Professional Documents
Culture Documents
भारताच्या इतिहासात जेथे लढाई झाली त्या ठिकाणाचे नाव त्या लढाईला दिले जाते.
याला अपवाद म्हणजे 1760 ची उदगीरची लढाई असन
ू वास्तविक पाहता ही लढाई तांदळ
ु जा
ता.जि. लातूर या गावात झालेली असून ओघात झालेल्या लिखाणाची बाकीच्यांनी री ओढली. याचे
समकालीन अस्सल संदर्भ पहात असताना दिल्लीतील मोगल दर्ब
ु ल झाल्याने 1724 ते 1818
यादरम्यान दक्षिणेत है द्राबादचा निजाम आणि सातारचे छत्रपती यांच्यात सत्तासंघर्ष सुरू होता.
कुरघोडीच्या राजकारणामळ
ु े यांच्यात वारं वार लढाया झाल्या. त्यामळ
ु े 1758 -60 लातर मराठे
दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही आघाड्यावर लढताना दिसन
ू येतात. एकदा का निजामाचा
बंदोबस्त झाला म्हणजे उत्तरे त राजकारण करायला मोकळे झालो या भावनेने पेशव्यांनी निजाम
प्रांतावर आक्रमण करण्यास सुरुवात केली. त्यानुसार बिदर, भालकी, सिंदखेडवर आक्रमण करत
मराठ्यांनी नगरचा किल्ला जिंकून घेतला. मराठ्यांच्या सत्तेत ज्याप्रमाणे बाळाजी बाजीराव उर्फ
नानासाहे ब पेशवे असन
ू या आक्रमणात त्यांचे भाऊ सदाशिवरावभाऊ आघाडीवर होते त्याचवेळी
निजामाच्या गादीवर सलाबतजंग असून त्याची आघाडी त्यांचा भाऊ निजामअली सांभाळत होता.
ही लढाई तांदळ
ु जा येथेच का झाली, याचा परामर्श घेत असताना तांदळ
ु जा आणि गिरवली
ही दोन सर्वत्र निजाम राजवट असूनही स्वराज्यात होती हे विशेष आहे . संभाजीपुत्र छत्रपती शाहू
महाराजांनी 1743 साली ही गावे सरदार जानोजीराव नाईक बावणेंना इनाम दिलेली होती. विशेष
म्हणजे तांदळ
ु जा आणी गिरवली या गावात बावणेच्या अतिशय भव्य अशा गढया असून स्वत:
बावणे हे अक्कलकोटचे फत्तेसिहं भोसले यांच्या सैन्याच्या घोडदळाचे प्रमुख असल्याने त्यांच्याकडे
मोठ्या प्रमाणावर घोड्याची पागा आणि इतर रसद असणे स्वाभाविक आहे , त्यामुळे संपूर्ण
मराठवाड्यात तांदळ
ु जा म्हणजे मराठ्यांच्या फौजेचा लष्करी तळ असल्याने तेथे भले मोठे मैदान
असणे स्वाभाविक आहे . त्यामळ
ु े च मराठ्यांची फौज तांदळ
ु जा याठिकाणी थांबली. निजामाच्या
फौजेला एका बाजूला धारूर आणि दस
ु र्या बाजूला उदगीरहून लढवत लढवत तांदळ
ु ज्याच्या
मैदानावर ढकलत आणले. आजही तांदळ
ु जा येथील बावणेंच्या वंशजाकडे अनेक ऐतिहासिक
दस्तावेज उपलब्ध असून त्यात पितळी दर्बि
ु ण लक्ष वेधून घेते. अशारितीने तांदळ
ु ज्याच्या
लढाईमळ
ु े निजामाला हरवन
ू मराठ्यांनी दक्षिणेत एकहाती सत्ता निर्माण घेण्याची तयारी सरु
ु वात
केली होती. उत्तरे त दत्ताजी शिदं ें च्या निधनामळ
ु े पानिपतकडे जाण्याची निकड झाली. अन्यथा
है द्राबादवरही मराठ्यांचा जरीपटका फडकला असता.