Professional Documents
Culture Documents
Costal Roads Translation Revised
Costal Roads Translation Revised
गज
ु रात
उस्मांगनी शेरासिया. ज्येष्ठ नेते. मच्छीमार अधिकार संघर्ष समिती.
गुजरात.
हक्कांची पायमल्ली होणे ही नवीन घटना नाही मात्र गुजरातमध्ये गेली
अनेक वर्ष हे च सरू
ु आहे असं शेरासिया म्हणाले. ब्लू इकॉनोमी चा अभ्यास
करण्यासाठी संशोधकांचे पथक गुजरात मध्ये आले तेव्हा हे स्पष्ट झाले की
गुजरात मध्ये ब्लू इकॉनोमी ची अंमलबजावणी आधीच झाली आहे .
गज
ु रातच्या 1600 किलोमीटर किनारपट्टी पैकी 400-500 किलोमीटर भाग
कच्छ मध्ये येतो. मंद्र
ु ामध्ये अदानी समह
ू ानी संपर्ण
ू गजु रात मध्ये निर्माण
केलेल्या कॅप्टीव्ह जेट्टी, बंदर, वेअर हाऊस कडे पाहिलंत तर ब्लू इकॉनोमी
स्पष्टपणे दिसेल. आणि जामनगर भागात पाहिलं तर रिलायन्सनेही याच
प्रकारची ब्लू इकॉनोमी उभी केली आहे .
समद्र
ु किनाऱ्यालगत रासायनिक उद्योग आणि बंदरावर आधारित उद्योग
आधीपासूनच आहे त. नरें द्र मोदी जेव्हा गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते,
तेव्हा गुजरातला लाभलेला मोठ्या समुद्रकिनाऱ्याचा विकास कसा करता
येईल ही त्यांची कल्पना तेव्हापासूनच होती. आणि तेच आता ब्लू
इकॉनोमीच्या रूपाने प्रत्यक्षात आणलं जात आहे . परं तु विकासाच्या या
संकल्पनेत, आणि ब्लू इकॉनोमी मॉडेल मध्येही मच्छीमारांसाठी कुठे ही
जागा नाही. हे विकासाचे प्रारूप, किनारे आणि समुद्र ओरबाडणारे असल्याचं
तज्ञ डॉ.अपर्णा संद
ु र यांनी केलेल्या सादरीकरणात हे स्पष्ट झालं आहे .
1989 पासन
ू किनारपट्टीवरील विकासाचा इतिहास डॉ. संद
ु र यांनी
अभ्यासला. गेल्या 30 वर्षांमध्ये जे घडलं ते समस्या अधिकच वाढवत
नेणारं आहे .राज्याकडून केंद्राकडे आणि केंद्राकडून आंतरराष्ट्रीय खाजगी
कंपन्यांकडे होत असलेल्या हस्तांतरणाकडे संद
ु र यांनी लक्ष वेधलं. त्यांनी
सांगितलं की या पद्धतीने प्रामुख्याने सार्वजनिक संसाधनांचे खाजगीकरण,
खाजगी कंपन्यांच्या नफ्यासाठी सार्वजनिक संसाधनांचा वापर आणि
स्थानिकांना डावलून भांडवली मक्तेदारी निर्माण केली जात आहे . स्थानिक
समद
ु ायांकडून त्यांची जमीन आणि नैसर्गिक संसाधन ओरबाडून घेऊन
भांडवलदार नफा कमावत आहे त. पर्यटन, उद्योग, राष्ट्रीय सुरक्षा,
खाणकाम, बंदर विकास आणि इतर उद्योग उभे करून त्यांनी या प्रदे शात
अत्यंत हिंसक पद्धतीने त्यांचं स्थान सरु क्षित केलं आहे . जेणेकरून
स्थानिक समद
ु ाय यापासन
ू दरू राहतील. यासाठी बळाचाही वापर केला जात
आहे हे ही सुंदर यांनी नमूद केले. संवर्धन करणे किंवा नैसर्गिक संकटांच्या
नावाखाली सागरी क्षेत्र बळकावलं जात आहे . "सागरी संरक्षित क्षेत्र आणि
ब्लू कार्बन उपक्रमांकडे पाहिल्यास, तसंच यासाठी वापरली जाणारी भाषा
पाहता लक्षात येईल की संकटांच्या नावाखाली भांडवलीकरणालाच चालना
दिली जात आहे . त्यांनी ओखी चक्रीवादळाचे उदाहरण दिलं. ओखी
चक्रीवादळाच्या नावाखाली इथल्या मच्छिमार समद
ु ायाला किनाऱ्यापासन
ू
दरू केलं गेलं. किनारी पर्यटनासाठी दारं खुली केली. तसंच जागतिक अन्न
संकटाचं कारण दे त औद्योगिक मत्स्यपालनाला मोकळीक दे ण्यात आली.
2019 च्या किनारी नियामक क्षेत्र अधिसूचनेत 1991 आणि 2011 च्या
CRZ - किनारी नियामक क्षेत्र अधिसूचनेतील अनेक महत्वाच्या तरतुदी
शिथिल केल्या.
गोवा गंत
ु वणक
ू धोरण 2014
हे धोरण दर्जेदार पर्यटन सुविधा निर्माण करण्यासाठी खाजगी गुंतवणुकीला
प्रोत्साहन दे ते. खाजगी जेट्टी किंवा टर्मिनल बांधण्यास तसेच पुरवठा
केंद्रांच्या निर्मितीला परवाना दे ते.
1999 मध्ये गुजरात पायाभूत सुविधा विकास GID कायदा लागू करण्यात
आला. या कायद्याने सार्वजनिक खाजगी भागीदारीला कायदे शीर चौकटीत
बसवलं गेलं.
3. समद
ु ायांशी सल्लामसलतीचा अभाव
कोणत्याही प्रकल्पावर स्थानिक समुदायांशी सल्लामसलत किंवा पूर्वसूचना
दे ऊन संमती घेण्यात आली नसल्याचं वरील सर्व उदाहरणांमध्ये लक्षात
येतं. 2014 च्या लोकसभा आणि 2016 च्या विधानसभा
निवडणुकांदरम्यान केरळ मधील विझिंजम बंदरांचं बांधकाम थांबवावं या
मागणीसाठी काही महिला, आमदार आणि खासदारांशी बोलल्या होत्या असं
एम. अमला यांनी सांगितलं. एका राजकीय संमेलनात पंधरा-वीस महिलांनी
बंदराचे काम थांबवण्याची मागणी थेट व्यासपीठावर जाऊन केली होती.
यापैकी काही महिलांनी बंदराच्या ऱ्हासाबाबत अभ्यास करण्यासाठी एका
स्वतंत्र संशोधन संस्थेसोबत सुद्धा काम केलं होतं. परं तु, कशाचाही उपयोग
झाला नाही. अमला यांच्या मते, "आपण हे सर्व प्रयत्न केले तरीही
सरकारला मात्र केवळ कॉर्पोरे ट कंपन्यांची वाढ/हित हवे आहे . एखाद्या
ठिकाणी विकास प्रकल्प सुरू करत असताना स्थानिकांशी चर्चा करूनच
निर्णय घेतले पाहिजेत मात्र याचा कोणाला फायदा होतोय, कोणावर वाईट
परिणाम होतो, मच्छीमारांच्या व्यवसायावर काय परिणाम होतो, यापैकी
कशाचाही विचार सरकार करीत नाही. "
महाराष्ट्रात, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने 2012 मध्ये पण
ु े येथील
राष्ट्रीय हरित लवादाकडे किनारी महामार्ग - कोस्टल रोडच्या विरोधात
याचिका दाखल केली होती. मात्र 2014 मध्ये निवत्ृ त झालेल्या
न्यायाधीशांच्या जागी नव्या न्यायाधीशांची नियुक्ती नं झाल्याने या
खटल्याची सन
ु ावणी प्रतीक्षेतच आहे . मच्छिमार कृती समितीचे किरण
कोळी यांच्या मते, " हरित लवादातील या रिक्त जागांवर नियुक्ती
करण्याबाबत सरकारची उदासीन आहे . राष्ट्रीय हरित लवादाने यापूर्वी जे
काही चांगले निर्णय दिले होते ती तत्व आता पाळली जात नाहीत लक्षात
येतंय. यापर्वी
ू 2005 मध्ये जेव्हा पेडर रोड उड्डाण पल
ु ाचा प्रश्न उपस्थित
झाला त्यावेळी प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी त्या पुलाच्या
बांधकामाला विरोध केला होता आणि त्यानंतर ते बांधकाम थांबवण्यात
आलं होतं. प्रसिद्ध व्यक्तिमत्वांचं म्हणणं ऐकून घेणारे सरकार हजारो
मच्छीमारांचे प्रश्न ऐकून घेऊ शकत नाही हे खरोखर खप
ू निराशाजनक
आहे .
या प्रश्नांशी निगडित असणाऱ्या आमच्यासारख्या संस्थांना दे खील
विश्वासात घेतलं गेलं नाही, 2019 च्या किनारी नियमक क्षेत्र
अधिसूचनेतील (CRZ) कलमांचे हे उल्लंघन आहे . 2011 मध्ये तत्कालीन
पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी CRZ 2011 ला कायदे शीर स्वरूप
दे ण्यापूर्वी मच्छीमारांना विश्वासात घेऊन चर्चा केली होती.