Professional Documents
Culture Documents
दीपक करंजीकर
एकविसाव्या शतकातील पहिले दशक आता उलटून गेले आहे. सर्वभक्षक काळ
जसा झपाझप पुढे जातो आहे त्याबरोबर आपले जीवनमानही झपाट्याने बदलते
आहे. व्यक्ती-समष्टी संबंध, समाजाची व्यवस्था, व्यवहार आणि व्यवच्छेदक लक्षणे ही
एखाद्या वेगवान चित्रपटासारखी सरकत आहेत. या आंधळ्या गतीत बऱ्याच गोष्टी
कालबाह्य होत आहेत, महत्त्वाच्या असणाऱ्या अनेक गोष्टींना काहीच महत्त्व उरलेले
नाही, तसेच आता असलेल्या काही गोष्टींशिवाय आपले चालणार नाही असेही झाले
आहे.
खरे तर हे त्या आदी अनंत अशा काळाचे काही विशिष्ट तुकडे आहेत ज्यावर
आपण जगत राहतो. अंतराळाच्या सारीपाटावर हे गाडे नगण्य असले तरी
आपल्यापुरते हेच विश्व आहे. जे सतत बदलते आहे. त्यामुळे ह्या रोज बदलणाऱ्या
विश्वाचे परिणाम अर्थातच आपल्या अस्तित्वावर, जगण्याच्या पद्धतीवर होणे
अपरिहार्य आहे. सध्याच्या विश्वाचे हे मानवनिर्मित प्रश्न कोणते आहेत, त्यांचे देश, धर्म,
भाषा, प्रांत, रंग, लिंग यांना पुरून उरणाऱ्या मानवी आयुष्यावर होणारे दूरगामी
परिणाम काय याचा मागोवा घेणारे हे प्रांजळ चिंतन.
साधारण सव्वाआठशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी विश्वाचे आर्त माझ्या मनी
प्रकाशले' असे म्हटले होते. ती प्रज्ञा, ते अनुभूतीचे समष्टी रूप आपल्याजवळ नसले
तरी आपण आपल्या पातळीवर या झपाट्याचा आणि त्याने निर्माण के लेल्या आपल्या
विश्वाच्या आर्ततेचा किमान दूरवरून वेध घेऊ शकतो. त्याची ही सोपी मांडणी.
- दीपक करंजीकर
प्रस्तावना
- रंगनाथ पठारे
स्त्रोत:
या तुलनेत जगातील सर्वांसाठी खालील गोष्टींसाठी करावा लागणारा
स्त्रोत :
हे प्रमाण जवळपास १६ पट आहे. या असल्या प्रगतीपासून स्वत:ला वाचवणे हे
नुसते नैतिक नाही तर माणुसकीचेही आहे. जगाची बात कशाला करायची? एक साधे
उदाहरण आपल्या महाराष्ट्राचे पाहू या.
सेवा क्षेत्र आणि उद्योग यांचा राज्याच्या उत्पन्नातील हिस्सा सुमारे ८७% (देशात
सर्वांत अधिक) आहे; तर भारताच्या नियोजन मंडळाच्या एका सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र
दारिद्र्याच्या बाबतीत देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्या लोकसंख्येच्या
जवळपास ३८% लोक दारिद्र्याच्या खाईत जगत आहेत. उत्पन्न असूनही दारिद्र्याची
व्याप्ती इतकी चिंताजनक कशी? या देशात सगळ्यात जास्त आत्महत्यही महाराष्ट्रातच
होतात. समतोल उद्योगवाढीकडे अक्षम्य दुर्लक्ष करणारे सत्ताधारी 'मराठी माणूस
नोकरीप्रिय आहे' असेच सोयीने गृहीत धरून त्याच्या नोकरीसाठी आंदोलने करणारे
प्रादेशिक पक्ष यांपैकी कोणीही गेल्या ४० वर्षांत महाराष्ट्रात कोणत्याही मूलभूत क्षेत्रात
उद्योग उभे के ले नाहीत. महाराष्ट्रातून देशात जाणारा कच्चा माल - चामडे, दूध,
तेलबिया, कोळसा, कापूस आणि सेवा क्षेत्र यातल्या कोणत्याही क्षेत्रांत असे उद्योग उभे
राहिले असते तर आपोआप हजारोंसाठी रोजगार निर्माण झाला असता. या
सगळ्यांमुळे आज साडेअकरा कोटींच्या महाराष्ट्रात जवळपास ७५-९० लाख लोक
बेरोजगार आहेत आणि त्यात दरवर्षी ४ ते ५ लाखांची भर पडते आहे. पण असे
सांगितले की महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न देशापेक्षा जास्त आहे याचे आकडे तोंडावर
फे कले जातात.
हे अत्यंत फसवे चित्र आहे. आज महाराष्ट्राचे सरासरी दरडोई उत्पन्न हे ४७,०००
रुपये आहे; पण फक्त मुंबईचे दरडोई उत्पन्न १,२५,००० रुपये आहे. महाराष्ट्राची
लोकसंख्या साडेअकरा कोटी; तर मुंबईची लोकसंख्या २.१ कोटी आहे. म्हणजे
महाराष्ट्राच्या जवळपास १९ . आता मुंबई वगळून महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न काढा
म्हणजे या दिशाभुलीचा अंदाज येईल. राज्यात दर लाख लोकसंख्येमागे ७७,०९३
मोबाईल फोन्स आहेत; पण रुग्णवाहिका मात्र फक्त आठ आहेत.
थोडक्यात काय तर विकास आणि विषमता ही हातात हात घालूनच चालतात;
असे असेल तर त्याला विकास तरी कसे म्हणायचे?
२. शांततेचा खळबळजनक आलेख
शांतता ही बाब इतकी अस्वस्थ करणारी असू शकते? आज जेव्हा जगात मंदीच्या
लाटांनी सगळ्यांना हतबल करून सोडले आहे, तेव्हा जगातले शस्त्र-व्यापारी मात्र
आनंदून गेले आहेत; कारण हीच वेळ आहे त्यांच्या भरभराटीची, व्यवसायाच्या अपूर्व
संधीची. म्हणजे नोकऱ्यांच्या जगात अस्वस्थ शांतता आहे; तर शस्त्रांच्या जगात
व्यवसायाच्या हमीची शांतता आहे. अजून एक माहिती देऊ? या अराजक अथवा
हिंसेवर अवलंबून असणारी अर्थव्यवस्था किती आकाराची? तर २.४ ट्रिलियन डॉलर्स
इतकी! म्हणजे किती? तर १४४ लाख कोटी रुपये म्हणजे जगाच्या एकू ण ढोबळ
उत्पन्नाच्या ५%.
खोटे वाटते ना!
सोबत एक आकृ ती आहे. त्यात जगाच्या शांततेचा आलेख आहे. पाच वेगवेगळ्या
पद्धतींनी शांततेचा इंडिके टर त्यात दाखवला आहे. त्यातला . म्हणजे शांत देश आणि
म्हणजे अत्यंत अशांत देश. चित्र भयाण आहे. जगाच्या नकाशात अगदी टोकाला
असणारे दोन तुकडे सोडले तर सर्व जग थोड्याफार प्रमाणात अशांत आहे. आपला,
रशियाचा, मध्य पूर्वेचा आणि आफ्रिके तला पट्टा तर एकदम सकस प्रदेश. इथे खरे
शस्त्रांचे मजबूत मार्के ट. शस्त्र व्यापारी म्हणून या नकाशाकडे बघा. मग कळेल...!
आता या एकं दर विषयाकडे आकडेवारीतून म्हणजे थोडे वेगळ्या कोनातून पाहू
या. जगातल्या प्रमुख राष्ट्रांचे संरक्षणावर होणारे खर्च किती या दृष्टिकोनातून. पुढील
तक्ता
बघा.
प्रमुख राष्ट्रांचे संरक्षणावर होणारे खर्च (लाख कोटी रुपये)
देश संरक्षण खर्च शस्त्रव्यापार
संपूर्ण जग ७० ७०
अमेरिका २८ ८
चीन ३.५ १
इंग्लंड, फ्रान्स २.८ १.६
रशिया १.५ ३.४
हे फक्त युद्ध सामग्रीच्या उत्पादनाचे निव्वळ आकडे आहेत. इतर कोणत्याही संलग्न
खर्चाच्या बाबी यात नाहीत. आता याचे परिणाम जरा तपशिलाने आणि उदाहरणाने पाहू
या.
सुमारे ९ वर्षे चाललेल्या अमेरिके च्या इराक/अफगाणिस्तान युद्धाचा खर्च हा
जवळपास ६० लाख कोटी रुपये आहे. यात मनुष्यहानी (किमान १५ लाख मृत्यू),
प्रदूषण, मानसिक विकलांगता, नैसर्गिक साधनसंपत्तीचा (जी सर्वांसाठी आहे) नाश यांचा
समावेश नाही. समजा, आपण असे म्हटले की ही सर्व राष्ट्रे आणि त्यांच्याशी साटेलोटे
असणारे शस्त्रव्यापारी यांनी मिळून हे जग वेठीला धरले आहे आणि त्यांच्यावर सदोष
मनुष्यवधाचे गुन्हे दाखल के ले पाहिजेत तर काय चुकीचे आहे? काही काळापूर्वी
कोपनहेगनला जागतिक पर्यावरण परिषदेत अमेरिके च्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन
मोठ्या उदार अंत:करणाने म्हणाल्या होत्या, “अमेरिका पुढाकार घेऊन जगात ५
लाख कोटींचा एक पर्यावरण निधी उभा करेल.' हे विधान अतिशय क्रू र विनोदी आहे...
म्हणजे जगाला जखमी करण्यासाठी ७० लाख कोटी, ती जखम चिघळत ठे वण्यासाठी
२० लाख कोटी आणि त्यावर मलमपट्टीचा खर्च ५ लाख कोटी? हे विधान नुसतेच
हास्यास्पद नाही; तर लाखो लोकांना जगण्याची संधी नाकारणारे आहे. म्हणूनच अत्यंत
विखारी आणि अमानवी आहे.
आजकाल आपण हल्ल्याच्या बातम्यांना सरावलो आहोत. मध्यंतरी एका
सर्वेक्षणात समोर आलेली माहिती थक्क करणारी आहे
सबंध जगभरात दर दिवशी किमान ८२२ लोक फक्त छोट्या शस्त्रांना बळी पडत
असतात. यातले ८०% लोक हे सामान्य नागरिक आहेत.
आजमितीला पाश्चात्य राष्ट्रे १ डॉलर विकासावर खर्च करतात; तर १० डॉलर
शस्त्रांवर खर्च करतात.
जी८ या समूहांमधले सर्व देश हे जगातील शस्त्रांचे प्रमुख निर्यातदार आहेत.
युनोच्या सुरक्षा समितीचे कायम सदस्य अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, इंग्लंड
यांची जगातील शस्त्रांच्या व्यापारावर पूर्णपणे मक्तेदारी आहे.
जगात सध्या उपलब्ध असणाऱ्या अधिकृ त फायर आर्सचे प्रमाण दर सहा
माणसामागे एक इतके आहे. अनधिकृ त फायर आर्सची संख्या याच्या दुप्पट असल्याचा
एक भयावह अंदाज आहे.
जगात दरवर्षी बनणाऱ्या सर्व प्रकारच्या बंदुकीच्या गोळ्यांचे प्रमाण दर माणशी ४
गोळ्या इतके आहे.
सध्या जगात सुमारे ५० कोटी छोटी शस्त्रे वापरात आहेत. याचे प्रमाण लोकसंख्या
७ अब्ज धरली तर दर १४ माणसांमागे एक छोटे शस्त्र इतके प्रचंड येते. मागच्या दशकात
असे पाहण्यात आले की एके -४७ ही स्वयंचलित मशीनगन णका कोंबडीच्या बदल्यात
युगांडात विकली जात होती.
जग संरक्षणखर्चाच्या फक्त ४०% खर्च शेतीवर होतो तर १०% खर्च सर्व प्रकारच्या
मदतीवर (यात आपत्ती आल्या) होतो.
दरवर्षी साधारणपणे १५ लाख छोटी शस्त्रे चोरीला जातात अथवा गायब होतात
काळ्या बाजारातल्या शस्त्र विक्रीची उलाढाल २० ते ४० हजार कोटी रुपये इतकी
आहे.
जगातील साधारण ९८ देशातील ११३४ कं पन्या या शस्त्रांच्या उत्पादन, विक्री यात
सहभागी आहेत.
जगाचा एकू ण दारुगोळा आणि शस्त्रास्त्रे यांच्यापैकी ६०टक्क्यांची मालकी ही
खाजगी उत्पादकांकडे आहे.
मित्रहो, जगभर चाललेल्या या अमानुष आणि अनिर्बध खेळाची थोडीतरी कल्पना
यावी म्हणून वरील तपशील दिला आहे. या तपशिलाने नेमके शांततेच्या बुरख्याआडून
जगात हिंसेचा व्यापार कोण करते आहे हे ध्यानात येईल. फार चर्चा न करता या अमानुष
खेळाने नेमका काय परिणाम घडवला आहे याची नजीकच्या काळातली दोन उदाहरणे
पाहू. त्यातले एक आपल्या शेजारच्या अंगणात घडते आहे.
इराण-इराक युद्धातील अमेरिके चा जानी दोस्त, सद्दामने अमेरिके कडून प्रचंड शस्त्र
खरेदी के ली. त्याबद्दल त्याला डेट्रोईटचा ऑनररी नागरिक हा किताब दिला गेला. ७०
जहाजे भरून अब्जावधी डॉलर्सची रासायनिक शस्त्रे इराकला विकली गेली. इराक
आखातातील बलवान राष्ट्र झाले. पुढे अमेरिके शी त्याचे तेलावरून आणि अरब
आखातातल्या मक्तेदारीवरून बिनसले. त्याच्या तपशिलात इथे जाण्याचे कारण नाही.
सद्दाम बिथरला. दरम्यान त्याची अमेरिके कडून शस्त्र खरेदी थांबली. त्याने तेलविक्रीचे
नवेच आयाम प्रस्थापित करण्याचे ठरवले. मग महासत्ता बिथरली. इराकवर युद्ध लादले
गेले. सद्दामचा अल-कायदाशी काही संबंध नसताना कु रापत काढत, युनोत खोटेनाटे
प्रमाण दावे करत इराकवर युद्ध लादले गेले (परत शस्त्र विक्रीचीच संधी). परिणती काय?
सद्दामच्या काळात नव्हता इतका हा देश आता अस्थिर झाला आहे. अमेरिके च्या
विरोधाचे युद्ध घराघरातून लढले गेल्याने अब्जावधी रुपयांची चोरटी शस्त्रविक्री तिथे
झाली आहे. ह्या सगळ्या बेहिशेबी शस्त्रांचा साठा अनेक कारणांनी उपयोगात आणला
जाईल आणि पुढची अनेक वर्षे तो देश अस्थिर होत जाईल. त्यात सामान्यजन भरडले
जातील. त्यातून एक दिवस बंड होईल आणि परत यादवीकडे जात हा देश मध्यपूर्वेतील
शस्त्र व्यापाराची एक मोठी बाजारपेठ तयार करेल अशा पद्धतीची ही व्यूहरचना असावी
अशी शंका येते.
दुसरे उदाहरण पाकिस्तान. आज अराजकाकडे वाटचाल करणारा आपला शेजारी.
९/११ च्या हल्ल्यानंतर पाकिस्तान अमेरिके कडून शस्त्रे खरेदी करणारा सगळ्यात मोठा
देश आहे. तर मग हा देश मजबूत असायला हवा. पण प्रत्यक्षात हा देश आज एक रॉटन
कं ट्री आहे. तिथले सामान्य जीवन सडलेले आहे. राज्यकर्ते बंदुकीच्या जोरावर जिवंत
आहेत. आज पाकिस्तानात दररोज सुमारे ८,००० बालके जन्माला येतात त्यातील ६० ना
शिक्षण आणि किमान पोषणाची सोय नाही. या दिशाहीन देशात आज ४५% जनता
(म्हणजे सुमारे ११ कोटी लोक) भिकारी जीवन जगते आहे, तर ७ कोटी लोक पिण्याच्या
पाण्यापासून वंचित आहेत. ८ कोटी निरक्षर आहेत. पाकिस्तानात तुम्ही एकाच रस्त्यावर
काळाचा शंभर वर्षांचा प्रवास सर्रास बघू शकता. जिथे हे उकिरड्यावरचे जिणे जनता
जगत असते, त्याच अरुं द गल्ल्यांत जमीनदारांच्या, लष्करी माजुरड्या लोकांच्या आणि
अमली पदार्थाच्या तस्करांच्या पॉश बीएमडब्ल्यू, मर्सिडिस, पोर्शे अशा कोट्यवधी
रुपयांच्या अलिशान गाड्या ये-जा करत असतात. हे दृश्य नेहमीचे आहे. आज
भरकटलेल्या पाकिस्तानवर हुकमत गाजवणारी दोन सत्ताकें द्रे आहेत. एक त्यांचे
लष्कर आणि दुसरी आयएसआय ही गुप्तहेर संघटना. पाकिस्तानला मदत
करताना अमेरिके ची त्यांच्याशी सततची सलगी असते. पाकिस्तानच्या ६५ वर्षांच्या
इतिहासात तिथे इतकी वर्ष लष्करी शासन राहिले, याला तिथल्या राज्यकर्त्याशिवाय
अमेरिके चाही हातभार होताच. अयुबखान, झिया, मुशर्रफ यांच्यासारख्या हुकु मशाहांशी
असणारे अमेरिके चे संबंध आणि भुत्तो, बेनझीर, नवाझ शरीफ यांच्यासारख्या लोकशाही
मार्गाने निवडलेल्या नेत्यांशी असणारे संबंध यातला फरक काय सांगतो? याशिवाय
पाकिस्तानला झालेल्या अमाप शस्त्रविक्रीने भारतासाठी जे वाढून ठे वले आहे ते वेगळेच.
गेल्या २५ वर्षांत तीन युद्धे आणि अनेक प्रॉक्झी वॉर्स, पंजाबची शोकांतिका, अमाप
अतिरेकी कारवाया, सियाचीन, कारगीलमधली घुसखोरी, काश्मीरमधील अस्थिरता, १३
विविध बॉम्बस्फोट, मुंबईवरचा हल्ला असल्या घटनांची साखळी भारताला अनुभवावी
लागत आहे. या बेहिशेबी शस्त्रांच्या वापरासाठी पोसलेले जेहादी ग्रुप, लष्कर-ए-तोयबा,
हरकत-उल-अन्सार, हिजब-उल-मुझाहीदिन आणि या जोडीला चोरट्या शस्त्रांवर
चालणाऱ्या अमली दहशतवादाच्या संघटना (एकू ण व्यापार ५००० कोटी रुपये) यांच्या
रूपाने, शस्त्रव्यापारातील नफ्याच्या हव्यासाने गेल्या ६० वर्षांत जन्माला घातलेले हे
भयाण वास्तव आपल्या शेजारी आहे. ज्यांनी ही शस्त्रे विकली त्यांना नाही; तर
आपल्याला या दुर्दैवी आणि बकाल शेजाऱ्याशी सामना किंवा दोस्ती करायची आहे.
ज्यांनी यातून पैसे कमावले ते मात्र नव्या सावजाच्या शोधात निघून गेले आहेत.
३. दुखते तिथे विकते!
आपण पिकवत असलेले धान्य आणि आपली लोकसंख्या यांचे प्रमाण व्यस्त
असल्याचा दावा सतत के ला जातो. एवढ्या लोकसंख्येला पुरणारे धान्य आहे कु ठे ? ते
पिकवणारी सकस जमीन आहे कु ठे ? त्यासाठी लागणारे पुरेसे शुद्ध पाणी आहे कु ठे ?
आज सात अब्जापर्यंत जाऊन पोचलेल्या जगाच्या लोकसंख्येला हे सगळे कसे पुरणार?
असे सगळे वरवर निरुत्तर करणारे आणि जणू उत्तरेच नसणारे प्रश्न विचारले जाऊ लागले
आहेत. विकासाच्या अंध आणि बेफाम वाटेवर स्वत:ची, स्वत:च्या मानवी जीवनपद्धतीची
वाट लावून घेणाऱ्या प्रगत राष्ट्रातील अनेक विद्वान असे प्रश्न विकसनशील देशांना
विचारत आहेत. एकीकडे एके क क्षेत्र परदेशी गुंतवणुकीला खुले होत असताना तर हे प्रश्न
जास्तच कु टील, हेतुपूर्ण आणि भीतीदायकही ठरू शकतात.
आपल्यासारख्या कृ षी संस्कृ तीशी हजारो वर्षे नाळ असणाऱ्या आणि हरित, श्वेत
अशा अनेक क्रांत्या स्वत:च्या जीवावर यशस्वी करणाऱ्या देशाला, हे प्रश्न काल परवाच्या
भुक्कड विद्वानांनी,त्यातही कार्पोरेट क्षेत्राकडून पोसले जाणाऱ्या मुखंडांनी विचारावे हे
नुसते संतापजनकचं नाही तर अनाठायीसुद्धा आहे. हे सगळे आठवायचे कारण सध्या
आपल्या देशात GM (Genetically Modified) फू डची चर्चा वेगात सुरू आहे. जणू
जमीन नासली आहे, वांझोटी झाली आहे, माणसे भुके ली आहेत आणि आता
तंत्रज्ञानाला काहीतरी हातपाय हलवल्याशिवाय काही खरे नाही म्हणून तेच आता अन्नही
पिकवतील. आपल्या सगळ्या भके लेपणाचे उत्तर अशा पद्धतीने विकसित के लेले अन्न
देऊ शकते असेही मोठ्या वकु बाने पटवले जात आहे. शास्त्रीय दृष्टिकोनाचे सतत गळे
काढणारे आता सरसावले आहेत.
वास्तविक दुनियेतली वाढत जाणारी भूक अथवा प्रचंड उपाशी जनता एकीकडे;
तर प्रचंड धान्य उत्पादन दुसरीकडे अशा एका विचित्र वळणावर जग आणि आपणही
सध्या आहोत. प्रचंड धान्यसाठा आहे आणि माणसे उपाशी आहेत ही परिस्थिती GM
फू डने बदलेल असा विचार करणे खुळचटपणाचे आहे. कारण माणसे उपाशी आहेत
याचा अर्थ त्यांच्याकडे हवे ते अथवा आवश्यक अन्न विकत घ्यायला पुरेसे पैसे नाहीत हा
आहे. आजही जगातील अनेक कु पोषणग्रस्त प्रदेश अथवा भुके ली माणसे तशी का
आहेत याचे खरे उत्तर दारिद्र्यात अथवा इतर कारणात सापडेल.
GM ने सगळे बदलेल, ते अतिशय सुरक्षित आहे. त्यामुळे रसायनांचा वापर कमी
होऊन जास्त उत्पादन घेता येईल असे अनेक दावे त्याचे समर्थक करत असतात. पण
जेनेटिकली मॉडिफाईड फू ड नेमके काय आहे? ते एक जैविक तंत्रज्ञान आहे - ज्यात
शास्त्रज्ञ एका जीवपेशीतील जीन्स काढून ते दुसऱ्या जीवपेशीत टाकू शकतात. यामुळे
होणाऱ्या जैविक प्रक्रियेत अनेक नवीन जीव तयार होतात. आता हे कृ त्रिम अन्नासंदर्भात
असल्याने विविध वनस्पतीबद्दलच हा विषय नीट लक्षात घेऊ या. नेहमी असे ठासून
सांगितले जाते की कोणतेही जेनेटिक मॉडीफिके शन हे (समस्त प्राणी आणि वनस्पतीत)
नैसर्गिकरीत्याच असणाऱ्या निपजप्रक्रियेसारखे आहे. पण वस्तुस्थिती मात्र तशी नाही.
पारंपरिक उत्पादन किंवा निपज पद्धतीत (organism) निसर्गत:च काही ठोस
अडथळे असतात किंवा विशिष्टच मार्ग असतात असे आपण म्हणू. उदाहरणार्थ - कापूस
आणि उंदीर अशी एकमेकातून निपज होऊ शकत नाही. पण जेनेटिक मॉडीफिके शन
मात्र अशी पद्धती आहे ज्यामुळे हे जीन्स निसर्ग निपजपद्धतीच्या पलीकडे जाऊ
शकतात. अजून एक उदाहरण द्यायचे तर = समजा, जेनेटिक बदल करून एखाद्या
माशाचे जीन्स एखाद्या टोमॅटोमध्ये गेले तर कसे वाटेल? सगळ्या जीवप्रक्रियेत मग तो
विषाणू असो वा माणूस, अंतर्भूत अशा काही आज्ञावली असतात. ज्यायोगे त्या जीवाचे
प्रजनन, विकसन, वाढ आणि जिवंत राहणे हे ठरते. पेशीतल्या एक मोठ्या रेणूत हे सर्व
सामावलेले असते. हाच आपल्याला परिचित असलेला DNA. हा जो DNA असतो तो
अनेक सूक्ष्म भागात विभागला जातो. ज्यायोगे त्या जीवाच्या अस्तित्वाची आणि वाढीची
प्रक्रिया नियमित आणि नियंत्रित होत असते ते म्हणजे जीन्स. जेनेटिक मॉडीफिके शन या
पद्धतीत मात्र हा DNA तोडून तो एका निपजप्रक्रियेतून दुसऱ्या निपजप्रक्रियेत पाठविला
जातो. जेनेटिक इंजिनियर DNAचे वेगवेगळे तुकडे वापरून ज्यातून नवीन जीन्स तयार
करून ते पुढे वेगवेगळ्या हव्या त्या निपजपद्धतीला जन्म देतात, हे सगळे जैविक
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शक्य आहे. त्याचा एक निश्चित असा उपयोगही आहे.
उदाहरणार्थ, विशिष्ट रोगांच्या विषाणूंची वाढ नियंत्रित करणे. फार तपशिलात न जाताही
इथे आपल्याला कळू शके ल की मुळात ही पद्धत निसर्गनियमाला धरून नाही. म्हणजे
सुरुवातीला पूर्ण अंदाज येणार नाही आणि झाल्यावर लगेचच लक्षात येणार नाहीत असे
काही अत्यंत दूरगामी परिणाम तिचे असू शकतात.
निरनिराळे जीन्स अशा पद्धतीने घुसवून तयार होणाऱ्या नवीन अन्नात प्रथिने वगैरे
अन्नघटकांचे प्रमाण, त्यांचे स्वरूप हे सगळेच वेगळेच आणि विपरीतही असू शकते.
त्याचे अनेक दुष्परिणाम ते सेवन करणाऱ्या मानवी आरोग्यावर होऊ शकतात. पुढे
जाऊन असेही म्हणता येईल की असे अनेक दुष्परिणाम जसे उद्भवतील तसे त्यांचे
स्वरूप लक्षात येईल; पण तोपर्यंत त्याच्या कारणमीमांसेची मूळ उद्भवाशी सांगड घालणे
कदाचित शक्यही होणार नाही. असो. अशा प्रकारे तयार होणाऱ्या धान्याला ‘फॉर्म क्रॉप'
असे संबोधले जाते. आजमितीला जगभर अशा प्रकारचे धान्य पिकवण्यासाठी हजारो
परवाने दिले गेले आहेत. अशा प्रकारचे वेगवेगळे अन्न जगातल्या प्रगत देशात आणि
विकसनशील देशात सध्या वेगवेगळ्या अन्नसाखळीच्या बँडेड दुकानात मोठ्या प्रमाणात
उपलब्धही झाले आहे.
जेनेटिक फू ड तयार होऊन आता जवळपास २० वर्षे होत आली आहेत आणि
नेमकी याच वेळी त्याच्या दुष्परिणामांची चर्चा सुरू झालीय. आता अनेक राष्ट्रे या
संदर्भात अधिकच सजग होऊ पाहताहेत. प्रगत राष्ट्रांच्या नेहमीच्या खाक्यानुसार स्वत:
यातून बाहेर पडून, आता हे सगळे संशोधन, त्याचा वापर आणि व्यापार, ही पिके
विकसनशील देशांकडे वळवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालीय. नुकतेच आपल्याकडे
बीटी जातीच्या वांग्याच्या लागवडीवरून उठलेले वादळ आठवत असेलच.
जागतिकीकरणाच्या असामान्य दबावात, सध्या भारत आपली प्रचंड बाजारपेठ आणि
तिची अधिकाधिक क्षेत्रे परदेशी गुंतवणूक आणि वापरप्रक्रियेला खुली करत आहेच.
आपल्या देशातील दारिद्र्य आणि उपासमार हासुद्धा या सगळ्या प्रचाराला सुसंगत
असाच मुद्दा असल्याने अशा प्रकारची जेनेटिकली मॉडीफाईड बियाणे आपल्या देशावर
लादली जाण्याची शक्यता आता बळावत चालली आहे. काय आहेत याचे दुष्परिणाम? हे
सगळे नेमके काय आहे ते नीट समजावून घेतले पाहिजे.
मुळात हे जेनेटिक फू डचे फॅ ड म्हणा अथवा निकड म्हणा आली ती विविध
बियाणांवरच्या रोगांना प्रतिबंध करणारे संशोधन करताना. वातावरणातून, पाण्यातून
लागणाऱ्या विविध किडींपासून पिकांचे संरक्षण व्हावे, त्यांची जोमाने, सकस वाढ व्हावी
म्हणून हा शोध अत्यंत मूलभूत आणि महत्त्वाचा होता. तो प्रश्न जसा आटोक्यात आला
तसे संशोधन निघाले पुढे. पिकांचा नाश होऊ नये अशा वाटेवर सुरू झालेले हे संशोधन
पोचले थोड्या पैशात, थोड्या संसाधनात जास्त पिकावे; मजबूत नफा मिळावा या
फसव्या वाटेवर । मग पुढे जात रोगापेक्षा औषध भयंकर या न्यायाने हे असले संकरीत
अन्न एकदम स्वस्त पडू लागल्याने त्याचे उत्पादन एखाद्या कारखान्यात होणाऱ्या
उत्पादनासारखे अखंडित उत्पादनासारखे करावे, मग त्यातून अफाट नफा मिळवावा
अशी लालसा मोठमोठ्या बायो क्षेत्रातल्या कं पन्यांच्या मनात निर्माण झाली. नफ्याला
एकच भाषा कळते नफ्याची! निरोगी असण्याची अथवा नसण्याची कळत नाही!
उलटपक्षी पाहता एखादा रोग ही तर उत्तम नफ्याची हमी. मग काय परवाने वाटले गेले.
उत्पादन सुरू झाले. काही वर्षे उलटून गेली. ज्यांनी हे शोध लावले त्यांना पारितोषिके
मिळाली. सत्कार झाले. 'मानवाच्या इतिहासाच्या वाटेवरील लक्षणीय मुक्काम' वगैरे
ठोकळेबाज शब्दप्रयोग झाले. ल अशा पिकांचा वापर वाढू लागला तसे त्याच्या
धोक्याचीही चर्चा सुरू झाली. ह्या असल्या अन्नाचा मानवी आरोग्याला असणारा धोका,
उद्भवणाऱ्या निरनिराळ्या अॅलर्जिक अवस्था आणि त्यांना ह्या अन्नाच्या सेवनाने
मिळणारे उत्तेजन, यातल्या जीनची स्थिरता, त्यातून मिळणाऱ्या पोषकद्रव्यांचे प्रमाण
यासाठी मग चाचण्याही सुरू झाल्या. त्यांचे भयावह निकाल आले. इथे हे लक्षात
घ्यायला हवे की जेनेटिक इंजिनिअरींग नेहमीच निपजप्रक्रियेतून प्रथिने खाद्यपदार्थात
संक्रमित करत आलेले आहेत. ब्राझीलमध्ये एकदा काही विशिष्ट कडधान्यातील प्रथिने
सोयाबीनमध्ये संक्रमित के ली आणि त्याच्या सेवनाने अनेकजण दर्धर रोगाचे शिकार
झाले. नंतर खुप दिवसांनी संशोधनांती कळले की, ही माणसे त्या विशिष्ट कडधान्याला
अॅलर्जिक होती. आता समजा, एखाद्या मुलाला दुधातल्या प्रथिनांची अॅलर्जी आहे.
त्या दुधातले काही जीन्स जर जेनेटिकली बदललेल्या गाजरात संक्रमित के ले असतील,
तर त्या मुलाला, त्याच्या आईला, त्याच्या डॉक्टरला, हे सहजासहजी कधीच कळणार
नाही की कशामुळे त्याला त्रास होतो आहे. कारण त्याला तर दुधाची अॅलर्जी होती हे
माहीत आहे; पण तो तर आता गाजर खातोय.
दुसरीही एक गोष्ट लक्षात आली ती अशी की, असे GM फू ड खाल्ल्याने त्यात
असणारे जीन्स आपण एखाद्या रोगावर घेतलेल्या एखाद्या प्रतिजैविक औषधांच्या
परिणामाला बाधक ठरू शकतात. GM फू ड मधले हे जीन्स शरीरात असणाऱ्या एखाद्या
विषाणूतही प्रवेश करू शकतात. एक साधे उदाहरण पाहू, नुसती पाण्यावर मारलेली
जंतुनाशक DDT पावडर, माशांच्या पोटात सापडून लोकांना विषबाधा होत असल्याची
उदाहरणे आहेत. मग GM फू डमुळे तर त्या संपूर्ण पिकाची संरचनाच बदलते आहे आणि
त्यामुळे काय काय होते त्याची नीट माहिती नाही. त्याचा अंदाजही रोगाला बळी
पडल्याशिवाय येत नाही, तर हे भीषण नव्हे काय?
आपल्या जीवप्रक्रियेतून, चयापचयाच्या सतत चालणाऱ्या क्रियेतून अनेक विषारी
द्रव्ये तयार होत असतात आणि कोणतीही वनस्पती/शरीररचना हे सर्व बाहेर
टाकण्यासाठी सतत कार्यरत असते. म्हणजेच काय तर आपली संरक्षक यंत्रणा अशा
प्रकारची द्रव्ये तयार करतात ज्यामुळे या विषारी द्रव्यांचा आपल्या शरीरयंत्रणेवर फारसा
परिणाम ती द्रव्ये होऊ देत नाहीत. इथे मात्र असेही आढळून आले की, या नवीन GM
फू डमुळे अशी काही नवीन विषारी द्रव्ये तयार होतात, ज्यांचे काय करायचे हेच आपल्या
संरक्षकप्रक्रियेला कळत नाही. समजा, जेनेटिक पद्धतीने कॉफी तयार करताना त्यातील
कॅ फीनच काढून टाकले. (डीकॅ फीनेटेड कॉफीची फॅ शन आहेच की) कारण ते आरोग्याला
चांगले नाही. आता याच कॅ फिनमुळे कॉफीला बुरशी लागत नाही हेही खरेच आहे. मग
प्रश्न असा उभा राहतो की आता ह्या नवीन कॉफीच्या दाण्यांना बुरशी लागेल आणि मग
ती बुरशी परत अशी काही विषारी द्रव्ये तयार करील जी नॉर्मल पद्धतीने नष्ट करता
येणार नाहीत. म्हणजेच हे ऋच फू ड अशा काही नवीन विषारी द्रव्यांना सतत जन्म देत
राहील. अनेक पिकांत अशा प्रकारची विषारी द्रव्ये तयार होत राहिली, तर ती खाणारे
प्राणी, त्यांना खाणारी माणसे अशा सगळ्यांनाच हे मारक ठरेल.
GM फू डने जगाचे भुके लेपण नष्ट होईल हा असाच एक हास्यास्पद दावा आहे.
भारताचे उदाहरण पाहू. आपल्या देशात धान्याची कोठारे भरलेली आहेत आणि त्याच
वेळी काही कोटी माणसे उपाशी आहेत तर, काही कोटी लोकांना कु पोषणाचे बळी ठरावे
लागते. आता जर हे असलेले अतिरिक्त धान्य यांच्या तोंडापर्यंत पोचू शकत नाही तर
जेनेटिक फू डने असे काय वेगळे घडणार आहे? मग भारतात GM फू डची चर्चा कशाला
होते? याचे कारण सरकारवर आंतरराष्ट्रीय बायो-टेक्नो उद्योगाकडून येणारा प्रचंड दबाव.
कोणतेही शास्त्रीय सल्ले, प्रशासकीय मत, राजकीय इच्छाशक्ती पूर्ण बदलले जाऊ
शकते इतके पाशवी असे आर्थिक साम्राज्य या बहुराष्ट्रीय कं पन्यांकडे आहे.
दुसरे कारण म्हणजे गेल्या तीन दशकात भारतात शोधांच्या दुनियेत फारसे काही
विशेष न घडल्याने GM फू ड हे एखाद्या चलनी नाण्यासारखे या देशातल्या काही
शास्त्रज्ञांना कदाचित स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी वापरावेसे वाटते. त्यांच्याकरता हे
संशोधन त्यांच्या जगण्याची काळजी घेणारे ठरू शकते. पण आमचे काय हो? आत्ता या
क्षणाला भारतात कापूस, मोहरी, ऊस, तेलबिया, सोयाबीन, तांदूळ, वांगी, बटाटे, के ळी,
पपई आणि वैद्यकीय वनस्पतींवर हे संशोधन चालू आहे. याशिवाय मासे हे जलचरसुद्धा
ह्या संशोधनाला बळी पडले आहेत. मात्र याविषयी माहिती देणारे समाजहितैषी गट
अथवा त्यांच्या मागे ठामपणे उभे राहणारे शहाणे आणि बहुसंख्येचे जनमत आपल्या
देशात अजून तयार झालेले नाही. अज्ञान हे सर्व हलाखीला कारणीभूत असते असे
म्हणतात, हे आपल्या बाबतीत खरेच किती खरे आहे नाही?
आपल्या देशात यापूर्वी बीटी कापसावर झालेले संशोधन काय दर्शवते? अतिशय
ढिसाळ आणि अशास्त्रीय पद्धतीने फक्त तीन वर्षे संशोधन चालले आणि पर्यावरण
खात्यांतर्गतच्या कमिटीने ते मान्य करून टाकले. हे असे उत्पादन भारतीय वातावरणात
चालणार नाही असे निष्कर्ष जरी यातून आले तरीही बीटी वांगी आणावी म्हणून परत
दबाव आलाच. या निमित्ताने हेही सांगितले पाहिजे की मुळात भारतातला जैविक
विविधतेचा कायदा २००३, अशा प्रकारच्या GM फू डला परवानगीच देत नाही. तरीही हे
सर्व धंदे बिनदिक्कतपणे सुरू आहेत. ज्यांची या मातीशी नाळ नसावी अशी शंका यावी
अशा के वळ मूठभर लोकांनी या पद्धतीने आपली भारतीय जैविक विविधता विकायला
काढली आहे. आपले नियंत्रक मंडळ बहुराष्ट्रीय कं पन्यांकडून याच्या परदेशातल्या
दुष्परिणामांची सविस्तर यादी मागवते. पण त्यांची तपासण्याची प्रक्रिया काही राखली
जात नाही. म्हणजे परदेशात नेहमी अशा गोष्टींचे काही परिणाम मुद्दाम तपासले जातात.
असे बियाणे वाढवून, त्याचे सेवन करायला लावून, त्याच्या बाधेच्या, अॅलर्जीच्या,
विषाणूंच्या, प्रतिकाराच्या अशा सर्व शक्यता प्राणीमात्रांवर तपासल्या जातात. त्यामुळे
अशा गोष्टींची मान्यता तिथे किमान २५ वर्षे घेते; कारण तितका काळ या जीवचक्राचा,
त्याच्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी लागतोच. आपल्याकडे मात्र दोन
तीन वर्षांत गोष्टी निकालात काढल्या जातात. परिणामत: हे थोड्या स्वार्थासाठी देशाच्या
हजारो वर्षांच्या सष्टीचक्राशी बेजबाबदारपणे खेळणे आहे. सरकार प्रत्येक गोष्टीत काही
करेल या आशेवर जगणे आता चालायचे नाही. कारण आपलीही काही जबाबदारी
असते. सरकार येते आणि जाते आपण मात्र नागरिक म्हणून स्थिर आहोत याचा विचार
तरी करायला हवा.
थोडक्यात काय, वैज्ञानिक कोणत्याही निसर्गनिर्मित निपजाच्या प्रक्रियेत एखादे
बदल घडवून तिच्या जागी दुसरी कृ त्रिम पद्धती आणू पाहतात तेव्हा या पृथ्वीवरील
सगळ्या सृष्टीचक्राचा खोलवर विचार करणे अनिवार्य आहे. ते के वळ काही प्राण्यांवरील
प्रयोगांनी सिद्ध करणे घातक आहे. सृष्टीचक्र हे एकमेकांवर अवलंबून असणारे चक्र
असून त्याचे काही तोल, काही परस्परपूरक जटील प्रक्रिया आहेत. ज्यामुळे ह्या
सृष्टीचक्राचे अस्तित्व आहे तेच नष्ट करून अन्नाच्या दुर्भिक्ष्यावर उत्तर शोधायचे, की
सगळेच पूरक असणे नष्ट करून जीवनाची नवीच, परिणामी माहीत नसणारी, विपरीत
पद्धती जन्माला घालायची हे एकदा डोळसपणे ठरवावे लागेल. 'जीवो जीवस्य जीवनं' हा
के वळ मंत्र नाही तर ते जगणे अव्याहत सुरू असण्याचे चिरदायी आश्वासन आहे.
त्याच्यावरच घाला घालून कसे चालेल? जैवतंत्रज्ञानाची रोगमुक्तीसारखी निश्चित अशी
वरदाने आहेत. पण त्याची दिशा जर चुकली तर सर्वनाश अटळ आहे. त्यातून यात
कार्पोरेट क्षेत्र आल्याने फक्त नफा, उलाढाल बघितली जाईल आणि मग हे सगळे प्रश्न
आणि त्याचे परिणाम एकदम मुके , सुन्न होतील. म्हणून आत्ताच याविरुद्ध तन-मन धनाने
काम करणे योग्य!
८. वॉर आणि पीस अर्थात युद्ध आणि शांतता
'या जगात १९६० पासून, विकसित देशांनी जी आर्थिक विकासाची धोरणे रेटली -
ज्यात हरितक्रांती, मुक्त व्यापार करार, जागतिक व्यापार संघटना, आणि शेतीवरच्या
विकसित देशातील प्रचंड सबसिडी या सगळ्याचा अंतर्भाव आहे - त्या सगळ्या धोरणांनी
जागतिक अन्नप्रणालीचा नाश के ला आहे.'
- एरिक होल्ट गीमेनेझ ( आंतरराष्ट्रीय पर्यावरण आणि शेतीतज्ज्ञ)
वरवर पाहता हे विधान एखादे प्रचारकी थाटाचे वाटू शकते. पण प्रत्यक्षात तसे
नाहीये. आपण तपशिलात जाऊन विचार के ला तर जागतिक स्तरावरची आदर्श
अन्नप्रणाली उभी करण्याचा हा सगळाच खटाटोप नुसताच विमनस्क करणारा नाही; तर
साऱ्या जगाला सध्याच्या अपरिहार्य अवस्थेत ढकलणाराही आहे.
१९६०-९० या काळात जगभर हरितक्रांतीचे नारे देऊन ती घडवली गेली.
सुरुवातीला बऱ्याच देशांना त्यामुळे फायदा झाला. औद्योगिकीकरण नसणाऱ्या बऱ्याच
देशांमधला शेतीव्यवसाय आधुनिक झाला आणि दर एकरी उत्पन्न वाढले हे खरे आहे.
पण हेही खरेच की या काळात जगातील शेती उत्पादन वाढले एकू ण ११% नी आणि
उपासमारी फोफावली तब्बल १२% नी. कृ षी उत्पादन वाढूनसुद्धा, लोकांची क्रयशक्ती
मात्र दिवसेंदिवस घटतच गेल्याने त्यातून एकू ण साध्य काहीच झाले नाही. आज
जवळपास अर्ध्या शतकानंतर मागे वळून पाहताना मात्र या सगळ्या व्यवस्थेने
विकसनशील देशांसाठी उभ्या के लेल्या काही समस्या प्रकटपणे दिसतात, जाणवतात.
शेतीव्यवसायाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पूर्णपणे बाजारीकरण झाल्याने के वळ एकाच
प्रकारचे प्रचंड पीक -ज्याला बाजारात भाव आहे/जे बाजाराला हवे आहे तेच-घेतले जाऊ
लागले. आधी असणारी कृ षी आणि जैविक विविधता मात्र संपत गेली. या त्वरित पैसे
देणाऱ्या पिकांनी पाण्याचा बेसुमार उपसा झाल्याने पाण्याची पातळी खोल गेली,
रासायनिक खतांच्या बेसुमार आणि बिनडोक वापराने मुळात कमी उपलब्ध असणारी
जमीन मोठ्या प्रमाणावर क्षारयुक्त झाली. तिची सकसता घटल्याने, ती अनुत्पादक
झाल्याने, तीत आणखी खतांचा मारा करत वारेमाप पिके घेतली गेली. परिणामी ती
संपूर्ण नापीक झाली.
जगात हरितक्रांतीआधी उत्पादन खूप नसेल, आजच्या भाषेत अविकसित असेल
पण त्यावेळच्या पारंपरिक शेतीव्यवस्थेत, प्रत्येकाच्या श्रमाची आणि पोटाची किमान
व्यवस्था वाहणारी जी एक साखळी होती, ती मात्र नष्ट झाली आहे. सध्या खते, बियाणे
यांच्या बहुराष्ट्रीय उत्पादक कं पन्या, अन्नव्यवस्थेचा बाजार करत, जागतिक अन्नबाजाराची
सूत्रे आपल्याच ताब्यात घेत, ती त्यातल्या अमर्याद नफ्यासाठी हलवणाऱ्या वितरण
आणि विक्री संस्था; त्यांना साथ देण्यासाठी सरसावलेल्या विकसित राष्ट्रांच्या तालावर
नाचणाऱ्या युनो, नाणेनिधी सारख्या तालेवार संस्था, आणि देशोदेशींच्या राज्यव्यवस्था
यांचे एक अनिष्ट वर्तुळ तयार झाले आहे. हे वर्तुळ जसजसे आपला परीघ वाढवत गेले,
तसतसे जगातले विकसनशील देश, त्यातील अनभिज्ञ लोक आपली अन्नसुरक्षा हळूहळू
पण निश्चितपणे गमावत गेले. विकसनशील देशातील ग्रामीण कृ षिप्रधान प्रदेशातील
ज्यांनी त्या देशातल्या अन्नव्यवस्थेची अनेक वर्षे धुरा वाहिली होती, एका अनागर
संस्कृ तीत आपल्या लोकांचे हित जपले होते ते हजारो गावकरी अन्नाच्या शोधात
शहरातील झोपडपट्ट्यात ढकलले गेले आणि त्यांच्या नशिबी जगण्याची समृद्धता
जाऊन एकदम बकालपण आले..
विकास होण्याआधी अनेक देश कर्जबाजारी झाले. जणू प्रगत राष्ट्रांचे सारे
विकासाचे मार्ग कर्जाच्या खाईतून गेले होते. पुढे १९८० च्या दशकात नाणेनिधी आणि
वर्ल्ड बँक यांनी या विकसनशील देशांना आपले परकीय कर्ज फे डण्यासाठी मदत
करायला मोठा गाजावाजा करत एक SAP (Structural Adjestment Programe)
आणला. ज्यात 'जास्त निर्यात आणि कमी खर्च धोरण या देशांच्या गळी उतरवले.
कालांतराने विकसनशील देशांवर अनेक बंधने लादण्यात आली. त्यात देशांचे चलनमूल्य
कमी करून निर्यात स्वस्त करणे, परदेशी भांडवल यावे यासाठी व्याजदर वाढवणे यावर
भर दिला गेला. त्यामुळे या देशांची निर्यात वाढून परदेशी चलनाचा साठा वाढला; पण
त्या देशातल्या शेतीवर अवलंबून असणारे, स्थानिक नागरिकांना परवडेल अशी विक्री
करता येणारे उत्पन्न मात्र घटले. त्यामुळे तिथल्या परस्परावलंबी अर्थव्यवस्थेला खीळ
बसली. देशोदेशी या कार्यक्रमाबद्दल असंतोष उफाळून येऊ लागला. मग जागतिक
व्यापार संघटना (WTO) १९९५ मध्ये स्थापन करण्यात आली. या संघटनेने या
सगळ्याचे नियमन करण्याच्या उदात्त (?) हेतूने वेगवेगळे करार करायला सुरवात के ली.
GATT.
GATS, TRIPS अशा अमेरिका आणि युरोपधार्जिण्या करारातून जगातल्या इतर
देशात नांदणाऱ्या सहमतीच्या, सहकाराच्या, एकमेकांना पूरक ठरणाऱ्या व्यापाराभोवती
आपले नियमांचे पाश आवळले. मग आयात कर कमी करणे, देशांतर्गत शेतकी आणि
इतर उत्पादने सबसिडीमुक्त करणे, देशी मालाला संरक्षण न देणे अशा प्रकारच्या
अटींमुळे अमेरिका-युरोपातून तिथल्या शेतकऱ्यांनी प्रचंड सबसिडी घेऊन मुबलक
पिकवलेले आणि त्यामुळे स्वस्त असणारे धान्य जगभरातून आयात व्हायला सुरुवात
झाली. पुन्हा त्याची किंमतही देशी धान्यापेक्षा कमी असल्याने, त्याचा परिणाम
देशोदेशीचा व्यापार उदीम कोसळण्यात होणार हे नक्की होते.
पुढे विकसित देशांची नजर पडली ती सार्वजनिक उद्योगांवर. सार्वजनिक उद्योगाची
कार्यक्षमता वाढवण्याऐवजी त्याचे खाजगीकरण करण्याचा दबाव टाकण्यात आला. वर्ल्ड
बँक अथवा नाणेनिधी विविध कर्जासाठी देशातल्या उद्योगांचे खाजगीकरण हा आवश्यक
निकष ठरवू लागली. परदेशी तंत्रज्ञान, गुंतवणूक पात्रता यावर ठरवली जाऊ लागली.
परदेशी गुंतवणुकीला अनेक देशांनी मुक्तद्वार दिल्याने देश म्हणून असणारे वेगळे
अस्तित्व संपत आले आणि साध्या गोष्टी ज्या त्या देशातल्या नागरिकांना हातातोंडाची
गाठ म्हणून का होईना पण उपलब्ध होत्या, त्यासाठी आता आंतरराष्ट्रीय बाजारावर
अवलंबून राहावे लागू लागले. देशी मालाला उठाव नाही, देशी औद्योगिक उत्पादने महाग
आहेत. त्याकरता स्वस्त भांडवल नाही या दुष्टचक्रात सापडलेले अनेक विकसित देश मग
या संस्थांपुढे, प्रगत राष्ट्रांपुढे नांगी टाकू लागले. या सगळ्या गोष्टींमुळे त्या देशातल्या
लोकांचे उत्पादन घटले. देशातील भुके ली माणसे प्रमाणाबाहेर वाढली. हे थोड्याफार
प्रमाणात सर्वच विकासशील देशांना भोगावे लागले आणि लागत आहे. क हे सगळे
विस्ताराने सांगायचे कारण या सगळ्याचा सामान्य माणसांच्या अन्नसुरक्षेवर अतिशय
प्रतिकू ल आणि दीर्घकाळ टिकणारा असा परिणाम झाला आहे. बाजारसूत्रे कधीही
भावनिक गुंतवणुकीवर चालत नाहीत तर अस्सल नफ्यातोट्याच्या समीकरणावर
चालतात. गरज निर्माण करणे हेसुद्धा बाजाराचेच टिकण्याचे सूत्र आहे. त्यामुळे
जागतिक अन्नदुर्भीक्ष्याची आजची अवस्था ही बहुराष्ट्रीय कं पन्यांना एका विशिष्ट
प्रकारच्या उत्पादनांची, त्याच्या वितरणाची मक्तेदारी निर्माण करायला मदत करते. त्या
अनुषंगाने जागतिक अन्नप्रणालीत खते, बियाणे, धान्य यांच्या पणन व्यवस्थेच्या
सुसूत्रीकरणाच्या नावाखाली ग्राहकांची बेसुमार लूट करण्याची एक नवी यंत्रणाच निर्माण
झाली आहे. मुळात ज्यासाठी हे सगळे हवे होते ते भुके चे, अन्नसुरक्षेचे प्रश्न मार्गी
लागण्यापेक्षा एक वैश्विक आणि वेगळीच कृ षी-अन्न खाजगी उद्योगाची भरभराट होऊ
लागली आहे. हे सर्व सार्वजनिक पैशातून, देशांच्या आर्थिक धोरणाचे सुकाणू बदलत
आणि लोकांच्या अन्नाच्या मूलभूत हक्काशी खेळत सुरू आहे ही खेदाची बाब आहे.
म्हणजे मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कं पन्यांनी WTO या जागतिक व्यापारहित पाहणाऱ्या
संघटनेच्या माध्यमातून खरे तर साम, दाम, दंड, भेद हे सर्व मार्ग बिनदिक्कतपणे वापरून
भयानक नफे खोरी के ली आहे. गंमत अशी की हे सर्व विविध देशातील नागरिकांच्या
हिताविरुद्ध असूनही या बहुराष्ट्रीय जायंट्सनी असे अनेक करार त्या त्या देशातील
सरकारांच्या गळी उतरवले आहेत. बियाणांची Monsanto and Du Pont, खते उत्पादन
करणारी महाकाय कं पनी Potash Corp, Yara and Sinochem, यांच्या गेल्या काही
वर्षातल्या नफ्यात २०% ते ७४% इतकी वाढ झाली आहे.
याबरोबरच मोठाल्या सुपर मार्के ट साखळी कं पन्यानी (Tesco, Carrefour. wal-
Mart आणि Safeway या सगळ्यांनी) आपले उत्पन्न अनिबंध पद्धतीने वाढवीत
जगातल्या विकसनशील देशातल्या लोकांची अक्षरश: लूट के ली आहे. यातूनच जागतिक
बियाणे व्यापार वर्षाला २ लाख १० हजार कोटी तर खते व्यापार २ लाख ४० हजार
कोटी इतका बहरला आहे. आता यात जगाचे भुके लेपण, लोकांची अन्न गरज, त्यांची
क्रयशक्ती वाढणे याला अजिबात महत्त्व नसून फक्त आणि फक्त मार्के टची आणि
नफ्याची वाढ हे ध्येय आहे. खते, बियाणांचा खप आणि अन्नधान्याची निकड यांच्या
दुष्टचक्राची साखळी करत ह्या सगळ्या कं पन्यांनी एकत्र येत, विविध देशातील सरकारांना
अक्षरश: गुंडाळत, जगातील अन्न सुरक्षा ओलीस ठे वली आहे जागतिकीकरणाचे सेवा
क्षेत्रातले फायदे बघून, आपल्या इथले मुक्त बाजाराच्या विचारांनी पछाडल्याने असे म्हणू
शकतील की 'आपल्या देशाचे उदाहरण घ्या - इथे दलाल, व्यापारी शेतकऱ्यांना लुटत
आहेतच की! उलट विविध फू डसाखळीच्या कं पन्या आल्याने स्पर्धा वाढेल आणि
शेतकरी, ग्राहकाला फायदाच होईल.' दलाल शेतकऱ्यांना लुटत आहेत हे खरे; पण ते
निदान देशी असल्याने त्यांच्यावर सरकारची इच्छाशक्ती, जनतेचा रेटा वापरून अंकु श
ठे वता येतो, पण या बहुराष्ट्रीय कं पन्यांवर अंकु श अशक्य आहे. कारण त्या बहुराष्ट्रीय
असल्याने त्यांच्यावर दबाव टाकला तर संबंधित देशाच्या इतर अनेक हितांवर त्या टाच
आणू शकतात. अशा कं पन्या स्वत:च्या हितासाठी, प्रत्यक्ष देशाच्या हिताविरुद्ध आपल्या
सरकारवर दबाव आणत असल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात.
सारांश, विकासाचे मॉडेल आणण्याची घाई, जगातील गोंधळलेली कृ षी संस्कृ ती,
कु पोषण व सकस नसणारे अन्न खाल्ल्याने उभे राहणारे लोकांच्या आरोग्याचे प्रश्न,
जगातले कमी होत जाणारे शुद्ध पाणी हे प्रश्न भारताच्या नशिबात डोकावायला सुरुवात
झाली आहे. जगाचे भुके लेपण हे विकसित अन्नप्रणालीच्या झाडाला आलेले विषारी फळ
आहे. गेल्या पन्नास वर्षात या सगळ्यात जगाच्या काय वाट्याला आले? तर या प्रगत (?)
जगात सुमारे आजमितीला दर सातामागे एक म्हणजे सुमारे १ अब्ज माणसे भुके ली
आहेत. त्यातली अर्ध्याहून जास्त म्हणजे सुमारे ५८ कोटी माणसे ही फक्त आशिया-
पॅसिफिकमध्ये आणि त्यातील २०.६ कोटी लोक भारतात आहेत. म्हणजे भारतात दर
सहा माणसामागे एक भुके ला असून इतर जगापेक्षा इथले हे प्रमाण जास्त आहे.
'उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म' असे तत्त्वज्ञान जगाला देणाऱ्या भारतातच असे घडावे
हा काव्यगत न्याय. भारताने हे असले विकासाचे मॉडेल स्वीकारून कोणाचे उदरभरण
चालवले आहे देवाला माहीत!.... २० कोटी लोकांच्या भुके च्या टाहोकडे कानाडोळा
करत, भारत महासत्ता होण्याच्या गप्पांमध्ये सुखेनैव रमलेल्या विचारवंतांना हे सगळे
माहीत नसेलच असे म्हणता येणार नाही.
अगदी अनादी काळापासून माणसाने चांगली जमीन, शुद्ध पाणी, आणि पोटभर
अन्नाच्या शोधात स्थलांतर के ले. त्यात अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टींपैकी अन्न
जगण्यासाठी अधिक मूलभूत. अन्न अधिक आवश्यक. “पोटाला दोन घास' ते 'सात
पिढ्या बसून खातील', अशी दोन टोके अन्नाच्या बाबतीत दिसून येतात. काहींना पहिली
गोष्ट दुर्मीळ; तर काहींना दुसऱ्या गोष्टीचीच चिंता. काही पहिली गोष्ट आयुष्यभर मागत
फिरतात; तर काही दुसऱ्या बाबीला ध्येय वगैरे समजतात. काही लोक पहिल्यासाठी
स्वतःला सतत गहाण टाकतात; तर काही दुसऱ्या बाबतीत अनेकांना गुलाम बनवतात.
पहिली अत्यावश्यक गरज; तर दुसरी प्रतिष्ठेची बाब!
पण जगात अन्न आहे तरी किती? आणि कोणासाठी? जो विकत घेऊ शके ल
त्याच्यासाठी आहे हे झाले कोडगे व्यावहारिक उत्तर. विकत घेऊ शकतो, पण मिळतच
नाही असे घडले तर? या साऱ्या जगाला किती अन्न लागते? ते पुरेसे आहे? का मुळातच
ते कमी आहे? हे असे प्रश्न पडण्यापूर्वी आपण आधी अन्नाच्या स्त्रोताची वस्तुस्थिती
जाणून घेऊ. आपल्याला अन्नाच्या सततच्या पुरवठ्यासाठी कसदार जमीन, ताजे गोडे
पाणी ह्या अत्यावश्यक गोष्टी आहेत. जगाची लोकसंख्या पुढच्या ५० वर्षांत ६५% ने
वाढेल असा एक वास्तवसदृश्य, भीतीदायक अंदाज आहे. त्याचबरोबर दरमाणशी
उत्पन्नही वाढेल, या दोन्ही गोष्टींचा परिणाम हा अन्नाची, पाण्याची गरज वाढण्यात
होणार. अर्थात नुसती लोकसंख्या वाढली म्हणून नाही तर जगण्याची पद्धत, खाण्याच्या
सवयी हे सर्वच बदलणार म्हणूनही. ह्या सगळ्यांमुळे जमीन आणि पाणी ह्या दोन
गोष्टींवर असह्य ताण येणार..
थोडे अजून खोलात जाऊन विचार के ला तर असे दिसते की जगाच्या एकू ण
क्षेत्रफळापैकी जमीन फक्त २९.२२% आहे; तर समुद्र आहे ७०.७८%. पण गंमत अशी
की बरोबर याच्या उलट म्हणजे जगाच्या गरजेपैकी ९८% अन्न हे जमिनीतून येते आणि
फक्त २% हे पाण्यातून. आजमितीला जगात एकू ण ४.५ अब्ज हेक्टर जमीन
लागवडीयोग्य आहे. दरवर्षी जमीन लागवडीयोग्य असण्याचे प्रमाणही भयावह पद्धतीने
घसरते आहे. या एकू ण जमिनीपैकी जवळपास एक तृतीयांश जमीन गेल्या वर्षात प्रचंड
प्रमाणात धूप झाल्याने नापीक झाली आहे. जमिनीच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात
ठे वायला हवी ती म्हणजे साधारणपणे ५०० वर्षांत २५ मिमी चांगली जमीन निसर्गत:
तयार होत असते. जमिनीची होणारी धूप ही अनेक मानवनिर्मित कारणांमुळे आहे. गेल्या
शंभर वर्षांत मोठ्या प्रमाणात जंगल जमिनीचे शेतजमिनीत रुपांतर करावे लागले आहे.
म्हणजे एकीकडे जंगल जमीन नष्ट होते आहे; तर दुसरीकडे उपलब्ध शेतजमिनीचे प्रती
एकरी उत्पन्न रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे कमालीचे घटत आहे. याशिवाय
ग्लोबल वॉर्मिंगसारख्या घटकांमुळे बदलणारे पावसाचे प्रमाण, पावसाचा लहरीपणा
यांमुळे होणारे उत्पादनाचे नुकसान वेगळेच. सध्या जगातील सरासरी
लागवडीयोग्यजमीन दर माणशी ०.२७ हेक्टर आहे. चीन मध्ये हे प्रमाण ०.०८ तर
भारतात ०.०५ इतके आहे. लागवडीयोग्य जमिनीची झपाट्याने घसरणारी टक्के वारी ही
अन्न दुर्भिक्ष्याशी आणि मानवी कु पोषणाशी सरळपणे निगडित असणार हे मान्य व्हायला
हरकत नाही. अर्थात त्या त्या देशातील अराजक, आर्थिक असुरक्षितता, आणि अन्नाचे
असमान वाटप ही मानवनिर्मित कारणे त्यात आणखीनच भर घालत असतात.
आपण बघितले की पृथ्वीतलावरचा ७०% भाग पाण्याने व्यापला आहे. त्यातही
ज्याला पिण्यायोग्य अथवा शुद्ध म्हणता येईल ते पाणी या सत्तर टक्कयांच्या फक्त ३%च
आहे. त्यापैकी २.१५% पाणी उत्तर आणि दक्षिण धृवावर जे ग्लेशियर्स आहेत त्यात आहे.
उरलेले ०.८५% पाणीसाठे म्हणजे जगातील सर्व सरोवरे, विहिरी, तळी, नद्या हे सर्व होय.
याशिवाय आपल्याला पावसाचे पाणीही मिळत असते. ते किती? तर जर १ इंच पाऊस
पडला तर सरासरी एका एकरात सुमारे १ लाख ३ हजार लिटर पाणी मिळते. (भारतात
चेरापुंजीला सरासरी १२०० इंच पाऊस पडतो. चेरापूंजीचे क्षेत्रफळाला एकरी १ लाख ३
हजार लिटर या आकड्याने गुणल्यास किती लिटर पाणी मिळेल याचा हिशेब करून
बघा. एवढ्या पाण्यात भारतात किमान काही हजारो वर्षे पाण्याचे दुर्भिक्ष्य नसायला हवे;
पण वस्तुस्थिती तशी आहे का? असो तो वेगळा विषय आहे.) त्यामुळेच जगाची
पावसावर अनिवार्य भिस्त आहे. पाऊस नसला तर आपण जगलो असतो का? पाऊस
आहे म्हणूनच आपण पाण्यासाठी अजन युद्ध के लेली नाहीत.
आता कृ षी उत्पादनात पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहेच. कोणतेही पीक
आपल्या वाढीसोबत पाणी वाफे च्या स्वरूपात वातावरणात फे कत असते. याचे प्रमाण
विविध पिकांप्रमाणे साधारण प्रत्येक किलोमागे २०० ते १००० लिटर इतके असते. हे
पाणी उत्सर्जित करणे, पिकाची पाण्याची गरज, प्रकार, त्याच्या वाढीची स्थिती,
वातावरणातील उष्याचे प्रमाण, एकू ण तापमान यांच्यावर अवलंबून आहे. जसे उसाला
आणि भाताला, गहू आणि इतर धान्यापेक्षा खूपच जास्त पाणी लागते. एक हेक्टर
मक्याचे पीक साधारणपणे ५० लाख लिटर पाणी उत्सर्जित करते. म्हणजे त्या पिकाला
किमान ८० लाख लिटर पाणी लागते. अशा दृष्टीने या विषयाकडे पाहिले तर कृ षी
उत्पादन हे माणसांपेक्षा जास्त पाणी फस्त करते. अगदी आकडेवारीतच सांगायचे तर
जगातील एकू ण पिण्यायोग्य पाण्यापैकी ८७% पाणी हे शेतीसाठी वापरले जाते जे परत
मिळत नाही.
आता यात अजून एक गंमत आहे ती म्हणजे जमीन एखाद्या विशिष्ट देशाची आहे
पण पाण्याचे मात्र जरा विपरीत आहे. ते असे की जगातील पाण्याची उपलब्धता ही
पर्यावरणावर अवलंबून आहे आणि पर्यावरण मात्र या पृथ्वीतलाशी, पृथ्वीवरच्या
वातावरणाशी म्हणजेच देशांच्या सीमापार, सर्व जगाशी निगडित आहे. याचा अर्थ एकाच
देशाने फक्त स्वत:पुरती पर्यावरणाची पूर्ण वाट लावली असे शक्य नाही. याचा अजून
एक अर्थ म्हणजे कोणत्याही एका देशाने उन्मत्त होऊन आणि बेजबाबदारपणे वागून जर
वातावरणातील एकं दर घटक वायूंचे प्रमाण मर्यादित ठे वले नाही तर इतर देशांना
तापमान, उष्मा, पाऊस या सगळ्या बाबींसाठी त्याचे परिणाम भोगायला लागणारच.
म्हणजे जमीन त्या त्या देशाची असली तरी पाणी, शुद्ध हवा यासाठी मात्र सर्वजण
एकमेकांशी जोडले गेले आहेत.
पाण्याची शुद्धता हा एक गंभीर विषय आहे. आशियातील ९०% रोग हे प्रत्यक्षपणे
अशुद्ध पाण्याशी निगडित आहेत. जगातील अनेक रोगांची लक्षणे ही के वळ पाण्याशी
संबंधित असून दरवर्षी ६० लाख मृत्यूमागे फक्त पाण्यामुळे झालेल्या जंतूसंसर्गाचे
कारण असते.
मुळात माणसांसाठी कमी पाणी असल्याने आणि पाण्याचे नियोजन हा के वळ
चर्चेचा विषय झाल्याने पाण्यामुळे कालांतराने माणसात वितुष्ट येणार आहे. इतके च
कशाला पण साऱ्या जगाचे यापुढे फक्त पाण्यावरून विभाजन अथवा एकत्रीकरण होत
जाईल अशी परिस्थिती येणार आहे. विविध राष्ट्रांच्या भविष्यातील करारात आता नकळत
पाणी हा महत्त्वाचा घटक ठरेल. चीनमध्ये आत्ताच ३०० पेक्षा जास्त गावात पाण्यावरून
संघर्ष सुरू आहे. भारतात जनता सोशिक असली तरी हळूहळू पाण्याचा प्रश्न अतिशय
उग्र स्वरूप धारण करेल अशीच परिस्थिती आहे. दर २० वर्षांनी लोकांचे शहरी भागात
होणारे स्थलांतर हे दुप्पट होते आणि त्याचे काहीच आकलन अथवा नियोजन नसल्याने
पाणी, आणि शुद्ध हवा यांचे प्रश्न अधिकच बिकट होत जातात. जगात आणि विशेषत:
आपल्या भारतात, नव्यानेच निर्माण होणारी मोठाली नियोजनशून्य शहरे पाण्याची
नासाडी करून पाण्याचे प्रश्न भयाण अवस्थेला नेऊन ठे वत आहेत. जमीन, पाणी ह्या
आजपर्यंत गृहीत धरलेल्या गोष्टींचे रौद्र स्वरूप भविष्यात आपल्या अस्तित्वावरच
जीवघेणे प्रश्नचिन्ह उभे करू पाहत आहेत त्यांचा अंदाज आज तरी कोणालाही घ्यावा
वाटत नाही.
गेल्या काही वर्षांत रासायनिक खतांवर संशोधन करून त्यांचे विविध प्रकार
जन्माला घालणाऱ्या संशोधन संस्था, त्यात विजिगिषु वृत्तीने आयुष्य वेचणारे शास्त्रज्ञ,
त्यांच्या जगाच्या कल्याणासाठी असणाऱ्या निष्ठा हे सारे मिळून नापीक झालेल्या
जमिनीत सुधारणा करून, पिकांची प्रतवारी, एकरी उत्पन्न एकवेळ वाढवू शकतील; पण
नवीन सकस माती ते तयार करू शकत नाहीत. शास्त्र, तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी
जमिनीतले झरे, नद्यांमधील पाणी नाही वाढवू शकत. माणूस म्हणून, या निसर्गाचा एक
महत्त्वाचा भाग म्हणून हे शहाणपण आपल्याला का येत नाही, हा प्रश्न अस्वस्थ करणारा
आहेच; पण त्याहीपेक्षा आपल्याच अस्तित्वावर घाला घालण्याचे हे वेडेपण कु ठून येते,
ह्या प्रश्नाशी मानव दिग्मूढ झाला आहे असे म्हणावे लागेल.
११. कागदीबॉम्बचे संकट
खाणे हे जगण्याचे कारण, मर्म आणि मार्गही आहे. खाणे हा तशा अर्थाने एक
स्वतंत्र धर्म आहे. देश, रंग, वय, लिंग, धर्म, जात ह्या सगळ्यांच्या पार असलेला.
विनोदाच्या अंगाने पहिले तर त्याचा संबंध फक्त पोटाशीच नाही तर शिव्या, पैसे, वेळ,
डोके खाणे अशा सगळ्यांबरोबरच अपमान, दु:ख, राग गिळणे असा विविध अंगांचा
आहे. गंमत अशी की, देह सहा फु टी असो वा दीड फु टी काय खावे हे ठरवणारी जीभ
फक्त चार-सहा इंचाचीच असते आणि ती जगभर समान आहे हे जसे लक्षात न येणारे
सत्य आहे, तसेच आपण जे पिकवतो आणि खातो, ते आपल्या पृथ्वीवरील जैवसंपदेवर,
नैसर्गिक स्त्रोतांवर खूपच ताण आणणारे ठरू शकते हे खाण्यात रमून जाताना आपल्या
लक्षातसुद्धा येत नाही. आपले खाणे मिळावे म्हणून निसर्गाची ही नासाडी करतानाच,
आपण आयुष्यभर प्रमाणाबाहेर बकाबका खात असतोच; पण 'मला काय दोन वेळा
खायला मिळाले तरी पुरेल' असे भंपक डायलॉगही फे कत असतो. जगात खाण्यासाठीच
सगळे काही चालले आहे. धान्य पिकवणे आणि ते विकणे हाच गेल्या शेकडो वर्षातला
सगळ्यात मोठा उद्योग आहे. अन्न उद्योगाइतकी उलाढाल अजून कोणालाही कोणत्याही
तंत्र, माहिती, इंटरनेट अशा कोणत्याही युगातही गाठता आलेली नाही. कधीही न
संपणारी ही इंडस्ट्री आहे. सगळ्या जगाच्या अर्थसत्ता ज्याच्यापुढे मान तुकवून उभ्या
आहेत असा हा वैश्विक व्यापार आहे. कारण त्याचा थेट संबंध हा मानवाच्या अस्तित्वाशी
आहे. एकवेळ कपडे नसतील तर चालेल, निवारा नसला तरी कु ठे तरी, कशाच्या तरी
आडोशाने राहता येईल; पण अन्न नसेल तर जगणेच शक्य नाही. आपले अन्न हे इतके
महत्त्वाचे असल्यानेच काय खावे, किती खावे याचे समग्र भान आपल्याला असणे हे
अतिशय आवश्यक आहे. आपल्या खाण्याचा, चवीचा, त्याच्या सवयीचा, गरजेचा,
आवडीनिवडीचा खोलवर परिणाम प्रत्यक्षपणे निसर्गावर, पर्यावरणावर आणि
जीवसृष्टीच्या अस्तित्वावर होत असतो. हा तीन प्रकारे होतो : एकतर हे अन्न (प्रोसेस
फू ड) तयार होताना पर्यावरणात सोडल्या जाणाऱ्या दूषित वायूंचे प्रमाण प्रचंड वाढत
आहे. दुसरे आहे ते जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणारी निसर्गातील
परस्परावलंबी व्यवस्था मोडीत काढत आहे आणि दिवसेंदिवस कमी होत जाणारे पाणी
अधिकच दुष्प्राप्य करत आहे. या तीनही बाबींवर येणारा असीमित ताण ही
पर्यावरणतज्ज्ञ, जीवशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ यांच्यासाठी सध्या अतिशय चिंतेची
बाब बनलेली आहे. पुढील आकडेवारी ते अधिक स्पष्ट करेल :
* जगात २५% लोक हे कशीबशी गुजराण करत आहेत. ते भुके ले आणि
कु पोषितसुद्धा आहेत. एकीकडे हे वास्तव असताना दुसरीकडे जगात पिकणाऱ्या
धान्यापैकी ४०% धान्य हे फक्त पशुपालनासाठी वापरले जाते. अर्थात हे काही मुक्या
जनावरांवर प्रेम किंवा दया करण्यासाठी नाही; तर त्यांना खाद्य म्हणून पोसण्यासाठी
आहे. म्हणजे २५% लोकांना किमान पोट भरण्यासाठी पुरेसे धान्य नाही; मात्र मांसाहार
करणाऱ्यांची सोय पाहण्यासाठी मात्र मजबूत धान्य आहे. विषमता फक्त आर्थिकच
बाबींवरच असते असे कोण म्हणतो? खाण्यासाठी म्हणून जे 'प्राण्यांचे पिक घेतले जाते
त्याचे गणित नुसते स्तंभित करणारेच नाही; तर अस्वस्थ, अंतर्मुख करणारेसुद्धा आहे.
* एक किलो मांस (बीफ) तयार करण्यासाठी ५४ किलो धान्य फस्त होते आणि
सरासरी ९०,००० लिटर पाणी लागते. एक किलो चिकनसाठी ६ किलो धान्य तर ५०००
लिटर पाणी. याच तुलनेत एक किलो सोयाबीनचे पिक घेण्यासाठी २००० लिटर,
तांदळासाठी १९०० लीटर, गहू ९०० लिटर, आणि बटाट्यासाठी ५०० लिटर पाणी
लागते.
ज्या देशाच्या जीवनशैलीचे आपल्याला असीमित आकर्षण आहे आणि ज्यांच्या
पावलावर पाऊल टाकू न चालण्याची स्वप्ने आपल्या सर्व राजा, रंक, आबालवृद्धांना पडत
आहेत त्या अमेरिके तले याबाबत काय वास्तव आहे?
* एका सर्वेक्षणानुसार तिथल्या लोकांनी आपले मांसाहारी खाणे फक्त १०% नी
जरी कमी के ले तरी त्यामुळे वाचणाऱ्या धान्यात ६ कोटी माणसांचे पोषण होऊ शकते.
(अमेरिके ची लोकसंख्या ३० कोटी आहे). आज अमेरिके त उपलब्ध असणाऱ्या एकू ण
पाण्याच्या अर्धे पाणी फक्त मांस तयार (Meat Production) करण्यासाठी वापरले
जाते.
या सगळ्या हव्यासाचा पर्यावरणावर (जे देशापुरते मर्यादित नसून सर्व जगासाठी
आहे) होणारा परिणाम आणखीनच भयावह आहे. आज पर्यावरणासाठी घातक
असणाऱ्या वायूंच्या उत्सर्जनातला किमान ३०% वाटा हा या मांस उत्पादन करणाऱ्या
कारखान्यांचा आहे. म्हणजे रासायनिक कारखाने, रासायनिक कचरा, इतर प्रदूषण या
सगळ्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा एकू ण वाटा ७०% आणि या एकट्याचा ३०%. मला
इथे मांसाहारी आणि शाकाहारी असा भेद मांडायचा नाहीये. ते स्वातंत्र्य प्रत्येकाला असले
तरी त्यात किमान दुसऱ्यांचा विचार, समाजाचे भान असावे असा सुबुद्ध समाजाचा
संके त आहे. तुम्ही शाकाहारी असलात तरी डेअरी उत्पादनांचा प्रश्न आहेच. एक किलो
दूध अथवा दुग्धजन्य पदार्थांसाठी किमान १० किलो वनस्पती अथवा धान्य फस्त होते
आणि ४ कोटी किलो दुग्ध पदार्थाचे उत्पादन एखादी वनस्पती, एखादी जमात नष्ट
करण्याची सुरुवात असू शकते. जिभेचे लाड करताना ही आकडेवारी आपण लक्षात
घ्यायला हवी.
या संदर्भात अजून एक प्रश्न आहे तो अन्नाच्या नासाडीचा. युनोच्या एका
सर्वेक्षणानुसार सध्या जगात एकू ण तयार अन्नापैकी सुमारे ३०% अन्न हे वाया जाते.
विकसित देशांतले याचे कारण समृद्धी आणि प्रोसेस फू ड हे आहे. आरोग्यशास्त्र तसेच
स्वच्छतेच्या नावाखाली कचऱ्यात अन्न टाकल्याचे त्यांना काही वाटतही नाही. त्यांच्या
जीवनपद्धतीत तयार (प्रोसेस फू ड) अन्नाचे प्रमाण अधिक असल्याने तिथे पिकवलेले
धान्य, भाज्या वगैरे फारसे वाया जात नाही. मात्र हे प्रोसेस फू ड वापरताना त्याचा प्रवास
हा शीतकपाटे ते मायक्रोव्हेव असा होत होत सरळ कचऱ्याच्या डब्यात जातो
(आपल्याकडेही असे करणे फॅ शनेबल झाले आहेच). म्हणजे आपल्या भाषेत तिथे अन्न
वाया जाते पण धान्य फारसे वाया जात नाही. भारतात मात्र अन्नाची नासाडी तर आहेच;
पण धान्याचीही आहे. एका अहवालानुसार भारतात दरवर्षी सुमारे ३० ते ४० हजार कोटी
रुपयांचे (हा आकडा अतिशय तोकडा असण्याची शक्यता आहे) धान्य वाया जाते. यात
पिकवलेले धान्य, विक्री न झाल्याने सडणाऱ्या भाज्या, फळे, मांस, अंडी, दूध हे सर्व
आले. साठवण्याची अपुरी व्यवस्था, अप्रगत वितरण व्यवस्था हे तर आहेच; पण सरकारी
पातळीवरचे कोडगेपण, आयात-निर्यातीचे राजकारण, सरकारचे शेतीकडे व्यवसाय
म्हणून होणारे अक्षम्य दुर्लक्ष्य, धान्य दलालांचे राजकारणाशी असणारे साटेलोटे आणि
एकू णच देशाचा सर्वकष, सर्वगामी विचार करण्याच्या कु वतीचा अभाव अशी अनेक
कारणे यामागे आहेत. या शिवाय आज भारतात जो अतिश्रीमंत, नवश्रीमंत आणि
उदासीन मध्यमवर्ग यांच्या मिश्रणातून जे सामान्य जीवनमान तयार झाले आहे ते; गरीब,
दारिद्र्यरेषेखाली जगणारे, अन्नाला पारखे असणारे यांच्याबाबत किती जाणून आहेत, ते
शोधायची गरज नाही. वेगवेगळ्या पाट्यांतून वाया जाणाऱ्या अन्नाचा ओघ ते आपल्याला
सांगू शके ल. त्याकरता आकडेवारीचीही जरूर नाही. खरे तर या प्रश्नांची उत्तरे किती
सोपी आहेत? आपण जे खातो ते कशाचा बळी देऊन आपल्यापर्यंत आले आहे याचे एक
भान असणे, अन्नवंचिताबाबत योग्य कृ तीने संवेदनशील असणे, लागेल तेवढेच शिजवावे,
रोज ताजे खावे, अन्न फे कू न देऊ नये, इतक्या साध्या वैयक्तिक गोष्टींनी आपण स्वत:च्या
पातळीवर अन्नधान्य नासाडीला नक्कीच आळा घालू शकतो.
ह्या पार्श्वभूमीवर भारतात काय अवस्था आहे? भारतात हिंदू जैन धर्माचे प्राबल्य
आहे. गाय हा उपयुक्त पशु आहे. हे विधान मान्य नसणारे अनेक कोटी लोक आहेत. एक
भारतीय वर्षाला सरासरी साडेतीन किलो मांस खातो. हे प्रमाण चीनच्या १/१६ आणि
अमेरिके च्या १/३० इतके अल्प आहे. पण या माहितीत एक गोची अशी जी भुके ल्या
भारताच्या आणि अन्न फे कणाऱ्या भारताच्या लोकांची सरासरी आहे. त्यामुळे जो
नवश्रीमंत मध्यमवर्ग जो आता २० कोटींच्या आसपास जाऊन पोचला आहे. त्याचे मांस
खाण्याचे प्रमाण प्रचंड आहे. बाकी लोकांना ते खायला परवडत नाही एवढाच भाग आहे.
भारत आज दुग्ध उत्पादनात अमेरिके च्या खालोखाल आहे (३५ कोटी गाई म्हशी); तर
कोंबडीच्या उत्पादनात पाचवा आणि अंडी उत्पादनात जगात चौथा आहे.
हे सर्व बघितल्यावर, जगात धान्य उत्पादनावर असणारा प्राणिजन्य उद्योगाचा
प्रभाव, तयार होणाऱ्या धान्याची नासाडी, इतक्या मोठ्या प्रमाणात लोक भुके ले
असताना फे कू न दिले जाणारे अन्न या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून 'खाणे' हा
उद्योग कु ठे येऊन पोचलाय ते चांगलेच लक्षात येते.
आपण काय खावे हा प्रश्न पर्यावरण, परस्परावलंबी जीवसृष्टी यांच्याशी इतका
निगडित आहे हे समजले तरी एक पाऊल त्या दिशेने पुढे पडले असे म्हणता येईल. नाही
तर के वळ खाण्यासाठी युद्धे होण्याचा अश्मयुगीन काळ संपला असे म्हणणे वेडेपणाचे
ठरायला फार वेळ लागणार नाही.
इतक्या मोठ्या प्रमाणवर जमा के लेला हा पैसा ठे वायचा कु ठे असा प्रश्न जेव्हा
यातून निर्माण झाला तेव्हा मग तशी व्यवस्था उभी के ली गेली. आज स्वित्झर्लंड स्वत:च्या
देशाचे नाव काळ्या पैशाच्या संदर्भात बदनाम होऊ नये असा आटोकाट प्रयत्न करते
आहे. त्यांच्या देशातल्या बँके त जेव्हा हे पैसे जमा होत होते तेव्हा हे कु ठून येतायत ते
त्यांना काय माहीत नव्हते? हा निव्वळ भंपकपणा झाला. कोणत्याही बँके त आपण जर
पैसे भरणा करायला गेलो तर त्या बँके ने तुम्हाला किमान दोन प्रश्न विचारले पाहिजेत.
एक, हे पैसे कु ठून आले आणि यावर तुम्ही आवश्यक करभरणा के ला आहे का? स्वीस
बँक तुम्हाला हे प्रश्न विचारत नाही. तुमचा पैसा ती जमा करून घेते. अचानक एखादा
परदेशी माणूस येतो; लक्षावधी डॉलर्स आपल्या खात्यात जमा करतो आणि एखाद्या
नि:संग साधूप्रमाणे, देशातले बँके चे अधिकारी त्याबद्दल काही विचारत नाही हे कसे शक्य
आहे? याचा अर्थ या जाब न विचारल्या गेलेल्या पैशावरच ती अर्थसत्ता इतके दिवस
चालली आहे. या देशाच्या व्यवसायाचे मुख्य प्रॉडक्टच असला पैसा आहे. त्यामुळे हे
प्रॉडक्शन वाढवत, त्याबाबत गुप्तता बाळगत पैशाचा धंदा करणारा हा देश आहे का?
जगातले सगळे (बदमाश म्हणजे कोण तर हुकू मशाह, अनैतिक राजकारणी, माफिया
इत्यादी) एकमेकांशी संपर्कात येत असतातच. ते एकमेकांना असा पैसा ठे वायचे सुरक्षित
ठिकाण सांगत नसतील हे कशावरून? त्यामुळेच ह्या पैशात सातत्याने वाढ होत नसेल?
इतक्या गदारोळानंतर आताशा कु ठे या सभ्य स्विस सरकारला म्हणे जाग आली आणि
त्यांनी एक कायदा संमत के ला. ज्यायोगे त्यांनी अशी खाती सील करण्याचे ठरवले. मध्य
पूर्वेतील सध्याच्या अस्थिरतेमुळे आता तिथल्या पदच्युत हुकु मशाहांच्या खात्यावर कडक
नजर ठे वण्यात येते आहे. ही माणसे बदमाश होती हे काय या बँके ला माहीत नव्हते?
नाणेनिधीला माहीत नव्हते? ज्यांच्या इशाऱ्यावर ही सरकारे हलत डुलत होती त्या प्रगत
आणि मानवतावादी (?) राष्ट्रांना हे माहीत नव्हते? हा भाबडेपणा की बदमाशी? एका
अभ्यासगटाच्या अहवालानुसार स्विस बँके त एकू ण १८ ट्रिलियन डॉलर्स इतकी रक्कम
आहे (ही रक्कम अमेरिके च्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा (१४ ट्रिलियन डॉलर्स) जास्त आणि
भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या (१.४ ट्रिलियन डॉलर्स) १३ पट इतकी प्रचंड आहे. आज
अनके देश स्विस बँके कडे देशातील नागरिकांच्या खात्यांची माहिती मागताहेत. फ्रान्स
आणि जर्मनीने तर याबद्दल स्विस बँके विरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात के सेस दाखल
के ल्या आहेत. भारत नेमके काय करतो आहे?
माणसाच्या अस्तित्वाइतकाच जुना आहे त्याचा आचार. विचार नंतर आला आणि
काहींच्या बाबतीत अथवा काही संदर्भात तो अजूनही यायचा आहे. त्यामुळे सदाचार
आणि भ्रष्टाचार हे निसर्गदत्तच आहेत. फरक इतकाच की एक प्रयासाने शक्य होतो; तर
दुसरा एकदा कळल्यावर सारखे प्रयास करायची गरज राहत नाही. तो चटकन अंगवळणी
पडतो, प्रयत्नांशिवाय प्राप्त होतो. आपण सगळेच थोड्याफार प्रमाणात भ्रष्ट आहोत.
अगदी निर्लज्जपणे पैसे खात नसू पण विचाराने तरी भ्रष्टपणा करत असूच! त्यामुळे
भ्रष्टाचार हा इतका स्वत:शी निगडित आहे. अर्थातच हा वैयक्तिक आयुष्याचा भाग
झाला. परंतु आपल्या सार्वजनिक आयुष्यात भ्रष्टाचार आल्याने मोठी गोची झाली आहे.
जेव्हा एकाच्या भ्रष्ट आचरणामुळे इतरांचे आयुष्य मातीमोल होते, जगण्याचा हक्क
हिरावला जातो; तेव्हा मात्र हा दखलपात्र गुन्हा ठरतो. गंमत अशी की सध्या जगात सर्वत्र
अशी माणसे बोकाळली आहेत आणि त्यांना याचे काहीही न वाटण्याइतके सवयीचे झाले
आहे. मग मात्र त्याबद्दल समाजमन जागृत करावे लागते. समाज म्हणून जगताना
आचरणाच्या पद्धती ह्या इतरांवर अवलंबून असतात. समूह, देश यापेक्षा ज्यावेळी
हितसंबंधांची जपणूक, विशिष्ट हेतू महत्त्वाचे ठरतात तेव्हा भ्रष्ट व्यवस्थेचा पाया रचला
जातो. कारण मग ती जपणूक, साटेलोटे या प्रकारात मोडते आणि इतर नाडले जातात.
आत्तापर्यंत नीट अभ्यासले तर घडले असे आहे की ज्या वेळी जगातील महासत्ता
एकमेकांविरुद्ध उभ्या ठाकल्या. मग ते कोल्ड वॉर असो, प्रोक्सी वॉर असो जगात त्या त्या
वेळी भ्रष्टाचाराची व्यवस्था जोमाने उभी राहिली आहे. पुढे जाऊन असेही म्हटले पाहिजे
की ती त्यांनी जन्माला घातली आहे. ज्यामुळे एक विधिनिषेध नसणारा, भ्रष्ट समाज
जन्माला येतो आहे. आज सारे जग भ्रष्टाचाराच्या अशा एका वळणावर येऊन ठे पले आहे
की आता त्यात काही बदल होईल अशी अशाच उरलेली नाही. काही प्रगत देशात,
भ्रष्टाचाराने सामान्य नागरिकांचे आयुष्य वेठीला धरले नसले तरी तिथेही शासनात आणि
कापरिट जगतात प्रचंड भ्रष्टाचार हा आहेच. उलट त्यांच्या भ्रष्टाचाराचे स्वरूप हे दृश्यमान
नसल्याने ते अधिकच गंभीर आहे. एका अर्थाने रशिया-अमेरिके च्या शीतयुद्धाच्या
काळातच आज जगभर पसरलेल्या बऱ्याच भ्रष्ट व्यवस्थेची पाळेमुळे सापडू शकतात.
अनेक हकमशहांचे निलाजरे समर्थन, आपल्याला न मानणाऱ्या लोकशाही व्यवस्था
अस्थिर करण्याचे परस्पर उद्योग, विरोधी तत्त्वांना हाताशी धरून साम-दाम-दंड-भेद अशा
सर्व मार्गाचा बेशरम अवलंब जगभर या महासत्तांनी के ला. शीतयुद्ध संपले तरी तिथून जे
काही अनिष्ट पायंडे पडले त्याचे परिणाम मात्र आजही सारे जग भोगते आहे.
दुसरा मुद्दा आहे तो बाजार व्यवस्थेची दिशा चुकल्याचा. आज प्रगत देशातील
कं पन्या विविध देशातील सत्ताधिशांना ज्या पद्धतीने विकत घेतात, त्यामुळे ही माणसे
के वळ आपल्या मालाच्या सुलभ निर्यातीसाठी, अनिर्बंध नफ्यासाठी त्या देशाच्या
व्यवस्थेला कायमस्वरूपी कीड लावतात. संरक्षणाच्या नावाखाली शस्त्रव्यापार,
विकासाच्या नावाखाली इन्फ्रास्ट्रक्चर उभे करणे यातून आज जगभर अनेक अनैतिक
उद्योग उभे राहत आहेत. तिसऱ्या जगाच्या देशातील खनिज संपत्ती (तांबे, जस्त,
अॅल्युमिनियम, सोने, हिरे, तेल) हस्तगत करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय कं पन्या
तेथील सरकारे, अधिकारी यांना भ्रष्ट करताना नाणेनिधी, व्यापार संघटना यांचा जो वापर
करतात तो बघता, जागतिकीकरणाच्या या भ्रष्ट प्रवासात अनेक देश गहाण पडले आहेत
हेच जाणवते. अनेक देशात वेगवेगळ्या औषधांवर काही हेतूंनी घातलेली बंदी, तीच
औषधे काळ्या बाजारात उपलब्ध करून देणारी याच कं पन्यांची भ्रष्ट यंत्रणा असे हे
सगळे गुंतागुंतीचे व्यवहार आहेत.
आजमितीला जगात विविध बहुराष्ट्रीय कं पन्यांद्वारा होणारा भ्रष्टाचार हा एक
चिंतेचा विषय आहे. आता जगातील अनेक देशांत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारात लाच
देणे हा एकच मार्ग उरला आहे असे वातावरण आहे. यामुळे जर त्या देशाच्या व्यवस्थेचे
धिंडवडे निघत असतील तरी नफा हा एकच उद्देश असणाऱ्या मिळवणाऱ्या कार्पोरेट
क्षेत्राला त्याचे काय? काही धूर्त लोकांनी तर हे इतके सोपे आणि सुलभ करून टाकले
आहेत की आपण थक्क होतो. एखादी एजन्सी नेमून सक्सेस फी अथवा प्रोसेस फी अशा
नावाखाली आज जगभर सर्रास लाच दिली/घेतली जाते. प्रगतीचा टेंभा मिरवणाऱ्या
आणि जगाला अक्कल शिकवणाऱ्या युरोपातील अनेक देशात लाच देणे ही एक
बिझिनेस पॅक्टिस मानली जाते. कारण त्याशिवाय त्यांना एखादे कं त्राट मिळूच शकत
नाही. एका अंदाजानुसार आज जगभर सुमारे ८ लाख ५० हजार कोटी रुपये (१
बिलियन = अंदाजे सहा हजार कोटी रुपये) इतकी लाचखोरीची उलाढाल आहे. इतक्या
पैशात जगातील गरिबी नष्ट होऊ शकते. अर्थात ही मोजली गेलेली रक्कम असू शकते;
भारतात जिथे बहुतेक आर्थिक व्यवहार हे अजूनही रोखीच्या स्वरूपात आहेत तिथे हे
मोजण्याचे कोणतेही परिमाण नाही. मात्र एखाद्या देशात सारखे अनेक कायदे जन्माला
यायला लागले की समजावे तिथे भ्रष्टाचाराची सॉलिड चलती आहे. पण कार्पोरेट
क्षेत्राच्या भ्रष्टाचारामुळे विकसनशील देशांसाठी काही मूलभूत आणि त्या देशांच्या
विकासावर दूरगामी परिणाम करणारे प्रश्न निर्माण होत आहेत.
* त्या देशातील कायदा सुव्यवस्था, विषमता यांना कमी लेखणे.
* त्या देशातील राजकीय यंत्रणा वेगळ्याच कारणांसाठी वापरली जाणे.
* त्या देशातील छोटे उद्योग नष्ट होणे.
* पैसा, गरिबी दूर करण्यासाठी खर्च होण्याऐवजी तो भलत्याच ठिकाणी
पोचणे.
* एखाद्या प्रकल्पाचा सामान्य माणसांना होणारा फायदा नाकारला जाणे.
* एखादा प्रकल्प गरज नसताना त्या देशावर लादला जाणे.
* देश, त्यातील नागरिक यांना फायदा होण्याचे काही संके त न पाळता
कं पनीचा फायदा हा एकमेव उद्देश बघितला जाणे. पाश्चिमात्य राष्ट्र, नाणेनिधी
आणि व्यापार संघटना यांनी भ्रष्टाचाराबद्दल वरकरणी कठोर बोलायचे आणि धोरणे मात्र
याला खतपाणी घालणारी राबवायची, असली भंपक व्यवस्था पोसली आहे. १९७७
साली जागतिक बँके ने आपल्या 'मार्गदर्शक तत्त्वात' (?) असे म्हटले होते, 'कोणताही
बदल ज्यात स्पर्धा वाढते, तो भ्रष्टाचाराला आळा घालतो म्हणून देशांनी धोरणे ठरवताना
आयातीवर कमी निबंध, खाजगी उद्योगांना सर्वंकष मुक्तता, आणि सरकारी उद्योगांचे
खाजगीकरण हे करणे सक्तीचे आहे.'
अजूनही बँके ने आपल्या या धोरणाचे यशापयश जोखून पाहिलेले नाही आणि
त्यात काहीही बदल के लेले नाहीत. आजही ते सतत मुक्त अर्थ व्यवस्थेचाच धोशा
लावताना दिसतात आणि त्याच वेळी आपले सारे जग मात्र भ्रष्टाचारात, पैशांच्या
घोटाळ्यात आकं ठ बुडाले आहे. अशा धोरणांमुळे बरेच देश आज भणंग झाले आहेत.
भारतातसुद्धा अशा अनेक बहुद्देशीय कं पन्यांच्या लॉबीजनी आपल्या राजधानीतील
सत्ता-सोपानाचे रस्ते वेढून टाकले आहेत. जगाचे आर्थिक भान असणारे पंतप्रधानसुद्धा
हे का थोपवू शकले नाहीत, हा मोठा प्रश्न आहे. अशा मोठ्या पदावरच्या व्यक्तींना
हाताशी धरूनही अशा लॉबीज स्वत:चा कार्यभाग साधतात.
भविष्यात ओबामा अमेरिके च्या आर्थिक भवितव्यासाठी अधिक कर्जे मागत
असतील, आपल्या देशात संसद अधिवेशनात अजून काही कोटींचे घोटाळे उघडकीस
आले असतील, १२५ कोटींच्या जनतेचे कर्णधार अत्यंत सवयीचा एक मूक, भकास
चेहरा करून बसले असतील, सरकारातील अनेक मंत्र्यांना त्यांच्या प्रवक्त्यांना
गोबेल्सच्या अरेरावीने पछाडले असेल, एखाद्या वाहिनीवर भ्रष्टाचाराविरुद्ध असलेल्या
कार्यक्रमाबरोबरच TRP - जाहिरातींचे भ्रष्ट डील सुरू असेल, वर्तमानपत्रे चौथा स्तंभ
वगैरे बाष्कळ बडबड करत, सतत होणाऱ्या निवडणुकातल्या पेड न्यूजने आपले रकाने
आणि खिसे भरत असतील, विविध राजकीय पक्षांचे स्वयंघोषित स्वच्छ नेते आपला
शेंबूड लपवत, सरकारविरुद्धच्या रणनीतीत गुंतले असतील, राज्यातील विविध सरकारे
भ्रष्टाचार कु ठे ही कमी पडू नये म्हणून काही कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेत
असतील, देशातल्या सचिवालयाबाहेर लाच द्यायला पैसे नाही म्हणून काम होत नाही
आणि काम होत नाही म्हणून गावी जाता येत नाही अशा कफल्लक आणि लाचार
अवस्थेत अनेक माणसे रस्त्यावर, ऊन्हा-थंडीत, वादळ-पावसात झोपत जगण्याचे प्रश्न
सुटण्याची वाट बघत असतील,
तरीही अण्णा हजारे आतड्याने बोलतील, उपोषणाला बसतील,
तरीही अनेक भाबडी माणसे त्यात सामील होतील,
तरीही देशभर मेडिया त्याचा इव्हेंट करून स्वत:चे उखळ पांढरे करून घेईल,
तरीही काही लाख मेणबत्त्या खपतील.
आपण एखाद्या समाजासाठीच्या समर्पित भावनेने करावा तसा, भ्रष्टाचारविरोधी
आंदोलनांचासुद्धा सण करून टाकला आहे. त्यामुळे त्या दिवसापुरते त्याचे महत्त्व. नंतर
कोणीही रोजच्या आयुष्यात वैयक्तिकरित्या भ्रष्टाचाराविरुद्ध झगडणार नाहीच. दरम्यान,
ह्या सगळ्या विरोधाभासात अजून एखादा घोटाळा घडत असेल.
भ्रष्टाचारी आणि आत्मसन्मान नसणारा भिकारी यात फरक नाही हे ह्या लोकांना
कधी कळेल?
सध्या जगभर 'पर्यावरण' हा एका विषय फार चिंतेचा, चर्चेचा आणि चिंतनाचा
झालेला आहे. अमेरिके चे तत्कालीन उपाध्यक्ष अल-गोर यांनी या विषयावर एक
माहितीपट बनवला आणि तो घेऊन त्यांनी जगभराचा दौरा के ला. जनजागतीच्या या
कार्याचे त्यांना नोबेलही मिळाले. मुळात पर्यावरण हा विषय एखाद्या प्रकरणाचा नसून
एखाद्या प्रबंधाचा आहे; तरीही थोडा ऊहापोह इथे करणे आवश्यक आहे. याविषयाची
व्याप्तीच इतकी मोठी आहे की त्याबद्दल अनेक प्रवाद, अपवाद आणि विवाद तयार
होतात. 'विकास का पर्यावरण' हा एक सगळ्यांच्या आवडीचा विषय आहेच. जगभर
पर्यावरणवादी आणि विकासवादी असे दोन गट झुंझायला उभे ठाकले आहेत. जणू काही
हे एकमेकांना पर्यायच आहेत. शिवाय राजकीय अथवा आर्थिक दबाव हा घटकही या
गोधळात भरच घालत असतो. हे सर्व मुद्दे बाजूला ठे वून पर्यावरण या विषयाचा समग्र
विचार करायला हवा.
सध्या इको-फ्रें डली व्यवस्थेचे युग आहे, क्योटो प्रोटोकालपासून ते कचऱ्याच्या
नियोजनापर्यंत, ध्वनी, पाणी, हवा यांचे प्रदूषण ते ग्लोबल वॉर्मिंगपर्यंत सतत अनेक शब्द
आपल्या कानावर पडतात. आपण आपल्या रोजच्या धकाधकीत इतके बुडून गेलेलो
असतो की जणू हे काहीतरी दुसऱ्या जगाचे विषय आहेत आणि आपल्यावर याचा काही
परिणाम होणार नाही अशी एक भाबडी किंवा सोयीची समजूत काही लोकांची आहे. तर
ह्याचा नीट विचार न के ल्यास पृथ्वी नष्ट होणार असा भीतीचा फं डा पसरवणारे महाभाग
आहेत. मुळात पर्यावरण संतुलन म्हणजे आपण जगत असताना या सभोवतालच्या
जीवसृष्टीशी, निसर्गाशी जुळवून घेत, थोडक्यात समरस होऊन जगणे. म्हणजेच हा काही
अवघड विज्ञानाचा विषय नाही, किंवा भरमसाठ आकडेवारी फे कू न लोकांना गुंग करून
सोडण्याचा उद्योग नाही. साधेसोपे जगण्याचे मंत्र असणारी जीवनपद्धती हे याचे उत्तर
आहे. पर्यावरण दिन साजरे करून जाणीव वाढेल पण त्याचे पुढे काय? जाणवते पण
काही करत नाही असले वांझ मुद्दे काय कामाचे? पर्यावरण दिनानिमित्त दोन-चार भाषणे
ठोकली, पेपरात फोटो वगैरे छापून आले की आपण पर्यावरण सुधारण्यासाठी खूप काही
के ले असे भ्रम बाळगणारे तर पावलोपावली भेटतात. नाहीतरी हल्ली 'मदर्स डे','फादर्स
डे' असे फॅ ड आलेले आहे. म्हणजे तो एक दिवस आईबापांची आठवण ठे वायची! बाकी
दिवसांचे काय? पण तसे के ले की मग त्या निमित्ताने सेल लावणारे या भावनेशी जशी
प्रचंड आर्थिक उलाढाल जोडून देतात तसेच पर्यावरणाचे होत चालले आहे.
पर्यावरण दिनाचे बजेट डोळ्यासमोर ठे वून 'गो ग्रीन' वगैरे घोषणा देत ग्राहकाला
आपण पर्यावरण ठीक करण्यासाठी योगदान दिले असे वाटायला लावणारे के वढा तरी
धंदा यातून करतात. प्रश्न तिथेच राहतात आणि यांचे मात्र उखळ पांढरे होते. आपण
सगळे पेट्रोल, डीझेल वापरणे सोडून द्यायला तयार आहोत का जर त्यामुळे एखाद्या
आजारी माणसापर्यंत रुग्णवाहिका पोचणार नाही? आपण सगळे सिलिकॉनचे तंत्रज्ञान
सोडून देऊ का, जेणेकरून आपल्याला कॉम्प्युटर, इंटरनेट, सेलफोन हे काहीही वापरता
येणार नाही? रसायनशास्त्राचे दुष्परिणाम होतात म्हणून आपण वैद्यकीय चिकित्सा वगैरे
नाकारू का? पाणी, कोळशापासून तयार होणारी वीज फारच प्रदूषण करते म्हणून
आपण विजेशिवाय जगू का? जर हे होणार नसेल आणि आपल्याला यातूनच मार्ग
काढायचा असेल तर मग याविरुद्ध नसत्या आरोळ्या ठोकन काय होणार? मग
पर्यावरणाच्या नावाखाली या सगळ्या जीवनावश्यक गोष्टींसाठी आपण नेमकी काय
भूमिका घेणार आहोत? एक गोष्ट आपल्याला विसरून चालत नाही की आपले सध्याचे
जीवन अशा विरोधाभासांनी बनले आहे. आपल्याकडे 'पर्यावरण का विकास' असा पर्याय
नाहीच आहे. पर्याय याच्या कु ठे तरी मध्ये उभा आहे. हा एक लंबक आहे; जो कोणत्याही
दिशेला जास्त झुकला तर त्रास अटळ आहे. रोजचे जगणे आपण जितके निसर्गाचा
सन्मान ठे वणारे करू, प्रदूषणाच्या बाबी नीट समजून त्यात आपली भर टाकणार नाही,
तितके हे सारे सोपे होईल. पुरोगामी असणे म्हणजेच स्वैराचारी असणे अशी समजूत
आपण करून घेतली आहे. त्याप्रमाणेच पर्यावरणावर सतत बोलत राहिले की, ते
आपोआप ठीक होते असा एक बदमाशीचा समज करून आपण जगत आहोत. या
साऱ्या प्रश्नाचे मूळ आपल्या रोजच्या जीवनपद्धतीतच आहे.
काही अत्यंत साध्यासाध्या गोष्टींनी आपण यात योगदान देऊ शकतो.
• आपण राहतो तिथल्या परिसरात शक्य तितकी झाडे लावणे एक
कडुनिंबाचा वृक्ष १० टनाच्या एअरकं डिशनइतका प्रभावी असतो.
• फ्लॅटमध्ये गच्चीवर कुं ड्या ठे वणे.
• घरतून बाहेर पडताना कापडी पिशवी सोबत ठे वणे, नामक
. कोणत्याही प्रकारच्या प्लस्टिक अथवा पॉलिथीन पिशव्या न वापरणे,
• घरात वावर असणाऱ्या खोल्यातच दिवा, पंखे सुरू ठे वणे.
• एक माणसासाठी एक कार न वापरता शक्यतो सार्वजनिक वाहतूक
व्यवस्था, सायकल अशा वाहनांचा उपयोग करणे.
• बँके ची, बिले भरण्याची ऑनलाईन सुविधा वापरणे. कागदाचा किमान
वापर.
• पाण्याचा वापर कटाक्षाने किमान करणे. आता रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या
अनेक गोष्टी यासाठी उपयोगी ठरू शकतात.
अगदी मुळात सांगायचे तर निसर्गाशी तारतम्य असणारी जीवनपद्धती स्वीकारणे.
हवा, पाणी हे सगळ्यांसाठी आहे. म्हणजेच एकमेकांसाठी आहे ना?
माणसाला ज्यात आनंद आणि यश मिळते ती गोष्ट तो परत परत करेत राहतो
आणि मग दर ४० वर्षांनी लोकसंख्या दुप्पट होत जाते. आपण सतत लोकसंख्येचा
गंभीरपणे विचार करतो पण हा गंभीरपणा आपण योग्य वेळी ठे वत नाही.
- समाज शास्त्रज्ञांच्या नोंदी
सध्याचे शतक मोठे मजेशीर आहे! 4G, 5G असले सेलफोन्स, Interactive, TV.
I-Pad अशा तरुणांच्या एके क मजेदार गोष्टींनी तंत्रज्ञान आणि विज्ञान यांच्या पोतडीतून
बाहेर पडून बहार उडवून दिलीय. हे सगळे पाहिले तर येणाऱ्या तरुणाईच्या हातात काय
प्रचंड ताकद असेल याचा अदमाससुद्धा उत्तेजित करणारा आहे. दुसरीकडे मात्र या
सगळ्या वस्तूंचे मार्के ट असणारी जगातील एकू ण प्रजा वृद्ध होत चालली आहे. सर्वांत
जास्त अशी म्हातारी माणसे असणारे हे जगाच्या इतिहासातले पहिलेच शतक असेल
बहुधा. साधारण दोन वर्षांपूर्वी माद्रिदला माणसांच्या वयाचा वेध घेणारी एक जागतिक
परिषद भरली होती. त्यात अनके गोष्टींचा ऊहापोह करण्यात आला. १९५० ते २०५० या
१०० वर्षांच्या कालावधीचा जगातील माणसांच्या वयाचा अभ्यास, तज्ज्ञांनी तीन
वयोगटात मांडला. एक गट वय १५ वर्षे पेक्षा कमी, दुसरा गट वय १५ ते ५९; तर तिसरा
गट ६० च्या वर वये असणारा. या मांडणीत सर्व गटांचे काळाच्या तीन टप्प्यात विभाजन
के ले गेले. इसवी सन १९५०, २०१० आणि २०५० असे तीन टप्पे ठरवण्यात आले.
सगळ्या गोळा के लेल्या माहितीची मांडणी के ली तसे लक्षात आले:
* १५ वर्षांखालील मुलांची संख्या जिचे प्रमाण १९५० साली शंभरात ३४ इतके
होते, ते २०१० ला २६ आणि त्याचा २०५० चा अंदाज शंभरात फक्त १९ असण्याचा
आहे.
* या शतकाच्या मध्यावर म्हणजे २०५० साली इतिहासात प्रथमच वृद्धांची संख्या
ही मुलांच्या संख्येला ओलांडेल. म्हणजे यावर्षी जगात शंभरपेकी २४ वृद्ध (६०%)
असतील तर मुले शंभरपैकी १९. त्यावेळच्या विकसित देशात हे प्रमाण तर दर शंभरी ३५
वृद्ध तर मुले फक्त १५ असतील. म्हणजे हे दुपटीहून जास्त होते.
* वय वर्षे १५ ते ५९ या वयोगटात मात्र २०१० ते २०५० या कालावधीत ६२% ते
५५% असाच बदल होईल.
ही आकडेवारी अतिशय तपशिलात्मक आहे, ती क्लिष्ट होत जाते आणि म्हणूनच
त्या सगळ्या छाननीत न जाता मला काही गोष्टींकडे लक्ष वेधायचे आहे. असे जाणवतेय
का की जग जसे प्रगत, विकसित होत गेले तसे
* वृद्धांच्या मृत्यूचे प्रमाण घटू लागलेय. त्यांना दीर्घायुष्याचे वरदान मिळतेय.
* विवाहसंस्था एकत्र राहण्यासाठी, प्रजजनासाठी कालबाह्य ठरली आहे.
वर्षामागन वर्षे माणसांचे प्रजनन प्रमाण कमी होत गेले आहे.
* आधुनिक जीवनशैलीने भूभागांचे सांस्कृ तिक वेगळेपण, स्थानिय वैशिष्ट्ये
गमावली असून सर्वत्र एकसाचेबद्ध जगण्याचा परिपाठ रुजतो आहे.
गेल्या शतकात वैद्यकीय क्षेत्रातील वैज्ञानिक शोध आणि जैविक तंत्रज्ञानाच्या
प्रगतीने तर अशी कमाल के लीय की प्रगत देशात माणसे जणू आजाराने मरायलाच तयार
नाहीत. लग्नसंस्थेचा आवाका कमी होत तो तात्पुरते नातेसंबंध, अथवा एकत्र राहणे अशा
स्वरूपात बदलला. जरी लग्ने के ली तरी पोरांची भानगड नको असा विचार रूढ झाला
आहे. त्यामुळे प्रजननदर कमी झालाय. म्हणजे बघा, जगातील मृत्यू आणि प्रजनन दोन्ही
एकाच वेळी घटणारे हे एकमेव शतक. त्यामुळे उद्याच्या जगातील तरुणांची संख्याच
इतकी कमी असेल की विचारता सोय नाही. 5 चीन आणि भारतातील कोणी विद्वान
म्हणतील की लोकसंख्या जितकी कमी तितके बरेच की. हे मान्य के ले तरी तरुण
लोकसंख्या कमी झाली, म्हणजे जग पूढे कसे जाणार हा प्रश्न उभा राहणारच.
कालांतराने जगात उरणार कोण तर जास्तीत जास्त वृद्ध. बर वृद्ध जसे जसे वार्धक्याकडे
झुकू लागतील तसे त्यांचे परावलंबित्व वाढणार. राष्ट्रांचे त्यांच्या आरोग्य सेवांवर खर्च
होणारे उत्पन्न दिवसेंदिवस वाढतच जाणार. आज ब्रिटन आणि अमेरिका या वाढलेल्या
खर्चाचे शिकार आहेतच. बरं वृद्ध लोकसंख्येच्या भौतिक गरजा मात्र कमीच. म्हणजे
निरनिराळ्या वस्तूंचा खप कमी, म्हणजे बाजारातील त्यांची मागणी कमी, त्यामुळे
उत्पादन पडून राहणार, मग उत्पादनावर अवलंबित उद्योग हळूहळू बुडणार. जिम 2
प्रजननाचा दर कमी म्हणजे मुलांची एकू ण संख्या कमी, त्यामुळे काय होईल याचे
उदाहरण बघू. ज्यांचे आजचे मार्के ट प्रचंड आहे ती खेळणी एकदम कमी होणार किंवा
खेळण्याच्या कं पन्यांना डोके वापरून वृद्धांची नवीन खेळणी काढावी लागणार, आता
मुले खेळणी का खेळतात तर त्यांना प्रत्येक गोष्टींचे कु तूहल असते आणि ते जगात
शिकण्याच्या वयात असतात. वृद्धांचे असे काहीच नाही. त्यातून या वृद्धांचे उत्पन्न कमी,
वर ते सरकारच्या मदतीवर जगणारे. बरं वृद्धत्व म्हणजे आयुष्याचा शेवटचा काल
असल्याने, एकटेपण असल्याने, त्यांना इतक्या वस्तू कोणासाठी, कशासाठी घ्यायच्या
असा रास्त प्रश्न पडणार. म्हणजे बाजारातल्या मालाला उठावच राहणार नाही.
वृद्धांना लागणारे अन्न मोजके च आणि साधे आणि पथ्याचे आणि अत्यंत कमी
असते. त्यात काही वेगळेपण नसते. ते वृद्ध असल्याने त्यांना जेवण बनवणे जमणार
नाही म्हणजे तयार अन्नाचाच खप जास्त. उद्या कदाचित जेवण्याऐवजी अन्नाची गोळी
वगैरे पण येईल बाजारात. तयार करण्याचे, बनवण्याचे खाद्यजिन्नस ही दुर्मीळ गोष्ट होत
जाणार, म्हणजे तो बाजारही झोपला. तयार अन्न जर प्रकृ तीला चांगले नसल्याने परत
औषधांचा खर्च जास्त वाढेल. म्हणजे दिनक्रम काय तर दोन गोळ्या जेवण म्हणून;
दोन गोळ्या त्याच्यामुळे होणाऱ्या त्रासासाठी. बास! बाजार व्यवहार संपला. बाकी पडून
राहणे, कारण वृद्धांचा संशोधन, उत्पादन यांच्यासाठी काही उपयोग नाही, म्हणजे फारसे
उद्योग नाही. उत्पादन नाही,त्यामुळे उद्याच्या बाजाराचे स्वरूप ठरवणे, एखादी नवीन
गोष्ट लोकांच्या गळी उतरवणे असले काहीही नाही. अर्थव्यवस्थेला गती नाही, वृद्ध काही
शेअर बाजारात वगैरेत रोजच्या रोज गुंतवणूक करणार नाहीत. त्यांच्याकडे मुळात पैसाच
कमी, त्याचा विनियोग कमी, त्याचे फिरत राहणे कमी, परिणामी सगळ्या
चलनव्यवहाराची गती हळूहळू ठप्प होईल. माणसांचे, वस्तूंचे सगळेच उत्पादन कमीकमी
होत जाणारे आणि भोवतालचे जग मात्र प्रगत, आधुनिक आणि सोयींनी परिपूर्ण असा
सगळा घोळ. त्यातून स्त्री-पुरुष प्रमाणसुद्धा बदललेले. आजच जगात वृद्धांपैकी फक्त
६३% लोकच विवाहित आहेत. त्यातही वृद्ध असूनही एकट्या राहणाऱ्या बायका तर
५२% तर पुरुष २०% . आता हा परत लिंग-प्रमाण घोळ. त्याचा एक वेगळाच धोका.
म्हणजे पाहा ही वरची आकडेवारी कु ठे घेऊन जाते?
याची कारणे शोधू गेले की परत आपण तिथेच येऊन पोचतो! म्हणजे तीच
विकसित साचेबद्ध जीवनशैली, एकटे जगणे, वैयक्तिकता सर्वोच्च महत्त्वाची. संवादाचे
पूल नकोतच, फक्त स्वत:ला हवे तसे जगण्याचा अट्टहास, पण त्या जगण्याचे कारण
मात्र मरण येत नाही हे किंवा त्याचा भविष्यातला हेतू अज्ञात असतो. यामुळे झाले का हे?
हेतू आला की मरणसुद्धा हवे हवेसे असते हो! इथे तर जगण्याचाच हेतू नाही. विकसित
देशात वृद्ध संख्या वाढत असल्याने ही भीतीदायक साचेबद्धता आताच येऊ लागली
आहे. म्हणून जगण्यासाठी गुंतून रहावे, काहीतरी फॅ ड असावे ही गरज झाली आहे.
म्हणून तर समलिंगी जोडपी असे खूळ सुरू झाले नाही? कारण काहीतरी बदल हवा, तेच
तेच नाही जगायचे. त्याचा कं टाळा येतो. भारतातसुद्धा आहे हे लफडे आता. प्रमाण अल्प
आहे पण त्या गोष्टी प्रकाशात यायला सुरुवात झाली आहे.
तुम्हाला हे सगळे जरा अतिशयोक्तीचे वाटते ना? मग भारतातल्या महानगरात
जगणाऱ्या तरुण मुलामुलींच्या जीवनपद्धतीचा जरा कानोसा घ्या. आज अनेक तरुण
लग्न करण्यापेक्षा एकत्र राहण्यावर जास्त भरवसा ठे वतायेत. कारण काय तर म्हणे त्यांना
लग्नाअगोदर सगळेच नीट जाणन घ्यायचे आहे म्हणे. आता इतके जाणन
घेतल्यावर मग लग्नात काय उरते? एकू णच त्यांना लग्ने नकोशी आहेत, मुले तर
दूरची बात. या बरोबरीने भारतातल्या शहरातले घटस्फोटांचे प्रमाण गेल्या चार वर्षांत
३०० ने वाढले आहे. यातले ८० % घटस्फोट हे सेवाक्षेत्रातले आहेत. जागतिकीकरणात
आपण खरे तर सेवाक्षेत्रामळे परदेशातून काम आणले पण त्याबरोबर आले हे भलतेच.
खरेय म्हणा, Nothing is Free!
तर दोस्तहो तुमचे हे नवे जग मान्य. आता जुने जाणार, एकदम मान्य...तुम्ही स्वतंत्र
आहातच हो. तुमच्या वाटाही आधुनिक! पण या जगातले आणि जगभर, जे तुमच्या
आधी यामार्गाने गेले त्यांचे सध्या काय झाले आहे ते तरी पाहाल की नाही? का तुमचे
स्वयंभूपण आंधळेसुद्धा आहे? इत्यलम!
३४. प्रतिजैविके - प्रगती आणि हास
जागतिकीकरण हे सध्याचे नाव असले तरी फार पूर्वी वैश्विक जगणे होतेच.
माणसाच्या हितासाठी सगळ्यांचे मिळून असणारे एक जग होतेच. सगळ्या गोष्टी
माणसाच्या कल्याणासाठी असल्या पाहिजेत, त्याला सीमा नकोत, कोणत्याही मर्यादा
नकोत. सगळ्या जगाची एक ओळख असणे म्हणजे वैश्विकता. मुक्त जगात एकमेकांशी
हवे नको त्याची अदलाबदल, शेअरिंग करणे हे महत्त्वाचे. अशा कल्पना, मूल्ये, तत्त्वे, धर्म
आणि सिद्धान्त या सगळ्यांना युनिव्हर्सल म्हणता येईल. युनिव्हर्सल असणे हे
जागतिकीकरणापेक्षा जास्त जवळचे आहे. सगळे जग एक खेडे झाले आहे असे आपण
ठोकू न देतो पण त्याचा अर्थ काही कळत नाही. असे सरधोपट बोलण्याची एक नवीच
फॅ शन जन्माला आली आहे. संवाद, माहितीचे सगळ्यांपर्यंत क्षणार्धात पोचणारे
मायाजाल, त्यासाठी अस्तित्वात नसणाऱ्या सीमा आणि त्यामुळे वेगाने मिटत चाललेली
प्रादेशिक अथवा विशिष्ट नागरिकत्वाची ओळख ही जागतिकीकरणाची लक्षणे. जुन्या
काळात जेव्हा एखादी गोष्ट वैश्विक आहे असे लोक म्हणायचे, तेव्हा तंत्रज्ञान नसल्याने
त्याचा अर्थ कळायचा नाही. जागतिकीकरण खरे तर के वळ एक कृ ती आणि तालीम
आहे. ती काही साध्याची गोष्ट नाही. त्यात एक गोची आहे ती अशी की,
जागतिकीकरणामुळे अमुक एकच पद्धत जगभर पसरणे, जग एकसारखे असणे याला
महत्त्व आणले आहे. एकाच प्रकारची जीवनशैली, एकाच प्रकारचे राहणीमान, विचार
करण्याची पद्धत यालाच जागतिकीकरण असे संबोधले जाऊ लागले आहे.
थोडे इतिहासात डोकावले तर लक्षात येईल की पहिल्या महायुद्धानंतर जगाची
दक्षिण आणि उत्तर अशी विभागणी झाली होती. दुसऱ्या महायुद्धाने मात्र अमेरिका आणि
रशिया अशी द्विपक्षीय व्यवस्था निर्माण के ली. शीतयुद्धानंतर रशिया नावाची दुसरी ताकद
नष्ट झाली आणि अमेरिके च्या ताब्यात सारे जग आले.१९९१ मध्ये इराकने कवेतवर
आक्रमण के ले आणि अमेरिका जगाचा पोलीस असल्यासारखी त्या युद्धात उतरली. या
वेळी रशिया मात्र जगाच्या रंगमंचावर एखाद्या प्रेक्षकापुरता उरला होता. ३ जून १९९२ ला
युनायटेड नेशन्सच्या सुरक्षा परिषदेने एक शिखर परिषद आयोजित के ली. तिथे प्रथमच
असा एक आंतरराष्ट्रीय ठराव करण्यात आला, ज्यायोगे तंत्रज्ञान आणि निबंधांची एका
सांगड घालत एका नव्या जागतिकीकरणाच्या धोरणाची मुहूर्तमेढ रचली गेली. इथून मग
जागतिकीकरण हा जगात परवलीचा शब्द बनला.
काही लोकांना सुरुवातीला असे वाटू लागले की जागतिकीकरण ही एक आर्थिक
संज्ञा आहे जिचा अर्थ 'जगाच्या विकासासाठी आणि साहचर्यासाठी असणारी यंत्रणा'
असा आहे. कालानुरूप मात्र आर्थिक जागतिकीकरण हे जणू अस्तित्वात असणाऱ्या
भांडवलशाही मुक्त अर्थव्यवस्थेचेच विस्तृत स्वरूप आहे असे ठरवले गेले. त्याने मुक्त
अर्थकारण ज्यात बाजाराधिष्टीत अर्थव्यवस्था बळकट व्हावी, देशोदेशींचे बाजार
सगळ्यांना मुक्त व्हावेत आणि त्यासाठी सर्वत्र सगळ्यांचा संचार सुरू व्हावा असा एक
व्यापार हष्टिकोनाचा रंग दिला गेला. बाजाराचे अर्थकारण म्हणजे जागतिकीकरण असेही
बरेच विद्वान ठोकू न देऊ लागले. खरे तर जागतिकीकरण नीट विकसित के लेली,
एकमेकांवर अवलंबित अशी एकू ण जागतिक भांडवल, वस्तू आणि सेवा यांच्या
बाजाराचा समतोल साधणारी व्यवस्था हवी होती. पण जागतिक व्यापार संघटना आणि
नाणेनिधी यांचे व्यवस्थापन कामाला लावत काही लोकांनी आपल्याला अपेक्षित
असणारी जगाची नवी संरचना लिहायला सुरुवात के ली. देशात होणारा वस्तू आणि
शेतीमाल यांचे जगाच्या बाजारात सुसूत्रपणे वितरण व्हावे, विविध स्थानिक अडथळे दूर
करत त्यांचे लाभ, उत्पादक देशांना, त्यातल्या नागरिकांना मिळावे म्हणून काम
करण्याऐवजी विविध देशांच्या शेतीमाल आणि वस्तूंवर बंधने आणि हेतूपूर्ण हालचाली
करण्यासाठी या संस्थांचा वापर सुरू झाला.
जागतिकीकरणाच्या प्रवाहाला असे हेतूपूर्ण वळण लागले आणि मग या आर्थिक
जागतिकीकरणाच्या मांडणीत, देशांनी आणि त्यातल्या सार्वजनिक उद्योगांनी
खाजगीकरणाची वाट चालावी म्हणून देशांना सरकारी क्षेत्राचे खाजगीकरण करण्याचे
धोरण राबवून त्यांना रोजगार, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रांत नेतृत्व देत
पाणी, वीज, रस्ते अशा नागरिकांच्या सुविधांचे नियोजन खाजगी क्षेत्राला सुपूर्द के ले गेले.
मग इथेच जागतिकीकरणाच्या गोंडस नावाखाली, बहुराष्ट्रीय कं पन्या फोफावायला
लागल्या. १९७० मध्ये संख्येने के वळ १०० असणाऱ्या अशा कं पन्या सध्या जवळपास
५०,००० च्या वर आहेत. जागतिकीकरणाने देशोदेशींच्या सरकारांचा सहभाग कमी होत
गेला. बहुराष्ट्रीय कं पन्यानी जगाचा ८०% इतका प्रचंड व्यापार ताब्यात ठे वत जगाच्या
एकू ण रोजगारापैकी फक्त ७% रोजगार निर्माण के ला.
दुसरीकडे माहितीचे जागतिकीकरण हे दूरसंचार, माहितीच्या तंत्रज्ञानाच्या
विस्तारात झाले. संवादाच्या नवीन तांत्रिक प्रगतीने दूरदर्शन आणि इंटरनेट यातून
संपर्काचे प्रभावी जाळे निर्माण के ले. सगळी मानव जात एकाच खेड्यात राहते आहे,
जिथे एकमेकांचे सुखदुःख प्रत्यक्ष घडते तसे एकमेकांना सांगता येते आहे. त्याला सीमा,
भाषा, रंग, प्रांत यांचे अडसर नाहीत. सर्व प्रकारची माहिती, बातम्या आता सगळ्यांना
एकाच वेळी समजू शकतात. एक सततची, कोणतेही प्रयास न करता माहिती ओतली
जाऊ लागली. इथे पण एक गोची अशी झाली की काही लोकांनी तिलाच ज्ञान असे
समजण्याची पद्धती रूढ के ली आहे. किती सोपे आहे सारे नाही? उगाच पूर्वी लोक
व्यासंग वगैरे करायच्या भानगडीत पडायचे. 'शोधा, मिळवा आणि ठोकू न द्या' असे एक
नवेच ज्ञानाचे फाडफाड मार्ग खुले झाले. सारे जग आता एकभाषीय झाले आहे.
इंटरनेटवरची सुमारे ८८% माहिती ही इंग्लिशमध्ये असते, ९% जर्मनीत, तर २% फ्रें च
आणि उरलेल्या एका टक्कयात सारे जग आणि त्याच्या हजारो भाषा आहेत. कागदावर
अवलंबून असणारी मानवी देवाणघेवाणीची संस्कृ ती आता हळूहळू लयाला जाईल. पत्रे
लिहिणे बंद झालेच आहे.
सगळ्या क्षेत्रातील आर्थिक राजकीय, माहिती तंत्रज्ञान, शास्त्रे यांचे जागतिकीकरण
तुम्हाला अपरिहार्यपणे संस्कृ तीच्या जागतिकीकरणाकडे घेऊन जाते. सध्या जगात टीव्ही
चॅनेल्सच्या सुळसुळाटामुळे एकाच प्रकारची विचारपद्धती लादली जात आहे.
जागतिकीकरणाचे बरेच संदेश हे इंग्लिश भाषेत आहेत. मूल्ये, तत्त्वे हे सर्व आता टीव्ही
चॅनलद्वारा पसरवले जात असल्याने पारंपरिक ज्ञान, या पिढीकडून पुढच्या पिढीकडे
जाणारे शहाणपण दुर्मीळ होते आहे. अशा पद्धतीने जागतिकीकरण हे कधीच
अर्थकारणाच्यापुढे निघून जात; आता मानवी आयुष्यावरसुद्धा आपले नियंत्रण लादते
आहे असे लक्षात आले आहे. एखाद्या राष्ट्राची, समाजगटाची अंगभूत वैशिष्ट्ये यात नष्ट
होऊ लागली आहेत आणि त्यामुळे त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. यातून एक
नवाच पंथ उदयाला येतो आहे जो माणूस म्हणून जीवनपद्धती म्हणून, माहिती म्हणून,
तंत्रज्ञान म्हणून, संस्कृ ती तत्त्वे, मूल्ये बुद्धिमत्ता असे सगळे एकाच पद्धतीचे घालत आहे
असे भयानक चित्र उभे राहू लागले. हे सगळे एकसाची असणारा माणूस तयार होत
आहे. लोकांना काय हवे यापेक्षा आंतरराष्ट्रीय समूह आता काय हवे- काय नको हे
सांगायला लागले आहेत. आंतरराष्ट्रीय संबंध यावर ठरवले जाऊ लागले आहेत. मग युनो,
सुरक्षा परिषद यांना फक्त हा अजेंडा राबवण्याचे काम उरले. एकसाची धोरणाचे
बिनडोकपण त्यांनाही सोयीचे होते. हे सगळे बघितल्यावर असे का झाले याचा छळणारा
प्रश्न उरतोच. त्याची उत्तरे शोधताना वर नमूद के लेल्या परिस्थितीने काहीतरी विपरीत
जन्माला घालायला सुरुवात के लीय. त्याकडे तुमचे लक्ष मला वेधायचे आहे.
मी भारतात कायमचा आल्यापासून अनेक ठिकाणी जातोय आणि तिथल्या
मुलांशी बोलतो. मी त्यांना एक प्रश्न नेहमी विचारतो, तुम्हाला ज्या कल्पना सुचतात त्या
तुम्हाला आहे त्या मनाने मुक्त करतात की तुम्हाला इतरांना मदत करण्यासाठी, त्यांची
सेवा करण्यासाठी जखडून ठे वतात? एरवी आपल्या चुणचुणीतपणाने कोणत्याही
वक्त्यांना भंडावून सोडणारी ही माहितीच्या महाजालातील तयार मुले यावेळी मात्र
बहुतांशी निरुत्तर असतात. स्वत:च्या आयुष्याशी दोन हात करत, तडजोडी करत अथवा
त्याला बाजूला सारत जगणारी मोठी माणसे सोडाच; पण आजकाल मुलेसुद्धा इतक्या
लहान वयात काही प्रश्नांनी मूक होऊ लागली आहेत. हे फार भयानक लक्षण आहे. नेहमी
प्रगती प्रगती असे ढोल ऐक आले की मी अस्वस्थ होतो. वास्तविक माझे बऱ्यापैकी
आयुष्य प्रगत राष्ट्रांत गेलेले आहे; पण तरी माझ्या मनात अनेक शंकांची वादळे घोंघावू
लागतात. कसली प्रगती? कसले पुढारलेपण? माणसाच्या आजच्या हालअपेष्टांची सगळी
आकडेवारी दिली तर के वळ त्याचीच अनेक पुस्तके होतील. मला सगळ्यात छळणारी
मूलभूत शंका ही आहे की आपण एक असा समाज निर्माण करत आहोत का, जो
एखाद्या कृ त्रिम बुद्धीवर जगेल पण शहाणपणावर मात्र अजिबात जगणार नाही? उपजत
बुद्धिमत्ता आणि जगण्यातून आलेले शहाणपण शून्य किमतीचे ठरावे अशा एका जगाकडे
तर आपले प्रवास सुरू नाहीत? मुद्दा समजण्यासाठी थोडे विस्ताराने लिहितो.
१९४१ मध्ये पहिला संगणक अतिशय प्राथमिक अवस्थेत तयार करण्यात आला.
ही संगणक युगाची नांदी होती. जी कामे माणूस स्वत:च्या हाताने, डोक्याने करायचा त्या
कामासाठी प्रथमच एक यंत्र तयार करण्यात आले. ज्याला एखादी विशिष्ट आज्ञावली
(कमांड) म्हणजे काय करायचे याची यादी दिली की, तो ती सर्व कामे करेल अशी ही
प्रणाली. एखादा पूर्वआरेखित कार्यक्रम तयार करून त्यात घातला की तो संगणक त्याचे
उत्तम, चुकाविरहीत निकाल आपल्या हातात ठे वायचा. इंटरनेटचा शोध लागला आणि
मग या यंत्राच्या वेगात, क्षमतेत आणि व्यामिश्रपणात प्रचंड बदल झाले. हा बदल म्हणजे
काय तर माणसे करत असणारी कामे जी वेळखाऊ होती, चुका प्रवर्तक होती, सतत
करण्याचा कं टाळा आणणारी होती ती सर्व कामे अतिशय वेगाने, त्याच्या काही अंशी
व्यामिश्रतेसकट या यंत्राने आपल्या ताब्यात घेतल्याने माणसाचा त्या कामातला वेळ
आणि शारीरिक श्रम वाचू लागले. दुसरा फायदा म्हणजे जी कामे होत ती कोणी किती
वेळात के ली अशा सर्व नोंदी ठे वणे, त्यावरून आडाखे बांधणे, कार्यक्षमता मोजणे हे सर्व
शक्य झाले. ही यंत्रप्रणाली आळशी माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली.
आज तर याशिवाय काहीही शक्य नाही. अगदी महासत्ता बनायचे स्वप्न पाहणेसुद्धा! या
संगणकाने अजून एक गोष्ट के ली ती म्हणजे माणसाच्या कार्यक्षमतेचा पुरता पर्दाफाश
के ला. व्यक्तिसापेक्षता सगळ्या कामातून निघून जाऊ लागली. माणसाची अपरिहार्यताच
यामुळे कु चकामी होऊन बसली. माणूस चकित झाला; कारण एखाद्या शोधाने
माणसाच्या बुद्धीवर, शारीरिक क्षमतेवर इतके नेमके प्रश्नचिन्ह यापूर्वी कधीच उभे के ले
नव्हते.
हे सगळे घडले असले तरी एखादे बलस्थान हे काही काळानंतर आपोआप
मर्मस्थानाचे निदर्शक ठरू लागते. किंबहुना त्या बलस्थानाच्या विकासातच काही असे
मूलभूत प्रश्न उभे राहण्याच्या शक्यता असतात, असे घडलेय का? संगणक, त्याचा
विकास, वापर आणि त्यावरची अवलंबिता यांनी काही तारतम्याचे, सजगतेचे आणि
उपजत भानाचे प्रश्न उभे के लेत का? थोडे खोलात गेले तर असे लक्षात येते की याचे उत्तर
'होय' असे आहे आणि हा संघर्ष इतका वरवरचा नाही. तो माणसाच्या माणसाची उपजत
बुद्धिमता (native intelligence) आणि संगणकीय जीवनशैलीने जन्माला घातलेली
कृ त्रिम बुद्धिमत्ता (artificial or programmatic intelligence) यातला आहे. मग
लक्षात येते हे की हा संघर्ष आपले जगण्याचे परिमाण बदलू शकतो. मानवी समाजाला
एका अशा वळणावर आणून ठे वू शकतो जिथे मानवी आयुष्याचे, आपल्या व्यवहार,
नातेसंबंध यांचे एका बाजारू मालात रूपांतर होऊ शकते.
परदेशातल्या एका के स स्टडीचा माझा अनुभव फारच अंतर्मुख करून गेला. गोष्ट
मेक्सिकोतली आहे. मेक्सिकोत मक्याची शेते जवळपास २००-३०० एकर इतकी प्रचंड
असतात. मका पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून एका कं पनीने कणसे
खुडण्याचे एक संगणकावर चालणारे यंत्र तयार के ले होते. मक्याची कणसे त्या यंत्राच्या
इन्पुट बॉक्समध्ये आणून ठे वायची आणि त्या एका स्वयंचलित प्रोग्राममुळे ते यंत्र जेवढा
मका हातांनी खुडायला साधारण एक दिवस लागायचा ते काम एका तासात वगैरे पूर्ण
करायचे. त्याचे प्रात्यक्षिक दिले गेले, पण मेक्सिकन शेतकरी मंडळी काही ते वापरत
नव्हती. त्याबाबतच्या कारणांची चर्चा झाली तेव्हा तिथल्या एका अडाणी शेतकरी स्त्रीने
सांगितले, “आम्हाला हे यंत्र कसे वापरायचे ते समजते; पण समजा आम्ही हे यंत्र वापरले
तर हा सगळा मका खुडताना आम्ही सगळे जे एकत्र बसतो ज्या गप्पा, जे आपापसातील
माहिती देणे घेणे होते, जे एकमेकांच्या प्रश्नांचे, आनंद, दुःखाचे जे शेअरिंग होते त्याचे मग
आम्ही काय करायचे? भले आम्हाला वेळ लागत असेल जास्त, पण आम्हाला घाईत
जगून कु ठे जायचे आहे? आणि कशासाठी?" - संगणकीकृ त यांत्रिकी जीवनाच्या प्रगतीने
मानवी संवेदनांची होणारी ससेहोलपट आणि कृ त्रिम बुद्धिमत्तेने आपल्या शहाणपणाचा
घेतलेला ताबा यावर या इतके नेमके भाष्य असूच शकत नाही.
सुरुवात अगदी शाळेपासून करायला हवी. पूर्वी आपण पाढे पाठ करायचो. गणित
तोंडी करता यायचे हा त्याचा फायदा झाला. पण त्याने नुसतीच गणित या विषयाची
भीती घालवतानाच ते उच्चार, स्मरणशक्ती याचा आकडेमोडीसाठी मेंदूला ताण देत
त्याची कार्यक्षमता वाढवायचेही काम व्हायचे का? काहीही उत्तर शोधताना, सोडवताना
मेंदूला जी तार्किक मूलभूत विचार करण्याची जी सवय लागते त्यामुळे मेंदूत क्रिया आणि
प्रतिक्षिप्त क्रिया यांची एक साखळी तयार होते. बालपणी मेंदूविकासाची प्रक्रिया हीच
आहे. गणित आपण कॅ ल्क्युलेटरने सोडवतो तेव्हा ही प्रक्रिया बंद होते, कारण आपण
मेंदूला कोणताही ताण देत नाही. कोणी यावर म्हणेल माझा वेळ वाचला तर बिघडले
कु ठे ? प्रश्न वेळेचा नाहीये तर मेंदूत तार्किक विचार करण्याच्या अनेक शक्यतांची जी एक
साखळी तयार होते त्याच्या संदेश वहनाचा,त्यात दडलेल्या इंद्रियविकासाचा आहे. अशा
अनेक अप्रत्यक्ष गोष्टींनी आपल्या विचारांची जडणघडण होत असते. जर मुलगा सातव्या
वर्षापासून अशा जडणघडणीत गुंफला गेला नाही तर प्रक्रियेच्या विकासाची हमी कशी
देणार? अजून एक मुद्दा म्हणजे एखादी गोष्ट पाठ करून मग ती लक्षात ठे वणे आणि
एखादी गोष्ट कॅ ल्क्युलेटरसारख्या यंत्रामध्ये तयार असणे यात मूलभूत फरक आहे.
दुसरे उदाहरण प्रत्येक माणसाच्या अंगी उपजत असणाऱ्या सर्जनशीलतेचे पाहू या.
चित्रकार एखादे चित्र काढतो, तेव्हा त्याची काही प्रोग्रॅम करून ठे वलेली योजना असत
नाही. त्याची निर्मिती आणि सर्जनशीलता याचे एक व्यामिश्र रूप त्या चित्राबरोबर
आकार घेते. एखादा अभिनेता जेव्हा रंगमंचावर अविष्कार करतो तेव्हा त्या भूमिके चे
समज, आविष्कृ त होत जाताना सुचणारे विविध आयाम, तिथे उपस्थित असणाऱ्या
प्रेक्षकांशी होणारी सुप्त मनाच्या पातळीवरची देवाणघेवाण या सगळ्यांचा मिळून एक
समुच्चय परिणाम तिथे साधला जातो. त्या आविष्काराची अनुभूती नेहमीच बदलत
असते. हे फक्त उपजत बुद्धिमत्तेमुळेच शक्य आहे. याची आज्ञावली नाही तयार करता
येत. सगळ्यांनी रेसिपी बुकप्रमाणे तंतोतंत स्वयंपाक के ला तरी चवीत फरक का पडतो
याचे उत्तर काय देणार?
२००१ मध्ये युनोच्या एका अभ्यास गटाने नोंदवले की संगणक आणि इंटरनेटच्या
बिनडोक आणि अमर्याद वापराने जगातील सुमारे अर्ध्याहून अधिक भाषा नामशेष होत
आहेत. वरवर बघता हे अतिशयोक्त वाटेल पण उदाहरणच पाहूयात. संस्कृ त भाषेतील
'ओम्' या शब्दाचे उदाहरण घेऊ. 'ओम्'चा उच्चार दोन स्वर आणि एका अर्ध्या व्यंजनात
विभागाला गेलाय. अ, उ आणि म्. याशिवाय हा उच्चाराधिष्ठीत शब्द आहे. संगणकाची
भाषा इंग्लिश असल्याने त्याचे स्पेलिंग जच असे होते. म्हणजे जी मुले आता
संगणकाद्वारा संस्कृ त भाषा शिकू पाहतील त्यांना याचा उच्चार 'ओम्' असा साधा हुंकार
नसणारा, श्वासाच्या आरोह-अवरोहावर अवलंबून नसणारा असाच माहीत होईल. असे
सरू राहिले तर मात्र हळहळ उच्चाराधिष्ठीत.स्वराधिष्ठीत शब्द नष्ट होतील.
काही दिवसांनी उच्चार आणि संगणकीय भाषा यांचे त्रैराशिक मांडताच येणार
नाही. सगळे फक्त आद्याक्षरांमध्ये बसवल्यामुळे आपण ते उच्चारच गमावून बसू की
काय? मग भाषा आणि संस्कृ ती यांचे असणारे एक अतूट नाते विसविशीत होत जाईल.
त्याचबरोबर अनेक स्थानिक सांस्कृ तिक दुवेही, ज्यात मुलांची वाढ होतानाचे वातावरण,
त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास होण्यासाठी आवश्यक असणारी जगण्याची पद्धती यांचेही
पाश ढिले पडतील. उपजत बुद्धिमत्तेची जागा मग कृ त्रिम बुद्धिमत्ता घेईल. खूप माहिती
असेल पण त्याचे विश्लेषण करण्याची क्षमता निघून जाईल. अभ्यास करून, प्रसंगी
वितंडवाद करून आपली मते तपासून पाहण्यापेक्षा रेडिमेड माहितीने ज्ञान समजल्याने,
कोणाची तरी मते आपली बनून जातील. आपण त्यासाठी भांडू, ग्लोबल व्हिलेजपेक्षा
ग्लोबल पाईलेज झाले असल्याने एखादी गोष्ट शोधून काढण्याचे मार्ग बंद होतील. हे
सगळे होईल असे मी म्हणतो आहे खरे; पण अलीकडेच काही तरुण मुलांशी बोलताना
माझ्या असे लक्षात आले आहे की महानगरातल्या तरुण मुलांचे इंटरनेटवरचे सर्किंग
इतके वाढले हे की मानवी संवेदना, निसर्गाचे आकलन आणि वाचन कमी झाले आहे.
नैसर्गिक मूल्यांची (व्हर्चुज) जागा कौशल्ये (स्किल्स) घेत आहेत. वाहणारी नदी असणे ही
समृद्धी आणि वाहत्या पाण्याला अडवून त्यावर धरण असणे ही संपत्ती. त्यामुळेच संपत्ती
काहीच ठिकाणी असू शकते, सर्वत्र नाही. आता संपत्तीची वाढ होत जाईल तशी समृद्धी
रोडावेल. नदीचे अस्तित्वच धरणाचे आश्वासन जिवंत ठे वते. नदी हा सोर्स आहे धरण
रिसोर्स. रिसोर्स सोर्सला घातक ठरून कसे चालेल? ते त्याच्याच अस्तित्वावरचे प्रश्नचिन्ह
नाही का ठरणार? हेच उदाहरण शहाणपण आणि बुद्धिमत्तेला लागू पडते. शहाणपण हे
अनुभवातून येते तसेच ते अंगभूत असते. जगताना आपण अनुभवांसाठी नेहमी सजग
असतो तेव्हाच त्या अनुभवांचे सार मनात रुजते, त्याचे एक विश्लेषण पूर्ण होते आणि
त्याप्रमाणे आपल्या शहाणपणाचीही नकळत जडणघडण होत जाते. मात्र त्यासाठी
चौफे र जगावे लागते. जीवनशैलीचे मोठे योगदान चौफे र जगण्यात आहे. तिची
व्यामिश्रता, वैविध्य जपण्यातच सगळे मर्म आहे. ती एकसाची होणार नाही याची
काळजी घ्यावी लागते. आहे, दिसतो त्यापेक्षा प्रत्यक्ष अवकाश मोठा आहे ही धारणा
मनात ठे वावी लागते. जगण्याचे विविध स्तर हवे असतील तर ते कदाचित जगणे सोपे
करून मिळणार नाहीत, अतिसुलभ जगण्याने फार फार तर आरामशीरपणा येईल पण
मग त्यामुळे जगण्याचा कस मात्र लागणार नाही. अतिसुलभ जगताना सारे सोपे होईल
पण मग आपल्याला शहाणपण येणार नाही हा फार नुकसानीचा सौदा आहे. म्हणून
ज्यांना शहाणपण हवे असेल त्यांना जगण्यात थोडे कष्ट पेरावे लागतील. ज्या वयात
आपला विकास होतो तिथे तर हे प्रकर्षाने करावे लागेल. कोणत्या वयात काय
सहजसाध्य करायचे आणि कोणाला थोडे झगडावे लागेल हे पहायचे याचे आपण निर्माण
के लेल संके त आपण स्वत: याबाबतीत किती सजग आहोत हे दाखवून देईल. मुलांना
सतत आराम मिळेल अशी जीवनशैली निर्माण करण्यापेक्षा त्यांना स्वत:च्या शहाणपणाने
त्यांचे आयुष्य कसे समाधानी करता येईल याचे वस्तुपाठ देणे गरजेचे नाही का? ती
आपली जबाबदारी नाही का? आज बघितले तर सुख, चैन, समृद्धी याला समाधान
मानण्याची प्रवृत्ती बोकाळते आहे. त्यासाठी कष्ट तर घ्यावेच लागतील. शहाणपण
जन्माला घालणे सोपे कसे असेल?
हे सर्व विवेचन बघता हा संघर्ष या पुढच्या सगळ्या संघर्षात अतिशय टोकाचा नाही
तर निर्णायकीसुद्धा असण्याची दाट शक्यता आहे. माहिती, ज्ञान आणि शहाणपणा ह्या
वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि माहितीला ज्ञान समजणे हे जितके अपरिपक्वतेचे लक्षण
आहे, तितके च माहितीतून येणाऱ्या ज्ञानालाच शहाणपण समजणे आपल्या
विकासासाठी फार दुर्दैवी आहे. तथाकथित प्रगतीच्या व्याख्येत मानवी जीवनाचा प्रवास
हा उपजत प्रज्ञेकडून (Native Intelligence) शहाणपणा (Wisdom) कडे व्हायला
हवा; तो जर कृ त्रिम प्रक्षेकडे (Artificial Intelligence) होत असेल तर ते हिताचे नाही.
कारण कृ त्रिम प्रज्ञा ही मानवी जीवांच्या सर्जनशीलतेत काहीही योगदान देऊ शकत नाही.
इतके च नव्हे तर अडसर ठरण्याची शक्यताच नाही तर उदाहरणे आहेत. आज हे सर्व
मांडण्याचे कारण म्हणजे के वळ आर्थिक सामर्थ्याच्या जोरावर काही शक्ती एका नव्या
जगाची रचना करू पाहत आहेत. त्या कोण आहेत आणि हे सर्व कशासाठी चालले
आहे? जगाला एकसाची करण्याच्या मुळाशी धार्मिक, राजकीय, लष्करी, सामाजिक,
वादिक, की आर्थिक अशा कोणत्या प्रेरणा आहेत? सारे जग असे एखाद्याला स्वत:च्या
पंखाखाली आणणे शक्य आहे का? खरे तर मानवी जीवनातील बदल हे नेहमीच
स्वागतार्ह असतात. पण बदलांनी मानवी मूलभूत प्रेरणा आणि संरचनेवर प्रभुत्व मिळवले
तर पुढे काय होईल याचा विचार कारणे हेच बुद्धिमत्ता आणि शहाणपण ह्यातले अंतर.
जाणिवेची परीक्षा नाही, ज्ञानाला गुण नाहीत अशी ही माहितीवर आधारित आणि तेही
निरुपयोगी, नियंत्रित माहितीवर आधारित शिक्षणपद्धती कोणाला हवा तसा समाज
निर्माण करत आहे? सारे जग असे सांगकामे व्हावे का? बुद्धिमत्ता टोकाची पण
शहाणपणरहित होणे हा काय प्रकार आहे? हे कोणते आक्रमण आहे? पं. आपल्या
जगण्याला दिलेले विविधतेचे आयाम, भौतिक सुखांचे पर्याय एकदा नीट तपासून
पाहायला हवेत. हे सत्य आहे का भ्रम याचा एकदा धांडोळा घ्यायला हवा. जगात
सगळीकडे स्वातंत्र्याचे भ्रम आहेत पण त्या देशांचा स्वत:च्या धोरणांवर ताबा नाही असे
जग काय कामाचे? आज जगात सर्वत्र ५०० टीव्ही चॅनेल्सचा पर्याय आहे. पण सर्व
चॅनेल्सवर येणारा संदेश मात्र एकच आहे. विविध प्रकारचे खाण्याचे पर्याय आहेत, पण
त्यातले ९०% एकाच प्रकारच्या धान्यापासून बनवले जात आहेत. म भारतासारख्या
देशात आज निवडणुकीला अनेक राजकीय पक्ष, अनेक विचारधारा उभ्या असतात असे
भासवले जाते पण कोणीही आले तरी आपल्या आयुष्यात काहीच फरक कसा पडत
नाही? आर्थिक स्वातंत्र्याचे तर अजूनच धिंडवडे आहेत. तुम्हाला गुंतवणुकीचे अनेक
पर्याय आहेत पण जेव्हा हे सगळे बुडते तेव्हा एकत्र कसे होते? तुम्ही स्वतंत्र विचार करत
नाही हे खरे आहे का? तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीचा ताबा कोणीतरी घेतला आहे
का? तुमच्या जगण्यावर कोणीतरी नियंत्रित कर लादत करते आहे का? मुख्य म्हणजे हे
तुमच्या स्वत:च्या नाही तर दुसऱ्या कोणाच्या तरी फायद्यासाठी आहे असा विचार करू
लागलो की काय वाटते? देश कोणताही असो,
तुमच्या प्रत्येक गुंतवणुकीचा ताबा कोणाकडे आहे याचा नीट विचार करा. सगळ्या
जगात एकच कं झ्युमर ऑर्डर आहे का? आपण काय परिधान करतो? म्हणजे काय
घालावे? कसे जगावे? काय वापरावे कु ठे जावे? कसे राहावे? काय खावे-प्यावे? सुटी
म्हणजे काय? ती मजेत घालवणे म्हणजे काय? मुलांना विरंगुळा म्हणून काय करावेसे
वाटावे? पालकांना मुलांचे लाड म्हणजे काय करावेसे वाटावे? फादर्स डे, मदर्स डे,
फ्रें डशिप डे, ग्रँडपा डे, डॉक्टर डे हे सगळे काय आहे? उपभोगवादाचे हे प्रॉडक्ट आहे का?
हे सगळे कोण ठरवते आहे? त्याच्यामागे काय दडलेले आहे? यातून मिळणाऱ्या अमर्याद
उत्पन्नात कोणाचे फायदे आहेत? सगळ्यांच्या दुःख-सुखाच्या कल्पना एकच कशा
असतील? सगळ्या जगाचा हॅपी इंडेक्स एकच कसा असेल? आपल्या इतक्या छान
आणि विविधरंगी आयुष्याचे एखाद्या वस्तृत रुपांतर होणे कोणाच्या फायद्याचे आहे?
याचा खोलवर विचार करावाच लागेल, कारण आपण कु ठे आहोत यापेक्षा कु ठे जायचे
आहे यावर आयुष्य ठरते...
अनेकपक्षी करार, मुक्त व्यापार करार, वस्तू, उत्पादने, माणसांची एकसाची
जीवनपद्धती या सगळ्या गोष्टींचे जागतिकीकरण म्हणजे कोणत्या तरी हव्यासी
ऑक्टोपसचे अनेक पाय आहेत. ज्याला आपण विकास समजून त्यामागे खुळ्यासारखे
धावत आहोत तो आपल्या विनाशाचा एक छु पा अजेंडा आहे हे आपल्या लक्षात का येत
नाही? अर्थशास्त्राचे पुस्तकी विद्वान अर्थशास्त्रीय सिद्धान्तातून बाहेर पडताना दिसत
नाहीत. दरम्यान जागतिकीकरणाच्या संकु चित अंधाऱ्या खोलीत आपले आयुष्य
घुसमटून जात आहे. ते विस्तृत होण्याऐवजी आपल्या स्वत:पुरते जगायला शिकवत आहे.
माहितीचे मायाजाळ यालाच ज्ञान समजण्याची एक घातक सवय आपल्याला लावत
आहेत.
आपला प्रवास व्यक्ती ते समष्टी ते सृष्टी असा होण्याऐवजी व्यक्ती, व्यक्तिगत
आणि माझ्यापुरते असा होतो आहे का, याचा विचार करणे, त्यावर सतत चिंतन करणे
जरुरीचे आहे.
३७. हीच ती वेळ, हाच तो क्षण
◆ ◆ ◆