Professional Documents
Culture Documents
गोकु ळात काय झाले ? काही वेळाने यशोदा जागी झाली. कु शीत सावळ्या वर्णाचा बालक निद्रिस्त होता.
सुंदर कु रळे जावळ होते. तिला अत्यानंद झाला. पान्हा फु टला. जगदीश जन्माला आला होता ! आणि
योगमायेनेही जिची कन्या म्हणून जन्म घेतला त्या वात्सल्यमूर्ती यशोदेकडून लालनपालन करून घेणार
होता ! सकाळी वार्ता गोकु ळात पसरली. नंदाला तर अत्यानंद झाला, "अहो ! नंदयशोदेला मुलगा झाला
बरं का ?" असे गवळणी एकमेकांना सांगू लागल्या. नवपुत्राच्या पवित्र दर्शनासाठी नंदाच्या दारी गर्दीच
झाली. गर्गमुनी आले. पुण्याहवाचन झाले. मांडव घालून मोठा उत्सव के ला गेला. गवळणी रंगीबेरंगी वस्त्रे
लेवून नटूनथटून मिरवत होत्या. नंदाने वाणे वाटली. अहेर दिले. त्याची तर अनेक जन्मांची पुण्याई
फळाला आली होती. नंदाच्या सावळ्या बाळाला कृ ष्ण, श्यामसुंदर अशा नावांनी गोपगोपी हाका मारू
लागल्या. त्याच्याकडे पाहून आपसात बोलू लागत्या- "अगं, हा अंगाने जरा थोराडच दिसतो नाही का !
पण त्याच्या मुठी पहा कशा आवळलेल्या आहेत. मोठेपणी जग मुठीत ठेवणार की काय ? दिसतो बघा
किती सुंदर ! माझी बाई दृष्टीच हालत नाही त्याच्यावरून." यशोदा म्हणाली- "ए, काय ग असं बोलतेस ?
दृष्ट लागेल ना माझ्या मनमोहनाच्या रूपाला !"
गवळणी यशोदेचा मोठ्या प्रेमाने सत्कार करू लागल्या. यशोदेने उत्तम वस्त्रेभूषणे धारण के ली होती !
पुरोहित गर्गमुनी यांनी बाळाची लक्षणे पाहून त्याचे भविष्य वर्तविले "यशोदे ! तू मोठी भाग्यवती ! हा तर
साक्षात् विष्णू ! त्याची तू आई झालीस ! याची कीर्ती त्रिभुवनात होईल. याच्यापुढे कोणतेही संकट
टिकणार नाही. दुष्टांना शासन करून साधूंचे रक्षण करणारा हा ईश्वरी अवतार आहे ! हा गोपालक होईल,
दैत्यांना घातक होईल. तो अनेक चमत्कार करील. बंदीतील लोकांना हाच मुक्त करील. तुम्हाला आणि
व्रजवासियांना अतिशय आनंद देईल. श्रीकृ ष्ण, गोविंद व गोपाल ही याची नावे प्रख्यात होतील. जगाला
हा वंद्य व पूज्य होईल !" असे भविष्य ऐकताच नंदयशोदा हर्षित झाली. बारा दिवस मोठा सोहळा झाला.
शेषशायी भगवंत नंदाघरी पाळण्यात घातला. श्रीकृ ष्ण असे त्याचे नाव ठेवण्यात आले. भक्तांसाठी मायेचे
परमनिधान, अनंत, विराट, परमेष्ठी, आता बालक होऊन नंदाला आनंद देऊ लागला.
कृ ष्णजन्मानंतर गोकु ळात गाई जास्तच दूध देऊ लागल्या. पीक अधिक मिळू लागले. लोक आनंद व
उत्साह यांनी भरून आले. सृष्टी सर्वांगी पुलकित झाली.
पण कं साच्या मथुरेत अपशकु न होऊ लागले. कं साने आपल्या मंत्र्याना बोलवून म्हटले- "माझा मृत्यू
ज्याच्या हातून होण्याचा संभव आहे तो जन्माला आला आहे. त्याचा आपल्या राज्यात सारीकडे शोध
घ्या. ज्याला तो सापडेल त्याला मी मोठे दान देईन."
एकजण म्हणाला- "कं स महाराज ! मी असे ऐकतो की गोकु ळात कु ठेतरी तुमच्या शत्रूचा जन्म झाला
आहे. पण कितीतरी गोपस्त्रिया प्रसूत झाल्या आहेत. त्यातील कोणता बालक तुमचा वैरी ते कसे
समजणार ?" त्यावेळी चर्चा झाली. महाबल नावाच्या दैत्याने ब्राह्मण ज्योतिषाचे रूप घेऊन गोकु ळात
जावे आणि नेमका कोणता बालक दैवी गुणांचा आहे ते ओळखून त्याला गुप्तपणे मारावे असे कं स व
त्याचे मंत्री यांनी ठरविले.
महाबलाने ब्राह्मणाचे अगदी हुबेहूब रूप धारण के ले. तो गोकु ळात आला. घरोघर हिंडून 'आपण सामुद्रिक
शास्त्र जाणतो' असे सांगून लोकांवर त्याने आपली छाप पाडली. काही गोपांना आपल्या पैशाचिक
विद्येच्या साह्याने त्याने भविष्यही सांगितले. लहान मुलांचे भविष्य आपण बिनचूक सांगतो असा त्याचा
दावा होता. गोपांनी त्याला नंदाच्या घरी आणले. ज्योतिषी म्हणून नंदाने त्याचा आदर के ला. यशोदा
श्रीकृ ष्णाला घेऊन त्याच्या समोर आली.
त्या दैत्याने श्रीकृ ष्णाचे तेज पाहून लगेच ओळखले - हा बालक तर विलक्षण दिसतो ! नंद-यशोदा यांपेक्षा
याचा तोंडवळा वेगळा दिसतो. हा सावळा असला तरी मन वेधून घेतो. त्याने पंचांगात पाहिल्यासारखे
के ले. जन्मतिथी व वेळ विचारली. मान हलविली. बोटांवर गणित के ल्याचे नाटक के ले आणि गंभीरपणे
म्हणाला- "हा मुलगा अपशकु नी आहे. याला घरातच काय, गोकु ळातही ठेऊ नका. त्याच्यामुळेच
तुमच्यावर मोठमोठ्या आपत्ती येतील. याला दूर रानात नेऊन टाकू न द्या ! नाहीतर तुमच्या कु ळाचा व
गोकु ळाचा नाश करील." यशोदेने घाबरून पटकन बाळाला पदराआड लपविले.
पण श्रीकृ ष्णाने त्या कपटी दैत्याला आपला प्रसाद दिला ! त्या दैत्याच्याच डोक्यावर शिंके होते. ते तुटले.
त्यातील मडके पडले ते त्याच्या डोक्यावर. खापर लागून डोक्याला जखम झाली. रक्त वाहू लागले. दैत्य
उठला, जायला निघाला. एक लाटणे आपोआप उडाले. त्याच्या तोंडात गपकन उभे बसले. घरातल्या
सगळ्या वस्तु टणटणा उडत त्याच्यावर येऊन पडू लागल्या ! त्याची पार दैना उडाली. तो पळत सुटला.
सारे त्याला हसू लागले. तो मथुरेत गेला. कं साजवळ जाऊन सारा वृत्तांत त्याला सांगितला. कं साने
जाणले- 'आपला शत्रू म्हणजे तो नंदाचा पोर ! नाहीतर असा प्रकार झाला नसता !' महाबळाला त्याने
मोठे दान दिले. त्यावर उपचार करविले. त्याने कं साचे कार्य के ले होते.
कं स चिंताग्रस्त झाला. गोकु ळात जाऊन, कोणत्या तरी प्रकारे नंदाच्या पुत्राचा घात करायला हवा होता.
त्याच्या आश्रयाला पूतना नावाची एक राक्षसी होती. तिला मायावी विद्या येत होती. ती कं साला
म्हणाली- मी मानव स्त्रीचे सुंदर रूप घेते. गोकु ळात जाते. नंदपुत्राला स्तनपान देण्याचे नाटक करते, आणि
विषप्रयोग करते, तो तत्काळ मरून जाईल." कं साने तिला पाठविले आणि सांगितले- "तू आधी इतर
गावात जा. नि तिथेही तुझा प्रभाव दाखव. माझी काही हरकत नाही."
पूतनेला जास्तच आनंद झाला. तिने अत्यंत सुंदर सोज्वळ रूप धारण के ले. घरोघरी कोणत्या तरी निमित्ताने
जाऊन तिने अर्भकांना दृष्ट लावली ! काही मुले आजारी पडली. काही तिच्या विषारी दृष्टीने मरण पावली.
पण तोपर्यंत ती तिथून दिसेनाशी झालेली असायची. तिचा संशय मात्र कोणाला आला नाही.
फिरता फिरता ती नंदाघरी आली. तिला पाहून यशोदेला आनंद झाला. कारण तिने रूपच तसे सोज्वळ
धारण के ले होते. पूतनेने म्हटले- "इकडे तिकडे मंडप, तोरणे, उत्सवाची लक्षणे दिसत आहेत. विशेष काय
?" यशोदेला बाळाचे कौतुक ! तिने भोळेपणाने तिला पाळण्यात निजलेला श्रीकृ ष्ण दाखविला. तोच
कृ ष्ण जागा झाला. पायाचा अंगठा तोंडात धरून चोखू लागला. ते ध्यान पाहून पूतनेला हर्ष झाला. तिने
म्हटले, 'माई, मी घेऊ का जरा बाळाला ! किती सुंदर आहे हो हा ! मला तर बाई पान्हाच फु टला ! त्याला
मी पण पाजू का ?' यशोदेला नवल वाटले. पण सरळ स्वभावाची चांगली बाई पाहून "बरं, घ्या हं जरा.
मी घरातलं काम उरकते तोवर घ्या. बसा इथं" असे म्हणून तिने बाळाला पूतनेजवळ दिले. यशोदा आत
गेली.
पूतनेने लाडिक शब्दात बाळाजवळ बोबडे बोलत त्याला मांडीवर घेतले. त्याला ती स्तन्य देऊ लागली.
तेवढ्यात यशोदा बाहेर आली. या स्त्रीचे वात्सल्य पाहून तिला नवलही वाटले, आनंदही झाला. ती पुन्हा
आपल्या कामात मग्न झाली.
कृ ष्णाने पूतनेच्या विषमय स्तनातून हळूहळू विष शोषण करण्यास प्रारंभ के ला. त्याचा काहीही प्रभाव
कृ ष्णावर पडला नाही. आता तो डोळे फिरवील आणि मरून पडेल असा अंदाज करीत पूतना त्याला
पाजीत होती. पण कृ ष्णाने तिच्या स्तनातील सारे विष शोषून रडायला प्रारंभ के ला. तेव्हा तिने दुसर्या
स्तनाशी त्याला धरले. त्याने त्यातील विषही शोषण के ले. आणि तो स्तन तीव्रपणे चोखू लागला. काय
प्रकार होत आहे हे कळायच्या आत कृ ष्णाने तिचे प्राणच खेचून घेण्यास प्रारंभ के ला. तेव्हा ती घाबरली.
कासावीस झाली. तिच्या खांद्यावर कृ ष्णाने एक हात घट्ट रोवला. पूतना खाली पडली. "अरे पुरे ! सोड !
जीव नको कु रतडूस ! देवा ! मी चुकले ! श्रीकृ ष्णा ! मी पुन्हा असे करणार नाही ! पण मला सोड" असे
काकु ळतीने म्हणू लागली.
ती मूर्च्छित पडली. तरी कृ ष्णाने तिला सोडले नाही. त्याने तिचे प्राणच ओढून तिला मुक्ती दिली !
राक्षसिणीचे मूळ रूप मरता मरता तिला पुन्हा प्राप्त झाले. कपटी खेळ खलास झाला. मारण्याच्या इच्छेने
जरी ती आली होती तरी कृ ष्णाबद्दल वात्सल्य भावाने ती त्याच्याशी एकरूप झाली. त्यामुळे कृ ष्णाने
तिला सद्गति दिली ! यशोदा बाहेर आली तो पूतना ही राक्षसी अस्ताव्यस्त पडलेली तिला दिसली.
"सोज्वळ सुंदर स्त्री कु ठे गेली ! हा कृ ष्ण तर या राक्षसिणीच्या स्तनाशी आहे. अरे देवा ! ही तर मरून
पडली आहे. असे पाहून यशोने घाबरून सर्वांना हाका मारल्या. घरातले सारे धावले. ते भयंकर दृश्य पाहून
थबकले. एका गोपाने पुढे होऊन कृ ष्णाला पटकन् उचलले. यशोदेजवळ दिले. विष पचवून तो बाळ हसत
होता. यशोदेला तो पटकन बिलगला !
बाळावर आलेले भयानक संकट पाहून गोकु ळच हादरले होते ! गोकु ळातल्या लोकांना आता कृ ष्णाची
फार काळजी वाटू लागली. नंद त्यावेळी मांडलिकत्वाचा कर भरण्यासाठी मथुरेला गेला होता ! संधी
साधून संकट आले होते. लोक भयभीत झाले होते. संकटातून श्रीकृ ष्ण वाचला, त्याच्या अंगी मोठी
अलौकिक शक्ती आहे असे लोकांना वाटू लागले. ते वेगळ्या दृष्टीने कृ ष्णाकडे पाहू लागले. यशोदेला
संकट टळल्याचा आनंद झाला होता. वेषधारी कपटी राक्षसिणीला ईश्वराने पिटाळून लावले, राक्षसिणीला
ईश्वरानेच नष्ट के ले हे ओळखून यशोदा कृ ष्णाला जास्त जपू लागली !
अध्याय ४ समाप्त
॥ श्रीकृ ष्णार्पणमस्तु ॥