You are on page 1of 10

॥ अध्याय चवथा ॥

कृ ष्णजन्मसोहळा - महाबल व पूतना यांचे संकट -


श्रीगणेशाय नमः ॥
जय जय श्रीकृ ष्णचंडांशा । गोपीनयनसरोजविकाशा । सत्यज्ञानचित्प्रकाशा । गोकु ळवासा गोविंदा ॥१॥
जय जय श्रीकृ ष्ण उदारा । निजजनमानसचकोरचंद्रा । ब्रह्मानंदा ज्ञानसमुद्रा । मायातीता अनंता ॥२॥
जय भवहृदयानंदकं दा । प्रेमळभक्तचातकजलदा । पूर्णानंदा पूर्णसुखदा । भेदभेदातीत तूं ॥३॥
जय जय मायाविपिनदहना । मधुकै टभारे मुरमर्दना । धर्मपाळका सद्‌गुणवर्धना । सच्चिदानंदा परेशा ॥४॥
जय जय कमळनाभा कमळपत्राक्षा । मनमोहना निर्विकल्पवृक्षा । मायाचक्रचालका सर्वसाक्षा ।
दानवशिक्षाकारणा ॥५॥
षड्‌गुणैश्वर्यसंपन्ना । यशःश्रीकीर्तिऔदार्य-विज्ञाना । जय अरिषड्वर्गमदभंजना । निरंजना निरूपाधिका ॥
६॥
हरे अनंतशायी अनंता । पुढें बोलें हरिविजयग्रंथा । तुझी लीला जगन्नाथा । तूंच बोलें सर्वही ॥७॥
तिसरे अध्यायीं निरूपण । गोकु ळीं गेला मनमोहन । वसुदेवास आडवें विघ्न । मायाजाळ पैं आलें ॥८॥
धरितां स्वरूपानुसंधान । आडवें येत मायाविघ्न । तैसा हरि उदरा येऊन । वसुदेव बांधिला मायेनें ॥९॥
साधकां जों स्वरूपप्राप्ति होत । तंव सिद्धि पुढें आडवी येत । सिद्धिसंगें परमार्थ । सर्व जातो हातींचा ॥१०॥
सिद्धिपाठीं जो लागला । तो दिवसाच चोरीं नागविला । आत्मप्राप्ति तयाला । कल्पांतींही नव्हेचि ॥११॥
देवाच्या बापाच्या पायीं वहिली । मायेनें बेडी ठोकिली । मायिक जीव सकळी । मुक्त कै से होती पां ॥१२॥
ऐसी दुर्धर हरीची माया । तीस कं स गेला आपटावया । तंव ते गेली निसटोनियां । न ये ते आया सुरासुरांच्या ॥
१३॥
ब्रह्मादिकां पडली माया अटक । तेथें कं स काय मशक । लागला कं सासी परम धाक । निशि-दिवस विसरेना ॥१४॥
जवळी प्रधान कारभारीं । कं स धांवे तयांवरी । अरे तुम्ही माझे सर्व अरी । मज मारूं पाहतां ॥१५॥
भोंवते सेवकांचे भार । तों हांक फोडी कं सासुर । म्हणे अवघेचि दावेदार । मजभोंवते मिळाले ॥१६॥
असो आतां गोकु ळीं चक्रपाणी । पहुडला यशोदेचे शयनीं । जागी जाहली नंदराणी । निजनयनीं अवलोकी ॥१७॥
यशोदा के वळ ज्ञानकळा । हरिप्राप्ति जाहली तिजला । सायास न करितां आला । घरा आपण गोविंद ॥
१८॥
यशोदेचें भाग्य विशेष । कवडी देऊनि घेतला परिस ।कोंडा देऊनि कल्पवृक्ष । हाता आला निजभाग्यें ॥
१९॥
धुवण देऊनि घेतलें अमृत । कीं अजापालटें ऐरावत । जंबुक देऊनि यथार्थ । सिंह घरा आणिला ॥२०॥
एकें चिंतामणि गोफणिला । तो येऊनि अंगणांत पडिला । तैसा यशोदेसी लाभ जाहला । घरा आला श्रीहरी॥२१॥
यशोदा बैसली उठोन । तों सेजे देखिलें निधान । अमलदलराजीवनयन । मोहिलें मन यशोदेचें ॥२२॥
हांसे वरी मुख करोनी । आपुले चरणींचा अंगुष्ठ धरोनी । घाली आपुलें वदनीं । तेज सदनीं न समाये ॥२३॥
यशोदेसी पुत्र जाहला म्हणोनी।धांवती रोहिणी आणि गौळिणी। आनंद न समाये त्रिभुवनीं ।धन्य राणी नंदाची ॥२४॥
द्वारीं उभे मंडप के ले । समस्त ब्राह्मण जवळी आले । कु ळींचा उपाध्याय ते वेळे । गर्गमुनि धांविन्नला ॥२५॥
गोकु ळीं अवतरला श्रीहरी । वाद्यें वाजती अतिगजरीं । दाटी झाली नंदद्वारीं । देव अंबरीं पाहती ॥२६॥
नंदें करूनि मंगलस्नान । पाहों चालिला पुत्रवदन । गर्ग आदिकरून ब्राह्मण । त्रिकाळज्ञानी पातले ॥२७॥
करूनियां पुण्याहवाचन । मग पाहे कृ ष्णवदन । मधुबिंदु मुखीं घालोन । मधुसूदन तोषविला ॥२८॥
श्रीवासुदेवाचें वदन । पाहतां नंद आनंदघन । म्हणे अनंत जन्मींचें पुण्य । एकदांचि फळा आलें ॥२९॥
दोन लक्ष गोधनें । नानापरींचीं दिव्य रत्‍नें । विचित्र अलंकार भूषणें । वाटितां जाहला नंद तो ॥३०॥
अक्षय वाणें घेऊनी । धांवती नगरींच्या गौळिणी । अहेर-अलंकारें ते क्षणीं । गौळी पूजिती नंदातें ॥३१॥
मंडित सर्व अलंकारें । गौळिणी नेसल्या कनकांबरें । पायीं पैंजण वाजती गजरें । यशोदेच्या गृहीं जातां ॥३२॥
हळदीकुं कु मांची ताटें भरोनी । धांवताती नितंबिनी । म्हणती धन्य त्रिभुवनीं । यशोदा देखिली समर्थ ॥३३॥
एक म्हणती हें बाळ । सखे दिसतें बहु विशाळ । एक म्हणती त्रिभुवनासी घालील । पालाण हा पुरुषार्थें ॥३४॥
एक म्हणती होईल महावीर । एक म्हणती दिसतो उदार । एक म्हणती सहस्रकर । उणा तेजासी याचिया ॥३५॥
एक म्हणती नखावरोनी । काम सांडावा कु र्वंडी करोनी । एक म्हणती ओंवाळूनी । जाऊं तुजवरोनि बाळका ॥
३६॥
एक म्हणती बोलूं नका गोष्टी । बाळास लागेल गे दृष्‍टी । यशोदेनें जगजेठी । पुढें ओसंगा घेतला ॥३७॥
ज्या मंदीरीं उपजला श्रीपती । के शरकस्तूरीनें लिंपिल्या भिंती । आरक्त चांदवे विराजती ।मुक्तझालरी भोंवत्या ॥३८॥
रत्‍नजडित पलंग । त्यापुढें ठेविला रत्‍नखचित चौरंग । त्यावरी यशोदा श्रीरंग । घेऊनियां बैसली ॥३९॥
ओसंगा घेतला चक्रपाणी । श्वेत चामरें करीं घेऊनी । ढाळिताती दोघीजणी । यशोदेवरी स्वानंदें ॥४०॥
तांबूल त्रयोदशगुणी । विडे देती दोघीजणी । एक पिकपात्र धरोनि । उभी असे जवळिकें ॥४१॥
कनकांबराची बुंथी । घेऊनि बैसली यशोदा सती । ओसंगा घेतला श्रीपती । आनंद चित्तीं न समाये ॥४२॥
भोंवते वेष्टिले विद्वज्जन । गर्गमुनि पुढें होऊन । पाहे बाळकाचें लक्षण । नयनीं वदन विलोकी ॥४३॥
जातक वर्णीत गर्गमुनी । नंद यशोदा ऐकती श्रवणीं।जें श्रवण करितां पापधुणी । होय एकदां सर्वांची ॥४४॥
हात पाहोनि गर्ग । म्हणे इंदिरावर श्रीरंग । धन्य यशोदे तुझें भाग्य । न वर्णवे शेषातें ॥४५॥
जें क्षीरसागरींचें निधान । जें क्षीराब्धितनयेचें जीवन । क्षितिधरावरी करी शयन । तो हा निधान पुत्र तुझा ॥४६॥
कमलनयन कमलवदन । कमलनाभ कमलभूषण । कमलप्रिय कमलशयन । तो हा पूर्ण पुत्र तुझा ॥४७॥
हा उपजला तुझ्या उदरीं । परी कीर्ति करील त्रैलोक्यभरी । यासी असती बहुत वैरी । परी नाटोपे कोणा हा ॥४८॥
महाविषें स्तन भरोनी । कोणी येईल कामिनी । स्तन पाजितां चक्रपाणी । तीस शोषोनि टाकील ॥४९॥
चंडवायु उडवूनि यातें । घेऊनि जाईल आकाशपंथें । मर्दूनियां त्या दैत्यातें । विजयी होईल पुत्र हा ॥५०॥
आंगावरी येईल गाडा । त्याचाही करील चुराडा । दोनी वृक्ष कडकडां । मोडूनि पडतील यावरी ॥५१॥
हा होईल चित्तचोर । गोरस उरों नेदी अणुमात्र । ऐकतां हांसती सकळ विप्र । यशोदा नंदा सुखावती ॥५२॥
मायाचक्रचालक चक्रपाणी । मोहील अवघ्या गौळिणी । यास थोर यमुनाजीवनीं । महासर्पमय असे ॥५३॥
तेथें विजयी होईल आपेंआप।आणिक एक बापासी गिळील सर्प ।परी तेथेंही याचा प्रताप ।विशेष वाढेल जननीये ॥५४॥
द्वादश योजनें महाअग्न । ग्रासील हा न लागतां क्षण । महापर्वत उचलोन । नखाग्रींच धरील हा ॥५५॥
गोरक्षण करील हा माते । कं सासी मृत्यु याचेनि हातें । संहारील सर्व दैत्यांतें । बंदींचीं समस्तें सोडवील ॥५६॥
गुरूपुत्र गेला मरोन । तो पुन्हां देईल आणून । समुद्रांत एक पट्टण । नवेंचि रचील अद्‌भुत ॥५७॥
महादैत्य संहारूनी । वरील मुख्य पट्टराणी । आणिक सोळा सहस्र जणी । एकलाचि पर्णील ॥५८॥
षोडश सहस्र एक शत । आणिक आठजणी विख्यात । संतति वाढेल अपरिमित । नाहीं अंत निजभाग्या ॥५९॥
घेईल भक्तांचा कै वार । उतरील धरणीचा सर्व भार । याची लीला गातां सर्वत्र । प्राणी तरती त्रिभुवनींचे ॥६०॥
धर्माघरीं उच्छिष्टें प्रीतीं । काढील हा श्रीपती । होईल भक्तांचा सारथी । लाज चित्तीं धरीना ॥६१॥
दिवसेंदिवस लीलाचरित्र । दावील गति चित्रविचित्र । निजधामा जातां स्वगोत्र । समागमें नेईल हा ॥६२॥
ऐसें जातक ऐकतां श्रवणीं।तटस्थ जाहलीं नंदराणी।तों स्तनपान करितां चक्रपाणी । परतोन पाहे द्विजाकडें ॥६३॥
माझी लीला सांगितली सर्वत्र।म्हणोनि हास्य करी राजीवनेत्र । जो ब्रह्मानंद सर्वेश्वर । लीलाकौतुक दावी तो ॥
६४॥
बारा दिवसपर्यंत । सोहळा होतसे अद्‌भुत । नंदें द्रव्य अपरिमित । वांटिलें विप्रा तेधवां ॥६५॥
तेरावे दिवशीं पाळणां । पहुडविला वैकुं ठराणा । श्रीकृ ष्ण हें नाम जाणा । गर्गें स्थापिलें जाणोनि ॥६६॥
करितां नाना साधना । न ये ब्रह्मादिकांच्या ध्याना । त्यासी घालूनि पाळणां । जो जो म्हणोनि हालविता ॥६७॥
वेदशास्त्रां न ये आया । भोगींद्र झाला हरीची शय्या । तो पाळणां निजोनियां । लीला दावी भक्तांतें ॥६८॥
जो पयोब्धिहृदयनिवासी । पद्मा सेवी पदपद्मांसी । उरगरिपु वहन ज्यासी । पाळणां त्यासी पहुडविलें ॥६९॥
जलजनाभ जलजलोचन । जलधिशायी जलदवर्ण । जय विजय कर जोडून । द्वारीं उभे जयाच्या ॥७०॥
सनकादिक सनत्कु मार । हृदयीं चिंतिती निरंतर । जें मन्मथशत्रुध्येय साचार । नारददिकां गुह्य जें कां ॥७१॥
जें मूळ आदिमायेचें । जें पक्व फळ निगमवल्लीचें । जें देवतार्चन कमलोद्‌भवाचें । पाळण्यांत खेळतसे ॥७२॥
जो विद्वज्जनमानसमराळ । जो वैकुं ठींचा वेल्हाळ । निजभक्तवरद तमालनील । तो पहुडला पाळणां ॥७३॥
जो अनंतगुणसंपन्न । अनंतनेत्र अनंतवदन । अनंतबाहु अनंतचरण । त्यास जो जो म्हणोनि हालवी ॥७४॥
जो अलक्ष्य अपरंपार । जो आदिमायेचा निजवर । जो त्रिभुवनाचा आधार । जो वंद्य निगमागमां ॥७५॥
जो विराट्‌वृक्षाचें मूळबीज । जो योगियांची विश्रांतिशेज । जो आदिप्रणवाचें निजगुज । तो पाळणां
पहुडविला ॥७६॥
जो वेदविद्याचलदिनकर । जो ब्रह्मांडनगरीचा स्तंभ थोर । जो दानवसमरप्रतापधीर । पाळणां तो पहुडविला ॥७७॥
अज्ञानगजच्छेदकपंचानन । जो मायाघोरविपिनदहन । जो सर्वआनंद आद्यकारण । ब्रह्म पूर्ण श्रीकृ ष्ण ॥
७८॥
पाळण्याभोंवत्या सुवासिनी । शांति क्षमा दया उन्मनी । उपरति सद्विद्या कामिनी । जो जो शब्दें हालविती ॥७९॥
निर्वाणदीक्षा तितिक्षा स्वरूपास्थिती । मुमुक्षा निष्कामना प्रतीती । सुलीनता समाधि सद्‌गती । लीला गाती
आनंदें ॥८०॥
परा पश्यंती मध्यमा वैखरी । गजरें गाती चारी नारी । चारी मुक्ति निर्धारीं । चहूं कोनीं तटस्थ ॥८१॥
घरांत मुख्य या सुंदरी । इतर बैसल्या बाहेरी । जागृती सुषुप्ति नारी । त्यांसी हरी दिसेना ॥८२॥
असंभावना विपरीतभावना । विक्षिप्ता त्यागिता येतां जाणा । तुर्या दावी शहाणपणा । जाणती असें बहुत मी ॥८३॥
बारा सोळा चौदा नारी । गलबला करिती बाहेरी । चौसष्टी दाविती कलाकु सरी । परी अंतरीं प्रवेश नव्हे ॥८४॥
असो आतां सकल नितंबिनी । ओंटी यशोदेची भरोनी । अलंकार वस्त्रें अर्पूनी । सदना आपुल्या त्या गेल्या ॥८५॥
वस्त्रें भूषणें देऊन । नंदें बोळविले ब्राह्मण । गर्ग गौरविला संपूर्ण । वस्त्राभरणीं तेधवां ॥८६॥
गोकु ळीं अवतरतां गोपाळ । सकळ वृक्ष सदाफळ । धेनु दुभती त्रिकाळ । दुग्ध तुंबळ वर्षती ॥८७॥
आधिव्याधिरहित लोक । नाही चिंता दरिद्रदुःख । शुष्क धरणीस अपार पीक । पिकों लागलें तेधवां ॥८८॥
अवतरतांचि रमारमण । जग जरारहित जाहलें तरुण । विकल्प पाप समूळून । देशधडी जाहलें ॥८९॥
दरिद्री ते जाहले भाग्यवंत । मूर्ख ते होती बोलके पंडित । कु रूप ते जाहले रूपवंत । देदीप्यमान तेजस्वी ॥९०॥
अवतरतां श्रीकृ ष्णपरब्रह्म । निःशेष गेलें रज-तम । गौळियां सुकाळ परम । स्वानंदाचा जाहला ॥९१॥
गृहीं प्रकाशतां प्रभाकर । मग कैं चा उरेल अंधकार । गृहस्वामी येतांचि तस्कर । पळोनि जाती चहूंकडे ॥
९२॥
कीं बोलतां ज्ञानवेदांत । सकळ मतें होती कुं ठित । कीं सद्विवेक होतां प्राप्त । संसारदुःख वितळे पैं ॥९३॥
कीं प्रवेशतां वैराग्य शांती । दुष्ट काम-क्रोध पळती । तैसा अवतरतां कमलापती । दोषदुष्काळ पळाले ॥
९४॥
असो इकडे मथुरेप्रती । दुश्चिन्हें कं सासी जाणवती । राजद्वारीं शुनी रडती । विजा पडती सभेवरी ॥९५॥
महास्फोट होऊनि धरा । क्षणक्षणां कांपे थरथरां । मेघ पडला नसतां धारा । शोणिताच्या वर्षताती ॥९६॥
कं स सभेसी चालिला । उगाच मुकु ट खालीं पडिला । गेली सभेची सर्व कळा । प्रेतवत वीर दिसती ॥९७॥
आपुलें शिरीं तेल शेंदूर । स्वप्नीं देखे कं सासुर । दिवाभीतांचे घुंघाट स्वर । दिवसाच कं स आयके ॥९८॥
उगेंच छत्र मोडून पडलें । कं सा वाटे मरण आलें । कं सास्त्रियांनीं स्वप्नीं देखिलें । महादुश्चिन्ह दारुण ॥९९॥
विधवा स्त्रिया स्वप्नकाळीं । ओंटी भरिती घेऊनि धुळी । मंगळसूत्र गळसरी तोडिली । काळपुरुषें अकस्मात ॥१००॥
नाना विघ्नें देखोनी । कं स भयभीत मनीं । सदा जाळी चिंताग्नी । कदा शयनीं नीज न ये ॥१०१॥
प्रधानाशीं कं स विचार करी । आमुचा वैरी उर्वीवरी । अवतरला परी निर्धारीं । ठायीं न पडे शोधितां ॥१०२॥
कोणे ग्रामीं कोणे घरीं । वाढतो न कळे माझा वैरी । जो ठायीं पाडील निर्धारीं । त्यासी इच्छिलें देईन मी ॥१०३॥
शत्रू जों लहान आहे । तों वेगें करावा क्षय । दंदशूक लघु म्हणों नये । देखतांचि वधावा ॥१०४॥
तृणामाजी किं चित अग्न । तो जाळील न लगतां क्षण । घर जों न पडे मोडून । तों बाहेर आधीं व्हावें ॥१०५॥
शस्त्राचा घाय जों न पडे । तों आधींचि वोढण करावें पुढें । तैसा शत्रु जो न वाढे । तों आधींच घात योजावा ॥१०६॥
प्रधान म्हणे ते वेळीं । जनवदंता ऐसी ऐकिली । वैरी वाढतो गोकु ळीं । गौळियाघरीं म्हणोनियां ॥१०७॥
लक्षानुलक्ष गौळिणी । गोकु ळीं असती बाळंतिणी । परी वैरी असे कोण्या सदनीं । तोचि ठायीं पाडिजे ॥१०८॥
कापटयवेषें दैत्य बरवा । धूर्त तार्कि की पाठवावा । अरि ठायीं पाडोनि वधावा । नाना उपायेंकरोनी ॥१०९॥
तों महाबळ नामें दैत्य । कं सासी पैज बोलत । मी विप्र होऊनि त्वरित । पाळती घेतों गोकु ळीं ॥११०॥
कं स बहुत संतोषला । महाबळ दैत्य गौरविला । तो तत्काळ धरियेला । विप्रवेष कापट्यें ॥१११॥
धोत्रें कळोत्रें नेसला । यज्ञोपवीत रुळे गळां । कापट्यवेष अवलंबिला । हातीं पंचांग घेतलें ॥११२॥
धोत्रें वोळी सरसावी । टिळे वाटे लोकांसी दावी । मी ब्राह्मण हें लटिकें चि मिरवी । परी अंतरीं कापट्य ॥११३॥
लटिका दाखवी आचार । परी अंतरीं दुराचार । वृंदावनफळ वरीच सुंदर । अंतरीं काळकू ट भरियेलें ॥११४॥
कीं बक पक्षियाचें शुष्क ध्यान । कीं धनलुब्धकाचें तत्त्वज्ञान । कीं दांभिकाचें भजन । वरी वरी दावी असत्य ॥११५॥
स्त्रीलंपटाचें विरक्तपण । कीं वेश्येचें मुखमंडण । कीं कोल्हाटियाचें शूरत्व पूर्ण । वरी वरी व्यर्थ पैं ॥११६॥
विश्वासघातक्याचे बोल । वरी वरी दिसती रसाळ । कीं मैंदाची शांति निर्मळ । वरी धरीच व्यर्थ पैं ॥११७॥
तैसा तो दैत्य महाबळ । वरी वरी जाहला सुशीळ । प्रवेशता जाहला गोकु ळ । धूर्त कु टिल दुरात्मा ॥११८॥
पुसताहे लोकां सकळां । कोणाचे घरीं होतो पुत्रसोहळा । तों ते सांगती कृ ष्ण अवतरला । नंदाचिये मंदिरीं ॥११९॥
हरिवंश-भागवतीं पाहीं । महाबळ विप्राची कथा नाहीं । शोध करितां सर्वांठायीं । नारदपुराणीं देखिली ॥१२०॥
तेथें ही कथा लिहिली जाण । श्रोतीं न धरावा अनमान । मुळावेगळी कथा पूर्ण । सहसाही वाढेना ॥१२१॥
नाना पुराणींचे इतिहास । बोलिला स्वामी वेदव्यास । यालागीं कदापि दोष । न ठेवावा ग्रंथातें ॥१२२॥
असो तो धूर्त महाबळ विप्र । प्रवेशला नंदाचें मंदिर । गौळी करिती नमस्कार । भावें करोनि विप्रातें ॥१२३॥
बैसावया दिधलें आसन । के लें ब्राह्मणाचें पूजन । यशोदा कृ ष्णासी घेऊन । स्तनपान करवीत ॥१२४॥
यशोदा म्हणे ब्राह्मणासी । शुभग्रह पहा कृ ष्णासी । जन्मकाळची दशा कै सी । तें आम्हांसी सांगिजे ॥१२५॥
पूर्वीं गर्गें जातक । परमकल्याण शुभसूचक । तुम्हीं सांगावें सम्यक । दशा पाहोन कृ ष्णाची ॥१२६॥
तंव तो कापट्येंकरून । पंचांग पाहे उकलोन । क्षणएक ग्रीवा तुकावून । सांगता जाहला तेधवां ॥१२७॥
म्हणे गर्गादि ऋषीश्वर । सकळ चुकले गुणाकार । सर्वांचे मुळीं साचार । कृ ष्ण उपजला जाण पां ॥१२८॥
यास उपजतां लागलें मूळ । हा करील सर्वांचें निर्मूळ । याच्या पायीं गोकु ळ । निर्दाळेल सर्वही ॥१२९॥
हा उपजला हो मूळीं । करील स्वगोत्राची होळी । तरी तुम्ही सकळ मिळोनि गौळी । लेंकरूं बाहेर टाका हें ॥१३०॥
गर्तेमाजी नेऊनी । जितचि पुरावें ये क्षणीं । तरीच कल्याण तुम्हांलागुनी । निश्चयेंसीं जाणिजे ॥१३१॥
बाळ नव्हें हा काळ । गिळील तुमचें कु ळ सकळ । ऐसें ऐकतांच वैकुं ठपाळ । काय चरित्र मांडिलें ॥१३२॥
जो सकळचराचरव्यापक । जो मायाचक्रचालक । जग हाचि पट सुरेख । परी तंतु देख श्रीकृ ष्ण ॥१३३॥
नाना परींचे विचित्र मणी । परी ओंविले एकाचि गुणीं । कीं अनेक तरंग सिंधुजीवनी । परी उदक एकचि निर्धारें ॥१३४॥
कीं नाना घटीं एक दिनकर । कीं बहु मंदिरें एक अंबर । कीं एक सुवर्ण नाना अलंकार । तैसा व्यापक श्रीहरी ॥१३५॥
कीं नाना मातृकांचा उच्चार । परी त्यांत एकचि ॐकार । नाना घटांचे आकार । परी मृत्तिका एकचि ॥१३६॥
तैसा श्रीकृ ष्ण सर्वचित्तचालक । जो मनोबुद्धींचा प्रवर्तक ।तेणें मांडिलें हो कौतुक । परम नाटकी श्रीहरी ॥१३७॥
बाहेर टाकावा बाळ । ऐसें बोलतां महाबळ । तों दह्यांचें मडकें सबळ । कपाळावरी आदळलें ॥१३८॥
बोलतो उत्तरें अमंगळें । म्हणोनि लाटणें आवेशलें । मुखामाजी उभेंचि शिरलें । कपटियाच्या तेधवां ॥
१३९॥
ऐसें कौतुक गौळी पाहती । तंव घरांतून देव्हारे पाट धांवती । उरावरी धडधडां आदळती । नाहीं शक्ति पळावया ॥१४०॥
पाटे वरवंटे मोडिती पाय । कपटिया तेथूनि पळों पाहे । बाजही आडवी उभी राहे । वाट नेदी दुर्जना ॥१४१॥
पाट चौक्या पाहारा अर्गळा । घण कु दळी कु र्‍हाडी सबळा ।गोंवर्‍यांसी जीव आला । पक्ष्यांसारिख्या धांवती ॥१४२॥
होती मुसळांचे मार । धोत्र फिटोनि गेलें समग्र । पंचांग फाटोनि जाहलें चूर । जानवें गेलें तुटोनि ॥१४३॥
ढुंगणाचें धोत्र गळालें । नागवाचि कपटी पळे । पदार्थ तितुके धांवती बळें । मार देती दारुण ॥१४४॥
गौळी हांसती सकळ । आमच्या कृ ष्णासी ठेविला बोल ।परी त्याचें फळ तात्काळ । प्राप्त जाहलें तयासी ॥१४५॥
गदगदां हांसती गौळिणी । अपवित्र बोलिला पापखाणी । जळो जळो त्याची वाणी । बरा झोडिला भगवंतें ॥१४६॥
इकडे कपटी नागवाचि पळत । पावला त्वरे मथुरेआंत । चळचळां कांपत रडत । कं साजवळी पातला ॥१४७॥
कं सासी म्हणे तुझा अरी । वाढतो गोकु ळाभीतरी । तो अनिवार सकळ धरित्री । निर्वैर करील वाटतें ॥१४८॥
थोर मार जो मज बैसला । पदार्थमात्रासी जीव आला । हे नव्हे मानवी कळा । तो अवतरला श्रीविष्णु ॥१४९॥
कं सासी म्हणे महाबळ । गोकु ळीं वाढतो तुझा काळ । तो दिसतो जरी बाळ । परी नाकळे कृ तांता ॥१५०॥
कं सा मज वाटतें पूर्ण । कीं जवळी आलें तुझें मरण । ऐकतां दचकलें मन । कं सरायाचें तेधवां ॥१५१॥
के सरीचा प्रताप ऐकोन । थरथरां कांपे वारण । कीं गरुडाचें ऐकोन स्तवन । उरग चित्तीं दचकती ॥१५२॥
ऐकोन सभाग्याची स्तुती । दुर्जन दचके परम चित्तीं ।कीं वेदांतींच्या ऐकोन श्रुती । मतवादी भयभीत ॥१५३॥
तैसाच कं स दचकोन । म्हणे दिसतें वर्तमान कठीण । आतां वैरियासी शोधून । कोण मारील सत्वर ॥१५४॥
कीं व्याधि जों उद्‌भव न धरी । तों निर्मूळ करावा लौकरी ।अग्नि आणि वैरी । धाकु टा म्हणों नये कीं ॥१५५॥
लघु म्हणूं नये दंदशूक । पुढें दुष्ट विघ्नकारक । तों पूतना येऊनि संमुख । पैज बोले कं सासी ॥१५६॥
क्षणामाजी तुझा वैरी । शोधूनि मारीन निर्धारीं । मी जाणें कपटकळाकु सरी । आज्ञा देईं मज आतां ॥१५७॥
कं स परम संतोषला । गौरवोनि निरोप दिधला । कपटस्वरूप ते वेळां । नटली रंभेसारखी ॥१५८॥
पायीं रुणझुणती पैंजण । नेत्रीं सोगयाचें अंजन । सर्व अळंकारीं नटली पूर्ण । परम पापीण पूतना ॥१५९॥
कं स म्हणे पूतने अवधारीं ।गांवोगांवींचीं बाळकें मारीं।त्यांत सांपडेल माझा वैरी । तो तूं झडकरी वधीं कां ॥१६०॥
आधीं पूतना परम चांडाळी ।त्यावरी कं साची आज्ञा झाली ।येरीनें तेचि हृदयीं धरिली ।अतिप्रीतीनें तेधवां ॥१६१॥
आधींच शंख करावयाची हौस ।त्यावरी पातला फाल्गुनमास।कीं राजाज्ञा झाली तस्करास । यथासुखें हिंडावया ॥१६२॥
आधींच जार दुराचारी । तो स्त्रीराज्यांत कारभारी ।आधींच पैशुन्यदुष्ट अघोरी । त्यावरी नृपति पाठिराखा ॥१६३॥
कीं मदिरा पाजिली मर्क टाला।त्यांत भूतसंचारहीं जाहला।त्यामाजी वृश्चिकें दंश के ला । तैसें जाहलें पूतनेसी ॥१६४॥
की मद्यपियानें देखिलें शिंदीवन ।कीं वमन देखोनि धांवे श्वान।कीं काग क्षत देखोन।अतिसाक्षेपें उकरी पैं ॥१६५॥
तैसी राक्षसी ते अवसरीं । गांवोगांवीचीं बाळकें मारी । प्रवेशतां लोकमंदिरीं । न वारिती कोणीच ॥१६६॥
तीस देखोन म्हणती । लक्ष्मीच आली की गृहाप्रति । बाळें मारी गुप्तगती । तें कोणास कळेना ॥१६७॥
ऐसी ते बाळकांची महामारी । प्रवेशली गोकु ळामाझारी ।स्तन मुखीं लावितांच झडकरि । बाळें प्राण टाकिती ॥१६८॥
महाविषें भरोनि स्तन । प्रवेशली यशोदेचें सदन ।यशोदा म्हणे बाळ कृ ष्ण । पहावया आली गोपी हे ॥१६९॥
पाळण्याजवळी आली पूतना । दृष्टीं अवलोकी राजीवनयना।ते बाळलीला देखोन मना । परम सुख वाटतें ॥
१७०॥
नीलवर्ण के श कु रळ । आकर्ण नेत्र विशाळ भाळ । दिव्य पिंपळपान सुढाळ । झगझगीत सतेज ॥१७१॥
कर्णीं कुं डलें तळपती । लघुदंत चौकींचे झळकती । सुहास्यवदन श्रीपती । कं ठीं शोभती वाघनखें ॥१७२॥
पदक एकावळी मुक्ताहार । तेणें शोभला बाळ दिगंबर । वांकी बिंदलीं परिकर । तडित्प्राय झळकती ॥
१७३॥
चिमणीं बोटें चिमणे हात । चिमण्या मुद्रिका लखलखित । चिमणीच कटी मेखळा झळकत । क्षुद्रघंटा
किणकिणती ॥१७४॥
पायीं पैंजण वाळे वाजती । चरणांगुष्ठ धरिला हातीं ।वदनीं घालूनि रमापती । चोखी प्रीतीकरूनियां ॥
१७५॥
तो वैकुं ठपती वरिष्ठ । कां मुखीं घातला चरणांगुष्ठ ।तरी चरणीं गोडी आहे उत्कृ ष्ट । ऐसें भक्त बोलती ॥
१७६॥
जे ते भक्त चरणीं रंगती । गोड म्हणोनि वाखाणिती ।ते गोडी पहावया श्रीपती । जपत होता बहुत दिवस ॥१७७॥
तें गोकु ळीं फावलें स्पष्ट । म्हणवोनि चोखी चरणांगुष्ठ।कीं स्वचरणींचा महिमा वरिष्ठ । आबाळ लोक नेणती ॥१७८॥
जैसें पितयानें अमृतफळ आणिलें । ते बाळकाहातीं दिधलें । परी त्याची गोडी त्यासी न कळे । वदनीं न
घाली सर्वथा ॥१७९॥
तेंच फळ पिता चोखितां । बाळ झोंबोनि लागे हाता । तैसा हा जगत्पितयाचा पिता । गोडी आधीं सेवीत ॥१८०॥
गोडीनें चरण चोखी श्रीपती । यालागीं भक्तांच्या मिठ्या पडती । असो पालखाजवळी निश्चितीं । पूतना ते
उभी असे ॥१८१॥
पूतना उचली वनमाळी । स्तन घातला मुखकमळीं । परम आवडीनें ते वेळीं । स्तनपान करीतसे ॥१८२॥
हातीं धरोनियां स्तन । मुखीं घाली जगज्जीवन । पूतनेच्या खांद्यावरी जाण । एक हात ठेविला ॥१८३॥
विष शोषिलें संपूर्ण । दुग्धही गेलें सरोन । सर्वांगीच्या शिरा ओढून । तुंबडी एकचि लागली ॥१८४॥
पूतनेसी नवल वाटले । म्हणे विष शोषून बाळ वांचलें ।सर्वांग तिचें कांपों लागलें । सोडी म्हणे श्रीकृ ष्णा ॥१८५॥
गोपाळा गोविंदा श्रीपती । सोडीं सोडीं कां मजप्रती । मी परतोनि न यें मागुतीं । या गोकु ळामाजी पैं ॥१८६॥
सांवळे गोपाळे माझे आई । सोडीं सोडीं कृ ष्णे कान्हाई । म्हणोनि मुखाकडे ते समयीं । पूतना विलोकी
सद्‌गद ॥१८७॥
सोडीं वेधका वनमाळी । तुझी माता कै सी वांचली ।धन्य ती यशोदा वेल्हाळी । स्तनपान करवी तूंतें ॥१८८॥
माझा शोषिसी कां जीवप्राण । सोडीं न यें मी आतां परतोन ।खालीं पडें मूर्च्छा येऊन । तरी जगज्जीवन
सोडीना ॥१८९॥
सकळ गात्रें शोषिलीं । पूतना अवलोकी वनमाळी । तंव ते मूर्ति सांवळी । हृदयावरी विराजे ॥१९०॥
अवलोकित कृ ष्णाचें वदन । हृदयीं बिंबलें तेंच ध्यान।मुखीं करी हरिस्मरण । कृ ष्णा गोविंदा माधवा ॥१९१॥
जय जय मुकुं दा मुरारी । पुराणपुरुषा श्रीहरी । माझा भवपाश निर्धारीं । छेदीं आतां विश्वेशा ॥१९२॥
जो सजलजलदवर्ण । वदन उदार आकर्णनयन । अवलोकितां सोडिला प्राण । पूतनेनें तेधवां ॥१९३॥
स्थूल लिंग कारण महाकारण । हरीनें शोषिलें न लागतां क्षण । दश इंद्रियें पंच प्राण । शोषी
अंतःकरणचतुष्टयासी ॥१९४॥
अवस्था भोग भोगूनि स्थानें । संपूर्ण शोषिलीं जगज्जीवनें । पूतनेचें भाग्य वानावें कवणें । के ली धन्य भगवंते ॥
१९५॥
गेला पूतनेचा प्राण । तरी न सोडी जगज्जीवन । यशोदा पाहें घरांत येऊन । तों विशाळ असुरी पसरली ॥१९६॥
महाभयानक विक्राळ वदन । दंत दाढा भ्यासुर पूर्ण । जिव्हा लांब सिंदूरवर्ण । लळलळे मुखाबाहेरी ॥१९७॥
भाळीं चर्चिला शेंदूर । बाबरझोटी भयंकर । कीं हे ताटिकाचि निर्धार । कृ ष्णावतारीं जन्मली हो ॥१९८॥
नरशिरांच्या रुळती माळा।यशोदेनें देखिली ते वेळां ।हांक फोडोनि बोलावी सकळां ।धांवा धांवा म्हणतसे ॥
१९९॥
गौळी पातले समस्त । थरथरां यशोदा कांपत । महाभयानक प्रेत । राक्षसीचें पसरलें ॥२००॥
गौळी पाहती सकळ । तों तिच्या वक्षःस्थळीं घननीळ । सच्चिदानंदघन निर्मळ । स्तन मुखीं धरिलासे ॥२०१॥
गौळियानें कृ ष्ण उचलिला । यशोदेपाशीं दिधला ।अश्रू वाहती मातेच्या डोळां । हृदयीं धरोनि स्फुं दत ॥२०२॥
मोठा चुकला गे अनर्थ । कैं ची राक्षसी आली घरांत ।मागुती कृ ष्णवदन पाहात । अश्रू पडती हरीवरी ॥
२०३॥
भ्याला असेल गे श्रीपती।म्हणोनि आपुले पायींची माती।कृ ष्णाचे ललाटीं लाविती । नवल भक्ति तयांची ॥२०४॥
एक करिती निंबलोण । एकीं कृ ष्णाचें पाहोनि वदन । म्हणति जाऊं ओंवाळून । तुजवरोन डोळसा ॥२०५॥
भालदोरी करूनि गोरटी । घालिती हरीच्या निजकं ठीं ।दृढ बांधिती रिठे गांठीं । होईल दृष्टि म्हणवोनी ॥२०६॥
श्रीकृ ष्णकथा प्रयाग थोर । भावमाघमासी सुंदर । येथें माघस्नान भक्तनर । त्रिकाळ करिती अनुतापें ॥२०७॥
की हा हरिविजयग्रंथराशी । हे आनंदवन वाराणसी । येथें जे होती क्षेत्रवासी । ते कृ ष्णासी परम प्रिय ॥
२०८॥
जो भीमातीरविहार । श्रीब्रह्मानंद जगदुध्दार । जो श्रीधरवरद उदार । त्याचें चरित्र परिसा आतां ॥२०९॥
इति श्रीहरिविजयग्रंथ । संमत हरिवंशभागवत । चतुर श्रोते परिसोत । चतुर्थोऽध्याय गोड हा ॥२१०॥
श्रीकृ ष्णार्पणमस्तु ॥

गोकु ळात काय झाले ? काही वेळाने यशोदा जागी झाली. कु शीत सावळ्या वर्णाचा बालक निद्रिस्त होता.
सुंदर कु रळे जावळ होते. तिला अत्यानंद झाला. पान्हा फु टला. जगदीश जन्माला आला होता ! आणि
योगमायेनेही जिची कन्या म्हणून जन्म घेतला त्या वात्सल्यमूर्ती यशोदेकडून लालनपालन करून घेणार
होता ! सकाळी वार्ता गोकु ळात पसरली. नंदाला तर अत्यानंद झाला, "अहो ! नंदयशोदेला मुलगा झाला
बरं का ?" असे गवळणी एकमेकांना सांगू लागल्या. नवपुत्राच्या पवित्र दर्शनासाठी नंदाच्या दारी गर्दीच
झाली. गर्गमुनी आले. पुण्याहवाचन झाले. मांडव घालून मोठा उत्सव के ला गेला. गवळणी रंगीबेरंगी वस्त्रे
लेवून नटूनथटून मिरवत होत्या. नंदाने वाणे वाटली. अहेर दिले. त्याची तर अनेक जन्मांची पुण्याई
फळाला आली होती. नंदाच्या सावळ्या बाळाला कृ ष्ण, श्यामसुंदर अशा नावांनी गोपगोपी हाका मारू
लागल्या. त्याच्याकडे पाहून आपसात बोलू लागत्या- "अगं, हा अंगाने जरा थोराडच दिसतो नाही का !
पण त्याच्या मुठी पहा कशा आवळलेल्या आहेत. मोठेपणी जग मुठीत ठेवणार की काय ? दिसतो बघा
किती सुंदर ! माझी बाई दृष्टीच हालत नाही त्याच्यावरून." यशोदा म्हणाली- "ए, काय ग असं बोलतेस ?
दृष्ट लागेल ना माझ्या मनमोहनाच्या रूपाला !"

गवळणी यशोदेचा मोठ्या प्रेमाने सत्कार करू लागल्या. यशोदेने उत्तम वस्त्रेभूषणे धारण के ली होती !
पुरोहित गर्गमुनी यांनी बाळाची लक्षणे पाहून त्याचे भविष्य वर्तविले "यशोदे ! तू मोठी भाग्यवती ! हा तर
साक्षात् विष्णू ! त्याची तू आई झालीस ! याची कीर्ती त्रिभुवनात होईल. याच्यापुढे कोणतेही संकट
टिकणार नाही. दुष्टांना शासन करून साधूंचे रक्षण करणारा हा ईश्वरी अवतार आहे ! हा गोपालक होईल,
दैत्यांना घातक होईल. तो अनेक चमत्कार करील. बंदीतील लोकांना हाच मुक्त करील. तुम्हाला आणि
व्रजवासियांना अतिशय आनंद देईल. श्रीकृ ष्ण, गोविंद व गोपाल ही याची नावे प्रख्यात होतील. जगाला
हा वंद्य व पूज्य होईल !" असे भविष्य ऐकताच नंदयशोदा हर्षित झाली. बारा दिवस मोठा सोहळा झाला.
शेषशायी भगवंत नंदाघरी पाळण्यात घातला. श्रीकृ ष्ण असे त्याचे नाव ठेवण्यात आले. भक्तांसाठी मायेचे
परमनिधान, अनंत, विराट, परमेष्ठी, आता बालक होऊन नंदाला आनंद देऊ लागला.

कृ ष्णजन्मानंतर गोकु ळात गाई जास्तच दूध देऊ लागल्या. पीक अधिक मिळू लागले. लोक आनंद व
उत्साह यांनी भरून आले. सृष्टी सर्वांगी पुलकित झाली.

पण कं साच्या मथुरेत अपशकु न होऊ लागले. कं साने आपल्या मंत्र्याना बोलवून म्हटले- "माझा मृत्यू
ज्याच्या हातून होण्याचा संभव आहे तो जन्माला आला आहे. त्याचा आपल्या राज्यात सारीकडे शोध
घ्या. ज्याला तो सापडेल त्याला मी मोठे दान देईन."

एकजण म्हणाला- "कं स महाराज ! मी असे ऐकतो की गोकु ळात कु ठेतरी तुमच्या शत्रूचा जन्म झाला
आहे. पण कितीतरी गोपस्त्रिया प्रसूत झाल्या आहेत. त्यातील कोणता बालक तुमचा वैरी ते कसे
समजणार ?" त्यावेळी चर्चा झाली. महाबल नावाच्या दैत्याने ब्राह्मण ज्योतिषाचे रूप घेऊन गोकु ळात
जावे आणि नेमका कोणता बालक दैवी गुणांचा आहे ते ओळखून त्याला गुप्तपणे मारावे असे कं स व
त्याचे मंत्री यांनी ठरविले.

महाबलाने ब्राह्मणाचे अगदी हुबेहूब रूप धारण के ले. तो गोकु ळात आला. घरोघर हिंडून 'आपण सामुद्रिक
शास्त्र जाणतो' असे सांगून लोकांवर त्याने आपली छाप पाडली. काही गोपांना आपल्या पैशाचिक
विद्येच्या साह्याने त्याने भविष्यही सांगितले. लहान मुलांचे भविष्य आपण बिनचूक सांगतो असा त्याचा
दावा होता. गोपांनी त्याला नंदाच्या घरी आणले. ज्योतिषी म्हणून नंदाने त्याचा आदर के ला. यशोदा
श्रीकृ ष्णाला घेऊन त्याच्या समोर आली.

त्या दैत्याने श्रीकृ ष्णाचे तेज पाहून लगेच ओळखले - हा बालक तर विलक्षण दिसतो ! नंद-यशोदा यांपेक्षा
याचा तोंडवळा वेगळा दिसतो. हा सावळा असला तरी मन वेधून घेतो. त्याने पंचांगात पाहिल्यासारखे
के ले. जन्मतिथी व वेळ विचारली. मान हलविली. बोटांवर गणित के ल्याचे नाटक के ले आणि गंभीरपणे
म्हणाला- "हा मुलगा अपशकु नी आहे. याला घरातच काय, गोकु ळातही ठेऊ नका. त्याच्यामुळेच
तुमच्यावर मोठमोठ्या आपत्ती येतील. याला दूर रानात नेऊन टाकू न द्या ! नाहीतर तुमच्या कु ळाचा व
गोकु ळाचा नाश करील." यशोदेने घाबरून पटकन बाळाला पदराआड लपविले.

पण श्रीकृ ष्णाने त्या कपटी दैत्याला आपला प्रसाद दिला ! त्या दैत्याच्याच डोक्यावर शिंके होते. ते तुटले.
त्यातील मडके पडले ते त्याच्या डोक्यावर. खापर लागून डोक्याला जखम झाली. रक्त वाहू लागले. दैत्य
उठला, जायला निघाला. एक लाटणे आपोआप उडाले. त्याच्या तोंडात गपकन उभे बसले. घरातल्या
सगळ्या वस्तु टणटणा उडत त्याच्यावर येऊन पडू लागल्या ! त्याची पार दैना उडाली. तो पळत सुटला.
सारे त्याला हसू लागले. तो मथुरेत गेला. कं साजवळ जाऊन सारा वृत्तांत त्याला सांगितला. कं साने
जाणले- 'आपला शत्रू म्हणजे तो नंदाचा पोर ! नाहीतर असा प्रकार झाला नसता !' महाबळाला त्याने
मोठे दान दिले. त्यावर उपचार करविले. त्याने कं साचे कार्य के ले होते.

कं स चिंताग्रस्त झाला. गोकु ळात जाऊन, कोणत्या तरी प्रकारे नंदाच्या पुत्राचा घात करायला हवा होता.
त्याच्या आश्रयाला पूतना नावाची एक राक्षसी होती. तिला मायावी विद्या येत होती. ती कं साला
म्हणाली- मी मानव स्त्रीचे सुंदर रूप घेते. गोकु ळात जाते. नंदपुत्राला स्तनपान देण्याचे नाटक करते, आणि
विषप्रयोग करते, तो तत्काळ मरून जाईल." कं साने तिला पाठविले आणि सांगितले- "तू आधी इतर
गावात जा. नि तिथेही तुझा प्रभाव दाखव. माझी काही हरकत नाही."

पूतनेला जास्तच आनंद झाला. तिने अत्यंत सुंदर सोज्वळ रूप धारण के ले. घरोघरी कोणत्या तरी निमित्ताने
जाऊन तिने अर्भकांना दृष्ट लावली ! काही मुले आजारी पडली. काही तिच्या विषारी दृष्टीने मरण पावली.
पण तोपर्यंत ती तिथून दिसेनाशी झालेली असायची. तिचा संशय मात्र कोणाला आला नाही.

फिरता फिरता ती नंदाघरी आली. तिला पाहून यशोदेला आनंद झाला. कारण तिने रूपच तसे सोज्वळ
धारण के ले होते. पूतनेने म्हटले- "इकडे तिकडे मंडप, तोरणे, उत्सवाची लक्षणे दिसत आहेत. विशेष काय
?" यशोदेला बाळाचे कौतुक ! तिने भोळेपणाने तिला पाळण्यात निजलेला श्रीकृ ष्ण दाखविला. तोच
कृ ष्ण जागा झाला. पायाचा अंगठा तोंडात धरून चोखू लागला. ते ध्यान पाहून पूतनेला हर्ष झाला. तिने
म्हटले, 'माई, मी घेऊ का जरा बाळाला ! किती सुंदर आहे हो हा ! मला तर बाई पान्हाच फु टला ! त्याला
मी पण पाजू का ?' यशोदेला नवल वाटले. पण सरळ स्वभावाची चांगली बाई पाहून "बरं, घ्या हं जरा.
मी घरातलं काम उरकते तोवर घ्या. बसा इथं" असे म्हणून तिने बाळाला पूतनेजवळ दिले. यशोदा आत
गेली.

पूतनेने लाडिक शब्दात बाळाजवळ बोबडे बोलत त्याला मांडीवर घेतले. त्याला ती स्तन्य देऊ लागली.
तेवढ्यात यशोदा बाहेर आली. या स्त्रीचे वात्सल्य पाहून तिला नवलही वाटले, आनंदही झाला. ती पुन्हा
आपल्या कामात मग्न झाली.

कृ ष्णाने पूतनेच्या विषमय स्तनातून हळूहळू विष शोषण करण्यास प्रारंभ के ला. त्याचा काहीही प्रभाव
कृ ष्णावर पडला नाही. आता तो डोळे फिरवील आणि मरून पडेल असा अंदाज करीत पूतना त्याला
पाजीत होती. पण कृ ष्णाने तिच्या स्तनातील सारे विष शोषून रडायला प्रारंभ के ला. तेव्हा तिने दुसर्‍या
स्तनाशी त्याला धरले. त्याने त्यातील विषही शोषण के ले. आणि तो स्तन तीव्रपणे चोखू लागला. काय
प्रकार होत आहे हे कळायच्या आत कृ ष्णाने तिचे प्राणच खेचून घेण्यास प्रारंभ के ला. तेव्हा ती घाबरली.
कासावीस झाली. तिच्या खांद्यावर कृ ष्णाने एक हात घट्ट रोवला. पूतना खाली पडली. "अरे पुरे ! सोड !
जीव नको कु रतडूस ! देवा ! मी चुकले ! श्रीकृ ष्णा ! मी पुन्हा असे करणार नाही ! पण मला सोड" असे
काकु ळतीने म्हणू लागली.

ती मूर्च्छित पडली. तरी कृ ष्णाने तिला सोडले नाही. त्याने तिचे प्राणच ओढून तिला मुक्ती दिली !
राक्षसिणीचे मूळ रूप मरता मरता तिला पुन्हा प्राप्त झाले. कपटी खेळ खलास झाला. मारण्याच्या इच्छेने
जरी ती आली होती तरी कृ ष्णाबद्दल वात्सल्य भावाने ती त्याच्याशी एकरूप झाली. त्यामुळे कृ ष्णाने
तिला सद्‌गति दिली ! यशोदा बाहेर आली तो पूतना ही राक्षसी अस्ताव्यस्त पडलेली तिला दिसली.
"सोज्वळ सुंदर स्त्री कु ठे गेली ! हा कृ ष्ण तर या राक्षसिणीच्या स्तनाशी आहे. अरे देवा ! ही तर मरून
पडली आहे. असे पाहून यशोने घाबरून सर्वांना हाका मारल्या. घरातले सारे धावले. ते भयंकर दृश्य पाहून
थबकले. एका गोपाने पुढे होऊन कृ ष्णाला पटकन् उचलले. यशोदेजवळ दिले. विष पचवून तो बाळ हसत
होता. यशोदेला तो पटकन बिलगला !

बाळावर आलेले भयानक संकट पाहून गोकु ळच हादरले होते ! गोकु ळातल्या लोकांना आता कृ ष्णाची
फार काळजी वाटू लागली. नंद त्यावेळी मांडलिकत्वाचा कर भरण्यासाठी मथुरेला गेला होता ! संधी
साधून संकट आले होते. लोक भयभीत झाले होते. संकटातून श्रीकृ ष्ण वाचला, त्याच्या अंगी मोठी
अलौकिक शक्ती आहे असे लोकांना वाटू लागले. ते वेगळ्या दृष्टीने कृ ष्णाकडे पाहू लागले. यशोदेला
संकट टळल्याचा आनंद झाला होता. वेषधारी कपटी राक्षसिणीला ईश्वराने पिटाळून लावले, राक्षसिणीला
ईश्वरानेच नष्ट के ले हे ओळखून यशोदा कृ ष्णाला जास्त जपू लागली !
अध्याय ४ समाप्त
॥ श्रीकृ ष्णार्पणमस्तु ॥

You might also like