You are on page 1of 8

॥ अध्याय तिसरा ॥

अवताराची योजना - कृ ष्णजन्म व कृ ष्णाचे गोकु ळात आगमन -

श्रीगणेशाय नमः ॥
जय जय अनंतब्रह्मांडनायका । चतुराननाचिया निजजनका । चोघांसीही नव्हे आवांका । तुझें स्वरूप वर्णावया ॥१॥
साही जणें वेडीं होती । अठरांची खुंटली गती । चौघीजणी तटस्थ पाहती । स्वरूपस्थिति न वर्णवे ॥२॥
पांचां नुरेचि ठाव । चारी सहजचि जाहलीं वाव । चौदाजणींची ठेव । न चले स्वरूप वर्णावया ॥३॥
शिणल्या बहुत चौसष्टी । आठजणी बहुत कष्टी । अकराही हिंपुटी । स्वरूप तुझें वर्णितां ॥४॥
आणीक बारा देखण्या । सोळाजणी चतुर शाहाण्या । आणि चौघी डोळेमोडण्या । लाजोनियां तटस्थ ॥५॥
पंचविसां जाहली वाव । तिघांचें नुरेचि नांव । दोन्ही म्हणणें भाव । हेंही तेथें विरालें ॥६॥
चहूं मुखांचा वर्णितां भागला । पांचां मुखांचा तटस्थ राहिला । सहा मुखांचा दडाला । कपाटामाजी जाऊनि ॥७॥
सहस्र मुखांचा वर्णितां देख । तोही जाहला तळीं तल्पक । थोरथोरांसी पडले अटक । एक मुखें काय वर्णूं ॥८॥
जीमूतींचें बिंदू किती । हेही एक वेळां होय गणती । निराळीं पायीं वेंघती । परी तुझी स्थिति अगम्य ॥९॥
होईल पृथ्वीचें वजन । गणवेल सिंधूचें जीवन । अवनीवरी किती तृण । मोजवेल गणितां तें ॥१०॥
अंबर आहे किती विती । हेंही गणवेल रमापती । परी तुझे गुण निश्चिती । न वर्णवती कोणातें ॥११॥
असो आतां पूर्वानुसंधान । द्वितीयाध्याय संपतां पूर्ण । कं सें देवकीचे गर्भ वधून । साही टाकिले बंदिशाळे ॥१२॥
पाप जाहलें उत्कट जाण । गांजिले गाई ब्राह्मण । यावरी क्षीरसागरीं जगज्जीवन । काय करिता जाहला ॥१३॥
अनंतासी म्हणे अनंत । चला अवतार घेऊं त्वरित । करूं दुष्‍टांचा निःपात । संत भक्त रक्षूं पैं ॥१४॥
तंव बोले धरणीधर । मी न घें आतां अवतार । पूर्वीं मी जाहलों सौमित्र । कष्ट फार भोगितले ॥१५॥
हांसोनि बोले द्विसहस्रनयन । अष्टाविंशति अयनें उपोषण । निराहार घोर अरण्य । तुम्हांसवें सेविलें जी ॥१६॥
आतां आपणांचे अवतरावें । अवतारनाट्य दाखवावें । गोब्राह्मण सुखी रक्षावे । प्रतिपाळावे साधुजन ॥१७॥
टाकोनि कपट कु टिलभाव । स्वामीसी हांसे भोगिराव । बोले कौतुकें रमाधव । शेषाप्रती स्वानंदें ॥१८॥
तूं माझा प्राणसखा । समरभूमीचा पाठिराखा । तुजविण भक्तटिळका । अवतार मी न घेंचि ॥१९॥
तूं माझें निजांग पूर्ण । तूं सखया माझा निजप्राण । तुजविण मज एक क्षण । न गमेचि जिवलगा ॥२०॥
तूं जाहलासी पूर्वीं लक्ष्मण । लंके सी के लें रणकं दन । बहुत सेवा करून । मज तुवां तोषविलें ॥२१॥
आतां तूं पुढें जाय सत्वर । होईं माझा ज्येष्‍ठ सहोदर । मी तूझी आज्ञा पाळीन निर्धार । बळिभद्र होईं तूं ॥२२॥
वडील बंधु तूं होईं । देवकीच्या गर्भीं जाऊनि राहीं । मी योगमायेसी लवलाहीं । पाठवितो तुजमागें ।२३॥
कं सें वधिलें गर्भ सकळ । तुज योगमाया काढील । मग गोकु ळीं नेऊनि ठेवील । रोहिणीच्या निजगर्भीं ॥२४॥
माया जाईल यशोदेच्या उदरा । मग मी येईन मथुरापुरा । देवकीचा गर्भवोवरा । माझा अवताररूप होय ॥२५॥
उपजतांचि गोकु ळीं येईन । मग तुम्ही आम्ही खेळों दोघे जण । गोरक्षमिषें संपूर्ण । दैत्य तेथील संहारूं ॥२६॥
करूनि साष्टांग नमन । पुढें चालिला संकर्षण । देवकीच्या उदरीं येऊन । गर्भ राहिला सातवा ॥२७॥
दिवसेंदिवस गर्भ वाढे । मंदिरीं परम प्रकाश पडे । जैसा पळेंपळ सूर्य चढे । उदयाद्रीहूनि पश्चिमे ॥२८॥
वसुदेवाप्रती देवकी बोले । सहा वेळां मी गर्भिणी जाहलें । परी नवल वाटतें ये वेळे । या गर्भाचें मजलागीं ॥२९॥
वाटे पृथ्वी उचलीन । कीं आकाशा धीर देईन । सप्त समुद्र सांठवीन । नखाग्रीं मज वाटतसे ॥३०॥
हातीं घेऊन नांगर-मुसळ । मीच मर्दीन कं सदळ । दैत्य मारावे समूळ । मनामाजी वाटतसे ॥३१॥
वसुदेव म्हणे ते क्षणीं । न कळे ईश्वराची करणी । येवढा तरी वांचोनी । विजयी हो कां सर्वदा ॥३२॥
तों लागला सातवा मास । निद्रा आली देवकीस । वसुदेवही सावकाश । निद्रार्णवीं निमग्न ॥३३॥
तंव ती हरीची योगमाया । तिची ब्रह्मांदिकां न कळे चर्या । इच्छामात्रें महत्कार्या । ब्रह्मांड हें रचियेलें ॥३४॥
ब्रह्मा विष्णु शिव तीन्ही । गर्भी आलीं बाळें तान्हीं । परी एकासी नेत्र उघडूनी । स्वरूप पाहों नेदीचि ॥३५॥
आत्मसुखाचा समुद्र । त्यांत पहुडले जीव समग्र । परी चाखों नेदी अणुमात्र । गोडी तेथींची कोणातें ॥३६॥
हे चैतन्याची बुंथी । हे अरूपाची रूपकर्त्री । ब्रह्मांडींचे पुतळे नानागती । एका सूत्रें नाचवी पैं ॥३७॥
इनें निर्गुण गुणासी आणिलें । इनें अनामासी नाम ठेविलें । इनें निराकारा आकारिलें । धरविले अवतार ॥३८॥
हे पतीसी न कळतां । गर्भिणी जाहली पतिव्रता । ब्रह्मांड रचिलें तत्त्वतां । इच्छामात्रेंकरूनियां ।३९॥
शेजे निजवूनि भ्रतार । सृष्टी घडी मोडी समग्र । समाचार अणुमात्र । कळों नेदी पतीतें ॥४०॥
हे कौटाळीण निर्धारीं । नसतींचि दैवतें उभीं करी । जीव पाडिले अघोरीं । नाना योनीं हिंडवी ॥४१॥
धरील कोणी स्वरूपाची चाड । त्यावरी घाली नसतें लिगाड । पुढें स्वर्गसुख करी आड । तेंचि गोड दाखवी ॥४२॥
गोड तें कडवट के लें । कडवटा गोडपण दाखविलें । अहंकारामद्य जीवा पाजिलें । वेडे के ले सर्वही ॥४३॥
आतां असो हे मायाराणी । इची विपरीतचि करणी । तिनें देवकीचा गर्भ काढूनी । गोकु ळासी पैं नेला ॥४४॥
कै सा नेला काढुनी । ब्रह्मादिकां न कळे करणी । रोहिणी वसुदेवाची पत्‍नी । नंदागृहीं होती ते ॥४५॥
कं साचिया भयें जाण । नंदगृहीं राहिली लपोन । तिच्या पोटीं नेऊन । गर्भ घातला ते क्षणीं ॥४६॥
निजले ठायीं गर्भ । पोटांत घातला स्वयंभ । परम तेजस्वी सुप्रभ । सूर्य जैसा तेजस्वी ॥४७॥
जागी जाहली रोहिणी । तों सात मासांची गर्भिणी । म्हणे कै सी जाहली करणी । चिंता मनीं वर्तत ॥४८॥
पुरुष नसतां गर्भ राहिला । परम चिंताक्रांत ते अबला । नंदयशोदेस कळला । समाचार सर्व तो ॥४९॥
जीवीं झोंबला चिंताग्नी । तों आकाशीं वदली देववाणी । चिंता करूं नको रोहिणी । वसुदेवाचा गर्भ असे ॥५०॥
पोटा येतो भोगींद्र । उतरील पृथ्वीचा भार । ऐकतां हें उत्तर । सुख जाहलें समस्तां ॥५१॥
लोकापवाद सर्व हरला । चिंतेचा डाग धुतला । तों बळिराम जन्मला । नवमास भरतांचि ॥५२॥
प्रकाशला सहस्रकिरण । तैसा बाळ देदीप्यमान । नंदें जातक वर्तवून । बळिभद्र नाम ठेविलें ॥५३॥
ऐसा उपजला अहींद्र । तों यशोदा जाहली गरोदर । हरिमायेनें अवतार । तेथें घेतला तेधवां ॥५४॥
यशोदा गर्भिणी जाहली । इकडे कथा कै सी वर्तली । देवकी पाहे घाबरली । तों गर्भ नाहीं पोटांत ॥५५॥
नेणों कै सी जाहली करणी । सांगे वसुदेवा लागोनी । म्हणे गर्भ न पडेची धरणीं । गेला जिरोनि पोटांत ॥५६॥
वसुदेव म्हणे ते वेळां । कं सधाकें गर्भ जिराला । न कळे ईश्वराची कळा । कं सास कळला समाचार ॥५७॥
दूत सांगती कं सातें । गर्भ जिरला तेथिंचा तेथें । कं स म्हणे आतां आठव्यातें । बहुत जपा सर्वही ॥५८॥
देवकी होतांचि गर्भिण । जागा नेत्रीं तेल घालून । आठव्याची आठवण । विसरूं नका सर्वथा ॥५९॥
देवकीउदरींचा आठवा । निजध्यास बैसला कं सभावा । जनीं वनीं आघवा । आठवा आठवा आठवत ॥६०॥
जागृतीं सुषुप्तीं स्वप्नीं । आठवा दिसे ध्यानीं मनीं । आठवा दिसे भोजनीं । आठवा शयनीं सोडीना ॥६१॥
भूमि दिसे आठव्याऐसी । आठवा दिसे आकाशीं । आठव्यानें व्यापिलें त्यासी । दिवसनिशीं आठवा ॥६२॥
क्षीरसागरीं श्रीहरी । क्षीराब्धिसुतेसी आज्ञा करी । पद्माक्षि तूं क्षितीवरी । क्षितीपाळउदरीं अवतरें ॥६३॥
वैदर्भदेशींचा भीमक राजा । तयाची तूं होय आत्मजा । तात्काळ चालली कमळजा । नमस्कारूनि हरीतें ॥६४॥
जगद्वंद्य स्वयें आपण । प्रवेशला मथुरापट्टण । देवकीचे गर्भीं येऊन । राहता जाहला कौतुकें ॥६५॥
गर्भवासा आला भगवंत । म्हणतां हांसतील साधुसंत । लीलावतारी जगन्नाथ । जन्म-मृत्यु त्या कैं चा ॥६६॥
ज्याचें करितां स्मरण । जाय जन्म-मृत्यु खंडोन । तो राहिला गर्भीं येऊन । कल्पांतींही घडेना ॥६७॥
उगाच लौकिकभाव । दाविली मृत्युलोकींची टेव । तो ब्रह्मानंद स्वयमेव । जन्म-मृत्यु त्या कैं चा ॥६८॥
क्षीरसागरींहून हरि आला । तरी तो ठाव काय ओस पडिला । तो तैसाचि संचला । लक्ष्मी-शेषांसमवेत ॥६९॥
अनंत रूपें अनंत नामें । अनंत अवतार अनंत कर्में । अनंत लीला घनश्यामें । भक्तांलागीं दाविल्या ॥७०॥
अनंत ब्रह्मांडें अनंत शक्ती । अनंत युगींच्या अनंत कीर्ती । अनंत रूपें अनंत मूर्ती । अतर्क्य गति वेदशास्त्रां ॥७१॥
असो लौकिक विचार देख । गर्भीं आला लक्ष्मीनायक । कं सासी लाविला धाक । देखिला नसतां सर्वदा ॥७२॥
देवकी जाहली गर्भिणी । तेज न माये गगनीं । खेद कांहीं न वाटे मनीं । सुखेंकरूनि डुल्लत ॥७३॥
पोटा आला विदेही हरी । देवकी नाहीं देहावरी । जनीं वनीं दिगंतरीं । अवघा मुरारी दिसतसे ॥७४॥
वसुदेव म्हणे देवकीप्रती । तुज चिंता कां न वाटे चित्तीं । आठव्याची कै सी गती । होईल ते न कळे पां ॥७५॥
कं स जपतो बहुत । आठव्याचा करावया घात । यावरी देवकी बोलत । प्रतिउत्तर काय तेव्हां ॥७६॥
भुजा पिटोनि बोले वचन । कं सास मारीन आपटोन । मुष्टिकचाणूरांचा प्राण । क्षणमात्रें घेईन मी ॥७७॥
हांक फोडोन गर्जे थोर । उतरीन पृथ्वीचा भार । करूनि दैत्यांचा संहार । बंदिशाळा फोडीन मी ॥७८॥
आणीं वेगें धनुष्यबाण । युद्ध करीन मी दारुण । जरासंध रथीं बांधोन । सत्रा वेळां आणीन मी ॥७९॥
भस्म करीन कालयवन । रचीन द्वारकापट्टण । सकळ नृपां शिक्षा लावून । पट्टराणी आणीन मी ॥८०॥
हांक फोडिली क्रोधें थोर । जिवें मारीन भौमासुर । निवटीन कौरवभार । निजभक्तकै वारें ॥८१॥
मी भक्तांचा सारथी होईन । दुष्ट सर्व संहारीन । मी ब्रह्मानंद परिपूर्ण । अवतरलों पृथ्वीवर ॥८२॥
वसुदेवासी चिंता वाटे । ही गर्जते येवढ्या नेटें । जरि बाहेर मात प्रकटे । तरी अनर्थ होईल पां ॥८३॥
वसुदेव बोले वचन । देवकी धरीं आतां मौन । येरी म्हणे कैं ची देवकी पूर्ण । ब्रह्म सनातन मी असें ॥८४॥
स्त्री पुरुष नपुंसक । त्यांहूनि वेगळा मी निष्कलंक । सकळमायाचक्रचाळक । कर्ता हर्ता मीचि पैं ॥८५॥
मी सर्वद्रष्टा अतींद्रिय । मी अज अव्यय निरामय । अजित अपार निष्क्रिय । आनंदमय वर्तें मी ॥८६॥
मी प्रळयकाळाचा शास्ता । मी आदिमायेचा नियंता । मी चहूं वाचांपरता । मायानिर्मिता मीच पैं ॥८७॥
मीच सगुण मीच निर्गुण । मीच थोर मीच लहान । देव दैत्य निर्मून । पाळिता हर्ता मीच पैं ॥८८॥
ऐसें देवकी बोलोन । मागुती धरिलें मौन । तों आकाशीं देव संपूर्ण । गजर करिती दुंदुभींचा ॥८९॥
अवतरेल आतां भगवंत । करील दुष्‍टांचा निःपात । देव मिळोनि समस्त । गुप्त मथुरेंत उतरले ॥९०॥
ब्रह्मादिक आणि चंद्र । बंदिशाळे पातळे समग्र । देवकीस प्रदक्षिणा करिती सुरवर । एक नमस्कार घालिती ॥९१॥
उभे ठाकू नि बद्धांजली । गर्भस्तुति आरंभिली । जय सच्चिदानंद वनमाळी । देवकीजठरगर्भा ॥९२॥
जय हरे नारायणा गोविंदा । इंदिरावर आनंदकं दा । सर्वेशा मुकुं दा परमानंदा । परमपुरुषा परज्ञा ॥९३॥
पद्मजजनका पुरातना । पंकजनेत्रा परमपावना । पद्मवल्लभा पशुपतिजीवना । पयोब्धिवासा परेशा ॥९४॥
पतितपावना पंकजधारका । कमनीयरूपा निष्कलंका । कमळस्वरूपा कमलानायका।किल्बिषमोचका कमलेशा ॥९५॥
कर्ममोचका करिवरतारणा । कै वल्यनिधि कै टभभंजना । करुणाकरा कामविहीना । काळनाशना काळात्मया ॥९६॥
आदिके शवा विश्वभूषणा । विश्वंभरा वेदपाळणा । वेदपुरुषा वेदस्थापना । विश्वाधीशा विश्वपते ॥९७॥
अनंतेवषा अनंतवदना । अनंतनामा अनंतनयना । अनंतपाणि अनंतचरणा । अनंतकल्याणा नमोस्तु ते ॥९८॥
अव्ययरूपा अपरंपारा । अगण्या अगुणा अगोचरा । अनामा असंगा अक्षरा । आदिकारणा आत्मया ॥९९॥
अमानुइषा अविद्याछेदना । आनंदरूपा आनंदसदना । अभेदा अबोधा अमळपूर्णा । आदिमूळा अव्यक्ता ॥१००॥
सर्वतीता सर्वज्ञा । गुणसागरा गुणज्ञा । आम्ही सकळ सुर तवाज्ञा । पाळोनियां राहतों ॥१०१॥
ऐसी स्तुति करूनि जाणा । देव पावले अंतर्धाना । आनंद न माये मना । सुरवरांच्या तेधवां ॥१०२॥
कं सासी रात्रंदिवस । लागला आठव्याचा निजध्यास । आठही प्रहर तयास । आठवावयास दुजें नाहीं ॥१०३॥
दूतींप्रती पुसे कं स । गर्भास किती जाहले मास । त्या म्हणती संपावयास । नव मासां अवधि थोडी हो ॥१०४॥
आपण येऊन कं सासुर । उभा राहे देवकीसमोर । तंव ते आनंदरूप साचार । चिंता अणुमात्र नाहींचि ॥१०५॥
नासाग्रीं ठेवून दृष्टि । कृ ष्णरूप पाहे सृष्‍टी । कृ ष्णरूप पाहे पाठीं पोटीं । बोलतां ओठीं कृ ष्णचि ये ॥१०६॥
कृ ष्णरूप आसन वसन । कृ ष्णरूप अन्न पान । कृ ष्णरूप दिसे सदन । भूषण संपूर्ण कृ ष्णरूप ॥१०७॥
पृथ्वी आप तेज वायु निराळ । कृ ष्णरूप दिसे सकळ । स्थावर जंगम निर्मळ । घननीळरूप दिसतसे ॥१०८॥
पुढें उभा कं स देख । परी निर्भय देवकी सुरेख । महेशापुढें मशक । तैसा कं स भासतसे ॥१०९॥
इंद्रापुढें जैसा रंक । कीं ज्ञानियापुढें महामूर्ख । कीं के सरीपुढें जंबुक । का सूर्यापुढें खद्योत पैं ॥११०॥
कीं हंसापुढें बग । कीं कोकिळेपुढें काग । कीं विप्रासमोर मांग । तैसा खळ उभा तेथें ॥१११॥
कीं नामापुढें पाप देख । कीं वेदांतापुढें चार्वाक । कीं शंकरापुढें मशक । मीनके तन उभा जैसा ॥११२॥
कीं पंडितापुढें अजापाळक । कीं श्रोतियापुढें हिंसक । कीं वासुकीपुढें मूषक । लक्षणें पाहूं पातला ॥११३॥
अग्नीपुढें जैसें तृण । कीं ज्ञानियापुढें अज्ञान । कीं महावातासी आडवें पूर्ण । जलदजाल जैसें कां ॥११४॥
ऐसा कं स देवकीपुढें । तीस न्याहाळूनि पाहे निवाडें । तंव तें चतुर्भुज रूपडें । शंख-चक्रयुक्त दिसे ॥११५॥
न दिसे स्त्रियेची आकृ ती । परम देदीप्यमान विष्णुमूर्ती । आरक्तनेत्र सुदर्शन हातीं । ऊर्ध्व करूनि उभी असे ॥११६॥
मुरकुं डी कं साची वळली । शस्त्रें हातींचीं गळालीं । बोबडी तोंडासी पडली । हांक फोडिली भयें तेव्हां ॥११७॥
आरडोनियां कं स पळे । थरथरां कांपे वाटे अडखळे । पिशाचवत संचरलें । गृहामाजी आपुलिया ॥११८॥
कं स तेव्हां शस्त्र घेऊनी । रागें आपटीत मेदिनीं । आठव्यास जिवें मारूनी । टाकीन मी निर्धारें ॥११९॥
आठव्यानें मज व्यापिलें । त्यासी मी गिळीन सगळें । कं स रागें फिरवी डोळे । आल्यागेल्यावरी पैं ॥१२०॥
आतां श्रीकृ ष्णाचा जन्मकाळ । पाहों आले निर्जर सकळ । दुंदुभिनादें निराळ । दुमदुमलें तेधवां ॥१२१॥
विमानांची जाहाली दाटी । वाव नाहीं नभापोटीं । करिती दिव्य सुमनवृष्‍टी । आनंद पोटीं न समाये ॥१२२॥
वर्षाऋतु श्रावणमास । बुधाष्टमी कृ ष्णपक्ष । अवतरला कमलदलाक्ष । रोहिणी नक्षत्र ते दिवशीं ॥१२३॥
सोमवंशीं अवतार । म्हणोनि साधिला चंद्रपुत्रवार । जाहला शशीचा उद्धार । दशा आली वंशासी ॥१२४॥
मध्यरात्रीं अष्टमीस । देवकीपुढें परमपुरुष । चतुर्भुज हृषीके श । निमासुर डोळस पैं ॥१२५॥
आठां वर्षांची मूर्ती । असंभाव्य पडली दीप्ती । तेजें दश दिशा उजळती । तेथें लपती शशि-सूर्य ॥१२६॥
पदकमळींचा आमोद सेवावया । भ्रमरी जाहली क्षीराब्धितनया । सर्वकाळ न विसंबे पायां । कृ पण जैसा धनातें ॥१२७॥
भागीरथी चरणीं उद्‌भवली । सागरीं ते एक जाहली । परी न विसंबे निजमुळीं । कदाकाळीं तुटेना ॥१२८॥
अरुणबालार्क संध्याराग । दिव्य रत्‍नांचे काढिले रंग । तैसे तळवे आरक्त सुरंग । श्रीरंगाचे शोभती ॥१२९॥
चंद्र क्षयरोगें जाहला कष्टी । मग राहिला चरणांगुष्ठीं । कीं दशधा होऊनि दाही बोटीं । सुरवाडला शशी तो ॥१३०॥
वज्र ध्वज पद्म अंकु श । ऊर्ध्वरेखा चक्र पदीं विशेष । सामुद्रिक चिन्हें सुरस । काय अर्थ सुचविला ॥१३१॥
साधकास ऊर्ध्वरेखा । ऊर्ध्वमार्ग दावी देखा । सत्त्वशीळा प्रेमळ भाविका । ऊर्ध्वसंके त दावीतसे ॥१३२॥
विद्यामदें जाहले जे मस्त । कोणास न लेखिती गज उन्मत्त । त्यांसी आकर्षावया वैकुं ठनाथ । क्षमांकु श धरी पदीं ॥१३३॥
पद्म कां धरिलें पायीं । पद्मा वसे तया ठायीं । आणिकांतें प्राप्त नाहीं । घोर तप आचरतां ॥१३४॥
अहंकार पर्वत थोर । भक्तांस बाधक जड फार । तो फोडावया वज्र । हरीनें पायीं धरियेलें ॥१३५॥
कीं तें चरणलक्षण जहाज । वरी विशाळ भक्तिध्वज । भक्त तारावया अधोक्षज । सदा उदित वाट पाहे ॥१३६॥
जीव शरण येती जडरूप । त्यांचें छेदावया सर्व पाप । चक्र पायीं देदीप्य । तेज अमूप झळकतसे ॥१३७॥
प्रपदें दिसती विमल । घोटी त्रिकोण सोज्ज्वळ । इंद्रनीळमणि सुढाळ । परी उपमे पुरेना ॥१३८॥
तळवे आरक्त विराजती । कीं बहु श्रमली सरस्वती । म्हणोनि घ्यावया विश्रांती । तळवां राहिली हरीच्या ॥१३९॥
विश्वाचीं पापें किती हरावीं । म्हणोनि श्रमली जाह्नवी । शुभ्र वांकीरूप जाहली बरवी । म्हणोनि सत्कवि वर्णिती हो ॥
१४०॥
कालिंदी कृ तांताची भगिनी । ऐसें बोलिजे सर्वजनीं । तो अपवाद चुकवावया लागूनी । मांडया सुनीळ झाली ते ॥१४१॥
ऐसी हरिपदीं त्रिवेणी सुरंग । अज्ञानच्छेदक दिव्य प्रयाग । अक्षयवट सुरंग । ध्वजांकु श तेचि पैं ॥१४२॥
चरणीं सुरवाडले प्रेमळ । तेच तेथें पूर्ण मराळ । वांकींवरी रत्‍नें तेजाळ । तपोधन तपती ते ॥१४३॥
प्रयागीं मोक्ष ठेवितां देह । येथींच्या श्रवणें होय विदेह । भावें माघमासीं निःसंदेह । त्रिवेणीमाधव सेविजे ॥१४४॥
त्या प्रयागीं जातां कष्ट । हा ध्यानींच होतो प्रगट । या प्रयागीं नीलकं ठ । क्षेत्रसंन्यास घेत पैं ॥१४५॥
वांकी नेपुरें तोडर । करिती दैत्यांवरी गजर । पोटर्‍या जंघा सुकु मार । श्यामसुंदर दिसती पैं ॥१४६॥
कीं ते सरळ कर्दळीस्तंभ । कीं गरुडपाचूंचे उगवले कोंभ । कीं शोधूनियां सुनीळ नभ । जानु जंघा ओतिल्या ॥१४७॥
कीं मिळोनि सहस्र सौदामिनी । शीतळ होऊनि पीतवसनीं । जडल्या चंचळपण टाकू नी । हरिजघनीं सर्वदा ॥१४८॥
कटीं मेखळेचें तेज आगळें । दिव्य रत्‍नें मिरवती सुढाळें । कीं एकहारी सूर्यमंडळें । हरिजघनीं जडलीं पैं ॥१४९॥
नाभि वर्तुळ गंभीर । जैसा कां बालभास्कर । तेथें उद्‌भवला चतुर्वक्‍त्र । सृष्टीचिये आदिकाळीं ॥१५०॥
उदरीं त्रिवळी सुकु मार । कौस्तुभतेजें झांके अंबर । वैजयंती मुक्ताहार । चरणांगुष्ठापर्यंत पैं ॥१५१॥
वक्षःस्थळीं श्रीवत्सलांछन । सव्यभागीं शोभायमान । वामभागीं श्रीनिके तन । वास्तव्यस्थळ श्रीचें पैं ॥१५२॥
शंख चक्र गदा पद्म । चतुर्बाहु उत्तमोत्तम । कीं धर्मार्थमोक्षकाम । चारी पुरुषार्थ उभारिले ॥१५३॥
पांघुरला जो पिंताबर । जडितपल्लव मनोहर । कीं तेणें रूपें सहस्रकर । अवतरला भासतसे ॥१५४॥
चांदणें शोभे शुद्ध निराळीं । तैसी उटी आंगीं शोभली । कीं इंद्रनीळा गवसणी घातली । काश्मीराची सुरंग ॥१५५॥
कं बुकं ठ विराजमान । नासिक सरळ सुहास्यवदन । मंदस्मित झळकती दशन । चंद्रतेज उणें पैं ॥१५६॥
कीं सर्वही आनंद मिळोन । हरिमुखीं वसती अनुदिन । त्रैलोक्यसौंदर्य विसांवोन । तेथेंच गोळा जाहलें ॥१५७॥
कुं डलें तळपती मकराकार । तेजें लखलखिलें अंबर । मज वाटे शशि-दिनकर । हरिश्रोत्रीं लागले ॥१५८॥
कुं डलांची दिव्य दीप्ती । गंडस्थळीं झळके ज्योती । कुं डलांसी कर्ण शोभविती । कर्णाची दीप्ती विशेष ॥१५९॥
कृ ष्णतनूच्या सुरवाडें । अलंकारांसी प्रभा चढे । कपाळीं टिळक निवाडे । मृगमदाचा सतेज ॥१६०॥
कल्पांतींचा सूर्य प्रगटला । तैसा मुकु ट तेजागळा । वरी दिव्य मणि मिरवला । तो वर्णिला नवजाय ॥१६१॥
बाहुदंडीं कीर्तिमुखें । हस्तकं कणें दिव्य सुरेखें । मुद्रिकांचें तेज झळके । चपळेहूनि विशेष ॥१६२॥
ऐसा एकाएकीं बंदिशाळे । देवकी देखे घनसांवळें । जिवाचें निंबलोण के लें । हरीवरूनि तेधवां ॥१६३॥
आनंद न माये अंबरीं । म्हणे भक्तवत्सला श्रीहरी । तूं माझिया निजोदरीं । पुत्र होवोनि अवतरें ॥१६४॥
तूं विश्वंभर बहु थोर । परी लोक म्हणती माझा पुत्र । ऐसा होईं तूं राजीवनेत्र । आळी माझी पुरवावी ॥१६५॥
हरी म्हणे ते वेळां । मी बाळक होईन अवलीळा । परी मज सत्वर गोकु ळा । नेऊनियां घालावें ॥१६६॥
तेथें माझा प्राणमित्र । ज्येष्ठ बंधु बळिभद्र । मग दोघेही येऊं साचार । दर्शनालागीं तूमच्या ॥१६७॥
ऐसें बोलून जगज्जीवन । हास्यवदनें अवलोकू न । आपुली योगमाया घालून । देवकीसी मोहिलें ॥१६८॥
सच्चिदानंद घननीळ । देवकीपुढें जाहला बाळ । तीस वाटलें के वळ । माझें उदरीं जन्मला ॥१६९॥
पहिला प्रताप विसरली । बाळ देखोन घाबरली । असंभाव्य प्रभा पडली । बंदिशाळे न समाये ॥१७०॥
रात्र जाहली दोन प्रहर । वसुदेवासी उठवी सुंदर । म्हणे शब्द जाईल बाहेर । तरी कं स धांवेल पैं ॥१७१॥
कोठें तरी कृ ष्ण लपवावा । बाहेर तर्क कळों न द्यावा । मौनेंचि हृदयीं धरावा । तरीच लाभेल कृ ष्ण हा ॥१७२॥
वसुदेव लावलाहें धांविन्नला । श्रीकृ ष्ण हृदयीं धरिला । म्हणे कोठें लपवूं याला । हा झांकिला नवजाय ॥१७३॥
सूर्य काय मुष्टींत झांके । चंद्र न लपे कदा कांखे । ऐरावत शक्राचा देखें । लपे कै सा पर्णकु टीं ॥१७४॥
सिंधु न माये रांजणीं । बोचक्यांत न लपे कदा अग्नी । मेरु काखेसी घालूनी । कोणा लपवे सांग पां ॥१७५॥
मूर्खांमाजी पंडित । अभाग्यांत श्रीमंत । क्लीबांमाजी प्रतापवंत । शूर कै सा झांके पां ॥१७६॥
लवणाचा घट थोर । आवरूं न शके गंगापूर । वानरांमाजीं रघुवीर । कदाकाळीं झांके ना ॥१७७॥
भूतांमाजी शंकर । किरडांमाजी धरणीधर । रंकामाजी राजेंद्र । कदा झांकिला जाईना ॥१७८॥
कस्तुरी चोरिली चोरें । परी परिमळें हाट भरे । तैसा कृ ष्ण न झांके वो सुंदरे । लपवितां कोठेंही ॥१७९॥
बाहेर प्रकटतां मात । तात्काळ होईल अनर्थ । ज्यासी द्रव्यकू प सांपडत । तेणें लोकातें न सांगावें ॥१८०॥
तों हळूच बोले देवकी बोला । हा अयोनिसंभव पुतळा । यास नेऊन घाला गोकु ळा । भय तुम्हांला कदा नाहीं ॥१८१॥
तंव वसुदेव म्हणे । पदीं शृंखला द्वारीं रक्षणें । लोहारें ठोकू नि घणे । कु लुपें कपाटें दृढ के लीं ॥१८२॥
मध्यरात्रीं पर्जन्यकाळ । यमुनेसी पूर असे तुंबळ । बेडी वाजे खळखळ । द्वारपाळ जागे पैं ॥१८३॥
घन वर्षतो मंदमंद । वसुदेव जाहला सद्गद । हृदयीं धरिला ब्रह्मानंद । चैतन्यघन श्रीकृ ष्ण ॥१८४॥
अवलोकिता श्रीकृ ष्णवदन । बेडी तुटली न लागतां क्षण । ज्यांचे करितांच स्मरण । भावबंधन निरसे पैं ॥१८५॥
नवल वाटलें वसुदेवा । घेवोनि चालिला वासुदेवा । माय धांवोनि तेधवां । वदन विलोकी पुत्राचें ॥१८६॥
पुन्हां बाळा दावीं वदन । आंसुवें भरले तेव्हां नयन । कृ ष्ण करी हास्यवदन । मातेकडे पाहोनियां ॥१८७॥
तो चहूं दारवंटा ते वेळे । दृढ कु लुपें ठोकिले खिळे । जावळी येता घननीळें । पायें स्पर्शिलीं कपाटें ॥१८८॥
तात्काळ उघडलीं चारीं द्वारें । रक्षक व्यापिले निद्राभरें । वसुदेव चालिला त्वरें । कोणी दुसरें आढळेना ॥१८९॥
वर्षती पर्जन्याच्या धारा । तों फणींद्र धांविन्नला त्वरा । विशाळ फणा ते अवसरा । कृ ष्णावरी उभारिला ॥१९०॥
खालीं पिता नेत राजीवनेत्र । भोगींद्र वरी जाहला छत्र । वेगें पावला यमुनातीर । तों महापूर भरलासे ॥१९१॥
मागें पुढें वसुदेव पाहे । म्हणे येथें करावें काय । उदकामाजी लवलाहें । बाळ घेवोन संचरला ॥१९२॥
जों जों उचली कृ ष्णातें । तों तों जीवन चढे वरुतें । स्पर्शावया जगज्जीवनातें । यमुनेतें आल्हाद ॥१९३॥
वरी उचलितां माधवा । आकं ठ उदक जाहलें वसुदेवा । वसुदेव म्हणे कमळाधवा । वैकुं ठपति धांवें कां ॥१९४॥
तंव श्रीकृ ष्णें दक्षिणचरण । तात्काळ बाहेर काढून । स्पर्शिलें यमुनाजीवन । जाहली पावन तेणें ते ॥१९५॥
परमसुखें यमुना सवेग । तात्काळ जाहली दोन भाग । जैसा स्त्रिया करिती भांग । क्षणमात्र न लगतां ॥१९६॥
वसुदेव उतरूनि यमुना । तात्काळ आला नंदभवना । तंव यशोदेसी जाहली कन्या । परी ते कांहीं नेणेचि ॥१९७॥
ते योगमाया हरीची पूर्ण । तिनें निद्रिस्त के ले सकळ जन । यशोदेशी न कळे वर्तमान । कन्यारत्‍न पुढें तें ॥१९८॥
कपाटें मोकळीं सर्वही । वसुदेव प्रवेशला अंतर्गृहीं । कृ ष्णा ठेवूनि लवलाही । कन्या वेगें उचलिली ॥१९९॥
पुत्र ठेवूनि कन्या नेली । कोणासी न कळे गोकु ळीं । वसुदेव तेच वेळीं । बंदिशाळे पातला ॥२००॥
वसुदेव परम ठकला । कृ ष्ण हातींचा दूर टाकिला । माया आणितां शृंखला । पायीं दृढ तैसीच ॥२०१॥
कपाटें तैसींच सकळिक । द्वारीं जागती सेवक । मायेसी घेतां अटक । सर्व जाहली पूढती ॥२०२॥
हिरा ठेवूनि आणिली गार । सूर्य देऊनि घेतला अंधकार । पाच देऊनि निर्धार । कांच घरा आणिली ॥२०३॥
परीस देऊनि घेतला खडा । पंडित देऊनि आणिला वेडा । चिंतामणि देऊनि रोकडा । पलांडू घेतला वळेंचि ॥२०४॥
अमृत देऊनि घेतली कांजी । कल्पवृक्ष देऊनि घेतली भाजी । कामधेनु देऊनि सहजी । अजा घेतली पालटें ॥२०५॥
निजसुख देऊनि घेतलें दुःख । कस्तूरी देऊनि घेतली राख । सोनें देऊनि सुरेख । शेण जैसें घेतलें ॥२०६॥
हंस देऊनि घेतला काग । विप्र देऊनि घेतला मांग । मुक्त देऊनि सुरंग । गुंज जैसी घेतली ॥२०७॥
देवोनियां रायके ळें । घेतलीं अर्कीचीं फळें । ज्ञान देऊनि घेतलें । अज्ञानत्व जैसें पैं ॥२०८॥
तैसें वसुदेवें के लें । कृ ष्ण ठेवूनि मायेसी आणिलें । तंव ते कन्या कोल्हाळें । रडतां कळलें रक्षकां ॥२०९॥
चहूंकडूनि सेवक धांवत । राया देवकी जाहली प्रसूत । येरू उठिला त्वरित । पिशाचवत धांवतसे ॥२१०॥
बिडालक धांवे मूषकावरी । तैसा आला बंदिशाळेभीतरी । कोठें गे कोठें आठवा अरी । म्हणोनियां धीट बोलत ॥२११॥
तों देवकी म्हणे बंधु । करूं नको येवढा वधु । देवकी रडे करी खेदु । काकु ळती येतसे ॥२१२॥
देवकी वोसंगा घेऊनि बैसली । कं स ओढीत तये वेळीं । पुत्र कीं कन्या नाहीं ओळखिली । रात्रिभागीं तेधवां ॥२१३॥
रागें भोवंडी दुराचारी । आपटावी जंव शिळेवरी । तंव ते महाशक्ति झडकरी । गेली अंबरी निसटूनियां ॥२१४॥
सहस्र कडकडती चपला । तैसा प्रलय तेव्हां वर्तला । कं स भयभीत जाहला । म्हणे वैरी गेला हातींचा ॥२१५॥
कं स जंव वरतें पाहे । तंव ते महाशक्ति तळपत आहे । तेज अंबरीं न समाये । बोले काय कं सासी ॥२१६॥
अरे मूढा दुराचारा । महामलिना खळा निष्ठुरा । तुझा वैरी पामरा । पृथ्वीवरी वाढतसे ॥२१७॥
ऐकतांच ऐसें वचन । धगधगलें कं साचें मन । शक्ति गेली अदृश्य होऊन । कं स आला मंदिरासी ॥२१८॥
श्रोतीं व्हावें सादर । पुढें कथा मनोहर । गोकु ळा गेला जगदुद्धार । परिसा चरित्र तयाचें ॥२१९॥
श्रीकृ ष्णकथा मुक्तमाळा । सभाग्य श्रोते हो घाला गळां । ब्रह्मानंद श्रीकृ ष्ण पुतळा । धन्य गोकु ळा करील तो ॥२२०॥
तुमच्या हृदयगोकु ळीं । शांतियशोदेजवळी । शेजे पहुडला वनमाळी । पुराणपुरुष तो पहा ॥२२१॥
ब्रह्मानंद म्हणे श्रीधर । धन्य तें गोकु ळ पवित्र । जेथें अवतरला यादवेंद्र । त्रिभुवनसुंदर जगदात्मा ॥२२२॥
या अध्यायाचें निरूपण । कं स येऊनि आपण । माया आपटावी जों धरून । तंव ते हातींची निसटली ॥२२३॥
इति श्रीहरिविजयग्रंथ । संमत हरिवंशभागवत । विचक्षण परिसोत संत । तृतीयोऽध्याय गोड हा ॥२२४॥
श्रीकृ ष्णार्पणमस्तु ॥

कं साने देवकीचे सहा पुत्र ठार के ले तेव्हा विष्णू शेषाला म्हणाला- "शेषराज, आता अवतार घेण्याची वेळ जवळ आली
आहे. आपण जायचे आहे. तू पण चल." शेषाने रामावतारी लक्ष्मणाचा जन्म घेऊन रामरूपी विष्णूची सेवा के ली होती,
हाल सोसले होते. तो म्हणाला- "मला पुन्हा वनवासात राहून उपास काढायचे नाहीत, मी नाही येणार भूतलावर ?"
तेव्हा विष्णूने त्याला म्हटले- "आता तू मोठा भाऊ हो. तुझे मी ऐके न. तुला मान देईन." ते शेषाला मान्य झाले. मग
विष्णू म्हणाला- "तू देवकीच्या गर्भात तुझ्या अंशाने प्रवेश कर. तेथून योगमाया तुला रोहिणी ह्या वसुदेवाच्या दुसर्‍या
स्त्रीच्या ठायी गर्भात प्रविष्ट करील. तुला एका स्थानावरून कर्षण करून अन्यत्र स्थापिले म्हणून तुझे नाव संकर्षण
पडेल. मग योगमाया यशोदेच्या कन्येच्या रूपाने अवतार घेईल आणि मी देवकीचा आठवा पुत्र म्हणून जन्म घेईन.
वसुदेव नंदाघरी जाऊन मला यशोदेजवळ ठेवील, योगमायेला नेऊन देवकीची तीच कन्या म्हणून सांगेल. कं स तिला
मारायला निघेल तो ती निसटून जाईल. रोहिणी तर गोकु ळातच आहे. मीही तिथेच येईन. मग गोकु ळात व वृंदावनात
आपण लीला करून भक्तांना आनंद देऊ."

त्या गोष्टीला शेषाने मान्यता दिली. तो देवकीच्या गर्भात सातवा म्हणून प्रविष्ट झाला पण तो गर्भ तसाच जिरून गेला
असे कं सादिकांना वाटले कारण देवकीला लागलेले डोहाळे पुढे बंद झाले. योगमायेने शेषाचे संकर्षण के ले होते.
रोहिणी गरोदर झाली व तिला पुत्र झाला. त्यावेळी वसुदेवाने गोकु ळात, आपला मित्र नंद व त्याची पत्‍नी यशोदा
यांच्याजवळ रोहिणीला पाठविले होते. कं साच्या छळापासून तिला दूर ठेवले होते. रोहिणीचा गर्भ हा वसुदेवाच्या
अंशापासूनच आहे अशी आकाशवाणी झाली व रोहिणीचे भय नाहीसे झाले. त्या मुलाचे नाव बलभद्र ठेवण्यात आले.

देवकीचे पोट ओसरले तेव्हा देवकीला वाईट वाटले. पण हे अपत्य जन्माला यायचे आणि कं स आपल्या डोळ्यादेखंत
त्याला मारायचा यापेक्षा हे कमी दुःखद ! कं साला कळले तेव्हा त्याने पहारेकर्‍यास सांगितले - आता वसुदेव-देवकीवर
कडक पहारा ठेवा. पुढे यथाकाल तिला आठवे अपत्य होणारच. कारण तशी आकाशवाणीच आहे ! तिला बाळ झाले
की तत्काळ मला कळवा."

दिवसमास गेले. काही काळाने देवकीला पुन्हा डोहाळे लागले. तिचे मुख अपूर्व तेजाने तळपू लागले. तिकडे विष्णूने
लक्ष्मीला सांगितले "मी लवकरच यदुकु ळात जन्म घेईन. त्यानंतर लगेच तू विदर्भराजाकडे, त्याची मुलगी म्हणून जन्म
घे. मीच तुझे पाणिग्रहण करीन." लक्ष्मीने ते मान्य के ले.

देवकीला डोहाळे लागले तेव्हा ती कं साला मारण्याच्या गोष्टी करू लागली. या अवतारात कोणते कार्य करणार ते सारे
भगवंताने तिच्याकडून व्यक्त के ले. तिला कोणाचीही भीतीच वाटत नव्हती. ती फारच आनंदात होती. स्वानंद सागरात
पोहत होती.

सर्व देव सूक्ष्म रूपांनी देवकीसन्मुख येऊन परमेष्टीची स्तुती करू लागले. त्यांना चतुर्भुज रूपात दर्शन देऊन विष्णूने
अवतारकार्यात सहाय्य करण्यास सांगितले. कं साला जळी स्थळी काष्ठी पाषाणी विष्णूचेच ध्यान लागले. आठवा
आठवा म्हणून तो भयाने ध्यास घेत होता तोही त्याचाच. ज्याकडे तो पाही तिथे तिथे त्याला विष्णूच दिसे ! आत्यंतिक
भयानेही देवाचा ध्यास लागतो तेव्हाही मन देवमय होते तसे त्याचे झाले होते.

जन्माची वेळ कोणती याचा अंदाजही कं साला नव्हता. इकडे बंदिशाळेत जन्मवेळ येण्यापूर्वी काही वेळ विष्णूने
देवकीला अष्टवर्षीय चतुर्भुज स्वरूपात दर्शन दिले. त्या दिव्य दर्शनाने वसुदेव व देवकी आनंदित झाले ! विष्णूने
आपल्या पूर्वीच्या अवतारांच्या वेळी वसुदेव-देवकीने काय कार्य के ले होते ते सांगून देवकीला आशीर्वाद दिला- "तुला
देवमाता म्हणून जगात मोठा मान मिळेल. मी बालरूपाने तुझा पुत्र म्हणून जन्म घेणार आहे." वसुदेवाला त्याने म्हटले,
"माझा जन्म होताच मला तत्काळ घेऊन नंदपत्‍नी यशोदेजवळ ठेवावे. तिला त्याच वेळी एक कन्या झालेली असेल. ती
इकडे आणावी. ती माझीच योगमाया आहे. रोहिणीला जो पुत्र झाला आहे तो तुझाच अंश असून शेषावतार आहे.
बलभद्र असे त्याचे नाव आहे. मी लौकिकांत नंदपुत्र म्हणून गोकु ळात वाढेन. हे रहस्य कं साला कळता कामा नये.
योगमाया त्याला धडा शिकवून गगनात निघून जाईल."

असे म्हणून विष्णूने आपले चतुर्भुज रूप आवरून घेतले. काही काळाने देवकी प्रसूत झाली व तिला पुत्र झाला.
पहारेकर्‍यांना ईश्वराने निद्रेच्या स्वाधीन के ले होते. श्रावण वद्य सप्तमीची ती रात्र. अष्टमी तिथी लागण्याचा सुमार !
मध्यरात्र ! बाहेर पाऊस पडत होता. बंदीशाळेत सामसूम ! वालक जन्माला आला पण शांत तेजस्वी होता. रडला नाही.
गुप्तपणे झालेला जन्म कोणाला कळला नाही.

वसुदेवाला विष्णूची आज्ञा आठवली. मायामोह बाजूला ठेवून त्याने तो बालक उचलून एका परडीत ठेवला. त्यावर
आपला शेला पांघरूण घातला. तो दिव्य बालक घेऊन आता बाहेर कसे जावे याचा विचार तो करू लागला. तोच दार
हळूच उघडले ! योगशक्तीने कड्याकु लपे निखळली होती. तो बाहेर डोकावला. दोन्ही बाजूला दोघे पहारेकरी झोपले
होते. त्याने पाय न वाजवता बाहेर पडून आडमार्गाने यमुना नदी गाठली.

यमुनेला पूर आला होता. पार जाणे शक्य नव्हते. पावसात भिजून चिंब झालेला वसुदेव, विष्णूचा धावा करू लागला.
यमुनेचा प्रवाह वेगाने वहात होता. धीर धरून वसुदेव प्रवाहात शिरला. यमुनेचे पाणी वाढत गेले. डोक्यावर परडी
घेतलेली. त्यातील भगवंताने यमुनेला आपला चरणस्पर्श हवा आहे हे ओळखले. त्याने हळूच एक कोमल चरण
परडीबाहेर काढला. पाण्याला तो लागताच यमुनेचे पाणी दुभंगले. वसुदेवाला वाट मिळाली. तो पैलतीरी पोहोचला.
मागे वळून पाहिले. पुन्हा प्रवाह दुथडी वाहात होता. झपझप पावले टाकीत वसुदेव पुढे निघाला. गोकु ळात पोहोचला.
नंदाच्या घरी यशोदा प्रसूत झाली होती. ग्लानी येऊन झोपली होती. कु शीत कन्या होती. योगमाया ! वसुदेव तेथपर्यंत
आला. कोणालाही जाग आली नाही. त्याने बाळाला यशोदेजयळ ठेवले, कन्येला उचलले, परडीत ठेवले. आल्या
पावली परत निघाला. यमुनेने आताही वाट दिली ! सर्व जगच्चालिका योगशक्ती वसुदेवाजवळ होती ! तो पुन्हा
बंदीशाळेपाशी आला. दमला होता. दारं उघडीच होती. अंधारात पहारेकरी अजून निद्रिस्त दिसत होते. वसुदेव आत
शिरला. दार अलगद बंद झाले ! कड्या आपोआप बसल्या. यशोदेजवळून आणलेली कन्या देवकीच्या कु शीला
बिलगली. एकदम हर्ष झाला देवकीला ! विलक्षण सामर्थ्य आले. मोठे धैर्य आले. वात्सल्यमयीला तेजोमयी भेटली
होती. ईश्वरी कार्यासाठी शक्तीची दोन्ही रूपे जवळ आली होती.

कन्येने एकदम नवजात अर्भकाप्रमाणे टाहो फोडला ! पहारेकर्‍यांच्या कानी मुलाच्या रडण्याचा ध्वनी पडला. ते
खडबडून जागे झाले. दारातून आत पाहिले. देवकीजयळ अर्भक दिसले. वसुदेव जवळ बसलेला. खिन्न वदन. काळजी
करणारा. पहारेकरी कं साला वृत्त सांगण्यास गेले ! अष्टौप्रहर विष्णूच्या धसक्याने चंचल चित झालेला कं स धावतच
आला. धडाधड दारे उघडीत वसुदेवाजवळ आला ! "कं सा ! ही घे कन्या ! ईश्वराची काय इच्छा आहे तोच जाणे ?"
वसुदेव म्हणाला. आठवे अपत्य होते ते ! दयामाया कशी दाखवणार कं स ? त्याने खसकन् ओढले ते बालक. बाहेर
गेला. बंदीशाळेच्या आवारात - एक मुहुर्तभरही उशीर न करता त्याने ती कन्या हातात घेतली - पाय घरून डोक्यावर
गरगरा फिरविली. तो शिलेवर तिला आपटणार तोच ती योगमाया त्याच्या हातून निसटून अंतरिक्षात स्वतःच्या तेजोमय
रूपात विराजू लागली. विजांचा कडकडाट झाला सर्वत्र प्रकाश पसरला ! तळपत्या मूर्तीकडे कं स पाहू लागला -
दचकला - आपल्यापेक्षा श्रेष्ठ शक्तीला पहाताच भयाने त्याचे हातपाय लटलटू लागले ! देवीने कं साला तीव्र स्वरात
म्हटले- "दुरात्म्या ! मूढा ! तुझा काळ जवळ आला आहे ! तुझा शत्रू अन्यत्र सुखाने वाढत आहे ! मी अचिंत्य अशी
त्याची योगमाया- तुझ्या हातात कशी सापडेन ? अरे मूर्खा ! आता तुझा मृत्यू जवळच आला आहे असे समज ?"

कं साचे डोळे दिपले. तो मटकन खाली बसला. देवी आकाशात निघून गेली. सेवकवर्ग तर मूर्च्छितच पडला होता.
वसुदेव-देवकी तटस्थ झाली ! कं स तावातावाने राजगृहात गेला. वसुदेव-देवकीला बंदीत टाकायला मात्र तो विसरला
नाही ! कृ ष्णाचा जन्म झाला ! कं स त्याला मारू शकला नाही. पुढील कथा चौथ्या अध्यायात वाचा.
अध्याय ३ समाप्त
॥ श्रीकृ ष्णार्पणमस्तु ॥

You might also like