अध्यक्षते खाली पार पडले .’ ‘मं डल आयोगाच्या’ माध्यमाद्वारे ८ 0 टक्के मागासवर्गीय
एकत्रित आले तर राजकीय बदल घडून ये ऊ शकतो. आज कोणत्याही पक्षासमोर
कार्यक् रम नाही उच्च वर्णीयांनाच निवडणूक तिकिटे मिळतात, यात परिवर्तन घडवून
सर्वांना प्रतिनिधीत्व दे ण्यासाठी एकजूट आवश्यक आहे ” असे त्यांनी आपले मत मांडले .
208
तिसरे चर्चा सत्र 'दलीत अत्याचार उपाय योजना’ या विषयावर आयोजिले होते .
मनोहर अं कुश या विषयावर बोलायला यावे त असे च पँ थर्सना वाटत असावे म्हणून
योग्य व्यक्ती कडे योग्य विषय दिल्याची पसं ती म्हणून टाळ्यांचा प्रचं ड कडकडाट
झाला. सर्वत्र घोषणा निनादल्या. आपल्या ने हमीच्या पद्धतीनु सार त्यांनी सु रुवात
केली,
चां भाराच्या मु लाने जमीन खरे दी करावी ही बाब सर्वाना दुखावणारी ठरली. आणि
अत्याचार सु रु झाला.उमलत्या वयाच्या तरुणींना बलात्कारले गे ले. कोवळ्या बालकांना
हवे त फेकू न त्यां च्यावर गोळ् या चालविण्यात आल्या. दारू पिऊन तर्रर्र होऊन रात्रभर
कोंबडीचे जे वण जे ऊन बलात्कार करणाऱ्या राधे , सं तोषा नावाच्या गु ं डांनी उजाडता
उजाडता तरुणींच्या गु प्तां गावर बं दुक ठे वून त्यांना ठार केले . जीवन उजाड केले . आता,
उपाय काय असावा ? अरे जशास तसे उत्तर द्या. पँ थर (टाळ्या) पण विध्वं स करू नका;
नवनिर्माते व्हा! आम्ही तर नवनिर्माण करतो, त्यालाच लोक आडवे ये तात. त्यांनाच
आम्ही तोडू (टाळ्या). इं दिरा गां धीना ठार केले त्या मागे धार्मिक भावना आहे . भारत
दे शाला हिं दुस्थान म्हणण्याची भयानक गोष्ट घडते आहे . पण आम्ही बौद्ध
नवनिर्माणाद्वारे ‘भारत’ निर्माण करू. इथला मं तर् ी तिरूपतींच्या दे वळात लोटां गण
घाले ल तर हे चालणार नाही (टाळ्या). १९२७ साली ‘मनु स्मृ ती’ जाळली तरीही दे श
सु धारला नाही. बाळासाहे ब दे वरस हा हिं द ू ने ता ‘मनु स्मृ ती’ का जाळीत नाही? कारण ते
जाणून बु जून झोपी गे लेत. त्यांना लाथे नेच जाग ये त असते . ‘तु म खु द हो बु लंद की खु दा
तु म्हे पु छे तु म्हारी सजा क्या है (वा! वा!!) दुर्बल माणसाचा सन्मान जागा होतो ते व्हा तो
सबलांना खाक करतो. आमच्यात गट म्हणून न्याय ही बात चूक आहे . गटच नाहीत.
पँ थर्सना झें डा घे तला आहे कोणासारखी तस्करी नाही केली (टाळ्या ), विश्वनाथ
प्रतापसिं गसारखा एस्. आर.पी.चा पहारा आपल्या घरावर नाही ठे वला (वा! वा!) आम्ही
घाबरत नाही आणि कोणाला घाबरवतसु ध्दा नाही. ‘मनु स्मृ ती, रामायण' यांनी राष्ट् रीय
एकात्मता ये णार नाही, ही एकता बाबासाहे ब शिकवतात. त्यांनी दाखवले ली समता;
त्यांचा सं घर्ष हाच आजच्या अत्याचाराला रोखू शकतो. आपला लढा तीव्र करूया”
209
चौथे व्याख्यान न्याय व्यवस्थे वर होते . अॅड. प्रीतमकुमार शे गावकर व अॅड.
राजबक्ष यांनी विचार मांडले . अॅड. शे गावकर म्हणाले , “कायद्याद्वारे बाबासाहे बांचं
स्वप्न साकार होईल. पण ये थील पोलिस यं तर् णा बदमाश आहे . त्यामु ळे अन्यायाला
तोंड दे ण्याची तयारी ठे वावी लागते . दं गलखोर, हत्यारे खु शाल सु टतात म्हणून सामाजिक
न्याय मिळे ल याची शाश्वती नाही” अँ ड राजबक्ष म्हणाले , “पोलिस अधिकारी
कर्तव्यापे क्षा जातीवर जास्त प्रेम करतात. कोणत्याही न्यायाबाबत आपल्या घरावर
दरवाज्यावर लिहा, मु लांना सां गा की, ‘शासक बना! पँ थर हा खाक करणारा विद्यूत
प्रवाह (करं ट) आहे हे दिसूद्या. पोलिस मागे हटे ल ( हं शा/टाळ्या) खां द्यावरल्या
झें ड्याला ‘कफन' समजून वाटचाल करा. (टाळ्या),
दलित व मु स्लिम ऐक्यावर बोलण्यासाठी इक्बाल साब व अजित रामपु रे
(सोलापूर) यांनी उपस्थिती लावली. रामपु रे तडफदार मोजक्या शब्दात म्हणाले , “जात
धर्म विरहीत पँ थर आहे . नामांतर प्रश्न का सु टत नाही? दलित, मु स्लीम एकत्र आले
तर हिं दुस्तान चे दलितस्थान बनवायला वे ळ लागणार नाही.”
ठराव
३) अनु सचि ू त जाती व जमातींना मिळणाऱ्या सवलती केंद्र शासनाने बौध्दांना त्वरीत
मं जरू कराव्यात. डॉ. बाबासाहे ब आं बेडकरां च्या ने तृत्वाखाली धर्मांतरीत झाले ल्या पूर्व
स्पृ शां च्या अनु सचि
ू त जाती जमातींना मिळणाऱ्या सवलती धर्मातरामु ळे काढून
टाकण्यात आल्या. वस्तु तः धर्मातरानं तरही त्याच आर्थिक, सामाजिक स्थिती न
बदल्यामु ळे त्यांना सवलती चालू ठे वणे हे न्याय व तार्कि क दृष्ट्या सु संगत होते . परं तु
त्याच्यावर अन्याय करून त्यां च्या सवलती केंद्र शासनाने काढून घे तल्या काही
काळानं तर त्यांना शै क्षणिक व आर्थिक सवलती मं जरू करण्यात आल्या. तथापि नोकरी
सवलती अदयाप नाकारण्यात आल्या आहे त या सर्व सवलती केंद्र शासनाने त्वरीत
मं जरू कराव्यात.
210
४) अनु सचि
ू त जातीजमातींना सं विधान व शासनाच्या कायद्याप्रमाणे प्राप्त झाले ले
नोकरी विषयक आरक्षण व आरक्षणाची टक्केवारी अनु सच ू ीसह भरून काढण्यात यावी
तसे च विद्यापीठ, शै क्षणिक सं स्था, न्याय व्यवस्था, सै न्यदल व प्रशासनात दलितांना
त्यांच्या लोकसं ख्ये च्या प्रमाणात प्रतिनिधीत्व दे ण्यात यावे .
६) खाजगी, सहकारी, निमसरकारी सं स्था, उद्योगधं दे यामध्ये अनु सचिू त जाती / जमाती
व बौध्द यांना आरक्षण मिळण्याची तरतूद करण्यात यावी. अनु सचि ू त जाती जमाती
बौध्दां च्या उमे दवारांना विनातारण व विना जामीन कर्ज सर्व बँ केतून दे ण्यात यावे . या
सं बंधात बँ क कर्मचाऱ्याकडून सं बंधीताना होणारा त्रास नाहीसा करणे . नियमाची
क्लिष्टता नाहीशी करावी.
$$$$$
७) भटक्या विमु क्त जाती / जमातींना त्यां च्या लोकसं ख्ये च्या प्रमाणात सवलती
दे ण्यासाठी केंद्र शासनाने प्रतिसरी थर्ड शे ड्युल निर्माण करावी. या जमातीच्या
निवासाची व नोकरीची जवाबदारी खासगी क्षे तर् ातील उद्योग धं दे सं स्थाकडे सु पर्द
ू करून
तशी कायदे शीर बं धन घालण्यात यावी. भटक्या विमु क्त जातीजमातीची गु न्हे गारी
जमाती म्हणून पोलिसाकडून होणारी छळवणूक सं बंधात बं द करण्यात यावी विनाकारण
छळवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यानात बडतर्फ करण्यात यावे
९) पायाभूत (बे सिक) उधोगधं दे व शे तीचे राष्ट् रीय करण करण्यात यावे . या सं बंधात डॉ.
बाबासाहे ब आं बेडकरांनी ‘स्टे टस ॲन्ड मायनारिटीज’ या ग्रंथात मांडले ल्या विचाराची
अं मलबजावणी करण्यात यावी सद्यस्थित भूमीहीन शे तमजूर यांना महागाई
निर्दे शांकाप्रमाणे किमान वे तन मं जरू करण्यात यावे .
११) बे कारांना महागाई निर्दे शांपर् माणे बे कारभत्ता दे ण्यात यावा. रोजगार हमी योजने तील
कामगारांना महागाई निर्दे शांपर् माणे वे तनवाढ करावी.
१२) भूमीहीनाने आजतागायत हस्तगत केले ल्या पडीक जमिनी गायरान जमिनी, महसूल
व वनखात्याच्या जमिनीची मालकी त्यां च्या नावाने करून दे ण्यात यावी. दलितां च्या
211
हस्तांतरीत झाले ल्या वतनी जमिनी त्यां च्या नावे करण्यात यावी आदिवाशींच्या जमिनी
त्यांना मिळण्यासाठी ज्या प्रमाणे कडक कायदे शीर कारवाई करण्याची तरतूद आहे .
त्याप्रमाणे वरील सं बंधातही व्यवस्था व्हावी,
$$$$$
१४) शहरी भागातील खासगी व शासकीय क्षे तर् ातील झोपडपट् टीच्या वसाहती
मूळच्याच ठिकाणाहन ू न हटविता त्यांना ते थेच कायम करून त्यांना सर्व मूलभूत नागरी
सु विधा उपलब्ध करून दे ण्यात याव्यात. झोपडपट् टी वासीयांना पक्की घरे बां धण्यासाठी
सरकारने अनु दान द्यावे .
१५) भारतीय सं विधाचे थोर शिल्पकार डॉ. बाबासाहे ब आं बेडकर यांचे केंद्र शासनाने
भव्य राष्ट् रीय स्मारक उभारावे व 14 एप्रिल हा त्यांची जन्मदिन ‘विद्यार्थी दिन’ म्हणून
भारतभर केंद्र शासनाने साजरा करावा.
१८) भारतीय सं विधानाच्या 25 व्या कलमात हिं द ू या सज्ञेखाली बौद्ध, जै न, शिख यांचा
समावे श करण्यात आला आहे . ही गोष्ट सर्वांनाच अयोग्य अन्यायकारक असून हे कलम
रद्द करण्यात यावे .
१९) विना अनु दान तत्वावर शासनाने परवानगी दिले ल्या खाजगी अभियां त्रिकी वै द्यकिय
अध्यापन व इतर सं स्थाना सर्व नियम लागू करावे त. प्रवे शासाठी आकारण्यात आले ली
कॅपिटे श फि व डोने शन बं द करण्यात यावे . वै द्यकीय पदव्यु त्तर शिक्षणासाठी अनु सचि
ू त
जाती / जमातीच्या प्रवे शासाठी आरक्षण व शिष्यवृ त्ती दे ण्यात यावी.
212
२०) भारतातील राष्ट् रीय एकात्मता धोक्यात असून दे श विभाजनकारी शक्ती
दिवसें दिवस प्रबळ होत आहे त. या शक्तींना विरोध करण्यासाठी जाती निमूर्लनाचा लढा
अधिक बळकट करणे आवश्यक आहे . त्याचबरोबर सर्व धर्मियांना अल्पसं ख्यांना
समानते ची वागणूक मिळणे महत्वाचे आहे . दे शाची अखं डता व एकात्मता नष्ट करणाऱ्या
जातीयवादी, वं शवादी सांपर् दायिक प्रतिगामी शक्तींचा समूळ उच्छे द करण्यासाठी
सर्वांनी लढा दे णे आवश्यक आहे . त्याच बरोबर अशा सं घटनावर बं दी घालण्यात यावी.
डॉ. बाबासाहे ब आंबे डकरां च्या निधी मी बु दधि ् वादी विज्ञाननिष्ठ लोकशाही
समतावादी विचारच या दे शाची एकात्मता कायम ठे वू शकेल. असा आमचा ठाम
विश्वास आहे . या दे शांची एकत्मता व अखं डता कायम राखण्यासाठी सर्व दलित शोषित
पिडीत व लोकशाहीवादी भारतीय जनते नेबुद्ध परिपक्व होणे आवश्यक आहे . असे आम्ही
आवाहन करीत आहोत. या दे शातील राजकीय लोकशाहीचे सामाजिक व राजकीय
लोकशाही रुपांतर होण्यासाठी दलितां च्या सं घटीत शक्तीची आम्हाला गरज वाटते .
दलिताचे न्याय प्रश्न सं सदीय व लोकशाहीच्या मार्गाने सु टले पाहिजे त
$$$$$
अशी आमची धारणा आहे . सं सदीय लोकशाहीतील सर्व त्रुटी व सध्याची निवडणूक
पध्दत या मध्ये दलितहितवर्धक बदल होणे आवश्यक आहे . या दे शात लोकशाही
समतावादी शक्ती प्रबळ होण्यासाठी दलितशोषितांचे राज्य स्थापण होण्यासाठी
भारतीय दलित पँ थर प्रतिज्ञाबं ध्द आहे . या दे शातील प्रतिगामी भांडवली
वर्णावस्यवादी शक्तीचे प्राबल्य राजकारणात अधिक असून या शक्तींना ने स्तनाबूत
करण्यासाठी लोकशाही समतावादी परिवर्तनशील शक्तीची एकजूट करणे आम्हाला
नितांत अनिर्वाह वाटते . प्रस्थापित शक्तीच्या विरोधात जनआं दोलन उभे करुन
दलित, शोषीत, पीडीत जनते च्या हिताचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण यांचा
आम्ही शपथ पूर्वक पु रस्कार करतो.
वरील सर्व प्रस्ताव समान महत्वाचे आहे त, याचाही आम्ही आग्रहपूर्वक उद्घोष
करीत आहोत.
213
$$$$$
रामदास आठवले
सिध्दार्थ विहार
हॉस्टेल, वडाळा
मुं बई - ४०० ०३१
दि. ४ जु लै १९८५
प्रति
मा. शिवाजीराव पाटील निलंगे कर
मु ख्यमं तर् ी,
महाराष्ट् र राज्य,
विधानभवन, मुं बई.
सविनय जयभीम
महोदय,
भारतीय दलित पँथर या राष्ट् रीय एकात्मते शी बां धिलकी मानणाऱ्या मोर्चा
विधानसभे वर ये त आहे . भारतीय सं विधानातील वै चारिक मु ल्यांना आधार भूत मानून
214
सत्ता प्रामाणिक प्रयत्न होताना दिसत नाहीत. सामाजिक आर्थिक समते चा प्रभावी
कार्यक् रम राबविला जात नाही. दलित मागास वर्गीयां च्या घटने ने दिले ल्या राखीव
जागांना विरोध करून दे शाची अखं डता व एकात्मता धोक्यात आणण्याचा कट
शिजविला जातो आहे . राखीव जागा बचाव लोकशाही बचाव अशीच आमची भूमिका
आहे .
१) मोर्चातील मागण्या
आस्मिते लाच विरोध करण्याचा प्रयत्न झाला आहे . दे शाचा हा घोर अपमान आहे . अशा
हिं सात्मक घटनाद्रोही आं दोलनाचा भारतीय दलित पँथर तीव्रपणे निषे ध करीत
आहे . हे आं दोलन थां बविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने कठोर उपाययोजनांचा अवलं ब
करावा.
४) दलित - मागासवर्गीयांचा नोकऱ्यातील बॅ कलॉग पूर्ण भरे पर्यं त रोस्टर पद्धत चालू
ठे वावी.
७) राखीव जागांचा विरोध करणाऱ्यावर राष्ट् रीय सु रक्षा कायद्याखाली अटक करावी.
215
दे गारा ५२% प्रमाण असणाऱ्या इतर मागासवर्गीयांना २८% राखीव जागा वाढवून
दे ण्याची मं डल आयोगाने केले ली शिफारस योग्य असून केंद्र व राज्य शासनाने मं डल
आयोगाने केले ल्या शिफारसी लागू केल्यास महाराष्ट् रतील २७२ व भारतातील ३७४३
जातींना त्याचा फायदा मिळणार आहे . आपण हा महत्वपूर्ण निर्णय घे ऊन पु रोगामीत्वाची
परं परा असणाऱ्या महाराष्ट् राची शान राखण्याचा प्रयत्न करावा.
$$$$$
216
४) बे कारांना काम द्या!
दे शात बे कारी वाढायलाच नको होती. परं तु ती वाढली! का? कारण शासनाचे धोरण
चु कीच्या मार्गाने वाटचाल करीत राहिले ! वास्तविक "प्रत्ये क हाताला काम दे ण्याची
शासनाने धोरणात्मक निती राबविली असती तर सध्या दिसणारे बे कारीचे चित्र पालटता
आले असते . बे कारांची समस्या सोडविणे अत्यावश्यक असूनही तसा प्रामाणिक प्रयत्न
केला गे ला नाही तर काही वर्षातच बे कारी प्रचं ड वाढे ल.
१) बे कारांना काम द्या अन्यथा काम मिळे पर्यं त महिना ३५० रू. बे कारभत्ता द्या.
$$$$$
१) बं द पडले ल्या गिरण्या व कारखाने त्वरीत चालू करावे त. मालक चालविण्यास तयार
नसतील तर शासनाने ताब्यात घे ऊन चालू करावे त.
२) कामगारांना किमान ३५ रू. ७५ पै से वे तन मिळाले च पाहिजे .
३) महानगरपालिकेत काम करणाऱ्या कामगारांना दोन वर्षात कायम करा.
४) महानगरपालिका कामगारां च्या सर्वां गीण विकासाची योजना राबवा.
217
१) दलितां वरील अत्याचार थांबविण्यासाठी स्वतं तर् पोलिस दलाची स्थापना करा. २)
दलितां वर अत्याचार करणाऱ्या समाजघटकां वर कडक कारवाई करा.
३) दलितांना स्व:सं रक्षणार्थ शास्त्रां चे परवाने द्या.
४) ज्या गावात अत्याचार होईल त्या गावाची ग्रामपं चायत बरवास्त करा.
$$$$$
आपले विनित,
रामदास आठवले
प्रा. अरुण कांबळे
अॅड. प्रितमकुमार शे गां वकर
टी. एम. कांबळे
दयानं द मस्के
रमे श इं गळे
आशोक बच्छाव
बी. के. सावं त
मनोहर अं कुश
दिलीप जगताप
डी. एम. गायकवाड
उमाकां न्त रणधीर
218
सु रेश बारसिं ग
कमले श यादव
प्रेम गोहील
विठ् ठल शिं दे
एकनाथ जाधव
व्ही. के. बालन
तानाजी गायकवाड
गौतम सोनवणे
$$$$$
ठराव क् रमांक १
“दलित ऐक्या सं बंधी”
ठराव क् रमांक २
“रीडल्स” सं बंधी
$$$$$
ठराव क् रमांक ३
“मराठवाडा विद्यापिठ नामांतर”
२७ जु लै १९७८ रोजी महाराष्ट् र राज्याच्या दोन्ही विधि मं डळात मराठवाडा
विद्यापिठाला “डॉ. बाबासाहे ब आं बेडकर मराठवाडा विद्यापिठ” असे नाव दे ण्याचा
एकमु खी ठराव सं मत होऊन सु ध्दा अद्याप पर्यं त शासनाने ठरावाची अं मल बजावणी
केले ली नाही. त्याचा ही परिषद तीव्र शब्दांत खोट व्यक्त करून शासनाने त्वरित
सदरील करावाची अं मलबजावणी करावी अशी ही परिषद मागणी करित आहे .
ठराव क् रमांक ४
“मं डल आयोग”
ठराव क् रमांक ५
"राजीव जागा"
ठराव क् रमांक ६
"मूलभूत विकासासाठी"
220
दलितां च्या मूलभूत प्रश्नांची निगडीत असणारे सर्व आं दोलन तथा भविष्यात
ये णाऱ्या निवडणूका दलितां च्या एकजूटीच्या जोरावर एकत्रितपणे लढविण्यात
याव्यात. अशी ही परिषद एकमु खी ठराव करते .
221
जर भे टले तर सां गेन की “दादासाहे ब आपल्या समाजाचे ऐक्य झालं ”, बलु तेदार
सं घटने च्या पु णे विभागाने या ऐक्याला पाठींबा व्यक्त केला त्याच प्रमाणे शं करराव
खरातांनीही शु भेच्छा सं देश पाठवला, बाबूराव बागु ल या आद्यदलित साहित्यकांने तर
प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवून नव्या तरुणांनी मला उभे केलं असं सां गितलं . गिरीश
खोब्रागडे , बा. को. गाणार, हं सराज गजभिये , मोहन वाघमारे , रतन कुमार पाटलीपु तर्
यांनी आपली स्पष्ट मत मांडली.
ही परिषद खरी एकात्म, दलित ऐकता परिषद होती. कारण या परिषदे ला उपस्थित
झाले ले विविध उपे क्षित तथा अन्य मागास समाजाचे प्रतिनिधी आपणहन ू उपस्थित
होते .
$$$$$
केवळ उपस्थितच नव्हते तर त्यांनी एकू णच दे शाच्या जडण घडणीचे व त्यात आपल्या
स्थानाचे चित्र उभे केले . चर्मकार, मातं ग, भटके विमु क्त, मे घवाल वाल्मिकी, वडार,
सं घट नाचे प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी, विचारवंत व साहित्यिक असा विविध
क्षे तर् ातील प्रतिनिधींची ही खरी 'ऐक्य' परिषद होती.
या परिषदे तील घटकांचे प्रति निधी अत्यं त जिव्हाळयाचे व पोट तिडकीने बोलले .
भटाकया विमु क्तांचे प्रमु ख बाळकृष्ण रे णके अत्यं त तडफेने म्हणाले , "हे ऐक्य
महत्वाचं , तरी थोडसं कठीण आहे . घटने पेक्षा ध्ये य निष्ठता, एकनिष्ठता महत्त्वाची आहे .
स्वतं तर् विचारांमुळे मतभे द असले तरी कार्यनिष्ठा जोपासावी. ने तृत्वापे क्षा
आं बेडकर अनु यायी म्हणून आम्ही काम करु" थोर साहित्यक लक्ष्मण मानें कार्यकर्त्यां च्या
व्यापक व्यासं गावर व अनु भुतीवर बोट ठे वतांना म्हणाले , "आमचे प्रश्न दलित
ने त्यानाही कळतात की नाही कोण जाणे . थोरले भाऊ म्हणून तु मच्यावर जबाबदारी आहे .
आपण ठराव करावा व आमच्याही राज किय हक्कासाठी लढावे . बाबासाहे ब तर आमची
आस्मिता आहे त. आमचं मुं डकंसु द्धा त्यां च्या चरणावर उतरवून आम्ही ठे वू."
मातं ग समाजाचे ने ते विठ् ठल साठे अत्यं त परखड बोलले . सत्य ठासून मांडतांना
म्हणाले "व्यासपीठावर ओरडून सां गणारे ने ते बे ईमान ठरतात म्हणून माझा विश्वास नाही.
ऐक्य कोणी ही करो, कसे ही करो प्रत्ये काने एकत्र प्रतिज्ञा करावी की मी विष खाऊन
मरे न पण समाजाशी बे ईमान होणार नाही. विकल्या जाणाऱ्यांनी सु धारले पाहिजे ,
ऐक्याच्या जोरावर सबं ध लढा उभारू या ऐक्य होतांना समाजाला व आं बेडकर
विचाराशी प्रामाणिक राहा." डॉ. आप्पासाहे ब गोपले हे मातं ग समा- जाचे दुसरे ने ते
एकत्रपणाची मूळ कल्पना मांडीत म्हणाले , "कपड़े बदलले तसे जातीने आपणात बदल,
आपण दलित सारे एकच बौद्ध समाजानं तर जयभिम करीत असतील तर ते मातं गच अन्य
दलित का नाही ? आम्हाला सं धी द्या किंवा नका दे वू पण दलितांच एकीकरण झालं च
पाहिजे ."
मं डप आयोगात ये णाऱ्या अन्य मागास जाती सं घटने चे ने ते अॅड. जनार्दन
पाटील एकजु टीबाबत निःशं क असल्याचे म्हणाले '८०% जनते ची एकजूट काळाची गरज
असे प्रति- पादन त्यांनी केले .
अशोक आं बेडकर यांनी (मु कुंदराव आं बेडकरांचे चिरं जीव ) थोडक्यात बोलतांना
भारतीय बौद्ध महासभे च्या एकत्रिकरणाला पूर्णतः मान्यता दर्शविली. महिला
प्रतिनिधी म्हणून बोलतांना शशीकला दे खणे यांनी पु रुषांबरोबर क् रां ती लढ्यात बरोबर
राहाण्याचे अभिवचन दिले . तर 'प्रति आं बेडकर' समजून फू ट पाडणाऱ्या ने त्यांना
222
चपराक मारली. रिपब्लिकन पक्षाचे , खोब्रागडे गटाचे ने ते हरिश्चं दर् खोब्रागडे म्हणाले ,
“दलित एकता म्हणजे सं पर्ण ू रिपब्लिकनची एकता यासाठी अं तः करण शु द्ध हवं .
रिपब्लिकन ने ते बाल कृष्णन यांनी तर धमाल उडवून. दे णाऱ्या भाषणात प्रथमच
महत्वाचा व वे गळा मु द्दा मांडला की, ' आपलं ऐक्य अने कदा झाल, ते टिकत नाही. आता
दलीत 'यु ती' करा गट किती पण असू द्या आम्ही तसे एकच आहोत."
रा. सु . गवई साहे बांनी राज कीय मु त्सद्याची भूमिका वठवली. बऱ्याच दिवसानं तर
एक रब्बी राजकीय कार्यकर्ता समाजाला खु ल्या दिलाने काही गु पीत कथन करतोय असं
$$$$$
वाटलं . बऱ्याच जणांनी परिषदे अगोदर बै ठक व्हायला हवी होती अशी खं त व्यक्त केली
होती त्याच बरोबर आयु . ऊके यांनी, शे वाळे यांनी सामाजिक, राजकीय, धार्मिक
ऐक्याबाबत विचार व्यक्त करण्याची ही खं त बोलून दाखविली होती, याचा
रचष्तकत्माचा ओझर उल्ले ख प्रा. नरें द्र गायकवाड व आं बेडकर यां च्या गं गाधर
भाषणात आला होताच तरी गबई साहे बानी अगदी जाणीवपूर्वक पत्रकारांना व सभे त ही
सां गितले की आम्ही लवकरच ऐक्य कसं करायच याचा तपशील ठरवू, आपल्या भाषणात
त्यानी Theory of Mirror या महात्मा फुल्याच्या सिध्दांताचा उले ख करून रामदास
आठवले नी आम्हाला आरशाचा सिद्धान्त पु न्हा आठवायला लावला असं म्हटलं . ते
म्हणाले "या परिषदे च रूप हे आरशाच्या सिद्धान्ता सारखं आहे . यातून दे शाचं ने त्यांच
चित्र दिसणार आहे . दलितांची व्याख्या व्यापक आहे . याचा नव्याने विचार करण्याची
प्रेरणा ही एकता परिषद दे ईल. आम्ही १०/१५ वर्षे अं तर कापलं ते कमी ही असे ल पण
दिशा मात्र एकच होती, आं बेडकर दिशा ! या एकीत महत्वाचा धोका आहे ढोंगाचा.
दलित ऐक्यासाठी ही परिषद ठे वून परिसं वाद, चर्चा घडवून आं बेडकर विचार जीवं त
करण्याचा प्रयत्न केले ला आहे . ही परिषद ७ तारखे हन ू २४ ला का आली, तर एकीच
वातावरण वै शिष्ठपूर्ण व्हावं . आता सर्वांना घे ऊन जाऊ, राग विसरू, सं वर्धक समितीची
घटना रिडल्स पु रती आहे . नाक आणि नथीना बाद न करता ऐवय प्रक्रिया वाढवू या.
कुणाविना कोणाची शोभा नाही सर्वामु ळे सर्वाना शोभा आहे . सर्वच इमानदारीचे
आं बेडकरी रक्ताचे पायीक आहे त, कोणी कमी निष्ठावान नाही. समाज परिवर्तन
घडणान्यांनी एकत्र घे ऊन सामु दायिक ने तृत्व कराव. आपला प्रजासत्ताक पक्ष निर्माण
होवो. "
या परिषदे ला पँ थरच्या सं स्था पासून सर्व नव्या जु न्यांचा मिलाप पाहावयास
मिळाला. पँ थरचे धडाडीचे कार्यकत्ये नामदे व ढसाळ आपल्या घणाघाती भाषणात
अक्षरशः कडाडले च. त्यां च्या भाषणा मु ळे पँ थरच पूर्वीचं रणक्षे तर् पु न्हा जागं
झाल्यासारखं वाटलं ऐक्या बावत ते म्हणाले , “२३ ला ऐक्याची भूमिका घे तली आज शि
कामोर्तब झाला आमचा आज वनवास सं पल्या सारखा वाटत आहे " ढसाळांचा ऊर भरून
आल्यासारखे अत्यं त गदगदन ू ते म्हणाले , " जी भूमिका घे ऊन मी आयु ष्यभर जगलो ती
'दलित' भूमिका ये थे मान्य झाली. आता पँ थर कामाला लागू या आता विधान माखले ली
मन आज साफ झाली. सर्व दुही तोडून टाकू .
पूर्वीचे पॅ थर, प्रॅस्टीकल सो फटचे ने ते भाई सं गारे म्हणाले की दलिता मधली
कोडी सोडवायला पाहिजे त. भारतीय दलित पं थरचे केंद्रीय ने ते गं गाधर गाडे थोडे
स्पष्टच बोलून गे ले. प्रकाश आं बेडकरां च्यासाठी निवडणूकीत उमे दवार मार्ग घे तल्याची
आठवण त्यांनी करुन दिली. निळया मशालींचे ऐक्य बड्या बड्यांना बोलत करील असं
223
मांडून ते कळक ळीचे आवाहन करीत म्हणाले , " प्रकाश आं बेडकर पु लोद, भाजप
पक्षाबरोबर का जाता ? निवडणूक यु ती का करता ? आमच्या बरोबर या. आपण एकत्र
जावू. ये त्या ऑ. टोबर पर्यं त ऐक्य झालं च पाहिजे ."
दलित तरुणांचे आशास्थान ठरले ले दोन कार्यकर्त्ये आहे त = ज्यां च्या केवळ
नावाच्या उच्चाराने टाळ्यांचा आणि घोषणांचा पाऊस पडतो. पै की क् रमांक एक आ
रामदास आठवलें चा आणि दुसऱ्या क् रमांकावर आहे त प्रा. जोगें द्र कवाडे दलित मु क्ती
से नेचे
$$$$$
सरसे नापती जोगें द्र कवाडे अं र्तमनातील आवाज गगनाला भिडवीत मने चे तवित नाटय
काव्य शै लीत म्हणाले , ३० कोटी दलितांचं, दे शाचं ऐक्य झाल पाहिजे ऐक्य होईल.
करावं च लागे ल कोण पळतं य बघु या. 'ते ' आले नाहीत, आणि त्यां च्या कडे जाऊन मला
समाधान वाटतं य. ऐक्य झाल्यावर आनं द होईल हा मं च खरा ऐक्यवादी मं च आहे एकी
झाली ना तर आपण करडे ठरू. सै तानां ची थं डगी बां धण्यासाठी मु स्लीम, बौद्ध या सर्वांची
एकी झाली पाहिजे समाजाचे तु कडे होऊ नये म्हणून ऐक्य करा. आपल्या आहुतीतून
पाण्यातून सोन्यासारखा समाज जगला पाहिजे . रामदास भाईंनी, ही परिषद घे तली
चां गलं केलं . आमजनते ला साक्षी ठे वु न ही चर्चा चालू आहे . ने त्यांनी मोठ्या मनाने बना.
तब्बल नऊ तास चालवले ल्या सभा या शे वटी परिषदे या उद्घाटक डॉ माईसाहे ब
आं बेडकर बोलल्या ठाकरें नी अलिकडे च सोडले ल्या एकापु डीचा समाचार घे ताना आणि
माईसाहे बां वर शिंतोडे उडविणारी वृ त्तपत्रे, पु स्तके लिहीणाऱ्यांना समर्पक उत्तरे
दे तांना आं बेडकरी समाजाच सशयी भूतांनी माईसाहे बांना किती छळल याचे प्रत्यं तर
आल्यावाचून राहील नाही. ऐक्याबाबत माईंनी थोडा इतिहासच कथन केला. आपली
अं तिम इच्छा पत्रकारांनी विचारली असता दलितांच ऐक्य व्हाव' हे माझे उत्तर होतं .
माई बाबासाहे बांन लड्याची तु लना करीत म्हणाल्य ‘‘त्यः' सं घटने ची ताकद केव्हाही
होती जनता एकत्र ये तेय. तु म्ही आपसात भांडू नका. चूका झाल्या त्या विसरून जायचं .
ऐक्यल्यान डॉ. आं बेडकरांचं स्वप्नच साकार होईल.” दलितऐक्य परिषदे चे अध्यक्ष
रामदास आठवले यांचे भाषण चक् रमु दर् ां कित होते . पण त्यांनी शे वटी आभार मानले .
त्यांनी अधून मधून केले लय ् ा शे रेबाजीतून त्यांनीही ठामपणे मांडले “आपण बे रजे चं
राजकारण करू वजाबाकीचं नाही. आमची भावना शु द्धच आहे . मित्रहो आमचं चुकलं
तर सां गा. द्याल ती शिक्षा भोगू, आम्ही, पण बाबासाहे बांची चळवळ मात्र फोडू नका.' ."
रामदास आठवलें नी अने क पँ थर कार्यकर्त्यांना घोषणा दे तांना सु द्धा रोखले होते . ते
म्हणायचे द्यायचीच तर दलित एकते ची घोषणा द्या आणि "आगे बढो" म्हणून पु ढे
एकट्याला पाठवू नका. पु ढे धोका आहे . मी कुणाचा 'आगे बढो सर्वजण आगे बढो' बोला
असे च त्यांनी अधून मधून सां गितलं .
परिषदे चा वरील वृ त्तांत ध्यानी घे तला तर प्रकाश आं बेडकर, राजा ढाले , प्रा
अरुण कांबळे यांनी हे तू विषयी घे तले ली शं का मात्र फोल ठरते ज्यांनी हे तू जाणून
घे तला नाही त्यांनी हे तवू रच शं का घ्यावी यात कोणाच्या हे तच ू ा नक्की सं शय ये तो हे
सु ज्ञांना कळायला वे ळ लागत नाही. ऐ.य पारिषद होत असतांना निमं तर् णही दिले लं
असतांना, वरील कार्यकर्त्यांनी हजर न राहन ू विरोध दर्शविणे शिवाय त्याची जाहीर
वाच्यता अशा स्फोटक वातावरणात करण किती सं युक्तीक आहे ? इथे पोक्तपणा
कोणात आहे ? दलीतां च्या चळवळीचं माते रं करुन स्वतःच्या प्रतिमा उं चावण्याचा
यत्न तर मागे नाही ना? 'डॉ. बाबासाहे ब आं बेडकर विचार सं वर्धक समिती' ऐक्याची
224
प्रक्रिया दृढ होण्याचा प्रयत्न करते म्हणजे ने मक काय करते ? सं वधं क समितीचे
प्रमु ख मानले ले बाळा साहे ब आं बेडकर
$$$$$
$$$$$
225
दलित पँथरचे अध्यक्ष रामदास आठवले यांची प्रा. विठ्ठल शिंदे यांनी घेतलेली मुलाखत
शहाणपणातून ने त्यां च्या ऐक्यापे क्षा जनते चे ऐक्य साधण्याचा प्रयत्न केला. ने त्यां च्या
ऐक्याशिवाय जनता एकत्र ये णार नाही असं ही वाटू लागलं आं बेडकरी विचाराशी
एकनिष्ठ असले ल्या लोकांनी, ने त्यांनी एकत्र यावं असा आमचा प्रचार सततचा होता.
ये वले ये थे १३ ऑक्टो. ८५ धर्मांतर घोषणा सु वर्ण महोत्सवाच्या प्रचं ड सभेतही व
महाराष्ट् रभर आणि दे शभर सर्वत्र एकीची भूमिका जाहीरच मांडली आहे . खरं तर
आमचा एकत्रीकरणाला विरोध असे लच कसा? जिथे पँ थरची निर्मीतीच मु ळी
समाजाच्या एकत्रिकरणाच्या गरजे तन ू निर्माण झाली. समिती टिकावू आहे का ? यापे क्षा
ती टिकावू असावी असं च मी म्हणे न. आणि आता या समितीपर्यं त न थांबता कायम
स्वरुपाचं ऐक्य आपण करावं . तशा प्रकारचा प्रयत्न जनते च्या वतीने करावा. ऐक्य
भोंगळ, तकलाद नको.
ऐक्य कायम स्वरुपी टिकविण्या साठी 'ने ता कोण' हा प्रश्न वादाचा बनण्याची
शक्यता नाकारता ये त नाही. त्यासाठी विशिष्ट पद्धत ठरणं आवश्यक आहे . ने ता
226
निवडीची खास पद्धत असावी. चार, सहा लोकांनी मान्य केल्यावर कोणीही ने ता
सर्वमान्य होत नाही. आमचे ने ते बाबा साहे बच तरीही समाजाचं ऐक्य करीत असतांना
लोकशाही पद्धतीने एखादी प्रमु ख व्यक्ती निवडावी. हे सूतर् सर्व ने त्यांनी मान्य केलं
तर ऐवयाच्या प्रक्रिये त बाधा ये णार नाही. लोकशाही पद्धतीने निवड होत नसे ल तर
त्या चाकोरीतच निवड व्हावी, सदरचे ऐक्य ने ता बनण्यासाठी किंवा बनविण्यासाठी नाही
असं मी समजतो, ते केवळ त्यासाठी होत असे ल तर आम्ही सं कुचित वृ त्ती मोडून काढू.
ऐक्य होतांना द्वितीय क् रमांकावरील कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे ; त्यां च्या
साठी वे गळ्या पद्धतीची कार्यप्रणाली तयार केल्यास हा प्रश्न सु टेल. तशी बां धणी
करावी लागे ल. समितीतील लोक फुटू शकतील; पण फुटणार नाहीत असं मला वाटतं य.
एका तीव्र भावने पोटी आम्ही एकत्र आलो असलो व न फुटण्याची सूची किंवा सं हिता
आज आखले ली नसली तरी न फुटण्यातच सर्वांचे होत आहे याची जाणीव सर्व पक्व
कार्यकर्त्यांना आहे च.
ने तृत्वावरील अं धविश्वास, व्यक्तिवाद किंवा साध्या गोष्टीची जाहीर वाच्यता न
करण्याचे बं धन पाळू न समजून उमजून घे तल्यास व बोलण्यात, वागण्यात एकवाक्यता
ठे वल्यास पु ढच्या गोष्टी सोप्या जातील असे मला चळवळीच्या अनु भवातून समजून
चु कले आहे . समिती काही काळ हवी, पण सतत असली तरीही तिच्या निमित्ताने कायम
स्वरुपी ऐक्य राहू शकते त्यासाठी छोटे मोठे गटही बरखास्त करण्याची तशी गरज
नाही.'
आं बेडकरी चळवळीच्या दृष्टीने दलित समाजाची एकू ण सामाजिक, राजकीय व
धार्मिक जडणघडण कशी असावी? "राजकीय पक्ष 'रिपब्लिकन पक्ष' असावा सामाजिक
प्रश्नांसाठी भा. दलित पँ थर, धार्मिक सं घटना एक असावी. या सर्वांची एकमे कां शी
सहकार्य,
$$$$$
227
करावी लागे ल. ठराविक वे ळ दे वन
ू आम्ही त्यांना सं धी दे व,ू सु धारण्याची वाट पाहू
नाहीतर समाजाने बहिष्कार टाकावा अशी तरतूद करू.
$$$$$
सोलापूर
दि. ३ व ४ जून १९८९ रोजी भारतीय दलित पँथर महाराष्ट् र राज्याचे तिसरे
राज्यव्यापी अधिवे शन पँथर शहीद राजा तळभं डारे मं चावर ठीक १ वा. २० मि. सु रु
झाले . खास भारले ल्या 'नॉर्थ कोट' मै दानावरील या नगराला म.फुले नगर तर
प्रवे शद्वाराला शाहीर अण्णाभाऊ साठे अशी नावे दे वन ू स्मृ ती जाग्या करण्याचा यत्न
केला गे ला होता. नियोजित अध्यक्ष रामदास आठवले यांनी बसूनच अध्यक्ष पदाची सूतर् े
हाती घे तल्यावर स्वागताध्यक्ष टी. एम्. कांबळे यांनी प्रमु ख पाहुण्यांना पु ष्पहार घालून
त्यांचे स्वागत केले . अधिवे शनाचे उद्घाघाटक अॅड. रमे शचं दर् परमार यांनी मे णबत्या
पे टवून उद्घाटन केले . गं गाधार गाडे यां च्या हस्ते मंडपा समोरील पटांगणावर झें डा
वं दन झाले .
उद्घाटकीय सत्रात चित्रा दे शपांडे, लक्ष्मण गायकवाड, रामदास आठवले व
रमे शभाई परमार यांची भाषणे झाली. मं चावर मोहन पटे ल, प्रा. गायकवाड, शरणकुमार
228
लिं बाळे , दयानं द मस्के, रमे श इं गळे एस. एम. प्रधान, अशोक बच्छाव, सु रेश सावं त,
बारशिं गे, यशपाल सखदे , सीता सावं त, पु रण मे शर् ाम, सं जय पगारे , अनिल गोंडाणे , राघू
मकवाना, अजिज रामपु रे , सु मित कांबळे , बाळभोईर, विठ् ठल शिं दे उपस्थित होते .
सदर सत्रात गु जरात दलित पँथर प्रमु ख व दलित साहित्यिक भाई
रमे शचं दर् परमार यांचे अत्यं त मार्मिक उद्बोधक व सडे तोड भाषण झाले . पँथर
केंद्रीय समितीच्या अध्यक्षीय समितीच्या सदस्यांपैकी एक असले ल्या या पँ थरच्या
राष्ट् रीय ने त्याने आपले सूतर् बद्ध सं यमी भाषण करताना म्हणले ...
“स्वातं त्र्यपूर्व काळ हा त्यागाचा काळ होता, आता भ्रष्ट् चाराचे आणि
वशिले बाजीचे यु ग आले आहे . परं तु या म्हणायला त्यागी असले ल्या यु गात
पददलितांसाठी काही केले जात नव्हते व त्याचमु ळे बाबासाहे बां च्या लढ्यात सर्व
‘हिं दुस्तान’ नव्हता. डॉ. श्रीनिवासन यां च्या ‘जाती सं घर्ष’ ह्या ग्रंथाद्वारे दलित व
शोषक या दोन जातींमध्ये सं घर्ष अटळ आहे . पण अशा यु गातही भारताचे राजकारण
घोषणां वर चालले आहे ; हे मोठे च आश्चर्य होय. कोणाला हिं द ू म्हणायला गर्व वाटतो;
मु ळात आम्ही भारतीय आहोत. राजीवजी ही रोज नवनवीन नारे लावीत आहे त. ‘... आगे
बढो हम तु म्हारे साथ है ’ हा नारा आमचा सहकारीही लावू लागले त. याला काय घोषणा
म्हणता ये ईल का? घोषणांनी परिवर्तन होत नसते , दोस्त हो! हिं दस्ू थानचे परिवर्तन
घामाने , श्रमाने होईल. इथे तर पै सा आणि श्रमातच
$$$$$
सं घर्ष आहे . परं तू विजय ने हमी घाम गाळणाऱ्यांचा होत असतो. डॉ. बाबासाहे बांनी हे
प्रतिपादन केले आहे हे च सत्य आमच्या बाजूला आहे .” राजीवजींच्या ‘पं चायत राज’
घोषणे कडे वळू न ते म्हणाले , “१९५६लाच पं चायत राज बाबत बाबासाहे ब म्हणाले होते
की, हे जातीयवाद्यां च्या हातात दिले ले हत्यार आहे . या तत्वावर म. गां धी व बाबासाहे ब
यां च्यात सं घर्ष उडाला. ताकद व्यक्तीला दिली जावी, गावाला नव्हे !” गर्व से हिं द ू
म्हणणाऱ्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी म्हटले “हिं द ू आहे त किती? कोण
आहे त हिं द?ू ये थील अस्पृ श्य हिं द ू नव्हते तर ‘नाग’ होते हे बाबां नीच सां गितले .
आदिवासी हे प्रकृतीचे /निसर्गाचे पूजक.
ख्रिचन, शीख, मु सलमान, जै न, हिं द,ू नाहीत. १६% अस्पृ श्य, ७% आदिवासी
एकू ण ३४%, मागासवर्गीय हिं द ू नाहीत. ५% मु सलमान, ३% शिख, २% ख्रिचन आणि म.
फुल्यांचे विचाराचे पु रोगामी वगै रे ४०% एकू ण ८०% लोक अधिक १०% जै न हिं द ू नाहीत.
ू ी आवई का उडवली जाते य. मु स्लिमांनी ओळखण्यासाठी वापरले ला हा हिं द ू
मग हिं दं च
शब्द आहे . यापु ढे ‘भारतीय’ आणि ‘हिं द’ू असा सं घर्ष अटळ आहे . त्यासाठी सावध रहा!
‘वे दान्त’ प्रेरणा मानणाऱ्या मार्क्सवाद्यां ना सं घर्ष शिकवायचा असे ल तर एकच वाद आहे
तो म्हणजे आं बेडकरवाद! नौजवान दोस्तानो, या दे शाच्या मालकां नो ये णाऱ्या यु गासाठी
रक्त घालवायची तयारी ठे वा!” रामदास आठवले यांनी आपले अध्यक्षीय भाषण
चक्कमु दर् ां कित केले लं होतं . ते त्यांनी वाचून दाखविले . त्यांच्या भाषणातील मु द्दे
चिं तनीय होते . स्थानिक पत्रकारांनी, सं पादकांनी योग्य दखल घे ऊन महत्वाच्या बाबी
जनते समोर पु न्हा मां डल्या.
पँथर ताकदीबाबत आठवले म्हणाले , “भा. द. पँ थर प्रामु ख्याने कार्यकर्त्यांची
सं घटना आहे . सं च आहे . पँ थरच्या उदयाबरोबर तरुण पिढीमध्ये एक नव चै तन्य निर्माण
झाले . पँथरच्या ध्वजाखाली हजारो, लाखो कार्यकर्त्यांची एक दमदार, कसदार पीढीच
229
तयार झाली. आज महाराष्ट् राबाहे रही पँथरचे महान कार्य चालू आहे त्याचे सारे श्रेय
त्यागपूर्वक आणि निष्ठे ने कार्य करणाऱ्या हजारो पँथर कार्यकर्त्यांना आहे .”
अधिवे शनाचे उद्दिष्ट स्पष्ट करतां ना त्यांनी नमूद केले की, “महाराष्ट् रात घडणाऱ्या,
दे शात घडविल्या जाणाऱ्या गं भीर गोष्टींवर तितकाच गं भीर विचार विनीमय
करण्यासाठी व काही भरीव ‘निर्णय’ घे ण्यासाठी आणि लढ्याची योग्य दिशा
आखण्यासाठी आमच्या अधिवे शनाचे प्रयोजन आहे .” आपल्या भाषणात त्यांनी
‘हिं दत्ू वाचा’फुगा फोडला आणि व्ही. पी. सिं गाच्या ने तृत्वाखालील जनता दलाच्या
फसव्या व ढोंगी भूमिकेचा पडदा टराटरा फाडला. ग्रामीण भागातील परिवर्तनासाठी
त्यांनी मांडले ली भूमिका तर अप्रतिमच होती. मूळ भाषणात नसले ला पण वे ळेवर
सं घटने तन ू जाणाऱ्या किंवा ज्यांचा कोंडमारा केला गे ला त्यां च्याविषयी अप्रत्यक्ष मत
मांडताना ते म्हणाले ; “वाळले ल्या फां द्या आम्ही काढल्या; मन साफ करा. माझ्या पे क्षा
मोठे व्हा! माझ्याजागी अध्यक्ष व्हा! आम्ही साहित्यिक नाही, विचारवं त नाही. खरं तर
मी एक ही आं बा तोडू दे णार नाही. जो जास्त काही करतो त्याला मी ठिकाणावर आणतो.
हा प्रवाह कोणी रोखू शकणार नाही, सर्वजण यात वाहत जातील.” आठवल्यां च्या
अखे री जोडले ल्या तु कड्यांचा मतलब अने कां च्या ध्यानी आला. पण त्यांनी केले ल्या
अप्रतिम भाषणावरचा हा
$$$$$
एक कलं क ठरल्यास नवल नाही. विचारवं तां ची आणि जास्त काही करणाऱ्यांची त्यांनी
धास्ती का घे तलीय हा प्रश्न उपस्थित झाल्यावाचून राहिला नाही..
कार्यकर्ता संमेलन
जोरदार पाऊस पडल्याने पु ढील कार्यक् रमात फेरफार करावे लागले . सायं काळी
(३.६.८९) कार्यकर्ता सं मेलन झालं . कार्यकर्त्यां नी ‘तोंडी’ अहवाल सादर केले . मनोगते
मांडली. या मे ळाव्यात ‘ठाणे ’ जिल्ह्याच्यावतीने कोणीच बोलले नाही. बाकी
महाराष्ट् रातील विविध जिल्ह्यातील प्रतिनिधी बोलले .
क्षणचित्रे
खु ल्या अधिवे शनात - प्रकाश आं बेडकर रिप. पक्षाचे मुं बई प्रदे शचे कार्यकर्त्ये आयु .
जगन्नाथ बावा (एम.ए.बी.एड.), लातूरचे काँ गर् े स कार्यकर्त्ये याकुबभाई, औरं गाबाद था.
रिप. चे माधव दाभाडे यांनी आपल्या कार्यकर्त्यां सह पँ थरमध्ये प्रवे श केला.
गायन
रात्री ने हमी प्रमाणे महाराष्ट् रातील सु पर् सिद्ध गायक गायिकां च्या गीत
गायनाचा कार्यक् रम झाला.
विद्यार्थी संमेलन
230
दि. ४ जून ८९ रोजी सकाळी ‘विद्यार्थ्यांचे सं मेलन’ झाले . विद्यार्थ्यां च्या
समस्यां वर सां गोपां ग विचार करण्यात आला. त्यानं तर लगे च ‘एकात्मते त धर्मां धते चा
धोका’ या विषयावर मान्यवरांचा परिसं वाद झाला. स्थानिक पत्रकांचे सं पादक श्री.
कुलकर्णी (केसरी) प्रा. बे न्नूरवार (सं चार), रं गा वै द्य (सं चार) यांनी भाग घे तला.
अध्यक्षस्थानी पँ थर रमे श इं गळे होते . या परिसं वादात टाळ्या घे णारी वाक्ये
फेकण्यापलिकडे कोणीही विषयाला धरून बोलले नाही. ‘धर्मां धता’ कशात आहे , आणि
तिचा धोका का वाटतो हे वाक्त्यांनाही फारसे उमगले ले नव्हते . बाकी धर्मां धते चा धोका
आहे एवढे मात्र त्यांनी सां गितले . या परिसं वादातील वक्त्यां च्या विशिष्ट बां धिलकी
पत्करून केल्या गे लेल्या भाषणांची चिरफाड करण्यासाठी अध्यक्ष रमे श इं गळे उभे
राहिले . त्यांनी अत्यं त सु तर् बद्ध मांडणी करायला सु रुवात केली आणि माईक बं द पडला
(की पाडला?), आणि जे व्हा माईक आला ते व्हा रामदास आठवले आले . त्यां च्या
आदे शावरून उच्चारले ले वाक्य पूर्ण न करता भाषण सं पवून समारोप केला. त्यानं तर
लगे च शरण कुमार लिं बाळे यांनी पँथर कार्यकर्ता कसा असावा या विषयावर बौद्धिक
घे तलं . ओघ व त्या व जीवं त भाषे त ते बोलले .
$$$$$
शोभा यात्रा
जाहीर केले ली भव्य शोभायात्रा दुपारी निघाली. पु न्हा एकदा निळ्या झें ड्यांनी
आणि तरुणांनी गजबजले ल्या रस्त्यां नी सोलापूर नगरी दुमदुमली. सोलापूरचा ले झीम
नाच या क् रां तीमोर्च्याचे आकर्षण ठरला. रात्री खु लेअधिवे शन झाले . खु ल्या
अधिवे शनात विविध ठराव सं मत करण्यात आले . १) धर्मांध प्रवृ त्ती विरुद्ध ठराव २)
राजकीय ठराव ३) आर्थिक ठराव ४) शै क्षणिक ठराव ५) नामां तर ठराव ६) लहान लहान
राज्य निर्मितीचा ठराव ७) अं तरराष्ट् रीय धोरण ठराव ८) पं चायत राज ठराव असे
अत्यं त महत्वपूर्ण खु लासे वार ठराव मांडले गे ले.
खु ल्या अधिवे शनात वे ळेचे बं धन लक्षात घे वन ू वक्त्याने जत्रेत लावायच्या
तमाशाच्या हजे री प्रमाणे उपस्थिती नोंदविली बहुते क वक्ते पँ टी ओढून दोन
मिनीटातच बाद करण्यात आले . सभे त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या सभे त
मा. गं गाधर गाडे यांचे प्रदीर्घ भाषण झाले . सभे त नारायण धु ळे (डोळे काढले ले), लक्ष्मण
गायकवाड, जगन्नाथ बावा, बाळकृष्ण रे णके, अनिल गोंडाणे , मोहन वाघमारे , अशोक
बच्छाव, आमदार नाइकवाडी, अॅड. शे गावकर, एस. एम. प्रधान, सु रेश सावं त,
रमे शचं दर् परमार यांची भाषणें झाली. अध्यक्षस्थानी रामदास आठवले होते . सभे ला
अं दाजे अडीच तीन लाख लोक उपस्थित होते . सं ख्यात्मक दृष्ट्या अत्यं त प्रभावी पण
गु णात्मकदृष्ट्या सामान्य असे दोन दिवशीय राज्य अधिवे शन शांतते ने पार पडले .
व्यवस्थापकांचा चोखपणा जाणवला पण एवढ्या मोठ्या अधिवे शनाची साधी
कार्यक् रम पात्रिका असू नये या बद्दल आश्चर्य व्यक्त केले गे ले.
231
$$$$$
दे शात दिवसें दिवस धर्मां ध व जातीयवादी प्रवृ त्तीचे प्राबल्य वाढत असून धर्म
भाषा प्रादे शिक अस्मिता उराशी बाळगून आं दोलने केली जात आहे त. ही बाब
राष्ट् रीय एकात्मते च्या दृष्टीने अत्यं त गं भीर असून राष्ट् रापे क्षा धर्म महान समजून
भारताचे हिं दुस्तान बनू पाहणाऱ्या प्रवृ त्ती दे शाची एकात्मता व अखं डता धोक्यात
आणण्यात कारणीभूत ठरतील. असे सं घटने ला वाटते धर्मनिरपे क्ष एकात्म राष्ट् र
उभारणीचा सं कल्प पॅ ं थर करीत आहे त. धर्मनिरपे क्ष लोकशाही स्वतः जबाबदार आधारित
वर्ण हीन आणि वर्ग हिन तथा सं रचना प्रस्थापित करण्यासाठी समता न्याय बं धुता व
स्वातं त्र्याच्या तत्त्वांनी गु ं तले ल्या शोषण आयु क्त समाज निर्माणाच्या दृष्टीने
समाजव्यवस्थे ची पु नर्रचना करण्यात यावी वर्गीय पिळवणूक की पे क्षा जातीय शोषण
अत्यं त क् रूर आणि अन्यायी असते म्हणून स्वर्गीय घोषणा आणि वर्णवर्चस्वाचा विरुद्ध
चे लढे दलित कामगार आदिवासी भटके व विमु क्तां च्या एकजु टीने लढविण्यात ये तील.
232
सरकार कोसळले . विधान सभे च्या धोकादायक सिद्धांताकडे हे तत: दुर्लक्ष होत आहे . ज्या
हिं दुत्ववादी शक्तीपु ढे दे शाचे विभाजन झाले तर त्याच शक्ती बरोबर पु न्हा पु न्हा
हातमिळवणी करणे म्हणजे राष्ट् राचा विश्वासघातच होईल. सत्ताधारी व विरोधी
राजकीय पक्षाने दलित आदिवासी भटके आणि विमु क्त त्यांची मते आम्हालाच
मिळतील, असे गृ हीत धरू नये . भविष्यात जातीयवादी व धर्मांत राजकीय शक्ती केंद्र
व राज्यात सत्ते त तर होणार नाही अशी दक्षता घे ऊनच भारतीय दलित पॅ ं थर राजकीय
धोरणे निश्चित करील.
$$$$$
१) भारतात दीड हजारांवर लहान-मोठे कारखाने आजारी किंवा बं द आहे त त्यामु ळेच
कारखान्यातील कामगारां च्या कुटु ं बास समोर जीवन निर्वाह विषयक मूलभूत प्रश्न उभे
आहे त त्यां च्या दै न्य दारिद्र्यात वाढच होत आहे म्हणून सर्व बं द व आजारी गिरण्या
सरकारने ताब्यात घे ऊन पु न्हा सु रू कराव्यात.
५) कारखानदारी विशिष्ट कुटु ं बाची मक्ते दारी बनली असून केवळ २५ कुटु ं बामध्ये
दे शातील कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न केंद्रीत झाले आहे . त्यामु ळे दे शाचे सरासरी
उत्पन्न वाढले असले तरी दारिद्र्य रे षे खाली जीवन जगणाऱ्या कुटु ं बाची सं ख्याही वाढत
आहे . या कुटु ं बाच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी दे शातील सर्व पायाभूत बड्या उद्योगधं द्याचे
राष्ट् रीयकरण करण्यात यावे .
233
ू त्ता सं कलन आदिवासींच्या उपजीविकेचे मु ख्य साधन असून तें दुपत्ता च्या दर
६) तें दप
वाढीच्या आं दोलनाचे आम्ही स्वागत करतो या धं द्यातील कंत्राटदारी पद्धती बं द
करण्यात यावी.
$$$$$
७) वार्ताहर रोजगार योजने अंतर्गत दारिद्र्य रे षे खालील कुटु ं बातील किमान दोन
व्यक्तींना रोजगार मिळालाच पाहिजे अशी हमी शासनाने द्यावी. मु क्त वे ठ बिगारांना
प्राधान्याने रोजगार पु रविण्यात यावे .
८) साखर कारखाने राजकीय सत्ते ची शक्तिशाली केंद्रे बनली आहे . साखर सम्राटांची
लोपी आर्थिक कल्याणाच्या सर्व योजनां वर एकाधिकार प्रस्थापित करताहे त. साखर
कारखान्याचे चे अरमन पद आणि सं चालक मं डळात घराणे शाही निर्माण झाली आहे .
साखर सम्राट राजकीय सत्ता सं घर्षात महत्त्वाचे ठरत आहे . या साखरे च्या
राजकारणाला प्रतिबं ध घालणारे अनिवार्य आहे . सर्व साखर व सहकारी कारखान्यां च्या
सं चालक मं डळात अनु सचि
ू त जाती-जमातीच्या व्यक्तींना योग्य प्रतिनिधित्व दे ण्यात
यावे .
९) अनु सचि
ू त जाती-जमातीच्या उद्योजकांना विविध वित्तीय महामं डळ व आर्थिक
विकास महामं डळातर्फे मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा रुपये दोन लाख पर्यं त वाढविण्यात
यावी. महामं डळातर्फे होणाऱ्या कर्जाच्या व्याजाचा दर ४% पे क्षा जास्त नसावा.
१०) अं गमे हनतीची कामे करणारे व असं बंधित कामगारासाठी स्वतं तर् कामगार बोर्ड
स्थापन करण्यात यावे . त्यां च्यासाठी विमा पे न्शन इत्यादी योजना राबविण्यात याव्यात.
१३) मं डल आयोगाने मागासवर्गीयां च्या शै क्षणिक व आर्थिक कल्पना साठी सु चविले ल्या
सर्व शिफारशींची विनाविलं ब अं मलबजावणी करावी.
१४) शे तमजु रां च्या किमान वे तनाचे दर निर्दे शांकानु सार निश्चित करण्यात यावे .
$$$$$
234
जमिनी नियमित करण्यात याव्यात. या जमिनीचे पट् टे सध्या जमिनीवर ताबा
असणाऱ्या भूमिहीनां च्या नावे करण्यात यावे .
१६) भारतीय सं विधानात दुरुस्ती करून खाजगी मालमत्ते चा अधिकार रद्द करावा. तसे च
रोजगार अधिकाराचा समावे श मार्गदर्शक तत्त्वात न करता त्याचा समावे श भारतीय
सं विधानातील मूलभूत अधिकारात करावा.
१७) विविध शासकीय प्रकल्प ग्रस्त शे तकरी व रहिवाशांना न्याय नु कसान भरपाई
मिळावी.
$$$$$
235
१) दे वदासी व त्यां च्या पु नर्वसनासाठी विविध कल्याणकारी योजना शासनातर्फे त्वरित
राबविण्यात याव्यात.
२) दुष्काळकाळात पाणी भरण्यासाठी खासगी विहिरींचा वापर करणाऱ्याना विरोध
करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करावी.
३) दे शातील सर्व खे डी,वाड्या व तांड्यांना पिण्याचे शु द्ध पाणी आणि निर्जं तुक पाणी
मिळण्याची सोय करण्यात यावी.
प्रादे शिक मागासले पणाचा अनु शेष भरून न काढल्यामु ळे महाराष्ट् रात स्वतं तर्
विदर्भ राज्याची मागणी वारं वार केली जात आहे . रागा तत्त्वाच्या आधारावर निर्माण
झाले ल्या एक भाविक राज्यात बहुसं ख्य असले ल्या विशिष्ट जातीच्या राजकीय
क्षे तर् ात मक्ते दारी निर्माण झाली आहे . त्यामु ळे इतर अल्पसं ख्याक जातीचा विकास
कुठला आहे विविध विभागात विकासाचा समतोल राखला जात नाही. कोकण विदर्भ व
मराठवाडा विभागाचा विकास केवळ वै धानिक विकास मं डळे स्थापन करून होणार नाही.
सर्व घटकांना विकासाची समान सं धी मिळण्यासाठी छोटी-छोटी राज्य स्थापन करण्यात
यावी.
$$$$$
२) तिवे टी जनते नी चालविले ल्या स्वातं त्र्य आं दोलनाला भारत सरकारने पाठिं बा द्यावा.
तिवे टी जनते ला सर्वतोपरी सहाय्य करावे .
३) भारतातील मूळ वं शीय आदिवासी चक् रसाना भारत पूर्व पाकिस्तान विभाजनाच्या
वे ळी बां गला दे शात स्वातं त्र्य करावे लागले होते . ते बां गला सरकारच्या अत्याचारामु ळे
236
परत भारतात आले असून आसाम व नागालँ ड मधील निर्वासित धावण्यात राहत
आहे त. भारतीय वं शाच्या बु द्धांचे भारतातच पु नर्वसन करण्यात यावे .
१) पं चायत राज्य पद्धती तीत विशिष्ट जाती यां च्यात सरपं चाचे वर्चस्व निर्माण करणारी
आणि पारं पारिक सरं जाम पद्धत सरं जामदार रीप पद्धती अधिक मजबूत करणारी स्त्री
होणार नाही अशी दक्षता घे णे अत्यं त आवश्यक आहे . सरपं च शोषणाचे केंद्र होऊ नये .
त्यांची सत्ता अनिर्बं ध न ठे वता तिच्यावर अत्यं त प्रभावी अं कुश ठे वण्यात यावा. त्या
दृष्टीने आर्थिक व्यवहार विषयक अधिकार असणारे स्वतं तर् पद ग्रामपं चायतीच्या
दलित सदस्याला अनिर्वाहपणे दे ण्यात यावे त. ग्राम विकास योजने साठी दलित
मागासवर्गीय विकासाचे लक्षही निश्चित करण्यात यावे .
$$$$$
समकालीन संघटना
१) यु वक रिपब्लिकन घोषणा पत्र
१४ एप्रिल १९७७
237
बाबासाहे बांची धारणा आणि कल्पना होती. आणि हा पक्ष कसा असावा याबाबतची ध्ये य
व उद्दिष्टे आणि धारणा डॉ. बाबासाहे बांनी दिग्दर्शीत केले ली आहे त. (रिपब्लिकनची
भूमिका लिखीत आहे .) अर्थात या पक्षाव्दारे आपले सामाजिक आणि राजकीय स्वप्न
साकार होणार होते. रिपब्लिकन पार्टी ही आपली राजकीय पार्टी, धार्मीक सं घटना
म्हणून बौध्द महासभा आणि शिस्तबद्ध लढाऊ सं घटना म्हणून समता सै निक दल या सर्व
सं घटना डॉ. बाबासाहे बां च्या मूळ कल्पने तल्या आहे त.
डॉ. बाबासाहे बांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली तमाम दलितांना धर्मातरीत केले
आणि या तमाम दिक्षित बौध्दां ची धार्मीक सं घटना म्हणजे बौध्द महासभा. डॉ.
बाबासाहे बां च्या महानिर्वाणानं तर १९५७ साली डॉ. बाबासाहे बांनी दिग्दर्शित केले ल्या
ध्ये य आणि धोरणाप्रमाणे बाबासाहे बां च्या रिपब्लिकन पक्षाचे सं घटन करण्याचा प्रयत्न
झाला पण त्यात तट पडले , गट झाले आणि प्रत्ये काने आपआपल्या गटात
रिपब्लिकनचे सं घटन केले आणि आजही आपल्यात अने क गटात विभागले ला आणि
राजमान्यता काढून घे तले ला रिपब्लिकन पक्ष उभा आहे . आजही या पक्षाची अवस्था
अतिशय दारुण व शोचनिय आहे . बौद्ध महासभा या धार्मिक सं घटने वी अवस्था हीच
आहे . समता सै निक दलही प्रत्ये क गटात विभागला आणि त्यांचे काम पु ढारी मं डळीस
सलाम ठोकणे या व्यातिरिक्त दुसरे काहीच काम उरले नाही. प्रत्ये क पु ढारी आपला गट
कसा प्रबळ बने ल याकडे जास्त लक्ष दे त आहे . त्याचप्रमाणे आसनाकडे ही अधिक
अधिक लक्ष केन्द्रीत असते . त्यामु ळे ध्ये य धोरण सर्व काही बाजूला रहाते . एकंदरीत या
परिस्थितीमु ळे या गोरगरीब समाजाची फारच शोचनिय अवस्था झाली. या समाजाचे
प्रश्न आवासून उभे आहे त. ते सोडविण्याच्या दृष्टीने कोणी प्रयत्न करत नाही.
समाजात निरुत्साह उदासिनता, नाउमे दपणा याचे साम्राज्य पसरले आहे . या
समाजातील अने क लोक अने क सं घटनामधून काम करीत
$$$$$
आहे त. यामु ळे आपली सं घटना प्रबळ होणे ऐवजी ती अधिकाधिक दबल होत गे ली. या
समाजातील तरुणामध्ये एक प्रकारची उदासिनता किंवा इतर यु वक सं घटनामधून काम
करण्याची वृ त्ती बळावली.
डॉ. बाबासाहे ब आं बेडकरां च्या विचारा पासून दरू दरू जाऊ लागले . गटागटात
विखु रले ले सं घटन असल्यामु ळे या गटात सामील होणे हा विचार काही तरुणास पटे ना.
त्यामु ळे ते गप्प बसले तर काही अतिरे की इतर सं घटना मधून काम करू लागले तर काही
तरुणांनी गटागटातच काम करणे धन्य मानले . पण यामु ळे अन्याय अत्याचार किंवा
समाजापु ढील प्रश्न याचा आवाज मात्र कोणीच उठवे ना. यातून ४-५ वर्षापूर्वी या
गटांचे एकत्रीकरण व्हावे - यासाठी यु वकांचे सं घटन झाले . तर या प्रस्थापित
ने तृत्वाच्या गटबाजी विरोधात आणि अन्याय अत्याचारा विरोधात एक तरुणां च्या
उद्रेकातून ‘दलित पँ थर’ नावाची सं घटना उभी राहीली आणि चार पाच वर्षाच्या
कालावधीत चारपाच गटात विभागली गे ली आणि या सं घटने चे मु ख्य ने तृत्व जे होते
त्या ने तृत्वाने दलित पँ थर बरखास्त करून ‘मास मुं व्हमें न्टची’ स्थापना केली. यामु ळे
त्यां च्यावर रुसवा असले ला एक ग्रुप आपला दलित पँ थरचा ग्रुप वाढावा यासाठी
कामाला लागले . तर पूर्वीच गट पाडले ले. आपला गट प्रबळ व्हावा म्हणून प्रयत्न
करीत आहे त, या सर्व दलित पँ थरच्या गटबाजीला कंटाळले ला आणि रिपब्लिकनच्या
गटबाजीला कंटाळले ला या समाजात उत्साहीपणे कां करण्यास तयार असले ल्या
238
तरुणांपुढे आज प्रश्न उभा झाला की रिपब्लिकन सु ध्दा गटात आहे आणि दलित पँ थरचे
गट दे खील आहे त. मग आपण कोणत्यातरी गटात जावून काम काम करावे ? तदवत
रिपाब्लिकनची राज्य मान्यता काढून घे तली ती कशी काय मिळवायची? समजापु ढील
अने क प्रश्न सोडावायचे आहे त ते कसे काय सोडवायचे ? वयस्कर मं डळीत गट आहे त ते
तरुणात का असावे त? रिपब्लिकन पक्ष बलवान आणि एकसं घ कसा बने ल? डॉ.
बाबासाहे बां च्या रिपब्लिकनचे स्वप्न कसे साकार होणार? दे शांतील गोरगरीब पीडित
समाजाचे आर्थिक, सामाजिक, राजकीय, हक्क कसे अबाधीत रहातील? असे अने क
चक् रावून सोडणारे प्रश्न त्यां च्यापु ढ उभे आहे त. आणि हे सोडविण्यासाठी एकच
यु वकांची सं घटना हवी आहे . आणि या सर्वाचे एकच उत्तर दे ईल अशी एकच सं घटना
म्हणजे “यु वक रिपब्लिकन”
यु वक रिपब्लिकनच का?
239
यासाठी डॉ. बाबासाहे ब आं बेडकरां स अभिप्रेत असले ला रिपब्लिकन पक्ष आणि तो
एकसं घ होण्यासाठी यु वक रिपब्लिकन हा एकच पर्याय आहे .
आपण तमाम यु वक जन्माने रक्ताने आणि विचाराने रिपब्लिकन आहोत. म्हणून
आपली सं घटना ही यु वक रिपब्लिकनच असायला हवी. यु वक रिपब्लिकनव्दारे डॉ.
बाबासाहे बांची सामाजिक, आर्थिक, राजकीय, स्वप्ने साकार करण्यासाठी प्रत्ये काने
यु वक रिपब्लिकनमध्ये सक् रीय भाग घे ऊन झटले पाहिजे . डॉ. बाबासाहे ब हे विचार
साकार करण्याचे सं घटनात्मक दृष्टिने प्राणपणाने झटण्यासाठी यु वकांचे सं घटन म्हणून
आज १४ एप्रिल १९७७ रोजी यु वक रिपब्लिकनची घोषणा होत आहे यात तमाम
आं बेडकर तत्वप्रणालीशी एकरूप असणाऱ्या आणि एकरूप होऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी
यु वक रिपब्लिकनमध्ये सक् रीय भाग घ्यावा.
आपले नम्र
सु रेश सावं त, अरविं द चें बूरकर श्रीकांत तळवटकर, किरण चन्ने , डि. कासारे , विजय
जाधव, वु.ल.सु र्यवं शी, बाबा मोरे , विजय बच्छाव, चु डामन मोरे , वि.सो.शिन्दे,
मो.ज.कटारे , राम पवार, मनोहर जाधव, कांचन उबाळे , गौरव दोंदे , किशोर शे जवळ,
चं दर् कांत ससाणे , गां गुर्डे, आणि इत्तर कार्यकर्ते :
$$$$$
विशे ष सूचना
सु रेश सावं त आणि किरण चन्ने यांनी यु वक रिपब्लिकन साठी कसारा (सी.आर.) जिल्हा
ठाणे ये थन
ू प्रकाशीत केले .
240
$$$$$
241
अं तर्गतबादवी झाली हे म्हणणे सं युक्तिक ठरे ल. आज या अं तर्गत यादवीच्या अवस्थे त व
वै चारिक सं हरमात समाज बां धव असताना अत्यं त प्रतिकू ल परिस्थितीत एका नूतन
सं घटने ची निर्मिती होणे हे चूक की बरोबर हे उद्याचा काळच वर्तविल. बु दधि ् स्ट फ् रं टची
निर्मिती समाज सं क्रमणातील अपरिहार्य ऐति हासिक क् रम आहे याच दुर्दम्य
इच्छाशक्तीवर बु दधि ् स्ट फ् रं टची उभारणी होते आहे .
भारतात हिं दुधमिव बहुसं ख्य आहे त ते जातिये तेच्या असाध्य अशा महाभयं कर
रोगाने ग्रस्त झाले आहे त. कोट्यावधी अस्पृ श बां धवां च्या दुर्धर अवस्थेस व त्याच्या
ह्या अवस्ते स धर्मच कारणीभूत आहे . चातु र्वण्यावर आधारले ल्या व विषमते वर पोसले ल्या
ह्या धर्माचे समूळ उच्चाटन या दे शातून झाल्या शिवाय दलितांची अवनतीं थांबणे शक्य
नाही कारण दलितां च्या व्यथे स जवाब दार हिं दुधर्मं च आहे . हिं दुधर्मात राहन
ू च सामाजिक
व आर्थिक समता निर्माण करण्याचे प्रयत्न वे डगळपणाचे व भामक आहे त. हिं दुधर्मात
दलितांचा स्वाभि मान जागृ त होणे कदापि शक्य नाही. हिं दुधर्म हा दलितांचे
पिळवणूकीचे साधन आहे . हिं दुधर्म अं धश्रद्धा व कालबाह्य तत्वां वर आधारले ला आहे .
दलितां च्या सं घटनास हिं दु धर्मातील जातिव्यवस्थाच विरोध करते . जातिव्यवस्थे मुळे
सारा दलितवर्ग विभागला गे ला आहे . त्यात सं घटीतपणाचा अभाव आहे . व हिं दुधर्मिय
वरिष्ठवर्णीयास तो धारदारपणे प्रतिकार करु शकत नाही. जातिव्यवस्थे च्या आधा राने च
उच्चवर्णीय हिं दु या दे शातील शासनकर्ता झाला आहे व राहणार आहे . दलितांत सर्वात
जास्त नाकेबं दी झाली असे लतर ती नवदीक्षित ५० लक्ष बौद्ध समाजाची आजचा बौद्ध
म्हणजे पूर्वाश्रमीचा महार. कुठलाहि
$$$$$
पीढीजात व्यव साय नसले ला अस्पृ श्यवर्ग म्हणजे महार. प. पू. डॉ. बाबासाहे ब
आं बेडकरांनी दलितांचा जो अभूतपूर्व सं गर् ाम उभा करुन दलितां च्या चळवळीचे जे
ऐतिहासिक पर्व निर्माण केले त्याचे श्रेय खऱ्या अर्थाने पूर्वाश्रमीच्या महारांना दे णे
कृतज्ञते चे ठरणार आहे . बाबासाहे ब आं बेडकरांचा लढा मानवते चा होता. अस्पृ शां च्या
दास्यमु क्तिचा होता एका बाजूने पाच हजार वर्षे सर्वस्व हारले ला, पोचले ला, दारिद्रयाने
खं गले ला व अज्ञानाच्या भयाण अं धारात हरवले ला भु का, कंगाल निशस्त्र दलित वर
दुसऱ्या बाजूस पाच हजार वर्षे सत्ता सं पत्तीचा भरपूर उपभोग घे तले ला व ज्ञान व
शस्त्रांनी मदमस्त झाले ला सवर्ण हिं दु अथवा ब्राम्हण्यग्रस्त अश्या ह्या असमान
शक्तिचा हा लढा होता. एका समाजास समता हवी होती तर दुसऱ्यास विषमता
टिकवायची होतीं. दोघे ही एकाच धर्माचे दोघांचे दे वही ते च परं तु एक दे वळांचा स्वामी तर
दुसऱ्याची सावली म्हणजे विटाळव त्यास दे वळांत मज्जाव. बाबासाहे बांना अस्पृ श्यते चे
मूळच उपटायचे होते . त्यां च्या मते अस्पृ श्य ते चे मूळ जो हिं दु धर्म तो नष्ट
झाल्याशिवाय या दे शात समता ये णार नाही. अस्पृ श्यांना सामाजिक प्रतिष्ठा व
मानवीहक्क, हिं दुधर्मास मिळणे अशक्य आहे . असे त्यांनी ओळखले होते . त्यांना घनघोर
सं गर् ाम अपे क्षित होता परं तु त्यात वर्षेनु वर्षे पीळल्या गे लेल्या दलितांचे रक्त नाहक
सांडवायचे नव्हते . दरिद्री अज्ञानी, असं घटीत दलितांना लांडग्यांस बळी द्यायचे नव्हते .
या दे शाचे अजून तु कडे पाडायचे नव्हते . बाबासाहे बांस शांततामय मार्गांनी समाज
परिवर्तन करा यचे होते . अस्पृ श्यां च्या हृदयात स्वाभिमानाचे वीज पे रावयाचे होते हा
बदल हिं दुधर्माच्या त्यागाने च सु रु होणार होता. अडिच हजार वर्षापूर्वी तथागताने जी
सामाजिक क् रां न्ती केली तिचे प्रवर्तन अपरिहार्य होते . बाबासाहे बांनी तथागतास आपले
242
मार्गदर्शन म्हणून स्विकारले . १४ ऑक्टो १९५६ साली भूतो न भविष्यति असे धम्मचक् र
प्रवर्तन झाले . हजारो वर्ष जु लमाच्या साखळदं डाने जखडले ले अस्पृ श्य मु क्त झाले .
१४ ऑक्टोबर १९५६ साली पाचलक्ष अस्पृ श्य तथागतास शरण गे ले. बाबासाहे ब
आं बेडकरांचा हा भीम टोला मदां ध हिं दं स ू अनपे क्षितपणे बसला. सं घटित दलितां च्या
शक्तिचा सीम अविष्कार पाहन ू सनातनी धर्ममतांड स्तिमित झाले . धर्मातराचा हादरा
अनपे क्षित होता. जु नाट धर्माचे बु रुज हादरले होतें . हजारौ वर्षाच्या दास्य गु लामी विरुध्द
बं डास सु रवात झाली होतो. परं तु दुर्दे वाने १९५६ साली ६ डिसें बर रोजी बाबासाहे बांचे
महापरिनिर्वाण झाले . त्यां च्या निर्वाणानं तर धम्मदिक्षा समारं भ घडले गे ले.
बाबासाहे बां च्या काही निष्ठावं त अनु यायांनी ही धर्मांतराची प्रक्रिया चालू ठे वली. ही
धर्मांतराची प्रक्रिया बांबाच्या मृ त्यूनंतर सु मारे २-३ वर्षेच झाली. नं तर ती थांबली तो
कायमचोच. सु मारे पन्नास लक्ष बौध्द भारतात आहे त. बहुसं ख्य महारांनीच बौध्द
धम्मदिक्षा घे तली. महारे तर अस्पृ श्याने या क् रान्तित स्वःतस सहभागी केले नाही.
बाबासाहे बांस सारा बौद्ध धम्माच्या छत्रा खाली सं घटीत करायचा होता. परं तु त्यांचे
अनपे क्षित निधन झाले व महारे तर अस्पृ श्यांनी जो अनास्था दाखविली त्यामूळे फक्त
महारच बौध्द झाले . काही ठिकाणी अत्यां शाने च व अपवादाने च इतर अस्पृ श्य बौध्द
झाले . महारांनी हिं दुधर्मास लाथाडले परं तु महारे तर अस्पृ श्यांचे गु लामगिरीच्या साखळ
दं डावरच प्रेम झाले ले दिसत आहे , या दे शातील जातियते ची व त्यावर आधारले ल्या
हिं दुधर्माची विषारी पाले मुळे इतकी खोलवर रुतली
$$$$$
243
कशी खपे ल ? त्यांना बौद्धजनांच्या सवलती काढून घे ण्यात व बौद्धांची आर्थिक कोंडी
करुन त्यास नामोहरम करण्यात जो आसूरी आनं द मिळतो त्या मागे शासन कर्त्याचा
बौद्ध धर्मद्वे षच कारणीभूत आहे . वौद्धां पासून इतर बलित कसे विभक्त जाहे वाचे एकच
उदाहरण पु रे से होईल. सवलतींसाठी बौध्दांनी उभारले ल्या लढ्यात बौध्दे तर दलित
मूग गिळू न गप्प आहे त यातच सारी मे ख आहे . बौध्दां च्या लढ्यास जशीजशी तीव्रता
ये ईल तसातसा हिं दुधर्मोयांचा विरोध त्यास / होईल. सं घर्षास धार ये ईल. बौध्दांबर
जु लूम होतील. जु लुमांचे प्रमाण वाढे ल. परं तु जु लमाने सं घर्ष मरत नसल्यामु ळ
बौध्दां च्या समते च्या लढयास विलक्षण ते ज ये ईल. हिं दु धर्मीय बौद्धास दडपण्याचा
प्रयत्न अमानु षपणे करतील. सं घर्षाचे स्वरूप बौद्ध हिं दु असे होईल व त्यात बौध्दे तर
दलित हिं दु बरोबरच बौद्धना झोडपून काढण्यास मागे पुढे पाहणार नाहीत बध्दै तर दलित
मलित असला तरी तो अगोदर हिं दु आहे " अगदी भयानक आहे हे पण हे सत्य आहे .
बौध्वे तर दलित बयां च्या विरोधात हिं दुच्या बाजूस आहे कारण त्यास समते च्या
सं घर्षापे क्षा हिं दु धर्म प्रिय आहे . परिणामी बौद्ध एकाकी पडले आहे त. त्यांचे एकाकीपण
वाढतच जाणार आहे कारण त्यांचा लढा विषमते च्या जन्म दात्यां शी म्हणणे म्हणजे
हिं दुधार्माने जोपासले ल्या ब्राम्हणा विरुद्ध आहे . बाबासाहे ब आं बेडकरांनी घडविले ल्या
धर्मांतराचा चु कीचा अर्थ आज लावला जात आहे . आज बौध्द धर्मियां च्या सं घटना धर्म
सं वर्धन समजून राजकीय फायद्या साठी लढत आहे त. दुसरीकडे धर्मांतर म्हणजे
$$$$$
राष्ट् रांतर अशी खूनशी विचार सरणी असणाऱ्या व जातिव्यवस्थचे समर्थन करणाऱ्या
सं घटनांना बाळसे धरले आहे . राज्यकर्ते अशा सं घटनांस पाठीशी घालते आहे .
विषमते वर आधारले ल्या सं स्कृतीचे निर्लज्ज उदात्तीकरण चालले आहे . बौध्दे तर
दलितांना तर राजकीय सवलती उपटण्याशिवाय दुसरे कसले व इप्सित नाही.
बाबासाहे बांचे असे म्हणणे आहे की राजकारणाचा उगम समाजकारण व धार्मिक
कारणांतन ू च होतो. परं तु आजमितिस लक्षात घे तले तर बौद्धां च्या चळवळीचे राजकारण व
समाज कारण सवलतीं भोवतीच घु टमळते आहे . सवलतींच्या प्राप्तीस बौध्द सं घटनांनी
उद्दिष्टांचे स्वरूप दिले आहे . यःकश्चित सवलतीसाठी धडपडणे चालले आहे .
सवलतींवर अवलं बन ू राहणे हे आत्महत्ये चे लक्षण आहे हे या सं घटनांस समजत नाही.
विषमते त आर्थीक सवलतीचा उपयोग यथातथाच असतो. बौध्दां च्या सं घटना
कोलमडतात त्याला कारण अर्धवट राजकीय, अर्धवट धार्मिक व अर्धवट सामाजिक असा
सरधोपटमार्ग आक् रमिणारे त्यांचे उद्दिष्टहीन ढोबळ स्वरुप. धर्माच्या बाबतीत अक्षम्य
दुर्लक्ष हे एक कारण सं घटनाच्या श्रमापे क्षा सत्ते च्या भागीदारीत सं धी मिळविण्याच्या
प्रयत्नां त बौध्दां च्या सं घटना आहे त. बौध्द हे अल्पसं ख्य असल्यामु ळे तडजोडीचे
नीतिभ्रष्ट राजकारण केल्याशिवाय त्यांस शासन सं स्थे त स्थान मिळत नाही. परिणामी
सं घटनां वर विपरीत परिणाम होवून । सत्ताप्राप्तीच्या दुष्ट राजकारणास बौध्दां च्या
सं घटना बळी पडल्या आहे त. सत्ता प्राप्तीच्या हव्यासापायी भ्रष्टाचार वाढला आहे .
सं घटना सं घटनां त यादवी सु रु झाली आहे . एकाच रक्ताचो माणसे एकमे कास पाण्यात
पाहू लागली आहे त.' गटागटां च्यात लढाया जुं पल्या आहे . तरुणां च्या सं घटनांचे पोते रे
होवून गटागटात त्यांची लक्तरे लोंबू लागली आहे त. याला कारण आहे सत्ते च्या
हव्यासाचे नीति शून्य राजकारण ! धम्म खऱ्या अर्थाने भीनला नसल्यामु ळेच बोध्दांत
एकी नाही आणि धम्म टिकायचा असे ल तर शक्ति पाहिजे . शक्तिीची निर्मिती, क्षणभं गरू
244
राजकीय फायद्यांसाठी समाजाकडे व धामिक बाबींकडे दुर्लक्ष करून होणार नाही. डॉ.
बाबासाहे बांनी धर्माच्या स्वरुपात एक शक्ति आणल्यास प्रदान केली परं तु त्याशक्तीचा
उपयोग नतद्रष्टषणे आपण केली नाही. तडजोडीचे व सत्तास्पर्धेचे राजकारण सनदशीर
मार्गांनी करुन आपल्यापदरी बरे वाईट पडावे या भीकमाग्यावृ त्तीने झटणाऱ्या
बौध्दां च्या सं घटनांनी बौद्ध धर्माकडे दुर्लक्ष केल्यामु ळे फारमोठे शक्तिपतन केले आहे .
धम्म सं घटनां त फार मोठी शक्ति आहे हे आजतागायत बौध्दांनी ओळखले नाही. जे
बहुसं ख्य आपल्या अवनतीस व परवश ते स कारणीभूत आहे त त्यां च्या वर्गां वर आघात
करण्याचौ व अन्याय व विषम ते ला पाठीशी घालणाऱ्या जरठ सं स्कृतीच्या उदरात सु रुंग
लावून तिची लक्तरे जगाच्या वे शीवर टां गण्याची दुर्दम्य इच्छाशक्ति आज बौद्धांत
नाही. नु सत्या उपोषण निदर्शनांनी आपले अस्तित्व टिकविण्याच्या खटाटोपीत
असणाऱ्या बौध्दां च्या अगणित सं गटनांमध्ये साऱ्या जगाचे लक्ष त्यां च्या प्रश्नांकडे
एकवटायला लावण्याची ताकद नाही. बौध्दांचे प्रश्न अश्रू ढाळू न सु टणार नाहीत तर
त्या साठी न भूतो न भविष्यती असा अभूतपूर्व धै र्यशील व कृतीशील सं गर् ाम झाला
पाहीजे . कडवा सं घर्ष झाला पाहीजे . व सर्वस्व पणाला लावून बौद्धांनी यु द्ध केले पाहीजे .
आणि यु द्ध रिकाम्या हातांनी करायचे नसते . स्वातं त्र्य समते चे नगारे बडविणा-या हिं दुनी
उत्कर्षाचे सारे मार्ग दलितांना बं द केले आहे त. दलितांत जागृ त असले ला बौद्ध समाज
$$$$$
हिं दुचे दडपशाहीचे लक्ष्य आहे . या बौद्धां नांच अन्याय अत्याचारास बळी पडावे लागत
आहे . बौद्धां वर होणारे अत्याचार हें पध्दतशीर व सातत्याने होत आहे त. आजचा बौद्ध
म्हणजे पूर्वाश्रमीचा महार. गां वची नींद्य कामे पूर्वी महार करायचा पूर्वी लाचारीने
वागणारा महार बौध्द झाल्यावर स्वाभिमानी झाला व त्याने लां च्छन असले ली घाणे रडी
कामे करण्याचे सोडल्यामु ळे दुष्ट सवर्णांचा सनातनी स्वाभीमान दुखवला गे ला व त्याने
सूडात्मक भावने ने नवदीक्षित बौध्दास छळण्यांस आरं भिले आहे शिक्षणाची कास धरल्या
मु ळे सु शिक्षितांची बे कारी व गां वची कामे सोडल्यामु ळे अशिक्षितांची बे कारी यामु ळे या
समाजास बे कारीचा प्रश्न भयानकपणे भे डसावीत आहे . उत्पं न्नाचे साधन नसल्यामु ळे
दारिद्र्याच्या खाईत बौध्द सापडला आहे . बौध्द धर्माबद्दल एक पारं पारीक द्वे ष या
दे शातील ब्राम्हण्यग्रस्त समाजात असल्यामु ळे धर्मांतरी तांना त्या द्वे षासही बळी
पडावे लागत आहे धर्मांतर केले तरी बोध्दांचा सामाजिक स्तर उं चावला नाही. अजूनही
अस्पृ श्य म्हणूनच त्याची गणना होते . बौध्दां त प्रतिकाराची भावना असल्यामु ळे
सनातनी सवर्णाच्या आत्याचाराला बळी प्रामु ख्याने बौध्दच ठरतो. या दे शातील
उत्पादनां च्या साधनांपासून तो डावलला गे ला आहे . बौद्योगिक प्रक्रिये त तो
झिडकारला गे ला आहे . राजकारणात त्याला प्याद्या सारखें उपयोगात आणले जात आहे .
सामाजिक उत्थानात त्याला सहे तुक टाळले जात आहे . केवळ नोकऱ्यां वर अवलं बन ू
राहण्याशिवाय वा भीक मागण्याशिवाय त्याला गत्यं तर नाही. बौध्द बां धव खे ड्यातील
अत्याचारास कंटाळू न पोटाची खळगी भरण्यासाठी औद्योगिक शहराच्या झोपडपट् टीत
की ड्यामुं ग्या सारखे जीणे जगतो. आहे . त्याची गु लामगिरी सं पली नाही. सं पत नाही.
त्यां च्या दृष्टीने स्वातं त्र्याची पहाट अजून उगवलीच नाही. तो अजून परतं त्र्याच्या
शृं खले त पोचतो आहे . तो गु लाम आहे . आणि गु लामाचे प्रथम कर्तव्य असते
पारतं त्र्यातून व परवशते तन ू मु क्त होणं . त्याला पूर्ण स्वातं तर् मिळाले पाहिजे . त्याचा
पिढ्यानपिढ्या हिसकावून घे तले ला स्वातं त्र्याचा सर्गिक हक्क त्याला मिळाला पाहीजे
245
बौध्दांनी दे खील दिखाऊ चळवळी कम ने भळा प्रतिकार करण्यापे क्षा आपल्या मूलभूत
हक्कासाठी स्वातं त्र्य प्राप्तीसाठी सं गर् ाम केला पाहीजे . गु लामगिरीचा व जु लमाचा
अतिरे क झाला आहे . ने भळचार कारस्थानी चळं वळीद्वारे व लढाईशिवाय
स्वातं त्र्यप्राप्ती, समता अशक्य आहे .. बौध्दांना एकच ध्ये य पाहीजे दास्यक्ति
परक्यां च्यापासून भिक मागून काहिही निष्पन्न होणार नाही. परके बौध्दांस कधीच मदत
करणार नाहीत. बौध्दांनी स्वप्नातही असे आणू नये की त्यांना सनातनी धर्म मार्तं डां श
यु ध्द टाळता ये ईल. गु लामगिरीतून मु क्त होण्यासाठी तु मु ल यु ध्दाशिवाय पर्याय नाही.
म्हणून प्रत्ये क बौध्द बां धवाने पक्षप्रेमाने उद्यक्त होण्यापे क्षा रक्त प्रेमा सं घटीत
होण्यातच त्याचे सं रक्षण आहे . गु लामगिरीच्या अनन्त सवलतींपेक्षां त्वातं त्र्याचा व दास्य
मु क्तते चा एकच हक्क प्राणमोलाचा आहे . भाषणे . निदांनांनी व घोषणां च्या खै रातीपे क्षा
एकाच ध्ये याने प्रेरीत होवून शिस्त बध्दते नें केले ला प्रचं ड उठावच साऱ्या जगात
असं तोषाचा डोम पे टवील. बौध्द भ्याड नाहीत. निर्बल नाहीत. तर दुर्दे वी आहे त. त्यांना
त्यां च्या आत्मशक्तिची जाण नाही. ह्या आत्मशक्तिोस बु दधि ् स्ट फ् रं ट जागे करील.
भारतातील साऱ्या दलितवर्गाला म्हणजे जो दारिद्र रे षे खालचा आहे त्याला
एकत्रित आणण्याचा प्रयत्न खु ळे पणाचा आहे . या दे शातील गरिबातही जातियता आहे
व तो
$$$$$
246
$$$$$
७ मार्च, १९७७
सामाजिक आणि सां स्कृतिक बां धिलकी घे ऊन जन्माला आले ल्या , मास
मु व्हमे न्ट' या सं घटने ला ये त्या ७ मार्च १९८२ रोजी पांच वर्ष पूरी होत आहे त आणि
त्यानिमित्ताने ही सं घटना आपला पांचवा वर्धापन दिन जागोजागी मोठ्या थाटाने
साजरा करीत आहे .
सबं ध दलित चळवळच आज एका अवघड अशा आवर्तात सापडले ली आहे , नव्हे
ती एका दिशाहीन भोवऱ्यात अडकल्यासारखी वाटत आहे . अशा अवघड कालामध्ये या
सं घटने ने जिद्दीने , चिकाटीने व ने टाने अविश्रांत परिश्रम करून आपले अस्तित्व कायम
अबाधित राखले आहे , नव्हे तिचा वे लविस्तार दिवसोंदिवस वाढतच आहे .
आज ही सं घटना महाराष्ट् राच्या प्रमु ख शहरांतन ू तर नांदते आहे च परं तु ती या
प्रदे शाच्या सीमा ओलांडून शे कडो मै ल दरू असले ल्या उत्तर प्रदे शात आणि
गु जरातमध्ये वे गाने आपली पावले टाकीत आहे . पांच वर्षे ही सं घटना नुसतीच टिकू न
राहिली नाही तर तिने हजारो तरुणां च्या मनांत वै चारिक विकास घडवून आणले ला आहे .
तिचा प्रवास हा दलितांतील वरच्या थराकडून खालच्या थराकडे ने ण्यास हजारो तरुण
प्रशिक्षित व बद्धपरिकर आणि सं घटित झाले आहे त. कोणत्याही वाऱ्या वादळाला न
जु मानता आं बेडकरी प्रेरणचे हे वारे बौद्धे त्तर सर्व जमातीच्या तरुणांत खे ळवण्याचे कार्य
247
या सं घटने ने अतिशय निष्ठे ने केले आहे . एवढे च नव्हे तर आदिवासींसारख्या अत्यं त
दुर्लक्षित असले ल्या घटकातही तिने लक्ष गु ं तविले ले आहे . हे कालपरवाच झाले ल्या
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी परिषदे वरून कुणाच्याही लक्षात यावे .
'मास मु व्हमे न्ट' चा जन्मच मु ळी १९७७ च्या वादळात झाले ला आहे . त्या
काळात सबं ध भारतीय समाजालाच सु काणू नसले ल्या होडीसारखी अवस्था प्राप्त झाली
होती. एकीकडून आणीबाणीचे पर्व समाप्त होत होते , त्याचवे ळी इं दिरा गां धीच्या
विरोधामध्ये तत्वच्यु त अशा पक्षांची एकी झाली होती. सबं ध सामाजिक डोळाच
राजकीय अं गाने व्यापले ला होता. राजकीय अस्तित्वाशिवाय माणसाला दुसरे
अस्तित्त्वच उरले नव्हते . दोन तु कडयात विभागले ल्या या समाजाला कोणत्या तरी
फळीचा आधार घे तल्याशिवाय उभे च राहता ये त नव्हते . परं तु कोणत्याही लाटे चा
आधार न घे ता त्या महापु रात आपले स्वतं तर् अस्तित्व टिकविणारी भारत वर्षातील
एकमे व सामाजिक सं घटना म्हणजे 'मास मु व्हमे न्ट' हीच होय.
$$$$$
आमच्यातले च काही लोक ह्या लाटां वर स्वार होऊन निवडणु कीच्या धामघु मीत
उतरण्याच्या काठावर उभे होते ; हे जाणताच त्यांचे राजकीय दोर कापून टाकण्यासाठी ह्या
सं घटने तील भविष्याचा वे ध जाणणाऱ्या मु त्सद्दी ने तृत्वाने एक मौलिक असा निर्णय
घे तला आणि तो म्हणजे दलित पँ थरसारखी त्या आधी पांच वर्षे चालले ली सं घटना
बरखास्त करण्याचा ! कारण त्यावे ळी दलित पँ थरचे सामाजिक अस्तित्व सं पुष्टात ये ऊन
राजकीय रं गरुप ये ण्याचा रं ग दिसत होता नि ते खरे ही झाले . कारण त्यानं तरच्या प्रत्ये क
निवडणु कीत दलित पँ थर ह्या नावाने कित्ये क उमे दवार लढले ले आणि पडले ले आपणास
दिसून ये तील. याचे कारण ने तृत्वातील दरू दर्शीपणाचा अभाव आणि विचारांची
दिवाळखोरी याशिवाय काय असू शकेल ?
एकीकडे नामदे व ढसाळ-भाई सं गारे अशा लोकां च्या चालू असले ल्या राजकीय
उलाढाली स्थगित व्हाव्यात म्हणून घे तले ला हा निर्णय चु कीचा नसूनही कुऱ्हाड़ीचा दांडा
गोतास काळ असल्याप्रमाणे आमच्यातीलच काही लोकांनी दलित पँ थर चालू
ठे वण्याचा आततायी प्रयत्न केला. आज आपण पाहतो की, वर्तमान पत्राच्या
पानाबाहे र आणि सचिवालयाच्या मर्यादे बाहे र त्या सं घटने ला फारसे अस्तित्व नाही.
एकीकडे मु स्लीम होण्यासाठी विरोध न करणारे किंबहुना उलट त्याचा पु रस्कारच करणारे
हे आं बेडकरवादी लोक दुसरीकडे मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहे ब आं बेडकरांचे
नां व द्यावे हे कोणत्या तोंडाने म्हणताहे त ? तत्त्वच्युती तु झे नां व दलित पँ थर !!
डॉ. बाबासाहे बां च्या नां वातसु द्धा मराठवाडा शब्द घु सविण्यात ही तत्त्वच्यूती या
आं बेडकरवाद्यां त लपले ली आहे . ह्याउलट 'डॉ. बाबासाहे ब आं बेडकर विद्यापीठच व्हावे
आणि त्याला 'मराठवाडा' हा सं कुचित प्रादे शिक शब्द चिकटवला जाऊ नये म्हणून 'मास
मु व्हमे न्टने हजारो तारा त्यावे ळच्या मु ख्यमं त्र्याला धाडल्या आणि निखळ आं बेडकर
विद्यापीठाचाच रास्त आग्रह धरला. एकीकडे उमे दवार मिळत नाही म्हणून स्वतःच्या
बापाला उमे दवारी दे ऊन चारीमुं ड्या चित करणारे ने ते आणि दुसरीकडे सरकारच्या
कमिटयां वर राहन ू सरकारच्या वाहनातून पोलिस सं रक्षणात दं गलग्रस्तांची कोरडी
248
पाहणी करणारे ही हे च ने ते ! त्यांना ने ते कोण म्हणे ल? जे स्वतःलासु द्धा मार्ग दाखवू शकत
नाहीत ते इतरांना काय दाखविणार ?
अशा प्रकारची तडजोडीशी कायमची काडीमोड घे तले ली, भारतात सामाजिं क
आणि सां स्कृतिक क् रां तीच्या दिशे ने डॉ. बाबासाहे ब आं बेडकरां च्या विचारांचा रथ ओढत
ने णारी जर कोणती सं घटना असे ल तर तिचे नां व 'मास मु व्हमे न्ट' आहे !!
१९७७ साली दलित पँ थरचे त्याकाळचे झुंजार ने ते राजा ढाले यांनी जे व्हा
सं घटने तला तत्त्वच्यूत घटक फेकू न दे ण्यासाठी सं घटने चे नां वच बदलण्याचा धाडशी
निर्णय घे तला ते व्हां जे सच्चे आणि विचाराने पक्के होते ते त्यां च्या बाजूला राहिले आणि
जे कच्चे होते ते एकतर नामशे ष झाले किंवा आजही इतर ने तृत्वाच्या अथवा
नामांतराच्या कुबड्या घे ऊन जगत आहे त. उदाहरणच द्यायचे झाले तर १९७७ साली
पोरक्या झाले ल्या दलित पँ थर या सं घटने ने माईसाहे ब आं बेडकरांसारखे कालबाह्य
ने तृत्व स्विकारले . आं बेडकर विचारां शी
$$$$$
249
‘मास मु व्हमे न्ट’ चे व्हायचे आणि नाव मात्र दलित पँ थरचे छापून यायचे . असे का घडत
होते . याचे उत्तर सोपे आहे . ज्यांचे पोट दलित पँ थरच्या नावावर जगणार होते त्यांना ही
निद्य धडपड अपरिहार्य होती. विद्यापीठ नामां तराची मागणी केली तिची भूमिकासु द्धा
त्यां च्या पां गळ्या ने तृत्वाला लिहिता आली नाही. कधी माईसाहे बां च्या कुबड्या तर
कधी कंम्यूनिष्टांपासून सर्व ऐऱ्या गै र्याच्या कुबड्या घे त त्यांनी केले ला प्रवास शे वटी
नामांतर फलद्रूप करू शकला नाही का ?
नामांतर विरोधी एक ही टीकाकाराला त्या काळात ह्या लोकांनी सडे तोड उत्तरे
दिली नाहीत ती आजपर्यं त ! जे झे पत नाही ते कार्य अंगावर घे तल्यानं तर जे काही होते
ते है असे .? इसे !
$$$$$
१९७७ सालीच आयु ष्यमान राजा ढाले यांनी नामांतराची आपली भूमिका विशद
करणारी डॉ. बाबासाहे ब आं बेडकर विद्यापीठच का ? हा दलितां च्या वतीने लिहिले ली
एकमे व पु स्तिका हे च ह्या चळवळीचे एकमे व विचारधन म्हटले पाहिजे .
नामांतराच्या चळवळीने १९७८ साली लढाई सोडून तडजोडीचे वळण घे तले आणि
मास मु व्हमे न्ट' सारख्या सं घर्षशील यु वकां च्या चळवळीला या चळवळीतून अं ग बाहे र
काढून घे णे भागच पडले . त्यानं तर आले लाँ गमार्चचे यु ग.
बाबा आढावांची समता दिं डी म्हणजे च कवाड्यांचा लाँ गमार्च ! पाचशे बाबा
आढावांची साठ मै ल चालत जाण्याची ही शयं त आजच्या आधु निक यु गां त खरे तर माओ
शीच स्पर्धा करणारी आणि तसे "जयभीम मधून नगारे ही वाजले . स्वतःच्या
वृ त्तपत्रांमधून स्वतःच्या प्रसिद्धीचे ढोल वाजवतांना डॉ. आं बेडकर, माओ, मार्टिन
ल्यु थर किंग हे ही छोटे ठरले . १९७८ सालापर्यं त स्वतःच्या हातात वृ त्तपत्र असूनही ज्या
यु गपु रुषाने नामांतराबाबत एक अक्षरही लिहिले नाही. तोच आता दलितांचा मु क्तीदाता
मु क्तीसे ना घे ऊन गल्लीबोळात हिं डत आहे . परं तु दिल्लीवर एक लाखाची चढाई करतांना
मागे कोणीच नाही हे पाहन ू त्यांना इं दिरागां धींच्या केसांनी बचावले . कारण इं दिरा
गां धींच्या केसां ना जर चाकू चा धक्काच लागला नसता तर कवाड्यांना प्रसिद्धीही
मिळाली नसती. परं तु एक लाखाच्या मोर्चावर ते व्हापासून जो पडदा पडले ला आहे तो
अद्यापही कायम आहे .
नामांतराच्या प्रश्नाचा विचका करण्यात कवाडे सारखा थोर पु रुष अन्य सापडणार
नाही. सरकारने कोणतीही बै ठक बोलावली की तिला इमाने इतबारे हजर असणारा कवाडे
इतका आज्ञाधारक बं डखोर सापडणार नाही. त्यामु ळेच सरकारने ह्या चळवळीला
वाटाण्याच्या अक्षता लावल्या हे उघड आहे .
'मास मु व्हमे न्ट' ही सं घटना सरकाचे सर्व डावपे च उमगून होती. म्हणून तिने
कोणत्याही सरकारी बै ठकीला भीक घातली नाही. विधान भवनात जो ठराव एकमताने
मं जरू होतो त्याला वे गळी लोकमान्यता घे ण्याची गरजच काय असते ? परं तु ज्यां च्या
अकले चे दिवाळे वाजले ले आहे असे सरकार आणि नामांतर चळवळीचे प्रणे ते कर्णधार हे
एकाच माळे चे मणी असल्यामु ळे अशा बै ठका होऊ शकल्या. 'मास मु व्हमे न्ट' ने त्यांना
दाद दिली नाही. आणि जे व्हा एखादा ठराव विधीरूपांत ये ण्याची आवश्यकता असते ,
ते व्हां दडपण सरकारवर आणण्याऐवजी, दडपण विधीमं डळावर आणण्याऐवजी
लॉगमार्च गे ला तो औरं गाबादच्या दिशे ने. असे का झाले ? आगामी निवडणु कीचे ढोल
250
वाजवतांना दलितांचे खरे पाठीराखे आम्हीच, असे भासवणाऱ्या बाबा आढावांनीच ही
फसगत केली. कारण लाँग मार्चचे प्रणे ते जरी कवाडे असले तरी सूतर् धार बाबा
आढाव होते ह्या दोन गोष्टींची गल्लत करून चालणार नाही.
नामांतर चळवळीतला हा सावळा गोंधळ, ने तृत्त्वातला अपरिपक्वपणा 'मास
मु व्हमे न्टला' पटणारा नव्हता. स्वतःच्या ने तृत्त्वासाठी लोकांचे बळी दे णे हे कार्यच
दलित चळवळीच्या कक्षे त ये ऊ शकत नाही. यासाठी धीराची आणि वै चारिक
पक्केपणाची गाठ पडावी लागते . दलित चळवळीत जो दुभंगले पणा आहे तो ह्याच
गोष्टीमु ळे आणि हे
$$$$$
दुभंगले पण एकनिष्ठ अशा आं बेडकर अनु यायी असले ल्या ' मास मु व्हमे न्टला' निष्कारण
खाली खे चत आहे . हे काळ सोकावल्याचे प्रतिक आहे .
१९७९ साली एक विनोदी मसु दा लोकसभे समोर आला त्याचे नाव होते
‘धर्मस्वातं त्र्य विधेयक' बिल, आणि ह्या बिलात ने मका घर्मांतरालाच विरोध केले ला होता.
धर्मांतराला विरोध म्हणजे डॉ. आं बेडकर प्रणित सामाजिक क् रां तीला विरोध हे 'मास
मु व्हमे न्ट' वगळता अन्य दलित सं घटनां च्या लक्षातच आले नाही, आणि आले
असल्यास त्यांनी तिकडे पद्धतशीर कानाडोळा केला याचे कारण राजकीय हितसं बंध !
१९७७ साली सत्ताबदलाची जी न भूतो न भविष्यति अशी क् रान्ती झाली त्या
क् रान्तीचे स्वरूप आणि तिच्या मागच्या विषारी वल्लीचे मूळ ओळखले ते ‘मास
ू े अने क पक्ष स्वतःला सामाजिक दृष्ट्या पु रोगामी म्हणवणारे
मु व्हमे न्ट’ ने च. हिं दं च
प्रतापां च्या हातात हात घालून निवडणु का लढले यातच त्यांची सामाजिक क् रां तीवरील
निष्ठा दिसून आली. चार उठवळ पक्षांनी दे शातलं ऐक्य साधण्याचा प्रयत्न करताना जी
भावना रुजवली ती भावना म्हणजे च हिं दं च्ू या एकते ची भारताला हिं दुस्थान म्हणणे ,
भारताच्या प्राचीन माणु सकीरहीत परं परांचे पु नरुज्जीवन करणे या पलीकडे या चार
टाळक्याना अक्कल नव्हती म्हणूनच गोवध बं दीसारखा मामु ली प्रश्न हा राष्ट् रीय
प्रश्न होऊ शकला आणि आजही धर्मांतर विरोधी बारगळले असले तरी धर्मांतराला
विरोध करणारी प्रवृ त्ति जिवं त आहे . महाराष्ट् रात आज ठिकठिकाणी चालू असले ले दं गे
याचं प्रतिक आहे त. अस्पृ श्यता हिं द ू धर्मावरील कलं क आहे , ये वढे मान्य करूनही
शे वटी त्याच नरकात तु म्ही राहा असे म्हणणारे समाज प्रवर्तक आणि धर्मगु रु हे ढोंगी
आहे त. त्यांचा बिमोड केला पाहिजे हे मास मु व्हमे न्ट' ने आधीच ओळखले असल्यामु ळे
त्यां च्या फसगतीस 'मास मु व्हमे न्ट' कधीच आली नाही, उलट तिने हिं दुवेत्तर अन्य
धर्मीयांबरोबर ओमप्रकाश त्यागी यां च्या बिलाला कडाडून विरोध केला. ते व्हा
दलितांतील स्वतःला कान्तीप्रवण म्हणवणाऱ्या सं घटना गे ल्या होत्या कुठे ? आणि
त्यांनी डॉ. आं बेडकरांचा कोणता वारसा चालविला आहे ? 'मास मु व्हमे न्ट' ने डॉ.
बाबासाहे बां च्या धम्माची ज्योत परमोच्च बिं द ू मानून ती ते वत ठे वण्यासाठी १९८१ च्या
फेब्रुवारीत झाले ल्या जनगणने च्या वे ळी भारतातील बौद्धांनी आपला धर्म बौद्ध म्हणूनच
नोंदवावा यासाठी सभा, सम्मे लने आणि पोस्टर भीतिपत्रक काढून जनजागृ ति केली आणि
अशा प्रकारचं कार्य करणारी मॉस मु व्हमे न्ट' ही भारतातील एकमे व सं घटना आहे .
दलितांतील तज्ञजणांना फसवून आपले बु द्धीदारिद्र्य हे च वै भव समजून
चालले ल्या ह्या पोटार्थी सं घटना, हिन्द ू धर्माचे लयास गे लेले वै भव वाढवण्यासाठी
251
जन्मास आले ले हिन्द ू सं घटन, सवलतीच्या नावाने खडे फोडणारे अण्णापाटलासारखे
नराधम आणि त्यांचे राजकीय हस्तक आणि त्यांचा वाढले ला पं थ यातून सामाजिक
क् रां तीला गतिरोध झाले ला आहे . नव्हे अन्यायाचे दरवाजे खु ले होऊन न्यायाचे दरवाजे
दलित समाजाला बं द होत आहे त. अशा पडत्या काळात आपले पु ढचे पाऊल पु ढे च
टाकणारी मास मु व्हमे न्ट' ही सं घटना तिचा पांचवा वर्धापन दिन साजरा करीत आहे हे
सु चिन्ह नव्हे काय ?
$$$$$
ह्या वर्षाची सु रवातच मु ळी दे वळी, साधु पुर, कसातारा ह्या सां घिक अन्यायां च्या
निघृण बातम्यांनी झाली आहे . निवडणु कीत हतबल झाले ले दलितांतील राजकीय ने तृत्व
समाजाला रसातळाला ने त आहे . ह्यामु ळे समाजाचे नीतिधै र्य वाढण्याऐवजी खच्ची झाले
आहे , आणि बौद्ध धर्माच्या प्रवे शानं तर आम्ही बौद्ध धर्माच्या सिमे वरच अजून रें गाळत
आहोत. याचे कारण सवलतीच्या तु कड्यासाठी धर्म बदलणारांचा पं थ आज आं बेडकर
अनु यायांत जन्म घे त आहे . 'कधी नाही मिळलं आणि गटकन गिळलं ' अशा सवलतीच्या
तु कड्यावर आणि सरकारी नोकरीवर चरत असले ला यु वा वर्ग आपल्या बं द खोल्यात चं द
झाला आहे . मग ह्या सामजिक चळवळी कुणाच्या मु क्तीसाठी? असा एक प्रश्न
आपल्या सर्वां च्यापु ढे उभा आहे . कारण सगळे च जर सरकारी नोकरीत सामील झाले तर
रस्त्यावर उतरणार कोण? आणि या सामाजिक चळवळी करणार कोण? ह्या सरकारी
गु लामांचा वर्ग ? भरीस भर म्हणून ह्या सरकारी गु लामांनी बामसे फ. डी. एस४ (DS 4)
अशी विविध नां व घे ऊन स्वतःच्या नोकरीच्या हमीची काळजी वाहीली आहे . हा
धोकादायक गु लामांचा पं थ वाढीस लागला आहे . आणि म्हणूनच जे रस्त्यावर् उतरले
आहे त, जे त्यागी आहे त, अशा तरूणांना आर्थिक मदत मिळण्यांचे तर दरू च राहो,
सहानु भतू ीही दे ण्याचे नाकारीत आहे त.
कांछीरामसारखा कुणी एक आं बेडकर शत्रू दे शाचे भले करणार आहे अशी
वाच्यता आहे ! बौद्ध नसले ले आणि बौद्ध असले ले, सवलती असले ले आणि सवलती
नसले ले अशा लोकांचे परस्पर विरोधी प्रश्न या सरकारी मं चावरून सु टणार असते तर
सरकारने वे ळीच त्याची दखल घे तली असती.
दलितां वर होणारे अन्याय दिवसें दिवस वाढत आहे त. अशा वे ळी दलितातील
आपापसातील एकमे ल सं पुष्टात ये त आहे . याची ग्वाही आजच्या समस्या दे त आहे त
आणि न्याय ही कल्पनाच वाटणारी यं तर् णा आमच्यातील तरुणांना, केवळ घोषणा दिल्या
एवढयाच आरोपाखाली त्यांचा मोर्चा निषिद्ध ठरवून, तु रूंगात पाठवित आहे .
मराठवाड्यातील दं गली पे टल्या त्यांतील गु ड न्यायासनासमोर सन्मानाने
वागविले जात आहे त आणि ते ही पु राव्या अभावी ! (पोलीसांची केवढी ही दक्षता ! )
आणि पु रावा नसूनही बल्लारपूरचे आमचे तरुण मात्र तु रुं गाची हवा खात आहे त.
अशा बिकट परिस्थितीत आमच्या सं घटने ने अने क सां स्कृतिक मे ळावे , अने क
चां गले उपक् रम, बालवाड्या, शै क्षणिक सं स्था आदि सु रु करून, हाती घे ऊन वृ त्तः
पत्रासारखे हातात कोणते ही साधन नसताना आपली सं घटना चालूच ठे वली आहे ..
252
तिचा हा वर्धापन दिन हा उच्चांक बिं द ू आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
आजच्या काळात सामाजिक क् रां तीची पु नः गरज आहे ह्याची जाणीव झाले ले सर्वच तरुण
'मास मु व्हमे न्ट'कडे वळत आहे त. त्यांचे स्वागत असो.
ये णाऱ्या काळाला उत्तर एकच 'मास मु व्हमे न्ट !!
टीप:- सं घटनात्मक आणि सामाजिक प्रश्नांचा विचार करण्यासाठी एक परिषद
लवकरच मुं बईत आयोजित करण्यात ये त आहे . आपण सर्वानी या सं दर्भात जागरुक
असावे .
$$$$$
253
चवताळू न उठू न सं घर्ष करीत आहे . दै न्य, उपासमार, बे कारी, जातीय कत्तल, दुष्ट शोषण
धार्मिक दडपशाही, किळसवाणा भ्रष्टाचार, स्त्रीयांचे शोषण, धार्मिक दंगली ही ह्या
समाजाची ठळक वै शिष्ठे आहे त.
सरकार जातीय, धर्मां ध, सवर्ण आणि धनदांडग्या मालदारांचे असल्यामु ळे
अन्यायग्रस्त दडपले ल्या जनसमु हाचे उद्रेक सरकारी दमन यं तर् णे द्वारे चिरडून टाकले
जात आहे त. पोलीस यं तर् णे द्वारे सरळसरळ जनते चे मु डदे पाडून थरकाप उडविणारी
दहशत
$$$$$
बसविली जात आहे . जनते चे जीवन मरणाचे प्रश्न सोडविण्याचा हाच एक उपाय
सरकारकडे आहे .
पं जाब, गोरखालँ ड, झारखं ड, मिझोराम, श्रीलं का इ. कोणत्याही प्रश्नां बाबत
सरकारकडे राजकीय तोडगा नाही. फक्त सै नीकी बळाचा निर्दय वापर करून सरकारने
सान्या समस्या चिघळवून टाकू न आपले रानटी व पाशवी असे हुकुमशाही स्वरुप दाखवून
दिले आहे .
भारताच्या अर्थव्यवस्थे ची ज्या वीस मालदारांकडे मक्ते दारुरी आहे अशा
घराण्यांनी अफाट नफा कमवून काळा पै सा निर्माण केला आहे . काळ्या पै शाने भारतीय
अर्थव्यवस्थे स ग्रासून टाकले आहे . सरकारच्या पं चवार्षिक योजनां द्वारे उधळले ले
अब्जावधी रुपये शहरी भांडवलदारांना मालामाल करण्यास आणि ग्रामीण भारतात
नवसधन वर्ग निर्माण करण्यात गु ं तले गे ले. भ्रष्टाचार या योजनां च्या पै शाने पोसला
गे ला. तळागाळातील जनते ला सर्वस्वी ह्या सरकारी खिरापतीवर अवलं बन ू ठे वून लाचार
व लं पट बनविले गे ले. परराष्ट् रातून हजारो कोटींचे आणले ले व्याजी कर्ज अनु त्पादक
बाबीवर खर्च करून दे शाची अवस्था कर्जबाजारी झाली आहे .
कामगारां वर दिवसें दिवस भांडलदारधार्जीणे हल्ले सरकार करीत आहे . त्यांना
सं घटीत होवू न दे ता त्याच्यावर कपात, दिशाहीन आधूनिकी यांतर् ीकी करण, कामगार
चळवळीच्या मु सक्या आवळणारे काळे कायदे याद्वारे हे हल्ले तीव्र होत आहे त.
सार्वजनिक उद्योगांचे क्षे तर् कमी करून खाजगी भांडवल दारांना क्षे तर् वाढवून दे णे व
परकीय बहुराष्ट् रीय भांडवलदारांना गु ं तवणु कीची मु भा दे ण्याचे सरकारचे धोरण सरकारचे
नं गे स्वरूप दाखवित आहे .
ग्रामीण भारतात उत्पन्नाचे मु ख्य स्रोत असणाऱ्या जमिनीचे केंद्रिकरण
जमीनदारांकडे आहे . भूमिहिन कष्टकरी कंगाल होवून शहरी झोपडपट् ट्यांत ये वू लागला
आहे .
नव्याने जाग ये त असले ल्या भीन्न भीन्न जाती व राष्ट् रसमु हां वर सं घटित व
क् रूर हल्ले होत आहे त. दलितां च्या कत्तलीचे योजनाबद्ध सत्र जातीवादी सवर्ण
मु जोरांनी व्यापकरीत्या चालविले आहे
पु नरुज्जीवनावादी विषारी विचारांचे वादळ आले आहे . धार्मिक रूढ़ीवादी
सं कल्पनांना पु र्नप्रतिष्ठा दे ण्याचे मोठे प्रयत्न होत आहे त. आर्थिक दृष्टया दिवाळे
बाजले ल्या ह्या समाजव्यग्थचे सां स्कृतीक अध:पतन झाले आहे . धर्मां धता व बां शीकते चे
बीष पाजून यु वापीढोस हिं सक केले जात आहे . इतिहासाचे जमातीकरण करून समाजात
यादवी माजविण्याचे कारस्थान जातीवादी सं घटना करीत आहे त. 'सती' सारखे प्रश्न
254
उपस्थित करून इतिहासाची चाके उलटी फिरविली जात आहे त. सरकारी प्रचार माध्यमे
जाणीवपूर्वक कालबाह्य अं धश्रद्धा जनते त पसरवित आहे त. स्त्रीयांचे वासनामय शोषण
सर्व माध्यमाद्वारे खु ले आम सरकारी आशिर्वादाने होत आहे .
अभिव्यक्ती स्वातं त्र्याच्या नरडीवर पाय दे णारे कायदे निर्माण करून जनते च्या
लढ्यांना गाडण्याचे सरकारचे धोरण निष्ठूर होत चालले आहे .
$$$$$
ह्या स्थितीत ज्यांची लोकशाही मूल्यां वर निष्ठा आहे व ज्याची शक्ती अन्यायी
शोषणाविरुद्ध लढत आहे , अशा शक्तीत एकोपा नाही. व मूळातच त्या क्षीण
असल्यामु ळे भारतात जातीय हिं सक हुकुमशाहीचा धोका शतपटीने वाढला आहे .
भारतातील समाज व्यवस्था फॅसिझमच्या सर्वनाशी उं बरठ्यावर उभी आहे .
फॅसिझमचा मु काबला
255
भारतातील कष्टकऱ्याचे शोषण यु रोप, चीन, रशिया मधील कष्टकऱ्याप्रमाणे ं
एकेरी नाही, अने कपट आहे . त्यामु ळे त्याची तीव्रता अने क पट आहे . कारण ते शोषण
वर्गीय व जातीय आहे
त्यामु ळे केवळ आर्थीक कान्तीचा विचार जातीअं ताच्या लढयाचे तत्वज्ञान ठरु
शकत नाही.
भारतातील समाजात क् रान्तीकारक बदल झाला नाही त्याचे महत्वाचे कारण
म्हणजे जातीव्यवस्थे च्या वास्तवते चे भान न ठे वता पारं पारिक यु रोपियन पद्धतीचे
आर्थीक लढे
$$$$$
256
जात म्हणजे फक्त जात आहे . तो एक बं दिस्त समाज म्हणता ये ईल. तो बं दिस्त
वर्ग नाही. जातीतील थर वर्ग लक्षणे व्यक्त करतात. ये थील पिळवणूक जातीधिष्ठित
असल्याने जातीव्यवस्थे विरूद्ध एखाद्या शोषीत जातीने उभारले ला लढा हा समग्र
क् रान्तीचाच एक भाग आहे . क् रान्तीकारक चळवळीतील ती फू ट नसते . तसा विचार करणे
ही पारं पारीक ब्राम्हणी मार्क्सवादी विचार पद्धती ठरते . तसे च केवळ दलितच क् रान्तीचा
पु ढारीवर्ग होवू शकतो व दलितांचा विद्रोह व्यक्त करणारे साहित्य हे कान्तीचे तत्वज्ञान
आहे असे समजणे हा पारं पारीक ब्राम्हणीदलित विचार ठरतो.
$$$$$
257
राजवटीचा अं त घडवला पाहिजे . कष्टकऱ्यांची राज्यसत्ता स्थापली पाहिजे .
जातीव्यवस्थे च्या समर्थक प्रतिगामी तत्वज्ञानाचा वै चारीक व भौतिक पराभव केला
पाहिजे . ज्या कान्तीने भारतातील जातीव्यवस्था नष्ट होईल तीच खरी क् रां ती ठरे ल.
$$$$$
258
$$$$$
जाहीरनामा
भारतातील दलित शोषित पीडित वर्ग अस्पृ श्य जाती तसे च आदिम असतो.
यांनी लढाऊ शक्ती असे ल, आणि ती उपरोक्त वर्ग जाती व जमाती यांचे अस्तित्व आणि
भौतिक उन्नती यात अवरोध आणणारी सर्वप्रकारची दुःखे , अनिष्ट बाबी आणि शत्रू
यांचे निर्दालन करून त्यां च्या सर्वां गीण कल्याणासाठी सं घर्षरत राहील.
भारत ही दलित मु क्ती से नेची कर्मभूमी असे ल आणि भारतातील सर्व स्त्री-
पु रुषांमध्ये स्वातं त्र्य, समता व बं धुत्व नांदावे यावर तिची श्रद्धा राहील. या 'से नेचे
स्वरूप धर्मनिरपे क्ष (Seculerr) राहील ही धर्मनिरपे क्षता डॉ. बाबासाहे ब आं बेडकर प्रणित
त्यां च्याच 'दि. बु ध्द अँ ड् हिज धम्म' या ग्रंथात विश्ले षित केले ल्या नवसमाज.
निर्मितीच्या सं कल्पने वर आधीरीत राहील.
उद्दे श :
१) 'दलित मु क्ती से ना' ही प्रथमतः भारतातील अस्पृ श्य, दलित व पीडित वर्ग, जाती व
जमाती यांची लढाऊ शक्ती म्हणून कार्यरत राहील,
२) उपरोक्त जाती व जमाती यांची अमे द्य आणि समर्पित शक्ती म्हणून ती रक्ताचे
अस्तित्व निर्माण करील
३) जमीनदार, भांडवलशहा, राजकारणी व नोकरशाही यां नी उपरोक्त जाती व जमाती
यां च्यावर केले ल्या अमानु ष अत्याचारा विरूद्ध रलढा होणारी ती सु निश्चितपणे घडले ली
यं तर् णा म्हणून स्वतःचे निर्माण करील.
$$$$$
259
४) ही 'से ना' अन्याय पं डितां च्या साठी माणसे , आर्थिक, वै द्यकीय बाणि कायदे विषयक
मदत पोचवील त्यासाठी या जाती व जमातीमधूनच आवश्यक अशा निधीची ती
उभारणी करील.
५) उपरोक्त जाती व जमातवर होणाऱ्या अन्यायाचे लक्षणीयच व त्वरित परमार्जन करणे
हे या 'धर्माचे ' राहील. प्रमु ख कर्तव्य राहील
६) राज्ययं तर् णे ने सं वैधानिक आणि विविधत तरतु दीनु सारच कायदा बाणि व्यवस्था
राबवावा यादृष्टीने ही 'से ना' राज्ययं तर् ने ला बाह्य करील.
कार्य :
१) उपरोक्त जाती जमाती यां च्यावर कोणीही अन्याय करण्याची हिंम्मत करु नये
म्हणून या जाती व जमातींवर दक्षता ठे वण्यासाठी सं पर्ण ू भारतभर या 'से ने ची केन्द्र
राहतील.
२) अशा प्रकारे निर्मित केन्द्रात वे ळोवे ळी सभा, सं मेलने आणि शिबिरे ( Camps)
होतील व त्यामध्ये स्वीकाराह विविध साधनांचा विचार होऊन तशी कृती करण्याचा
सं कल्प केला जाईल.
३) अशा प्रत्ये क सं मेलनात व शिबिरामध्ये प्रत्ये क आपल्या कार्याचा अहवाल सादर
करावा लागे ल.
४) प्रत्ये क शाखा नै तिक आणि शारीरिक प्रशिक्षण दे ण्यासाठी साप्ताहिक कवायती व
प्रशिक्षण शिबिरे आयोजित करतील.
५) दलितांना शस्त्रे पु रविण्यासारख्या राज्ययं तर् णे च्या उद्दिष्टांचा पु रे पु र सं भाव्य
उपयोग व्हावा म्हणून वरील जाती-जमातींना शस्त्र विषयक प्रशिक्षण दे ण्यासाठी
प्रत्ये क शाखा प्रयत्नशील राहोल.
६) दलित मु क्ति से नेच्या अध्यक्षीय मं डळाने ( Presidium ) वे ळोवे ळी ठरविल्यानुसार
से नेचा स्वतं तर् असा गणवे श राहील.
७) दलित मु क्ति से नेच्या अध्यक्षीय मं डळाने ( Presidium ) निश्चित केले ले गीत हे '
से ने'चे सं चलन गीत (Amthem ) राहील.
८) प्रत्ये क शाखा व केंद्राच्या प्रमु खांमधून त्यांनी निवडून दिले ल्या प्रतिनिधींचे
अध्यक्षीय मं डळ ( Presidium) निर्माण होईल.
आज सं पर्णू भारतीय समाज जाती, पोटजाती, वर्ग, वर्ण व जमाती यां च्यामूळे
विघटित आहे . मानवी व तथाकथित ईश्वरनिर्मीत अपरिवर्तनीय बधानां नी अस्पृ श्य,
पीडित, दलित व आदिवासी यां च्यावर होत असले ला अन्याय आजही ऐकला जात नाही.
त्यां च्याकडे लक्ष दिले जात नाही वा त्याचे परिमार्जनही होत नाही. धर्मग्रंथ, दे वदे वता व
पु रोहित ही धर्मपे ठाधिपती यांनी निर्माण केले ले धार्मीक सनातनत्व व ब्राम्हणशाही हे
आज सर्वत्र खऱ्या अर्थाने सत्ता सं चालन करीत आहे त. सर्व समदुःखी समाजांन एकसं घ
होऊन धार्मिक, राजकीय, सामाजीक आणि आर्थिक क्षे तर् ातील विहित सं धीसाधू यां च्या
विषारी व ज्वालाग्राही अपप्रवृ त्तींना नष्ट करणे हे या समाजाचे आद्य कर्तव्य आहे .
$$$$$
260
मानवी मूल्यांचे निर्माते डॉ. बाबासाहे ब आं बेडकरांनी या दृष्टीने पथदिग्दर्शन
केले ले आहे त्यांनी स्थापन केले ल्या समता सै निक दलाचे पु नरुज्जीवन करून त्यात
नवशक्ती ओतली पाहिजे "दलित मुक्ती-से ना " म्हणजे समता सै निक दलाचा नवीन व
वै ज्ञानिक अविष्कार होय.
भारतातील अस्पृ श्यां नो, पीडितांनो, दलितांनो, आदिवासोनो 'उठा; सं घटित व्हा
आणि सं घर्ष करा!' जाईल.
$$$$$
261
दलित मु क्ती से ना
घोषणापत्र
'दलित मु क्ति से ना, यह भारत के बादिम दलित शोषित पं डित, सर्वहारा वर्ग, अपृ श्य
जाति तथा आदिम जनजाति इनको बाबू शक्तिी रहे गी और वह उपरोक्त वर्ग, जाति एवं
जनाती इनके अस्तित्व और भौतिक उन्नती में बाधा डालने वाले सभी प्रकार के दुःख,
धनिष्ट बातें , औरण पु त्रोंका निर्दालन कर उनके सर्वां गो का के लिये सं घर्षरत रहे गी।
'भारत' यह दलित मु क्ति से ना की कर्मभूमि रहे गी और हर भारतीय नरनारियों को
स्वातं त्र्य समता और बं धुत्व विद्यमान रहे इसपर उसको निष्ठा रहे गी इस से ना का स्वरूप
धर्मनिरपे क्ष (Secular रहे गा और यह घर्मनिरपे क्षता डॉ. बाबासाहब आं बेडकर ने ह लिखे
हुए ' दि बु द्ध बं ड हिज धम्म' इस पं थ में विश्ले खित नव समाज निर्मिती के सं कल्पनापर
अधिष्ठित होगी|
ध्येय : दलित मु क्ति से ना के निम्नलिखीत हरकतों के विरोध में सं घर्ष करे गी.
१) भारत के अस्पृ श पीडित दलित आदि वर्ग, जाति था आदिम जनजातीयोचर होने वाला
सामजिक अन्याय.
३) उपरोक्त जाति वर्ग तथा जनजातीयोपर होने वाला राज किय अन्याय ऊन्हे शप्त हुए
सं विधानात्मक तथा प्रजातं तर् द्वारा प्रदत्त अधिकारों का हनन
उद्दे श: दलित मु क्ती से ना, प्रथमत: भारतीय अस्पृ श दलित पीडित वर्ग व जातीशं दपा
बादीम जनजाविश इनको सै निक व्यक्ति बने गी। वह अपना निर्माण एक मजबूत तथा
समर्पित शक्तीरूप में करे गी ! जमिनदारी राजकीय ने ता तथा नोकरशाह इनके द्वारा
खरोक्त व जातीयाँ या जनवा तीयों पर दो अमानवीय अत्याचार किए जाते हैं , उनके
खिलाफ सं घर्ष करने वाली वह स्वयं निर्मिती यं तर् णा होगी! यह से ना अन्यायग्रस्थोके
लिए मानवी शक्ति, आर्थिक, वै द्यकीय तथा कानूनी मदत दे गी। इस के लिए यह 'से ना'
इन्ही वर्गों, जातीयां तथा जमातीओमे से निधी (Funds) सं कलित करे गे ! इन वर्गों, जातीय
तथा जमातीपर होने वाले
$$$$$
262
अत्याचारोंका परीमार्जन तत्काल तथा तु रं त हो यह इस 'से ना' प्रमु ख का कर्तव्य हो!
राज्यसत्ता उसे प्राप्त सं विधान तथा कानु न इनके नियमोंकाभी कानु न और व्यवस्था का
सं चालन करे इसलिए यह से ना उसे
कार्य :-
१) उपरोक्त वर्ग जाती तथा जमाती इनपर कोईभी अन्याय करने की हिम्मत न कर सके
इसलिए उनपर निगरानी रखने के लिए यह से ना पूर्ण भारत में ऐसे दक्षता केन्द्रको
स्थापित करे गो
२) इस तरहसे निर्मित केन्द्र सामायीक सभाओ, सं मेलनो तथा शिबिरो का आयोजन कर
से नाद्वारा अं गीकृत साधनो पर विचार विमर्श करे गी तथा अपने कृतियों का सं कल्प करे गी
!
३) इन सम्मे लनो शिविरोमे , हर केंद्र, अपने कार्यवाही का रिपोर्ट पे श करे गें ।
४) हरु केन्द्र नै तिक तथा शारीरिक प्रशिक्षण दे ने के लिए साप्ताहिक तथा परे डस्
(paracas ) तथा शिविरोंका आयोजन करे गे !
५) दलितोको बाध्मसं रक्षण के लिए वस्त्र दे नें जै से राज्यसत्ता के उद्दिष्टोंका यथासं भव
उपयोग हो इसलिए यह बर्मी उपरोक्स वर्म जाती तथा जनजातीया इनको वस्त्र शिक्षा
दे ने के लिये अपने केन्द्रोद्वारा प्रयत्नशील रहे गी !
६) 'दलित मु क्ति से ना' के अध्यक्षीय मं डल (presidium) द्वारा निर्देशित से ना का गणवे ष
(uniform) होगा !
७) दलित मु क्ति से ना के अध्यक्षीय मं डल ( presidium )द्वारा निर्देशित से ना का सं चलन
गीत ( Anthem) होगा |
८) हर शाखा तथा केन्द्र इनके प्रमखोमे सेही उनके ही द्वारा चु ने गये प्रतिनिधीयोमे सेही
अध्यक्षीय मं डल, (presidium ) बने गा!
आज समस्त भारतीय समाज जाती, उपजाती, वर्ग वर्ण जमाती इनके द्वारा
विभक्त तथा विघटीत है ! मानविय तथा तथाकथित ईश्वरद्वारा निर्मित अपरिवर्तनीय
एसे बं धनोद्वारा अस्पृ श दलित पिडीत तथा आदीवासी इनपर होने वाला अन्याय,
अत्याचार आजभी अनसु ना रहता है , दर्ल ू क्षित रहता है तथा उसका परिमार्जनभी नही
होता ! धर्मग्रंथ, दे वदे वताओ, पु रोहित धर्माधिपती इसके द्वारा निर्मित स्थापित सनातन
तथा ब्राम्हणशाही इन्हीके द्वारा आजज वस्तु तः सत्तासं चालन होता है । सब समदु:खी
समाज सं घठीत होकर धार्मिक, राजकीय, सामाजिक तथा आर्थिक क्षे तर् ों मे कार्यरत
निष्ठित सं धिसाधूओके विषै ले तथा ज्वालाग्राही रूपरवत्तीयो को नष्ट करना यह इन
दुःखी समाजोका आद्य उत्तरदायित्व है ।
$$$$$
263
उसको नवशक्ति प्रदान करना आवश्यक है ! 'दलित मु क्ती से ना' इसी समता सै निक दल
का नया तथा वै ज्ञानिक अविष्कार है !
भारतीय अछुतो, पिडीतो, दलतो, आदिवासियो अठो सं घठित हो और सं घर्ष करो !
$$$$$
264
The Dalit Liberation Army shall function primarily as a militant force of
the untouchable’s oppressed & depressed people of India. It will build itself
into a strong and dedicated power of these classes. It will create a well builtup
machinery to counteract inhuman cruelties done to the untouchables.
Oppressed & depressed classes by Zamindars, Capitalists. Politicians &
Beauracrats. It will provide man power, financial help, medical & legal help to
all these sufferers by creating funds from among these classes. The instant &
immediate redressal of the injustices done to these classes shall be its main
concern It will create its machinery in such a way that law and order machin
ery of the state will be compelled to act in the true spirit of the constitutional
and legal ways. FUNCTIONS
1) It will establish centres through-out India to keep close watch upon the life
of these classes so that nobody could dare to do any injustice to them.
2) The units so created will have periodical meetings, camps, conventions so
that various measures. To be adopted from time to time could be considered
and acted upon.
3) Every unit will be liable to place in such conventions, camos, its records of
activities.
4) Every unit shall be required to hold weekly parades and cadre camps to
impart moral and physical training.
5) Every unit shall strive to make every possible use of govermental
programms like providing Arms & thus impart trai ning for use of such Arms.
6) The Dalit liberation Army will have its own uniform prescribed by the
Presidium of the Army (Supreme Commandoes Council) from time to time.
7) The Dalit Liberation Army will have its own Anthem approved by the
Presidium.
8) The presidium of the Army shall beman ned by chiefs of various units and
centres by electing them amongst themselves such personnel of its presidium.
scripts, deities and religious heads have become the de facto rule every where
in India. It is the prime concern of the ill-treated societies to combat such
devastating and poisonous acts of
265
Dr. Babasaheb Ambedkar, the champion of the human values has shown
us the way. The Samta Sajnik Dal which he founded has to be revived and
rejuvina ted. The Dalit Liberation Army shall be new and scien tific set up of
this Samta Sainik Dal.
Untouchables Oppressed and Depressed and Tribals of India AWAKE,
ORGANISE, AND ARISE
$$$$$
266
267
$$
268