You are on page 1of 2

एक वडाचे झाड होते.

त्याच्या आजूबाजूला हिरवळ होती, गवत होते.

ते झाड त्या गवताला हिणवुन म्हणायचे “अरे काय तुमची पद्धत? तिकडुन वारा आला कि वाकले इकडे,
इकडून आला कि वाकले तिकडे.. मी बघा माझ्या जागी स्थिर असतो. त्यामुळे लोक माझा आसरा घ्यायला
येतात.”

काही दिवसांनी एक मोठे चक्रीवादळ आले. त्याच्या जोराने अनेक झाडे उन्मळून पडली. वटवृक्षाची
सुद्धा तीच गत झाली.

वादळ ओसरल्यावर गवत मात्र बुत होते.

कधी कधी मोडेन पण वाकणार नाही असा ताठर बाणा आपले जास्त नुकसान करतो.

मुंगी फार मेहनती असते.

त्या अतिशय मेहनतीने कण कण वाळु गोळा करून आपल्यासाठी वारूळ बनवतात.

दूर दूर फिरून शिस्तीत कण कण अन्न गोळा करून वारुळात सुरक्षित ठेवतात.

ही वारुळे आणि अंतरे त्यांच्या आकाराच्या मानाने प्रचंड असतात.

हिवाळ्यात जेव्हा त्यांना अन्न मिळणे दुरापास्त होते त्यासाठी त्या आधीच उन्हाळ्यात राब राब राबुन
अन्न साठवुन ठेवतात जेणेकरून पुढे उपासमार होऊ नये.

त्यामानाने टोळ उनाड असतो.

गुणगुणत नाचत रमत गमत इकडेतिकडे भटकत वेळ घालवत असतो.

असंच एका टोळाची हिवाळ्यात उपासमार व्हायला लागली तेव्हा त्याने मुंगीकडे मदत मागितली.
एकदा कबुतरांनी गरुडाला घाबरून आपले संरक्षण करण्यासाठी एका घारीला आपल्या कळपाचे प्रमुख
म्हणुन नेमले.

घारीने याचा फायदा घेतला. एक एक कबुतराला आपल्याला भेटण्याचा आदेश देऊन ती त्यांना मारून
खात असे.

गरुडापेक्षा जास्त कबुतरांना त्या घारीने मारले.

ता
कबुतराला हे लक्षात आले तेव्हा त्यांना पचाताप पश्चा
झाला, पण आता फार उ ररशी
झाला होता.

“रोगापेक्षा इलाज भयंकर”

एकदा एका नदीतुन दोन भांडे वाहत चालले होते.

एक भांडे मातीचे होते.

एक भांडे पितळेचे होते.

पितळी भांडे मातीच्या भांड्याला हाक मारून म्हणाले “बरं झालं तू तरी आहेस सोबत. नाहीतर जमिनीवर
पोहचेपर्यंत एकट्याने फार कंटाळा आला असता. जरा जवळ ये, गप्पा मारूया.”

मातीचे भांडे म्हणाले “आपण जरा दूर राहिलेलंच बरं. तु म्हणतोयस ते ठीक आहे, पण एखादी लाट
जोरात आली आणि आपण एकमेकांवर आपटलो तर माझे तर तुकडेच होतील. त्यापेक्षा कंटाळा आला तर
हरकत नाही, पण जमिनीवर पोहचेन तरी.”

You might also like