Professional Documents
Culture Documents
त्यावेळी देवांना गंभीर अशी दिव्य वाणी ऐकू आली. ती ऐकतांच देव आनंदाने थर थर कापू लागले.
त्यांची हृदये उचंबळून आली ! भिऊ नका ! पृथ्वी ! देवगणांनो, चिंता करू नका. मी तुमचे गार्हाणे ऐकले
आहे. दैत्य माजले आहेत. त्यांना शासन करण्यासाठी मी लवकरच यदुकु ळात पूर्णांशाने अवतार घेणार
आहे. तुम्हीही यादववंशात माझ्या बरोबरीने जन्म घ्या. उपदेवतांनी गोपाल म्हणून जन्म घ्यावा. ऋषींनी
गाईगुरे व्हावे. गोकु ळात माझ्या संगतीत रहावे. कोणी कोणाचा जन्म घ्यावा ते सांगतो. पंडूचे पाच पुत्र
म्हणून यम, धर्म, वायु, इंद्र, अश्विनीकु मार यांनी यावे. बृहस्पती हाच द्रोणाचार्य, पार्वती हीच द्रौपदी, लक्ष्मी
हीच रुक्मिणी, शेष हाच संकर्षण, अग्नी हाच द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न, आणि पुढे वसुदेव व देवकी यांचा पुत्र
म्हणून मी जन्म घेईन. माझी योगमाया शक्तिरूपाने माझ्या आधी जन्म घेईल. गोकु ळात मी बालपण
घालवीन. मीच दुष्टांचा नाश करीन. तुम्ही या अवतारकार्यात मला सहाय्य करायला या ! आता निर्भयपणे
स्वस्थानी जा. पुढच्या तयारीला लागा !
ही दिव्य वाणी ऐकली. देवांचे समाधान झाले. सर्वजण स्वर्गलोकात परत आले. नंतर ऋषी, मुनी व देव
आपापल्या स्थानी गेले.
श्रोतेहो, पुढे यदुवंशात शूरसेनाला वसुदेव हा पुत्र झाला. त्या वसुदेवाला जो पुत्र होणार तोच विष्णूचा
अवतार, याचे ज्ञान देवांना होते. त्यानी आनक व दुंदुभि यांचा मंगल ध्यनि के ला. वसुदेवाला
'आनकदुंदुभि' असे नाव पडले । उग्रसेनाचा भाऊ देवक, त्याला देवकी ही जी कन्या होती तिचा विवाह
पुढे वसुदेवाशी झाला. उग्रसेनाची पत्नी मोठी साध्वी होती. तिच्यावर एकदा मोठा दुर्धर प्रसंग ओढवला ।
एका राक्षसाने तिला अचानक पळविले आणि तिच्यावर बलात्कार के ला ! तिने त्याला शाप दिला -
'मला तुझ्यापासून जो पुत्र होईल त्याचा विष्णूच्या हातून घात होईल ! पुढे तिला मुलगा झाला. तोच कं स
! उग्रसेनाला राज्यभ्रष्ट करून त्याने पुढे मथुरेचे राज्य बळकावले. देवकी ही त्याची चुलत बहीण. कं स
पित्याचा द्वेष करी, यादवांचा द्वेष करी, आईला छळी, ग्रोब्राह्मणांना त्रास देई. त्याचे देवकीवर मात्र बंधुप्रेम
होते. तिचा विवाह वसुदेवाशी ठरला तेव्हा त्याला फार आनंद झाला. देवकी व वसुदेव ज्या रथात बसून
वरातीसह जाणार त्याचे सारथ्य कं स स्वतः करू लागला. बहिणीचे कल्याण व्हावे ही त्याची इच्छा होती.
रथ चालू लागला. लोक दाटीवाटीने यात्रेत सामील झाले होते. गर्दी फार होती. मथुरेतील सर्व मार्ग
सुशोभित के ले होते. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. तोच गंभीर अशी आकाशवाणी झाली- 'कं सा ! तू
ज्या भगिनीची वरात इतक्या थाटात नेत आहेस, त्याच भगिनीच्या आठव्या अपत्याकडून तुझा मृत्यु होईल
! हे लक्षात ठेव !'
कं स दचकू न स्वस्थ बसला. रथ थबकला. वरात जागीच थांबली. उत्सवाचे वातावरण काळवंडले. कं स
एकदम उठला. त्याने कमरेचे खड्ग उपसले ! देवकीला मारून टाकले म्हणजे आपल्यावरील संकट टळेल
अशा विचाराने तो देवकीचा तिथेच शिरच्छेद करणार होता. त्याने खड्ग उगारले. देवकीची वेणी धरून
हिसडली ! देवकीला त्याने जमिनीवर ओढले. वसुदेवाने उडी मारली. देवकी भावाच्या हातापाया पडली.
मारू नको म्हणून विणवण्या करू लागली. सारे तटस्थ ! दारुण प्रसंग ओढवला. उग्रसेन कं साची निंदा
करू लागला. वसुदेवाने कं साचा हात धरून त्याला अडवले. स्त्रीहत्येचे पाप करू नको म्हणून विनविले.
कं स ऐके ना. "जिचे आठवे अपत्य म्हणजे माझे मरण, तिला मी आताच मारून टाकतो. मुलेच व्हायला
नकोत !"
वसुदेवाने दयायाचना के ली. "देवकीला जी अपत्ये होतील ती मी तुझ्या स्वाधीन करीन. हिला कशाला
मारतोस ?" असे म्हणून कं साची समजूत काढली. भर वरातीत होऊ घातलेले घोर कर्म टळले. कं स द्रवला.
त्याने वसुदेवाला व देवकीला बंदीत टाकले. त्यांच्यावर कडक पहारा ठेवला. वाजत गाजत वरात निघाली
खरी, पण देवकी आणि वसुदेव यांचा संसार बंदीखान्यातच सुरू झाला ! कालांतराने तुरुं ग अंगवळणी
पडला. कलीकाळाने देवकीला पुत्ररत्न झाले. वसुदेवाला आनंद झाला, पण लगेच हे मूल कं साला द्यायचे
आहे या विचाराने दुःख वाटले. देवकी रडू लागली. या अर्भकाला आपला भाऊ मारून टाकणार या
कल्पनेने तिला ब्रह्मांड आले. पण वसुदेवाने मन आवरले, अर्भकाला घेऊन तो कं साकडे गेला. त्याचा
प्रामाणिकपणा पाडून कं साचे विचार पालटले. 'तुझे आठवे अपत्य माझा घात करणार आहे, मी याला
कशाला मारू ? तू याला परत ने' असे म्हणून कं साने वसुदेवाला परत पाठविले.
वसुदेव पुत्रासह परत आला. त्या दांपत्याला नवल वाटले. देवकीला रडता रडता हसू आले. आपला बाळ
वाचला ह्याचा आनंद त्या दोघांना झाला खरा, पण तो काही फार काळ टिकला नाही ! कारण, देवांची
योजना काही वेगळीच होती.
नारद कं साच्या राजसभेत आले. स्वागताचा स्वीकार करून म्हणाले- 'कं सा, वसुदेवाच्या प्रथम पुत्राला तू
मारून टाकलेस ना ?' कं स म्हणाला- "नाही. तो पहिला मुलगा आहे. त्याच्यापासून मला काही भय
नाही." नारद म्हणाला- "अरे कं सा, देवांच्या भाषेचा अर्थ सामान्यांना कळत नाही. आठवे अपत्य कसे
मोजायचे ? कोणत्याही अपत्याला पहिले समजून कोणतेही अपत्य आठवे ठरू शकते. तू शंके ला जागाच
ठेवू नको. वसुदेवाचा कोणताही पुत्र तुला घातक ठरू शकतो. तू त्या अर्भकाला तत्काळ मारून टाक."
नारदांचे हे बोलणे, मृत्युला भिणार्या पण दुष्ट अशा कं साने मनावर घेतले. त्याने लगेच आपला विचार
बदलला. नारद निघून गेल्यावर तो लगेच उठला. स्वतःच बंदीशाळेत गेला. पहारेकरी दक्ष झाले.
कं साबरोबर त्याचे दोनचार सेवक होतेच. दार उघडायला लावून कं स आत शिरला आणि तरातरा चालत
त्याने देवकीच्या समोर जाऊन 'तुझा पोर देऊन टाक' म्हणून दरडावले, मांडीवर निजलेल्या नवजात
शिशूला त्याने खसकन् उचलले. देवकी किं काळी मारुन बेशुद्धच पडली. वसुदेव पुढे धावला, त्याला
कं साने दूर ढकलले आणि त्या पोराला बाहेर नेऊन एका मोठ्या शिळेवर आपटून ते छिन्नविछिन्न करून
टाकले !
नारदांनी असे कां सांगितले ? कं साचे अपराध पूर्ण झाले पाहिजेत म्हणजेच त्याला मारण्यासाठी विष्णू
येईल. जेवढ्या बालहत्या त्याच्याकडून होतीत तेवढा अवतार लवकर होईल असा देवांचा मानस होता.
पहिला पुत्र निष्प्राण पडला त्याचबरोबर कं साच्या पापाचा घडा भरू लागला.
दिवसामागून दिवस गेले. देवकीला एकदोन वर्षांनी पुत्र होत होता. पण कं स तो मारून टाकीत होता. असे
सहा पुत्र कं साने मारले. त्याला भगिनीची दयासुद्धा आली नाही. देवकी शोकाकु ल होती. वसुदेवाचे दुःख
मुके होते !
कालांतराने देवकीला सातव्यांदा गर्भ राहिला. हे अपत्य म्हणजेच भगवंताची योगमाया ! तिचे वृत्त पुढे
ऐका.
अध्याय २ समाप्त.
॥ श्रीकृ ष्णार्पणमस्तु ॥