You are on page 1of 124

॥ श्री एकनाथी भागवत ॥

अध्याय दसु रा

श्रीगणेशाय नमः ॥ श्री गोपालकृ ष्णाय नमः ॥


जय जय देवाधिदेवा । भोगिसी गरुु त्वें सहु ावा ।
विश्वीं विश्वात्मा ये सद‌भ् ावा । तंू कृ पेनें जेव्हां अवलोकिसी ॥ १ ॥
हे देवाधिदेवा ! तझु ा जयजयकार असो. तंू गरुु त्वाच्या योगेंकरून आवड परु ी करतोस. तंू कृ पेनें जेव्हां अवलोकन करतोस, तेव्हां
विश्वामध्यें विश्वात्मा व्यापनू राहिल्याचे अनभु वास येते १.

ते विश्वीं जो विश्ववासी । त्यातें विश्वासी म्हणसी ।


तेणें विश्वासें प्रसन्न होसी । तैं पायांपाशीं प्रवेशु ॥ २ ॥
ह्या विश्वामध्यें जो जगन्निवास आहे, त्यावर विश्वास ठे वावा, असें तंू सांगतोस. आणि तसा विश्वास ठे वला, की तंू प्रसन्न होतोस.
आणि प्रसन्न झालास म्हणजे तझ्ु या पायापं ाशीं प्रवेश होतो २.

त्या चरणारविदं कृ पादृष्टी । अहं सोहं सटु ल्या गांठी ।


एकसरें तझ्ु या पोटीं । उठा‍उठी प्रवेशलों ॥ ३ ॥
त्या पादकमलाच्ं या कृ पादृष्टीनें 'अह'ं 'सोहं ' भावनेच्या गाठं ी सटु ू न हां हां म्हणतां एकदम तझ्ु या पोटातं शिरलों ३.

यालागीं तंू निजात्ममाये । या हेतु जवं पाहों जायें ।


तंव बापपण तजु माजीं आहे । अभिनव काये सांगावें ॥ ४ ॥
तंू आमची माता आहेस, अशा दृष्टीनें तझ्ु याकडे पाहूं लागतों, तो पितृत्वही तझ्ु यामध्येंच दिसते. ह्यापेक्षा अधिक आश्चर्य तें काय
सांगणार ? ४.

येथ मातापिता दोनी । वेगळीं असती जनीं ।


ते दोनी एक करोनी । एका जनार्दनीं निजतान्हें ॥ ५ ॥
ह्या लोकी तर माता व पिता ही दोन वेगवेगळी असतात; पण ती दोन्ही एका जनार्दनामध्यें ऐक्यरूप होऊन त्यांचे मी तान्हें लेकरूं
झालों ५.

आतां उभयस्नेहें स्नेहाळा । वाढविसी मज बाळा ।


परी नित्य नवा सोहळा । संभ्रमु आगळा निजबोधाचा ॥ ६ ॥
ह्याकरितां ती दोन्ही प्रेमें एकत्र करून ह्या लेकराला वाढवावे आणि रोज रोज आत्मबोधाचा नवा नवा सोहळा दाखवीत जावा अथवा
दाखवीत आहेसच ६.

शिव शक्ति गणेशु । विश्व विष्णु चडं ाश


ं ु।
ऐसा अलंकार बहुवसु । निजविलासु लेवविशी ॥ ७ ॥
शिव, शक्ति, गणेश, तसाच विश्व, विष्ण,ु सर्यू , एतदप् अनेक अलक
ं ार स्वतः आपल्या हौसेनेंच मला घालतोस ७.

यापरी मज निजबाळा । लेणीं लेवविशी स्वलीळा ।


आणि ले‍इलेपणाचा सोहळा । पहाशीं वेळोवेळां कृ पादृष्टीं ॥ ८ ॥
ह्याप्रमाणें मला आपल्या लेंकराला आपल्या हौसेनेंच भषू णे लेववितोस व तो सोहळा वेळोवेळां कृ पादृष्टीनें तंचू पाहातोस ८.

बाळका लेवविजे लेणें । तयाचें सख ु तें काय जाणे ।


तो सोहळा मातेनें भोगणें । तेवीं जनार्दनें भोगिजे सख
ु ॥९॥
मल
ु ाच्या आंगावर दागदागिनें घातले, तरी त्यांची शोभा व सख ु ही त्याला कशी कळणार ? तो सोहळा आईनेंच भोगावा. त्याप्रमाणें
मजकडून ग्रंथ वदवनू त्याचे सख ु जनार्दनांनीच घ्यावे ९.

आपल्ु या चिद‌र् त्‍नांच्या गांठी । आवडी घालिशी माझ्या कंठी ।


यालागीं मज पाठोवाठीं । निजात्मदृष्टीं सवें धांवे ॥ १० ॥
आपल्या चिद‌र् त्‍नाच्ं या माळा आवडीनें माझ्या गळ्यातं तचंू घालतोस व रक्षणासाठी निजात्मदृष्टीनें माझ्या पाठोपाठ धावं त असतोस
१०.

समर्थ जयाचा जनकु । त्यास मानिती सकळ लोकु ।


एका जनार्दनीं एकु । अमान्य अधिकु मान्य कीजे ॥ ११ ॥
ज्याचा बाप श्रीमंत असतो, त्याच्या मल
ु ाला सर्व लोक मान देतात. त्याप्रमाणें एका जनार्दनांनी ह्या एकनाथाला आपला म्हटले,
त्यामळ
ु ें तो अमान्य असतांही अधिक मान्यतेला पात्र झाला आहे ११.

बाळक स्वयें बोलों नेणे । त्यासी माता शिकवी वचनें ।


तैशीं ग्रंथकथाकथनें । स्वयें जनार्दनें बोलविजे ॥ १२ ॥
मलु ाला स्वतः बोलावयाला कळत नाही, म्हणनू आईच त्याला बोलावयाला शिकवीत असते. त्याप्रमाणें ह्या ग्रंथांतील कथा ही गरुु
जनार्दन स्वतः माझ्याकडून बोलवीत आहेत १२.

तेणें नवल के लें येथ । मर्खा


ू हाती श्रीभागवत ।
शेखीं बोलविलें प्राकृ त । एकादशार्थ देवभाषा ॥ १३ ॥
त्यानं ी येथे के वढा चमत्कार के ला पहा, श्रीभागवताच्या एकादशस्कंधाचा अर्थ, तोही शेवटी महाराष्ट्रभाषेमध्यें मज मर्खा
ू कडून
बोलविला ! असो. १३.

परिसोनि प्रथम अध्यावो । उगाचि राहिला कुरुरावो ।


पढु ें कथाकथनीं ठावो । काहं ीं अभिप्रावो दिसेना ॥ १४ ॥
पहिला अध्याय श्रवण करून कुरुराज परीक्षिती उगाच बसला. पढु चा कथाभाग ऐकावयाचा त्याचा कांहीं मानस दिसेना १४.
आपण करावा प्रश्न । तंव हा सांगेल कृ ष्णनिधन ।
यालागीं राजा मौन । ठे ला धरून निवातं ॥ १५ ॥
कारण, आतां जर आपण प्रश्न के ला, तर शक ु ाचार्य कृ ष्णनिधनाची कथा सांगतील. ह्यास्तव तो राजा मक
ु ाट्यानें बसला १५.

जाणोनि त्याचा अभिप्रावो । बोलत जाहला शक ु देवो ।


तो म्हणे मोक्षाचा प्रस्तावो । तो हा अध्यावो परीक्षिति ॥ १६ ॥
त्याच्या मनांतील असा अभिप्राय जाणनू शक ु ाचार्य म्हणाले, "हे परीक्षिती ! हा अध्याय म्हणजे मोक्षाचा प्रस्ताव आहे असे समज"
१६.

हा एकादश अलोलिक । श्लोकाहून श्लोक अधिक ।


पदोपदीं मक्ति
ु सख ु । लगटले देख निजसाधकां ॥ १७ ॥
"हा अकरावा स्कंध सगळाच मोठा अलौकिक आहे. ह्यांत एकापेक्षा एक सरस श्लोक असनू , आत्मसाधन करणाराला मक्ति
ु सख ु
पावलोपावली भेटते" १७.

ऐसें ऐकतांचि वचन । राजा जाहला सावधान ।


मक्ति
ु सख ु ीं आवडी गहन । अवधानें कान सर्वांग के ले ॥ १८ ॥
असें ऐकताचं राजा सावधान झाला. कारण मक्ति ु सख ु ाची त्याला फारच आवड. म्हणनू त्यानें अवधानानें सर्वांगाचे कान करून
सोडले १८.

ऐसें देखोन परीक्षिती । शक ु सख ु ावे अत्यंत चित्तीं ।


तो म्हणे अवधानमर्तीू । ऐक निश्चितीं गह्य
ु ज्ञान ॥ १९ ॥
असे पाहून शक ु ाचार्यांच्या चित्ताला अत्यंत आनंद झाला आणि ते म्हणाले, "तंू अवधानाची मर्ति
ू च बनलास, तर आतां तंू स्वस्थ
अंतःकरण करून गह्य ु ज्ञान श्रवण कर" १९.

द्वितीयाध्यायीं निरूपण । नारद वसदु वे सवं ाद जाण ।


निमिजायंतांचे प्रश्न । मख्ु य लक्षण भागवतधर्म ॥ २० ॥
दसु ऱ्या अध्यायामध्यें नारद आणि वसदु वे ह्यांच्या संवादाचे निरूपण आहे. यात मख्ु यतः भागवतधर्माचें लक्षण निमिजायंतांच्या
प्रश्नरूपानें सागि
ं तले आहे २०.

श्रीशक
ु उवाच -
गोविन्दभजु गप्तु ायां द्वारवत्यां कुरूद्वह ।
अवात्सीन्नारदोऽभीक्ष्णं कृ ष्णोपासनलालसः ॥ १ ॥
श्लोक १ - श्रीशक ु म्हणतात हे कुरूनदं ना ! श्रीकृ ष्णाच्ं या सहवासात राहण्याच्या इच्छे ने नारद श्रीकृ ष्णानं ी स्वतःच्या शौर्याने रक्षण
के लेल्या द्वारके त वारंवार येऊन राहात असत. (१)

जो मक्त
ु ांमाजीं अग्रणी । जो ब्रह्मचारियां शिरोमणी ।
योगी वंदिती मक ु ु टस्थानीं । जो भक्तमंडणीं अतिश्रेष्ठ ॥ २१ ॥
मक्त
ु लोकांमध्यें जो अग्रगण्य, ब्रह्मचाऱ्यांचा शिरोमणि, ज्याला योगीसद्ध
ु ां शिरसावद्यं मानतात, जो भक्तमंडळामध्यें अत्यंत श्रेष्ठ २१.

जो ब्रह्मरसाचा समद्रु । जो निजबोधाचा पर्णू चंद्र ।


तो बोलता झाला शक ु योगींद्र । श्रोता नरें द्र कुरुवंशीचा ॥ २२ ॥
जो ब्रह्मरसाचा समद्रु व आत्मबोधाचा पर्णू चंद्र, तो शक ु योगींद्र बोलू लागला आणि कुरुवंशांतील राजाधिराज परीक्षिती ऐकू लागला
२२.

तो म्हणे व्यासाचा जो निजगरुु । आणि माझाही परमगरुु ।


नारद महामनु ीश्वरु । त्यासी अति‍आदरु श्रीकृ ष्णभजनीं ॥ २३ ॥
शकु ाचार्य म्हणाले-जो व्यासाचा साक्षात् गरुु व माझा परमगरुु महामनु ीश्वर नारद त्याचे श्रीकृ ष्णभजनावर अत्यंत प्रेम होतें २३.

द्वारके हूनि स्वयें श्रीकृ ष्ण । पिंडारका पाठवी मनि ु गण ।


तेथनिू नारद आपण । द्वारके सी जाण पनु ः पनु ः येतु ॥ २४ ॥
श्रीकृ ष्णांनी आपणहूनच सार्‍या मनि ु जनांना द्वारके हून पिंडारकाला पाठविलें, पण नारद मात्र तेथनू वरचेवर द्वारके ला येत असत २४.

हो कां जे द्वारके ‍आंत । न रिघे भय काळकृ त ।


जेथ स्वयें श्रीकृ ष्णनाथ । असे नादं त निजसामर्थ्यें ॥ २५ ॥
द्वारके मध्यें काळकृ त भय प्रवेश करीत नसे. कारण, तेथें स्वसामर्थ्यानें श्रीकृ ष्ण स्वतः नांदत होते २५.

दक्षशापु नारदासी पाहीं । महु ूर्त राहों नये एके ठायीं ।


तो शापु हरिकीर्तनीं नाहीं । यालागीं तो पाहीं किर्तननिष्ठु ॥ २६ ॥
नारदाला दक्षाचा शाप होता की, तंू एक महु ूर्तभरही एके ठिकाणी राहूं नयेस; पण तो शाप हरिकीर्तनामध्यें चालत नव्हता, म्हणनू तो
कीर्तनांतच निरंतर मग्न असे २६.

ज्याची गा‍इजे कीर्तनीं कीर्ती । तो द्वारके सी वसे स्वयें श्रीपती ।


तेथें शापबाधेची न चले प्राप्ती । यालागीं नित्यवस्ती नारदासि तेथें ॥ २७ ॥
ज्याची कीर्ति कीर्तनामध्यें गावयाची, तो लक्ष्मीपति श्रीकृ ष्ण स्वतःच द्वारके मध्यें रहात होता. म्हणनू तेथेही या शापाची बाधा होत
नसे. एवढ्याकरितां नारदाची तेथें निरंतर वस्ती होती २७.
नारदासी पर्णू ब्रह्मज्ञान । त्यासी कां कृ ष्णमर्ती
ू चें ध्यान ।
श्रीकृ ष्णदेहो चैतन्यघन । यालागी श्रीकृ ष्णभजन नारदा पढियें ॥ २८ ॥
नारदाला परिपर्णू ब्रह्मज्ञान होते; मग त्याला सगणु अशा श्रीकृ ष्णमर्ती
ू चे ध्यान का आवडावें बरें ? तर श्रीकृ ष्ण जरी देहधारी होते, तरी
त्यांचा देह के वळ चैतन्यमयच होता, म्हणनू श्रीकृ ष्णाचे भजन नारदांना अत्यंत आवडे २८.

यापरी कृ ष्णभजन । मक्त ु ासं ी पढिये पर्णू ।


त्यासी न भजे अभागी कोण । तेंचि निरूपण शक ु सांगे ॥ २९ ॥
याप्रमाणें श्रीकृ ष्णभजन जर मक्त ु ांनाहीं आवडते, तर त्याला भजत नाहीं असा अभागी कोण असणार ? तेंच निरूपण शक
ु ाचार्य
सांगतात २९.

को नु राजन् इन्द्रियवान् मक
ु ु न्दचरणाम्बजु म् ।
न भजेत्सर्वतोमृत्यःु उपास्यममरोत्तमैः ॥ २ ॥
श्लोक २- हे राजन ! ज्याला इद्रि ं ये आहेत असा, सगळीकडून मृत्यनू े वेढलेला कोणता प्राणी मोठमोठ्या देवतानं ीसद्ध
ु ा उपासना
करावी, अशा श्रीकृ ष्णचरणकमलांची सेवा करणार नाही ? (२)

ऐकें बापा नृपवर्या । ये‍ऊनि उत्तमा देहा या ।


जो न भजे श्रीकृ ष्णराया । तो गिळिला माया अतिदःु खें ॥ ३० ॥
हे राजश्रेष्ठा ! बाबा ऐक. ह्या उत्तम नरदेहाला येऊन जो श्रीकृ ष्णाला भजत नाही, त्याला मायेनें आणि घोर दःु खानें गिळले म्हणनू
समजावें ३०.

ज्या भगवतं ालागनु ी । माथा धरूनि पायवणी ।


सदाशिव बैसला आत्मध्यानीं । महाश्मशानीं निजवस्ती ॥ ३१ ॥
ज्या भगवंतासाठी त्याच्या पायांचे तीर्थ मस्तकावर घेऊन सदाशिव महास्मशानामध्यें वस्ती करून आत्मध्यानामध्यें बसलेला आहे
३१,

पोटा आला चतरु ानन । इतरांचा पाडु कोण ।


देहा येवोनि नारायण । न भजे तो पर्णू मृत्यग्रु स्त ॥ ३२ ॥
ब्रह्मदेवच ज्याच्या पोटीं आलेला आहे, तेथे इतराचं ी काय कथा ? नरदेहाला येऊन जो नारायणाला भजत नाहीं, तो पर्णू मृत्यग्रु स्त
होय ३२.

त्यजनि ू परमात्मा पर्णू । नाना साधनें शिणती जन ।


त्यासी सर्वथा दृढबधं न । न चक ु े जाण अनिवार ॥ ३३ ॥
श्रीकृ ष्णपरमात्म्याला सोडून जे लोक नानाप्रकारच्या साधनांच्या क्लेशांत पडतात, त्यांचे दृढससं ारबंधन कधीही चक
ु णार नाहीं ३३.
साडं ू नि श्रीकृ ष्णचरण । इद्रं ादि देवांचें करितां भजन ।
ते देव मृत्यग्रु स्त पर्णू । मा भजत्याचें मरण कोण वारी ॥ ३४ ॥
श्रीकृ ष्णाचे चरण सोडून इद्रं ादि देवांचे कोणी भजन करतात; पण ते देवच जर पर्णू पणे मृत्यग्रु स्त आहेत, तर मग भजणारांचे मरण ते
कसें चक ु विणार ? ३४.

असोनि इद्रिं यपाटव पर्णू । जो न भजे श्रीकृ ष्णचरण ।


त्यासी सर्वत्र बाधी मरण । क्षणक्षण निर्दाळी ॥
सर्व इद्रि
ं ये शाबतू असनू ही जो श्रीकृ ष्णचरणांचे भजन करीत नाहीं, तो जेथे जेथे जाईल, तेथे तेथे त्याला मरण हे ठे वलेलेच. तें प्रत्येक
क्षणाला त्याचा नाश करते ३५.

तो नारद महामनु ीश्वरु । मक्त ु हो‍ऊनि भजनतत्परु ।


द्वारके वसे निरंतरु । श्रीकृ ष्णीं थोरु अतिप्रीति तया ॥ ३६ ॥
तो महामनि ु नारद, मक्त ु असनू ही भजनामध्यें निरंतर तत्पर असतो. तो सदासर्वदा द्वारके मध्येंच राहत असे. त्याचे श्रीकृ ष्णावर अत्यतं
प्रेम होते ३६.

तमेकदा तु देवर्षिं वसदु वे ो गृहागतम् ।


अर्चितं सख
ु मासीनं अभिवाद्येदमब्रवीत् ॥ ३ ॥
श्लोक ३- एकदा देवर्षी नारद वसदु वे ांकडे आले ते आसनस्थ झाल्यावर त्यांनी त्यांची विधिपर्वू क पजू ा व प्रणाम करून म्हटले - (३)

धन्य धन्य तो नारदु । ज्यासी सर्वी ं सर्वत्र गोविदं ु ।


सर्वदा हरिनामाचा छंदु । तेणें परमानदं ु सदोदित ॥ ३७ ॥
अहाहा ! धन्य धन्य तो नारद ! त्याला जिकडे तिकडे श्रीकृ ष्णच दिसत असे. त्याला सदासर्वदा हरिनामाचा छंद असनू
परमानंदामध्येंच तो सदा निमग्न असे ३७.

जो श्रीकृ ष्णाचा आवडता । ज्यासी श्रीकृ ष्ण आवडे सर्वथा ।


ज्याचेनि संगें तत्त्वतां । नित्यमक्त
ु ता जडजीवां ॥ ३८ ॥
जो श्रीकृ ष्णाचा आवडता व ज्याला सर्वतोपरी श्रीकृ ष्ण आवडता, ज्याच्या संगतीनें जड जीवांना मक्ति
ु प्राप्त होते ३८,

तो नारदु एके वेळां । स्वानंदाचिया स्वलीळा ।


आला वसदु वे ाचिया रा‍उळा । तेणें देखोनि डोळां हरिखला ॥ ३९ ॥
तो नारद एके दिवशी आपल्या आनंदाच्या भरांत सहज वसदु वे ाच्या घरी गेला. त्यास पाहातांच वसदु वे ाला फार आनदं झाला ३९.
के लें साष्टागं नमन । बैसों घातलें वरासन ।
ब्रह्मसद‌भ् ावें पजू न । श्रद्धासंपर्णू माडि
ं लें ॥ ४० ॥
त्यानें त्यास साष्टांग नमस्कार घालनू बसावयास उच्चासन दिले, आणि प्रत्यक्ष परब्रह्मच आपल्या घरीं आलें, अशा श्रद्धायक्त
ु बद्ध
ु ीनें
पजू ेस प्रारंभ के ला ४०.

नारद तोचि नारायण । येणें विश्वासेंकरूनि जाण ।


हेमपात्रीं चरणक्षाळण । मधपु र्क विधिपर्णू पजू ा के ली ॥ ४१ ॥
नारद हा प्रत्यक्ष नारायणच आहे अशा दृढ विश्वासानें त्यानें त्याचे पजू न के ले. सवु र्णाच्या पात्रामध्यें त्याचे पाय धवु न मधपु र्क विधीनें
त्याची यथासांग पजू ा के ली ४१.

पजू ा करोनि सावधानीं । वसदु वे बैसोनी सख ु ासनीं ।


हृदयीं अत्यतं सख ु ावोनी । काय आल्हादोनी बोलत ॥ ४२ ॥
ह्याप्रमाणें प्रेमानें पजू ा करून वसदु वे आपल्या आसनावर बसला आणि अंतःकरणामध्यें अत्यंत आनदं भरित होऊन बोलू लागला
४२.

श्रीवसदु वे उवाच -
भगवन्भवतो यात्रा स्वस्तये सर्वदेहिनाम् ।
कृ पणानां यथा पित्रोः उत्तमश्लोकवर्त्मनाम् ॥ ४ ॥
श्लोक ४- वसदु वे म्हणाले ज्याप्रमाणे मातापित्याचं े पत्रु ाकडे येणे त्याच्या कल्याणासाठी किंवा भगवद‌भ् क्ताचं े येणे प्रपचं ाला
उबगलेल्या दःु खितांच्या कल्याणासाठी असते, तसेच, हे भगवन ! आपले येणे हे सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठीच असते. (४)

स्वलीला कृ पा के ली तम्ु हीं । तेणें परम सभाग्य जाहलों जी मी ।


तमु चेनि आगमनें आम्ही । कृ तकृ त्य स्वामी सन्निधिमात्रें ॥ ४३ ॥
आज आपणहून येण्याची कृ पा के लीत, तेगंकरून मी अयंत भाग्यवान् झालो आहे. आपल्या सन्निधिमात्रानें (जवळ असल्याने)
आम्ही कृ तकृ त्य झालो आहों ४३.

चक ु लिया निजजननी । बाळक दीन दिसे जनीं ।


त्यासी मातेच्या आगमनीं । संतोष मनीं निर्भर ॥ ४४ ॥
आई दिसेनाशी झाली म्हणजे लोकांमध्यें मल ू के विलवाणे होते . पण त्याची आई आली की त्याच्या मनामध्यें आनंद मावेनासा होतो
४४.

त्याहूनि श्रेष्ठ तमु ची यात्रा । नित्य सख


ु दाती भतू मात्रां ।
स्वलीला तम्ु ही मही विचरां । दीनोद्धारालागनु ी ॥ ४५ ॥
तिच्यापेक्षाही आपलें आगमन अधिक श्रेष्ठ आहे; कारण तें प्राणिमात्रानं ा नित्यसख
ु देणारे असते. आपण दीनाचं ा उद्धार
करण्याकरितां लीलेनें पृथ्वीवर संचार करता ४५.
मातेच्या आगमनीं निजबाळा । दृष्टि‍उत्संगीं नित्य नवा सोहळा ।
तमु ची यात्रा दीनां सकळां । भोगवी स्वलीळा निजात्मसख ु ॥ ४६ ॥
आई आलेली दिसतांच मल ु ाला नित्य नवा सोहाळा होतो, पण तमु चे आगमन यच्चयावत् दीन जनांना अनायासे आत्मसख

भोगावयाला लावते ४६.

माता सख ु दे तें नश्वर । तमु च्या आगमनीं अनश्वर ।


नित्य चित्सख
ु चिन्मात्र । परात्पर भोगावया ॥ ४७ ॥
आई सख ु देते तें नश्वर असते, आणि तमु च्या आगमनानें जें सख
ु प्राप्त होतें तें शाश्वत असतें. परे च्या पलीकडील चिन्मात्र चित्सख

भोगावयास मिळते ४७.

तम्ु ही भागवतधर्ममार्गगामी । तैंचि तमु ची भेटी लाहों आम्ही ।


जैं पण्ु यकोटी निष्कामीं । प्रयागसंगमीं के लिया ॥ ४८ ॥
आपण भागवतधर्माच्या मार्गानें जाणारे आहात. आम्ही प्रयागसगं मावर निष्काम बद्ध
ु ीनें जेव्हां पण्ु याच्या कोटी कराव्यात, तेव्हाचं
आम्हांला आपली भेट होते ४८.

नारदा तंू भगवद‌रू ् प । तझु ी भेटी करी निष्पाप ।


तवु ां कृ पा के लिया अल्प । स्वयें चित्स्वरूप ठसावे ॥ ४९ ॥
नारदा ! तू भगवत्स्वरूप आहेस. तझु ी भेटच मनष्ु याला निष्पाप करून सोडते. तंू थोडीशी जरी कृ पा के लीस, तरी अंतःकरणामध्यें
चित्स्वरूप ठसनू जाते ४९.

तझु ेनि भक्तीसी महिमा अमपू । तझु नि े वाढला भक्तिप्रताप ।


तझु ेनि भक्ति भगवद‌रू
् प । तंू चित्स्वरूप निजनिष्ठां ॥ ५० ॥
तझ्ु याच योगानें भक्तीला अलौकिक महिमा चढला. भक्तीचे सामर्थ्य तझ्ु याच योगानें पसरलें. तझ्ु याच योगानें भक्ति ही भगवत्स्वरूप
बनली. तंू आपल्या आत्मनिष्ठेच्या योगानें चित्स्वरूप झाला आहेस ५०.

तंू भक्तिप्रकाशकु दिवटा । कीं भक्तिमार्गीचं ा मार्गदृष्टा ।


नारदा तझु ा उपकार मोठा । भक्तीच्या पेठा वसविल्या तवु ां ॥ ५१ ॥
भक्तीला दाखवनू देणारी मशाल ती तचंू किंवा भक्तिमार्गाचा वाटाड्या तो तंू. नारदा ! तझु ा उपकार फार मोठा आहे. कारण तंू
भक्तीच्या पेठाच वसवनू टाकल्या आहेस ५१.

मख्ु य भागवतशास्त्र पर्णू । तवु ां व्यासासी उपदेशनू ।


प्रगट करविलें दशलक्षण । दीन जन उद्धरावया ॥ ५२ ॥
श्रेष्ठ आणि परिपर्णू भागवतशास्त्राचा तचंू व्यासाला उपदेश करून दीन जनाचं ा उद्धार करण्यासाठी दशलक्षणे * प्रगट कलींस ५२.
[[ * भागवताची दशलक्षणे- सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, ऊति, मन्वंतरें , ईशानक्र ु थन, निरोध, मक्तिु व आश्रय यांचे विवरण नाथांनी
आपल्या चतःु श्लोकी भागवतांत पढु े लिहिल्याप्रमाणें कलें आहे "सर्ग बोलिजे ससं ारातें। विसर्ग म्हणिजे संहारातें। स्थान म्हणिजे
वैकंु ठातें। पोषण तेथें भगवद‌भ् जन ॥ ८१४ ॥ कर्म त्या नावं ऊति । चौदा मनचंू ी व्यवस्थिति। या नावं मन्वतं रें म्हणती। दशावतारकीर्ति
ईशचरित्र ।। १५॥ सकल इद्रि ं यांच्या वृत्ति । एकाग्र या नांव निरोधस्थिति । निःशेष जेथ विरे वृत्ति । त्या नांव मक्ति
ु महाराया ॥ १६ ॥
उत्पत्ति-स्थिति-प्रळयान्त । ज्या स्वरूपावरी होत जात। स्वरूप अविकारी यथास्थित । त्या नांव निश्चित आश्रय राया ॥ १७ ॥
दोराअंगी सर्प उपजला । दोरावरी सर्प नांदला । दोरावरी सर्प निजला । तरी दोर स्पर्शला नाहीं सा ॥ १८ ॥ तेवीं वस्तच्ू या ठायीं।
प्रपंचाची वार्ता नाहीं। तो झाला गेला न घडे कांहीं । आश्रय पाहीं या नांव ॥ १९ ॥ पावावया आश्रयप्राप्ति । भावें करावी भगवद‌भ् क्ति
। ते भक्तीची निजस्थिति । श्रीव्यासें भागवतों विशद के ली ।। ८२० ॥ इ. ]]]

नारदा तंू देवासमान । हेही उपमा दिसे गौण ।


तेचिविषयीं निरूपण । वसदु वे आपण निरूपी ॥ ५३ ॥
नारदा ! तंू देवासमान आहेस. पण ही उपमासद्ध ु ां गौणच होय. अशा अभिप्रायानें वसदु वे म्हणाला ५३.

भतू ानां देवचरितं दःु खाय च सख ु ाय च ।


सख ु ायैव हि साधनू ां त्वादृशामच्यतु ात्मनाम् ॥ ५ ॥
श्लोक ५- देवताचं े वर्तन कधी प्राण्याच्ं या दःु खाला तर कधी सख
ु ाला कारणीभतू होते परंतु आपल्यासारख्या भगवत्प्रेमी साधचंू ी
प्रत्येक कृ ती सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठीच असते. (५)

देवांपासनि ू भतू सृष्टी । सख


ु दःु खें शिणे पोटीं ।
अतिवृष्टी कां अनावृष्टी । भतू कोटी आकांतु ॥ ५४ ॥
देवांपासनू जीवसृष्टीला सख ु ें आणि दःु खें प्राप्त होऊन तिला यातना भोगाव्या लागतात. अतिवृष्टि किंवा अनावृष्टि झाली की
प्राण्यांमध्यें आकांत उसळतो ५४.

त्या देवांपरीस साधु अधिक । हें साचचि मज मानलें देख ।


देवचरिते उठी सख ु दःु ख । साधु निर्दोख सख ु दाते ॥ ५५ ॥
ह्याकरिता त्या देवांपेक्षां साधु हेच श्रेष्ठ होत, असें मला खरोखर वाटते. कारण, देवांच्या करणीनें दःु खमिश्रित सख
ु उत्पन्न होते; पण
साधु हे निर्दोष सखु ाचे दाते. अर्थात दःु खलेशरहित सख ु देणारे आहेत ५५.

त्याहं ीमाजीं तजु सारिखा । जोडल्या कृ पाळू निजात्मसख


ु ा।
तैं पेठ पिके परमार्थसखु ा । हा महिमां लोकां कदा न कळे चि ॥ ५६ ॥
त्यांतही तझ्ु यासारखा कृ पाळू निजात्मसखा मिळाल्यावर काय विचारावें ? परमार्थसख
ु ाची पेठच पिकून जाते. हा महिमा ह्या लोकांना
कळत नाहीं ५६.
दिधल्या सख ु ाचि मागतु ी । च्यतु ी हों नेणे कल्पातं ीं ।
ते अच्यतु ात्मस्थिती । तजु पाशी निश्चितीं नारदा ॥ ५७ ॥
आणखी विशेष हे की, एकदां हें सख ु मिळाले की, तें कल्पांतीही नाश पावत नाहीं अशी अच्यतु ात्मस्थिति, नारदा ! निश्चितपणे
तझ्ु यापाशींच आहे ५७.

तझिु ये महिमेपासीं । मदु ल देवो नये तक ु ासी ।


तेंही सांगेन मी तजु पासीं । यथार्थेंसी नारदा ॥ ५८ ॥
तझ्ु या महिमेशी मख्ु य देवाचीही बरोबरी होऊ शकत नाही. ती कशी ? तेही नारदा ! मी तल
ु ा यथार्थ रीतीनें सागं तों ५८.

देवाचा अवतार होये । दासां सख ु दैत्यां भये ।


तेथेही ऐसे विषम आहे । हें न समाये तजु माजीं ॥ ५९ ॥
देवाचा अवतार झाला म्हणजे त्याच्या दासाला सख ु होते आणि दैत्यानं ा भय पडते, असा त्यातं भेदभाव आहे; पण हा पक्षपात
तझ्ु यामध्यें नाहीं ५९.

तंू देवांचा आप्त होसी । दैत्यही विश्वासती तजु पासीं ।


रावण ने‍ऊनि तजु एकातं ासी । निजगह्य ु ासी स्वयें सागं े ॥ ६० ॥
तंू देवांचाही आप्त आहेस; तसा दैत्यांचाही पण तझ्ु यावर भरंवसा आहे. रावण तल
ु ा एकांतांत नेऊन आपल्या हृदयांतील हितगजु
सांगत होता ६०.

देव रावणें घातलें बंदीं । तो रावण तझु े चरण वंदी ।


शेखी रामाचा आप्त तंू त्रिशद्ध
ु ी । विषम तजु मधीं असेना ॥ ६१ ॥
रावणानें देव बदं ीत घातले होते, पण तोच तझ्ु या चरणाला वदं न करीत होता. शेवटी तंू खरोखरी रामाचाही मित्र होतासच. सारांश,
तझ्ु यामध्यें विषमभाव हा नाहींच ६१.

जरासधं ु कृ ष्णाचा वैरी । तझु ी चाल त्याच्या घरीं ।


आणि कृ ष्णाचे सभेमाझारीं । आप्तत्वें थोरी पैं तझु ी ॥ ६२ ॥
जरासधं कृ ष्णाचा वैरी होता, पण तझु ें जाणेयेणें त्याच्या घरी होतेच; आणि कृ ष्णाच्या सभेत तर कृ ष्णाचा थोर आप्त तचंू ६२.

नाम घेवों नेदी देवाचें । हें बिरुद हिरण्यकशिपचू ें ।


त्यासी कीर्तन तझु ें रुचे । विषमत्व साचें तजु नाहीं ॥ ६३ ॥
देवाचें नांव घेऊ द्यावयाचें नाहीं हे तर हिरण्यकशिपचू े ब्रीद; पण त्याला तझु ें कीर्तन मनस्वी आवडत असे. ह्यावरून तझ्ु यामध्यें
खरोखर भेदभाव असा नाहींच ६३.
लाचं गु ी बद्धि
ु सदा देवासं ी । तैशी नाहीं तम्ु हां साधसंू ी ।
ऐक त्याही अभिप्रायासी । यथार्थेंसीं सांगेन ॥ ६४ ॥
देवांची बद्धि
ु लालचु ीची आहे. तशी तम्ु हां साधंचू ी नाही. ती कशी तेही यथार्थ रीतीनें सांगतों ऐक ६४.

भजन्ति ये यथा देवान्देवा अपि तथैव तान् ।


छायेव कर्मसचिवाः साधवो दीनवत्सलाः ॥ ६ ॥
श्लोक ६- लोक देवतांना ज्याप्रकारे भजतात, त्याचप्रमाणे देवतासद्ध
ु ा त्यांना प्रतिबिंबासारखेच कर्मानसु ार फळ देतात परंतु सत्परू
ु ष
दीनवत्सल असतात ते सर्वांनाच आपले समजतात. (६)

जे जैसे देव यागीं यजिजती । तैसतैसी फळें देव देती ।


न भजत्यांतें विघ्नें सचि
ू ती । ऐसी गती देवांची ॥ ६५ ॥
जे जसे यज्ञानें देवानं ा तृप्त करतात, त्यानं ा देव तशी फळे देतात; आणि जे त्यानं ा भजत नाहीत, त्याच्ं यावर विघ्नें आणनू घालतात
अशी देवांची चाल आहे ६५.

जैसजैसा परुु ष वेंठे । तैसतैसी छाया नटे ।


तेवीं भजनें देव प्रसन्न मोठे । येरवीं उफराटें विघ्न करिती ॥ ६६ ॥
परुु ष जसा वळतो त्याप्रमाणें छायाही वळते. तद्वत् देवांचे भजन के लें म्हणजे ते मोठे प्रसन्न होतात; नाहीं तर उलटें विघ्न करतात ६६.

जंव जंव सर्यू प्रकाशत असे । तंव तवं छाया सरिसी दिसे ।
निजकर्में देवही तैसे । कर्मवशें प्रसन्न ॥ ६७ ॥
प्रातःकाळी सर्यू जसजसा वर चढत जातो, तसतशी छायाही जवळ येत जाते. तद्वत् आपल्या कर्माप्रमाणें देवही जवळ येतात म्हणजे
प्रसन्न होतात ६७.

सर्यू अस्तमानीं छाया नासे । अभजनें देव क्षोभती तैसे ।


एवं लाचं गु े देव ऐसे । तहंू ी अनायासे जाणसी ॥ ६८ ॥
सर्यू मावळला की छाया नाहीशी होते, त्याप्रमाणें भजन के ले नाहीं की देव क्षब्ु ध होतात. अशा प्रकारे देव स्वार्थी आहेत, हे तल
ु ाही
माहीत आहेच ६८.

इतर देवाचं ी कथा कोण । थोरला देव लाचं गु ा पर्णू ।


तोही न भेटे जीव घेतल्याविण । भेटल्याचे आपण गर्भवास सोसी ॥ ६९ ॥
इतर देवांची काय कथा ? पण सर्वांत जो मोठा देव, तोसद्ध
ु ां पक्का लांचखाऊ आहे. तोसद्ध
ु ां जीव घेतल्याशिवाय भेटत नाहीं आणि
भेटल्याचे गर्भवास आपण सोसतो ६९.
त्याचें जीवें सर्वस्वें भजन । के ल्या निजागं दे‍ऊनि होये प्रसन्न ।
परी न भजत्याच्या घरा जाण । विसरोनि आपण कदा न वचे ॥ ७० ॥
त्याचे जीवाभावानें भजन के ले म्हणजे तो आपले निजांग देऊनही प्रसन्न होतो; पण जो भजत नाहीं त्याच्या घराला कधी चक
ु ू नसद्ध
ु ा
जात नाहीं ७०.

तैसी नव्हे तमु ची बद्ध ु ी । दीनदयाळ त्रिशद्ध


ु ी।
तंू तंव के वळ कृ पानिधी । ऐक तो विधी सांगेन ॥ ७१ ॥
तशी तम्ु हां सतं ाचं ी बद्धि
ु नाही. तंू तर खरोखर दीनावं र दया करणारा आहेस. कृ पेचा के वळ निधि. ते कसे ते सागं तों ऐक ७१.

तवु ां व्यास देखोनि सज्ञान । उपदेशिलें गह्य


ु ज्ञान ।
ध्रवु बाळक अज्ञान । म्हणोनि जाण नपु ेक्षिसी ॥ ७२ ॥
तंू व्यासाला सज्ञान पाहून ब्रह्मज्ञानाचा उपदेश के लास; पण ध्रवु हे अज्ञान बालक म्हणनू त्याचीही उपेक्षा के ली नाहींस ७२.

प्रल्हाद उपदेशिला जेव्हां । दैत्यपत्रु न म्हणसी तेव्हां ।


तझिु या कृ पेचा हेलावा । तो निजविसांवा दीनांसी ॥ ७३ ॥
प्रल्हादाला जेव्हां उपदेश के लास, तेव्हां हा दैत्याचा मल ु गा आहे हा विचार तंू मनातं आणिला नाहीस. तझ्ु या कृ पेची लहरी हेच दीन
जनांचे विश्रांतिस्थान आहे ७३.

के वळ वाटपाडा देख । भजनेंवीण एका‍एक ।


महाकवी के ला वाल्मीक । अमर आवश्यक वंदिती त्यासी ॥ ७४ ॥
वाल्या कोळी के वळ वाटमार्‍या, भजन ठाऊक नाहीं, पजू न ठाऊक नाहीं; त्याला तंू रामनामाचा उपदेश करून महाकवि वाल्मीकि
करून सोडलास. त्याला देवसद्ध
ु ां वदं न करतात ७४.

देखोनि ज्याचिया ग्रंथासी । सख


ु वोसंडे सदाशिवासी ।
ऐसा तंू कृ पाळू होसी । अनाथासी कुवासं ा ॥ ७५ ॥
ज्याच्या ग्रंथाला पाहून सदाशिवालासद्ध
ु ा आनंदाचे भरतें येते. असा तंू कृ पाळू आणि अनाथाला विसावा आहेस ७५.

वरिवरी दाविसी मिणधा कोप । कोपोनि सांडविशी त्याचें पाप ।


शेखीं सायज्ु याचे दीप । दाविशी सद‌रू
् प दयाळुवा ॥ ७६ ॥
तंू वरवर निमित्ताला मात्र कोप दाखवितोस. पण ज्याच्यावर तंू कोप करतोस त्याचे पाप नाहीसे करतोस; आणि शेवटी, हे दयाळो !
सायज्ु याचा दीप लावनू सद‌रू् प दाखवितोस ७६.

तम्ु ही अच्यतु ात्मे निजनिर्धारीं । म्हणौनि देवो तमु चा आज्ञाधारी ।


तम्ु ही म्हणाल त्यातें उद्धरी । येर्‍हवीं हातीं न धरी आनातें ॥ ७७ ॥
तम्ु ही खरोखर अच्यतु ात्मे आहातं , म्हणनू देवही तमु चा आज्ञाधारक आहे. तम्ु ही ज्याचा उद्धार करा असे त्याला म्हणाल, त्याचाच
तो उद्धार करतो. नाहींतर हातांतसद्ध
ु ां धरीत नाहीं ७७.

ऐसा तंू दीनदीक्षागरुु । ब्रह्मज्ञाने अति‍उदारु ।


तरी पसु ेन तो विचारु । निजनिर्धारु सांगावा ॥ ७८ ॥
अशा रीतीनें दीनाला परमार्थाची दीक्षा देणारा तंू गरुु आहेस आणि ब्रह्मज्ञानानें अत्यंत उदार आहेस. ह्याकरितां आतां जी गोष्ट मी
विचारीन ती नीट सांगावी ७८.

ब्रह्मन् तथापि पृच्छामो धर्मान्भागवतांस्तव ।


यान्श्रत्ु वा श्रद्धया मर्त्यो मच्ु यते सर्वतो भयात् ॥ ७ ॥
श्लोक ७- हे ब्रह्मन ! तरीसद्ध ु ा आम्ही आपणास भागवत धर्मासंबंधी प्रश्न विचारीत आहोत जे श्रद्धेने ऐकल्यामळ
ु े सगळीकडे भयप्रद
असणार्‍या या ससं ारापासनू मनष्ु य मक्त ु होतो. (७)

आदरें म्हणे देवऋषी । आजि सकळ पण्ु यें आलीं फळासी ।


मायबाप तंू घरा आलासी । निजसख ु ासी दायक ॥ ७९ ॥
तो पन्ु हा आदरानें म्हणाला, हे देवर्षे ! आज माझी सारी पण्ु ये फळास आली. कारण, आत्मसख
ु देणारा मायबाप तंू आमच्या घरी
आलास ७९.

कृ पा के ली मागील शिष्यां । तेचि कृ पेचा घालीं ठसा ।


मज तझु ा पर्णू भरंवसा । सोडवीं भवपाशापासनि ू ॥ ८० ॥
पर्वी
ू च्या शिष्यांवर आपण जशी कृ पा के ली, तशीच मजवरही करून मला संसारपाशापासनू सोडवावे. तझ्ु यावर माझा पर्णू विश्वास
आहे ८०..

तझु ेनि दर्शनें कृ तकृ त्यता । जर्‍ही मज जाली तत्त्वतां ।


तर्‍ही भागवतधर्मकथा । कृ पेनें तत्त्वतां सागं ावी ॥ ८१ ॥
तंू मला आपल्या दर्शनानें खरोखर कृ तकृ त्य करून सोडलेस. तर आता तशाच कृ पेनें यथार्थ रीत्या मला भागवतधर्म सांगावे ८१. त

ऐसे सांगावे भागवतधर्म । जेणें निरसे कर्माकर्म ।


श्रद्धेनें ऐकतां परम । जन्ममरण हारपे ॥८२ ॥
े भागवतधर्म असे सांगावे की, जेणेंकरून सारे कर्माकर्म लयास जाईल आणि श्रद्धेनें श्रवण के ले असतां जन्ममरणांतनू मक्त
ु ता
होईल ८२.

भवभय अति दारुण । त्या भयाचें माया निजकारण ।


तिचें समळ
ू होय निर्दाळण । ऐसे धर्म कृ पेनें सांगावे ॥ ८३ ॥
ससं ाराचे भय अति दारुण आहे, आणि त्याचे मळ
ू कारण माया होय. ती ज्या धर्मानें समळ
ू नाहींशी होऊन जाईल, असे धर्म मला
कृ पा करून सांगावे ८३.

मज नाही अधिकार पर्णू । ऐसें विचाराल लक्षण ।


तेविषयींची हे निवारण । सावधान अवधारीं ॥ ८४ ॥
मला ते ऐकण्याचा पर्णू अधिकार नाही, असे म्हणशील तर त्याबद्दल सांगतों ऐक ८४.

अहं किल परु ानन्तं प्रजार्थो भवि


ु मक्ति
ु दम् ।
अपजू यं न मोक्षाय मोहितो देवमायया ॥ ८ ॥
श्लोक ८ - पर्वी
ू मी मक्त ु ी देणार्‍या भगवंतांची आराधना मक्त
ु ी मिळावी म्हणनू नव्हे, तर ते मला पत्रु रूपाने प्राप्त व्हावेत, म्हणनू के ली
होती कारण भगवंतांच्या मायेने मी त्यावेळी मोहित झालो होतो. (८)

मज अधिकारु नाहीं पर्णू । हें मीही जाणतो आपण ।


मागें म्यां के ले भगवद‌भ् जन । तें तंू कथन अवधारीं ॥ ८५ ॥
मला पर्णू अधिकार नाही, हे माझे मलाच कळते. पण मी पर्वी ू भगवद‌भ् जन के लेले आहे, तें तंू श्रवण कर ८५.

म्यां पर्वी
ू ं आराधिलें देवराया । तें भजन ममता नेलें वायां ।
प्रलोभविलों देवमाया । पत्रु स्नेहालागनि
ू ॥ ८६ ॥
मीही पर्वी
ू देवाधिदेवाची आराधना के ली होती; पण तें भजन ममतेमळ
ु ें व्यर्थ गेले. पत्रु लोभामळ
ु ें देवाच्या मायेनें मी अगदी भल
ु नू गेलों
८६.

मज देव तष्टु ला प्रसन्नपणें । मागसी तंू दे‍ईन म्हणे ।


तेथें मायेनें ठकिलें मजकारणें । माझा पत्रु होणें मी मागें ॥ ८७ ॥
देवाला संतोष होऊन तो माझ्यावर प्रसन्न झाला आणि तंू मागशील ते देईन म्हणाला. त्या वेळेस मायेनें मला फसविले, त्यामळ
ु ें
'माझा पत्रु हो' हे मागणे मी मागितले ८७,

तो हा माझा पत्रु श्रीकृ ष्ण । परी मज न सांगे ब्रह्मज्ञान ।


तोचि वंदी माझे चरण । म्हणे बाळक पर्णू मी तझु ें ॥ ८८ ॥
तोच हा माझा पत्रु श्रीकृ ष्ण होय; पण तो मला ब्रह्मज्ञान सागं त नाही. तोच माझ्या चरणावं र मस्तक ठे वतो, आणि मी तझु ें खरोखर
लेंकरूं आहे असे म्हणतो ८८.

यापरी श्रीकृ ष्णापासीं । ज्ञानप्राप्ति नव्हे आम्हांसी ।


कृ ष्ण परमात्मा हृषीके शी । हें निश्चयेंसीं मी जाणें ॥ ८९ ॥
ह्यामळु ें श्रीकृ ष्णापासनू आम्हांला ज्ञानप्राप्ति होत नाही. खरोखर हृषीके शी श्रीकृ ष्ण हा परमात्मा आहे हे मला माहीत आहे ८९.
श्रीकृ ष्ण जन्मला माझिया कुशीं । म्हणौनि श्रद्धा आहे मजपाशीं ।
तेणेंचि तंू तष्टु लासी देवऋषी । तरी निजकृ पेंसीं उद्धरी ॥ ९० ॥
श्रीकृ ष्ण माझ्या पोटी जन्मास आला, म्हणनू च मला श्रद्धा आहे आणि म्हणनू च तंहू ी संतष्टु झाला आहेस . तर आतां तसाच आपल्या
कृ पेनें माझा उद्धार कर ९०.

जे मायेनें ठकिलो वाडेंकोडें । ते माया समळ ू झडे ।


ऐसें सांगिजें रोकडें । बहू बोलोनि पढु ें काय काज ॥ ९१ ॥
ज्या मायेच्या भल ु ीनें आम्ही फशी पडलों आहोत, ती माया समळ
ू झडून जाईल, असे प्रत्यक्ष ज्ञान सांगावें. ह्यापेक्षा जास्त बोलनू
काय उपयोग ? ९१.

यथा विचित्रव्यसनाद‌् भवद‌भि ् र्विश्वतोभयात् ।


मच्ु येम ह्यञ्जसैवाद्धा तथा नः शाधि सव्रु त ॥ ९ ॥
श्लोक ९- हे सव्रु ता ! आपण मला आता असा उपदेश करा की, ज्यामळ
ु े अनेक सक
ं टानं ी सर्व बाजनंू ी वेढलेल्या या ससं ारातनू मी
सहज पार होऊन जाईन. (९)

मायाजलें भवसागरु । भरला असे अतिदस्ु तरु ।


त्याचा उतरावया पैलपारु । होय तंू तारूं मनि
ु राया ॥ ९२ ॥
मायारूप जळानें हा संसारसमद्रु अगदीं तडु ु ंब भरून जाऊन उतरून जाण्याला अत्यंत कठीण झाला आहे. तर हे मनि
ु राया ! तो उतरून
पलीकडे जाण्याला तंू तारूं हो ९२.

याचें सकळ जळ क्षार । माजीं सावजें अनिवार ।


एकएकें चराचर । गिळिलें साचार निजशक्तिं ॥ ९३ ॥
ह्या समद्रु ाचे पाणी सगळे खारट आहे; आणि त्यांत प्रचंड जलचरें अनिवार झालेली आहेत. ती इतकी मातली आहेत की, त्यांतील
एकएकानें आपल्या सामर्थ्यानें खरोखर चराचरच गिळून टाकलेलें आहे ! ९३.

लाटावं री अचाट लाटा । मोहाचिया अतिदर्घु टा ।


आदळती अविवेकतटा । धैर्याचिया कांठा पाडित ॥ ९४ ॥
मोहाच्या एकावर एक अतिदर्धु र अशा लाटा उसळत आहेत. अविवेकतटावर त्या आदळतात, व धैर्याचा काठं पाडून टाकतात ९४.

अहं कुवावो वाजतां थोरु । अवघाचि खवळे सागरु ।


मी माझेनि गजरें घोरु । अतिदर्धु रु गर्जत ॥ ८५ ॥
अहक ं ाररूप झजं ावात 'रों रों रों रों' असा वाजत असतो, त्यामळ
ु ें सारा समद्रु अगदी खवळून जातो; आणि 'मी' व 'माझे' म्हणनू
मोठ्यानें गर्जना करतो ९५.
नाना वासनांचा वळसा । पाहे पां भंवताहे कै सा ।
येथ तरावया धिवं सा । नव्हे सहसा सरु नरां ॥ ९६ ॥
त्याचप्रमाणें नाना प्रकारच्या वासनांचे भोंवरे कसे गर गर गर गर फिरतात पहा ! त्यामळ
ु ें या सागरांतनू पलीकडे जाण्याचे धैर्य
सरु नरांना सहसा होत नाहीं ९६.

क्रोधाचें प्रबळ भरतें । भरी द्वेषाचिया तरियातं ें ।


असयू ातिरस्कारांची तेथें । चिडाणी उते अनिवार ॥ ९७ ॥
द्वेषाच्या खाड्यांतनू क्रोधाची भरती भरत असते आणि असयू ा तिरस्काराचे पईु ड पसरून राहते ९७.

कामपर्वताचीं शिखरें । विषमें भासती अपारें ।


आशे‍इच्छे चीं वरी थोरें । झाडें विषयांकुरें वाढलीं ॥ ९८ ॥
कामरूप पर्वतांची असंख्य शिखरे उंचनीच दिसत असतात आणि त्यांच्यावर इच्छे ची मोठमोठाली झाडें विषयांकुरानें फोफावतात
९८.

संकल्पविकल्पांचे मीन । निदं च्े या ससु री दारुण ।


ब्रह्मद्वेषाचे नक्र पर्णू । सागरीं जाण तळपती ॥ ९९ ॥
ह्या समद्रु ातं सक ं ल्प आणि विकल्परूप मासे असनू निदं ारूप अक्राळविक्राळ ससु री आहेत आणि ब्रह्मद्वेषरूप माजलेले नक्र
समद्रु ामध्यें तळपत असतात ९९.

एवढाही हा भवसागरु । शोषितां तंू अगस्ती साचारु ।


तझु ेनि भवाब्धीपैलपारु । पावों हा निर्धारु जाहला आम्हां ॥ १०० ॥
संसारसमद्रु हा एवढा प्रचंड आहे तरीसद्ध ु ा त्याला खरोखर शोषनू टाकणारा तंू अगस्तीच आहेस. ह्याकरितां तझ्ु या साहाय्यानें हा
समद्रु उल्लघं न करून जाऊं असा आम्हांला भरंवसा वाटतो १००.

याचा विश्वतोभय हेलावा । तो आम्हां न बाधी तमु च्या कणवा ।


अप्रयासें नारददेवा । मरणार्णवा मज तारीं ॥ १०१ ॥
ह्याच्या लाटांचे भय सर्व ब्रह्मांडाला आहे; पण तझ्ु या कृ पेनें त्या आम्हांला मात्र बाधक व्हावयाच्या नाहीत. तर हे नारददेवा ! हे
दयानिधे ! आपण ह्या जन्ममरणरूप ससं ारसागरातं नू अनायासे माझा उद्धार करावा १.

पायी उतरून भवसागरु । साक्षात् पावें परपारु ।


ऐसा भागवतधर्मविचारु । तो निजनिर्धारु प्रबोधीं ॥ १०२ ॥
हा ससं ारसमद्रु के वळ पायानेंच तरून जाऊन प्रत्यक्ष पैलतीर गाठं ीन, असा भागवतधर्माचा विचार मला सागं ावा २.
ऐकोनि वसदु वे ाची उक्ती । नारद सखु ावला चितीं ।
तोचि अभिप्रावो परीक्षिती । शक ु स्वमखु ें स्थिति सागं त ॥ १०३ ॥
हें वसदु वे ाचें भाषण ऐकून नारदाच्या मनाला परम संतोष झाला. तीच त्याची आनंदमय स्थिति शक
ु ाचार्य आपल्या मख
ु ानें
परीक्षितीला सांगतात ३

श्रीशकु उवाच -
राजन् एवं कृ तप्रश्नो वसदु वे ेन धीमता ।
प्रीतस्तमाह देवर्षिः हरे ः संस्मारितो गणु ैः ॥ १० ॥
श्लोक १०- श्रीशक ु म्हणतात राजन ! बद्धि ु मान वसदु वे ांचा हा प्रश्न ऐकून देवर्षी नारदांना भगवंतांच्या गणु ांचे स्मरण झाले आणि
प्रेमपर्वू क ते त्यांना म्हणाले - (१०)

सागं तां वसदु वे ाचा प्रश्न । श्रीशक


ु जाहला स्वानंदपर्णू ।
नारदु वोळला चैतन्यघन । चित्सख ु जीवन ममु क्षु ां ॥ १०४ ॥
हा वसदु वे ाचा प्रश्न सांगतांना श्रीशक ु ाचार्यांना स्वानंदाचे भरते आले. चैतन्यरूपी मेघ असा नारद ममु क्ष
ु ु लोकांवर चित्सख
ु ाचें जीवन
(जल) वर्षाव करूं लागला ४.

श्रीशकु म्हणे नरदेवा । भावो मीनला नारदाच्या भावा ।


ऐकोनि प्रश्नसहु ावा । तो म्हणे वसदु वे ा धन्य वाणी ॥ १०५ ॥
श्रशकु ाचार्य म्हणाले. हे राजा ! हे ऐकून मनाला मन मिळाल्यामळ
ु ें नारद म्हणाला, हे. वसदु वे ा ! तझु ी वाणी धन्य होय ५.

परिसतां हा तझु ा प्रश्न । चित्सख


ु ें प्रगटे नारायण ।
ऐसें बोलतां नारद जाण । स्वानंदें पर्णू वोसंडला ॥ १०६ ॥
हा तझु ा प्रश्न ऐकून चिदानंदस्वरूपानें नारायणच प्रगट झाला आहे. असें बोलता बोलतां नारद आत्मानंदानें अगदी भरून गेला ६.

रोमाचं उचलले अगं ीं । स्वेद दाटला सर्वांगीं ।


आनंदाश्रु चालिले वेगीं । स्वानंदरंगीं डुल्लतु ॥ १०७ ॥
त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले, साऱ्या अंगाला घाम सटु ला, डोळ्यांतनू आनंदाश्रु वाहूं लागले आणि स्वानंदाच्या रंगांत तो
डोलंू लागला ७.

सप्रेम मीनलिया श्रोता । जैं पर्णू सख


ु ावेना वक्ता ।
तैं तो जाणावा अवघा रिता । कथासारामृता चवी नेणे ॥ १०८ ॥
प्रेमळ श्रोता मिळाला असतां ज्या वक्त्याला पर्णू आनदं होत नाही, त्याला कथासारामृताची चवच ठाऊक नाहीं, तो अगदी कोरडा
आहे म्हणनू समजावे ८.
ऐकतां वसदु वे ाचा प्रश्न । नारद सख
ु ावे पर्णू ।
मग स्वानदं गिरा गर्जोन । काय आपण बोलत ॥ १०९ ॥
वसदु वे ाचा प्रश्न ऐकतांच नारदाला अत्यंत आनंद झाला आणि मग त्या आनंदयक्त
ु वाणीनें गर्जना करून वसदु वे ाला काय बोलू
लागला ते ऐक ९.

श्रीनारद उवाच -
सम्यक् एतत् व्यवसितं भवता सात्वतर्षभ ।
यत्पृच्छसे भागवतान् धर्मांस्त्वं विश्वभावनान् ॥ ११ ॥
श्लोक ११- नारद म्हणाले - हे यदश्रु ेष्ठा ! विश्वाचे कल्याण करणारा भागवतधर्म जाणनू घेण्यासंबंधीचा तमु चा हा निश्चय अतिशय
चांगला आहे. (११)

नारद म्हणे सात्वत श्रेष्ठा । वसदु वे ा परमार्थ निष्ठा ।


धन्य धन्य तझु ी उत्कंठा । तंू भावार्थी मोठा भागवतधर्मी ॥ ११० ॥
नारद म्हणाला, हे यादवश्रेष्ठा ! हे परमार्थनिष्ठ वसदु वे ा ! तझ्ु या उत्कंठे ची खरोखरच धन्य आहे. भागवतधर्मावर तझु ी मोठी भक्ति आहे
ह्यातं शक
ं ा नाहीं ११०.

ज्याचेनि धर्माचे प्रश्नोत्तरें । हें विश्व अवघेंचि उद्धरे ।


हें विचारिलें तवु ां बरें । निजनिर्धारें श्रीकृ ष्णजनका ॥ १११ ॥
हे श्रीकृ ष्णजनका ! ज्या धर्माच्या प्रश्नोत्तरानें ह्या साऱ्या विश्वाचाही उद्धार होईल, त्याच धर्माचा तंू प्रश्न विचारलास हे फारच उत्तम
झाले ११.

तझु ेनि प्रश्नोत्तरें जाण । साधक निस्तरती संपर्णू ।


साधकांचें नवल कोण । महापापी पावन येणें होती ॥ ११२ ॥
तझ्ु या प्रश्नोत्तराच्या योगानें साधक उद्धरून जातील ह्यातं आश्चर्य काय ? ह्याच्यायोगें महापापीसद्ध
ु ा पावन होतील १२.

श्रतु ोऽनपु ठितो ध्यात आदृतो वानमु ोदितः ।


सद्यः पनु ाति सद्धर्मो देवविश्वद्रुहोऽपि हि ॥ १२ ॥
श्लोक १२- हे वसदु वे ा ! हा श्रेष्ठ भागवत धर्म असा आहे की, जो ऐकल्याने, त्याचा उच्चार के ल्याने, त्याचे स्मरण के ल्याने, त्याचा
स्वीकार के ल्याने किंवा त्याला मान्यता दिल्यामळ ु े सद्ध
ु ा दर्जु नही त्याच क्षणी पवित्र होतात. (१२)

भागवतधर्माचेनि गणु ें । एक उद्धरती श्रवणें ।


एक तरती पठणें । एक निस्तरती ध्यानें ससं ारपाश ॥ ११३ ॥
भागवत धर्मच असा आहे की, त्याच्या श्रवणानें कित्येक उद्धरतात; कोणी त्याच्या पठणानेंच तरतात; कोणी त्याचे चितं न करून
संसारपाशांतनू मक्त
ु होतात १३.

एक श्रोतयां वक्तयांतें । देखोनि सख ु ावती निजचित्तें ।


सद‌भ् ावें भलें म्हणती त्यांतें । तेही तरती येथें भागवतधर्में ॥ ११४ ॥
कोणी श्रोत्याला व वक्त्याला पाहून आपल्या मनांत आनंदभरित होतात सद‌भ् ावानें जे त्यांना 'भले भले' म्हणतात तेसद्ध
ु ा येथे ह्या
भागवतधर्मानें तरून जातात १४.

हें नवल नव्हे भागवतधर्मा । जो कां देवद्रोही दरु ात्मा ।


अथवा विश्वद्रोही दष्टु ात्मा । तोही तरे हा महिमा भगवतधर्मी ॥ ११५ ॥
ह्यांतही मोठें सें नवल नाही; पण जो देवद्रोह करणारा दरु ात्मा असतो; अथवा साऱ्या विश्वाचा द्रोह करणारा दष्टु चांडाळ असतो,
तोसद्धु ा ह्या भागवतधर्मानें तरून जातो, असा ह्याचा महिमा आहे १५.

हृदयीं धरितां भागवतधर्म । अकर्म्याचें निर्दळी कर्म ।


अधर्म्याचें निर्दळी धर्म । दे उत्तमोत्तमपदप्राप्ती ॥ ११६ ॥
भागवतधर्म जर हृदयामध्यें बाळगला, तर अकर्त्यांच्या कर्मांचा तो नाश करून टाकतो आणि अधर्म्यांचे अधर्मही रसातळाला नेऊन
त्यांना उत्तमोत्तम पदावर नेऊन बसवितो १६.

जेथ रिगाले भागवतधर्म । तेथ निर्दळे कर्माकर्मविकर्म ।


निंदा द्वेष क्रोध अधर्म । अविद्येचें नाम उरों नेदी ॥ ११७ ॥
जेथें भागवतधर्म शिरतो, तेथे तो कर्माकर्म सारे लयास नेऊन निदं ा, द्वेष, क्रोध, अविद्या, ह्यांचे नांवसद्ध
ु ां उरूं देत नाहीं १७.

ते भागवतधर्मी अत्यादर । श्रद्धेनें के ला प्रश्न तवु ां थोर ।


निजभाग्यें तंू अति उदार । परम पवित्र वसदु वे ा ॥ ११८ ॥
अशा त्या भागवतधर्मासबं धं ानेंच तंू अति आदरानें व भक्तीनें गढू प्रश्न के लास. तेव्हां हे वसदु वे ा, तंू मोठा पवित्र व अत्यतं उदार
भाग्याचा आहेस १८.

तझु ें वानंू पवित्रपण । तरी पोटा आला श्रीकृ ष्ण ।


जयाचेनि नामें आम्ही जाण । परम पावन जगद्वद्यं ॥ ११९ ॥
तझ्ु या पवित्रपणाचे वर्णन किती करावें ? ज्याच्या नामानें आम्ही पावन व जगद्वद्यं झालों, तो श्रीकृ ष्ण प्रत्यक्ष तझ्ु या पोटाला आलेला
आहे १९.

तो स्वयें श्रीकृ ष्णनाथ । नित्य वसे तझि


ु यां घरातं ।
तझि
ु या‍ऐसा भाग्यवंत । न दिसे येथ मज पाहतां ॥ १२० ॥
तो श्रीकृ ष्ण तझ्ु या घरातं नित्य वास करीत आहे. तेव्हां तझ्ु या एवढा भाग्यवान् मला तर दसु रा कोणी दिसत नाहीं १२०.

वसदु वे तझि ु या नामतां । "वासदु वे " म्हणती अनतं ा ।


तें वासदु वे नाम स्मरतां । परमपावनता जगद्वद्यं ां ॥ १२१ ॥
हे वसदु वे ा ! तझ्ु याच नांवावरून ह्या अनंताला 'वासदु वे ' असे म्हणतात. त्या वासदु वे -नामाचे स्मरण के ले असतां प्राणी अत्यंत पावन
होतो २१.

त्वया परमकल्याणः पण्ु यश्रवणकीर्तनः ।


स्मारितो भगवानद्य देवो नारायणो मम ॥ १३ ॥
श्लोक १३- ज्यांचे श्रवण व कीर्तन पावन करणारे आहे, त्या परमकल्याणस्वरूप व माझे आराध्यदैवत, अशा भगवान नारायणांचे
तम्ु ही आज मला स्मरण करून दिले आहे. (१३)

ज्याचेनि श्रवणें वाढे पण्ु य । ज्यचेनि नामें झडे भवबंधन ।


तो सद्य स्मरविला तवु ां नारायण । तझु ी वाचा कल्याण वसदु वे ा ॥ १२२ ॥
ज्याच्या गणु ानवु ादानें पण्ु य वाढते, ज्याच्या नामानें संसारबंधन तटु ते, त्या नारायणाचे तंू आज स्मरण करविलेंस; तेव्हां तझ्ु या ह्या
वाणीचे कल्याण असो २२.

तझु ा आजि ऐकताचि ं प्रश्न । पर्णू प्रगटला नारायण ।


मज तझु ा हा उपकार पर्णू । तंू परम कल्याण वसदु वे ा ॥ १२३ ॥
आज तझु ा हा प्रश्न ऐकून हृदयामध्यें नारायणच पर्णू पणे प्रगट झाला आहे. हा तझु ा माझ्यावर मोठा उपकार होय. ह्याकरितां हे वसदु वे ा
! तझु ें कोटकल्याण असो २३.

आशक ं ा : ऐकोनि नारदाचें वचन । झणें विकल्प धरील मन ।


यासी पर्वी
ु ं होतें विस्मरण । आतां जाहलें स्मरण वसदु वे प्रश्नें ॥ १२४ ॥
नारदाचें हें भाषण ऐकून कदाचित् कोणाच्या मनातं विकल्प येईल की, नारदाला पर्वी
ू नारायणाचे विस्मरण झाले होते, आतां
वसदु वे ाच्या प्रश्नामळ
ु ें त्याला स्मरण झाले २४.

ज्याचं ी ऐसी विकल्पयक्त ु ी । ते जाणावे निजात्मघाती ।


तेही अर्थीचं ी उपपत्ती । ऐक निश्चितीं शकु सागं े ॥ १२५ ॥
पण असा जे कोणी विकल्पाचा तर्क करितील ते आत्मघातकी समजावे. त्याविषयींची फोड उघड करून शक
ु सांगत आहेत ती ऐका
२५,

अग्नि कंु डामाजीं स्वयभं असे । तो घृतावदानें अति प्रकाशे ।


तेवीं सप्रेम प्रश्नवशें । सख
ु उल्लासे मक्त
ु ांचें ॥ १२६ ॥
अग्निकंु डामध्यें अग्नि स्वयभं ू असतो, त्यावर तपू ओतले की तो अधिकच भडकतो. तद्वत् प्रेमळ प्रश्नाच्ं या योगानें मक्त
ु ाचे सख

अधिक विकासतें २६.

सप्रेम भावार्थे मीनला श्रोता । मक्त


ु ही उल्हासें सांगे कथा ।
तेथील सख ु ाची सख ु स्वादतु ा । जाणे जाणता सवर्म ॥ १२७ ॥
श्रोता भक्तिभावानें तल्लीन झाला म्हणजे मक्त ु ही अधिक उल्हासानें कथा सांगतो. त्या सख
ु ाची गोडी जाणता असतो तोच यथार्थ
रीतीनें समजतो २७.

यालागीं मक्त
ु ममु क्षु ु विषयी जन । भागवतधर्में निवती संपर्णू ।
तोचि वसदु वे ें के ला प्रश्न । तेणें नारद पर्णू सख
ु ावला ॥ १२८ ॥
ह्याकरितां मक्त
ु , ममु क्षु ,ु आणि विषयी जनसद्ध ु ां भागवतधर्मानें पर्णू शांति पावतात, तोच प्रश्न वसदु वे ानें के ला म्हणनू नारदालाही
परमानदं झाला २८.

जे कां पर्वू परंपरागत । जीर्ण भागवतधर्म येथ ।


सांगावया नारदमनि ु निश्चित । उपपादित इतिहासु ॥ १२९ ॥
आणि पर्वू परंपरागत प्राचीन असा जो भागवतधर्म तो सप्रमाण सागं ण्याकरितां त्या नारदमनु ींनी मागील इतिहास सागं ण्यास सरु वात
के ली २९.

अत्राप्यदु ाहरन्ति इमं इतिहासं परु ातनम् ।


आर्षभाणां च सवं ादं विदेहस्य महात्मनः ॥ १४ ॥
श्लोक १४- त्यासंबंधी हा एक प्राचीन इतिहास सांगतात तो म्हणजे ऋषभाचे पत्रु आणि महात्मा विदेह यांचा सवं ाद होय. (१४)

येच अर्थी ं विदेहाचा प्रश्न । सवं ादती आर्षभ नवजण ।


ते भागवतधर्म जीर्ण । इतिहास सपं र्णू सांगेन ऐक ॥ १३० ॥
वरील अर्थाचाच जनकराजाचा प्रश्न होता, व त्याचे उत्तर नऊ आर्षभानं ी दिले होते. नारद म्हणाला, त्या भागवतधर्माचा सपं र्णू प्राचीन
इतिहास मी तल ु ा सांगतों ऐक १३०.

आर्षभ कोण म्हणसी मळ ु ीं । त्यांची सांगेन वंशावळी ।


जन्म जयाचं ा सकु ु ळीं । नवामाजीं जाहली ब्रह्मनिष्ठा ॥ १३१ ॥
परंतु प्रथम आर्षभ हे कोण असे विचारशील तर, त्यांची वंशावळीही सांगतो. त्यांचा उत्तम कुळांत जन्म झाला असनू त्या नऊ
असामींमध्येंही उत्तम ब्रह्मनिष्ठा उत्पन्न झालेली होती ३१.

प्रियव्रतो नाम सतु ो मनोः स्वायम्भवु स्य यः ।


तस्याग्नीध्रस्ततो नाभिः ऋषभस्तत्सतु ः स्मृतः ॥ १५ ॥
श्लोक १५- स्वायभं वु मनचू ा प्रियव्रत नावाचा एक पत्रु होता, त्याचा पत्रु आग्नीध्र, आग्नीध्राचा नाभी आणि नाभीचा ऋषभ. (१५)

स्वायभं ु मनचू ा सतु ु । जाण नामें 'प्रियव्रत'ु ।


त्याचा 'आग्नीध्र' विख्यातु । 'नाभी' त्याचा सतु ु सर्यू वंशीं ॥ १३२ ॥
स्वायंभमू नचू ा जो पत्रु होता, त्याचे नांव 'प्रियव्रत' असे जाण. त्याचा पत्रु 'आग्नीध्र' नांवाचा विख्यात होता. त्याचा सर्यू वंशांतील पत्रु
'नाभी' हा होय ३२.

त्या नाभीपासनि ू ज्ञानविलासु । 'ऋषभ' जन्मला वासदु वे ांशु ।


मोक्षधर्माचा प्रकाशु । जगीं सावकाशु विस्तारिला ॥ १३३ ॥
त्या नाभीपासनू ज्ञानाचा के वळ विलास असा 'ऋषभ' जन्मास आला, हा वासदु वे ाचा अंशांशावतार असनू त्यानें मोक्षधर्माचा जगांत
सर्वत्र प्रकाश के ला ३३.

तमाहुर्वासदु वे ांशं मोक्षधर्मविवक्षया ।


अवतीर्णं सतु शतं तस्यासीद् ब्रह्मपारगम् ॥ १६ ॥
श्लोक १६- वासदु वे ांचा अंश असणार्‍या त्यांनी मोक्षधर्माचा उपदेश करण्यासाठी अवतार धारण के ला होता त्याचे शंभर पत्रु होते
आणि ते सगळे वेदामं ध्ये पारंगत होते. (१६)

ऋषभ वासदु वे ाचा अश ं ु । ये लोकीं मोक्षधर्मविश्वासु ।


प्रवर्तावया जगदीशु । हा अंशांशु अवतार ॥ १३४ ॥
ऋषभ हा वासदु वे ाचा अंश होता. भल ू ोकी मोक्षधर्मावर लोकांची श्रद्धा वाढावी म्हणनू च हा भगवंताचा 'अंशांश' अवतार झाला होता
३४.

त्याचें पंचमस्कंधीं चरित्र । सागि


ं तलें सविस्तर ।
त्यासी जाहले शत पत्रु । वेदशात्रसंपन्न ॥ १३५ ॥
पचं मस्कंधामध्यें त्याचे सविस्तर चरित्र सागि
ं तले आहे, त्याला वेदशास्त्रसपं न्न असे शभं र पत्रु झाले ३५.

त्याहं ीमाजीं ज्येष्ठ पत्रु । अतिशयें परम पवित्र ।


ऐक त्याचे चरित्र । अतिविचित्र सांगेन ॥ १३६ ॥
त्यामध्येंही सर्वांत वडील पत्रु होता तो अतिशय पवित्र होता. त्याचे लोकविलक्षण चरित्र सागं तों ऐक ३६.

तेषां वै भरतो ज्येष्ठो नारायणपरायणः ।


विख्यातं वर्षमेतद् यन्नाम्ना भारतमद‌भ् तु म् ॥ १७ ॥
श्लोक १७- भरत हा त्याच्ं यामध्ये सर्वात थोरला तो नारायणाचं ा परम भक्त होता त्याच्ं याच नावावरून अलौकिक असा हा देश
भारतवर्ष या नावाने प्रसिद्ध झाला. (१७)
जो ज्येष्ठपत्रु 'भरत' जाण । तो नारायणपरायण ।
अध्यापि 'भरतवर्ष' उच्चारण । त्याचेनि नावं ें जाण विख्यात ॥ १३७ ॥
या वडील मल ु ाचे नांव 'भरत' असनू तो नारायणाचा परम भक्त होता; अद्यापि 'भरतवर्ष' म्हणनू जे ह्या भरतखंडाला म्हणतात, ते
याच्याच नांवामळ ु ें प्रसिद्ध झाले आहे ३७.

जो मनसा-वाचा-कर्मणा । अखडं भजे नारायणा ।


असतांही राज्यधर्मी ं जाणा । जो आत्मखणु ा न चक
ु े ॥ १३८ ॥
जो मनाने, वाचेनें आणि कर्मानें नारायणाला अखंड भजे, जो राज्यकारभारांत असतांही आत्मखणु ा चक
ु त नसे ३८.

जेवीं मार्गी ं चालतां । पा‍उलें वक्रेंही टाकिता ।


दैववशें अडखळ ु तां । आश्रयो तत्त्वतां भमि
ू चाचि ॥ १३९ ॥
ज्याप्रमाणें वाटेनें चालत असतां वांकडीतिकडी पावले पडली किंवा ठे चही लागली तरी त्याला भमू ीचाच आश्रय असतो ३९.

तेवींचि तयासी असतां । राज्यधर्म चाळितां ।


यथोचित कर्म आचरितां । निजीं निजात्मता पालटेना ॥ १४० ॥
त्याप्रमाणेच तो भरत राज्यकारभार पाहत असतां व यथोचतु कर्में आचरीत असतांही आत्मनिष्ठेपासनू च्यतु झाला नाहीं १४०.

या नाव बोलिजे 'अखंडस्थिती' । जे पालटेना कल्पांती ।


जेथ असतां सखु ी होती । पनु रावृत्ति असेना ॥ १४१ ॥
या स्थितीलाच 'अखंड स्थिति' असे म्हणतात; जी कल्पांतीही पालटत नाही, आणि ज्या स्थितीत असतांना मनष्ु य अत्यंत सख
ु ी
होतो व त्याला पनु र्जन्म घ्यावा लागत नाहीं ४१.

ऐसें करी सदाचरण । आणि नारायणपरायण ।


आ‍ईक त्याचेंही व्याख्यान । विशद करूनि सांगेन ॥ १४२ ॥
अशा रीतीनें तो भरत सदाचरण करीत असनू , नारायणपरायण होता. ही गोष्ट मी तल
ु ा विशद करून सागं तों ऐक ४२.

नराचं ा समदु ाय गहन । त्यासी 'नार' म्हणती जाण ।


त्याचें 'अयन' म्हणजे स्थान । म्हणौनि म्हणती 'नारायण' आत्मयासी ॥ १४३ ॥
नरांच्या मोठ्या समदु ायाला 'नार' असे म्हणतात, त्या नाराचे म्हणजे जीवसमदु ायाचे आत्मा हा 'अयन' म्हणजे स्थान अथवा
अधिष्ठान असल्यामळ ु ें त्याला 'नारायण' म्हणतात ४३.
त्याच्या ठायीं परायण । म्हणिजे अनन्यत्वें शरण ।
निवटूनियां आपल ु ें अहपं ण । तद‌रू
् पें जाण राहिला ॥ १४४ ॥
त्याच्या ठायीं भरत परायण म्हणजे अनन्य शरण झाला व आपले अहपं ण नाहीसे करून तद‌रू
् प होऊन राहिला ४४.

ऐसा तो ऋषभाचा पत्रु । जयासी नांव 'भरत' ।


ज्याच्या नामाची कीर्ति विचित्र । परम पवित्र जगामाजीं ॥ १४५ ॥
असा तो ऋषभाचा पत्रु , त्याचे नांव 'भरत'. ज्याच्या नांवाची पवित्र कीर्ति सगळ्या जगांत दमु दमु नू राहिली आहे ४५.

तो भरतु राहिला हे भमि


ू के सी । म्हणौनि 'भरतवर्ष' म्हणती यासि ।
सकळ कर्मारंभीं करितां संकल्पासी । ज्याचिया नामासी स्मरताति ॥ १४६ ॥
तो भरत या भमू ीत होउन मेला म्हणनू या देशाला 'भारतवर्ष' असे म्हणतात. सर्व वैदिक कर्मारंभी सक
ं ल्प करितांना त्याच्या नांवाचा
उच्चार करावा लागतो ४६.

ऐसा आत्माराम जर्‍ही झाला । तर्‍ही विषयसगं नव्हे भला ।


यालागीं त्याचा वृत्तांतु पढि
ु ला । सांगेन सकळां आ‍इकें ॥ १४७ ॥
पण असा अगदी आत्मारामस्वरूप झाला तरी त्यालासद्ध ु ां विषयसगं योग्य नाही, हे समजण्यासाठी त्याचे पढु ील चरित्र मी सर्वांना
सांगतों, ते ऐकावें ४७.

नामें ख्याती के ली उदडं । यालागीं त्यातें म्हणती 'भरतखंड' ।


आणीकही प्रताप प्रचंड । त्याचा वितंड तो ऐका ॥ १४८ ॥
नांवानेंच त्यानें आपली फार प्रसिद्धि के ली, म्हणनू च याला 'भरतखंड' असे म्हणतात. पण याहूनही त्याचा प्रताप प्रचंड म्हणजे
लोकविलक्षण आहे तो सांगतो ऐक ४८.

स भक्त
ु भोगां त्यक्त्वेमां निर्गतस्तपसा हरिम् ।
उपासीनस्तत्पदवीं लेभे वै जन्मभिस्त्रिभिः ॥ १८ ॥
श्लोक १८- त्याने पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेतल्यावर ते सोडून तो वनात गेला तेथे त्याने तपश्चर्येने भगवंतांची उपासना करून तीन
जन्मामं ध्ये भगवतं ानं ा प्राप्त करून घेतले. (१८)

तेणें दिग्मडं ल जिति


ं लें । समद्रु वलयाकि
ं त राज्य के लें ।
नानाविध भोग भोगिले । जे नाहीं देखिले सरु वरीं ॥ १४९ ॥
त्यानें सर्व दिशा पादाक्रांत करून समद्रु वलयाकि
ं त पृथ्वीचे राज्य के ले. मोठमोठ्या देवांनीही जे भोगविलास भोगले नाहीत, अशा
नाना प्रकारच्या सख ु विलासांचा त्यानें उपभोग घेतला ४९,
अनक ु ू ळ स्त्रिया पत्रु । अनकु ू ळ मत्रं ी पवित्र ।
अनक ु ू ळ राज्य सर्वत्र । ते त्यागिले विचित्र नानाभोग ॥ १५० ॥
त्याला स्त्रिया व पत्रु ही अनक ु ु ल असनू पवित्र मंत्रीही अनक
ु ू ल होते. तसेच सर्व राष्ट्र अनक
ु ू ल असनू ही त्या नाना प्रकारच्या दिव्य
भोगाचं ा त्यानें त्याग के ला १५०.

ऐसे भोग भोगिलियापाठीं । सांडूनि वलयांकित राज्यसृष्टी ।


स्वयें निघाला जगजेठी । स्वहितदृष्टी हरिभजनीं ॥ १५१ ॥
अशा प्रकारचे सर्व भोग भोगल्यानतं र ते आपलें समद्रु वलयाकि
ं त सर्व राज्य सोडून देऊन स्वहितावर दृष्टि ठे वनू तो हरिभजनासाठी
निघाला ५१.

जे राज्यवैभव भोगिती । त्यांसी कदा नव्हे गा विरक्ती ।


भरतें के ली नवलख्याती । सेविला श्रीपती भोगत्यागें ॥ १५२ ॥
जे राज्यवैभव भोगतात, त्यांना विरक्ति कधीच होत नाही; परंतु भरतानें मोठी नवलाची गोष्ट के ली, ती ही की, सर्व भोगांचा त्याग
करून तो लक्ष्मीपतीची सेवा करूं लागला ५२.

तों नेणचि
ें जन्में जाण । हो‍आवा मोक्षासी आरोहण ।
परी जाहलें जन्मांतरकारण । तेंही विंदाण सांगेन ॥ १५३ ॥
तो खरोखर त्याच जन्मांत मोक्षाला जावयाचा; परंतु त्याला जन्मांतर घ्यावे लागले. त्याचेही कारण सांगतों ५३.

संनिहितप्रसतू काळीं । मृगी जळ प्राशितां जळीं ।


ऐकोनि पंचाननाची आरोळी । उडाली तत्काळीं अतिसत्राणें ॥ १५४ ॥
एक हरिणी, प्रसतिू काल अगदी जवळ आला असतां, नदीच्या पाण्यांत उभी राहून पाणी पीत होती. इतक्यांत तिनें एकदम व्याघ्राची
गर्जना ऐकली. त्यासरशी ती भयानें तत्काळ उडाली ५४.

धाकें गर्भु तिचा पडतां जळीं । भरत स्नान करी ते काळीं ।


देखोनि कृ पाळु कळवळी । काढी तत्काळी दयाळुत्वें ॥ १५५ ॥
पण उड्डाण करतानं ा भयामळ ु ें तिच्या पोटातं ील गर्भ एकदम त्या पाण्यातं पडला. त्या काळी जवळच भरत हा स्नान करीत होता.
त्यानें तो पाहिला आणि तो जात्याच कोमल मनाचा असल्यानें त्यास त्याची दया येऊन त्यानें त्यास तत्काळ बाहेर काढले ५५.

मृगी न येचि परतोन । मातृहीन हें अतिदीन ।


भरत पाळी भतू दयेनें । मृगममता पर्णू वाढली ॥ १५६ ॥
ती हरिणी काही मागे परतनू आली नाही. त्यामळ ु ें ते पाडस आईशिवाय बापडु वाणे दिसू लागले. त्यामळ
ु े , भतू दयेनें प्रेरित होऊन भरत
त्या हरिणबाळकाचा प्रतिपाळ कर्रूं लागला. करतां करतां मृगाची ममता फारच वाढली ५६.
स्नान सध्ं या अनष्ठु ान । करितां मृग आठवे क्षणक्षण ।
आरंभिल्या जपध्यान । मृगमय मन भरताचें ॥ १५७ ॥
ती इतकी की, स्नान, संध्या, अनष्ठु ान करतांनासद्ध ु ा क्षणोक्षणी त्याला तें हरिणीचे पाडस आठवंू लागले. जप किंवा ध्यान आरंभिलें
की भरताच्या डोळ्यापं ढु े त्या हरिणबालकाशिवाय दसु रे काहं ींच दिसत नसे ५७.

आसनीं भोजनीं शयनीं । मृग आठवे क्षणक्षणीं ।


मृग न देखतां नयनी । उठे गजबजोनि ध्यानत्यागें ॥ १५८ ॥
बसतानं ा, जेवतानं ा, निजतानं ा, घटके घटके ला त्या मृगाचीच त्याला आठवण होत असे. हरिणबाल जरा डोळ्याआ
ं ड झाला, की तो
ध्यान सोडून खडबडून उठत असे ५८.

ममता बैसली मृगापाशीं । मृग वना गेला स्वइच्छें सीं ।


त्याचा खेदु करितां भरतासी । काळ आकर्षी देहातें ।१५९ ॥
अशा रीतीनें त्या मृगावर त्याची ममता बसली. तों एके दिवशी तो मृग स्वेच्छे नें अरण्यांत निघनू गेला, त्यामळ
ु ें भरताला अत्यंत दःु ख
झाले व त्या दःु खाचे वेळींच त्याला मृत्यनू ें गाठलें ५९.

यालागी साचचि जाण । ममतेपाशीं असे मरण ।


जो निर्मम संपर्णू । त्यासि जन्ममरण स्पर्शेना ॥ १६० ॥
यासाठी ममतेपाशी मरण हें ठे वलेलेच समजावे. जो निखालस ममताशन्ू य असतो, त्याला जन्ममरण स्पर्शसद्ध
ु ा करीत नसते १६०.

भरत तपिया थोर अंगें । तेथ काळ कै सेनि रिघे ।


ममतासंधी पाहोनि वेगें । मृत्यु तद्योगें पावला ॥ १६१ ॥
भरत स्वतः मोठा तपस्वी होता, तेव्हां तेथें काल कसा शिरला ? तर ममतेची संधि साधनू मृत्यनू ें त्यावर घाला घातला ६१.

देहासी येतां मरण । भरतासी मृगाचें ध्यान ।


तेणें मृगजन्म पावे आपण । जन्मातं रकारण जाहलें ऐसें ॥ १६२ ॥
देहाला मरण आले त्या वेळी भरताला त्या मृगाचा ध्यास लागलेला होता. त्यायोगें त्याला पढु चा जन्म मृगाचा प्राप्त झाला. याप्रमाणें
त्याला पनु र्जन्माचे कारण घडले ६२.

कृ पेनें के ला जो सगं ु । तोचि योगियां योगभगं ु ।


यालागीं जो निःसंगु । तो अभंगु साधक ॥ १६३ ॥
कृ पेनें का होईना, संग के ला असता तोच योग्याच्या योगभंगास कारण होतो. ह्याकरितां जो निःसंग असतो, तोच अभंग साधक होय
६३.
मृगाचेनि स्मरणें निमाला । यालागीं तो मृगजन्म पावला ।
जो कृ ष्णस्मरणें निमाला । तो कृ ष्णचि
ु जाला देहांतीं ॥ १६४ ॥
मृगाचें स्मरण करता करतांच त्याला मरण आले, म्हणनू च तो मृगाच्या जन्मास गेला. जो कृ ष्णस्मरण करतांना मरण पावतो, तो
मृत्यनू तं र कृ ष्णस्वरूपच होतो ६४.

अतं काळीं जे मती । तेचि प्राणियांसी जाण गती ।


यालागी श्रीकृ ष्ण चित्तीं । अहोरातीं स्मरावा ॥ १६५ ॥
अतं काळी प्राण्याची जशी मति असते, तशीच त्याला गति मिळते. ह्याकरितां मनामध्यें अहोरात्र श्रीकृ ष्णाचेच स्मरण करावें ६५,

परी मृगदेहीं जाण । भरतासी श्रीकृ ष्णस्मरण ।


पर्वी
ू ं के लें जें अनष्ठु ान । तें अंतर जाण कदा नेदी ॥ १६६ ॥
भरत मृग झाला, परंतु त्या मृगाच्या देहामध्येंसद्ध ु ा त्याला श्रीकृ ष्णाचे स्मरण होते. कारण, पर्वू जन्मी के लेले अनष्ठु ान कधीही व्यर्थ होत
नाही, हे पक्कें समजावें ६६.

मागतु ा तिसरे जन्में पाहें । तो 'जडभरत' नाम लाहे ।


तेथें तो निर्ममत्वें राहे । तेणें होय नित्यमक्त
ु ॥ १६७ ॥
त्यानंतर तिसऱ्या जन्मीं तो 'जड-भरत' ह्या नावानें प्रसिद्धीस आला. तेथें तो मायापाशापासनू अगदी अलप्त राहिल्यामळ
ु ें नित्यमक्त

होऊन बसला ६७.

बहुतां जन्मींची उणीवी । येणें जन्में काढिली बरवी ।


निजात्मा आकळोनि जीवीं । परब्रह्मपदवी पावला ॥ १६८ ॥
मागील पष्ु कळ जन्मांची जाणीव त्यानें ह्या जन्मात भरून काढली. त्यानें आपला जीव आत्मस्वरूपांत लीन करून परब्रह्मपदवी प्राप्त
करून घेतली ६८.

ऋषभपत्रु उत्पत्ती । शतबधं ु जाण निश्चितीं ।


त्यांत ज्येष्ठाची स्थिती । उरल्यांची गती ते ऐका ॥ १६९ ॥
ह्याप्रमाणें ऋषभाला शभं र पत्रु झाले होते, त्यापं ैकी सर्वांत जो वडील, त्याची स्थिति सागि
ं तली. आतां बाकीच्याचं ें वर्तमान ऐक ६९.

तेषां नव नवद्वीप पतयोऽस्य समन्ततः ।


कर्मतन्त्रप्रणेतार एकाशीतिर्द्विजातयः ॥ १९ ॥
श्लोक १९- त्या पत्रु ांपक
ै ी नऊ पत्रु या भारतवर्षाच्या नऊ द्वीपांचे अधिपती झाले आणि एक्क्याऐशं ी पत्रु कर्मकांड रचणारे ब्राह्मण
झाले. (१९)
नव नवखडं ाप्रं ती । ते के ले खडं ाधिपती ।
एक्यायशीं जणांची स्थिती । कर्ममार्गी होती प्रवर्तक ॥ १७० ॥
प्रत्येक खंडावर एक एक याप्रमाणें नऊ खंडांवर नवांना अधिपति करून ठे विले होते. एक्यायशी असामी कर्ममार्गाचे प्रवर्तक होते
१७०.

उरले जे नव जण । सकळ भाग्याचें भषू ण ।


ब्रह्मज्ञानाचें अधिष्ठान । ऐक लक्षण तयांचें ॥ १७१ ॥
बाकी जे नऊ असामी उरले, ते सर्व भाग्याचे भषू ण व ब्रह्मज्ञानाचे के वळ अधिष्ठानच होते. त्याचं े लक्षण सागं तो ऐक ७१.

नवाभवन्महाभागा मनु यो ह्यर्थशंसिनः ।


श्रमणा वातरसना आत्मविद्याविशारदाः ॥ २० ॥
श्लोक २० उरलेल्या भाग्यशाली नऊ जणानं ी परिश्रमपर्वू क आत्मविद्या सपं ादन करून ते आत्मज्ञानी झाले होते त्यामळ
ु े ते नेहमी
दिगबं र अवस्थेत राहात आणि अधिकारी परुु षांना आत्मज्ञानाचा उपदेश करीत असत (२०)

ऋषभकुळीं कुळदीप । स्नेहसत्रू वें ीण देदीप्य ।


नवही जण स्वयें सद‌रू ् प । सायज्ु यस्वरूप प्रकाशक ॥ १७२ ॥
हे नऊ बंधु म्हणजे ऋषभकुलाला तेलवातीशिवाय प्रकाशित करणारे जणंू दीपकच होते. ते नऊही जण सच्चिदानंदरूप असनू
सायज्ु यस्वरूपाचे प्रकाशक म्हणजे साधकांना सायज्ु यस्वरूपाचे दर्शन करविणारे होते ७२.

आत्माभ्यासीं परिश्रम । करून निरसिलें कर्माकर्म ।


यालागीं ते अकृ ताश्रम । निजनिभ्रम स्वयें जाहले ॥ १७३ ॥
त्यांनी आत्माभ्यासांत परिश्रम करून कर्माकर्म निरसनू टाकले होते. म्हणनू ते भ्रमरहित झाले असनू कोणताही आश्रम न स्वीकारतां
राहिलेले होते ७३.

शाब्दबोधें सदोदित । ब्रह्मज्ञानपारंगत ।


शिष्यप्रबोधीं समर्थ । परमाद‌भ् तु अतिदक्ष ॥ १७४ ॥
ते शब्दज्ञानातं निष्णात व ब्रह्मज्ञानपारंगत असनू शिष्यप्रबोधाविषयीं समर्थ आणि परमाद‌भ् तु व अत्यतं दक्ष होते ७४.

ते ब्रह्मविद्येचें चालतें डिंब । त्याचं े अवेव ते ब्रह्मकोंब ।


हे विद्येचें पर्णू बिंब । स्वयें स्वयंभ परब्रह्म ॥ १७५ ॥
ते ब्रह्मविद्येचे चालते बोलते पतु ळे असनू त्यांचे अवयव म्हणजे ब्रह्माला फुटलेले कोंबच होते. ते विद्येचे पर्णू बिंब असनू स्वतःसिद्ध
परब्रह्माचे स्वरूप होते ७५.
दशदिशा एकूचि दोरा । भरूनि पाघं रुणें मनु ीश्वरा ।
वारा वळून कडदोरा । बांधिला परु ा ग्रंथीरूप ॥ १७६ ॥
त्या मनु ीश्वरांनी दशदिशांना एकच दोरा भरून पाघं रुणे के ली होती; वारा वळून त्याचा ग्रंथिरूप एकच कडदोरा बांधलेला होता ७६.

आकाशाच्या ठायीं । अंबरत्व के लें तिहीं ।


ते चिदबं र पाहीं । एकचि नवांही पाघं रूण ॥ १७७ ॥
आकाशाचेंच त्यांनी वस्त्र के लें होतें. नऊही असामींनी चिदाकाशाचे एकच पांघरूण के ले होते ७७.

प्राणापान वळूनि दोन्ही । गांठी के ली नाभीच्या ठायीं ।


तंव जीवग्रंथी सटु ली पाहीं । तेंचि नवांही ब्रह्मसत्रू ॥ १७८ ॥
प्राण व अपान ह्या दोहोंची दोरी वळून नाभीमध्यें त्याची गांठ दिली, तोंच जिवाची चिदचिद‌ग्र् ंथी सटु ली आणि तेच त्या नऊ
असामींना ब्रह्मसत्रू म्हणजे यज्ञोपवीत झालें. ७८.

ऐसे परब्रह्मवैभवें । निडारले निजानभु वें ।


त्यांचीं सांगेन मी नांवें । यथागौरवें तें ऐक ॥ १७९ ॥
परब्रह्माच्या वैभवानें व आत्मस्वरूपानभु वानें ते अगदी परिपक्व झाले होते. आता त्या नऊ असामींची नावेही यथागौरव सागं तों ऐक
७९.

ज्याचं े नाम ऐकतां । कांपत काळ पळे मागतु ा ।


संसार नघु वी माथा । नाम स्मरतां जयांचें ॥ १८० ॥
ज्यांचे नांव ऐकताच काळ हा कांपत कांपत माघारी पळतो, ज्यांच्या नामाचे स्मरण के ले असतां संसार डोकें च वर करूं शकत नाहीं
१८०,

त्याचि
ं या नामांची कीर्ती । आ‍ईक सांगेन परीक्षिती ।
ज्याचं ेनि नामें आतडु े मक्त
ु ी । जाण निश्चितीं भाविकां ॥ १८१ ॥
हे परीक्षिती ! ज्यांचे नाम घेतले असतां भाविक जनांना निश्चयेंकरून मक्त
ु ीच मिळते, त्यांच्या नामाची कीर्ति तल
ु ा सांगतो ऐक ८१.

कविर्हरिरन्तरीक्षः प्रबद्ध
ु ः पिप्पलायनः ।
आविर्होत्रोऽथ द्रुमिलश्चमसः करभाजनः ॥ २१ ॥
श्लोक २१- त्यांची नावे अशी होती कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबद्ध
ु , पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस व करभाजन. (२१)

कवि हरि अंतरिक्ष । प्रबद्धु पिप्पलायन देख ।


आविर्होत्र द्रुमिल सटु ंक । चमस निर्दोष करभाजन ॥ १८२ ॥
कवि, हरि, अंतरिक्ष, प्रबद्धु , पिप्पलायन, आविर्होत्र, सल
ु क्षणी द्रुमिल, निर्दोष असा चमस, व करभाजन ८२.
एवं नवही नांवें जाण । यांचें करितां नामस्मरण ।
सकळ पापा निर्दळण । हे महिमा पर्णू तयाचं ी ॥ १८३ ॥
अशा प्रकारें त्या नवांची नऊ नांवे होतीं. ह्या नामांचे स्मरण के ले असतां सर्व पातकांचा नाश होतो, असा त्यांचा महिमा आहे ८३.

त्याचं ी परमहसं स्थिती । सांगेन मी तजु प्रती ।


ज्याचं ेनि पावन होय क्षिती । त्या या नव मर्ती
ू पण्ु य पज्ू य ॥ १८४ ॥
त्यांची परमहसं स्थिति मी तल ु ा सांगतो. ज्यांच्या योगानें सर्व पृथ्वी पावन होऊन जाईल अशा त्या पण्ु यपज्ू य नऊ मर्ति
ू होत्या ८४.

एते त भगवद‌रू
् पं विश्वं सदसदात्मकम् ।
आत्मनोऽव्यतिरे केण पश्यन्तो व्यचरन्महीम् ॥ २२ ॥
श्लोक २२- हे व्यक्त-अव्यक्त जग भगवद‌रू् प माननू ते आपल्याहून वेगळे नाही, असा अनभु व घेत पृथ्वीवर विहार करीत होते. (२२)

ते वेगळे दिसती नवांक । परी भगवद‌रू् पें अवघे एक ।


सतं ासतं जन अनेक । आपणासं गट देख एकत्वें पाहती ॥ १८५ ॥
ते नऊ जरी देहानें वेगळे दिसत होते, तरी भगवत्स्वरूपत्वानें एकच होते. सष्टु असोत की दष्टु असोत, सर्वजनांना आपणासहवर्तमान ते
एकरूपानेंच पहात ८५.

त्यासं ी तंव असंतता । उरली नाहीं सर्वथा ।


संत म्हणावया परु ता । भेदु न ये हाता चिन्मयत्वें ॥ १८६ ॥
कारण, त्यांना असाधत्ु व म्हणनू कोठे च काही राहिले नव्हते. सर्व चिन्मय झाल्यामळ
ु ें 'संत' म्हणण्यापरु ता भेद त्यांच्या ठिकाणी
राहिलाच नव्हता ८६.

जग परिपर्णू भगवतं ें । आपण वेगळा नरु े तेथें ।


तंव भगवद् रूप समस्तें । भतू ें महाभतू ें स्वयें देखे ॥ १८७ ॥
सारे जग भगवतं ानेंच भरलेले असल्यामळ ु ें आपण त्याहून निराळे राहणे शक्य नाही. त्यामळ
ु ें ते सर्व भतू मात्र व पचं महाभतू े
भगवत्स्वरूपच पहात असत ८७.

हेंही देखतें देखणें । तेंही स्वयें आपण होणें ।


होणें न होणें येणें जाणें । हीं गिळूनि लक्षणें विचरती मही ॥ १८८ ॥
हे पहाणे व पाहण्याचा पदार्थसद्ध ु ा आपणच होऊन, होणें न होणे, येणें जाणें, ही सर्व लक्षणें गिळून टाकून ते जगांत वावरत असत
८८.
अव्याहतेष्टगतयः सरु सिद्धसाध्य ।
गन्धर्वयक्षनरकिन्नर नागलोकान् ।
मक्त
ु ाश्चरन्ति मनि
ु चारणभतू नाथ ।
विद्याधरद्विजगवां भवु नानि कामम् ॥ २३ ॥
श्लोक २३ - मनात येईल, तिकडे ते जात असत. देवता, सिद्ध, साध्य, गंधर्व, यक्ष, मनष्ु य किन्नर, नाग, मनु ी, चारण, भतू नाथ,
विद्याधर, ब्राह्मण, गोशाळा अशा कोणत्याही जागी ते स्वच्छंदपणे जात सर्वजण जीवन्मक्त
ु च होते. (२३)

वैकंु ठ कै लास सरु सिद्धस्थानें । सप्तपाताळादि गमनें ।


एवं श्लोकोक्त चवदा भवु नें । स्वइच्छा विचरणें कामनारहित ॥ १८९ ॥
वैकंु ठ, कै लास, तसेंच देव व सिद्ध (साध्य, गंधर्व, यक्ष, नर, किन्नर, नाग, मनि
ु , चारण, भतू नाथ, विद्याधर, द्विज, गाई) इत्यादिकांची
स्थानें, सारांश, सप्तस्वर्ग व सप्तपाताळादि म्हणजे श्लोकामध्यें सांगितलेले चौदा लोक, यांमध्यें ते निरिच्छपणे खश ु ाल फिरत असत
८९.

त्यासं ी जीवीं नाहीं विषयासक्ती । यालागीं खंटु ेना त्यांची गती ।


इच्छामात्रें गमनशक्ती । सख ु ें विचरती निष्काम ॥ १९० ॥
त्यांच्या मनांत विषयासक्ति नसल्यामळ ु ें त्यांची गति कुठे च खटंु त नसे. स्वेच्छे प्रमाणें पाहिजे तिकडे जाण्याचे त्यांच्या अंगी सामर्थ्य
असल्यामळ ु ें ते निष्कामपणे हवे तिकडे खश ु ाल जात येत असत १९०.

त एकदा निमेः सत्रं उपजग्मर्यु दृच्छया ।


वितायमानमृषिभिः अजनाभे महात्मनः ॥ २४ ॥
श्लोक २४ - ते एकदा या अजनाभ वर्षात महात्म्या निमीच्या, ऋषींच्या द्वारा चालू असलेल्या यज्ञात योगायोगाने जाऊन पोहोचले.
(२४)

जेथें मनाचा प्रवेशु नाहीं । त्यांची पायवाट ते ठायीं ।


ऐसे स्वइच्छा विचरतां मही । आले ते पाहीं कर्मभमू ीसी ॥ १९१ ॥
ज्या ठिकाणी मनाचासद्ध ु ां प्रवेश होणें नाही, त्या ठिकाणी ते पायानं ी जात. अशा प्रकारे ते इच्छागमनीं स्वेच्छे नें जगातं फिरतां फिरतां
एक वेळ कर्मभमू ीवर आले ९१.

मही विचरतां वितंड । पातले 'अजनाभ' खंड ।


तवं विदेहाचा याग प्रचडं । मीनले उदडं ऋषीश्वर ॥ १९२ ॥
आणि यदृच्छे नें पृथ्वीवरील 'अजनाभ' खंडाला (भारतवर्षांत) येऊन पोचले. तों तेथें जनकराजाचा यज्ञ चालू असनू मोठमोठे ऋषि
असंख्यात जमले होते ९२.

याग वेदोक्तविधी निका । कंु डमडं प वेदिका ।


आवो साधोनि नेटका । विधानपीठिका अतिशद्ध ु ॥ १९३ ॥
तो यज्ञ वेदोक्तविधीनें यथाशास्त्र चालला होता. कंु ड, मडं प, वेदिका, दिशासाधन, अनष्ठु ानाची पीठिका म्हणजे यथाशास्त्र पर्वू तयारी
करून सर्व कर्में पवित्र रीतीनें चालली होतीं ९३.

स्रक
ु ् -स्रवु ा-त्रिसंधानें । विस्तरूनि परिस्तरणें ।
अखंड वसधु ारा दडं ाप्रमाणें । ऋषिमंडणें होम करिती ॥ १९४ ॥
स्रकु ् , सवु ा, इत्यादि यज्ञपात्रे, 'त्रिसंधानें' म्हणजे तीन ठिकाणीं जोडलेली दर्भाची दोरी (शल्ु बादि रज्ज)ु व दर्भाची परिस्तरणें पसरून
'दडं ाप्रमाणे' म्हणजे अखंड, 'वसधु ारा' म्हणजे तपु ाची धार धरून ऋषिमंडळे होम करीत होती ९४.

होम होतां संपर्णू । पर्णा


ू हुतीसमयीं जाण ।
येतां देखिले नवही जण । देदीप्यमान निजतेजें ॥ १९५ ॥
होमाची समाप्ति होऊन पर्णा ू हुतीची वेळा आली तोंच हे नऊ असामी (आर्षभयोगी) तेजानें देदीप्यमान् असे येतांना दृष्टीस पडले ९५.

तान् दृष्ट्वा सर्यू सङ्काशात् महाभागवतान् नृप ।


यजमानोऽग्नयो विप्राः सर्व एवोपतस्थिरे ॥ २५ ॥
श्लोक २५- ते भगवंतांचे परम भक्त आणि सर्या ू प्रमाणे तेजस्वी होते त्यांना पाहून यजमान निमी, अग्नी आणि ऋत्विज असे सर्वजणच
त्याच्ं या स्वागतासाठी उभे राहिले. (२५)

अमित सर्या
ू चिया कोटी । हारपती नखतेजागं ष्टु ीं ।
तो भगवंत जिंहीं धरिला पोटीं । त्यांची तेजाची गोष्टी अलोलिक ॥ १९६ ॥
ज्याच्या अंगष्टु नखाच्या तेजांत कोट्यवधि सर्यू लोपनू जातात, त्या भगवंताला ज्यांनी हृदयांत सांठविला, त्यांचे तेज किती
अलौकिक होते म्हणनू सांगावें ? ९६.

त्याचि
ं या अंगप्रभा । सर्यू लोपताहे उभा ।
जिंहीं प्रभेसी आणिली शोभा । चैतन्यगाभा साकार ॥ १९७ ॥
त्याच्ं या अगं कातं ीपढु े सर्यू ही दिपनू जात असे. आपल्या अगं तेजानें प्रभेलाच शोभा आणणारे असे नऊजण साकार चैतन्याचा गाभाच
होते ९७.

ते भगवद‌भ् ांववैभव । भगवंताचें निजगौरव ।


भक्तीचे भाग जे नव । ते हे जाण सर्व मर्ति
ू मतं ॥ १९८ ॥
नऊ असामी म्हणजे भगवद‌भ् ावाचें वैभव, भगवंताचें गौरव, किंवा नवविधा भक्तीचे मर्ति
ू मंत पतु ळे च होते असे म्हटले तरी चालेल
९८.

नवखडं पृथ्वीचे अलक ं ार । नवविधीचें निजसार ।


नवरत्‍नांचेंही निजभांडार । तें हे साकार नवही जण ॥ १९९ ॥
ते नवखडं पृथ्वीचे जणंू अलक
ं ार, नवनिधींचें निजसार, किंवा नवरत्नाचं ें निजभाडं ारच साकाररूप घेऊन आलेले, असे ते नऊ
असामी होते ९९.

कीं ते नवही नारायण । स्वयें प्रगटले आपण ।


नवही नृसिंह जाण । देदीप्यमान पैं आले ॥ २०० ॥
किंवा ते नऊ नारायणच तेथे आपणहून प्रगट झाले, किंवा ते नऊ नारसिंहच तेथें देदीप्यमान रूपानें आले असे वाटलें २००.

आव्हानिले तिन्ही अग्नी । उभे ठे ले त्यांतें देखोनी ।


ते हे भागवतीं देखिले नयनीं । इतरांलागनु ी दिसेना ॥ २०१ ॥
तेथील यज्ञकंु डांत दक्षिणाग्नि, गार्हपत्याग्नि व आहवनीयाग्नि अशा तीन अग्नींना आवाहन के लेले होतें , ते ह्यांस पाहतांच उठून उभे
राहिले. त्यांना ह्या नऊ भागवतांनीच पाहिले. इतरांना ते अग्नि दिसले नाहींत १.

येतां देखोनि तेजोमर्ती


ू । ऋत्विज आचार्य उभे ठाकती ।
सा‍उमा धावं े विदेहनृपती । स्वानदं वृत्ती सन्मानी ॥ २०२ ॥
अशा त्या तेजःपंजु मर्तिू पाहून ऋत्विज आणि आचार्य हे उभे राहिले. जनक राजा तर धांवतच सामोरा गेला व त्यानें स्वानंदपर्वू क
त्याचं ा सत्कार के ला २.

सवेग घाली लोटागं ण । मगु टु काढोनि आपण ।


मस्तकीं वंदनि
ू यां चरण । पर्णा
ू दरें जाण आणिता झाला ॥ २०३ ॥
त्यानें झटकन जाऊन त्यांच्या पायांवर लोटांगण घातले, आणि मगु टु काढून मस्तकानें चरणांस वंदन करून मोठ्या सत्कारानें त्यांस
यज्ञमंडपात आणिलें ३.

विदेहस्तानभिप्रेत्य नारायणपरायणान् ।
प्रीतः सम्पजू यां चक्रे आसनस्थान्यथार्हतः ॥ २६ ॥
श्लोक २६- ते भगवतं ाचं े परम भक्त आहेत, असे जाणनू विदेहराजाने त्यानं ा यथायोग्य आसनावर बसविले आणि प्रेमाने त्याचं ी
विधिपर्वू क पजू ा के ली. (२६)

त्यातं ें जाणोनि भगवत्पर । विदेहा आल्हाद थोर ।


त्याचं े पजू से ी अत्यादर । स्वयें सादर पैं झाला ॥ २०४ ॥
ते भगवत्पर असल्याचें जाणनू जनकाला फार आल्हाद वाटला, व त्यानें स्वतः पजू न करण्याची अत्यादरानें तयारी के ली ४.

श्रद्धायक्त
ु चरणक्षालन । धपू दीप समु न चंदन ।
पजू ा मधपु र्क विधान । के लें सपं र्णू यथायोग्य ॥ २०५ ॥
परमश्रद्धेनें त्यानें त्यांचे पाय धतु ले; व धपू , दीप, गंध, पष्ु पें वगैरे सर्व साहित्यासह मधपु र्क विधानानें त्यांची यथासांग पजू ा के ली ५.
तान् रोचमानान् स्वरुचा ब्रह्मपत्रु ोपमान्नव ।
पप्रच्छ परमप्रीतः प्रश्रयावनतो नृपः ॥ २७ ॥
श्लोक २७- ते नऊही योगेश्वर आपल्या अंगकांतीने सनकादिकांसारखे तळपत होते राजाने विनम्रतेने मस्तक लववनू अतिशय प्रेमाने
त्यांना प्रश्न के ला. (२७)

निजागं ींच्या निजप्रभा । अगं ासी आणिली शोभा ।


काय ब्रह्मविद्येचा गाभा । शोभे नवप्रभा शोभायमान ॥ २०६ ॥
निजांगींच्या स्वयंभू तेजानेंच त्यांच्या शरीराला शोभा आलेली होती. त्यांचा देह म्हणजे विलक्षण तेजानें शोभायमान असा
ब्रह्मविद्येचा गाभाच होता ६.

निजहृदयींचें ब्रह्मज्ञान । परिपाकें प्रकाशलें पर्णू ।


तेंचि निजांगा मंडण । इतर भषू ण त्यां नाहीं ॥ २०७ ॥
त्याच्ं या हृदयातं ील ब्रह्मज्ञानच परिपक्व होऊन प्रकाशमान झालेले होते व तेच त्याच्ं या आगं ाला भषू वीत होते . इतर भषू णे त्यानं ा
नव्हतीं ७.

मगु टु कंु डलें कंकण । मर्खा


ू ‍अंगीं बाणलीं पर्णू ।
ते शोभा लोपनि ू मर्ख
ू पण । बाहेर सपं र्णू प्रकाशे ॥ २०८ ॥
मगु टु , कंु डलें, सलकडीं, ही मर्खां
ू च्या अंगावर हवीं तितकी असली तरी, त्या अलंकारांची सारी शोभा लोपनू त्याच्या अंगचा संपर्णू
मर्ख
ू पणाच मात्र बाहेर प्रकट होतो ८.

तैसे नव्हती हे ज्ञानघन । ब्रह्मपर्णू त्वें विराजमान ।


तेंचि त्यांसी निजांगा मंडण । इतर भषू ण त्यां नाहीं ॥ २०९ ॥
हे ज्ञानघन तसे नव्हते. पर्णू ब्रह्मत्वानेंच ते शोभत होते. तेच त्यांच्या शरीराचे भषू ण होते. इतर भषू ण त्यांना नव्हते ९.

ब्रह्मानभु वें पर्णू त्व पर्णू । इद्रि


ं यद्वारा विराजमान ।
तें त्यांसी निजशांतिभषू ण । मगु टु कंकण तें तच्ु छ ॥ २१० ॥
ते ब्रह्मानभु वानें पर्णू असनू तो अनभु व इद्रि ं यांच्या द्वारें ही बाहेर पडत होता. पर्णा
ू नभु वामळ
ु ें आलेली शांति हेच त्यांचे भषू ण होते.
त्यापढु े मगु टु व कंकणे ही तच्ु छ होत २१०.

मागां वाखाणिले सनकादिक । त्यांसमान कीं अधिक ।


ऐसा विचारितां परिपाक । त्यां यां वेगळिक दिसेना ॥ २११ ॥
पर्वी
ू सनकादिकाचं े वर्णन के लें आहें, त्याच्ं याच बरोबरीचे हे होतें, की अधिक होते ? असे विचाराल, तर त्याच्ं यामध्यें आणि
ह्यांच्यामध्यें मळ
ु ीच भेद नाहीं असे समजावें ११.
त्याचं ी यांची एक गती । त्यांची यांची एक स्थिती ।
त्याचं ी याचं ी एक शातं ी । भेदु निश्चितीं असेना ॥ २१२ ॥
त्यांची ह्यांची गति एक; त्यांची ह्यांची स्थिति एक ; व त्यांची ह्यांची शांतिही एकच ; खरोखर भेद म्हणनू काहींच नाहीं १२.

त्याच्ं या‍ऐसे हे सखे बंधु । त्यांच्या‍ऐसा समान बोधु ।


त्याच्ं या‍ऐसा हा अनवु ादु । सर्वथा भेदु असेना ॥ २१३ ॥
त्यांच्यासारखेच हेही सखे बंधु होते; त्यांच्यासारखाच बोध ह्यांचाही होता; सर्व चाल, रीत, वागणक
ू त्यांच्यासारखीच ; भेद म्हणनू
कांहींच नाहीं १३.

ते चौघे हे नवजण । अवघ्यां एकचि ब्रह्मज्ञान ।


त्यांची यांची शांती समान । हें विदेहासी पर्णू कळंू सरले ॥ २१४ ॥
ते चौघे व हे नऊ असामी, पण सर्वांचे ब्रह्मज्ञान सारखेंच ; त्यांची आणि ह्यांची शांति अगदी सारखी; हे जनक राजाला पर्णू पणे कळून
चक ु ले १४.

ऐसें परिपर्णू त्व जाणोनी । राजा सख


ु ावे स्थिति देखोनी ।
मग अतिविनीत हो‍ऊनी । मृदु मजं ळ ु वचनीं विनवीत ॥ २१५ ॥
अशी त्याचं ी ती परिपर्णू स्थिति पाहून राजाला फार सतं ोष झाला व नतं र त्यानें अत्यतं नम्र होऊन मृदु -मजं ळ
ु वाणीनें त्यासं विनतं ी
के ली १५.

श्रीविदेह उवाच -
मन्ये भगवतः साक्षात् पार्षदान् वो मधद्वि
ु षः ।
विष्णोर्भूतानि लोकानां पावनाय चरन्ति हि ॥ २८ ॥
श्लोक २८- विदेहराजा म्हणाला - मी तर असे समजतो की, आपण सर्वजण मधसु दू न भगवंतांचे पार्षदच आहात कारण भगवंतांचे
भक्त लोकानं ा पवित्र करण्यासाठी सर्वत्र फिरत असतात. (२८)

सार्वभौम चक्रवर्ती । देहीं असोनि विदेहस्थिती ।


तो जनकु आर्षभांप्रती । अतिप्रीतीं विनवितु ॥ २१६ ॥
सार्वभौम चक्रवर्ती व देहातं असनू विदेह स्थिति, असा जो जनक राजा, तो त्या ऋषभपत्रु ानं ा अतिप्रेमानें विनतं ी करिता झाला १६.

त्याच्ं या भेटीसवें उलथलें सख ु । विदेहासी देहवें ीण हरिख ।


तेणें हरिखेंकरूनियां देख । प्रीतीपर्वू क विनवितु ॥ २१७ ॥
त्याच्ं या भेटीबरोबर जनकाला आनदं उचबं ळून आला. त्या विदेहाला देहावाचं नू सतं ोष झाला, व त्या सख
ु सतं ोषाच्या भरातं त्यानें
त्यांस प्रेमपर्वू क विनंती के ली १७.
तमु चें सामर्थ्य पाहतां येथ । तम्ु हीं ईश्वररूप समस्त ।
देहभावें तरी भगवद‌भ् क्त । जैसे पार्षद हरीचे ॥ २१८ ॥
तो म्हणाला- येथे तमु चे सामर्थ्य पाहिले तर, तम्ु ही सारे ईश्वररूपच आहांत. देहभावानें पाहिले तर भगवंताचे भक्त आहांत, जणू
श्रीहरीचे पार्षद (प्रभावळींतील सेवक.) १८.

देवो आपलु ा आपण भक्तु । ऐसा जो कां उपनिषदर्थु ।


तो साच करूनि वेदार्थु । निजपरमार्थु अनभु वा ॥ २१९ ॥
देव हा आपलाच आपण भक्त आहे असा जो उपनिषदांतील ध्वनितार्थ, तो तमु च्या ठिकाणी खरे पणानें अनभु वास येत आहे १९.

'शिव हो‍ऊनि शिवु यजिजे' । हें लक्षण तम्ु हासं ीच साजे ।


येरीं हे बोलचि बोलिजे । परी बोलते वोजें अर्थ न लभे ॥ २२० ॥
'शिव होऊनच शिवाची पजू ा करावी' ('शिवो भत्ू वा शिवं यजेत'् ) हे उपनिषदरहस्यलक्षण तमु च्याच ठिकाणीं शोभत आहे. इतरांनी
ह्या गोष्टी तोंडानें बोलाव्यात मात्र. परंतु त्या बोलण्यात अर्थ दिसनू येत नाहीं २२०.

विष्णनु ें सृष्टीं जें जें स्रजणें । तें तें तम्ु हीं पवित्र करणे ।
मही विचरायाचीं कारणें । कृ पाळूपणे दीनोद्धारा ॥ २२१ ॥
श्रीविष्णु सृष्टीमध्यें जें जें म्हणनू उत्पन्न करतो, तें तें पवित्र करण्यासाठी, के वळ दीन जनाचं ा उद्धार करावा म्हणनू च कृ पाळूपणानें
तम्ु ही पृथ्वीवर संचार करीत असतां २१.

तम्ु ही विचरा विश्वकणवा । परी भेटी होय प्राप्ति तेव्हां ।


आजि लाधलों तमु ची सेवा । उद‌भ् ट दैवाथिलों मी ॥ २२२ ॥
तम्ु ही जगाच्या कल्याणासाठींच फिरत असतां, परंतु भाग्य उदयाला येते तेव्हांच तमु ची भेट होते . आज तमु ची सेवा मला लाभली
त्या अर्थी खरोखरच मी मोठा भाग्यवान होय २२.

आजि माझें धन्य दैव । आजि माझे धन्य वैभव ।


आजि धन्य मी सर्वी ं सर्व । हें चरण अपर्वू पावलों ॥ २२३ ॥
धन्य माझे भाग्य व धन्य माझें वैभव. आज आपल्या अपर्वू चरणांचा लाभ झाल्यानें मी सर्वतोपरी धन्यच झालो आहे २३.

दर्ल
ु भो मानषु ो देहो देहिनां क्षणभङ्गरु ः ।
तत्रापि दर्ल
ु भं मन्ये वैकुण्ठप्रियदर्शनम् ॥ २९ ॥
श्लोक २९- जीवांना मनष्ु यशरीर प्राप्त होणे, हे अतिशय कठीण शिवाय ते क्षणभंगरु अशा या देहात भगवंतांच्या भक्तजनांचे दर्शन
आणखीच दर्ल ु भ आहे. (२९)
सकल देहांमाजीं पहा हो । अतिदर्ल ु भ मनष्ु यदेहो ।
त्याचिया प्राप्तीचा सभं वो । तो अभिप्रावो अतिदर्गु म ॥ २२४ ॥
अहो ! सर्व देहांमध्यें नरदेह हा अत्यंत दर्ल
ु भ आहे. तो प्राप्त होणे म्हणजे महत्कर्म कठीण ! २४.

सक ु ृ तदष्ु कृ त समान समीं । तैं पाविजे कर्मभमू ी ।


तेंचि जैं पडे विषमीं । तैं स्वर्गगामी कां नरकीं ॥ २२५ ॥
पण्ु य आणि पाप समसमान व्हावें तेव्हांच ही कर्मभमि ू म्हणजे नरदेह प्राप्त होत असतो. पण्ु य-पापांत कांहीं कमीजास्त झाले, तर
स्वर्गास जातो किंवा नरकांत पडतो २५.

समानकर्मी ं नरदेह जोडे । तरी समस्तां समबद्धि ु न घडे ।


त्यां समांमाजीं विषम गाढें । जेणें पडे तें ऐका ॥ २२६ ॥
कर्म समान झाले म्हणजे नरदेह प्राप्त होतो; तरी सर्वांची बद्धि
ु कांहीं सारखी असत नाही. त्या साम्यामध्यें जेणक
े रून गाढ असें वैषम्य
पडतें तें सागं तों ऐक २६.

पापाचा एकु महाचिरा । पण्ु यें जोखणीं चाराचरु ा ।


समान आलिया तळ ु ाभारा । येणें जन्में नरा दृढ पापबद्ध
ु ी ॥ २२७ ॥
पापाचा एक भला मोठा चिरा घेऊन तो एका बाजल ू ा घातला, आणि त्याच्या बरोबरीला पण्ु याचा चाराचरु ा घालनू जोखंू लागलें;
आणि ती दोन्ही तोलामध्यें सारखीं भरलीं, तर त्या जन्मीं तशा मनष्ु याला नेहमीं पापबद्धि
ु च होत असते २७.

वाळू आणि सवु र्ण । जोखितां झाल्याही समान ।


सोनियालागीं वेंचिती धन । वाळू ते जाण न घेती फुकट ॥ २२८ ॥
ज्याप्रमाणें वाळू आणि सोनें जोखतांना सारखें भरले, तरी त्या सोन्याकरितां द्रव्य खर्च करतात, पण वाळू कोणी फुकटसद्ध
ु ा घेत नाहीं
२८,

एकाचें पण्ु य अत्यतं थोर । पाप लहानसहान एकत्र ।


करूनि जोखितां तळ ु ाभार । समान साचार जैं होय ॥ २२९ ॥
त्याचप्रमाणें एकाचे पण्ु यच फार मोठे असते, आणि लहान लहान पापें एकत्र करून ती त्याच्या तल
ु नेला घातलेली असतात. आणि
ती बरोबर होतात २९.

ऐसेनि कर्में जे जन्मती । त्यांसी पण्ु यावरी अतिप्रीती ।


पण्ु य पाप दोनी झडती । तैं नित्यमक्ति ु पाविजे ॥ २३० ॥
अशा कर्मानें जे जन्मास येतात, त्याचं ी पण्ु यावरच फार प्रीति असते. पण्ु य आणि पाप ही दोन्ही जेव्हां साफ नाहींशी होतात, तेव्हाचं
नित्यमक्ति
ु मिळत असते २३०.
ऐशा अतिसक्ष्ू म संकटीं । मनष्ु यदेहीं होय भेटी ।
तेथेंही अभिमान अति उठी । धन दारा दिठी विषयाच्ं या ॥ २३१ ॥
अशा मोठ्या सक ं टानें मनष्ु यदेहाची भेट होत असते. पण तेथे कनक-कांतारूप विषयाचा अतिशय अभिमान उत्पन्न होतो ३१.

मनष्ु यदेहींचेनि आयष्ु यें । विषयीं सायास करिती कै से ।


अमृत दे‍ऊनि घे जैसें । तान्हें सावकाशें मृगजळ ॥ २३२ ॥
तहानेसाठीं ज्याप्रमाणें अमृत देऊन मृगजळ घ्यावे, त्याप्रमाणें मनष्ु यदेहाच्या अमोल आयष्ु यामध्यें विषयासाठीं यातायात करीत
असतात ! ३२.

गधं र्वनगरींचीं ठाणीं । घेतलीं दे‍ऊनि चितं ामणी ।


तैशी लटिकियालागीं आटणी । विषयसाधनीं नरदेहा ॥ २३३ ॥
चिंतामणि देऊन गंधर्वनगर म्हणजे आकाशांतील ढगांच्या आकृ ति घ्याव्यात, त्याप्रमाणें लटक्या अशा विषयसाधनासाठीं नरदेहाचे
मातेरे करून घेतात ३३.

तोडूनि कल्पतरूंचे उद्यान । सायासीं तें वाहोनि रान ।


तेथें साक्षेपें पेरिली जाण । आणनि
ू आपण विजया जैशीं ॥ २३४ ॥
तैसें नरदेहा ये‍ऊनि नरां । करिती आयष्ु याचा मातेरा ।
पर्णू व्यवसायो शिश्नोदरां । उपहास निद्रा कां निंदा ॥ २३५ ॥
कल्पतरूची बाग तोडून टाकावीं व तें रान म्हणनू दरू फें कून द्यावे, आणि त्या जागी जशी मोठ्या अगत्यानें भांग आणनू लावावी;
त्याप्रमाणें जीव नरदेहाला येऊन आयष्ु याचे मातेरे करून सोडतात. शिश्नोदरासाठी सारा दिवस उद्योग; नाहीं तर उपहास, टवाळकी,
निंदा किंवा झोंप ! ३४-३५.

नित्य प्रपंचाची कटकट । सदा विषयांची खटपट ।


कदा आरायिल्या चोखट । स्वेच्छा सारीपाट खेळणें ॥ २३६ ॥
दररोज प्रपंचाची कटकट; विषयांची खटपट; तशांत वेळ मिळालाच तर यथेच्छ सोंगट्यांचा डाव खेळावयाचा ! ३६.

नाना विनोद टवाळी । नित्य विषयांची वाचाळी ।


त्यासी जपतां रामनामावळी । पडे दातं खिळी असभं ाव्य ॥ २३७ ॥
तर्‍हते र्‍हच्े या थट्टामस्क‍र्‍या; विषयांचीच नेहमी बडबड; अशांना रामनामावळी जपावयाची म्हटले की, दांतखिळी बसलीच ! ३७.

घरा आली कामधेनु । दवडिती न पोसवे म्हणनू ु ।


तेवीं श्रीरामनाम नच्ु चारूनु । नाडला जनु नरदेहीं ॥ २३८ ॥
कामधेनु घरी आली असतां पोसवत नाहीं म्हणनू तिला हाक
ं ू न द्यावी, त्याप्रमाणें श्रीरामनामाचा जप न के ल्यामळ
ु ें जीव नरदेहातं येऊन
फुकट गेले ! ३८.

करितां नरदेहीं अहक ं ार । तंव तो देहचि क्षणभंगरु ।


देहीं देहवंता भाग्य थोर । जैं भगवत्पर भेटती ॥ २३९ ॥
ह्या नरदेहाचा अहक ं ार धरून रहावें, तर तो मळू चाच क्षणभंगरु ; येथे भगवंताशी एकरूप झालेले भक्त भेटणें हेंच मोठे भाग्य होय ३९.

ज्यासं ी भगवद‌भ् क्तीची अति गोडी । त्यांवरी भगवंताची आवडी ।


त्यांची भेटी तैं होय रोकडी । जैं पण्ु याच्या कोडी तिष्ठती ॥ २४० ॥
ज्यांना भगवद‌भ् क्तीची अत्यंत गोडी असतें, त्यांच्यावर भगवंताचेही अत्यंत प्रेम असते. तशा भगवद‌भ् क्तांची प्रत्यक्ष भेट तेव्हांच होते
की, जेव्हां कोटि पण्ु यें उभी राहतात २४०.

ज्याचि
ं या आवडीच्या लोभा । भगवंतु पालटें आला गर्भा ।
दशावताराचं ी शोभा जाहली । पद्मनाभा ज्याचं ेनि ॥ २४१ ॥
ज्याच्या प्रेमाच्या लोभामळ ु े च भगवंत आपले निजनिर्गुणरूप पालटून जन्म घेता झाला, ज्यांच्या लोभामळ
ु े च त्या पद्मनाभाला
दशावताराचं ी शोभा प्राप्त झाली ४१,

ऐसे कृ ष्णकृ पासमारंभे । जे भगवतं ाचे वालभे ।


त्यांची भेटी तैंचि लाभे । जैं भाग्यें सल
ु भें पैं होती ॥ २४२ ॥
असे जे कृ ष्णकृ पाबळानेंच त्याचे अत्यंत आवडते झाले, तशांची भेट, भाग्य उदयाला येतात तेव्हांच होत असते ४२.

निष्कामता निजदृष्टी । अनन्त पण्ु यकोट्यनक


ु ोटी ।
रोकड्या लाभती पाठोवाठीं । तैं होय भेटी हरिप्रियांची ॥ २४३ ॥
अंगामध्यें निरिच्छता, आत्मस्वरूपामध्यें दृष्टि, व कोट्यनक
ु ोटी पण्ु यें लागोपाठ उभी राहतात, तेव्हांच हरिप्रियांची भेट होते ४३.

व्याघ्रसिहं ाचं े दधू जोडे । चद्रं ामृतही हाता चढे ।


परी हरिप्रियांची भेटी नातडु े । दर्ल ु भ भाग्य गाढें मनष्ु यां ॥ २४४ ॥
वाघाचे व सिंहाचेही दधू मिळे ल, चंद्रामृतही हातीं येईल, पण हरिप्रियांची भेट मात्र होणार नाहीं. त्याला मोठे दर्ल
ु भ भाग्यच लागतें
४४.

व्याघ्रसिंहदधु ासाठी । अतिसबळता जोडे पष्टु ी ।


परी जन्ममरणांची तटु ी । दधु ासाठीं कदा नव्हे ॥ २४५ ॥
वाघाच्या अणि सिहं ाच्या दधु ानें मनष्ु य अतिशय प्रबळ व पष्टु होईल, पण त्या दधु ापासनू काही जन्ममरण चक
ु णार नाहीं ४५.
म्हणती चंद्रामृत जो आरोगी । तो होय नित्य निरोगी ।
मख्ु य चद्रं चि क्षयरोगी । त्याचें अमृत निरोगी करी के वीं ॥ २४६ ॥
चंद्रामृत जो पितो, तो नित्य निरोगी होतो असे म्हणतात, पण चंद्र हाच मळ
ू चा क्षयरोगी आहे, त्याचे अमृत दसु र्‍याला निरोगी कसे
करणार ? ४६.

व्याघ्रसिहं दग्ु धाचे शक्तीं । प्राणी जैं अजरामर होती ।


तैं तेणें दग्ु धें जयांची उत्पत्ती । ते कां मरती व्याघ्रसिंह ॥ २४७ ॥
वाघाच्या आणि सिंहाच्या दधु ानें प्राणी जर अजरामर झाले असतें , त्याच दधु ापासनू ज्यांची उत्पत्ति ते वाघ आणि सिंह कां मरते ?
४७.

जैं हरिभक्तांची भेटी घडे । तैं न बाधी संसारसांकडें ।


जन्ममरण समळ ू ीं उडे । त्यांची भेटी आतडु े अतिभाग्यें ॥ २४८ ॥
पण हरिभक्ताचं ी भेट जेव्हां होते, तेव्हां ससं ाराचे सक
ं ट बाधत नाही. जन्ममरण समळ
ू नाहीसे होते. तात्पर्य, त्याचं ी भेट होण्याला
अत्यंत भाग्य पाहिजे. ४८.

आजि मी भाग्यें सभाग्य पर्णू । लाधलों तमु चें दर्शन ।


तरी "आत्यति
ं क क्षेम" कोण । तें कृ पा करून मज सागं ा ॥ २४९ ॥
आज ते सर्व भाग्य माझ्या वाट्यास आले आहे. कारण मला तमु चे दर्शन घडले. तरी 'आत्यंतिक क्षेम' म्हणजे काय ते मला कृ पा
करून सांगावें ४९.

अत आत्यन्तिकं क्षेमं पृच्छामो भवतोऽनघाः ।


संसारे ऽस्मिन्क्षणार्धोऽपि सत्सङ्गः शेवधिर्नृणाम् ॥ ३० ॥
श्लोक ३०- म्हणनू हे त्रिलोकपावन महात्म्यांनो ! आम्ही आपणास आमच्या परम कल्याणासंबंधी विचारीत आहोत कारण या
जगात अर्धा क्षण झालेला सत्सगं सद्ध ु ा मनष्ु याचा फार मोठा ठे वा आहे. (३०)

म्हणों तम्ु ही निष्पाप निर्मळ । तंव तमु चेनि दर्शनें तत्काळ ।


नासती सकळ कलिमळ । ऐसे निजनिर्मळ तम्ु ही सर्व ॥ २५० ॥
तम्ु हाल
ं ा निष्पाप व निर्मळ म्हणावें, तर तमु च्या दर्शनानें सर्व कलिमळ तत्काळ नाश पावतात. असे तम्ु ही सर्व जात्याच अत्यतं पवित्र
व पावन आहां २५०.

स्नान के लिया गंगा । पवित्र करी सकळ जगा ।


ते गगं ाही निजपापभगं ा । तमु चे चरणसगं ा वाछ
ं ीत ॥ २५१ ॥
स्नान के ले कीं, गगं ा सर्व जगाला पवित्र करून सोडते, पण ती गगं ाही स्वतःचें पातक नष्ट होण्यासाठी तमु च्या चरणसगं ाची इच्छा
करते ५१.

तमु ची दर्शनसंग-चिद‌ग् ंगा । अत्यंत दाटुगी माजीं जगा ।


दर्शनमात्रें ने भव भंगा । जन्ममरण पैं गा मग कैं चे ॥ २५२ ॥
तमु च्या दर्शनाचा लाभ, हीच चित्स्वरूप गंगा होय. ती जगामध्यें अत्यंत समर्थ आहे. के वळ दर्शनानेंच भव म्हणजे संसार नाहींसा
करून टाकते. मग जन्ममरण कुठलें ? ५२.

तेथें कायसा गंगेचा पडिपाडु । नाहीं तीर्थमहिमेसी पवाडु ।


तीर्थां भवदोष अवघडु । त्यांचा करी निवाडु दृष्टिसंगें ॥ २५३ ॥
ह्या तमु च्या दर्शनापढु े गंगेचा काय पाड ? तीर्थाच्या महिम्याची त्याच्यापढु े प्रतिष्ठा नाहीं. तीर्थाच्यानें संसार दरू करणे अशक्य आहे.
त्याचा नाश तमु च्या दृष्टिसगं ानेंच होतो ५३,

ऐशी पवित्रता प्रबळ । दृष्टि‍उत्सगं ी वाढवा सकळ ।


आजि झालों मी अतिनिर्मळ । तम्ु हीं दीनदयाळ मीनलेति ॥ २५४ ॥
अशी अत्यतं पवित्रता आपण आपल्या कृ पादृष्टीनेंच वाढविता. मी तर आज अत्यतं पवित्र झालो. कारण, तम्ु ही दीनदयाळ मला
भेटलांत ५४.

ऐसे पवित्र आणि कृ पामर्ति


ू । भाग्यें लाधलो हे संगती ।
सत्संगाची निजख्याती । सांगता श्रति
ु मौनावल्या ॥ २५५ ॥
अशा पवित्र आणि कृ पामर्ती ू ची संगति मला आज भाग्यानेंच प्राप्त झाली आहे. सत्संगतीचें माहात्म्य वर्णन करतांना श्रति
ु सद्ध
ु ां
मौनावतात ५५.

ब्रह्म निर्धर्म नेणे निजधर्मा । साधमु ख


ु ें ब्रह्मत्व ये ब्रह्मा ।
त्या सत्सगं ाचा महिमा । अतिगरिमा निरुपम ॥ २५६ ॥
ब्रह्म हें स्वतः निर्धर्म आहे, त्याला आपला धर्म काय आहे तें कळत नाहीं, साधंच्ू या मख
ु ानेंच ब्रह्माला ब्रह्मत्व येते. त्या सत्संगतीचा
महिमा फारच थोर व निरुपम होय ५६.

सत्सगं म्हणों निधीसमान । निधि जोडल्या हारपे जाण ।


सत्संगाचें महिमान । साधकां संपर्णू सद‌रू
् प करी ॥ २५७ ॥
सत्संगाला द्रव्याच्या ठे व्यासमान म्हटले, तर ठे वा सांपडलेला हरवतो, पण सत्संगाचा महिमा असा आहे की, तो साधकांना
नखशिखान्त सद‌रू ् पच करून सोडतो ५७.
निधि सापं डलिया साङ्ग । अत्यतं वाढे विषयभोग ।
तैसा नव्हे जी सत्संग । निर्विषयें चांग सख ु दाता ॥ २५८ ॥
चांगलासा ठे वा सांपडला, तर त्यामळ ु ें विषयभोग वाढतो. पण महाराज ! सत्संग मात्र तसा नव्हे. तो निर्विषय-निरतिशय सख
ु देणारा
आहे ५८.

इद्रि
ं यांवीण स्वानंदु । विषयांवीण परमानंदु ।
ऐसा करिती निजबोधु । अगाध साधनि ु जमहिमा ॥ २५९ ॥
इद्रि
ं याशि
ं वाय स्वानदं आणि विषयाशिवाय परमानदं प्राप्त होईल, असाच ते बोध करतात. म्हणनू साधचंू ा महिमा अगाध आहे ५९.

निमिषार्ध होता सत्संग । तेणें संगें होय भवभंग ।


यालागीं सत्संगाचें भाग्य । साधक सभाग्य जाणती ॥ २६० ॥
सत्सगं अर्धनिमिष जरी झाला, तरी त्यायोगें ससं ाराचा भगं होऊन जातो. ह्याकरितां सत्सगं तीचे भाग्य, भाग्यवान् साधक आहेत तेच
जाणतात २६०.

संतचरणीं ज्यांचा भावो । भावें तष्टु ती संत स्वयमेवो ।


सतं सन्निधिमात्रें पहावो । ससं ार वावो स्वयें होय ॥ २६१ ॥
संतचरणांच्या ठिकाणीं ज्यांचा भाव आहे, त्यांच्यावर त्या भावामळ
ु ें च संत आपणहून संतष्टु होतात. अहो ! संतांच्या के वळ
सान्निध्यानेंच संसार आपोआप वायफळ होऊन जातो ६१.

नाना विकार विषयविधी । संसारु सबळत्वें बाधी ।


त्या संसाराची अवधी । जाण त्रिशद्ध
ु ी सत्संग ॥ २६२ ॥
नानाप्रकारचे विकार, विषयांचा पसारा, इत्यादिकांच्या योगें संसार हा तीव्रत्वानें बाधतो. त्या संसाराचा नाश करावयाला सत्संग हाच
एक रामबाण उपाय आहे ६२.

दीपाचिये सगं प्राप्ती । निःशेष कापरु त्वाची शातं ी ।


तेवीं झालिया सत्संगती । संसारनिवृत्ति क्षणार्धें ॥ २६३ ॥
दीपाची सगं त प्राप्त झाली की कापरु ाचें कापरु पणच नाहीसें होतें ; त्याप्रमाणें सत्सगं ति प्राप्त झाली असतां एका क्षणार्धामध्यें ससं ाराची
म्हणजे जन्ममरणपरंपरे ची, व देहात्मबद्ध ु ीची निवृत्ति होतें ६३.

ते तमु ची सत्संगती । भाग्यें पावलों अवचितीं ।


"आत्यंतिक क्षेम" कै शा रितीं । प्राणी पावती तें सांगा ॥ २६४ ॥
ती तमु ची संगति आज सदु वै ानें मला अकस्मात् मिळाली आहे, तर आतां प्राणी 'आत्यंतिक क्षेम' म्हणजे शाश्वत कल्याण कशानें
पावतील ते सांगावें ६४.
आत्यतिं क क्षेमाचें वर्णन । जरी म्हणाल भागवतधर्म ।
त्या धर्माचा अनक्र
ु म । साङ्ग सगु म सांगा जी ॥ २६५ ॥
भागवतधर्मच आत्यंतिक क्षेमाचें वर्म आहे असे आपण म्हणाल, तर महाराज ! त्या धर्माचा अनक्र
ु म सगु म करून मला सांगावा ६५.

धर्मान्भागवतान्ब्रतू यदि नः श्रतु ये क्षमम् ।


यैः प्रसन्नः प्रपन्नाय दास्यत्यात्मानमप्यजः ॥ ३१ ॥
श्लोक ३१- आम्ही ऐकण्याचे अधिकारी असलो, तर आपण आम्हांला भागवतधर्माचा उपदेश करावा कारण त्यामळ
ु े प्रसन्न झाले
असता भगवान शरणागत भक्तानं ा स्वतःलासद्ध ु ा देऊन टाकतात. (३१)

परिसावया भागवतधर्मी ं । श्रवणाधिकारी असों जरी आम्ही ।


तरी कृ पा करूनि तम्ु हीं । सांगावे स्वामी सकळ धर्म ॥ २६६ ॥
भागवतधर्म ऐकण्याइतका जर आमचा अधिकार असेल, तर महाराज ! आपण आम्हाल
ं ा ते सर्व भागवतधर्म सागं ावे ६६.

नवल या धर्मांची ख्याती । सप्रेम आदरितां प्रिती ।


तेणें तष्टु ोनियां श्रीपती । दे सेवकां हातीं आपणिया ॥ २६७ ॥
ह्या भागवतधर्माची ख्याति काही विलक्षण आहे. हे जर प्रेमानें स्वीकारले, तर तेणेम्करून श्रीपति सतं ष्टु होऊन आपण सेवकाच्ं या
स्वाधीन होतो ६७.

"अजन्मा" या नामाची ख्याती । वेदशास्त्रीं मिरवी श्रीपती ।


तो भागवतधर्माचिया प्रीती । सोशी जन्मपंक्ती भक्तांचिया ॥ २६८ ॥
आपण 'अजन्मा' अशी ख्याति श्रीकृ ष्ण वेदशास्त्रांमध्यें मिरवितात; पण तोच भगवंत भागवतधर्माच्या प्रेमाकरितां भक्तांचे अनेक जन्म
सोसतो ! ६८.

एवं भागवतधर्मी जाण । जो कोणी अनन्य शरण ।


त्यासी तष्टु ोनियां नारायण । निजात्मता पर्णू स्वयें देतु ॥ २६९ ॥
अशा ह्या भागवतधर्माला जो कोणी अनन्यभावानें शरण जातो, त्याला नारायण प्रसन्न होऊन आपले सर्वस्व अर्पण करतो ६९.

जी भागवतधर्मश्रवणार्थ । मज अधिकारु जरी नसेल येथ ।


तरी मी अनन्य शरणागत । आणि तम्ु ही समस्त कृ पाळू ॥ २७० ॥
आतां, भागवतधर्म श्रवण करण्याइतका जर माझा अधिकार नसेल, तर खरोखर मी तम्ु हांला अनन्य भावानें शरण आलो आहे आणि
तम्ु ही सर्वजण कृ पाळू आहां २७०.

भतू दयेचें निडारलेपण । तमु च्या ठायीं वोसडं े पर्णू ।


तम्ु ही दयानिधि संपर्णू । दीनोद्धरण तमु चेनी ॥ २७१ ॥
आपल्या ठिकाणी भतू दया तर परिपक्क होऊन राहिलेली आहे, तम्ु ही दयेचे सागर आहा;ं तमु च्या योगानें दीनाचं ा उद्धार होतो ७१..

जेथ तमु ची कृ पा पर्णू । तेथ न राहे जन्ममरण ।


सर्वाधिकार संपर्णू । सहज आपण वोळंगे ॥ २७२ ॥
जेथे तमु ची पर्णू कृ पा असते, तेथे जन्ममरण नांवालासद्ध
ु ां उरत नाहीं; सर्व प्रकारचे अधिकार सहजच प्राप्त होतात, ७२.

तवं तमु चे कृ पेपरतें । आन सामर्थ्य नाहीं येथें ।


ऐसें जाणोनियां निश्चितें । शरण तम्ु हांतें मी आलों ॥ २७३ ॥
अर्थात् तमु च्या कृ पेपरतें दसु रे सामर्थ्यच नाही. असें निश्चयानें जाणनू मी तम्ु हांला शरण आलो आहे ७३.

कायसी ज्ञातेपणाची लाज । येथें तमु चे कृ पें माझें काज ।


ऐसें विदेहें प्रार्थूनि द्विज । चरणरज वंदिलें ॥ २७४ ॥
ज्ञातेपणाची लाज काय कामाची ? कारण येथें तमु च्या कृ पेनेंच माझें कार्य होणार आहे. अशी जनकराजानें प्रार्थना करून त्या
ब्राह्मणाचं े चरणरज मस्तकीं धरलें ७४.

ऐकोनि विदेहाचा नम्र प्रश्न । संतोषले नवही जण ।


तेंचि श्रीमख
ु ें नारद आपण । करी निरूपण वसदु वे ा ॥ २७५ ॥
जनकराजाचा हा नम्र प्रश्न ऐकून ते नऊ असामीही सतं ष्टु झाले. तीच गोष्ट नारद स्वमख
ु ानें वसदु वे ाला निरूपण करीत आहे. ७५

श्रीनारद उवाच -
एवं ते निमिना पृष्टा वसदु वे महत्तमाः ।
प्रतिपज्ू याब्रवु न्प्रीत्या ससदस्यर्त्विजं नृपम् ॥ ३२ ॥
श्लोक ३२- नारद म्हणाले हे वसदु वे ा ! निमीने जेव्हा त्या महात्म्यांना हा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी अतिशय प्रेमाने त्या प्रश्नाचा
सन्मान के ला आणि सदस्य व ऋत्विजांच्या बरोबर बसलेल्या राजा निमीला ते म्हणाले - (३२)

जो जगाचि स्थिती गति जाणता । जो हरिहराचं ा पढियतं ा ।


जो निजात्मज्ञानें परु ता । तो झाला बोलता नारद ु ॥ २७६ ॥
जो जगाची स्थिति व गति जाणणारा, जो हरिहरांचा लाडका, जो निजात्मज्ञानानें परिपर्णू , तो नारद वसदु वे ास म्हणाला ७६,

नारद म्हणे वसदु वे ा । विदेहें प्रश्न के ला बरवा ।


तेणें परमानंदु तेव्हां । त्या महानभु ावां उलथला ॥ २७७ ॥
वसदु वे ा ! जनकराजानें ह्याप्रमाणें मार्मिक प्रश्न के ला असता त्या महानभु ावांना अत्यंत संतोष झाला ७७.
सतं ोषोनि नवही मर्ती
ू । धन्य धन्य विदेहा म्हणती ।
ऋत्विजही सादर परमार्थी ं । सदस्य श्रवणार्थी ं अतितत्पर ॥ २७८ ॥
ते नऊ असामीही संतष्टु होऊन जनकराजाला धन्य धन्य म्हणाले. यज्ञांतील ऋत्विजांना व सभासदांना परमार्थश्रवणासाठी अत्यंत
उत्सकु ता लागनू राहिली ७८.

ऐसें दे‍ऊनि अनमु ोदन । बोलते जाहले नवही जण ।


तेचि कथेचें निजलक्षण । नव प्रश्न विदेहाचे ॥ २७९ ॥
त्यानं ाहीं योग्य अनमु ोदन देऊन त्या नऊ असामींनी बोलण्यास प्रारंभ के ला. जनकाचे नऊ प्रश्न हा ह्या कथेचा प्रधान विषय होय ७९.

भागवतधर्म भगवद‌भ् क्त । माया कै सी असे नांदत ।


तिचा तरणोपाव येथ । के वीं पावत अज्ञानी ॥ २८० ॥
'भागवतधर्म' कसा ? 'भगवद‌भ् क्त' कसे असतात ? 'माया' कशी खेळ करते ? तिच्यातं नू अज्ञ जनाचं ा 'तरणोपाय' कसा होतो ? २८०.

येथ कै चें असे परब्रह्म । कासया नावं म्हणिजे कर्म ।


अवतारचरित्रसंख्या परम । अभक्तां अधमगति कै शी ॥ २८१ ॥
तसेंच 'परब्रह्म' कसे आहे ! 'कर्म' हे नावं कशाला लागते ? 'अवतारचरित्र' सख्ं या किती ? 'अभक्तानं ा अधोगति' कां प्राप्त होते ? ८१.

कोणे यगु ीं कै सा धर्म । सागं ावा जी उत्तमोत्तम ।


ऐसे नव प्रश्न परम । जनक सवर्म पसु ेल ॥ २८२ ॥
व 'कोणत्या यगु ांत कोणता धर्म ?' हे उत्तम प्रकारें निरूपण करावे. असे मोठे मार्मिक नऊ प्रश्न जनकराजानें विचारले ८२.

ऐसे विदेहाचे प्रश्न । अनक्र


ु में नवही जण ।
उत्तर देती आपण । तयांत प्रथम प्रश्न कवि सांगे ॥ २८३ ॥
याप्रमाणें जनकाचे नऊ प्रश्न होते; त्यांची नऊही असामींनी अनक्र
ु मानेंच उत्तरे दिली. त्यांतला पहिला प्रश्न कवि हा सांगू लागला ८३.

श्रीकविरुवाच -
मन्येऽकुतश्चिद् भयमच्यतु स्य
पादाम्बजु ोपासनमत्र नित्यम् ।
उद्विग्नबद्ध
ु ेरसदात्मभावात्
विश्वात्मना यत्र निवर्तते भीः ॥ ३३ ॥
श्लोक ३३- कवी म्हणाला राजन ! भगवंतांच्या चरणांची नित्य उपासनाच या जगात सर्व प्रकारचे भय नाहीसे करणारी आहे, असे
माझे निश्चित मत आहे नश्वर पदार्थांविषयी अहतं ा व ममता उत्पन्न झाल्यामळ
ु े ज्यांचे चित्त उद्विग्न झालेले असते, त्यांना वाटणारी
भीती या उपासनेने संपर्णू पणे नाहीशी होते. (३३)
रायें पशि
ु लें "आत्यन्तिक क्षेम" । तदर्थी ं कवि ज्ञाता परम ।
तो आत्यंतिक क्षेमाचें वर्म । भागवतधर्म प्रतिपादी ॥ २८४ ॥
राजानें 'आत्यंतिक क्षेम' म्हणजे अत्यंत कल्याण कशात आहे असे विचारले. त्या विषयांत कवि परमज्ञाताच होता. त्यानें आत्यंतिक
क्षेमाचे वर्म म्हणजे 'भागवतधर्म' याचे प्रतिपादन करण्यास आरंभ के ला ८४.

ऐक राया नवलपरी । आपल ु ा संकल्प आपणा वैरी ।


देहबद्ध
ु ी वाढवनि
ू शरीरीं अतिदृढ करी भवभया ॥ २८५ ॥
तो म्हणाला, राजा ! एक चमत्कार लक्षात ठे व. आपलाच सक
ं ल्प आपणास वैरी आहे. तोच शरीरामध्यें देहबद्धि
ु (साडेतीन हात देह
तोच 'मी' अशी भावना) वाढवनू संसाराचे भय अधिकाधिक दृढ करीत असतो ८५.

जयापाशीं देहबद्ध ु ी । त्यासी सख


ु नाहीं त्रिशद्ध
ु ी।
ते बडु ाले द्वद्वं सधं ीं । आधिव्याधिमहार्णवीं ॥ २८६ ॥
ज्याच्यापाशी देहबद्धि ु असते, त्याला सख ु म्हणनू नाहींच नाही. असे लोक सख
ु -दःु ख, शीत-उष्ण इत्यादि द्वद्वं ांच्या संधींमध्यें आणि
आधिव्याधींच्या महासागरांत बडु ू न जातात ८६.

जे देहबद्ध
ु ीपाशीं । सकळ दःु खाचि ं या राशी ।
महाभयाचीं भतू ें चौपाशीं । अहर्निशीं झोंबती ॥ २८७ ॥
कारण, देहबद्ध
ु ीपाशी दःु खांच्या राशी ह्या ठे वलेल्या. रात्रदि
ं वस चारीही बाजंनू ी महाभयांची भतू ें त्याला झोंबत असतात ८७.

देहबद्ध
ु ीचिया नरा । थोर चिंतेचा अडदरा ।
संकल्पविकल्पांचा मारा । ममताद्वारा अनिवार ॥ २८८ ॥
'देहच मी' मानणाऱ्या मानवाला चिंतेचे मोठे भय असते. त्याच्यावर ममतेच्या द्वारा संकल्पविकल्पांचा मारा सारखा सरू
ु असतो ८८.

देहबद्ध
ु ीमाजीं सख ु । अणमु ात्र नाहीं देख ।
सखु मानिती ते महामर्ख ू । दःु खजनक देहबद्ध
ु ी ॥ २८९ ॥
देहबद्ध
ु ीमध्यें अणरु े णइू तकें सद्ध
ु ा सख
ु नाही. असे असतांही जे सख
ु मानतात, ते महामर्ख
ू होत. देहबद्धि
ु ही दःु खजनक आहे ८९.

दीपाचे मिळणीपाशीं । के वळ दःु ख पतंगासी ।


तरी आलिगं ंू धावं े त्यासी । तेवीं विषयासं ी देहबद्ध
ु ी ॥ २९० ॥
दिव्याची संगत करणाऱ्या पतंगाला के वळ दःु खच असते, तरी तो त्याला मिठी मारावयाला धांवतो, त्याप्रमाणं देहबद्धि
ु विषयांकडे
धांव घेते २९०.

ऐशी असतं देहबद्ध


ु ी कुडी । वाढवी विषयाचं ी गोडी ।
तेथें महाभयाची जोडी । जन्ममरणकोडी अनिवार ॥ २९१ ॥
याप्रमाणें देहबद्धि
ु मोठी वाईट आहे. ती विषयाचं ी गोडी वाढवितें. त्यामळ
ु ें महाभय उत्पन्न होऊन जन्ममरणाचं े फे रे अनिवार होतात
९१.

एवढा अनिवार संताप । देहबद्ध ु ीपाशीं महापाप ।


जाणोनि धरी जो अनतु ाप । विषयीं अल्प गंतु ेना ॥ २९२ ॥
देहबद्ध
ु ीपाशी इतका अपरिहार्य संताप आहे व देहबद्ध ु ीपाशी मोठे पातक आहे, असें जो जाणतो तो अनतु ाप धरून विषयामध्यें
तिळमात्रही गंतु त नाहीं ९२.

धरितां विषयांची गोडी । भोगाव्या जन्ममरणकोडी ।


येणें भयें विषय वोसंडी । इद्रि
ं यांतें कोंडी अतिनेमें ॥ २९३ ॥
विषयांची गोडी धरली असतां कोट्यवधी जन्ममरणें सोसावीं लागतात, या भयानें तो विषय सोडून देतो आणि अत्यंत नियमानें
इद्रि
ं यातं कोंडून ठे वतो ९३.

इद्रि
ं यें कोंडितां न कोंडती । विषय साडि
ं तां न साडं ती ।
पढु तपढु ती बाधंू येती । यालागी हरिभक्ती द्योतिली वेदें ॥ २९४ ॥
पण इद्रिं यें ही कोंडावयाला गेले तर कोंडून घेत नाहीत. विषय सोडूं म्हटले तर सटु त नाहींत, पन्ु हा पन्ु हा उपद्रव द्यावयाला येतात.
ह्याकरितांच वेदानें हरिभक्ति प्रगट करून ठे विली आहे ९४.

इद्रि
ं यें कोंडावीं न लगती । सहजें राहे विषयासक्ती ।
एवढें सामर्थ्य हरिभक्तीं । जाण निश्चितीं नृपवर्या । २९५ ॥
तिच्यामध्यें इद्रि
ं ये कोंडावी लागत नाहींत व विषयासक्ति आपोआप थांबते. हे राजाधिराजा ! एवढे अद‌भ् तु सामर्थ्य हरिभक्तीमध्यें
आहे हे पक्कें लक्षात ठे व ९५.

योगी इद्रि
ं यें कोंडती । तीं भक्त लाविती भगवद‌भ् क्तीं ।
योगी विषय जे त्यागितीं । ते भक्त अर्पिती भगवतं ीं ॥ २९६ ॥
योगी लोक इद्रि
ं यांना कोंडून ठे वतात; पण भक्त लोक तींच इद्रि
ं ये भगवंताच्या भक्तीकडे लावतात. योगी जे विषय टाकून देतात, तेच
भक्त लोक भगवतं ाला अर्पण करतात ९६.

योगी विषय त्यागिती । त्यागितां देह दःु खी होती ।


भक्त भगवंतीं अर्पिती । तेणें होती नित्यमक्त
ु ॥ २९७ ॥
योगी विषयांचा त्याग करतात, पण त्या त्यागानें देहाला दःु ख होते; आणि भक्त हे तेच विषय भगवंताला अर्पण करीत असल्यामळ
ु ें ते
नित्यमक्त
ु होतात ९७.
हें नव्हे म्हणती विकल्पक । याचिलागीं येथें देख ।
"कायेन वाचा" हा श्लोक । अर्पणद्योतक बोलिजेला ॥ २९८ ॥
कोणी विकल्पी लोक हे शक्य नाहीं असे म्हणतात. ह्याकरिता येथे 'कायेन वाचा' हा कृ ष्णार्पणद्योतक श्लोक सांगितला आहे ९८.

दारा सतु गृह प्राण । करावे भगवंतासी अर्पण ।


हे भागवतधर्म पर्णू । मख्ु यत्वें "भजन" यां नांव ॥ २९९ ॥
घरदार, बायकामल ु ें, आणि प्राणसद्ध
ु ां भगवंताला अर्पण करावे, हाच पर्णू 'भागवतधर्म' आणि ह्याचंच नांव 'मख्ु य भजन' होय ९९.

अकराही इद्रि
ं यवृत्ती । कै शा लावाव्या भगवद‌भ् क्ती ।
ऐक राया तजु प्रती । संक्षेपस्थिती सांगेन ॥ ३०० ॥
आतां अकराही इद्रिं यांच्या वृत्ति भगवतद‌भ् क्तीकडे कशा लावाव्या, ते हे राजा ! तल
ु ा संक्षेपरीतीनें सांगतों ऐक ३००.

'मनें' करावें हरीचें ध्यान । 'श्रवणें' करावें कीर्तिश्रवण ।


'जिव्हेनें' करावे नामस्मरण । हरिकिर्तन अहर्निशी ॥ ३०१ ॥
'मनानें' हरीचें ध्यान करावें, 'कानांनी' त्याची कीर्ति श्रवण करावी, 'जिव्हेनें' नामस्मरण करावे, आणि रात्रदि
ं वस त्याच्या कीर्तनांत मग्न
असावें १.

'करीं' करावे हरिपजू न । 'चरणीं' देवालयगमन ।


'घ्राणी' तल
ु सी आमोदग्रहण । जिंहीं हरिचरण पजि ू ले ॥ ३०२ ॥
'हातांनी' हरीचे पजू न करावे, 'पायांनी' देवालयांत जावें, 'नाकाने' निर्माल्यतळ
ु सींचाच वास घ्यावा २.

नित्य निर्माल्य मिरवे शिरीं । चरणतीर्थें अभ्यतं रीं


हरिप्रसाद ज्याचे उदरीं । त्या देखोनि दरू ी भवभय पळें ॥ ३०३ ॥
जो मस्तकावर नित्य निर्माल्य धारण करतो, आणि पोटांत चरणतीर्थ व हरिप्रसाद सांठवितो, त्याला पाहून संसारभय लांब पळते ३.

वाढतेनि सद‌भ् ावें जाण । चढतेनि प्रेमें पर्णू ।


अखंड ज्यासी श्रीकृ ष्णभजन । त्यासी भवबंधन असेना ॥ ३०४ ॥
वाढत्या सद‌भ् ावानें व चढत्या प्रेमानें ज्याला श्रीकृ ष्णाचें भजन अखंड घडते, त्याला ससं ाराचे बंधन उरत नाहीं ४.

सकल भयांमाजीं थोर । भवभय अतिदर्धु र ।


तेंही हरिभक्तीसमोर । बापडु ें किंकर के वीं राहे ॥ ३०५ ॥
सर्व भयांमध्यें भवभय अति दर्धु र ! तेही बिचारे हरिभक्तीपढु े के वळ पामर होऊन जाते. मग ते समोर उभे कसे राहणार ? ५.
करितां रामकृ ष्णस्मरण । उठोनि पळे जन्ममरण ।
तेथें भवभयाचें तोंड कोण । धैर्यपण धरावया ॥ ३०६ ॥
रामकृ ष्णस्मरण के ले असतां जन्ममरण उठून पळू लागते, तेथें धैर्य धरून पढु े राहण्याला संसारभयाला तोंड कुठचें ? ६.

जेथें हरिचरणभजनप्रीती । तेथें भवभयाची निवृत्ती ।


परम निर्भय भगवद‌भ् क्ती । आमच्ु या मतीं निजनिश्चयो ॥ ३०७ ॥
जेथें हरिचरणभजनाची प्रीति, तेथें संसारभयाची निवृत्ति याप्रमाणें भगवद‌भ् क्ति ही परमनिर्भय होय असा आमच्या बद्ध
ु ीचा निश्चय
आहे ७.

कृ तनिश्चयो आमचु ा जाण । येथें साक्षी वेद-शास्त्र-परु ाण ।


सर्वात्मना भगवद‌भ् जन । निर्भयस्थान सर्वांसी ॥ ३०८ ॥
तंू पक्के पणीं जाण की, हा आमचा कृ तनिश्चय आहे; व याला वेद, शास्त्र, परु ाणें साक्षी आहेत. तात्पर्य, सर्व प्राण्यांना सर्वोपरी
भगवद‌भ् जन हेच निर्भय स्थान आहे ८.

असो वेद शास्त्र परु ाण । स्वमख ु ें बोलिला श्रीकृ ष्ण ।


मी सर्वथा भाक्ति‍आधीन । भक्तिप्रधान भगवद्वाक्य ॥ ३०९ ॥
वेद, शास्त्रे, परु ाणें, ही बाजल
ू ा राहोत; पण प्रत्यक्ष श्रीकृ ष्णानें आपल्या मख
ु ानें हेच सांगितले आहे की, मी सर्वथा भक्तीच्या आधीन
आहे. यावरून भगवंताच्या वाक्यांत भक्ति हीच प्रधान होय ९.

उभवनिू यां चारी बाह्या । निजात्मप्राप्तीच्या उपाया ।


"भक्त्याहमेकया ग्राह्यः" । बोलिला लवलाह्यां श्रीकृ ष्ण ॥ ३१० ॥
इतके च नव्हे तर, प्रत्यक्ष श्रीकृ ष्णांनी आपले चारही हात उभारून निजात्मप्राप्तीचा उपाय सांगताना 'भक्त्याहमेकया ग्राह्यः' म्हणजे
एका भक्तीनेंच मी वश होणारा आहे, असें एकदम सागि ं तले आहे. ३१०

ये वै भगवता प्रोक्ता उपाया ह्यात्मलब्धये ।


अञ्जः पसंु ामविदषु ां विद्धि भागवतान् हि तान् ॥ ३४ ॥
श्लोक ३४- अज्ञानी लोकानं ासद्ध ु ा अगदी सहजपणे साक्षात आपल्या प्राप्तीचे जे उपाय भगवतं ानं ी सागि
ं तले आहेत, तेच "भागवत
धर्म" समज. (३४)

न करितां वेदशात्रव्यत्ु पत्ति । ऐशिया अज्ञानां निजात्मप्राप्ती ।


सगु म जोडे ब्रह्मस्थिती । यालागीं हरिभक्ती प्रकाशिली देवें ॥ ३११ ॥
वेद-शास्त्र-व्यत्ु पत्ति ज्यांना नाहीं, अशा अज्ञानी जनांना परमेश्वरप्राप्ति सगु म होऊन त्यांना ब्रह्मस्वरूप होतां यावें म्हणनू देवानेंच ही
हरिभक्ति प्रकट के ली आहे ११.
न करितां वेदशास्त्रपठण । जड मढू म्हणाल तरले कोण ।
उन्मत्तगजेंद्रउद्धरण । गर्भसंरक्षण परिक्षितीचें ॥ ३१२ ॥
वेदशास्त्रपठण न करता जड मठू कोण तरले असें म्हणाल, तर उन्मत्त गजेंद्राचा उद्धार झाला आहे. परीक्षितीचे गर्भामध्यें संरक्षण झाले
आहे १२,

अबं रीषगर्भनिवारण । करावया भक्तीच कारण ।


"अहं भक्तपराधीनः" । स्वमख ु ें नारायण बोलिला ॥ ३१३ ॥
अबं रीषाचे गर्भवास चकु ावयाला भक्ति हीच कारण झाली आहे. 'अहं भक्तपराधीनः' म्हणजे मी भक्ताच्या स्वाधीन आहे, असे
आपल्या तोंडानें नारायणानें म्हटले आहे १३.

वनचर वानर नेणों किती । उद्धरले भगवद‌भ् क्तीं ।


अस्वलें तारावया निश्चितीं । विवरीं जाबं वती भक्तीस्तव वरिली ॥ ३१४ ॥
ह्या भगवद‌भ् क्तीनें वनचर वानर किती तरले कोण जाणे ! अस्वलांचा उद्धार व्हावा म्हणनू भगवंतानें विवरांत जाऊन जांबवतीला
भक्तीमळु ें च वरिले १४.

जाण पां अविवेकी के वळ । गौळी गोधनें गोपाळ ।


तेही उद्धरिले सकळ । श्रीकृ ष्णसखे प्रबळ अनन्यप्रीतीं ॥ ३१५ ॥
पनु ः हे लक्षात आण की, के वळ अविवेकी असे गौळी, गोधनें व गोपाळ जे कृ ष्णाचे सखे सवंगडी, तेसद्ध
ु ा प्रबळ अशा अनन्य
प्रीतीमळ
ु े च उद्धरून गेले १५.

शास्त्रविरुद्ध अविवेकस्थिती । जारभावें श्रीकृ ष्णप्रीती ।


गोपी उद्धरिल्या नेणों किती । अनन्यभक्तिसख्यत्वें ॥ ३१६ ॥
शास्त्रविरुद्ध अविवेकामळु ें जारभावानेंच का होईना, श्रीकृ ष्णावर अत्यतं प्रीति ठे वल्यामळ
ु ें गोपी किती उद्धरल्या, त्याचं ी तर गणतिच
नाहीं १६.

न करितां नाना व्यत्ु पत्ती । सगु मोपायें ब्रह्मप्राप्ती ।


अबळें तारावया निश्चितीं । भगवतं ें निजभक्ति प्रगट के ली ॥ ३१७ ॥
अनेक प्रकारची शास्त्रे वगैरे न पढतां सल ु भ उपायानें ब्रह्मप्राप्ति व्हावी, आणि दबु ळीही निश्चितपणे तरून जावी म्हणनू भगवंतानें
आपली भक्ति प्रगट के ली १७.

तें हें राया भागवत जाण । मख्ु यत्वें भक्तिप्रधान ।


भावें करितां भगवद‌भ् जन । अज्ञान जन उद्धरती ॥ ३१८ ॥
राजा ! तेच हे भागवत, ज्यात मख्ु यत्वेकरून भक्तिच प्रधान आहे. शद्ध
ु भावानें भगवद‌भ् जन के लें असता अज्ञानी लोक उद्धरून
जातात १८.
हें भागवत नव्हे नव्हे । अज्ञानालागीं निजपव्हे ।
भवाब्धि तरावया भजनभावें । महानाव देवें निर्माण के ली ॥ ३१९ ॥
हें भागवत नव्हे हो नव्हे; ही दीन अज्ञानी लोकांकरितां घातलेली पाणपोईच आहे. भजनभावानें संसारसागर तरून जाण्याकरितां
देवानें ही एक मोठी नौकाच निर्माण करून ठे वली आहे १९.

भागवताचे महानावे । जे रिघाले भजनभावें ।


त्यांसी भवभयाचे हेलावे । भजनस्वभावें न लागती ॥ ३२० ॥
भजनभावानें जे ह्या भागवतरूपी महानौकें त बसनू निघाले, त्यांना भजनस्वभावामळ
ु ें ससं ारभयाचे हेलकावे खावें लागत नाहींत
३२०.

स्त्रीशद्रू ादि आघवे । घालनि ू यां ये नावे ।


एके च खेपे स्वयें न्यावे । भजनभावें परतीरा ॥ ३२१ ॥
स्त्रीशद्रू ादिक सारे ह्या नावेत घालनू एकाच खेपेनें भजनभावानें पलीकडच्या तीराला नेतां येतात २१.

जे आवलितां भावबळें । तोडी कर्माकर्मक्रूरजळें ।


स्वबोधाचेनि पाणिढाळें । काढिती एक वेळे निजात्मतीरा ॥ ३२२ ॥
भावबळानें या नावेला वल्हवंू लागले असतां कर्माकर्मरूप क्रूर जळाला तोडून निजबोधाच्या प्रवाहदिशेनें ती एकाच वेळेला नेऊन
पैलतीरास पोंचविते २२.

वैराग्याचे निजनावाडे । अढळ बसले चहूक ं डे ।


विषयाचं े आदळ रोकडे । चक ु वनि
ू धडपडु े काढिती काठं ा ॥ ३२३ ॥
वैराग्याचे नावाडी चहूक
ं डे अढळ बसले असल्यामळ ु ें विषयांचे खडक चक
ु वनू ते अलगद नेऊन तीराला पोंचवितात २३.

संचितक्रियमाणांच्या लाटा । मोडोनि लाविती नीट वाटा ।


वेंचनि
ू प्रारब्धाचा साठं ा । निजात्मतटा काढिती ॥ ३२४ ॥
संचितक्रियमाणांच्या लाटा मोडून नीट रस्त्याला लावतात आणि प्रारब्धाचा साठा संपवनू आत्मस्वरूपतटाला पोंचवितात २४.

तेथ गरुु वचन साचोकारें । सांभाळित उणेंपरु ें ।


भतू दयेचेनि दोरें । निजनिर्धारें वोढिती ॥ ३२५ ॥
यामध्यें काहीं न्यनू ाधिक्य झाल्यास गरुु वचन सांभाळून घेते. नाव तीराला लागत असतां भतू दयेच्या दोरानें आत्मनिर्धारानें ओढतात
२५.
तवं एकाएक एकसरीं । काढिली परात्परतीरीं ।
तंव प्रत्यावृत्ती येरझारी । आत्मसाक्षात्कारीं खटंु ली ॥ ३२६ ॥
तेव्हां सपाट्यासरशी ती नौका परात्परतीराला लागते. सर्वांना एकदम परतीरावर उतरवितात, आणि मग आत्मसाक्षात्कार झाल्यानें
पनु रावृत्ति खटंु ू न ये जा करावे लागत नाहीं २६.

येथ धरिला परु े भावो । तैं बडु णेंचि होय वावो ।


मग टाकावो जो ठावो । तो स्वयमेवो आपण होय ॥ ३२७ ॥
एक भाव धरला की परु े , मग 'बडु णे' म्हणतात ते मिथ्या होऊन जाते. मग जेथे पोंचावयाचें म्हणतो तें स्थानच हा आपण होऊन बसतो
२७.

येथ पव्हणयावीण तरणें । प्रयासेंवीण प्राप्ति घेणें ।


सखु ोपायें ब्रह्म पावणें । यालागीं नारायणें प्रकाशिली भक्ती ॥ ३२८ ॥
येथें पोहल्याशिवायच तरावयाचे, आणि प्रयासाशिवायच प्राप्ति व्हावयाची. अर्थात् सख
ु ोपायानें ब्रह्मप्राप्ति व्हावी म्हणनू नारायणानें
भक्ति प्रगट के ली आहे २८.

भागवतधर्माचिये स्थिती । बाळीं भोळीं भवाब्धि तरती ।


सख
ु ोपायें ब्रह्मप्राप्ती । तेचि श्लोकार्थी ं विशद सांगे ॥ ३२९ ॥
भागवतधर्माची स्थितिच अशी आहे की, त्यानें साळींभोळींही संसारसमद्रु तरून जातात. सल
ु भ रीतीनें ब्रह्मप्राप्ति कशी होते, तेच
आतां श्लोकार्थामध्यें स्पष्ट करून सागं तात २९.

यानास्थाय नरो राजन् न प्रमाद्येत कर्हिचित् ।


धावन्निमील्य वा नेत्रे न स्खलेन्न पतेदिह ॥ ३५ ॥
श्लोक ३५- राजन ! या भागवत धर्माचा अवलबं करणार्‍या मनष्ु यावर कधी सक ं टे येत नाहीत आणि डोळे बदं करून तो पळाला
म्हणजेच त्याच्या विधिविधानात काही कमतरता राहिली तरी, त्याचे स्खलन किंवा पतन होत नाही. (३५)

जो श्रति
ु स्मृती नेणता । भावें भजे भगवत्पथा ।
त्यासी विधिनिषेधबाधकता । स्वप्नींही सर्वथा प्रमादु न घडे ॥ ३३० ॥
ज्याला श्रति
ु -स्मृति समजत नाहीत, पण के वळ भक्तिभावानेंच जो भगवन्मार्गाला म्हणजे भागवतधर्माला अनसु रतो, ज्याला
विधिनिषेधांची बाधा होत नाहीं व स्वप्नांतसद्ध
ु ां प्रमाद घडत नाहीं ३३०.

सद‌भ् ावेंसीं सप्रेम । आचरितां भागवतधर्म ।


बाधंू न शके कर्माकर्म । भावें परुु षोत्तम संतष्टु सदा ॥ ३३१ ॥
सप्रेम सद‌भ् ावानें जर भागवतधर्माचे आचरण के ले, तर त्याला कर्माकर्म बाधंू शकत नाही. त्याच्या भक्तीनेंच परुु षोत्तम सदासर्वदा
सतं ष्टु असतो ३१.
श्रति
ु स्मृति हे दोन्ही डोळे । येणेंवीण जे आंधळे ।
तेही हरिभजनी धावं तां भावबळें । पडे ना आडखळ ु ें सप्रेमयोगें ॥ ३३२ ॥
श्रति
ु आणि स्मृति हे दोन डोळे आहेत. त्यांच्याशिवाय जे आंधळे असतात, तेही भावबळानें हरिभजनामध्यें धांवतांना पडत नाहीत व
अडखळत नाहीत ३२.

प्रेमेंवीण श्रति
ु स्मृतिज्ञान । प्रेमेंवीण ध्यानपजू न ।
प्रेमेंवीण श्रवण कीर्तन । वृथा जाण नृपनाथा ॥ ३३३ ॥
हे राजा ! प्रेमाशिवाय श्रति ु स्मृतींचे ज्ञान, प्रेमाशिवाय ध्यान-पजू न, प्रेमाशिवाय श्रवण-कीर्तन, ही सर्व व्यर्थ होत, हे लक्षात ठे व ३३.

माता देखोनि प्रेमभावें । बालक डोळे झाक ं ू नि धावं े ।


तें धांवेसवें झेंपावे । अति सद‌भ् ावे निजमाता ॥ ३३४ ॥
आई पाहिली की, मल ू डोळे झाकून तिच्याकडे धांव घेते; त्या धांवेबरोबर आईही पण तितक्याच प्रेमानें धांव घेऊन मल
ु ाला झेलनू
घेते ३४.

जैसा सप्रेम जो भजे भक्तु । त्या भजनासवें भगवंतु ।


भल ु ला चाले स्वानंदयक्त
ु ु । स्वयें सांभाळितु पदोपदीं ॥ ३३५ ॥
त्याप्रमाणें जो भक्त भगवतं ाला सप्रेम भजतो, त्याच्या त्या भजनाबरोबर भगवतं ही भल
ु नू स्वानदं ानें त्याच्याबरोबर चालू लागतो व
त्याला पदोपदी सांभाळतो ३५.

ऐसे आचरितां भागवतधर्म । बाधंू न शके कर्माकर्म ।


कर्मासी ज्याची आज्ञा नेम । तो परुु षोत्तम भजनामाजीं ॥ ३३६ ॥
अशा प्रकारें भक्त भागवतधर्म आचरीत असतां त्याला कर्माकर्म बाधंू शकत नाही. कारण, कर्माला ज्यानें आज्ञा व नियम घालनू
दिले आहेत, तो परुु षोत्तमच त्याच्या भजनामध्यें असतो ३६.

ऐसा भागवतधर्में गोविदं ु । तष्टु ला चाले स्वानदं कंदु ।


तेथें के वीं रिघे विधिनिषेधु । भक्तां प्रमादु न कदा बाधी ॥ ३३७ ॥
याप्रमाणें स्वानंदकंद जो गोविंद, तो जेणे भागवतधर्मानें संतष्टु होऊन चालत असतो, तेथे विधि-निषेधांचा शिरकाव कसा होणार ?
त्याच्या भक्ताला प्रमादाची कधीही बाधा होत नाहीं ३७.

जेवीं कां स्वामीचिया बाळा । अवरोधु न करवे द्वारपाळा ।


तेवीं भागवतधर्मभजनशीळा । कर्मार्गळा बाधंू न शके ॥ ३३८ ॥
ज्याप्रमाणें धन्याच्या मल
ु ाला पहारे कर्‍याच्यानें अटकाव करवत नाही, त्याप्रमाणें भागवतधर्मानें जो भजन करणारा आहे, त्याला
कर्माचा अडसर प्रतिबंधक होत नाहीं ३८.
ज्यासी भगवद‌भ् जनीं विश्वासु । विधिनिषेधु त्याचा दासु ।
देखोनि निजभजनविलासु । स्वयें जगन्निवासु सख ु ावे ॥ ३३९ ॥
ज्याला भगवद‌भ् जनामध्यें विश्वास आहे, त्याचे विधिनिषेध हे दासच बनतात. त्याचा भजनविलास पाहून स्वतः जगन्निवास परम
संतष्टु होतो ३९.

भागवतधर्में राहे कर्म । तवं तवं सखु ावे परुु षोत्तम ।


सप्रेमभक्ता बाधी कर्म । हा वृथा भ्रम भ्रांतांसी ॥ ३४० ॥
भागवतधर्मानें कर्म करण्याचे राहतें, तसतसा परुु षोत्तम संतष्टु च होतो. प्रेमळ भक्तांना कर्म बाधतें हा भ्रांतिष्ट लोकांना वृथा भ्रम आहे
३४०.

कर्म करूं पावे प्रमादु । तंव प्रमादीं प्रगटे गोविदं ु ।


यालागीं विधिनिषेधु । न शकती बाधंू हरिभक्तां ॥ ३४१ ॥
भक्ताला कर्म प्रमादातं पाडूं लागले, तर त्या प्रमादातं च भगवान् प्रगट होतो. ह्याकरितां हरिभक्तानं ा कर्माचे विधिनिषेध बाधक होत
नाहीत ४१.

अजामिळा कर्मबाध । यमपाशीं बांधितां सबु द्ध ।


तेथें प्रगटोनि गोविदं । के ला अतिशद्ध
ु नाममात्रें ॥ ३४२ ॥
अजामिळाला त्याचे कर्म बाधक झालें, यमपाशांत तो बांधला गेला, इतक्यांत के वळ नामामळ
ु ें तेथे भगवान् प्रगट होऊन त्यांनी
त्याला पावन के ले ४२.

स्वधर्म कर्म हेच दोनी । निजसत्ता भोयी करूनी ।


जो पहुडे भजनसख ु ासनीं । तो पडे तैं दडं णी स्वधर्म-कर्मां ॥ २४३ ॥
स्वधर्म आणि कर्म ह्या दोघांनाहीं आपल्या सत्तेनें भोई करून जो भक्त भजनरूप पालखीत शयन करतो, तेव्हां तो पडेल तर
स्वधर्मकर्मानाच दडं होतो ४३.

भजनप्रतापसत्तालक्षणें । स्वधर्मकर्मां ऐसें दडं णें ।


वर्णाश्रमांचा ठावो पसु णें । होळी करणें कर्माची ॥ ३४४ ॥
भजनप्रतापाच्या योगें स्वधर्मकर्मांनाहीं याप्रमाणें दडं करता येतो. वर्णाश्रमाचा ठाव पसु नू टाकून कर्माची होळीच करून टाकतां येते
४४.

एवं भागवतधर्में जे सेवक । स्वधर्मकर्म त्यांचें रंक ।


तें राहों न शके त्यासं न्मख
ु । मा के वीं बाधक हों शके ल ॥ ३४५ ॥
तात्पर्य, याप्रमाणें जे भागवतधर्माचे सेवन करणारे आहेत, त्याचं े स्वधर्मकर्म हे दीन सेवक होत. भक्तापं ढु े त्यानं ा उभे राहण्याचेही
सामर्थ्य नाही, मग ते भक्तांना बाधक कसे होऊ शकतील ? ४५.

कै से कै से भागवतधर्म । के वीं भगवंती अर्पे कर्म ।


अतिगह्य ु उत्तमोत्तम । निजभजनवर्म ऐक राया ॥ ३४६ ॥
भागवतधर्म कसेकसे आहेत ? भगवंतामध्यें कर्म कसे अर्पण होते ? हे राजन् ! अति गह्य
ु निजभजनवर्म तल
ु ा सांगतों ऐक ४६.

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा


बदु ध्् यात्मना वानसु तृ स्वभावात् ।
करोति यद्यत्सकलं परस्मै
नारायणायेति समर्पयेत्तत् ॥ ३६ ॥
श्लोक ३६- मनष्ु य शरीराने, वाणीने, मनाने, इदि
ं यानं ी, बद्ध
ु ीने, अहक
ं ाराने किंवा स्वभावाप्रमाणे जी जी कर्मे करील, ती ती सर्व कर्मे
त्याने त्या परमपरूु ष नारायणांनाच समर्पण करावीत. (३६)

हेतक
ु अथवा अहेतक ु । वैदिक लौकिक स्वाभाविक ।
भगवतं ीं अर्पे सकळिक । या नावं देख "भागवतधर्म" ॥ ३४७ ॥
सहेतकु असो अथवा अहेतक ु असो, वैदिक असो, लौकिक असो की स्वाभाविक असो; ही सारी भगवंताच्या ठायीं अर्पण करणें,
यालाच 'भागवतधर्म' म्हणतात, हें तंू ध्यानांत ठे व ४७.

उदकीं तरंग अतिचपळ । जिकडे जाय तिकडे जळ ।


तैसें भक्ताचें कर्म सकळ । अर्पे तत्काळ भगवंतीं ॥ ३४८ ॥
उदकांतील डलाट अति चपल असते, पण ती जिकडे जाईल तिकडे उदकांतच मिसळते; त्याप्रमाणें भक्तांचे सारे कर्म तत्काल
भगवतं ाच्याठायींच अर्पण होते. अर्थात् भगवद‌रू
् पच होऊन जातें ४८.

ये श्लोकींचें व्याख्यान । पहिलें मानसिक अर्पण ।


पाठीं इद्रि
ं यें बद्धि
ु अभिमान । कायिक जाण श्लोकान्वयें ॥ ३४९ ॥
ह्या श्लोकाच्या व्याख्यानातं प्रथमतः मानसिक कर्माचें अर्पण सागि
ं तले असनू , मागाहून इद्रि
ं यें, बद्धि
ु , अहक
ं ार इत्यादिकाच्ं या कर्माचे
व शेवटी कायिक कर्माचे अर्पण असे श्लोकान्वयानसु ार सांगितले आहे ४९.

भागवतधर्माची निजस्थिती । मन बद्धि ु चित्त अहक ं ृ ती ।


आदिकरूनि इद्रि ं यवृत्ती । भगवंतीं अर्पिती तें ऐक ॥ ३५० ॥
भागवतधर्माची खरी स्थिति म्हणजे मन, बद्धि ु , चित्त, अहकं ृ ति आदिकरून इद्रि
ं यवृत्ति आहेत त्या सर्व भगवंताला अर्पण करणें होय.
ते कसें तें ऐक ३५०.
बाधंू न शके स्वधर्मकर्म । ऐक राया त्याचें वर्म ।
मनीं प्रगटला परुु षोत्तम । अतिनिःसीम निजबोधें ॥ ३५१ ॥
हे राजा ! भक्ताला स्वधर्मकर्म कसें बाधत नाहीं त्याचे वर्म सांगतों ऐक. अति निस्सीम आत्मबोधाच्या योगानें मनामध्येंच परुु षोत्तम
प्रगट होतो ५१.

म्हणोनि संकल्पविकल्प । अवघे झाले भगवद‌रू ् प।


यालागीं भक्त नित्य निष्पाप । सत्यसंकल्प हरिदास ॥ ३५२ ॥
त्यामळ
ु ें सक
ं ल्प-विकल्प हे सारे भगवद‌रू
् पच होतात, आणि त्यायोगें भक्त हे निष्पापच असतात. ते हरीप्रमाणें सत्यसक
ं ल्पी होतात
५२.

जेवीं बद्धि
ु बळांचा खेळ । राजा प्रधान गजदळ ।
अवघे काष्ठचि के वळ । तेवीं सक
ं ल्प सकळ भगवद‌रू ् प ॥ ३५३ ॥
ज्याप्रमाणें बद्धि
ु बळाच्या खेळांत राजा, प्रधान, हत्ती, पायदळ ही सर्व असतात, पण ती सारीच के वळ लांकडे त्याप्रमाणें भगवंताच्या
भक्ताचे संकल्प सारे भगवद‌रू
् पच होतात ५३.

जो जो सकं ल्प कामी कामु । तो तो होय आत्मारामु ।


तेथ भजनाचा संभ्रमु । अतिनिःसीमु स्वयें वाढें ॥ ३५४ ॥
त्याचा सकं ल्प ज्या ज्या विषयाची इच्छा करतो तो तो विषय आत्माराममयच बनतो, त्यामळ
ु ें भजनसंभ्रम आपोआपच अतिशय
वाढतो ५४.

जागृति सषु प्तु ी स्वप्न । तिहीं अवस्थां होय भजन ।


तेथ अखंड अनसु ंधान । निजबोधें पर्णू ठसावलें अंगीं ॥ ३५५ ॥
जागृति, स्वप्न, सषु ति ु या तिन्ही अवस्थामं ध्यें भजन होऊ लागते व अगं ामध्यें आत्मबोध पर्णू ठसला गेल्यामळ
ु ें अनसु धं ान अखडं
असते ५५.

मना होतां समाधान । समाधानें अधिक भजन ।


पर्णू बाणलें अनसु धं ान । ध्येय-ध्याता-ध्यान समरसें भजे ॥ ३५६ ॥
मनाला समाधान प्राप्त झाले म्हणजे त्यायोगें भजनही अधिकच वाढत जाते. अनसु ंधान पर्णू पणे बाणल्यामळ
ु ें ध्येय, ध्याता, ध्यान ही
एकरूप होऊन भजन चालतें ५६.

तर्या
ू साक्षी उन्मनी । याही लाविल्या भगवद‌भ् जनीं ।
जंववरी अवस्थापणीं । आपआपणीं मक ु ल्या नाहीं ॥ ३५७ ॥
तर्या
ु , साक्षी आणि उन्मनी ह्या तीन जोपर्यंत आपलेपणाला मक ु ल्या नाहीत, तोपर्यंत त्यांनाहीं भक्त भगवद‌भ् जनाकडेच लावतात ५७.
ऐसा भावनेवीण उपजे भावो । तो तो तत्काळ होय देवो ।
मग अर्पणाचा नवलावो । न अर्पितां पहा हो स्वयें होय ॥ ३५८ ॥
ह्याप्रमाणें भावनेशिवायच भाव उत्पन्न होतो, तो तत्काळ देवरूपच बनतो. मग अर्पणाचे आश्चर्य कसले ? अर्पण न करितां
आपोआपच तें भगवदर्पण होतें ५८.

स्वरूपें मिथ्या के लें स्वप्न । जागृती सोलनि


ू काढिलें ज्ञान ।
निवडोनि सषु प्ति
ु सखु समाधान । तिहींतें पर्णू एकत्र के लें ॥ ३५९ ॥
स्वरूपानभु वानें स्वप्न मिथ्या करून सोडलें ; जागृति सोलनू ज्ञान काढले; सषु प्तु ीचें सख
ु समाधान निवडून काढून ते पर्णू पणे एकत्र
करून ठे वले ५९;

तये स्वरूपीं सगळें मन । स्वयेंचि करी निजात्मार्पण ।


तेथींचें सख
ु समाधान । भक्त सज्ञान जाणती स्वयें ॥ ३६० ॥
की अशा स्वरूपांत स्वतः मनच आत्मार्पण करते. अशा स्थितीतील सख
ु समाधान सज्ञान भक्तच जाणत असतात ३६०.

यापरी मानसिक जाण । सहज स्वरूपीं होय अर्पण ।


आतां इद्रि
ं याचं ें समर्पण । होय तें लक्षण ऐक राया ॥ ३६१ ॥
ह्याप्रमाणें मानसिक व्यापार स्वरूपामध्यें सहज अर्पण होतो असें तंू जाण. आतां इद्रि
ं यांचे समर्पण कसे होते, ते लक्षण ऐक ६१.

दीपु लाविजे गृहाभीतरीं । तोचि प्रकाशे गवाक्षद्वारीं ।


तेवीं मनीं प्रगटला श्रीहरी । तोचि इद्रि
ं यांतरीं भजनानंदु ॥ ३६२ ॥
घरामध्यें दिवा लावला म्हणजे त्याचाच उजेड खिडक्यांतनू ही बाहेर पडतो. तद्वत् मनामध्यें श्रीहरि प्रगट झाला म्हणजे तोच
इद्रि
ं यांमध्यें भजनानंदरूपानें प्रगट होतो ६२.

तेचि इद्रि
ं यव्यापार । सांगिजती सविस्तर ।
स्वाभाविक इद्रि
ं यव्यवहार । भजनतत्पर परब्रह्मीं ॥ ३६३ ॥
तेच इद्रि
ं यांचे व्यापार सविस्तरपणे सांगतों ऐक. स्वाभाविक इद्रि
ं यव्यापारही परब्रह्मस्वरूपांत भजनरूप होतात ६३,

जंव दृष्टि देखे दृश्यातें । तंव देवोचि दिसे तेथें ।


यापरी दृश्यदर्शनातें । अर्पी भजनसत्ते दृष्टीचा विषयो ॥ ३६४ ॥
दृष्टि जेव्हां दृश्य पदार्थाला पहाते, तेव्हां तिला तेथें देवच दिसत असतो. ह्याप्रमाणें भजनसत्तेनें दृश्यदर्शनासह दृष्टीचा विषय
भगवंताला अर्पण करतो ६४.

दृश्य द्रष्टा आणि दृष्टी । देखतां तिन्ही एकवटी ।


सहजें ब्रह्मार्पण ते दृष्टी । भक्त जगजेठी यापरी अर्पी ॥ ३६५ ॥
दृश्य, द्रष्टा आणि दर्शन ही तिन्ही एकरूपानें पहात गेलें म्हणजे दृष्टि सहज ब्रह्मार्पण होते. याप्रमाणें भक्त श्रेष्ठ दृष्टि अर्पण करतो ६५.

दृश्य प्रकाशी दृश्यपणें । तेंचि दृष्टीमाजीं होय देखणें ।


ऐसेनि अभिन्नपणें । दर्शनार्पणें भजती भक्त ॥ ३६६ ॥
दृश्याला दृश्यपणानें जी सत्ता प्रगट करते, तीच दृष्टीमध्यें दर्शनरूप होते. अशा अभिन्नपणानें दर्शनार्पण करून भक्तजन भजन करतात
६६.

हे एकपणीं तीनही भाग । तिन्हीमाजीं एक अंग ।


ऐसें जें देखणें चांग । त्याचि अर्पणें साङ्ग सहजें अर्पी ॥ ३६७ ॥
एकपणांत तीनही भाग आहेत व तिहींमध्यें एकच स्वरूप आहे. असें हें सदंु र पहाणे, हेच साङ्ग समर्पण होय ६७.

नाना पदार्थ प्रांजळे । नीच नवे देखती डोळे ।


परी अर्पणाचे सोहळे । निजात्ममेळें अर्पिती स्वयें ॥ ३६८ ॥
डोळे नित्य नवे नाना प्रकारचे पदार्थ पहातात; पण भक्तानं ा ते सर्व आत्मरूप दिसतात व याप्रमाणें दृष्टीच्या अर्पणाचे सोहळे ते
भोगतात ६८.

यापरी दृष्टीचें दर्शन । भक्त करिती ब्रह्मार्पण ।


आतां श्रवणाचें अर्पण । अर्पी तें लक्षण ऐक राया ॥ ३६९ ॥
या प्रकारे दृष्टीचे दर्शन भक्त ब्रह्मार्पण करीत असतात. आता हे राजा ! ते 'श्रवणाचे अर्पण' ब्रह्मामध्यें कसे करतात, ते सांगतों ऐक
६९.

जो बोलातें बोलविता । तोचि श्रवणीं झाला श्रोता ।


तोच अर्थावबोधु जाणता । तेथें ब्रह्मार्पणता सहजेंचि ॥ ३७० ॥
जो शब्दाला बोलविणारा, तोच कानांमध्यें ऐकणारा होऊन बसलेला आहे. आणि अर्थाचे ज्ञान जाणणाराही तोच आहे. अर्थात् येथे
श्रवणाची ब्रह्मार्पणता होते ३७०.

शब्दु शब्दत्वें जंव उठी । तंव शब्दविता प्रगटे पाठींपोटीं ।


तेणें अकृ त्रिम भजन उठी । ब्रह्मार्पणमिठी श्रवणीं पडे ॥ ३७१ ॥
शब्द हा शब्दरूपानें उठतो न उठतो, तोच शब्दास बोलविणारा त्याच्या पाठींपोटीं प्रगट होऊन राहतो; त्यामळ
ु ें ते भजन अकृ त्रिमपणे
उत्पन्न होते आणि श्रवणांत ब्रह्मार्पणाची मिठी सहजच पडते ७१.

शब्दबोलासवें अर्थवाढी । तंव शब्दविता घे शब्दार्थगोडी ।


तेणें हरिभजनीं आवडी । स्वयें उठी गाढी श्रवणार्पणेंसीं ॥ ३७२ ॥
शब्दोच्चार झाला की, त्याच्याबरोबर अर्थ वृद्धिंगत होतो; इतक्यातं शब्द काढणारा असतो तोच शब्दार्थाची गोडी ग्रहण करतो
आणि तेणेंकरून श्रवणार्पणानेंच हरिभजनांत अत्यंत आवड उत्पन्न होते ७२.

शब्द जंव कानीं पडे । तंव शब्दार्थें भजन वाढें ।


बोलवित्याच्या अंगा घडे । अर्पण उघडें करितांचि ॥ ३७३ ॥
शब्द कानांवर पडतो न पडतो तोच शब्दार्थामळ ु ें भजन वाढते; आणि त्यायोगें शब्दाच्या प्रवर्तकाशी उघड उघड अर्पण होतें ७३.

बोलासी जो बोलविता । त्यासीं दृढ के ली एकात्मता ।


तें भजन चढे श्रवणाच्या हाता । ब्रह्मार्पणता निजयोगें ॥ ३७४ ॥
शब्दाला जो बोलविणारा, त्याच्याशी एकात्मता दृढ के ली की, तें भजन श्रवणाच्या हाती येते व ब्रह्मार्पणता सहज घडते ७४.

सद‌ग् रुु वचन पडतां कानीं । मनाचे मनपण विरे मनीं ।


तेंचि श्रवण ब्रह्मार्पणीं । भगवद‌भ् जनीं सार्थकता ॥ ३७५ ॥
सद्गरू
ु चे वचन कानावं र पडले की, मनाचे मनपण मनामध्येंच जिरून जाते, तेच श्रवण ब्रह्मार्पण होऊन भगवद‌भ् जनानें सार्थकता होते
७५.

श्रवणेंचि यापरी श्रवण । करितां उठिलें ब्रह्मार्पण ।


हेतरु हित भगवद‌भ् जन । स्वभावें जाण स्वयें होत ॥ ३७६ ॥
ह्याप्रमाणें श्रवणानेंच श्रवण के ले असता त्यास ब्रह्मार्पणता प्राप्त होऊन, हेतरु हित भगवद‌भ् जन आपोआपच होते ७६.

भजनें तष्टु ला जगन्निवास । होय वासाचा निजवास ।


मग घ्राणद्वारा परे श । भोगी सवु ास ब्रह्मार्पणेंसीं ॥ ३७७ ॥
भजनामध्यें संतष्टु झालेला जगन्निवास वासांतील वास होऊन राहतो; व तो परे श घ्राणाच्या द्वारे ब्रह्मार्पणत्वानें सवु ास ग्रहण करतो
७७.

जो समु ना समु नपण जोडी । तो घ्राणाचेंही घ्राण होय आवडी ।


मग नाना सवु ासपरवडी । ब्रह्मार्पणप्रौढीं निजभोग अर्पी ॥ ३७८ ॥
जो पष्ु पाला पष्ु पपण देतो, तोच आवडीनें घ्राणाचे घ्राण होऊन राहतो; आणि मग अनेक प्रकारच्या सवु ासाचा घमघमाट
ब्रह्मार्पणप्रौढीनें भोगतो ७८.

वासाचा अवकाश होय आपण । घ्राणीं ग्राहकपणें जाण ।


तो भोगचि
ु स्वयें संपर्णू । कृ ष्णार्पण सहज होतु ॥ ३७९ ॥
नासिके मध्यें ग्राहकपणानें पोकळीचा भाग आपणच स्वतः होत असल्यामळ
ु ें तो भोग सहजच कृ ष्णार्पण होतो ७९.
रसना रस सेवंू जाये । तंव रसस्वादु देवचि होये ।
मग रसनेमाजीं ये‍ऊनि राहे । ब्रह्मार्पणें पाहे रसभोगवृत्ती ॥ ३८० ॥
(आतां 'रस' विषयाचे अर्पण सांगतात)-जिव्हा रसग्रहण करण्याला जाते तो देव स्वतःच रसास्वाद होतो, त्यामळ ु ें रसनेमध्यें
रसोपभोगाची वृत्ति ब्रह्मार्पणत्वानें येऊन राहते (अथवा, देव रसनेत येऊन राहतो व त्यामळ
ु ें रसभोगवृत्तिही ब्रह्मार्पण होते) ३८०.

जे जे रसना सेवी गोडी । ते ते हरिरूपें धडफुडी ।


स्वादा ये‍ऊनि रोकडी । ब्रह्मार्पणपरवडी निजभोग अर्पी ॥ ३८१ ॥
जिव्हा जो जो स्वाद ग्रहण करते, तो तो हरिरूप होऊन पर्णू पणे गोडीला चढतो. ह्या प्रकारे जिव्हा आपला रसानभु व ब्रह्मार्पण करून
टाकते ८१.

रस-रसना-रसस्वादु । त्रिविधभेदें निजअभेदु ।


रससेवनीं परमानंदु । स्वानंदकंदु वोसंडे ॥ ३८२ ॥
रस, रसना आणि रसास्वाद ह्या तिहींचा निजस्वरूपातं अभेदच आहे. अशा भावनेनें रस सेवन के ला असतां स्वानदं ाचा कंद
इद्रि
ं यद्वाराही बाहेर येतो. अर्थात् अशा रससेवनानें परमानंद-साक्षात्कार होतो ८२.

कटु मधरु नाना रस । रसना सेवी सावकाश ।


परी ते अवघा ब्रह्मरस । स्वादीं सरु स परमानदं ु ॥ ३८३ ॥
कडू, मधरु , इत्यादि जे अनेक रस आहेत ते रसना सावकाश सेवन करते, परंतु तो सारा 'ब्रह्मरस' असल्यामळ
ु ें त्याच्या स्वादांत सरु स
असा परमानंदच प्रकट होतो ८३.

यापरी रसीं रसना । भोगें रतली कृ ष्णार्पणा ।


आतां स्पर्शविषयरचना । अर्पे ब्रह्मार्पणा तें ऐक राया ॥ ३८४ ॥
ह्याप्रमाणें रसना ही रसभोगद्वारा कृ ष्णार्पणांतच रत होते. आता हे राजा ! 'स्पर्श' विषयाची व्यवस्था ब्रह्मार्पणांत कशी होते तें ऐक ८४.

स्पर्श घे‍ईजे निजदेहीं । तवं देहींच प्रगटे विदेही ।


मग स्पर्शी जें जें कांहीं । तो तो भोगु पाहीं ब्रह्मार्पणें उठी ॥ ३८५ ॥
आपल्या देहानें स्पर्श घ्यावयास जावें, तो देहामध्यें विदेही परमात्माच प्रगट होतो. ह्यामळ
ु ें जे जे काही स्पर्शावयास जावें, तो तो
स्पर्शभोग ब्रह्मार्पणानेंच उठू लागतो ८५.

स्पर्शास्पर्शें जें स्पर्शिजे । तंव स्पर्शावया नाडळे दजु ें ।


तेणें एकपणाचेनि व्याजें । कृ ष्णार्पणवोजें भजन प्रगटे ॥ ३८६ ॥
स्पर्शास्पर्शानें म्हणजे त्वचेनें कशाला तरी स्पर्शावे म्हटलें, तर तेथे स्पर्श करण्यास दसु रें काहं ींच लागत नाही. त्या ऐक्यरूपामळ
ु ें
कृ ष्णार्पणरूपी भजनच प्रकट होते ८६.
तेथ जो जो घे‍ईजे पदार्थु । तो तो पदार्थु होय समर्थु ।
तेणेंचि भजनें परमार्थु । निजस्वार्थु निजभक्तां ॥ ३८७ ॥
तेव्हां जो जो पदार्थ म्हणनू घ्यावयास जावें, तो तो पदार्थ सर्वसत्ताधीश परमात्माच होऊन राहतो; आणि तशा त्या भजनानें
निजभक्ताचा स्वार्थ जो परमार्थ तोच पदरांत पडतो ८७.

द्यावया काहं ीं देवा जाये । तवं देतां भजन कै सें होये ।


देतें घेतें दान स्वयें । देवोचि होये निजांगें ॥ ३८८ ॥
(आतां 'हाता' चे अर्पण सांगतात)- हात देवास काहीं द्यावयास जातात, तों तें देतांना भजन कसे घडते पाहा. तर देणारा, घेणारा व
दान ही तिन्ही देव स्वतःच होऊन राहतो ८८.

जे‍उतें जे‍उतें चालवी पाये । तो तो मार्गु देवोचि होये ।


मग पा‍उला पा‍उलीं पाहे । निजभजन होये ब्रह्मार्पणेंशीं ॥ ३८९ ॥
(आतां 'पाया'चे अर्पण सागं तात)-भक्त जिकडे जिकडे पाय चालवीत नेतात, तो तो मार्ग देव स्वतःच होऊन राहतो; त्यामळ
ु ें
ब्रह्मार्पणत्वानें पावलोपावली निजभजन घडते ८९.

चरणा चरणा निजगती । तोचि निजांगें क्षितीची क्षिती ।


चालतां तैशिया यक्त ु ी । सहज ब्रह्मस्थिति निजकर्में अर्पी ॥ ३९० ॥
चरणाच्या गतीला ज्याची चालना, तोच पृथ्वीची धारणाशक्ति आहे, अशा यक्ति
ु धारणेनें चालतांना ते चालण्याचे कर्म सहज
ब्रह्मस्थितीला पोंचते ३९०.

बोल बोलवितिया वदनीं भेटी । बोलणें लाजे त्याचिया दृष्टी ।


ते लाज गिळून बोलणें उठी । निजभजनपष्टु ी ब्रह्मार्पणेंसी ॥ ३९१ ॥
(मागें ओवं ी ३७० मध्यें ज्ञानेंद्रियांपैकी श्रोत्रेंद्रियाचा शब्दविषय सांगितला, आतां कर्मेंद्रियांपैकी वागिंद्रियाचा शब्दविषय सांगतात.)
बोल आणि बोलविणारा याचं ी भेट वदनातं होते. त्याला पाहून बोल लाजतो. ती लाज गिळूनच मग बोलणे प्रगट होत असल्यामळ ु ें
ब्रह्मार्पणासह निजभजन वाढत असते ९१.

शब्द मावळे निःशब्दीं । निःशब्दचि बोलिजे शब्दीं ।


तोचि अर्पणाचा विधी । जाण त्रिशद्ध
ु ी समर्पितेनिशीं ॥ ३९२ ॥
निःशब्दामध्यें शब्द लय पावतो, निःशब्द वस्तचु शब्दांनी बोलली जाते. अर्पणकर्त्यासह खरोखरीचा अर्पणविधि हाच असे समज
९२.

बोलु बोलविता बोला‍आतं ु । तो बोलु अर्पणेंसींच येतु ।


ऐसा शब्देंचि भजनार्थु । प्रकटे परमार्थु ब्रह्मार्पणेंसीं ॥ ३९३ ॥
बोल बोलविणारा तो बोलाच्या आतं आहे असे मानले, म्हणजे ते बोल कृ ष्णार्पणानेंच उठतात. असें शब्दरूपानेंच भजन होऊन
ब्रह्मार्पणासह परमार्थ प्रगट होतो ९३.

ऐसा मनें-कर्में-वचनें । जो दृढावला भगवद‍भ् जनें ।


तेंचि भजन अभिमानें । निजनिर्वाणें दृढ धरी ॥ ३९४ ॥
(आतां 'अभिमानाचें' अर्पण सांगतात)- वर सांगितल्याप्रमाणें मनाने, कर्मानें व वचनानें भगवद‌भ् जनामध्यें जो दृढावला, तोच ते भजन
अभिमानानें दृढतर धरून राहतो ९४.

तरंग समद्रु ा‍आंतौता । म्हणे माझेनि मेघु तत्त्वतां ।


जगातें निवविता जीवविता । तृषा हरिता चातकांची ॥ ३९५ ॥
समद्रु ाच्या आंत असलेली लाट म्हणते की, खरोखर पाहिले तर जगाला शांत करणारा व पोसणारा, आणि चातकाची तृषा हरण
करणारा जो मेघ, तो माझ्यापासनू च झाला आहे ९५.

माझेनि सस्यें पिकतीं । माझेनि सरिता उसळती ।


मागतु ी मजमाजीं मिळती । समरसती सिंधत्ु वें ॥ ३९६ ॥
माझ्याच योगानें धान्ये पिकतात, माझ्याच योगानें नद्या भरून वाहतात, आणि पन्ु हा त्या समद्रु ाशी ऐक्यता पावनू मलाच येऊन
मिळतात ९६.

तेवीं मळु ींचें पर्णू पण । पावोनि भजे अभिमान ।


त्याचे भजनाचें लक्षण । सावधान अवधारीं ॥ ३९७ ॥
ह्या न्यायानें भगवद‌भ् क्त हा मळ ू चें पर्णू त्व पावनू त्या पर्णू त्वाच्या अभिमानानें भजंू लागतो. त्या भजनाचे लक्षणही चित्त देऊन ऐक
९७.

म्हणे मी सकललोककर्ता । कर्म करोनि अकर्ता ।


मी सर्वभोगभोक्ता । नित्य अभोक्ता मी एकु ॥ ३९८ ॥
तो म्हणतो की, त्रिभवु नाचा कर्ता तो मी; कर्म करून अकर्ता व सर्व प्रकारचे भोग भोगनू नित्य अभोक्ता असणाराही मीच एक ९८.

सकळ लोकीं माझी सत्ता । सकळीं सकळांचा नियंता ।


सकळां सकळत्वें मी प्रकाशिता । होय मी शास्ता सकळिकाचं ा ॥ ३९९ ॥
सर्व लोकांमध्यें माझीच सत्ता आहे ; सर्वांमध्यें सर्वांचा नियंता तो मीच; सर्वांना सर्वपणानें प्रकाशविणाराही मीच ; तसाच सर्वांचा
शास्ताही मीच होय ९९.

सकळां भतू ीं मी एकु । मीचि व्याप्य व्यापकु ।


जनिता जनयिता जनकु । न होनि अनेकु जगद‌रू ् प मी ॥ ४०० ॥
सर्व प्राणिमात्रामध्यें मी एकच आहे ; व्याप्य व व्यापक मीच ; उत्पन्न होणारा व उत्पन्नकर्ताही मीच ; एकत्व न मोडतां जगद‌रू
् प
होणारा मीच ४००.

मी देवांचा आदिदेवो । देवीं देवपणा माझाचि भावो ।


व्ययामाजीं मी अज अव्ययो । अक्षरीं अक्षरभावो माझेनि अंगें ॥ ४०१ ॥
देवांचा आदिदेव तो मी; देवांमध्यें देवपणा आहे तो माझाच भाव होय. विनाशी पदार्थात मी अव्यय व अज आहे. अक्षरामध्यें
अक्षरधर्म जो दिसतो तो माझ्यामळ ु े च. १.

ईश्वरीं जे जे सत्ता । ते ते माझी सामर्थ्यता ।


भगवंतीं भगवंतता । जाण तत्त्वतां माझेनि ॥ ४०२ ॥
ईश्वराच्या ठायीं जी जी म्हणनू सत्ता आहे, तें तें सर्व माझेच सामर्थ्य. भगवंतामध्यें भगवंतपणा म्हणनू जो आहे तो खरोखर
माझ्याचमळ ु ें २.

मी आपरूपीं आपु । मी प्रकृ तिपरुु षाचं ा बापु ।


सृष्टिरचनेचा संकल्पु । निर्विकल्पु पैं माझा ॥ ४०३ ॥
जलरूपामध्यें रसरूप मी ; प्रकृ तिपरुु षाचं ा जनक तो मी; सृष्टिरचनेचा सक
ं ल्प तो माझा, पण वस्ततु ः मी निर्विकल्प ३.

मी आदीची अनादि आदी । मी समाधीची निजसमाधी ।


निजशद्ध ु ीसी माझेनि शद्ध
ु ी । यापरी त्रिशद्ध
ु ी अभिमानार्पण ॥ ४०४ ॥
सर्व कारणांचें अनादिकारण मी; समाधीची मळ ू समाधि मी; आत्मशद्ध
ु ीला शद्धि
ु प्राप्त झाली ती माझ्याचमळ
ु े . अभिमानाचें कृ ष्णार्पण
होतें तें वस्ततु ः अशा प्रकारे ४.

मी अजन्मा न जन्मोनि जन्में । मी अकर्मा न करोनि करीं कर्में ।


माझेनि योगें परुु षोत्तमें । पाविजे महिमे उत्तमत्वाचे ॥ ४०५ ॥
मी अजन्मा असतां न जन्मतां जन्म घेतो. मी अकर्मा असनू कर्म न करितां कर्मे करतो. परुु षोत्तमाला उत्तमत्वाचा महिमा माझ्यामळ
ु ेच
प्राप्त झाला आहे ५.

सच्छब्दें माझें अंग । चिच्छब्दें मीचि चांग ।


न होनिया तिन्ही भाग । आनदं निर्व्यंग तोचि मी ॥ ४०६ ॥
'सत'् शब्दानें माझ्याच अंगाचा बोध होतो; 'चित'् शब्दानें तर मीच स्पष्ट आहे; सत,् चित् व आनंद हे तीन भिन्न धर्म न होतां निर्व्यंग
असा जो 'आनंद' तोच मी आहे ६.

माझेनि सर्यू दृष्टी डोळस । मजमाजीं चिदाकाशाचा अवकाश ।


माझेनि अंगें जगन्निवास । सावकाश नांदतु ॥ ४०७ ॥
माझ्यामळ
ु े च सर्या
ू ची दृष्टि डोळस झाली आहे. माझ्यामध्येंच चिदाकाशाचा अवकाश आहे. जगन्निवास हा माझ्यामळ
ु े च जगातं
आनंदानें नांदतो ७.

अजा अजपणें मी अज । निःशेष निर्बीजां मी बीज ।


माझेनि निजांगें निज । निजभोज स्वयें नाचे ॥ ४०८ ॥
मी अज आहे. माझ्या अजत्वानेंच मायेला अजत्व प्राप्त झाले आहे. निःशेष निर्बीज पदार्थाचे बीज मी आहे. माझ्याच स्वरूपानें
आत्मस्वरूप प्रगट होऊन नाचत असते ८.

अधिष्ठाना मजमाजीं अधिवासु । मी जगदीशाचा पर्णू ईशु ।


मी परम परुु षाचाही परुु षु । परे शा परे शु मीच स्वयें ॥ ४०९ ॥
अधिष्ठानाचे वास्तव्य माझ्यामध्येंच आहे. जगदीश्वराचा पर्णू ईश्वर मी आहे. परमपरुु षाचा परुु ष मी आहे, आणि परे शाचा परे शही
स्वतः मीच होय ९.

असतं माझेनि सतं होये । अचित् माझेनि चिदत्व लाहे ।


निजानन्दासीही पाहें । आनंदु निर्वाहे माझेनि ॥ ४१० ॥
असत् वस्तु माझ्या योगानें सत्तावान होतात. अचित् म्हणजे जड वस्तनंू ा माझ्या योगानें सचेतनत्व मिळते. निजानदं ालाही माझ्याच
योगानें आनदं त्व प्राप्त होते ४१०.

मी सकळ सिद्धींची निजसिद्धी । मी सर्वांगदेखणी बद्धु ीची बद्ध


ु ी।
मोक्ष म्हणणें तोही उपाधी । जाण त्रिशद्ध
ु ी माझेनि ॥ ४११ ॥
मीच सर्व सिद्धींची मळू सिद्धि; बद्ध
ु ीची सर्वांगदेखणी बद्धि
ु मीच; मोक्ष म्हणणे ही एक उपाधिच माझ्यामळ
ु ें सिद्ध होते ११.

मी साचार निजधर्म । मजमाजीं ब्रह्म विसरे कर्म ।


ब्रह्मसमाधीचें परब्रह्म । निजनिःसीम मीच मी ॥ ४१२ ॥
खरोखरीचा धर्म तो मी आहे. माझ्यामध्यें ब्रह्म हे कर्म विसरून जाते. ब्रह्मसमाधीची परमावधि असें जें परब्रह्म तें मीच आहे १२.

हरि-हर-ब्रह्मा निजनिर्धारीं । हेही माझे अंशांशधारी ।


मी दशावतारांचा अवतारी । माझी निजथोरी मीही नेणें । ॥ ४१३ ॥
ब्रह्मा, विष्ण,ु महेश्वर हेही खरोखर माझ्या अश ं ाचा अश
ं धारण करणारे आहेत. मीच दशावताराचं ा अवतारी आहे. माझी खरी खरी
थोरवी मलाही कळत नाहीं १३.

ऐशिया नाना विवंचना । अभिमानें भजे भगवद‌भ् जना ।


"ब्रह्माहमस्मि" दृढभावना । आपण आपणा पर्णू त्वें अर्पी ॥ ४१४ ॥
अशा प्रकारे अनेक विचाराच्ं या अभिमानानें तो भगवद‌भ् जन करतो, आणि 'अहं ब्रह्मास्मि' म्हणजे मी ब्रह्म आहे ह्या दृढभावनेनें
आपणच आपल्याला पर्णू त्वानें समर्पण करतो १४.

जीव घालनि ू पर्णु त्वा‍आंतु । जें जें अभिमान कल्पितु ।


तें तें साचचि स्वयें होतु । तेंही पर्णू त्व अर्पितु निजपर्णू त्वीं ॥ ४१५ ॥
पर्णू त्वामध्यें जीव घालनू अभिमान ज्या ज्या कल्पना करतो तें तें खरोखर तो स्वतःच होतो, आणि तें पर्णू त्वही आपल्या मळ
ू च्या
पर्णू त्वांत अर्पण करतो १५.

"ब्रह्माहमस्मि" नसु धें वचन । ये अहतं े नाम भगवद‌भ् जन ।


मा हा तंव तद‌रू ् प हो‍ऊन । भजे अभिमान ब्रह्मार्पणेंसीं ॥ ४१६ ॥
'ब्रह्माहमस्मि' असें जे नसु तें वचन आहे, त्या अहतं ेला भगवद‌भ् जन म्हणतात. मग हा तर तद‌रू
् प होऊन आणि अभिमान ब्रह्मार्पण
करूनच भजन करूं लागतो १६.

साडं ू नि देहबद्धु ीचा के रु । भजनें उठिला अहक ं ारु ।


तो अपरोक्ष निजसाक्षात्कारु । पावनि ू पर्णू निर्धारु पर्णू त्वें वर्ते ॥ ४१७ ॥
देहबद्धु ीचा के र झाडून काढून अशा भजनानें जो अहक ं ार उठतो, तोच अपरोक्ष आत्मस्वरूपसाक्षात्कार होय. असा पर्णू निर्धार पावनू
तो पर्णू त्वानें वागंू लागतो १७.

म्हणौनि मनना मीचि मनन । स्मरणा मीचि नित्य स्मरण ।


चित्तासी मी निजचिंतन । चिंत्यधर्मेंवीण सर्वदा ॥ ४१८ ॥
म्हणनू मननाचे मनन ते मीच, स्मरणाचे नित्यस्मरण मीच; चित्ताला चिंतनधर्मावांचनू आत्मचिंतन होतें तें मीच १८.

ज्याची सहसा प्राप्ति नव्हे । तें निजचित्तेंचि चिंतावें ।


तंव अप्राप्तीची प्राप्ति पावे । चित्त निजानभु वें सहज भजतां ॥ ४१९ ॥
ज्याची सहसा प्राप्ति होत नाही, ते निजचित्तानें चितं ावे; अशा प्रकारे चित्त स्वानभु वानें भजंू लागले असतां अप्राप्त म्हणनू वाटते त्याची
प्राप्ति होते १९.

तेव्हां निश्चितें जें जें चिंती चित्त । तें तें स्वयेंचि होय समस्त ।
या प्रतीतीं चित्त भजत । ब्रह्मार्पणयक्त ु निजबोधें ॥ ४२० ॥
तेव्हां चित्त निश्चयेंकरून जे जे चिंत्तन करू लागते तें तें सारे स्वतः तेंच बनते . ह्या प्रतीतीनें चित्त निजबोधेंकरून यक्त
ु होऊन भजू
लागते ४२०.

नाथिलें चितं ी ते "अतिचितं ा" । आथिलें ते "निश्चितं ता" ।


आथी नाथी साडि ं ली चिंता । सहजें न भजतां भजन होये ॥ ४२१ ॥
नसलेल्याचे चितं न करणे ती 'अतिचितं ा' आणि असलेल्याचे चितं न करणे ती 'निश्चितं ता' होय. पण आहे व नाहीं ह्या दोन्ही भावाचं े
चिंतन सोडून दिले म्हणजे न भजतांही भजन घडते २१.

चित्त चिंत्य आणि चिंतन । यापरी तिहींस जाहलें समाधान ।


तें समाधानही कृ ष्णार्पण । सहजी संपर्णू स्वयें होये ॥ ४२२ ॥
चित्त, चिंत्य आणि चिंतन ह्या तिहींना समाधान (म्ह. त्रिपटु ीचे ऐक्य) झाले असतां, तें समाधानसद्ध
ु ा पर्णू पणे सहज कृ ष्णार्पण होते
२२.

ऐसिया भगवद‌भ् जनविधीं । भजनशील झाली बद्ध ु ी।


तैं सकळ कर्मी ं समाधी । जाण त्रिशद्ध
ु ी स्वयें झाली ॥ ४२३ ॥
अशा भगवद‌भ् जनाच्या विधीनें बद्धि
ु भजनशील झाली म्हणजे सकल कर्मांमध्येंही निश्चयेंकरून आपोआप समाधि प्राप्त होते २३.

कर्माचरणीं समाधी । एक म्हणती न घडे कधीं ।


तें पावले नाहीं निजात्मबोधीं । जाण त्रिशद्ध
ु ी विदेहा ॥ ४२४ ॥
कोणी म्हणतात की, 'कर्माचरणामध्यें समाधि कधीच संभवत नाही.' त्यांना हे जनकराजा ! आत्मस्वरूपाचा बोध झालाच नाहीं असें
तू खचित समज २४.

ताटस्थ्या नावं समाधी । म्हणेल त्याची ठकली बद्धु ी।


ते समाधी नव्हे त्रिशद्ध
ु ी । जाणावी नसु धी मर्छा
ू आली ॥ ४२५ ॥
जो तटस्थपणाला 'समाधि' हे नांव देतो, त्याची बद्धिु चकली म्हणावी; कारण ती खरोखरीची समाधि नसनू के वळ 'मर्छा
ू ' आहे असे
समजावें २५.

ताटस्थ्यापासनि
ू उठिला । तैं तो समाधीस मक
ु ला ।
तेव्हां एकदेशी भावो आला । मंदही या बोला न मानिती सत्य ॥ ४२६ ॥
तटस्थपणापासनू उठला म्हणजे जागा झाला, की तो समाधीला मक ु ला. अर्थात् हा एकदेशी भाव झाला. मतिमदं लोक देखील हे
भाषण खरे मानणार नाहींत २६.

समाधी आणि एकदेशी । बोलतां बोलणें ये लाजेसी ।


सत्य मानी ते शब्दपिशी । शद्ध
ु स्वरूपासी अनोळख ॥ ४२७ ॥
समाधि आणि ती एकदेशी, हे बोलणेसद्ध ु ा लजास्पद आहे. असे असतांही ते जे खरें मानतील, ते के वळ शब्दपांडित्य करणारे , त्यांना
शद्ध
ु स्वरूपाची ओळख नाहीं असे समजावें २७.

येथें प्राचीन अतिसमर्थ । तें मर्च्छा


ू आणोनि करी तटस्थ ।
वांचनिू चालते बोलते समाधिस्थ । जाण पां निश्चित वसिष्ठादिक ॥ ४२८ ॥
येथे प्राचीन म्हणजे प्रारब्ध अति समर्थ असल्यामळ
ु ें ते मर्छा
ू आणनू निचेष्ट करते . खरोखर पाहिले असतां चालते बोलते समाधिस्थ
वसिष्ठादिकच होत २८.

पाहें पां देवर्षि नारदु । विनोदें न मोडे समाधिबोधु ।


याज्ञवल्क्याचा समाधिसंबंधु । ऋषिप्रसिद्धु परिक्षा के ली ॥ ४२९ ॥
देवर्षि नारदच पाहा. त्याच्या विनोदकर्मानेंही समाधीचा कधीच भंग होत नाही; (तो निरंतर चालता-बोलतांना व फिरतां-
सवरतांनासद्ध ु ा समाधिस्थितींतच असतो) याज्ञवल्क्याच्या समाधीसंबंधाची तर प्रसिद्ध ऋषींनी परीक्षासद्ध
ु ा पाहिली आहे २९.

स्वरूप देखोनि मर्च्छि


ू त जाहला । तो आपणियां आपण तरला ।
स्वयें तरूनि जन उद्धरिला । तो बोधु प्रकाशिला शक
ु वामदेवीं ॥ ४३० ॥
स्वरूप पाहून मर्छि
ू त होतो तो आपला आपण मात्र तरतो; परंतु स्वतः तरून दसु ऱ्यासही तारणारे असे ज्ञान शक
ु वामदेवादिकांनीच
प्रकट के ले आहे ४३०.

यालागीं समाधि आणि व्यत्ु थान । या दोनी अवस्थासं हित जाण ।


बद्ध
ु ी होये ब्रह्मार्पण । अखंडत्वें पर्णू परमसमाधि ॥ ४३१ ॥
ह्याकरितां समाधि आणि व्यत्ु थान ह्या दोन्ही अवस्थासं हवर्तमान बद्धि
ु ब्रह्मार्पण होते, तीच अखडं व परिपर्णू समाधि होय ३१.

अर्जुना दे‍ऊनि निजसमाधी । सवेंचि घातला महायद्ध ु ीं ।


परी तो कृ ष्ण कृ पानिधी । ताटस्थ्य त्रिशद्ध
ु ी नेदीच स्पर्शों ॥ ४३२ ॥
श्रीकृ ष्णानें आत्मसमाधि देऊन लागलेंच घोर यद्ध ु ांत ढकललें. परंतु त्या करुणानिधि कृ ष्णानें त्याला तटस्थपणाचा स्पर्शसद्ध
ु ा होऊ
दिला नाहीं ३२.

सकळ कर्मी ं समाधी । हे सद‌ग् रुु चि बोधी बद्ध


ु ी।
तरी बद्ध
ु ींही त्रिशद्ध
ु ी । निजसमाधी न मोडे ॥ ४३३ ॥
सर्व प्रकारच्या कर्मामध्येंही समाधि असावी हें ज्ञान, बद्ध
ु ीला एक सद्गरुु च देतात; म्हणनू खरोखर यद्ध
ु ासारख्या 'घोर' कर्मांतसद्ध
ु ां
आत्मसमाधीचा भंग होत नाहीं ३३.

बद्ध
ु ीं आकळलें परब्रह्म । तैं अहैतक ु चाले कर्म ।
हेंचि बद्ध ु ीचें अर्पण परम । इतर तो भ्रम अनमु ानज्ञान ॥ ४३४ ॥
बद्धु ीनें परब्रह्माचे आकलन के लें म्हणजे कोणतेंही कर्म आहेतक ु च चालते; हेंच बद्ध
ु ीचे खरे खरु े अर्पण आहे. इतर जें आनमु ानिक
ज्ञान, तो भ्रम होय ३४.

स्वरूपीं दृष्टी निवधी । अनवच्छिन्न समानबद्ध


ु ी।
कर्माकर्मी ं अज्ञान न बाधी । "परमसमाधी" तिये नांव ॥ ४३५ ॥
स्वरूपातं पराकाष्ठेची तन्मय दृष्टि व कधीं न तटु णारी अशी सर्वत्र समबद्धि
ु ज्याची असते, त्याला कर्माकार्मांतही अज्ञानाची बाधा
होत नाही. अशा स्थितीचेच नांव 'परमसमाधि' होय ३५.

निःशेष गेलिया देहबद्ध ु ी । स्वरूपपणें फंु ज न बाधी ।


कर्माकर्मी ं अज्ञान न बाधी । ते 'परमसमाधी' निर्दुष्ट ॥ ४३६ ॥
देहबद्धि
ु निखालस गेली म्हणजे स्वस्वरूपानभु वानें अहक ं ाराची बाधा होत नाही. आणि कर्माकर्मांमध्यें अज्ञानाची बाधा होत नाही,
हीच निर्दोष 'परमसमाधि' होय ३६.

ते स्वरूपीं निरवधी । भजनशीळ झाली बद्ध ु ी।


ते सकळ कर्मी ं समाधी । निजार्पणविधी स्वयें जाहली ॥ ४३७ ॥
सदासर्वकाळ स्वस्वरूपामध्यें बद्धि
ु भजनशील झाली म्हणजे ती कोणत्याही कर्मामध्यें आपण स्वतःच श्रीकृ ष्णार्पण होते ३७.

जेथें शमली मनाची आधी । ते जाणावी 'परमसमाधी' ।


समाधी घेणें ते देहबद्ध
ु ी । काष्ठ तें त्रिशद्ध
ु ी मर्च्छि
ू तप्राय ॥ ४३८ ॥
मनाची आधि म्हणजे तळमळ अगदी शांत होणे तिचेच नांव 'परमसमाधि'. देहबद्धि ु न सोडतां प्राणवायु कोंडून समाधि लावणे ती
लाकडासारखी जड म्हणजे मर्छा ू वस्थेप्रमाणेंच स्थिति होय असें खास समजावे ३८.

मनासी ठा‍उकें नसे । इद्रिं यीं व्यापारु तरी दिसे ।


कर्म निपजे जें ऐसें । तें जाणिजे आपैसें 'कायिक' ॥ ४३९ ॥
(आता 'कायिक ' कर्माचे लक्षण सांगतात) मनास तर जाणीव नाही, पण इद्रि ं यांचा व्यापार तर चाललेला दिसतो. अशा प्रकारें जें जें
कर्म निपजत असते, ते सहजच 'कायिक' म्हणजे नसु तें देहाचे कर्म असें जाणावें ३९.

श्वासोच्छ्वासांचे परिचार । कां निमेषोन्मेषांचे व्यापार ।


तेही नारायणपर । के ले साचार निजस्वभावें ॥ ४४० ॥
श्वासोच्छ्‍वासाचं े चलन किंवा डोळ्याचं ी उघडझाप करणें हेंही खरोखर त्यानें नारायणपरच के लेले असते ४४०.

तरी देहगेहवर्णाश्रमें । स्वभागा आलीं जीं जीं कर्में ।


तीं तीं आचरोनि निजधर्में । पर्वा
ू नक्र
ु में अनहकं ृ ती ॥ ४४१ ॥
घरदार, शरीर व वर्णाश्रमधर्म याच्ं यायोगे आपल्या वाट्यास जी जी कर्में आलेली असतात, तीं तीं तो कर्तव्यबद्ध
ु ीनें पर्वी

सांगितल्याप्रमाणें अभिमानरहित होऊन करीत असतो ४१.

साखरे चें कारलें प्रौढ । तें देठू-कांटेनशीं सर्वही गोड ।


तेवीं इद्रि
ं यकर्मगढू । स्वादिष्ठ सदृढ ब्रह्मार्पणें ब्रह्मीं ॥ ४४२ ॥
साखरे चे मोठे थोरलें कारले के लें, तरी त्याचा देंठ व काटं ेसद्ध
ु ा जसे गोडच असतात; त्याप्रमाणें सारे इद्रि
ं याचं े कर्म ब्रह्मार्पणाच्या
योगानें ब्रह्मामध्यें गोडच गोड अर्थात् ब्रह्मरूपच होऊन जातें ४२.

कर्मकलापु आघवा । आचरोनि आणि गौरवा ।


परी कर्तेपणाचिया गांवा । अहभं ावो स्पर्शेना ॥ ४४३ ॥
तो एकंदर कर्मसमहू यथास्थित आचरून त्याचा गौरव करतो, पण कर्तेपणाच्या अभिमानाच्या गांवांत पाऊलसद्ध
ु ां ठे वीत नाहीं ४३.

मजपासनू झालें सत्कर्म । माझा आचार अति उत्तम ।


म्यां निरसिलें मरणजन्म । हा स्वभावें देहधर्म उठोंचि नेणे ॥ ४४४ ॥
माझ्याकडून सत्कर्म घडले; माझे आचरण अत्यंत उत्तम ; जन्ममरणाचे मी निरसन के लें; हा स्वाभाविक देहधर्म त्याच्यामध्यें कधी
उठतच नाहीं ४४.

देहसंगें तरी वर्तणें । परी देहधर्म धरूं नेणे ।


देहस्वभाव लक्षणें । ब्रह्मार्पणें विचरिती ॥ ४४५ ॥
देहसंगानें तर वागत असतो, पण देहधर्म मात्र धरीत नसतो. त्याची सारी देहस्वभावाची लक्षणें ब्रह्मार्पणानेंच चालत असतात ४५.

देहधर्माचा नठु े फांटा । ज्ञानगर्वाचा न चढेचि ताठा ।


यालागीं सहज भजनामाजिवटा । झाला तो पैठां अनहक ं ृ ती ॥ ४४६ ॥
देहधर्माचा अंकुर त्याच्यांत उठत नाही, ज्ञानगर्वाचा ताठा त्याला चढत नाहीं, यामळ
ु ें सहजभजनामध्यें तो अनहक
ं ृ तीनेंच नेहमी
वावरत असतो ४६,

त्यापासनि
ू जें जें निपजे । तें तें देवो म्हणे माझें खाजें ।
यालागीं ब्रह्मार्पणवोजें । त्याचे स्वभाव सहजें नार्पितां अर्पिती ॥ ४४७ ॥
त्याच्यापासनू जें जें कांही उत्पन्न होतें, तें तें सारे माझे गोड खाद्य आहे असे देव म्हणतो. या प्रकारें ब्रह्मार्पणत्वामळ
ु ें तशा भक्ताचे सारे
स्वभाव अर्पण न करितां सहजच अर्पण होत असतात ४७.

परिसाचे कसवटीवर्‍हें । जें जें लागे तें तें साडेपंधरें ।


तेवीं निपजे जें जें शरीरें । तें तें खरें परब्रह्म ॥ ४४८ ॥
परिसाच्या कसोटीवर जें हें लोखडं लागते, तें तें सारे साडेपधं राच्या दराचे म्हणजे अतीव शद्ध
ु बावनकशी सोनेंच बनते, त्याप्रमाणें
त्याच्या शरीराकडून जें जें कर्म घडतें, तें तें खरे खरु े परब्रह्म असते ४८.

त्याचा खेळु तेंचि महापजू न । त्याची बडबड तेंचि प्रिय स्तवन ।


त्याचे स्वभावीं स्वानदं पर्णू । श्रीनारायण सख
ु ावे ॥ ४४९ ॥
त्याचा खेळ तेंच महापजू न; त्याची बडबड तेंच महास्तवन; याप्रमाणें त्याच्या स्वाभाविक कर्मानें स्वानदं पर्णू श्रीनारायण सख
ु ी होतो
४९.

तो जे‍उती वास पाहे । आवडीं देवो ते‍उता राहे ।


मग पाहे अथवा न पाहे । तरी देवोचि स्वयें स्वभावें दिसे ॥ ४५० ॥
तो ज्या वाटेकडे पाहतो, त्या वाटेकडे देव आनंदानें उभा राहतो; मग त्यानें पाहिले किंवा न पाहिले तरी, त्याला स्वाभाविकपणे देवच
दिसतो ४५०.

तयासी चालतां मार्गें । तो मार्गु हो‍इजे श्रीरंगें ।


तो देवाचिया दोंदावरी वेगें । चाले सर्वांगें डुल्लत ॥ ४५१ ॥
तो ज्या मार्गानें चालतो, तो मार्गच श्रीरंग आपण होतो, अर्थात तो देवाच्या पोटावरूनच खश
ु ाल सर्वांगांनी डुलत चालतो ५१.

जें जें कर्म स्वाभाविक । तें तें ब्रह्मार्पण अहेतक


ु ।
या नावं भजन निर्दोख । 'भागवतधर्म' देख या नावं ॥ ४५२ ॥
त्याजकडून स्वाभाविकपणे जें जें कर्म घडतें, तें तें अहेतक
ु पणे ब्रह्मार्पणच होतें; ह्यांचेंच नांव निर्दोष 'भजन' व याचेंच नांव शद्ध

'भागवत' धर्म ५२.

स्वाभाविक जे वर्तन । तें सहजें होय ब्रह्मार्पण ।


या नांव शद्ध
ु आराधन । भागवतधर्म पर्णू जाण राया ॥ ४५३ ॥
स्वाभाविक जें वर्तन होत असते, तें साहजिक ब्रह्मापर्णच होते; ह्याचेच नांव शद्ध
ु 'आराधन.' हे जनक राजा ! पर्णू 'भागवतधर्म'
म्हणतात तो हाच असे समज ५३.

यापरी भगवद‌भ् जनपथा । भय नाहीं गा सर्वथा ।


'अभय' पशि ु लें नृपनाथा । तें जाण तत्त्वतां भजनें होय ॥ ४५४ ॥
अरे ! अशा प्रकारच्या भगवद‌भ् जनमार्गाला कधींच कशाचें भय नाही. हे नृपनाया ! तंू 'अभय ' म्हणनू विचारलेंस, तें या भजनानेंच
निश्चयानें प्राप्त होते ५४.

येथें भयाचें कारण । राया तंू म्हणशील कोण ।


तेंही सागं ों सावधान । ऐक श्रवणसौभाग्यनिधी ॥ ४५५ ॥
राजा ! ह्यांत भयाचे कारण कोणते, असे जर तंू विचारशील तर तेही सांग.ू हे श्रवणसौभाग्यनिधे ! सावधान मनानें श्रवण कर ५५.

भयं द्वितीयाभिनिवेशतः स्यात्


ईशादपेतस्य विपर्ययोऽस्मृतिः ।
तन्माययातो बधु आभजेत्तं
भक्त्यैकयेशं गरुु देवतात्मा ॥ ३७ ॥
श्लोक ३७- जो ईश्वराला विन्मख ु झाला, त्याला त्याच्या मायेमळ
ु े आपल्या स्वरूपाची विस्मृती होते आणि त्यामळु े देह म्हणजेच मी
असा त्याला भ्रम होतो या आत्म्याखेरीज दसु रे काही मानण्यामळ ु े भय उत्पन्न होते म्हणनू गरू
ु ं नाच आपले आराध्यदैवत माननू
अनन्य भक्तीने त्या ईश्वराचे भजन करावे. (३७)

आतां पर्णू त्वें सर्वत्र एक । तेथ जो म्हणे मी वेगळा देख ।


तेंचि अज्ञान भयजनक । दःु खदायक अतिद्वद्वं ें ॥ ४५६ ॥
आत्मा पर्णू त्वेंकरून सर्वत्र एकच आहे, तथापि 'त्याच्याहून मी भिन्न आहे' असे म्हणणे सेंच भयजनक अज्ञान आहे. त्यांत द्वद्वं
म्हणजे भेदभाव उत्पन्न होत असल्यामळ ु ें ते अत्यंत दःु खदायक होते ५६.

भयाचें मळू दृढ अज्ञान । त्याचें निवर्तक मख्ु य ज्ञान ।


तेथ कां लागलें भगवद‌भ् जन । ऐसा ज्ञानाभिमान पडि ं तां ॥ ४५७ ॥
दृढ अज्ञान हेंच जर भयाचे मळ ू आहे आणि ज्ञान हेंच मख्ु यतः त्या अज्ञानाचे निवर्तक आहे, तर मग तेथे भगवद‌भ् जन कुठून लागले ?
असा पडिं त लोकानं ा ज्ञानाभिमान असतो ५७.

ऐक राया येचि अर्थी । ज्ञानासी कारण मख्ु य भक्ती ।


हा कृ तनिश्चयो आमच्ु या मतीं । तेही उपपत्ती अवधारीं ॥ ४५८ ॥
याकरितां राजा ! तल
ु ा सागं तों ऐक. ज्ञानाला मख्ु य कारण भक्ति आहे, असा आमचा ठाम सिद्धान्त आहे. त्याचेही कारण ऐक ५८.

अज्ञानाचें मळ
ू माया । जे ब्रह्मादिकां न ये आया ।
गणु मयी लागली प्राणियां । जाण ते राया अति दस्ु तर ॥ ४५९ ॥
जी ब्रह्मादिकानं ाहीं आवरत नाहीं ती माया हेंच अज्ञानाचे मळ
ू आहे. ती त्रिगणु ात्मक असनू प्राण्याच्ं या मागे लागलेली आहे, आणि
ती अत्यंत दस्ु तर आहे असे तंू समज ५९.

त्या मायेचें मख्ु य लक्षण । स्वस्वरूपाचें आवरण ।


द्वैताचं ें जें स्फुरे स्फुरण । "मळ
ू माया" जाण तिचें नावं ॥ ४६० ॥
स्वस्वरूप झाकून टाकणे, हेंच त्या मायेचे मख्ु य लक्षण आहे. द्वैताचे स्फुरण होणे यालाच 'मळ
ू माया' हें नांव आहे ४६०

ब्रह्म अद्वयत्वें परिपर्णू । ते स्वरूपी स्फुरे जें मीपण ।


तेंचि मायेचें जन्मस्थान । निश्चयें जाण नृपनाथा ॥ ४६१ ॥
ब्रह्म हे अद्वैतपणानें परिपर्णू आहे, हे राजा ! त्या अद्वैतस्वरूपामध्यें 'मीपण' म्हणनू जें उत्पन्न होते, तेच खरोखर मायेचे जन्मस्थान
असें तंू जाण ६१.
ते मायेच्या निजपोटीं । भयशोकदःु खाचि ं या कोटी ।
ब्रह्माशिवादींचे लागे पाठी । इतरांची गोठी ते कोण ॥ ४६२ ॥
त्या मायेच्या पोटामध्यें भय, शोक, आणि दःु खांच्या राशीच्या राशी भरलेल्या आहेत. ती ब्रह्मदेव व शंकर अशा सारख्यांच्यासद्ध
ु ा
पाठीस लागते, मग इतराचं ी काय कथा ? ६२.

ते माहामायेची निवृत्ती । करावया दाटुगी भगवद‌भ् क्ती ।


स्वयें श्रीकृ ष्ण येचि अर्थी ं । बोलिला अर्जुनाप्रती गीतेमाजीं ॥ ४६३ ॥
त्या महामायेची निवृत्ति करावयाला एक भगवद‌भ् क्तिच समर्थ आहे. गीतेमध्ये प्रत्यक्ष श्रीकृ ष्णानं ी अर्जुनाला असेच सागि
ं तले आहे
६३.

" मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते " भ. गीता-७.१४


श्लोक - जे लोक मलाच शरण येतात, ते या मायेला तरून जातात. गीता-७.१४

माया म्हणिजे भगवच्छक्ती । भगवद‌भ् जनें तिची निवृत्ती ।


आन उपाय तेथें न चलती । भक्त सख ु ें तरती हरिमाया ॥ ४६४ ॥
भगवद‌ग् ीतेचें तें वचन - "मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते" (ह्याचा अर्थ) माया म्हणजे भगवतं ाची शक्ति होय; तिची निवृत्ति
करावयाला भगवद‌भ् जनच पाहिजे; त्या ठिकाणी अन्य उपाय चालावयाचे नाहीत. भगवंताचे भक्त असतात तेच हरीची माया सख ु ाने
तरून जातात ६४

हरीची माया हरिभजनें । हरिभक्तीं सखु ेंचि तरणें ।


हें निजगह्य
ु अर्जुनाचेनि कारणें । स्वयें श्रीकृ ष्णें सांगितलें ॥ ४६५ ॥
हरीचे भक्त हरिभजनानेंच हरीची माया सख ु ानें तरून जातात, हे आपल्या अंत:करणांतील गप्तु स्वतः श्रीकृ ष्णांनी अर्जुनास प्रकट के ले
६५,

मायेचि हेचि निजपष्टु ी । स्वरूपीं विमख ु करी दृष्टी ।


द्वैतभावें अत्यंत लाठी । भ्रमाची त्रिपटु ी वाढवी सदा ॥ ४६६ ॥
मायेच्या अगं चा हाच गणु मोठा आहे की, ती जीवाची दृष्टि स्वरूपापासनू विन्मख ु करते, आणि द्वैतभावाने बलाढ्य होऊन
सदासर्वकाल भ्रमाची त्रिपटु ी (दृश्य, दर्शन, द्रष्टा अशी भावना) वाढवीत असते ६६.

भयाचें जनक द्वैतभान । द्वैतजनक माया जाण ।


मायानिवर्तक ब्रह्मज्ञान । हें संत सज्ञान बोलती ॥ ४६७ ॥
द्वैताचें भान हें भयाचें जनक व माया ही द्वैताची जनक असें तंू जाण. अशा त्या मायेचे निवर्तक ब्रह्मज्ञान होय, असें ज्ञानसंपन्न
साधसु ंत सांगतात ६७.
ऐसें श्रेष्ठ जें ब्रह्मज्ञान । तें भक्तीचें पोसणें जाण ।
न करितां भगवद‌भ् जन । ब्रह्मज्ञान कदा नपु जे ॥ ४६८ ॥
पण असें श्रेष्ठ जें ब्रह्मज्ञान, ते भक्तीचे पोसकें मल ू आहे, हें लक्षात ठे व. भगवद‌भ् जन के लें नाहीं तर ब्रह्मज्ञान कधीही प्राप्त व्हावयाचे
नाहीं ६८.

जरी जाहले वेदशास्त्रसंपन्न । तिहीं न करितां भगवद‌भ् जन ।


मायानिवर्तक ब्रह्मज्ञान । तयांसीही जाण कदा नपु जे ॥ ४६९ ॥
वेदशास्त्रसपं न्न असले, आणि त्यानं ी जर भगवद‌भ् जन के लें नाही, तर मायेला परावृत्त करणारें ब्रह्मज्ञान त्यानं ाही कधींच प्राप्त
व्हावयाचें नाहीं ६९.

शब्दज्ञानाची व्यत्ु पत्ती । दाटुगी होय लौकिक स्थिती ।


मायानिवर्तक ज्ञानप्राप्ती । न करितां हरिभक्ती कदा नपु जे ॥ ४७० ॥
शब्दज्ञानाची व्यत्ु पत्ति ही लौकिक वाढवावयाला समर्थ होईल, पण मायेची निवृत्ति करणारे ज्ञान मात्र हरिभक्तीशिवाय कधींही प्राप्त
व्हावयाचे नाही ४७०.

हरिगणु ाचं ी रसाळ कहाणी । ते ब्रह्मज्ञानाची निजजननी ।


हरिनामाचेनि गर्जनीं । जीव घे‍ऊनि माया पळे ॥ ४७१ ॥
हरिगणु ांची रसाळ कथा, तीच ब्रह्मज्ञानाची खरी जननी होय. हरिनामाचा गजर ऐकला की, माया ही जीव घेऊन पळते ७१.

माया पळतां पळों न लाहे । हरिनामधाकें विरोनि जाये ।


यालागीं हरिमाया पाहें । बाधंू न लाहे हरिभक्तां ॥ ४७२ ॥
पण माया पळू लागली तरी तिला पळतां येत नाही. कारण, हरिनामाच्या धाकानें ती जेथल्या तेथे विरूनच जाते. ह्याकरितां हरीची
माया ही हरिभक्तानं ा बाधंू शकत नाहीं ७२.

नामाची परम दर्धु र गती । माया साहों न शके निजभक्ती ।


हरिभक्त माया सख ु ें तरती । यालागीं श्रीपती बोलिला स्वयें ॥ ४७३ ॥
हरिनामाची शक्ति काहं ी विलक्षण आहे; तिच्यापढु ें मायेचा जोर चालत नाही; म्हणनू हरिभक्त आहेत ते सख
ु ाने मायेला तरून जातात,
असे प्रत्यक्ष श्रीपतींनी सांगितलें आहे ७३.

सायज्ु याच्या चारी मक्त


ु ी । अंकीं वाढवी भगवद‌भ् क्ती ।
ते न करितां अनन्यगती । शास्त्रज्ञां मक्त
ु ी न घडे कदा ॥ ४७४ ॥
सलोकता, समीपता, सरूपता व सायज्ु यता या चारही मक्त ु ींना भगवद‌भ् क्ति आपल्या मांडीवर वाढविते. अशी भक्ति जर
अनन्यभावानें के ली नाही, तर शास्त्रज्ञ लोकांना मक्ति
ु कधींही मिळावयाची नाहीं ७४.
हरिभजनीं जे विमख ु । त्यासं ी सदा द्वैत सन्मख
ु ।
महाभयेंसीं दःु खदायक । प्रपंचु देख दृढ वाढे ॥ ४७५ ॥
हरिभजनाला जे विमख ु होतात, त्यांच्यापढु े द्वैत सदासर्वकाल उभे असते. त्यांच्या ठिकाणी महाभयासह दःु खदायक प्रपंच दृढत्वानें
वाढतच राहतो ७५,

जेवीं एका‍एकीं दिग्भ्रमु पडे । तो पर्णू म्हणे पश्चिमेकडे ।


तैसी वस्तवि ु मख
ु ें वाढे । अतिगाढें मिथ्या द्वैत ॥ ४७६ ॥
ज्याप्रमाणें एकाएकी दिशाभल ू झालेला मनष्ु य पश्चिमेकडेच पर्वू आहे असे म्हणतो, त्याप्रमाणें परब्रह्माशी विमख
ु झाले म्हणजे
मिथ्याद्वैत माजनू राहते ७६.

द्वैताचिये भेदविहिरे । सटु ती संकल्पविकल्पांचे झरे ।


तेथ जन्ममरणाचं ेनि परू ें । बडु े एकसरे ब्रह्माडं गोळ ॥ ४७७ ॥
द्वैताच्या भेदरूप विहिरीतनू संकल्पविकल्पांचे झरे सटु तात आणि जन्ममरणांचा परू येऊन त्यांत सरसहा ब्रह्मांडगोळ बडु ू न जातो ७७.

जन्ममरणांचिया वोढी । नाना दःु खांचिया कोडी ।


अभक्त सोशिती साक ं डीं । हरिभक्तातं ें वोढी स्वप्नींही न लगे ॥ ४७८ ॥
जन्ममरणाच्या ओढींनी नाना प्रकारच्या दःु खांच्या राशी व परोपरीची संकटें अभक्त लोकच सोशीत असतात. तशी ओढ हरिभक्तांना
स्वप्नांतसद्ध
ु ा लागत नाहीं ७८.

भक्तीचें अगाध महिमान । तेथें रिघेना भवबंधन ।


तें करावया भगवद‌भ् जन । सद‌ग् रुु चरण सेवावे ॥ ४७९ ॥
भक्तीचा महिमा अगाध आहे. तिच्यांत संसारबंधन शिरत नाही. असें तें भगवद‌भ् जन साधण्यासाठी सद्गरुु चरणाची सेवा करावी लागते
७९.

निजशिष्याची मरणचितं ा । स्वयें निवारी जो वस्ततु ां ।


तोचि सद‌ग् रुु तत्त्वतां । येर ते गरुु ता मत्रं तंत्रोपदेशें ॥ ४८० ॥
आपल्या शिष्याच्या मरणाची चितं ा जो तत्त्वतः निवारण करतो, तोच खरा सद्गरुु होय. त्याशिवाय इतर प्रकारचा गरुु पणा, तो के वळ
मंत्रतत्रं ोपदेशापरु ताच समजावा. ४८०.

मंत्रतत्रं उपदेशिते । घरोघरीं गरुु आहेत आ‍इते ।


जो शिष्यासी मेळवी सद्वस्ततू ें । सद‌ग् रुु त्यांते श्रीकृ ष्ण मानी ॥ ४८१ ॥
मंत्रतत्रं ांचा उपदेश करणारे गरुु घरोघर आयते असतात; पण शिष्याला जो सद‌व् स्तप्रू त पोचवितो, त्यालाच श्रीकृ ष्ण हे सद्गरुु मानतात.
८१.
गरुु देवो गरुु माता पिता । गरुु आत्मा ईश्वर वस्ततु ां ।
गरुु परमात्मा सर्वथा । गरुु तत्त्वतां परब्रह्म ॥ ४८२ ॥
गरुु च देव, गरुु च मातापिता, गरुु च आत्मा व ईश्वरही तोच. गरुु हा सर्वथैव परमात्माच आहे. तात्विक दृष्टीनें पाहिले असतां गरुु हा
परब्रह्मच आहे ८२.

गरू
ु चे उपमेसमान । पाहतां जगीं न दिसे आन ।
अगाध गरू ु चे महिमान । तो भाग्येंवीण भेटेना ॥ ४८३ ॥
गरूु च्या उपमेला शोभेसें जगातं पाहावयास गेले असतां दसु रे काहं ीच मिळणार नाही. गरू
ु चा महिमा अगाध आहे. भाग्याशिवाय
त्याची भेट व्हावयाची नाहीं ८३.

निष्काम पण्ु याचिया कोडी । अगाध वैराग्य जोडे जोडी ।


नित्यानित्यविवेकआवडी । तैं पाविजे रोकडी सद‌ग् रुु कृ पा ॥ ४८४ ॥
निष्काम पण्ु याच्या राशी व निस्सीम वैराग्याची जोड पदरी असावी, तशीच नित्यानित्यविवेकाची आवडही उत्पन्न व्हावी, तेव्हांच
सद्गरुु कृ पा साक्षात् हातास चढते ८४.

सद‌ग् रुु कृ पा हातीं चढे । तेथें भक्तीचें भाडं ार उघडे ।


तेव्हां कळिकाळ पळे पढु ें । कायसें बापडु ें भवभय ॥ ४८५ ॥
सद्गरुु कृ पा हातास चढली की, भक्तीचे भांडार उघडते. तेव्हां तिच्यापढु े कलिकालसद्ध
ु ा पळत सटु तो, तेथें भवभय ते बिचारे काय
करणार ? ८५.

गरू
ु तें म्हणो मातापिता । ते एकजन्मीं सर्वथा ।
हा सनातन तत्त्वतां । जाण पा वस्ततु ां मायबापु ॥ ४८६ ॥
गरू
ु ला मायबाप म्हणावे तर ती बिचारी एकाच जन्मापरु ती असतात; पण गरुु हा खरोखर जन्मोजन्मींचा मायबाप असतो ८६.

अधोद्वारें उपजविता । ते लौकिकीं मातापिता ।


अधोद्वारा आतळों नेदिता । तो सद‌ग् रुु पिता सत्यत्वें शिष्यां ॥ ४८७ ॥
अधोद्वारापासनू जन्म देणारे ते लौकिक मातापिता होत, पण अधोद्वाराचा स्पर्श न होऊ देणारा म्हणजे गर्भवास चक
ु विणारा जो सद्गरुु
तोच शिष्याचा खरा मायबाप होय ८७.

गरू
ु तें म्हणों कुळदेवता । तिची कुळकर्मीचं पज्ू यता ।
हा सर्व कामीं अकर्ता । पज्ू य सर्वथा सर्वार्थी ं ॥ ४८८ ॥
गरू
ु ला कुलदेवता म्हणावे तर तिची पज्ू यता फक्त कुलधर्माच्या कर्मामध्येंच असते; पण गरुु हा सर्व कर्मांमध्यें अकर्ता असल्यानें
सदासर्वकाल आणि सर्वोपरीच पज्ू य आहे ८८.
गरुु म्हणो देवासमान । तवं देवासं ी याचेनि देवपण ।
मग त्या सद‌ग् रू
ु समान । देवही जाण तक ु े ना ॥ ४८९ ॥
गरू
ु ला देवासमान म्हणावे तर, देवाला देवपण येते ते ह्याच्यामळ
ु ें च येते; म्हणनू देवाचीही सद्गरू
ु शी तल
ु ना होत नाही. हे लक्षात ठे व
८९.

गरुु ब्रह्म दोनी समान । हेही उपमा किंचित न्यनू ।


गरुु वाक्ये ब्रह्मा ब्रह्मपण । तें सद‌ग् रुु समान अद्वयत्वें ॥ ४९० ॥
गरुु आणि ब्रह्म ही दोन्हीं समान असे म्हणावें , तरी ही उपमाही किंचित् गौणच. कारण, ब्रह्माला ब्रह्मपण गरुु वाक्यानेंच येत असते.
अद्वयत्वेंकरून मात्र ते सद‌ग् रू ु शी समान होईल ४९०.

यालागी अगाध गरुु गरिमा । उपमा नाहीं निरुपमा ।


ब्रह्मीं-ब्रह्मत्व-प्रमाण-प्रमा । हे वाक्यमहिमा गरू
ु ची ॥ ४९१ ॥
ह्याकरितां गरू ु ची थोरवी अगाध आहे. तिला उपमा नाही. ती निरुपम आहे. ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मत्व-प्रमाण-प्रमा-प्रमेय इत्यादि
वाक्यमहिमा गरू ु ची आहे ९१.

ब्रह्म सर्वांचे प्रकाशक । सद‌ग् रुु तयाचाही प्रकाशक ।


एवं गरू ु हूनि अधिक । नाहीं आणिक पज्ू यत्वें ॥ ४९२ ॥
ब्रह्म हे सर्वांचे प्रकाशक आहे, पण सद्गरुु त्याचाही प्रकाशक आहे. म्हणनू गरू
ु हून अधिक पज्ू य असें दसु रे कोणीच नाहीं ९२.

यालागीं गरूु तें मनष्ु यबद्ध


ु ीं । पाहों नये गा त्रिशद्ध
ु ी।
ऐशिये भावार्थबद्ध ु ी । सहजें चित्तशद्ध ु ी सच्छिष्यां ॥ ४९३ ॥
ह्याकरितां हे राजा ! गरू ु ला खरोखर मनष्ु यभावनेनें कधीही पाहूं नये. अशा भावार्थबद्ध
ु ीनें राहिले तर सच्छिष्याची सहजच चित्तशद्धि

होते ९३.

ज्याचं ा गरुु चरणीं निःसीम भावो । त्याचं ा मनोरथ परु वी देवो ।


गरुु ‍आज्ञा देवो पाळी पहा हो । गरुु वाक्यें स्वयमेवो जड मढू तारी ॥ ४९४ ॥
गरुु चरणावं र ज्याचं ी निस्सीम भक्ति असते, त्याचं े मनोरथ देव पर्णू करतो. कारण गरू
ु ची आज्ञा देवसद्ध
ु ा पाळतो. गरू
ु च्या वाक्यानें देव
जडमढू ांचाही उद्धार करतो ९४.

ब्रह्मभावें जे गरुु सेवक । देवो त्यांचा आज्ञाधारक ।


त्यांसी नित्य परु वी निजात्मसख ु । हे गरुु मर्यादा देख नल्ु लंघु ी देवो ॥ ४९५ ॥
ब्रह्मभावनेनें जे गरू ु ची सेवा करितात, त्यांचा देवही आज्ञाधारक होतो. त्यांना तो निजस्वरूपाचे सख
ु सदासर्वदा परु वितो. अशी ही
गरुु मर्यादा देवही उल्लंघन करीत नाहीत ९५.
देवो गरुु ‍आज्ञा स्वयें मानी । तवं गरुु देवासी पज्ू यत्व आणी ।
एवं उभयतां अभिन्नपणीं । भावार्थियांलागोनी तारक ॥ ४९६ ॥
गरू
ु ची आज्ञा स्वतः देव मानतो व गरू ु ही देवाला थोरपणास चढवितो. म्हणनू ते उभयतांही अभिन्नभावानें भावार्थी लोकांना तारक
होतात ९६.

सद‌भ् ावो नाहीं अभ्यंतरीं । बाह्य भक्ति भावेंचि करी ।


ते भावानसु ारें संसारीं । नानापरी स्वयें ठकती ॥ ४९७ ॥
अतं ःकरणातं सद‌भ् ाव नसतां बाहेरून जे भक्तीचे सोंग करतात, ते आपल्या भावनेस अनसु रून ससं ारातं नाना प्रकारानं ी गटंगळ्या
खातात ९७.

ठकले ते मनष्ु यगती । ठकले ते निःस्वार्थी ।


ठकले ते ब्रह्मप्राप्ती । दभं ें हरिभक्ती कदा नपु जे ॥ ४९८ ॥
ते मनष्ु यत्वाला मक ु तात, आत्मत्वाला दरु ावतात, आणि ब्रह्मप्राप्तीलाही ठकवतात. दभं ानें हरिभक्ति कधीच उपजत नाहीं ९८.

येथ भावेंवीण तत्त्वतां । परमार्थु न ये हाता ।


सकळ साधनाचं े माथां । जाण तत्त्वतां सद‌भ् ावो ॥ ४९९ ॥
येथे शद्ध
ु भावावांचनू परमार्थ कधीच हाताला लागत नाही. साऱ्या साधनांमध्यें सद‌भ् ाव हाच श्रेष्ठ साधन आहे हें तंू लक्षात ठे व ९९.

कोरडिये खांबीं धरितां सद‌भ् ावो । तेथेंचि प्रगटे देवाधिदेवो ।


मा सद‌ग् रुु तंव तो पहा वो । स्वयें स्वयमेवो परब्रह्म ॥ ५०० ॥
कोरड्या खांबाच्या ठिकाणी सद‌भ् ाव ठे वतांच तेथे देवाधिदेव प्रगट झाला; मग सद्गरुु तर स्वतः प्रत्यक्ष परब्रह्म आहेत ५००.

यालागी गरुु भजनापरता । भजावया मार्गु नाही आयता ।


ज्ञान-भक्ति जे तत्त्वतां । ते जाण सर्वथा सद‌ग् रुु भक्ति ॥ ५०१ ॥
ह्याकरितां गरुु भजनापरता भजावयाला दसु रा सोपा मार्ग नाही. खरोखरच ज्ञान-भक्ति म्हणनू जी काही म्हणतात, ती सर्वथा
सद्गरुु भक्तीच आहे १.

गरुु हूनि श्रेष्ठ ब्रह्म । म्हणतां गरुु त्वा आला कनिष्ठ धर्म ।
ऐसा भाव धरितां विषम । ब्रह्मसाम्य शिष्यां नपु जे ॥ ५०२ ॥
गरू
ु हून ब्रह्म श्रेष्ठ असे म्हटले तर गरुु त्वाला कमीपणा येतो. असा विषम भाव धरला तर, शिष्याच्या ठिकाणी ब्रह्मसाम्य उपजणार
नाहीं २.

आम्हां सद‌ग् रुु तोचि परब्रह्म । ऐसा नित्य निजभाव सप्रेम ।


हेचि गरुु सेवा उत्तमोत्तम । शिष्य परब्रह्म स्वयें होये ॥ ५०३ ॥
आम्हाल
ं ा सद्गरुु तोच परब्रह्म आहे अशा प्रकारचा सप्रेम निजभाव ठे वणे हीच उत्तमोत्तम गरुु सेवा होय. अशा सेवेच्या योगे म्हणजे
अशा निजभावानें शिष्य स्वतः परब्रह्म होतो ३.

ऐशिये गरुु सेवे‍आंत । प्रह्लाद झाला द्वद्वं ातीत ।


नारद स्वानंदें गात नाचत । ब्रह्मसाम्यें विचरत सरु ासरु स्थानें ॥ ५०४ ॥
अशाच गरुु सेवेनें प्रल्हाद द्वद्वं ातीत झाला; व नारद परब्रह्माशी ऐक्य पावनू निजानंदानें गात नाचत देवदानवांच्या स्थानामधनू विहार
करीत असतो ४.

ऐसीचि गरुु सेवा करितां । चक


ु ली अंबरीषाची गर्भव्यथा ।
ते गर्भ जाहला देवोचि साहता । भक्ता भवव्यथा बाधों नेदी ॥ ५०५ ॥
अशीच गरुु सेवा करीत असतां अंबरीषाची गर्भव्यथा टळली. त्याचे गर्भ देव सोसता झाला. आपल्या भक्ताला त्यानें संसाराची व्यथा
होऊ दिली नाहीं ५.

ऐशिया अभिन्न भावना । सबु द्ध ु ी भजती गरुु चरणां ।


ते पढियंते जनार्दना । त्यांसी भवभावना शिवों नेदी ॥ ५०६ ॥
अशा अभिन्न भावनेनें जे सबु द्धिु मतं गरुु चरणानं ा भजतात, ते जनार्दनाला आवडते होतात, त्यानं ा तो ससं ारभावनेला स्पर्शूं देत नाहीं
६.

गरुु ब्रह्म दोनी एक । शिष्यही असे तदात्मक ।


जे भेदें मानिती वेगळिक । तेही मायिक कवि सांगे ॥ ५०७ ॥
गरुु व ब्रह्म दोन्ही एकच आहेत; तसाच शिष्यही तदात्मक म्हणजे तत्स्वरूपच आहे. जे कोणी भेदभावनेनें भिन्नता मानतात ते मायिक
होत असें कवि सांगतो ७.

अविद्यमानोऽप्यवभाति हि द्वयोः
ध्यातर्धि
ु या स्वप्नमनोरथौ यथा ।
तत्कर्मसङ्कल्पविकल्पकं मनो
बधु ो निरुन्ध्याद् अभयं ततः स्यात् ॥ ३८ ॥
श्लोक ३८- राजन ! हा द्वैतप्रपंच नसतानाही त्याची कल्पना करणार्‍याला तो भासतो ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये स्वप्न पाहाणार्‍याच्या
कल्पनेमळ ु े किंवा जागेपणी निरनिराळ्या मनोरथांमळ
ु े एक विलक्षण सृष्टी दिसू लागते त्याप्रमाणे म्हणनू विवेकी परू
ु षाने संसारातील
कर्मांसबं धं ी सक ं ल्पविकल्प करणार्‍या मनाला आवरावे त्यामळु े च त्याचे भय नाहीसे होईल. (३८)

परुु षासी जो प्रपंचु दिसे । तो नसतांचि मिथ्या आभासे ।


जेवीं कां एकला निद्रावशें । स्वप्नीं निजमानसें जग कल्पी ॥ ५०८ ॥
ज्याप्रमाणें कोणी एकादा मनष्ु य निजला असतां स्वप्नामध्यें जगाची कल्पना करतो, त्याप्रमाणें परुु षाला जो प्रपचं म्हणनू दिसतो, तो
खरोखर नसतांना मिथ्याच भासतो ८.
असोनि निद्रावश दिसे स्वप्न । जो जागा होवोनि आपण ।
करूं बैसे मनोरथध्यान । तो नसतेंचि जन वन एकत्वीं देखे ॥ ५०९ ॥
मनष्ु य झोंप घेत असला म्हणजे स्वप्न पडतें, तोच जागा होऊन मनोरथ चिंतन करूं लागला की, एकीएक असनू ही त्याला नसलेलें
जन वन दिसू लागते ९.

हो कां घालोनि आसन । जो करी मर्ति ू चितं न ।


त्यासी ध्येय-ध्याता-उपचार-ध्यान । नसतेंच जाण कल्पित भासे ॥ ५१० ॥
किंवा आसन घालनू जो मर्तीू चे चिंतन करतो, त्याला ध्येय, ध्याता, ध्यान, उपचार इत्यादि नसतेच कल्पित भासू लागते ५१०.

जेवीं धनलोभ्याचें हारपे धन । परी वासना न साडं ी धनधान्य ।


धनातें आठवितां मन । धनलोभें पर्णू पिसें होये ॥ ५११ ॥
ज्याप्रमाणें धनलोभ्याचें धन नाहीसे झाले तरी त्याची वासना कांहीं धनधान्याला सोडीत नाही, त्याचे मन द्रव्याचे स्मरण करूं
लागताचं द्रव्यलोभानें पर्णू वेडे होऊन जातें ११.

मन स्वयें जरी नव्हे धन । तरी धनकोश आठवी मन ।


तंव स्मृती वळघे वन । व्यामोहें पर्णू पिसें होये ॥ ५१२ ॥
मन स्वतः जरी द्रव्य नव्हे, तरी ते द्रव्याच्या खजिन्याची आठवण करतें व स्मृतिलोप होऊन मोहानें वेडेपिसें होऊन बसतें १२.

तेवीं व्यामोहाचें पर्णू भरित । मिथ्या भासे देहादि द्वैत ।


तें अहभं ावें मानितां आप्त । भवभय निश्चित आदळे अंगीं ॥ ५१३ ॥
त्याप्रमाणें मोहानें पर्णू ग्रासले म्हणजे मिथ्या देहादि द्वैत भासू लागते. ते अहभं ावानें खरे मानले की, ससं ाराचे भय अचक
ू येऊन
आंगावर आदळते १३.

भवभयाचे कारण । मनःकल्पना मख्ु य जाण ।


त्या मनाचें करावया निरोधन । सद‌ग् रुु वचननिजनिष्ठा ॥ ५१४ ॥
भवभयाचे मख्ु य कारण आपली मनःकल्पना होय हे लक्षात ठे व. त्या मनाचा निरोध करावयाला सद‌ग् रू
ु चे वचन व त्याच्या ठायीं दृढ
निष्ठा हेंच पाहिजे १४.

हें जाणोनि सच्छिष्य ज्ञाते । गरुु वाक्यें विश्वासयक्त


ु ें ।
विवेकवैराग्याचेनि हातें । निजमनातें आकळिती ॥ ५१५ ॥
हे लक्षात आणनू जे कोणी ज्ञाते सच्छिष्य असतात, ते गरुु वाक्यावर विश्वास ठे वनू विवेक व वैराग्य यांच्या बळानें आपल्या मनाला
आवरून ठे वतात १५.
तेचि आकळती हातवटी । संक्षेपें राया सांगेन गोष्टी ।
सद‌ग् रुु वाक्य परिपाटी । जे मनातें थापटी निजबोधें ॥ ५१६ ॥
राजा ! ते आवरावयाची हातोटी कशी असते, तो प्रकार तल ु ा थोडक्यात सांगतो. सद्गरुु वाक्य हे आत्मबोधानें मनाला सावध करीत
असते १६.

चचं ळत्वें विषयध्यान । करितां देखे जें जें मन ।


तें तें होय ब्रह्मार्पण । सद‌ग् रुु वचननिजनिष्ठा ॥ ५१७ ॥
सद्गरू
ु वर व त्याच्या वचनावर दृढनिष्ठा ठे वल्याने, चंचलपणानें विषयचिंतन करीत असतां मन जे पाहते, तें तें ब्रह्मार्पणच होत जाते
१७.

धरूनियां विषयस्वार्थु । मनें जो जो घे‍इजे अर्थु ।


तो तो होय परमार्थु । हा अनग्रु हो समर्थु गरुु कृ पेचा ॥ ५१८ ॥
विषयाचा स्वार्थ धरून मनानें जो जो पदार्थ घ्यावा, तो तो सारा परमार्थरूपच होतो, असें गरुु कृ पेच्या अनग्रु हाचे सामर्थ्य आहे १८.

जो भ‍ईु भेणें पळों जाये । तो जेथें पळे तेथें भू ये ।


मग येणेंजाणें स्वयें राहे । ठायीं ठाये पांगळ
ु ला ॥ ५१९ ॥
जमिनीच्या भयानें जो पळू लागेल, त्याला तो जिकडे जाईल तिकडे जमीनच भेटते. असे झाले म्हणजे येणे आणि जाणे आपोआपच
बंद पडते व एकाच ठिकाणी तो थांबतो १९.

तैसें मनासी लाविजे वर्म । जें जें देखे तेंचि ब्रह्म ।


जें जें करूं बैसे कर्म । तेथ परुु षोत्तम स्वयें प्रगटे ॥ ५२० ॥
त्याप्रमाणें मनाला एक वर्म दाखवनू द्यावे. ते हेच की, ते 'जे जे पाहीम्ल तें तें ब्रह्मच आहे.' असे के ले म्हणजे तो जें जें कर्म करावयाला
लागेल तेथे तेथें परुु षोत्तम सहज प्रगट होईल ५२०.

एवं इद्रि
ं यवृत्ति‍उल्लाळे । मोडिले गरुु वाक्यप्रतीतिबळें ।
निजाधिष्ठानमेळें । कळासलें येके वेळे अखंड कुलपु ॥ ५२१ ॥
अशा प्रकारे गरू ु पदेशाच्या अनभु वाच्या प्रभावानें इद्रि
ं यवृत्तीच्या उसळ्या नाहीशा होतात व ब्रह्मरूप अधिष्ठानाशी ऐक्य होऊन बाह्य
प्रवृत्तीला अखडं कुलपू ठोकल्याप्रमाणें होते २१.

ऐसें नेमितां बाह्य कर्म । मनाचा मोडे द्वैत भ्रम ।


तंव बाह्य परब्रह्म । पर्णू चिदव्् योम कोंदाटे ॥ ५२२ ॥
अशा रीतीनें बाह्य कर्माचे नियमन के ले असतां मनाचा द्वैतभ्रम मोडतो आणि बाहेरसद्ध
ु ा परब्रह्मरूप चिदाकाश सर्वत्र भरून राहते २२.
ऐसें भजनें मन नेमितां स्वयें । न रिघे कल्पांतकाळभये ।
भक्त हो‍ऊनियां निर्भयें । विचरती स्वयें निःशकं ॥ ५२३ ॥
अशा प्रकारच्या भजनानें मनाचा निरोध के ला असता त्या भक्तांना कल्पांतकाळाचेही भय राहत नाही. ते निर्भय होऊन खश
ु ाल फिरत
असतात २३.

हे अगाध निष्ठा परिपर्णू । भोळ्याभाळ्या न टके जाण ।


यालागी सगु म साधन । सांगेन आन तें ऐक ॥ ५२४ ॥
पण ही अगाध निष्ठा भोळ्या भाबड्यांना पर्णू पणे साधत नाही. ह्याकरितां दसु रें एक सोपे साधन सांगतों तें ऐक २४.

श्रृण्वन्सभु द्राणि रथाङ्गपाणेः


जन्मानि कर्माणि च यानि लोके ।
गीतानि नामानि तदर्थकानि
गायन्विलज्जो विचरे दसङ्गः ॥ ३९ ॥
श्लोक ३९- भगवंतांच्या जन्माच्या आणि लीलांच्या पष्ु कळशा मंगलमय कथा या जगात प्रसिद्ध आहेत, त्या ऐकाव्यात तसेच
त्याच्ं याविषयीची नामे व स्तोत्रे सक
ं ोच सोडून गात राहावीत शिवाय प्रपचं ामध्ये आसक्त न होता सर्व व्यवहार करावेत. (३९)

तरावया भाळे भोळे जन । मख्ु य चित्तशद्ध


ु ीच कारण ।
जन्मकर्म हरीचे गणु । करावे श्रवण अत्यादरें ॥ ५२५ ॥
भोळे भाविक लोक तरावयाला मख्ु य कारण चित्तशद्ध ु ीच आहे. हरीचे जन्म, कर्म आणि गणु अत्यादरानें श्रवण करावेत २५.

चकु ल्या पत्रु ाची शद्धि


ु वार्ता । जेणें सादरें ऐके माता ।
तेणें सादरें हरिकथा । सार्थकता परिसावी ॥ ५२६ ॥
चक ु लेला पत्रु सांपडल्याची वार्ता आई जितक्या उत्कंठे नें ऐकते, तितक्याच उत्कंठे नें जिवाचें सार्थक करणारी हरिकथा श्रवण करावी.
२६.

हरीचीं जन्मकर्में अनंत गणु । म्हणाल त्यांचें नव्हेल श्रवण ।


लोकप्रसिद्ध जें जें परु ाण । तें श्रद्धा संपर्णू ऐकावें ॥ ५२७ ॥
हरीची जन्मकर्मे व गणु अनतं आहेत, ते सारे ऐकावयास कसे मिळतील असे म्हणाल तर सागं तो की, लोकप्रसिद्ध जें जें परु ाण असेल
तेवढे तरी पर्णू श्रद्धेनें ऐकावें २७.

बहु देव बोलिले परु ाणीं । तेही लागती ज्याचे चरणीं ।


तो समर्थ चक्रपाणी । जो वेदपरु ाणीं वदि
ं जे ॥ ५२८ ॥
परु ाणामध्यें पष्ु कळ देव सागि
ं तलेले आहेत. तेही सारे ज्याच्या चरणाला लागतात, वेदानं ी व परु ाणानं ीही ज्याला वदं न के ले आहे, तो
चक्रपाणि असा श्रीकृ ष्णच एक समर्थ म्हणजे श्रेष्ठ आहे २८.

त्याचीं जीं जीं जन्मे अति‍अद‌भ् तु । जीं जीं कर्मे परमार्थयक्त


ु ।
स्वमख ु ें बोलिला भगवंत । तीं तीं ज्ञानार्थ परिसावीं ॥ ५२९ ॥
त्याचे अत्यंत अद‌भ् तु असे जे जे जन्म व परमार्थयक्त ु जी जी कर्में भगवंतानें आपल्याच मख
ु ानें सांगितली आहेत, ती ती
ज्ञानप्राप्तीकरितां श्रवण करावी २९.

जें जें के लें परु ाणश्रवण । तें तें व्यर्थ होय मननेंविण ।
यालागीं श्रवण-मनन । सावधान करावें ॥ ५३० ॥
परंतु जें जें परु ाण श्रवण के ले, त्याचे त्याचे मनन के ल्याशिवाय ते व्यर्थ होते. ह्याकरितां श्रवण के लेल्याचे नीट मनन करीत असावें
५३०.

मोले घेतली जे गाये । दभु तें खातां विषय होये ।


तेचि दान देतां लवलाहें । दभु ती होये परमामृतें ॥ ५३१ ॥
मोल देऊन जी गाय घ्यावी, तिचे दभु ते आपण खाल्ले तर तो विषयभोग होतो; पण तीच दान देऊन टाकली तर ती परमामृताचे दभु ते
म्हणजे मोक्ष देते ३१.

तेवीं के ले जें श्रवण । तें मननें परम पावन ।


तेंचि उपेक्षितां जाण । परिपाकीं पर्णू वाझं होये ॥ ५३२ ॥
तद्वत् जे श्रवण करावे, ते मननानेंच परमपावन होते. तीच त्याची म्हणजे श्रवणाची उपेक्षा के ली, तर परिणामी तें निष्फळ होतें ३२.

हरिनाम पडतां श्रवणीं । एकां गळोनि जाये वदनीं ।


एकां ये कानींचे ते कानीं । जाय निघोनि हरिनाम ॥ ५३३ ॥
हरीचें नाम कानातं पडले असतां कित्येकाच्ं या तें मख
ु ातं नू बाहेर पडते तर कित्येकाच्ं या ह्या कानातं ले त्या कानातं नू निघनू जातें ३३.

हरिनाम पडतां श्रवणीं । ज्याचे रिघे अंतःकरणीं ।


सकळ पापा होवोनि धणु ी । हरिचरणीं तो विनटे ॥ ५३४ ॥
परंतु हरीचें नाम कानावं र पडताचं ते ज्याच्या अतं ःकरणातं शिरते, त्याचे सारे पाप धतु ले जाऊन तो हरीच्या चरणीं लिगटून जातो
३४.

यापरी श्रवणीं श्रद्धा । मननयक्त


ु करितां सदा ।
तैं विकल्प बाधीना कदा । वृत्तिं शद्ध
ु ा स्वयें होये ॥ ५३५ ॥
ह्याप्रमाणें सदासर्वकाल श्रवणाच्या ठिकाणीं मननयक्त
ु श्रद्धा ठे वली, म्हणजे विकल्पाची कधीही बाधा न होतां चित्तवृत्ति आपोआपच
शद्ध
ु होते ३५.

ऐसें मननयक्त ु श्रवण । करितां वोसंडे हर्ष पर्णू ।


तेणें हर्षें हरिकिर्तन । करी आपण स्वानंदें ॥ ५३६ ॥
ह्या प्रकारे मननयक्त ु श्रवण के ले असतां पर्णा
ू नंद उचंबळू लागतो, आणि त्या आनदं ाच्या भरांत तो हरिकीर्तन करूं लागतो ३६.

हरिचरित्रें अगाध । ज्ञानमद्रु ा-पदबंध ।


कीर्तनीं गातां विशद । परमानंद वोसंडे ॥ ५३७ ॥
ज्ञानमद्रु ा-पदबंधयक्त
ु हरीची अगाध चरित्रे कीर्तनामध्यें गाऊन त्यांचे ते विवेचन करूं लागले म्हणजे परमानंद ओसंडूं लागतो ३७.

वानिती अजन्मयाचीं जन्में । वानिती अकर्मयाचीं कर्में ।


स्मरती अनामियाचीं नामें । अतिसप्रेमें डुल्लत ॥ ५३८ ॥
ज्याला जन्म नाही, त्याच्या जन्माचं े वर्णन करतात; ज्याला कर्म नाही, त्याची कर्में म्हणजे लीला गातात; व ज्याला नाम नाही,
त्याच्या नामाचे संकीर्तन करून प्रेमभरानें डुलत असतात ३८.

साधावया निजकाज । सांडूनि लौकिकाची लाज ।


कीर्तनी नाचती भोज । अतिनिर्लज्ज निःशक
ं ॥ ५३९ ॥
स्वहित साधण्यासाठी लौकिकाची लाज सोडून देऊन आवडीनें अत्यंत निर्लज्ज होऊन निःशंकपणानें नाचत असतात ३९.

कीर्तनें निर्दळिले दोष । जप तप ठे ले निरास ।


यमलोक पाडिला वोस । तीर्थाची आस निरास जाहली ॥ ५४० ॥
कीर्तनाच्या योगानें दोषांचे निर्दलन होते; जप, तप, निराश होऊन जातात; यमलोक ओस पडतो व तीर्थांची आशा निष्फळ होते
५४०.

यमनियमां पडती उपवास । मरों टेंकले योगाभ्यास ।


कीर्तनगजरें हृषीके श । निर्दळी दोष नाममात्रे ॥ ५४१ ॥
यमनियमांना उपवास पडतात, योगाभ्यास मरावयाला टेकतो, कीर्तनाचा गजर होऊ लागला की, श्रीकृ ष्णपरमात्मा नाममात्रेंकरूनच
सर्व दोष नाहीसे करतो ४१.

कीर्तनाचा घडघडाट । आनंदु कोंदला उद‌भ् ट ।


हरुषें डोले वैकंु ठपीठ । तेणें सख
ु ें नीलकंठ तांडवनाचें नाचतु ॥ ५४२ ॥
कीर्तनाचा घडघडाट सरू ु झाला की, जिकडेतिकडे आनदं च दमु दमु नू राहतो. श्रीविष्णु आनदं ानें डुलावयाला लागतो, व त्या
आनंदाच्या भरांत शंकर तर तांडवनृत्य करूं लागतो ४२.
यापरी हरिकीर्तन । देत परम समाधान ।
हा भक्ति-राजमार्ग पर्णू । ये मार्गी ं स्वयें रक्षण चक्रपाणी कर्ता ॥ ५४३ ॥
ह्याप्रमाणें हरिकीर्तन हे मनाला अत्यंत समाधान देणारे आहे. हा भक्तीचा राजमार्ग आहे. ह्या मार्गात स्वतः चक्रपाणि संरक्षण करीत
असतो ४३.

चक्र घे‍ऊनि भक्ताचं े ठायीं । म्हणे तझु ें कार्य कायी ।


मज जगीं वैरीचि नाहीं । भक्तद्वेषी पाहीं निजशस्त्रें नाशी ॥ ५४४ ॥
तो चक्र घेऊन त्याला म्हणतो की, "भक्ताच्या ठिकाणी तझु ें काम काय ? मला तर जगामध्यें शत्रचू नाही; पण भक्तांचा द्वेष करणारा
असतो त्याचा मी आपल्या शस्त्रानें नाश करतों" ४४.

चक्रें अभिमानाचा करी चेंदा । मोहममता छे दी गदा ।


शंखें उद्बोधी निजबोधा । निजकमळें सदा निजभक्त पजू ी ॥ ५४५ ॥
चक्रानें अभिमानाचा चेंदा करतों; गदा ही मोहममतेला छे दनू टाकते; शख
ं ानें आत्मबोधाला जागृत करतो आणि कमलानें सदा
सर्वकाळ आपल्या भक्तांची पजू ा करतो ४५.

जेथें चक्रपाणी रक्षिता । तेथें न रिघे भवभयाची कथा वार्ता ।


यापरी कीर्तिवतं ा । हरि सर्वथा स्वयें रक्षी ॥ ५४६ ॥
चक्रपाणीच जेथें संरक्षण करणारा असतो, तेथे भवभयाची कथावार्ताही उरत नाही. श्रीहरि स्वतः कीर्तिवंताचे (कीर्ति गाणाऱ्यांचे)
संरक्षण करीत असतो ४६.

ज्यासं ी न करवे कथाश्रवण । अथवा न टके हरिकीर्तन ।


तिंहीं करावें नामस्मरण । राम-कृ ष्ण-गोविंद ॥ ५४७ ॥
ज्यांना कथाश्रवण करवत नसेल, किंवा हरीचे कीर्तन करतां येत नसेल, त्यांनी 'राम, कृ ष्ण, गोविदं ' असें नामस्मरण करावे ४७.

अच्यतु -नामाची निजख्याती । चेवल्या कल्पातं ीं हों नेदी च्यतु ी ।


त्या नामातें जे नित्य स्मरती । ते जाण निश्चितीं अच्यतु ावतार ॥ ५४८ ॥
'अच्यतु ' ह्या नामाची ख्यातीच अशी आहे की, तें गर्जिलें असतां कल्पांतीही 'च्यति
ु ' म्हणजे अधोगति होऊ देत नाही. त्या नामाचे जे
निरंतर स्मरण करतात, ते खरोखर अच्यतु ाचेच अवतार होत ४८.

रामकृ ष्णादी नामश्रेणी । अखंड गर्जे ज्यांची वाणी ।


त्यांसी तीर्थें येती लोटांगणीं । सरु वर चरणीं लागतीं स्वयें ॥ ५४९ ॥
ज्याचं ी वाणी रामकृ ष्णादि नामाचं ा अखडं जप करते, गर्जना करते, त्याच्ं या पायाश
ं ी तीर्थे लोटागं णी येतात व मोठमोठे देवही स्वतः
येऊन चरणी लागतात ४९.
बाप नामाचें निजतेज । यम वदं ी चरणरज ।
नामापाशीं अधोक्षज । चतर्भुु ज स्वयें तिष्ठे ॥ ५५० ॥
नामाचें तेजच काही विलक्षण आहे. ते घेणाराची पायधळ ू यमसद्ध
ु ां मस्तकावर धारण करतो. नामाजवळ चतर्भुु ज श्रीकृ ष्ण सदा
सर्वकाळ तिष्ठत असतो ५५०.

नामाचेनि पडिपाडें । कायिसें भवभय बापडु ें ।


कळिकाळाचें तोंड कोणीकडे । नामापढु ें रिघावया ॥ ५५१ ॥
नामाच्या प्रभावापढु े भवभय तें बिचारें किती ? नामापढु े यावयाला कळिकाळाचे तोंड काय लागले आहे ? ५१.

जेवढी नामाची शक्ती । तेवढें पाप नाहीं त्रिजगतीं ।


नामापाशी चारी मक्त
ु ी । जाण निश्चित्तीं विदेहा ॥ ५५२ ॥
नामाची जेवढी शक्ति आहे, तेवढे त्रैलोक्यांत पापसद्धु ा नाही. हे जनकराजा ! नामापाशी खरोखर चारही मक्ति
ु असतात, हे तंू लक्षात
ठे व ५२.

ऐक राया सावधान । नामापरतें सगु म साधन ।


सर्वथा नाहीं नाहीं आन । निश्चय जाण नेमस्त ॥ ५५३ ॥
हे राजा ! नीट लक्ष देऊन ऐक. नामापेक्षा सगु म असे दसु रें साधन नाहींच नाही, असें पक्के पणी जाण ५३.

जन्म-नाम-कर्में श्रीधर । श्रवणें उद्धरती पामर ।


यालागीं हरिलीला सभु द्र । शास्त्रज्ञ नर वर्णिती ॥ ५५४ ॥
श्रीधराच्या नामाचे, जन्माचं ें व कर्माचे श्रवण घडले की पामराचाही उद्धार होतो. ह्याकरितां शास्त्रवेत्ते परुु ष हरीची लीला ही
कल्याणकारक आहे म्हणनू वर्णन करतात ५४.

ऐसा बाणल्या भक्तियोग । न धरी जाणपणाचा फूग ।


त्यजनि
ू अहमं मतापागं । विचरती निःसगं हरिकीर्तनें ॥ ५५५ ॥
असा भक्तियोग ज्यांच्या अंतःकरणांत बाणतो, त्यांना जाणतेपणाचा ताठा राहात नाही. अहमं मतेचा पांग टाकून देऊन ते निःसंगपणे
हरिकीर्तन करीत संचार करीत असतात ५५.

करितां श्रवण स्मरण कीर्ति । तेणें वाढे सप्रेम भक्ति ।


भक्त विसरे देहस्फुर्ति । ऐक तेही स्थिति सांगेन राया ॥ ५५६ ॥
हरिकीर्तीचे श्रवण व हरिनामाचे स्मरण के ले असतां सप्रेम भक्ति वृद्धिंगत होते, आणि भक्ताला देहाचें भानच राहात नाही. राजा !
तीही स्थिति सागं तों ऐक ५६.
एवंव्रतः स्वप्रियनामकीर्त्या
जातानरु ागो द्रुतचित्त उच्चैः ।
हसत्यथो रोदिति रौति गायति
उन्मादवत् नृत्यति लोकबाह्यः ॥ ४० ॥
श्लोक ४० - जो हे व्रत घेतो, त्याच्या हृदयात, आपल्या प्रियतम प्रभंच्ू या नामसंकीर्तनाने प्रेमाचा अंकुर उगवतो त्याचे चित्त द्रवते तो
वेड्याप्रमाणे कधी खदखदनू हसतो तर कधी मोठ्याने रडू लागतो कधी मोठ्याने भगवंतांना हाका मारतो तर कधी त्यांच्या गणु ांचे
गायन करू लागतो कधी कधी नाचतोसद्ध ु ा अशा वेळी त्याला लोकाचं ी मळ ु ीच पर्वा नसते. (४०)

हरिनामगणु कीर्तनकीर्ती । अखंड आवडे जागृतीं ।


स्वप्नींही तेचि स्थिती । दृढ हरिभक्ती ठसावे ॥ ५५७ ॥
हरिनामाचे व गणु कीर्तनाचे वर्णन जागृतीमध्यें तर निरंतर आवडतेंच, पण स्वप्नातं सद्ध
ु ा तीच स्थिति झाली म्हणजे हरिभक्ति उत्तम
प्रकारें मनांत ठसली म्हणनू समजावें ५७.

ऐशियापरी भक्तियक्त ु । दृढतर जाहलें ज्याचें व्रत ।


तवं तवं होय आर्द्रचित्त । प्रेमा अद‌भ् तु हरिनामकीर्ती ॥ ५५८ ॥
अशा रीतीनें भक्तियक्त ु होऊन ज्याचे व्रत जसजसे दृढतर होत जाते , तसतसे त्याचे चित्त अधिकाधिक द्रवनू हरिनामकीर्तीविषयींचा
प्रेमा अद‌भ् तु रीतीनें वाढतो ५८.

आत्मा परमप्रिय हरी । त्याचे नामकीर्तीचा हर्ष भारी ।


नित्य नवी आवड वरी । सबाह्याभ्यंतरीं हरि प्रगटे ॥ ५५९ ॥
परमप्रिय असा जो आत्मा तोच हरि. त्याच्या नामकीर्तीचा अत्यंत हर्ष, व नित्य नवी आवड; ह्यायोगे अंतर्बाह्य हरीच प्रगट होतो ५९.

चक ु ल्या मायपतू ां संकटीं । एकाकीं बहुकाळें जाहली भेटी ।


तेणें वोरडे घालोनि मिठी । चाले जेवीं पोटीं अनिवार रुदन ॥ ५६० ॥
एकाद्या संकटामध्यें मायलेकांची ताटातटू व्हावी, आणि पष्ु कळ काळ लोटल्यावर अकस्मात् गांठ पडावी, त्या वेळी तो मल
ु गा
हबं रडा फोडून आईला मिठी घालतो आणि हुदं के देऊन ओक्साबोक्शी रडू लागतो ५६०,

तेवीं जीवशिवां अवचटी । भक्तीचे पेठे जाहली भेटी ।


आत्मसाक्षात्कारें पडे मिठी । ते संधीमाजीं उठी अनिवार रुदन ॥ ५६१ ॥
त्याप्रमाणें भक्तीच्या पेठेत जेव्हां जिवाची व शिवाची भेट होते, आणि आत्मसाक्षात्कारानें मिठी पडते, तेव्हां त्या संधीत अनिवार रडें
कोसळतें ६१.
परमात्मयासी आलिगं न । तेणें अनिवार स्फंु दन ।
रोमांचित रुदन । सप्रेम पर्णू उसासोनि करी ॥ ५६२ ॥
परमात्म्याला आलिंगन दिले जाते, त्यायोगें अनिवार हुदं के येऊ लागतात; व प्रेमानें परिपर्णू झाल्यामळ
ु ें रोमांचित होऊन मोठमोठ्यानें
उसासे टाकून तो रुदन करूं लागतो ६२.

सवेंचि गदगदोनि हांसे । मानी मजमाजींच मी असें ।


चक
ु लों भेटलों हें ऐसें । देखोनि आपल
ु ें पिसें हांसोंचि लागे ॥ ५६३ ॥
लगेच खदसदां हासतो व म्हणतो की, अहो ! मी तर माझ्यामध्येंच आहे. चक ु लों, भेटलों असें म्हणणे हे आपलेच वेडेपण, असें
मनांत आणनू तो हासावयालाच लागतो ६३.

मी अखंडत्वें स्वयें संचलों । अभेदपर्णू त्वें अनादि रचलों ।


तो मी अव्ययो म्हणे जाहलों मेलों । येणें आठवें डोलडोलों हासं ोंचि लागे ॥ ५६४ ॥
मी तर अखंडितपणानें स्वतः सर्वत्र भरलो आहे, पर्णू अभेदामळ ु ें मी अनादि आहे तसाच आहे. ह्याप्रमाणें मी अव्यय असतां जन्मलों
व मेलों असें म्हणत होतो ह्याची आठवण करून मान डोलवनू डोलवनू तो हासंचू लागतो ६४.

पळतां दोराच्या सर्पाभेण । पडे अडखळे भयें पर्णू ।


तोच दोरातें वोळखोन । आपणिया आपण स्वयें हांसे ॥ ५६५ ॥
दोराला साप समजनू घाबऱ्या घाबऱ्या पळतांना अडखळतो व पडतो, तोच त्या दोराला ओळखनू आपल्या आपणच हासंू लागतो
६५.

तेवीं संसाराचा अभावो । देहभाव समळ ू वावो ।


तेथें नाथिली ममता अहभं ावो । मज होता पहा वो म्हणनि
ू हांसे ॥ ५६६ ॥
तद्वत् ससं ार हा मिथ्या असनू देहभाव समळ
ू खोटा आहे, असे असतां मला नसती ममता व अहभं ाव होता की हो ! म्हणनू हासतो
६६.

बाप गरुु वाक्य निजनिर्वाहो । देहीं असतां विदेहभावो ।


माझे चारी देह झाले वावो । येणें अनभु वें पहा वो गर्जों लागे ॥ ५६७ ॥
धन्य तें गरुु वाक्य ! तेच मला तारक झाले. देहांत असनू मी विदेही बनलो. माझे चारी देह मिथ्या की हो झाले ! अशा अनभु वोद‌ग् ारानें
गर्जना करूं लागतो ६७.

म्हणे धन्य धन्य भगवद‌भ् क्ती । जिणें मिथ्या के ल्या चारी मक्त
ु ी।
मी परमात्मा निजनिश्चितीं । येणें उल्हासें त्रिजगती गर्जवी गजरें ॥ ५६८ ॥
तो म्हणतो,"धन्य धन्य ती भगवद‌भ् क्ति ! की जिनें चारी मक्त ु ीही मिथ्या करून सोडल्या ! परमात्मा तो मीच हे निश्चित आहे." अशा
उल्हासाच्या गजरानें त्रिभवु नही दणाणनू सोडतो ६८.
धन्य भगवंताचें नाम । नामें के लों नित्य निष्काम ।
समळ ू मिथ्या भवभ्रम । गर्जोनि निःसीम हाक फोडी ॥ ५६९ ॥
धन्य तें भगवंताचें नाम ! त्या नामानें मला नित्य निष्काम करून सोडलें ! भवभ्रम समळ
ू मिथ्या ठरला ! याप्रमाणें मोठमोठ्यानें गर्जना
करून हांक फोडतो ६९.

आतां दजु ें नाहींच त्रिलोकीं । दिसे तें तें मीच मी कीं ।


मीच मी तो एकाकी । येणें वाक्यें अलोलिकी हाक फोडी ॥ ५७० ॥
आतां त्रिभवु नांत दसु रे कांहींच नाहीं; जें जें दिसतें तें मीच मी; तो एकी एक मीच आहे असे बोलनू मोठमोठ्यानें हांक फोडतो ५७०.

दर्धु र भवबधं ज्याचेनि । निःशेष गेला हारपोनी ।


त्या सद‌ग् रू
ु च्या निजस्तवनीं । गर्जवी वाणी अलोलिक ॥ ५७१ ॥
ज्याच्यायोगें दर्धु र असा भवबंध नाहीसा होऊन गेला, त्या सद्गरू
ु च्या स्तवनामध्येंच आपली अलौकिक वाणी गर्जवितो ७१.

म्हणे ससं ार झाला वावो । जन्ममरणाचं ा अभावो ।


कळिकाळासी नाहीं ठावो । म्हणोनियां पहा वो हाक फोडी ॥ ५७२ ॥
'अहो ! हा संसार मिथ्या झाला; जन्ममरणाचा अभाव झाला; कळिकाळाचा ठावच पसु नू गेला', असे म्हणनू हाक फोडतो ७२.

ऐशा हांकावरी हाका । फोडूं लागे अलोलिका ।


सवेंचि गाये निजात्मसख
ु ा । स्वानंदें देखा डुल्लतु ॥ ५७३ ॥
अशा एकावर एक हाका अपर्वू रीतीनें मारू लागतो. लगेच आत्मसख ु ाचे गाणे गातो, आणि स्वानंदानें डोलत राहतो ७३.

परम सख्याची गोड कथा । तृप्ती न बाणे स्वयें सांगतां ।


तेवीं निजानभु वें हरि गातां । धणी सर्वथा परु े ना ॥ ५७४ ॥
जिवलगाची गोड कथा स्वतः सांगू लागले असतां तृप्तीच होत नाहीं; त्याप्रमाणें आत्मानभु वानें हरीला गाऊं लागले म्हणजे काही
के ले तरी परु े च वाटत नाहीं ७४.

त्याचें गाणें ऐकतां । सख


ु रूप होय सज्ञान श्रोता ।
ममु क्ष
ु ां होय परमावस्था । जरी तो अवचिता गावों लागे ॥ ५७५ ॥
त्याचे गायन श्रवण करतांना ज्ञानी श्रोता सखु रूप होतो; ममु क्ष
ु ल ू ा त्याचे गाणे ऐकून प्रेमाचें भरतें दाटून येते ७५.

गातां पदोपदीं निजसख


ु । कोंदाटे अधिका‍अधिक ।
वोसंडितां परम हरिख । स्वानंदें अलोलिक नाचों लागे ॥ ५७६ ॥
ह्याप्रमाणें तो गाऊं लागला असतां पदोपदीं तें निजसख
ु दाटून येते, आणि हर्ष पोटातं मावेनासा झाला म्हणजे तो निजानदं ानें
अलौकिकपणे नाचंू लागतो ७६.

सारूनि दजु ेपणाचें काज । निरसोनि लौकिकाची लाज ।


अहभं ावेंविण सहज । आनंदाचे भोजें अलोलिक नाचे ॥ ५७७ ॥
दजु पे णाचे काम सोडून, लौकिकाची लाज टाकून देउन तो अहभं ावाशिवाय सहज आनंदानें मोठ्या गमतीनें नाचतो ७७.

जो मोलें मदिरा खाये । तो मदिरानंदें नाचे गाये ।


जेणें ब्रह्मानंदु सेविला आहे । तो के वीं राहे आवरला ॥ ५७८ ॥
जो विकत घेऊन दारू पितो, तोसद्ध ु ा दारूच्या गंगु ीत गातो आणि नाचतो, मग ज्यानें ब्रह्मानंदरस सेवन के ला, तो कह्यात कसा
राहणार ? ७८.

यालागीं तो लोकबाह्यता । स्वये नाचे ब्रह्मउन्मादता ।


लोक मानिती तया पिशाचता । हा बोधु पडि ं तां सहजा न कळे ॥ ५७९ ॥
ह्यासाठी ब्रह्मानंदाच्या उन्मादांत लौकिक सोडून तो स्वतः गात व नाचत असतो. लोक त्याला वेडा म्हणतात. हे बोधाचे वर्म
पडि
ं ताना सहसा कळत नाहीं ७९.

त्याचिया निजबोधाची कथा । ऐक सागं ेन नृपनाथा ।


एक भगवंतावांचनू सर्वथा । त्यासी लौकिकता दिसेना ॥ ५८० ॥
राजा ! त्याला एका भगवंतावांचनू दसु रा लोकाचार दिसतच नाही. त्याच्या निजबोधाची कथा सांगतों ऐक ५८०.

खं वायमु ग्निं सलिलं महीं च


ज्योतींषि सत्त्वानि दिशो द्रुमादीन् ।
सरित्समद्रु ांश्च हरे ः शरीरं
यत्किंच भतू ं प्रणमेदनन्यः ॥ ४१ ॥
श्लोक ४१- आकाश, वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी, ग्रहनक्षत्रे, प्राणी, दिशा, वृक्षवनस्पती, नद्या, समद्रु हे सगळे , इतके च काय, सारे
चराचर भगवतं ाचं े शरीर समजनू त्याला अनन्य भावाने नमस्कार करावा. (४१)

ब्रह्मउन्मादपरमानदं ें । जवं जवं पाहे स्वानदं बोधें ।


तंव तंव चराचर पर्णा ू नंदें । देखे स्वानंदकंदें दमु दमि
ु त ॥ ५८१ ॥
स्वानंदाच्या बोधानें आणि ब्रह्मोन्मादाच्या परमानंदानें तो जो जो पाहूं लागतो, तों तों त्याला हे चराचर पर्णा
ू नंदानें भरलेले आणि
स्वानंदानें दमु दमु लेलेंच दिसते ८१.
पृथ्वी आप तेज वायु नभ । देखे हरिरूप स्वयभं ।
भतू ां महाभतू ांचें डिंभ । न देखे भिन्न कोंभ अभिन्नत्वें ॥ ५८२ ॥
पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश ही सर्व त्याला साक्षात हरिस्वरूप दिसंू लागतात. भतू ांच्या किंवा महाभतू ांच्या प्रतिभेचे भिन्न भिन्न
कोंभ, त्याला सारे अभिन्न-एकरूपच भासंू लागतात ८२.

जेवीं न मेळवितां मेळा । पाहतां जैसा के ळीचा कळा ।


स्वयें विकासे फळांदळां । तेवीं वस्तु हे पांचाला भतू भौतिकात्मक ॥ ५८३ ॥
ज्याप्रमाणें दसु री सामग्री न मिळवितां के ळीचा कोंब फळे व पानें ह्या रूपानें विकास पावतो, त्याप्रमाणे, परीक्षिति राजा ! परब्रह्म हें
भतू -भौतिकात्मक रूपानें प्रगट होते ८३.

जेवीं कांतोनियां रंध्रसळे । स्फटिकदीपगृहअंगमेळें ।


चितारिलीं अश्वगजदळें । तीं भासती सोज्ज्वळें आतं ल ु ेनि दीपें ॥ ५८४ ॥
किंवा स्फटिकगृहाच्या भिंतीवर कोरण्याच्या हत्यारानें हत्ती, घोडे व सैन्य इत्यादि कोरून काढलेली चित्रे, आंतील दिव्यामळ
ु ें च
अगदी हुबेहुब दिसतात ८४.

तेवीं सोमसर्याू दि तेजशक्ती । कां वन्हि नक्षत्रें जे लखलखिती ।


जननयनादि निजदीप्ती । देखे आत्मज्योती सतेज ॥ ५८५ ॥
त्याप्रमाणें तेजःपंजु असे सर्यू चंद्रादिक किंवा लखलखणारे अग्नि व नक्षत्रें यांच्यांतील लखलखीतपणा व प्राण्यांच्या नयनांतील तेज,
ही सर्व आत्मज्योतीनेंच सतेज दिसतात ८५.

यक्त
ु ीं मेळवितां द्रव्यांतर । अग्नि परी भासे पष्ु पाकार ।
तेवीं वस्तु स्वलीला साचार । रविचंद्राकारा नानात्वें भासे ॥ ५८६ ॥
जाळण्याच्या दारूचे पदार्थ (गधं क, सोरमीठ, कोळसा वगैरे) यक्त ु ीनें मिश्रित के ले म्हणजे (बाण, फुलबाजा, नळे वगैरेमधील) अग्नि
हा फुलासारखा दिसू लागतो, त्याप्रमाणें परब्रह्म हे आपल्या लीलेनें सर्यू चंद्राकार होऊन नानात्वानें भासतें ८६.

पृथ्वी गंधरूपें स्वयें असे । तो गंधु कस्तर्या


ू दिकीं भासे ।
तेवीं भगवत्सत्ता सर्वत्र असे । परी सात्त्विकीं दिसे अतिप्रगट ॥ ५८७ ॥
पृथ्वी स्वतःसिद्ध गंधरूप आहे, पण तो सगु ंध कस्तरू ी इत्यादि पदार्थांमध्येंच प्रगट होतो; त्याप्रमाणें भगवंताची सत्ता ही सर्वत्र आहे,
पण ती सात्त्विकामध्यें (अंतःकरणाच्या सत्त्ववृत्तीमध्यें) अतिशय स्पष्ट दिसते ८७.

यालागीं सात्त्विकाठायीं सत्त्व । तेथ देखे भवगत्तत्त्व ।


सत्त्वें सत्त्वंतां महत्त्व । अति मान्यत्व हरिरूपें ॥ ५८८ ॥
म्हणनू सात्त्विकाच्या ठिकाणी जें सत्त्व असते, ते भगवत्तत्त्व आहे असे समज. सत्त्वस्थ वृत्तीच्या लोकांना सत्त्वामळ
ु े च महत्त्व व
हरिरूपानें मान्यत्व प्राप्त होते ८८.
पृथ्वीसी जळावरण आहे । तेंचि चतःु समद्रु नांव लाहे ।
तैसें देवाचेंचि अगं पाहे । दिशात्वें वाच्य होये दशदिशां ॥ ५८९ ॥
पृथ्वीभोंवतीं जलाचे आवरण आहे, त्याला 'चतःु समद्रु ' असे म्हणतात. त्याप्रमाणें दशदिशांमध्यें असलेले देवाचेंच अंग 'दिशा' ह्या
नांवानें बोलले जाते ८९.

पर्वू पश्चिमादि योग । दशदिशाचं े दिग्विभाग ।


तेही देवाचेंचि अंग । तद‌रू ् प श्रीरंग स्वयें भासे ॥ ५९० ॥
पर्वू -पश्चिम इत्यादि जे प्रकार आहेत, ते दशदिशांचेच भाग होत, ते देवाचेंच अंग. त्या रूपानें श्रीरंगच मर्ति
ू मंत भासतो ५९०.

तृण दर्वा
ू दर्भ द्रुम । देखोनि म्हणे हेही हरीचे रोम ।
अनोळखा हें अतिविषम । निजांगीं सर्व सम हरिरूप पाहतां ॥ ५९१ ॥
गवत, दर्वाू , दर्भ, झाडें ही पाहून हेही श्रीहरीचेच के स आहेत असे तो म्हणतो. आपल्या अंगांत सर्वत्र सम हरिरूप असतांही, न
ओळखणाऱ्याला हे सर्व विषमच दिसते ९१.

जैशा आपल्ु या अंगोळिया । गणितां दिसती वेगळालिया ।


परी असती लागलिया । स्वयें सगळिया अखंड अंगीं ॥ ५९२ ॥
आपली बोटे मोजू लागले म्हणजे ज्याप्रमाणें ती वेगळी वेगळी आहेत असे वाटते ; पण ती मळ
ू ची साऱ्या आपल्या एका आगं ालाच
अखंड चिकटून राहिलेली असतात ९२

तेवीं वन-वल्ली-दर्भ-दांग । देखोनि म्हणे हे हरीचें अंग ।


अनन्यभावें लगबग । भिन्नभाग देखेना ॥ ५९३ ॥
त्याप्रमाणें वन, वेली, दर्भ, अरण्य इत्यादि पाहून हे सर्व हरीचेंच स्वरूप आहे असे तो म्हणतो. हे सारे तो ऐक्यभावानेंच पाहातो,
त्याला त्यांत निराळा अंश दिसतच नाहीं ९३.

म्हणे दर्वू -द्रुम-वन-वल्ली । हेचि अनतं कोटि रोमावळी ।


हरीचेनि अंगें असे वाढली । त्या निजशोभा शोभली हरिरूपत्वें ॥ ५९४ ॥
दर्वा
ू काय, झाडेझडु पें काय, किंवा रानवेली काय, ही अनंत कोटि के सांची पंक्ति हरीच्या अंगावर वाढलेली आहे, आणि तिला त्या
श्रीहरीच्याच स्वरूपानें शोभा आली आहे असें तो म्हणतो ९४.

जेवीं वटाच्या पारंबिया । लोंबोनि वाढती वेगळालिया ।


त्याही वटरूपें संचलिया । वटत्वा मक ु लिया म्हणों नये ॥ ५९५ ॥
वडाच्या पारंब्या ज्याप्रमाणें लोंबत सटु ू न निरनिराळ्या वाढतात, तरी त्या वडाच्याच झाडाच्या असतात. त्या वटत्वाला मक
ु ल्या
असे म्हणता येत नाही. ९५.
तेवीं चैतन्यापासोनि वोघ । निघाले सरितारूप अनेग ।
तेही चैतन्यघन चागं । चिद‌रू् पें साङ्ग सदा वाहती ॥ ५९६ ॥
त्याप्रमाणें चैतन्यापासनू हे नद्यांच्या रूपानें अनेक ओघ निघालेले आहेत, त्यांतही ओतप्रोत चैतन्यच भरलेले आहे, आणि त्या
चिद‌रू् पानेंच निरंतर वाहात असतात ९६.

हो कां चद्रं बिबं ीं अमृत जैसे । बिबं ीं बिबं रूप हो‍ऊनि असे ।
तेवीं भगवंतीं संसारु भासे । भजनविश्वासें भगवद‌रू ् प ॥ ५९७ ॥
किंवा चंद्रबिबं ांतील अमृत जसे बिंबांत बिंबरूपच होऊन असते, त्याप्रमाणें भगवंतामध्यें संसार भासतो, व तो भजनविश्वासानें
भगवद‌रू् पच होतो ९७.

ऐसे वेगवेगळे भाग । पाहतां उल्हासे जवं चांग ।


तंव अवघें उघडें जग । देवोचि साङ्ग स्वयें झाला ॥ ५९८ ॥
अशा प्रकारें सृष्टीतील वेगवेगळे भाग पाहतानं ा जसजसा उल्हास वाटत जातो, तसतसा यच्चयावत जग देवच पर्णू पणे नटला आहे
असा त्याला अनभु व येऊ लागतो ९८.

यालागीं सर्व भतू ांचे ठायीं । अनन्यशरण कै सा पाहीं ।


लवण जैसें सागरापायीं । ठायीं ठायीं जडोनि ठाके ॥ ५९९ ॥
ह्यासाठी तो सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी असा काही लीन होऊन जातो की, समद्रु ाच्या पाण्यामध्यें जणू काय मीठच अंशाअंशांनी
मिळून गेलें आहे ९९.

तेथ मगंु ीही देखोनि जाण । हरिरूपीं वदं ी आपण ।


मशकासही अनन्यशरण । घाली लोटांगण भगवद‌रू ् पें ॥ ६०० ॥
त्या स्थितीत तो मंगु ीला पाहून तेही हरिस्वरूपच समजनू वंदन करतो. हे तर काय, पण एकाद्या माशीला पाहूनसद्ध
ु ा तेही भगवंताचेंच
स्वरूप म्हणनू अनन्यभावानें शरण होऊन लोटागं ण घालतो ६००.

गो-खर-चाडं ाळ-श्वान । अतिनिंद्य जे हीन जन ।


ते भगवद‌रू
् प देखोनि पर्णू । घाली लोटांगण अनन्यभावें ॥ ६०१ ॥
गाय असो की गाढव असो; चाडं ाळ असो की श्वान असो; लोकातं ज्यानं ा अत्यतं निद्यं व कनिष्ठ समजतात, त्यानं ाहीं पर्णू भगवद‌रू
् प
माननू अनन्यभावानें लोटांगण घालतो १.

हरिरूपें देखे पाषाण । भगवद‌रू


् पें वंदी तृण ।
जगं मस्थावरादिकां शरण । घाली लोटागं ण चिदैक्यभावें ॥ ६०२ ॥
पाषाणसद्ध
ु ा हरिरूपच समजतो. तृणालासद्ध
ु ा भगत्वस्वरूप माननू वदं न करतो. स्थावरजगं मादिकानं ासद्ध
ु ां चिदैक्यभावानें लोटागं ण
घालतो २.

करितां हरिनामस्मरणकीर्ती । एका‍एकी एवढी प्राप्ती ।


झाली म्हणसी कै शा रितीं । ऐकें नृपती तो भावो ॥ ६०३ ॥
हरिनामस्मरणाच्या महिन्यानें एवढा लाभ कसा होतो म्हणशील तर, हे राजा ! त्यांतील मर्म ऐक ३.

करितां पजू ाविधिविधान । कां श्रवण स्मरण कीर्तन ।


सर्वदा चिदैक्यभावना पर्णू । "पर्णू प्राप्ति" जाण त्यातेंचि वरी ॥ ६०४ ॥
विधिपर्वू क पजू ाविधान किंवा श्रवण, स्मरण व कीर्तन करीत असतां ज्याची सर्वकाळ पर्णू 'चिदैक्यभावना' असते, त्यालाच 'पर्णू प्राप्ति'
साध्य होते असें हूं समज ४.

भक्तिः परे शानभु वो विरक्तिः


अन्यत्र चैष त्रिक एककालः ।
प्रपद्यमानस्य यथाश्नतः स्यःु
तष्टि
ु ः पष्टि
ु ः क्षदु पायोऽनघु ासम् ॥ ४२ ॥
श्लोक ४२- जसे जेवणार्‍याला प्रत्येक घासाबरोबर तृप्ती, जीवनशक्ती आणि भक ू नाहीशी होणे असे तीन फायदे एकाच वेळी होतात,
त्याचप्रमाणे जो मनष्ु य भगवंतांना शरण जातो, त्याला भगवंतांबद्दल प्रेम, त्यांच्या स्वरूपाचा अनभु व आणि इतर सर्व वस्तवि
ंू षयी
वैराग्य, अशा तीनही गोष्टींची एकाच वेळी प्राप्ती होते. (४२)

आ‍इके विदेहा चक्रवर्ती । ऐशी जेथें भगवद‌भ् क्ती ।


तीपाशीं विषयविरक्ती । ये धांवती गोवत्स न्यायें ॥ ६०५ ॥
हे चक्रवर्ती जनकराजा ! ऐक. अशी जेथें भगवद‌भ् क्ति असते, तिच्यापाशी गोवत्सन्यायानें विषयविरक्तीही धावनू येते ५.

हें असो जेवीं जावळीं फळें । हों नेणें येरयेरां वेगळें ।


तेवीं भक्ति विरक्ति एके काळें । भक्त तेणें बळें बळिष्ठ होती ॥ ६०६ ॥
हे असो. जळ ु ी फळे असली म्हणजे ती एकमेकास सोडूं शकत नाहीत, त्याप्रमाणें भक्ति आणि विरक्ति या एकदमच उत्पन्न होतात
आणि त्यांच्या सामर्थ्यावर भक्त हेही समर्थ होतात ६.

जेथ भक्ती आणि विरक्ती । नांदो लागती सहजस्थिती ।


तेथेंचि पर्णू प्राप्ती । दासीच्या स्थितीं सर्वदा राबे ॥ ६०७ ॥
जेथें भक्ति आणि विरक्ति या सहजस्थितीनें नांदंू लागतात, तेथेच पर्णू -प्राप्ति ही सदासर्वकाल दासीसारखी राबते ७.
यापरी भगवद‌भ् क्ती । पर्णू दाटुगी त्रिजगती ।
भक्तांघरीं नांदे प्राप्ती । भक्तिविरक्तिनिजयोगें ॥ ६०८ ॥
याप्रमाणें भगवद‌भ् क्ति ही त्रिभवु नामध्यें महान् समर्थ आहे. आणि भक्ति-विरक्तींच्या एकोप्यामळ
ु ें भक्तांच्या घरी प्राप्तीही नांदंू लागते
८.

भक्ति विरक्ति अनभु वप्राप्ती । तिन्ही एके काळें होती ।


ऐक राया तेही स्थिती । विशदोक्तीं सांगेन ॥ ६०९ ॥
आता भक्ति, विरक्ति आणि अनभु वप्राप्ति या तिन्ही एकाच काळी कशा उत्पन्न होतात, ती स्थितीही तल
ु ा विशद करून सागं तों ९.

जैसी कीजे भगवद‌भ् क्ती । तैसीच होय विषयविरक्ती ।


तदनसु ारें अनभु वस्थिती । ती भक्त पावती तेचि क्षणीं ॥ ६१० ॥
जशी जशी भगवद‌भ् क्ति करावी, तशी तशी विषयामध्यें विरक्ति उत्पन्न होत जाते आणि तदनसु ार अनभु वस्थितीही भक्तानं ा त्याच
वेळी प्राप्त होते ६१०.

जेवीं कां भक ु े लियापाशीं । ताट वाढिलें षड्रसीं ।


तो पष्टि
ु तष्टि
ु क्षधु ानाशासी । जेवीं ग्रासोग्रासीं स्वयेंचि पावे ॥ ६११ ॥
भकु े लेल्या मनष्ु यापढु े षड्‌रसान्नाचे ताट वाढून ठे वले म्हणजे त्याला प्रत्येक घांसाबरोबर पष्टि
ु , तष्टि
ु व क्षधु ानाश आपोआप लाभतात
. ६११.

जितकु ा जितकु ा घे‍इजे ग्रास । तितक


ु ा तितक
ु ा क्षधु ेचा नाश ।
तितक
ु ाचि पष्टि
ु विन्यास । सख ु ोल्लास तितक ु ाचि ॥ ६१२ ॥
जितका जितका घासं घ्यावा, तितका तितका क्षधु ेचा नाश होतो, आणि तितकें तितकें पोट भरत येऊन सख
ु व समाधानही तितकें च
वाढत जातें १२.

पष्टि
ु तष्टि
ु क्षधु ानाशनी । जेवीं एके काळें येती तिनी ।
भोक्ता पावे स्वयें भोजनीं । तेवीं भगवद‌भ् जनीं भक्त्यादि त्रिकु ॥ ६१३ ॥
पष्टि
ु , तष्टि
ु व क्षधु ानाश ही तिन्ही जशी जेवणाराला जेवणामध्यें एकदमच प्राप्त होतात, त्याप्रमाणें भगवद‌भ् जनामध्यें भक्तीचे त्रिकूट
म्हणजे भक्ति, विरक्ति व अनभु वप्राप्ति ही तिन्ही एकदमच उत्पन्न होतात १३.

सद‌भ् ावें करितां भगवद‌भ् क्ती । भक्ति-विरक्ति-भगवदप्र् ाप्ती ।


तिनी एके काळें होती । ऐशिया यक्त ु ीं जाणिजे राया ॥ ६१४ ॥
हे राजा ! सद‌भ् ावानें भगवद‌भ् क्ति के ली असतां भक्ति, विरक्ति आणि भगवत्प्राप्ति ही तिन्ही वरील न्यायानें एकसमयावच्छे दक
ें रून
प्राप्त होतात असें तंू जाण १४.
भक्ती म्हणिजे सर्व भतू ीं । सप्रेम भजनयक्त
ु ी।
प्राप्ती म्हणिजे अपरोक्षस्थिती । भगवत्स्फूर्ती अनिवार ॥ ६१५ ॥
'भक्ति' म्हणजे सर्व प्राणिमात्रांच्या ठायीं सप्रेमभावना, आणि 'प्राप्ति' म्हणजे अपरोक्ष साक्षात्कार, अर्थात् भगवद‌रू
् पाची अनिवार
स्फूर्ति होय १५.

विरक्ति म्हणिजे ऐशी पहा हो । स्त्रीपत्रु देहादि अहभं ावो ।


समळू जेथें होय वावो । विरक्ति निर्वाहो या नांव राया ॥ ६१६ ॥
आता 'विरक्ति' म्हणजे अशी की, माझी स्त्री, माझा पत्रु , माझा देह, इत्यादि जो ममकार व अहक
ं ार असतो, तो जेथे समळ
ू मिथ्या
होऊन जातो, राजा ! ह्याचेच नांव 'विरक्ति' असें तंू समज १६.

यापरी भजनाचे पोटीं । भक्ति-विरक्ति-प्राप्ति त्रिपटु ी ।


ऐक्यभावें सद‌भ् क्तां उठी । हरिभजनदिठी एके चि काळीं ॥ ६१७ ॥
अशा प्रकारें भजनाच्या पोटी भक्ति, विरक्ति आणि भगवत्प्राप्ति ही त्रिपटु ी ऐक्यभावानें सद‌भ् क्ताच्या ठिकाणी भजनदृष्टीमळ
ु ें एकाच
वेळी उत्पन्न होते १७.

यालागीं राया निजहितार्थी ं । आदरें करावी हरिभक्ती ।


तेणें अवश्य भगवत्प्राप्ती । उपसंहारार्थी कवि सांगे ॥ ६१८ ॥
ह्यासाठी राजा ! स्वहिताकरितां अवश्यमेव हरीची भक्ति करावी. तेणक
ें रून हटकून भगवत्प्राप्ति होते. असें उपसंहारार्थ 'कवि' (पढु ील
श्लोकातं ) सागं तो १८.

इत्यच्यतु ाङ्‌घ्रिं भजतोऽनवु त्त्ृ या


भक्तिर्विरक्तिर्भगवत्प्रबोधः ।
भवन्ति वै भागवतस्य राजन्
ततः परां शान्तिमपु ैति साक्षात् ॥ ४३ ॥
श्लोक ४३- हे राजन ! अशा प्रकारे जो भक्त निरंतर भगवंतांचे भजन करतो, त्याला भगवंतांविषयी भक्ती, संसाराबद्दल वैराग्य आणि
भगवतं ाच्ं या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते आणि तेव्हा तो परम शातं ीचा प्रत्यक्ष अनभु व घेऊ लागतो. (४३)

यापरी अनन्य भक्ती । जे सर्वदा सर्वभतू ीं करिती ।


ते भक्ती-विरक्ती-भगवत्प्राप्ती । सहजें पावती अनायासें ॥ ६१९ ॥
ह्याप्रमाणें सदासर्वदा जे सर्व भतू ाच्ं या ठिकाणी अनन्य भक्ति करतात, ते भक्ति, विरक्ति व भगवद‌प्र् ाप्ति अनायासें प्राप्त करून घेतात
१९.

राया हरिभक्तिदिव्यांजन । तें ले‍ऊनि भक्त सज्जन ।


साधिती भगवन्निधान । निजभजनमहायोगें ॥ ६२० ॥
हे राजा ! हरिभक्ति हें एक उत्तम अजं न आहे. ते सद‌भ् क्त आपल्या नेत्रातं घालनू आपल्या भजनरूप महायोगानें भगवत्स्वरूपाचा ठे वा
आपलासा करितात ६२०.

करितां ऐक्यभावें निजभक्ती । उत्कृ ष्ट उपजे पर्णू शांती ।


तेणें होये असतांची निवृत्ती । भक्तां पर्णू प्राप्ति परमानंदें ॥ ६२१ ॥
ऐक्यभावनेनें निजभक्ति के ली असतां सर्वोत्कृ ष्ट पर्णू शांति प्राप्त होते, आणि तिच्या योगें असत् वस्तंचू ी निवृत्ति होऊन भक्तांना
ब्रह्मानंदरूप भगवंताची पर्णू प्राप्ति होते २१.

यालागीं धन्य भगवद‌भ् क्त । इद्रि


ं यीं वर्तता विषयी विरक्त ।
देहीं असोनि देहातीत । नित्यमक्त
ु हरिभजनें ॥ ६२२ ॥
म्हणनू भगवद‌भ् क्त हे मोठे धन्य होत ! ते इद्रि
ं यांशी वावरत असनू ही विषयांविषयीं विरक्त असतात, ते देहधारी असनू विदेही
असतात, आणि हरिभजनाच्या योगें नित्यमक्त ु होऊन राहतात २२.

भावें करितां भगवद‌भ् क्ती । भक्त मक्त


ु ीही न वछि
ं ती ।
तरी त्यांपाशी चारी मक्त
ु ी । दास्य करिती सर्वदा ॥ ६२३ ॥
भक्त एकनिष्ठेनें भगवद‌भ् क्ति करीत असता, तिच्या भरातं ते मक्त
ु ीचीही इच्छा करीत नाहीत; तरी पण, त्याच्ं यापाशी सदासर्वदा चारही
मक्ति
ु दास्य करीत असतात २३.

हा भागवतांचा निजमहिमा । अनपु म नाहीं उपमा ।


भावें भजोनि परुु षोत्तमा । परमात्मगरिमा पावले ॥ ६२४ ॥
हा भगवद‌भ् क्तांचा महिमा निरूपम आहे. त्याला उपमा नाही. एकनिष्ठेनें परुु षोत्तमाचे भजन करून ते श्रेष्ठ अशा परमात्मपदाला
पोचलेले असतात २४.

अगाध भगवंताची भक्ती । भक्तांची उत्कृ ष्ट प्राप्ती ।


ऐकतां विदेहचक्रवर्ती । आश्चर्यें चित्तीं चमत्कारला ॥ ६२५ ॥
अशा प्रकारची भगवंताची श्रेष्ठ भक्ति आणि भक्तांना होणारी भगवद‌प्र् ाप्ति ऐकून चक्रवर्ती जनक राजाच्या चित्ताला मोठे आश्चर्य
वाटले २५.

म्हणे धन्य धन्य भगवद‌भ् जन । हरिखें कवीस लोटागं ण ।


घालितां चालिलें स्फंु दन । रोमांचित नयन अश्रपु र्णू जाहले ॥ ६२६ ॥
'धन्य धन्य भगवद‌भ् जन' असें म्हणनू आनंदानें कवीला तो लोटांगण घालू लागला, तेव्हां त्याचा कंठ भरून येऊन हुदं के आवरतनासे
झाले, सर्वांगावर रोमांच उभे राहून अश्रंनू ी नेत्र भरून आले २६.
आनदं स्वेदें कापं त । नावेक राहिला तटस्थ ।
सवेंचि जाहला सावचित्त । म्हणे झणीं महतं न पसु तां जाती ॥ ६२७ ॥
आनंदाचा घाम फुटून आंग थरथर कापू लागले व तो क्षणभर तटस्थ होऊन राहिला. पण लगेच देहभानावर आला. कारण न जाणों,
हे महर्षि आपल्याला न विचारतां निघनू ही जातील असें त्याला वाटले २७.

ऐशिया अतिकाकुलतीं । नेत्र उघडोनि पाहे नृपती ।


बैसली देखोनि मनि
ु पक्त
ं ी । अतिशयें चित्तीं सख
ु ावला ॥ ६२८ ॥
अशा अत्यतं काकुळतीनें राजानें डोळे उघडून पाहिले, तो ऋषिमडं ळी बसलेली पाहून त्याच्या मनाला अत्यतं आनदं झाला २८.

तेणें संतोषें डोलत । म्हणे पर्णू प्राप्त भगवद‌भ् क्त ।


जगीं कै से कै से विचरत । तीं चिन्हें समस्त पसु ों पाहों ॥ ६२९ ॥
त्या आनदं ाच्या भरातं तो डोलंू लागला आणि म्हणाला, ज्यानं ा 'पर्णू प्राप्ति' झालेली असते, असे भगवद‌भ् क्त जगामध्यें कसकसे
वागतात, ती सारी लक्षणे आतां ह्यांस विचारून पाहूं २९.

श्रीराजोवाच -
अथ भागवतं ब्रतू यद्धर्मो यादृशो नृणाम् ।
यथाचरति यदब्र् तू े यैर्लिङ्गैर्भगवत्प्रियः ॥ ४४ ॥
श्लोक ४४- राजाने विचारले आता आपण मनष्ु यांपैकी भागवत कोणाला म्हणावे , ते सांगा त्याचे धर्म कोणते ? त्याचा स्वभाव कसा
असतो ? तो माणसाश ं ी कसा वागतो ? काय बोलतो ? आणि कोणत्या लक्षणामं ळ
ु े तो भगवतं ानं ा प्रिय होतो ? (४४)

भक्तां 'पर्णू प्राप्ति' सगु म । ऐकतां राजा निवाला परम ।


तो भक्तचिन्हानक्र ु म । समळ ू सवर्म पसू त ॥ ६३० ॥
भक्ताला 'पर्णू प्राप्ति' होणे सगु म आहे हे ऐकून राजाला अतिशय सतं ोष झाला. म्हणनू तो भक्ताच्ं या लक्षणाचं ा अनक्र
ु म व समळ
ू मर्म
विचारूं लागला ६३०.

विदेह म्हणे स्वामी मनु ी । पर्णू प्राप्ति आकळोनी ।


ते भक्त कै से वर्तती जनीं । तीं लक्षणें श्रवणीं लेववी मज ॥ ६३१ ॥
जनक राजा म्हणाला, महाराज ! मनि ु वर्य ! पर्णू प्राप्ति करून घेतलेले जे भगवद‌भ् क्त असतात, ते जगामध्यें वागतात तरी कसे ? ती
त्यांची सारी लक्षणे माझ्या कानांवर घालनू माझे कान अलंकृत करा ३१.

भक्तलक्षणभषू ण । तेणें मडि


ं त करा श्रवण ।
सावध ऐकतां संपर्णू । हो‍इजे आपण भगवत्प्रिय ॥ ६३२ ॥
भक्तांची लक्षणे हे एक प्रकारचे अलंकारच आहेत, ते घालनू माझे श्रवण भषू णयक्त
ु करा. ती सारी लक्षणे जर लक्ष लावनू श्रवण
के ली, तर आपणही भगवतं ाला प्रिय होऊ ३२.
त्याचं ा कोण धर्म कोण कर्म । कै से वर्तती भक्तोत्तम ।
हृदयीं धरोनि परुु षोत्तम । त्याचं ें बोलतें वर्म तें कै सें ॥ ६३३ ॥
त्यांचा धर्म कोणता ? त्यांचे कर्म कसे असते ? अंतःकरणामध्यें परुु षोत्तमाला ठे वनू ते कसे काय वागतात ? त्यांची बोलण्याची शैली
कशी ? ३३.

कोणेपरी कै शा स्थितीं । हरिभक्त हरीस प्रिय होती ।


ऐशिया लक्षणांचिया पंक्ती । समळ ू मजप्रती सांगिजे स्वामी ॥ ६३४ ॥
कोणत्या स्थितीनें आणि कोणत्या रीतीनें हरीचे भक्त हरीला प्रिय होतात ? स्वामी ! अशा लक्षणांच्या जितक्या मालिका असतील,
तितक्या साऱ्या मला सांगाव्यात ३४.

विदेहाच्या प्रश्नावरी । संतोषिजे मनु ीश्वरीं ।


कविधाकुटा जो कां हरी । तो बोलावया वैखरी सरसावला ॥ ६३५ ॥
ह्या जनक राजाच्या प्रश्नानें त्या सर्व मनु ीश्वरानं ा मोठा सतं ोष झाला व कवीहून धाकटा असा 'हरि' नावाचा बधं ु त्याच्या प्रश्नाचे उत्तर
देण्यास पढु े सरसावला ३५.

श्रीहविरुवाच -
सर्वभतू ेषु यः पश्येद् भगवद‌भ् ावमात्मनः ।
भतू ानि भागवत्यात्मन्येष भागवतोत्तमः ॥ ४५ ॥
श्लोक ४५- हरी म्हणाला आत्मस्वरूप भगवान सर्व प्राण्यांमध्ये आत्मरूपाने राहिले आहते, असे जो पाहातो, त्याचबरोबर सर्व
चराचर आत्मस्वरूप भगवंतांमध्येच आहेत, असे पाहातो, तो उत्तम भागवत समजावा. (४५)

हरि म्हणे रायाप्रती । अमित भक्तलक्षणस्थिती ।


एक दिगबं रत्वें वर्तती । एक स्वाश्रमस्थिती निजाचरें ॥ ६३६ ॥
राजाला हरि म्हणाला, "हे राजा ! भक्तलक्षणाचं े अनेक प्रकार आहेत. कोणी दिगबं र म्हणजे नग्न स्थितीमध्यें राहतात, आणि कोणी
आपला आश्रमधर्म पाळून आपल्याच आचारानें वागतात ३६.

एक सदा पडले असती । एकांची ते उन्मादस्थिती ।


एक सदा गाती नाचती । एक ते होती अबोलणे ॥ ६३७ ॥
कोणी सदासर्वदा स्वस्थ पडूनच राहातात, तर कोणी उन्मत्तासारखे वर्तन करतात. कोणी सर्वकाळ गातात व नाचतात, तर कोणी
मौनच धरून राहतात ३७.

एक गर्जनीं हरिनामें । एक निर्दाळिती निजकर्में ।


एक भतू दयाळू दानधर्में । एक भजननेमें राहती ॥ ६३८ ॥
कोणी हरिनामाचा घोष करीत असतात ; कोणी आपली कर्मेच टाकून देतात ; कोणी प्राणिमात्राविषयीं दया ठे वनू दानधर्म करीत
राहतात व कोणी भजनाचा नियम धरून राहतात ३८.

ऐशा अनंत भक्तस्थिती । सांगतां सांगावया नाकळे वृत्ती ।


त्यांमाजीं मख्ु य संकलितीं । राया तजु प्रती सांगेन ॥ ६३९ ॥
अशा भक्तांच्या स्थिति पष्ु कळ आहेत. त्या साऱ्या सांगणे शक्य नाही. ह्याकरितां हे राजा ! त्यांपैकी मख्ु य मख्ु य आहेत त्या
थोडक्यांत तल ु ा सांगतों ३९.

पर्णू प्राप्तीचा मख्ु य ठावो । सर्वां भतू ीं भगवद‌भ् ावो ।


हाचि पर्णू भक्तीचा निजगौरवो । तोचि अभिप्रावो हरि सांगे ॥ ६४० ॥
सर्व भतू ांमध्यें भगवंत भरलेला आहे असे पाहणें हेच पर्णू प्राप्तीचे मख्ु य स्वरूप व साधन आहे ; हाच पर्णू भक्तीचा निजगौरव आहे;
अशा अभिप्रायानें हरि बोलतो ६४०.

सर्व भतू ीं मी भगवतं । सर्व भतू ें मजआतं ।


भतू ीं भतू ात्मा मीचि समस्त । मीचि मी येथ परमात्मा ॥ ६४१ ॥
मीच भगवत्स्वरूप असनू सर्व भतू ामं ध्यें मीच व्यापलेलों आहे, माझ्यामध्येंच सर्व भतू ें आहेत, आणि सर्व भतू ामं धील भतू ात्मा मीच
असनू परमात्मा तो मीच आहे ४१;

ऐसें जें पर्णू त्वाचें मीपण । तेणें वाढे आत्माभिमान ।


सहजें निजनिरभिमान । तें शद्ध ु लक्षण ऐक राया ॥ ६४२ ॥
असें जें पर्णू त्वाचे मीपण असते, त्यानेंच आत्माभिमान वाढतो, व तो खराखरा निरभिमान सहज होतो. राजा तें शद्ध
ु लक्षण सांगतों
ऐक ४२.

शद्ध
ु भक्तांचें निजलक्षण । प्रत्यगात्मयाचें जें मीपण ।
तेंही माननि
ू यां गौण । भावना पर्णू त्याचं ी ऐसी ॥ ६४३ ॥
शद्धु भक्तांचे मख्ु य लक्षण असे आहे की, प्रत्यगात्माच आपण (प्रत्यगात्मा म्हणजे अवस्थात्रयसाक्षिचैतन्य; हेच मी आहे असें जें
वेदान्ताचें निजगह्य ु ) तेसद्ध
ु ां गौण समजनू त्याचं ी भावना पर्णू पणे अशी झालेली असते की ४३,

सर्वां भतू ी भगवतं । भतू ें भगवतं ी वर्तत ।


भतू ीं भतू ात्मा तोचि समस्त । मी म्हणणे तेथ मीपणा न ये ॥ ६४४ ॥
सर्व प्राणिमात्रामध्यें भगवंत आहे आणि सर्व प्राणिमात्र भगवंतामध्यें आहेत; प्राणिमात्रामध्यें असणारा असा जो परमात्मा तोच मी
आहे असे म्हटले म्हणनू काही मीपणाचा दोष येत नाहीं ४४.
सर्व भतू ीं भगवतं पाहीं । भतू ें भगवतं ाचे ठायीं ।
हें अवघें देखे जो स्वदेहीं । स्वस्वरूप पाहीं स्वयें होय ॥ ६४५ ॥
सर्व प्राणिमात्रामध्यें भगवंत आहे, आणि भगवंतामध्यें सर्व प्राणिमात्र आहेत असें जो मानतो आणि हे सारें जो आपल्याच देहामध्यें
पाहतो, तो स्वस्वरूपच बननू राहतो ४५.

तो भक्तांमाजीं अतिश्रेष्ठ । तो भागवतांमाजीं वरिष्ठ ।


त्यासी उत्तमत्वाचा पट । अवतार श्रेष्ठ मानिती ॥ ६४६ ॥
तो भक्तामं ध्यें अत्यतं श्रेष्ठ, तोच भागवतामं ध्यें वरिष्ठ, त्यालाच उत्तमत्वाचा मान देऊन श्रेष्ठ अवतार समजतात ४६.

तो योगियांमाजीं अग्रगणी । तो ज्ञानियांचा शिरोमणी ।


तो सिद्धांमाजीं मगु टु मणीं । हें चक्रपाणी बोलिला ॥ ६४७ ॥
योग्यामं ध्यें अग्रगणी तोच; ज्ञान्यामं ध्यें शिरोमणि तोच; आणि सिद्धामं ध्यें मक
ु ु टमणीही तोच. असें स्वतः श्रीकृ ष्णानें सागि
ं तले आहे
४७.

जैशा घृताचिया कणिका । घृतेंसीं नव्हती आणिका ।


तेवीं भतू ें भौतिकें व्यापका । भिन्न देखा कदा नव्हती ॥ ६४८ ॥
तपु ाच्या कण्या असतात त्या तपु ाहून जशा निराळ्या नसतात, त्याचप्रमाणें पंचमहाभतू े व भौतिक पदार्थ-प्राण्यांचे शरीरादिक-हे सर्व,
सर्वव्यापक परमात्म्याहून कधी भिन्न होत नाहीं ४८.

हे उत्तम भक्तांची निजस्थिती । राया जाणावी सनि


ु श्चितीं ।
आतां मध्यम भक्त कै से भजती । त्यांची भजनगती ऐक राया ॥ ६४९ ॥
हे राजा ! 'उत्तम' भक्तांची स्थिति ही अशा भावनेची असते असें तंू निश्चयानें जाण. आतां 'मध्यम' भक्त कसे भजतात, त्यांचीही
भजनपद्धति ऐकून ठे व ४९.

ईश्वरे तदधीनेषु बालिशेषु द्विषत्सु च ।


प्रेममैत्रीकृ पोपेक्षा यः करोति स मध्यमः ॥ ४६ ॥
श्लोक ४६- जो भगवतं ावं र प्रेम, त्याच्ं या भक्ताश
ं ी मैत्री, दःु खी व अज्ञान्यावं र कृ पा आणि भगवतं ाचं ा द्वेष करणार्‍याचं ी उपेक्षा करतो,
तो मध्यम प्रतीचा भागवत होय. (४६)

ईश्वर मानी उत्तमोत्तम । तद‌भ् क्त मानी मध्यम ।


अज्ञान तो मानी अधम । द्वेषी ते परम पापी मानी ॥ ६५० ॥
ईश्वर हा उत्तमोत्तम; त्याचे भक्त हे मध्यम; अज्ञानी हे अधम; आणि द्वेषी हे अत्यंत पातकी असे तो मानतो ६५०.
ईश्वरी 'प्रेम' पवित्र । भक्तासं ी 'मैत्री' मात्र ।
अज्ञानी तो कृ पापात्र । उपेक्षा निरंतर द्वेषियांची ॥ ६५१ ॥
ईश्वरावर मात्र त्याचे शद्ध ु प्रेम असते; भक्तांशी फक्त स्नेह असतो; अज्ञानी असतील त्यांच्यावर कृ पा असते; आणि भतू ांचा द्वेष
करणारा असतो त्याची तो निरंतर उपेक्षाच करतो ५१.

हे मध्यम भक्तांची भक्ती । राया जाण ऐशिया रितीं ।


आतां प्राकृ त भक्तांची स्थिती । तेही तजु प्रती सांगेन ॥ ६५२ ॥
हे राजा ! मध्यम भक्ताचं ी भक्ति ती अशा रीतीची असते, हे ध्यानात ठे व. आता 'प्राकृ त' भक्ताचं ी स्थिति कशी असते, तेही तल
ु ा
सांगतों ५२.

अर्चायामेव हरये पजू ां यः श्रद्धयेहते ।


न तद‌भ् क्तेषु चान्येषु स भक्तः प्राकृ तः स्मृतः ॥ ४७ ॥
श्लोक ४७- आणि जो भगवंतांच्या मर्ती ू चीच पजू ाअर्चा श्रद्धेने करतो, परंतु त्यांचे भक्त किंवा अन्य लोकांवर प्रेम करीत नाही, तो
कनिष्ठ भक्त होय. (४७)

पाषाणप्रतिमा हाचि देवो । तेथेंचि ज्याचा पर्णू भावो ।


भक्त-संत-सज्जनांसी पहा वो । अणमु ात्र देहो लवों नेदी ॥ ६५३ ॥
पाषाणाची मर्ति
ू हाच देव; तेथेच ज्याची सारी भक्ति. पण भक्त अथवा संत पाहून एक के सभरही देह वांकंू देत नाहीं ! ५३.

ते ठायीं साधारण जन । त्याची वार्ता पसु े कोण ।


त्यांसी स्वप्नींही नाही सन्मान । यापरी भजन प्राकृ ताचें ॥ ६५४ ॥
अशा ठिकाणी साधारण लोकांना कोण विचारतो ? त्यांना स्वप्नांतसद्ध ु ा कधी सन्मान मिळावयाचा नाही. ह्याप्रमाणें प्राकृ तांचे भजन
असतें ५४.

ऐशिया स्थितीं जो जड भक्तु । तो जाणावा मख्ु य प्राकृ तु ।


प्रतिमाभंगें अंतु । मानी निश्चित्य देवाचा ॥ ६५५ ॥
अशा अज्ञान स्थितीमधील जो भक्त असतो, तोच मख्ु य 'प्राकृ त' भक्त होय. त्याच्या मर्ती
ू चा भगं झाला म्हणजे देवाचा अतं झाला
असें तो समजतो ! ५५.

यापरी त्रिविध भक्त । सांगितले भजनयक्त ु ।


परी उत्तमांचीं लक्षणें अद‌भ् तू । ती सांगावया चित्त उदित माझें ॥ ६५६ ॥
अशा प्रकारे तीन प्रकारचे भजन करणारे लोक तल ु ा सांगितले. पण उत्तम भक्तांची लक्षणे के वळ अपर्वू असतात. ती सांगावयास माझें
मन अगदी उत्सक झाले आहे ५६.
गृहीत्वापीन्द्रियैरर्थान् यो न द्वेष्टि न हृष्यति ।
विष्णोर्मायामिदं पश्यन् स वै भागवतोत्तमः ॥ ४८ ॥
श्लोक ४८- जो इद्रि ं यांनी विषयांचे ग्रहण करतो, परंतु त्याबद्दल आवडनावड बाळगत नाही, ही सर्व भगवंतांचीच माया आहे, असे
मानतो, तो उत्तम भागवत समजावा. (४८)

इद्रि
ं यें विषयांतें सेविती । परी सख
ु दःु ख नमु टे चित्तीं ।
विषय मिथ्यात्वें देखती । ते जाण निश्चितीं उत्तम भक्त ॥ ६५७ ॥
इद्रि
ं यें विषयाचं े सेवन करीत असतात, तरी ज्याच्ं या चित्तामध्यें सख
ु -दःु ख उत्पन्न होत नाही. कारण विषय मिथ्या आहेत असे ते
मानतात; तेच खरोखर 'उत्तम भक्त' होत ५७.

मृगजळीं जेणें के लें स्नान । तो नाहतां कोरडाचि जाण ।


तेवीं भोगीं ज्यासं ी अभोक्तेपण । ते भक्त पर्णू उत्तमोत्तम ॥ ६५८ ॥
मृगजलामध्यें ज्यानें स्नान के लें. त्याचे स्नान झाले तरी तो कोरडाच असतो; त्याप्रमाणें भोग भोगण्यामध्येंही जे अलिप्त म्हणजे
अभोक्ते असतात. तेच पर्णू व उत्तमोत्तम भक्त होत ५८.

उत्तम भक्त विषय सेविती । हा बोलु रूढला प्राकृ ताप्रं ती ।


त्यांसी विषयीं नाहीं विषयस्फूर्ती । त्यागिती भोगिती दोनी मिथ्या ॥ ६५९ ॥
उत्तम भक्त विषयसेवन करतात असा सामान्य लोकांचा बोलवा अथवा समजतू असते. पण त्यांना माहीत नसते की, तशा भक्तांना
विषयामध्यें विषयस्फूर्तीच नसते. त्याचं े त्यागणे व भोगणे दोन्ही मिथ्याच असतात ५९.

स्वप्नींचें के ळें रायभोगें । जागा हो‍ऊनि खावों मागे ।


तेणें हातु माखे ना तोंडी लागे । तेवीं विषयसंगें हरिभक्त ॥ ६६० ॥
स्वप्नामधील के ळे अतिशय गोड लागले होते म्हणनू जागे झाल्यावर तो तेच खावयास माग ू लागला, तर ते हातालाही लागत नाही,
आणि तोंडांतही जात नाहीं; त्याप्रमाणें विषयसंगांत हरिभक्त अलिप्तच असतात ६६०.

येथवरी मिथ्या विषयभान । तरी सेवावया त्यांसी काय कारण ।


येथ प्रारब्ध बळी पर्णू । तें अवश्य जाण भोगवी ॥ ६६१ ॥
विषयभान जर इतकें मिथ्या आहे, तर त्यांनी त्याचे सेवन तरी का करावें ? (असें प्राकृ त लोक म्हणतात त्याचे उत्तर असें की),
प्रारब्धकर्म मोठे बलवत्तर असते, तेंच त्यांना विषय भोगण्यास भाग पाडते ६१.

परी मी एक विषयभोक्ता । ही स्वप्नींही त्यास नमु टे कथा ।


यालागीं उत्तम भागवतता । त्यासीच तत्त्वतां बाणली ॥ ६६२ ॥
परंतु मी एक विषयभोक्ता आहे, ही गोष्ट त्यांच्या स्वप्नांतसद्ध
ु ा येत नाहीं; म्हणनू च उत्तम भागवतपणा खराखरु ा त्यालाच बाणला असे
समजावे ६२.
यापरी विषयासक्तीं । वर्तिजे उत्तम भक्तीं ।
याहून अगाध स्थिती । सागं ेन तजु प्रती ते ऐक ॥ ६६३ ॥
उत्तम भक्त विषयसेवनांत अशा रीतीनें वागतात. आता ह्याहूनही एक अगाध स्थिति आहे, तीही तल
ु ा सांगतों ऐक ६३.

देहन्द्रि
े यप्राणमनोधियां यो
जन्माप्ययक्षतु ् भयतर्षकृ च्छ्रै ः ।
संसारधर्मैरविमह्य ु मानः
स्मृत्या हरे र्भागवतप्रधानः ॥ ४९ ॥
श्लोक ४९- जन्ममृत्य,ू तहानभक ू , श्रम, भय आणि लालसा हे विकार क्रमशः शरीर, प्राण, इद्रि
ं ये, मन आणि बद्ध
ु ी यांना होत
असतातच जो भगवंतांचे स्मरण करण्यात इतका तन्मय झालेला असतो की, या प्रापंचिक गोष्टींनी त्रस्त होत नाही, तो उत्तम भागवत
होय. (४९)

देह-इद्रि
ं य-मन-बद्धिु -प्राण । हेंचि बधं ाचें पचं ायतन ।
क्षधु ा तृषा भय क्लेश पर्णू । जन्ममरण इत्यादि ॥ ६६४ ॥
देह, इद्रि
ं यें, मन, बद्धि
ु आणि प्राण हीच बधं ाची पाचं स्थानें आहेत. आणि त्यातं क्षधु ा, तृषा, भय, क्लेश, जन्म, मरण इत्यादि भरलेली
आहेत ६४.

या पांचां स्थानीं अपार श्रम । या नांव म्हणिजे ससं ारधर्म ।


निजभक्तां प्रसन्न आत्माराम । त्यांसी भवभ्रम स्वप्नींही नाहीं ॥ ६६५ ॥
ह्या पांचही ठिकाणी अत्यंत कष्ट असतात. ह्यालाच 'संसारधर्म' असें नांव आहे. परंतु श्रीआत्माराम आपल्या भक्तांवर सदासर्वदा
प्रसन्न असतो, म्हणनू त्यांना भवभ्रम स्वप्नांतसद्ध
ु ां शिवत नाहीं ६५.

क्षधु ा लागलिया दारुण । आन्नआकांक्षें पीडे प्राण ।


भक्तां क्षधु ेची नव्हे आठवण । ऐसें अगाध स्मरण हरीचें ॥ ६६६ ॥
अपरिहार्य क्षधु ा लागली म्हणजे अन्नाच्या इच्छे नें इतरांचा प्राण व्याकुळ होतो, परंतु भक्त लोक हरिस्मरणांत इतके गढून गेलेले
असतात की, त्यापढु े त्यानं ा क्षधु ेची आठवणही होत नाहीं ६६.

भावें करितां भगवद‌भ् क्ती । क्षधु ेतषृ ेची नव्हे स्फूर्ती ।


एवढी पावले अगाध प्राप्ती । ते भवभयें निश्चितीं डंडळतीना ॥ ६६७ ॥
अंतःकरणपर्वू क भगवद‌भ् क्ति के ली असतां भक ू व तहान ह्यांची आठवण होत नाही. एवढी थोर प्राप्ति ज्यांना झालेली असते, ते
खरोखर संसारभयानें घाबरून जात नाहीत ६७.
मनामाजीं भवभयभरणी । तें मन रातलें हरिचरणीं ।
आतां भयातें तेथ कोण मानी । मन मनपणीं असेना ॥ ६६८ ॥
संसाराचे भय मनामध्यें असते, आणि त्यांचे मन तर हरिचरणामध्यें रंगनू गेलेले असते; मग भयाला कोण मानणार ? कारण, तेथें
मनाला मळ ु ी मनोधर्मच राहत नाहीं ६८.

मनीं स्फुरे द्वैताची स्फूर्ती । तेथ भवभयाची दृढस्थिती ।


ते मनीं जाहली हरीची वस्ती । यालागीं भवभयनिवृत्ती द्वैतेंसीं ॥ ६६९ ॥
मनामध्यें द्वैताची भावना उत्पन्न होते व त्यामळ ु ें ससं ारभय दृढावत जाते. अशा त्या मनामध्यें भगवतं ाची वस्ती झाली की,
द्वैतासहवर्तमान भवभयाची निवृत्ति सहज होते ६९.

देहबद्ध
ु ीमाजीं जाणा । नानापरी उठती तृष्णा ।
ते बद्ध
ु ी निश्चयें हरीच्या स्मरणा । करितां परिपर्णा
ू विनटली स्वयें ॥ ६७० ॥
देहबद्ध
ु ीमध्यें नाना प्रकारच्या तृष्णा म्हणजे वासना उठतात; पण तीच बद्धि
ु निश्चयेंकरून हरीचे स्मरण करूं लागली, की तेथेंच पर्णू पणे
जडून जाते ६७०.

जेथें जें जें स्फुरे तृष्णास्फुरण । तेथें स्वयें प्रगटे नारायण ।


तेव्हां तृष्णा होय वितृष्ण । विरे संपर्णू पर्णा
ू माजीं । ६७१ ॥
त्या बद्ध
ु ीत मग जी जी तृष्णा स्फुरण पावते, त्या त्या तृष्णेत सहज नारायण प्रगट होतो. त्यामळ
ु ें तृष्णा वितृष्णा होते व पर्णू त्वांत
विरून जाते ७१.

यापरी गा तृष्णारहित । हरिस्मरणें भगवद‌भ् क्त ।


इद्रि
ं यक्लेशां भक्त अलिप्त । तोही वृत्तांत ऐक राया ॥ ६७२ ॥
ह्याप्रमाणें भगवद‌भ् क्त असतात ते हरिस्मरणानें तृष्णारहित होऊन जातात, त्यामळ
ु ें इद्रि
ं याच्ं या क्लेशापं ासनू ते अलिप्त राहतात. राजा !
तोही प्रकार ऐक ७२.

मख्ु य कष्टाचें अधिष्ठान । इद्रि


ं यकर्मी ं राया जाण ।
ते इद्रि
ं यकर्मी ं ब्रह्मस्फुरण । हरिभक्तां पर्णू हरिभजनें ॥ ६७३ ॥
कष्ट होण्याचे मख्ु य बीज इद्रि ं यांच्या कर्मामध्यें असते. त्या इद्रि
ं यकर्मामध्यें हरिभक्तांना हरिभजनाच्या योगें ब्रह्मस्फुरणच पर्णू पणे होत
राहते ७३.

दृष्टीनें घे‍ऊं जातां दर्शन । दृश्यमात्रीं प्रगटे नारायण ।


श्रवणीं शब्द घेतां जाण । शब्दार्थी ं पर्णू विराजे वस्तु ॥ ६७४ ॥
दृष्टीनें पाहावयास जावें, तो जें जें 'दृश्य' दिसते त्या त्या दृश्य पदार्थात नारायणच प्रगट होतो. कानानें 'शब्द' ग्रहण करीत असतां, त्या
शब्दाच्या ध्वनीमध्यें व अर्थामध्यें ब्रह्मच पर्णू पणे विराजमान होतें ७४.
घ्राणीं घेतां नाना वासु । वासावबोधें प्रगटे परे शु ।
रसना सेवी जो जो रसु । रसीं ब्रह्मरसु निजस्वादें प्रगटे ॥ ६७५ ॥
नाकानें अनेक प्रकारचे 'गंध' म्हणजे वास घेतांना त्या वासांच्या ज्ञानामध्यें परमेश्वरच प्रगट होतो. त्याचप्रमाणें जिव्हा जे जे 'रस' सेवन
करते, त्या त्या रसांमध्यें स्वादरूपानें ब्रह्मरसच प्रगट होतो ७५.

देहीं लागतां शीत-उष्ण । अथवा कां मृद-ु कठीण ।


तेथें स्पर्श ज्ञानें जाण । चिन्मात्र पर्णू प्रगटे स्वयें । ६७६ ॥
देहाला काही शीत-उष्ण किंवा मृद-ु कठिण लागले, तर त्या 'स्पर्श' ज्ञानानें त्यांच्यांत मळ
ू चे चित्स्वरूपच पर्णू पणे प्रगट होते ७६.

आतां कर्मेंद्रियप्रवृत्ती । तेथही स्फुरे ब्रह्मस्फुर्ती ।


घेणें देणें गमनस्थिती । इद्रिं यां गती आत्मारामें ॥ ६७७ ॥
आतां हस्तपादादि कर्मेंद्रियप्रवृत्तींत ही ब्रह्माचीच स्फूर्ति स्फुरत असल्यामळ
ु ें घेणे-देणे, किंवा जाणे-येणे इत्यादि इद्रि
ं यांचें चलनवलन
आत्मारामच करीत असतो, असा त्यानं ा अनभु व येतो ७७.

ऐसे करितां इद्रि


ं यें कष्ट । ते कष्टीं होय निजसख
ु प्रगट ।
तेणें इद्रि
ं यां विश्रांति चोखट । पिकली स्वानंदपेठ हरिभक्तां ॥ ६७८ ॥
अशा रीतीनें इद्रिं यें कष्ट करूं लागली असता त्या कष्टामं ध्येंही आत्मसख ु प्रगट होते. तेणेंकरून इद्रि
ं यानं ा उत्तम प्रकारची विश्राति

मिळते. ह्याप्रमाणें हरिभक्तांच्या वाट्यास स्वानंदाची पेठच पिकून राहाते ७८.

जेणें इद्रि
ं यां कष्ट होती । तेणेंचि इद्रि
ं या सखु प्राप्ती ।
हे भगवद‌भ् जनीं निजयक्त ु ी । भोगिजे हरिभक्ती हरीचेनि स्मरणें ॥ ६७९ ॥
इद्रि
ं यांना ज्याच्यामळ ु ें कष्ट घडतात, त्याच्यामळ ु े च त्या इद्रि
ं यांना सख
ु होते, ही भगवद‌भ् जनांमधील निजयक्ति
ु आहे. ह्याप्रमाणें
हरिभक्त हरीच्या स्मरणानें नित्यमक्ति
ु भोगीत असतात ७९.

जन्म आणि मरण । हें देहाचे माथां जाण ।


भक्त देहीं विदेही पर्णू । ध्यातां हरिचरण हरिरूप जाहले ॥ ६८० ॥
जन्म आणि मरण ही देहाच्याच कपाळी लागली आहेत . पण भक्त हे देहांत असनू पर्णू विदेही असतात. कारण हरिचरणांचें ध्यान
करतां करतां ते हरिरूप होऊन जातात. ६८०.

यालागीं देहाची अहतं ा । कदा नपु जे भगवद‌भ् क्तां ।


ते भक्तपर्णू तेची कथा । ऐक नृपनाथा सांगेन ॥ ६८१ ॥
ह्यामळ
ु ें भगवद‌भ् क्तानं ा देहाची अहतं ा कधीच उत्पन्न होत नाही. हे राजाधिराजा ! त्या भक्ताच्या पर्णू तेचे वर्णन सागं तों, ऐक ८१.
देह धरिल्या पंचाननें । भक्त न डंडळी जीवें प्राणें ।
वध्ं यापत्रु सळ
ु ीं देणें । देहाचें मरणें तेवीं देखे ॥ ६८२ ॥
देह हा वाघानें धरला तरी, भक्त असतो तो मनांत मळ ु ीच डगमगत नाही. वाझं ेच्या मल
ु ाला सळ
ु ी दिल्याप्रमाणेच देहाचे मरण आहे
असें तो समजतो ८२.

छाया पालखीं बैसावी । ऐसें कोणी चितं ीना जीवीं ।


तैशी देहासी पदवी यावी । हा नठु ी सद‌भ् ावीं लोभ भक्तां ॥ ६८३ ॥
पालखींत आपली छाया बसावी असे कधीच कोणाच्या मनात येत नाहीं; त्याप्रमाणें देहाला मोठी पदवी म्हणजे मानमान्यता प्राप्त
व्हावी असा लोभ, भक्तांना स्वभावगत्याच उत्पन्न होत नाहीं ८३.

देहासी आलिया नाना विपत्ती । भक्तां खेदु नमु टे चित्तीं ।


जेवीं आकाश शस्त्रघातीं । न ये काकुळती तैसे ते ॥ ६८४ ॥
किंवा देहाला हव्या तितक्या विपत्ति प्राप्त झाल्या, तरी भक्ताच्ं या मनातं त्याविषयीं कधीं खेदही उत्पन्न होत नाही. आकाशावर
तरवारीचा घाव के ला तर, ते जसें कधी काकुळतीला येत नाही, त्यांतलाच तो प्रकार होय ८४.

जननीजठरीं देहो जन्मला । भक्तु न म्हणे मी जन्मा आला ।


रवि थिल्लरु ीं प्रतिबिबं ला । थिल्लरु मी जाहला कदा न म्हणे ॥ ६८५ ॥
देह हा आईच्या पोटी जन्मास आला, त्यायोगें 'मी जन्मास आलों' असें भक्त म्हणत नाही. डबक्यामध्यें सर्या
ू चे प्रतिबिबं पडले, तर
मी डबकं झालों असें कांहीं सर्यू म्हणत नाहीं ८५.

सायप्रं ातः सर्यू प्रकाशे । अभ्रीं गधं र्वनगर आभासे ।


देह प्रतिपाळी अदृष्ट तैसें । म्यां के लें ऐसें स्फुरे ना ॥ ६८६ ॥
सकाळपासनू संध्याकाळपर्यंत सर्यू प्रकाशतो; त्या प्रकाशानें ढगांमध्यें गंधर्वनगराचा भास होतो; (गंधर्वनगर मी उत्पन्न के ले असें सर्यू
म्हणत नाहीं); त्याप्रमाणें अदृष्ट आहे तेच देहाचा साभं ाळ करते. तेथे मी करतों असें त्याच्या मनातं उठत नाहीं ८६.

भक्तदेहासी येतां मरण । हेतरु हित हरीचें स्मरण ।


यालागीं देह निमाल्या आपण । न मरतां पर्णू पर्णू त्वें उरें ॥ ६८७ ॥
भक्ताच्या देहाला मरण प्राप्त झाले तरी, त्याला हेतरु हित हरीचे स्मरण असते. यामळ
ु ें देह पडला तरी आपण न मरतां तो पर्णू त्वाच्या
योगें पर्णू त्वानेंच उरतो ८७.

थिल्लरु ा समळ ू नाशु झाला । तरी रवि न म्हणे तो निमाला ।


तेवीं देहो गेलिया भक्त उरला । सद‌रू
् पें सचं ला हरिस्मरणें ॥ ६८८ ॥
डबके सारें आटून गेलें तरी, सर्यू काहं ीं 'मी नाहींसा झालों' असे समजत नाहीं; तद्वत् देह गेला तरी भक्त हरिस्मरणाच्या योगें सद‌रू
् पानें
विश्वांत साठलेला असतो. ८८.

आधीं काय सर्पु मारावा । मग दोरातें दोरु करावा ।


तो न पालटतां निजगौरवा । दोरूचि अघवा दोररूपें ॥ ६८९ ॥
दोरावर भासणाऱ्या सर्पाला काय आधी मारून मग दोराला दोर करावा लागतो ? नाही. आपल्या मळ
ू स्वरूपानें न पालटतांच सारा
दोर दोराच्या रूपानेंच अखंड असतो ८९.

तेवीं हरिभक्तां देहाच्या अभावो । मा काळ कवणा घालील घावो ।


आतां आम्ही ते आम्हीच आहों । तें आम्हीपणही वावो आमचु ेनि आम्हां ॥ ६९० ॥
त्याप्रमाणें हरिभक्ताला देहाचा अभाव असतो. मग काळ घाव घालणार तरी कोणावर ? आतां आम्ही ते आम्हीच म्हणजे ब्रह्मरूप
आहों, आणि त्या ब्रह्मत्वामळ ु ें आमचा आम्हीपणा (देह हाच मी असा अभिमान) व्यर्थ झाला ६९०.

एत्यादि ससं ारदेहधर्म । ज्यासी स्पर्शों न शके कर्माकर्म ।


मोहें नव्हेचि भवभ्रम । तो भक्तोत्तम प्रधानत्वें ॥ ६९१ ॥
ह्याप्रमाणें ससं ारातं ील जे देहधर्म आहेत ते, व कर्माकर्म, ही ज्याला शिवतसद्ध
ु ा नाहीत, मोहानें ज्याला भवभ्रम कधीच होत नाही,
तोच मख्ु यत्वेकरून 'भक्तोत्तम' होय ९१.

राया आणिकही एक खणू । तजु मी सांगेन संपर्णू ।


ज्याचा काम होय नारायण । तें भक्तलक्षण अवधारीं ॥ ६९२ ॥
राजा ! तल
ु ा आणखीही एक खणू सांगतो. ज्याचा कामसद्ध ु ा नारायण होतो असें भक्तलक्षण ऐक ९२.

न कामकर्मबीजानां यस्य चेतसि सम्भवः ।


वासदु वे ैकनिलयः स वै भागवतोत्तमः ॥ ५० ॥
श्लोक ५०- ज्याच्या मनामध्ये विषयभोगाचं ी इच्छा, कर्मप्रवृत्ती आणि त्याचं े बीज असणारी वासना याचं ा उदय होत नाही आणि जो
के वळ वासदु वे ांच्या आश्रयानेच राहातो, तो उत्तम भागवत होय. (५०)

हृदयीं चिंतितां आत्माराम । तद‌रू ् प जाहला हृदयींचा काम ।


त्यासी सर्व कर्मी परुु षोत्तम । देवदेवोत्तम तष्टु ोनि प्रगटे । ६९३ ॥
अंतःकरणांत आत्मारामाचे चिंतन करता करता हृदयांतील काम आत्माराम होतो. त्याला देवाधिदेव परुु षोत्तम संतष्टु होऊन सर्व
कर्मांत प्रगट होतो ९३.

तेथें ज्या ज्या वासना हृदयवासी । त्याही पडकल्या हरिमख


ु ासी ।
एवं वासना जडल्या हरिरूपाशीं । हरि आश्रयो त्यांसी दृढ जाहला ॥ ६९४ ॥
तेव्हां हृदयातं ज्या ज्या वासना असतात, त्या त्या सर्व हरिसख
ु ालाच चिकटतात; अशा रीतीनें साऱ्या वासनाच हरिरूपाशी जडल्या
म्हणजे त्याला हरि हाच दृढ आश्रय होऊन राहतो ९४.

तेथ जो जो भक्तांसी कामु । तो तो होय आत्मारामु ।


वासनेचा निजसंभ्रमु । परुु षोत्तमु स्वयें होये ॥ ६९५ ॥
त्या वेळी भक्ताचा जो जो काम (विषयाभिलाष) असतो तो तो आत्मारामच होतो. त्याच्या वासनेचा निजसंभ्रम स्वतः परुु षोत्तमच
होतो ९५.

जगीं हरिभक्ति उत्तमोत्तम । भक्त कामेंचि करी निष्काम ।


चाळितां वासना-अनक्र ु म । निर्वासन ब्रह्म प्रकाशे स्वयें ॥ ६९६ ॥
जगामध्यें हरीची भक्ति उत्तमांतील उत्तम आहे; ती भक्ताला कामानेंच निष्काम करते. एकामागनू एक उद‌भ् वणाऱ्या वासनांचा
अनक्र
ु म न्याहाळू लागले म्हणजे निर्वासनारूप ब्रह्म आपोआप प्रकाशित होते. (एक वृत्ति नाहींशी झाली व दसु री जोपर्यंत उठली
नाहीं तोपर्यंत म्हणजे त्या संधिकालांत निर्विकल्प चैतन्य स्पष्ट भासंू लागते.)९६.

ग्रासोग्रासीं रामस्मरण । तें अन्नचि होय ब्रह्म पर्णू ।


भक्त भोगी मक्त ु पण । या रीतीं जाण विदेहा ॥ ६९७ ॥
घांसाघांसाला रामाचे स्मरण के ले असतां तें अन्नच पर्णू ब्रह्म होते. हे जनकराजा ! ह्या रीतीनेंच भक्त हा विषयांत मक्त
ु स्थिति
अनभु वितो ९७.

ऐसा जो निष्कामनिष्ठ । तोचि भागवतांमाजीं श्रेष्ठ ।


त्यासीच प्रधानत्वपट । जाण तो वरिष्ठ उत्तमत्वें ॥ ६९८ ॥
असा जो निष्कामनिष्ठ असतो, तोच भागवतांमध्यें श्रेष्ठ होय. त्यालाच मख्ु यत्वाचा मान देणे योग्य आहे. तो आपल्या उत्तमत्वानेंच
श्रेष्ठ आहे असे समज ९८.

उत्तम भक्त कै से विचरती । त्या भक्ताचं ी विचरणस्थिती ।


ते सांगितली राया तजु प्रती । यथानिगतु ी तीं श्लोकीं ॥ ६९९ ॥
राजा ! उत्तम भक्त कसे वर्तत असतात, ती त्याचं ी वर्तनस्थिति तल
ु ा तीन श्लोकानं ी सागि
ं तली ९९.

उत्तम भक्त कोणें लिगं ेंसी । आवडते जाहले भगवतं ासी ।


तें लक्षण सांगावयासी । अति‍उल्हासीं हरि बोले ॥ ७०० ॥
ह्यानंतर उत्तम भक्त हे कोणत्या गणु ांमळ
ु ें भगवंताला प्रिय होत असतात ते लक्षण सांगण्यासाठी अत्यंत उल्हासानें हरि बोलू लागला
७००.
न यस्य जन्मकर्मभ्यां न वर्णाश्रमजातिभिः ।
सज्जतेऽस्मिन्नहभं ावो देहे वै स हरे ः प्रियः ॥ ५१ ॥
श्लोक ५१ - ज्याला या शरीराचा, चांगल्या कुळात जन्मल्याचा, तसेच वर्ण, आश्रम आणि जातीचाही अहक
ं ार नसतो, तोच
भगवतं ानं ा प्रिय असतो. (५१)

प्राकृ तां देहीं देहाभिमान । तेणें गरुु कृ पा करितां भजन ।


पालटे अभिमानाचें चिन्ह । अहं नारायणभावनायक्त ु ॥१॥
सामान्य लोकानं ा देहात्मभाव असतो. त्यानें गरुु कृ पा सपं ादन करून भजन के ले असता त्याच्या अभिमानाचे स्वरूप 'मी स्वतः
नारायणस्वरूप आहे' ह्या भावनेंत पालटते १.

अहं देह हें समळ


ू मिथ्या । अहं नारायण हें सत्य सत्त्वतां ।
ऐशी भावना दृढ भावितां । ते भावना‍आतं ौता अभिमान विरे ॥ २ ॥
'मी देह' ही भावना समळ ू मिथ्या आहे; वस्ततु ः 'मी नारायण' हेच खरे आहे. अशा भावनेचा अभ्यास दृढ झाला असता त्या
भावनेमध्येंच अभिमान विरून जातो २.

अभिमान हरिचरणीं लीन । तेव्हां भक्त होय निरभिमान ।


तेंचि निरहतं ेचें लक्षण । हरि संपर्णू सांगत ॥ ३ ॥
देहाभिमान हरिचरणाच्या ठायीं लीन झाला म्हणजे भक्त निरभिमान होतो. तेंच निरहतं ेचे लक्षण हरि पर्णू पणे सांगत आहे. ३.

निरहक ं ाराचीं लक्षणें । तो जन्मोनि मी जन्मलों न म्हणे ।


सवु र्णाचें के लें शनु ें । तरी सोनें श्वान हों नेणे तदाकारें असतां ॥ ४ ॥
निरहक ं ाराची लक्षणें अशी की, तो जन्मनू मी जन्मलों असें म्हणत नाहीं. सोन्याचे कुत्रे के ले तरी, सोनें कुत्र्याच्या आकारांत
असतानं ाहीं कुत्रे होऊ शकत नाहीं ४.

तेवीं जन्मादि अहभं ावो । उत्तम भक्तां नाहीं पहा हो ।


कर्मक्रियेचा निर्वाहो । अहक
ं र्ता स्वयमेवो मानीना ५ ॥
त्याप्रमाणें जन्मादिकाचा अहभं ाव उत्तम भक्ताला असत नाही. तो कर्मक्रियेचा नित्यक्रम चालवितो, पण त्याचा 'कर्ता मी' असें मात्र
म्हणत नाहीं ५.

तो कर्म करी परी न म्हणे मी कर्ता । जेवीं गगनीं असोनि सविता ।


अग्नि उपजवी सर्यू कांता । तेवीं करोनि अकर्ता निजात्मदृष्टीं ॥ ६ ॥
सर्यू ज्याप्रमाणें आकाशांत असनू ही (पृथ्वीवरील) सर्यू कांतापासनू अग्नि उत्पन्न करतो, त्याप्रमाणें उत्तम भक्त सर्व कर्में करूनही
आत्मदृष्टीनें अकर्ता असतो ६.
सर्येू सर्यू कातं ीं अग्निसगं । तेणें होतु याग कां दाघ ।
तें बाधंू न शके सर्या ू चें अंग । तेवीं हा चांग करूनि अकर्ता ॥ ७ ॥
सर्या
ू मळ ु ें सर्यू कांतापासनू अग्नि उत्पन्न होतो, त्या अग्नीनें मग यज्ञ होवोत की दावाग्नि भडको; त्यानें सर्या
ू चे अंग कांहीं भाजू शकत
नाही, त्याप्रमाणें हाही सर्व करून शद्ध ु अकर्ता असतो ७.

अचेतन लोह चंबु कें चळे । लोहकर्में चंबु क न मैळे ।


तेवीं हा कर्में करूनि सकळें । अनहक
ं ृ तिबळें अकर्ता ॥ ८ ॥
न हालणारे म्हणजे जड-अचेतन असे लोखडं लोहचबंु कामळ ु ें हालू लागते; पण लोखडं ाच्या त्या हालचालीपासनू लोहचबंु काला
कसलीच बाधा होत नाही, तो क्रियावान् होत नाही. त्याप्रमाणें हाही सर्व कर्में करून निरभिमानपणाच्या जोरावर अकर्ता असतो ८.

देहींचीं कर्में अदृष्टें होती । मी कर्ता म्हणतां तीं बाधती ।


भक्तां सर्व कर्मी ं अनहक ं ृ ती । परमात्मप्रतीती भजनयोगें ॥ ९ ॥
देहाची कर्में प्रारब्धानें होत असतात; त्यांचा कर्ता 'मी' असे म्हटले की, ती बाधक होतात. परंतु भजनाच्या योगें परमात्मप्रतीतीमळ
ु ें
सर्व कर्मांत भक्त निरहक ं ारच असतो ९.

एवं देहींचीं कर्में निपजतां । पर्णू प्रतीती भक्त अकर्ता ।


कर्माकर्माची अवस्था । नेघे तो माथां अनहक ं ृ ती ॥ १० ॥
ह्या प्रकारे , देहाची कर्में चालली असतां पर्णू प्रतीतीमळ ु ें म्हणजे पर्णू त्वाच्या अनभु वामळ
ु ें भक्त अकर्ताच असतो. तो स्वाभाविक
निरहक ं ृ तीमळु ें कर्माकर्मांचा भार माथ्यावर घेतच नाहीं ७१०.

जरी जाहला उत्तमवर्ण । तरी तो न म्हणे मी ब्राह्मण ।


स्फटिक कंु कुमें दिसे रक्तवर्ण । । "मी लोहीवा पर्णू " स्फटिक न म्हणे ॥ ११ ॥
आपला जन्म उत्तम वर्णांत झालेला असला, तरी 'मी ब्राह्मण' असें तो म्हणत नाही. कंु कुमामध्यें ठे वलेला स्फटिक लाल वर्णाचा
दिसतो, पण तो स्फटिक 'मी लाल आहे,' असे कधी म्हणत नाहीं ११.

ज्यासी नाही देहाभिमान । तो हाती न धरी देहाचा वर्ण ।


तैसाचि आश्रमाभिमान । भक्त सज्ञान न धरी कदा ॥ १२ ॥
ज्याला देहाचा अभिमान नसतो तो देहाचा वर्ण घेऊन बसत नाही, त्याचप्रमाणें ज्ञानसंपन्न भक्त आश्रमाचाही कधी अभिमान
बाळगीत जाही १२.

अगं ीं बाणला संन्यासु । परी तो न म्हणे मी परमहसं ु ।


जेवी नटा‍अंगीं रजविलासु । तो राजउल्हासु नट न मानी ॥ १३ ॥
तो देहानें संन्यासाश्रमी झाला, तरी 'मी परमहसं ' म्हणजे संन्यासी असे तो म्हणत नाही. नाटकांत नटाच्या अंगावर राजविलासी
पोषाख चढविला, तरी तो नट 'मी राजा झालों' असें मानीत नाहीं १३.
तेवीं आश्रमादि अवस्था । भक्त न धरीच सर्वथा ।
तैशीच जातीचीही कथा । न घे माथां भक्तोत्तम ॥ १४ ॥
त्याप्रमाणें भक्त आश्रमादि अवस्थेचा अभिमान धरीत नाही. तसेंच उत्तम भक्त जातीचाही भार माथ्यावर घेत नाहीं १४.

जाती उंच नीच असंख्य । परी तो न म्हणे हे माझीचि एक ।


जेवीं गगं ातीरीं गावं अनेक । परी गगं ा माझा एक गावं न म्हणे ॥ १५ ॥
उंच-नीच अशा पष्ु कळ जाती आहेत, परंतु त्यांतली अमकी एक जात 'माझी,' असे तो म्हणत नाही. ज्याप्रमाणें गंगेच्या तीरीं अनेक
गांवे असतात, पण त्यांतला अमक ु एक गांव 'माझा' असें गंगा म्हणत नाहीं १५,

तेवीं जन्म-कर्म-वर्णा-श्रम-जाती । पर्णू भक्त हातीं न धरिती ।


चहूं देहांची अहक ं ृ ती । स्वप्नींही न धरिती हरिभक्त ॥ १६ ॥
त्याप्रमाणें पर्णू भक्त असतात ते जन्म, कर्म, वर्णाश्रम व जाती ह्यांचा अभिमान बाळगीत नाहीत. ते स्थल
ू , सक्ष्ू म, कारण व महाकारण
अशा चारी देहाचं ा अभिमान स्वप्नातं ही धरीत नाहीत. १६.

आशक ं ा ॥ तरी काय वर्णाश्रम-जाती । भक्त निःशेष साडिं ती ।


त्यांत असोनि नाहीं अहक ं ृ ती । ते हे उपपत्ति बोलिलो राया ॥ १७ ॥
[आशक ं ा-] तर मग भक्त असतात ते, वर्णाश्रम-जाती सर्वच टाकून देतात की, काय ? [उत्तर- तर तसे नव्हे; ते त्यातं असनू त्याचं ा
अहक ं ार त्यांना असत नाही, अशी त्याची उपपत्ति तल ु ा सांगितली १७.

तो जेव्हां पावे जन्मप्राप्ती । तेव्हां त्यासवें नाहीं वर्णाश्रम-जाती ।


जन्मअभिमानें माथां घेती । हे कुळगोत-जाति पैं माझी ॥ १८ ॥
जीव जेव्हां जन्मास येतो, तेव्हां त्याच्याबरोबर काही वर्णाश्रम-जात वगैरे येत नाही; तर जन्माभिमानानें कुल, गोत, जात ही माझी
असें तो आपल्या माथीं घेतो १८.

ऐशा नाथिल्या अहक ं ृ ती । ब्रह्मादिक गतंु ले ठाती ।


वाढविता वर्णाश्रम जाती । सज्ञान गंतु ती निजाभिमानें ॥ १९ ॥
अशा नसत्या अभिमानानें ब्रह्मदेवादिकसद्ध ु ा गंतु नू पडतात. वर्णाश्रमधर्म व जाती वाढवनू मोठमोठे विद्वानसद्ध
ु ा आपआपल्या
अभिमानातं गतंु नू राहतात १९.

ऐशी अहतं ेची अतिदर्धु र गती । येथें ब्रह्मादिकां नव्हे निवृत्ती ।


सोडूं नेणे गा कल्पांती । सज्ञान ठाकिजेती निजाभिमानें ॥ २० ॥
अहतं ेची अशी मोठी दर्धु र गति आहे. ब्रह्मादिकाचं ीसद्ध ु ा त्यातं नू सटु का होत नाही. कल्पातं ीसद्ध
ु ा त्यानं ा ती सटु त नाही. मोठे
ज्ञानसंपन्न असतात तेसद्ध ु ां स्वाभिमानानें फसले जातात ७२०.
येथें भक्तांच्या भाविक स्थितीं । अभिमान तटु े भगवद‌भ् क्तीं ।
ते निरभिमान भक्तस्थिती । राया तजु प्रती दाविली स्वयें ॥ २१ ॥
इकडे भक्तांच्या भाविक स्थितीत भगवद‌भ् क्तीमळे अभिमान नाहीसा होऊन जातो. हे राजा ! ती भक्तांची निरभिमान स्थिति तल
ु ा
दाखवनू दिली २१.

समळ ू देहाभिमान झडे । तो देहीचि देवासी आवडे ।


ते भक्त जाण वाडेकोडें । लळे वाडे हरीचे ॥ २२ ॥
ज्याचा देहाभिमान समळ ू झडून जातो, तोच देहधारी देवाला प्रिय होतो. असे भक्तच देवाचे अत्यंत लाडके होतात, हे लक्षात ठे व
२२.

ते जें जें मागती कौतक ु ें । तें देवोचि होय तितक ु ें ।


त्यांचेनि परम संतोखें । देव सख ु ावला सख ु ें दोंदिल होये ॥ २३ ॥
ते जें जें कौतक
ु ानें मागतात, तें तें सर्व देवन स्वतः होतो. त्याच्ं या परम सतं ोषानें देवही सख
ु ी, सतं ष्टु व पष्टु होतो. २३.

तो जिकडे जिकडे जाये । देव निजांगें ते‍उता ठाये ।


भक्त जे‍उती वास पाहे । देव ते ते होय पदार्थ ॥ २४ ॥
भक्त जिकडे जिकडे जातो, तिकडे तिकडे देव स्वतःच उभा राहतो. भक्त ज्याची इच्छा करतो अथवा जे जे पदार्थ पाहतो, ते ते पदार्थ
देवच होतो २४.

त्यासी झणीं कोणाची दृष्टी लागे । यालागीं देवो त्या पढु ें मागें ।
त्या सभोवता सर्वांगें । भक्तीचेनि पगं ें भल
ु ला चाले ॥ २५ ॥
त्याला कदाचित् कोणाची दृष्ट लागेल, म्हणनू देव त्याच्या मागें, पढु ें व सर्वांगाच्या सभोंवतीं राहतो. भक्तीमळ
ु ें भक्तांचा पांगला होऊन
व त्यांच्या भक्तीला भाळून त्यांच्याबरोबर चालत असतो २५.

निरभिमानाचेनि नावं ें । देव निजागं ें करी आघवें ।


जेवीं कां तान्हयाचेनि जीवें । जीवें भावें निजजननी ॥ २६ ॥
ज्याप्रमाणें तान्ह्या बाळाच्या प्रेमासाठी जीवाभावानें आई त्याची सेवा करते , त्याप्रमाणें भक्ताच्या निरभिमानामळ
ु ें देवच स्वतः त्याचे
सर्व काही करतो २६.

एवं राखतां निजभक्तांसी । तरी देव धाके निजमानसीं ।


जरी हा मजसीं आला ऐक्यासी । तरी हे प्रीति कोणासीं मग करावी ॥ २७ ॥
ह्याप्रमाणें आपल्या भक्ताचे देव सरं क्षण करीत असतानं ा त्याच्या मनातं एक धाक उत्पन्न होतो, तो हा की, हा जर माझ्याशी ऐक्य
पावला, तर मग हे प्रेम मी कोणाशी करावें ? २७.
कोणासी पाहों कृ पादृष्टीं । कोणापें सांगों निजगोष्टी ।
कोणासी खेवें देवों मिठी । ऐशी आवडी मोठी प्रेमाची ॥ २८ ॥
कृ पादृष्टीनें कोणाकडे पहावें ? गजु गोष्टी कोणाला सांगाव्या ? चारी हातांनी कोणाला मिठी मारावी ? अशी त्याला प्रेमाची आवड
मोठी विलक्षण असते २८.

या काकुळतीं श्रा‍अनतं ु । ऐक्यभावें करी निजभक्तु ।


मग देवो भक्त दोहींआंतु । देवोचि नांदतु स्वानंदें ॥ २९ ॥
अशा काकुळतीनें त्याला श्रीअनंत ऐक्यभावानें आपला भक्त करून ठे वतो. मग देव आणि भक्त ह्यांमध्यें देवच स्वानंदानें नांदत
असतो २९.

एवं आपल ु ी आपण भक्ती । करीतसे अनन्यप्रीतीं ।


हेंचि निरूपण वेदांतीं । अद्वैतभक्ति या नांव ॥ ३० ॥
अशा प्रकारे तो अनन्य प्रीतीनें आपणच आपली भक्ति करीत असतो. हेच वेदातं ामध्यें निरूपण के लेले आहे आणि याचचं नावं
'अद्वैतभक्ति' ७३०.

त्यासी चहूं भजु ीं आलिंगितां । हांव न बाणेचि भगवंता ।


मग रिघोनियां आतं ौता । परमार्थता आलिगं ी ॥ ३१ ॥
तशा भक्ताला चारही भजु ांनी बाहेरून आलिंगान देत असतां देवाला तृप्ति म्हणनू होत नाही. मग तो त्याच्या आंत शिरून परमार्थतः
आलिंगन देतो. (हेंच खरे अंतर्बाह्य 'सर्वांगालिंगन' होय) ३१.

ऐसें खेंवाचें मीस करी । तेणें भक्त आणी आपणाभीतरीं ।


मग आपण त्या‍आंतबाहेरी । अतिप्रीतीवरी कोंदाटे ॥ ३२ ॥
ह्याप्रमाणें आलिंगनाचे निमित्त करून भक्ताला आपल्यामध्यें आकर्षण करून घेतो व मग त्याच्या अंतर्बाह्य आपणच अत्यंत प्रेमानें
भरून राहतो ३२.

नवल आवडीचा निर्वाहो । झणीं लागे काळाचा घावो ।


यालागीं निजभक्तांचा देहो । देवाधिदेवो स्वयें होये ॥ ३३ ॥
देवाच्या आवडीचे स्वरूप मोठ्या नवलाचे आहे. भक्ताला काळाचा घाव लागू नये म्हणनू देवाधिदेव आपल्या भक्ताचा देहसद्ध
ु ा
आपणच होतो ३३.

ऐसा जो पढियंता परम । तो भागवतांमाजीं उत्तमोत्तम ।


यापरी भागवतधर्म । परुु षोत्तम वश्य करी ॥ ३४ ॥
असा जो देवाचा अत्यतं आवडता झाला असेल, तोच भागवतामं ध्यें 'उत्तमोत्तम' होय. अशा प्रकारचा भागवतधर्म परुु षोत्तमाला वश
करून घेतो ३४.

ऐशिया उत्तम भक्ता । भेदाची समळ


ू नरु े वार्ता ।
हेचि अभेदभक्तकथा । ऐक नृपनाथा सांगेन ॥ ३५ ॥
अशा उत्तम भक्ताला भेदाची वार्ताही उरत नाही. हे राजा ! तीच भक्ताची अभेदभावाची कथा तल
ु ा सांगतों, ऐक ३५.

न यस्य स्वः पर इति वित्तेष्वात्मनि वा भिदा ।


सर्वभतू समः शान्तः स वै भागवतोत्तमः ॥ ५२ ॥
श्लोक ५२- जो संपत्ती किंवा शरीर इत्यादींच्या बाबतीत "हे माझे आणि हे दसु र्‍याचे" असा भेदभाव मानीत नाही, सर्व पदार्थांमध्ये
समस्वरूप अशा परमात्म्याला पाहात असतो, व त्यामळ ु े शांत राहातो, तो भगवंतांचा उत्तम भक्त होय. (५२)

अद्वैतभजनाचे वोजें । मी माझें तंू आणि तझु ें ।


ज्यासी नरु े चि सहज निजें । तो भक्त मानिजे उत्तमत्वें ॥ ३६ ॥
अद्वैत भजनाच्या योगानें मी आणि माझें, किंवा तंू आणि तझु ें हें ज्याच्यामध्यें शिल्लक उरत नाही, तोच 'उत्तम भक्त' मानला जातो
३६.

यापरी ज्याचे चित्ताचे ठायीं । भेदु निःशेष उरला नाहीं ।


तेथ माझें तझु ें हें कांहीं । तें निमालें पाहीं जेथींच्या तेथें ॥ ३७ ॥
अशा रीतीनें ज्याच्या चित्तामध्यें भेद मळ ु ीच उरत नाही, तेथे माझें तझु ें हें काहीच राहात नाही. ते तेथल्या तेथेंच नाहीसे होऊन जातें
३७.

जेवीं अग्नीशीं जें जें टेंके । तें तें अग्नीचि हो‍ऊनि ठाके ।
तेवीं अभेदभक्त जें जें देखे । तें तें यथासख ु ें स्वस्वरूप होये ॥ ३८ ॥
ज्याप्रमाणें अग्नीला जें जें येऊन टेंकतें तें तें अग्निच होऊन जाते, त्याप्रमाणें अभेदरूप झालेला भक्त जें जें पाहतो तें तें स्वाभाविक
रीतीनें आत्मस्वरूपच होऊन जातें ३८.

निजवित्त आणिकापाशीं देतां । आवांकू नपु जे त्याचिया चित्ता ।


न देखे पारके पणाची वार्ता । विकल्प घालितां तरी उपजेना ॥ ३९ ॥
आपले द्रव्य दसु ऱ्यापाशी देतांना त्याच्या चित्ताला शंका येत नाही, परके पणाची वार्तासद्ध
ु ा त्याला दिसत नाही, व कोणी विकल्प
घातला तरी त्याच्या मनांत तो उतरत नाहीं ३९.

डावे हातींचे पदार्था । उजवे हातीं स्वयें देतां ।


येथें कोण देता कोण घेता । तेवीं एकात्मता सर्वभतू ीं ॥ ४० ॥
डाव्या हातातं ील पदार्थ आपणच उजव्या हातातं दिला, तर त्यातं देणारा कोण ? आणि घेणारा कोण ? त्याप्रमाणें सर्व प्राणिमात्राच्ं या
ठिकाणी त्याची एकात्मताच होऊन जाते ७४०.

आपणासकट सर्व देहीं । भक्तां भगवंतावांचनि ू नाहीं ।


यालागीं शांति त्याचे ठायीं । स्वानंदें पाहीं निःशंक नांदे ॥ ४१ ॥
आपल्यासद्ध
ु ा सार्‍या देहांमध्यें भक्तांना भगवंताशिवाय दसु रे कांहीच दिसत नाहीं; म्हणनू त्यांच्या ठिकाणी शांति ही निःशंकपणानें
नांदत असते ४१.

ऐशिया निजसमशांतीं । भगवद‌भ् क्त क्रीडा करिती ।


यालागीं उत्तमत्वाची प्राप्ती । सनि
ु श्चितीं पावले ॥ ४२ ॥
अशा आपल्याच समदृष्टिरूप शांतीमध्यें भगवद‌भ् क्त क्रीडा करीत असतात; म्हणनू च त्यांना खरोखर उत्तमत्वाची प्राप्ति होते ४२.

हरिभक्ताचं ी निरपेक्षता । ऐक सांगेन नृपनाथा ।


उत्तम भक्ताचं ी सागं तां कथा । अति‍उल्हासता हरीसी ॥ ४३ ॥
हे राजा ! आतां हरिभक्तांची 'निरपेक्षता' सांगतों ऐक. उत्तम भक्तांची कथा सांगतांना हरीच्या मनाला अत्यंत उल्हास प्राप्त झाला होता
४३.

निरपेक्ष तो मख्ु य भक्त । निरपेक्ष तो अति विरक्त ।


निरपेक्ष तो नित्यमक्त
ु । सत्य भगवंत निरपेक्षी ॥ ४४ ॥
(तो म्हणाला), निरपेक्ष असतो तोच 'मख्ु य भक्त' होय. निरपेक्षच खरा 'विरक्त' व निरपेक्षच 'नित्यमक्त
ु ' होय. कारण भगवंत हा खरोखर
निरपेक्षच आहे ४४.

त्रिभवु नविभवहेतवेऽप्यकुण्ठ
स्मृतिरजितात्मसरु ादिभिर्विमृग्यात् ।
न चलति भगवत्पदारविन्दात्
लवनिमिषार्धमपि यः स वैष्णवाग्र्यः ॥ ५३ ॥
श्लोक ५३- आपले अतं ःकरण भगवन्मय करणार्‍या देवतासद्ध ु ा भगवतं ाचं े जे चरणकमल धडंु ाळीत असतात, त्याच्ं यापासनू अर्धे
निमिषसद्ध ु ा जो दरू होत नाही, मग त्यासाठी एखाद्याने त्याला त्रिभवु नाचे वैभव जरी दिले तरीसद्ध
ु ा तो त्यांचे स्मरण सोडीत नाही,
तोच वैष्णवांमध्ये अग्रगण्य होय. (५३)

सप्रेमभावें करितां भक्ती । हरिचरणीं ठे विली चित्तवृत्ती ।


निजस्वार्थाचिये स्थितीं । अतिप्रीतीं निजनिष्ठा ॥ ४५ ॥
आपला खरा स्वार्थ साधण्याच्या अवस्थेत सप्रेम भक्ति करीत असतां अत्यंत प्रीतीनें व निजनिष्ठेनें भक्त आपली सारी वृत्ति हरीच्या
चरणावं रच ठे वीत असतो ४५.
तेथें त्रिलोकींच्या सकल संपत्ती । कर जोडूनि वरूं प्रार्थिती ।
तरी क्षणार्ध न काढी चित्तवृत्ती । भक्त परमार्थी अतिलोभी ॥ ४६ ॥
तेव्हां त्रैलोक्याच्या संपत्ति हात जोडून प्रार्थना करीत त्याला वरण्यासाठी आल्या, तरीही तो आपली चित्तवृत्ति एक अर्धा क्षणसद्ध
ु ा
हरिचरणांकडून काढण्यास तयार नसतो. इतका तो परमार्थाला लंपट असतो ४६.

क्षणार्ध चित्तवृत्ती काढितां । त्रिभवु नविभव ये हाता ।


एवढिया सांडूनि स्वार्था । म्हणाल हरिभक्तां लाभ कोण ॥ ४७ ॥
त्यानें एक अर्धा क्षण चित्तवृत्ति तेथनू काढली, तर त्रैलोक्याची संपत्ति त्याच्या हातास चढेल, तर मग इतका स्वार्थत्याग करण्यांत
हरिभक्ताला लाभ कोणता ? असे म्हणाल तर सांगतों ४७.

हरिचरणीं अपरोक्षस्थिति । तेथील क्षणार्धाची जे प्राप्ती ।


त्यापढु ें त्रिभवु नसंपत्ती । भक्त मानिती तृणप्राय ॥ ४८ ॥
हरिचरणाच्ं या ठिकाणी रत असतां जो साक्षात्कार होतो, त्याच्या क्षणार्धाचा जो लाभ, त्याच्यापढु े हें त्रैलोक्याचे वैभव किंवा सपं त्ति
भक्तांना तृणप्राय वाटते ४८.

सकळ जगाचा स्रजिता । ब्रह्मा पितामहो तत्त्वतां ।


त्रैलोक्यराज्यसमर्थता । वोळगे वस्ततु ां अगं णीं ज्याचे ॥ ४९ ॥
सर्व जग उत्पन्न करणारा ब्रह्मदेव पितामह; त्रैलोक्याचं ऐश्वर्य वस्ततु ः त्याच्या अंगणांत लोळत असते ४९.

त्रिभवु नवैभवाचे माथां । ब्रह्मपदाची समर्थता ।


तो ब्रह्माही निजस्वार्था । होय गिवं सिता हरिचरण ॥ ५० ॥
त्रैलोक्याच्या वैभवाहूनही ब्रह्मदेवाची पदवी फार मोठी आहे. असा तो ब्रह्मदेवही आपल्या सख
ु स्वार्थासाठी हरीचे चरण धंडु ीत
असतो ७५०.

त्यागोनि ब्रह्मवैभवसपं त्ती । ब्रह्मा बैसोनि एकातं ीं ।


अहर्निशीं हरिचरण चिंती । तरी त्या प्राप्ति सहसा नव्हे ॥ ५१ ॥
ब्रह्मलोकीची वैभवसंपत्ति झगु ारून देऊन ब्रह्मदेवही एकांतांत बसनू रात्रदि
ं वस हरीच्या चरणांचे ध्यान करीत असतो. तरी त्याला
सहसा प्राप्ति होत नाहीं ५१.

सहसा न पवे हरिचरण । यालागीं ब्रह्मा साभिमान ।


तेणें अभिमानेंचि जाण । नेलीं चोरून गोपाल-वत्सें ॥ ५२ ॥
ब्रह्मदेवाला हरिचरण प्राप्त न झाल्यामळ
ु े च तो अभिमानी झाला, आणि त्या अभिमानामळ
ु ें च त्यानें गोकुळातं ील गोपाळ व वासरे
चोरून नेली हे लक्षात घे ५२.
तेथें न कष्टता आपण । न मोडतां कृ ष्णपण ।
गोपाल-वत्सें जाहला सपं र्णू । पर्णू त्वें पर्णू स्वलीला ॥ ५३ ॥
त्या वेळी आपण कष्ट न करितां व आपलें कृ ष्णपणही मोडूं न देता, पर्णू त्वेकरून आपल्या लीलेनें सारे गोपाळ व त्यांची वत्से
आपणच होऊन राहिला ५३.

अगाध हरिलीला पर्णू । पाहतां वेडावलें ब्रह्मपण ।


तेव्हां सांडोनि पदाभिमान । अनन्यशरण हरिचरणीं ॥ ५४ ॥
ही हरीची अद‌भ् तु लीला पाहून ब्रह्मदेव वेडा होऊन गेला आणि त्या वेळी आपल्या ब्रह्मपदाचा अभिमान सोडून देऊन अनन्यभावानें
हरीच्या चरणीं शरण आला ५४.

कै लासराणा शल ू पाणी । ब्रह्मा लागे ज्याचे चरणीं ।


तोहि निजराज्य सांडोनी । महाश्मशानीं हरिचरण चिंती ॥ ५५ ॥
ब्रह्मदेवही ज्याच्या चरणी लागतो असा कै लासाधिपति श्रीशक
ं र, पण तोही आपले कै लासाचे राज्य सोडून देऊन महाश्मशानामध्यें
बसनू हरिचरणांचें ध्यान करीत असतो ५५.

कौपीनभस्मजटाधारी । चरणोदक धरोनि शिरीं ।


हरिचरण हृदयामाझारीं । शिव निरंतरीं चितं ीत ॥ ५६ ॥
कमरे त कौपीन घालनू , सर्वांगाला भस्म चर्चून, मस्तकावर जटा धारण करून हरिचरणांचे तीर्थ (गंगा) शिरावर घेऊन शंकर आपल्या
हृदयामध्यें निरंतर हरिचरणांचेंच चिंतन करतो ५६.

एवं ब्रह्मा आणि शक ं र । चरणाचं े न पवती पार ।


तेथें त्रैलोक्यवैभव थोर । मानी तो पामर अतिमंदभाग्य ॥ ५७ ॥
ह्याप्रमाणें ब्रह्मदेव आणि शंकर यांनाहीं हरिचरणांचा ठाव लागत नाहीं; तेथें जो त्रैलोक्याचे वैभव थोर मानतो, तो पामर अत्यंत
हतभागी समजला पाहिजे ५७,

हरिचरणक्षणार्धप्राप्ती । त्रैलोक्यराज्यसंपत्ती ।
भक्त ओवं ाळूनि साडि ं ती । जाण निश्चितीं निंबलोण ॥ ५८ ॥
हरिचरणाच्ं या क्षणार्ध प्राप्तीपढु े भक्त लोक त्रैलोक्याची राज्यसपं त्ति ओवं ाळून टाकतात, हे लक्षात ठे व ५८.

हरिचरणसारामृतगोडी । क्षणार्ध जैं जोडे जोडी ।


तैं त्रैलोक्यवैभवाच्या कोडी । करी कुरवंडी निजभक्त भावें ॥ ५९ ॥
हरिचरणसारामृताची गोडी एक क्षणार्धही मिळेल, तर त्या लाभावरून निजभक्त त्रैलोक्यवैभवाच्या राशीच्या राशी मनापासनू
ओवं ाळून टाकील ५९.
एवं हरिचरणांपरतें । सारामृत नाहीं येथें ।
यालागीं चित्तें वित्तें जीवितें । जडले सनि
ु श्चितें चरणारविदं ी ॥ ६० ॥
तात्पर्य, ह्या लोकी हरिचरणांहून दसु रें सारामृत कसलेच नाही. ह्याकरितां तनमनधनानें ते चरणारविंदालाच निश्चितपणे जडून राहतात
७६०.

निमिषार्ध त्रटु ी लव क्षण । जे न सोडिती हरिचरण ।


ते वैष्णवांमाजीं अग्रगण । राया ते जाण "उत्तम भक्त" ॥ ६१ ॥
हे राजा ! डोळ्याची पापणी लवेपर्यंत किंवा चटु कीवाजेपर्यंतसद्ध
ु ा हरीचे चरण जे सोडीत नाहीत, तेच वैष्णवांमध्यें अग्रगण्य व उत्तम
भक्त होत, हे लक्षात ठे व ६१.

जे त्रिभवु नविभवभोग भोगिती । तेही पावले अनतु ापवृत्ती ।


त्यांच्या तापाची निजनिवृत्ती । हरिचरणप्राप्ती तें ऐक ॥ ६२ ॥
जे त्रैलोक्यवैभवाचे सख
ु भोगतात त्यानं ाहीं अनतु ाप होत असतो. त्याच्ं या तापाची निवृत्ति होण्याला हरिचरणप्राप्ति हेच काय ते एक
साधन आहे. कसे ते सांगतों, ऐक ६२.

भगवत उरुविक्रमाङ्घ्रि ‌ शाखा


नखमणिचन्द्रिकया निरस्ततापे ।
हृदि कथमपु सीदतां पनु ः स
प्रभवति चन्द्र इवोदितेऽर्क तापः ॥ ५४ ॥
श्लोक ५४ - भगवंतांच्या त्रिभवु नव्यापी चरणांच्या बोटांच्या नखरत्‍नांच्या चंद्रिके ने ज्या भक्तजनांच्या हृदयाचा त्रिविध ताप एक वेळ
दरू के ला, त्यांच्या हृदयामध्ये, जसा चंद्रोदय झाल्यावर सर्या
ू चा ताप जाणवत नाही, तसा तो ताप परत कसा आपला प्रभाव दाखवील
? (५४)

थोर हरिचरणाचा पराक्रम । पदें त्रैलोक्य आवरी त्रिविक्रम ।


ब्रह्मांड भेदोनि पदद्रुम । वाढला परमसामर्थ्यें ॥ ६३ ॥
हरिचरणाचं ा पराक्रम फार थोर आहे. त्या श्रीहरि त्रिविक्रमानें आपल्या पदानें त्रैलोक्य आकलन करून सोडले . तो चरणवृक्ष आपल्या
अद‌भ् तु पराक्रमानें ब्रह्मांड भेदनू ही पलीकडे गेला ६३.

ते पदद्रुमींचिया दशशाखा । त्याचि दशधा दशांगलि


ु का ।
अग्रीं अग्रफळचंद्रिका । नखमणि देखा लखलखित ॥ ६४ ॥
त्या पादवृक्षाच्या दहा शाखा म्हणजे त्याच्या दोन्ही पावलांची दहा बोटें होत. शाखांच्या अग्रभागावर फळें शोभतात त्याप्रमाणें
बोटांच्या अग्रभागी नखमणिचंद्रिका शोभते ६४.
ते नखचद्रि
ं के चे चद्रं कातं । चरणचद्रं ामृतें नित्य स्रवत ।
भक्तचकोर ते सेवित । स्वानंदें तृप्त सर्वदा ॥ ६५ ॥
त्या नखरूप चंद्रिके चे चंद्रकांतमणि चरणरूप चंद्रामृताच्या योगानें नित्य स्रवत असतात; आणि तें अमृत भक्तरूपी चकोर सेवन
करून सर्वकाळ स्वानदं ानें तृप्त असतात ६५.

त्यासं ी कामादि त्रिविधतापप्राप्ती । सर्वथा बाधंू न शके पढु ती ।


जेवीं सर्या
ू ची संतप्त दीप्ती । चंद्रबिंबा‍आंतौती कदा न रिघे ॥ ६६ ॥
सर्या
ू ची प्रखरदीप्ति जशी चद्रं बिबं ातं कधींच शिरत नाही, त्याप्रमाणें त्यानं ा कामादिक त्रिविध तापाची बाधा त्यानतं र कधींच होऊ
शकत नाहीं ६६.

जे हरिचरणचंद्रचकोर । स्वप्नींही ससं ारताप न ये त्यांसमोर ।


ऐसा चरणमहिमा अपार । हरि मनु ीश्वर हर्षें वर्णी ॥ ६७ ॥
जे हरिचरणरूप चंद्राचे चकोर असतात, त्यांच्यासमोर स्वप्नांतसद्ध ु ां ससं ारताप येत नाही. ह्याप्रमाणें चरणाचा अपार महिमा 'हरि'
नामक मनिु (नवयोग्यांपैकी द्वितीयबंध)ु मोठ्या आनंदानें वर्णन करूं लागला ६७.

'देहे वै स हरे ः प्रियः' । येणें श्लोकें गा विदेह्या ।


दाविली भक्तिलिंगक्रिया । जाण तू राया सनि ु श्चित ॥ ६८ ॥
हे जनकराजा ! 'देहे वै स हरे ः प्रियः' ह्या (५१ व्या) श्लोकानें भक्तांची लक्षणे व भक्तांची क्रिया निश्चितपणे दाखवनू दिली ६८.

'न यस्य स्वः पर इति' । येणें त्याची धर्मस्थिती ।


राया सांगितली तजु प्रती । यथानिगतु ीं यथार्थ ॥ ६९ ॥
तशीच 'न यस्य स्वः पर इति' ह्या (५२) श्लोकानें त्यांची धर्मस्थिति यथातथ्य रीतीनें तल
ु ा सागि
ं तली ६९.

'यादृश' म्हणे कै से असती । भगवद‌भ् जनें स्वानंदतृप्ति ।


त्रिविध तापाचं ी निवृत्ती । करोनि असती हरिभक्त । ७० ॥
'यादृश' म्हणजे ते कसे असतात, कसे वागतात ह्या (४४ व्या श्लोकांतील) तझ्ु या प्रश्नाचे उत्तर दिले. भगवद‌भ् जनानें आणि
आत्मानदं ानें त्याचं ी तृप्ति होते, आणि असे ते हरिभक्त त्रिविधतापाचं ी निवृत्ति करून शातं राहतात, हे सर्व सागि
ं तले ७७०.

आतां त्याचं ी बोलती परी । नामें गर्जती निरंतरीं ।


तेचि ते संक्षेपाकारीं । उपसंहारीं हरि सांगे ॥ ७१ ॥
आता त्यांच्या बोलण्याची पद्धति आणि निरंतर चाललेली नामाची गर्जना कशी असते, तेही संक्षेपानें शेवटीं हरिऋषि सांगत आहे
७१.
सकळ लक्षणाचं ी सारस्थिति । प्रेमळाची परमप्रीती ।
उल्लंघंू न शके श्रीपती । तेही श्लोकार्थी ं हरि सांगे ॥ ७२ ॥
प्रेमळ भक्कांचे जें निस्सीम प्रेम, तीच सर्व लक्षणांतील मख्ु य स्थिति होय. श्रीपतीलासद्ध
ु ां तिचे उल्लघं न करता येत नाही. ह्याचेही
वर्णन आतां पढु ील उपसहं ारात्मक श्लोकातं हरिः सागं त आहे.७२.

विसृजति हृदयं न यस्य साक्षात्


हरिरवशाभिहितोऽप्यघौघनाशः ।
प्रणयरसनया धृताङ्‌घ्रिपद्मः
स भवति भागवतप्रधान उक्तः ॥ ५५ ॥
इति श्रीमद‌भ् ागवते महापरु ाणे परमहसं ायां संहितायां
एकादशस्कन्धे द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥
श्लोक ५५- अगतिक होऊन नामोच्चार के ल्यावरसद्ध ु ा संपर्णू पापराशी नष्ट करणारे साक्षात भगवान श्रीहरी, प्रेमरज्जनू े चरणकमल
बाधं नू ठे वल्यामळ
ु े ज्याचे हृदय एका क्षणापरु तेसद्ध
ु ा सोडीत नाहीत, तो भगवद‌भ् क्तामं ध्ये मख्ु य होय. (५५)

अवचटें तोंडा आल्या हरी । सकळ पातकें सहं ारी ।


तें हरिनाम निरंतरीं । जे निजगजरीं गर्जती ॥ ७३ ॥
तोंडाला चक ु ू न जरी हरीचें नाम आले, तरीसद्धु ा ते सर्व पातकाचं ा नाश करते, असें तें हरीचे नाम भक्तजन निरंतर गर्जत असतात ७३.

ऐसें ज्याचं े जिव्हेवरी । नाम नाचे निरंतरीं ।


तें धन्य धन्य संसारीं । स्वानंदें हरि गर्जति ॥ ७४ ॥
ह्याप्रमाणें ज्याच्या जिव्हेवर नाम निरंतर नाचत असते, जे स्वानंदानें हरिनामाचा गजर करीत असतात, ते संसारामध्यें अत्यंत धन्य
होत ७४.

सप्रेम सद‌भ् ावें सपं र्णू । नित्य करितां नामस्मरण ।


वृत्ति पालटती आपण । तेंही लक्षण ऐक राया ॥ ७५ ॥
पर्णू प्रेमानें व सद‌भ् ावानें नित्य नामस्मरण के ले असतां वृत्ति आपोआप पालटून जातात. तेही लक्षण सागं तों ऐक ७५.

नामासरिसाच हरी । रिघे हृदयामाझारीं ।


तेणें धाकें अभ्यंतरीं । हों लागे परु ी हृदयशद्ध
ु ी ॥ ७६ ॥
नामाबरोबरच हृदयामध्यें हरि शिरतो. त्या धाकानें अतं रातं पर्णू पणे हृदयशद्धि
ु होऊ लागते ७६.

तेव्हां प्रपंच सांडोनि वासना । जडोनि ठाके जनार्दना ।


'अह'ं कारु सांडोनि अहपं णा । सोहं सदनामाजीं रिघे ॥ ७७ ॥
तेव्हां 'वासना' प्रपचं ाला सोडून जनार्दनालाच चिकटते व अहक
ं ार 'अह'ं पणाला सोडून 'सोह'ं (परब्रह्म तेंच मी) ह्या भावनेमध्यें शिरतो
७७.
चित्त विसरोनि चित्ता । जडोनि ठाके भगवंता ।
मनाची मोडली मनोगतता । सक ं ल्प विकल्पता करूं विसरे ॥ ७८ ॥
'चित्त' हे चित्ताला विसरून भगवंताला जडून राहते, 'मनाचे' मनपणही मोडून ते सक
ं ल्पविकल्प करावयालाच विसरते ७८.

कृ तनिश्चयेंसीं बद्ध
ु ी । हो‍ऊनि ठाके समाधी ।
ऐशी देखोनि हृदयशद्ध ु ी । तेथोनि त्रिशद्ध
ु ी न रिघे हरी ॥ ७९ ॥
'बद्धि
ु ' ही कृ तनिश्चयानें समाधिरूपच होऊन राहते. अशी हृदयाची शद्धि
ु झालेली पाहिली म्हणजे तेथनू खरोखरच हरि बाहेर निघत
नाहीं ७९.

हरिनामप्रेमप्रीतीवरी । हृदयीं रिघाला जो हरी ।


तो रिघों विसरे बाहेरी । भक्तप्रीतिकरीं कृ पाळू ॥ ८० ॥
हरिनामप्रेमप्रीतीनें हरि जो हृदयामध्यें शिरला, तो भक्तप्रीतीमळ
ु ें बाहेर निघावयाचेंच विसरून जातो ७८०.

भक्तें प्रणयप्रीतीची दोरी । तेणें चरण धरोनि निर्धारीं ।


निजहृदयीं बांधिला हरी । तो कै शापरी निघेल ॥ ८१ ॥
भक्तानें प्रणयप्रेमाची दोरी करून तिनें त्याचे चरण धरून हृदयामध्यें घट्ट बांधनू ठे वले असतां तेथनू तो कसा निघणार ? ८१.

भगवंत महा अतर्बु ळी । अदट दैत्यांतें निर्दळी ।


तो कोंडिला हृदयकमळीं । हे गोष्टी समळ ू ीं मिथ्या म्हणती ॥ ८२ ॥
परंतु भगवान् हा अनंत बलशाली असनू तो बलिष्ठ दैत्यांचाही संहार करतो, असा तो महाबलिष्ठ हरि हृदयकमलामध्यें कोंडला ही
गोष्ट समळ
ू मिथ्या असे कोणी म्हणतील ८२.

जो शष्ु क काष्ठ स्वयें कोरी । तो कोंवळ्या कमळामाझारीं ।


भ्रमर गंतु ला प्रीतीवरी । के सर माझारीं कुचंबो नेदी ॥ ८३ ॥
तर पहा, जो वाळलेले लाकूडसद्ध ु ा कोरून टाकतो, तो भ्रमर कोवळ्या कमलामध्यें प्रेमामळ
ु ें गतंु नू राहतो. त्यातं ील के सरलाही तो
कुचंबंू देत नाहीं ८३.

तेवीं भक्ताचिया प्रेमप्रीतीं । हृदयीं कोंडिला श्रीपती ।


तेथ खंटु ल्या सामर्थ्यशक्ती । भावार्थाप्रती बळ न चले ॥ ८४ ॥
त्याप्रमाणें भक्ताच्या प्रेमातिशयामळ ु ें हृदयामध्यें श्रीहरि कोंडला जातो. तेथे त्याचे सर्व सामर्थ्य व पराक्रम कंु ठित होतात. कारण
भावार्थापढु ें बळ चालत नाहीं ८४.
बाळ पालवीं घाली पिळा । तेणें बाप राहे थोकला ।
तरी काय तो निर्बळ जाहला । ना तो स्नेहें भल ु ला ढळे ना ॥ ८५ ॥
मल
ू बापाच्या पदराला पीळ घालते, त्यामळ ु ें बाप जातांना थांबतो. म्हणनू तो काय त्याच्यापेक्षा बळानें कमी झाला ? नाही. तो प्रेमानें
भलु नू गेल्यामळ
ु ें त्याच्यानें हालवत नाहीं इतकें च ८५.

तेवीं निजभक्त लडेवाळ । त्याचें प्रेम अत्यंत गोड ।


निघावयाची विसरोनि चाड । हृदयीं सरु वाड हरि मानी ॥ ८६ ॥
त्याप्रमाणें लडिवाळ निजभक्ताचे प्रेम अत्यतं गोड असते; म्हणनू तेथनू निघावयाची गोष्ट विसरून श्रीहरि त्याच्या हृदयातं च आनदं
माननू राहतो ८६.

ऐसें ज्याचें अंतःकरण । हरि न सांडी स्वयें आपण ।


तैसेचि हरीचे श्रीचरण । जो साडि
ं ना पर्णू प्रेमभावें ॥ ८७ ॥
असें ज्याचे अंतःकरण असते, त्याला श्रीहरि आपण होऊन कधी सोडीत नाहीं; तसेंच तोही पर्णू प्रेमामळ
ु ें हरीचे चरण सोडीत नाहीं
८७.

हरीचे ठायीं प्रीति ज्या ऐशी । हरीची प्रीति त्या तैसी ।


जे अनन्य हरीपाशीं हरि । त्यांसी अनन्य सदा ॥ ८८ ॥
हरीच्या ठिकाणी ज्याची जशी प्रीति असते, तशी हरीचीही प्रीति त्या भक्ताच्या ठिकाणी असते, हरीपाशी जे निरंतर अनन्य असतात,
त्याच्ं यापाशी श्रीहरिही निरंतर अनन्य असतो ८८.

ऐसे जे हरिचरणीं अनन्य । तेचि भक्तांमाजीं प्रधान ।


वैष्णवांत ते अग्रगण । राया ते जाण 'भागवतोत्तम' ॥ ८९ ॥
ह्याप्रमाणें जे श्रीहरीच्या चरणीं अनन्य भक्ति धरून राहतात, तेच भक्तामं ध्यें मख्ु य होत. हे राजा ! वैष्णवामं ध्यें तेच अग्रगण्य व
भागवतांमध्यें उत्तम भागवत ते तेच हें लक्षात ठे व ८९.

गौण करूनि चारी मक्त ु ी । जगीं श्रेष्ठ भगवद‌भ् क्ती ।


त्या उत्तम भक्ताचं ी स्थिती । सक्ष
ं ेपें तजु प्रती बोलिलों राया ॥ ९० ॥
ह्याप्रमाणें चारही मक्त
ु ींना गौणपणा आणनू जगामध्यें श्रेष्ठ भगवद‌भ् क्तीचा जो आश्रय करतो, त्या उत्तम भक्ताची स्थिति संक्षेपानें तल
ु ा
सांगितली ७९०.

पर्णू भक्तीचें निरूपण । सांगतां वेदां पडलें मौन ।


सहस्रमख ु ाची जिव्हा पर्णू । थकोनि जाण थोंटावे ॥ ९१ ॥
भक्तीचे पर्णू निरूपण करतांना वेदसद्ध ु ा मौनावतात; सहस्रमख
ु ी शेषाची जिव्हासद्ध
ु ा भक्तीचा महिमा वर्णन करतांना थकून जाते ९१.
ते भक्तीची एकाश ं ता । तजु म्यां सागि
ं तली हे कथा ।
यावरी परिपर्णू ता । राया स्वभावतां तंू जाणशी ॥ ९२ ॥
हे राजा ! तलु ा मी एवढा वेळ जी कथा सांगितली, ती त्या भक्तींतील एक अंश मात्र आहे असे समज. ह्यावरून तिची परिपर्णू ता
तझ्ु या सहज लक्षातं येईल ९२.

हरीसारिखा रसाळ वक्ता । सांगतां उत्तमभक्त कथा ।


तटस्थ पडिलें समस्तां । भक्तभावार्थता ऐकोनी ॥ ९३ ॥
हरिऋषीसारखा रसाळ वक्ता उत्तम भक्ताची कथा सागं त असतां भक्तभावार्थता ऐकून सर्व लोक अगदी तटस्थ झाले ९३.

तवं रावो रोमांचित जाहला । रोममळ ू ीं स्वेद आला ।


श्रवणसखु ें लांचावला । डोलों लागला स्वानंदें ॥ ९४ ॥
राजाची गोष्ट तर काय सागं ावी ? त्याच्या सर्वांगावर रोमाचं उभे राहिले आणि त्या प्रत्येक रोमाच्या मळ
ु ाशी घाम फुटला.
श्रवणसख ु ाला लब्ु ध होऊन तो आत्मानंदानें डोलंू लागला ९४.

पर्णू संतोषोनि मनीं । म्हणे भलें के लें मनु ी ।


थोर निवालों निरूपणीं । श्रवणाची धणी तरी न परु े ॥ ९५ ॥
मनामध्यें अत्यंत संतोष पावनू राजा म्हणाला, मनि ु वर्य ! आपण फार चांगले के लें ! आपले निरूपण ऐकून फारच समाधान झाले. पण
तेवढ्यानें श्रवणांची तृप्ति मात्र होत नाहीं ९५.

ऐकोनि हरीचें वचन । राजा म्हणे हे अवघे जण ।


अपरोक्षज्ञानें ज्ञानसंपन्न । वक्ते पर्णू अवघेही ॥ ९६ ॥
हरिमनु ीचे भाषण ऐकून राजा मनांत म्हणाला, हे सारे च मनि ु आत्मानभु वज्ञानानें परिपर्णू आहेत. इतकें च नव्हे, तर हे सारे उत्तम वक्तेही
आहेत ९६.

भिन्न भिन्न करोनि प्रश्न । आकर्णूं अवघ्याचं ें वचन ।


ऐशिया श्रद्धा राजा पर्णू । अनपु म प्रश्न पैं करील ॥ ९७ ॥
ह्याकरितां ह्यानं ा निरनिराळे प्रश्न करून साऱ्याचं े भाषण श्रवण करूं या. अशा पर्णू श्रद्धेनें तो राजा पढु े अनपु म प्रश्न करणार आहे ९७.

रायासी कथेची पर्णू चाड । पढु ां प्रश्न करील गोड ।


जे ऐकतांचि परु े कोड । श्रोते वाड सख ु ावती ॥ ९८ ॥
राजाला कथेची अत्यंत आवड असल्यामळ ु ें पढु े तो फार उत्तम प्रश्न विचारील. ते ऐकतांच इच्छा तृप्त होऊन श्रोत्यांना मोठा संतोष
होईल ९८.
त्या प्रश्नाचें गह्य
ु ज्ञान । श्रवणीं पाववीन सपं र्णू ।
वदनीं वक्ता जनार्दन । यथार्थ पर्णू अर्थवी ॥ ९९ ॥
त्या प्रश्नांतील गढू ज्ञान मीही सर्वांस ऐकवीन. संपर्णू अर्थानें व यथातथ्य रीतीनें श्रीजनार्दनच माझ्या मख
ु ानें बोलणार आहे ९९.

पावं ा नाना मधरु ध्वनी गाजे । परी तो वाजवित्याचेनि वाजे ।


तेवीं एका जनार्दनीं साजे । ग्रंथार्थवोजें कवि कर्ता ॥ ८०० ॥
मरु लीमधनू अनेक प्रकारचे ध्वनि निघतात, पण तें कौशल्य त्या वाजविणाराचे असते. त्याप्रमाणें जनार्दनाच्या कृ पेनें 'एका' हा कवि
व ग्रथं कर्ता म्हणनू पढु े येत आहे ८००.

इति श्रीमद‌भ् ागवते महापरु ाणे एकादशस्कन्धे परमहसं संहितायां


एकाकार टीकायां निमिजायंतसंवादे द्वितीयोऽध्यायः ॥
श्रीकृ ष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥ ५५ ॥ ओव्या ॥ ८०० ॥
श्रीकृ ष्णार्पणमस्तु.
दसु रा अध्याय समाप्त

You might also like