Professional Documents
Culture Documents
‘yë¶ … 70 én¶o
- राित इं दौरी
- उदय रोटे
संपर्क ः ९६१९४८५६१४
आशुतोष पोतदार
**
**
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 17
लहानपणापासून तो केस फारसे वाढवत नसे. वाढवलेच
तर केस डोक्याच्या वरवर वाढत. काही दिवसांत केसांची
टोपी होत असे. अशा वेळी केसात कंगवा फिरविणे अशक्य
होई. त्याच्या लहानपणी टोपीसारखे केस दिसेपर्यंत त्याला
कुणी केस वाढवू देत नसत. थोडे तरी केस वाढू लागले की
त्याची रवानगी केशकर्तनालयात होत असे. केशकर्तनालय
हे दकानाच्या
ु पाटीवर लिहिलेले नाव. अन्यथा, त्या दकानाला
ु
न्हाव्याचे दकानु म्हणत. के स कापणारे मामा म्हणजे
दिलखुलास व्यक्ती. गावभराच्या बातम्या ऐकवुन
केशकर्तनालयात येणाऱ्या लोकांचे मन खूश ठे वण्याचे काम
मामा करत असत. ज्या गतीने डोक्यावर मामांची कात्री फिरे
त्याच गतीने त्यांच्या तोंडातुन शब्द बाहेर पडत. त्यांच्या
बोलण्यात कात्रीचा आवाजही ऐकू येईनासा होई. घरचे असे
सांगत की त्याचे जावळ याच मामांनी काढले. पण, जावळ
काढताना त्याने कोणताही त्रास दिला नाही. जावळ काढताना
मनापासुन तो शांत राहिला आणि त्याने जावळ काढतानाचा
फोटोही काढून दिला. अगदी अलीकडेपर्यंत हा फोटो आई
सर्वांना दाखवायची. आता आईच नसल्याने कुणाला त्याच्या
त्या फोटोचे कौतुक वाटणे शक्य नाही. जसे वय वाढत गेले
तसे त्याला बरेच छंद लागले. पण, केस वाढवायचा छंद
काही लागला नाही. दाढी वाढवुन पािहली पण केस काही
वाढवू शकला नाही. केस वाढु लागले की त्याला विचित्र
भावना यायची आणि तो पटदिशी हेअर सलूनमधे जाऊन
केस कापून यायचा.
रात्री हाताला लागणारा केसांचा पुंजका असा का लागत
आहे हा विचार करत तो झोपी गेला. झोपी गेल्यावर त्याच्या
मनात काय यावे यावर काही त्याचा ताबा नसे. कुणाचा
असतो म्हणा; पण त्याच्या मनात विचारांची शृंखला असते
तशी त्याच्या मनात स्वप्नांची शृंखला तयार होते. कधीकधी
सकाळी उठल्याउठल्या आपल्याला कुठले स्वप्न पडले होते
याचा विचार करण्यात त्याची सकाळ संपून जाते. आज
त्याच्या मनात विहिरीचे विचार येत राहिले. अलीकडच्या
18 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
काळात त्याने विहीर पाहिलेलीही नाही. जी काही पाहिली
आहे ती लहानपणी. पण विहीर त्याला नितांत आवडते.
लहानपणी अनेक तास त्याने विहिरीवर घालवले होते. आड,
बाव, कूप, गोल विहीर, चौकोनी विहीर, पुष्करिणी, बारव,
भुडकी, वाव अशी नाना नावं विहिरीला असली तरी दोनच
नावांच्या विहीरी त्याला माहिती होत्या: पाणी ओढायसाठीचा
आड आणि पोहायसाठीची विहिर. पाणी ओढायसाठी आडावर
घागर सोडली की त्या पाण्यात पडतानाचे दृश्य त्याला खेचन ू
घ्यायचे. विहिरीच्या कठडय़ावर बसल्या बसल्या त्याला
स्वतःला पाहात येत असे. पाण्याबरोबर आपणही त्यात का
शिरू नये असा प्रश्न पडायचा. पण, घागर पडून आडातले
पाणी डचमळले की त्याचा आडातल्या पाण्यातला इंटरेस्ट
संपून जायचा. मग, तो आडाभोवती चिमण्यांनी बांधलेल्या
घरटय़ांकडे बघत राहायचा. सकाळ संध्याकाळ तो
पोहण्यासाठीच्या विहिरीवर जाऊन बसायचा. रविवारची
शाळा नसायची तेव्हा तो विहिरीवरून संध्याकाळपर्यंत घरी
यायचा नाही. दहावीला गेल्यावर रविवारीही सकाळची शाळा
असायची. ती एक्स्ट्राच्या क्लासेसची शाळा असायची. त्याला
शाळा काही आवडायची नाही. एक्स्ट्राचे क्लासेसही
आवडायचे नाहीत. मग, तो सकाळचे क्लासेस बुडवून
पोहायच्या विहिरीवर जाऊन पाण्यात पडायचा. शाळेतली
हशु ार मुले त्याला किती पाण्यात पडतोस म्हणून चिडवायची.
एकदा रविवारचे पोहायला गेला पण जाताना बदलण्यासाठी
दसरी
ु चड्डी घेऊन जायचा विसरला. त्याला पोहायचे तर
होते. मग, आहे त्या चड्डीवर पाण्यात उतरला. पोहनू
झाल्यावर ओली चड्डी विहिरीवरच्या पम्पिंग मोटरच्या
खांबावरल्या कपाटावर वाळत टाकली. विहिरीत बघत
बसला. चड्डी वाळत राहिली. पण, पूर्ण चड्डी काही वाळली
नाही कारण एक्स्ट्राच्या क्लासला जायचे होते. शेवटी, जेवढी
काही वाळली होती तेवढी चड्डी घालून तो क्लासला
पळाला. वर्गात शिरताना त्याची अजूनही ओली असलेली
चड्डी पाहनू काही जण फिदीफिदी हसले. शिक्षकही
त्याच्याकडे एकटक पाहातच राहिले. तो मागच्या बाकावर
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 19
जाऊन बसेपर्यंत त्याच्याकडेच बघत राहिले. सर्व जण
त्याच्याकडे पाहातच राहिले. ‘‘आलात थेट विहिरीवरून
राहिलात उपकार करून. आता जा वेळ असेल तेव्हा
केशकर्तनालयात आणि राहा आईबापावर उपकार करून."
शिक्षक त्याच्याकडे पाहात बोलले. राग आला की ते
यमकात बोलत. पण कधी मारत नसत. त्याने आपल्या
डोक्यावर हात फिरवला. पाणी ओघळत होते. हात वर
करून दंडावरच्या शर्टाने त्याने डोके पुसले. लाजलेला तो
खाली बसला.
**
**
रघूच्या मेसज
े ला उत्तर पाठवून चार तास उलटून गेल.े
त्याने पोहे करून खाल्ले. दोनदा चहा झाला. घराच्या
मालकाला फोन करून झाला. फेसबुकवर फोटो बदलून
झाले. आता उठून काम करायला हवे याची त्याला जाणीव
झाली. ठरवून तो उठला. लॅपटॉप उघडला. खिडकीचा पडदा
सरकवला. खुर्ची टेबलाजवळ ओढली. टेबल हलवून घट्ट
बसवून घेतले. समोर ठे वलेल्या बाटलीत पाणी आहे काय ते
पाहिले. त्यात थोडे पाणी होते. बाटली नंतर भरून घेऊ असा
विचार करून त्याने आपल्या लॅपटॉपकडे नजर वळवली.
लॅपटॉप सुरू केला आणि काम करावे म्हणून बसला. पण
लगेचच बाजूला सरकवला. त्याला काही सुचने ा. का कुणास
ठाऊक त्याचे लक्ष लागेना. त्याचे लक्ष खिडकीकडे गेल.े तो
उठला आणि खिडकीकडे चालत गेला. खिडकीबाहेर सारं
ओलं ओलं दिसत होतं. रात्रभर पाऊस पडला असावा.
पाऊस कधीही पडतो याची त्याला चिडचिड झाली. रस्त्यावर
जागा मिळेल त्या दिशेने पाणी आपल्यासाठी जागा करून
घेताना त्याला दिसले. दिसेल तिथे लग्नाच्या जेवणानंतर
विसकटलेले अन्न बघावे तसे पाणी आजुबाजूला साठले
होते. जागा मिळेत तिथे दाटीवाटीने ओघळ तयार झालेत.
यातूनच आपल्याला भाजी वैगरे सामान आणायला जायला
लागणार. त्याच्या अंगावर काटाच आला. आपण ओघळावरनं
पाय नाचवत पाण्याला पाय न लावता उडत जाऊ असे
त्याला वाटते. आपण भाजी आणायला उडत चाललोय असे
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 23
आपल्याच मनाला सांगितले. मनातल्या मनात तो चालत
राहातो. अधेमधे उडत राहातो तर आता समोर T आकाराचे
वळण दिसते. डाव्या बाजूला जाणारा रस्ता बाजाराकडे जातो
तर उजव्या बाजूला जाणारा टपरीकडे. डाव्या बाजुला गेलं
की भाजी मिळते तर उजव्या बाजुला हेअर सलून, टपरीवर
चहा आणि सिगरेट. बस झाले मनातल्या मनात बोलणे.
हेअर सलूनमधे जावे आणि सिगरेट मारून चहा पिऊन
यावा म्हणून तो लॅपटॉपचे तोंड मिटवून ठे वतो.
पॅन्ट घालून आवरायला आत आरशासमोर उभा राहातो.
आरशासमोर काहीतरी विचित्र वाटायला लागते. आपण असे
का झालोय हेच त्याला कळेना. आपल्या डोक्यावर हे काय
नवीन आलेय याचे काही त्याला कोडे उलगडेना. आरशात
आपल्या डोक्याला भिंतीवरल्या कोळ्याच्या जाळ्यासारखे
केस दिसू लागतात. जागोजाग पिंजारलेले केस त्याच्या
कपाळावर रुळत होते. रुळत होते म्हणायला खूप काही रेलून
बसले नव्हते. तर, काहीतरी अनाकलनीय. उंच डोंगरावरून
खाली दिसणाऱ्या झुडपासारखं त्याचं डोकं दिसत होतं.
केसांची वेणी घालायला तो शिकलाय. पण त्याला अशा
केसांची वेणीही घालता येणार नाही. कसे केस दिसतायत?
हातात कंगवा घेतो. केस विंचरू लागतो. पण, कंगव्याचे
दात केसातून निघतच नाहीत. मग दसरा ु कंगवा घेतो. तोही
केसात अडकून बसतो. मग अजून एक कंगवा घेतो. तोही
केसात अडकून बसतो. आता काय करावे हेच त्याला
कळेनासे होते. त्याला एक आयडिया सुचते. तसेच केस
आणि कंगवे घेऊन तो बाथरूममधे जातो आणि केसांवर
पाणी मारून घेतो. केस भिजवून बघतो आणि केसांतन ू
कंगवा फिरवतो. केस फक्त हलल्यासारखे वाटतात.
हेअर सलूनकडे वळतो.
हेअर सलूनमधे केस कापणारे वेगळे आणि नंबर लावून
घेणारे गृहस्थ वेगळे. ते गृहस्थ समोर आले.
‘‘सर, बैठो नां. एक ही नंबर है.''
‘‘ ओके. मेरा थोडाही काम है''
‘‘शेव्हिंग करनी है?''
24 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
‘‘ नहीं बाल करने है.''
‘‘ हो जाएगा, सर. ये लिजिए पेपर.''
हेअर सलूनमधे एका बाजूला तीन आणि दसऱ्या ु बाजूला
तीन अशा सहा खुर्च्या मांडल्या होत्या. गर्दी तुरळकच. तरी
दोघे जणच रांगेत होते. रविवार असता तर अजून गर्दी
असती आणि बराच वेळाचे वाट पाहाणे असते. त्याच्याशिवाय
दसरे
ु गि-हाईक होते ते मोबाईलवर बिझी होते. मोबाईलमुळे
वाट पाहाण्यातला त्रास कमी झाला होता. वाट पाहाण्यापेक्षा
बिझी राहाण्याने माणसाची अनेक त्रासांतन ू सुटका होत
असेल. त्याच्याजवळही मोबाईल होता. पण, त्याला
मोबाईलमधे कमीच इंटरेस्ट होता. अर्थात, त्याला लोकांशी
बोलण्यातही कमीच इंटरेस्ट असतो. त्याला विचार करण्यात
जास्त इंटरेस्ट असतो. कसला विचार करण्यात असतो किंवा
विचार खूप महत्त्वाचे असतात काय असले विचार त्याच्या
मनात येत नसतात. विचारांच्या मालिकांत राहाण्यात त्याने
स्वतःला गुंतवून घेतलेले असते. विचार करणे प्रयत्नपूर्वक
होत नसते. ते सहज होत असते. उदाहरणार्थ, आता या
दकानात
ु आरशात पाहनू त्याच्या मनात विचार येत आहेत..
सहा खुर्च्यांवर बसलेली सहा माणसे त्यांच्या भवताली
असलेल्या आरशांत पाहातातय. इतके आरसे असताना
प्रतिबिंबांची प्रतिबिंबे असे होऊन एकूण दिसणाऱ्या प्रतिबिंबांची
मोजणी तो करत आहे. आरशात दिसणारी प्रतिबिंबे सोडून
एकमेकांच्या डोळ्यांत दिसणारी प्रतिबिंबे वेगळीच. इतक्या
साऱ्या प्रतिबिंबांतन ू खरे कुठले प्रतिबिंब मानायचे?
‘‘सर, आपका नंबर आया है." नंबर लावून घेणारे
गृहस्थ त्याच्याकडे पाहनू बोलले.
‘‘हां."
तो इकडे तिकडे पाहात खुर्चीकडे पोहोचला. आरशात
पाहात या सगळ्यांच्यात आपण किती उंच आहोत याचा
त्याला अभिमान वाटत होता. केस कापणाऱ्या गृहस्थाने
खुर्ची वळवून त्याला बसायला जागा दिली. त्याच्या डोक्यावर
हात फिरवत त्याने विचारले, ‘‘कितना कट करना है?"
‘‘छोटे बाल करने है."
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 25
‘‘अभी तो छोटे है. और छोटे करें गे तो बहतु छोटे दिखेंगे
आप."
‘‘कान के पिछे तो कितने बडे हय ु े है बाल"
‘‘नहीं तो. देखिये." त्याने त्याच्या डोक्याच्या मागे
आरसा धरून त्याला दाखवले.
‘‘अरे, ऐसे कैसे हो सकता है? मेरे आरसे में तो दिख
रहा था."
‘‘नहीं सर ऐसा कुछ बडा हआ ु नहीं है. प्लेनही है."
‘‘पर मुझे तो दिखा. मैंने फोटो भी निकाला है. ये देखो
ये फोनपर."
त्याने दाखवायला फोन काढला. क्षणात त्याच्या लक्षात
आले की आपण काढलेले फोटो डिलिट केले आहेत. फोन
बाजूला ठे वला.
‘‘मुझे कलही दिखा आरसे में. कमालही हआ ु ."
"हा सर. मै आरसे के साथही होता हं ू आरसे कमाल के
होते है. फस सकते हो आप."
‘‘बाल काटने के लिये मै बाद मे आता हं"ू , तो तुटक
बोलला. अंगावर घातलेले फडके बाजूला केले. दाबून खुर्ची
वळवली. भरदिशी बाहेर निघून आला.
**
- आशुतोष पोतदार
संपर्क : 7387005358
इ मेल ः potdar.ashutosh@gmail.com
हरिश्चंद्र थोरात
संदर्भ :
थोरात हरिश्चंद्र आणि पवार जयंत, २०१२, हरिश्चंद्र
थोरात आणि जयंत पवार यांच्यातील ई-संवाद, मुक्त शब्द,
जून—२०१२.
थोरात हरिश्चंद्र, २०१८, मराठी कादंबरी : त्रेसष्ट ते
तेरा, शब्द पब्लीकेशन, मुंबई.
नेमाडे भालचंद्र, २००८, निवडक मुलाखती,
लोकवाङ्मय गृह, मुंबई.
नेमाडे भालचंद्र, २००९, सोळा भाषणे, लोकवाङ्मय
गृह, मुंबई.
पवार जयंत, २०१५, वरनभातलोन्चा नि कोन नाय
कोन्चा, लोकवाङ्मय गृह, मुंबई.
- हरिश्चंद्र थोरात
संपर्क -९८१९०९४२३६
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 81
‘समकालीन सामाजिक
पर्यावरणाचा चिंतनात्मक
दस्तऐवज'ः ‘धळ ू पेर'
ll१ll
प्रत्येक काळाचे विशिष्ट असे समाजशास्त्र असते. तसेच
त्या काळाचा एक चरित्रपटही तयार झालेला असतो. ह्या
कालपटावर कार्यरत असलेली व्यवस्था आपल्या मनःपूत ISBN 978-93-82364-57
-3
ll२ll
पहिला विभाग लेखकाच्या हेतक
ू थनाचा असून त्यात
दोन लेख आहेत. ‘आम्ही लटिके ना बोलू' या लेखातून
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 85
‘धूळपेर' या शब्दाचे कृषिवलांच्या जीवनातील वेगवेगळे
संदर्भ उलगडून दाखवताना लेखकाने या लेखनामागील
प्रयोजनही नमूद केले आहे. ‘‘आजचे अस्वस्थ ‘वर्तमान'
त्यातल्या गुंतागुंतीसह समजून घेताना त्यातले बारकावे उघड
व्हावेत असाही हा प्रयत्न आहे... ‘धूळपेर'च्या माध्यमातून
अनागर अशा समाजव्यवस्थेतील वंचित समूहाचा आडवा
छेद मांडण्याचे प्रयोजन आहे. बालपणीचा काळ सुखाचा,
असे म्हणत स्मरणरमणीयतेत घेऊन जाणारे किस्से आणि
जुना गाव आठवण्यातला आनंद या ठिकाणी दिसणार नाही.
समकालीन जगणे हाच या लेखनाचा परीघ आहे. तीच या
‘धूळपेर'ची जमीन आहे." केवळ वर्तमान जगण्याला आणि
भयचकित करणाऱ्या प्रश्नांना चर्चास्थानी ठे वण्याची ही
भूमिकेतली स्पष्टता आणि लेखनाची प्रयोजनावर ठाम
राहणारी दिशा सबंध पुस्तकातून दृष्टि पथात येते.
ll३ll
दसऱ्या
ु विभागात आठ लेख असून समकाळातील
कृषीव्यवस्थेतील वास्तवाचे सूक्ष्म बारकावे टिपतात.
कृषकसमाजाच्या निसर्गाशी असलेल्या जैविक
नात्यांचाआदिबंध उसवून दाखवताना पेरणीच्या दिवसांमधील
शेतकऱ्यांची ओढाताण आणि त्यांनी पाहिलेल्या भविष्याच्या
सुखदायी स्वप्नांचे बीज जमिनीत रुजवण्याच्या धडपडीचे
शब्दचित्र ‘शुद्ध बीजापोटी' या पहिल्याच लेखातून दृष्टीस
पडते. ‘पेर्ते व्हा' ह्या लेखातील शेतकऱ्यांचे पावसावरील
अवलंबित्व आणि शेतकऱ्यांच्या भावस्वप्नांमधील सुप्त-
प्रकट संघर्षाची अधोरेखिते लक्ष वेधन ू घेतात. ‘काळ्या
आईची लाडकी मुल'े हा लेख खऱ्या आणि उपऱ्या
शेतकऱ्यांमधील फरक टोकाच्या उपरोधिकपणे अधोरेखित
करतो. यातील उपहास वस्तुस्थितीला मूळ रूपात आणतो
पण कडवटपणाचा लवलेशही यात डोकावत नाही, तसेच
वाचकाला वस्तुस्थितीच्या गाभ्यात डोकवायला भाग पाडतो.
पारं परिक शेती व शेतकरी देशोधडीला लागलेले असताना
शेतकऱ्यांचा एक नवा वर्ग उदयास आला आहे याकडे
86 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
निर्देश करणारा हा वेगळा लेख आहे. हा नवा शेतकरी
भाबडा नाही, देवभोळेपणही त्याच्याकडे नाही. तो व्यवहारवादी
आहे, चाणाक्षपणा त्याच्यात ठासून भरलेला आहे. तो
कावेबाज आहे. आपल्याकडे जमलेल्या मायेचा सदपयोग ु
म्हणून आणि दसरीकडे ु उपरी बांधिलकी म्हणूनही जमीन
घेणारा हा शेतकरी जेव्हा मूळ शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची
भाषा बोलायला लागतो तेव्हा परिस्थितीतील विरोधाभास
आणि गांभीर्य लक्षात घेण्यासारखे आहे याकडे लेखकाने
निर्देश केला आहे. ‘दो बिघा जमीन आणि किं गफिशर' हा
लेख गावपातळीवरील सावकारी व्यवस्थेवर प्रकाश टाकतो.
शेतकऱ्यांच्या प्रत्येक पिढीला सावकारी व्याजाचा विळखा
पडत गेला आणि सावकारी कर्जापायी शेतकरी व
कृषीव्यवस्था मोडून पडली. कर्जमाफीसुद्धा शेतकऱ्यांना एक
चकवाच ठरतो तेव्हा या कर्जापायी, सावकारांच्या तगाद्यापायी
अनेक शेतकऱ्यांनी गळफास घेऊन स्वतःला संपवले. जोडे
झिजवूनही बँकांकडून कर्ज मिळत नाही तेव्हा खाजगी
फायनान्स आणि सावकारांकडून कर्ज घेण्याशिवाय
शेतकऱ्यांना, शेतमजूरांना दसरा ु पर्याय उरत नाही. तर
दसरीकडे
ु उद्योजकधार्जिणे शासन आणि बँका विजय
मल्ल्यासारख्यांना अमाप कर्ज देतात आणि माल्या बँकांचे
कर्ज बुडवून पसार होतो या विसंगतीला या लेखातून उजागर
केले आहे. ‘‘मोल नाकारणारा बाजार'' या अन्वयार्थक
शीर्षकाच्या लेखातून शेतकऱ्यांच्या मालाचा भाव ठरविणाऱ्या
बाजारातले संगनमतावर आधारलेले राजकारण उघड केले
आहे. खरेदी-विक्रीसंदर्भात केली जाणारी चलाखी हे
बाजारातले वास्तव भयाण आहे. शेतकरी प्रत्येक टप्प्यावर
गंडवला जातो आणि सगळ्यात मोठे दर्दैु व हे की त्याने
उत्पादित केलेल्या वस्तूंचा, शेतधान्याचा भाव ठरविण्याचे
अधिकार मात्र उत्पादनप्रक्रियेशी ज्यांचा अर्थाअर्थी संबंध
नाही अशांच्या हाती एकवटलेले असतात. आडत-व्यापारी
अन् बाजार समित्यांच्या मनःपूत खरेदीभावाने शेतकरी पुरता
नागवला जातो. शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या
बाजारकें द्री यंत्रणेतील षडयंत्राला हा लेख उघड पाडतो.
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 87
कथेचा बाज घेऊन आलेला ‘‘कापूस म्हणाला उसाला'' हा
लेख बागायती शेतीच्या परिसरातील लोकमानसाचा पोत
आणि कोरडवाह ू परिसरातील लोकमनाची सल प्रतीकात्मक
पद्धतीने विशद करतो. ऊस हा पश्चिम महाराष्ट्राची ओळख
आणि सुबत्ता ठसवतो तर कापूस हा मराठवाडा आणि
विदर्भाचे दरिद्री प्राक्तन ठळक करतो.
नव्याने येऊ घातलेल्या कुठल्याही गोष्टींकडे टोकाच्या
नकारात्मकतेने पाहण्याची पद्धत आहे. एकांगी चित्र रं गवून
एखाद्या नव्या बाबीला मोडीत काढण्याचा इथला शिरस्ता
आहे. बदलांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी कोत्या स्वरूपाची
राहिलेली आहे. ‘‘हिरव्या संस्कृ तीचे रक्षक'' या लेखातून
आसाराम लोमटे यांनी नव्या बदलांबाबतीत स्वागतशीलता
दाखवली आहे. घरातल्या, शेतातल्या कष्टाचा भार कमी
करणाऱ्या अनेक गोष्टी इथे स्थिरावल्या आणि श्रम कमी
आणि सुलभ होत गेल.े पण या यांत्रिक बदलांकडे स्वागतशील
वृत्तीने पाहिले गेले नाही, उलट या बाबतीत चुकीची मांडणी
केली गेली. याबाबतीत आसाराम लोमटे वेगळी भूमिका
घेतात. ते म्हणतात, ‘‘श्रमाला सुकर, सुलभ करणाऱ्या आणि
मजुरांनाही ढोरकष्टातून मुक्ती देणाऱ्या यांत्रिकीकरणाचे
स्वागतच करायला हवे. असे घडत मात्र नाही. तुम्ही
यांत्रिकीकरणाबद्दल बोलू लागलात म्हणजे तुम्ही लगेच
‘मजूरविरोधी' अशी भूमिका घेतली जाते. ज्यांना राबायचेच
नाही त्यांना असे बोलून मोकळे होता येते; पण ज्यांना
राबायचे आहे त्यांचा ताण कमी करणारी, कष्टाचा शीण
हलका करणारी यांत्रिकता जिथे कुठे असेल तिचा स्वीकारच
करायला हवा'' विधायक गोष्टींना डावलून खोटय़ा
संस्कृ तीरक्षणाचा खोटा आव आणणाऱ्या समाजाच्या
मनोविकारांवर प्रस्तुत लेख नेमके बोट ठे वतो. अस्मानी-
सुल्तानी संकटांनी मोडून पडलेला शेतकरी मरणाला जवळ
करताना दिसतो. दष्काळ, ु नापिकी, गारपीट अन् कर्जाच्या
डोंगरापुढे हतबल झालेला शेतकरी जीवनयात्रा संपवून
लेकरांना, कुटुंबाला पोरक्या अवस्थेत सोडून जातो.
शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणारा ‘‘थांब! जरा
88 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
मागे वळून बघ..'' हा लेख वाचून विसरून जावा असा
नाही. संकटं येतात पण आत्मिक बळ एकवटून संकटांचा
धीराने सामना करावा लागतो हे तथ्य मनात ठसवतो. जगाचा
पोशिंदा जगला पाहिजे ही कळवळ्याची परिभाषा मनबुद्धीत
बिंबवणारा सदरील लेख शेतकऱ्यांना भावनिक साद घालतो.
ll४ll
कायम समाजव्यवस्थेच्या काठावर उभे असलेल्या आणि
आपल्या जगण्याच्या संघर्षात स्वतःला झोकून देणाऱ्या
ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार, बांधकाम मजूर,
विहीर खोदणारे, खदाण कामगार, झाडे तोडून कोळसा
बनवणारे आदिवासी, जळतण गोळा करणाऱ्या बायका,
सरकारी अनास्थेमुळे भरडले जाणारे मजूर, गुत्तेदार आणि
ठे केदारांच्या शोषणाला बळी पडलेले कामगार. रोजगार
हमीच्या योजनेवर अल्प मोबदल्यात राबणारे मजूर, खडी
कामगार इत्यादींच्या अभावग्रस्त जगण्याला, त्यांच्या
वाटय़ाला येणाऱ्या जीवघेण्या संघर्षाला आसाराम लोमटे यांनी
तिसऱ्या विभागातील लेखांमधून वाचा फोडली आहे. ‘‘मजूर
की मजबूर?'' या लेखातून ऊसतोड कामगारांच्या
हालापेष्टांच े संकीर्तन मांडतांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर
उभे राहणारे प्रश्नचिन्ह व करपून जाणाऱ्या बालपणाच्या
सूक्ष्म नोंदी सापडतात. जगण्यासाठी वर्षानुवर्षे स्थलांतर
ज्यांच्या मानगुटीवर ठाम होऊन बसले आहे अशा स्थलांतरित
समाजाच्या विसकटलेल्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा
हिशोब मांडतो. रखरखत्या उन्हात पोटासाठी खपणाऱ्या
मजूर कामगारांच्या दरिद्री जगण्याची दाहकता ‘‘ज्यांचे घर
उन्हात!'' या लेखातून चर्चिली आहे. शेतकऱ्यांच्या
आत्महत्या हा समकाळातला ज्वलंत प्रश्न म्हणून पुढे आला.
या आकडेवारीत दररोज भर पडताना दिसते. भरीस भर
म्हणून आता मजूर व कामगारही आपले जीवन संपवू लागले
आहेत. ‘‘शेवट नसलेली गोष्ट'' या लेखातून मजुरांच्या
आत्महत्या आणि त्याला कारणीभूत असलेल्या कारणांची
चर्चा आसाराम लोमटे यांनी केली आहे. रोजगार हमी या
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 89
शासकीय योजनेत काम करून त्या कामाचा मोबदला
मिळाला नाही, शिवाय आपल्या कष्टाचे मूल्य मिळावे म्हणून
हरत-हेचा संघर्ष करूनही हाती काहीच लागले नाही म्हणून
बुलडाणा जिल्ह्यातील पाच मजुरांनी स्वतःला संपवल्याची
बाब पुढे आली. वस्तुतः या मजुरांनी आत्महत्या केलेल्या
असल्या तरी त्यांना सर्वस्वी जबाबदार शासनाची अनास्थावादी
धोरणे आणि इथे बोकाळलेला असुरी भ्रष्टाचार आहे हे
दृष्टीआड करून चालणारे नाही. वस्तुतः या आत्महत्या
नसून हत्या असल्याचा निर्वाळा या लेखातून मिळतो.
‘‘घामाला सुगंध असतो?'' अशा प्रश्नार्थक वाक्याच्या
लेखात श्रमाला प्रतिष्ठेची लेबलं चढवणाऱ्या प्रचलित
व्यवस्थेने रूढ केलेली न्यायाची परिभाषा व आदर्शवादी
धारणांची मूलभूमी किती भुसभुशीत आणि कष्टकऱ्यांच्या
काबाडकष्टाचा संकोच करणारी आहे याची प्रचिती प्रस्तुत
लेखातून येते. उच्चभ्रू समाजाने राबणाऱ्यांच्या कष्टाला
वेगवेगळ्या परिकल्पनांमध्ये गुंफून त्यांच्या कष्टाचे
गौरवीकरण केले आहे. कष्टाला निरनिराळ्या सौंदर्यवादी
परिभाषेत गुंफून वस्तुस्थितीच्या विश्लेषणाचे पर्याप्त मार्गच
बंद करणाऱ्यांच्या धूर्त परिभाषेचा आदर्शवादी कांगावा लोमटे
यांनी उघड पाडला आहे. ते म्हणतात, ‘‘ज्यांना राबायचे
नाही तेही घाम गाळतात पण हा घाम वेगळा. त्यांचे घाम
गाळणे कोणी वापरून घेत नाही, हेही घामाने निथळतात पण
त्यावर त्यांचे पोट अवलंबन ू नाही. उष्मांक जाळण्यासाठी
घाम गाळणे आणि पोट जाळण्यासाठी घाम गाळणे यात मोठे
अंतर आहेच पण दोहोंत पूर्वापार संघर्षही आहे. तो संघर्ष
समजून घेतला तर ‘घामाला सुगंध असतो' असे म्हणण्याचा
भाबडेपणा कुणी करणार नाही.'' कष्ट करणाऱ्यांचा उदोउदो
करून त्यांचे शोषण करत राहण्याच्या इथल्या कूट
धारणांमागील सत्य समोर आणले आहे. सत्ताधीश आणि
सामान्य, सधन आणि निर्धन, व्यवस्थेचे म्होरके आणि
तळपातळीवरील कंगाल मजुरांना खाव्या लागणाऱ्या खस्ता
आणि प्रशासकीय व्यवस्थेपुढील त्यांच्या हतबलतेच े संदर्भ
मूळाबर उलगडून दाखवणारे हे चिंतनसूत्र भूमिगत वास्तवाचा
90 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
पाठपुरावा करते.
‘‘उन्हातल्या पूर्वजांचे सावलीतले वारस...'' या लेखात
आपल्या मुलांची आयुष्यभर ढोरकष्टात कुतरतोढ होऊ नये,
आपली हयात राबण्यात गेली तशी आपल्या मुलांची जाऊ
नये असे वाटणाऱ्या शेतकऱ्यांनी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात
आणून सोडले. पदरमोड करून, खस्ता खाऊन मुलांना
शिकविले, पण शिकून मोठय़ा पदांवर गेलले ्या शेतकऱ्यांच्या
मुलांनी मात्र आपली कष्टकऱ्यांची पूर्वपरं परा सपशेल
विसरून ‘स्व' बांधवांनाच लुबाडण्याचा चंग बांधला; या
वास्तवाकडे लक्ष वेधले आहे. कष्टकऱ्यांच्या घरातून शिकून
मोठे झालेल्यांचा करं टेपणा, व्यवस्थेचे दलाल होऊन
आपल्याच भाऊबंदांना लुटणाऱ्यांचा भ्रष्ट चेहरा या लेखनातून
उजागर केला आहे. कृषिसंस्कृ तीत बैलाला महत्त्वाचे स्थान
असून त्याच्या कष्टाची उतराई म्हणून बैलपोळ्यालाही अनन्य
महत्त्व राहिलेले आहे, पण आधुनिकीकरणाच्या वेगवान
काळात, बदलत्या यांत्रिकीरणाच्या पार्श्व भूमीवर शेती
कसण्यासाठी बैलांची गरज राहिली नाही. पारं परिक पद्धतीने
शेती कसण्याच्या पद्धती बाद ठरत गेल्या आणि बैल
सांभाळणे वरचेवर अवघड होत गेल.े पण ‘‘बैलाची माती...
मातीचे बैल...'' या रूपकात्मक पद्धतीने लिहिलेल्या
लेखातून बदलत जाणाऱ्या सामाजिक परिस्थितीबरोबरच
मानवी वृत्ती-प्रवृत्तीची सांगोपांग चर्चा केली आहे. बैलांच्या
अनुषंगाने समाजमनात ठाम होऊन बसलेल्या मनोधारणांचाही
मागोवा घेतला आहे. आज खरेखुरे बैल दिसत नाहीत पण
आपला शेतीची असलेला आदिबंध जपण्याच्या असोशीतून
बैलपोळ्याला मातीच्या बैलाची पूजा करण्याचा प्रघात रूढ
होत आहे याकडे लेखक लक्ष वेधतात. दष्काळामु ु ळे केवळ
शेतकरी मोडून पडत नाही तर त्याच्या दावणीला असलेल्या
जित्राबाच्या जिवावरही दष्काळु उठतो. ‘‘मुकी बिचारी'' या
लेखातून दष्काळात
ु चारापाण्याअभावी खंगत चाललेल्या
मुक्या गुराढोरांचे हाल आणि शेतकऱ्यांच्या जनावरांशी
असलेल्या ऋणानुबंधाला चिंतनपटावर आणले आहे. दष्काळ ु
पडला की शेतकऱ्यांना गुरांचे होणारे हाल पाहवत नाहीत
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 91
अन् ही जनावरं खाटकाला विकायचे पातक त्यांच्याकडून
होत नाही, अशा वेळी दलाल शेतकऱ्यांना फसवून कमी
भावात जनावरं घेतात आणि या मुक्या जनावरांची रवानगी
खाटिकखान्यात होते. शेतकऱ्यांच्या विरोधी जाणारी परिस्थिती
या लेखाचे अंतःसूत्र आहे.
ll५ll
चौथ्या विभागात एकून तीन लेखांचा समावेश असून
त्यापैकी ‘‘असला नवरा नको गं बाई'', हा लेख आजच्या
गावपातळीवरील एका ज्वलंत समस्येकडे बोट दाखवतो.
खरे तर शहरातल्या मुली शेतकऱ्यांच्या मुलांशी संसार
थाटत नाही हे सिद्ध झालेले तथ्य आहे, पण आजघडीला
खेडय़ातील मुलींनाही शेतकरी नवरा नको आहे. शेतकीचे
कष्टप्रद जगणे आणि आयुष्यभराचा भोगवटा नाकारण्याकडे
खेडय़ातल्या मुलींचाही कल वाढला आहे. बेभरवशाची
शेतीव्यवस्था आणि कष्टाचा शिणवटा नको असणाऱ्यांना
शहरी नवरा आणि मासिक वेतनाचे सुख खुणावत आहे.
यातून शेतात राबणाऱ्या शेतकरी मुलांची लग्नं होत नाहीत
हे नागडे सत्य या लेखातून ठळक होते. स्त्री म्हणजे कष्ट
असे समीकरण बनलेले असताना ‘‘पोरी पळत आहेत
रानातून...'' या लेखाने बदलत्या काळ परिवेषाच्या
पार्श्व भूमीवर गावखेडय़ातील मुलींच्या शिक्षणाच्या वाढत्या
प्रमाणाचे चित्र रं गवण्याबरोबर मुलीच्या विस्तारणाऱ्या
भावविश्वाला मनस्वी शब्द दिला आहे.
‘‘झेपावणाऱ्या ठिणग्या'' हा लेख गावपातळीवरील
लढवय्या स्त्रियांची कर्तबगारी अधोरेखित करतो, तसेच
दसरीकडे
ु बदललेल्या कायद्याने स्त्रियांना प्रशासनात स्थान
तर मिळाले, पंचायतराज व्यवस्थेत ती स्थिरावली पण
निर्णयप्रक्रियेपासून मात्र जाणीवपूर्वक तिला अलिप्त ठे वले
गेल.े ती केवळ एक कठपुतळी म्हणूनच सत्ताकें द्रात
वावरताना दिसते. सहीची धनी असलेली स्त्री पॅसिव्हच
राहिली या वास्तवाकडेही लक्ष वेधतो. ग्रामीण भागातल्या
स्त्रियांचे परिस्थितीशरण जगणे आणि त्यांच्या भावविश्वाचे
92 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
अलक्षित कंगोरे उलगडून दाखवले आहेत. शहरी सुशिक्षित
स्त्रियांचे सुखभरे जगणे आणि गावखेडय़ातील कष्टकरी
समाजातील स्त्रियांच्या जगण्यामध्ये महदंतर आहे.
गावखेडय़ातील बायकांचे जगणे कष्टाशी कायम बांधले
गेलल े े आहे. परावलंबनाने जखडून टाकणारे, नैसर्गिक
जगणे हरवून बसलेल्या स्त्रिया प्रत्येक स्तरात, वयोगटात
आढळतात. पुरुषसत्ताक व्यवस्थेत तिचे असलेले गौणत्व
आणि परं परेने त्यांच्यावर लादलेल्या दैववादी धारणांमध्येच
स्त्रिया अडकून पडलेल्या आहेत. त्यांचे भावविश्व, आकांक्षा,
सुखकल्पना पुरुषप्रधान व्यवस्थेत आणि परिस्थितीच्या रेटय़ात
चक्काचूर होतात याच्या सूक्ष्म नोंदी वरील लेखांमधून
सापडतात.
ll६ll
पाचव्या विभागात एकूण सहा लेख असून त्यापैकी
‘‘ढगांचा गडगडाट आणि वांझोटे आभाळ'' हा लेख वगळता
इतर पाच लेख इथे सातत्याने पडणारे दष्काळ,
ु दष्काळामु
ु ळे
सामान्यजनांचे होणारे हाल, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा,
जनावरांवर ओढावणारे संकट, इकडूनतिकडून पिक आले
तर अनपेक्षित गारपिटीशी पडणारी गाठ आणि एकंदरीतच
अस्मानी-सुल्तानीच्या छळकपटाने गांजलेल्या ग्रामीण
समाजाच्या अनेकमितीय वास्तव संदर्भांना चिंतनपटावर
आणतात. ‘‘...अशी राहावी तहान'' या लेखातून शासनाच्या
धोरण लकव्यामुळे दरवर्षी निर्माण होणारी पाणीटंचाई आणि
सामान्यांच्या ताटातले राज्यकर्त्यांच्या ओरबाडण्याच्या
प्रवृत्तीवर प्रकाश पडतो. ‘‘बरी या दष्काळे
ु पीडा गेली'' हा
लेख दष्काळीु परिस्थितीतील सामान्यलोकांचे गलितगात्र
जगणे आणि दष्काळात ु शासकीय, राजकीय पातळीवर
चालणारे अभ्यासदौरे, पाहणी, दष्काळनिवारण
ु कार्यक्रमाचे
देखावे, बेगडी आस्था मनावर ठसवू पाहाणाऱ्या राजकीय
नेत्यांच्या भेटीगाठीचे फार्स आणि त्यामागील वास्तव
कारणांचा शोध घेताना आसाराम लोमटे महत्त्वाचे निरीक्षण
नोंदवतात. ते म्हणतात, ‘‘दष्काळ
ु नेहमीच येतो, ‘सिंहस्थ',
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 93
‘कं ु भमेळा' ही जशी पर्वणी तशीच आता दष्काळही ु एक
पर्वणी ठरू पाहातोय. दष्काळ
ु ‘पाहाणे' हाच मोठा ‘इव्हेंट'
ठरू लागला आहे. प्रचंड लवाजम्यासह, माध्यमांच्या
प्रतिनिधींसह आणि कॅमेऱ्याच्या लखलखाटात हे दष्काळी ु
पर्यटन चाललेले असते. या पर्यटनात दष्काळनिर्मूलनाच्या
ु
उपाययोजनांबाबतचे गांभीर्य किती आणि दिखावा किती
यातल्या सीमारेषाच नष्ट झाल्या आहेत. कुठलाही गाजावाजा
न करता, फारसा डामडौल न दाखवता काही तरी उपाय
सातत्यपूर्ण आणि नियोजनातून केले जात आहेत हे चित्र
कधीच दिसत नाही. त्यामुळे दष्काळ ु ‘साजरा' करणे हीच
एक गोष्ट आता सर्वांच्या अंगवळणी पडली आहे.'' या
दष्काळनिवारणाच्या
ु दिखावू कार्यक्रमाच्या आड दर्लक्षित
ु
राहणारे सामान्यांचे वास्तव जगणे आणि त्यांच्या पुढय़ात उभे
राहणारे प्रश्न अनुत्तरितच राहतात. शिवाय दष्काळ ु
निवारणाच्या नावाखाली होणारा भ्रष्टाचार कुणालाच थांबवता
येत नाही. दष्काळग्रस्त
ु लोकांच्या दारापर्यंत सरकारी योजना
पोहाेचत नाहीत तर त्या राजकीय लोकांकडे वळत्या केल्या
जातात. रोजगार हमीतील भ्रष्टाचार गुरांसाठीची चाराछावणी,
पाणी टँ करमागील लॉबी आदींवरही या लेखातून प्रकाश
पडतो. तोंडी आलेला घास ओरबाडून नेणारे अस्मानी संकट
‘‘आभाळानेच झोपेत धोंडा घातल्यावर..'' या लेखातून
चर्चिले आहे. गारपीटग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि बटईदार
यांच्या परिस्थितीवर भाष्य करताना सरकारी पंचनामा आणि
तुटपुंज्या आपत्तीनिवारणातील ठोकताळे वाचकांसमोर ठे वतो.
अलीकडे नैसर्गिक वातावरणात अामूलाग्र बदल झाले असून
त्याचा फटका शेती आणि शेतीवर विसंबून असलेल्यांना
बसत आहे. एवढेच नाहीतर खेडेगावातील दैनंदिन व्यवहार
कमालीचे गुंतागुंतीचे बनत चालले आहेत.पावसाचा
लहरीपणा आणि शेतकरी, कष्टकऱ्यांच्या दयनीय अवस्थेला
‘‘अंगावर येणारा कोरडय़ा आभाळाचा चांदवा'' या लेखातून
मुखर केले आहे. एकापाठोपाठ एक नक्षत्रे कोरडी जाऊ
लागली तर शेतकऱ्यांनी जमिनीत काय पेरावे हा प्रश्न उभा
राहतो. धूळपेर साधेलच याची शाश्वती नाही. सर्वबाजूंनी
94 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
परिस्थितीच्या कचाटय़ात अडकलेला शेतकरी प्रस्तुत
लेखातून उभा राहतो. शेतकरी आणि विठ्ठलाचे एक सुहृदयी
नाते राहिलेले आहे. आषाढ महिन्यात पंढरपूरच्या वारीची
आस शेतकऱ्यांना लागलेली असते. आपल्या इष्टदेवाला
भेटण्यासाठी प्रत्येक जण आसुसलेला असतो. दरवर्षी ही
वारी आनंददायी असतेच असे नाही. कारण मातीत बीज
रुजविण्यासारखा पाऊस पडला तर वारीत आत्मिक ऊर्जेसह
सामील होणारा शेतकरी पाहावयास मिळतो. पण आषाढ
कोरडा गेला तर मग वारीत मन लागत नाही. उदासपणे जड
अंतःकरणाने वारीत पावसाची आस मनी धरत शेतकरी
चालत राहतो. कष्टाचा शिणवटा घालवण्यासाठी, रोजच्या
जगण्यातली व्येवधानं विसरण्यासाठी, जीवघेण्या प्रपंचातून
क्षणभर विसावा मिळविण्यासाठी पंढरपुरच्या दिशेने वळलेल्या
असंख्य माणसांच्या भावस्थितीचा अन्वयार्थ लावणारा ‘थरारू
दे वीट!' हा लेख वाचकांच्या मनाचा ताबा घेतो.
ll७ll
‘धूळपेर'मधील पाचव्या विभागातील ‘ढगांचा गडगडाट
आणि वांझोटे आभाळ' हा लेख आणि सहाव्या विभागातील
चारही लेख समकालीन राजकीय परिस्थितीवर आणि
समाजाला आंतर्बाह्य कुरतडणाऱ्या राजकारणावर टोकदार
भाष्य करतात. विशेषतः मागील दशकभरापासून ग्रामीण
समाजात राजकारणाला नवे रं ग चढलेले पाहावयास
मिळतात. राजकीय पक्ष-संघटनांनी खेडोपाडी पाय रोवून
गावपातळीवरील राजकारणाला कमालीचा द्वेषभावनेवर
आधारलेला टोकदारपणा प्राप्त करून दिला. सत्तांधांच्या
सत्तास्पर्धेने गावपातळीवर सौहार्दाचे वातावरण गढूळ करून
टाकले. समाजकारण व विकासकारणाचे अंग वगळता
धार्मिक, जातीयतेवर आधारलेली हीणकस समीकरणे
गावखेडय़ात रूढ केली. तडजोडींवर तरं गणारे सत्तेचे
राजकारण सद्यकाळात चर्चेचा विषय झालेले दिसते.
राजकारणातून समाजकारण हद्दपार झाले असून केवळ
हितसंबंधाचे चिंगम चघळणाऱ्या नतद्रष्ट लोकांची बजबजपुरी
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 95
मात्र सर्वत्र माजली आहे. जनतेच्या प्रश्नांशी काडीचेही
घेणदे ेणे नसणारेच सत्तेच्या उबदार गादीवर पाय पसरून
बसलेले असतात. ‘ढगांचा गडगडाट आणि वांझोटे आभाळ'
या लेखामधून गावपातळीवरील हिणकस राजकारण आणि
नित्याने येणाऱ्या निवडणुकांच्या वास्तवनोंदी घेतल्या आहेत.
गावपातळीवरील वस्तुस्थिती फारच गुंतागुंतीची झाली आहे.
आजचा गाव राजकारणाने पुरता पोखरून टाकला आहे.
निवडणुकांपर्वीू सामान्य माणसांच्या तोंडावर आश्वासनांची
जी पळसपानं पुसली जातात, सुजलाम सुफलामच्या योजनांची
जी फसवी स्वप्नं डोळ्यांत पेरली जातात पण वास्तविक ते
प्रत्यक्षात कधीच उतरत नाहीत याकडे लोमटे लक्ष वेधतात.
‘सत्तेचे रं ग-रूप', ‘हा पान्हा कधी आटेल?', ‘रयत आणि
(आजचे) राजे!', ‘आखाडय़ातली आणि फडातली भाषा' या
लेखांमधून समकाळ कवेत घेताना सामाजिक परिघाला
पोखरणाऱ्या राजकीय पर्यावरणाचे चित्र लोमटे यांनी रेखाटले
आहे. "हा पान्हा कधी आटेल" या लेखातून ग्रामीण भागातील
राजकारणाचा पट मांडताना कालौघात ठाम होत गेलले ्या
सामाजिक ध् रुवीकरणाच्या राजकारण्यांच्या रणनीतीला
अलगद चिमटीत पकडले आहे. राजकारणाला नवी टोकदार
भाषा चिकटली पण समाजविकासाचा रकाना मात्र दर्लक्षितच ु
राहिला याबाबतची तथ्ये या लेखातून मांडली आहेत. ‘रयत
आणि (आजचे) राजे' हा लेख ग्रामीण महाराष्ट्रातील
राजकारणावर आणि भूतकालीन अस्मितांच्या नावाने सत्तेचे
गड अबाधित ठे वू पाहाणाऱ्या सरं जामी वृत्तीवर नेमके बोट
ठे वते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्ताबाजारात
फायद्याचे खाते गळ्यात पाडून घेणारे जनतेच े हरत-हेने
शोषण करताना दिसतात. निवडणुकांच्या तोंडावर सामान्यांचे
उं बरठे झिजवणारे सत्ता हातात पडली की जनतेकडे
सोयीस्करपणे पाठ फिरवतात; हे वास्तव या लेखातून
अधोरेखित होते. राजकारणात वापरली जाणारी विशिष्ट
भाषा आणि त्या भाषेमागे उभ्या असलेल्या समाजमानसशास्त्राचा
उलगडा ‘आखाडय़ातली आणि फडातली भाषा' या लेखातून
सूक्ष्मपणे केला आहे. राजकारणात आखले जाणारे डाव-
96 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
प्रतिडाव, कुरघोडी, कार्यकर्त्यांना ऊर्जा पुरवणारे घोषवाक्य,
सांकेतिकता, धमकी, चिथावणी, समयोचितपणे वापरल्या
जाणाऱ्या म्हणी, वाक्प्रचार या भाषेमधून डोकावणाऱ्या
वृत्तीप्रवृत्तीला हा लेख उजागर करतो. एकंदरीत लेखकाने
या लेखातून राजकीय बोलीभूगोल डोळ्यांसमोर साक्षात उभा
केला आहे.
ll८ll
सातव्या विभागात एकूण अकरा लेखांचा समावेश असून
समकाळाच्या पार्श्व भूमीवर सामाजिक मूल्यांची होणारी
पडझड, धारणा, अवधारणा, वैयक्तिक मूल्यांचा सामाजिक
अवकाश, व्यक्तीचे सामाजिक भानाचा पोत तपासणारे आणि
एकंदरीतच विचार करण्याच्या व जगण्याच्या विविध तऱ्हा
समजून घेणारे हे लेख आहेत. भौतिक सुखाच्या मागे वाहवत
जाणारा समाज, आत्मकें द्रित वृत्तीच े वाढते प्रस्थ, वेगाने वाह ू
लागलेले स्वार्थाचे दषित
ू वारे, त्याची अनियंत्रित दिशा आणि
यात सामान्य, वंचित, उपेक्षितांची व मानवतावादी तत्त्वांवर
चालणाऱ्यांची होणारी दमछाक याचे तटस्थ चिंतन मांडले
आहे. ‘नाद नाय करायचा' या लेखातून हरवत चाललेली
मानवी संवेदनशीलता आणि त्यातूनच जगण्यात वाढत
जाणारी चाकोरीबद्धता याचे चिंतन मांडले आहे. फेसबुक,
व्हॉट्सअपसारख्या नव्या माध्यमांमळ ु े सामाजिक जाणिवेला
कृतीची पालवी फुटावी अशी एक अपेक्षा होती पण उलटपक्षी
जगणे सवंग होत गेल.े संवाद दर्मीळ
ु होत जाऊन आत्मलुब्धता
ठळक होत गेली. सोयीचे तेवढेच पाहायचे हा जणू शिरस्ताच
बनला. सद्यकाळातल्या या आत्ममग्नतेवर भाष्य करणारा हा
महत्त्वपूर्ण लेख आहे.
काळ जसजसा बदलत गेला तसतशा समाजाच्या वृत्ती
आकंच ु न पावू लागल्या. आत्मविकासाचा मार्ग प्रशस्त बनत
गेला. विधायक गोष्टींसाठी प्रचलित असलेली मूल्यात्मक
भाषा आणि भाषातत्त्वांना दिखाऊपणाची बाधा झाली. हे
वर्तमान समाजाचे चित्र ‘सामाजिक बांधिलकीच्या नावाने...'
या लेखातून प्रकटते.. ‘गंगाखेड लुटणे आणि गंगेवर वाटणे'
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 97
अशी एक म्हण प्रचलित आहे. या म्हणीचा प्रत्यय प्रस्तुत
लेख वाचताना येतो. समाजात वावरताना अनेक लोक याच
तत्त्वाचा आधार घेताना दिसतात. समाजातूनच लुटलेली,
ओरबाडलेली धनमाया वाजतगाजत समाजात वाटत फिरतात,
वरतून सामाजिक बांधिलकीचा फेटा घालून मिरवतात. हा
लेख माणसांचे सार्वजनिक जीवनातले वर्तन आणि प्रत्यक्ष
कृतीतील तफावत उजागर करतो. ‘गर्दीत हरवली वाट...'
हा लेख सत्त्व हरवत चाललेल्या वर्तमानाची नाडी तपासतो.
दिलेल्या शब्दाला पाळणारे इमानी आणि स्वाभिमानी लोक
सद्यकाळात पाहावयास मिळत नाहीत. खरे बोलणारांचे तोंड
बंद केले जाते. शब्दाला जागणारा इथे टिंगलीचा विषय
ठरविला जातो, तर इतरांना बरे वाटेल असे बोलणाऱ्यांना
येथील समाज डोक्यावर घेऊन नाचतो. खरे बोलण्यापेक्षा
बरे बोलणारे दिवसेंदिवस वाढत चाललेत. पत म्हणून दिल्या
जाणाऱ्या शब्दांना चिकटलेले विश्वासार्हता हे मूल्य मलिन
झाले आहे. हितसंबंधाने माखलेली समूहाची भाषा आणि
बाजारू चलनी भाषा वरचढ ठरत असून ‘बोले तैसा चाले
त्याची वंदावी पाउले' हे वचन या बाजारी दनिये ु ने मोडीत
काढले आहे. तडजोडवादी सामाजिक पर्यावरणात स्वत्व
आणि सत्त्व जपू पाहणाऱ्यांना हा काळ विरोधी जाणारा आहे.
प्रस्तुत लेख वचन आणि वर्तन यातल्या विसंगतीला कोट
करतो. ‘अजातशत्रूंची वस्ती वाढत आहे..' मला काय त्याचे
अशी एक प्रवृत्ती समाजात वाढत चालली आहे. तटस्थ
असणे वेगळे आणि तटस्थतेच्या आड नामानिराळे असणे
वेगळे. कोषधारी मानसिकता कुठलीही सामाजिक जबाबदारी
पार पाडू शकत नाही, तथापि विधायक वा विघातक दृश्य
वास्तवासंदर्भात कुठलीही ठाम भूमिका वठवित नाही. अशा
बघ्या लोकांमळ ु े समाज मानवी सौहार्दाला पारखा होत आहे.
समाजात वाढत चाललेल्या कातडीबचावू लोकांच्या
मानसिकतेला प्रस्तुत लेखातून चिमटे काढले आहेत.
चळवळींना मूल्यात्मक चेहरा आणि विधायक दिशा देणाऱ्या
भाषेच े सामर्थ्य ‘आवाज कुणाचा' या लेखातून अधोरेखित
केले आहे. जनचळवळींना गतिमान बनवणारी, लोकमानसाला
98 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
जागृत करणारी भाषा सामाजिक उत्थानासाठी प्रेरकच ठरते
पण अलीकडे ही चळवळीची भाषा बोथट झाली असून
व्यवस्थेशी हात मिळवणारे वाढत चालले आहेत. तडजोडीवर
आधारलेल्या, हितसंबंध जोपासणाऱ्या चळवळी तेवढय़ाच
शिल्लक उरल्या आहेत ही खंतही या लेखातून व्यक्त झाली
आहे.
‘सत्वाचे शब्द' आणि ‘आस्थेचा परीघ' हे लेख
कलावंताच्या आतल्या आवाजाला आवाहन करतात. सुंदर
जगाचे स्वप्न पाहनू तशी प्रतिसृष्टी उभा करू पाहणारा
कलावंत जगाच्या दःखवे ु दनांचा वाहक असतो, तरीही तो
आपल्या आतल्या अपेक्षित जगाशी संवादी असतो. त्याला
वेळोवेळी आपले सत्त्व आणि स्वत्व तपासून घ्यावे लागते.
सम्यक दृष्टी आणि भूमिकेवरील निष्ठा हे त्याचे वेगळेपण
जनमानसाच्या मनावर ठसत असते, म्हणून कलावंताने
आपली जबाबदारी ओळखून भोवतालाचे यथातथ्य वास्तव
टिपून घ्यावे अशी अपेक्षा असते. आपल्या अनुभवांशी
एकनिष्ठ राहनू निर्मिती करणारा कलावंत समाजालाही
प्रेरकच ठरतो. ज्यांचा आवाज क्षीण आहे वा ज्यांचे हंदु के
बहिऱ्या व्यवस्थेपर्यंत पोचतच नाहीत अशा वेळी लेखक,
कवींनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून या वंचित,
पीडितांच्या अभावग्रस्त जगण्याशी स्वतःला जोडून घ्यावे.
आपले हस्तक्षेपाचे विधान व्यवस्थेच्या नाही तर मुक्यांच्या
बाजूने वापरावे. तथापि हा आस्थाभाव कोता, तात्कालिक
फायद्यांवर आधारलेला असू नये तर संवेदनेने तो शोषितांच्या
हक्कासाठी कृतिप्रवण असावा असे लेखक प्रस्तुत लेखातून
सुचवत आहेत. व्यवस्थेबाबतीत आणि लेखकाच्या
भूमिकेसंदर्भात आसाराम लोमटे महत्त्वाचे मत नोंदवतात.
‘व्यवस्था इतकी चतुर आणि तडजोडीच्या तत्त्वावर उभी
असते की, तिथे असा वेगळा शब्द उमटूच नये याची
खबरदारी घेतली जाते. व्यवस्थेला प्रश्न विचारणारे नको
असतात, हस्तक्षेप करणारे नको असतात, प्रतिवादी नको
असतात. व्यवस्थेत धडपडून उठू पाहणारा, वेगळे काही
सांगू पाहणारा बरोबर नेम धरून टिपला जातो. अशा वेळी
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 99
तळाच्या माणसाबद्दल बोलण्याची जोखीम उचलली पाहिजे,
हस्तक्षेपाचा शब्द उच्चारला गेला पाहिजे. तळाची वेदना
शब्दांत आली पाहिजे. आपण जे बोलू ते केवळ ‘मोले
घातले रडाया' असे नको, तर ज्याबद्दल बोलू त्याबद्दलची
जिवंत आस्था असली पाहिजे.' सामान्यांची बाजू घेऊन
बोलणे-लिहिणे हेच कवी, लेखकांचे कर्तव्य असल्याचे वरील
अवतरणातून सूचित होते.
एखाद्या विशिष्ट गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन रूढावला
की बाकीचे डोळ्यांवर पट्टी बांधून आंधळेपणाने त्याच
मळवाटे वरून चालत राहणार. नव्या परिवर्तनवादी गोष्टींकडे,
वेगळ्या बाबींकडे स्वागतशीलपणे पाहण्याची दृष्टी गमावलेला
समाज आपले गुणदोष पाह ू शकत नाही. तो गतकाळातल्या
गौरवपूर्ण (?) बाबींना कुरवाळीत बसतो. ‘मळवाटा
नाकारताना' ह्या लेखातून आसाराम लोमटे समाजाच्या
पूर्वग्रहदषित
ू रूढीवादी चश्म्यावर साचलेली धूळ पुसनू
काढतात. जुन्या व्यवस्थेबाबतीतले अंधप्रेम व नव्या बाबींना
ठरवून मोडीत काढणाऱ्या मानसिकतेवर बोट ठे वतात.
खेडय़ांच्या उद्ध्वस्तीकरणाला आधुनिकीकरण कारणीभूत
आहे असा समज (गैर) करून समाज आत्मपरीक्षणापासून
सतत दरू पळत आला आहे. सतत दसऱ्यांवर ु खापर फोडून
स्वतः मात्र पळपुटेपणा करणारा समाज भोवतालात पसरला
आहे. शिवाय याच व्यवस्थेत परं परेने रुळलेल्या शोषणादी
व्यवस्थाप्रणित गोष्टींचा पुरस्कार करत आणलेल्या हिणकस
बाबींकडे आसाराम लोमटे लक्ष वेधतात. ग्रामीण खेडय़ाचे
विकृत आणि पूर्वग्रहाधारित चित्र निर्माण करण्यासाठी
ग्रामपातळीवरील समाजच नाही; तर लिहिणारे लेखकही
कारणीभूत आहेत, अशी स्पष्ट भूमिका लोमटे यांनी घेतली
घेतली आहे आणि ती वस्तुस्थितीला धरूनच आहे. साहित्यातून
गावखेडय़ाचे व तेथील समाजाच्या परस्परसंबंधाचे चित्र कसे
चुकीच्या पद्धतीने रेखाटले जाते याकडे निर्देश करताना
लोमटे म्हणतात ‘शेतकऱ्यांचे जगणे चित्रित करणाऱ्या
लेखनात शेतमजुराविषयीची अनास्था आणि शेतमजुरांच्या
जगण्याची व्यथा सांगणाऱ्या साहित्यात शेतकरी येतो तो
100 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
खलनायक म्हणून. वास्तवाच्या पातळीवर दोघेही शोषितच,
पण साहित्यात मात्र एकमेकांचे शत्रू. गावातल्या चार-दोन
धनदांडग्यांचा अपवाद वगळला तर बाकी सगळे एकाच
रेषेत जगतात, पण आपल्याकडे लेखक ज्या समूहातून येतो
तो त्याच समूहाची भाषा बोलतो. सगळ्या प्रकारची वर्गवारी
टाळून वास्तवाला भिडण्याचे प्रयत्न अपवादानेच घडतात.
आपल्या आस्था फक्त आपल्याच समूहाशी बांधलेल्या असणे
हे लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्याच्या साहित्याचाही
संकोच करणारे आहे.' पण दर्दैु व असे की या वास्तवाकडे
नितळपणे पाहण्याची निकोप दृष्टी विकसित होऊ शकलेली
नाही. ‘जमिनीला कान लावण्याची गोष्ट...' हा लेखही
लेखकाच्या आदिम प्रतिमेला आवाहन करणारा आहे. लेखक,
कवींनी अभावग्रस्तांच्या क्षीण आवाजाला, त्यांच्या उपेक्षित
हंदु क्यांना उजागर करण्याची निकड प्रतिपादित करणारा हा
लेख आहे. ‘या उजेडात थोडी आग असती तर...' या
लेखात सामान्य कष्टकरी माणसांकडे जन्मजात असलेल्या
प्रतिभेचा, आणि निर्मितीक्षम कलागुणांचा जागर मांडला
आहे. या लेखातून सामान्यांच्या जगण्यात विरघळून गेलले ्या
कलागुणांची आणि कौशल्याची दखल पुरेशा वृत्तीगांभीर्याने
शासन स्तरावर घेतली जात नाही याविषयीची खंतही व्यक्त
केली आहे. याच विभागातील शेवटचा लेख ‘भाषा ः
व्याकरणाची आणि अंतःकरणाची" हा काव्यात्म लेख आहे.
माणूस जगला तर माणसाची भाषाही जगेल, ती भाषा
बोलणारा समाज तगला तर त्या समाजाची भाषाही तगेल हे
मध्यवर्ती सूत्र डोळ्यासमोर ठे वनू लिहिलेला हा नितांत सुंदर
असा लेख आहे. भाषेला चिटकलेल्या, चिटकवलेल्या
शिष्ट-अशिष्ट धारणा, भाषेचा संकोच करणारे इथले
शिष्टसंमत कायदेकानून, भाषेला जखडून टाकणारे, बंदिस्त
करू पाहाणारे पंडिती नीतिनियम, भाषेशी बांधले गेलल े े
मानवी व्यवहार आणि तिची चकित करणारी अनेक रूपे-
प्रारूपे नोंदवताना या सगळ्यात महत्त्वाची असते ती
अंतःकरणातून अंकुरलेली संवेदनेची भाषा या मताला लोमटे
यांनी चिंतनाच्या कें द्रवर्ती ठिकाणी आणले आहे. समाज,
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 101
संस्कृ ती टिकवायची असेल तर माणसांना सन्मानाने
जगवण्याचा आग्रह आसाराम लोमटे यांनी धरला आहे.
ll९ll
आठवा विभाग केवळ दोन लेखांचा असून समकाळातील
जातव्यवस्थेसंदर्भात विचार प्रकट करणारा आहे. जातिव्यवस्था
ही इथल्या समाजव्यवस्थेतील काळी बाजू राहिलेली आहे.
भारताने विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बळावर धर्मप्रणित रूढ कल्पना
मोडीत काढल्या. पण जातीवर आधारलेली दरी मात्र कमी
होऊ शकली नाही. वाढत जाणारी द्वेषभावनाही कमी करता
आली नाही. बदलत जाणाऱ्या काळात जातअस्मितेला
हितसंबंधावर आधारलेले नवे संदर्भ प्राप्त होत गेल.े
जातीजातीतील कटुता नष्ट झाली नाही; उलट जातवास्तव
अधिक टोकदार आणि नासूर बनत चालले आहे. जातीपातीच्या
आधारावर शोषण चालूच आहे. ‘खैरलांजी ते खर्डा,
निखाऱ्याची वाट...' या लेखात आजच्या जातीवर
आधारलेल्या समाजमानसिकतेतील विकृतीला उजागर
करणारे एक विधानवास्तव लोमटे यांनी लिहिले आहे. हे
विधान भूतकाळ आणि वर्तमानकाळातील जातधारणेच े
बदलते स्वरूप अधोरेखित करते. ते असे, ‘आधी लोक
शिवाशिव करू द्यायचे नाहीत, पण जगू द्यायचे, आता
शिवाशिव करू देतात, पण जगू देत नाहीत' विकासाच्या
कितव्याही मजल्यावर देश पोहोचला असला तरी जातीयतेच े
समूळ उच्चाटन मात्र करता आलेले नाही. उलट सत्ताकारणाच्या
गलिच्छ बाजारात जातीजातींमधील आंतर्विरोध वाढतच
गेलले े दिसतात याकडे लेखकाने निर्देश केला आहे.
मानवी जीवन एक प्रवास आहे असे आपण मानतो, पण
मानवाला स्थिर जीवन जगण्याची आस असते. असे असले
तरी बऱ्याचदा पोटासाठी आपले घर, गाव, परिसर सोडावा
लागतो. बहतु ेक वेळा विकास प्रकल्पांच्या नावानेही
भूमिपुत्रांना सक्तीने विस्थापित केले जाते. गावपातळीवर
वाढती जातीय विषमता आणि जातीय बेबनाव हाही
स्थलांतराला कारक घटक ठरतो. अशा स्थलांतरित,
102 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
विस्थापित, शोषित लोकांच्या मूकवेदनेला हात घालताना
त्यांच्या पुढय़ात परिस्थितीने आणि व्यवस्थेने वाढून ठे वलेल्या
प्रश्नांना उजाळा देणारा ‘गळून पडलेले मोरपिस' हा लेख
विचार करायला भाग पाडतो.
ll१०ll
‘धूळपेर'मधील शेवटच्या विभागात चार लेखांचा
समावेश केला असून हे लेख मानवी जीवनाच्या मानसिक-
भावनिक अंगांना स्पर्श करतात. ‘अंधार...आतला आणि
बाहेरचा', ‘वस्तीला अंधार नको कायमचा' हे लेख
रूपकात्मक असून अंधार आणि उजेड या जगण्याच्या दोन
बाजू आहेत. या दोन ध् रुवावरच आपण जगण्याची धडपड
करीत असतो. अंधार आणि उजेड हा जसा भौतिक
पातळीवरचा असतो तसाच तो मानसिक पातळीवरचाही
असतो. मनाची आणि प्रत्यक्ष जगण्याची काळी आणि उजळ
बाजू अधोरेखित करणाराही असतो. प्रत्येक जण आपल्या
वकुबानुसार जगण्याची धडपड करतो; याच न्यायाने प्रस्तुत
लेख मानवी जगण्याच्या विविध पैलंव ू र प्रकाश टाकतात.
‘उगवणाऱ्या प्रत्येक पहाटे साठी' हा लेख जगण्याच्या
धडपडीचे आणि जीवनपद्धतीचे तत्त्वज्ञान मनबुद्धीत ठसवतो.
गरिबीच्या, गुलामीच्या बेडय़ा माणसाला जखडून टाकतात.
स्वातंत्र्याच्या सगळ्या शक्यता अवरुद्ध होतात. परिस्थिती
विरोधी जाते तेव्हा नैराश्याचे मळभ मनबुद्धीला काळवंडून
टाकते, म्हणून आपले आयुष्य कसे जगायचे आणि कसे
सुंदर बनवायचे हे प्रत्येकाच्या हाती असते. भौतिक परावलंबन
असो वा मानसिक गुलामी दोन्हीही घातकच असतात.
जगण्याप्रतीचा सकारात्मक ध्यास आणि आश्वासकताच
प्रत्येकाला समृद्ध बनवते. नकारात्मक भाव व वास्तवापासून
पलायन करण्याची मनोवृत्ती ध्येयाच्या वाटेतला मोठा अडसर
ठरतो. मानसिक पराभव हा आपल्या स्वप्न, आकांक्षांचाही
गळा घोटतो. कुठल्याही विपरित परिस्थितीवर मात करून
आपणच आपले दार्शनिक होण्याची निकड नोंदवून
जीवनाप्रतीची सकारात्मकता मनात बिंबवणारा हा लेख
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 103
आहे. ‘अक्षरांचा श्रम केला' हा लेख या पुस्तकातील शेवटचा
लेख असून समारोपीय भावना व्यक्त करणारा आहे. या
लेखातून आसाराम लोमटे आपल्यातला माणूस मरू देऊ
नका अशी भावनिक साद घालतात. आपल्यातल्या
माणुसकीला आणि एकूणच मानवी संवेदनेला जागृतीचे
आवाहन करतात.
ll११ll
‘धूळपेर'मधील लेखन खूप तटस्थपणे केलेले आहे. ही
तटस्थता विषयांच्या निवडीपासूनच डोळ्यांत भरते. विशेषतः
ग्रामीण गावगाडय़ातील कष्टकरी समाजाच्या धारणा व
एकंदरीतच कृषिव्यवस्थेच्या परिघात स्वतःला झिजवणाऱ्या
समाजाचे चिंतन लक्षवेधी ठरते. हे चिंतन भूतकाळाच्या
भुयारांचे तळ धुंडाळीत नाही वा इतिहासाचे उत्खननही करीत
नाही. वर्तमानाला छळणाऱ्या समस्यांना हात घालून उपेक्षित
समाजाच्या छळवादाचे स्वरूप नमूद करते. वर्तमानकालीन
जगण्याला समकक्ष असलेल्या नोंदी या समकाळाचे
मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र उलगडून
दाखवतात. लेखकाचा पिंड हा गतकालीन बाबींना
कुरवाळणारा (नॉस्टाल्जिक) व भूतकालीन धारणांचा
पुरस्कार करणारा नाही तर वर्तमान जगण्याला प्रमाण मानून
व्यवहाराच्या पातळीवरील प्रश्नांचा उभा-आडवा छेद मांडू
पाहाणारी लेखकाची वास्तववादी दृष्टी इथे महत्त्वाची ठरली
आहे. विशेषतः कृषिसंस्कृ तीचा आदर्शवादी मुखवटा नाकारून
वर्तमानकालीन वस्तुस्थितीचा ताळेबंद मांडणे या लेखनामागे
प्रधानस्वर राहिलेला आहे. अभावात आपले आयुष्य
संपवणाऱ्या गावखेडय़ातील कष्टकऱ्यांच्या डोळ्यांवर
आदर्शवादी लेबलं चिकटवली गेली. त्यांना वस्तुस्थितीपासून
अलिप्त ठे वन ू सतत त्यांची दिशाभूल केली. अशी दिशाभूल
करणाऱ्या व्यवस्थेची यथायोग्य चिकित्सा लोमटे यांनी केली
आहे. ‘धूळपेर'मधील लेखन समकाळाच्या घुसमटीचे चरित्र
आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. समकाळातले
विविधांगी प्रश्न आणि प्रश्नांनी चहबु ाजूंनी वेढलेला माणूस या
104 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
लेखनाच्या गाभास्थानी एकवटला आहे. अभावग्रस्तांचा
हताश, पराभूत चेहरा जसा या लेखनातून ठळक होत राहतो
तशाच त्यांच्या धडपडीच्या अनेक संघर्षवाटाही या लेखनातून
सूचित होतात. आसाराम लोमटे यांनी निर्माण केलेली ही
वास्तवचित्रे वाचकांना अस्वस्थ करतात तसेच विचारप्रवृत्तही
आसाराम लोमटे
लेखांक : तीन
- माया पंडित
संपर्क : ९९४९४७०४३४
- चित्रा नित्सुरे
- चित्रा नित्सुरे
संपर्क ः ९८१९१९२०८०
सरिता सोमाणी
आधारभूत काव्यसंग्रह
१. परुळेकर, रजनी. १९९३, पुन्हा दीर्घ कविता, डिंपल
पब्लिकेशन, वसई.
२. परुळेकर, रजनी. १९९६, चित्र, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई.
३. शेख, मलिका अमर. २००७, माणूसपणाचं भिंग
बदलल्यावर, लोकवाङ्मय गृह, मुंबई.
४. धुळेकर, नीरजा. १९९४, वेणा, नीलकंठ प्रकाशन, पुण.े
५. लोखंडे, प्रज्ञा.२००२, उत्कट जीवघेण्या धगीवर,
लोकवाङ्मय गृह, मुंबई.
- सरिता सोमाणी
चलभाष -८२७५९४५७९२
saritadarak2050@gmail.com
- दत्तप्रसाद दाभोळकर
संपर्क ः९८२२५०३६५६
36 463 4
34
46
36
आिेत.yeng
अशया -Debसगळ्यया
ieer Deensसु.खयासीन,l³eeb®eerआतममगन
meceer#ee जगयात
l³ee झो् l³ee
. Heeìer
. Heeìer
उडवणयारे
meeef, nसवयास्थ्य
l³eke=Àleerिरवू
®ee नmeKees
्याकणयारे
} JesOकयािी
e Iesles‘सवयास्थ्यियारक’
DeeefCe efle}e
}}
}s Jee®eve
. l³eeb®eer
les DeeefCe ce.meg.Heeìer} ्ुढय़यात³eLees
आले तर v³ee³e
ef®ele कसे वया्े oslलes.?ner meceer#ee DeLe&efveCe&³eve
e&efveCe&³evee
ev
s Jee® ³eee,r
}µeeðeer keÀjleevee meeefnl³eke=Àleer®³ee ceeieCeerHe´ceeCes
...अंतमुमुख करणयारे, कधी आतल्यया आत सवतःलयाच
b®
eR.®eel³eepemee e
eeefC
}les DpeieCese&³eve ceevemeµeeðeer³e, DeeefoyebOeelcekeÀ, ªHeefve<þ
त्यासया्यलया लयावणयारे, सयाचले्णयालया जरया खरवडून
meeefmeeef
e&efveCveeep³ee
ceOet
r³e,Jee
nl³eke=
ee µeesOe
eReeb®®ee eieCes
ÀleeRÀ®leeRes ®Jee®eve
चयांगले efउगवू
Je®eejन ्येkeÀjles
ण्ययासयाठीच.
s}
[} µeesOe . Deµee Yee<esceO³es ceOetve ceOetve p³ee
DeeefDeeef
®eve
ee
Ceeb®
Ce CefveeJe&efv®eJe&eve®eve
on
्ेरणी करतयानया असतो. हि्ययाणे जसे कोरडय़या मयातीत
e
7- 3
DeeefCe efveJe&®eve
80
45n
2 36ha
on 9 38wac
मूल्यः
2 04962
धूळपेर 250
रु््ये
वेदनेची भयाषया समजून घेतली आहण एखयाद्याच्यया दुःखयाची
Am{U {Zd©MZ
गयाज ऐकण्ययासयाठी मनयाची, आ्ल्यया अरमु्ूणमु िसतक्े्याची
[a¨JmU (H$mX§~(लेar)खसंग्रह) (g‘rjm)
त्ययारी ठे वली तरीिी खू् झयाले. संवेदनेच्यया वया्े वरचे आ्ण
H¥$îUmV ImoV सिप्रवयासी आिोत कयारण आ्ल्ययालया ियांधणयारया कयाळ एक
‘.gw.nmQ>rb
‘yë¶ : 220/- आिे... ‘yë¶ … 375 én¶o
www.shabdbooks.com
www.shabdpublication.com आसाराम लोमटे - ‘धूळ्ेर’मधून