Professional Documents
Culture Documents
B.Ed. 104
B.Ed. 104
महाविद्यालय,वडमुखवाडी,पुणे
बी. एड .प्रथम वर्ष : २०२१-२२
पेपर १०४ - अध्ययनासाठी मूल्यांकन आणि मूल्यमापन
विद्यार्थ्यांचे नाव - देशमुख अश्विनी विशाल
मार्गदर्शक - प्रा. तडस.एम.जी
परीक्षा पध्दतीतील सध
ु ारणा
प्रचलित परीक्षा पध्दतीमधून विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञान किती प्रमाणात
आहे एवढेच तपासले जाते. संपूर्ण परीक्षा ही के वळ पुस्तकावर आधारलेली
आढळते. परीक्षेतून तर्क , अनुमान, कौशल्य, उपयोजन, संश्लेषण,
अभिरुचि, रसग्रहण ही उद्दिष्टे विद्यार्थ्यांमध्ये किती प्रमाणात विकसित
आहे याचा अंदाज येऊ शकत नाही. आत्मविश्वास, कष्टाळूपणा,
सामाजिकता, सहकार्य भावना विविध कला कौशल्य या पैलूंचे परीक्षण
परीक्षेमधून होत नाही त्यामुळे परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा होणे महत्वाचे आहे.
सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्यमापन
O अर्थ
O सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्यमापनाची गरज
1) परीक्षा पद्धतीमध्ये सुधारित बदल.
2) विद्यार्थ्यांचा सुप्त गुणांचा विकास.
3) शैक्षणिक मूल्यमापनातील त्रुटी.
4) शिक्षणाची गुणवत्ता.
O सातत्यपूर्ण आणि सर्वांगीण मूल्यमापनाचे फायदे
1) विद्यार्थी सहभाग वाढतो.
2) विद्यार्थी कार्यक्षमता वाढते.
3) शिक्षक-विद्यार्थी आंतरक्रिया वाढते.
4) विकासात्मक दृष्टीकोन.
O सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्यमापनाच्या मर्यादा
1) शैक्षणिक साधनांची कमतरता.
2) शैक्षणिक साधंनांचा अपुरा वापर.
3) सातत्याचा अभाव.
4) अद्ययावत नोंदीचा अभाव.
5) वस्तुनिष्ठ मूल्यमापणाचा अभाव.
अर्थ
विद्यार्थ्यांचे वर्षातून एकदाच मूल्यमापन करण्याऐवजी वर्षभर ठराविक अंतराने मूल्यमापन के ले जाते.
विद्यार्थ्याची वर्गातील वर्तणूक, अभ्यासतील लक्ष, उत्तरे देण्याची तत्परता, उपक्रमातील सहभाग यामार्गाने विद्यार्थ्याचे मूल्यमापन करून प्रगति अभ्यासता
येते.
अभ्यासतील कच्चे दुवे किं वा मागासलेपण शोधता येते.
मूल्यमापनावरून विद्यार्थी मागे का पडला? या दृष्टीने त्याच्या प्रगतीसाठी विशिष्ट उपचारात्मक योजना आखता येतात.
यामुळे सातत्यपूर्ण मूल्यमापनाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्यमापनाची गरज
1) परीक्षा पद्धतीमध्ये सुधारित बदल-
मूल्यमापन पद्धतीमध्ये के वळ परीक्षेच्या माध्यमातून मूल्यमापन के ले
जाते. म्हणजेच बोधात्मक विकासावर भर देण्यात येतो, म्हणून हे
मूल्यमापन एकांगी स्वरूपाचे असते. परीक्षा पद्धतीतील उणिवा दूर
करण्यासाठी १९५६ मध्ये मूल्यमापनात सुधारित बदल करून ही पद्धत
अस्तित्वात आणली.
2) विद्यार्थ्यांचा सुप्त गुणांचा विकास-
मूल्यामापनात विद्यार्थ्याने परीक्षेत मिळवलेल्या गुणांना जास्त महत्व
असते. सर्वांगीण विकासासाठी परीक्षेचे महत्व कमी करून सुप्त गुणांचा
विकास करण्यासाठी या मूल्यमापनाची आवश्यकता असते.
3) शैक्षणिक मूल्यमापनातील त्रुटी दूर करण्यासाठी-
मूल्यमापन करतांना परीक्षापद्धत किं वा प्रचलित परीक्षा पद्धत वापरली
जाते.याद्वारे के लेल्या मूल्यमापनातील त्रुटि दूर करण्यासाठी याची गरज भासते.
या मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सुधारित विकासात्मक बदल होतो.
4) शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी-
शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्याचा हेतू विद्यार्थ्यांमध्ये योग्य व अचूक
बदल घडवून आणणे असतो.शालेय शिक्षण पद्धतीमध्ये सुधारीत बदल
घडविणे,शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे,विद्यार्थांचा सर्वांगीण विकास साध्य होणे हे
या मूल्यमापनाचे उद्दिष्ट आहे.
सातत्यपूर्ण आणि सर्वांगीण मूल्यमापनाचे फायदे
1) विद्यार्थी सहभाग वाढतो:
सर्वकष मूल्यमापनामुळे विद्यार्थी शालेय परीक्षेबरोबरच अभ्यासपूरक व सहशालेय उपक्रमांमध्ये सहभागी होतो व आपले
प्राविण्य निश्चित करतो. विद्यार्थी आवडीनुसार शालेय उपक्रमांमध्ये सहभागी होतो. त्यामुळे आपापसातील संबंध वाढतात आणि
विद्यार्थी सहभाग वाढतो.
1) मर्यादित.
2) अमर्यादित /अनिर्बंध.
फायदे व शैक्षणिक उपयुक्तता